१२ मार्च २०२३

Addiction of Social media? Is Social Media distroy your life??

Reality:-
एका सर्व्हे नुसार आपण मोबाईल ला दिवसभरात 1000+ वेळा touch करतो आणि 5-6तास आपण mobile ची screen बघतो..
काही लोकांच्या कडून आपण एखाद्याचा phone काढून घेतला तर ते Irritate/stress feel करतात...Etc.

Addiction??
कारण काय?
Dopamine Pattern?
हे एक neurotransmitter आहे जे एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी signal देते.हे एक pleasure chemical, Motivation,Reward च्या संबंधित आहे.

Ex:- तुम्ही लहान असताना पप्पा /मम्मी जेव्हा घरी येताना तुम्हाला Chocolate चे Promise केलेले असते.तेव्हा ते Chocolate तुमच्यासाठी Reward असते. तुम्ही त्याची खूप उत्सुकतेने वाट पाहता त्यामुळे तुम्हाला Excitement होते आणि तुम्ही happy होता.
विचार करा? जर प्रत्येक वेळी Chocolate आणले तर तो intrest/तो happiness राहत नाही..
(एखादी गोष्ट जास्त झाली तर ती कंटाळवाणी वाटते....)

Addiction??
Social media (What's app/insta/Fb/Telegram) जेव्हा notificatin येते तेव्हा dopomine harmone मुळे तेवढ्या पुरता आंनंद होतो आणि तोच happines मिळवण्यासाठी तुम्ही त्या कडे आकर्षित होता..सगळ्यात वाईट insta/fb reels जेथे प्रत्येक ३० सेकंद तुम्हाला happiness मिळतो..जसे scroll करता तसे new काय तरी बघायला मिळते आणि कधी १-२ तास गेले समजत नाही.मग तो त्रास /चिडचिड..म्हणजेच काय जेवढ्या लवकर गोष्टी आपल्याला मिळतात तेवढे आपण addict होत जातो...

उपाय ??
आपल्याला त्या social media मधून मिळणारा reward आणि easy मध्ये मिळणारा access कमी करायचा आहे ज्यामुळे dopomine harmone कमी होईल....

१.जास्तच addict असाल तर सगळे social media ॲप delete करा.

२.कमी addict असाल notification
Off करा..
(Depends on u)
ज्यामुळे तुम्हाला त्या ॲप पर्यंत पोहचण्यासाठी time लागेल so access कमी होईल आणि Reward पण भेटणार नाही ....ज्यामुळे Addiction  कमी होईल....

धन्यवाद...

११ मार्च २०२३

…म्हणून तुमच्या 'या' सवयी बदला!

आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या अगदी साध्या-साध्या गोष्टींपुढे हतबल होऊन जातो. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असला तरी या सगळ्यांच्या काही सवयींमध्ये कमालीचा एकसारखेपणा आहे. पाहुयात आपल्याला जीवनात मागे खेचणाऱ्या काही सवयी..._

☑️सकाळी लवकर उठा

_ : _'सकाळी लवकर उठा जा' हा सल्ला आपल्याला नेहमीच बोअरिंग वाटतो. पण अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ दिवसाची सुरूवात लवकर करतात. रात्रभर शांत झोप झाल्यावर सकाळी उठल्यानंतरचे काही तास आपलं मन शांत असतं. यावेळी आपण अनेक गोष्टींचा शांतपणे विचार करू शकतो. पुढे सुरू होणाऱ्या दिवसाबाबत आपण यावेळी प्लॅन आखू शकतो. आणखी बरंच काही करू शकतो._

☑️समतोल साधता आला पाहिजे

_आयुष्यात पुढे जायचं तर आपल्याला समतोल साधता आला पाहिजे. आपल्या कुटुंबाला आपल्या नातेवाईकांना वेळ देणंही महत्त्वाचं आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे व्हाईट हाऊसमध्ये असताना दर दिवशी सकाळी त्यांच्या मुलींच्या शाळेच्या तयारीसाठी वेळ द्यायचे आणि मगच त्यांच्या कामांकडे वळायचे. जर अमेरिकेचा अध्यक्ष आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढत हे करू शकतो तर आपण तर हे नक्कीच करू शकतो._

☑️योग्य आहार आणि व्यायाम: _

बराक ओबामा रोज 90 मिनिटं व्यायाम करायचे ते हि न चुकता. आता यापुढे तुमचं एक्सक्युज काय आहे? चांगलं आरोग्य राखण्यासाठी नियमित केलेला हलका व्यायामही उपयुक्त ठरतो._

☑️सोशल लाईफला वेळ द्या

_आता सोशल लाईफ म्हणजे सोशल मीडियावरचं लाईफ नाही. तर खरोखरचं सोशल लाईफ. आपल्या कामात व्यस्त असताना आपला मित्रपरिवार तसंच आपल्यासोबत काम करणार आपले सहकारी यांच्यासोबतचं आपलं नातंही आपला कामातला उत्साह दुणावायला मदत करतो._

☑️अपयशाचं योग्य मूल्यमापन करणं

_मोठ्या व्यक्ती कधी अपयशी झाल्याच नाहीत का? तर असं अजिबात नाही. त्यांनी वेळीच अपयशाचं योग्य मूल्यमापन केला आणि आपल्या या सगळ्या लोकांनी पुढे इतिहास घडवला. उदा. स्टीव्ह जाॅब्स, कार्टूनिस्ट वाॅल्ट डिस्नी, अमिताभ बच्चन._ 

_या सगळ्या खूप साध्यासोप्या गोष्टी आहेत. आपण आपल्या रोजच्या जीवनात या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत मोठमोठ्या मॅनेजमेंटचे फंडे वाचत बसतो. तसं म्हटलं तर ‘लाईफ इझ सिंपल’. बेसिक गोष्टींची आपण काळजी घेतली तरी आपण जीवनात मोठी प्रगती करू शकतो.

१० मार्च २०२३

महाराष्ट्राची भौगोलीक परिस्थिती

- महाराष्ट्रातील 5 प्रादेशिक विभाग

- कोकण : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड 

- पाश्चिम महाराष्ट्र : पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर

- खानदेश/उत्तर महाराष्ट्र : जळगाव, नंदुरबार, धुळे

- विदर्भ : नागपूर, चंदपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम 

- औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद 


महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

- ताडोबा - चंदपूर 

- प्रियदर्शनी/पेंच - नागपूर 

- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरीवली, नवी मुंबई

- गुगामाल/मेळघाट - अमरावती

- नवेगाव बांध - गोंदिया

- सह्याद्री/चांदोली वाघ्र प्रकल्प - सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर 


गोदावरी नदी [ भारतातील प्रमुख नदी ]

१) भारतातील आणि महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. 


२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे. 


३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात. 


४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला. 


५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी. 


६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी. 


७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश 


८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे 


९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका 


१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते. 


११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत. 


१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.

 

१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली. 


१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो. 


१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

महाराष्ट्रातील नवीन निर्माण झालेले जिल्हे.


🅾️पर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते


🅾️10 जिल्हे नविन निर्माण झाले


🅾️त अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल?


🧩Tricks:- सिंजाला ग मुबा वान ही गोपाल चा


🅾️सिं- सिंधुदुर्ग (१मे१९८१)

🅾️जा- जालना (१मे१९८१)

🅾️ला- लातूर (१६ऑगस्ट१९८२ )

🅾️ग- गडचिरोली (२६ऑगस्ट१९८२)

🅾️मबा- मुंबई  (१९९०)

🅾️वा- वाशिम (१जुलै१९९८)

🅾️न- नंदूरबार (१जुलै१९९८)

🅾️हि- हिंगोली (१मे१९९९)

🅾️गो- गोंदिया (१मे१९९९)

🅾️पाल- पालघर (१ऑगस्ट२०१४)


🅾️भारतातील कमी लोकसंख्येची घनता असलेली राज्ये


🧩Tricks:- अरुणा माझी सक्की मा नाही


🅾️अरुणा- अरुणाचल प्रदेश(१७)

🅾️माझी- मिझोराम(५२)

🅾️सक्की- सिक्किम(८६)

🅾️मा- मणिपुर(११५)

🅾️ना- नागालँड(११९)

🅾️ही- हिमाचल प्रदेश(१२३)


महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा

१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.

आजची प्रश्नमंजुषा


Que.1 : ब्रिटीश गव्हर्नर जनरल 'मॉडर्न इंडिया मेकर' म्हणून ओळखले जातात?

1⃣ लॉर्ड कॅनिंग

2⃣ लॉर्ड डलहौसी✅✅✅

3⃣ लॉर्ड कर्झन

4⃣ लॉर्ड माउंटबॅटन



Que .2 : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?

1⃣ मौलाना अबुल कलाम

2⃣ एम. ए. जिन्ना

3⃣ बद्रुद्दीन तायबजी✅✅✅

4⃣ रहीमतुल्ला एम सयानी


 

Que.3 : पुढीलपैकी कोणत्या वर्षात ब्रिटीश कारभाराची राजधानी कलकत्ता ते दिल्ली येथे स्थानांतरित झाली?

1⃣ 1911✅✅✅

2⃣ 1857

3⃣ 1905

4⃣ 1919


Que .4 : खालीलपैकी कोणते कार्यक्रम-वर्ष संयोजन चुकीचे आहे?

1⃣ चौरी चौरा - 1922

2⃣ भारत सोडा - 1942

3⃣ दांडी मार्च - 1931✅✅✅

4⃣ बगालचे विभाजन - 1905


Que.5 : भारत स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.?

1⃣ जवाहरलाल नेहरू

2⃣ राजेंद्र प्रसाद

3⃣ सी राजगोपालाचारी

4⃣ ज.बी.कृपलानी✅✅✅


महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली?
 A) वर्धा 
 B) गडचिरोली 
 C) चंद्रपूर 
 D) गोंदिया ✅✅


 एक स्कूटर १ लिटर पेट्रोलवर ४५ कि.मी. अंतर कापू शकते तर १८० कि.मी. अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?
 A) ६ लिटर 
 B) ५ लिटर 
 C) ४ लिटर ✅✅
 D) ३ लिटर


 “पोपट पेरू खातो” या वाक्यातील कर्म ओळखा.
 A) प्रथमान्त ✅✅
 B) द्वितीयांत 
 C) चतुर्थ्यांत 
 D) तृतीयान्त


“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
 A) कारणबोधक 
 B) विकल्पबोधक 
 C) न्यूनत्वबोधक 
 D) परिणामबोधक✅✅


: नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
 A) २ जानेवारी 
 B) २१ एप्रिल ✅✅
 C) २८ फेब्रुवारी 
 D) १४ सप्टेंबर


 एका सांकेतिक भाषेत SAND म्हणजे VDQG , BIRD म्हणजे ELUG असेल तर LOVE म्हणजे काय?
 A) PRYW 
 B) ORTW 
 C) NPUH 
 D) ORYH ✅✅


: : x चे 15% = 900 चे 10% तर x =?
 A) 60 
 B) 600 ✅✅
 C) 700 
 D) 800


भारताच्या नार्कोतीक्स कंट्रोल ब्युरोचे पदसिद्ध प्रमुख (Ex – Officio Head) कोण आहेत?
 A) डायरेक्टर जनरल ऑफ बी.पी.आर. and डी. 
 B) डायरेक्टर आई. बी. 
 C) डायरेक्टर ऑफ रेवेन्यू इंतेलीजेंट 
 D) डायरेक्टर सी. बी. आय ✅✅
 


 पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले?
 A) इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान 
 B) पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान ✅✅
 C) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 
 D) महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान



 “अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?
 A) तत्पुरुष ✅✅
 B) अव्ययीभाव 
 C) कर्मधारय 
 D) द्विगु


देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?
 A) अकोदरा ✅✅
 B) रावतभाटा 
 C) बडोदरा 
 D) मानकापूर

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

🔸अमरावती जिल्हा: 

ऊर्ध्व वर्धा धरण


🔸अहमदनगर जिल्हा : 

आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)


🔸 औरंगाबाद जिल्हा : 

गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे


🔸 उस्मानाबाद जिल्हा :

 तेरणा धरण


🔸 कोल्हापूर जिल्हा : 

रंकाळा तलाव


🔸 गडचिरोली जिल्हा : 

दिना


🔸 गोंदिया जिल्हा :

 इटियाडोह


🔸चंद्रपूर जिल्हा :

 पेंच आसोलामेंढा


🔸जळगाव जिल्हा : 

अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)


🔸 ठाणे जिल्हा :

 भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे


🔸धुळे जिल्हा : 

अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव


🔸 नंदुरबार जिल्हा :

 यशवंत तलाव,


🔸 नागपूर जिल्हा : 

उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.


🔸 नांदेड जिल्हा : 

इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण


🔸नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण


🔸 परभणी जिल्हा : 

कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण


🔸 पुणे जिल्हा :

आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)


🔸 बुलढाणा जिल्हा :

खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी


🔸 बीड जिल्हा :

 माजलगाव धरण,मांजरा धरण


🔸 भंडारा जिल्हा :

 इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप


🔸मुंबई जिल्हा :

 मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी


🔸 यवतमाळ जिल्हा:

 पूस ,अरुणावती ,बेंबळा


🔸 वर्धा जिल्हा : 

ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)


🔸 सातारा जिल्हा :

 उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)


🔸 सिंधुदुर्ग जिल्हा :

 तिलारी धरण,देवधर धरण


🔸 सोलापूर जिल्हा : 

आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)


🔸 हिंगोली जिल्हा : 

येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.


०९ मार्च २०२३

Headlines Of The Day From The Hindu


• BSE आणि UN Women India यांनी FinEMPOWER कार्यक्रम सुरू केला.


• अखिल भारतीय महिला लोककला संमेलन मुंबईत होणार आहे.


• मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मौगंजला मध्य प्रदेशातील 53 वा जिल्हा म्हणून घोषित केले.


• शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशात 'लाडली बहना' योजना सुरू केली.


•अश्विनी वैष्णव यांनी सिक्कीमसाठी 'गो ग्रीन, गो ऑरगॅनिक' कव्हर रिलीज केले.


• एस. एस. दुबे यांनी नवीन महालेखा नियंत्रक म्हणून पदभार स्वीकारला.


• रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रत्येक नागरिकाला डिजिटल पेमेंटचा वापरकर्ता बनवण्याचे मिशन सुरू केले आहे.


• सार्वजनिक आरोग्य सेवा पायाभूत सुविधांसाठी जागतिक बँकेने भारताला $1 अब्ज देण्याचे वचन दिले आहे.


• क्लायंटसाठी क्वांटम कॉम्प्युटिंग आणण्यासाठी एचसीएल टेक्नॉलॉजीज मायक्रोसॉफ्टला भागीदार करते. 


• इलेक्टोरल डेमोक्रसी इंडेक्स 2023 मध्ये भारत 108 व्या स्थानावर आहे.


• दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ आशिया-पॅसिफिकमधील सर्वात स्वच्छ आहे.


• INS त्रिकंदने आंतरराष्ट्रीय सागरी सराव 2023 मध्ये भाग घेतला.


• 7 मार्च 2023 रोजी 5 वा जण औषध दिन साजरा केला जातो.


•मीराबाई चानू यांना बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे.


राज्यसेवा प्रश्नसंच ( Online Test Series )

प्रश्न मंजुषा


१.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?

१. राणीगंज व विरभूम✅

२. झरिया व खेत्री

३. ब्राम्हणी व देवगढ 

४. बोकारो व राजमहाल


२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?

१. मिथेन व आयसो मिथेन

२. ईथेन व आयसो ईथेन 

३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅

४. प्रोपेन व आयसो प्रोपेन



३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?

१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी

२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅



५.  जोड्या लावा :

अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक

ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी

क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध

ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध


१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅

२. अ-३, ब-२, क-४, ड-१

३. अ-१, ब-४, क-२, ड-३

४. अ-१, ब-२, क-४, ड-३



६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?

१. पायदळ लढाऊ विमान 

२. हलके लढाऊ विमान ✅

३. वैमानिकरहित लक्ष्य विमान 

४. जेट ट्रेनर




७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?

१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅ 

२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे

३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून

४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून




८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?

१. हरमन होलोरिथ

२. हाँवर्ड एकेन✅

३. थिओडोर मँमन

४. के.आर. पोर्टर



९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?

१. १५ आँगस्ट १९९३

२. १५ आँगस्ट १९९५✅

३. १५ आँगस्ट १९९७

४. १५ आँगस्ट १९९९



१०.  योग्य विधान निवडा :

१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.

२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.

३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅

४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.




११.  जोड्या लावा :


अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर

ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद

क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा 

ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा


१. अ-३, ब-२, क-३, ड-१

२. अ-२, ब-१, क-३, ड-४

३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅

४. अ-२, ब-३, क-४, ड-१



१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?

१. परम आनंद

२. परम अनंत✅

३. परम सुलभ 

४. परम तेज



१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?

१. कलकत्ता - हावडा

२. मुंबई - दिल्ली

३. कराची - लाहोर✅

४. मुंबई - ठाणे


१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?

अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स

१. अ आणि ब

२. ब आणि क

३. अ आणि क✅

४. अ, ब, आणि क



१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?

 उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते. 

त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.

आजचे प्रश्नसंच

 गुजरात या राज्याचे क्षेत्रफळ कोणत्या देशाच्या क्षेत्रफळाइतके आहे. ?

⚪️ रमनिया 

⚪️ ओमान 

⚫️ सेनेगल ☑️

⚪️ य. के 



 भारतातील पहिले ई-कोर्ट सुरु करण्याचा मान ......या शहराला मिळाला आहे. ?

⚪️ पणे 

⚫️ नागपूर ☑️

⚪️ औरंगाबाद 

⚪️ नाशिक 



 कोणत्या नदीमुळे कोकणाचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे भाग पडले आहेत.  ?

⚪️ आबा नदी 

⚫️ कुंडलिक नदी ☑️

⚪️ यमुना नदी 

⚪️ पातळगंगा नदी 



 जम्मू काश्मीर ची राजधानी श्रीनगर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे. ?

⚪️ चिनाब नदी 

⚪️ वयास नदी 

⚪️ रावी नदी 

⚫️ *झेलम नदी ☑️



 विडी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले तिरोडा व सालेकसा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. ?

⚪️ चद्रपूर 

⚪️ नागपूर 

⚫️ गोंदिया ☑️

⚪️ भडारा 



 भारताच्या संचित निधीतून देयके देण्यासाठी ....द्वारे अधिकृत केले जाते .?

⚪️ वित्त विधेयक

⚫️ विनियोजना अधिनियम ☑️

⚪️ वित्तिय अधिनियम 

⚪️ सचित निधी अधिनियम 



 अनुसुचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यासाठी गुणांची अट मर्यादित प्रमाणात शिथिल करण्याबाबत ची तरतुद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलेले आहे. ?

⚫️ कलम 335 ☑️

⚪️ कलम 17

⚪️ कलम 340

⚪️ कलम 338



 खालीलपैकी कोण पंतप्रधानांचे डोळे व कान आहेत असे श्री एस. एस. खेरा यांनी म्हटले आहे. ?

⚪️ मत्रिमंडळ 

⚫️ मंत्रिमंडळ सचिवालय ☑️

⚪️ लोकसभा राज्यसभा 

⚪️ वरील सर्व 



 भारतीय राज्य घटनेमध्ये केंग हा सर्वात महत्वाचा अधिकारी आहे, असे कोणी म्हटले आहे. ?

⚪️ जवाहरलाल नेहरु 

⚪️ क. एम. मुंशी 

⚪️ क मेनन 

⚫️ डाँ. आंबेडकर ☑️



 भगतसिंह कोषारी हे हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री होते. ?

⚫️ चूक ☑️

⚪️ बरोबर 

⚪️ तटस्थ 

⚪️ यापैकी नाही

पहिली पंचवार्षिक योजना (First Panchwarshik Scheme)



कालावधी : 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956.

मुख्य भर : या योजनेचा भर कृषि क्षेत्रावर होता.

प्रतिमान : हेरोल्ड-डोमर चे प्रतिमान या योजनेत वापरण्यात आले.

योजनेचे उपनाव : पुंनरुस्थान योजना.

अपेक्षा वृद्धी दर : 2.1%.

प्रत्यक्षा वृद्धी दर : 3.6%.



प्रकल्प :


दामोदर खोरे विकास प्रकल्प (झारखंड-प.बंगाल, दामोदर नदीच्या खोर्यात)

भाक्रा-नानगल प्रकल्प (हिमाचल प्रदेश–पंजाब, सतलज नदी)

कोसी प्रकल्प (बिहार, कोसी नदीवर)

हिराकुड योजन(ओरिसा, महानदी)


कारखाने :


सिंद्री (झारखंड) खत कारखाना

चित्तरंजन (प.बंगाल) रेल्वे इंजिन कारखाना

पेरांबूर (तमिळनाडू) रेल्वे डब्यांचा कारखाना

HMT(बंगलोर)

हिंदुस्तान (पिंपरी,पुणे)


मूल्यमापन :


योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली कारण, योजनेचा कालावधी मान्सूनला अनुकूल होता, योजनेची लक्षे कमी होती.

अन्नधान्याचे उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरून 65.8 दशलक्ष टनापर्यंत वाढले.

मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जेचा पायाभूत सोयींना सुरवात.

राष्ट्रीय उत्पन्न 18% नी तर दरडोई उत्पन्न 11% नी वाढले.



विशेष घटनाक्रम :


8 मे, 1952 पासून ओधोगिक विकास व नियमन अधिवेशन 1951 लागू करण्यात आला.

2 ओक्टोंबर, 1952 रोजी सामुदायिक विकास कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.

हातमाग उधोगाचा विकास करण्यासाठी 1952 मध्ये अखिल भारतील हातमाग बोर्डची स्थापना करण्यात आली .

1955 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीच्या शिफारसीनुसार (गोरवाल समिती) एम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले.

जानेवारी 1955 मध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (ICICI) स्थापन करण्यात आले, ज्याने मार्च 1955 मध्ये आपले कार्य सुरू केले.


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

अग्रणी बँक योजना



14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली. 


*शिफारस -*


डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली. 


*सुरुवात -*


1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. 


*योजना -*


देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली. 


*कार्ये -*


जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -


जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलत समित्या (Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -

 जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.

 जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.

 अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.

 जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.

 भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला. 


*महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)*


स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना. 


*सध्यस्थिती -*


सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत.     फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती. 


*उषा थोरात समिती -*


भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.

राज्ये व राजधान्या


🔲 अरुणाचल प्रदेश - इटानगर


🔲 आध्रप्रदेश - अमरावती (नवीन), हैदराबाद (जुनी राजधानी)


🔲 आसाम - दिसपूर


🔲 उत्तर प्रदेश - लखनऊ


🔲 उत्तराखंड - देहराडून


🔲 ओरिसा - भुवनेश्वर


🔲 कर्नाटक - बंगलोर


🔲 करळ - तिरूवनंतपुरम


🔲 गजरात - गांधीनगर


🔲 गोवा - पणजी


🔲 छत्तीसगड - अटल नगर (नया रायपूर)


🔲 झारखंड - रांची


🔲 तामिळनाडू - चेन्नई


🔲 तलंगणा - हैदराबाद


🔲 तरिपुरा - अागरताळा


🔲 नागालॅंड - कोहिमा


🔲 पजाब - चंदीगड


🔲 पश्चिम बंगाल - कलकत्ता


🔲 बिहार - पटणा


🔲 मणिपूर - इंफाळ


🔲 मध्यप्रदेश - भोपाळ


🔲 महाराष्ट्र - मुंबई


🔲 मिझोराम - ऐझाॅल


🔲 मघालय - शिलॉंग


🔲 राजस्थान - जयपूर


🔲 सिक्कीम - गंगटोक


🔲 हरियाणा - चंडीगड


🔲 हिमाचल प्रदेश - सिमला


🛑 कद्रशासित प्रदेश आणि राजधानी 🛑

1. अंदमान-निकोबार - पोर्ट ब्लेअर

2. चंदीगड - चंदीगड

3. दमण आणि दीव - दमण दादरा व नगर हवेली - सिल्व्हासा

4. दिल्ली - नवी दिल्ली

5. पुदूचेरी - पुदूचेरी

6. लक्षद्वीप - कवारत्ती

7. जम्मू काश्मीर -श्रीनगर व जम्मू

8. लडाख - लेह


(दीव - दमण व दादरा नगर हवेली या 2 केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. 26 जानेवारी 2020)

लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?



देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमेदवार का निवडून देतो? याबाबतचे गणित आज जाणून घेऊयात... 


सध्या लोकसभेच्या 543 जागा (मतदारसंघ) आहेत. त्यापैकी 79 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी (एससी) आणि 41 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव आहेत. जनतेमार्फत निवडून येणाऱ्या 543 सदस्यांमध्ये घटक राज्यांच्या कमाल मर्यादेनुसार 530 खासदार निवडून येतात. 


तर केंद्रशासित प्रदेशांतून (दिल्ली 7, अंदमान-निकोबार 1, चंदीगड 1, दादरा व नगर हवेली 1, दमण व दीव 1, लक्षद्वीप 1, आणि पुदुचेरी 1) एकूण 13 सदस्य निवडून येतात. म्हणजेच, अद्याप केंद्रशासित प्रदेशांतील 7 जागा रिक्त आहेत. तशी गरज भासल्यास संसदेला या जागांमध्ये वाढ करता येईल.


▪️कमाल मर्यादा 550


भारतीय राज्यघटनेत कलम 81 नुसार लोकसभा सदस्यांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील घटक राज्यांतील खासदारांची संख्या हि 530 पेक्षा अधिक व केंद्रशासित प्रदेशांतील खासदारांची संख्या 20 पेक्षा अधिक असता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 


देशातील प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडून खासदारांची कमाल मर्यादा हि 550 इतकी आहे. शिवाय, अँग्लो इंडियन समाजातील दोन सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी तरतूद असल्याने लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा हि 552 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

विधानपरिषद



विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती:


घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सात घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश,जम्मू काश्मीर आणि कर्नाटक , तेलंगणा , आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.


विधानपरिषदेची रचना :

1956 च्या 7 व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी आणि 40 पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात 78 इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. 171/2 नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात त्यांची रचना पुढीलप्रमाणे आहे.


विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी :

1. 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.


2. 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.


3. 1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.


4. 1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.


5. 1/6 राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.


सदस्यांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


सदस्यांचा कार्यकाल : 

सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष इतका असतो.


विधानपरिषदेचा कार्यकाल :

विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.


गणसंख्या : 1/10

अधिवेशन : 

दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


सभापती व उपसभापती :

विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे



Ques. भारतातील निवडणूका लोकशाही पद्धतीने होतात, हे देर्शविणारे वाक्ये खाली दिली आहेत. त्यापैकी अयोग्य वाक्ये ओळखा.


A. जगातील सर्वाधिक मतदार भारतात आहे✅📚

B. भारतात निर्वाचन आयोग खूप शक्तिशाली आहे

C. भारतात 18 वर्षांपेक्षा अधिक वयाची प्रत्येक व्यक्ती मतदाता आहे.

D. भारतात निवडणूकीत पराभाव
 झालेली पार्टी जनादेश स्वीकार करणे

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. भारतीय दंड संहितेमधील कोणते कलम बलात्कार या गुन्ह्याबाबत वापरले जाते ?

A. कलम 180
B. कलम 376✅📚
C. कलम 476
D. कलम 576

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. कमाल जमीन धारणा कायद्याचे उद्दिष्ठ कोणते ?

अ. मोजक्या हातात जमीन संकलित होण्यास प्रतिबंध करणे.

ब. अतिरिक्त जमिनीवर भूमिहीन शेतमजुरांचे पुनर्वसन करणे.

क. सामाजिक न्याय प्रस्तापित करणे.


A. अ आणि ब
B. अ आणि क
C. ब आणि क
D. वरील सर्व✅📚

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. न्यायपालिकेच्या बाबतीत कोणते विधान चुकीचे आहे-

A. . संसदेद्वारे पारित प्रत्येक कायद्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजूरी लागते.✅📚
B. जर एखादा कायदा राज्यघटनेच्या विरूध्द असेल तर न्यायपालिका तो रद्द करू शकतो.
C. न्यायपालिका कार्यकारी मंडळापेक्षा स्वतंत्र असते.
D. जर एखाद्या नागरिकाच्या

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार काही खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित केले जातात ?

A. कलम 139 ब
B. कलम 139 क
C. कलम 139 अ✅📚
D. कलम 138

📚💐📚💐📚💐📚💐📚

Ques. खालीलपैकी कोणत्या खटल्यांचा भारतीय संविधानात दिलेल्या मुलभूत हक्क प्रकरणाशी संबंधीत नाही ?

A. केशवानंद वि. केरळ राज्य
B. गोलकनाथ वि. पंजाब राज्य
C. मोहिरीबिबी वी. धरमदास घोष✅📚
D. शंकरीप्रसाद खटाला

📚💐📚💐📚💐📚💐📚

Ques. आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये लोकशाही व्यवस्थेची गरज आहे , कारण.................

A. विकसित राष्ट्रांच्या शब्दाला जास्त किमत प्राप्त होईल
B. विभिन्न राष्ट्रांच्या समस्यांचे निराकरण त्यांच्या सैन्य बळाकडे बघुन केले जावे
C. राष्ट्रांना त्यांच्या लोकसंख्येचा प्रमाणात सुविधा मिळाव्यात
D. जगातील सर्व राष्ट्रांशी समान व्यवहार व्हावे✅📚

📚💐📚💐📚💐📚💐📚

Ques. UPSC द्वारे घेतल्या जाणार्या स्पर्धा परीक्षांसंबंधी सुधारण्यासाठी डॉ. अरूण निगवेकर समितीने कोणत्या शिफारसी केल्या आहेत ?

 1.उमेदवारांकडे गतिमान प्रशासनासाठीचे कौशल्य असावे.

2.समाज व सरकार यामधील दुवा बनवण्याची क्षमता.

3. परीक्षांच्या (प्रक्रिया) कालावधी 6 महिन्यां पर्यंत कमी करावा.

4. विषय ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान असावे.

A. फक्त अ, क आणि ड
B. फक्त ब, क आणि ड
C. फक्त अ, ब आणि ड✅📚
D. वरील सर्व

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. 11 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे झालेल्या घटनासमितीच्या बैठकीत खालीलपैकी कोणाची संविधान समितीच्या कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली ?

A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. डॉ. बाबासाहेब आंबे़डकर
C. वल्लभभाई पटेल
D. ए.सी. मुखर्जी✅📚

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. घटना समितीच्या झेंडा समितीच्या अध्यक्ष कोण होते ?

A. पंडित नेहरू
B. जे.बी.क्रपलनी✅📚
C. डॉ.राजेंद्रप्रसाद
D. वल्लभभाई पटेल


📚💐📚💐📚💐📚💐📚💐

 रत्नागिरी जिल्ह्यातील मुम्बई गोवा महामार्गावरील चिपळूण हे शह र कोणत्या नदीकाठी वसलेले आहे

Ans:- वाशिष्ठी

देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना


•देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड


•देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा


•देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत


•देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश


•देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू


•देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर


•देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश


•देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)


•देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल


•देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश


•देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान


•देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)


•देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा


•देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)


•देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र


•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली


•देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)


•देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)


•देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली


•देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)


•देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड


•देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर


•देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश


•देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी


•देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)


•देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी


•देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र


•देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर


•देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर


•देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई


•देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात


•देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)


•देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे


•देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश


•देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर


•देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र


•देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र


•देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई


•देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)


•देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली


•देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे


•देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक


•देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)


•देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश


•देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर


•देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे


•देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम


•देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे


•देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा

परीक्षेसाठी महत्वाचे



◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक


◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच


◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक


◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच


◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच


◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती


◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी


◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO


◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष


◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी


◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 


◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी


◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त


◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर


◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त


इतिहास प्रश्नसंच

 १)  आग्रा शहराचे संस्थापक कोण होते ?

    १) मोहम्मद तुघलक 

    २) अल्लादिन खिल्जी 

    ३) सिकंदर लोधी 📚📚

    ४) इब्राहिम लोधी




२) 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण होते ? 

        १) अशोक कोठारी 

        २) अशोक मेहता 📚📚

        ३) डॉ. एस. एन.सेन 

        ४)  वी.डी सावरकर




३) केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती ?

      १) शिवराम   

      २) नारायण गुरु📚📚

      ३) राजगुरू 

      ४)  पेरियार




४) होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली ?

          १) दक्षिण आफ्रिका

          २) आयर्लंड📚📚

          ३) नेदरलँड

          ४) भारत




५) महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी 'सत्याग्रह' केला.........?     

         १) असहकार चळवळीच्या वेळी  📚📚

         २)  जालियनवाला बाग हत्याकांडा वेळी 

         ३) रौलेट ॲक्ट विरोधात 

         ४) खिरापत चळवळीच्या वेळी




६) चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा .......... शी संबंधित होता.

          १) ऊस 

          २) नीळ 📚📚

          ३) कापूस

          ४) भात




७) खालील पैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण? 

           १) महात्मा गांधी 

           २) लोकमान्य टिळक

           ३) चित्तरंजन दास📚📚

           ४) न्यायमूर्ती रानडे





८) खालील पैकी कोणत्या कायद्याने मुस्लीमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ? 

            १) १८१३

            २) १९०९📚📚

            ३) १९१९

            ४) १९३५




९) भारतातील कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा मोठ्या प्रमाणावर  प्रभाव पडला ? 

            १) अमेरिकन क्रांती

            २) फ्रेंच क्रांती 

            ३) रशियन क्रांती📚📚

            ४) यापैकी नाही




१०) कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ? 

              १) कायमधारा 

              २) जमीनदारी 

              ३) रयतवारी 📚📚

              ४) मिरासदारी


अकबराचे साम्राज्य



अकबरने राज्यावर आले  की ठरवले की शेरशाह सुरीच्या, ज्याने हुमायूॅला दिल्लीतून हाकलुन देउन दिल्लीचे तख्त काबीज केले होते, वंशाचा नायनाट करायचा.


 शेरशाहची तीन मुले वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र राज्ये चालवित होती. अकबरने त्यातील सगळ्या बलाढ्य अशा सिकंदरशाह सुरी वर चाल केली. दिल्लीची सल्तनत तर्दी बेग खानच्या हातात सोपवून अकबर स्वतः पंजाबकडे चालून गेला.


सिकंदरशाहने अकबरचा सामना न करता त्याला हुलकावण्या देणे पसंत केले. 


अकबर त्याचा पाठलाग करीत असताना दिल्लीवर सिकंदरशाहचा भाऊ आदिलशाह सुरीच्या हेमचंद्र विक्रमादित्य नावाच्या हिंदू सेनापतीने चाल केली. तर्दी खानने दिल्लीची तटबंदी केलेली नव्हती व हेमूचा हल्ला होताच तो शहर सोडून पळून गेला.


 हेमूने दिल्ली जिंकल्यावर आदिलशाहची सत्ता झुगारून दिली व स्वतःला राजा विक्रमादित्य या नावाने राज्याभिषेक करून घेतला. अशा प्रकारे हेमू दिल्लीवर राज्य करणारा शेवटचा हिंदू सम्राट झाला.


दिल्लीने अशाप्रकारे नांगी टाकल्याची खबर अकबरला मिळाल्यावर त्याच्या सल्लागारांनी त्याला आल्यावाटेने काबूलला पळ काढण्याचा सल्ला दिला.


 राजधानी गमावलेली असताना व सम्राट होउन अवघे काही महिने झालेले असताना राज्य परत मिळवण्याऐवजी काबूलमधील आपल्या नातेवाईकांचा आसरा घेणे जास्त हितावह असल्याचा तो सल्ला होता.


 अकबरच्या सेनानींपैकी एक बयराम खानने याचा विरोध केला व दिल्लीतून घूसखोरांना हाकलून देउन आपले राज्य परत घेण्यास अकबरला उद्युक्त केले.


 अकबरने आपले असलेले सगळे सैन्य घेउन दिल्लीवर चाल केली. दिल्लीतून पळालेला तर्दी बेग खान आता परत अकबरला येउन मिळाला व त्यानेही दिल्लीकडे न जाता परस्पर काबूलला जाण्याचा सल्ला दिला. 


काही काळानंतर बयरामखानने तर्दी बेग खानवर पळपुटेपणाचा आरोप ठेवून त्याला मृत्यूदंड दिला. अबुल फझल व जहांगीरच्या मते बयरामखानने हे निमित्त काढून आपल्या प्रतिस्पर्ध्याचा निकाल लावला.


०८ मार्च २०२३

स्त्री जन्माची कहाणी :- ज्ञानेश्वरी गजानन शेळके


मी "स्त्री" आणि ही माझी कहाणी, 

आता तुम्ही म्हणाल काय आहे हीची रडगाणी ..

रडगाणी नाही हो आयुष्य आहे माझं ,

स्त्री जन्माचं लपलं आहे त्यात राजं...


जन्म झाला तेव्हा बाबा म्हणाले "लक्ष्मी आली", 

चांगला सहवास आणि प्रेमाने मी "लाडात वाढली"... 

मोठी झाली तशी "मासिक पाळी" ची "समस्या" जाणवली, आई म्हणाली बाळा हीच तर देते मुलीला "एक ओळख वेगळी" ...


इच्छा होती माझी ही खूप सारं शिकायचं ,

पण; शिकून काय करणार शेवटी "परक्याचं धनंच" म्हणायचं ...

लोकांच्या "वाईट नजरा" नेहमी मला "छळायच्या", 

त्यांना माझ्यात "त्याची बहिणी" नाही का दिसायच्या?...


मुलगी आहे म्हणून नेहमी माझ्यावर "बंधने घातली", शेवटी लग्न होऊन मी माझ्या सासरी आली....

लग्नात माझ्या खूप सारा "हुंडा" दिला, 

तेव्हा वाटलं कोणी हा "मुलगी विकत घेण्याचा" "व्यवसाय" सुरू केला ?


लग्नानंतर झाला माझा खूप सारा "छळ" ,

पण ; "आई -वडिलांच नाव नाही गमवायचं" यातून सहन करण्याचा मिळालं बळ...

मी नाही हो कुठेही कमी ,

पण ;"स्त्री कमजोर हे ठरवलचं तुम्ही" ...


"नवजीवन निर्माण" करायचा एक गुण मला लाभला, म्हणूनच देवाने मला "स्त्रीचा जन्म" दिला...

देवाने घडवलय मला "थोडीशी वेगळी", 

पण; मीही आहे "एक तुमच्यातली"....


"मुलगी ,बहिण ,पत्नी ,आई" एवढीच ओळख नाहीये माझी ,

एक स्त्री म्हणून मला आहे माझी "एक वेगळी सुंदर अस्मिता" जागवायची... 


नाव: ज्ञानेश्वरी गजानन शेळके

पत्ता: द्वारकानगर, छ. संभाजीनगर

महाराष्ट्राचा इतिहास - मौर्य ते यादव



*(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)*


*👉 मौर्य साम्राज्याचा काळ*

महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.


*👉 सातवाहन साम्राज्याचा काळ*

सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.


*👉 वाकाटकांचा काळ*

वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.


*👉 कलाचुरींचा काळ*

वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.


*👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ*

वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.


*👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ*

वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.


*👉 यादवांचा काळ*

महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या

▪️371 :-  महाराष्ट्र

👉 विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे.


 ▪️371 :- गुजरात

👉 सौराष्ट्र व कच्छसाठी स्वंतत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.


 ▪️371(A) :- नागालँड 

   13 (घटनादुरुस्ती ) 1962

👉 नागाहिल्स व ट्युएनसांग प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी करणे.


▪️371(B) :- आसाम

(22(घटनादुरुस्ती) 1969 हे कलम समाविष्ठ).

👉 आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.


▪️371(B) :- :-मणिपूर

(27 (घटनादुरुस्ती) 1971 ने समाविष्ठ)

👉 राज्यातील डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.


▪️371(F) :-  सिक्कीम

(36 घटनादुरुस्ती) 1975 ने समाविष्ठ)

👉  शांतता व जनतेच्या विविध गटांच्या सामाजिक आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी.


▪️371(H) :-अरुणाचल प्रदेश

 (55(घटनादुरुस्ती) 1986 ने समाविष्ट)


👉 राज्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी.


▪️371(D) &(E) :- आंध्रप्रदेश व तेलंगणासाठी विशेष तरतुदी


▪️371(G) :- मिझोरमसाठी

👉 (53 घटनादुरुस्ती 1986 ने समाविष्ठ)


▪️371(I) :-गोव्यासाठी विशेष तरतुदी

👉 (56 घटनादुरुस्ती 1987 ने समाविष्ठ)


▪️371(j) :-कर्नाटक - हैद्राबाद प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.

 👉 (98 घटनादुरुस्ती 2012 ने समाविष्ट).


42वी घटनादुरुस्ती 1976: या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते

1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.

2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.

3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.

4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद

5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती

6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.

7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.

8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.

9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.

10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.

11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण

12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.

13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.

14) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले.
शिक्षण ,जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण , वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना.

15) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.

16) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद

८ वी पंचवार्षिक योजना

👉 कालावधी: इ.स. १९९२ - इ.स. १९९७

👉 पराधान्य : मनुष्यबळ विकास          👉 घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व 

👉 उत्पादकता' मॉडेल : Export-led Growth Model 

👉 खर्च : 

👉 परस्तावित खर्च- ४,३४,१२० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- ४,७४,११२ कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. राष्ट्रीय महिला कोष-१९९२-९३ 

👉 २. Employment Assurance Scheme (EAS) 

👉 ३. Prime Minister's Rozgar Yojana (PMRY) 

👉 ४. Mahila Samridhi Yojana 

👉 ५. Member of Parliament Local Area Development Scheme (MPLADS) 

👉 ६. NATIONAL SOCIAL ASSISTANCE PROGRAMME(NSAP) 

👉 ७. Mid-Day Meal Scheme 

👉 ८. Indira Mahila Yojana


👉 महत्वपूर्ण घटना : 

👉 सार्वजनिक शेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणूकीची प्रक्रिया सुरु झाली. १९९४-९५ मध्ये रुपया चालू खात्यावर पूर्ण परीवातानीय करण्यात आला.

👉 (Full convertibility of Rupee on Current account) १९९२ मध्ये SEBI ला संविधानिक दर्जा देण्यात आला. 

👉 १९९२ मध्ये ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेस संविधानिक दर्जा देण्यात आला .

केशवानंद भारती खटला :- संपुर्ण नक्की वाचा.



🔰कशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला.

🔰घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते.

🔰राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले.

🔰ससदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे?

🔰या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले.

🔰गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की *घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.*

🔰या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले.

🔰या *खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन* केले गेले.

🔰 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की
' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.

🔰ससदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.

🔰 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्‍लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं.

🔰या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं.

🔰कशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्‍लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. *म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.*

भारतीय राज्यघटना

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ४४८ (जानेवारी २०२०) कलमे असून भारतीय संविधान हे विस्ताराने जगातले सर्वांत मोठे संविधान आहे. भारताची राज्यघटना ही अतिशय लवचीक असून तिच्या मदतीने जगातील इत्तर राज्यघटनांपेक्षा जास्त प्रकारचे कायदे करता येतात. आपल्या घटनेने प्रत्येकाला एकच नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. आपली घटना हि जगातील सगळ्यात मोठी घटना आहे.


🔑भारतीय राज्यघटना : घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये , केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत ग्क्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका


एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे


भाग I  कलम १ ते ४ संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र 


भाग II कलम ५ ते ११  नागरिकत्व 


भाग III कलम १२ ते ३५ मूलभूत अधिकार 


भाग IV कलम ३६ ते ५१ राज्याचे मार्गदर्शक तत्वे 


भाग IVA कलम ५१ A मूलभूत कर्त्यव्ये


भाग V  कलम ५२ ते १५१ केंद्र सरकार (संघराज्य)


भाग VI कलम १५२ ते २३७ राज्य सरकार 


भाग VII 7 वी घटनादुरुस्ती रद्द


भाग VIII कलम२३९-२४२ केंद्रशासित प्रदेश क्षेत्र


भाग IX कलम २४३-२४३O पंचायतराज

– ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद

– नगर पंचायत 


भाग IX A कलम २४३P – २४३ZG  नगरपालिका


भाग IX B  कलम ZH – कलम ZT  सहकारी संस्था


भाग X  कलम २४४-२४४A  अनुसूचित जाती व जमातीप्रदेश /क्षेत्र, आदिवासी क्षेञ


 भाग XI  कलम २४५ – २६३  केंद्र – राज्य संबंध 


 भाग XII  कलम २६४-३००A  महसुल – वित्त, मालमत्ता, करार व फिर्याद


 भाग XIII  कलम ३०१-३०७  व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध


 भाग XIV  कलम ३०८-३२३  केंद्र आणि राज्यांतर्गत सेवा, प्रशासकीय लोकसेवा आयोग


 भाग XIV A  कलम ३२३A, ३२३B  न्यायाधिकरण


 भाग XV  कलम ३२४-३२९A  निवडणूक आयोग


 भाग XVI कलम ३३०-३४२   अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी


 भाग XVII   कलम ३४३-३५१  कार्यालयीन भाषा


 भाग XVIIII  कलम ३५२-३६०  आणीबाणी विषयक तरतुदी


 भाग XIX  कलम ३६१-३६७  संकीर्ण


 भाग XX  कलम ३६८ संविधान दुरुस्ती बाबत 


 भाग XXI  कलम ३६९-३९२  अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष तरतुदी


 भाग XXII  कलम ३९३-३९५  संक्षिप्त रूपे, प्रारंभ आणि निरसने




📝परिशिष्ट


1. परिशिष्ट I राज्य व केंद्र शासित प्रदेश


2. परिशिष्ट II वेतन आणि मानधन (राष्ट्रपती, राज्यपाल,लोकसभेचा सभापती व उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती, राज्यातील विधानपरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक)


3. परिशिष्ट III पद ग्रहण शपथा (केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, संसद सदस्य, सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, राज्यातील मंत्री, विधिमंडळांच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळ सदस्य, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश)


4. परिशिष्ट IV राज्यसभा जागांचे राज्ये आणि संघराज्य प्रदेशात विवरण


5. परिशिष्ट V भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती


6. परिशिष्ट VI आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती संबंधित तरतुदी


7. परिशिष्ट VII केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची (केंद्र सूची – ९८ विषय सुरुवातीला ९७ विषय होते. राज्यसूची – ५९ विषय सुरुवातीला ६६ विषय होते. समवर्ती सूची ५२ विषय सुरुवातीला ४७ विषय होते.


8. परिशिष्ट VIII भाषा घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची संख्या पूर्वी १४ इतकी होती सध्या या परिशिष्टात २२ भाषा आहेत.


9. परिशिष्ट IX  कायद्यांचे अंमलीकरण. हे परिशिष्ट पहिली घटनादुरुस्ती अधिनियम, १९५१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.


10. परिशिष्ट X   पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभांचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी यात आहेत. सन १९८५ च्या ५२ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये याचा समावेश करण्यात आला. हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणूनच ओळखले जाते.


11.  परिशिष्ट XI  पंचायत राज चे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात २९ विषय आहेत. हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले.


12.  परिशिष्ट XII  हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७४ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले. नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत

परिशिष्ट



1. परिशिष्ट I राज्य व केंद्र शासित प्रदेश


2. परिशिष्ट II वेतन आणि मानधन (राष्ट्रपती, राज्यपाल,लोकसभेचा सभापती व उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती, राज्यातील विधानपरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक)


3. परिशिष्ट III पद ग्रहण शपथा (केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, संसद सदस्य, सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, राज्यातील मंत्री, विधिमंडळांच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळ सदस्य, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश)


4. परिशिष्ट IV राज्यसभा जागांचे राज्ये आणि संघराज्य प्रदेशात विवरण


5. परिशिष्ट V भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती


6. परिशिष्ट VI आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती संबंधित तरतुदी


7. परिशिष्ट VII केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची (केंद्र सूची – ९८ विषय सुरुवातीला ९७ विषय होते. राज्यसूची – ५९ विषय सुरुवातीला ६६ विषय होते. समवर्ती सूची ५२ विषय सुरुवातीला ४७ विषय होते.


8. परिशिष्ट VIII भाषा घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची संख्या पूर्वी १४ इतकी होती सध्या या परिशिष्टात २२ भाषा आहेत.


9. परिशिष्ट IX  कायद्यांचे अंमलीकरण. हे परिशिष्ट पहिली घटनादुरुस्ती अधिनियम, १९५१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.


10. परिशिष्ट X   पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभांचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी यात आहेत. सन १९८५ च्या ५२ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये याचा समावेश करण्यात आला. हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणूनच ओळखले जाते.


11.  परिशिष्ट XI  पंचायत राज चे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात २९ विषय आहेत. हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले.


12.  परिशिष्ट XII  हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७४ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले. नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात १८ विषय आहेत.

विधान परिषद


- राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह

- घटनेचे कलम 169 विधानपरिषदेची स्थापना किंवा रद्द करण्याशी संबंधित आहे: संबंधित राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने (2/3) असा ठराव पारित करावा लागतो आणि हा ठराव संसदेत साध्या बहुमताने मंजूर करावा लागतो. 

-------------------------------------

● पात्रता 

- उमेदवार भारताचा नागरिक असावा

- त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावीत. 

- संसदेने ठरवून दिलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक

-------------------------------------

● सदस्य संख्या

- कमीत कमी 40 (J&K: 36) तर जास्तीत जास्त संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश इतके सदस्य

- एक तृतीयांश सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात (स्थायी सभागृह)

- सदस्याचा कालावधी 6 वर्षांचा असतो

--------------------------------------

● रचना: कलम 171

[सदस्य: मतदार संघ: महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील संख्या]


- 1/12 सदस्य: पदवीधर मतदारसंघातून: 7 सदस्य

- 1/12 सदस्य: शिक्षक मतदारसंघातून: 7 सदस्य

- 1/6 सदस्य: राज्यपाल नियुक्त: 12 सदस्य

- 1/3 सदस्य: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून: 26 सदस्य

- 1/3 सदस्य: विधानसभा सदस्य निवडून देतात: 26 सदस्य

■ विधानपरिषदेच्या गणपूर्तीसाठी 1/10 सदस्यांची आवश्यकता असता.

--------------------------------------

● विधानपरिषद असलेली राज्ये

[राज्याचे नाव आणि सदस्य संख्या]


- उत्तर प्रदेश (100)

- महाराष्ट्र (78)

- बिहार (75)

- कर्नाटक (75)

- आंध्र प्रदेश (50)

- तेलंगणा (40)

- जम्मू-काश्मिर (36)

■ ओरिसा हे विधानपरिषद स्थापन करणारे देशातील आठवे राज्य ठरले आहे.

● महाराष्ट्राची विधानपरिदषद




- भारत सरकार कायदा 1935 नुसार 1937 मध्ये विधानपरिषद अस्तित्वात आली.
- परीषदेची पहिली बैठक 20 जुलै 1937 रोजी पुण्याच्या कौन्सिल हाॅलमध्ये पार पडली.
- 1960 पासून हिवाळी अधिवेशन (ऑक्टो नोव्हें) नागपूर येथे होते.
- 1987 मध्ये परीषदेला 50 वर्षे पूर्ण झाली, सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला.
- 2000 पासून 22 जुलै हा दिवस महाराष्ट्र विधानपरिषदेचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो.
---------------------------------------
● सदस्य संख्या

- 1937 मध्ये 29, 1957 मध्ये 108 करण्यात आली तर वेगळ्या महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ही सदस्य संख्या 78 करण्यात आली. यापैकी -
30 सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे
22 सदस्य स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारे
07 सदस्य पदवीधर आणि शिक्षकांद्वारे
12 सदस्य राज्यपालांद्वारे निवडले जातात.
- गणपूर्तीसाठी कमीत कमी 10 सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे.
--------------------------------------
● सभापती

- पहिले सभापती: मंगलदास मच्छाराम पक्वासा (22 जुलै 1937 ते 16 ऑगस्ट 1947)
- सध्या: रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर
- आजपर्यंत एकही महिला सभापती झाली नाही.
----------------------------------------
● उपसभापती

- पहिले उपसभापती: आर. जी. सोमण (22 जुलै 1937 ते 16 ऑक्टोबर 1947)
- पहिल्या महिला उपसभापती: जे. टी. सिपाहिमलानी (19 ऑगस्ट 1955 ते 24 एप्रिल 1962)
- सध्या: नीलम गोर्हे


शेवटचे 50 दिवस आणि आपण.

आज ही Post लिहिण्याचा उद्देश एकच आहे की Combine पुर्व साठी राहिलेले शेवटचे 50 दिवस तुमच्यासाठी Game Changer ठरू शकतात. त्याच अनुषंगाने काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न.

  1. आता तुमची Revision ची phase चालू असेल त्यामुळे नवीन हातात काहीच घेऊ नका. जे आत्तापर्यंत वाचलंय तेच Revise करा.

2. इथून पुढे कमीत कमी 3 Revision व्हायला पाहिजेत असं नियोजन करा. पुढील 50 दिवसाचे 25-15-10  अशा दिवसांमध्ये 3 Revision चे Planning करू शकता.    

3. कमीत कमी 5 विषयांवर आपला जबरदस्त Control असला पाहिजेत. आणि इतर कोणतेही 2 विषय ते सुद्धा above average हवेत तरच 60+ च Target गाठता येऊ शकते.

4. कुठल्याही विषयाला गृहीत धरू नका विशेषतः गणित बुद्धिमत्ता आणि इतिहास. या विषयांकडेसुद्धा Specific लक्ष असू दया. कारण मार्कांची गोळबेरीज ही सर्व विषय मिळूनच होत असते.       

5. Polity चे Imp Articles, Subjects, Schedules,पंचायत राज च्या काही Facts या पाठ असू दया.

6. Combine Prelims चे 2022,2021,2020,2019 या चार वर्षांच्या Papers च बारकाईने विश्लेषण करा. त्यामध्ये आयोग कुठे फसवतो, आयोगाची अपेक्षा, काही Tricks, प्रश्न विचारण्याची पद्धती, विषयानुसार आयोगाचा कल या सर्व बाबींचा आढावा घेणं योग्य राहील.

7. Practice Test papers Solve करायला हवेत. कारण आपल Time Management होत आहे का नाही हे त्यातूनच समजू शकते. किमान 5 Test Papers तरी वेळ लावून सोडवून व्हायला हवेत.       

8.आता Revision करत असताना प्रत्येक विषयाचा प्रत्येक उपघटक, प्रत्येक कोपरा चांगला धुंढाळून घ्यायला हवा.

9. Exam Hall मधील 1 तास-
आपण कितीही अभ्यास केला तरी हा एक तासच बऱ्याच गोष्टी ठरवतो. त्यामुळे त्या 1 तासामध्ये मानसिकता सकारात्मक असायला हवी. इतर गोष्टींचे विचार कमीत कमी यायला हवेत. त्यामुळे आत्ताच Practice करत असताना आयोगाचा Paper Solve करत आहोत असा Approach समोर ठेऊन Solve करा.

 शेवटी Combine हा जरी 20-20 चा खेळ असला तरी त्याच्या पाठीमागे असलेली मेहनतच आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे शेवटचे 50 दिवस शक्य तेवढा जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा.      

  सर्वांना शुभेच्छा 💐💐.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...