२६ मार्च २०२३

महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्न सराव

🔶 दशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.

1. गुजरात🔸🔸

2. सिक्किम 

3. आसाम

4. महाराष्ट्र


भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे


 🔶  भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.

1.दिल्ली🔸🔸

2. महाराष्ट्र

3. आंध्र प्रदेश

4. चंदिगढ


 🔶 ............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.

1. मध्य प्रदेश

2. राजस्थान🔸🔸

3. सिक्किम

4. गुजरात


🔶 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.

1.02

2.06

3.07

4.05🔸🔸

 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री


 🔶 अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.

1. उत्तर

2. दक्षिण

3. मध्य

4. पूर्व🔸🔸


 🔶 भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?

1.  ग्वाल्हेर🔸🔸

2. इंदौर

3.  दिल्ली

4.  या पैकी नाही


 🔶 मबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?

1. अमर शेख

2. अण्णाभाऊ साठे🔸🔸

3. प्र. के.अत्रे

4. द.ना.गव्हाणकर


 🔶 पढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती? 

1. धुळे -गाळणा डोंगर 

2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर 

3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर

4. हिंगोली -हिंगोली डोंगर


अ. सर्वच बरोबर 🔸🔸

ब. 1, 2बरोबर 

क. 3, 4बरोबर 

ड. सर्वच चूक


 🔶  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?

1. महाराष्ट्र 🔸🔸

2. तामिळनाडु 

3. आंध्रप्रदेश 

4. पश्चिमप्रदेश


 🔶  सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?

1. नर्मदा व तापी🔸🔸

2. तापी व गोदावरी

3. कृष्णा व गोदावरी

4. कृष्णा व पंचगंगा


 🔶 कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.

1. महानदी त्रिभुज प्रदेश

2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🔸🔸

3. गोदावरी त्रिभुज प्रदेश

4. कृष्णा त्रिभुज प्रदेश


 🔶 खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.

1. मुगल ए आझम

2. किसान का नाम🔸🔸

3. आलम आरा

4. राजा हरिश्चंद्र


 🔶 भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.

1. चेन्नई

2. कोलकत्ता🔸🔸

3. चंदिगड

4. मुंबई


 🔶 मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.

1. पैठण

2. सोयगाव

3. औरंगाबाद🔸🔸

4. नांदेड


 🔶 नदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.

1. सह्याद्री

2. गाविलगड

3. सातमाळा

4. सातपुडा🔸🔸


🟣 खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?

1. ब्रिटन

2. रशिया

3. भारत

4. दक्षिण आफ्रिका


🔵 मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

1. हल्दिया

2. न्हावा-शेवा

3. कांडला

4. मार्मागोवा


🟡. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.

1. जिनिव्हा

2. पॅरिस

3. न्यूयॉर्क

4. रोम


🟠. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

1. महाड

2. औरंगाबाद

3. नाशिक

4. मुंबई


🔴 भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.

1. अडीच

2. तीन

3. साडे चार

4. साडे पाच


🟣 ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.

1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

2. लोकहितवादी

3. महात्मा फुले

4. न्या. महादेव गोविंद रानडे


🟤. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

1. द्राक्ष

2. मका

3. उस ✔️✔️

4. डिझेल


🟣. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

1. नीळ

2. भात फक्त

3. गहू फक्त

4. भात व गहू


🟡. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?

1. अमेरिका आणि मेक्सिको

2. अमेरिका आणि कॅनडा ✔️✔️

3. ब्राझिल आणि अर्जेटीना

4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड


🟠. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?

1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे

2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात

3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.

4. वरील कोणतीही नाही ✔️✔️


🔴 20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

1. 79

2. 59

3. 49 ✔️✔️

4. 39

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)



गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.


त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.


१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.


आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते. 


या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या. 


प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले. 


प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,


त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.


या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.


भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.


या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.


आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती. 


अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.


चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.


राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.


या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.


या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.

आंतरराज्यीय परिषद (Interstate Counsil)

🔶योजना आयोग व राष्ट्रीय विकास परिषद (NDC) या सल्लागारी स्वरुपाच्या संस्था असल्यामुळे राष्ट्रपती घटनेच्या.

🔶कलम २६३ नुसार आंतरराज्यीय परिषद स्थापन करु शकता. ( यास घटनात्मक दर्जा आहे.)


कार्ये –

१. राज्य व केंद्र सरकारच्या विवादांची चौकशी करणे व सल्ला देणे.

२. राज्य व केंद्र सरकार यांच्यातील परस्पर हितसंबधांवर संशोधन करणे.


🔶भारताच्या एकूण नियोजन खर्चापैकी राज्यांच्या योजनांवर ५०% खर्च होतो.

🔶नियोजीत वेळे आगोदर २ ते ३ वर्षे योजनेची प्रक्रिया सुरु होते.

🔶 नियोजीत प्रस्ताव संपूर्ण माहितीसह NDC कडे पाठविली जातात.

🔶राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना १९४९ मध्ये झाली.

🔶योजनांमध्ये सरासरी अंतर्गत वित्त पुरवठा ९०% होता.

🔶सथिर किंमतीनुसार ५० वर्षात राष्ट्रीय उत्पन्नात ३.५ पट वाढ झाली.

🔶भारताच्या विकास खर्चाचे प्रमाण ५० वर्षात ३२% वरुन ६४% पर्यंत वाढविण्यात आले.

🔶नियोजन आयोगाच्या हाती फार मोठ्या प्रमाणावर सत्ता व राष्ट्रीय नियंत्रण आहे.

🔶राष्ट्रीय योजना आयोग आपला अहवाल अर्थ आयोग / वित्त आयोग यांना सादर करते.

🔶नियोजन आयोगाची पुर्नरचना १९६७ मध्ये करण्यात आली.

🔶भारतात आर्थिक नियोजनाचा प्रथम उल्लेख सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९३१ मध्ये काँग्रेसच्या कराची येथे झालेल्या अधिवेशनात केला.

🔶नियोजन मंडळाचे सदस्य जे. सी. घोष (शास्त्रज्ञ) हे होते.

🔶भारताची आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट्ये बी. एस. मिन्हास यांनी स्पष्ट केली.


२१ मार्च २०२३

Daily Top 10 News : 21 March 2023


1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील. या परिषदेला विविध देशांचे कृषी मंत्री, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, पोषणतज्ञ, आरोग्य तज्ज्ञ, स्टार्टअप नेते आणि इतर भागधारक उपस्थित राहणार आहेत.


2) हरिद्वार येथील आयुर्वेदिक विद्यापीठाच्या ऋषीकुल कॅम्पसने नुकतेच “पशुवैद्यकीय आणि आयुर्वेद” या विषयावर आंतरराष्ट्रीय आयुर्वेट कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते. 17 मार्च रोजी सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री संजीव बालियान यांच्या हस्ते करण्यात आले.


3) संपन्ना रमेश शेलार या शारीरिक शिक्षणाच्या पदवीधर विद्यार्थिनीने श्रीलंकेतील तलाईमन्नार ते तामिळनाडूतील धनुसकोडीपर्यंत पोहण्याच्या 21 वर्षांखालील गटात सर्वात वेगवान भारतीय बनून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने 29 किमीचे अंतर अवघ्या 5 तास 30 मिनिटांत पूर्ण केले.


4) हरिद्वार येथे ‘पशुवैद्यकीय आणि आयुर्वेद’ या विषयावर आंतरराष्ट्रीय आयुर्वेत संमेलनाचे उद्घाटन झाले.


5) भारताच्या G20 अध्यक्षतेखालील Startup20 Engagement Group (B20) ची दुसरी बैठक 18-19 मार्च रोजी गंगटोक, सिक्कीम येथे झाली आहे.


6) ग्लोबल टेररिझम इंडेक्स मध्ये भारत 13 व्या क्रमांकावर आहे.


7) जी कृष्णकुमार यांची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


8) मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विधानसभेत वित्त आणि विनियोग विधेयकावरील चर्चेदरम्यान राज्यात 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभाग निर्माण करण्याची घोषणा केली. राजस्थानमध्ये आता 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभाग असतील, ज्यामुळे जिल्ह्यांची संख्या 50 आणि विभागांची संख्या 10 होईल.


9) राम सहाया प्रसाद यादव हे नेपाळचे तिसरे उपराष्ट्रपती बनले आहेत.


10) सेव्हन पीएम मित्रा (प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल) पार्क साइट्सची घोषणा करण्यात आली.

पोलीस भरती प्रश्नसंच


1. एका विशिष्ट रक्कमेवर 7 % दराने 2 वर्षात 1449 रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर ती रक्कम कोणती?

1000 

10000🏆

12000

1200


2. 4312 x 5417 =?

23358104 🏆

23357104

23348104

23349104


3. 96435 या संख्येतील 6 व 3 यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती?

6300

6030🏆

603


4. एका त्रिकोणाच्या कोनांचे गुणोत्तर 3: 4: 5 आहे लहान व मोठ्या कोणातील अंतर 30°आहे तर मोठ्या कोणाचे माप किती?

30° 

45°

75°🏆

60°


 

5. 72 किमी प्रती तास या वेगाने जाणारी रेल्वे 50 सेकंदात किती अंतर कापेल?

900 

800

1000🏆

1200


6. 20 वर्ष वय असलेल्या मुलाचे 55 वर्ष वय असलेल्या वडीलांशी असलेले गुणोत्तर किती?

4: 11 🏆

11: 4

 5: 4 

5: 11


7. x आणि y दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात तेच काम स्वतंत्रपणे y 20 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम X किती दिवसात पूर्ण करेल?

10 

20🏆

15

25


8. संयुक्त संख्या ओळखा . 7, 3, 5, 9

9 🏆

5

7

3


 

9. जय व हरि १४०० रुपयात अनुक्रमे १ शर्ट व खरेदी केला. हरीच्या किंमत जायच्या शर्टच्या किमतीपेक्षा ३०० रुपयाने अधीक आहे तर शर्टची किमत किती?

750 

850

1100

550🏆


10. एका संख्येमध्ये त्याचा संख्येचे 10% मिळवले असता 44 ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती?

30 

35

20

40🏆


11. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

49, 121,169,289, _.

256 

324

361🏆

441


12. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

AZ, CX, EV, GT, _.

HS 

HT

IR🏆

IQ


13. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

12: 35: : : ? : 63

14 

15

16🏆

18


14. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

ab _ cd _ cbcd

aa, bb 

cc, aa

ca, bc

cb, ab🏆


 

15. मुंबईवरून अहमदनगरला जाण्यास प्रत्येक 90 मिनिटास एक वस आहे अमरल सकाळी 7: 00 वा बसस्थानकात गेल्यानंतर समजले की पहिली बस 25 मिनिटापूर्वीच गेलेली आहे तर नंतरची बस सुटण्याची वेळ काय असेल?

7: 25 

7: 45

7: 55

8: 05🏆


16.एका सांकेतिक लिपीत BAD हा शब्द 14 असा लिहिला तर MAD हा शब्द कसा लिहाल?

 16 

36🏆

45

60


17.एका सांकेतिक लिपीत WETHER = 13119753 तर WERE = ?

7357 

57911

131135🏆

35115


18. एका सांकेतिक लिपीत BOOK हा ANNJ शब्द असा लिहितात तर PENCIL हा शब्द कसा लिहाल?

QFODJM 

AFODJM

QFOJMD

ODMBHK🏆


 

19. जर 1 = D, 2 = Y, 3 = X, 4 = P, 5 = N, तर 2351432 =?

YXPDPYX 

YXNDPXY🏆

 XYNDPYX

XYDNPYX


20. जर ANSWER म्हणजे REWSNA तर QUESTION म्हणजे काय?

NOITSEUQ 🏆

QRQTJSON

QNUOESTI

PDVJSTON


31. खालीलपैकी संत एकनाथ यांची रचना कोणती?

भावार्थरामायण 🏆

अभंगगाथा

भावार्थदीपीका

गीतारहस्य


32. आपण सर्वांनी हळू वाचावे

सकर्मक कर्तरी 

सकर्मक भावे

अकर्मक भावे🏆

यापैकी नाही


33. पंचमुखी

दिगू 

बहुव्रीही🏆

कर्मधारेय 

अव्ययीभव


34. खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा.

विसावा 

विश्रांती

विश्राम🏆

 आराम


 

35. नाशिकहून मुंबई २०० किलोमिटर आहे.

तृतीय 

पंचमी🏆

सप्तमी

व्दितीय


36. राजनने अभ्यास केला.

चतुर्थी  

व्दितीया

तृतीया🏆

षष्ठी


37. अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा दाढी धरणे

पकडून ठेवणे 

कचाट्यात पकडण🏆

आळवणी करणे

शरण आणणे


38. 'आणि' हे कोणते अव्यय आहे?

विकल्प बोधक  

परिणामबोधक 

संकेतबोधक 

समुच्चयबोधक🏆


 

39. ‘तळे राखी तो पाणी चाखी’ या म्हणीचा योग्य अर्थ दया .

तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही  

तळेराखणारा मनुष्य पाणी पितोच 

ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते,तो त्या वस्तू चा उपभोग घेतोच 🏆

तळेराखणारा अधिकाराचा वापर करतो 


40. सज्जन 

सत् + जन  🏆

सन् + जन 

सज् + जन 

सज् + ज्जन


21. ......... हा संघराज्य व घटकराज्य  यामधील दुवा म्हणून कार्य करतो?

मुख्यमंत्री 

पंतप्रधान

राष्ट्रपती

राज्यपाल


22. कोणतेही अर्थविधेयक -------------- मान्यतेशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही?

राष्ट्रपती 🏆

अर्थमंत्री

पंतप्रधान

मंत्रीमंडळ


23. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या राष्ट्राच्या घटनेवरुन घेण्यात आली?

आफ्रिका 

आयर्लंड🏆

अमेरिका

कॅनडा


24. भारतीय राज्यघनेच्या ........... कलमानुसार समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे?

१४ ते १८ 🏆

३१ ते ३५

२२ ते २

३१ ते ५


 

25. केंद्रीय मंत्रीमंडळातील एखादा सदस्य संसदेंच्या कोणत्याही गृहाचा सदस्य नसेल तर शपथ ग्रहण केल्यापासून --------- त्यासा कोणत्याही एका गृहाचे सदस्यत्व मिळविणे बंधनकारक आहे?

तीन महिन्याच्या आत 

सहा महिन्याच्या आत🏆

एका न्यायालयाची आत

पाच वर्षाच्या आत


26. केंद्रीय कायदेमंडळात कुणाचा समावेश असतो ?

लोकसभा 

राज्यसभा

राष्ट्रपती

यापैकी सर्व🏆


27. महान्यायवादीची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे?

राष्ट्रपती 🏆

कायदा आयोग

सर्वोच्च न्यायालय

कायदेमंत्री


28. राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

१८ 

१२🏆

१६

२०


 

29. राष्ट्रपतीचे आणीबाणीविषयक अधिकार ---------- घटनेवरून घेण्यात आले आहेत

रशियाच्या 

ऑस्ट्रेलियाच्या

वायरमन प्रजासत्ताक🏆

कॅनडाच्या


30. संसद सदस्य होण्याकरिता कोणत्याही व्यक्तीला किमान कोणती पात्रता पूर्ण करावी लागते?

तो भारताचा नागरिक असावा 

त्याच्या वयाला २५ वर्षे पूर्ण असावीत

लोकप्रतिनिधी कायघात देण्यात आलेल्या सर्व अटी पूर्ण कराव्यात

यापैकी सर्व🏆

महत्त्वाचे प्रश्नसंच

1. भारतीय संविधानाने भारताचे वर्णन —– केले आहे.

संघराज्य

विधानमंडळ

राज्यांचा संघ

विधान परिषद

उत्तर : राज्यांचा संघ


2. कोलकाता उच्चन्यायालयाचे अधिकार क्षेत्र —— या संघराज्य क्षेत्रात विस्थारित केलेले आहे.

दिल्ली

अंदमान-निकोबार बेटे

पौंडेचेरी

दीव व दमण

उत्तर : अंदमान-निकोबार बेटे



 

3. ग्रामपंचायतीचा पंचांची निवडणूक —– पद्धतीने होते.

प्रत्यक्ष मतदान

अप्रत्यक्ष मतदान

प्रौढ मतदान

प्रौढ पुरुष मतदान

उत्तर : प्रौढ मतदान


4. गोगलगाय —– या संघात मोडते.

मोलुस्का

आर्थोपोडा

इकायनोडमार्ट

नेमॅटोडा

उत्तर : मोलुस्का


5. संतृप्त हायड्रोनकार्बनमधील दोन कार्बन अणूंमध्ये —– असतो. 

एकेरी बंध

दुहेरी बंध

तिहेरी बंध

यापैकी एकही नाही

उत्तर : एकेरी बंध


6. —– हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

शुक्र

बुध

मंगळ

पृथ्वी

उत्तर : बुध


7. ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

मुल्क राज आनंद

शोभा डे

अरुंधती राय

खुशवंत सिंग

उत्तर : शोभा डे


8. नियोजित आलेवाडी बंदर —— जिल्ह्यात आहे.

सिंधुदुर्ग

ठाणे

रत्नागिरी

रायगड

उत्तर : ठाणे


9. —– शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

मुंबई

बंगलोर

कानपूर

हैदराबाद

उत्तर : बंगलोर


10. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्त्रियांसाठी किती जागा राखीव असतात?

01

02

03

यापैकी एकही नाही

उत्तर : यापैकी एकही नाही


11. भारतातील संसदीय व्यवस्थेचा —— हा केंद्रबिंदु आहे.

मुख्यमंत्री

महाधीवक्ता

पंतप्रधान

महान्यायवादी

उत्तर : पंतप्रधान



 

12. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?

9800 J

980 J

98 J

9.8 J 

उत्तर : 980 J


13. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

राजा राममोहन रॉय

केशव चंद्र सेन

देवेंद्रनाथ टागोर

ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर : राजा राममोहन रॉय


14. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

डॉ. बी.आर. आंबेडकर

वि.रा. शिंदे

महात्मा जोतिबा फुले

भास्करराव जाधव

उत्तर : वि.रा. शिंदे


15. खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?

अॅथलेटिक्स

कुस्ती

क्रिकेट

स्विमींग

उत्तर : अॅथलेटिक्स


16. कोणत्या प्राण्याला ‘राष्ट्रीय वारसा’ हा दर्जा भारत सरकारने बहाल केला?

हत्ती

वाघ

सिंह

हरिण

उत्तर : हत्ती


17. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराने वयाची —— वर्षे पूर्ण केलेली असावीत.

21

25

30

35

उत्तर : 35


18. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पद्धती —– साली सुरू झाली.

1 मे 1960

1 मे 1961

1 मे 1962

1 मे 1965

उत्तर : 1 मे 1962



 

19. सध्या महाराष्ट्राचा विधानसभेत —– सभासद संख्या आहे.

78

238

250

288

उत्तर : 288


20. खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे?

CO२

H२S

SO२

NH३

उत्तर : NH३

सराव प्रश्न

1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर ----- कि.मी. असते.

1. 110

2. 115

3. 105

4. 120

उत्तर : 110


2. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ------ येथे आहे.

1. पेंच

2. मणिकरण

3. कोयना

4. मंडी

उत्तर : मणिकरण


3. 'स्पीड पोस्ट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

1. मुल्क राज आनंद

2. शोभा डे

3. अरुंधती राय

4. खुशवंत सिंग

उत्तर : शोभा डे


4. नियोजित आलेवाडी बंदर ------ जिल्ह्यात आहे.

1. सिंधुदुर्ग

2. ठाणे

3. रत्नागिरी

4. रायगड

उत्तर : ठाणे


5. ----- शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

1. मुंबई

2. बंगलोर

3. कानपूर

4. हैदराबाद

उत्तर : बंगलोर


6. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

1. 20 मीटर

2. 200 मीटर

3. 180 मीटर

4. 360 मीटर

उत्तर : 200 मीटर


7. मुंबई उच्च न्यायालयाची ----- खंडपीठे आहेत.

1. दोन

2. तीन

3. चार

4. एक

उत्तर : तीन


8. राज्याचा आकस्मिक निधी ------ च्या अखत्यारीत असतो.

1. राज्यपाल

2. मुख्यमंत्री

3. मंत्रीपरिषद

4. राज्यविधानमंडळ

उत्तर : राज्यपाल


9. स्पायरोगायरा ----- शेवाळ आहे.

1. नील-हरित

2. हरित

3. लाल

4. रंगहीन

उत्तर : हरित


10. ------ वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

1. नायट्रोजन

2. अमोनिया

3. हेलियम

4. कार्बन डाय-ऑक्साइड

उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड

लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती:

लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.


सभासदांची संख्या :

घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. भारतीयलोकप्रतींनिधी कायदा 1951 नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.


मतदारसंघ निर्धारण आयोग :

या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.


उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


निवडणूक पद्धत :

लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते. ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते.


लोकसभेचा कार्यकाल :

पाच वर्ष इतका आहे परंतु तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी 83/2 कलमानुसार वाढवू शकतो.


सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देऊ शकतो.


बैठक किंवा अधिवेशन :

घटनेच्या 85 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची वाटेल त्या वेळी अधिवेशन बोलवितो परंतु दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


गणसंख्या :

कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.


पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)


लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :

लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते.


कार्य :

1. धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे.

2. प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.

3. प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.

4. कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.

5. सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.

6. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.

7. राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे.

8. सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो.

आतापर्यंत झालेल्या व होणाऱ्या सर्व जी २० परिषदा

🇺🇲 ०१ली : २००८ : वॉशिंग्टन , अमेरिका 

🇬🇧 ०२री :  २००९ : लंडन , ब्रिटन 

🇺🇲 ०३री :  २००९ : पीट्सबर्ग , अमेरिका

🇨🇦 ०४थी : २०१० : टोरांटो , कॅनडा 

🇰🇷 ०५वी : २०१० : सियोल , दक्षिण कोरिया 

🇫🇷 ०६वी : २०११ : कान्स , फ्रांस 

🇲🇽 ०७वी : २०१२ : लॉस कॉबोस , मॅक्सिको

🇷🇺 ०८वी : २०१३ : सेंट पिटर्सबर्ग , रशिया 

🇦🇺 ०९वी : २०१४ : ब्रिस्बेन , ऑस्ट्रेलिया 

🇹🇷 १०वी : २०१५ : अंतालिया , तुर्की 

🇨🇳 ११वी : २०१६ : हांगझोऊ , चीन

🇩🇪 १२वी : २०१७ : हैम्बर्ग , जर्मनी 

🇦🇷 १३वी : २०१८ : अर्जेंटिना

🇯🇵 १४वी : २०१९ : ओसाका , जपान 

🇸🇦 १५वी : २०२० : सौंदी अरेबिया

🇮🇹 १६वी : २०२१ : इटली 

🇮🇩 १७वी : २०२२ : इंडोनेशिया

🇮🇳 १८वी : २०२३ : भारत

🇧🇷 १९वी : २०२४ : ब्राझील .


✔️ जी २० देश 


🇺🇲 अमेरिका

🇦🇷 अर्जेंटिना 

🇦🇺 ऑस्ट्रेलिया 

🇧🇷 बराझील 

🇨🇦 कनडा 

🇨🇳 चीन

🇪🇺 यरोपियन संघ 

🇫🇷 फरान्स 

🇩🇪 जर्मनी

🇮🇳 भारत 

🇮🇩 इडोनेशिया

🇮🇹 इटली 

🇯🇵 जपान

🇲🇽 मक्सिको 

🇷🇺 रशिया 

🇸🇦 सौदी अरेबिया 

🇿🇦 दक्षिण आफ्रिका 

🇰🇷 दक्षिण कोरिया

🇹🇷 तर्की

🇬🇧 बरिटन .

दुसरी पंचवार्षिक योजना (Second Panchwarshik Scheme)


कालावधी : 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961.

मुख्य भर : जड व मूलभूत उद्योग.

प्रतिमान : पी. सी. महालनोबिस.

प्राधान्य क्षेत्र : (i) ऊद्योगधंदे व खानी

                 (ii) दळणवळण

                 (iii) शेती.

अपेक्षित वृद्धी दर : 4.5%.

प्रत्यक्ष वृद्धी दर : 4.5%.

योजनेचे उपनाव : नेहरू – महालनोबिस योजना.

योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च – 4800 कोटी रु,

                  वास्तविक खर्च – 4600 कोटी रु.


उद्दिष्टे :

विकासाचा दर 7.5% प्रतिवर्ष एवढा संपादन करणे.

जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून उद्योगीकरण.

10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार.

समाजवादी समाजरचनेचे तत्व हे आर्थिक नीतिचे लक्ष्य महणून स्वीकारण्यात आली.


प्रकल्प :

भिलाई पोलाद प्रकल्प – रशियाचा (1959)

रूरकेला पोलाद प्रकल्प – प. जर्मनी (1959)

दुर्गापुर पोलाद प्रकल्प – ब्रिटन  (1962)

BHEL – भोपाल

दोन खत कारखाने – (i) नानागल (ii) रूरकेल


🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

📚  खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश


✔️कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन

✔️ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.

✔️अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.

✔️ करोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.

✔️जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.

✔️टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.

✔️टगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.

✔️तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.

✔️तल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.

✔️निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.

✔️बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.

✔️सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.

✔️यरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.

✔️पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.

✔️मगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.

✔️ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.

✔️लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.

✔️ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम


― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.

― मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. 

― (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. 

― ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड.

― गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान.

― कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.

― प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ.

― बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.

― या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली.

― सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.

― या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.

― काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.

― व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.

― मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.

― भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.

― निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.

― स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.

― भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले.


▪️छोडो भारत चळवळ


क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला. ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादीगटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.


▪️नेताजी सुभाष चंद्र बोस


भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.


▪️आझाद हिंद सेना


ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.


▪️भारतीय नौदलाचा उठाव


आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्‍या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली. या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.

---–----------------------------------------------------

पाचवी पंचवार्षिक योजना (Fifth Panchwarshik Scheme)

कालावधी : 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979

मुख्यभर : गरीबी हटाओ / दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन

प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र

योजना खर्च : प्रास्ताविक खर्च – 37,250 कोटी रु व वास्तविक खर्च – 39,426 कोटी रु.

अपेक्षित वृद्धी दर – 4.4%

प्रत्यक्ष वृद्धी दर – 5%



उद्दिष्टे :

1. आर्थिक वाढ – लक्ष्य – 4.4%

2. दारिद्र्य निर्मूलन

3. उत्पादक रोजगारात वाढ



प्राधान्य :

1. शेती

2. उद्योग

3. इंधन / ऊर्जा


कार्यक्रम :

TRYSEM – ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम.

किमान गरजा कार्यक्रम –

1. दरिद्री रेषेतील कुटुंबांना मोफत व अनुदानित सेवा.

2. ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादक कार्यकक्षमता वाढविणे.




विशेष घटनाक्रम :

1. 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या.

2. 1976-77 मध्ये दुसर्‍यांदा भारताचा व्यापारतोल अनुकूल ठरला.

3. 1976 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले.

4. 1975-76 मध्ये बाल कल्याणासाठी एकात्मिक बाल विकास योजना (ICDS) सुरू करण्यात आली.

5. 1977-78 मध्ये वाळवंटी क्षेत्रामध्येपरिस्थिकीय संतुलन प्रस्थापित करण्यासाठी वाळवंट विकास कार्यक्रम (DDP)सुरू करण्यात आला.


मूल्यमापण :

1. अशुभ सुरवात –1973 चातेलाचा झटका व चलन फुगवट्याच्या वाढत्या दरामुळे.

2. दरिद्रय निर्मूलन, बेरोजगारी, आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश.

3. मात्र योजनेच्या शेवटी अर्थव्यवस्थेत मोठ्या वाढीच्या दराची अपेक्षा निर्माण झाली होती.   

4. 26 जुन 1975 – आणीबाणीची घोषणा

5. 1 जुलै 1905 – 20 कलमी कार्यक्रम.


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

९ वी पंचवार्षिक योजना

👉 कालावधी: इ.स. १९९७ - इ.स. २००२

👉 पराधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती 👉 घोषवाक्य : सामाजिक न्याय आणि समनतेसह आर्थिक वाढ. 

👉 खर्च : 

👉 परस्तावित खर्च- ८,९५ ,२०० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- ९,४१,०४० कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. कस्तुरबा गांधी शिक्षण योजना(१५ ऑगस्ट १९९७)- स्त्री साक्षरता कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुलींच्या शाळा काढणे. 

👉 २. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना(डिसेंबर १९९७)- शहरातील बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार 

👉 ३. भाग्यश्री बाल कल्याण योजना 

👉 ४. राजराजेश्वरी महिला कल्याण योजना(१९ ऑक्टोबर १९९८)- स्त्रियांसाठी विमा संरक्षण 

👉 ५. अन्नपूर्णा रोजाना(मार्च १९९९) - पेन्शन न मिळणाऱ्या जेष्ठ नागरिकांना १० किलो अन्नधान्य पुरवठा. 

👉 ६. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना(१ एप्रिल १९९९)- IRDP, TRYSEM, DWCRA, SITRA, गंगा कल्याण योजना, दशलक्ष विहिरींची योजना या सहा योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली. 

👉 ७. जवाहर ग्राम समृद्धी योजना(१ एप्रिल १९९९)- सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती 

राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ?

 देशांतर्गत संस्था व व्यक्तींनी एका आर्थिक वर्षात मिळवलेले उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्न हे तीन पद्धतीने मोजली जाते.


1) उत्पन्न पद्धत (income method)

2) उत्पादन पद्धत (product method)

3)  खर्च पद्धत (expenditure method)


 1) उत्पन्न पद्धत(income method) –

    या पद्धतीत उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणार्‍या घटक उत्पन्नाच्या आधारावर केली जाते.वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, उद्योग, कौशल्य वापरले जाते.त्यांच्या मालकांना उत्पन्न म्हणजे खंड, मजुरी, व्याज व नफा प्राप्त होतो. याला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे उत्पन्न पद्धत म्हणतात.  उत्पन्न पद्धतीत घटक किंमत विचारात घेतली जाते.


 2) उत्पादन पद्धत (product method) –

       या पद्धतीत राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धित यांची बेरीज करून काढली जाते. उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजलेले असते.


 3) खर्च पद्धत(expenditure method) –

           राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप खर्च पद्धतीने ही करता येते. अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो. यासाठी उपभोग खर्च व गुंतवणूक खर्च यांची बेरीज केले जाते.  उपभोग खर्च खाजगी आणि सरकारी अशा प्रकारचा असतो.  गुंतवणूक खर्च देशातील आणि परदेशातील असा दोन प्रकारचा असतो.

जवाहर ग्राम योजना

योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1999


योजनेत कार्यवाही नववी पंचवार्षिक योजना

लक्ष रोजगार निर्माण करणे

उद्देश जवाहर रोजगार योजनेस अधिक प्रभावी आणि व्यवहारिक बनविण्याच्या दृष्टीने जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आली ग्रामीण भागामध्ये मागणी आधारीत सुविधा उभारून शाश्वत मालमत्ता उभारणे व निरंतर रोजगार उपलब्ध करणारी कायमस्वरूपी  साधन सामग्री तयार करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.

जवाहर ग्रामसमृद्धी योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या 75:25% आर्थिक सहभागातून सुरू करण्यात आली.


🔰शेती.

वानिकी, लॉगिंग आणि मासेमारी यासारख्या शेती आणि संबंधित क्षेत्राचा वाटा जीडीपीच्या  होता, या क्षेत्राने  2014 मध्ये एकूण कामगारांपैकी% रोजगार मिळविला. कृषी क्षेत्राने जीडीपीच्या २% काम केले आणि देशातील एकूण कामगारांपैकी  रोजगार उपलब्ध झाला. 

मध्ये 2016  भारतीय अर्थव्यवस्था वैविध्यपूर्ण आणि घेतले आहे म्हणून, जीडीपी शेती योगदान हळू हळू 1951 ते 2011 पर्यंत कमी झाली आहे, पण तो अजूनही देशातील सर्वात मोठी रोजगार स्रोत आणि त्याच्या एकूणच सामाजिक व आर्थिक विकास लक्षणीय तुकडा आहे.

 पंचवार्षिक योजनांमध्ये शेतीवर विशेष भर देण्यात आल्यामुळे आणि सिंचन, तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धतींचा वापर आणि शेती पतपुरवठा यांच्या तरतूदीत सातत्याने सुधारणा केल्यामुळे सर्व पिकांचे पीक-उत्पन्न-प्रति-युनिट-क्षेत्र १ since since० पासून वाढले आहे.

भारतातील हरित क्रांतीपासून अनुदान. तथापि, आंतरराष्ट्रीय तुलनेत भारतातील सरासरी उत्पादन हे सहसा जगातील सर्वाधिक सरासरी उत्पादनाच्या 30% ते 50% पर्यंत असल्याचे दिसून येते. राज्यांत उत्तरप्रदेश , पंजाब , हरियाणा , मध्यप्रदेश , आंध्रप्रदेश , तेलंगणा , बिहार , पश्चिमबंगाल , गुजरात आणिभारतीय शेतीत महाराष्ट्र महत्त्वपूर्ण योगदान देणारा आहे.

२० मार्च २०२३

परश्न सराव



🔶 दशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.

1. गुजरात🔸🔸

2. सिक्किम 

3. आसाम

4. महाराष्ट्र


भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे


 🔶  भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.

1.दिल्ली🔸🔸

2. महाराष्ट्र

3. आंध्र प्रदेश

4. चंदिगढ


 🔶 ............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.

1. मध्य प्रदेश

2. राजस्थान🔸🔸

3. सिक्किम

4. गुजरात


🔶 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.

1.02

2.06

3.07

4.05🔸🔸

 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री


 🔶 अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.

1. उत्तर

2. दक्षिण

3. मध्य

4. पूर्व🔸🔸


 🔶 भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?

1.  ग्वाल्हेर🔸🔸

2. इंदौर

3.  दिल्ली

4.  या पैकी नाही


 🔶 मबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?

1. अमर शेख

2. अण्णाभाऊ साठे🔸🔸

3. प्र. के.अत्रे

4. द.ना.गव्हाणकर


 🔶 पढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती? 

1. धुळे -गाळणा डोंगर 

2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर 

3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर

4. हिंगोली -हिंगोली डोंगर


अ. सर्वच बरोबर 🔸🔸

ब. 1, 2बरोबर 

क. 3, 4बरोबर 

ड. सर्वच चूक


 🔶  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?

1. महाराष्ट्र 🔸🔸

2. तामिळनाडु 

3. आंध्रप्रदेश 

4. पश्चिमप्रदेश


 🔶  सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?

1. नर्मदा व तापी🔸🔸

2. तापी व गोदावरी

3. कृष्णा व गोदावरी

4. कृष्णा व पंचगंगा


 🔶 कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.

1. महानदी त्रिभुज प्रदेश

2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🔸🔸

3. गोदावरी त्रिभुज प्रदेश

4. कृष्णा त्रिभुज प्रदेश


 🔶 खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.

1. मुगल ए आझम

2. किसान का नाम🔸🔸

3. आलम आरा

4. राजा हरिश्चंद्र


 🔶 भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.

1. चेन्नई

2. कोलकत्ता🔸🔸

3. चंदिगड

4. मुंबई


 🔶 मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.

1. पैठण

2. सोयगाव

3. औरंगाबाद🔸🔸

4. नांदेड


 🔶 नदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.

1. सह्याद्री

2. गाविलगड

3. सातमाळा

4. सातपुडा🔸🔸

गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती

◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. 


◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. 


◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. 


◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. 


◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. 


◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. 


◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  


★ गोदावरी नदीचा उगम :-


◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. 


◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. 


◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.


◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते. 


◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. 


◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.


◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.


★ गोदावरीच्या उपनद्या:-


◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.


★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-


◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.


★ गोदावरी नदीवरील धरणे:-


◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.


◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. 


◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.

आदिवासी समुह लक्षणे व वैशिष्ट्ये

*🔻- लक्षणे -*---


१) आदिवासी समुह हा निश्चित भूप्रदेशात राहनारा एक सजातीय समुह आहे.


२) प्रत्येक आदिवासी समुहाला व जमातीला एक विशिष्ट असे नाव परंपरेनुल़सार प्राप्त झालेले असते.

उदा- गौंड, कोरकू, भिल्ल इत्यादी.


३) प्रत्येक आदिवासी जमातीची भाषा भिन्न असते. ती बोलीभाषा असु शकते किंवा लिपीबद्ध भाषा सुद्धा असु शकते. भारतात सुमारे ४०० पेक्षा अधिक बोलीभाषा बोलनारे  आदिवासी समुह आहेत.


४) एकाच पुर्वजापासुन आपली निर्मिती झाली असे माननारा हा समुह आहे. म्हनजे तो रक्तबंध आणि विवाह नात्यावर आधारित असनारा समुह आहे.


५) पोषाख पद्धती, विवाह पद्धती, रितीरिवाज, इत्यादी बाबतवएकवआदिवासि समुह दुसऱ्या आदि़वासि समुहापेक्षा वेगळा असतो.


६) निरक्षरता हे आदिवासि समुहाचे ठळक वैशिष्ट्य अाहे.


७) जादूटोना व धर्म यांच्या आचरनाला आदिवीसि समुहात विशेष महत्व दिले जाते.


८) यंत्र सामुग्रीचा उपयोग, औद्योगीक विकास याबाबतित हा समुह अगदी प्राथमिक अवस्थेत असतो.


९) आदिवासी समुहातील लोक उपजिविकेल़साठी सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरनावर अवलंबून असतात. साधी अर्थव्यवस्था व सरळ व सोपी समाजव्यवस्था हे आदिवासी समुहाचे महत्वपुर्ण असे सामान्य लक्षन आहे.

=========

*🔻- आदिवासी समुह वैशिष्ट्य-*


१) *विशिष्ट भूप्रदेश*---

   एका आदिवासी जमातीची एका विशिष्ट भूप्रदेशात वस्ती असते. 

उदा - ठाणे जिल्ह्यातील डहानुचा परिसर सोजून अन्यत्र वारली आदिवासी जमातीची वस्ती आढळत नाहि. 

कोरकू, कोलाम व अन्य आदिवासी समुहाची वस्ती एक विशिष्ट भूप्रदेशात असव्याचे दिसुन येते. कोनत्याही अडचनी आल्या तरा ते अापली वस्ती सोडून जान्यास तयार नसतात. 


२) *समूहाचा आकार*---

   आदिवासी समुहाचा आकार लहान असतो. आदिवासींच्या काहू गावांमध्ये वा वस्त्यांमध्ये २०-२५ घरे म्हनजेच १००-१५० लोक रहात असतात . दुर्गम परिसर व समुहाची सदस्य संख्या कमी यामुळे त्यांच्या सामाजिक संपर्काचे क्षेत्र अत्यंत मर्यादित असते.


३) *रक्त संबंधांवर आधारीत सजातीय समुह*---

   आपला पुर्वज एकच आहे अशी धारना आसाऱ्या काही कुटुंबाचा एक गट म्हनजे कुळ होय. एकाच कुळातील सदस्यांमध्ये बंधुत्वाचे नाते असते. एका आदिवासी जमातीत वा समुहात कुळांची संख्या मर्यादित असते. स्वत:चे कुळ सोडून अन्य कुळातील वधुशी किंवा वराशी विवाहसंबंध जोडले जातात. 


४) *विवाहपद्धती*---

   विवाह हे केवळ वधू- वर या देन व्यक्तिंना जोडनारे बंधन नसुन ते देन कुटुंबांना व कुळांना जोडनारे साधन आहे.़,अशी आदिवासी समुहाची धारना आहे. या समुहात वधूपित्याला योग्य ते मुल्य देउन वधू प्राप्त केली जाते. वधूमुल्य देणे ही वधूजवळ असलेल्या पात्रतेची व गुनांची पावता हेय असे मानले जाते. विवाहापुर्वी मुलगी आर्थिक स्वरुपाची कार्य करत असते. यामुळे विवाहानंतर पतिचे आर्थिकनउत्पन्न वाढते व वडिलांचे कमि होते. म्हनुन वधूमुलिय देने योग्य आहे , असे आदिवासी समुहात मानले जाते.


५) *कुटुंबपद्धती*---

   या समुहात सामान्यपने दोन पिढ्यांचे एकत्र कुटुंब असते. या कुटुंबात भावंडांचे एकमेकांवर वि़लक्षन प्रेमव असते. आदिवासी समुहात पितृसत्ताक कुटुंबपद्धती मोठ्या प्रमानावर आहे. तसेच काही मोजक्या समुहात मातृसत्ताक पद्धती आहे. या समुहात कुटुंबप्रमुखांचा अधिकार व नियंत्रण बिनातक्रार मान्य केले जाते. कुटुंबसदस्यांच्या आर्थिक, धार्मिक, राजकिय व सामाजिक वर्तनावर कुटुंबसंस्थेचे बारीक लक्ष असते.


६) *आर्थिक स्थिती*---

   आदिवासींच्या जिवनावश्यक गरजा मर्यादित असुनदेखिल त्या पुर्ण करन्यासाठी त्यांना झगडावे लागते. आदिवासि कंदमुळे गैळा करने, शिकार, मासेमारी, पशुपालन ,शेती, मोलमजुरी यांसारख्या आर्थिक क्रिया करतात. वस्तीच्या सभोवती असनाऱ्या नैसर्गिक बक्यावरनावर त्यांनी कोनत्या आर्थिक क्रिया कराव्यात हे अवसंबुन असते. आर्थिक क्रिया करताना ते परंपरागत अवजारे व पद्धतिंचा वापर करतात. 

उदा - भाला, धनुष्य बान , कोयता यांचा शिकार करन्यासाठी उपयोग करतात. नफा मिळवने हे त्यांचे ध्येय नाही. जीवनाश्यक मुलभूत गरजा भागविता येतिल एवढेच उत्पन मिळविन्याचा ते प्रयत्न करतात. परंतु तेवढे देखिल उत्पन त्यांवा मिळत नाही. यामुळेवजवळ जवळ सर्वच आजटदिवासी दारिद्य्रा खालिल जिवन जगतात.


७) *धर्म व जादूचा प्रभाव*---

   आजिवासींच्या जिवनावर धर्म व जादूचा प्रभाव आहे. निसर्ग पुजा व पुर्वज पुजा हे दोन प्रकार त्यांच्यात दिसुन येतात. तेवस्वत:च्या शरिरावर कुसचिन्ह गौंदवून घेतात. तसेचवघरांवर ही कुलचिन्हांची चित्रे काढतात. यामळे शरिराचे व घराचे संरक्षन होते अशी त्यांची धारना आहे. भूत, पिशाच यांची बाधा झाल्यामळेच रोग होतात, असा त्यांचा विश्वास आहे. म्हनुनच सर्व आदिवासी समुहांमध्ये मात्रिकाला महत्वपुर्ण स्थान प्राप्त झाल्याचे दिसुन येते.


८) *शिक्षण व मनोरंजनाची साधने*---

   दुर्गम भागात राहनाऱ्या आदिल़वासिंचे जिवन खडतर असते. नाचगाणी, नकला, खेळ, देवदेवतांचे उत्सव यामुळे त्यांच्या जिवनात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते. युवागृहे किंवा शयनगृहे यांना त्यांच्या जिवनात खास महत्व आहे. वयाच्या चौथ्या वर्षी मुलांना व मुलींना युवागृह या संस्थेत दाखल करतात. विवाह होइपर्यंत मुले व मुली युवागृहाचे सदस्य असतात. जमातीचा इतिहास, प्रथा, परंपरा याची माहिती युवागृहे आपल्या सदस्यांना देतात. युवागृहाचे हे शैत्षनिक कार्य आदिवासी समुहासाठी अत्यंत महत्वाचे असते.


९) *स्त्रियांचा दर्जा*---

   आदिवासी समुह आर्थिकदृष्ट्या अप्रगत असले तरीही या समुहांमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीची वागनुक दिली जाते. बहुताश आदिवासी जमातींमध्ये स्त्रियांचा आर्थिक क्रियांनध्ये समावेश असतो. काही समुहांमध्ये स्त्रियांना पुरोहित म्हनुन विधी करन्याचा तसेत मृत कुटुंबसदस्याच्या प्रेताचा अग्निसंस्कार करन्याचा अधिकार आहे.


१०) *जीवनपद्धती*---

   आदिवासी समुह सदस्यांचे परस्पर संबंध हे रक्तसंबंध व दर्जा यावर आधारलेले असतात. रुढी, परंपरा,श्रद्धा इत्यादींनी त्यांचे सामाजिक जिवन नियंत्रित केले जाते. त्यांचेवखाने- पिने, रहानीमान इत्यादींमध्ये एकरुपता असल्याचे दिसुन येते. दऱ्याखोऱ्यातील नैसर्गिक संकटांना तोंड देताना त्यांना परस्पराच्या सहकार्याची गरज लागते. त्यामुळेच त्यांच्या सामाजीक जिवनावर समुहभावनेचा प्रभाव अधिक प्कमानात असतो.

============================================


*🔴- शेतकरी समुह अर्थ व स्थिती -*


*🔻- अर्थ-*---

  शहरी क्षेत्रात श्रीमंत, मध्यम व गरिब असे तिन गट अाढळतात. आर्थिक स्थितीमधिल तफावतीमुळे या तीन्ही गटाची जिवनपद्धती वेगवेगळी असते. ग्रामिन क्षेत्रातही श्रीमंत वा बागायतदार शेतकऱ्यांचे मध्यम शेतकरी, अल्पभुधारक शेतकरी, व भुमिहीन शेतमदुर असे भिन्न गट आहेत. ग्रामीण समुहात जमिनविषयक संबंध अत्यंत महत्ल़वाचे आहेत. या समुहातुनच हे उपसमुह निर्मान झाले आहेत. या सर्व उपगटाची अार्थिक स्थिती भिन्न असली तरी आचार विचारांची पद्धती , जीवनविषयक दृष्टीकोन यांत काही फारसा फरक नसतो. सर्वात महत्वाचे म्हनजे या सर्वांच्या शेती या व्यवसायाचे स्वरुप. समान असते. निसर्गाची अवकृपा झाली की, त्याचा फटका लहान व मोठ्या शेतकऱ्यांना सारख्याच प्रमानात बसतो. शेतमजुरांची उपलब्धता ही मध्यम शेतकऱ्यांप्रमानेच बागायतदारामचीही समस्या होउ लागली आहे. शेतमालाच्या अल्प किंमती व उत्पादन खर्च जास्त याचा ताळेबंद जमत नसल्यामुळे "शेती करने परवडत नाही " ही ओरडवग्रामीन भागात सार्वत्रिक स्वरुपाची बनली आहे.  या दृष्टीनेच आपन ग्रामीनक्षेत्रामधिल शेतकरी या विशाल आकाराच्या समुहाची ओळख करुन घेत आहोत. 

======


*🔻- भारतिय शे़तकऱ्यांची जिवनविषयक स्थिती -*


विभिन्न शास्त्रांनधिल अध्ययन, सर्वेक्षन, नेत्याचे विचार यांसारख्या विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनविषयक स्थितीचे चिन्ह पुढील प्रमाने मांडले जाते.

भारतीय शेतकरी कर्दबाजारी आहेत. तेनअल्पशिक्षित व कर्जबाजारी असून परंपरावादी व सनातनी वृतीचे आहेत. ते शेती व्यवसायाकडे व्यापारी दृष्टीतून पाहन्यापेक्षा पोट भरन्याचा एक मार्ग या दृष्टीने पाहतात. यामुळे शेतीव्यवसायातील उत्पन्न व उत्पादन सिमीत राहिले आहे. ते शासनाने ठरवलेल्या विकास योजनांचा मोकळ्या मवाने स्विकार करत नाहीत. उत्पादन वाढीसाठी खासवप्रयत्न करन्याची प्रेरना व वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अवलंब करन्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नाही. 

         शेती उत्पादनाची हेतु व उत्पादन तंत्र यांमध्ये सुधारना झाल्याशिवाय त्यांच्या आर्थिक व जीवनविषयक स्थितीमध्ये फारसा बदल घडून येने शक्य नाही.

               

*शेतकरी संघटना*---

      सुमारे ७०% लोक शेतीव्यवसायाशि निगडित आहेत. असे असऩुन देखिल शेतकरी संघटित नाहीत. ब्रिचिश राजवटी पासुनचे चित्र गेल्या २०-२५ वर्षांपासुन बदलु लागले आहे. शेतीव्यवसायासी ल़संबंधित विविध प्रश्नानी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्मान झाला आहे. शेतकऱ्यांच्या या असंतोषातुनच अनेक राज्यांमध्ये आंदोलने सुरु झाली व त्यांच्या संघटना निर्माण झाल्या.

शासनाचे धोरन व निर्णय यांवर प्रभाव टाकनाऱ्या संघटित गटांना हितसंबंधि गट व दबाव गट संबोधले जाते. शेतकरी संघटनेच्या सामुहिक प्रयत्नातुन प्राप्त झाल़्ल्या अनेक गौष्टींकडे नजर टाकली , की या संघटनेने दबाव गट म्हनुन आपले  स्थान निर्मान करन्यास यश प्राप्त केले आहे. 

औद्योगिक क्षेत्रातिल दबावगटांच्या तुलनेत शेतकरी संघटना या दबावगटाचा प्रभाव फारच कमी आहे. शेतकरी संघटनांची शक्ती व प्रभाव फारसा वृद्धींगत न होन्याची कराने कोनती, हे देखिल तपासुन पाहता येईल. फुमशेती,वनौषधी, जैविक शेति , करन्याकडे शेतकऱ्यांचे मन वळविने , ग्रामीन जीवनात सुधारना घडवून आननाऱ्या चळवळि घडवून आनने, यांसारखी अनेक विधायक काम करन्यास शेतकरी संघटनांना भरपूर वाव आहे असे म्हनता येईल. थोडक्यात , शेतकऱ्यांचे हितसंबंध व त्यांच्या मागन्या शासनासमोर सुस्पष्चपने मांडन्याचे आणि शेतकऱ्यांना संघटित करन्याचे महत्वपुर्ण कार्स शेतकरी संघटनांनी केले आहे. म्हनुनच शेतकरी संघटनेच्या राजकिय, आक्थिक व सामाजिक क्षेत्रामधिल कार्याला तसेच त्याच्या अध्ययनाला महत्व प्राप्तवझाले आहे असे म्हनता येईल.

भारतातील विविध घटनांची पहिली सुरुवात :



पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)

 पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)

 पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन - मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)  

 पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)

 पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)

 पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

 पहिले रेल्वेस्थानक - जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

 पहिले राष्ट्रीय उद्यान - सिंद्री (झारखंड) - 1951

 पहिला खत प्रकल्प - मेट्रो रेल्वे कोलकत्ता

 पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली

 पहिले व्यापारी विमानोड्डापण - कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

 पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

 पहिले पंचतारांकित हॉटेल - ताजमहाल, मुंबई (1903)

 पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)

 पहिला बोलपट - आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)

 पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा

 पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)

 पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)

 पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल

 पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली (1959)

 पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)

 पहिले अंटार्क्टिका मोहीम - डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम

 पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)

 पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा

 पहिले रासायनिक बंदर - दाहेज, गुजरात

 भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता

 पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)

 भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट

 पहिला उपग्रह - आर्यभट्ट (1975)

 भारतीय बनावटीची पहिलीपाणबुडी - शाल्की  

 पहिला अणुस्फोट - पोखरण (18 मे, 1974 राजस्थान)

 भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक - दक्षिण गंगोत्री (दुसरे-मैत्री)  

 पहिला सहकारी साखर कारखाना - प्रवरानगर (1949) अहमदनगर  

 भारताची पहिली आण्विक पाणबुडी - आय.एन.एस.चक्र

 पहिली सहकारी सुतगिरणी - कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर

 भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका - आय.एन.एस.दिल्ली

 पंचायतराज पद्धतीचा स्विकार करणारे पहिले राज्य - राजस्थान

 भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा - एर्नाकुलम (केरळ)  

 भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर - कोट्टायम (केरळ)

 भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना - कोइंबतुर (1920)

Daily Top 10 News : 20 March 2023


1) चीन आणि भारतातील अरुणाचल प्रदेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मॅकमोहन रेषेला औपचारिकपणे मान्यता देऊन अमेरिकेने द्विपक्षीय ठराव मंजूर केला. ठरावाने हे राज्य आपल्या भूभागाचे असल्याचा चीनचा दावा नाकारला आणि त्याऐवजी अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले. शिवाय, ठरावाने भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला पाठिंबा व्यक्त केला.


2) क्रेमलिनने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर मुलांचे सक्तीने रशियाला हस्तांतरण केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले . युक्रेनियन लोकांनी रशियावर त्यांच्याविरुद्ध नरसंहाराचा प्रयत्न केल्याचा आणि त्यांची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.


3) भारत-बांग्लादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्या हस्ते संयुक्तपणे होणार आहे.


4) 17 मार्च रोजी, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने HDFC Ltd आणि HDFC बँक यांच्या विलीनीकरणास मान्यता दिली, जे कॉर्पोरेट भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे विलीनीकरण मानले जाते. विलीनीकरणामुळे भारतातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण वित्त कंपनीला देशातील सर्वात मोठ्या खाजगी सावकारासह एकत्रित करून एक विशाल बँकिंग संस्था निर्माण होईल.


5) आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने (OECD) आर्थिक वर्ष 2024 साठी भारतासाठी 20 आधार अंकांनी वाढीचा अंदाज 5.9% पर्यंत वाढवला आहे.


6) इराणी चषक 2022-23 च्या फायनलमध्ये टीम रेस्ट ऑफ इंडियाने मध्य प्रदेशचा 238 धावांनी पराभव करून 30 वे विजेतेपद पटकावले. त्याने आपली अधिकृत कामगिरी सुरू ठेवत आपल्या प्रभावी कामगिरीने विजय मिळवला. दोन्ही डावात शानदार फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने दोन्ही डावात द्विशतक आणि एक शतक झळकावून आरओआयच्या विजयात मोलाचे योगदान दिले.


7) महिला आणि बाल विकास मंत्रालय 20 मार्च 2022 ते 3 एप्रिल 2023 या कालावधीत देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून पाचवा पोषण पंधरवडा साजरा करणार आहे. जनआंदोलन आणि जन भागीदारीच्या माध्यमातून पौष्टिकतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि सकस खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे हे पंधरवड्याचे उद्दिष्ट आहे.


8) भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा भाग असलेल्या एल-20 म्हणजे लेबर-20 शी संबंधित गटाची प्रारंभिक बैठक आज पंजाबच्या अमृतसर इथे सुरु झाली.


9) भारत आणि मालदीव दरम्यान चौथा संरक्षण सहकार्य  संवाद माले इथं 19 मार्च 2023 रोजी संपन्न झाला. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि मालदीवचे संरक्षण दल प्रमुख, मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल, मेजर जनरल अब्दुल्ला शमाल यांनी बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले.


10) जागतिक श्री अन्न परिषदेचा एक भाग म्हणून भरडधान्य  आधारित स्टार्टअपसाठी ऍगलाईव्ह (AgLive ) 2023: द मिलेट चॅलेंज”, हे  सत्र आयोजित.


Headlines Of The Day From The Hindu


• अटल इनोव्हेशन मिशनने ATL सारथी लाँच केले.


•आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अन्न आणि आदरातिथ्य मेळा दिल्लीत सुरू झाला.


• USGS च्या निवेदनानुसार न्यूझीलंडच्या उत्तरेला असलेल्या केरमाडेक बेटांच्या प्रदेशात 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला.


•उद्योजिका श्रेया घोडावत यांची शी चेंजेस क्लायमेटसाठी भारताची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.


•हनीवेलने विमल कपूर यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली. 


•अमेरिकेच्या सिनेट समितीने एरिक गार्सेट्टी यांची भारतातील अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली.


•भारतातील किरकोळ महागाई फेब्रुवारी 2023 मध्ये 6.44% वर घसरली.


• सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने ब्लॉसम महिला बचत खाते सुरू केले.


• भारत आणि जागतिक बँकेने 4 राज्यांमध्ये हरित राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्पाच्या बांधकामासाठी कर्ज करारावर स्वाक्षरी केली.


•आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने फेब्रुवारी 2023 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार प्राप्तकर्त्यांची घोषणा केली आहे.


•फिफाच्या अध्यक्षपदी जियानी इन्फँटिनो यांची पुन्हा एकदा निवड झाली. 


•मायक्रोसॉफ्टने क्लाउड गेमिंग प्रदाता बूस्टरॉइडसह परवाना करार केला.


• SIPRI अहवाल 2023 नुसार भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातकर्ता आहे.


•GPT4, OpenAI च्या मोठ्या भाषेच्या मॉडेलचे सर्वात अलीकडील प्रकाशन, जे ChatGPT आणि नवीन Bing सारख्या लोकप्रिय अँप्सला सामर्थ्य देते.


१९ मार्च २०२३

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

  पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षवृत्त आहेत ?

👉 181


 भारताला एकूण किती Km लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?

👉 7517 Km


 महाराष्ट्रतील पहिल्या अनुभट्टीचे नाव काय होते ?

👉 अप्सरा


महाराष्ट्रतील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?

👉 कोयना


 महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?

👉 गडचिरोली


 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ?

👉 पसिफिक महासागर


 इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो ?

👉 नाईल


 जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?

👉 गरीनलँड


 रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

👉 राजस्थान


अस्तंभा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉 नदुरबार


 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

👉 सांगली


दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे ?

👉 86 %


 कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

👉 सातारा व रत्नागिरी


फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरात आहे ?

👉 भिलाई


 सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे ?

👉 शक्र


 ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणतात ?

👉 भकंपनाभी 


महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याल सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ?

👉 रत्नागिरी


 उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?

👉 भीमा


 पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?

👉 अकोला


तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे ?

👉 चामडे उत्पादन

कम्बाईन पूर्व परीक्षेत 50 पाशी अडकलेला आपला स्कोर 60+ कसा वाढवता येईल??


सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे weak points शोधा, सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांचे खालील प्रमाणे weak points असतात व त्याच्यावर solution पुढील प्रमाणे


1. Attempt कमी असणे:-


👉Attempt हा 100 पैकी कमीत कमी 90 ते 95 या रेंजमध्ये असला पाहिजे, मग परीक्षा कितीही अवघड असो. कारण Attempt केल्याशिवाय मार्क्स मिळण्याची  संधीच उपलब्ध होणार नाही.

बरेच विद्यार्थी चार पैकी दोन पर्याय eliminate करतात परंतु राहिलेल्या दोन पर्यायांपैकी उत्तर त्यांना माहीत नसते. असे प्रश्न देखील रिस्क घेऊन सोडवणे गरजेचे असते, कारण निगेटिव्ह मार्किंग फक्त एक चतुर्थांश आहे, यात मार्क्स वाढण्याचीच शक्यता जास्त असते.


2. फक्त GS वर focus, CSAT  कडे दुर्लक्ष:-


👉100 पैकी 15 प्रश्न CSAT वर येतात त्यामुळे नक्कीच या विषयाकडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे, जितका importance GS मधील एखाद्या विषयाला देतात तितकाच importance CSAT ला देखील दिला पाहिजे.

ज्यांचा CSAT weak आहे त्यांनी आत्तापासूनच दररोज दोन तास सराव करायला सुरुवात करावी.

CSAT चे 15 प्रश्न सोडवताना देखील अगोदर सोपे आणि तुम्हाला येणारे प्रश्न सोडवून घ्यावेत.


3. अपुऱ्या Revisions:-


👉पूर्ण syllabus ची एक reading आणि किमान दोन revisions तरी झाल्याच पाहिजे तरच आपली प्रश्नपत्रिका सोडवताना accuracy वाढेल.

Revisions करताना देखील महत्त्वाच्या आणि scoring  विषयांची revision priority ने करावी जसे की polity, geography, economy, CSAT


4.Question solving ची  practice न करणे:-


👉Revisions करताना आयोगाचे PYQs आणि कुठलेही एक चांगली test series लावा ज्याच्यामुळे तुम्हाला questions सोडवण्याची skill निर्माण होईल. Test series मुळे effective time management आणि stress management तुम्हाला करता येईल. आयोगाचे प्रश्न सोडवण्यासाठी एक confidence तुमच्यामध्ये तयार होईल.


5.Sources निश्चित न करणे:-


👉परीक्षेसाठी आवश्यक असलेले sources निश्चित न केल्यामुळे revisions योग्य प्रकारे होत नाहीत. त्यामुळे रिविजन चांगल्या प्रकारे होण्यासाठी तुमचे sources निश्चित करा. तुम्हाला इतर sources मधील काही माहिती महत्वाची वाटत असेल तर तो पूर्ण source वाचू नका त्यातील जे required मुद्दे आहेत त्याची तुमच्या basis source मध्ये value addition करा.


आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याला positively घ्या.

I mean "These are not my weak points, they are actually my areas of improvement" या दृष्टिकोनातून बघा.😊


All the best for Prelims💐💐.

स्टेटिक जीके के साथ परीक्षा संबंधी करंट अफेयर्स: 19 मार्च 2023


#Hindi 


1) हरियाणा के पंचकूला में आयोजित 26वीं अखिल भारतीय वन खेल प्रतियोगिता में छत्तीसगढ़ 11वीं बार ओवरऑल चैंपियन बना।

▪️छत्तीसगढ :- 

मुख्यमंत्री - भूपेश बघेल

राज्यपाल - बिस्वा भूषण हरिचंदन

भोरमदेव मंदिर

उदंती-सीतानदी टाइगर रिजर्व

अचानकमार टाइगर रिजर्व

इंद्रावती टाइगर रिजर्व


2) OpenAI ने अपने बड़े भाषा मॉडल के नवीनतम संस्करण GPT4 की घोषणा की है जो चैटजीपीटी और नए बिंग जैसे प्रमुख अनुप्रयोगों को शक्ति प्रदान करता है। 

➨सैन फ्रांसिस्को स्थित शोध कंपनी का कहना है कि GPT-4 पिछले संस्करण की तुलना में अधिक परिष्कृत है और इसे अधिक डेटा पर प्रशिक्षित किया गया है, जिससे इसे चलाना भी महंगा हो गया है।


3) भारतीय रिज़र्व बैंक (RBI) ने 18 देशों के बैंकों को रुपये में भुगतान निपटाने के लिए विशेष वोस्ट्रो रुपया खाता (SVRA) खोलने की अनुमति दी है।

◾️भारतीय रिजर्व बैंक:- 

➨मुख्यालय:- मुंबई, महाराष्ट्र

➨Established:- 1 April 1935, 1934 Act. 

➨हिल्टन यंग कमीशन

➨ प्रथम गवर्नर - सर ओसबोर्न स्मिथ

➨ प्रथम भारतीय राज्यपाल - चिंतामन द्वारकानाथ देशमुख

➨वर्तमान राज्यपाल:- शक्तिकांत दास


4) लेफ्टिनेंट जनरल दलजीत सिंह ने भारत के सबसे वरिष्ठ सैन्य चिकित्सक, सशस्त्र बल चिकित्सा सेवा (DGAFMS) के महानिदेशक का पदभार संभाला।


5) भारतीय नौसेना ने अमेरिकी नौसेना द्वारा आयोजित लॉन्ग रेंज MR ASW विमान के लिए समन्वित बहु-पार्श्व एंटी-सबमरीन वारफेयर (ASW) अभ्यास 'एक्सरसाइज सी ड्रैगन 23' के तीसरे संस्करण में भाग लेने के लिए गुआम, यूएसए में एक P8I विमान तैनात किया।


6) संयुक्त राज्य अमेरिका की सीनेट ने भारतीय मूल के रवि चौधरी को ऊर्जा, प्रतिष्ठान और पर्यावरण के लिए वायु सेना के सहायक सचिव के रूप में पुष्टि की है।


7) केंद्रीय कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय ने राजस्थान में न्यूनतम समर्थन मूल्य (एमएसपी) पर सरसों और चना की खरीद के आदेश जारी कर दिए हैं। 

➨ प्रदेश में 15 लाख 19 हजार 318 मीट्रिक टन सरसों तथा 6 लाख 65 हजार 28 मीट्रिक टन चना उपार्जित किया जायेगा.

▪️राजस्थान :- 

मुख्यमंत्री - अशोक गहलोत 

राज्यपाल - कलराज मिश्र

➭सिटी पैलेस

➭केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान

➭सरिस्का राष्ट्रीय उद्यान।

➭ कुम्भलगढ़ किला

➭एम्बर पैलेस

➭हवा महल

➭रणथंभौर राष्ट्रीय उद्यान


8) अमेरिका ने औपचारिक रूप से मैकमोहन रेखा को भारत के अरुणाचल प्रदेश और चीन के बीच अंतरराष्ट्रीय सीमा के रूप में मान्यता दी और बीजिंग के इस दावे को खारिज कर दिया कि पूर्वोत्तर राज्य चीनी क्षेत्र के अंतर्गत आता है।


9) नासा ने चंद्रमा पर मानवता की वापसी यात्रा के लिए स्पेससूट की एक नई पीढ़ी का अनावरण किया है।

➨स्पेससूट का नया डिजाइन विशेष सुविधाओं के साथ आता है ताकि अंतरिक्ष यात्रियों को चंद्रमा की सतह पर वैज्ञानिक प्रयोग करने में मदद मिल सके।


10) केंद्रीय मंत्री श्री नरेंद्र

 सिंह तोमर ने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) के सहयोग से बैंगलोर कृषि विश्वविद्यालय द्वारा आयोजित 5 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम "एग्रीयूनिफेस्ट" का उद्घाटन किया।


11) दीपक मोहंती को पेंशन कोष नियामक एवं विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) का अध्यक्ष नियुक्त किया गया है।

➨पेंशन निधि विनियामक और विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) वृद्धावस्था आय सुरक्षा को बढ़ावा देने के उद्देश्य से 01.02.2014 को लागू पीएफआरडीए अधिनियम के तहत स्थापित एक वैधानिक नियामक निकाय है।


12) राजस्थान के मुख्यमंत्री अशोक गहलोत ने राज्य में 19 नए जिले और तीन नए मंडल बनाने के अपनी सरकार के फैसले की घोषणा की।

➨तीन नए संभाग बांसवाड़ा, पाली और सीकर होंगे।


13) मणिपुर की राज्यपाल सुश्री अनुसुइया उइके ने मणिपुर के केंद्रीय कृषि विश्वविद्यालय में 'पर्यावरण और लचीला कृषि को पुनर्जीवित करने के लिए प्राकृतिक खेती' विषय पर एक अंतर्राष्ट्रीय सम्मेलन का उद्घाटन किया।

▪️मणिपुर :-

➨मुख्यमंत्री :- नोंगथोम्बम बीरेन सिंह

➨ लाई हरोबा, संगाई महोत्सव

➨Yaoshang , Porag Festival 

➨ थांगशी जलप्रपात

➨ खौपुम झरना

➨ बराक जलप्रपात

➨खोंगहामपत ऑर्किडेरियम

➨लोकतक झील

➨केबुल-लामजाओ राष्ट्रीय उद्यान

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती


०१) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे ?

- गुरुमुखी.


०२) 'जुळे ग्रह' असे कोणत्या दोन ग्रहांना म्हटले जाते ?

- पृथ्वी आणि शुक्र.


०३) द्रव अवस्थेत असणारा एकमेव धातू कोणता ?

- पारा.


०४) 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार शिवरायांनी कोणाबद्दल काढले आहेत ?

- तानाजी मालुसरे.


०५) पहिला सजीव कुठे निर्माण झाला ?

- पाण्यात.


०१) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?

- कर्नाळा.

 

०२) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात ?

- कोयना.


०३) पत्रकार दिन केव्हा साजरा करण्यात येतो ?

- ६ जानेवारी. 

 

०४) सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?

- शुक्र.


०५) मंगळ या ग्रहाला ..... असेही संबोधतात?

- लाल ग्रह.


०१) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या ?

- फातिमा बिबी.

     

०२)भारतातील  पहिल्या महिला अंध आय.ए.एस.अधिकारी कोण आहेत ?

- प्रांजल पाटील.


०३) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरांमध्ये सुरू झाली ?

- कोलकाता.


०४) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्यांची संख्या असते ?

- २४.


०५) जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत मधून किती टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव आहे ?

- पाच टक्के.


०१) 'व्हॉट्सॲपची' निर्मिती केव्हा झाली ?

- २००९.


०२) कोणाचा जन्मदिवस 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो ?

- स्वामी विवेकानंद.


०३) 'बुलंद दरवाजा' कोठे आहे ?

 - फत्तेपूर शिक्री.(उत्तर प्रदेश)


०४) ICU चा लॉंगफॉर्म काय आहे ?

- Intensive Care Unit.


०५) 'मेरी कोम' ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- बॉक्सिंग. 


०१) भारतातील पहिला बोलपट कोणता ?

- आलम आरा.


 ०२) ऑलिंपिकमध्ये प्रथम सुवर्णपदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण ?

- अभिनव बिंद्रा.(नेमबाजी)


०३) 'भारतरत्न' या पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली ?

- १९५४.


 ०४) 'KYC' चा लॉंगफॉर्म काय आहे ?

- Know Your Customer.


०५) 'आंबोली' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- सिंधुदुर्ग.


०१) कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळेपणा - गोरेपणा ठरतो ?

- मेलॅनिन.


०२) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

- शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार.


०३) मीठ साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हणतात ?

- जलसंजीवनी.


०४) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

- तिसरा.


०५) 'भारतरत्न' पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

- महर्षी धोंडो केशव कर्वे.


💐 विटामिन बी चे अविष्कारक कोण आहेत ?

🎈मॅकुलन.


💐 शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

🎈मिलींद बोकील.


💐 सोमनाथ जोतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे ?

🎈गुजरात.


💐 मंडो नृत्‍य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

🎈गोवा.


💐 छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

🎈मुंबई.


०१) भारत देश कोणत्या खंडात आहे ?

 - आशिया.


०२) राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक कोणता आहे ?

- ११२.


०३) 'नौटंकी' हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ?

- उत्तर प्रदेश.


०४) पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

- तामिळनाडू.


०५) महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो ?

- नैऋत्य मोसमी वारे.


०१) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणी मोजतात ?

- मिर्झापूर.


०२) सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात ?

- प्रतल.


०३) शरीरातील सर्वात मोठे हाड कोठे असते ?

- मांडीत. 


०४) कोणत्या वायूमुळे मुख्यतः ओझोन थराचा ऱ्हास होतो ?

- क्लोरो-फ्लोरो कार्बन.(CFC)


०५) दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

- यमुना. 


०१) भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती कोणती ?

- हडप्पा. 


०२) 'भरतनाट्यम' हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

- तामिळनाडू.


०३) कांगारू हा प्राणी कोणत्या खंडात आढळतो ?

- ऑस्ट्रेलिया. 


०४) अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

- शरयू. 


०५) सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखास काय म्हणतात ?

- सरन्यायाधीश.


०१) वातावरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे ?

- २१ टक्के.


०२) मानवी चेहर्‍यात हाडांची संख्या किती ?

- १४.


०३)  कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो ?

- मलेरिया.


०४) मानवी शरीरात किती मणके असतात ?

- ३३.


०५) वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे ?

- पॅरिस.


०१) भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला ?

 - C-DAC.


०२) भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली ?

- १९५६.


०३) १९९८ साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्फोटाच्या चाचण्या घेतल्या ?

- पोखरण.


०४) न्यूटनचा दुसरा नियम कशाचे मापन देतो ?

- संवेग.


०५) मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

- हवामानशास्त्र.


०१) तेलबियांचा राजा असे कोणत्या पिकास म्हणतात ?

- भुईमूग.


०२) 'रुपया'  हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले ?

- शेरशहा सुरी.


०३) 'तृतीय रत्न' हे नाटक कोणी लिहिले ?

- महात्मा फुले.


०४) आपल्या देशात कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

- संसदेला.


०५) तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो ?

- गहू.


०१) बहिणाबाई चौधरी यांच्या कोणत्या बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत ?

- अहिराणी. 


०२) आपले राष्ट्रीय स्मारक कोणते आहे ?

- इंडिया गेट.


०३) भारताचे  राष्ट्रीय ब्रीदवाक्य कोणते ?

- सत्यमेव जयते. 


०४)  चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता वायू असतो ?

- नायट्रोजन. 


०५) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

- नाईल.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

भारतातील महत्त्वाची पदे व पदस्थ व्यक्ती :-


◆ भारताचे राष्ट्रपती - द्रौपदी मुर्म

◆ भारताचे उपराष्ट्रपती - जगदीप धनखड

◆ भारताचे पंतप्रधान - नरेंद्र मोदी 

◆ भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रवूड

◆ भारताचे लोकपाल - प्रदीप कुमार मोहंती

◆ भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी

◆ भारताचे महालेखापाल - राजीव महर्षी

◆ नियंत्रक व महालेखापरीक्षक - गिरीशचंद्र मुर्मु

◆ नियंत्रक व लेखापरीक्षक -  भारती दास

◆ भारताचे निवडणूक आयुक्त - राजीव कुमार

◆ केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त - यशवर्धन सिन्हा

◆ लोकसभा सभापती - ओम बिर्ला

◆ राज्यसभा सभापती - जगदीप धनखड

◆ भारताचे वित्तमंत्री - निर्मला सीतारमण

◆ भारताचे गृहमंत्री - अमित शाह

◆ भारताचे संरक्षणमंत्री - राजनाथ सिंह

◆ केंद्रीय दक्षता आयोग आयुक्त - सुरेश एन. पटेल

◆ केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष - मनोज सोनी

◆ राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अरूणकुमार मिश्रा

◆ राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष - रेखा शर्मा

◆ रिझर्व बँक गव्हर्नर - शक्तीकांत दास

◆ निती आयोग अध्यक्ष - नरेंद्र मोदी

◆ निती आयोग उपाध्यक्ष - सुमन बेरी

◆ पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - एन.के.सिंग

◆ सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष - अशोककुमार माथूर

◆ स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष - दिनेश कुमार खरा

◆ सेबी च्या अध्यक्षा - माधवी पुरी बुच

◆ नाबार्ड बँक अध्यक्ष - गोविंद आर. चिंतला

◆ केंद्रीय सक्तवसुली संचालनालय - संजयकुमार मिश्रा

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार


▪️व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.


▪️भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.


▪️खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.


▪️बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.


▪️समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.


 ▪️संयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.


 ▪️आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.


▪️खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.


▪️समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.

उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र.


 ▪️उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या  जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर 

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले



🔹आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) 17 मार्च 2023 रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले.


🔸न्यायालयाने आरोप केला आहे की तो युद्ध गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे आणि युक्रेनमधून रशियामध्ये मुलांच्या बेकायदेशीरपणे निर्वासित करण्यावर त्याचे दावे केंद्रित केले आहेत.


🔹रशियाच्या मुलांच्या हक्कांसाठीच्या आयुक्त मारिया लव्होवा-बेलोवा यांनाही याच गुन्ह्यांसाठी आयसीसीला हवा आहे.

युक्रेनला लढाऊ विमाने पुरवणारा पोलंड हा नाटोचा पहिला देश आहे


🔹पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांनी येत्या काही दिवसांत चार सोव्हिएत काळातील मिग-२९ लढाऊ विमाने युक्रेनला पाठवण्याची घोषणा केली.


🔸या हस्तांतरणामुळे पोलंड हे लढाऊ विमाने देणारे पहिले नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) सदस्य बनतील.


🔹स्लोव्हाकियाने येत्या आठवड्यात युक्रेनला १३ मिग-२९ लढाऊ विमाने पाठवण्याची घोषणा केली आहे.


-----------------------------------------------------------

चालू घडामोडी :- 18 मार्च 2023


◆ जागतिक अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि आपल्या दैनंदिन जीवनाला आकार देण्याच्या क्षमतेसह AI मानवी इतिहासातील बदलाचा सर्वात महत्त्वाचा चालक बनण्यास तयार आहे.


◆ चीन आणि भारतातील अरुणाचल प्रदेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मॅकमोहन रेषेला औपचारिकपणे मान्यता देऊन अमेरिकेने द्विपक्षीय ठराव मंजूर केला.


◆ युक्रेन युद्ध गुन्ह्यांबद्दल ICC ने व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले.


◆ भारत-बांग्लादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्या हस्ते संयुक्तपणे होणार आहे.


◆ पोलाद मंत्रालयाने प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत विशेष स्टील उत्पादनासाठी 27 कंपन्यांसोबत 57 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे.


◆ आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने (OECD) आर्थिक वर्ष 2024 साठी भारतासाठी 20 आधार अंकांनी वाढीचा अंदाज 5.9% पर्यंत वाढवला आहे.


◆ नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने HDFC आणि HDFC बँक विलीनीकरणाला मान्यता दिली. (https://t.me/Vidyarthipoint)


◆ इराणी चषक 2022-23 च्या फायनलमध्ये टीम रेस्ट ऑफ इंडियाने मध्य प्रदेशचा 238 धावांनी पराभव करून 30 वे विजेतेपद पटकावले.


◆ शिक्षण मंत्रालयाने सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये (61.8%) सर्वात कमी साक्षरता आहे आणि केरळमध्ये भारतातील सर्वाधिक साक्षरता दर 94% आहे.


◆ 2023 मधील जगातील महान ठिकाणांची TIME यादी जाहीर, 2 भारतीय ठिकाणे यादीत आहेत.


◆ स्वया रोबोटिक्सने भारतातील पहिल्या स्वदेशी चतुष्पाद रोबोट आणि एक्सोस्केलेटनचे अनावरण केले. (https://t.me/Vidyarthipoint)


◆ शिवशंकरी, प्रसिद्ध तमिळ लेखक, सरस्वती सन्मान 2022 ने सन्मानित करण्यात आली.


◆ INS द्रोणाचार्यला त्याच्या उत्कृष्ट सेवांच्या सन्मानार्थ प्रेसिडंट कलरने सन्मानित करण्यात येईल.


◆ केंद्रीय गृह मंत्रालयाने माजी अग्निवीरांसाठी 10% आरक्षण जाहीर केले.


◆ रचना बिस्वत रावत यांनी लिहिलेले “बिपिन: द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म” हे पुस्तक प्रकाशित झाले.


◆ श्री राजीव मल्होत्रा   आणि श्रीमती विजया विश्वनाथन यांचे स्नेक्स इन द गंगा हे पुस्तक प्रकाशित झाले. (https://t.me/Vidyarthipoint)


◆ जागतिक पुनर्वापर दिन 18 मार्च रोजी साजरा करण्यात आला.


◆ भारतात, ऑर्डनन्स फॅक्टरी डे दरवर्षी 18 मार्च रोजी साजरा केला जातो.


◆ सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी (MoSPI) मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) राव इंद्रजीत सिंग यांनी नवी दिल्ली येथे “मेन अँड वूमन इन इंडिया 2022” च्या 24 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले.

पोलंडने नुकतीच युक्रेनला चार मिग-29 लढाऊ विमाने देण्याची घोषणा केली आणि असे करणारा तो पहिला नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) देश बनला.

◆ पोलंडने नुकतेच युक्रेनला चार मिग-29 लढाऊ विमाने देण्याची घोषणा केली आणि असे करणारा तो पहिला नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) देश बनला. रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षात युक्रेनला लष्करी पाठबळ देण्याच्या दिशेने हे पाऊल उचलले जात आहे.


➤ मिग-29 फायटर जेट्सचा संक्षिप्त इतिहास :-


◆ मिग-29 हे लढाऊ विमान जमिनीवर हल्ले करण्यासाठी वापरले जाणारे सिंगल-सीट ट्विन-इंजिन एअर-टू-एअर लढाऊ विमान आहे. 


◆ 1939 मध्ये आर्टेम मिकोयान आणि मिखाईल गुरेविच यांनी स्थापन केलेल्या डिझाईन ब्युरोने विकसित केलेल्या सोव्हिएत लष्करी लढाऊ विमानांच्या कुटुंबातील आहे. 


◆ हे लढाऊ विमान पहिल्यांदा 1983 मध्ये सादर करण्यात आले होते.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

Headlines Of The Day From The Hindu



• INDIAai इकोसिस्टम AI मानवी इतिहासातील बदलाचा सर्वात महत्त्वाचा चालक बनेल.


अमेरिकेने मॅकमोहन रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता दिली.


. युक्रेन युद्ध गुन्ह्यांबद्दल ICC ने व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले.


•भारत-बांग्लादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्या हस्ते संयुक्तपणे होणार आहे.


•सरकारने 27 पोलाद कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला.


•नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने HDFC आणि HDFC बँक विलीनीकरणाला मान्यता दिली.


•इराणी चषक 2022-23 रेस्ट ऑफ इंडियाने जिंकला.


•शिक्षण मंत्रालयाने सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये (61.8%) सर्वात कमी साक्षरता आहे आणि केरळमध्ये भारतातील सर्वाधिक साक्षरता दर 94% आहे.


• 2023 मधील जगातील महान ठिकाणांची TIME यादी जाहीर, 2 भारतीय ठिकाणे यादीत आहेत.


• स्वया रोबोटिक्सने भारतातील पहिल्या स्वदेशी चतुष्पाद रोबोट आणि एक्सोस्केलेटनचे अनावरण केले.


•शिवशंकरी, प्रसिद्ध तमिळ लेखक, सरस्वती सन्मान 2022 ने सन्मानित करण्यात आली.


• INS द्रोणाचार्यला त्याच्या उत्कृष्ट सेवांच्या सन्मानार्थ प्रेसिडंट कलरने सन्मानित करण्यात येईल.


•जागतिक पुनर्वापर दिन 18 मार्च रोजी साजरा करण्यात आला.


१८ मार्च २०२३

ससंदीय लोकशाही



केंद्रात संसद (पार्लमेंट) द्विसदनी (लोकसभा व राज्यसभा) असून, ती लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची असते. लोकसभेत जास्तीतजास्त ५५० सदस्य असतात. हे सदस्य प्रौढ मतदानपद्धतीने निवडले जातात. त्यांपैकी ५२५ किंवा त्यापेक्षा कमी सदस्य घटक ज्यातून व २५ किंवा त्यापेक्षा कमी सदस्य केंद्रशासित प्रदेशांतून निवडले जातात. प्रत्येक राज्यात अनेक मतदारसंघ असतात आणि शक्यतो ते सारख्या लोकसंख्येचे केलेले असतात. राज्यसभेत बारा सदस्यांस वगळून बाकीचे सदस्य राज्यांच्या विधानसभांमार्फत निवडले जातात. हे बारा सदस्य राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले असतात; ते कला, साहित्य, शास्त्र किंवा समाजसेवा ह्या क्षेत्रांत विशेष कामगिरी केलेले असावे लागतात. लोकसभेची मुदत पाच वर्षांची असते. पाच वर्षांनी तिचे विसर्जन होते व पुन्हा निवडणूक होऊन तिची पुनर्रचना करण्यात येते. मात्र पंतप्रधानांना वाटल्यास ते राष्ट्रपतींना लोकसभेचे विसर्जन पाच वर्षांपेक्षा आधी करावयाचा सल्ला देऊ शकतात आणि मध्यावधी निवडणूक जाहीर करू शकतात. अशा प्रकारे दोन वेळा (१९७१ व १९७९) लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्यात आल्या. तसेच ४२व्या संविधानदुरुस्तीने संसदीय लोकसभेची मुदत सहा वर्षांची करण्यात आली होती; परंतु ४४ व्या संविधान-दुरुस्तीने ती पूर्ववत पाच वर्षे केली. राज्यसभा विसर्जित होत नाही. मात्र तिचे एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होऊन त्या जागी नव्याने निवडलेले सदस्य येतात


प्रत्येक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्य करावे लागते. ही मान्यता बहुमताने मिळते. जर एखादे विधेयक एका सभागृहाने संमत केले असेल आणि त्याला दुसऱ्या सभागृहाची मान्यता नसेल, तर दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावून ते विधेयक मान्य करून घेता येते. अर्थविषयक विधेयकाबाबत मात्र राज्यसभेला केवळ आपले नकारार्थी मत व्यक्त करता येते; पण हे मत लोकसभेने मानलेच पाहिजे, असे नाही. लोकसभेच्या अध्यक्षपदी सभापती (स्पीकर) असतो. त्याची निवड  बहुमताने लोकसभा करते. राज्यसभेच्या अध्यक्षपदी उपराष्ट्रपती असतो.


लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असलेल्या नेत्याला मंत्रिमंडळ बनवण्यासाठी राष्ट्रपती पाचारण करतात. तो नेता-पंतप्रधान-व इतर मंत्री संसदेच्या कुठल्या तरी सभागृहाचे सदस्य असावेच लागतात. तसे ते नसल्यास सहा महिन्यांच्या आत त्यांस निवडून वा निमित्त होऊन यावे लागते. पंतप्रधान व मंत्रिमंडळ संयुक्तपणे संसदेला जबाबदार असतात. जोपर्यंत लोकसभेत त्यांचे बहुमत आहे, तोपर्यंत त्यांना अधिकारात राहता येते. त्यांच्या विरुद्ध जर अविश्वासाचा ठराव संमत झाला, तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो. हे बहुमत त्या नेत्याचा राजकीय पक्ष बहुमतात असल्यामुळे असेल किंवा त्यास त्याचा व इतर पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे असेल. संविधानात ‘राजकीय पक्ष’ हे शब्द नाहीत.


केंद्र शासनाचे सर्वोच्चपद राष्ट्रपतींचे असून त्यांची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य व राज्याच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य करतात. प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य ठरवताना संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या मतांचे मूल्य सर्व राज्यांच्या विधानसभांच्या मतांइतके होईल व राज्यांचे मतबल समान असेल, ह्या तत्त्वांवर ठरवण्यात येते. थोडक्यात राष्ट्रपतींची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रामणीय मताद्वारे घेतली जाते आणि अशा निवडणुकीतील मतदान गुप्तमतदानपद्धतीने होते. राष्ट्रपतींची मुदत अधिकारग्रहणानंतर पाच वर्षांची असते. मात्र त्यांना पुन्हा निवडणुकीस उभे राहता येते. राष्ट्रपतिपदासाठी उभा असलेला उमेदवार भारताचा नागरिक असला पाहिजे; त्याचे वय ३५ वर्षे पूर्ण आणि त्याच्यात लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून येण्यास लागणारी क्षमता असायला हवी. तसेच तो शासनाच्या नियंत्रणाखालील कुठल्याही पगारी अगर मानधन मिळणाऱ्या जागेवर नसावा. अशा जागेवर तो असल्यास निवडणुकीपूर्वी त्याने त्या पदाचा त्याग करावा; मात्र राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल किंवा केंद्र वा राज्य सरकारातील मंत्रिपद ह्या जागेवर असलेल्या व्यक्तीस निवडणुकीस उभे राहण्यास हरकत नाही. याच अटी उपराष्ट्रपतिपदासही लागू आहेत.


उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष व राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत किंवा काही कारणाने राष्ट्रपती गैरहजर असल्यास किंवा निधन पावल्यास निधनानंतर सहा महिन्यांपर्यंत किंवा नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत कार्यकारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. राष्ट्रपती जर घटनेविरूद्ध वागले, तर त्यांना पदच्युत करता येते. संविधानाच्या या व्यतिक्रमणाबद्दल राष्ट्रपतींवर महाभियोग करावयाचा असेल, त्या वेळी संसदेच्या प्रत्येक सभागृहात हजर असलेल्यांपैकी दोन-तृतीयांश सभासदांचा व सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन-तृतीयांश सभासदांचा पाठिंबा आवश्यक असतो.


राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख आहे काय ? हा प्रश्न पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी प्रथमच १९५८ मध्ये उपस्थित केला. तेव्हापासून अशी चर्चा कायदेपंडितांत चालू आहे. संसदीय लोकशाही संकेतानुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींनी मानलाच पाहिजे आणि भारतातही हा नियम अव्याहतपणे मानला गेला. सर्वोच्च न्यायालयाने देखील मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो, असे मत व्यक्त केले आहे. बेचाळिसाव्या संविधानदुरुस्तीने मूळ संविधानातील ही संदिग्धता काढून टाकली आणि राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाचा सल्ला मानलाच पाहिजे, अशी स्पष्ट तरतूद केली. चव्वेचाळिसाव्या संविधानदुरुस्तीने ही तरतूद कायम ठेवली आणि राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाकडे एखादा प्रश्न पुनर्विचारासाठी पाठवण्याचा अधिकार दिला आणि पुनर्विचारानंतरचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक राहील असे नमूद केले. सभागृहाची बैठक बोलावणे, त्यात अभिभाषण करणे, सभागृहाचे विसर्जन करणे, कायद्याला संमती देणे, वटहुकूम काढणे इ. राष्ट्रपतींचे वैधानिक अधिकार असून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सरन्यायधीश, उच्च न्यायालयांचे न्यायधीश व सरन्यायधीश, लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सभासद, पंतप्रधान, नियंत्रक व महालेखापरीक्षक आणि निर्वाचन आयुक्त यांच्या नेमणुका ते करतात. एखाद्या व्यक्तीस माफी देणे, खटला काढून घेणे किंवा शिक्षा कमी करणे, हेही त्यांचे अधिकार आहेत.


संसदेत प्रत्येक सभासदाला संपूर्ण भाषण स्वातंत्र्य असते. संसदेत केलेल्या भाषणावरून कुठलाही खटला करता येत नाही. संसदेच्या प्रत्येक सभागृहाला अनेक विशेष अधिकार असतात. हे विशेष अधिकार संसदेला कायदा करून ठरविता येतील; परंतु असा कायदा करेपर्यंत इंग्लंडच्या पार्लमेंटला आपले संविधान कार्यान्वित होतेवेळी जे विशेष अधिकार व सवलती होत्या, त्याच भारताच्या संसदेच्या सभागृहाच्याही राहतील. आजवर असा कायदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ह्या विशेष अधिकाराबद्दल अनिश्चितता आहे.


केंद्र सरकारप्रमाणेच राज्यसरकारेही चालतात. फरक इतकाच की घटकराज्याच्या प्रमुखपदी राज्यपाल असतात. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ती नेमणूक रद्द होऊ शकते. राज्यपाल हे जरी राज्याचा घटनात्मक प्रमुख असले, तरी ते केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करतात. राज्यात संविधानाप्रमाणे राज्य चालते किंवा नाही हे ते पाहतात आणि तसे नसल्यास राष्ट्रपतींकडे अहवाल सादर करतात. प्रत्येक राज्यात विधिमंडळ असते. त्याची मुदत पाच वर्षे असते. हे विधिमंडळ आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, बिहार, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश ह्या राज्यांत द्विसदनी आहे व बाकीच्या राज्यांत एक सदनी आहे. ह्या दोन सभागृहांना अनुक्रमे विधानसभा व विधान परिषद ह्या नावाने संबोधले जाते. विधानसभेत ५०० हून कमी व ६० पेक्षा जास्त सभासद निरनिराळ्या मतदारासंघांतून निवडलेले असतात. सबंध राज्याची विभागणी अशा प्रकारे करण्यात येते, की त्यातली लोकसंख्या व त्या मतदारसंघास मिळणाऱ्या जागा ह्यांचे प्रमाण सर्व राज्यभर सारखेच राहते. विधान परिषदेच्या सभासदांची संख्या विधानसभेच्या सभासदसंख्येच्या एक-तृतीयांशापेक्षा जास्त असता कामा नये; मात्र ही सभासदसंख्या ४० पेक्षा कमी नसावी. ह्यात एक-तृतीयांश सभासद विधिमंडळाच्या सभासदांनी निवडलेले असतात. काही राज्यपालांनी नेमलेले असतात. एक-तृतीयांश सभासद त्या राज्यातील नगरपालिका, जिल्हा मंडळे व संसद विधिद्वारा उल्लेखित अशा स्थानिक प्राधिकाऱ्यांचे सदस्य यांनी मिळून बनलेल्या मतदारसंघातून जवळजवळ एक-दशांश, भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही विद्यापीठाचे कमीत कमी तीन वर्षे पदवीधर असतील, अशा व्यक्तींनी मिळून बनलेल्या मतदारसंघातून व जवळजवळ एक-द्वादशांश माध्यमिक व इतर शिक्षणसंस्थातून शिकवण्याच्या कामात कमीत कमी तीन वर्षे असलेल्या व्यक्ती मिळून बनलेल्या मतदारसंघातून निवडले जातात.


केंद्रशासित प्रदेशाची शासनपद्धती परिस्थितीनुसार ठरविण्यात येते. अरुणाचल प्रदेश, दिल्ली, गोवा, दमण, दीव, मिझोरम व पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांवर राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला ले. गव्हर्नर हा प्रमुख असतो. अंदमान आणि निकोबार बेटे व चंडीगढ यांवर चीफ कमिशनर हा प्रमुख असतो. लक्षद्वीप बेटासाठी स्वतंत्र प्रशासक नेमलेला आहे. अरुणाचल प्रदेश, गोवा, दमण, दीव, मिझोराम, पाँडिचेरी या प्रदेशात स्वतंत्र विधानसभा व मंत्रिमंडळे आहेत. दिल्लीसाठी महानगर परिषद व कार्यकारी परिषद आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे येथे झालेला समझौता (करार)

पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.




करारनाम्याच्या अटी

पुणे करारातील अटी खालीलप्रमाणे आहेत.


१) प्रांतिक विधान सभेत साधारण निवडणूक क्षेत्रातील जागांपैकी दलित वर्गासाठी १४८ राखीव जागा ठेवण्यात येतील. राखीव जागांची प्रांतानुसार विभागणी खालीलप्रमाणे होती:


२) या जागांची निवडणूक संयुक्त पद्धतीद्वारे केली जाईल. दलित वर्गाच्या सदस्यांची नावे त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये नोंदविलेली असतील, त्यांचे एक मंडळ नेमणूक करून बनविले जाईल. हे मंडळ प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील चार उमेदवारांचे पॅनल निवडेल. ही निवडपद्धती एकमतीय आधारावर होईल. अशा प्राथमिक निवडीमध्ये ज्या चार सदस्यांना सर्वाधिक मते मिळतील ते साधारण निवडणूक क्षेत्राचे उमेदवार समजले जातील.


३) केंद्रीय कार्यकारणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील दोन प्रकारे होईल.


४) केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल.


५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडीची व्यवस्था (केंद्रीय व प्रांतीय कार्यकारिणीसाठी, ज्यांचा वर उल्लेख केला आहे.) पहिल्या दहा वर्षानंतर समाप्त होईल. दोन्हीही पक्षाच्या आपापसातील संमतीने खालील कलम सहा नुसार त्याकालावधीपूर्वी देखील समाप्त केला जाऊ शकेल.


६) प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीत दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व जसे एक व चार मध्ये दिले आहे, ते दोन्हीही संबंधितपक्षांद्वारे आपापसांत समझोता होऊन त्यास हटविण्यासाठी निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत अंमलात येईल. .


७) केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी दलितांच्या मतदानाचा अधिकार लेथियन कमीटीच्या अहवालाप्रमाणे असेल.


८) दलित वर्गाच्या प्रतिनिधधींना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीत अस्पृश्य असल्याने अयोग्य ठरविले जाता कामा नये. दलितांच्या प्रतिनिधित्वास (संख्येने) पुरे करण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातील व सरकारी नोकऱ्यांमध्ये ठरवून दिलेली शैक्षणिक योग्यता त्यांच्याकडे असल्यास त्यांची नेमणूक केली जाईल.


९) सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांच्या मुलाबाळांसाठी शैक्षणिक सोयी पुरविल्या जातील. त्यासाठी योग्य त्या रकमेची तरतूद केली जाईल. इत्यादी समझोत्याच्या अटी 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट'मध्ये सामील करण्यात आल्या.


१०) वरील निवडणुकीबाबत व सरकारी नोकरीबाबत अस्पृश्याना योग्य जागा मिळाव्या म्हणून शक्य तितका प्रयत्न केला जाईल. मात्र सरकारी नोकरीकरिता शिक्षणाच्या ज्या अटी सरकारने लावल्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत.

इत्यादी अटींना संमती देण्यात आली. त्यानंतर म. गांधींनी संत्र्याचा रस पिऊन, आपला प्राणांतिक उपवास सोडला (http://www.simplifiedcart.com/)

लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?



देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमेदवार का निवडून देतो? याबाबतचे गणित आज जाणून घेऊयात... 


सध्या लोकसभेच्या 543 जागा (मतदारसंघ) आहेत. त्यापैकी 79 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी (एससी) आणि 41 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव आहेत. जनतेमार्फत निवडून येणाऱ्या 543 सदस्यांमध्ये घटक राज्यांच्या कमाल मर्यादेनुसार 530 खासदार निवडून येतात. 


तर केंद्रशासित प्रदेशांतून (दिल्ली 7, अंदमान-निकोबार 1, चंदीगड 1, दादरा व नगर हवेली 1, दमण व दीव 1, लक्षद्वीप 1, आणि पुदुचेरी 1) एकूण 13 सदस्य निवडून येतात. म्हणजेच, अद्याप केंद्रशासित प्रदेशांतील 7 जागा रिक्त आहेत. तशी गरज भासल्यास संसदेला या जागांमध्ये वाढ करता येईल.


▪️कमाल मर्यादा 550


भारतीय राज्यघटनेत कलम 81 नुसार लोकसभा सदस्यांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील घटक राज्यांतील खासदारांची संख्या हि 530 पेक्षा अधिक व केंद्रशासित प्रदेशांतील खासदारांची संख्या 20 पेक्षा अधिक असता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 


देशातील प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडून खासदारांची कमाल मर्यादा हि 550 इतकी आहे. शिवाय, अँग्लो इंडियन समाजातील दोन सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी तरतूद असल्याने लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा हि 552 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

भारतीय निवडणूक आयोग.



🅾️ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ यांच्या निवडणूका पार पाडल्या जातात. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी कामकाज पाहिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात व ते 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते पदावर राहतात.

🧩राज्यसभा..

🅾️ ससदेचे उच्च सभागृह.

🅾️ भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात

🅾️ एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त.

🅾️ सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)

🅾️ महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा

🅾️ मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा

🧩लोकसभा..
🅾️ एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)

🅾️ पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952

🅾️16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014

🅾️लोकसभा निवडणूक 2014..

🅾️16 वी लोकसभा निवडणूक.

🅾️ 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान.

🅾️16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना

🅾️एकूण मतदारसंघ: 543

🅾️ एकूण मतदान केंद्र: 927553

🅾️ सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3

🅾️ एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)

🧩 पक्षीय बलाबल
🅾️भारतीय जनता पक्ष: 282
🅾️ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44
🅾️ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06
🅾️ कम्युनिस्ट पक्ष: 01
🅾️ कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09
🅾️राज्यस्तीय पक्ष: 182
🅾️नोंदणीकृत पक्ष: 16
🅾️अपक्ष: 03

🧩 वशिष्ट्ये...

🅾️ EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला.

🅾️नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला.

🅾️ 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला.

🅾️ 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

🅾️ एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये

🅾️ महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014

🅾️ 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे.

🅾️6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले.

🅾️ 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.

🅾️एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...