०५ सप्टेंबर २०२४

काकोरी कट घटना


( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती. 


- दिनांक: ९ ऑगस्ट १९२५

- स्थान: काकोरी जवळ, लखनऊजवळील एक लहान गाव, (उत्तर प्रदेश) 


प्रमुख सहभाग:


- हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA): काकोरी घटना हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या सदस्यांनी घडवून आणली होती, ही १९२४ मध्ये स्थापन झालेली ब्रिटिश शासनाविरुद्ध लढण्यासाठीची क्रांतिकारी संघटना होती

.

- प्रमुख क्रांतिकारी: 

  - रामप्रसाद बिस्मिल (या ऑपरेशनचे नेते)

  - अशफाकुल्ला खान

  - चंद्रशेखर आझाद

  - राजेंद्र लाहिरी

  - रोशन सिंग

  - मुकुंदी लाल

  - सचिंद्र बक्षी

  - बनवारी लाल

  - केशब चक्रवर्ती

  - ठाकूर रोशन सिंग

  - विष्णु शरण दुब्लिश


उद्दिष्टे:


- क्रांतिकारी क्रियाकलापांसाठी निधी जमा करणे: काकोरी घटनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सरकारी निधी घेऊन जाणाऱ्या ट्रेनची लूट करणे होते. क्रांतिकारकांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी त्यांचे क्रियाकलाप चालवण्यासाठी आणि शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून पैसा जप्त करण्याचा प्रयत्न केला.


घटना:


- ९ ऑगस्ट १९२५ रोजी, क्रांतिकारकांनी काकोरी येथे ८-डाउन सहारनपूर-लखनऊ ट्रेनची चेन खेचून ट्रेन थांबवली. त्यांनी ट्रेनमध्ये ठेवलेली सरकारी पैसे असलेली तिजोरी लुटली. लुटलेली रक्कम सुमारे ₹८,००० होती, जी त्या वेळी एक मोठी रक्कम होती.


परिणाम:


- अटक आणि खटले: लुटीनंतर, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी HRA वर मोठा आघात केला. अनेक सदस्यांना अटक करण्यात आली आणि "काकोरी कट प्रकरण" नावाचा खटला चालवला गेला.


- शिक्षा:

  - रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी आणि रोशन सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि १९२७ मध्ये त्यांची फाशी झाली.

  - इतर क्रांतिकारकांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या, ज्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा देखील होती.


महत्व:


- स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा: काकोरी घटना ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या प्रतिकाराचे प्रतीक बनली. या घटनेमुळे अनेक तरुण भारतीयांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली.

- शहादत: बिस्मिल, अशफाकुल्ला खान, लाहिरी, आणि रोशन सिंग यांची फाशी भारतीय इतिहासात शहादत म्हणून ओळखली जाते, जी त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे.


वारसा:

- काकोरी घटना ही ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या धैर्याच्या कृती म्हणून ओळखली जाते, ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची तीव्रता वाढल्याचे दिसते. या घटनेत सहभागी झालेल्या क्रांतिकारकांचे स्मरण भारताच्या स्वातंत्र्य संघर्षातील नायक म्हणून केले जाते. उत्तर प्रदेशात विशेषतः दरवर्षी या घटनेचे स्मरण केले जाते.


ह घटना भारतातील क्रांतिकारक क्रियाकलापांमध्ये एक महत्त्वपूर्ण वळण म्हणून ओळखली जाते, ज्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध अधिक थेट आणि लढाऊ कृतींना चालना मिळाली. 


मुघल साम्राज्याचा उदय


♦️1. बाबर (सन 1526 ते 1530) :

✔️Founder 


✔️Battle of Khanwa

:Babur defeated Rana Sunga of Mewar and his allies.


✔️Battle of Ghaghra

Babur defeated the joint forces of the Afghans and Sultan of Bengal


✔️Babur defeated Ibrahim Lodi in the first battle of Panipat.



2. हुमायून (सन 1530 ते 1555) :


• बिहारमधील अफगाणचा प्रमुख शेरशहा सुरीने चौसाच्या लढाईत हुमायूमचा पराभव केला.

• यामुळे हुमायूमला पळून जावे लागले चौसाच्या दुसर्‍या लढाईत (सन 1540) हुमायूचा दुसर्‍यांदा पराभव करून मुघलांची सत्ता संपूष्ठात आणली.


3. शेरशहा सूरी (सन 1540 ते 1554) :-

:सूरी वंशाची स्थापना केली. शेरशहाने जनतेच्या हितार्थ अनेक योजना सुरू केल्या.

✔️जमीन महसूल सुधारणा: –

• शेतीची प्रत निश्चित करून उत्पादनानुसार शेतसारा निश्चित केला.

✔️रस्ते बांधणी :-

✔️चलन व्यवस्था :-

• त्याने रुपया हे नाणे सुरू केले.

✔️टपाल व्यवस्था :-


४.हुमायून (सन 1555 ते 1556) :


🔥His biography Humayunnama was written by Gulbadan Begum in Persian language.


5. अकबर (1556 ते 1606) :


   ✔️second battle of Panipat in 1556

  ✔️In the Battle of Haldighati, Rana Pratap Singh was severely defeated by the Mughal army

   ✔️ Chand Bibi defended Ahmednagar against the Mughal forces.


✔️Ibadat Khana (House of worship) at his new capital Fatepur Sikri.

• अकबर हा सहष्णू राजा होता.

• त्याने युद्धकैद्यांना गुलाम बनविण्याची प्रथा बंद केली.

• सतीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला.

• हिंदूवर लादण्यात आलेला झिझिया कर रद्द केला.

• बालहत्या प्रथा बंद केली.

• सर्व धर्माची तत्वे एकत्र करून दिन-ए-रलाही धर्माची स्थापना केली.

✔️, he promulgated a new religion called Din Ilahi or Divine Faith.

कला व विद्याप्रेमी :-

• अकबराच्या काळात आगर्‍याचा किशाल किल्याचे व फत्तेपूर शिक्रीचा किल्ला बांधला.

• अकबराच्या काळातच तानसेन व बैजू बाबरा सारखे गायक प्रसिद्धीला आले.

• अकबराच्या काळात अथर्ववेद, पंचतंत्र, रामायण व महाभारताचे फारसी भाषेत रूपांतर करण्यात आले.

• तुलसीदासचे रामचरितमानस याच काळात रचले गेले.

• अकबराच्या नवरत्न दरबार प्रसिद्ध होता.


6. जहांगीर (1606 ते 1627) :


• त्याने पूर्व बंगाल व पंजाबमधील कांगडा प्रांत राज्यास जोडले. हा राजा कलाप्रेमी होता.

• मुघल चित्रकलाशैली याच राज्याच्या काळात प्रसिद्धीला आली.

• काश्मिरमधील प्रसिद्ध निशांत बाग व शालिमार बाग जहांगीर राजनेच बांधली.

• जाहांगीरच्या कारभारावर नूरजहांचे नियंत्रण होते.


7. शहाजहान (सन 1627 ते 1658) :

• त्याने दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतूबशाहींना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले आणि त्याच्या मदतीने निझामशाही संपुष्टात आणली.

• 

• शहाजहान हा कलाप्रेमी राजा होता. त्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल नावाची जगप्रसिद्ध वास्तु बांधली. दिल्ली जामा मशीद आणी लाल किल्ला हे याच राज्याच्या काळात बांधले गेले.


8. औरंगजेब (सन 1658 ते 1707) :

👉🏾Alamgir, World Conqueror.


✔️ninth Guru of Sikhs Guru Tegbahadur was executed by Aurangazeb.


• औरंगजेबाच्या काळापर्यंत मुघल साम्राज्याची सत्ता संपूर्ण भारतभर पसरली होती. 


याच काळात पंजाब प्रांतात शिखांविरुद्ध संघर्ष सुरू झाला होता आणि महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.


• औरंगजेबास आपली 21 वर्षे मराठ्यांसोबत संघर्ष करण्यात खर्च करावी लागली. परंतु, त्यास यश आले नाही.

• शेवटच्या क्षणी सन 1707 मध्ये खुल्ताबाद येथे त्याचे निधन झाले. 



औरंजेबानंतरचे मुघल सम्राट कमकुवत निघाल्यामुळे प्रांतिक नवाबांनी आपले स्वतंत्र राज्य घोषित केले.


• सन 1857 च्या ऊठावात शेवटचा मुघल सम्राट बहादुरशहा जफर यास इंग्रजांनी अटक करून ब्रम्हदेशातील रंगून येथे ठेवले आणि तेथेच त्याचे निधन झाले.

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

- कलम: 315

- स्थापना: 1926

- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 


 📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

- कलम: 315

- संरचना: 1 अध्यक्ष + 6 सदस्य

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 


 🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 324

- स्थापना: 26 जानेवारी 1950

- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.


 🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 243K/ZK

- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.


 💰 CAG (महालेखा परीक्षक)

- कलम: 148

- स्थापना: 1858

- संरचना: 1 महालेखा परीक्षक

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.


 ⚖️ Lokpal (लोकपाल)


- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013

- स्थापना: 2019

- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.


⚖️ Lokayukta (लोकायुक्त)

- कायदा: राज्यस्तरीय कायदे

- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980

- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल 


 👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993

- स्थापना: 1993

- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)

- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.


👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993

- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001

- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य

- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.


🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)

- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003

- स्थापना: 1964

- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त

- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.


👨‍⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985

- स्थापना: 1985

- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: 


👨‍⚖️  MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985

- स्थापना: 1991

- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: 


📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)

- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978

- स्थापना: 1966

- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य

- कार्यकाल: 3 वर्षे

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार:


महत्वाचे खटले

❇️केशवानंद भारती खटला 1973:-

✍️भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सार्वभौम नाही तर दोघांच्या अधिकारामध्ये पर्याप्त संतुलन निर्माण करण्यात आले आहे

✍️प्रास्ताविक घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केले

✍️मूलभूत हक्काचं उल्लंघन करणाऱ्या कायदयला आव्हान देता येऊ शकेल


❇️मिनर्व्हा मिल खटला 1980:- 

✍️भारताची घटना मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यामधील संतुलन च्या आधारशिलेवर आधारलेली आहे

✍️घटनेने संसद ला घटनादुरुस्ती चा मर्यादित अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून संसद अमर्यादित अधिकारात बदलू शकत नाही

✍️राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेला दूषप्रवृत्ती च्या आधारावर आव्हान देत येऊ शकेल


❇️बेरुबारी युनियन खटला 1960:-

✍️प्रास्ताविक घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले


❇️ए के गोपालन खटला 1950:- (

✍️कलम 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृती च्या विरुद्ध उपलब्ध आहे ,असंगत कायदेशीर कृती विरुद्ध नाही


❇️मेनका गांधी खटला1978:- (https://t.me/joinchat/Rju74jGW683AtnSf)

✍️कलम 21 ला कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व लागू केले


❇️आय आर कोहेल्लो खटला 2007:- (https://t.me/joinchat/Rju74jGW683AtnSf)

✍️नवव्या अनुसुचितील कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकन पासून संरक्षण प्राप्त नाही.


❇️एस आर बोंमई खटला 1994:- (https://t.me/joinchat/Rju74jGW683AtnSf)

✍️घटना संघत्मक असल्याचे स्पष्ट केले तसेच संघराज्यवाद घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे स्पष्ट केले.

भाऊराव पायगौंडा पाटील


(२२ सप्टेंबर १८८७–९ मे १९५९). 


महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक. सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्यांचे शैक्षणिक व सामाजीक कार्य पाहून गाडगे महाराज (Gadge Maharaj) यांनी त्यांना कर्मवीर पदवी दिली.  ते अण्णा या नावानेही परिचित आहेत.

 जन्म:


कुंभोज (जि. कोल्हापूर) या खेड्यात पायगौंडा व गंगुबाई या जैन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे मूळ घराणे मूडब्रिदी (जि. दक्षिण कन्नड – कर्नाटक) गावचे. देसाई हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु पुढे त्यांच्या घराण्याला पाटीलकी मिळाल्याने ते देसाईचे पाटील झालेत. 


शिक्षण:

एतवडे बुद्रुक (जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे ते कोल्हापुरात इंग्रजी सहावीपर्यंत शिकले. राजर्षी शाहूमहाराजांच्या प्रभावाखाली त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. विद्यार्थिदशेतच सातव्या एडवर्ड बादशाहाच्या पुतळ्यास डांबर फासल्याच्या खोट्या आरोपावरून त्यांना तुरुंगवास सोसावा लागला. त्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु पुढे त्यांची सुटका होऊन त्यांनी कोल्हापूर सोडले.


भाऊराव हे ओगले काच कारखान्याचे व पुढे किर्लोस्कर नांगराचे १९१४ ते १९२२ या दरम्यान विक्रेते होते. या काळात ठिकठिकाणी खेड्यांत फिरल्यामुळे जनतेचे दारिद्र्य व शिक्षणाचा अभाव यांची जाणीव त्यांना झाली. 


कार्य:

१९०९ मध्ये दादा जिनप्पा मद्वण्णा यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह दूधगाव (जि. सांगली) येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली होती. या शिक्षण संस्थेपासून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी १९१९ मध्ये कराडजवळील काले या गावी त्यांनी पहिले वसतिगृह काढले (१९१९). तोच रयत शिक्षण संस्थेचा शुभारंभ होता. पुढे १९२४ मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढले. त्यास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी या वसतिगृहास १९२७ साली भेट दिली. त्या वेळी गांधीजींनी ‘भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तीस्तंभ है’ अशी कर्मवीरांच्या कार्यांची प्रशंसा केली. तेव्हापासून भाऊराव खादी वापरू लागले व राजकारणापासून दूर राहून शिक्षणाच्या कार्यास त्यांनी पूर्णतः वाहून घेतले. गोरगरीब पण हुशार मुले जेथेजेथे खेड्यापाड्यांत दिसतील, तेथून त्यांना उचलून आणून वसतिगृहात ठेवून पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळले. त्यांतील काही विद्यार्थांच्या परदेशी शिक्षणाची सोय पालक या नात्याने त्यांनीच केली. ‘स्वावलंबनाने कष्ट करून शिका’, या मंत्राबरोबरच भाऊरावांनी ‘तुम्हास एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा आणि शंभर वर्षांची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा’ हा संदेश दिला.

सत्यशोधक चळवळीशी त्यांचा अत्यंत संस्कारक्षम अशा वयात आलेला निकटचा संबंध. या चळवळीतून बहुजनसमाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळावयाची, तर तिचा रोख शिक्षण प्रसाराच्या द्वारा त्या समाजातील अनिष्ट रूढी व अंधश्रद्धा नष्ट करण्याकडे असणे आवश्यक होते. भाऊरावांनी शिक्षणकार्य पतकरून हे साधण्याचा नेटका प्रयत्न केला. या कार्यामुळे विरोधक व सनातनी मंडळींचा रोष होऊन त्यांना जाच सहन करावा लागला. सर्व जातिधर्माचे आजन्म कार्यकर्ते सेवक या संस्थेत तयार झाले.वटवृक्ष हे बोधचिन्ह व स्वावलंबी शिक्षण हे संस्थेचे बोधवाक्य ठरले. भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या कार्यास मनःपूर्वक साथ दिली. महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले (Mahatma Jyotirao Govindrao Phule) व राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Mharaj) यांची शिक्षणाप्रसाराची इच्छा त्यांनी पूर्ण केली. ते सत्यशोधक समाज (Satyashodhak Samaj) याचे एक महत्त्वाचे सदस्य होते. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट्.’ ही सन्मान्य पदवी अर्पण केली. 


निधन:

भाऊराव यांचे हृदयविकाराने पुणे येथे निधन झाले.

०२ सप्टेंबर २०२४

स्पर्धा परीक्षा - इतिहास विषय तयारी


● मुळात इतिहास हा विषय आवडीने अभ्यास करण्याचा आहे. परंतु काही विद्यार्थ्यांना यातील वंशावळी, सणावळी याची अकारण भीती वाटते. इतिहास विषयाच्या अभ्यासाची पायाभरणी पद्धतशीरपणे केली तर काहीच कठीण नाही. 


● प्रामुख्याने इतिहास विषयाचे तीन भाग पडतात. प्रथम म्हणजे प्राचीन इतिहास, दुसरा मध्ययुगीन इतिहास व तिसरा म्हणजे अर्वाचीन इतिहास. यातही आपल्याला भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. मग एमपीएससी वा तत्सम स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, तर महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासावाच लागेल.

इतिहास अभ्यासाची पूर्वतयारी करताना त्याला प्रामुख्याने तीन भागात विभागून अभ्यास करणे सोईचे होईल. 


● प्राचीन इतिहास अभ्यासायचा म्हटला तर अगदी सिंध संस्कृतीच्या इतिहास पासून सुरुवात करून वैदिक युग, बौद्ध साहित्य, जैन साहित्य, मगध राज्य, मौर्य साम्राज्य त्यानंतरची राजवंश जसे कण्व, कुपाल, गुप्त साम्राज्य, हुण, राजपूत, गुर्जर, प्रतिहार, कनौज, पाल, येथपर्यंतचा कालावधी सर्व तपशीलवार अभ्यासणे आलेच. या सर्वांच्या काळातील वैशिष्ट्ये, सणावळी लक्षात ठेवणे जिकरीचे काम तर आहेच; सोबतच कठीण आहे. 


● पण त्यासाठी वर्ग 8 ते 12 पर्यंतची इतिहासाची पुस्तके फारच उपयोगी पडतात. एनसीईआरटी व राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके वाचावी लागतील. त्यातून स्वत:ची टिपणे काढावीत व स्वतंत्र वहीत लिहून ठेवावीत. हीच बाब मध्ययुगीन इतिहास व अर्वाचीन इतिहासाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. 


● मध्ययुगीन इतिहास म्हटला तर सुुलतान घराण्यापासून तर खिलजी, तुघलक, लोधी, मुगल साम्राज्यातील बाबर, हुमायुन, अकबर, शहाजहान, औरंगजेबपर्यंतचा तपशीलवार इतिहास अभ्यासावा लागेल, तर अर्वाचीन इतिहासासाठी 1850 च्या उठावापासून तर स्वातंत्र्यापर्यंत व स्वातंत्र्योत्तर काळातील अगदी आतापर्यंतच्या घटनांचा अभ्यासही करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे इतिहासाची विभागणी करून पूर्वतयारी होण्यात मदत होते.

झांशी संस्थान :

 ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील अठराव्या शतकातील बुंदेलखंडातील एक संस्थान. हे संस्थान उत्तरेस ग्वाल्हेर संस्थान व जालौन, पूर्वेस धसान नदी, पश्चिमेस दतिया, ग्वाल्हेर ही संस्थाने, दक्षिणेस ओर्छा संस्थान यांनी सीमांकित झाले होते.


 झांशी संस्थानातून ब्रिटिशांनी झांशी जिल्हा निर्माण केला. त्याचे क्षेत्रफळ ९,२८२ चौ. किमी. लोकसंख्या सु. पाऊण लाख (१८५४) व उत्पन्न ४·३ लाख रु. होते.


प्राचीन काळी या संस्थानच्या आसपास परिहार, काठी राजपूत व गोंड लोकांची वस्ती होती. काही वर्षे ते चंदेल्लांच्या अंमलाखाली होते.


 ११८२ साली पृथ्वीराजाने चंदेल्लांचा पराभव केला. तेराव्या शतकारंभी कुत्‌बुद्दीन (१२०२-०३) व अल्तमश (१२३४) यांनी या प्रांतावर स्वाऱ्या केल्या. नंतर हा प्रदेश खेंगर टोळीच्या ताब्यात गेला.


 त्यांनीच येथे किल्ला बांधला. तेराव्या शतकात रुद्रप्रताप बुंदेल्याने खेंगरांचा पराभव करून तेथे राज्य स्थापिले. त्याचा मुलगा भारतीचंद्र याने १५३१ मध्ये ओर्छा शहर वसविले. ओर्छाचा राजा बीरसिंगदेव याने १६१३ मध्ये झांशीची स्थापना करून झांशीचा किल्ला बांधला. अकबर, शाहजहान व वीरसिंग यांच्यात चकमकी उडाल्या होत्या. 


सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात चंपतराय बुंदेला याचा मुलगा छत्रसाल याने झांशीवर आपला अधिकार प्रस्थापित केला. त्याने पहिल्या बाजीरावास मुसलमानांविरुद्ध मदतीस बोलाविले. बाजीरावने मुसलमानांचा पराभव केला.


 त्याबद्दल छत्रसालने बुंदेलखंडाचा तिसरा हिस्सा बाजीरावास देण्याचे कबूल केले. हा करार प्रत्यक्ष पाळला गेला नाही.


 महाराष्ट्रातून कोणी सरदार जाऊन सालीना सहा लक्षांची खंडणी वसूल करी. १७४२ मध्ये मल्हार कृष्ण व राणोजी शिंदे हे झांशीस गेले असता ओर्छाकरांनी त्यांचा पराभव करून मल्हार कृष्णचा खून केला. तेव्हा पुण्याहून गेलेल्या नारो शंकराने ओर्छाकरांचा पराभव करून झांशी मराठ्यांच्या ताब्यात आणली.


 पेशव्यांनी मल्हार कृष्णच्या वंशजांना झांशीची जहागीर दिली. १७४२ ते १७७० पर्यंत नारो शंकर, बाबुराव, कान्हेरपंत, विश्वासराव लक्ष्मण हे झांशीचे सुभेदार होते. 


नारो शंकराने झांशीचा किल्ला ताब्यात घेऊन किल्ल्याला लागून नवीन शहर वसविले. हाच झांशी संस्थानचा संस्थापक. झांशीची सुभेदारी वंशपरंपरेने १७७० मध्ये रघुनाथ हरी नेवाळकर यांच्या घराण्याकडे आली.


 रघुनाथरावाने २५ वर्षे कारभार केल्यानंतर आपला भाऊ शिवराव याच्या नावाने पुण्याहून वस्त्रे मागविली. इंग्रजांनी बुंदेलखंडावर चाल केली, तेव्हा शिवरावने त्यांना साह्य केले. ६ फेब्रुवारी १८०४ रोजी इंग्रज आणि शिवराव यांच्यात तह झाला.


 १८ वर्षे कारभार केल्यानंतर शिवरावचा नातू रामचंद्रराव हा गादीवर आला. १३ जून १८१७ रोजी पेशवे आणि इंग्रज यांच्यात झालेल्या तहान्वये झांशी संस्थान हे इंग्रजांच्या ताब्यात गेले.


 इंग्रज व रामचंद्रराव यांच्यात तह होऊन इंग्रजांनी झांशी संस्थान रामचंद्ररावाकडे वंशपरंपरेने चालविण्याचे मान्य केले. भरतपूरच्या वेढ्यात रामचंद्ररावाने इंग्रजांना साह्य केले म्हणून १८३२ मध्ये इंग्रजांनी त्याला महाराज हा किताब दिला.


 १८३५ मध्ये रामचंद्ररावानंतर त्याचा चुलता रघुनाथराव गादीवर बसला, पण तो १८३८ मध्ये मरण पावला. त्यानंतर त्याचा भाऊ गंगाधरराव गादीवर आला, पण वाद होऊन १८३८ ते १८४३ पर्यंत इंग्रजांनी झांशी संस्थानचा कारभार आपल्या हातात घेतला. पुढे इंग्रजांनी गंगाधररावाबरोबर तैनाती फौजेचा तह केला. तहाप्रमाणे २,२७,००० रु. वसुलाचा मुलूख इंग्रजांना मिळाला. 


गंगाधररावांची पहिली पत्नी मरण पावल्यावर त्याने मोरोपंत तांबे यांची मुलगी लक्ष्मीबाई (मनुबाई) हिच्याशी लग्न केले. १८५३ मध्ये गंगाधरराव व लक्ष्मीबाई यांनी नेवाळकर घराण्यातील आनंदराव यास दत्तक घेतले. नंतर त्याच साली गंगाधरराव मरण पावले.


 १८५४ साली लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस अमान्य करून झांशी संस्थान ब्रिटिश राज्यात समाविष्ट केले. लक्ष्मीबाईने आपला दत्तक मंजूर व्हावा, म्हणून खटपट केली. ती अखेरपर्यंत आशावादी होती आणि इंग्रजांना मदत करीत होती. 


अखेर राणीला वार्षिक ६०,००० रु. तनखा देऊन तिला शहरातील राजवाड्यात राहण्याची परवानगी दिली. १८५७ च्या उठावात झांशी इंग्रजांच्या हाती पडू नये, म्हणून राणीने आटोकाट प्रयत्न केले. अखेरीस राणी रणांगणी मृत्यू पावली.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?


देशातील प्रत्येक कारागीर कार्व्हर्सवासीय चालनांचा अहवाल राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या वेळी किंवा तणावग्रस्त देशांच्या स्वराज्यनिश्चिती: देशाच्या त्या देशातील राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारख्या आहेत.


कल्चरमचा कलम 356 नार, जेव्हा राज्यातील प्रशासकीय कार्यक्रम घटनात्मक परिस्थिती चालविते राष्ट्रपती राजपूत लागू होतात.


सामाजिक कलम 365 नूसार, राज्य सरकारच्या निर्देशांबद्दल दुर्लक्ष झाले तर संबंधित देशव्यापी राजवट घोषित करणे आवश्यक आहे.


देशपातळीवर लागू होणा दोन्या दु: खाचा त्रास कमी होणे आवश्यक आहे.


संसदेच्या माहुरीवर सहा दिवस राष्ट्रपती राजवट लागू होतात.


संसदेणे पुढील सहा वर्षाचे प्रमाणित राष्ट्रपती राजवतीचा कालावधी कमी होणे.


संसदेची प्रमाणित वास्तविकता, भावनांचा दोनदा अनुभव तीन वर्षांचा प्रदेश राष्ट्रपुत्र लागू करणे आवश्यक आहे.


राष्ट्रपती राजवती न्यायालयीन राज्ये सर्व राष्ट्र राष्ट्रपती हाती असतात.


राष्ट्रपती पुनर्निधी असे बहुमत पाळणारे राज्यपाल चालवा राज्य चालवा.


राज्यपाल राज्याचे मुख्य सत्य कार्यवाही चालतात.


राष्ट्रपती राजवतीशी संबंधित राज्याची पद्धतशीर कार्ये, अधिकार संसदेकडे सोप एब्ले.


राष्ट्रपती अध्यादेश राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.


लोकांच्या भेटीगाठींच्या बैठकीत काही काळ खर्च होत नाही.


राष्ट्रपती राजवती उच्चस्तरीय अधिकार अबाधित असतात.


संबंधित राज्यातील वातानुकूलित विदर्जन दिशानिर्देशित राष्ट्रपती असतात

भूगोल नोट्स


☀️  जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.

☀️  भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

☀️  भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,

दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

☀️  क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

☀️  इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

☀️  पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

☀️  जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

☀️  भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

☀️  भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.

☀️  भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते 


   🖊 क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप 


   मि - मिझोराम

    त्र - त्रिपुरा

    म - मध्य प्रदेश

  झा - झारखंड

    रा - राजस्थान

    गु - गुजरात

  छा - छत्तीसगड

    प - पश्चिम बंगाल


सिंधू संस्कृती



1) समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.


2) सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.


3) १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.


4) नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


5) १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.


6) रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.


7) प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.


8) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.


9) सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.


10) सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.


11) भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.


12) अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.


13) सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.


14) हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.


15) सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.


16) हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.


17) राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.


18) माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

Mpsc प्रश्न सराव


1) भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वत रांगेमुळे अलग होतात.

   1) बालाघाट    2) महादेव    3) सातपुडा    4) अजिंठा


उत्तर :- 1


2) उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खो-यांचा क्रम बरोबर आहे ?


   1) तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा    2) तापी, गोदावरी, सीना, कृष्णा, भीमा

   3) भिमा, गोदावरी, तापी, कृष्णा, सीना    4) तापी, सीना, गोदावरी, कृष्णा, भिमा


उत्तर :- 1


3) खालील कोणते विधान चुकीचे आहे ?


   अ) दक्षिण पठारात गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते.

   ब) गोदावरीनंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे.

   क) महानदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वांत मोठे खोरे आहे.

   ड) नर्मदा व कावेरी नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे.

   1) ब      2) क      3) ड      4) कोणतेही नाही


उत्तर :- 4


4) खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे ?


   1) गोदावरी    2) भीमा      3) कृष्णा      4) वरील एकही नाही


उत्तर :- 2


5) योग्य जोडया लावा.


  धबधबे      ठिकाण

         अ) मार्लेश्वर      i) सातारा

         ब) ठोसेघर      ii) रत्नागिरी

         क) सौताडा      iii) अहमदनगर

         ड) रंधा      iv) बीड


    अ  ब  क  ड


           1)  ii  iii  i  iv

           2)  iv  iii  ii  i

           3)  i  iv  iii  ii

           4)  ii  i  iv  iii


उत्तर :- 4



1) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?


   1) तापी    2) वैनगंगा    3) नर्मदा      4) कृष्णा


उत्तर :- 2


7) पुढील कोणते /ती विधान/ ने योग्य आहेत ?


   अ) सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे.

   ब) वणी हे गाव निरगुडावर वसलेले आहे.


   1) केवळ अ योग्य  2) केवळ ब योग्य    3) अ व ब दोन्ही योग्य  4) अ व ब योग्य नाहीत


उत्तर :- 2


8) जोडया लावा.


  जिल्हा      धबधबा

         अ) अहमदनगर    i) सौताडा धबधबा

         ब) अमरावती    ii) सहस्त्रकुंड धबधबा

         क) बीड      iii) रंधा धबधबा

         ड) यवतमाळ    iv) मुक्तागिरी धबधबा

    अ  ब  क  ड


           1)  ii  iii  iv  i

           2)  i  iv  iii  ii

           3)  iii  iv  i  ii

           4)  iv  ii  iii  i


उत्तर :- 3


9) खालील विधाने पहा.


   अ) भिमा ही कृष्णेची उपनदी आहे.

   ब) इंद्रायणी ही भिमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे.

   क) भोगवती ही सिना नदीची उपनदी आहे.

   1) विधान अ आणि ब बरोबर आहेत.    2) विधान अ आणि क बरोबर आहेत.

   3) विधान ब आणि क बरोबर आहेत.    4) सर्व विधाने बरोबर आहेत.


उत्तर :- 4


10) खालील कोणती तापीची उपनदी नाही ?


   1) पूर्णा    2) पांझरा    3) दुधना      4) गिरणा


उत्तर :- 3

खिलजी_वंश



1. जलालुद्दीन फिरोज खिलजी के शासन का समय रहा है ?

►-(1290-96) जलालुद्दीन फिरोज खिलजी


2. जलालुद्दीन फिरोज खिलजी दिल्ली की गद्दी पर कब बैठा ?

►-1290 ई.


3. सुल्तान बनने से पहले जलालुद्दीन क्या था ?

►-बुलंदशहर का इफ्तादार


4. नवीन मुसलमान किसे कहा गया ?

►-दिल्ली में बसने वाले मंगोलों को ।


5. किसने जलालुद्दीन फिरोज खिलजी की हत्या कर दिल्ली की गद्दी हासिल की 

►-अलाउद्दीन खिलजी (1296 ई. में)


6. अलाउद्दीन खिलजी के शासन का समय रहा है ?

►-(1296-1316 ई.) अलाउद्दीन खिलजी


7. जलालुउद्दीन खिलजी के शासन में अलाउद्दीन क्या था ?

►-कड़ा-मानिकपुर का सुबेदार


8. उसने देवगिरी पर कब आक्रमण किया ?

►-1296 ई.


9. सिकंदर-ए-सानी की उपाधि किसने ग्रहण की ?

►-अलाउद्दीन


10. अलाउद्दीन के समय किसने दिल्ली में विद्रोह किया था ?

►-हाजियों ने ।


11. हाजियों के विद्रोह को किसने खत्म किया ?

►-हमीदुद्दीन


12.अलाउद्दीन ने कौन-सा सिद्धांत चलाया था ?

►-दैवी अधिकार


13. अलाउद्दीन खिलजी ने सेना में कौन-सी प्रथा शुरू की ?

►-हुलिया रखने की प्रथा ।


14. खिलजी वंश में घोड़ों को दागने की पद्धति किसने शुरू की ?

►-अलाउद्दीन खिलजी ।


15. भू-राजस्व व्यवस्था को अधिक प्रभावी बनाने के लिए अलाउद्दीन खिलजी ने किसकी स्थापना की ?

►-दीवान-ए-मुस्तखराज


16. अलाउद्दीन का प्रसिद्ध सेनापति कौन था जिसने दक्षिण भारत अभियान का नेतृत्व किया था ?

►-मलिक काफूर


17. अलाउद्दीन के दरबारी कवि कौन थे ?

►-अमीर खुसरो


18. सितार एवं तबले के अविष्कार का श्रेय किन्हें जाता है ?

►-अमीर खुसरो


19. इब्नबतूता की पुस्तक रेहला में किस शासक की घटनाओं का वर्णन है ?

►-मुहम्मद तुगलक


20. अलाउद्दीन की मृत्यु के बाद दिल्ली का सुल्तान कौन बना ?

►-कुतुबुद्दीन मुबारक । इसने खलीफा की उपाधि ग्रहण की ।

पोलीस भरती प्रश्नसंच

 1. अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला —– म्हणतात.

आकाशगंगा

 दीर्घिका

 तेजोमेघ  

तारकामंडल

उत्तर : आकाशगंगा


2. अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात.

 भांगाची भरती

उधानाची भरती

 ध्रुवीय भरती

 विषुववृत्तीय भरती

उत्तर : उधानाची भरती


 3. रिश्टर हे —– तीव्रता मोजण्याचे एकक आहे.

 भूपट्ट निर्मिती

 ज्वालामुखी

भूकंप

 मंद हालचाली

उत्तर : भूकंप


 4. —– पासून अॅल्युमिनियम मिळवले जाते.

 तांबे

 बॉक्साइट

 लोखंड

मॅगनीज

उत्तर : मॅगनीज


 5. —– हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे.

 हिराकुंड

 जायकवाडी

भाक्रा नांगल

 तुंगभद्रा

उत्तर : भाक्रा नांगल


 6. काथ —– या वृक्षापासून बनवितात.


 साल

 देवदार

 हलदू

खैर

उत्तर : खैर


 7. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर —– आहे.

 कळसूबाई

धुपगड

 महेंद्रगीरी

 अनैमुडी

उत्तर : धुपगड


 8. मॅग्रुव्ह वनस्पतीचे मूळ स्थान —– देशात आहे.

भारत

 नेपाळ

 चीन

 म्यानमार

उत्तर : भारत


 9. —– हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे.

व्हेनिस

 नेपल्स

 मिलान

 तुरीन

उत्तर : व्हेनिस


 10. —– हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

 श्रीलंका

 आयर्लंड

ग्रीनलंड

 ऑस्ट्रेलिया

उत्तर : ग्रीनलंड


 11. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात —– पर्वत आहे.


 हिमालय

अंडीज

 आल्पस

 रॉकी

उत्तर : अंडीज


 12. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील —– क्रमांकाचा देश आहे.

 पाचव्या

 सहाव्या

सातव्या

 आठव्या

उत्तर : सातव्या


 13. अंदमान निकोबर बेटाची राजधानी —– आहे.

 पोर्टब्लेयर

कंवरती

 दिल्ली

 सिल्वासा

उत्तर :कंवरती


 14. इंदिरा गांधी कालवा —– राज्याच्या वायव्य भागात आहे.

 गुजरात

राजस्थान

 उत्तर प्रदेश

 मध्य प्रदेश

उत्तर : राजस्थान


 15. गुरुशिखर हे —– पर्वतातील उंच शिखर आहे.

 विंध्य

 सातपुडा

अरवली

 हिमालय

उत्तर : अरवली


 16. कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर —– राज्यात आहे.

 ओडिसा

 केरळ

कर्नाटक

 आंध्रप्रदेश

उत्तर : कर्नाटक


 17. भारतीय पठारावरील —– पश्चिम वाहिनी नदी आहे.

नर्मदा

 कृष्णा

 गोदावरी

 कावेरी

उत्तर : नर्मदा


 18. सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते?

 मीटर

 रिश्टर

फॅदम

 फूट

उत्तर : फॅदम


 19. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश —– नावाने ओळखला जातो.

 पंपाज

डाऊन्स

 प्रेअरी

 व्हेल्ड

उत्तर : डाऊन्स


 20. —– हा जागृत ज्वालामुखी आहे.

 व्हेसूव्हियस

 किलीमांजारो

 काटमाई

फुजियामा

उत्तर : फुजियामा

साम्यानज्ञान प्रश्नोउत्तरे -भूगोल(भारत) (Geography)


🔹 1. मुंबर्इ बंगलोर NH-4 हा कोणता मार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग ✅ 

राज्य मार्ग

जिल्हा मार्ग

ग्रामीण मार्ग


🔹 2. खालीलपैकी कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभजक आहे.

अरवली 

विंध्य

सहयाद्री

सातपुडा ✅


🔹 3. सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात?

पश्चिमी घाट ✅

निलगिरी पर्वत

अरवली पर्वत

सातपूडा पर्वत


🔹 4. भारतातील प्रमुख अवकाश केंद्र ………… आहे

श्रीहरीकोटा ✅

कोचीन

हसन

बेंगलोर


🔹 5. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.

कॄष्णा 

दामोदर

अलमाटी

सतलज ✅


🔹 6. ........... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

जोग ✅

नायगारा

कपिलधारा 

शिवसमुद्र


🔹 7. पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण धृवाकडे चालत गेल्यास कोणत्या रेखा किंवा अक्ष वृत्तवर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा शेवट होतो.

९०° अक्षांश 

६०° अक्षांश

१८०° अक्षांश ✅

३८०° अक्षांश


🔹 8. आठव्या पंचवार्षिक योजनेत रेल्वेच्या कशावर अधिक भर देण्यात आला आहे.

विद्युतीकरणावर ✅

रूंदीकरणावर

संगणकीकरणावर

खासगीकरणावर


🔹 9. ............... हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

श्रीलंका 

आयर्लंड

ग्रीनलंड ✅

ऑस्ट्रेलिया 


🔹 10. नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते?

पाणी 

तापमान 

वातावरण ✅

खेळ क्लुप्त्यांचा :- अभ्यास थोडासा वेगळा


1) महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या


क्लुप्ती : विन सातसा गोहभी मकृ:


वि- विध्य पर्वत

न – नर्मदा

सा- सातपुडा

ता- तापी

सा – सातमाळ

गो- गोदावरी

ह –हरिचंद्र बालघाट

भी –भीमा

म- महादेव

कृ- कृष्णा


2) भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ?


कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते


क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”


गु = गुजरात

झ = झारखंड

ती = छातीसगड

प = पं. बंगाल

र = राजस्थान

म = मध्यप्रदेश

मि = मिझोरम

त्र = त्रिपुरा


3) भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार


क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले


क = काश्मीर हिमालय

प  =  पंजाब हिमालय

कु = कुमाऊ हिमालय

ने   = नेपाळ हिमालय

पूर्व हिमालय = पूर्व हिमालय


4) हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके


क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'


शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दार्जी– दार्जीलिंग


5) बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा


क्लूप्त्या : “मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.


6) द्वीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.


क्लुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला""


अन्ना = अनायमुडी - २६९५

दोन = दोडाबेटा - २६३

गुरु = गुरुशिखर - १७२२

काळूबाई = कळसुबाई - १६४६

धूप = धुपगड = १३५०


7) भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत


क्लुप्ती : "कृत्ति" मुंगूस.

कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

ति - तिलैया प्रकल्प (झारखंड)

मुगू - मुद्रा प्रकल्प (गुजरात)

स - ससन प्रकल्प (मध्य प्रदेश)


8) भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?


क्लुप्ती : "MIM BSP"


M - म्यानमार

I - इंडोनेशिया

M - मालदीव

B - बांगलादेश

S -श्रीलंका

P - पाकिस्तान


9) आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.


क्लुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.


आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ - ऊर्जा


१0) सदिश राशी कशा लक्षात ठेवाल.


क्लुप्ती : "सविता वेग वजन बग "


स - संवेग

वि - विस्थापन

त - त्वरण

वेग

वजन

ब - बल

ग - गती


१1) दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने


क्लुप्ती : ऑबिलीपी


ऑ - अन्थ्रासाईड

बी  - बिटूमिंस

लि - लिग्नाईट

पी - पिट


१2)  महाराष्ट्रातील घाट


आंबा कोर -आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

माथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाट

बापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट.

कुंभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

खांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

मुना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट


१3) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”


सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१4) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”


सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१5) महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा


क्लूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर

             आंबा पडला सावित्रीवर

             वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

             काळी गेली तळ्यात खोलवर’

सूर्या नदी


वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ -  काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी


१6)  महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम


क्लूप्त्या : 'गोभीकृतान '


गो - गोदावरी

भी - भीमा

कृ - कृष्णा

ता - तापी

न - नर्मदा


महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा


*देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर्वताच्या रांगा राज्याचा प्राकृतिक कणा असून उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा व पूर्वेस असलेल्या भामरागड-चिरोली-गायखुरी या डोंगररांगा राज्याच्या नैसर्गिक सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस गुजरात उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस आंध्रप्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व नैऋृत्येस गोवा ही राज्ये आहेत. 


*राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्‍या हिवाळ्यात टिकून राहते. 


*पश्‍चिम समुद्र तटावरून येणार्‍या पावसाळी ढगांमुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर 400 सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. समुद्र किनारपट्टीवरील कोकणात मुसळधार पाऊस पडतो व तो उत्तरेकडे सकरताना कमी होत जातो. सह्याद्रीच्या पूर्वेला पश्‍चिम पठारावरील जिल्ह्यात 70सेंमी एवढा अत्यल्प पाऊस पडत असून सोलापूर व अहमदनगर हे सर्वाधिक कोरडे जिल्हे आहेत. पूर्वेस विदर्भ व मराठवाड्याकडे सरकताना पावसाचे प्रमाण काहीसे वाढते. 


*लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असून राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3.08 लक्ष चौ.कि.मी. आहे. जनगणना, 2011 नुसार राज्याची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी असून ती देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.3 टक्के आहे.


* राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून 45.2 टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते. राज्यात 36 जिल्हे असून प्रशासकीय सुविधेसाठी ते कोकण, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा महसुली विभागातविभागले आहेत.


* जिल्हा स्तरावरील नियोजनासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. स्थानिक प्रशासनासाठी राज्याच्या ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या व 27,920 ग्रामपंचायती आहेत, तर नागरी भागात 26 महानगरपालिका, 230 नगरपरिषदा, 110 नगरपंचायती व सात कटक मंडळे आहेत.


* मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून बहुतांशी प्रमुख खाजगी कंपन्या व वित्तीय संस्थांची मुख्यालये या शहरात आहेत. देशातील प्रमुख वायदे व भांडवली बाजार आणि विक्रेय वस्तू व्यापार विनिमय केंद्रे मुंबईत आहेत.


* राज्यातील 234 लाख हेक्टर जमीन लागवडीखाली तर 52.1 लाख हेक्टर वनांखाली आहे. सिंचनात वाढ व्हावी यासाठी अनेक सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. बिगर सिंचन क्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे गतीने होण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 


*महाराष्ट्राला ‘2019 पर्यंत पाणी टंचाई मुक्त राज्य’ करण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले असून याद्वारे दरवर्षी 5,000 गावे पाणी टंचाई मुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. 


*पशुसंवर्धन हे कृषि क्षेत्राशी संबंधीत महत्त्वाचे क्षेत्र आहे. देशातील पशुधन व कुक्कुट पक्ष्यांच्या संख्येमध्ये राज्याचा हिस्सा अनुक्रमे 6.3 टक्के व 10.7 टक्के आहे.


* महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे. लघु उद्योगात हे अग्रेसर असून देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगि क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याने सातत्य राखले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे हे प्रमुख केंद्र आहे.


* जनगणना 2011 नुसार अखिल भारतीय स्तरावरील 73 टक्के साक्षरता दराच्या तुलनेत राज्याचा साक्षरता 82.3 टक्के आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिले जात असून राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या उत्कृष्ट संस्था आहेत. 


*भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसारदेशाचा मानव विकास निर्देशांक 0.467 आहे तर राज्यासाठी तो 0.572 आहे. मानव विकास निर्देशांकात भारताचा सध्या 130 वा क्रमांकआहे. 


*महिला धोरण राबविणारे तसेच महिलांच्या विकासासाठी ‘महिला व बालकल्याण’ या स्वतंत्र विभागाची स्थापना करुन अर्थसंकल्पीय तरतूद करणारे हे पहिले राज्य आहे. रोजगार हमी योजना राबविणारे हे आद्यप्रवर्तक राज्य असून केंद्र शासनाने ही येाजना अंगिकारली आहे. 


*महाराष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमांनी रेखांकित केलेले राज्य नसून येथील जनतेने संघटितरित्या परिश्रमपूर्वक घटविलेले राज्य आहे. या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृती विकसित होण्यास नैसर्गिक तसेच सांस्कृतिक विविधता सहाय्यभूत झाली आहे. स्वतःची अध्यात्मिक बैठक असलेले हे राज्य ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. 


*राज्याने देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावली आहे. अजंठा, वेरूळ व घारपुरीची लेणी, गेट वे ऑफ इंडिया आणि वास्तुशास्त्राच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तू


जसे विहार व चैत्य यामुळे जगभरातील पर्यटक राज्याकडे आकर्षित होतात. 


*मानव विकासास सहाय्यभूत ठरणार्‍या प्रत्येक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्तिमत्त्वे राज्यात उदयास आली आहेत. क्रीडा, कला, साहित्य व सामाजिक सेवा यामध्ये राज्याचे भरीव योगदान आहे. ‘बॉलीवूड’ नावाने जगप्रसिद्ध असलेला चित्रपट उद्योग राज्यात स्थित आहे.

मान्सूनचे स्वरूप

अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल

ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

क) मान्सूनचा खंड

ड) मान्सूनचे निर्गमन


▪️अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल


या घटकाची माहिती  आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇


▪️ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण


1) आर्द काल व शुष्क काल

- सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.

- अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .

- आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो  


2) पाऊसाचे  वितरण

- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .

- नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .

-  पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . 

- पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

 

3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध

- बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .

- आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ; याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.

- पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.


क) मान्सूनचा खंड

- नैऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात.


🔹पाऊस न पडण्याची अनेक कारणे पुढीलप्रमाणे ....


- पाऊस घेऊन येणारे उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने अश्या प्रकारचा खण्ड पडतो . 

- उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही.

- भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.

 - पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे पाऊस पडत नाही . 

- तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .


ड) मान्सूनचे निर्गमन

- वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते .

- मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.

_____________________________________

हिमालयातील महत्वाच्या खिंडी


1. अघिल खिंड:

काराकोरम मध्ये K2 च्या उत्तरेस आहे .

चीनच्या शिनजियांग (सिंकियांग) प्रांतासह लडाखमध्ये सामील होते .


2. बनिहाल खिंड:

पीर-पंजाल पर्वतरांगा मध्ये स्थित आहे .

जम्मूमध्ये श्रीनगरला जोडते.

जवाहर बोगद्याचे उद्घाटन डिसेंबर 1956 मध्ये झाले.


3. बारा लाचा खिंड:

जम्मू आणि काश्मीर मध्ये स्थित आहे .

मनाली आणि लेहला जोडते.


4. बोमडी-ला खिंड:

अरुणाचल प्रदेशातील ग्रेटर हिमालयात भूतानच्या पूर्वेला स्थित आहे .

ल्हासा (तिबेटची राजधानी)आणि अरुणाचल प्रदेशला जोडते .


5. बुर्जीला खिंड:

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेजवळील नियंत्रण रेषेच्या जवळ स्थित आहे.

हे काश्मीर खोऱ्याला लडाखच्या देवसाई मैदानाशी जोडते.


6. चांग-ला खिंड:

हा ग्रेटर हिमालयातील एक उंच पर्वत मार्ग आहे. हा देशातील सर्वात उंच पर्वत रस्त्यांपैकी एक आहे.

चांग-ला खिंड हिमालयात स्थित चांगथांग पठाराचे मुख्य प्रवेशद्वार आहे.


7. डेब्सा खिंड:

हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि स्पीती जिल्ह्यांच्या दरम्यान ग्रेटर हिमालयात स्थित आहे.स्पिती दरी आणि पार्वती दरीला जोडते.


8. दिहांग खिंड:

अरुणाचल प्रदेश राज्यात स्थित.

हे अरुणाचल प्रदेशला मंडाले (म्यानमार) शी जोडते.


9. दिफू खिंड:अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात स्थित आहे.

हि खिंड भारत आणि म्यानमारमधील पारंपारिक खिंड आहे जी मंडालेला सहज आणि कमीत कमी  अंतरावर जोडते.


10. इमिस-ला खिंड:

लेह जिल्ह्याच्या दक्षिण काठावर स्थित आहे.

हि खिंड लेहहून तिबेट (चीन) साठी प्रवेशद्वार आहे.


11. खारदुंग-ला खिंड:

भारतीय जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख प्रदेशात स्थित आहे.

हि देशातील सर्वोच्च मोटरेबल(वाहने पण जाऊ शकतील) खिंड आहे.

हि लेहला सियाचिन हिमनदीसह जोडते.


12. खुंजरब खिंड:

काराकोरम पर्वत मध्ये स्थित आहे.

हि लडाख आणि चीनच्या सिंकियांग प्रांतामधील पारंपारिक खिंड आहे.


13.जेलेप ला खिंड:

पूर्व सिक्कीम जिल्हा, सिक्कीम, भारत आणि तिबेट स्वायत्त प्रदेश, चीन यांच्यामधील एक उंच पर्वत मार्ग आहे. भारताशी जोडणाऱ्या मार्गावर आहे.

हि खिंड सिक्कीमला ल्हासाशी जोडतो, चुंबी खोऱ्यातून जातो.


14. लनक खिंड:

अक्साई-चिन (लडाख) मध्ये स्थित आहे.

हि खिंड लडाखला ल्हासाशी जोडते.


15. लिखापानी/पांगसौ खिंड:

हि खिंड भारत-बर्मा (म्यानमार) सीमेवरील पत्काई टेकड्यांच्या शिखरावर आहे.

आसामच्या मैदानावरून बर्मामध्ये जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.


16. लिपु लेख खिंड:

पिथौरागढ जिल्ह्यात स्थित. हि खिंड उत्तराखंडला तिबेटशी जोडते.

महाराष्ट्रातील हवामान

महाराष्ट्रातील हवामान विशिष्टपूर्ण आहे. याचे कारण त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्रात मान्सून वाऱ्यामुळे पाऊस मिळतो.


महाराष्ट्राच्या हवामानाचे स्वरूप -


कोकण -

कोकणचे हवामान उष्ण, दमट, सम, प्रकारचे आहे. कोकणची सखल किनारपट्टी अरबी समुद्रास अगदी जवळ असल्याने वर्षभर वर्षभर तो प्रदेश फार उष्नही व फार थंडही नसतो.


सह्यान्द्री -

समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा थंड होते. म्हणून सह्यान्द्रीच्या घाटमाथ्यावर उन्हाळ्यत देखील तेथील हवामान थंड असते. हिवाळ्यात मात्र कडाक्याची थंडी असते. म्हणून या भागातील हवामान थंड व आद्र असते.


महाराष्ट्र पठार -

महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण,विषम,व कोरडे आहे. या भागात मार्च ते मे या काळात बरीच उष्णता असते. म्हणजेच उन्ह्याळातील व हिवाळ्यातील तापमानातच बरीच तफावत असल्याने पठारावरील हवामान हे विषम आहे.


महाराष्ट्रातील ऋतू -

महाराष्ट्रात साधारणपणे उन्हाळा-मार्च ते मे, पावसाळा -जून ते सप्टेम्बर, हिवाळा - ऑक्टोबर ते फेब्रूअरी, हे तीन मुख्य ऋतू आहेत.


उन्हाळा -

२१ मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो तसेच दिनमानाच्या कालही वाढते.

महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे १६' ते २२' दरम्यान असल्याने या काळात तापमानात वाढत जाते. कोकण किनार पट्टीत अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे खरे व मतलई वारे यांचा फायदा मिळतो. तर दख्खनचे पठार हे सह्यन्द्री पर्वतामुळे

अरबी समुद्रापासून अलग झालेले असते. यामुळे कोकण व पठार यावरील बरीच तफावत आहे.


कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान कक्षा ३०' ते ३३' सें च्या दरम्यान असते. मराठवाड्यात ३० ते ३५ सें तापमान असते. तर विदर्भामध्ये ४२ ते ४३ सें च्या आसपास असते.


हवेचा दाब व वारे -

उन्हाळ्यात असे तापमान वाढत गेल्यास साहजिकच हवेचा दाब कमी कमी होत जातो. आणि कोकण किनारपट्टीत समभार रेषा समांतर होत जातात. एप्रिल मे महिन्यात जसजसा उन्हाळा कडक होत जातो तसतसा समभार रेषा जवळजवळ येऊ लागतात आणि वायुभार उतार तीव्र होत जातो. अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. आणि वायुभर उतार तीव्र होत जातो. अरबी समूद्रवरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात व किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तर मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीची वादळे निर्माण होतात.


पर्जन्य -

हिवाळ्यामध्ये वायव्य भारतात तयार झालेल्या जास्त दाबाचा पट्टा सूर्य कर्कवृत्ताकडे असल्याने हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. एप्रिल महिन्यात हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो. व त्याचा बराचसा प्रदेश सागरावारही असतो. वायव्य भारतात दाबाचा प्रदेश असतो. परंतु तो अजूनही कमजोरच असतो. दाबाच्या प्रदेशाकडून

जास्त दाबाच्या प्रदेशाकडून लागतात. ते एप्रिल व मी महिन्यात महाराष्ट्रच्याही भागावरून वाहत जाऊन पाऊस देतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसाला आंबेसरी

असे म्हणतात.


महाराष्ट्र मान्सूनची संकल्पना -


सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन हि अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात भूभाग

व जलभाग तापणे हे मान्सून चे तंत्र आहे. हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात जो पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ८५% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते. पावसाळ्यात चार महिन्याच्या कालावधीत कोकण आणि सह्यन्द्री पर्वतरांगेत भरपूर पाऊस पडतो. त्यामानाने मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागात अजून पावसाचे प्रमाण वाढत जाते. त्याचे कारण विदर्भ हा प्रदेश बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्याच्या शाखेत येतो त्या भागात आगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान पाऊस पडतो.

कोकणात २५० ते ३०० सें मी पाऊस पडतो. घाठ्माठ्यावरील आंबोली येथे सर्वात जास्त

म्हणजे ७०७ से मी पूस कोसळतो. तर महाबळेश्वरला ५९४ एवढा पाऊस पडतो. माथेरानच्या पठारावर पावसाचे प्रमाण ४९३ से मी आहे. सह्यांद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडे ५० ते ६० सें मी पाऊस पडतो. तसेच हा प्रदेश अनिश्चित स्वरूपाचे आहे. म्हणून या भागाला अवर्षणग्रस्त प्रदेश म्हटले जाते.

मराठवाड्यात ६० ते ८० सें मी एवढे पर्जन्य आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेस पावसाचे प्रमाण वाढत जाते. पश्चिम विदर्भात ७५ ते ९० सें मी पाऊस पडतो. तर पूर्व विदर्भात ९० ते १५० से मी इतका पाऊस पडतो. विदर्भातील गाविलगडच्या डोंगरात पावसाचे प्रमाण वाढत जाते. तेथील थंड हवेच्या चिखलदरा या ठिकाणी १५० सें मी एवढा पाऊस पडतो.


ऑक्टोंबर संक्रमणाचा महिना -

या महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. आणि हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने उकाडा अनुभवास येतो.


हिवाळा -

मान्सून संपल्यावर वाऱ्याचा काळ संपल्यावर नोवेंबरपासून खऱ्या अर्थाने हिवाळा चालू होतो. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार केला तर असे आढळते कि बऱ्याचशा रेषा पश्चिम पूर्व दिशेने असून त्या एकमेकास समांतर आहेत. हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो.


महाराष्ट्रात हिवाळ्यात संपूर्ण खानदेश, नाशिक जिल्हा, बराचसा अहमदनगर पुण्यातील जुन्नर घोडेगाव,राजगुरुनगर, शिरूर,पुणे,हवेली, तालुके. विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या धारणी,चिखलदरा, तसेच वरुड नागपूर भंडारा, चंद्रपूर या भागात किमान तापमान १० सें ते १२.५ सें एवढे असते. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच प्रमाणात मराठवाडा व पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग वर्धा, गोंदिया, भंडारा,चंद्रपूरच्या उत्तर भागात किमान तापमान १२.५ व १५ सें दरम्यान आहे.


महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण -


जास्त पर्जन्याचा प्रदेश - महाराष्ट्रातील कोकण आणि सह्यान्द्री डोंगरावर आणि डोंगराच्या पायथाचा प्रदेश या भागात ३०० ते ६०० इतका पाऊस पडतो. मध्यम पर्जन्याचा प्रदेश- सह्यान्द्रीच्या भागात, तर नाशिक,पुणे,सातारा,सांगली, या जिल्ह्याचा पश्चिम भाग गोंदिया, गडचिरोली, या भागात ३०० ते २०० से मी पाऊस पडतो. मध्यम ते कमी पर्जन्याचा प्रदेश - चन्द्रपूर, यवतमाळ,वर्धा, या भागात मध्यम पर्जन्य पडते. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्याचा भागात तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे या भागात कमी पर्जन्य होते.

मातीचे प्रकार व स्थान


गाळाची मृदा

सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.


काळी मृदा 

दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.


तांबडी मृदा

तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.


वाळवंटी मृदा 

राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.


गाळाची मृदा 

नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.

एलिफंटा लेणी


◾️ एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे.


◾️ एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती निर्माण केला याला कुठेच तोड नाही.


◾️या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते.


◾️कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानीअसावीत्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट , यादव नि मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली.सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.


◾️शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले नि सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले


◾️  १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. 


◾️घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. 

भरती विशेष सामान्यज्ञान


1) जैन धर्माचे पहिले तीर्थकर- ऋषभदेव


2) सिंधू संस्कृती ही संस्कृती होय - नागरी


3) चिनी प्रवासी युवान सॉंग यांच्या काळात भारतात आला - हर्षवर्धन


4) आजच शत्रू चे दुसरे नाव काय - कुणीक


5) जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार - वर्धमान महाविर


6) गौतम बुद्धाच्या वडिलांचे नाव काय होते - शुद्धोधन


7) 0 चा शोध कोणत्या देशात लागला - भारत


8) अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील कोणी सांगितले - गौतम बुद्ध


9) हॉटल येथे शिवाची मंदिरे यांच्या काळातील आहे - चालुक्य


10) पॅगोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे - बोध


11) प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती - रावी


12) हडप्पा संस्कृती मध्ये कोणत्या कलांना महत्त्व होते - नृत्यसंगीत


13) गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला - लुंबिनी


14) हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे - कालीबंगन


15) महाभारतात दूत राष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय - गांधारी


16) मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे - सौदी अरेबिया


17) कलिंग युद्धाची संबंधित नाव कोणते - सम्राट अशोक


18) हडप्पा संस्कृती मध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले - कालीबंगन


19) मोहम्मद गजनी यांनी भारतावर किती वेळा आक्रमण केले - 17


20) शीख धर्माचे दहावे गुरू - गुरूगोविंद सिंह


पुणे प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती


1. पुणे जिल्हा


जिल्हयाचे मुख्य ठिकाण - पुणे        

         क्षेत्रफळ - 15,643 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 94,26,959 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 14 - जुन्नर, आंबेगांव, खेड (राजगुरूनगर), इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे शहर, दौंड, भोर, हवेली (पुणे), मुळशी (पौड), पुरंदर (सासवड), बारामती. 


सीमा - उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा आहे. आग्नेयेस सोलापूर तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष


 


'विधेचे माहेरघर' असे पुणे शहरास म्हणतात. याच ठिकाणी महात्मा ज्योतीबा फुल्यांच्या समाज-परिवर्तनाच्या कार्यास सुरुवात झाली. आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या नररत्नाचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी होय. 


राष्ट्रकूट, राजवटीत या गावाचा पुनवडी नावाने उलेख केला जाई. 'पुण्य'या शब्दावरून 'पुणे' हे नाव पडले असावे, अशी एक उपपती मांडली जाते. 


देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यात आर्वी येथे 1971 पासून कार्यरत अष्टविनायकापैकी (1) श्री विघ्नेश्वर, ओझर (2) श्री गणपती, राजणगांव (3) गिरजात्मक, लेण्याद्री (4) चिंतामणी, थेऊर (5) मोरेश्वर, मोरगाव या पाच अष्टविनायकाचे स्थान या जिल्हात आहे. 


महत्वाची स्थळे


 


पुणे - मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. शिवाजी महाराजांचे बालपण, पेशव्यांची राजधानी, शनिवारवाडा यांमुळे पुण्यास ऐतिहासिक महत्व आहे. पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याजवळच्या मोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था. 


तसेच निगडी येथे 'अप्पूघर' हे करमणुकीचे केंद्र आहे. 


पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड, परिसरात अनेक उधोगधंदे आहेत. चिंचवड येथे श्री. मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागा, पेनिसिलीन, रसायने इत्यादीचे कारखाने येथे आहेत. निगडी येथील 'अप्पूघर' हे एक करमणुकीचे केंद्र आहे. 


जुन्नर - जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजाचा जन्म झाला. किल्यावर शिवाईदेवीची मंदिर आहे. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडा होता. 


आळंदी - हे ठिकाण इंद्रायणीकाठी असू येथे श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. 


देहू - हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.


चाकण - येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. कांद्यांची बाजारपेठ म्हणूनही चाकण प्रसिद्ध आहे. 


लोणावळा - हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथून जवळच वळवण धरण, कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहेत. नाविक प्रशिक्षण केंद्र व अनेक कारखाने येथे आहेत. 


जेजूरी - महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचे देवस्थान आहे. 


आर्वी - आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे 'विक्रम' हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे. 


राजगुरूनगर - हुताम्मा राजगुरूंचे हे गाव आहे. 


भीमाशंकर - येथील शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य आहे. 


उरुळी कांचन - येथे निसर्गोपचार केंद्र आहे. येथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे. 


दौंड - दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून लोहमार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते. 


वालचंदनगर - येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते. तसेच प्लॅस्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखानाही येथे आहे. 


सासवड - हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सोपानदेवीची समाधी आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे. सासवडचा परिसर अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरु इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. 


भोर - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रंग, मेणकापड इत्यादींचे कारखाने आहेत. येथून जवळच भाटघर धरण व बनेश्वर ही सहलीची ठिकाणी आहेत. 


वेल्हे - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळ राजगड व तोरणा हे किल्ले आहेत. 


वढू - येथे संभाजी महाराजांची समाधी आहे. 


पौंड - हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच मुळशी धरण आहे. 


पुणे प्रशासकीय विभागास पश्चिम महाराष्ट्र म्हटले जाते. 


1997 पासून पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा आहे. 


ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे चालविले जाते. 


पुणे नागरी संकुल हे देशातील आठव्या व राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचेनागरी संकुल आहे. 


राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भोसरी (पुणे) 


महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय, पुणे 


राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे 


महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे 


राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (NCL), पुणे 


भारतीय कृषि उधोग प्रतिष्ठान, उरळी कांचन (पुणे) 


महाराष्ट्र विकास प्राधिकरण (यशदा), पुणे 


सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला 


फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट, पुणे 


नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासला (पुणे)


 


2. सांगली जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सांगली  

               क्षेत्रफळ - 8,572 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 28,20,575 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 10 - खानापूर, कवठे महाकाळ, वाळवे, तासगाव, जत, शिराळे, आतपाडी, पलूस, मिरज, कडेगाव. 


सीमा - उत्ततेस व ईशान्येस सोलापूर जिल्हा, उत्तरेस व वायव्येस सातारा जिल्हा, पूर्वेस कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस व नैऋत्येस कोल्हापूर जिल्हा असून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा.


जिल्हा विशेष -


 


1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्हाचे विभाजन करून उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण केले. नंतर 23 नोव्हेंबर 1960 ला फेरफार करून दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात करण्यात आले. 


सांगली जिल्ह्याला कलावंताचा जिल्हा म्हणतात. 


हळद व द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध. रबी ज्वारीला या जिल्ह्यात 'शाळू'म्हणून ओळखले जाते. 


प्रमुख स्थळे


 


सांगली - शहराच्या मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला असून येथील गणेशमंदिर प्रसिद्ध आहे. 


मिरज - येथील भुईकोट किल्ला व मिरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहे. 


औंदुबर - या गावात दत्तात्रय मंदिर असून हे मंदीर नरसिंह सरस्वती यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. ब्राम्हण कुटुंबात 1304 मध्ये जन्माला आलेले हे संत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर भवनेश्वरीचे मंदीर आहे. 


बहादूरवाडी - या गावात माधवराव पेशव्यांनी 1761 च्या सुमारास किल्ला बांधला. 


बेडग - ता. मिरजपासून 11 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. 


भोपाळगड - ता. खानपूरच्या दक्षिण पूर्वेस एक किल्ला असून तो शिवाजीच्या ताब्यात होता. 


भोसे - येथे दांडोबा महादेव गुफा प्रसिद्ध असून या गुहेत यादव राजा सिंघण यांचा शिलालेख आहे. 


देवराष्ट्र - हे गाव खानापूर तालुक्यातील असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी होय. या गावात अनेक प्राचीन लेण्या आहे. 


कासबे दिग्रज - मिरज तालुक्यातील हे गाव पाच हिंदू मंदिरे व दोन जैन बस्तीसाठी प्रसिद्ध आहे. 


कुंडल - तासगाव तालुक्यातील या गावात हिंदूच्या लेण्या आहे. 


शिराळा - या तालुक्याच्या गावात देश-विदेशातील लोक नागपंचमीसाठी येथे येतात. 


मच्छिंद्रगड - कर्हाड तालुक्यातील उत्तरेस शिवाजीने हा किल्ला बांधला.


 


3.सातारा जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सातारा         

    क्षेत्रफळ - 10,480 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 30,03,922 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) 


तालुके - 11 - खंडाळा, फलटण, वाई, माण, जावळी, लाख महाबळेश्वर, कोरेगांव, खटाव, सातारा, पाटण, कराड. 


सीमा - उत्तरेस पुणे जिल्हा, पूर्वेस सोलापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा असून वायव्येस रायगड जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष -


 


रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञानगंगेचा उदय याच जिल्ह्यात झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये कराड तालुक्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली 1924 मध्ये या शिक्षण संस्थेचे कार्यालय सातारा येथे नेण्यात आले. 


येथेच छत्रपती शाहूचा राज्यभिषेक 1708 मध्ये झाला. 


ऐतिहासिक शूरवीराचा जिल्हा. मराठा काळापासून या जिल्ह्याला लष्करी परंपरा लाभली आहे. 


प्रमुख स्थळे


 


सातारा - सातारा शहरामध्ये शिलाहार वंशातील राजा दूसरा भोज याने 1990 मध्ये 'अजिक्यतारा' हा किल्ला बांधला आहे. येथील छत्रपती वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. जवळच सज्जनगड या किल्यावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. 


महाबळेश्वर, पाचगणी - हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.महाबळेश्वर येथे महाबळेश्वराचे मंदीर. 


वाई - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोषनिर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय येथे आहे. 


पाटण - येथे 'शिवाजीसागर' हा जलाशय आहे. 


कर्हाड - एथे कृष्णामाईचे मंदीर व यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे. 


औंध - औंधचे वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. 


प्रतापगड - महाबळेश्वर तालुक्यात शिवरायांनी 1656 मध्ये या गडाची उभारणी केली. याच कडावर अफझलखानाचा वध झाला.


चाफळ - छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदासस्वामी याची भेट येथे झाली.


सज्जनगड - स्वामी समर्थ रामदास यांचे कार्यस्थान. यांच्या वास्तव्याने गडास 'सज्जनगड' असे नाव देण्यात आले आहे. 


म्हसवड - येथे 12 व्या शतकातील सिद्धनाथाचे मंदीर, कल्याणी चालुक्य राजा जगदेकमल्ला याचा शिलालेख मंदिरात आहे. 


माहुली - ता. सातारा पासून 5 कि.मी. अंतरावर पूर्वेस कृष्णा व वेन्ना या दोन नद्यांना संगम.


मसूर - ता. कराड येथे समर्थ रामदास स्वामींनी बांधलेले मारूतीचे मंदीर.


निगडी - समर्थ रामदासांचे समकालीन संत रघुनाथ (रंगनाथ) यांचे गाव.


 


4. कोल्हापूर जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - कोल्हापूर        

     क्षेत्रफळ - 7,685 चौ. कि.मी.


लोकसंख्या - 38,77,015 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) 


तालुके - 12 - शहुवाडी, हातकणगले, पन्हाळा, शिरोळ, करवीर, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल, भुदगड (गारगोटी), राधानगरी.


सीमा - उत्तरेस सांगली जिल्हा, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य, पश्चिमेस रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे आहे. 


जिल्हा विशेष -


 


पुराणात अशी दंतकथा आहे कि महालक्ष्मीने हा परिसर आपल्या गदेने महापुरापासून वाचविला म्हणून या परिसरास 'करवीर' असे नाव पडले. दुसर्‍या एका दंतकथेनुसार एका टेकडीवर 'कोल्हासूर' नावाच्या दैत्याचा वध केला गेला यावरून कोल्हापूर हे नाव पडले. 


हा जिल्हा राजर्षी शाहुंची जन्मभूमी आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर याच जिल्ह्यातील आहेत. 


गुळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध. अतिशय प्राचीन महालक्ष्मीचे मंदीर, हे मंदीर राजा कर्णदेव यांनी बांधले. 


प्रमुख स्थळे


 


कोल्हापूर - महालक्ष्मी मंदीर, रंकाळा तलाव, नवीन राजवाडा व शालिनी पॅलेस ही प्रक्षणीय स्थळे आहेत. 'कुस्तीगिरांची पंढरी' म्हणून ओळखले जाते. 'खासबाग' हे कुस्तीचे प्रसिद्ध मैदान येथेच आहे. अलीकडे या शहरास कलानगरी म्हणून ओळखले जाते. 


पन्हाळा - पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. येथे पन्हाळगड हा किल्ला आहे. 


राधानगर - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे अभयारण्य आहे. ते राधानगरी अभयारण्य म्हणून ओळखले जाते. 


बाहुबली - हे ठिकाण जैन धर्मियांचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. 


आजरा - (तालुका स्थळ) रावळनाथ व रामलिंग मंदिरे व एक पडका किल्ला तसेच बॉक्साईटचे साठे यासाठी हा भाग प्रसिद्ध. रामलिंग मंदीर त्याच्या निसर्गरम्यते मुळे लोकांचे आवडते ठिकाण.


आळते - (ता. हातकणगले) लाल रंग म्हणजे आळता तयार करण्यासंबंधी हे गांव मध्ययुगात प्रसिद्ध होते. आजही काही प्रमाणात आळत्याची निर्मिती येथे होते. गुहेतील शिवमंदिर प्रसिद्ध. ही मुळची जैन धर्मीय गुहा. 


इचलकरंजी - (हातकणगले ता.) हातमागावरील साडया व इतर कपड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध म्हणून या गावास मँचेस्टर म्हणत. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक याच गावातले. शास्त्रीय संगीत क्षेत्रात या गावाने मोठे योगदान दिले आहेत. 


कणेरी - (करवीर ता.) लिंगायतांचे पीठ, कडसिद्धे श्वराचा मठ यासाठी हे गाव प्रसिद्ध इ.स. 12 व्या शंतकापासून या मठाला इतिहास आहे. 


पन्हाळ्याच्या पाटील कुटुंबाकडे असलेल्या ताम्रपटात या मठाचा उल्लेख आढळतो. 


बालिंगे - (कात्यायनी पार्क) (करवीरा ता.) कात्यायनी मंदीर व निसर्ग यासाठी प्रसिद्ध. कात्यायनीचे एवढे मोठे क्षेत्र महाराष्ट्रात दुसरे नाही.


ज्योतिबा - (ता. पन्हाळा) 1730 मध्ये ज्योतिबाचे मंदीर राणाजीराव शिंदेंनी बांधले. येथे मोठी यात्रा भरते. 


वडगाव - हे गाव हातकणगले या तालुक्यात असून येथे धनाजी घोरपडेंची समाधी आहे. 


नरसिंहांची वाडी - यास नरसोबाची वाडी म्हणून ओळखतात. दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध. 


हुपरी - हे गाव हातकणगले या तालुक्यात असून हे गाव चांदी व चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. 


महत्वाचे


 


कोल्हापूर जिल्ह्यात शेंगाचे तेल गाळण्याचे कारखाने जयसिंगपूर, इचलकरंजी, वडगांव तेथे आहे.  


कोल्हापूर जिल्ह्यात पातळे विणण्याचे माग इचलकरंजीत आहेत.  


हातकणगले तालुक्यात हुपरी येथे चांदीचे दागिने तयार करतात. 


कोल्हापूर जिल्ह्यातून पुणे-बेंगलोर (4) हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.         


कोल्हापूर जिल्ह्यात हातकणगले या तालुक्यात पानमळे आहेत. 


कोल्हापुरी लोक बेंदराच्या सणाला बैलाची पुजा करतात. 


कोल्हापूर फेटा, चपला, पैलवान, गूळ इत्यादि बाबींसाठी प्रसिद्ध आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी व गगनबावडा तालुक्यात आश्रमशाळा आहेत. 


पन्हाळा किल्ला पन्हाळा तालुक्यात आहे. 


विशालगड किल्ला शाहूवाडी तालुक्यात आहे. 


सतीची समाधी विशालगड किल्ल्यावर आहे. 


राधानगरीचे धरण भोगावती नदीवर बांधले आहे. 


राधानगरीच्या धरणातील पाण्याच्या साठयाला लक्ष्मीसागर तलाव म्हणतात. 


शिवाजी विधापीठ कोल्हापूरला आहे. 


कोल्हापूरला खासबाग मैदान आहे. 


महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी औधोगिक वसाहत इचलकरंजीला आहे.


शालिनी पॅलेस कोल्हापूरला आहे. 


कोल्हापूर मालवण मार्ग हा गैबी खिंडीतून गेला आहे. 


कोल्हापूर मालवण हा मार्ग फोंडा घाटातून गेला आहे.


 


5. सोलापूर जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सोलापूर           

 क्षेत्रफळ - 14,895 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 43,15,527 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 11 - करमाळे, बार्शी, माढे, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, मंगळवेढे, अक्कलकोट. 


सीमा - उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद जिल्हा, पूर्वेस उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस सातारा जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य असून वायव्येस पुणे जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष -


 


हातमाग चादरी, ज्वारीचे कोठार व विठ्ठलाचे मंदीर (पंढरपूर) यासाठी प्रसिद्ध. मुळेगांव येथे कोरडवाहु शेती संशोधन केंद्र 1933 पासून कार्यरत आहे. 


भारतास स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1930 मध्ये एक अभूतपूर्व घटना सोलापूरच्या इतिहासात घडली. मे 1930 मध्ये ब्रिटीशांनी गांधीजींना अटक केल्यानंतर पोलीसाच्या गोळीबाराने प्रक्षुब्ध झालेल्या जनतेने शहरातील पोलीस व इंग्रज अधिकार्‍यांना पळवून लावले व तीन दिवस जिल्ह्याचा कारभार सभांळला. 


येथील मराठी लावणी सारस्वताचे एक लेणे ठरली आहे. 


प्रमुख स्थळे


 


सोलापूर - येथील चादरी 'सोलापुरी चादर' या नावाने विशेष प्रसिद्ध आहेत. 


पंढरपूर - पंढरपूर हे देशातील प्रमुख तिर्थक्षेत्रापैकी एक आहे. येथे महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुखमिणीचे मंदीर असून आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो लोक दर्शनाला येतात. 


अक्कलकोट - स्वामी समर्थ यांचे मोठे मंदीर. 


करमाळे - येथील भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर प्रसिद्ध आहे. 


बेगमपुर - ता. मोहळ - येथे औरंगजेबाच्या मुलीची कबर आहे. 


ब्र्म्ह्पुरी - हे गाव मंगळवेढा या तालुक्यात येत असून येथे यादवकालीन सिद्धेश्वर मंदीर आहे. 


नान्नज - सोलापूरपासून 20 किमी. अंतरावर नान्नज हे ठिकाण वसले आहे. हरिणे व आकर्षक व दुर्मिळ अशा 'माळढोक' या पक्षांसाठी नान्नज येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे. 


महत्वाचे


 


सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणतात.


चादरीसाठी प्रसिद्ध शहर म्हणजे सोलापूर होय. 


सोलापूर जिल्ह्यातून भीमा, सिना, माण, भोगावती, बोरी या नद्या वाहतात.


सोलापूर जिल्ह्यामध्ये औधोगिक वसाहती सोलापूर, कुर्डूवाडी, चिंचोळीयेथे आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने चादरी, हातमाग, तयार कपडे, तंबाखू, लोखंडी सामान हे आहेत. 


सोलापूर जिल्ह्यातील लोहमार्ग मुंबई-पुणे-सोलापूर-मद्रास(ब्रोडगेज), सोलापूर-गदग(मिटरगेज), मिरज-कुर्डूवाडी-लातूर(नॅरोगेज).वैराग हे धार्मिक स्थळ सोलापूर जिल्ह्यात आहे. 


सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पवित्र क्षेत्र आहे. 


सोलापूर जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते पुणे-सोलापूर-हैद्राबाद, सोलापूर-चित्रदुर्ग. 


चीन मधील युद्धकाळात 1938 ते 1942 या दरम्यान तेथे जाऊन रुग्णांची व गोरगरिबांची सेवा करणारे डॉ.व्दारकानाथ कोटणीस हे आंतराष्ट्रीय आदर्शव्यक्ती सोलापूरचे होत.

मोर्य ते यादव



मौर्य साम्राज्याचा काळ  


महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.


सातवाहन साम्राज्याचा काळ 


सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.


वाकाटकांचा काळ 


वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.


कलाचुरींचा काळ 


वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.


बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ 


वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.


वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ 


वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.


यादवांचा काळ 


महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

दख्खन पठार



‘दक्षिण’ या संस्कृत शब्दाचा ‘दख्खन’ हा अपभ्रंश असून, दक्षिण म्हणजे उजव्या हाताकडील अथवा दक्षिण दिशेकडील. यावरूनच दख्खन पठार अशी संज्ञा पडली असावी. या पठाराचा उल्लेख रामायण, महाभारत व मार्कंडेय, मत्स्य, वायु या पुराणांत अनेक वेळा आढळतो.


पहिल्या शतकात एका ग्रीक मार्गनिर्देशकाने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात या पठाराचा ‘दचिन बदेस’, तर पाचव्या शतकात आलेला चिनी प्रवासी फाहियान याच्या वृत्तांतात Ta–Thsin असा उल्लेख आढळतो. तसेच अभिजात संस्कृत साहित्यात व कोरीव लेखांत याचा ‘दक्षिण पथ’ असा उल्लेख आढळतो. सातवाहन राजांच्या कारकीर्दीत सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यास ‘दक्षिणापथपति’ अशी उपाधी दिलेली होती.


दक्षिण पथावर सातवाहन, चोल, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव व होयसळ इ. वंशांचे राज्य होते. तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या पठाराविषयी फार थोडी  माहिती उपलब्ध होती. तथापि पठारावर इतिहासपूर्व काळापासून मानवी वस्ती आहे, याबद्दल पुष्कळ पुरावा मिळतो.

या पठाराच्या सीमेबाबत एकमत नाही. संकुचित अर्थाने उत्तरेकडे सातमाळा टेकड्या व दक्षिणेकडे कृष्णा नदी यांच्यामधील मराठी भाषा बोलली जाणाऱ्या (महाराष्ट्र) प्रदेशासच दख्खन पठार म्हणतात; तर व्यापक अर्थाने नर्मदा किंवा विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील संपूर्ण भारतीय द्वीपकल्पास दख्खन पठार म्हणतात.


हे पठार भारत वआफ्रिका खंड यांना जोडणाऱ्या प्राचीन ‘गोंडवन भूमी’ चा अवशेषात्मक भाग असावा. या पठाराच्या उत्तरेस सातपुडा पर्वंत असून त्यात १,६७६ मी. उंचीच्या डोंगररांगा आहेत. या रांगांत उगम पावणाऱ्या तापी, नर्मदा या नद्या अरबी समुद्रास मिळतात.


तसेच पूर्वेस व पश्चिमेस अनुक्रमे पूर्व घाट व पश्चिम घाट (सह्याद्री) असून हे घाट पठाराच्या दक्षिण टोकाला येऊन मिळतात. पठाराची सरासरी उंची सु. ६१० मी. असून पठाराचा उतार पूर्वेकडे कमी कमी होत गेला आहे. कृष्णा, गोदावरी आणि कावेरी या पठारावरील प्रमुख नद्या असून त्या पश्चिम घाटात उगम पूर्वेकडे बंगालच्या उपसागरास मिळतात.


पठारावरील हवामान कोरडे असून किनाऱ्यावर उष्ण–दमट तर काही ठिकाणी रूक्ष असते. उन्हाळ्यात तपमान २०° ते ३२° से. च्या दरम्यान असते, तर हिवाळ्यात १०° ते २४° से. पर्यंत असते. नैर्ऋत्य व ईशान्य या दोन्ही मोसमी वाऱ्यांपासून पठारावर पाऊस पडतो.


जास्तीत जास्त पर्जन्यमान पश्चिम घाटावर असून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. पठार अतिशय टणक, मजबूत आणि स्फटिकमय ग्रॅनाइटी व बेसाल्ट खडकांनी बनले आहे. त्यावरील लाव्हारसाच्या थरांपासून बनलेली मृदा सुपीक आहे.


पठाराचा बराचसा भाग सपाट असून त्यात मधून मधून सपाट माथ्याचे उंचवटे व गोलाकार टेकड्या दिसतात. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा प्रदेश स्थिर स्वरूपाचा मानला जातो. पठारावर खनिज संपत्ती विपुल असून तीत सोने, दगडी कोळसा, मँगॅनीज व लोखंड यांची धातुके तसेच बॉक्साइट, मोनॅझाइट वाळू इ. खनिजे प्रमुख आहेत.


मध्ययुगीन भारत (थोडक्यात)



गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.

त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.

१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.

आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते.

या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या.

प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले.

प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,

त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.

या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.

भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.

या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.

आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती.

अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.

चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.

राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.

या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.

या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.

२८ ऑगस्ट २०२४

अतीमहत्वाच्या संज्ञा

१) राज्याचा एकत्रित निधी (राज्यघटनेचा अनुच्छेद २६६/१) : 

राज्याला विविध मार्गातून मिळणारा संपूर्ण महसूल, राज्याद्वारे उभारलेले सर्व कर्ज आणि कर्ज परताव्यामध्ये राज्याला मिळणारे सर्व उत्पन्न म्हणजे राज्याचा एकत्रित निधी होय. शासनाच्या विविध कार्यावर होणारा खर्च या एकत्रित निधीतून भागविला जातो.


२) आकस्मिता निधी ( राज्यघटनेचा अनुच्छेद २६७/२) :

अर्थसंकल्पात तरतूद न केलेले अकस्मात उद्भवलेले अत्यंत महत्त्वाचे खर्च भागविण्याकरिता किंवा अनेकदा केलेली तरतूद अपुरी असल्यामुळे आणि खर्च मात्र अत्यावश्यक असल्यास असा खर्च भागविण्याकरिता या आकस्मिता निधीची तरतूद केली जाते. हा खर्च पुढे पूरक मागण्यांच्या रूपात विधानमंडळात मंजुरीकरिता मांडण्यात येतो व त्याकरिता पुनर्विनियोजन करण्यात येते.


३) लोकलेखा (राज्यघटनेचा अनुच्छेद २६६/२) : 

यामध्ये एकत्रित निधीमध्ये अंतर्भूत केलेल्या रकमा वगळून शासनाला किंवा शासनाच्यावतीने मिळालेल्या इतर सर्व रकमा जमा करण्यात येतात. यातील व्यवहार बँकिंग व समायोजनाच्या स्वरूपाचे असल्याने यातून खर्च करण्यासाठी विधानमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता नसते. म्हणजेच लेखांच्या बाबतीत राज्यशासन बँकरची भूमिका करीत असते आणि ज्यावर व्याज देत असते व परत करण्याची जबाबदारी राज्यशासनाची असते असा निधी अथवा लेखे.

उदा. अल्पबचतचे पैसे, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे, राज्यमार्ग निधी, शिक्षण उपकरनिधी इ. लोकलेखा स्वतंत्रपणे सांभाळला जातो आणि तो राज्याच्या एकत्रित निधीचा भाग असत नाही.


४) दत्तमत खर्च : 

राज्याच्या एकत्रित निधीतून करावयाच्या खर्चाच्या पै अन् पैची मान्यता ही विधानसभेतून घ्यावी लागते. यातील काही बाबी सोडल्या तर सर्व खर्च हा दत्तमत असतो म्हणजे ज्याला मतदानाने मंजुरी मिळवावी लागते. याचा अर्थ असा की विभागाच्या खर्चाच्या मागण्या या विधानसभेत मतदानाला टाकाव्या लागतात आणि त्या मतदानाने मान्य होतात.


५) भारित खर्च :

 हा खर्च मतदानाला टाकला जात नाही तर हा राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असतो. त्यामुळे विधानसभा याला नाकारू शकत नाहीत. उदा. मा. न्यायमूर्ती, मा. राज्यपाल, मा. अध्यक्ष व उपाध्यक्ष विधानसभा, मा. सभापती व उपसभापती विधानपरिषद यांचे पगार, भत्ते आदींचा खर्च शासनाच्या कर्जावरील व्याजाचा खर्च, न्यायालयाच्या आदेशान्वये भागवायचा खर्च इत्यादी.


६) योजनांतर्गत खर्च : 

राज्याच्या वार्षिक योजनेअंतर्गत असलेला खर्च. हा खर्च संपूर्णपणे विकासात्मक खर्च असतो.


७) योजनेतर खर्च :

 योजनेतर खर्चात सर्वसाधारणपणे राज्याचे सर्व विकासेतर खर्च भागविले जातात. उदा. कर्मचाऱ्यांचे पेन्शन, कायदा सुव्यवस्था व करवसुली यावर येणारा खर्च, सामान्य प्रशासनावर येणारा खर्च इत्यादी.


८) महसुली लेखे :

 हे दोन प्रकारचे असतात. A. महसुली जमा : राज्यशासनाचे सर्व प्रकारचे कर, सेस, शुल्क या माध्यमातून येणारे उत्पन्न, केंद्रीय कर व शुल्कातील राज्याला मिळणारा हिस्सा व करेतर उत्पन्न जसे की प्राप्त होणारे व्याज, फी, शास्तीचे उत्पन्न तसेच केंद्र शासनाकडून मिळणारी विविध अनुदाने याला महसुली जमा असे म्हणतात.

B. महसुली खर्च : राज्यप्रशासन, राज्य विधानमंडळ, करवसुली यावर होणारा खर्च, कर्ज परतफेड आणि व्याज प्रदान करणे. पेन्शन तसेच विविध संस्थांना अनुदाने देणे व शासनाच्या विविध विभागांतर्गत प्रशासकीय खर्च करणे.


९) भांडवली लेखे :

 हे खालील प्रकारचे असतात.

अ . महसुली लेखा बाहेरील भांडवली खर्च : शासनाने कायमस्वरुपी मत्ता निर्माण करण्याकरिता अथवा प्राप्त करण्याकरिता केलेले खर्च. जमीन अधिग्रहीत करणे, रस्ते अथवा पुलांचे बांधकाम, पाटबंधारे अथवा ऊर्जा निर्मिती वरील खर्च, वरील खर्च, कर्ज रोख्यातील गुंतवणूक, खाद्यान्नाची भांडारे इत्यादी भांडवली खर्चाचे प्रकार आहेत.

ब. भांडवली उत्पन्न : साधारणपणे शासनाच्या मत्तेच्या विक्रीतून प्राप्त झालेले उत्पन्न.


१०) महसुली तूट आणि महसुली शिल्लक : 

राज्याच्या अर्थसंकल्पात ज्यावेळी एकूण महसुली जमेपेक्षा महसुली खर्च अधिक असतो त्यावेळी त्याला महसुली तूट मानले जाते. परंतु ज्यावेळी जमा होणारा महसूल हा महसुली खर्च भागवून उरतो अधिक असतो त्याला महसुली शिल्लक म्हणतात. ‘महसुली शिल्लक चांगले’ तर महसुली तूट ही राज्याच्या अर्थव्यवस्थेत चिंताजनतक मानली जाते.


११) तुटीचा अर्थसंकल्प : 

महसुली व भांडवली लेखावरील एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च ज्यावेळी अधिक असतो त्यावेळी त्याला अर्थसंकल्पीय तूट असे म्हणतात.


१२) राजकोषीय तूट :

 वर उल्लेखित केलेल्या अर्थसंकल्पीय तुटीत भांडवली उत्पन्नातील कर्ज व इतर दायित्व समाविष्ट केल्यावर जी रक्कम तयार होते तिला राजकोषीय तूट असे म्हणतात.


१३) मागण्या :

 प्रत्येक विभागाला आपल्या विभागांतर्गत जो खर्च अपेक्षित आहे तो अर्थसंकल्पात समाविष्ट केला जातो व हा खर्च कशाकरिता करण्यात येणार आहे. याच्या स्पष्टीकरणासह मागणीच्या स्वरुपात तो विधानमंडळापुढे मंजुरीसाठी मांडावा लागतो.


१४) पूरक मागण्या :

 एखाद्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात अंदाजित केल्यापेक्षा अधिक खर्च एखाद्या बाबीवर होत असेल अथवा वार्षिक अर्थसंकल्प तयार करताना ज्या खर्चाची कल्पना करण्यात आली नसेल असा नवीन बाबींवरील खर्च, अर्थसंकल्पात तरतूद न केलेला आकस्मिक स्वरुपाचा खर्च करावा लागला असेल तर तो आकस्मिता निधीतून केला जाते व मग पूरक मागण्यांच्या स्वरुपात त्याच्या स्पष्टीकरणासह विधानसभेसमोर मंजुरीकरिता मांडावा लागतो.


१५) अधिक खर्चाच्या मागण्या :

 या मागण्या पूरक मागण्यापेक्षा भिन्न असतात. कारण पूरक मागण्यांमधील चालू आर्थिक वर्षाकरिता मागणी असते तर यामध्ये मागील वित्तीय वर्षात झालेल्या अधिकच्या खर्चाकरिता मागणी असते.


१६) विनीयोजन विधेयक : 

सर्व विभागांच्या खर्चाच्या मागण्या एकत्रितपणे मतास टाकून मंजूर झाल्यावर त्याचे कायद्यात रुपांतर करावे लागते याला विनियोजन विधेयक म्हणतात आणि या मागण्या समवेत जो भारित खर्च आहे त्याचा अंतर्भाव करून राज्याच्या एकत्रित निधीतून हा खर्च भागविण्याचे अधिकार शासनास याद्वारे प्राप्त होतात.


17. पुनर्विनियोजन विधेयक : 

पूरक मागण्या संदर्भात जे विधेयक येते त्याला पुनर्विनियोजन विधेयक असे म्हणतात.


१८) वित्तीय विधेयक : 

राज्याचा अर्थसंकल्प मांडताना भाषणाच्या दुसऱ्या भागात वित्तमंत्री करासंबंधीचे प्रस्ताव मांडतात. याच प्रस्तावाचे विधेयकात रूपांतर करण्याकरिता विधानसभेसमोर वित्तीय विधेयक मांडले जाते. या विधेयकामुळे कर कमी किंवा अधिक होतो अथवा त्यात सूट मिळते किंवा त्यावरची शास्ती इ. वाढते व यामुळेच वस्तूंचे भाव कमी अधिक होतात. लौकिक अर्थाने नागरिकांना भाव कमी अधिक होणे म्हणजेच बजेट वाटते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१००० भूगोल प्रश्न

 1) ............... या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते.

   1) सातारा    2) कोल्हापूर    3) कराड      4) महाबळेश्वर

उत्तर :- 3


2) महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली ................ आहे.

   1) भीमा    2) गोदावरी    3) कृष्णा      4) वैनगंगा

उत्तर :- 2


3) योग्य जोडया लावा. 

  धरण      जलाशयाचे नाव

         अ) कोयना      i) शहाजी सागर

         ब) भाटघर      ii) शिवसागर

         क) माणिकडोह    iii) ऑथर सरोवर

         ड) भंडारदरा    iv) येसाजीकंक

    अ  ब  क  ड

           1) i  iv  ii  iii

           2) i  iii  ii  iv

           3) iv  iii  ii  i

           4) ii  iv  i  iii

उत्तर :- 4


4) महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?

   1) वशिष्ठी    2) तापी      3) भीमा      4) उल्हास

उत्तर :- 3


5) खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे ?

   1) देहू      2) आळंदी    3) पंढरपूर    4) नाशिक

उत्तर :- 3


1) खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व  पीके ही ‘दिवस तटस्थ पीके (डे न्युट्ल क्रॉप)’ आहेत

   अ) मका, भात, वाटाणा    ब) गहू, रताळी, भात

   क) वाटाण, कपाशी, गहू    ड) टोमॅटो, वाटाणा, कपाशी

   1) अ व ड    2) ब आणि क    3) कव अ    4) ड फक्त

उत्तर :- 4


2) खालीलपैकी कोणत्या घटकाचा वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण, वाढ व उत्पन्न यासाठी उपयोगी ठरणा-या वित्तंचक निर्मितीवर 

     होतो ?

   1) वा-याचा वेग    2) पालाश    

   3) सूर्यप्रकाश    4) पाण्याचे रेणू

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणते जैविकखत नाही ?

   1) जीवाणू खत    2) शैवाल खत    

   3) हरीत शेणखत    4) वरील सर्व

उत्तर :- 3


4) खालीलपैकी कोणता खतप्रकार हा नियंत्रित स्वरुपात विरघळणा-या खताच्या गटात मोडत नाही ?

   1) आइबीडीयु     2) सीडीयु    

   3) एमडीयु    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


5) बियांमधील तेलांचे प्रमाण, फळांमधील व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण आणि फळांचा रंग वृध्दिगत करणारे पोषण द्रव्य .................

   1) लोह    2) चुना      3) पालाश    4) स्फुरद

उत्तर :- 3


1) तंबाखू बियाण्याच्या उगवणीकरिता सर्वात अनुकूल तापमान ................... होय.

   1) 20ºC    2) 28ºC      3) 32ºC      4) 25ºC

उत्तर :- 2


2) शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :

   अ) पर्यावरण संतुलन राखणे.    ब) सामाजिक – आर्थिक समता साध्य करणे.

   क) आर्थिक लाभ मिळवणे.

   1) अ व क बरोबर  2) ब व क बरोबर    3) अ व ब बरोबर    4) सर्व बरोबर

उत्तर :- 4


3) सपासप कापणे व जाळणे हे शेतीचे वैशिष्टय खालीलपैकी कोणत्या हवामान विभागात आढळते ?

   1) विषुववृत्तीय पर्जन्य अरण्यांचा प्रदेश    2) भूमध्य हवामानाचा प्रदेश

   3) मोसमी हवामानाचा प्रदेश      4) सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश

उत्तर :- 1


4) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................... असते.

   1) 470 W/m²    2) 770 W/m²    3) 1170 W/m²    4) 1370 W/m²

उत्तर :- 4


5) एखाद्या अक्षवृत्तावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण :

   1) ऋतूपरत्वे सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन बदलतो.

   2) दिवासाची लांबी बदलते.

   3) सूर्यापासूनचे अंतर बदलते.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


1) खालीलपैकी कोणते पिके अत्यंत आम्लधर्मीय मृदेस सहनशील आहेत.

   1) एरंड, भात, ओट    2) गहू, भात, वांगी

   3) मका, भात, टोमॅटो    4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 1


2) योग्य जोडया लावा.

  वारे      स्थान

         अ) गरजनारे चाळीस    i) 50º द. अक्षवृत्त

         ब) शूर पश्चिमी वारे    ii) 5º उ. ते 5º द. अक्षवृत्त

         क) उन्मत साठ    iii) 40º द. अक्षवृत्त

         ड) निर्वात पट्टा    iv) 60º द. अक्षवृत्त 

    अ  ब  क  ड

           1)  i  iii  iv  ii

           2)  iii  i  iv  ii

           3)  iv  iii  ii  i

           4)  i  ii  iii  iv

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते एक विधान उंची परत्वे सरासरी तापमानातील होणारी घट बरोबर दर्शविते ?

   1) 1º सें.दर 160 मी. ला    2) 1º सें. दर 170 मी. ला

   3) 1º सें. दर 100 मी. ला    4) 1º सें. दर 260 मी. ला

उत्तर :- 1


4) योग्य जोडया लावा.

  वातावरणाचे थर      उंची

         अ) तापांबर        i) 500 ते 1050 किमी

         ब) स्थितांबर      ii) 16 ते 50 किमी

         क) आयनांबर      iii) 0 ते 16 किमी

         ड) बाह्यांबर        iv) 80 ते 500 किमी

    अ  ब  क  ड

           1)  iii  ii  i  iv

           2)  ii  iv  i  iii

           3)  iii  ii  iv  i

           4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 3


5) जेव्हा हवामान अंदाजाची उपयुक्तता 3 ते 10 दिवस असते, तो ..................

   1) कमी कालावधीचा हवामान अंदाज    

   2) मध्यम कालावधीचा हवामान अंदाज

   3) जास्त कालावधीचा हवामान अंदाज    

   4) वरील सर्व

उत्तर :- 2


1) खालीलपैकी कोणत्या स्थानिक वा-यांना ‘डॉक्टर वारे’ या नावानेही संबोधिले जाते ?

   1) खारे व मतलई वारे    2) मान्सूनपूर्व वारे

   3) पर्वतीय/ डोंगरी वारे    4) दरी वारे

उत्तर :- 1


2) पृथ्वी सभोवतालचे वातावरण उबदार राहते कारण –

   1) उबदार हवा ग्रीन हाऊस परिणामामुळे बाहेर जात नाही.    2) भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन.

   3) जैविक इंधन उष्णता बाहेर सोडतात.        4) वनस्पती कार्बनडायऑक्साईडचे शोषण करतात.

उत्तर :- 2


3) सापेक्ष आर्द्रता जेव्हा कमी असते तेव्हा ............................

   1) शुष्क व द्रव तापमानमापक समान तापमान दर्शवितात.

   2) शुष्क आणि द्रव तापमानमापकातील तापमानात जास्त फरक असतो.

   3) जास्त तापमान असेल.

   4) कमी तापमान असेल.

उत्तर :- 2


4) हिवाळयातील ढगाळ रात्री या निरभ्र आकाश ...................... रात्रीच्या तुलनेत जास्त उबदार असतात. कारण :

   1) ढग उष्णतेचे उत्सर्जन पृथ्वीकडे करतात.

   2) ढग शीत लहरी ज्या आकाशातून येतात, त्या सामावून घेऊन पृथ्वीकडे पाठवतात.

   3) ढग पृथ्वीकडून होणा-या उष्णतेचे उत्सर्जन रोखतात.

   4) ढग हे अति उंचीवर असल्याने सूर्याच्या उष्णतेचे शोषण करून उष्णता पृथ्वीकडे पाठवतात.

उत्तर :- 3


5) समुद्र सपाटीपासून वातावरणाची लांबी किती आहे ?

   1) 60,000 ते 80,000 कि.मी    2) 16,000 ते 29,000  कि.मी

   3) 35,000 ते 65,000 कि.मी    4) 10,000 ते 30,000 कि.मी

उत्तर :- 2


1) भूपृष्ठावरील काही पदार्थ, साधारणत: खडक आणि खनिज पदार्थ ................. मुळे प्रतिदिप्तीत होतात किंवा सदृश्य प्रकाशमान 

     होतात.

   1) अवरक्त प्रारण    2) औष्णिक प्रारण    

   3) सूक्ष्मतरंग प्रारण    4) जंबुपार प्रारण

उत्तर :- 4


2) मध्य कटिबंधातील आवर्ताचा व्यास :

   1) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासाइतका असतो.

   2) कधी उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षाही कमी तर कधी जास्त असतो.

   3) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा जास्त असतो.

   4) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा कमी असतो.

उत्तर :- 3


3) विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव

   1) दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक    2) गडगडाटासह जोरदार पाऊस

   3) वेगवान वारे          4) थंड रात्री

उत्तर :- 2


4) रॉकीजमधील अतिशुष्क व उष्ण वारा म्हणजे :

   1) फॉन    2) लू      3) चिनूक      4) मिस्ट्रल

उत्तर :- 3


5) खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?

   1) जून      2) सप्टेंबर    3) डिसेंबर    4) मार्च

उत्तर :- 1


1) भूपृष्ठाकडे येणा-या सौर ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा ढगांमुळे परावर्तीत होते ?

   1) 27%    2) 34%      3) 51%      4) 17%

उत्तर :- 1


2) अटलांटिक व पॅसिफिक महासागरांप्रमाणे हिंदी महासागरातील सागरी प्रवाहचक्र नियमितपणे व अखंड गतीने कार्यरत राहात 

     नाही, कारण :

   1) 25 अंश उत्तर अक्षवृत्तापलीकडे भुभाग भूखंडाने व्यापलेला आहे.

   2) प्रचलित वा-यांचा समुद्रप्रवाहाच्या दिशेवर परिणाम होतो.

   3) हिंदी महासागरावर ऋतुमानानुसार मोसमी वा-यांची दिशा बदलते.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


3) खालील विधाने पहा :

   अ) फिलीपाइन्सच्या किना-यावरील वादळांना टायफून्स म्हणतात.

   ब) व्हिक्टर, कतरीना ही हरीकेन-चक्री वादळाची नावे आहेत.

   क) युएसएच्या फ्लॉरिडा किना-याजवळ निर्माण होणा-या वादळांना टोरनॅडो म्हणतात.

   1) फक्त विधान अ बरोबर आहे.    2) विधाने अ आणि ब बरोबर आहेत.

   3) विधाने ब आणि क बरोबर आहेत.  4) विधाने अ, ब आणि क बरोबर आहेत.

उत्तर :- 4


4) .............. च्या परिणामने इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सजर्नाचे विखरणे वातावरण करत असते.

   1) उत्सर्जनाचा वेग    2) त्याची वारंवारिता

   3) त्याची तीव्रता    4) वरील सर्व

उत्तर :- 4


5) महाराष्ट्र राज्य हे एकूण 9 कृषि हवामान विभागांमध्ये .................. च्या आधारावर विभागलेले आहे.

   1) पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती      2) पर्जन्य, तापमान व वनस्पती

  3) पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती        4) पर्जन्य, तापमान व मृदा प्रकार 

उत्तर :- 3


1) ‘जेटस्ट्रीम’ चे गुणधर्म खाली दिलेले आहेत. त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा :

   अ) हे दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वा-यांच्या दरम्यान आढळतात.

   ब) हे विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवांजवळील भागात आढळतात.

   क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.

   ड) यांचा भूपृष्ठावरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.

   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) ब आणि ड

उत्तर :- 1


2) एल् निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किना-यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?

   1) ॲटलांटिक    2) पॅसिफिक    3) इंडियन    4) आर्कटिक

उत्तर :- 2


3) भारतीय हवामान खात्याने मान्सून वा-याचे आगमन व निर्गमन यांचा अभ्यास करून चार ऋतू मानलेले आहेत, या ऋतूच्या 

     सोबत कालावधी दिला आहे, यापैकी अचूक पर्याय ‍निवडा.

   अ) नैऋत्य मान्सून काळ  -  जून ते ऑक्टोबर     ब) मान्सून उत्तर काळ  -  ऑक्टोबर ते डिसेंबर

   क) ईशान्य मान्सून काळ  -  जानेवारी ते फेब्रुवारी   ड) मान्सून पूर्व काळ  -  मार्च ते मे

   1) फक्त अ विधान बरोबर आहे.      2) ब आणि क विधाने बरोबर आहेत.

   3) अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


4) भारतीय हवामान वर्गीकरणामध्ये कोपेन या शास्त्राने ‘Amw’ हे अद्यक्षर कशासाठी वापरले आहे ?

   1) निमशुष्क स्टेपी हवामान    2) मोसमी हवामान अल्पकालीन शुष्क हिवाळी

   3) मान्सून शुष्क हिवाळी      4) ध्रुवीय शुष्क हिवाळी

उत्तर :- 2


5) खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते ?

   1) हवेचा दाब    2) तापमान    3) वा-याची दिशा    4) सूर्यप्रकाश

उत्तर :- 2


1) गरजणारे चाळीस हे ..................... वारे आहेत ?

   1) ईशान्य – व्यापारी    2) आग्नेय – व्यापारी    

   3) नैऋत्य – प्रतिव्यापारी    4) वायव्य – प्रतिव्यापारी

उत्तर :- 4


2) दिवसातील सर्वाधिक तापमान .............................. या वेळेत असते.

   1) सकाळी 11.00 ते दुपारी 12.00      2) दुपारी 12.00 ते दुपारी 1.00

   3) दुपारी 1.00 ते 2.00        4) दुपारी 2.00 ते 3.00

उत्तर :- 4


3) महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे ही मान्सूनपूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात ...................... या 

     महिन्यांत जास्त येतात.

   1) एप्रिल आणि जुलै    2) एप्रिल आणि मे    

   3) मे आणि जून      4) जून आणि जुलै

उत्तर :- 3


4) खालील पर्यायातून ज्याचा भारतीय मान्सून निर्मितीशी संबंध नाही असा पर्याय निवडा.

   1) हिमालय पर्वत व तिबेटचे पठार यांचे स्थान व विस्तार

   2) व्दीपकल्पीय भारतातील वनांचे प्रमाण

   3) जेट स्ट्रीम वा-यांचे उच्च वातावरणातील चालीय संचलन

   4) हिन्दी महासागर व आशिया खंडांतर्गत भागाचा तापण्याचा व थंड होण्याच्या क्रियेतील तफावत

उत्तर :- 2


5) ज्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा .............................. टक्के अधिक असतो ते वर्ष पर्जन्याधिक्याचे समजण्यात येते ?

   1) 120    2) 100      

   3) 150    4) 125

उत्तर :- 1


1) खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही ?

   1) पश्चिम पाकिस्तान    2) फीलीपाईन्स    3) दक्षिण व्हिएतनाम    4) मध्य केनिया

उत्तर :- 4


2) भारताव्यतिरिक्त पुढील प्रदेशामध्ये मोसमी वारे वाहतात :

   अ) आफ्रिकेतील गियानाचा किनारा, उत्तर ऑस्ट्रेलियाचा किनारा

   ब) ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, कंबोडीया व व्हिएतनाम 

   क) चीन, दक्षिण जपान      ड) संयुक्त संस्थानाचा मेक्सिकोच्या आखातालगतचा भाग

   1) अ, ब, क बरोबर    2) ब, क, ड बरोबर    3) अ, क, ड बरोबर    4) सर्व बरोबर

उत्तर :- 4


3) तापमानाचे उभे वितरण हे ............................ या घटकावर अवलंबून आहे.

   1) अक्षवृत्ते      2) उंची      3) समुद्र सानिध्य      4) सागरी प्रवाह

उत्तर :- 2 


4) जोडया लावा.

   अ) विषुववृत्तीय कमी भाराचा पट्टा    i) या भागातील हवा पृष्ठभागाचे घर्षण व पृथ्वीच्या परिवलनामुळे वर ढकलली जाते.

   ब) मध्य कटिबंधीय जास्त थराचा पट्टा  ii) वर्षभर तापमान 0ºC पेक्षा कमी असते.

   क) उप-ध्रुवीय कमी भाराचा पट्टा    iii) या भागामध्ये वर्षभर सूर्याची किरणे प्रामुख्याने लंबरूप पडतात.

   ड) ध्रुवीय जास्त भाराचा पट्टा    iv) थंड हवा 25º आणि 35º अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली उतरते.

  अ  ब  क  ड

         1)  i  ii  iv  iii

         2)  iv  ii  iv  iii

         3)  iii  iv  i  ii

         4)  ii  iii  iv  i

उत्तर :- 3


5) खालील विधाने पहा.

   अ) जेट वायुच्या प्रभावामुळे हिवाळयात काश्मिर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो.

   ब) हिवाळयात तामिळनाडूमध्ये ईशान्स मान्सून वा-यामुळे पाऊस पडतो.

   क) बंगालमध्ये उन्हाळयात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतात.

   1) फक्त विधान अ बरोबर आहे.    2) फक्त विधान ब बरोबर आहे.

   3) फक्त विधान क बरोबर आहे.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


1) योग्य जोडया लावा :

  वायू      वातावरणातील शुष्क प्रमाण भाग प्रती दशलक्ष

         अ) नायट्रोजन (N2)    i) 0.007ppm

         ब) हेलियम (He)    ii)0.5ppm

        क) ओझोन (O3)    iii) 780,840.0ppm

         ड) हायड्रोजन (H2)    iv) 5.2ppm

    अ  ब  क  ड

           1)  ii  i  iii  iv

           2)  iv  iii  ii  i

           3)  i  ii  iv  iii

           4)  iii  iv  i  ii

उत्तर :- 4


2) खालील विधानांचा विचार करा.

   अ) एल. निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठाभागावरील तापमानात वाढ होते.

   ब) वर्ष 2013-14 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ आणि ब दोन्हीही    4) अ आणि ब दोन्हीही नाहीत

उत्तर :- 3


3) स्क्वेल / चंडवात (पाऊस व हिम वर्षाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ आहे, परंतु कधी – कधी ............... 

     प्रसंगी येते. 

   1) किनारपट्टीवर मान्सून पूर्व काळात आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.

   2) मान्सून काळात किनारपट्टीवर आणि मान्सून पूर्व काळात अंतर्गत प्रदेशात.

   3) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.

   4) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि अंतर्गत प्रदेशात.

उत्तर :- 2


4) नॅशनल सेंटर फॉर मोडियम रेंज वेदर फोरकास्टींग (NCMRWF) याची स्थापना .................. साली नवी दिल्लीत झाली.

   1) 1985    2) 1988      3) 1992      4) 1994  

उत्तर :- 2


5) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?

   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान

   2) जमीन आणि माती संवर्धन

   3) पिकांचे नियोजन

   4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे

उत्तर :- 1  


1) खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा :

   अ) तपांबर    ब) आयनांबर    क) स्थितांबर    ड) बाह्यांबर

   1) ड, क, ब, अ    2) अ, क, ब, ड    3) अ, ब, क, ड    4) क, ब, अ, ड

उत्तर :- 2


2) सर्वसाधरणपणे उत्सर्जीत सूर्यकिरणांपैकी ................. टक्के सूर्यकिरण पिकाच्या पृष्ठभागावरती शोषले जातात.

   1) 75      2) 79      3) 85      4) 73

उत्तर :- 1


3) जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसाहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा ‘आपलं पाणी’ प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यात राबविला

      जात आहे ?

   1) नागपूर-अमरावती-अकोला    2) धुळे-जळगाव-नंदूरबार

   3) सांगली-सातारा-कोल्हापूर    4) पुणे-अहमदनगर-औरंगाबाद

उत्तर :- 4


4) पावसाच्या थेंबामुळे जमिनीचे धुपीवर कोणता मुख्य परिणाम होतो ?

   1) जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमिनीची घडण बिघडणे.

   2) पाणी साठयास सुरुवात होणे.

   3) जमिनीतील ओलावा कमी करणे.

   4) जोरात वाहणा-या पाण्यामुळे जमिनीच्या कणांची वाहतुक होते.

उत्तर :- 1


5) पाण्याची वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू 

     करण्यात आले ?

   1) बारामती    2) खेड      3) पुरंदर      4) मावळ

उत्तर :- 3


1) सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा ?

   1) जमीन एका हंगामात पडीक ठेवावी.    2) ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

   3) एका आड एक सरी भिजवावी.      4) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर :- 2


2) भारत सरकारने पाणी वापराबाबत काही निर्देश ठरवून दिले आहेत ? महाराष्ट्रासाठी कोणती जोडी चुकीची आहे ?

   1) महापालिका क्षेत्र – 135 लिटर दर डोई दर दिवशी

   2) ‘अ’ गटातील नगरपालिका – 170 लिटर दर डोई दर दिवशी

   3) ‘ब’ गटातील नगरपालिका – 100 लिटर दर डोई दर दिवशी

   4) ग्रामीण विभाग – 40 लिटर दर डोई दर दिवशी

उत्तर :- 2


3) पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिध्दांत वापरून काढतात ?

   1) डारसीज् सिध्दांत    2) हेनरीज् सिध्दांत

   3) ॲव्होगाड्रोज सिध्दांत     4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 2


4) पिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधी संरक्षक पाणी देण्यासाठी जनसंचयनाची (वॉटर हार्वेस्टिंग) प्रामुख्याने जी आणखी 

     केली जाते त्यास ...................... म्हणतात.  

   1) पावसावरची शेती    2) अपधाव शेती

   3) कोरडवाहू शेती    4) वरील सर्व

उत्तर :- 2


5) अ) समतल बांध पध्दत मुख्यत्वे कमी पावसाच्या प्रदेशात जल संधारणासाठी वापरली जाते.

    ब) ढाळीचे बांध पध्दत जास्त पावसाच्या प्रदेशात जास्त झालेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी वापरली जाते.

         वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे  ?

   1) अ बरोबर आणि ब चूक आहे.      2) दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत.

   3) अ चूक आणि ब बरोबर आहे.      4) दोन्ही अ आणि ब चूक आहे.

उत्तर :- 2


1) जर जमिनीवरून वाहून जाणा-या पाण्याच्या प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास जमिनीची धुप करण्याची शक्ती मूळ वेगाच्या किती 

     पटीने वाढेल ?

   1) एकपट    2) दुप्पट      3) चारपट    4) आठपट

उत्तर :- 3


2) कोणत्या पट्टा पीक पध्दतीमध्ये कडधान्य अथवा गवत यांचे पट्टे शेतामध्ये कायम स्वरुपी ठेवले जातात ?

   1) समतल पट्टा    2) वारा प्रतिबंधक पट्टा  3) वरील दोन्ही    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


3) पृथ्वी वरील पाण्याबाबत काय बरोबर नाही ?

   अ) समुद्रात पृथ्वीवरचे 2/3 पाणी आहे परंतु हे पाणी माणसाला उपयुक्त नाही.

   ब) ताजे पाणी (मीठ नसलेले) केवळ 2.7 टक्के आहे.

   क) केवळ 1 टक्के ताजे पाणी मानवास उपयुक्त आहे.

   ड) सुमारे 70 टक्के ताजे पाणी हिमनद्या व बर्फाच्या स्वरुपात अंटार्टिका, ग्रीनलँड व पर्वतरांगात आहे. त्याच्या ठिकाणामुळे ते 

         दुरापास्त आहे.

   1) ब आणि क    2) क आणि ड    3) ब आणि ड    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


4) कोरडवाहू शेतीमध्ये पीक उत्पादन वाढीसाठी खतांची कार्यक्षमता यामुळे वाढविता येईल :

   अ) माती परीक्षण व मातीची प्रतिक्रिया नुसार खतांचा वापर.

   ब) जमिनीमध्ये बियाण्याच्या 5 से.मी. बाजूला किंवा खाली खत देणे.

   क) पेरणीच्यावेळी स्फुरद आणि पालाश खत वापरणे आणि नत्र खतांचा दोन हप्त्यात विभागून वापर करणे.

   1) अ, ब    2) ब, क      3) अ, क      4) अ, ब, क

उत्तर :- 4

5) तुषार सिंचनाच्या समानता गुणांकावर खालील घटक परिणाम करतात  ?

   अ) तुषार तोटयामधील अंतर    ब) पीक भूमिती

   क) संच चालवण्याच्या कालावधी    ड) वा-याची स्थिती

   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) अ आणि ड    4) क आणि ड

उत्तर :- 3



1) साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो ?

   1) कॉपर सल्फेट      2) शिसे      3) कोबाल्ट    4) कॅडमियम

उत्तर :- 1


2) खालील परिस्थितीत तुषार सिंचन पध्दत चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही ?

   1) वा-याचा जास्त वेग    2) जास्त रोपांची घनता  3) कमी रोपांची घनता  4) उताराची जमीन

उत्तर :- 1


3) प्रवाही जलसिंचनात शेवाळ जे नत्र स्थिरीकरणामुळे स्विकारले जाते, तेच ठिबक सिंचन प्रणालीत मुळीत पसंत केले जात नाही 

     कारण – 

   1) ठिबक सिंचन प्रणाली वापरल्यामुळे शेवाळ नत्र स्थिरीकरण करू शकत नाही.

   2) ठिबक सिंचनाच्या पाईपमध्ये शेवाळ वाढू शकत नाही.

   3) ठिबक तोटया बंद पडू शकतात.

   4) यापैकी काहीही नाही.

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना :

   अ) महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत सुरू केलेली आहे.

   ब) अनुसूचित जाती व नवबौध्द कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ जोड व स्वच्छता गृहासाठी ही सुरू केलेली योजना आहे.

   क) या योजनेंतर्गत 75 टक्के अनुदान राज्यसरकार देते तर उर्वरित 25 टक्के रक्कम संबंधित लाभधारक अथवा नागरी स्थानिक 

         संस्थेने खर्च करावी लागते.

   वरीलपैकी कोणती / ते विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    2) फक्त अ आणि ब    3) फक्त ब आणि क    4) अ, ब आणि क

उत्तर :- 2


5) समपातळी (कंटूर) बांधाची शिफारस ................... असणा-या भागासाठी आणि ज्या जमिनीमध्ये पाणी झिरपते व 6 टक्के पर्यंत 

     उतार असतो अशा शेत जमिनीत करतात.  

   1) 600 मि.मी. पेक्षा कमी पर्जन्यमान    2) 600 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान

   3) 1000 मि.मी. पेक्षा अधिक पर्जन्यमान    4) 700 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान

उत्तर :- 1


1) ठिबक सिंचन प्रणालीमध्ये वाळूच्या गाळणीची गरज खालील घटक सिंचनाच्या पाण्यातून काढण्यासाठी होते ?

   अ) शेवाळ    ब) पाण्यात विरघळलेले क्षार    

   क) काडी-कचरा    ड) अतिसुक्ष्म मृदा कण

   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) ब आणि क    4) क आणि ड

उत्तर :- 2


2) गैबीयनच्या संदर्भात कोणत्या बाबी सत्य आहेत ?

   अ) ते हाताळण्यासाठी लवचिक आहेत.    ब) त्यांचे बांधकाम कमी खर्चाचे असते.

   क) अपधावासाठी ते अपाय असतात.    ड) ते सहज फुटू शकतात.

   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) अ आणि ड

उत्तर :- 1


3) ............................ जमिनीसाठी तुषार सिंचन उपयुक्त आहे.

   1) खार    2) उथळ व उताराच्या  

   3) आम्लधर्मी    4) अल्कधर्मी

उत्तर :- 2


4) ....................... सांडवा पाणी आडवून पाणी साठवण्यासाठी उपयोगात आणता येत नाही.

   1) आघात    2) आघात प्रवेश    3) घसरणी    4) आपत्कालीन

उत्तर :- 3


5) एप्रिल 2002 मध्ये स्विकारलेल्या राष्ट्रीय जल नितीची ही उद्दिष्टये आहेत :

   अ) जल संसाधनांच्या नियोजनासाठी चौकट तयार करणे.    ब) एकात्मिक जल संसाधनांचा विकास.

   क) उत्तरेतील नद्या दक्षिणेतील नद्यांशी जोडणे.      ड) भूजल व्यवस्थापन.

   1) अ आणि ब फक्त बरोबर आहेत      2) क आणि ड फक्त बरोबर आहेत

   3) अ, ब आणि ड फक्त बरोबर आहेत    4) वरील सर्व बरोबर आहेत

उत्तर :- 3 


1) ................... पिकांसाठी ठिबक सिंचन पध्दत अतिशय उपयुक्त आहे.

   1) अधिक पाण्यामध्ये होणा-या    2) क्षारांना बळी न पडणा-या

   3) कमी उत्पन्न देणा-या      4) फळ

उत्तर :- 4


2) डोंगराळ आणि चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या रचनेमध्ये अतिरिक्त पावसाच्या पाण्याच्या संकलन करण्यासाठी कोणत्या 

     प्रकारचा तलाव वापरतात ?

   1) बंधा-याने बांधलेला    2) खोदलेला    

   3) पृष्ठीय      4) वरील सर्व

उत्तर :- 1


3) केंद्रीय जल आयोग हा ......................संबंधी कार्यरत आहे.

   1) भूजल      2) पाण्याची गुणवत्ता    

   3) पृष्ठभागावरील पाणी    4) पाणी पुरवठा व स्वच्छता

उत्तर :- 3


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) धन आयन – विनिमय क्षमता मोन्टरमोरेलोनाइट क्ले खनिजामध्ये जास्त असते.

   ब) पिकातील पानांपासून होणारे बाष्पोणपर्णात्सर्जन बासालीन रोखते.

   1) केवळ अ    2) केवळ ब    

   3) दोन्ही    4) एकही नाही

उत्तर :- 1


5) समान सूर्य किरणोत्सर्गामध्ये, सिंचनाखाली घेतलेल्या पिकाचे उत्पन्न हे समान पाणी पावसामार्फत मिळालेल्या त्याच पिकाच्या 

     उत्पन्ना ............................... असते ?

   1) पेक्षा अधिक    2) एवढे    

   3) पेक्षा कमी    4) पेक्षा अनिश्चित

उत्तर :- 3 


1) पिकाची पाण्याची गरज काढताना सर्वाधिक पीक गुणांक कोणत्या वाढीच्या अवस्थेत असतो ?

   1) प्रजोत्पादन अवस्था    2) रोप अवस्था

   3) जोमदार शाखीय अवस्था  4) पक्वता अवस्था

उत्तर :- 1


2) पाण्याची धूप रोखण्याकरिता कृषीविद्या विषयक कोणकोणत्या उपाय योजना आहेत ?

   अ) पिकाची निवड व जमिनीची मशागत      ब) पट्टा पेर आणि जमिनीवरचे अच्छदान

   क) समतल बांधबंधीस्‍ती आणि वनस्पतीजन्य अडथळे    ड) वरीलपैकी कोणतेही नाही

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त    

   3) अ आणि क फक्त    4) ड फक्त

उत्तर :- 1


3) ज्या प्रक्रियेमध्ये पावसाचे पाणी तळे, जलाशयामध्ये गोळा करून साठविले जाते आणि ते पिकांना जेव्हा पाहिजे तेव्हा पुरवणी 

     सिंचन म्हणून दिले जाते त्यास .......................... असे म्हणतात.

   1) पाऊस संचयन    2) पाणी संचयन    

   3) संरक्षित सिंचन    4) सिंचन

उत्तर :- 2


4) दोन भिन्न अवस्थांमधील आकर्षणास .......................... असे म्हणतात.

   1) अधेझ्न (Adhesion)      2) कोहीझन (Cohesion)    

   3) प्रतिसारण (Repulsion)    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1


5) कमी दर्जाचे / प्रतिचे पाणी सिंचनाच्या ................... या पध्दतीमध्ये वापरले जाऊ शकते.

   1) तुषार सिंचन      2) ठिबक सिंचन    

   3) सरी – वरंबा पध्दत    4) मोकाट पध्दत

उत्तर :- 2


1) भारतामधील बहुतेक सिंचन (कमांड) क्षेत्रामध्ये सिंचनाने ......................... वाढली आहे.

   1) पाणथळ जमिनी    2) भूमिगत उच्चतम पाणी पातळी

   3) क्षारयुक्त जमीन    4) वरील सर्व

उत्तर :- 4


2) झाडांना मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास ....................... पुरविणा-या खतांची कार्यक्षमता वाढते.

   1) नत्र      2) स्फुदर      

   3) पालाश    4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- 2


3) काही वनस्पतीमध्ये पानांच्या कडा किंवा टोक यामधून काही प्रमाणात थेंबांच्या स्वरूपात पाण्याचा –हास होतो. या प्रक्रियेला 

     ................... म्हणतात.

   1) ॲबसॉर्पशन (शोषण)      2) ॲडसॉपर्शन

   3) ऑसमॉसीस (परासरण)    4) गटेशन

उत्तर :- 4


4) वनस्पतीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याचा क्षमता ........................ मुळे येते.

   अ) पाणी ग्रहण करणे    ब) पाण्याचे नुकसान कमी करणे

   क) जलसंचय      ड) वरीलपैकी कोणतेही नाही

   1) अ व ब फक्त    2) ब व क फक्त    3) अ, ब व क    4) ड फक्त

उत्तर :- 3


5) पाण्याच्या प्रवाहासोबत कितपत पाणी हे जमिनीत समप्रमाणात विभागले जाते ते .......................... दर्शविते.

   1) पाणी देण्याची कार्यक्षमता    2) पाणी वाटप कार्यक्षमता

   3) पाणी वाहन कार्यक्षमता      4) पाणी साठवण कार्यक्षमता

उत्तर :- 2


1) पृष्ठीय सिंचन पध्दतीची (प्रवाह पध्दती) क्षमता कशी सुधारता येऊ शकते ?

   अ) पाटाचे अस्तरीकरण करून    ब) जमिनीचे योग्य सपाटीकरण करून

   क) मोकाट पध्दतीने पाणी देऊन

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त

   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?

   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक

   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार

उत्तर :- 1


3) शाश्वत शेतीच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कोणत्या शेती पध्दतीचा सहभाग महत्त्वाचा असतो ?

   1) सेंद्रिय शेती        2) कोरडवाहू शेती

   3) पावसावर आधारित शेती    4) चारा – गवत शेती

उत्तर :- 1


4) पडणा-या पावसाच्या संवर्धनासाठी खोल जमिनीत खालीलपैकी कोणती पध्दत अतिशय महत्त्वाची आहे ?

   1) जमिनीच्या वरच्या थरात बदल करणे    2) जमिनीच्या वरच्या थरात विशिष्ट आंतररचना करणे (कॉनफिगरेशन)

   3) खोल नांगरट करणे        4) जमिनीशी उभे आच्छादन करणे

उत्तर :- 2


5) अ) वालुकामय मातीमध्ये चिकन माती पेक्षा जास्त रिकाम्या जागा असतात.

    ब) चिकणमाती वालुकामय मातीपेक्षा जास्त पाणी समावून घेऊ शकते.

   वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?

   1) अ आणि ब पैकी एकही बरोबर नाही    2) अ बरोबर पण ब चूक आहे

   3) अ चूक पण ब बरोबर आहे      4) दोन्ही अ आणि ब बरोबर आहे

उत्तर :- 3


1) कोणत्या प्रकारच्या मशागतीचा हेतू जमिनींची धूप थांबविण्यासाठी व पिकांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पादनसाठी आहे ?

   1) धानांच्या ताटांचे बुडरवे, आच्छादन व मशागत    2) शुन्य मशागत

   3) कमीत कमी मशागत          4) प्राथमिक मशागत

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या प्रस्थापनाला / विकासाला भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाने हातभार लावला ?

   1) अवर्षण प्रणव क्षेत्र कार्यक्रम (डी.पी.ए.पी.)      

   2) वाळवंट विकास कार्यक्रम (डी.पी.पी.)

   3) कोरड वाहु प्रदेशासाठी राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (एन.डब्लु.डी.पी.आर.ए.)

   4) बहुव्याप्ती असलेला पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (काऊडेप)

उत्तर :- 3


3) भारतात मिट्टी बचाओ (माती वाचवा) चळवळीला कुठे सुरवात झाली ?

   1) नागपूर, महाराष्ट्र    2) म्हैसूर, कर्नाटक    

   3) दारभंगा, बिहार    4) होशंगाबाद, मध्यप्रदेश

उत्तर :- 4


4) पिकांना स्फुदराची जास्तीत जास्त उपलब्धता होण्यासाठी जमिनीचा सामू या दरम्यान असतात.

   1) 4.5 – 6    2) 6 – 7    

   3) 7.5 – 8.5    4) 7.0 – 8.5

उत्तर :- 2


5) कमी पावसाच्या प्रदेशातील बागायती जमिनी कशामुळे क्षारयुक्त व चोपण (अल्कली युक्त) होतात ?

   1) कमी प्रमाणात अन्नद्रव्याचा निचरा    2) पीक अवशेषांचा अती वापर

   3) असंतुलीत खतांचा वापर      4) पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठभागातील थरांमध्ये क्षारांची वाढ

उत्तर :- 4


1) पिकांच्या योग्य वाढीसाठी पोयटा (लोम) मातीत, हवा : पाणी : घन पदार्थ........................ प्रमाणात असावेत:

   1) 20:30:50    2) 30:30:40    3) 25:30:45    4) 25:25:50

उत्तर :- 4


2) मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपरू हे कोणत्या संशोधनाशी संबंधित आहे ?

   1) जमीन धुपीचे परिणाम      

   2) पाण्याने होणा-या धुपीचे परिणाम

   3) वा-याने होणा-या धुपीचे परिणाम    

   4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 3


3) डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरेंसींग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते ........................

   1) 16% ते 33%    2) 3% ते 5%      

   3) >10%      4) 40% ते 45%

उत्तर :- 1


4) जमिनीचा पोत म्हणजे

   1) मातीच्या खनिजांची रचना    2) मातीच्या कणांची रचना

   3) सेंद्रीय पदार्थाची रचना      4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 4


5) आम्लधर्मीय जमिनी ................... यांच्या निच-यामुळे तयार होतात ?

   1) पालाश, सोडियम, तांबे, चुना    

   2) मॉलिबडेनम, चुना, मॅग्नेशियम, सोडियम

   3) चुना, मॅग्नेशियम, पालाश, हाइड्रोजन  

   4) चुना, सोडियम, मॅग्नेशियम, पालाश

उत्तर :- 4


1) धूपे बरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते ?

   1) नत्र      2) पालाश    

   3) स्फुरद    4) लोह    

उत्तर :- 3


2) साधारणत: जमिनीची सच्छिद्रता किती असते ?

   1) 20 ते 30%    2) 30 ते 35%    

   3) 30 ते 60%    4) 60 ते 70%

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणते पीक मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे ?

   1) मका    2) ज्वारी      

   3) बाजरी    4) चवळी

उत्तर :- 4


4) जमिनीची धूप थांबविण्यासाठी पहिली पायरी म्हणजे.................. थांबविणे.

   1) पाण्याचा प्रवाह    2) वा-याचा वेग

   3) मातीचे विभक्तीकरण    4) झाडांची वाढ

उत्तर :- 3


5) कमी ते मध्यम पावसाच्या भागामध्ये समपातळीत बांध असलेल्या काळया जमिनीवर कोणत्या प्रकारच्या टेरेसिंगचा वापर 

     करतात?

   1) झिंग टेरेसिंग      2) बेंच टेरेसिंग

   3) ग्रेडेड टेरेसिंग      4) वरील सर्व

उत्तर :- 1 


1) ठाळीचे बांध कोणत्या ठिकाणी घेतले जातात ?

   अ) जमीन पाण्याच्या धुपेला कमी ग्रहणशील आहे तेथे    ब) मातीची पारगम्यता कमी आहे तेथे

   क) दलदलीच्या जमिनीत           ड) जास्त उताराच्या जमिनीत

उत्तर :- 3


2) मृदेची सच्छिद्रता (Porosity) जर 50% आहे तर छिद्र गुणोत्तर (void ratio) ......................... इतके असेल.

   1) 0.5      2) 1.0      3) 2.0      4) 5.0

उत्तर :- 2


3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) जमिनीची वा-यामुळे होणारी धुप जमिनीची पारगम्यता बदलून गंभीर स्वरुपाची हानी घडवून आणते.

   ब) हिस्टोसोल्स यांनी नैसर्गिक / जैविक मृदा म्हणतात.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 2


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) लॅटरीटिक मृदा मोसमी हवामानाच्या प्रदेशात आढळते.

   ब) लॅटरीटिक मृदा लोह, ॲल्युमिनियम, पोटॅश व चुनखडीयुक्त आहेत.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 1


5) जमिनीचा उतार ................ टक्केपेक्षा जास्त असतो तेव्हा कंटूर चर तांत्रिकदृष्टया किंवा आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत नाहीत.

   1) 10      2) 15      3) 20      4) 25

उत्तर  :- 3


1) चांगल्या पोयटयाच्या मातीत पोयटयाचे प्रमाण साधारण ....................... टक्के असते.

   1) 10-20    2) 20-30    

   3) 30-50    4) 60-75

उत्तर :- 3


2) अपपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे ?

   1) रासायनिक    2) कायिक/भौतिक    

   3) जैविक    4) भस्मीकरण

उत्तर :- 2


3) जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या जमिनीच्या (मातीच्या) ‘अ’ थरामध्ये का असते ?

   1) मातीची ‘अ’ थरामध्ये जास्त अन्नद्रव्ये असतात.    2) मातीची ‘अ’ थरामध्ये सुपीकता अधिक असते.

   3) मातीची ‘अ’ थरामध्ये जलसंपृक्त असतो.      4) मातीची ‘अ’ थरामध्ये भरपूर सेंद्रीय पदार्थ असतात.

उत्तर :- 4


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे  ?

   अ) विम्लधर्मीय आणि क्षारयुक्त विम्‍लधर्मीय जमिनी पुन:प्रापण करण्यासाठी (सुधारण्यासाठी) सल्फर वापरतात.

   ब) क्षारयुक्त जमिनीमध्ये विनिमयात्मक सोडियमची टक्केवारी 15 पेक्षा अधिक असते.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 1


5) ‍विधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

   अ) रेगूर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खो-यात, पठारी प्रदेशात सापडते.

   ब) जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करडया रंगाची मृदा आढळते.

   1) विधान अ बरोबर    2) विधान ब बरोबर

   3) दोन्ही विधाने बरोबर    4) दोन्ही विधाने चूक

उत्तर :- 3  


1) माती (मृदा) तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पदार्थ पाण्याबरोबर वाहत जाऊन जमा होतात ते म्हणजे

   अ) कोलूव्हियम    ब) लॅक्यूस्ट्राइन    क) ॲल्यूव्हीयम    ड) टिल

   1) अ      2) अ व ब    3) क      4) ड

उत्तर :- 3


2) वरून वाहणा-या पाण्यामुळे उताराच्या जमिनीमधून समप्रमाणात पातळ थरामध्ये माती निघून जाणे याला .................... असे 

     म्हणतात.

   1) ओघळपाडी धूप  2) घळई धूप    3) सालकाढी धूप    4) शिंतोडे धूप

उत्तर :- 3


3) दरवर्षी आपल्या देशात अंदाजे किती मातीची धूप होते ?

   1) 12 अब्ज टन    2) 100 अब्ज टन    3) 329 अब्ज टन    4) 120 अब्ज टन

उत्तर :- 1


4) मातीचा .................... गुणधर्म कमी करण्यासाठी ऊसाची मळी मातीमध्ये मिसळली जाते.

   1) क्षार      2) विम्ल      3) अम्ल      4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


5) जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्युमस हे जमिनीची ......................... वाढवितात.

   अ) जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता

   ब) अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग/ दर)

   क) सच्छिद्रता

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त

   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क

उत्तर :- 4


1) वालुकामय मातीमध्ये असणारी एकूण रंध्र पोकळी (छिद्रांनी व्यापलेली जागा) ही .........................

   1) चिकणमातीपेक्षा जास्त असते      2) चिकणमातीपेक्षा कमी असते

   3) चिकणमाती इतकीच असते      4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


2) व्हर्टीसोलला .......................... असे म्हणतात.

   1) ॲल्यूव्हीएम      2) चेस्टनट    3) रेगूर      4) लॅटोसॉल्स

उत्तर :- 3


3) युनायटेड स्टेटस्‍ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांच्याप्रमाणे मातीमधील मध्यम वाळू कणांचा व्यास ...................... मी.मी. होय.

   1) 0.5 ते 0.25      2) 0.05 ते 0.002    3) 2.00 ते 1.00    4) 1.00 ते 0.50

उत्तर :- 1

4) खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

   अ) सतलज गंगा खो-यांमध्ये सुपीक गाळाची मृदा आढळते.

   ब) दख्खनच्या पठारावर खोल, मध्यम व उथळ थराची सुपीक काळी मृदा आढळते.

   क) पश्चिम किनारपट्टीला आर्द्र हवामानात जांभी मृदा आढळते.

   ड) व्दीपकल्पीय पठारावर लोहाचा अंश असणारी लाल, तांबूस व पिवळसर मृदा आढळते.

   1) अ आणि ब विधाने बरोबर आहेत.    2) क विधान बरोबर आहे.

   3) अ आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


5) खाली नमूद केल्यापैकी कोणती मृदा धुपेची कारणे संपूर्णत: मानव निर्मिती आहेत ?

   अ) भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार      ब) मृदेचे स्वरूप

   क) जंगलतोड          ड) गवताळ कुरणांचा वाजवी पेक्षा जास्त वापर

   इ) भटकी शेती

   1) वरील सर्व    2) ब, क आणि ड    3) अ, क आणि ड    4) क, ड आणि इ

उत्तर :- 4


1) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस

   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा ड्रायव्हिंग – तारकर्ली

उत्तर :- 3


2) महाराष्ट्र सरकारने 2006 साली पर्यटन धोरण विकसित केले. खालीलपैकी कोणते विधान या पर्यटन धोरणाचा भाग नाही ?

   अ) करमणूक करामधून सुट        ब) किनारी नियंत्रण कायद्यातून सूट

   क) पाणी आणि विजेचे दर औद्योगिक गटानुसार    ड) मालमत्ता करातून आणि अकृषि करातून सूट

   इ) अविकसित प्रदेशातून सूट

    योग्य पर्याय निवडा:

   1) अ, क आणि इ    2) ब आणि क    3) ब आणि ड    4) फक्त ब

उत्तर :- 4


3) राजीव गांधी खेळ अभियानाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही ?

   अ) ती एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.    ब) ती 2014 मध्ये सुरू करण्यात आली.

   क) तिने पंचायत युवा क्रिडा आणि खेळ अभियानाची जागा घेतली.

   ड) ‘युवकात खेळ आयुष्याचा एक मार्ग’ यास प्रोत्साहन देण्यास, खेळांच्या सुविधा सहज उपलब्ध करून देणे व खेळांच्या स्पर्धा 

         भरविणे या बाबी सम्मीलित आहेत.

   इ) सर्वकष क्रीडा केंद्रे या योजनेत बांधली जातील.  फ) स्त्रीयांना स्वत:चे संरक्षण प्रशिक्षण यात सम्मीलित आहे.

   ग) विशेष वर्गासाठी खेळही आयोजित केले जातात असे की उत्तर – पूर्व क्षेत्र खेळ.

   1) इ      2) फ      3) ग      4) वरील तिन्हीपैकी एकही नाही

उत्तर :- 4


4) पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे ?

   अ) नेलोरी, बेलरी, गुरेजी, केशरी या भारतातील मेंढीच्या जाती आहेत.

   ब) भारतीय लोकर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत कमी प्रतीची समजली जाते व तिला जाडीभरडी कार्पेट लोकर 

         म्हणतात.

   1) केवळ अ      2) केवळ ब      3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 2


5) मलेरिया हा भारत तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसार पावलेला रोग आहे. मलेरिया बाबत कोणते विधान असत्य आहे ?

   अ) मुंबई ही मलेरियाची राज्यातील राजधानी आहे.

   ब) गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा मलेरिया ग्रस्त जिल्हा आहे.

   क) महाराष्ट्र हे देशात आठव्या क्रमांकाचे मलेरियाग्रस्त राज्य आहे.

   ड) ओरिसा हे भारतातील सर्वाधिक मलेरियाग्रस्त राज्य आहे.

   1) फक्त अ      2) अ, ब आणि ड      3) अ, ब आणि क    4) फक्त क

उत्तर :- 4


1) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा – वेरूळ लेणी आहेत ?

   1) पुणे      2) अहमदनगर    

   3) औरंगाबाद    4) लातूर

उत्तर :- 3


2) महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

   1) 6      2) 4      

   3) 7      4) 9

उत्तर :- 1


3) पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये ......................... चे स्थान आहे.

   1) महाड    2) वाई      

   3) महाबळेश्वर    4) नाशिक

उत्तर :- 2


4) खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ?

   1) लोणावळा    2) चिखलदरा    

   3) महाबळेश्वर    4) माथेरान

उत्तर :- 2


5) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?

   1) सांगली    2) सातारा    

   3) रायगड    4) रत्नागिरी

उत्तर :- 3


1) जोडया जुळवा.

   अ) सिंधुदुर्ग    1) पेट्रोलियन/ खनिज तेल

   ब) मुंबई    2) औषधी खनिजयुक्त पाणी

   क) गडचिरोली    3) मँगनीज

   ड) ठाणे    4) चुनखडी

   1) अ-4, ब-2, क-1, ड-3      2) अ-3, ब-1, क-4, ड-2

   3) अ-3, ब-2, क-4, ड-1      4) अ-2, ब-1, क-3, ड-4

उत्तर :- 2


2) लोह व ॲल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?

   1) काळी मृदा    2) गाळाची मृदा    3) जांभी मृदा    4) पिवळसर मृदा

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणती जोडी कृषी विद्यापीठ व गाव यांच्या करिता बरोबर आहे ?

   1) मराठवाडा कृषी विद्यापीठ – राहुरी

   2) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ – अकोला

   3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी विद्यापीठ – परभणी

   4) महात्मा फुले कृषी विद्यापीठ – दापोली

उत्तर :- 2


4) मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर .......................... हे आहे.

   1) कांडला    2) मार्मागोवा    3) हल्दीया    4) न्हावा-शेवा

उत्तर :- 4


5) पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर 

     कोणते ?      

   1) मुंबई    2) ठाणे      3) चंद्रपूर      4) नागपूर

उत्तर :- 3


1) महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने ........................... जिल्ह्यात आढळतात.

   1) सोलापूर    2) अहमदनगर    

   3) जालना    4) अमरावती

उत्तर :- 2


2) माथेरान हे ........................ वस्तीचे उदाहरण आहे.

   1) रेषीय    2) जुळी      

   3) गोलाकार    4) डोंगरमाथा

उत्तर :- 4


3) एखाद्या देशातील व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास 

     .................... स्थलांतर म्हणतात.

   1) सक्तीचे    2) अंतर्गत    

   3) आंतरराष्ट्रीय    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


4) नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

   1) अकोला    2) बुलढाणा    

   3) वाशिम    4) हिंगोली

उत्तर :- 1


5) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील ........................... क्रमाकांवर देश आहे.

   1) तीन    2) पाच      

   3) सात    4) नऊ

उत्तर :- 3


1) खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही  ?

   1) विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे.

   2) तीची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त आहे.

   3) या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात.

   4) ही प्रणाली तांबडया वाळुकाश्मासाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर :- 1


2) श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल ?

   1) समभूज त्रिकोण    2) काटकोन त्रिकोण    

  3) सरळ रेषा      4) वरीलपैकी कोणतीही  नाही

उत्तर :- 2


3) खालील विधाने भारतातील हिवाळयातील स्थिती वर्णन करतात.

   अ) उत्तर भारतात कमी तापमान असते.    ब) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो.

   क) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो.    ड) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ, ब, क    2) अ, क, ड    3) अ, ब, ड    4) फक्त क

उत्तर :- 3


4) ......................... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

   1) जोग    2) नायगारा    3) कपिलधारा    4) शिवसमुद्र

उत्तर :- 1


5) गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे .......................... साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.

   1) वाघ      2) हत्ती      3) सिंह      4) गेंडा

उत्तर :- 3 


1) जम्मू व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प ....................... या नदीवर आहे.

   1) रावी    2) बियास    3) चिनाब    4) व्यास

उत्तर :- 3


2) जमशेदपूर हे औद्योगिक शहर .......................... या नदीवर वसले आहे.

   1) महानदी    2) सोन      3) सुवर्णरेखा    4) गंगा

उत्तर :- 3


3) .................... हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.

   1) दिल्ली ते आग्रा    2) मुंबई ते ठाणे

   3) हावडा ते खडकपूर    4) चेन्नई ते रेनीगुंठा

उत्तर :- 2


4) भारतात चहा उत्पादनात ...................... राज्याचा प्रथम क्रमांक आहे.

   1) आसाम    2) बिहार      3) महाराष्ट्र    4) ओरिसा

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत  ?

   1) ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे.

   2) अशा विहीरी नैसर्गिक तेल पुरवतात.

   3) या विहीरी नैसर्गिक वायू पुरवतात.

   4) वरील कोणतेही नाही.

उत्तर :- 4


1) 2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण .....................% आहे.

   1) 76.88%    2) 88.76%    3) 71.42%    4) 42.71%

उत्तर :- 1


2) प्रकाशामध्ये (दृश्य)........................ असतात.

   1) लघु लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी

   2) दीर्घ लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी

   3) लघु लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी

   4) दीर्घ लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी

उत्तर :- 1


3) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

   1) सिआल    2) सायमा    3) निफे      4) शिलावरण

उत्तर :- 3


4) खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे ?

   1) बॅक्टेरिया      2) निमॅटोडस्‍    

   3) ॲक्टीनोमायसेटस्‍    4) फंगी

उत्तर :- 2


5) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................. असते.

   1) 470 W/m²      2) 770 W/m²      

   3) 1170 W/m²      4) 1370 W/m²

उत्तर :- 4


1) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन आणि पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?

   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान    2) जमीन आणि माती संवर्धन

   3) पिकांचे नियोजन        4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?

   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक

   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार

उत्तर :- 1


3) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस

   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा डायव्हिंग – तारकर्ली

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

   1) सह्याद्री    2) सातपुडा    

   3) मेळघाट    4) सातमाळा

उत्तर :- 2


5) 1 जुलै 1998 रोजी ..................... या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.

   1) उस्मानाबाद    2) धुळे      

   3) परभणी    4) भंडारा

उत्तर :- 2


1) कोकणचे हवामान ..................... आहे.

   1) कोरडे    2) विषम      

   3) सम      4) थंड

उत्तर :- 3


2) .................. ही वर्धा नदीची उपनदी आहे.

   1) पेनगंगा    2) भीमा      

   3) येरळा    4) पंचगंगा

उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात ................ या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.

   1) सिंधुदुर्ग    2) गडचिरोली    

   3) औरंगाबाद    4) सोलापूर

उत्तर :- 2


4) पश्चिम महाराष्ट्रातील .................. जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

   1) नाशिक    2) पुणे      

   3) कोल्हापूर    4) सोलापूर

उत्तर :- 3


5) महाराष्ट्राच्या पठारावर .................. मृदा आढळते.

   1) क्षारयुक्त    2) वाळुकामय    

   3) काळी    4) जांभी

उत्तर :- 3


Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...