१० जून २०२४

चालू घडामोडी :- 09 JUNE 2024

1) दरवर्षी 09 जून रोजी जगभरात 'जागतिक मान्यता दिन' (हिंदीमध्ये जागतिक मान्यता दिन) साजरा केला जातो.

2) दरवर्षी 09 जून रोजी प्रवाळाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी 'कोरल ट्रॅगल डे' साजरा केला जातो.

3) प्रवाळ त्रिकोण दिन सर्वप्रथम 09 जून 2012 रोजी साजरा करण्यात आला.

4) ईनाडू ग्रुपचे संस्थापक आणि ज्येष्ठ मीडिया व्यक्तिमत्व रामोजी राव यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.

5) पेंटब्रश आर्ट कम्युनिटी, भारतीय प्रवासी कलाकारांच्या गटाने संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 'रेट्रो रिव्हायव्हल' नावाचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

6) नवीनतम QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रैंकिंग 2025 नुसार, IIT खरगपूर ही देशातील चौथी सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्था बनली आहे.

7) गॅम्बियन सिव्हिल सर्व्हट्ससाठी चौथा मिड-करिअर प्रशिक्षण कार्यक्रम 'नवी दिल्ली' येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.

8) युनायटेड नेशन्स (UN) ने सशस्त्र संघर्षांदरम्यान मुलांवर गुन्हे करणाऱ्या देशांच्या 'लाजरी यादी'मध्ये इस्रायल आणि हमासचा समावेश केला आहे.

9) बिस्लेरी लिमोनाटाने बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर यांची पहिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

10) कॅनडाचे माजी पंतप्रधान विल्यम लिऑन मेकेन्झी किंग हे सर्वाधिक काळ (21 वर्षे, 154 दिवस) सत्तेवर राहणारे जागतिक नेते आहेत.

11) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार बर्ड फ्लूमुळे जगातील पहिला मानवी बळी (मृत्यू) मेक्सिकोमध्ये झाला आहे.

12) रामोजी राव यांनी 1984 मध्ये चित्रपटांची निर्मिती सुरू केली.

13) रामोजी राव यांना 2000 मध्ये 'नुवी कवळी' चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

14) जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ संकुल म्हणून 'रामोजी फिल्म सिटी'ची 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे.

15) उत्तर प्रदेशा ची पूजा तोमर UFC मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.

16) पूजाने तोमरने 2012 पासून MMA फायटिंगला सुरुवात केली होती.

17) भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या पहिल्या क्रू मिशनमध्ये बोईंग स्टारलाइनरमधून अंतराळात उड्डाण करणारी पहिली महिला ठरली आहे.

18) भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स नासाच्या स्टारलाइनर मोहिमे अंतर्गत तिसऱ्यांदा अंतराळात पोहचल्या आहेत.

19) सुनीता विल्यम्स यांनी सर्वप्रथम श्री गणेशाची मूर्ती आणि भगवद्गीता अंतराळात नेली आहे.

आयोग व त्यांचे अध्यक्ष:

✅राष्ट्रीय मानवी हक्क आयोग:

स्थापना: 12 oct 1993

1ले अध्यक्ष: न्या. रंगनाथ मिना

सध्याचे अध्यक्ष: अरूण कुमार मिश्रा


✅महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग: 

स्थापना: 6 मार्च 2001

1ले अध्यक्ष: न्या. अरविंद सावंत

सध्याचे अध्यक्ष: कमलकिशोर ताटेड


✅राष्ट्रीय महिला आयोग:

स्थापना: 31 जाने 1992

1ले अध्यक्ष: जयंती पटनायक

सध्याचे अध्यक्ष: रेखा शर्मा


✅महा- राज्य महिला आयोग:

स्थापना: 28 जाने 1993

सध्याचे अध्यक्ष: रुपाली चाकणकर


✅राष्ट्रीय माहिती आयोग:

स्थापना: 12 0ct 2005

1 ले अध्यक्ष: बजाहत हबीबुल्ला

सध्याचे अध्यक्ष: हिराला समरिया


✅महा राज्य माहिती आयोग:

स्थापना: 2 मार्च 2006

सध्याचे अध्यक्ष: सुमित मलिक 


✅ केंद्रीय निवडणुक आयोग:

स्थापना: 25 जाने 1950

सध्याचे अध्यक्ष: राजीव कुमार (25 वे)


✅महा-राज्य निवडणुक आयोग:

स्थापना: 26 एप्रिल 1994

सध्याचे अध्यक्ष: UPS मदान 


✅निती आयोग:

स्थापना: 1 जाने 2015

1ले अध्यक्ष: नरेंद्र मोदी (पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष)


✅राष्ट्रीय बालहक्क आयोग: 

स्थापना: मार्च 5 2007

1ले अध्यक्ष: शांता सिन्हा

सध्याचे अध्यक्ष: प्रियांक कानुनगो

महिलांच्या साठी विविध राज्यात असलेल्या महत्त्वाच्या योजना

 ✅कर्नाटक राज्य :- 

⭐️गृहलक्ष्मी योजना  : कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा 2000 रुपयांची निधी


✅तमिळनाडू राज्य  :-

⭐️कलैग्नार मगलीर उरीमाई थित्तम योजना  : कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा 1000 रुपये


✅आंध्र प्रदेश राज्य :

⭐️अम्मा वोडी योजना : शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मातांना दरवर्षी 15000 रुपये , 45 ते 60 वयोगटातील महिलांना दरवर्षी 18500 रुपये


✅उत्तर प्रदेश राज्य :- 

⭐️कन्या सुमंगला योजना : प्रत्येक मुलीला जन्मापासून शिक्षणापर्यंत खर्चासाठी 25000 रुपये


✅मध्य प्रदेश राज्य 

⭐️लाडली बहना योजना  : 1.3 कोटी महिलांना दरमहा प्रत्येकी 1,250 रुपये


✅पश्चिम बंगाल 

⭐️लक्ष्मीर भंडार : अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील रुपये महिलांना दरमहा 1000 रुपये

⭐️कन्याश्री प्रकल्प : 13 ते 18 या वयोगटातील शाळा तसेच कॉलेजात जाणाऱ्या मुलींना दरवर्षी 1000 रुपये

⭐️रूपश्री प्रकल्प: लग्नासाठी मुलीला एकदाच 25000 रुपयांचे अनुदान


📌कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली या राज्यांनी महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाते.

📌महाराष्ट्रात महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सवलत दिली जाते


जिल्हाधिकारी

– जिल्हा हा प्राचीन कालखंडापासून महत्वाचा घटक मानला जातो.  जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्याचा संपूर्ण कारभार चालतो.

– रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या मते ” जिल्हाधिकारी असे कासव आहे ज्याच्या पाठीवर भारत सरकाररूपी हत्ती उभा आहे”. जिल्हाधिकारी या पदाचा वेगवेगळ्या कालखंडामध्ये विकास होत गेला आहे.

कालखंड                           जिल्हाधिकाऱ्यांचे नाव

मौर्य कालखंड                      राजुका

गुप्त कालखंड                      वीसयापती

मोगल कालखंड                    अमीर / अमल गुजर

ब्रिटीश कालखंड                   जिल्हाधिकारी


भारतामध्ये जिल्हाधिकारी हे पद १४ मे १७७२ रोजी वॊरन हेस्टींगंज यांनी निर्माण केले. ( महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे )

– १७८७ मध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायदानाची वदंडाधिकाऱ्याची कामे सोपविली.

– सुरवातीला जिल्हा धिकारी होण्यासाठी ( ICS- Indian Civil Services ) परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक होते.

– भारतामध्ये १९४६ ला ICS सेवेचे रूपांतर IAS सेवेमध्ये करण्यात आले.

– सुरेंद्रनाथ बेनर्जी हे भारतातील पहिले ICS  परीक्षा उत्तीर्ण व्यक्ती होय. 

– सत्येंद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले ICS अधिकारी होय. 

– ICS परीक्षेमध्ये भारतीय लोकांचा सहभाग वदावा यासाठी ‘ली कमिशनच्या‘ शिफारशीच्या आधारावर भारतामध्ये १९२६ ला सांघिक लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली ( UPSC ).

– स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सांघिक लोकसेवा आयोगाचे रूपांतर केंद्रीय लोकसेवा आयोग असे करण्यात आले व भारतीय राज्यघटनेचा कलम ३१५ मध्ये तरतूद करण्यात आली.

– जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख असतो. तसेच भारतीय प्रशासन सेवेतील IAS दर्जाचा वरिष्ठ अधिकारी असतो.

– महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ७ (१) नुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हाधिकारी असतो.

पात्रता                    पदवीधर असावा

निवड                     केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे

नेमणूक                   राज्य शासन

दर्जा                       IAS चा

कार्यक्षेत्रे                  जिल्हास्तर

वेतन व भत्ते              राज्य शासन

कार्यकाळ                 ३ वर्ष ( ३ वर्षानंतर बदली )

नियंत्रण                   विभागीय आयुक्त

रजा                       राज्य शासन

राजीनामा                 राज्य शासन

बडतर्फी                  केंद्र शासनाच्यावतीने


महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा

'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन' हे कोणी म्हंटले ?*

A) सुभाष चंद्र बोस ✅✅
B) नारायण गुरु 
C) सुखदेव 
D) भगत सिंग

♻️♻️ *सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ?*

A) सुधाकर  
B) केसरी 
C) दीनबंधु ✅✅
D) प्रभाकर

♻️♻️ *महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही ?* 
A) गुलामगिरी 
B) जातीचा उच्छेद ✅✅
C)  शेतक-यांचा आसूड 
D) ब्राह्मणांचे कसब

♻️♻️ *कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ?*

A) तापी ✅✅
B) कावेरी 
C) महानदी 
D) कृष्णा

*महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?*

A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅
B) आण्विक ऊर्जा  
C) जल विद्युत ऊर्जा 
D) यापैकी नाही

♻️♻️ *पुण्याचे प्लेग कमिश्नर रैंड यांची 1893 मध्ये _________ याने हत्या केली. *

A) दामोदर हरि चाफेकर ✅✅
B) वासुदेव बळवंत फडके 
C) उस्ताद लहुजी मांग 
D) अनंत कान्हेरे 

♻️♻️ *मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली ?*

A) ढाका ✅✅
B) कोलकाता 
C) चितगांव 
D) मुर्शिदाबाद

♻️♻️ *बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ?*

A) लॉर्ड रिपन 
B) लॉर्ड डफरीन 
C) लॉर्ड डलहौसी 
D) लॉर्ड कर्झन ✅✅

♻️♻️ *बार्डोलीचा सत्याग्रह ___________ यांच्या नेतृत्त्वाखाली झाला. *

A) सरदार पटेल ✅✅
B) म. गांधी  
C) विनोबा भावे 
D) महादेव देसाई

♻️♻️ महाराष्ट्रातील आद्य क्रान्तिकारक कोण होते ?

A) राजाराम मोहन रॉय 
B) दादाभाई नौरोजी 
C) वि. दा. सावरकर 
D) वासुदेव बळवंत फडके ✅✅

१. खालीलपैकी कोणत्या समितीचा कार्यविषयक 'पंचायतराज संस्था' हा होता ?
अ) जी. व्ही. के. राव समिती
ब) लळा सुंदरम समिती
क) अशोक मेहता समिती ✅✅
ड) व्ही.कृष्णमेनंन समिती

२) चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असतांना सूर्यग्रहण झाले तर अशे ग्रहण ..........असेल?
१) खग्रास
२) खंडग्रास
३) कंकनाकृती ✅✅
४) यापैकी नाही

३) केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली 'माडिया गोंड'ही जगात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
१) सिंधुदुर्ग
२) चंद्रपूर ✅✅
३) गोंदिया
४) रायगड

४) खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा आपणास मिळणाऱ्या परकीय मदतीत आजही सर्वाधिक हिस्सा आहे ?
१) रशिया
२) जपान
३) ब्रिटन
४)अमेरिका ✅✅

५) 'मुंबई बेट'ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ..........
१) याने पोर्तुगीजांकडू जिंकून घेतले.
२) याने मोघलांकडून जिंकून घेतले.
३) यांच्यामते इंग्लंडहून सुंदर शहर होते
४) याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले. ✅✅

६) 'ग्रँड ट्रॅक' हा राष्ट्रीय महामार्ग या दोन शहरांना जोडतो.
१) कोलकत्ता : अमृतसर  ✅✅
२) मुंबई : दिल्ली
३) मुंबई : कोलकत्ता
४) कोलकत्ता : चेन्नई

७) अग्निकंकण उर्फ 'रिंग ऑफ फायर'खालीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधीत आहे
अ) भूकंपप्रवण क्षेत्र
ब) ज्वालामुखी उद्रेकाचे क्षेत्र
क) प्रशांत महासागराभोवतीचा भाग

१) फक्त अ,ब व क ✅✅
२) फक्त ब व क
३) फक्त ब व अ
४) अ ते क

८) 'रिंट ऑफ व्हेबिअस कॉपर्स' व 'रिंट ऑफ मॅडामस' हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधीत आहेत
१) संपत्तीचा हक्क
२) धर्मस्वातंत्र्याचा हक्क
३) स्वातंत्र्याचा हक्क
४) घटनात्मक दाद मागण्याचा हक्क ✅✅

९) खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रीपतीच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधीत आहेत?
१) ३५२,३५६,३६० ✅✅
२) १६३,१६४,१६५
३) ३६७,३६८,३६९
४) ३६९,३७०,३७१

10) भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर,१९४६ रोजी दिल्ली येथे भरले होते.या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले  होते?                                १) डॉ. राजेंद्रप्रसाद
२) हृदयनाथ कुंझरू
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४) डॉ. सच्चिदानंद सिन्हा✅✅

११) विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जाते?
१) एक-पप्ष्टांश
२) एक-बारांश ✅✅
३) एक-पंचमाश
४) एक-तृतीयांश

१२) दादाभाई नौरोजीनी आपला सुप्रसिद्ध 'वहन सिद्धांत' (Drain Theory) आपल्या ..........ग्रंथात मांडला आहे .
१)पाँव्हार्टी इन इंडिया
२) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल इन इंडिया ✅✅
३) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल
४) ब्रेन ड्रेन ड्युरिंग ब्रिटिश पिरिअड

१३) गंगा नदी येथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगेच्या मुखाशी गाळ साचून ........या नावाने बेट तयार झाले आहे
१) सुंदरबन
२) प्रयाग
3) न्यू-मूर ✅✅
४) कोलकात्ता

१४) संगणकामधील फ्लॉपी डिस्क म्हणजे........होय.
१) माहिती एकत्र करणारी यंत्रणा
२) केंद्रीय मेमरी
३) एक सॉफ्टवेअर
४) माहिती साठवण्याचे एक साधन ✅✅

१५) 'P'हा 'K'चा भाऊ आहे .'S'हा 'P' चा मुलगा आहे .'T'ही 'K'ची मुलगी आहे .'E'आणि 'K'परस्पर बहिणी आहेत; तर 'E'che 'T'शी नाते काय?
१) आत्या
२) मावशी ✅✅
३) मामी
४) बहीण

"Economics of public and private helth care And health insurance in india"  या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.?

उत्तर: ब्रिजेश पुरोहित

◾️1]शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९ ✅✅✅
4) ९१२

2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

1) सोडियम क्लोरेट ✅✅✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3]  जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर

1)  त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ
2) ब ✅✅✅
3) ड
4) ई

6]  खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅✅✅

7] २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२

 2) २३५.२

3) २३०.५२

4) २.३५२ ✅✅✅

8]  त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय.

1) वेग ✅✅✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन

9] होकायंत्रात .............. चुंबक वापरतात.

1)  निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची✅✅✅

10]   हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

वहाइसरॉय घटकांवरील सराव प्रश्न


♦️परश्न 1️⃣: कोणाच्या काळात भारतीय परिषद कायदा 1861 पारित करण्यात आला-?

१) लॉर्ड कॅनिंग✅✅

२)लॉर्ड मिंटो

३) लॉर्ड डफरीन

४) यापैकी नाही


♦️परश्न 2️⃣:कॅम्पबेल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ कमिटी कोणाच्या काळात स्थापन केली?

१)लॉर्ड कॅनिंग

२) लॉर्ड रिपन

३) लॉर्ड जॉन लॉरेन्स ✅✅

४) लॉर्ड लिटन


♦️परश्न 3️⃣:- "रॉयल टायटल ऍक्ट" कोणाच्या काळात संमत करण्यात आला?

१) लॉर्ड रिपन

२) लॉर्ड हेस्टिंग

३) लॉर्ड लिटन ✅✅

४) यापैकी नाही


♦️परश्न 4️⃣:-पहिला फॅक्ट्री ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१)लॉर्ड रिपन ✅✅

२) लॉर्ड लान्सडाऊन

३) लॉर्ड चेम्सफर्ड

४) यापैकी नाही


♦️परश्न 5️⃣:-पंजाब टेंनसी ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड वेलस्ली

२) लॉर्ड डफरिन ✅✅

३) लॉर्ड कानींग

४) लॉर्ड मेयो


♦️परश्न 6️⃣:- मणिपूर राज्यच्या कारभारात कोणी हस्तक्षेप केला?

१) लॉर्ड वेलस्ली

२) लॉर्ड मिंटो

३) लॉर्ड लिटन

४) लॉर्ड लान्सडाऊन✅✅


 ♦️परश्न 7️⃣ :-भारतीय नाणी व चलन कायदा कोणी केला?

१) लॉर्ड कर्झन✅✅

२) लॉर्ड कॉर्नवॉलिस

३) लॉर्ड मेयो

४) लॉर्ड रिपन



 ♦️परश्न 8️⃣:-भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड लिटन

२) लॉर्ड चेम्सफर्ड

३) लॉर्ड कर्झन ✅✅

४) यापैकी नाही


 ♦️परश्र 9️⃣ :- कोणच्या काळात वंगभंग चळवळ घडून आली?

१) लॉर्ड मिंटो

२) लॉर्ड हार्डिंग

३)लॉर्ड कर्झन

४) लॉर्ड मिंटो II ✅✅


 ♦️परश्न १०:- असहकार चळवळ कोणच्या काळात सुरू झाली?

१) लॉर्ड रिडींग ✅✅

२) लॉर्ड होर्डिंग

३) लॉर्ड चेम्सफर्ड

४) यापैकी नाही

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

कोणत्या  गव्हर्नर  जनरलनि  इनाम  कमिशन  1828  ला  नेमले .

A) लॉर्ड  विलियम बेंटिक ✅✅
B) लॉर्ड  हेस्टिंग्स
C) लॉर्ड  वेलस्ली
D) लॉर्ड मेयो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



बॉम्बे  ठाणे  रेल्वे  कोणत्या  वर्षी  सुरु  झाली.

A) 1852
B) 1853✅✅
C) 1854
D) 1855
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



इ. स .  1848 ते  1856 या   काळात  अनेक  संस्थाने  कोणी  खालसा  केली.

A) लॉर्ड  रिपन
B) लॉर्ड  विलियम  बेंटिक
C) लॉर्ड कॉर्नवालिस
D) लॉर्ड  डलहौसी ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



इ. स. 1800 मध्ये कोणी  हिंदी  लोकांसाठी  कलकत्ता येथे  फोर्ट  विलियम  महाविद्यालयाची  स्थापना  केली.

A) लॉर्ड  मेकॅले
B) लॉर्ड  बेंटिक
C) लॉर्ड  वेलस्ली ✅✅
D) लॉर्ड  डलहौसी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



शासकीय  कर्मचाऱ्यावर   राष्ट्रीय  काँग्रेसशी  संबंध  ठेवण्यास कोणी  बंदी  घातली.

A) लॉर्ड  कर्झन
B) लॉर्ड  डफरीन ✅✅
C) लॉर्ड रिपन
D) ए.  ओ.  ह्यूम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो.?

19 जुलै
29 जुलै ✅✅
30 जून
30 जुलै

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कारगिल विजय दिवस भारतीय भुदलाच्या कोणत्या विजयी मोहीमेच्या स्मृतीत पाळला जातो?

(A) ऑपरेशन कॅक्टस
(B) ऑपरेशन पवन
(C) ऑपरेशन विजय ✅✅
(D) ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या संस्थेनी ‘उन्नत भारत अभियान’साठी TRIFED सोबत सामंजस्य करार केला?

(A) भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू
(B) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
(C) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास
(D) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या राज्यात चौथ्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार?

(A) हरयाणा✅✅
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश
(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणाची वेस्टर्न एअर कमांडच्या प्रमुखपदी नेमणूक झाली?

(A) एअर मार्शल विवेक राम चौधरी✅✅
(B) एअर मार्शल व्ही. आर. चौधरी
(C) एअर मार्शल बी. सुरेश
(D) एअर मार्शल आय. पी. विपिन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या सार्वजनिक संस्थेनी स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि उद्योजकता विकास यासाठी IIT कानपूर या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?

(A) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
(B) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन
(C) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन✅✅✅
(D) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या देशाने पारंपरिक औषधी आणि होमिओपथी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासाठी भारतासोबत सामंजस्य करार केला?

(A) केनिया
(B) झिम्बाब्वे✅✅
(C) मोझांबिक
(D) मलावी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या देशाने अॅंटीमायक्रोबियल रेझिस्टन्स विषयक संशोधनासाठी भारतासोबत करार केला?

(A) ब्रिटन✅✅✅
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) स्पेन
(D) कॅनडा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणाला भूशास्त्र मंत्रालयाकडून ‘जीवनगौरव उत्कृष्ठता पुरस्कार 2020’ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) अशोक साहनी✅✅
(B) डॉ. एस. एस. बाबू
(C) जे. के. भट्टाचार्य
(D) टी. चक्रवर्ती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात पवन हंस या कंपनीने उडान योजनेच्या अंतर्गत प्रथम हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ केला?

(A) हिमाचल प्रदेश
(B) जम्मू व काश्मीर
(C) सिक्किम
(D) उत्तराखंड✅✅


1857 च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला?
तात्या टोपे
मंगल पांडे✅✅✅
नानासाहेब पेशवे
बहादुरशहा जफर


चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये करण्यात आला. चंपारण्य हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तरांखंड
उत्तर प्रदेश
पंजाब
बिहार✅✅✅



जगात सर्वात जास्त बोलणाऱ्या एकूण भाषांपैकी हिंदी भाषेचा कितवा क्रमांक लागतो?
पाचवा
सहावा✅✅✅
सातवा
आठवा



नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10+2 ऐवजी कोणती पद्धत राबवली जाणार आहे?
5+3+3+4✅✅✅
5+10+12
5+8+4
5+4+3+2



कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्तत्कृष्ठ ठरले आहे?
नादौन पोलीस ठाणे✅✅✅
नानखारी पोलीस ठाणे
रामपूर पोलीस ठाणे
नेरवा पोलीस ठाणे


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


भारतीय हवाई दलाच्या कोणत्या पथकाला ‘गोल्डन अॅरोज’ म्हणून संबोधले जाते?

(A) स्क्वॉड्रॉन 12
(B) स्क्वॉड्रॉन 102
(C) स्क्वॉड्रॉन 17✅✅
(D) स्क्वॉड्रॉन 8

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या देशासोबत भारतीय रिझर्व्ह बँकेनी 400 दशलक्ष डॉलरच्या चलनाची अदलाबदल करण्यासाठी करार केला?

(A) इथिओपिया
(B) सेनेगल
(C) सेशेल्स
(D) श्रीलंका ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

काश्मीर खोऱ्यातल्या कोणत्या मसाल्याला केंद्र सरकारकडून GI टॅग प्राप्त झाला?

(A) कोशूर माऱ्त्सिवागुन
(B) कोशूर झुर
(C) काश्मीर कहवा
(D) केसर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने भाडेतत्वावर देण्याच्या संदर्भातल्या भारतीय लेखा मानदंडांमध्ये दुरुस्ती केली?

(A) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
(B) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय ✅✅
(C) कायदा व न्याय मंत्रालय
(D) अर्थमंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


2020 साली जागतिक हेपॅटायटीस दिनाची संकल्पना काय आहे?

(A) इन्व्हेस्ट इन एलिमीनेटिंग हेपॅटायटीस
(B) हेपॅटायटीस फ्री फ्युचर✅✅
(C) फाइंड द मिसिंग मिलियन्स
(D) मेकिंग हेपॅटायटीस एलिमीनेशन ए रीयालिटी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशात भारत निर्यातीला चालना देण्यासाठी कापूस साठविण्यासाठी गोदाम उभारणार आहे?

(A) व्हिएतनाम✅✅
(B) म्यानमार
(C) अफगाणिस्तान
(D) फिलीपिन्स

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या मंत्रालयाने ग्रामीण विकास कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी “वित्तीय व्यवस्थापन निर्देशांक” जाहीर केला?

(A) सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(C) कामगार व रोजगार मंत्रालय
(D) ग्रामीण विकास मंत्रालय✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी तयार केलेल्या भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मोबाइल अॅपचे नाव काय आहे?

(A) ऋतू
(B) जलवायू
(C) मौसम ✅✅
(D) अवधी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या मंत्रालयाने ‘BIS-केअर’ अॅपचे अनावरण केले?

(A) ग्राहक कल्याण, खाद्यान्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय ✅✅
(B) खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
(C) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय
(D) अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



___ या दिवशी ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा केला जातो.

(A) 14 जुलै
(B) 15 जुलै✅✅
(C) 13 जुलै
(D) 12 जुलै

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



जगातला सर्वात उंच रेल्वे पूल कुठे बांधण्यात येत आहे?

(A) उत्तराखंड
(B) जम्मू व काश्मीर✅✅
(C) लडाख
(D) मणीपूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या संस्थेत “विमेन आंत्रेप्रेनेऊरशिप अँड एंपोवरमेंट (WEE) कोहोर्ट” उपक्रमाचा प्रारंभ केला गेला?

(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली✅✅
(B) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू
(C) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
(D) महिला व बाल विकास मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या बँकेनी ‘कोना कोना उम्मीद’ मोहीमेचा प्रारंभ केला?

(A) फेडरल बँक
(B) HDFC बँक
(C) कोटक महिंद्रा बँक✅✅
(D) ICICI बँक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



“स्वच्छ भारत रेव्होल्यूशन” या पुस्तकाचे संपादक कोण आहेत?

(A) जयदीप गोविंद
(B) समीर कुमार
(C) व्ही. राधा
(D) परमेश्वरन अय्यर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या संस्थेच्यावतीने “सहकार कूपट्यूब NCDC चॅनेल” कार्यक्रमाचा प्रारंभ केला?

(A) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र
(B) राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ✅✅
(C) राष्ट्रीय दुग्ध संस्कृती संग्रह
(D) राष्ट्रीय हवामान माहिती संस्कृती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पंचायतराज संबंधित घटनादुरुत्या

७३ वी घटना दुरुस्ती ( १९९२ – ९३ )

           ग्रामविकास राष्ट्रविकासाचा मूलभूत पाया मानला जातो. भारतीय राह्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो. परंतु हे कलम राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येत असल्यामुळे याकडे राज्यांनी दुर्लक्ष केले. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून पंचायतराज संस्था अस्तित्वात आहेत. परंतु या संस्थांना घटनात्मक दर्जा नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये या संस्थांचा विकास झाला नाही. पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा. अशी शिफारस सर्वप्रथम १९८६ मध्ये डॉ. एल. एम. सिंघवी या समितीने केली होती.


            ग्रामीण भागात सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी व पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी पहिला प्रयत्न राजीव गांधी यांनी केला ‘नया पंचायतराज’ नावाचे ६४ वे घटनादुरुस्ती विधेयक १९८९ ला संसदेत सादर केले. परंतु अपयश आले. तसेच व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर यांनीही प्रयत्न केले.


– पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस प्रथम डॉ. एल. एम. सिंघवी यांनी केली.

– राजीव गांधी यांनी सर्वप्रथम १५ मे  १९८९ ला ‘नाय पंचायतराज’ नावाचे ६४ वे पंचायतराज घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले.

– १९८९ ला व्ही. पी.सिंग व चंद्रशेखर यांनीही पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केले.

– १९९० ला लोकसभा विसर्जित झालयामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.

-१९९२ ला पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंचायतराज संबधी ७३ वे घटना दुरुस्ती विधेयक तयार केले.

– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.

– २३ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध. व त्यानंतर या विधेयकास १७ राज्याची विधिमंडळाची मंजुरी मिळाली.

– २० एप्रिल १९९३ ला या विधयेकावर राष्टत्रपतीची स्वाक्षरी होऊन पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

– २४ एप्रिल १९९३ पासून ७३ व्या घटना दुरुस्तीच्या अंबलबजावणी सुरु.

– २४ एप्रिल १९९४ पर्यंत या शिफारशी सर्व राज्यांना लागू करण्याचे बंधनकारक आले.

– २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये ‘पंचायतराज दिन’ म्हणून पाळला जातो.

– भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ ( A ते O ) मध्ये पंचायतराजची तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्यघटनेला ११ वे परिशिष्ट जोडण्यात आले व त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश करण्यांत आला आहे.

– ७३ व्या घटनादुरुस्ती विधेयकास बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांनी विरोध दर्शविला होता.


 ७३ व्या घटनादुरुस्तीचे वैशिष्ट्य / परिणाम / भूमिका :


१) पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A ते O )

2) राज्यघटनेला अकरावे परिशिष्ट जोडण्यात आले. ( त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश आहे. )

३) जिल्हा ग्रामसभा व पंचायत व्याख्या कलम ( २४३ )

४) ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A )

५) त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेची तरतूद कलम २४३ ( B )

६) पंचायत राज संस्थांची रचना निश्चित कलम २४३ ( C )

७) पंचायत राजमध्ये राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( D )

अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा

ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा

क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST ) यांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा.


८) पंचायतीत राज संस्थांचा कार्यकाल निश्चित कलम २४३ (E)

९) पंचायत राज सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( F )

१०) पंचायतराजसंस्था सत्ता अधिकार व जवाबदाऱ्या २४३ ( G )

११) पंचायत राज संस्थासंबधी वित्तीय तरतुदी कलम २४३ ( H )

१२) राज्य वित्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( I )

१३) पंचायत राज संस्थांचे हिशोब व ऑडिट कलम २४३ ( J )

१४) पंच्यात्तराजच्या निवडणूका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कलम २४३ ( K )

१५) केंद्रशासित प्रदेशाबाबत तरतुदी कलम २४३ ( L )

१६) काही प्रदेशाला ७३ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( M )

१७) सध्या अस्तित्वात असलेल्या पंचायती चालू ठेवणे कलम २४३ ( N )

१८) पंचायत संस्थांचा निवडणूक प्रक्रियेत न्यायालयाचा हस्तक्षेप नाही कलम २४३ ( O )



मुस्लिम धर्मातील सामाजिक सुधारणा आंदोलने

1) वहावी आंदोलन
2) अलिगड आंदोलन 
3) अहमदीया आंदोलन
4) देवबंध आंदोलन 

 1) वहाबी आंदोलन  

वहाबी चे प्रवर्तक रायबरेली चे 'सैय्यद अहमद' होते

वहाबी 1828 ई. ते 1888 पर्यंत

आन्दोलनाचे मुख्य केन्द्र पटना शहर होते

पटना चे विलायत अली व इनायत अली या आन्दोलन चे प्रमुख नायक होते

हे आन्दोलन मूलता मुस्लिम सुधारवादी आन्दोलन होते

जे उत्तर पश्चिम, पूर्वी भारत तथा मध्य भारतात होते

 सैय्यद अहमद ची इच्छा 

सैय्यद अहमद इस्लाम धर्मातील परिवर्तने तथा सुधारणांच्या  विरुद्ध होते

त्यांची इच्छा हजरत मोहम्मद  कालीन इस्लाम धर्माला पुन:स्थापित करण्याची होती

सैय्यद अहमद पंजाब चे सिक्ख आणि  बंगाल चे  अंग्रेजांना विरोध केला

अनुयायांना शस्त्र धारण व प्रशिक्षित करुन स्वयं सैनिकी वेशभूषा धारण केली,

त्यांनी पेशावर वर 1830 ई. मध्ये काही काळासाठी अधिकार ठेवला

अापल्या नावाचे सिक्के भी चालवले

  फाँसी ची शिक्षा 

1857 मध्ये आन्दोलनाचे नेतृत्व पीर अली ने केले

कमिश्नर टेलबू ने  एलिफिन्सटन सिनेमा समोर एका झाडाला लटकवून फाँसी दिली

त्यांच्याबरोबर ग़ुलाम अब्बास, जुम्मन, उंधु, हाजीमान, रमजान, पीर बख्श, वहीद अली, ग़ुलाम अली, मुहम्मद अख्तर, असगर अली, नन्दलाल एवं छोटू यादव यांना फाँसी वर दिली



 2) अलिगड मुस्लीम आंदोलन 

अलीगढ़ आन्दोलनाची सुरुवात अलीगढ़ (उत्तर प्रदेश)येथे झाली.

आन्दोलन चे संस्थापक सर सैय्यद अहमद ख़ाँ होते

त्यांनी 'पीरी-मुरीदी प्रथा' एवं 'दास प्रथा' समाप्त करण्याचे प्रयत्न केले

सर सैय्यद अहमद ख़ाँ नी 1875 ई. मध्ये अलीगढ़ मध्ये एक ‘ऐंग्लो मुस्लिम स्कूल’ ज्याला 'ऐंग्लों ओरियन्टल स्कूल' म्हणत

येथे मुस्लिम धर्म, पाश्चात्य विषय तथा विद्वान् जैसी सभी विषयांची शिक्षा दीली जात !

 आन्दोलनाचेे इतर नेते 

दिल्लीत जन्मलेले सैय्यद अहमद ने 1839 ई. मध्ये  ईस्ट इंडिया कम्पनीत नौकरी केली।

कम्पनीच्या न्यायिक सेवेत कार्य करताना  1857 च्या उठावात कम्पनीची साथ दिली

 1870 नंतर प्रकाशित 'डब्ल्यू. हण्टर' चे पुस्तक 'इण्डियन मुसलमान' मध्ये सरकार ला सल्ला दिला कि मुसलमानांबरोबर समझौता करावा

सर सैय्यद अहमद ख़ाँ द्वारा संचालित 'अलीगढ़ आन्दोलन' चे त्यांच्या व्यतिरिक्त आन्दोलन के अन्य प्रमुख नेता

नजीर अहमद चिराग
अली अल्ताफ
हुसैन मौलाना
शिबली नोमानी

अलिगढ चळवळीचे उद्देश कोणते ?

उत्तर

1.मुस्लीम समाजाने आपली राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राबद्दलची कालबाह्य सनातनी विचारसरणी बदलून पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारांचा समन्वय साधला पाहिजे. हा अलीगड चळवळीचा उद्देश होता.

2. मुस्लीम समाजाला आधुनिक शिक्षण मिळावे.

3. धार्मिक शिक्षणाबरोबरच पाश्चिमात्य शिक्षणाची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी हा त्यांचा हेतू होता.

4. काळाच्या बदलानुसार धर्माची परिभाषा व अर्थ यांच्यातही बदल झाला पाहिजे. तसे होत नसेल तर धर्माला जडत्व येते असे त्यांनी प्रतिपादन केले.

5. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, सांप्रदायिकता, अवैज्ञानिक चालिरीती याविरुद्ध लढा दिला.

6.मुस्लीम समाजातील पडदा पद्धतीचा  निषेध केला.

7. मुस्लीम स्त्रियांनी शिक्षण घेऊन ज्ञानसंपन्न व्हावे असे त्यांनी मत मांडले.

8. बहुपत्नीत्व पद्धतीस त्यांनी जोरदार विरोध केला.

9. 1875 मध्ये त्यांनी ‘अँग्लो ओरिएन्टल कॉलेज’ची स्थापना अलिगढ येथे केली.

पाश्चिमात्य विज्ञान व संस्कृती याची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी या कॉलेजचा उपयोग केला.

10. सय्यद अहमदखान यांनी धार्मिक सहिष्णुतेचा उपदेश केला. हिंदू व मुसलमान हे समाज एकत्र यावेत अशी त्यांची इच्छा होती.

Basic Concepts of Economics :

🛑दारिद्र्य 🛑

जीवनाच्या मुलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्र्य होय.

दारिद्र्य एक सापेक्ष संकल्पना आहे.



🔶कामगार 

उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणा-या सर्व व्यक्तींना कामगार म्हटले जाते.




🛑बेरोजगारी🛑

 रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.  रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली व्यक्ती त्यासाठी शारिरीक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी.



🔶बेरोजगारीचे प्रकार

१) खुली बेरोजगारी :- 

काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात.


२) हंगामी बेरोजगारी :-

शेतीच्या नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.


३) अदृश्य / प्रच्छन्न बेरोजगारी :-

आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास..


४) कमी प्रतीची बेरोजगारी :-

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा / शिक्षणाच्या दर्जेपेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते.


५) सुशिक्षीत बेरोजगारी :- 

जेव्हा सुशिक्षीत लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात.


६)चक्रीय बेरोजगारी :-

विकसीत भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत ही बेरोजगारी दिसून येते.


७) घर्षणात्मक बेरोजगारी :-

 विकसीत देशांना जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतात व कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतिक्षेत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते.

• असा तात्पुरता कालावधी जेव्हा कामगार ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्या परिस्थितीला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. (येथे घर्षण जुन्या व नव्या उद्योगामध्ये निर्माण झालेले असतात.)


राणी लक्ष्मीबाई

महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर

टोपणनाव:मनू

जन्म:नोव्हेंबर १९, इ.स. १८३५

काशी, भारत

मृत्यू:जून १७, इ.स. १८५८

झाशी, मध्य प्रदेश

चळवळ:१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

प्रमुख स्मारके:ग्वाल्हेर

धर्म:हिंदू

वडील:मोरोपंत तांबे

आई:भागीरथीबाई तांबे 

पती:गंगाधरराव नेवाळकर

अपत्ये:दामोदर (दत्तकपुत्र)


लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.


बालपण


लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.


व्यक्तिमत्त्व


धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.


वैवाहिक जीवन


इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.


दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.


गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.


झाशी संस्थान खालसा


पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणाचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.


परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.


झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.


इ.स. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध


इ.स. १८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्‍या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्‍या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्‍या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.


अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.


दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.


उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्‍या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.


शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्‍या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.


राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्‍यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’


या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

महाराष्ट्राचे विधान मंडळ

👉288 एकूण आमदार विधानसभेचे आहेत.तर 78 सदस्य संख्या विधानपरिषदेची आहे.

👉5/6 विधान परिषद सदस्य

 हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात.

👉1/6 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला,सहकार क्षेत्र व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात.


1) सभासदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.

2)दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवे सभासद निवडले जातात.

३) एखाद्या घटक राज्यात विधान परिषद संसदेच्या कायद्याने निर्माण करता येते.

४) विधान परिषदेत किमान ४० व जास्तीत जास्त राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १/३ सदस्य असू शकतात.

५) विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे.

६) सभापती व उपसभापतीची निवड विधान परिषदेचे सदस्य आपल्या मधूनच करतात.




👉 कशी असते मतदान प्रक्रिया?

 1 विधानसभेप्रमाणे येथे थेट मतदान प्रक्रिया अवलंबली जात नाही.

2) राष्ट्रपती निवडणूक, विद्यापीठ सिनेट यासारख्या निवडणुकींसाठी पसंतीक्रमाची पद्धती वापरली जाते तीच पद्धत या निवडणुकीतही अवलंबली जाते.

3) विधान परिषदेसाठी देखील पसंतीक्रम पद्धतीचाच अवलंब केला जातो.

4) निवडणुकीसाठी जेवढे मतदार उभे असतील तेवढय़ा उमेदवारांना मतदार आपला (आवडीनुसार) पसंतीक्रम देतो.

5) जास्त पसंतीच्या उमेदवाराला पहिला क्रम, त्यानंतर दुसर्‍या आवडीच्या उमेदवाराला दुसरा अशा पद्धतीने एकूण उमेदवारांएवढे मत देता येते.


👉मतमोजणी : संबंधित मतदारसंघाची मतदान संख्या व उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतात.

👉 निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पण पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसल्यास दुसर्‍या पसंतीची मते जो पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी होतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही.

👉सरळ लढतीचा फायदा : दोन उमेदवारांच्या सरळ लढतीत पहिल्या पसंतीच्या मतात जो पहिल्या क्रमांकावर राहतो त्याचा विजय जवळपास नक्की असतो. मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेल्या दुसर्‍या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. तरी कोटा पूर्ण न झाल्यास पहिल्या क्रमांकावरील उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.

हे माहीत आहे ना :- राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन

  हे माहीत आहे ना :- राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन



1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.


2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष


3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष


4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष


5)1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष


7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू


 11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.


12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी  -वंदे मातरम टागोरांनी गायले.


16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष


22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच          चतुसुत्रीचा स्विकार केला.


23) 1907  -सुरत  -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट


26) 1911 - कलकत्ता  बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.


31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य -करार/लखनौ करार


32) 1917 - कलकत्ता  -अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष


35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य-  काँग्रेसच्या घटनेत बदल


39) 1924-  बेळगाव  -महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष


40) 1925  -कानपूर  -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा


43) 1926 - कलकत्ता  -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक  अधिवेशन


44) 1929  -लाहोर  -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी


50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन


51) 1938  -हरिपूरा  -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव


52) 1939  -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट


53) 1940 - रामगड  -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष


61) 1955 - आवडी  -यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला

--------------------------------------------


MPSC, पोलीस भरती,आर्मी भरती उपयुक प्रश्नसंच

*खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे *

⚪️ विस्थापन
⚫️ चाल☑️
🔴 गती
🔵 तवरण

*वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?*

⚪️ ऑक्सिजन
⚫️ हड्रोजन
🔴 कार्बन डायऑक्साईड☑️
🔵 नायट्रोजन


*मन्यूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?*

⚪️सवेग☑️
⚫️बल
🔴तवरण
🔵घडण

*कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?*

⚪️अल्फा
⚫️बिटा
🔴गमा☑️
🔵कष-किरण

*रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?*

⚪️मलॅनिन
⚫️इन्शुलिन☑️
🔴यकृत
🔵कल्शियाम

 *मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?*

⚪️रग तयार करणे
⚫️विद्युत रोधक म्हणून☑️
🔴विद्युत सुवाहक म्हणून
🔵वरील सर्व कारणांसाठी

*धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?*

⚪️सोडियम क्लोरेट☑️
⚫️मायका
🔴मोरचुद
🔵कॉपर टिन

*बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.*

⚪️मोठी
⚫️लहान☑️
🔴दप्पट
🔵तिप्पट

*वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................*

⚪️तितकेच राहते
⚫️निमपट होत
🔴चौपट होते
🔵दप्पट होते ☑️

*ध्वनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .*

⚪️सथायू ☑️
⚫️दरव
🔴वायू
🔵निर्वात प्रदेश


न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात ---------- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.
⚪️राष्ट्रवादी
⚫️समाजवादी
🔴अर्थवादी
🔵सनदशीर✅

वसईचा तह कोणात झाला?
⚪️टीपू सुलतान - इंग्रज
⚫️दसरा बाजीराव पेशवे - इंग्रज✅
🔴रघुनाथ पेशवे - इंग्रज
🔵पशवे - पोर्तुगीज


खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता?
⚪️ बार्डोली सत्याग्रह ✅
⚫️चफारण्य सत्याग्रह
🔴काळ्या कायाघाचा निषेध
🔵खडा सत्यांग्रह

बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलीदान दिले?
⚪️नदुरबार
⚫️मबई✅
🔴पणे
🔵सातारा

सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?
⚪️नारायण स्वामी
⚫️नारायण गुरु✅
🔴दयानंद सरस्वती
🔵राधाकृष्णन

दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?
⚪️रामदास✅
⚫️चांगदेव
🔴सत तुकाराम
🔵सत सावता माळी


गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?
⚪️सरदार वल्लभभाई पटेल
⚫️अरुणा असफअली
🔴राम मनोहर लोहिया ✅
🔵नानासाहेब गोरे

मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
⚪️मबई
⚫️रत्नागिरी
🔴सिंधुदुर्ग ✅
🔵ठाणे

कॉग्रेसचे १९३६ चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?
⚪️फजपूर✅
⚫️आवडी
🔴मद्रास
🔵रामनगर

संत तुकारामांचा जन्म कोठे झाला?
⚪️दहू✅
⚫️आळंदी
🔴जांब
🔵पठण

राज्यसेवा परीक्षा नियोजनअभ्यासासाठी टिप्स-

-- जो दररोज अभ्यास करणार आहे त्याची रिविजन त्यादिवशी करायचे आहे

-- दिवस कमी असल्या कारणामुळे कोणताही टाइमपास करू नये

-- मुख्य परीक्षेचा आता कोणताही अभ्यास करू नका

-- तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच पुस्तकाचा अभ्यास करा नवीन पुस्तके जास्त विकत घेण्याच्या फंदात पडू नका

-- जर मागच्या तीन ते चार वर्षापासून सतत अपयश येत असेल तर सर्व सोशल मीडिया बंद करून अभ्यास करा

-- परीक्षेचा अभ्यास कसा करावा यासाठी दिवसभराच्या सेमिनार साठी कुठेही वेळ घालवू नका

-- या पुस्तकातून अगोदर अभ्यास केला आहे त्याच पुस्तकाचा सतत अभ्यास करा

-- या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयामध्ये कोर अर्थशास्त्र विचारले जात नाही त्यामुळे अर्थशास्त्राची विशेष तयारी करण्यासाठी वेळ घालवू नका दारिद्र्य रोजगार विकास सर्वसमावेशक विकास शाश्वत विकास लोकसंख्या या टॉपिकवर प्रश्‍न विचारले जात असल्या कारणामुळे जास्त वेळ देऊ नका

--CSAT मध्ये गणित या विषयावरती मागील पाच वर्षात पाच ते सात प्रश्न विचारले जातात त्यासाठी जास्त वेळ वाया घालू नका त्यासाठी स्पेशल क्लास लावण्याची कोणतीही आवश्यकता नाही मागील परीक्षेमध्ये चे प्रश्न विचारले गेले आहेत त्याचाच सराव करा तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी प्रश्न रिपीट होत आहेत

-- उताऱ्यावरील प्रश्न यासाठी मागील आयोगाच्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि दररोज तीन ते चार उतारे सोडवा आणि त्यामध्ये आपण कुठे चुका करतोय त्याच्यावरती काम करा

-- बुद्धिमत्ता मध्ये पंधरा ते सतरा प्रश्न विचारले जातात त्याची विशेष तयारी करा कोणतेही पुस्तक वापरा त्यातील सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये किमान दहा ते बारा प्रश्नांची उत्तर येऊन जातील जोपर्यंत स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही केले तर त्याला काहीच फरक पडत नाही सध्या मार्केटमध्ये बुद्धिमत्ता चे चांगली पुस्तके आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये प्रश्न सोडवण्याच्या चांगल्या क्लुप्त्या दिलेल्या आहेत आणि ही पुस्तके अतिशय स्वस्तात बाजारात मिळतात त्यामुळे आणखी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही ती पुस्तकेच जर तुम्ही व्यवस्थित पणे सोडवली तर तुमची भीती कायमची दूर होऊ शकते.

-- सामान्य विज्ञान या विषयावरती जास्त प्रश्न परीक्षा मध्ये विचारले जातात त्यामुळे या विषयाचा अभ्यास आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे या दोन बाबी होणे गरजेचे आहे सामान्य विज्ञान विषयासाठी क्रमिक पुस्तकांमधील 60 ते 70 टक्के प्रश्न येतात या विषयांमध्ये मुलांना मार्ग कमी का पडतात कारण या विषयावरची असलेली भीती आणि रिविजन न करणे हे आहे त्यामुळे या विषयांची जास्तीत जास्त रिव्हिजन करायला हवी.

-- इतिहास या विषयाचा राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये अभ्यास जास्त आहे आणि विद्यार्थी या विषयालाच सर्वाधिक वेळ देतात आणि परीक्षेमध्ये प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं ज्यांनी भरपूर अभ्यास केला आहे त्यांनाही देता येत नाहीत त्यामुळे एकच चांगलं पुस्तक वापरा आणि शालेय क्रमिक पुस्तके वापरा त्याचीच सतत सतत रिविजन करा प्रश्न सोडवा .कमीत कमी वेळ द्या.

-- चालू घडामोडी या विषयासाठी मागील जानेवारी 2023 पासून चालू घडामोडी चा अभ्यास करा

-- भूगोल आणि पर्यावरण या विषयांमध्ये आपणास हमखास चांगले मार्क मिळू शकतात यासाठी क्रमिक पुस्तके त्यासंदर्भातल्या चालू घडामोडी आणि कोणतेही पुस्तक वाचा जास्त प्रश्न आहे प्राकृतिक भूगोल  व भारत आणि जगाच्या भूगोलाचा संदर्भात विचारले जातात याचाही जास्तीत जास्त सराव करा

-- राज्यघटना आणि लोकाभिमुख धोरण कायदे या संदर्भामध्ये बेसिक राज्यघटनेचा अभ्यास चांगला झाला पाहिजे जो पुढे जाऊन तुम्हाला मुख्य परीक्षेलाही उपयोगी पडणार आहे त्याचबरोबर शासनाची महिला कम कुवत घटक आणि विविध बाबी जसे की शिक्षण आरोग्य व्यवसाय रोजगार यासंदर्भात मधील शासनाचे धोरण याबाबत प्रश्न विचारले जातात.

-- जर प्रायोरिटी ठरवायचे म्हटलं तर सर्वाधिक जास्त प्रायोरिटी या परीक्षांमध्ये CSAT, सामान्य विज्ञान राज्यघटना भूगोल चालू घडामोडी 
पर्यावरण अर्थशास्त्र आणि इतिहास या क्रमाने द्यायला हवी.

-- लक्षात घ्या हा अभ्यास सर्व तुम्हालाच करावयाचा आहे कोणीतरी तुम्हाला मदत करेल या आशेने स्वतःला फसवू नका आणि घरच्यांनाही फसवू नका

--- आज पर्यंतचा इतिहास परीक्षेचे अभ्यासक्रम जास्त असल्याने त्याच प्रमाणे कॉम्पिटिशन जास्त असल्याकारणामुळे जो हार्ड आणि स्मार्ट दोन्ही वर काम करेल तसेच आत्मविश्वास सातत्य आणि स्वतःला पारंगत ठेवेल तोच हा गड जिंकेल.

-- फालतू च्या बिनकामाचा ज्या आपल्या करिअरमध्ये काहीही महत्वाच्या नाहीत अशा गप्पा अभ्यास करताना सोशल मीडियावर करण्यात वेळ घालू नका लक्षात ठेवा 2023 ही लढाई तुमची पण आहे त्यामुळे दुसऱ्याच्या लढाईबद -- यश मिळेपर्यंत समाजकारण-राजकारण या गोष्टीपासून दूर राहा स्वतःचे हित कशात आहे हे पहा

खेळ क्लुप्त्यांचा :- अभ्यास थोडासा वेगळा



1) महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या

क्लुप्ती : विन सातसा गोहभी मकृ:

वि- विध्य पर्वत

न – नर्मदा

सा- सातपुडा

ता- तापी

सा – सातमाळ

गो- गोदावरी

ह –हरिचंद्र बालघाट

भी –भीमा

म- महादेव

कृ- कृष्णा


2) भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ?


कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते

क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”

गु = गुजरात

झ = झारखंड

ती = छातीसगड

प = पं. बंगाल

र = राजस्थान

म = मध्यप्रदेश

मि = मिझोरम

त्र = त्रिपुरा


3) भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार

क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले

क = काश्मीर हिमालय

प  =  पंजाब हिमालय

कु = कुमाऊ हिमालय

ने   = नेपाळ हिमालय

पूर्व हिमालय = पूर्व हिमालय


4) हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके

क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'

शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दार्जी– दार्जीलिंग


5) बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा

क्लूप्त्या : “मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.


6) द्वीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.

क्लुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला""

अन्ना = अनायमुडी - २६९५

दोन = दोडाबेटा - २६३

गुरु = गुरुशिखर - १७२२

काळूबाई = कळसुबाई - १६४६

धूप = धुपगड = १३५०


7) भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत

क्लुप्ती : "कृत्ति" मुंगूस.

कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

ति - तिलैया प्रकल्प (झारखंड)

मुगू - मुद्रा प्रकल्प (गुजरात)

स - ससन प्रकल्प (मध्य प्रदेश)


8) भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?

क्लुप्ती : "MIM BSP"

M - म्यानमार

I - इंडोनेशिया

M - मालदीव

B - बांगलादेश

S -श्रीलंका

P - पाकिस्तान


9) आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.

आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ - ऊर्जा


१0) सदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : "सविता वेग वजन बग "

स - संवेग

वि - विस्थापन

त - त्वरण

वेग

वजन

ब - बल

ग - गती


१1) दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने

क्लुप्ती : ऑबिलीपी

ऑ - अन्थ्रासाईड

बी  - बिटूमिंस

लि - लिग्नाईट

पी - पिट


१2)  महाराष्ट्रातील घाट

आंबा कोर -

आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

माथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाट

बापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट.

कुंभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

खांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

मुना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट


१3) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१4) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१5) महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा

क्लूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर

             आंबा पडला सावित्रीवर

             वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

             काळी गेली तळ्यात खोलवर’

सूर्या नदी

वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ -  काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी


१6)  महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम

क्लूप्त्या : 'गोभीकृतान '

गो - गोदावरी

भी - भीमा

कृ - कृष्णा

ता - तापी

न - नर्मदा

०७ जून २०२४

नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार...!

➡️एनडीएच्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब

🔖यांचा आहे एनडीएत समावेश

🔴भाजप- २४०
🔴तेलुगु देशम - १६
🔴संयुक्त जनता दल १२
🔴शिवसेना - ७
🔴राष्ट्रवादी काँग्रेस - १
🔴लोकजनशक्ती (रामविलास) - ५
🔴जनता दल (धर्मनिरपेक्ष) - २
🔴राष्ट्रीय लोकदल - २
🔴जनसेना पार्टी - २
🔴यूपीपीएल- १
🔴हिंदुस्तानी अवाम मोर्चा - १
🔴जोरम पीपल्स मूव्हमेंट- १
🔴सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा-१
🔴अपना दल - १
🔴आसाम गण परिषद- १
🔴आसू पार्टी- १

Combine & राज्यसेवा 2024 पूर्व: विज्ञान विषय A to Z strategy

विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व 23 मधील प्रश्न बघता आयोग या विषयातील काही प्रश्न बरेच अवघड विचारताना दिसतो.बरेच जण घाबरून गेले आणि त्यामुळे पेपर चे पुढील सोप्पे प्रश्न पण चुकले.पेपर च्या त्या एक तासात आपली मानसिकता स्थिर ठेवण प्रचंड गरजेचं आहे.त्यामुळे किती जरी अवघड प्रश्न आले तर घाबरायच कारण नाही, इतके अवघड प्रश्न कोणालाच येत नसतात हे लक्षात घ्या.आता तयारी विषयी बोलुयात.एक Basic तयारी करून average गुण तरी या विषयात आपल्याला मिळवता आले पाहिजे.विज्ञान या विषया वर पूर्व परीक्षेत 15 प्रश्न विचारले जातात.त्यातील काही प्रश्न हे विचित्र परंतु काही प्रश्न हे ठरलेल्या topics वर विचारले जातात.PYQ च analysis केल तर आपल्याला कळेल की शेवटी दिलेल्या topics वर भर दिला तर नक्कीच आपण यात साधारण गुण सहज मिळवू शकतो.


👉ज्यांना खूप कमी वेळात जास्त गुण घ्यायचे असतील तर त्यांनी विज्ञानाचे फक्त स्टेट बोर्ड 6 वी ते 10 वी केले आणि त्याजोडीला PYQ analysis+ PYQ info तोंड पाठ जरी केली तरी पुरेस आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये आलेला जर्मन सिल्व्हर चा प्रश्न PYQ होता आणि त्यात 3-4 प्रश्न स्टेट बोर्ड मधून आलेले दिसतात.


👉गट ब मुख्य पेपर-2 आणि गट क मुख्य पेपर-2 मध्ये विचारलेल्या विज्ञानाच्या प्रश्नांचे Analysis ही नक्की करा.संयुक्त पूर्व 23 पेक्षा त्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही कमी होती.या 2 पेपर मध्ये प्राणी वर्गिकरणावर 4-5 प्रश्न आलेले दिसतात.

✅जीवशास्त्र | Biology:


1.प्राण्याचे वर्गीकरण

2.वनस्पती वर्गीकरण

3. ग्रंथी संप्रेरके आणि विकरे

4. पोषण द्रव्ये

5. रोग लक्षणे आणि चिन्हे (यात जीवाणूजन्य, विषाणूजन्य,कवके,असंसर्ग जन्य यांचा अभ्यास)


✅रसायनशास्त्र | Chemistry 


1. अणू आणि त्याची रचना

2. आवर्तसारणी 

3. मूलद्रव्यांचे वर्गीकरण

4. खनिजे आणि धातुके

5. किरणत्सारीता आणि आण्विक रसायनशास्त्र

6. कार्बनी संयुगे


✅भौतिशास्त्र | Physics 


1.प्रकाश

2.ध्वनी

3.विद्युत धारा

4.ऊर्जा,कार्य व शक्ती

5. गती आणि बल

6. प्रकाश,भिंग,आरसे

7.किरणोत्सारीता 


👉Science चे स्टेट बोर्ड मधील One liner Problems ही चांगले करा.त्यात जे फक्त फॉर्म्युला टाकून एक दोन स्टेप मध्ये सोडवायचे छोटे छोटे problems आहेत बऱ्याचदा तेच आलेले दिसतात.


👉विज्ञान विषय अभ्यासताना मुलभूत संकल्पना समजून घेऊन अभ्यास केला तरच तो विषय समजून गुण येतात.या साठी अभ्यास करताना जी संकल्पना समजली नाही ती youtube वर search करून Video स्वरूपात बघितली तर चांगली लक्षात राहील (उदा.Cell structure).YT वर बऱ्याच channel वर वरील सर्व topics मोफत उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करताना नक्कीच फायदा होईल.


🚨सर्वात महत्वाचे........❌

👉बरेच जण मला msg करतात की सर विज्ञानात गुण मिळत नाही,खूप टेन्शन आलंय.जेव्हा त्यांच्याशी बोलणं होत तेव्हा प्रत्यक्षात अस जाणवत की त्यांना मुळात गणितात 8-10 गुण असतात,Polity मध्ये 7-8 गुण असतात. लक्षात घ्या विज्ञान तुमची लीड किती असणारे? हे ठरवणार नाही. ते गणित बुध्दिमत्ता आणि polity ठरवणार आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये पूर्व गणित one liner होत.मुलांनी त्यात 18-19 गुण पण घेतले आहेत.

विज्ञानात कमी गुण मिळतात म्हणून आता त्यात PHD च करतो अस ही काही जन ठरवतात.परंतु तस करू नका.त्यात किती जरी अभ्यास केला तरी अमुक अमुक गुण मिळतीलच हे सांगता येत नाही. विज्ञानाचा अभ्यास करण्यापूर्वी स्वतः ला 2 प्रश्न विचारा.

1. मला गणित बुद्धिमातेत किमान 15 पेक्षा जास्त गुण मिळणार आहेत ना? इतका आत्मविश्र्वास आलंय ना?

2. मला Polity मध्ये 12+ गुण मिळणार आहेत ना?


या 2 प्रश्नाची उत्तरे नकारात्मक असतील तर पहिले 2 विषय focus करा. कारण ते predictable आहेत आणि input output ratio ही खूप high आहे.


👉विज्ञानाला घाबरायच काही कारण नाही...

Combine पूर्व 23 ला बरेच जण प्रश्न बघून घाबरून गेले.मुळात त्याच कारण हे आहे की आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायची मानसिकता.वर सांगितल्या प्रमाणे कमीत कमी वेळात अभ्यास करून Avg गुण मिळवायचे ध्येय ठरवा.जास्त टेन्शन घेऊ नका.

बाकी गणित,polity,Geo,Eco,His आहेच score करायला.💯


'मुस्लिम लीग’ ची स्थापना.


   🖍ठिकाण :- ढाका

   🖍सस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला

   🖍मख्यालय :- लखनऊ
  
 🖍उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये
सहानुभूती निर्माण करुन मुस्लिम गटास काँग्रेसपासून दूर ठेवणे,मुस्लिमांच्या राजकीय व इतर हक्कांचे संरक्षण करणे, तसेच मुस्लिमांसाठी इंग्रज सरकारप्रती राजनिष्ठेची भावना दृढ करणे व त्यांच्या आकांक्षा, गरजा सरकारसमोर संयमपूर्ण शब्दात ठेवणे हा होता.


 🖌 मस्लिम लीगची स्थापना ‘All Indian 
Mohammadan Educational Conference’
च्या 20 व्या वार्षिक सभेच्या शेवटच्या दिवशी 
करण्यात आली.ही सभा ढाका येथे 27 ते 30 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती.

🖌या सभेत मुस्लिम लीग ही राजकीय पार्टी स्थापन करण्याचा प्रस्ताव ढाक्याचे नवाब सलीम उल्ला आणि मोहसीन यांनी मिळून मांडला.
 
 🖌अखेर आगाखान यांनी सुचविल्यानंतर या संघटनेला ‘All Indian Muslim League’ असे नाव देण्यात आले.
  
🖌मस्लिम लीगचे पहिले वार्षिक अधिवेशन 29 - 30 डिसेंबर 1907 रोजी कराची येथे अहमजी पिरभॉय यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
  
🖌पढच्या वर्षीच मोहम्मद अली गोहर यांनी कराची येथे मुस्लिम लीगची घटना (ग्रीन बुक) लिहिली.
        

  📚मस्लिम लीगचे अध्यक्ष📚
1907 अहमजी पीरभॉय
1908-1912 आगाखान
1912-1918 सर मुहम्मद अली
1919-1930 मुहम्मद अली जिना
1931 सर मुहम्मद शफी
1931-1932 सर मुहम्मद झफररुल्ला खान
1932-1933 मिया अब्दुल अझीझ
1933-1934 हफिज हिदायत हुसेन
1934-1947 मुहम्मद अली जिना
Ref. :- "आधुनिक भारताच्या इतिहासाची आवर्तसारणी", लेखक :- अॅङ. वरद देशपांडे

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 1). महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?

⚫️ लतिका घोष ☑️

⚪️ सरोजिनी नायडू

⚪️ कष्णाबाई राव

⚪️ उर्मिला देवी


2). पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?

⚫️ अक्स-ला-चॅपेलचा तह ☑️

⚪️ पॉंडेचेरीचा तह

⚪️ मगलोरचा तह

⚪️ परिसचा तह



3). १८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?

⚪️ खान बहादूर खान

⚫️ कुंवरसिंग ☑️

⚪️ मौलवी अहमदुल्ला

⚪️ रावसाहेब



4). डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले. ?

⚪️ १८४९

⚪️ १८५१

⚫️ १८५३ ☑️

⚪️ १८५४



5). १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले. ?

⚪️ फरी इंडिया

⚪️ नया भारत

⚪️ फरी प्रेस जर्नल

⚫️ लीडर ☑️



6) १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. ?

अ] उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते.

ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.


⚪️ फक्त अ

⚪️ फक्त ब

⚫️ वरील दोन्ही ☑️

⚪️ वरीलपैकी एकही नाही



7). खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा. ?

अ] लॉर्ड कर्झन

ब] लॉर्ड चेम्सफर्ड

क] लॉर्ड हार्डिंग्स II

ड] लॉर्ड आयर्विन


पर्याय


⚫️ अ-ब-क-ड ☑️

⚪️ अ-क-ब-ड

⚪️ क-अ-ब-ड

⚪️ अ-ड-क-ब



8). विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. ?

स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला. ?

पर्याय


⚫️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ☑️

⚪️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

⚪️ अ बरोबर आणि ब चूक

⚪️ अ चूक आणि ब बरोबर



9. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?

⚪️ भारत सरकारचा कायदा १९३५

⚪️ भारत सरकारचा कायदा १९१९

⚫️ भारत कौन्सिल कायदा १९०९ ☑️

⚪️ भारत कौन्सिल कायदा १८९२


10). मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?

⚪️ सहदरण आय्यपन 

⚫️ नारायण गुरु ☑️

⚪️ हदयनाथ कुंजरू 

⚪️ टी.एम. नायर


कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो?

⚪️ कावीळ 

⚪️ विषमज्वर

⚪️ अतिसार

⚫️ वरील सर्व ☑️



 देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली?

⚫️ एडवर्ड जेन्नर ☑️

⚪️ लई पाश्चर 

⚪️ शयाम विल्मुट

⚪️ कार्ल स्टिनर



 विद्यूत शक्ती _ मध्ये मोजतात. ?

⚪️ वॉल्ट 

⚪️ कल्वीन 

⚫️ वॅट ☑️

⚪️ कलरी



 ढगांचा गडगडात वीज चमकल्यानंतर थोड्यावेळाने ऐकू येतो; कारण 

⚪️ ढग आकाशात खूप उंचावर असतात. 

⚪️ परकाश व आवाजाची गती समान असते

⚫️ प्रकाशाची गती ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त असते ☑️

⚪️ धवनीची गती प्रकाशाच्या गती पेक्षा जास्त आहे



  तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही _

⚪️ खर्चीवर बसलेले असता 

⚪️ जमिनीवर बसलेले असता

⚫️ जमिनीवर झोपलेले असता ☑️

⚪️ जमिनीवर उभे असता



 वटवाघूळ उडत असताना _ ध्वनी निर्माण करतात.?

⚪️ लघु वारंवारतेचा 

⚫️ उच्च वारंवारतेचा ☑️

⚪️ मध्यम वारंवारतेचा

⚪️ यापैकी नाही



 कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?

⚪️ विहिरीतील 

⚪️ नळाचे 

⚪️ तलावाचे

⚫️ पावसाचे ☑️



 कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्राज्ञाने लावला?

⚫️ डॉ. हॅन्सन ☑️

⚪️ डॉ. रोनॉल्ड

⚪️ डॉ. बेरी

⚪️ डॉ. निकेल्सनू



 ७ कि.मी. = डेकामीटर ?

⚪️ ७० 

⚫️ ७०० ☑️

⚪️ ७०००

⚪️ ०.७००



 खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात?

⚫️ स्ट्रेप्टोमायसिन ☑️

⚪️ पनिसिलिन

⚪️ डप्सॉन

⚪️ गलोबुलिन


............... या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. ?

⚪️ सातारा    

⚪️ कोल्हापूर    

⚫️ कराड ☑️

⚪️ महाबळेश्वर



 महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली ................ आहे. ?

⚪️ भीमा    

⚫️ गोदावरी ☑️

⚪️ कष्णा      

⚪️ वनगंगा



 योग्य जोडया लावा.  ?


  धरण      जलाशयाचे नाव

अ) कोयना      i) शहाजी सागर

ब) भाटघर      ii) शिवसागर

क) माणिकडोह    iii) ऑथर सरोवर

ड) भंडारदरा    iv) येसाजीकंक


    अ  ब  क  ड

⚪️ i  iv  ii  iii

⚪️ i  iii  ii  iv

⚪️ iv  iii  ii  i

⚫️ *ii  iv  i  iii ☑️*



 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?

⚪️ वशिष्ठी    

⚪️ तापी      

⚫️ भीमा ☑️ 

⚪️ उल्हास



 खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे ?

⚪️ दहू     

⚪️ आळंदी    

⚫️ पंढरपूर ☑️  

⚪️ नाशिक


 ‘लवासा’ प्रकल्प पुणे जिल्ह्यातील ............ नदीच्या खोऱ्यात उभारला जात आहे. ?

⚪️ चद्रभागा    

⚪️ मळा-मुठा    

⚫️ मोसे ☑️

⚪️ कष्णा 



 पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर .............. वसलेले आहे. ?

 ⚪️ कराड    

⚪️ पढरपूर    

⚪️ औदुंबर    

⚫️ नरसोबाची वाडी ☑️



 हिमालयातील नद्यांच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांचा विचार करा. ?*

   अ) त्यांची झीज करण्याची क्षमता प्रचंड आहे.

   ब) त्या नद्या बारमाही आहेत.

   क) या नद्यांनी मोठया प्रमाणात ‘घळयांची’ निर्मिती केलेली नाही.

   ड) बहुतेक नद्यांचा उगम हिमालयाच्या वरच्या भागात आहे.

        वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहेत ?

⚪️ फक्त अ, ब    

⚫️ फक्त क ☑️

⚪️ अ, ब, क, ड    

⚪️ अ, ब, ड



 योग्य जोडया लावा. ?


  नदी      उपनदी

अ) भीमा      i) वैनगंगा

ब) गोदावरी      ii) कोयना

क) कृष्णा      iii) इंद्रायणी

ड) तापी      iv) गिरणा


       अ  ब  क ड 

⚫️ iii  i  ii  iv ☑️

⚪️ ii  iv  i  iii

⚪️ ii  i  iii  iv

⚪️ iii  ii  i  iv



 खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही ?

⚪️ इद्रावती    

⚪️ परवरा      

⚫️ इंद्रायणी ☑️

⚪️ दधना


पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

⚫️ बोस – आईनस्टाईन कंडनसेट ☑️

⚪️ फर्मआयोनिक कंडनसेट

⚪️ एरिक – कॅटरले कंडनसेट     

⚪️ कार्नेल टर्मस् कंडनसेट



 धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?

   अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.

   ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे).

   क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.


⚪️ फक्त अ    

⚫️ फक्त ब ☑️

⚪️ फक्त क    

⚪️ वरीलपैकी एकही नाही



 खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात. ?

अ) एडीनीन – A  

ब) गुआनीन – G    

क) थायमिन – T    

ड) साइटोसीन – C


⚪️ अ, ब    

⚫️ अ, ब, क ☑️

⚪️ ब, क, ड    

⚪️ अ, ब, क, ड



 वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?*

⚪️ चाल    

⚪️ घनता      

⚪️ जडत्व    

⚫️ त्वरण ☑️



 खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता. ?*

⚫️ मिथेन ☑️

⚪️ कलोरीन    

⚪️ फलोरीन    

⚪️ आयोडीन


. अ). ज्या भौतिक राशी व्यक्त करताना परिमाण आणि दिशा दोघांची आवश्यकता असते त्या राशींना आदिश राशी असे म्हणतात. ?

 ब). ज्या भौतिक राशी व्यक्त करताना फक्त दिशेची आवश्यकता असते त्या भौतिक राशींना सदिश राशी असे म्हणतात.

वरीलपैकी सत्य विधान / विधाने कोणते ?

⚪️ फक्त अ    

⚪️ फक्त ब   

⚪️ अ, ब दोन्ही    

⚫️ एकही नाही ☑️



 धातूबद्दल खालील विधानांचा विचार करा. ?

अ). धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन प्राप्त करतात.

ब). धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन प्राप्त करतात.

क). आधुनिक आवर्तसारणीत धातू मूलद्रव्य डाव्या बाजूला व मध्यभागी आहेत.

ड). टेक्नेशिअम हा सर्वांत पहिला कृत्रिम मूलद्रव्य आहे.


⚫️ अ, क, ड बरोबर ☑️

⚪️ अ, क बरोबर    

⚪️ ब, क बरोबर    

⚪️ अ, ब, क, ड बरोबर



 खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

अ). हिपॅरीन  - रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे.

ब). हिस्टामाइन  - सूल आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन आहे.

⚪️ अ योग्य    

⚪️ ब योग्य    

⚫️ दोन्ही योग्य ☑️

⚪️ दोन्ही अयोग्य



 खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा. ?

अ).  एक किलोग्रॅम म्हणजे पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालयातील 90% प्लॅटीनम, 10% इरिडीयम या मिश्रधातूचा 39  मि.मी. उंची व व्यास असणा-या ठोकळयाचे वजन होय.*

ब). एक किलोग्रॅम म्हणजे 4° c तापमानात सामान्य वायूदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन होय.

⚫️ अ, ब दोन्ही ☑️

⚪️ फक्त अ   

⚪️ फक्त ब    

⚪️ एकही नाही



 खालील विधानांचा विचार करा. ?

अ). चांदीपेक्षा सोन्याची तन्यता जास्त आहे.

ब). चांदीपासून 8,000 फूट लांबीचा तार काढता येतो.

क). चांदीनंतर तांबे दुसरा आणि सोने तिसरा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे.

ड). चांदी हा मानवासाठी विषारी नाही आणि आपण जेवण डेकोरंटमध्ये चांदीचा वापर करू शकतो.

  

⚫️ ब, क, ड बरोबर अ चूक ☑️

⚪️ अ, ब, क, ड बरोबर

⚪️ अ, ब, ड बरोबर      

⚪️ वरीलपैकी नाही

150 सामान्य ज्ञान के प्रश्न उत्तर 2022


प्रश्‍न 1. मानव ने सर्वप्रथम किस धातु का प्रयोग किया ?
उत्तर – ताँबा

प्रश्‍न 2. अंगूरों की पैदावार के लिए कौन-सा शहर प्रसिद्ध है ?
उत्तर – नासिक (महाराष्ट्र)

प्रश्‍न 3. कोयना बांध किस राज्य मे स्थित है ?
उत्तर – महाराष्ट्र

प्रश्‍न 4. शरीफा की फसल कौन से महीने काटी जाती है ?
उत्तर – नवम्बर के प्रारम्भ

प्रश्‍न 5. ‘ऑस्‍कर पुरस्‍कार’ प्रदान किया जाता है-
उत्‍तर – नेशनल अकादमी ऑफ मोशन पिक्‍चर ऑर्ट्स एण्‍ड साइंसेज द्वारा


प्रश्‍न 6. ज्ञानपीठ पुरस्‍कार प्राप्‍त करने वाला प्रथम हिन्‍दी लेखक कौन था-
उत्‍तर – सुमित्रानंदन पंथ


प्रश्‍न 7. सरस्‍वती सम्‍मान के प्रथम प्राप्‍तकर्ता हैं-
उत्‍तर – हरिवंश राय बच्‍चन

प्रश्‍न 8. ‘भारत रत्‍न’ से विभूषित प्रथम विभूति है-
उत्‍तर – डॉ. एस. राधाकृष्‍णन

प्रश्‍न 9. मरणोपरान्‍त भारतरत्‍न पुरस्‍कार से सर्वप्रथम किसे सम्‍मानित किया गया था-
उत्‍तर – लाल बहादुर शास्‍त्री

प्रश्‍न 10. ‘भारत रत्‍न’ से विभूषित प्रथम विदेशी है-
उत्‍तर – खान अब्‍दुल गफ्फार खान

प्रश्‍न 11. द्वितीय विश्वयुद्ध के दौरान जापान पर परमाणु बम कब गिराया गया था ?
उत्तर – 6 अगस्त 1945

प्रश्‍न 12. हिमसागर एक्सप्रेस किन दोनों जगह के बीच चलती है ?
उत्तर – जम्मू और कश्मीर

प्रश्‍न 13. “उगते सूरज की भूमि” किस देश को कहा जाता है ?
उत्तर – जापान

प्रश्‍न 14. मध्य प्रदेश की राजधानी का नाम क्या है ?
उत्तर – भोपाल

प्रश्‍न 15. टोक्यो किस देश की राजधानी है ?
उत्तर – जापान

प्रश्‍न 16. विश्व का सबसे बड़ा देश कौन-सा है ?
उत्तर – रूस

प्रश्‍न 17. भारत की मुख्य भूमि का अक्षांश किसके बीच फैला हुआ है ?
उत्तर – 8’4′ उत्तर और 37’6′ उत्तर के बीच

प्रश्‍न 18. अक्टूबर और नवंबर के महीनों में भारी वर्षा कहा होती है ?
उत्तर – कोरोमंडल तट पर

प्रश्‍न 19. चेन्नई में दक्षिण-पश्चिम मानसून से अन्य स्थानों की तुलना में कम वर्षा क्यों होती है ?
उत्तर – क्योंकि मानसून कोरोमंडल तट के समानांतर चलता है, चेन्नई बहुत गर्म है और नमी को संघनित नहीं होने देता, वे अपतटीय हवाएं हैं।


प्रश्‍न 20. गुवाहाटी से चंडीगढ़ तक मानसूनी बारिश का क्या रुख है ?
उत्तर – हासन ट्रेंड एक वर्ष में

प्रश्‍न 21. 50 सेमी से कम वर्षा वाला क्षेत्र कौन-सा है ?
उत्तर – लेह (लद्दाख)

प्रश्‍न 22. कौन-सा संगठन भारत का स्थलाकृतिक मानचित्र बनाता है ?
उत्तर – भारतीय सर्वेक्षण विभाग

प्रश्‍न 23. भारत का कौन-सा केंद्र शासित प्रदेश ऐसा है कि इसके चार जिले हैं, लेकिन इसके किसी भी जिले की सीमा इसके किसी अन्य जिले की सीमा से नहीं लगती है ?
उत्तर – पुडुचेरी

प्रश्‍न 24. झीलों के अध्ययन को क्या कहा जाता है ?
उत्तर – लिम्नोलॉजी

प्रश्‍न 25. कुल्लू घाटी किसके बीच स्थित है ?
उत्तर – धौलाधार और पीर पंजाली

प्रश्‍न 26. पिपली घाट दर्रे के किस पहाड़ी भाग में है ?
उत्तर – अरावली

प्रश्‍न 27. किस हिमालयी चोटी को सागरमाथा भी कहा जाता है ?
उत्तर – माउंट एवरेस्ट

प्रश्‍न 28. गैडविन ऑस्टिन क्या है ?
उत्तर – एक चोटी

प्रश्‍न 29. ग्रेटर हिमालय का दूसरा नाम क्या है ?
उत्तर – हिमाद्री

प्रश्‍न 30. जो नागा टीबा और महाभारत पर्वत श्रृंखलाओं में शामिल है ?
उत्तर – निम्न हिमालय

प्रश्न 31. कार्बोरेटर किस इंजन में होता है?
उत्तर- पेट्रोल इंजन

प्रश्न 32. हाइग्रोमीटर किसे नापने के लिए प्रयोग मे लाया जाता है?
उत्तर- वायुमण्डल में व्याप्त आर्द्रता कॉ

प्रश्‍न 33. बालटोडा हिमनद कहाँ स्थित है ?
उत्तर – काराकोरम पवर्तमाला

प्रश्‍न 34. स्थायी बंदोबस्त का सिद्धांत किसने दिया था ?
उत्तर – लॉर्ड कॉर्नवालिस

प्रश्‍न 35. हिमानी (ग्लेशियर) बर्फ का विशाल पिंड कहा है ?
उत्तर – हिमालय पर्वत के श्रेणी के शीर्ष स्थलो पर छाया रहता है।

प्रश्‍न 36. कायांतरित कौन-सी शैल है ?
उत्तर – संगमरमर

प्रश्‍न 37. एक घण्टे में पृथ्वी कितने देशान्तर घूमती है ?
उत्तर – 15° डिग्री देशांतर

प्रश्‍न 38. चंद्र ग्रहण किस कारण होता है ?
उत्तर – पृथ्वी, सूर्य और चन्द्रमा के बीच आ जाता है।

प्रश्‍न 39. ब्रिटिश शासन ने किन स्थानों के बीच पहली रेलवे लाइन शुरू की गई थी ?
उत्तर – मुम्बई से ठाणे के बीच

प्रश्‍न 40. सह्याद्री पर्वत श्रृंखला के अन्य नाम क्या है ?
उत्तर – पश्चिमी घाट

प्रश्‍न 41. भारत का सबसे ऊँचा पठार कौन-सा है ?
उत्तर – लद्दाख का पठार

प्रश्‍न 42. बगान कृषि का उत्पादन कौन करता है ?
उत्तर – गैर-खाद्य फसलें

प्रश्‍न 43. भारत में फसलों का क्षेत्रफल कितना है ?
उत्तर – खाद्यान्न के क्षेत्रफल का 60 से 70 प्रतिशत

प्रश्‍न 44. जूट उत्पादन में सर्वाधिक प्रचुर क्षेत्र कौन से है ?
उत्तर – पश्चिम बंगाल

प्रश्‍न 45. भारत में जूट का सर्वाधिक क्षेत्रफल कहाँ है ?
उत्तर – पश्चिम बंगाल

प्रश्‍न 46. युद्ध में साहस और पराक्रम के लिए दिया जाने वाला भारत का सर्वोच्च सैनिक पुरस्कर कौन-सा है ?
उत्तर – परमवीर चक्र

प्रश्‍न 47. स्थाई बंदोबस्त के तहत जमींदार को पूरे राजस्व का कितना प्रतिशत राज्य को देना तय हुआ ?
उत्तर – 89%

प्रश्‍न 48. सोहन घाटी का सम्बन्ध किस काल से है ?
उत्तर – निम्न पूरा पाषाण काल युगीन स्थलों से

प्रश्‍न 49. दो नदियों के बीच उपजाऊ भूमि क्या कहलाती है ?
उत्तर – दोआब

प्रश्‍न 50. भारतीय प्रायद्वीप की सबसे लंबी नदी कौन-सी है ?
उत्तर – गोदावरी नदी


प्रश्‍न 51. किस नदी को दक्षिण गंगा कहा जाता है ?
उत्तर – गोदावरी नदी

प्रश्‍न 52. किस नदी का उद्गम भारत से बाहर है ?
उत्तर – ब्रह्मपुत्र नदी

प्रश्‍न 53. सिन्धु नदी किस पर्वत श्रेणी से निकलती है ?
उत्तर – कैलाश पर्वत

प्रश्‍न 54. हरित क्रांति शब्द का प्रयोग किस उच्च उत्पादन को इंगित करने के लिए किया गया है ?
उत्तर – प्रति हेक्टेयर कृषि उत्पादकता में वृद्धि करके।

प्रश्‍न 55. हरित क्रांति किन राज्यों में सर्वाधिक सफल रही ?
उत्तर – पंजाब, हरियाणा और उत्तर प्रदेश में

प्रश्‍न 56. हरित क्रांति का संबंध किस फसल से है ?
उत्तर – गेहूँ

प्रश्‍न 57. रिक्टर स्केल का निर्माण किसने किया था ?
उत्तर – चार्ल्स फ्रांसिस रिक्टर (1935)

प्रश्‍न 58. सामान भूकंपीय तीव्रता वाले स्थानों को मिलाने वाली रेखा क्या कहलाती है ?
उत्तर – सम-भूकंपीय रेखा (Isoseismal Line)

प्रश्‍न 59. भारत को कितने भूकंपीय क्षेत्रो में विभाजित किया गया है ?
उत्तर – चार (II, III, IV तथा V)

प्रश्‍न 60. संसार का सर्वोच्च ज्वालामुखी पर्वत कौन-सा है ?
उत्तर – कोटोपैक्सी (इक्वाडोर)

प्रश्‍न 61. संसार का सबसे ऊंचा जलप्रपात कौन-सा है ?
उत्तर – एन्जिल जलप्रपात (वेनेज़ुएला)

प्रश्‍न 62. ज्वार भाटा के कारण समुद्री जल स्तर में उत्पन्न अंतर को क्या कहते है ?
उत्तर – ज्वारीय परिसर (Tidal Range)

प्रश्‍न 63. सूर्य के प्रकाश की सहायता से शरीर में किस विटामिन का निर्माण होता है?
उत्‍तर – विटामिन D का

प्रश्‍न 64. हैली पुच्‍छल तारा (Halley’s Comet) प्रति कितने वर्ष बाद दिखाई पड़ता है?
उत्‍तर – 76 वर्ष

प्रश्‍न 65. किन तरंगों की सहायता से चमगादडें (Bats) रात में सुरक्षित उड़ती हैं?
उत्‍तर – पराश्रव्‍य तरंग

प्रश्‍न 66. HIV विषाणु से कौन सा रोग होता है ?
उत्‍तर – AIDS एड्स

प्रश्‍न 67. रक्‍त का थक्‍का जमाने में कौनसा विटामिन सहायक होता है?
उत्‍तर – विटामिन K

प्रश्‍न 68. एम्पियर सेकेण्‍ड मात्रक है?
उत्‍तर – आवेश की मात्रा

प्रश्‍न 69. लाफिंग गैस है?
उत्‍तर – नाइट्रस ऑक्‍साइड

प्रश्‍न 70. बाह्य चुम्‍बकीय प्रभावों से वैज्ञानिक यंत्रों की रक्षा की जाती है?
उत्‍तर – लौह कवर में

प्रश्‍न 71. परमाणु बिजली घरों में किस प्रकार की न्‍यूक्‍लीयर अभिक्रिया होती है?
उत्‍तर – न्‍यूक्‍लीयर संलयन

प्रश्‍न 72. ‘गैसों के दाब’ ज्ञात करने वाला यंत्र क्‍या कहलाता है?
उत्‍तर – मैनोमीटर

प्रश्‍न 73. विश्व का सबसे लम्बा रेल मार्ग कौन-सा है ?
उत्तर – ट्रांस साइबेरियन रूट (10260 किमी)

प्रश्‍न 74. भारत का प्रथम आई.एस.ओ. (ISO) प्रमाण पत्र वाला बैंक है ?
उत्तर – केनरा बैंक (1 जुलाई 1906)

प्रश्‍न 75. प्रथम बैंक जिसने 1946 में भारत से बाहर लंदन में अपनी शाखा खोली ?
उत्तर – बैंक ऑफ इंडिया (7 सितंबर 1906)

प्रश्‍न 76. HYV कार्यक्रम को भारत में और क्या कहा जाता है ?
उत्तर – नई कृषि नीति

प्रश्‍न 77. भारत के किस राज्य को चावल का कटोरा कहा जाता है ?
उत्तर – आंध्र प्रदेश

प्रश्‍न 78. ऑपरेशन फ्लड किससे संबंधित है ?
उत्तर – दुग्ध उत्पादन

प्रश्‍न 79. क्रिसिल (CRISIL) का पूर्ण रूप नाम क्या है ?
उत्तर – क्रेडिट रेटिंग एजेंसी

प्रश्‍न 80. नेफ्त (NEFT) का पूरा नाम है ?
उत्तर – नेशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रांसफर

प्रश्‍न 81. किसने अपने पुत्र व पुत्री को बौद्ध धर्म के प्रचार व प्रसार हेतु श्रीलंका भेजा ।
उत्‍तर – अशोक ने।

प्रश्‍न 82. कौटिल्‍य द्वारा रचित अर्थशास्‍त्र कितने अभिकरणों में विभाजित है।
उत्‍तर – 15

प्रश्‍न 83. अशोक का अभिलेख भारत के अलावा किस अन्‍य स्‍थान पर भी पाया गया है।
उत्‍तर – अफगानिस्‍तान ।

प्रश्‍न 84. किस शिलालेख में अशोक ने घोषणा की, सभी मनुष्‍य मेरे बच्‍चे है।
उत्‍तर – प्रथम पृथक शिलालेख में ।

प्रश्‍न 85. किस स्‍थान से अशोक के शिलालेख के लिए पत्‍थर लिया जाता था।
उत्‍तर – चुनार से।

प्रश्‍न 86. किस महीने में मौर्यो का राजकोषीय वर्ष आरम्‍भ होता था।
उत्‍तर – आषाढ़ (जुलाई) ।

प्रश्‍न 87. किस जैन ग्रंथ में चंद्रगुप्‍त मौर्य के जैन धर्म अपनाने का उल्‍लेख मिलता है।
उत्‍तर – परिशिष्‍ट पर्व में।

प्रश्‍न 88. चंद्रगुप्‍त मौर्य का संघर्ष किस यूनानी शासक से हुआ।
उत्‍तर – सेल्‍यूकस से।

प्रश्‍न 89. एरियन ने चंद्रगुप्‍त मौर्य को क्‍या नाम दिया।
उत्‍तर – सैंड्रोकोट्स ।

प्रश्‍न 90. किस ग्रंथ में चंद्रगुप्‍त मौर्य के लिए कुलहीन शब्‍द का प्रयोग हुआ।
उत्‍तर – मुद्राराक्षस।

प्रश्‍न 91. किसने अपने पुत्र व पुत्री को बौद्ध धर्म के प्रचार व प्रसार हेतु श्रीलंका भेजा ।
उत्‍तर – अशोक ने।

प्रश्‍न 92. कौटिल्‍य द्वारा रचित अर्थशास्‍त्र कितने अभिकरणों में विभाजित है।
उत्‍तर – 15

प्रश्‍न 93. अशोक का अभिलेख भारत के अलावा किस अन्‍य स्‍थान पर भी पाया गया है।
उत्‍तर – अफगानिस्‍तान ।

प्रश्‍न 94. किस शिलालेख में अशोक ने घोषणा की, सभी मनुष्‍य मेरे बच्‍चे है।
उत्‍तर – प्रथम पृथक शिलालेख में ।

प्रश्‍न 95. किस स्‍थान से अशोक के शिलालेख के लिए पत्‍थर लिया जाता था।
उत्‍तर – चुनार से।

प्रश्‍न 96. किस महीने में मौर्यो का राजकोषीय वर्ष आरम्‍भ होता था।
उत्‍तर – आषाढ़ (जुलाई) ।

प्रश्‍न 97. किस जैन ग्रंथ में चंद्रगुप्‍त मौर्य के जैन धर्म अपनाने का उल्‍लेख मिलता है।
उत्‍तर – परिशिष्‍ट पर्व में।

प्रश्‍न 98. चंद्रगुप्‍त मौर्य का संघर्ष किस यूनानी शासक से हुआ।
उत्‍तर – सेल्‍यूकस से।

प्रश्‍न 99. एरियन ने चंद्रगुप्‍त मौर्य को क्‍या नाम दिया।
उत्‍तर – सैंड्रोकोट्स ।

प्रश्‍न 100. किस ग्रंथ में चंद्रगुप्‍त मौर्य के लिए कुलहीन शब्‍द का प्रयोग हुआ।
उत्‍तर – मुद्राराक्षस।


प्रश्‍न 101. चंद्रगुप्‍त के बाद किसने शासन प्राप्‍त किया।
उत्‍तर – बिंदुसार ने।

प्रश्‍न 102. बिन्‍दुसार किस संप्रदाय का अनुयायी था।
उत्‍तर – आजीवक संप्रदाय।

प्रश्‍न 103. किस विद्धान बिंदुसार को 16 राज्‍यों का विजेता बताया।
उत्‍तर – तारानाथ ने।

प्रश्‍न 104. अशोक मगध की गद्दी पर कब बैठा।
उत्‍तर – 269 ई.पू. ।

प्रश्‍न 105. अशोक की माता का क्‍या नाम था।
उत्‍तर – शुभद्रांगी।

प्रश्‍न 106 ‘दादा साहेब फाल्‍के पुरस्‍कार’ प्रदान किया जाता है-
उत्‍तर – सूचना एवं प्रसारण मंत्रालय, भारत सरकार द्वारा

प्रश्‍न 107. भारत की पहली महिला कैबिनेट मंत्री कौन-सी थी ?
उत्तर – राजकुमारी अमृत कौर

प्रश्‍न 108. भारत के सशस्त्र बलों का सुप्रीम कमांडर है ?
उत्तर – भारत के राष्ट्रपति

प्रश्‍न 109. यूटीआई (UTI) बैंक वर्तमान में किस नाम से जाना जाता है ?
उत्तर – एक्सिस बैंक (3 दिसम्बर, 1993)

प्रश्‍न 110. स्वामी विवेकानंद का जन्म-दिन, कब राष्ट्रीय युवा दिवस के रूप में मनाया जाता है ?
उत्तर – 12 जनवरी

प्रश्‍न 111. किस ग्रंथ में दक्षिणी भारत के आक्रमणों का पता चलता है।
उत्‍तर – तमिल ग्रंथ ‘अहनानूर’।

प्रश्‍न 112. चंद्रगुप्‍त मौर्य का निधन कब हुआ।
उत्‍तर – 297 ई.पू. ।

प्रश्‍न 113. चाणक्‍य किस विश्‍वविद्यालय में शिक्षक थे।
उत्‍तर – तक्षशिला विश्‍वविद्यालय में।

प्रश्‍न 114. किस ग्रंथ में दक्षिणी भारत के आक्रमणों का पता चलता है।
उत्‍तर – तमिल ग्रंथ ‘अहनानूर’।

प्रश्‍न 115. चंद्रगुप्‍त मौर्य का निधन कब हुआ।
उत्‍तर – 297 ई.पू. ।

प्रश्‍न 116. चाणक्‍य किस विश्‍वविद्यालय में शिक्षक थे।
उत्‍तर – तक्षशिला विश्‍वविद्यालय में।

प्रश्‍न 117. भारत का पहला मोबाइल बैंक कौन-सा है ?
उत्तर – लक्ष्मी वाहिनी बैंक (खरगोन, मध्य प्रदेश)

प्रश्‍न 118. भारत के पहले उप-प्रधानमंत्री थे ?
उत्तर – सरदार वल्लभ भाई पटेल

प्रश्‍न 119. प्रो. अमर्त्‍य सेन को किस वर्ष अर्थशास्‍त्र का नोबेल पुरस्‍कार दिया गया-
उत्‍तर – 1998 में

प्रश्‍न 120. विश्वेश्वरैया आयरन एंड स्टील लिमिटेड कहाँ स्थित है ?
उत्तर – भद्रावती

प्रश्‍न 121. भारत की सिलिकॉन वैली कहाँ स्थित है ?
उत्तर – बैंगलोर

प्रश्‍न 122. आंध्र प्रदेश का अनंतपुर जिला किस लिए प्रसिद्ध है ?
उत्तर – गोल्डन

प्रश्‍न 123. स्वतंत्रता के बाद विकसित पहला बंदरगाह कौन-सा था ?
उत्तर – कांडला

प्रश्‍न 124. भारत का सबसे ऊंचा बांध भाखड़ा किस नदी पर बना है ?
उत्तर – सतलुज नदी

प्रश्‍न 125. टिहरी बांध किस नदी पर बनाया गया है ?
उत्तर – भागीरथी नदी

प्रश्‍न 126. जलविद्युत शक्ति भारत में कुल कितना विद्युत शक्ति में योगदान करती है ?
उत्तर – लगभग एक-पांचवां

प्रश्‍न 127. इंदिरा गांधी नहर से किन नदियों को पानी मिलता है ?
उत्तर – सतलुज नदी

प्रश्‍न 128. व्यास नागार्जुन सागर बांध किस नदी पर बना है ?
उत्तर – कृष्णा नदी

प्रश्‍न 129. सरदार सरोवर बांध किस नदी पर है ?
उत्तर – नर्मदा नदी

प्रश्‍न 130. अर्थशास्‍त्र के क्षेत्र में नोबेल पुरस्‍कार किस वर्ष से प्रदान किए जा रहे हैं-
उत्‍तर – 1969 से

प्रश्‍न 131. सुब्रह्मण्‍यम चन्‍द्रशेखर को किस क्षेत्र में नोबेल पुरस्‍कार मिला-
उत्‍तर – भौतिकी

प्रश्‍न 132. ‘एशियाई नोबेल पुरस्‍कार’ के नाम से जाना जाता है-
उत्‍तर – रैमन मैग्‍सेसे पुरस्‍कार

प्रश्‍न 133. भारत के संसद में अंग होते है ?
उत्तर – राष्ट्रपति, लोक सभा और राज्य सभा

प्रश्‍न 134. संविधान के प्रारूप समिति के अध्यक्ष थे ?
उत्तर – डॉ. भीमराव अंबेडकर

प्रश्‍न 135. चंद्रगुप्‍त के बाद किसने शासन प्राप्‍त किया।
उत्‍तर – बिंदुसार ने।

प्रश्‍न 136. बिन्‍दुसार किस संप्रदाय का अनुयायी था।
उत्‍तर – आजीवक संप्रदाय।

प्रश्‍न 137. किस विद्धान बिंदुसार को 16 राज्‍यों का विजेता बताया।
उत्‍तर – तारानाथ ने।

प्रश्‍न 138. अशोक मगध की गद्दी पर कब बैठा।
उत्‍तर – 269 ई.पू. ।

प्रश्‍न 139. अशोक की माता का क्‍या नाम था।
उत्‍तर – शुभद्रांगी।

प्रश्‍न 140. भारत में शिलालेख का प्रचलन सर्वप्रथम किसने किया।
उत्‍तर – अशोक ने।

प्रश्‍न 141. Global Electric Vehicle Outlook कब जारी किया गया ?

उत्तर – 2021

प्रश्‍न 142. किस काल में स्त्रियों की संख्‍या पुरूषों के बराबर थी।
उत्‍तर – गुप्‍तकाल में।

प्रश्‍न 143. गुप्‍तकाल में औषधि शास्‍त्र का प्रमुख विद्वान कौन था।
उत्‍तर – वाग्भट्ट।

प्रश्‍न 144 गुप्‍तकालीन आर्थिक दशा की प्रमुख विशेषता क्‍या थी।
उत्‍तर – उद्योग-धन्‍धों व कृषि को प्रोत्‍साहन।

प्रश्‍न 145. चन्‍द्रगुप्‍त द्वितीय ने कब विक्रमादित्‍य की उपाधि धारण की थी।
उत्‍तर – शकों का उन्‍मूलन करने के बाद।

प्रश्‍न 146. चंद्रगुप्‍त मौर्य का प्रधानमंत्री थे।
उत्‍तर – कौटिल्‍य।

प्रश्‍न 147. चरक और नागार्जुन किसके दरबार की शोभा थे।
उत्‍तर – चंद्रगुप्‍त मौर्य।

प्रश्‍न 148. खाद्य मूल्य सूचकांक (Food Price Index) किस साल उच्चतम स्तर पर पहुंचा था ?
उत्तर – 2014

प्रश्‍न 149. राष्ट्रीय विज्ञान दिवस कब मनाया जाता है ?
उत्तर – 28 फरवरी

प्रश्‍न 150. भारत में रविदास जयंती कब मनाई जाती है ?
उत्तर – 27 फरवरी

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...