१६ एप्रिल २०२४

मध्ययुगीन भारताचा इतिहास


✺ गुलाम वंशाची स्थापना कोणी केली?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ कुतुबमिनारचा पाया कोणी घातला?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ अडीच दिवस लागलेली झोपडी कोणी बांधली?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ नालंदा विद्यापीठ कोणी नष्ट केले?

► बख्तियार खिलजी


✺ दिल्ली सल्तनतचा खरा संस्थापक कोण मानला जातो?

► इल्तुतमिश


✺ मोर सिंहासन कोणी बांधले?

► शहाजहान


✺ मयूर सिंहासन तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव काय होते?

► बादलखान


✺ शाहजहानचे बालपणीचे नाव काय होते?

► खुर्रम


✺ शाहजहानच्या बेगमचे नाव काय होते?► मुमताज


✺ शाहजहानच्या आईचे नाव काय होते?

► ताज बीबी बिल्कीस माकानी


✺ मुमताज महल या नावाने प्रसिद्ध होण्यापूर्वी शाहजहानच्या बेगमला कोणत्या नावाने संबोधले जात होते?

► अर्जुमंदबानो


✺ जहांगीरचा धाकटा मुलगा शहरयार याचे लग्न कोणासोबत झाले होते?

► तिच्या पहिल्या पतीपासून नूरजहानला जन्मलेल्या मुलीपासून.


✺ शहाजहानने कोणाच्या मदतीने गादी मिळवली?

► असफ खान


✺ शहाजहानच्या काळात कोणते ठिकाण मुघलांच्या हातातून गेले?

► कंदहार


✺ शाहजहानने आग्रा येथून राजधानी कोठे हलवली?

► शाहजहानाबाद (जुनी दिल्ली)


✺ लाल किल्ला आणि किला-ए-मुबारक कोणी बांधले?

► शहाजहान


✺ शाहजहानने पत्नी मुमताज महलची कबर कुठे बांधली?

► आग्रा


✺ मुमताज महलची कबर कोणत्या नावाने ओळखली जाते?

► ताजमहाल


✺ ताजमहाल बांधण्यासाठी किती वेळ लागला?► 20 वर्षे


✺ ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झाले?

► १६३२ मध्ये


✺ ताजमहालचे शिल्पकार कोण होते?

► उस्ताद ईशा खान आणि उस्ताद अहमद लाहौरी.


✺ ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवरी कोठून आणले होते?

► मकराना (राजस्थान)


✺ आग्राची मोती मशीद कोणी बांधली?

► शहाजहान


✺ शहाजहानच्या काळात आलेल्या फ्रेंच माणसाचे नाव काय होते?

► फ्रान्सिस बर्नियर आणि टॅव्हर्नियर


✺ शहाजहानच्या दरबारात कोणते संस्कृत विद्वान उपस्थित होते?

► कबींद्र आचार्य सरस्वती आणि जगन्नाथ पंडित


✺ कवी जगन्नाथ पंडित यांनी कशाची रचना केली?

► रसगंगाधर आणि गंगालहरी


✺ उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर कोणी केले?

► दारा शिकोह


✺ उपनिषदांचे पर्शियन भाषांतर कोणत्या नावाने केले गेले?

► सर-ए-अकबर!


✺ लोह आणि रक्ताचे धोरण कोणी पाळले?

► बलबन


✺ तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता?

► घियासुद्दीन तुघलक

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग

 🔻Q. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?


1) न्या रंगनाथ मिश्रा.

2) न्या. H. L. दत्तू

3) न्या. अरविंद सावंत✅✅✅अचूक उत्तर

4) श्री. M. A. सयिद


----------------------------------------------------------


🔻स्पष्टीकरण :-


❤️ महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग :-


📌स्थापना :- 6 मार्च 2001

     ⭐️मानवी अधिकार संरक्षण अधिनियम, 1993 नुसार


📌अध्यक्ष :- उच्च न्यायालयाचे माजी  न्यायाधीश


➡️पहिले अध्यक्ष :- न्या. अरविंद सावंत (2001- 02) 


➡️कार्यरत अध्यक्ष :- कमलकिशोर ताटेड (2022 पासून)


----------------------------------------------------------


❤️ राष्ट्रीय मानव अधिकार आयोग :-


📌 स्थापना  :- 12 ऑक्टोबर 1993

         ⭐️मानवी अधिकार संरक्षण अधिनियम, 1993 नुसार


📌अध्यक्ष :- सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश 


➡️पहिले अध्यक्ष :- न्या. रंगनाथ मिश्रा (1993 - 96) 


➡️कार्यरत अध्यक्ष :- न्या. अरुण कुमार मिश्रा (2021 पासून)


----------------------------------------------------------

📌📌

⚠️Note :- पश्चिम बंगाल राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे पहिले (1995) राज्य ठरले आहे.

चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2024

◆ नवीन शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सवाची सुरुवात वडनगर गुजरात येथून करण्यात येणार आहे.

◆ भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारीची परदेशात निर्यात करणारी सिट्रोन ही पहिली बहुराष्ट्रीय कंपनी ठरली आहे.

◆ भारत आणि सिंगापूर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात AI तंत्रज्ञानावर दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे.

◆ BARTI आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लंडन येथे शास्वत सर्वसमावेशक विकास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या विषयावर अंतरराष्ट्रिय परिषदेचे अयोजन करण्यात आले.

◆ आतापर्यंत एकूण 31 मानवांनी पृथ्वीच्या वातावरणा बाहेर उड्डाण करून अंतराळात प्रवेश केला आहे.

◆ स्वदेशी बनावटीच्या मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल प्रणालीची DRDO ने यशस्वी चाचणी घेतली आहे.

◆ जगातील जर्मनी देशाच्या प्राणी संग्राहलयात जगातील सर्वात वयस्कर गोरिला आहे.

◆ डस्टलिक 2024 युद्ध सराव भारत आणि उझबेकिस्तान या देशात सुरू झाला आहे.

◆ यावर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत Athletics मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना जागतिक अथलेटीक्स महासंघातर्फे 50 हजार अमेरिकन डॉलर बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे.

◆ IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा SRH संघ पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहे.

◆ कॅनडाच्या गार्डनर फाऊंडेशनचा ग्लोबल हेल्थ मधील जॉन डक्स पुरस्कार 2024 डॉ. गगनदीप कांग मिळाला आहे.

◆ देशात आसाम राज्यात 14 ते 20 एप्रिल दरम्यान रोंगाली बिहू उत्सव साजरा करण्यात येतो.

◆ राष्ट्रीय न्यायिक अकादमी च्या प्रमुखपदी अनिरुद्ध बोस यांची निवड करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

IMPORTANT CURRENT #GK



🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश


🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)


🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश


🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ


🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'


🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'


🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ


🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)


🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ


🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)


🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)


🟣12. ♿️ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र


🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)


🟣14.⚡️ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ


🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू


🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता


🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)


🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान


🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)


🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)


🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'  - सांची (मध्य प्रदेश)

लक्षात ठेवा

🔸१) दुर्गाराम मंछाराम यांच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग यांनी १८४४ मध्ये 'मानवधर्म सभा' या सभेची स्थापना केली. कोठे ?

- सुरत


🔹२) दादोबा पांडुरंग यांनी मुंबई येथे 'परमहंस सभे'ची स्थापना केली .... 

- ३१ जुलै, १८४९


🔸३) हिंदुधर्मातील स्त्रियांची दुःस्थिती व विशेषतः विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती यांवर प्रकाश टाकणारी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहिली .... 

- बाबा पद्मनजी


🔹४) सन १८६७ मध्ये मुंबई येथे 'प्रार्थना समाजा'ची स्थापना करण्यात आली. या समाजाच्या स्थापनेचे श्रेय विशेषत्वाने देण्यात येते .... यांना.

- आत्माराम पांडुरंग


🔸५) .... रोजी मुंबईतील कोळीवाडा (मांडवी) येथील समारंभात जोतीराव फुले यांना 'महात्मा' ही पदवी दिली गेली.

- ११ मे, १८८८



🔸१) इ. स. १८४८ मध्ये आपल्या स्वतःच्या घरात मुलींची मुंबईतील पहिली शाळा स्थापन केली ....

- नाना शंकरशेठ


🔹२) मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी जमशेदजी जिजीभाय यांच्याबरोबरच .... यांनीही विशेष प्रयत्न केले होते.

- नाना शंकरशेठ


🔸३) एरवी इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या .... यांनीच वेळप्रसंगी “दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचा कारभार पाहत आहे." अशा शब्दांत ब्रिटिश शासनावर टीका केली. 

- लोकहितवादी


🔹४) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना .... यांनी १८५७ चे भिल्लांचे बंड मोडून काढले.

- दादोबा पांडुरंग


🔸५) स्वधर्मात राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करावयाचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडवून आणावयाचे, असे मानणारा सुधारकांचा एक वर्ग देशात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आपणास ..... यांनी स्थापन केलेल्या 'मानव धर्मसभा' व 'परमहंस सभा' यांचा उल्लेख करावा लागेल.

- दादोबा पांडुरंग


🔸१) पृथ्वीवरील दोन स्थानांमधील रेखावृत्तीय अंशात्मक अंतरास .... मिनिटांनी गुणले असता त्या दोन ठिकाणातील स्थानिक वेळेतील फरक समजू शकतो. 

- चार


🔹२) विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस २३°३०' अक्षवृत्ता पर्यंतच्या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे त्या भागात तापमान जास्त असते. या पट्ट्यास काय म्हणतात? 

- उष्ण पट्टा


🔸३) पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस .... म्हणून ओळखले जाते.

- उपसूर्य स्थिती


🔹४) चमकणाऱ्या विजेमुळे हवेतील काही ऑक्सिजनचे .... वायूत रूपांतर होते..

- ओझोन


🔸५)आपल्या आकाशगंगेचा व्यास किमान .... लाख प्रकाशवर्षे असावा. 

- एक

🔸१) २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी संपातस्थिती निर्माण होते. म्हणून या दोन दिवसांना ..... असे म्हणतात.
- संपातदिन

🔹२) ज्या वेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या स्थितीस .... असे म्हणतात.
- अयनस्थिती

🔸३) २१ मार्च या संपातदिनाला उत्तर गोलार्धात ..... म्हणून ओळखले जाते.
- वसंत संपात 

🔹४) २३ सप्टेंबर या संपातदिनाला उत्तर गोलार्धात .... म्हणून ओळखले जाते. 
- शरद संपात

🔸५) पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ?
- चार मिनिटे

१५ एप्रिल २०२४

महाराष्ट्रातील पंचायतराज


◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

  - स्थानिक स्वराज्य संस्था


◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

  -  2 ऑक्टोबर 1953


◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

  - 16 जानेवारी 1957


◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

  - वसंतराव नाईक समिती


◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

  - 27 जून 1960


◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

  - महसूल मंत्री


◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

  - 226


◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

  - जिल्हा परिषद


◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

   - 1  मे 1962


◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

  -  7 ते 17


◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

  - 5 वर्षे


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

  - पहिल्या सभेपासून


◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

  - तहसीलदार


◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

  - विभागीय आयुक्त


◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - सरपंच


◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - दोन तृतीयांश (2/3)


◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - तीन चतुर्थांश (3/4)


◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - संबंधित विषय समिती सभापती


◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - विभागीय आयुक्त


◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

  -  ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

   - जिल्हा परिषदेचा


◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

  - ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

  -  राज्यशासनाला


◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

   -  विस्तार अधिकारी


◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

  - ग्रामविकास खाते


  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

  - जिल्ह्याचे पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

  -  जिल्हाधिकारी


◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)


◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

  -  जिल्हा परिषद अध्यक्ष


◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

  -  वसंतराव नाईक

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)


प्रश्न.1) महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्राप्त झाले आहे?

उत्तर - सावंतवाडी


प्रश्न.2) कोणता खेळाडू आयपीएल मध्ये ३ हजार धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे?

उत्तर - शुभमन गील


प्रश्न.3) भारतातील कोणत्या जैन अध्यात्मिक गुरू ना अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर - लोकेश मुनी


प्रश्न.4) QS रँकिंग नुसार कोणते विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे?

उत्तर - JNU विद्यापीठ नवी दिल्ली


प्रश्न.5) इटलीत खुल्या स्किफ युरो चॅलेंज नौकायान स्पर्धेत मिश्र गटात मुंबई च्या आनंदी चंदावरकर हिने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर - कांस्य 


प्रश्न.6) लंडन येथील जागतिक पातळीवरील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन २०२४ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर - दारासिंग खुराणा


प्रश्न.7) जागतिक आरोग्य संघटनेच्या हिपॅटायटीस अहवाल २०२४ नुसार रुग्णाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तर - तिसऱ्या


प्रश्न.8) जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक हिपॅटायटीस चे रुग्ण कोणत्या देशात आहेत?

उत्तर -  चीन


प्रश्न.9) पिटर हिग्ज यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

उत्तर - 2013


प्रश्न.10) राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दीन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर -11 एप्रिल


प्रश्न.1) महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर - पुणे 


प्रश्न.2) आयपीएल मध्ये दोन वेळा ५ विकेट घेणारा जसप्रीत बुमराह कितवा गोलंदाज ठरला आहे?

उत्तर - चौथा


प्रश्न.3) महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर - हरेंद्र सिंग


प्रश्न.4) आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड च्या सदस्य पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर - जगजित पवाडिया


प्रश्न.5) आशियाई विकास बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी भारताच्या GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

उत्तर - 7%


प्रश्न.6) हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स नुसार भारत देश कितव्या कितव्या स्थानावर आहे?

उत्तर - तीसऱ्या 


प्रश्न.7) हूरून युनिकॉर्न इंडेक्स २०२४ नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

उत्तर - अमेरीका 


प्रश्न.8) मानवी अंतराळ उड्डाणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर - 12 एप्रिल


प्रश्न – अलीकडेच आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू कोण बनला आहे?

उत्तर - विराट कोहली


प्रश्न – गंगू रामसे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते?

उत्तर - सिनेमॅटोग्राफर


प्रश्न – जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हल 2024 नुकताच कुठे सुरू झाला?

उत्तर - लडाख


प्रश्न – नुकताच जर्मन लोकशाही पुरस्कार कोणाला मिळेल?

उत्तर - युलिया लानाया


प्रश्न – कोणत्या देशाने अलीकडेच आपला रोजगार व्हिसा कार्यक्रम बदलला आहे?

उत्तर - न्यूझीलंड


प्रश्न – अलीकडेच F1 जपानी ग्रां प्री 2024 कोणी जिंकले आहे?

उत्तर - मॅक्स वर्स्टॅपेन


प्रश्न – भारतीय तटरक्षक दलाने अलीकडेच जलचर केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे?

उत्तर - तामिळनाडू


प्रश्न – अलीकडे कोणत्या राज्यातील मिरज शहरात बनवलेल्या सतारला तानपुरा हा GI टॅग मिळाला आहे?

उत्तर - महाराष्ट्र


प्रश्न – नुकताच CRPF शौर्य दिवस कधी साजरा करण्यात आला?

उत्तर – ९ एप्रिल


प्रश्न – IPEF द्वारे नुकतेच क्लीन एनर्जी इन्व्हेस्टर फोरम कोणत्या देशात आयोजित केले जाईल?

उत्तर - सिंगापूर


प्रश्न – नुकतेच कोणत्या शहरात राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे उद्घाटन होणार आहे?

उत्तर - रांची


प्रश्न – वित्त आयोगाचे सदस्य म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर - मनोज पांडा


प्रश्न – भारताने अलीकडेच कोणत्या देशात सिटवे बंदरावर ऑपरेशनल नियंत्रण मिळवले आहे?

उत्तर - म्यानमार


प्रश्न – कोणत्या देशाने अलीकडे रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात केले आहे?

उत्तर - चीन


प्रश्न – अलीकडे कोणत्या देशाचे सैन्य माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू करणार आहे?

उत्तर - नेपाळ


प्रश्न – ECI ने अलीकडे कोणते नवीन ॲप लाँच केले आहे?

उत्तर – सुविधा पोर्टल


प्रश्न – नुकताच मार्च 2024 चा ICC प्लेयर ऑफ द मंथ कोण बनला आहे?

उत्तर - माइया बाउचर आणि कामिंदू मदिन्स


प्रश्न – जागतिक होमिओपॅथी दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला?

उत्तर - 10 एप्रिल


प्रश्न – अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने सुरक्षा आव्हानांचे मूल्यांकन केले आहे आणि दहशतवादावर विचारांची देवाणघेवाण केली आहे?

उत्तर - कझाकस्तान


प्रश्न – अलीकडेच त्याच्या नवीन लोगोचे अनावरण कोणी केले आहे?

उत्तर - CCL


प्रश्न – कोणत्या देशाने अलीकडेच WTO मध्ये तांदूळासाठी शांतता कलम लागू केले आहे?

उत्तर भारत


प्रश्न – अलीकडे हिपॅटायटीसच्या बाबतीत कोणता देश अव्वल आहे?

उत्तर - चीन


प्रश्न – नुकताच नवीन वर्ष उगादी सण कोठे साजरा करण्यात आला?

उत्तर - तेलंगणा आणि आंध्र प्रदेश


प्रश्न – अलीकडेच, कोणत्या मिशनसाठी इस्रो टीमला प्रतिष्ठित जॉन अल हा पुरस्कार देण्यात आला? जॅक स्विगर्ट जूनियरची पुरस्कारासाठी निवड झाली आहे?

उत्तर - चांद्रयान ३


प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन कधी साजरा करण्यात आला?

उत्तर - 12 एप्रिल


प्रश्न – नुकतीच आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डवर कोणाची निवड झाली आहे?

उत्तर - जगजित पावडिया


प्रश्न – अलीकडेच भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव डस्टलिक सुरू होणार आहे?

उत्तर - उझबेकिस्तान


प्रश्न – T20 क्रिकेटमध्ये 7000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा आठवा भारतीय कोण आहे?

उत्तर - सूर्यकुमार यादव


प्रश्न – अलीकडेच नौदल प्रमुखांनी कोणत्या राज्याच्या कारवार नौदल तळावर नवीन सुविधांचे उद्घाटन केले आहे?

उत्तर - कर्नाटक


प्रश्न – भारतीय लष्कराने अलीकडेच रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा सराव कोठे केला आहे?

उत्तर - सिक्कीम


प्रश्न – नुकतेच स्वामी विवेकानंद U20 फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले?

उत्तर - छत्तीसगड


प्रश्न – नुकतीच आशिया कुस्ती स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित केली जात आहे?

उत्तर - किरगिझस्तान

सामान्य ज्ञान (GK) प्रश्नोत्तरे



(1) सौरऊर्जा ___ स्वरुपात असते.

1) प्रकाश प्रारणांच्या

*2) विद्युत चुंबकीय प्रारणांच्या ✅*

3) अल्फा प्रारणांच्या

4) गामा प्रारणांच्या 


----------------------------


(2) बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर _ प्रारणांचा मारा करतात.

1) अल्फा

2) बिटा

3) गॅमा ✅

4) क्ष-किरण 


----------------------------


(3) पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ......... इतकी असते.

1) M

*2) N ✅*

3) A

4) X

----------------------------

(4) जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण.........आहे.

*1) ०.०३% ✅*

2) ०.३%

3) ३%

4) ०.००३%


----------------------------

(5) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरीडोफायटा या सवंहिनी वनस्पती वर्गात येत नाही.

1) फिलीसीनी

*2) मुसी ✅*

3) लायकोपोडियम

4) इक्विसेटीनि 


----------------------------


(6) मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण..........हे विकर त्याच्या जठरात नसते.

1) *सेल्युलेज ✅*

2) पेप्सीन

3) सेल्युलीन

4) सेल्युपेज 

----------------------------


(7) पाण्याची घनता ................ ला उच्चतम असते.

*1) ४℃ ✅*

2) २५℃

3) ०℃

4) ७३℃

----------------------------


*(8) आधुनिक जैवतंत्रज्ञान ............. पातळीवर कार्य करते.*

1) अवअणू

2) अणू

*3) रेणू ✅*

4) पदार्थ 

भारत : स्थान व विस्तार




◼️भारत अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. 


◻️अक्षवृत्तीय स्थान : ८० ४' उत्तर ते ३७० ६' उत्तर अक्षवृत्त


◼️रेखावृत्तीय स्थान : ६८०७' पूर्व ते ९७० २५' पूर्व रेखावृत्त


◻️सर्वांत दक्षिणेकडील टोक : इंदिरा पॉईंट (६०४५' उत्तर अक्षवृत्त)


◼️पूर्व पश्चिम जास्तीत जास्त अंतर : २९३३ किमी 


◻️दक्षिण-उत्तर जास्तीत जास्त अंतर : ३२१४ किमी


◼️क्षेत्रफळ : ३२,८७, २६३ चौरस किमी (जगात सातवा क्रमांक)


◻️भूसीमा लांबी : १५२०० किमी.


◼️सागरी किनारा लांबी : ७,५१७ किमी


◻️सर्वांत उत्तरेकडील स्थान : दफ्तार (जम्मू आणि काश्मीर)


◼️सर्वांत दक्षिणेकडील स्थान : कन्याकुमारी/इंदिरा पॉईंट


◻️सर्वांत पूर्वेकडील स्थान : किबिथू (अरुणाचल प्रदेश)


◼️सर्वांत पश्चिमेकडील स्थान : घुअर मोटा (राजस्थान)


◻️सर्वांत उंच स्थान : के-२ (गॉडवीन ऑस्टिन) (८६११ मी) (काराकोरम रांग)


◼️सर्वांत खोल बिंदू : कुट्टानाद (-२.२ मी) (केरळ)


◻️सागरी सीमा : ६ देशांशी संलग्न


◼️भू सीमा : ७ देशांशी संलग्न


सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त


◾️भारतातील पहिले 100% साक्षर राज्य :- केरळ

◾️भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य :- सिक्कीम

◾️प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य :- त्रिपुरा

◾️जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य :- आंध्र प्रदेश

◾️मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य :- पश्चिम बंगाल

◾️लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य :- उत्तराखड

◾️देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य :- दिल्ली

◾️जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य :- राजस्थान

◾️भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य :- हिमाचल प्रदेश

◾️भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य :- दिल्ली

◾️भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य :- प. बंगाल

◾️मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य :- सिक्किम

◾️GST विधेयकास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य :- आसाम

◾️राज्य GST कायद्यास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य :- तेलंगणा

◾️'आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

◾️भारतातील पहिले धुम्रपानमुक्त राज्य :- सिक्किम

◾️निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य :- पंजाब

◾️सौर ऊर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरू करणारे पहिले राज्य :- केरळ

◾️कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

◾️बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य :- हरियाणा

◾️पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य :- राजस्थान

◾️मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य :- पंजाब

◾️सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य :- मध्य प्रदेश

◾️ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य :- दिल्ली

◾️ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य :- दिल्ली

◾️ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य :- आंध्र प्रदेश

◾️भारतातील पहिले ई-न्यायालय :- हैद्राबाद उच्च न्यायालय

◾️ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य :- गुजरात

◾️जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :-मेघालय

◾️पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य :- तेलंगणा

◾️भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य :- दिल्ली

◾️होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य :- राजस्थान

◾️स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे राज्य :- महाराष्ट्र

......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ...

 ◾️"चंद्रयान प्रकल्प 4 "- ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी खुलासा केला आहे 2040 पर्यत ISRO चंद्रावर अंतराळवीर उतरवणार आहे


पृथ्वीच्या कक्षेबाहेर इस्रोच्या पाच मोहीम👇👇

1] 'चांद्रयान-1' :- 22 ऑक्टोबर 2008

2] 'मंगळयान' :- 05 नोव्हेंबर 2013

3] 'चांद्रयान-2' :- 22 जुलै 2019

4] 'चांद्रयान-3' :- 14 जुलै 2023

5] 'आदित्य एल-1' :- 02 सप्टेंबर 2023


◾️फ्रेंच ऑटोमेकर Citroën ही भारतात उत्पादित इलेक्ट्रिक वाहने (EVs) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कार उत्पादक बनली आहे.

⭐️Citroën ही इंडोनेशिया ला 500 EV गाड्या देणार आहे


◾️जागतिक होमिओपॅथी दिवस 10 एप्रिल, 2024


◾️Tata Advanced Systems Ltd (TASL ) ने सॅटेलॉजिकच्या सहकार्याने, भारताचा खाजगी क्षेत्रातील निर्मित सब-मीटर रिझोल्यूशन पृथ्वी निरीक्षण उपग्रह, TSAT-1A चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे

⭐️7 एप्रिल रोजी इलॉन मस्कच्या स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटवर केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून TSAT-1A चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले


◾️QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रैंकिंग 2024

⭐️ IIT बॉम्बे अभियांत्रिकीमध्ये जागतिक स्तरावर 45 व्या क्रमांकावर आहे


◾️सुश्री जगजीत पावडिया यांची न्यूयॉर्क येथे झालेल्या निवडणुकीत 2025-2030 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळावर निवड झाली आहे


◾️आशियाई विकास बँकेने FY25 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज पूर्वीच्या 6.7% वरून 7% पर्यंत वाढवला आहे.

⭐️FY26 साठी, ने ते 7.2% वर्तवला आहे


◾️आशियाई विकास बँक /Asian Development Bank 


⭐️मुख्यालयः मांडलुयोंग, फिलीपिन्स

⭐️स्थापनाः 19 डिसेंबर 1966

⭐️अध्यक्षः मासात्सुगु असाकावा


◾️15 वा वित्त आयोग या

⭐️अध्यक्ष - NK सिंग आहेत

⭐️स्थपणा - नोव्हेंबर 2017 


◾️16 व्या वित्त आयोग

⭐️अध्यक्ष - अरविंद पंगरियार

⭐️स्थपणा - 31 डिसेंबर 2023


◾️दरवर्षी 9 एप्रिल रोजी

 CRPF दिवस

 साजरा केला जातो


◾️झिम्बाब्वे देशाने स्वतःचा नवीन चलन ZiG (जीग ) लॉन्च केली


◾️शक्ती महोत्सव 

⭐️संगीत अकादमी शक्ती महोत्सवाचे आयोजन करनार आहे 9 ते 17 एप्रिल दरम्यात 

⭐️हयात संगीत आणि नृत्य होईल

⭐️याचे आयोजन देशातील 7 शक्तीपीठांच्या मध्ये होणार आहे


◾️देशातील 7 शक्तिपीठे मध्ये शक्ती महोत्सवाचे आयोजन  

⭐️गुवाहाटी चे कामाख्या मंदिर (आसम) 

⭐️कोल्हापुर चे महालक्ष्मी मंदिर (महाराष्ट्र) 

⭐️कांगड़ा चे ज्वालामुखी मंदिर (हिमाचल प्रदेश)

⭐️उदयपुर चे त्रिपुरी सुंदरी मंदिर (त्रिपुरा) 

⭐️बनासकंठा चे अंबाजी मंदिर (गुजरात) 

⭐️देवघर चे जय दुर्गा शक्ती पीठ (झारखंड)

⭐️उज्जैन चे  हरसिद्धि मंदिर (मध्य प्रदेश)


◾️30 मार्च ला राजयस्थान स्थपणेला 75 वर्षे पूर्ण

⭐️1949 मध्ये स्थापना


◾️हुरुन ग्लोबल यूनिकॉर्न इंडेक्स 2024 रिपोर्ट

⭐️यूनिकॉर्न स्टार्टअप मध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो 

🔥अमेरीका - पहिला ( 703 स्टार्टअप )

🔥चीन - दुसरा ( 340 स्टार्टअप )

🔥भारत - तिसरा ( 67 स्टार्टअप )

यात 68 होते Byjus कमी झालं एक - बायजूस जगात सर्वात जास्त वैल्यू डिस्ट्रॉयर स्टार्टप बनले


भारतातील सर्वोत्तम मूल्यवान युनिकॉर्न

⭐️स्वीगी  - 8 Billion $

⭐️ड्रीम 11 - 8 Billion $

⭐️रेझर पे - 7.5 Billion $


🔥स्विगी आणि ड्रीम11 जगात 83 वा क्रमांक आहे 

🔥रेझर पे चा जगात 93 वा क्रमांक आहे


◾️ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते' अंतर्गत 1064 जणांची सुटका.

⭐️ऑपरेशन नन्हे फरिश्ते' रेल्वे कडून राबवले जाते

⭐️ऑपरेशन नान्हे फरिश्तेचा उद्देश विविध कारणांमुळे हरवलेल्या किंवा त्यांच्या कुटुंबापासून विभक्त झालेल्या मुलांना पुन्हा जोडणे हा आहे.


◾️आइसलँडने नवीन पंतप्रधान म्हणून बजार्नी बेनेडिक्ट्सन निवड

⭐️कॅटरिन जेकोब्सडोटीर यांच्या जागी त्यांची निवड
⭐️जानेवारी ते नोव्हेंबर 2017 या 10 महिन्यासाठी सरकारमध्ये पंतप्रधान होते.
⭐️बेनेडिक्ट्सन यांनी जेकोब्सडोटीरच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणूनही काम केले आहे

◾️आइसलँड देशाबद्दल माहिती
⭐️उत्तर अटलांटिक महासागरात स्थित बेट देश 
⭐️उत्तर अमेरिका आणि युरोपमधील  भौगोलिक सीमेवर असलेला देश
⭐️राजधानी, रेकजाविक (“बे ऑफ स्मोक्स”),
⭐️लोकसंख्या: 317,000
⭐️क्षेत्रः 39,769 चौरस मैल (103,001 चौरस किलोमीटर)

◾️वरिष्ठ आयपीएस अधिकारी अनुराग कुमार यांची सीबीआयच्या सहसंचालकपदी नियुक्ती

⭐️2004 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत
⭐️सध्या पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो (BPR&D) मध्ये कार्यरत आहेत.
⭐️आसाम-मेघालय केडरचे अधिकारी आहेत
⭐️CBI स्थापना: 1 एप्रिल 1963
⭐️CBI मुख्यालय: नवी दिल्ली.
➡️CBI चे सध्याचे संचालक प्रवीण सूद आहेत

◾️US-INDIA टॅक्स फोरमच्या अध्यक्षपदी तरुण बजाज यांची नियुक्ती
⭐️यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम (USISPF) ने त्यांची नेमणूक केली
⭐️ते माजी महसूल सचिव आणि माजी आर्थिक व्यवहार सचिव आहेत
⭐️बजाज हे 1988 च्या बॅचचे हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी

◾️Tax Forum म्हणजे
⭐️Tax forum म्हणजे दोन्ही देशतील व्यवहारादरम्यान Tax धोरणे ठरवणे
⭐️टॅक्स फोरम 25 फेब्रुवारी 2020 रोजी अधिकृतपणे सुरू
⭐️US-INDIA टॅक्स फोरममध्ये सुमारे 350 सदस्य कंपन्या आहेत

◾️ T20 मध्ये 500 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय बनला आहे
⭐️वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान, टी-20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारण्याचा टप्पा गाठला. 
⭐️T20 क्रिकेट सामन्यात 500 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारे फलंदाज
🏏1056 - ख्रिस गेल
🏏860 - किरॉन पोलार्ड
🏏678 - आंद्रे रसेल
🏏548 - कॉलिन मुनरो
🏏500* - रोहित शर्मा

◾️नायजेरिया मेनिंजायटीसवर (मेंदुज्वर) लस आणणारा पहिला देश बनला आहे
⭐️लाशीचे नाव : Men5CV/MenFive
⭐️नायजेरिया हा आफ्रिकेतील 26 देशांपैकी एक आहे ज्यात मेंदुज्वराचे प्रमाण जास्त आह.



खाडी नदी जिल्हा

 खाडी      नदी       जिल्हा 

━━━━━━━━━━━━━━━━━━━

▪️दातीवार ➖ तानसा वैतरणा =पालघर

▪️वसई ➖ उल्हास =पालघर

▪️ठाणे ➖ उल्हास=ठाणे


▪️मनोरी ➖ दहिसर=मुंबई

▪️मालाड / मोर्वे ➖ अशिवरा=मुंबई उपनगर

▪️माहीम ➖ मिठी=मुंबई उपनगर


▪️पनवेल ➖ पाताळगंगा=रायगड

▪️धरमतर ➖अंबा=रायगड

▪️राजपुरी ➖ काळ =रायगड


▪️बाणकोट ➖ सावित्री =रायगड/रत्नागिरी

▪️केळशी ➖ भरजा=रत्नागिरी

▪️दाभोळ ➖ विशिस्टी=रत्नागिरी


▪️जयगड ➖ शास्त्री=रत्नागिरी

▪️भाट्ये ➖काजळी =रत्नागिरी

▪️पूर्णगड ➖ मुचकुंदी= रत्नागिरी


▪️जैतापूर ➖ काजवी =रत्नागिरी

▪️विजयदुर्ग ➖ शुक=रत्नागिरी/सिंधुदुर्ग

▪️देवगड ➖ देवगड=सिंधुदुर्ग


▪️आचरा ➖ आचरा=सिंधुदूर्ग 

▪️कालावली ➖गड =सिंधुदुर्ग

▪️कर्ली ➖ कर्ली=सिंधुदुर्ग

जाणून घ्या बाबासाहेबांविषयीच्या दहा विशेष गोष्टी


#History 


१. प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या : 


डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.


२. आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ : 


Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957).


३. डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे : 


मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).



४. महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने : 


महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.


५. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/संघटना :


बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल (१९२७), स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६), शेड्युल कास्ट फेडरेशन (१९४२), पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५), भारतीय बौद्ध महासभा (१९५५).



६. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा : 


‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’.

‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’

‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’

‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’

‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’


७. बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार / सन्मान : 


१९५५ मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान, १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.


८. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :


चित्रकार : बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती.

पत्रकार : ‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते.

राजकारणी : बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.

अर्थतज्ज्ञ : ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.

तत्वज्ञ : स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.


९. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल फारशा चर्चिल्या न गेलेल्या गोष्टी : 


दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती., ‘दामोदर नदी खोरे’ आणि ‘सोने नदी खोरे’ प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या ‘हिराकुड धरण’ प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता. ‘जय भीम’ या घोषणेनंतर देशात ‘जय हिंद’ ही घोषणा सुरु झाली.


१०. बाबासाहेबांचे लेखन : 


भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. विशेष म्हणेज त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.

महात्मा गांधी


- जन्म: 2 ऑक्टोबर 1869, मृत्यू: 30 जानेवारी 1948 

- 1893 ते 1915 दक्षिण आफ्रिकेत (21 वर्षे) 

- 9 जानेवारी 1915 वयाच्या 45 व्या वर्षी गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात (बाॅम्बे) आगमन. याचवर्षी अहमदाबाद येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना 

- गांधी युग 1917 ते 1947 

- 9 जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस 

- 2 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन 

 

● चंपारण्य सत्याग्रह (बिहार) 1917 

- बिहारमधील निळ उत्पादक शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी 

 - टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. 

- पहिला सविनय कायदेभंग  

- स्थानिक नेता राजकुमार शुक्ल 

 

● अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा (गुजरात) 1918 

 

- पहिले उपोषण / भूक हरताळ 

- कापड गिरणी मालकांविरोधात 

 

● खेडा सत्याग्रह (गुजरात) 1918 

 

- पहिले असहकार आंदोलन 

- सरकारविरोधी  

 

● रौलट सत्याग्रह 1919 

 

- नागरी स्वातंत्र्यावर गदा आणत असलेल्या रौलट कायद्याविरोधात 

- पहिले जन आंदोलन (Mass Strike) 

 

- जालियनवाला बाग हत्याकांडाच्या (13 एप्रिल 1919) निषेध म्हणून गांधींनी कैसर - ए- हिंद ही पदवी परत केली.  

- 1919 मध्ये दिल्लीत ऑल इंडिया खिलाफत समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून गांधीजींची निवड  

 

● असहकार चळवळ  

 

- जून 1920 अलाहाबादमध्ये खिलाफत समितीत हा ठराव पास झाला 

- काँग्रेसचे कोलकत्ता अधिवेशन ( सप्टेंबर 1920) आराखडा मंजूर 

- काँग्रेसचे नागपूर अधिवेशन (डिसेंबर 1920) काँग्रेसची मान्यता  

- चौरीचौरा घटना (16 एप्रिल 1922) असहकार चळवळ स्थगित  

 

- 1924 बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद गांधींकडे (पहिले आणि एकमेव) 

- 1930 तत्कालीन व्हाईसराॅय लाॅर्ड इर्विनकडे गांधीजींनी 11 मुद्द्यांची मागणी केली.  

 

 

● दांडी यात्रा 

 

- मिठाचा कायदा मोडण्यासाठी 

- 79 अनुयायांची पहिली तुकडी, 14 महाराष्ट्रायीन नेत्यांचा समावेश  

- 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दांडीयात्रा, अंतर 240 मैल 

- 6 एप्रिल 1930 मिठाचा कायदा मोडला 

 

● गांधी इर्विन करार 1931 

- दुसर्या गोलमेज परिषदेला गांधी उपस्थित राहणार 

- संविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली 

- काँग्रेसच्या कराची अधिवेशनात या कराराला समर्थन मिळाले. 

- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. 

- 1931 संविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू ही चळवळ पुन्हा 1934 मध्ये मागे घेण्यात आली. 

 

● पुणे करार 1931 

- रॅम्से मॅकडाॅनल्डच्या जातीय निवड्याला विरोध म्हणून पुण्याच्या येरवडा कारागृहात गांधींचे आमरण उपोषण 

- यावरूनच गांधी आणि आंबेडकर यांच्यात 24 सप्टेंबर 1932 ला हा करार झाला 

- दलितांची स्वतंत्र मतदार संघाची तरतूद रद्द केली.  

 

● वैयक्तिक सत्याग्रह 

 

- 1933 मध्ये सुरूवात 

- 14 व 16 सप्टेंबर 1940 काँग्रेसच्या मुंबई बैठकीत घोषणा 

- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. 

- 13 ऑक्टोबर 1940 वर्धा येथे विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही  

- पंडित नेहरू दुसरे वैयक्तिक सत्याग्रही 

 

● चले जाव 

 

- काँग्रेसचे मुंबई अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर 

- महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाल्यामुळे भूमीगत स्वरूप प्राप्त 

- सी. राजगोपालचारी सूत्र (CR Formula): गांधी आणि जिनांची मिटिंग

चालू घडामोडी :- 14 एप्रिल 2024

◆ उद्योगपती आणि पायलट गोपी थोताकुरा हे पहिले भारतीय अवकाश पर्यटक ठरणार आहेत.

◆ विंग कमांडर राकेश शर्मा हे 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय होते.

◆ उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी प्रा. रमण मित्तल आणि डॉ. सीमा सिंग यांच्या ‘द लॉ अँड स्पिरिच्युॲलिटी: रिकनेक्टिंग द बॉण्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.

◆ 2024 मध्ये जालियावाला बाग हत्याकांडाला 105 वर्षे पूर्ण होत आहेत.

◆ अदानी ग्रीन एनर्जी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क तयार करणार आहे.

◆ जगजीत पावडिया यांची आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा निवड झाली आहे.

◆ न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांची राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ मध्य प्रदेशातील पारंपारिक गोंड पेंटिंगला जीआय टॅग दर्जा मिळाला आहे.

◆ ‘सच्चिदानंद मोहंती’ यांची विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ कन्नड भाषेतील प्रसिद्ध लेखिका ममता जी.  सागर यांना जागतिक साहित्य संस्थेने (WOW) ‘आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ प्रदान केला आहे.

◆ हैदराबादची मूळ भारतीय-अमेरिकन अभिनेत्री अवंतिका वंदनापू हिला हार्वर्ड विद्यापीठाने “दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर” पुरस्कार आणि पदवीने सन्मानित केले आहे.

◆ राष्ट्रपती ज्युलियस माडा बायो(सिएरा लिओन) यांनी झोम्बी ड्रग संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.

◆ डॉ. गगनदीप कांग यांना प्रतिष्ठित जॉन डर्क्स ग्लोबल हेल्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[कॅनडाचे गार्डनर फाउंडेशन हा पुरस्कार प्रदान करते.]

◆ सर्वाधिक मतदान केंद्र असणारे मतदारसंघ/ जिल्हा पुणे(8382) आहे.

◆ सर्वात कमी मतदान केंद्र असणारे मतदारसंघ/ जिल्हा सिंधुदुर्ग(918) आहे.

◆ जगातील सर्वाधिक 407 मीटर लांबीचा SkyWalk प्रकल्प अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा येथे तयार होत आहे.

◆ T20 क्रिकेट मध्ये 500 सिक्स मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

RPF चे उल्लेखनीय ऑपरेशन्स

1] ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते' :-  मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयातून 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्‍थानके, फलाटावरील 1064 मुलांची सुटका करण्‍यात आली आहे.

2] मेरी सहेली पथके :- रेल्वेतील महिला प्रवाशांना, विशेषतः एकट्या प्रवास करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने मेरी सहेली पथके तैनात करण्यात आली आहेत.

3] ऑपरेशन मातृशक्ती :- ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत, महिला आरपीएफ जवानांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रसूती झालेल्या गर्भवती महिलांना मदत केली.

4] मिशन जीवन रक्षा :- मिशन जीवन रक्षा अंतर्गत, आरपीएफ जवानांनी रेल्वेचा अपघात किंवा रेल्वे-खाली आत्महत्त्या करण्यापासून अनेक जणांचे प्राण वाचवले.

5] ऑपरेशन महिला सुरक्षा :- महिला आणि मुलींना मानवी तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या जाळ्यात अडकण्यापासून 150 जणांना रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ऑपरेशन महिला सुरक्षा अंतर्गत वाचवले होते.

Note :- ‘मेरी सहेली' नावाचा कार्यक्रमही रेल्वेकडून राबविण्यात येत आहे.

पंचतीर्थ

पंचतीर्थ (Panchteerth)

- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील पाच महत्त्वाच्या स्थळांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देणारा हा उपक्रम.
- 2014 - 2015 मध्ये घोषित केलेल्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत 15 सर्किट घोषित करण्यात आली आहेत, त्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सर्किट अंतर्गत या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे.

1⃣ जन्मभूमी

- महू (मध्य प्रदेश) येथे 14 एप्रिल 1891 रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.
- 2019 मध्ये महू रेल्वे स्थानकाचे नाव बदलून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असा केले.

2⃣ दीक्षाभूमी

- नागपूर (महाराष्ट्र) येथे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
- 2014 मध्ये या ठिकाणाला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला.

3⃣ शिक्षण भूमी

- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी लंडन येथे असताना 10, किंग हेन्री मार्ग येथे राहिले होते.
- महाराष्ट्र सरकारने ही जागा खरेदी केली आणि 14 नोव्हेंबर 2015 रोजी नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.

4⃣ महापरिनिर्वाण भूमी

- दिल्लीत 26, अलीपूर रोड याठिकाणी बाबासाहेबांचे निवासस्थान होतो. येथेच त्यांचे निधन झाले.
- या घराचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचा निर्णय 2 डिसेंबर 2003 रोजी झाला.
- स्मारकाचे 21 मार्च 2016 रोजी भूमीपूजन तर 13 एप्रिल 2018 रोजी मोदींच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले.

5⃣ चैत्यभूमी

- दादर, मुंबई (महाराष्ट्र) येथे बाबासाहेबांची समाधी आहे.
- येथे (इंदू मिल) भव्य स्मारक नियोजित आहे, त्याचे 2015 मध्ये भूमीपूजन झाले आहे.

१२ एप्रिल २०२४

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था



🔹 जमीनदारांची संघटना


१८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला. ज्या इंग्रजांना भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती. त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली होती. तसेच इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशीही सहकार्य करण्यात आले.


"इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल' १८५१ मध्ये डॉ. राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादिकांनी स्थापली. तिचे कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचे पुनरुज्जीवन इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले.


🔺 बरिटिश इंडियन असोसिएशन


०१. या संस्थेची स्थापना १८५१ मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार यांचाही समावेश या संघटनेत झाला. या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते. मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.


🔸ईस्ट इंंडिया असोसिएशन


१८६५ साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी 'लंडन इंडियन सोसायटी'ची स्थापना केली. एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर 'ईस्ट इंडिया असोसिएशन' मध्ये झाले. ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. या संस्थेत सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते. मुबई, मद्रास, कलकत्ता येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. त्या १८८४ पर्यत जोमाने कार्य करीत होत्या. पुढे ब्रिटिशांची सहानूभूती कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.


🔷* पुणे सार्वजनिक सभा


०१. न्यायमूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुण्यात १८७० साली सार्वजनिक सभेची स्थापना केली. १८७१ मध्ये न्या. रानडे यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयने १८७७ च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला भारताची साम्राज्ञी अशी पदवी अर्पण केली.


०२. या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र समर्पण केले. मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या. तसेच या निमित्ताने जमलेल्या सर्व प्रांतातील लोकप्रतिनिधीपूढे व राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची कल्पना सुचविली.


🔹* मद्रास महाजन सभा


मद्रासमध्ये १८८४ साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी माहजन सभा नावाची संस्था केली होती. स्थानिक संस्थांच्या जानेवारी १८८५ मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली होती.


🔷* इंडियन असोसिएशन


०१. २६ जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 'इंडियन असोसिएशन' नावाची संस्था स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.


०२. या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या.


🔸* इंडियन नॅशनल युनियन


१८८४ च्या शेवटी 'इंडियन नॅशनल युनियनची' स्थापना हयूम यांनी केली. भारताचे संघटन करणे. नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने भारताचा विकास साधणे. सरकार व जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.


२६ ऑगस्ट १८५२ रोजी बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी इत्यादिकांनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले. तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये ३१ जून १८८५ साली झाले. या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप १८८५ साली आले.

'पृथ्वीचे अंतरंग'

🎆 'पृथ्वीचे अंतरंग' या भूगोलाच्या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मध्ये किमान २ प्रश्न विचारले जातात. पृथ्वीच्या आंतरांगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते. म्हणून पृथ्वीच्या आंतरांगाचा अभ्यास महत्वाचा ठरतो.


🎆 पथ्वीच्या अंतरंगाचे गूढ अजूनही मानवास उलगडलेले नाही. पृथ्वीच्या आंतरांगाच्या अभ्यासात प्रमुख दोन अडचणी आहेत. 


🎆 पष्ठभागावरील खडक हा कठीण व अपारदर्शक आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वृद्धी होत जाते. साधारणपणे ३० मी खोलीवर 1°C तापमान वाढत जाते.


🎆 अतरंगाची माहिती मिळवण्यासाठी भूकंपशास्त्राची मदत होते.


🎆 भकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. जेव्हा भूकंप होतो तेव्हा सेस्मॉमीटरवर तीन प्रकारच्या लहरींची नोंद होते.


प्राथमिक लहरी (P Waves)

दुय्यम लहरी (S Waves)

पृष्ठीय लहरी (L Waves)

या लहरींच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती भूगर्भशास्त्रज्ञांना मिळते.


✅ पराथमिक लहरींची वैशिष्ट्ये:

🎆 भकंप यंत्रावर या लहरींची नोंद सर्वप्रथम होते, याचा आर्थ या लहरींचा वेग सर्वात जास्त असतो.

🎆 पराथमिक लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल ही पुढे-मागे होते. प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बऱ्याच खोलपर्यंत प्रवास करतात. 

🎆 पराथमिक लहरी या घन तसेच द्रव माध्यमातून प्रवास करतात. परंतु मध्यम बदलले की या लहरी वाक्रीभूत होतात.


✅ दय्यम लहरींची वैशिष्ट्ये:

🎆 पराथमिक लहारीनंतर या लहरींची नोंद होते. प्राथमिक लहरींपेक्षा वेग कमी.वस्तूकणांची हालचाल लहरींच्या काटकोनामध्ये होते. पृष्ठभागापासून २८८०km पर्यंतच प्रवास करतात. 

🎆 दय्यम लहरी फक्त घन माध्यमातूनच प्रवास करतात. माध्यम बदलले की या लहरी परावर्तीत होतात.


✅ पष्ठीय लहरींची वैशिष्ट्ये:

🎆 पथ्वीच्या कवचामध्येच या लहरी प्रवास करतात. या लहरींचा वेग कमी असतो. या लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल विविध दिशांनी होते. या लहरी अतिशय विध्वंसख असतात. पृथ्वीच्या आंतरांगासंबंधी निष्कर्ष

🎆 पथ्वीचा केंद्रभाग द्रवरूप:- पृथ्वीचे अंतरंग पूर्णतः घनरूप असते तर 'P' व 'S' लहरी गाभ्यातून आरपार गेल्या असत्या व भूकंप झालेल्या ठिकाणच्या विरुद्ध बाजूसदेखील भूकंपाची नोंद झाली असती. परंतु भूकंप लहरींच्या निरीक्षणावरून असे आढळते की, विरुद्ध बाजूस फक्त 'P' लहरींची नोंद होते. 'S' लहरी फक्त घन भागातून प्रवास करतात. यावरून केंद्रभाग द्रवरूप असावा असा निष्कर्ष काढता येतो.

🎆 भगर्भातील गाभ्याचा व्यास ६९४२ km :- भूकंपाच्या उगमस्थानापासून १०३° चा कोण करून लहरी वळतात. १०३° ते १४२° प्रदेशात P व S लहरींची नोंद होत नाही; यामुळे या प्रदेशाला भूकंप छाया प्रदेश असे म्हणतात. यावरून भूगार्भाच्या गाभ्याचा व्यास ६९४२ km आहे असे निश्चित झाले.

🎆 बाह्यर्गाभा द्रवरूप:- गाभ्याच्या बाह्य अवरनाजवळ 'P' लहरींचा वेग एकदम कमी होतो. या गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप आहे असा निष्कर्ष काढता येतो.

🎆 कठीण घन पदार्थाचा आंतर्गाभा:- अंतर्गाभ्यात 'P' लहरींचा वेग वाढतो. यावरून असे अनुमान काढले जाते की, कठीण अशा घन पदार्थाचा आंतर्गाभा बनला असावा. कठीण घन पदार्थाचे प्रावरण:- 'P' व 'S' लहरींचा वेग प्रवारानातून प्रवास करताना इतका प्रचंड असतो की, अशा लहरी फक्त अति कठीण व घन पदार्थातूनच प्रवास करतात.

भिल्लांचे उठाव



०१. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी खानदेश ताब्यात घेतला. भिल्लांची वस्ती विशेषतः याच भागात असल्याने भिल्लांच्या मनात इंग्रजाबद्द्ल द्वेष निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्रिंबकजी डेंगळे, भिल्ल नाईक, दसरत व धानजी, हरिया (हिरा), निहाल, सेवाराम सोनार (घिसाडी), भागोजी नाईक, खर्जासिंग, भीमा नाईक, उचेतसिंग पवार यांनी या उठावाचे नेतृत्व केले.


०२. त्रिंबकजी ढेंगळे हा दुसऱ्या बाजीरावचा मित्र व मराठा सरदार होता. दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर डेंगळेला ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथून तो पळाला व त्याने भिल्लांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास चिथविले. त्याने उठावाची सूत्रे त्याचे पुतणे गोदाजी व महिपा डेंगळे यांच्यावर सोपविली. तत्कालीन कलेक्टर कॅप्टन ब्रिग्जने उठावाचा बंदोबस्त करण्यासाठी भिल्लांचे मुडदे पाडले व डोंगरातील वाटघाटांवर सैन्य ठेऊन त्यांची रसद बंद केली.


०३. पण याउलट मुंबईचा गवर्नर माउंट एल्फिन्सटन याने मात्र भिल्लांना पेन्शन व काम देऊन त्यांचा बंदोबस्त केला.त्यांची वेगळी तुकडी उभारून आडमाळावर त्यांना तैनात केले. नादीरसिंह या भिल्ल डाकुस त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच पकडण्यात आले.


०४. नोकऱ्या देऊनही भिल्ल थंड झाले नाहीत. त्यांनी उठाव सुरूच ठेवला. इंग्रजांनी भिल्लांच्या बंदोबस्तासाठी त्यांना माफी देण्याची घोषणा केली. यावेळी भिल्लाचे नेतृत्व सातमाळ्याचा भिल्ल नाईक करत होता. कॅप्टन ब्रिग्ज ने भिल्ल नाईकास पकडून त्याला फाशी दिली यासोबत शेख सादुल्ला यास कठोर शिक्षा केली.


०५. डसरत व धानजी हे लासूरच्या भिल्लांचे प्रमुख होते. त्यांनी १८२० मध्ये विशेषतः सातपुडा प्रदेशात गावे व घरे बेचिराख करण्याचे सत्र चालविले. त्यांच्या टोळीत शेख दुल्ला हा पेंढारी सामील झाला. मेजर मोरीन याने १०० मैलांवरील महत्वाच्या जागा जिंकल्याने दक्षिण भिल्लांच्या प्रमुखाना शरणागती पत्करावी लागली.


०६. १८२२ मध्ये सातमाळ्याचा हरिया व सातपुड्याचा निहाल भिल्ल यांनी भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व केले. यांच्या काळात अंदाधुंदी, बलात्कार व शोषणास मर्यादा राहिल्या नाहीत. यावेळी कॅप्टन रॉबिन्सन याने भिल्लांना यशस्वीरित्या दडपले.


०७. १८२५ मध्ये सेवाराम सोनारच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. यावेळी राजकीय नेत्यांनीसुद्धा याला पाठींबा दिला. सेवारामने साताराच्या राजाच्या नावाने बनावट पत्रे तयार केली व ती राजाच्या आदेशानुसार बागलान तालुक्यातील भिल्लांना वाटली. ही पत्रे भिल्लांनी उठाव करण्यासंदर्भातील होती.


०८. त्यानुसार भिल्लांनी लुटालूट केली. त्यांनी उतारपूरवर हल्ला केला व तेथील लुट मुरली महाल या किल्ल्यात ठेवली. लेफ्टनंट औट्रम याने यातील काही लुट परत मिळविली व सेवाराम व त्याच्या सहकाऱ्यांना पकडले. सेवारामबाबत औट्रम ने मवाळ भूमिका घेतली व भिल्लांच्या जमिनी परत दिल्या.


०९. १८२८ पर्यंत भिल्लांचे उठाव कमी झाले पण संपले नव्हते. पानिपतच्या लढाईत मरण पावलेल्या पवारांचा पणतू उचेतसिंग पवार याने धारच्या पवारांकडून गादी मिळविण्यासाठी भिल्लांना सोबत घेऊन दोन वेळा हल्ला केला होता. दोन्ही वेळेस तो पराभूत झाला.


१०. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात भिल्ल लोकांनी कोनारराव याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध बंड केले. पण सुसूत्रता नसल्याने इंग्रजांना बंड दडपून टाकणे सोपे ठरले.


११. काजरसिंग नाईक याने १८७५ च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले. तो पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता. त्याने ब्रिटीशांचा ७ लाखाचा खजिना लुटला. १८५७ च्या अंबापाणी लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई झाली. यात स्रियांचाही सहभाग होता.

नचिकेत मोर समिती.

स्थापना - Sept 2013 - RBI ने स्थापन केलेली.

अहवाल - 2014


लघुव्यवसाय व कमी उत्पन्न कुटुंबांनी एकात्मिक वित्तीय सेवा समिती.


शिफारशी -

A) प्रत्येक प्रौढ भारतीय 1 jan 2016 अखेर बँक खातेदार झाला पाहिजे .

B) आधार क्रमांक देतानाच त्या नागरिकांचे बँकेत खाते उघडण्यात यावे.

C) वैधानिक तरलता प्रमाण (SLR) रद्द करून रोख राखीव प्रमाण (,CLR)  कमी करावे.

D) अग्रक्रम क्षेत्र 40% ऐवजी 50% कर्जाची अट असावी.

E) देय बँका स्थापन ( payment Bank) कराव्या.

F) राज्य वित्त नियमन आयोगाची स्थापना करावी.

पोलीस भरतीसाठी येणारे भारतीय राज्यघटना मधील प्रश्नसंच

Q. भारताने राज्यघटना स्वीकार ........ रोजी केली

२६ नोव्हेंबर १९४९.


Q. भारतीय राज्य-घटना कधी अमलात आली ?

२६ जानेवारी १९५०.


Q. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

डॉ.राजेंद्रप्रसाद.


Q. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी......घटना  आहे ?

लिखित.


Q. भारतीय राज्यघटना तयार  करण्यास किती कालावधी लागला ?

०२ वर्षे ११ महीने १८ दिवस.


Q. भारतीय संविधान हे ....... आहे

अंशता संघात्मक व अंशता एकात्मक.


Q. भारतात नागरिकत्व कोणत्या पद्धतीचे आहे ?

एकेरी.


Q. भारताने संसदीय शासन पद्धती  कोणत्या देशातून स्वीकारली आहे ?

इंग्लंड.


Q. संघराज्य पद्धत कोणत्या देशातून स्वीकारली आहे ?

अमेरिका.


Q. मूळ भारतीय घटनेत मूळ किती मूलभूत अधिकार होते ?

०७.


Q. ४४व्या घटनादरूुस्ती नुसार हा  मूलभूत अधिकार रद्द झाला ?

संपत्तीचा


Q. ४२व्या घटना दरुस्तीत कोणते शब्द उद्देशपत्रिकेत जोडले गेले ?

समाजवादी , धर्मनिरपेक्ष,अखंडता.


Q. मूलभूत अधिकारांशी संबंंधीत कलमे कोणती ?

कलम १२ ते ३५.


Q. संसदेशी समंधित कलम कोणते ?

कलम ७९ ते १२२.


Q. राज्यसभेत सर्वात जास्त प्रतींनिधी कोणत्या राज्यांचे असतात ?

उत्तर प्रदेश.


Q. घटने नुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती ?

२५०.


Q. संसदेच्या दोन अधिवेशना मधील कालावधी जास्तीत जास्त ----एवढा असावा ?

सहा महिने.


Q. राज्य मंत्रिमंडळ संयुक्तपणे कोणाला जबाबदार असते ?

विधानसभा.


Q. संसदेच्या दोन्ही सभागहृाचे निर्वाचित सदस्य कोणाची निवड करतात ?

उपराष्ट्रपती.


Q. राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पुर्ण नियंत्रण कोणाचे असते ?

विधिमंडळाचे.


Q. महाराष्ट्राच्या विधान सभेत  निर्वाचित सभासदाची संख्या किती असते ?

२८८


Q. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे ----- कार्य होत ?

कल्याणकारी.


Q. ----- हा राज्याचा नामधारी प्रमुख असतो ?

राज्यपाल.


Q. शेती  हा विषय कोणत्या सूचित देण्यात आला आहे ?

राज्यसूची.


Q. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो ?

०६ वर्षे.


Q. लोकसभा हे कोणते सभागृह आहे ?

अस्थायी.


Q. एखादे विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार कोणाचा असतो ?

लोकसभा अध्यक्ष


Q. संकटकालीन काळात लोकसभा किती ने वाढवण्यात येते ?

०१ वर्षानी.


Q. संघसूचित किती विषयाचा समावेश आहे ?

९७.


Q. राज्यसूचित किती विषयाचा समावेश आहे ?

६६


Q. संमवर्ती सूचित किती विषय आहे ?

४७.


Q. संमवती सूचित विषय वर कायदा कोण बनवू शकते ?

केंद्र व राज्य सरकार.


Q. लोकसभेचे मुदतपूर्व विर्सजन करण्याचा अधिकार कोणास आहे ?

राष्ट्रपती.


Q. राष्ट्रपति कोणत्या कलम ने  संपूर्ण देशात आणीबाणी लावू शकतात ?

३५२.


Q. आतापर्यत भारतात किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली ?

०३ वेळा.


Q. दुहेरी शासन व्यवस्था असलेल्या पद्धतीला काय म्हणतात ?

संघराज्य.


Q. स्वातंत्राच्या हक्काचा समावेश भारतीय राज्य घटनेच्या ----- या 

कलमात करण्यात आला आहे ?

कलम १९ ते २२.


Q. भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती कोणती ?

अंदाज समिती.


Q. ४२ वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत कार्यात आली  होती ?

१९७६.


Q. जास्तीत जास्त किती दिवस अर्थ विधेयक राज्यसभा स्वत: कडे ठेवू

शकते ?

१४ दिवस.


Q. घटना परिषदेची निर्मिती ---- मध्ये कॅबिनेट मिशन च्या शिफारशी नुसार झाली ?

२४ मार्च १९४६.


Q. भारतात घटनात्मक रित्या किती भाषाना मान्यता देण्यात आली ?

२२.


Q. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी घेण्यात आल्या होत्या ?

१९५२.


Q. वटहुकुम राष्ट्रपती कोणत्या कलम ने काढतात?

१२३.


Q. घटना समितेचा पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

०९ डिसेंबर १९४६.

भारताचे संविधान



आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:

सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय:

विचार, अभिव्यक्ती, विश्‍वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य: दर्जाची व संधीची समानता:

निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्‍वासन देणारी बंधुता:

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन

आमच्या संविधान सभेस आज

दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करीत आहोत.


👉 भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-


(१) लिखित घटना

भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे.  राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.


(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना

भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.


(३) लोकांचे सार्वभौमत्व

घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सत्ता आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फत  राज्यकारभार चालविते. राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.


(४) संसदीय लोकशाही

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोकसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.


(५) संघराज्यात्मक स्वरूप

भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.


(६) मूलभूत हक्क

भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.


(७) धर्मनिरपेक्ष राज्य

भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्मांना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.


(८) एकेरी नागरिकत्व

भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली आहे.

(९) एकच घटना

ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आला. 

(१०) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ

देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.

(११) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती

भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत चालतो.

राष्ट्रासाठी महिलांचे योगदान


🔹सचेता कृपलानी

इंदिरा गाँधी ने कभी सुचेता कृपलानी के बारे में कहा था, ‘ऐसा साहस और चरित्र, तो स्त्रीत्व को इस कदर ऊँचा उठाता हो, महिलाओं में कम ही देखने को मिलता है।’ स्वतंत्रता आंदोलन के साथ सुचेता कृपलानी का जिक्र आता ही है। सुचेता ने आंदोलन के हर चरण में बढ़-चढ़कर हिस्सा लिया और कई बार जेल गईं। सन् 1946 में उन्हें असेंबली का अध्यक्ष चुना गया। सन् 1958 से लेकर 1960 तक वह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस की जनरल सेक्रेटरी रहीं और 1963 में उत्तर प्रदेश की मुख्यमंत्री बनीं।



🔹 मीरा बेन

लंदन के एक सैन्य अधिकारी की बेटी मैडलिन स्लेड गाँधी के व्यक्तित्व के जादू में बँधी साम समंदर पार काले लोगों के देश हिंदुस्तान चली आई और फिर यहीं की होकर रह गईं। गाँधी ने उन्हें नाम दिया था - मीरा बेन। मीरा बेन सादी धोती पहनती, सूत कातती, गाँव-गाँव घूमती। वह गोरी नस्ल की अँग्रेज थीं, लेकिन हिंदुस्तान की आजादी के पक्ष में थी। उन्होंने जरूर इस देश की धरती पर जन्म नहीं लिया था, लेकिन वह सही मायनों में हिंदुस्तानी थीं। गाँधी का अपनी इस विदेशी पुत्री पर विशेष अनुराग था



🔹कमला नेहरू

कमला जब ब्याहकर इलाहाबाद आईं तो एक सामान्य, कमउम्र नवेली ब्याहता भर थीं। सीधी-सादी हिंदुस्तानी लड़की, लेकिन वक्त पड़ने पर यही कोमल बहू लौह स्त्री साबित हुई, जो धरने-जुलूस मेंअँग्रेजों का सामना करती है, भूख हड़ताल करती है और जेल की पथरीली धरती पर सोती है। नेहरू के साथ-साथ कमला नेहरू और फिर इंदिरा की भी सारी प्रेरणाओं में देश की आजादी ही सर्वोपरि थी। असहयोग आंदोलन और सविनय अवज्ञा आंदोलन में उन्होंने बढ़-चढ़कर शिरकत की। कमला नेहरू केआखिरी दिन मुश्किलों से भरे थे। अस्पताल में बीमार कमला की जब स्विटजरलैंड में टीबी से मौत हुई, उस समय भी नेहरू जेल में ही थे।



 🔹मडम भीकाजी कामा

पारसी यूँ तो हिंदुस्तानी थे, लेकिन गोरी चमड़ी और अँग्रेजी शिक्षा के कारण अँग्रेजों के ज्यादा निकट थे। ऐसे ही एक पारसी परिवार में जन्मी भीकाजी कामा पर अँग्रेजी शिक्षा के बावजूद अँग्रेजियत का कोई असर नहीं था। वह एकपक्की राष्ट्रवादी और स्वतंत्रता संग्राम सेनानी थीं। स्टुटगार्ड जर्मनी में उन्होंने देश की आजादी पर कहा था, ‘हिंदुस्तानी की आजादी का परचम लहरा रहा है। अँग्रेजों, उसे सलाम करो। यह झंडा हिंदुस्तान के लाखों जवानों के रक्त से सींचा गया है। सज्जनों, मैं आपसे अपील करती हूँ कि उठें और भारत की आजादी के प्रतीक इस झंडे को सलाम करें।’ फिरंगी भीकाजी कामा के क्रिया-कलापों से भयभीत थे और उन्होंने उनकी हत्या के प्रयास भी किए। पर देश-प्रेम से उन्नत भाल झुकता है भला। भीकाजी कामा का नाम आज भी उसी गर्व के साथ हमारे दिलों में उन्नत है।


🔹 सिस्टर निवेदिता

उनका वास्तविक नाम मारग्रेट नोबल था। उस दौर में बहुत-सीविदेशी महिलाओं को हिंदुस्तान के व्यक्तित्वों और आजादी[image]NDNDकी लड़ाई ने प्रभावित किया था। स्वामी विवेकानंद के जीवन और दर्शन के प्रभाव में जनवरी, 1898 में वह हिंदुस्तान आईं। भारत स्त्री-जीवन की उदात्तता उन्हें आकर्षित करती थी, लेकिन उन्होंने स्त्रियों कीशिक्षा और उनके बौद्धिक उत्थान की जरूरत को महसूस किया और इस
के लिए बहुत बड़े पैमाने पर काम भी किया। प्लेग की महामारी के दौरान उन्होंने पूरी शिद्दत से रोगियों की सेवा की और भारत के स्वतंत्रता आंदोलन में भी अग्रणी भूमिका निभाई। भारतीय इतिहास और दर्शन पर उनका बहुत महत्वपूर्ण लेखन है, जो भारतीय उपमहाद्वीप में स्त्रियों की बेहतरी की प्रेरणाओं से संचालित है।



🔹 कोकिला सरोजिनी नायडू

सिर्फ स्वतंत्रता संग्राम सेनानी ही नहीं, बल्किबहुत अच्छी कवियत्री भी थीं। गोपाल कृष्ण[image]NDNDगोखले से एक ऐतिहासिक मुलाकात ने उनके जीवन की दिशा बदल दी। दक्षिण अफ्रीका से हिंदुस्तान आने के बाद गाँधीजी पर भी शुरू-शुरू में गोखलेका बहुत गहरा प्रभाव पड़ा था। सरोजिनी नायडू ने खिलाफत आंदोलन की बागडोर सँभाली



🔹विजयलक्ष्मी पंडित

एक संपन्न, कुलीन घराने से ताल्लुक रखने वाली और जवाहरलाल नेहरू की बहन विजयलक्ष्मी पंडित भी आजादी की लड़ाई में शामिल थीं। सविनय अवज्ञा आंदोलन में भाग लेने के कारण उन्हें जेल में बंद किया गया था। वह एक पढ़ी-लिखी और प्रबुद्ध महिला थीं और विदेशों में आयोजित विभिन्न सम्मेलनों में उन्होंने भारत का प्रतिनिधित्व किया था। भारत के राजनीतिक इतिहास में वह पहली महिला मंत्री थीं। वह संयुक्त राष्ट्र की पहली भारतीय महिला अध्यक्ष थीं। वह स्वतंत्र भारत की पहली महिला राजदूत थीं, जिन्होंने मास्को, लंदन और वॉशिंगटन में भारत का प्रतिनिधित्व किया।



🔹अरुणा आसफ अली

हरियाणा के एक रूढि़वादी बंगाली परिवार से आने वाली अरुणा आसफ अली ने परिवार और स्त्रीत्व के तमाम बंधनों[image]NDNDको अस्वीकार करते हुए जंग-ए-आजादी को अपनी कर्मभूमि के रूप में स्वीकार किया। 1930 में नमक सत्याग्रह से उनके राजनीतिक संघर्ष की शुरुआत हुई। अँग्रेज हुकूमत ने उन्हें एक साल के लिए जेल में कैद कर दिया। बाद में गाँधी-इर्विंग समझौतेके बाद जब सत्याग्रह के कैदियों को रिहा किया जा रहा था, तब भी उन्हें रिहा नहीं किया गया।ऐतिहासिक भारत छोड़ो आंदोलन के दौरान 9 अगस्त, 1942 को अरुणा आसफ अली ने गोवालिया टैंक मैदान में राष्ट्रीय झंडा फहराकर आंदोलन की अगुवाई की। वह एक प्रबल राष्ट्रवादी और आंदोलनकर्मी थीं। उन्होंने लंबे समय तक भूमिगत रहकर काम किया। सरकार ने उनकी सारी संपत्ति जब्त कर ली और उन्हें पकड़ने वाले के लिए 5000 रु. का ईनाम भी रखा। उन्होंने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस की मासिक पत्रिका ‘इंकलाब’ का भी संपादन किया। 1998 में उन्हें भारत रत्न से सम्मानित किया गया।

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच

 (०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर- २४ डिसेंबर.


(०२)  सायकलचा शोध कोणी लावला ?

उत्तर- मॅकमिलन.


(०३)  'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?

उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.


(०४)  भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?

उत्तर- १९२० मध्ये.


(०५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?

उत्तर- सोलापूर.


(०६)  भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

उत्तर- वड.


(०७)  विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(०८)  कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?

उत्तर- विंबलडन.


(०९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?

उत्तर- २० मार्च १९२७.


(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?

उत्तर- C₁₂H₂₂O₁₁ 


(११)  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- दादासाहेब फाळके.


(१२)  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- रूडाल्फ डिझेल.


(१३)  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी


(१४)  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.


(१५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.


(१६)  महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

उत्तर- पुणे.


(१७)  वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- जेम्स वॅट.


(१८)  'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

उत्तर- राम गणेश गडकरी.


(१९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

उत्तर- ८ जुलै १९३०.


(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?

उत्तर- C₆H₁₂O₆ 


(२१)  राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर- त्याग आणि शौर्य.


(२२)  टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.


(२३)  ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

उत्तर- रानकवी.


(२४)  अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?

उत्तर- २९ आॅगस्ट.


(२५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?

उत्तर- २७ मे १९३५.


(२६)  न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

उत्तर- किवी.


(२७)  ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(२८)  मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?

उत्तर- विवेकसिंधू.


(२९)  'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सुनील गावस्कर.


(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?

उत्तर- महात्मा फुले.


(३१)  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?

उत्तर- व्हाइट हाऊस.


(३२)  अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?

उत्तर- ब्रेल लुईस.


(३३)  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*

उत्तर- अरूणा ढेरे.


(३४)  'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- पी. टी. उषा.


(३५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?

उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.


(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?

उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची 


(३७)  महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप


(३८)  देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?

उत्तर- कोल्हापूर.


(३९)  श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते  ?

उत्तर- प्र.के.अत्रे 


(४०)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?

उत्तर- 1990 


(४१)  तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?

उत्तर- कावेरी नदी.


(४२)  पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.


(४३)  आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर- कृष्णाजी केशव दामले.


(४४)  अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- अॅथेलेटिक्स.


(४५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?

उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

 

(४६)  सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?

उत्तर- रोम.


(४७)  डायनामाइटचा शोध कोणी लावला ?

उत्तर- आल्फ्रेड नोबेल.


(४८)  आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?

उत्तर- ह. ना. आपटे.


(४९)  'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सायना नेहवाल.


(५०)  डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?

उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...