१७ एप्रिल २०२३

चालू घडामोडी प्रश्नसराव

(1)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

(2)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम .

(3)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- 20 फेब्रुवारी .

(4)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- *तिरंदाजी.

(5)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.

(6)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर .

(7)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.

(8)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- 23 मार्च .

(9)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस .

(10)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार .
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

०६ एप्रिल २०२३

साधारण विधेयक आणि धनविधेयक यांचा तुलनात्मक अभ्यास

🔴 साधारण विधेयक

▪️साधारण विधेयकाची सुरुवात संसदेच्या कोणत्याही सभागृहात करता येते.

▪️कोणताही सदस्य असे विधेयक मांडू शकतो.

▪️राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीशिवाय मांडता येते.

▪️राज्यसभा यात बदल करू शकते किंवा फेटाळू शकते.

▪️राज्यसभा जास्तीत जास्त 6 महिने असे विधेयक रोखून धरू शकते. -

▪️लोकसभेने पारित केलेले विधेयक राज्यसभेत पाठवण्यासाठी अध्यक्ष्यांच्या सहीची गरज नसते.

▪️दोन्ही सभागृहांत असहमती झाल्यास राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावू शकतात

▪️मंत्र्याने लोकसभेत मांडलेले साधारण विधेयक अस्वीकृत झाल्यास/ सरकारचा मतदानात पराभव झाल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागतो. खाजगी सदस्याच्या विधेयकाच्या बाबतीत असे झाल्यास मंत्रीपरिषदेला राजीनामा द्यावा लागत नाही.

▪️राष्ट्रपती असे विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात.

🔵धन विधेयक

▪️सुरुवात फक्त लोकसभेत करता येते.

▪️फक्त मंत्रीच मांडू शकतो.

▪️फक्त राष्ट्रपतींच्या पूर्व संमतीनेच मांडता येते.

▪️राज्यसभेला फक्त बदल सुचवण्याचा हक्क आहे.

▪️राज्यसभा जास्तीत जास्त 14 दिवस धन विधेयक रोखून धरू शकते.

▪️लोकसभेने पास केलेल्या धनविधेयकावर अध्यक्षांची सही असणे गरजेचे असते.

▪️असहमती झाल्यास लोकसभेने स्वीकारलेल्या स्वरुपातच विधेयक दोन्ही सभागृहांनी पारित केल्याचे मानले जाते. यावर संयुक्त बैठकीची तरतूद नाही.

▪️लोकसभेने नामंजूर झाल्यास सरकार राजीनामा देते.

▪️राष्ट्रपती अस्वीकृत करू शकतात पण पुन्हा विचार करण्यासाठी परत पाठवू शकत नाही.
════════════════

पंचायत राज संदर्भातील समित्या



1) व्ही आर राव (1960)

🔴विषय - पंचायत सांख्यिकी सुसूत्रता समिती


2) एस डी मिश्रा (1961)

🔵विषय - पंचायत राज आणि सहकारी संस्था


3) व्ही ईश्वरण (1961)

🟣विषय - पंचायत राज प्रशासन


4) जी आर राजगोपाल (1962)

🟠विषय - न्याय पंचायती संदर्भात अभ्यासगट


5) आर आर दिवाकर (1963)

🟢विषय - ग्रामसभेसंदर्भात 


6) एम राजा रामकृष्णय्या (1963)

🟡विषय - पंचायत राज संस्थेच्या अंदाजपत्रक संदर्भात अभ्यासगट


7) के संथानम (1963)

🟤विषय - पंचायत राज अर्थविषयक अभ्यास गट


8) के संथानम (1965) 

🟣विषय - पंचायत राज निवडणूक संदर्भात


9) आर के खन्ना (1965)

⚫️विषय - पंचायत राज लेखापरीक्षणसंबंधी अभ्यासगट


10) जी रामचंद्रन (1966) 

⚪️विषय - पंचायत राज प्रशिक्षण संदर्भात


11) श्रीमती दया चोबे (1976)

🔴विषय - समुदाय विकास आणि पंचायत

बलवंतराय मेहता अभ्यास गट

📌स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिली पंचवार्षिक योजना अमलांत आली. शेतकऱ्यांचा आणि खेड्यांतील इतर लोकांचा विकास करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. लोकांचा सहभाग व्यामध्ये अपेक्षित होता पण या योगानेला म्हणावा तसा लोकसहभाग मिळाला नाही. या कामाची पाहणी करण्यासाठी नियोजन मंडळाने बलवंतराय मेहतांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट नेमला.

📌या अभ्यास गटाने आपला अहवाल १९५७ साली सदर केला. त्यामध्ये पंच्यात राज्याची संकल्पना दिशा आणि रचनेच्या दूरगामी व अमुलाग्र बदलासाठी शिफारशी करण्यात आल्या. आणि प्रथमच लोकशाही विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने पंचायत राज्याची संकल्पना मांडण्यात आली. राजस्थान सरकारने बलवंतराय समितीच्या सूचना विचारात घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची योजना आखली.

📌२ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था पंचायत राज या नावाने लोकप्रिय झाली.

🌸पंचायत राज व्यवस्थेचा आढावा🌸

📌पंचायत राज व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या समित्या वेळोवेळी स्थापन करण्यात आल्या. त्यात श्री. व्ही.टी.कृष्णम्माचारी यांच्या अध्यक्षतेखाली १९६० साली समिती नेमण्यात आली. या अभ्यासगटाने काही महत्वाच्या शिफारशी केल्या. कायदयाने ग्रामसभा प्रस्थापित कराव्या व त्यांच्या किमान दोन सभा व्हाव्यात ही महत्वाची शिफारस या अभ्यास गटाने केली.

📌१९७७ साली अशोक मेहता समिती स्थापन करण्यात आली. प्रतेक राज्यातील पंचायत राज व्यवस्था त्या त्या राज्याच्या परिस्थितीप्रमाणे वेगवेगळी असू शकेल. आवश्यक वाटल्यास घटनेत दुरुस्ती करून पंचायत राज व्दारे लोकशाही विकेंद्रीकरण झाले पाहिजे असे मत या समितीने मांडले. १९८५ साली नियोजन मंडळाने ग्रामीण विकास व दारिद्रय निर्मुलन कार्यक्रम परिणामकारक रितीने राबविला जावा म्हणून  श्री.जी.व्ही.के. राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीनेही लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असावा म्हणून पंचायत राज व्यवस्थेला महात्वाचे स्थान असावे अशी शिफारस केली.

🌸महाराष्ट्रात पंचायतीराजचा अभ्यास🌸

📌महाराष्ट्र शासनानेही पंचायत राज व्यवस्थेच्या यशस्वी परिणामकारकतेसाठी वेळोवेळी अभ्यासगट व समित्यांची स्थापना केली. एस.जी.बर्वे समिती १९६८, बोगिरवार समिती, १९७०, मंत्रिमंडळाची उपसमिती, १९८०, आणि पंचायत राज व्यवस्थेचे मुल्यमापन करण्यासाठी १९८४ साली प्राचार्य पी.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

📌या समितीने आपला अहवाल १९८६ साली सादर केला. ही सर्वात अलिकडील समिती असून त्यांच्या शिफारशीच्या आधारे राज्यशासन वेळोवेळी विचार करून दुरुस्त्या करीत आहे.

🌸एल.एम.सिंघवी समिती🌸

📌सन १९८४ च्या अखेरीस राजीव गांधी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली. त्यांच्या सरकारने पंचायत राज्य संस्थेला मजबूती प्रदान करण्याच्या उद्देशाने सन १९८६ च्या जून महिन्यात एल.एम.सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली “लोकशाही आणि विकास कामासाठी पंचायतीचे पुर्नजीवन करण्यासाठी समिती” ची नियुक्त केली.

📌पंचायत राज संस्थांची सध्याची स्थिती त्यांची आत्तापर्यंतची वाटचाल आणि विकास कार्यातील त्यांची भूमिका इत्यादीचे मुल्यमापन करण्याची तसेच ग्रामीण विकास व राष्ट्रबांधणीच्या कार्यात पंचायत राज्य संस्थांना भरीव योगदान कसे करता येईल या बाबत उपाय सुचविण्याची जबाबदारी सिंघवी समितीवर सोपविण्यात आली होती.

🌸घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस🌸

📌एल.एम.सिंघवी समितीच्या बऱ्याचशा शिफारशी यापुर्वीच्या काही समित्यांनी केलेल्या शिफारशी प्रमाणेच आहेत. तथापि सिंघवी समितीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण शिफारस केली ती म्हणजे “पंचायत राज संस्थांना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक मान्यता व संरक्षण देण्यात यावे. त्याकरीता भारतीय राज्य घटनेत एक नवे प्रकरण समाविष्ट करण्यात यावे.”

📌सिंघवी समितीची ही शिफारस अत्यंत वैशिष्टयपूर्ण मानावी लागेल. भारतात पंचायत राज्याची स्थापना झाल्यानंतर राजकिय नेत्यांनी व राज्यकर्त्यांनी ग्रामीण पुर्नरचनेच्या तसेच ग्रामीण विकासाच्या कार्यात पंचायत राज्य संस्था महत्त्वाची भूमिका बजावतील म्हणून त्यांना सक्षम बनविण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत अशा अर्थाचे मत प्रदर्शन केले. ७३ वी घटना दुरुस्ती करण्यामागे सिंघवी समितीच्या अहवालाचे फार मोते योगदान आहे असे म्हटल्यास त्यात वावगे काहीच नाही.

पृथ्वीचे अंतरंग

 🔴 पृथ्वीच्या अंतरंगाच्या अभ्यासाची प्रत्यक्ष साधने

1. खाणकाम

2. Deep Ocean Drilling

3. ज्वालामुखी उद्रेक


🌍 पृथ्वीच्या अंतरंगाच्या अभ्यासाची अप्रत्यक्ष साधने

1. उल्का 

2. गुरुत्वाकर्षण

3. पृथ्वीच्या खोलीनुसार वाढणारे तापमान, दाब व घनता

4. भूकंप लहरींचा अभ्यास

5. चुंबकीय बल



🌍 पृथ्वीच्या अंतरंगातील स्तर व विलगता


◆ सियाल

---------------------- कॉनरॅड विलगता

◆ सायमा

---------------------- मोहो विलगता

◆ बाह्यप्रावरण

---------------------- रॅपट्टी विलगता

◆ अंतर्प्रावरण

---------------------- गटनेबर्ग विलगता

◆ बाह्यगाभा

---------------------- लेहमन विलगता

◆ अंतर्गाभा


माझ्या भावी अधिकारी मित्र आणी मैत्रीणीनो...



अभ्यास....अभ्यास....अभ्यास... करत असालच तर मनात कुठलीही भिती बाळगू नका... हरवलेला आत्मविश्वास शोधा त्याला आता बाहेर काढा... माहिती आहे मला की, अधिकारी होण्याचे स्वप्नं पाहणार्या मुलिंना अनेक मर्यादा आहेत आणी मुलांना बंधना सोबत अनेक जबाबदारी आहेत... आणी त्यात आयोगाचे पेपर पुढे ढकलले गेले आहेत याच डिप्रेशन येतय..! पण विद्यार्थी ना तुम्ही हे विसरून कस चालेल ? जरा शोधा बरं विद्यार्थी म्हणजे काय ? याचा उत्तर... "कुठल्याही ज्ञानाच्या धर्तीवर, विवेक बुद्धीने ज्ञान धारण करुन जगणारा म्हणजे विद्यार्थी. " मग तुम्हाला न्याय देता यायला हवा या विद्यार्थी दशेला...

त्यासाठी विद्यार्थी हा उताविळ नसावा तर तो संयमी, चिकित्सक, जिद्दी, ध्येयवाडी, प्रामाणिक आणी आत्मविश्वासू असावा. मागेच अयोगाने वेळापत्रक प्रसिद्ध केले आणी सगळेच जोमाने सिद्धत्वाच्या वाटेवर धावू लागले.. त्यात कालच बातमी धडकली की, " आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्या..! " हे ऐकल आणी अनेक विद्यार्थी थबकले. काही लगेच तणावग्रस्त झाले. काही तर अक्षरशः व्हाटसअप, फेसबूक आणी सोशल मिडियावर ट्रोल करत आपल्यातला असंयमी विद्यार्थी प्रदर्शन करत निघाले. आयोग म्हणजे आज तमाम भावी अधिकारी वर्गाचे एक असे मंदिर आहे. जे तुम्हाला तुमच्या आयुष्याला प्रामाणीकपणाने न्याय देत आले आहे आणी देत आहे देत राहील...

मग तुमचा संयम जर आज फक्त परीक्षा पुढे ढकलल्या म्हणून जर सुटत असेल तर, ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल... मित्रांनो जरा धीर धरा.. ही तूमच्या संयमाची परीक्षा आहे. त्यात यशस्वी व्हा. कारण संयम मातृत्व बहाल करतो. मग कोणते मातृत्व तर जिद्द, इच्छाशक्ती, आत्मविश्वास यांसारखी अनेक सामर्थ्यशील गुण संयमच जन्माला घालतो. मग बघा तुम्ही कुठल्या तणावात जगत आहे.. सोडा आता तरी त्या तणावाचे दार
..ह्वा तिथून फरार... आणी ठोठवा विवेक बुद्धीचे दार... शोधा तुमचे दोष, वाढवा तुमचा अभ्यासाचा व्यासंग... परीक्षा पुढ ढकलल्या गेल्या म्हणून टेंशन आले. ही कारण तुम्ही तुमच्या अपयशाला देऊ शकत नाही. पण परिक्षा आणी तुमच्यात पडलेल अंतर परिवर्तीत करा तुमच्या आत्मविश्वासात...

 वेळ वाया जातोय ही कारण तुमच ध्येय सिद्ध होईपर्यंत तुमचा वेळ वाया जातोय अस जिथ कुठ वाटेल ना तिथ थोड थांबा...! बघा आतमधे डोकाऊन मग मिळेल एक उत्तर की, वेळ वाया जात नाही तो आपण घालवतो आहे..! म्हणून संयम बाळगा...! देशाच्या जवानांसारखी तयारी ठेवा..! युद्धाची मानसीक व शारीरिक तयारी ते एका दिवसात नाही पुर्ण करत. ती तयारी ते रोजच करत असतात. म्हणून ते खचत नाही. अपयशाचा विचारही ते कधीच करत नाही. कधी समोरुन क्षत्रूची गोळी येईल आणी रक्त पिऊन कायमची घेऊन जाईल...पण ना असते चिंता ना असते भिती असते फक्त तयारी..!

ती तयारी करा.. अभ्यास झालय पुर्ण ही फालतू कारण देऊन आपल्या भविष्याचा, आईबापाच आणी स्वताःचा अपमान तरी करु नका. कारण अभ्यास हा कधीच कुणाचाही पुर्णपणे पुर्ण होत नाही अगदी मरेपर्यंत... मग तुमचा अभ्यास झाला हे कोणीही मान्य करणार नाही. अगदी तुमचे मनही हे वाक्य फेटाळून लावेल. अभ्यास झाला होता राव...! मूड़ ऑफ़ झालाय..! तयारी झाली होती राव..! आता काय काराव ? हा जर विचार करत असाल तर कुठतरी चुकता आहे. पुढचे वेळापत्रक येईपर्यंत रोजचा दिनक्रम तसाच ठेवा... झालच शक्य तर मानसीक तयारी करा. या परिक्षेसोबतच आयुष्यातील कुठल्याही परीक्षेला सामोरी जाण्याची तयारी... खंबीर, संयमी आणी शांत व्हा.. ती सर्वात मोठी ताकद आहे सामर्थ्याची...

 तुमच्यातला ध्येयवेडा माणुस कधीच शांत होऊ देऊ नका. तो शांत झाला तर वाट्याला येणारी प्रश्नावली आयुष्य नैराश्ययुक्त करते. मित्रांनो मला माझे शेकडो मित्र रोजच भेटतात. आणी एक निर्जीव वाक्य वापरतात. " सरकारी नौकरी मिळवण म्हणजे जोक नाही. " मान्य आहे मला हे सगळ. पण हे वाक्य कन्व्हर्ट करता यायला हव. हे वरील वाक्य विनोद आहे फक्त त्यांच्यासाठी जे जिवंतपणी मृत अवस्थेत जगत आहे.. हा विनोद आहे त्यांच्यासाठी जे आयुष्य फक्त मौजमजा करत वाया घालवत आहे मग तुम्ही कोण ? ठरवा... काय करनार हाती आलेल्या वेळेचा सदउपयोग कसा करावा ते.. कारण "प्रत्येक गोष्टीतिल वेळेचे योग्य व अचुक नियोजन तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते..."

शेवटी एकच सांगेल तुकोबारायांच्या शब्दात...

असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे...!

पहिल्यांदाच जे Combine गट ब पूर्व परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी..

MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या...

आपल्याला OMR वर काय माहिती भरायची असते / लिहायची असते..

1. Name of examination
2. Roll number
3. Question booklet number
4. Question booklet series
(A, B, C, D)
5. Subject CODE 012
(हॉलतिकीट वर उल्लेख असतोच पाहून जा.)
6. तुमची सही..
candidate signature
7. invigilator ने set CODE टाकून सही केलेली आहे का ते एकदा पेपर वापस collect करताना आवर्जून पाहा.. (पुढे प्रॉब्लेम नको )
8. हॉल मध्ये attendance वर तुमची सही..
9. Question किती attempt केले ते लिहणे.. शेवटचे दोन मिनिट यासाठीच असतात..

OMR वर कोणत्या चुका झाल्या तरी पेपर चेक होतो हे आधीच आयोगाने सांगितल आहे.. तरीही OMR वर कसलीच चूक होणार नाही याची काळजी घ्या..

परीक्षा साठी कोणतीही original ID आणी Id ची xerox सोबतीला न्या.. सकाळ च्या shift मध्ये परीक्षाचा कालावधी जरी प्रत्यक्ष 11 ते 12 असला तरीही, केंद्रावर उपस्थिती चा वेळ सकाळी 9:30 आहे त्यामुळं पाऊस किंवा इतर करणामुळे लवकर जा..
हॉलतिकीट वर वेळ पाहून जा..

सर्वात महत्वाचे हॉलटिकिट, पेन,ओरिजिनल ID, id Xerox, घड्याळ आणी मास्क, सोबतीला राहूद्या..

परीक्षा साठी शुभेच्छा.. तब्बेतीची काळजी घ्या..

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

#MPSC_Pre #Combine_Pre
#General_Knowledge

🟣   इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये  🟣

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.

◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

Combine पुर्व 2021 इथून पुढील 14 दिवसांचे नियोजन आणि बरंच काही..


♦️आता आपण पुढील 14 दिवसाचे नियोजन काय आणि कस करता येईल याविषयीं सविस्तर चर्चा करू.


1. पुढच्या 14 दिवसात प्रत्येक विषयांचे 1 चांगले Revision आणि शेवटी 1 fast Revision व्हायला हव. बघुयात सविस्तर..


2. साधारणता 14 दिवसांचे नियोजन 2 टप्प्यात केलं तर better राहील. पुढील 10 दिवसात इतिहास, भूगोल, Polity, Economy आणि Science या प्रत्येक विषयाला साधारण 2 दिवस असे 5 विषयांना एकूण 10 दिवस. याप्रमाणे आपली पुढील 10 दिवसात सर्व विषयांची 1 मस्त Revision झाली पाहिजेत.


3.आता तुम्हाला वाटेल आपली पाचच विषयांची Revision झाली. पण एक लक्षात घ्या Current आणि Math Reasoning ला इथून पुढील दिवसांमध्ये वेळ न देता तासांमध्ये वेळ द्या. म्हणजे तुम्ही Dailly 12 तास अभ्यास केला तर किमान 3 तास या विषयांना तुम्ही द्यायला हवेत.

Current आणि Math Reasoning हे Cutoff मध्ये deciding factors असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष नको.


4. आता तुमचे पहिल्या 10 दिवसात पहिले Revision होईल. अजून तुमच्याकडे 4 दिवस आहेत. यामध्ये प्रत्येक विषयच Revision करणं शक्य होणार नाही. त्याऐवजी, तुम्ही तुम्हाला weak वाटणारे विषय किंवा त्यामधील तुम्हाला weak वाटणारे उपघटक निवडून त्याची Revision  करू शकता. उदा. इतिहासात तुम्ही समाजसुधारक, Polity मध्ये Imp articles, सुची, परिशिष्ट्ये इ. वाचू शकता. तसेच Economy मध्ये लोकसंख्येची आकडेवारी तुम्ही पाठ करू शकता.


अशा प्रकारे शेवटच्या 4-5 दिवसात तुम्हाला येत असलेल्या गोष्टी Skip करून ( कारण तुम्हाला येणाऱ्या गोष्टी कधीही येणारच आहेत.)ज्या गोष्टी चुकु शकतात किंवा ज्याची revision करण्याची गरज आहे त्यावरतीच focus करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त Output मिळेल.


वरील नियोजन जसेच्या तसे follow करावे असे काही नाही त्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे बदल करू शकता. फक्त सांगण्याचा मुद्दा एवढाच की पुढील 14 दिवसात आपला Comprehensive अभ्यास होणं अपेक्षित आहे.


♦️यासोबतच खालील काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.


1. Reading तर आपण करणारच आहोत    पण पुढच्या 14 दिवसांनमध्ये तुम्ही आयोगाचे खूप सारे PYQ नक्की बघा. फक्त PYQ Analysis करताना ते स्पष्टीकरण वाचण्यापेक्षा तो प्रश्न कोणत्या उपघटकावर आला आहे, या वर्षी कोणत्या उपघटकावर ते प्रश्न विचारू शकतात, तसेच तो प्रश्न अजून दुसऱ्या कोणत्या मार्गाने solve करता येऊ शकतो का??

अश्या सर्व पद्धतीने PYQ Analysis झालं पाहिजेत.


2. जे घटक तुम्हाला अवघड वाटतात त्या घटकांचे pyq चांगले करा. म्हणजे Reading कमी झालं तरी Marks येतील.


3. आता Revision करताना जास्त Detail मध्ये करण्याची वेळ राहिली नाही so आपला फोकस हा Fact वरती हवा. म्हणजे आपली परीक्षा पण Factual आहे so तो approach कायम डोक्यात असू द्या.


4. तुमचे कमीत कमी 5 Test Papers तरी सोडवून झालं असतील. आता इथून पुढे जास्त Test Papers Solve करण्यात Point नाही पण तरी तुम्हांला Time management साठी शक्य असल्यास अजूनही 3-4 Test Papers सोडवण संयुक्तीक असेल. पण जास्त test Papers च्या पाठीमागे लागण्यात काहीही Point नाही कारण आपल्याला आयोगाला marks पाडायचे आहे test papers ला नाहीत. So फक्त Time management म्हूणन त्या गोष्टींकडे बघा.


5. Combine पुर्व ही अभ्यासाएव्हडीच वेळेच्या आणि झालेल्या अभ्यासाच्या नियोजनाची परीक्षा आहे. So Actual exam मध्ये वेळेच्या नियोजनाचे नियोजन आतापासूनच डोक्यात असू द्या. Actual Paper मध्ये होणाऱ्या Silly mistakes कश्या कमी करता येतील यादृष्टीने पुढील दिवसांमध्ये काम होणं अपेक्षित आहे..


6. तुम्ही सर्वजण नक्कीच परीक्षा पास होणार आहात. जशी जशी परीक्षा जवळ येईल तसा तसा कॉन्फिडन्स वाढला पाहिजेत. स्वतः च्या प्रामाणिक कष्टावरती विश्वास ठेवा यश आपलेच आहे.


सर्वांना खूप खूप शुभेच्छा..💐💐💐


भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास


● सिस्टर निवेदिता यांनी तयार केलेल्या ध्वज
- 1904
- लाल रंग हा स्वातंत्र्य आणि विजयाचे प्रतिक
- वज्र हे शक्तीचे प्रतीक आहे
- वंदे मातरम् हे बंगाली भाषेत लिहिले आहे.

● वंदे मातरम् ध्वज
- 1906
- हिरवा, पिवळा आणि लाल रंगाचे आडवे पट्टे
- 8 कमळाची फुले जी 8 प्रांताची प्रतिक
- वंदे मातरम् हे हिंदीतील शब्द, सूर्य आणि चंद्र

● बर्लिन समितीचा ध्वज
- 1907
- मादाम भिकाजी कामा यांनी बर्लिनमध्ये अनावरण केले.
- केशरी, पिवळा, हिरवा रंग आणि 8 कमळाची फुले. माहिती संकलन वैभव शिवडे.
- वंदे मातरम् हे हिंदीतील शब्द आणि सूर्य आणि चंद्राचे प्रतिक

● होमरूल चळवळीतील ध्वज
- 1917
-युनियन जॅक हा ब्रिटिश सत्तेचा भाग होता
- 7 स्टार (सप्तर्षी/उर्षा मुख्यतः)
- क्रिसेंट आणि वरती चंद्र आणि चांदणी

● काँग्रेसेचा ध्वज
- 1921
- पांढरा, लाल आणि हिरवा रंग
- या झेंड्यासाठी गांधीजींनी पांढरा पट्टा आणि चरखा सुचवला होता

● स्वराज ध्वज
- 1931
- तीन रंगाचा ध्वज स्विकारला
- धर्मनिरपेक्ष ध्वज केशरी, पांढरा, हिरवा आणि यावरती चरखा होता

● स्वतंत्र भारताचा ध्वज
- 1947
- 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेत हा ध्वज स्विकारण्यात आला. वैभव शिवडे.
- वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
- मधल्या भागात पांढरा रंग आहे. या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो. वैभव शिवडे.
- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीचा बोध होतो.

- निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला 'अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते.


जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती:



जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.


रचना :- 

प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.


सभासद संख्या - 

प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.


सभासदांची निवडणूक - 

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.


पात्रता (सभासदांची) - 

जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.


आरक्षण : 

1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.


कार्यकाल : 

5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.


अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड :

 जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.


कार्यकाल :

अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.


राजीनामा :

1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे

2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे


मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-

अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.


बैठक : 

जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.


मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

महत्वाचे दिन...परीक्षेच्या दृष्टीने


============================
१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————————————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

सामान्य ज्ञान

1. पृथ्वी पर दिन और रात होते हैं ?

(A) दैनिक गति के कारण

(B) वार्षिक गति के कारण

(C) छमाही गति के कारण

(D) तिमाही गति के कारण

ANSWER - (A) दैनिक गति के कारण


2. सबसे बड़ा ग्रह है ?

(A) बृहस्पति

(B) पृथ्वी

(C) युरेनस

(D) शुक्र

ANSWER - (A) बृहस्पति


3. सबसे छोटा ग्रह है ?

(A) मंगल

(B) शनि

(C) बुध

(D) नेप्चून

ANSWER - (C) बुध


4. अगुलहास धारा किस महासागर में बनती है ?

(A) प्रशान्त महासागर में

(B) हिन्द महासागर में

(C) आर्कटिक महासागर में

(D) अन्य

ANSWER - (B) हिन्द महासागर में


5. पृथ्वी का सबसे भीतर वाला भाग क्रोड किसका बना होता है ?

(A) ताँबा और जस्ता

(B) निकेल और ताँबा

(C) लोहा और जस्ता

(D) लोहा और निकेल

ANSWER - (D) लोहा और निकेल


6. मैंगनीज के उत्पादन में भारत का दूसरा स्थान है, प्रथम देश कौन सा है ?

(A) फ्रांस

(B) रुसी संघ

(C) कनाडा

(D) संयुक्त राज्य अमेरिका

ANSWER - (B) रुसी संघ


7. निम्नांकित में से कौन देश कोयले का सबसे बड़ा उत्पादक है ?

(A) ब्राजील

(B) भारत

(C) अमेरिका

(D) चीन

ANSWER - (C) अमेरिका


8. इनमें किसको जापान का मैनचेस्टर कहा जाता है ?

(A) ओसाका

(B) टोकियो

(C) नागासाकी

(D) याकोहामा

ANSWER - (A) ओसाका


9. भारत के स्वतंत्रता संघर्ष के दौरान 'Deccan Educational Society' नामक संस्था की स्थापना किसने की थी ?

(A) जवाहरलाल नेहरू

(B) रवीन्द्र नाथ टैगोर

(C) बाल गंगाधर तिलक

(D) व्योमेश चन्‍द्र बनर्जी

ANSWER - (C) बाल गंगाधर तिलक


10. 1857 के गदर के समय भारत का गवर्नर जनरल कौन था ?

(A) लॉर्ड केनिंग

(B) नील आर्मस्ट्रांग

(C) जॉन मथाई

(D) अन्य

ANSWER - (A) लॉर्ड केनिंग


11. 'भारत भारतीयों के लिए ' नारा किस संस्था ने दिया था ?

(A) अशासकीय संस्था

(B) आर्य समाज ने

(C) ब्राह्म समाज ने

(D) अन्य

ANSWER - (B) आर्य समाज ने


12. विन्ध्याचल और सतपुड़ा पहाड़ियों के बीच से होकर बहने वाली नदी है ?

(A) नर्मदा

(B) सिंधु नदी

(C) कोसी

(D) गोदावरी

ANSWER - (A) नर्मदा


13. इन्वेस्टर प्रोटेक्शन फण्ड (Investor Protection Fund) किस संस्था ने स्थापित किया है ?

(A) पूंजी मुद्दे ने

(B) DLF ने

(C) सेबी (SEBI) ने

(D) अन्य

ANSWER -(C) सेबी (SEBI) ने 


14. कुण्डापुर एंव करवार कच्छ वनस्पति स्थान कहाँ स्थित हैं ?

(A) केरल राज्य में

(B) कर्नाटक राज्य में

(C) तमिल नाडु राज्य में

(D) त्रिपुरा राज्य में

ANSWER -(B) कर्नाटक राज्य में 


15. भारत की प्रथम बहुउद्देशीय परियोजना किस नदी पर बनाई गई थी ?

(A) कावेरी नदी

(B) गंडक नदी

(C) दामोदर नदी पर

(D) यमुना नदी

ANSWER - (C) दामोदर नदी पर


16. भारत में प्रथम स्थापित परमाणु-संयंत्र (Atomic Plant) कौन-सा है ?

(A) तारापुर परमाणु संयंत्र

(B) कैटेनोम परमाणु संयंत्र.

(C) कुडनकुलम परमाणु संयंत्र

(D) अन्य

ANSWER - (A) तारापुर परमाणु संयंत्र


17. यूनाइटेड किंगडम (United Kingdom- U.K) में शामिल हैं -

(A) इंगलैण्ड तथा उतरी आयरलैण्ड

(B) उतरी आयरलैण्ड तथा वेल्स

(C) स्कॉटलैण्ड तथा वेल्स

(D) (A) और (D)

ANSWER - (D) (A) और (D)


18. आगरा शहर को किसने बसाया ?

(A) सिकन्द लोदी

(B) अकबर

(C) बहलोल लोदी

(D) शाहजहाँ

ANSWER -(D) शाहजहाँ 


19. राष्ट्रिय प्रतीक के निचले भाग में उत्क्रीर्णित शब्द 'सत्यमेव जयते' किस सन्दर्भ से लिए गए हैं ?

(A) पुराण

(B) जातक

(C) मुदकोपनिषद्

(D) महाभारत

ANSWER -(C) मुदकोपनिषद् 


20. अशोक के शिलालेखों की लिपि क्या है ?

(A) गुरुमुखी

(B) ब्राह्यी

(C) देवनागरी

(D) हयरोग्लाइफिक्स

ANSWER - (C) देवनागरी



21. बिहू निम्नलिखित में से किसका लोकप्रिय उत्सव है ?

(A) असम

(B) उड़ीसा

(C) बिहार

(D) बंगाल

ANSWER -(A) असम 


22. विवेकानन्द रॉक मेमोरियल कहाँ स्थित है ?

(A) अण्डमान निकोबार

(B) लक्षद्वीप

(C) केरल

(D) तमिलनाडु

ANSWER -(D) तमिलनाडु 


23. महात्मा गांधी को राष्ट्रपिता के रूप में उल्लेख सबसे पहले किसने किया था ?

(A) सुभाषचन्द्र बोस

(B) जवाहरलाल नेहरू

(C) बल्ल्भभाई पटेल सी

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER - (A) सुभाषचन्द्र बोस


24. प्रथम गोलमेज सम्मेलन कहाँ हुआ था ?

(A) नई दिल्ली में

(B) लन्दन में

(C) बम्बई में

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER -(B) लन्दन में 


25. देश का लोह पुरुष किसे कहा जाता है ?

(A) सरदार पटेल

(B) पं. जवाहरलाल नेहरू

(C) महात्मा गांधी

(D) लोकमान्य तिलक

ANSWER - (A) सरदार पटेल


26. महात्मा गांधीजी को 'अधनंगा फकीर' किसने कहा ?

(A) हिटलर

(B) जिन्ना

(C) चर्चिल

(D) माउण्टबेटन

ANSWER - (C) चर्चिल


27. महात्मा गांधी निम्नलिखित में से किनसे अधिक प्रभावित थे ?

(A) बर्नार्ड शा

(B) लिओ टॉलस्टॉय

(C) कार्ल मार्क्स

(D) इन में से कोई नहीं

ANSWER -(B) लिओ टॉलस्टॉय 


28. महात्मा गांधी का जन्म हुआ था ?

(A) 1859

(B) 1869

(C) 1879

(D) 1889

ANSWER -(B) 1869

आजची स्मार्ट प्रश्नमंजुषा


1)जागतिक नागरी संरक्षण संघटनेचे सदस्य देश किती आहेत?

1)59✅✅

2)18 निरीक्षक देश

3)56

4)45




2)जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी असतो?

1)28एप्रिल 

2)1जानेवारी

3)18मार्च

4)1मार्च✅✅




3)1मार्च 2021पासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिली लस कोणाला दिली?

1)गृहमंत्री अमित शहा

2)राष्ट्रपती रामनाथ कोविंद

3)उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू

4)पंतप्रधान नरेंद्र मोदि✅✅

पहिला टप्पा =6जानेवारी 2021



4)गोल्डन ग्लोबल पुरस्कार 2021 चा उकृष्ट परदेशी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटला मिळाला?

1)सोल

2)लो सी

3)मीनारी✅✅

4)नोमॅडलँड (93वा ऑस्कर :- सर्वोत्तम चित्रपट:- दिग्दर्शक क्लोई झाओ :- आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार फ्रान्सेस एम सीडॉर्मंड




5)भारतीय शाळकरी विद्यार्थीनी किती लघुग्रहांचा शोध लावला?

1)6

2)8

3)10

4)18✅✅





 9)PSLV-C-51 चे वजन किती आहे?

1)1500kg

2)1300kg

3)670kg

4)673kg✅✅ 28February 2021 successfully launched

Hight=44.4miter




 8)"जॉन्सन अँड जॉन्सन" च्या एका डोसच्या लशीला कोणत्या देशात मान्यता मिळाली?

1)रशिया

2)भारत

3)अमेरिका✅

4)कॅनडा




10)'ड'प्रथीनयुक्त गहू कोणी विकसित केला?

1)डॉ के. शिवन

2)डॉ आर उमामहेश्वरन

3)चिंतल वेंकट रेड्डी✅✅

4)राजीव मल्होत्रा

_______________________


Q 1. मानवाधिकाराचे जनक कोणाला म्हणतात? 

- रेने कॅसिन


Q 2. भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

- 12 ऑक्टोबर 1993


Q 3. सर्वाधिक उंच पर्वतरांगा कोणत्या खंडात आढळतात?

- आशिया खंडात


Q 4. जगातील सर्वात जास्त लांबीच्या पर्वतरांगा कोठे आहेत ? 

-अँडिज (7000 मीटर), रॉकी पर्वत रांग (4,500 मीटर)


Q 5. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रास अभयारण्याचा दर्जा बहाल केला ?

-कन्हारगाव अभयारण्य


Q 6. चीनने कोणत्या नदीवर बांध (धरण) बांधून जलविद्युत् प्रकल्प निर्माण करण्याचे योषित केले? - यारलुंग ल्सांग्पो (ब्रह्मपुत्रा) 


Q 7. शेतपीकांचा हमीभाव कोण ठरवितो?

- कमिशन फॉर अॅग्रिकल्चररल कॉस्ट अँड प्रायसेस आयोग 


Q 8. माऊंट एव्हरेस्टची उंची किती सेंटीमीटरने वाढली, अशी घोषणा नेपाळ व चीनने केली?

- 86 सेंटिमीटर


Q 9. माऊंट के-2 पर्वत शिरवरांची उंची किती आहे ?

- 8611 मीटर 


Q 10. माऊंट अॅल्बस कोणत्या पर्वत रांगेत आहे ?

- कॉकेशस पर्वतरांगेत (युरोप)

मूलभूत अधिकाराचा विकास

जगामध्ये सर्वप्रथम इसवी सन 1215 मध्य ब्रिटेन इथे चर्च चे अधिकार सामान्य लोकांनी मागितले ज्याला मॅग्ना कार्टा असे म्हणतात. इथूनच मूलभूत अधिकारांचे विकास मानले जाते. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये


समता (Equality)


स्वातंत्र्य (Freedom)


बंधुत्व


यांचा विकास झाला.


1931 मध्ये कराचीमध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात वल्लभ भाई पटेल अध्यक्ष होते. यांनी सर्वप्रथम काँग्रेसच्या अधिवेशनात मूलभूत अधिकारांची मागणी केली. यापूर्वी कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक नेता एम एन रॉय यांनी मूलभूत अधिकारांची मागणी केली होती.


M. N. Roy हे कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर मूलभूत अधिकार भारतीय संविधानामध्ये टाकण्यात आले व मुलभूत अधिकारांसाठी संविधान परिषदेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली या विषयाची मार्गदर्शक समिती नियुक्त करण्यात आली.


व या समितीच्या शिफारशींच्या अनुसार भारतीय संविधानाच्या भाग-3 मध्ये कलम 12 ते 35 च्या दरम्यान 7 मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला.


1) समतेचा अधिकार ( कलम 14 ते 18)


2) स्वातंत्र्याचा अधिकार ( कलम 19 ते 22)


3) शोषणाविरुद्धचा अधिकार ( कलम 23 ते 24)


4) धार्मिक स्वातंत्र्य ( कलम 25 ते 28)


5) शिक्षण संस्कृती जपण्याचा अधिकार ( कलम 29 ते 30)


6) संपत्तीचा अधिकार


7) संविधानिक उपचाराचा अधिकार (कलम 32 ते 35)


असे मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आले परंतु 44 वी घटना दुरुस्ती 1978 अनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार काढून टाकण्यात आला 1978 मध्ये मोरारजी देसाईंची सरकार आली होती त्यांनी निवडून येताच  संपत्तीचा अधिकार डिलीट केला.


संपत्तीच्या अधिकाराला कलम  300A अनुसार कायदेविषयक अधिकार बनवण्यात आले.


कलम 12:- यानुसार राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे कारण मूलभूत अधिकार राज्यच त्या राज्याच्या नागरिकांना देते व या अधिकारांवर नियंत्रणही राज्यच ठेवते.  इथे राज्य म्हणजे भारत.


कलम 13:-  न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार यामध्ये देण्यात आलेला आहे.


भाग 3 :- मूलभूत अधिकार ( कलम 12 ते 35)


असे अधिकार जे  व्यक्तीच्या जीवनास परिपूर्णता निर्माण करून देतात व ज्यांचा मुख्य उद्देश व्यक्तीचे संरक्षण आणि त्यांचा विकास हेच ध्येय असतो.  हे अधिकार भौतिक, मानसिक, नैतिक विकासाकरिता महत्त्वपूर्ण असतात. यामुळे व्यक्तीचा विकास तर होतोच देशाचाही विकास होतो. संविधानामध्ये याला सर्वोच्च स्थान आहे.


भाग – ३ मुलभूत हक्क ही भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारांची सनद आहे. ही सनद भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते. या मुलभूत हक्कांमध्ये कायद्यापुढे समानता, उच्चार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने कोठेही उपस्थित राहण्याचे व सभा स्वातंत्र्य, आणि नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी संवैधानिक प्रतिकारासाठी habeas corpus यासारख्या याचिकांचा अधिकार असे उदारमतवादी लोकतांत्रिक देशांमध्ये असलेल्या अधिकारांचा समावेश होतो. या अधिकारांचा भंग केल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय दंडविधान संहितेखाली शिक्षा होऊ शकते.


०३ एप्रिल २०२३

महानगरपालिका बद्दल संपुर्ण माहिती


🔸3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.


🔹महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.


🔸महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.


🔹महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.

महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात.


🔸महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.


🔹महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.


🔸आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो.


🔹महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.


🔸महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.


🔹महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.


🔸सध्या महाराष्ट्रात 28 महानगरपालिका आहेत. (28 वी - इचलकरंजी )


🔹पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका गणली जाते.

१००% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क असलेले हरियाणा हे भारतातील पहिले राज्य बनले आहे



◆ भारतातील हरियाणा राज्यातील रेल्वे नेटवर्क भारतीय रेल्वेद्वारे पूर्णपणे विद्युतीकरण करण्यात आले होते, ज्यामुळे ते आपल्या रेल्वे नेटवर्कचे १००% विद्युतीकरण साध्य करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे.


◆ हरियाणाचे विद्यमान ब्रॉडगेज नेटवर्क १,७०१ रूट किलोमीटर असून, जे आता १००% विद्युतीकरण झाले आहे, परिणामी कमी झालेल्या लाईन अंतराच्या खर्चात (सुमारे २.५ पट कमी), जास्त वाहण्याची क्षमता, वाढलेली विभागीय क्षमता, कमी ऑपरेटिंग आणि देखभाल खर्च यामुळे बचत होते.


➤ नवीनतम अद्यतनांनुसार, भारतातील सात विभागीय रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गांनी १००% विद्युतीकरणाचे लक्ष्य गाठले आहे.


◆ ईस्ट कोस्ट रेल्वे (ECoR)

◆ उत्तर मध्य रेल्वे (NCR) 

◆ उत्तर पूर्व रेल्वे (NER)

◆ पूर्व रेल्वे (ER)

◆ मध्य रेल्वे (CR)

◆ दक्षिण पूर्व रेल्वे (SER)

◆ पश्चिम मध्य रेल्वे (WCR)


चालू घडामोडी प्रश्नसराव


(1)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(2)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम .


(3)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- 20 फेब्रुवारी .


(4)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी .


(5)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू .


(6)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर .


(7)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा .


(8)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- 23 मार्च .


(9)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस .


(10)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.

━━━━━━━━━━━━━━

Daily Top 10 News : 4 April 2023

- - - - - - - - - - - -  - - - 

1) G20 एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची दुसरी बैठक गुवाहाटी इथं सुरू होणार


2) उपराष्ट्रपती यांच्या पत्नी सुदेश धनखड यांचा अर्थशास्त्रातल्या पीएचडी पदवीनं गौरव


3) कार्बन उत्सर्जन आटोक्यात ठेवण्यासाठी हरित हायड्रोजन हा आश्वासक पर्याय ठरेल असा भूपिंदरसिंग भल्ला यांचा विश्वास


4) भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू सलीम अझीझ यांचं निधन


5) आयपीएलमधे राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैद्राबादवर ७२ धावांनी विजय


6) पी. व्ही. सिंधू हिला माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत उपविजेतेपद


7) इस्रोची पुन्हा वापरता येणाऱ्या प्रक्षेपण यानाची स्वयं अवतरण मोहिम यशस्वी


8) भारतीय नौदलाचे नवे उपप्रमुख म्हणून व्हाइस अॅडमिरल संजय जसजित सिंग यांनी स्विकारला कार्यभार


9) मार्च 2023 मधलं जीएसटी संकलन 1 लाख 60 हजार कोटी रुपयांवर


10) शिक्षण हक्क कायदा अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरच्या प्रवेशाची ऑनलाईन सोडत पुढच्या आठवड्यात

 

भारतातील पहिले


◾️ 10,000 नवीन MSME ची नोंद करणारा पहिला जिल्हा ➖️ अर्नाकुलम


◾️ भारतातील पहिले खाजगीरीत्या तयार केलेले रॉकेट ➖️ Vikram -s ➖️ आंध्र प्रदेश


◾️ जगातील पाम लोफ हस्तलिखित संग्रहालय ➖️ केरळ


◾️ ग्रीन बॉन्ड लॉन्च करणारी देशातील पहिली नागरी संस्था ➖️इंदोर


◾️ ड्रोनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली ➖️ स्काय एअर


◾️ पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट ➖️ जम्मू आणि काश्मीर


◾️ कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 2023 ची प्रथम राष्ट्रीय लोक अदालत  ➖️  जम्मू-काश्मीर


◾️ पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस➖️  मुंबई


◾️ भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर ➖️  दिल्ली 


◾️ भारतातील पहिले फ्रोझर लेक मॅरेथॉन ➖️ लदाख


◾️ प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय ➖️  केरळ

प्रिय विद्यार्थी मित्रांनो... येणाऱ्या परीक्षेच्या बाबतीत खालील मुद्दे लक्षात घ्या;

1. 'परीक्षा होईल की नाही' यासारख्या चर्चांमध्ये लक्ष देऊ नका, परीक्षा नक्की होणार असे मनाला कायम सांगा.

2. उपलब्ध प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरा.

3.  दररोज 5 तासांचा वेळ revision साठी द्या.

4. दररोज 5 तासांचा वेळ CSAT ला द्या.

5. दररोज 2 तास जुन्या प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी यांना द्या.

6. Tension येत असल्यास सराव पेपर्स आता देऊ नका.

7. परीक्षेत आठवेल का नाही? असा विचार करू नका, आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या नसतात तर उपलब्ध पर्यायातून उत्तर शोधायचे असते.

8. पदांची संख्या , मेरिट यांचा विचार करू नका, ते तुमच्या हातात नाही.

9. पुरेशी झोप घ्या, यामुळे मन शांत राहण्यास मदत होईल.

10. आत्मविश्वास कायम ठेवा. नको त्या लोकांपासून दूर राहा.

11. राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाल्यावर लगेचच Combine पूर्वपरीक्षेवर focus ठेवा.

12.  stick to wicket, runs will come automatically.


combine रणनीती..

नमस्कार मित्रांनो,

आज आपण शेवटच्या 90 दिवसांमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी आणि 60 गुण कसे मिळवावेत याबाबत चर्चा करूयात..

♦️ 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल पाहता आता सुरक्षित गुण किती असतील याबाबत कोणीच निश्चित सांगू शकत नाही. पहिल्या उत्तरतालिका नुसार किमान 60 गुण मिळवले तरच मुख्य परीक्षेला असण्याची खात्री राहणार आहे. सर्वांनी पूर्व परीक्षेला ठरवून 60 गुणांच्या वर स्कोर करण्याची आवश्यकता आहे.

♦️ इतिहास -

मागील संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पाहता असे लक्षात येते की नेहमीच त्रास देणाऱ्या इतिहास या विषयाने विद्यार्थी मित्रांना भरपूर मदत केलेली आहे. 15 पैकी 14 गुण मिळवणारे बरेच विद्यार्थी मी स्वतः पाहिलेले आहेत त्यामुळे यंदा इतिहासामध्ये, जर पेपरचा दर्जा मागील प्रमाणेच राहिला तर, किमान 12 गुण मिळवणे अनिवार्य राहणार आहे. इतिहासाचे तयारी करण्यासाठी कोणतेही एकच आपण वापरू शकता. इतिहासामध्ये ज्ञान मिळवणे मर्यादीत असल्याने लॉजिक डेव्हलपमेंट आणि एलिमिनेशन टेक्निक्स खूप काम करतात.त्याबाबत आपण आवर्जून विचार करावा

♦️भूगोल-

बाबतीत,15 पैकी किमान 10 गुण मिळाले तर आपण पूर्व परीक्षा सहजासहजी पास होऊ शकतो.भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी सौदी सर किंवा खातीब सर किंवा दीपस्तंभ प्रकाशन यांचे पैकी कोणतेही एक महाराष्ट्राच्या भूगोल साठी वापरावे आणि भारताच्या भूगोलासाठी सौदी सरांचे पुस्तक वापरावे.

♦️पॉलिटी-

या विषयांमध्ये पूर्वी 10 पैकी 10 गुण मिळतात मात्र अभ्यासक्रमाचा आवाका व त्या तुलनेमध्ये कमी गुणांचा भारांक आणि आयोगाची प्रश्न विचारण्याची वाढत असलेली खोली पाहता सध्या आपणास 10 पैकी 7 ते 8 गुण मिळवणे आवश्यक असते. लक्ष्मीकांत सरांचे अथवा  कोळंबे सरांचे पुस्तक आपण यासाठी वापरू शकतो तसेच पंचायत राज या घटकावर येणाऱ्या 2 ते 3 प्रश्नांसाठी किशोर लवटे सरांचे पंचायत राज हे पुस्तक उपयुक्त ठरते. त्याचे वारंवार वाचन केले पाहिजे. शॉर्ट नोट्स बनवल्या पाहिजेत व त्याची वारंवार उजळणी झाली पाहिजे तरच प्रचंड डेटा आपल्या लक्षात राहू शकतो.

♦️अर्थशास्त्र-

येणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी सध्या कमी होत आहे म्हणजेच केवळ सर्वसामान्य अभ्यासावर आपण 15 पैकी 10 ते 12 गुण मिळवू शकतो. यासाठी देसले सर किंवा कोळंबे सर पैकी कोणतेही एक पुस्तक वाचण्यास पुरेसे ठरते. अर्थशास्त्राचे आयोगाचे मागील काही वर्षांचे प्रश्न पाहिल्यास आयोग कोणत्या घटकांवर किती आणि कसे प्रश्न विचारतो हे लक्षात येऊ शकते त्यामुळे पूर्वीच्या प्रश्नांना बिलकुल दुर्लक्षित करू नये.

♦️विज्ञान -

हा घटक सर्वसामान्यपणे सर्वच जनतेला किचकट वाटणारा विषय आहे तसेच प्रश्नांचा दर्जा मध्ये आयोगाने सातत्य राखलेले नाही. त्यामुळे कधी अभ्यास करून कमी मार्क तर कधी अभ्यास न करता ही सरासरी मार्क मिळतात मात्र तरीही स्टेट बोर्ड इयत्ता 7 ते 10 वी च्या पुस्तकांवर आपली कमांड असायला हवी किंवा सचिन भस्के सरांच्या पुस्तकाच्या किमान 3 ते 4 उजळण्या व्हायला हव्यात. लक्षात ठेवा की जर विज्ञान विषय अवघड आला तर तो सर्वांसाठी अवघड असेल आणि सोपा ला करतो सर्वांसाठीच सोपा असेल त्यामुळे या विषयावर ती मेरीट ठरण्याची शक्यता फार कमी असते.

♦️चालू घडामोडी-

हा पूर्व परीक्षांमधील सर्वांत अनिश्चित विषय मला वाटतो.यासाठी आयोग नक्की कोणता source वापरतो हे निश्चित समजत नाही. मात्र असे असले तरीही 15 पैकी 8 प्रश्न प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्याने सुटू शकतात. परिक्रमा हे मासिक किंवा अभिनव अथवा सिंपलिफाईड प्रकाशनाचे वार्षिकी यातून बऱ्याच अंशी घटना कव्हर होतात. त्या पुस्तकांच्या 2 ते 3 उजळण्या केल्यास किमान 7 ते 8 गुण पडण्यास हरकत नाही.

♦️गणित बुद्धिमत्ता -

हा विषय पूर्व परीक्षांमधील मार्क देणारा विषय म्हणून ओळखला जातो मात्र काही विद्यार्थ्यांना हा विषय की  किचकट जातो मात्र दररोज सराव केल्यास या विषयाची भीती मनातून निघू शकते. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका पहा व आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत यावरून बाजारात सापडणारे कोणतेही एक पुस्तक घेऊन त्यातून दररोज दोन ते अडीच तास सराव अपेक्षित आहे.

♦️अशाप्रकारे एकंदरीत आपण 60 गुणांची गोळाबेरीज परीक्षेपूर्वी जमा केली आणि त्यानुसार विषयांना वेळ वाटून दिला आणि उजळणी केली तर निश्‍चितपणे आपण संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 60 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतो. जितके जास्त गुण असतील तितकी पूर्व परीक्षा पास होण्याची खात्री अधिक असेल व त्यामुळे पूर्व परीक्षेचा निकाल पर्यंतचा वेळ वाट पाहण्यात जाणार नाही.
त्यामुळे वरील प्रमाणे अभ्यास करून अथवा आपल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करून 60 प्लस गुण मिळवणे आवश्यक ठरते.

❇️ तुमच्या अभ्यासासाठी अनेक अनेक शुभेच्छा.

👉The Achievers Mentorship.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...