१६ ऑक्टोबर २०२२

शासनाच्या महत्वाच्या योजना

प्रधानमंत्री जन धन योजना - 28 ऑगस्ट 2014

स्वच्छ भारत मिशन - 2 ऑक्टोबर, 2014

मिशन इंद्रधनुष्य - 25 डिसेंबर 2014

बाटी बचाओ बेटी पढाओ - 22 जानेवारी 2015

अटल निवृत्तीवेतन योजना - 9 मे 2015

डी.डी. किसान चॅनेल - 26 मे 2015

स्मार्ट सिटी प्रकल्प - 25 जून 2015

प्रधानमंत्री आवास योजना - 25 जून 2015

डिजिटल इंडिया - 1 जुलै 2015

स्टॅन्डस अप इंडिया - 5 एप्रिल, 2016

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना - 1 मे, 2016

आयुष्मान भारत योजना - 23 सप्टेंबर, 2018

सवामित्व योजना - 24 एप्रिल 2020

वेगवेगळ्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला

1] अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमानं उडवणाऱ्या महिला

2] इंदिरा गांधी: देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान

3] कल्पना चावला: अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला

4] दुर्गाबाई कामत: दुर्गाबाई कामत या पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री होत्या.

5] प्रिया जिंघन: भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या पहिल्या महिला

6] पी.व्ही.सिंधू: रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूने रौप्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी पहिली महिला ठरली

7] आनंदीबाई गोपाळ जोशी: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला.

8] अदिती पंत: अंटार्टिकावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला

9] बचेंद्री पाल: या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. १९९४ साली त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर सर केले. भारत सरकारने २०१९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

10] रिटा फेरिया पॉल: मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी पहिली भारतीय महिला

11] हिना सिंधू: वर्ल्डकप शुटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला.

12] मिताली राज: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा पार करणारी पहिली भारतीय महिला. एकदिवसीय सामन्यात २०० एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे

13] होमी वरारावाला: छायाचित्रकार म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या (फोटो जर्नालिस्ट) पहिल्या भारतीय महिला साडी नेसून खांद्यावर कॅमेरा घेतलेला त्यांचा फोटो त्या काळाची प्रचिती देतो.

14] सायना नेहवाल: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

15] फातिमा बेवी: सर्वोच्च न्यायलयातील पहिल्या महिला न्यायाधीश

16] दीपा मलिक: २०१६ साली रिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला

17] पी. टी. उषा: ऑलिम्पिक खेळांच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू

शहर - नदी - राज्य

1. आग्रा - यमुना - उत्तर प्रदेश
2.. अहमदाबाद - साबरमती - गुजरात
3. अलाहाबाद - गंगा - उत्तर प्रदेश
4. अयोध्या - सरयू - उत्तर प्रदेश
5. बद्रीनाथ - गंगा - उत्तराखंड
6. कोलकाता - हुगळी - पश्चिम बंगाल
7. कटक - महानदी - ओडिशा
8. नवी दिल्ली - यमुना - दिल्ली
9. दिब्रूगड - ब्रह्मपुत्र - आसाम
10. फिरोजपूर - सतलज - पंजाब
11. गुवाहाटी - ब्रह्मपुत्र - आसाम
12. हरिद्वार - गंगा - उत्तराखंड
13. हैदराबाद - मुसी - तेलंगणा
14. जबलपूर - नर्मदा - मध्य प्रदेश
15. कानपूर - गंगा - उत्तर प्रदेश
16. कोटा - चंबळ - राजस्थान
17. जौनपूर - गोमती - उत्तर प्रदेश
18. पटना - गंगा - बिहार
19. राजामंड्री - गोदावरी - आंध्र प्रदेश
20. श्रीनगर - झेलम - जम्मू / काश्मीर
21. सूरत - ताप्ती - गुजरात
22. तिरुचिरापल्ली - कावेरी - तामिळनाडू
23. वाराणसी - गंगा - उत्तर प्रदेश
24. विजयवाडा - कृष्णा - आंध्र प्रदेश
25. वडोदरा - विश्वमित्री - गुजरात
26. मथुरा - यमुना - उत्तर प्रदेश
27. औरैया - यमुना - उत्तर प्रदेश
28. इटावा - यमुना - उत्तर प्रदेश
29. बेंगळुरू - वृषभवती - कर्नाटक
30. फर्रुखाबाद - गंगा - उत्तर प्रदेश
31. फतेहगड - गंगा - उत्तर प्रदेश
32. कन्नौज - गंगा - उत्तर प्रदेश
33. मंगलोर - नेत्रावती - कर्नाटक
34. शिमोगा - तुंगा नदी - कर्नाटक
35. भद्रावती - भद्रा - कर्नाटक
36. होसपेट - तुंगभद्र - कर्नाटक
37. कारवार - काली - कर्नाटक
38. बागलकोट - घाटप्रभा - कर्नाटक
39. होन्नवर - श्रावती - कर्नाटक
40. ग्वालियर - चंबळ - मध्य प्रदेश
41. गोरखपूर - राप्ती - उत्तर प्रदेश
42. लखनऊ - गोमती - उत्तर प्रदेश
43. कानपूर - छावणी - गंगा उत्तर प्रदेश
44. शुक्लगाव - गंगा - उत्तर प्रदेश
45. चाकेरी - गंगा - उत्तर प्रदेश
46. मालेगाव - गिरणा नदी - महाराष्ट्र
47. संबलपूर - महानदी - ओडिशा
48. राउरकेला - ब्राह्मणी - ओडिशा
49. पुणे - मुठा - महाराष्ट्र
50. दमण - गंगेची नदी - दमण
51. मदुरै - वैगाई - तामिळनाडू
52. तिरुचिराप्पल्ली - कावेरी - तामिळनाडू
53. चेन्नई - आदियार - तामिळनाडू
54. कोयंबटूर - नोय्याल - तामिळनाडू
55. इरोड - कावेरी - तामिळनाडू
56. तिरुनेलवेली - थामिरबाराणी - तामिळनाडू
57. भरुच - नर्मदा - गुजरात
58. कर्जत - उल्हास - महाराष्ट्र
59. नाशिक - गोदावरी - महाराष्ट्र
60. महाड - सावित्री - महाराष्ट्र
61. नांदेड - गोदावरी - महाराष्ट्र
62. नेल्लोर - पेन्नर - आंध्र प्रदेश

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum Porifera)



हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद्रांना ऑस्टीया' आणि 'ऑस्कुला म्हणतात.

हे जलवासी प्राणी असून त्यांतील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात.

बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते

या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात,

हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही. म्हणून 'स्थांना 'स्थानबद्ध प्राणी' (Sedentary animals) म्हणतात.

ह्यांच्या स्पंजासारख्या शरीरास कंटिकांचा / शुकिकांचा (Spicules) किंवा स्पोंजिनच्या तंतूचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनिट किंवा सिलीकाच्या बनलेल्या असतात.

ह्यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषकद्रव्यांचे से भक्षण करतात. ऑस्टीया नावाच्या छिद्रांद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑस्क्युला' नावाच्या छिद्रांद्वारे बाहेर सोडले जाते.

त्यांचे प्रजनन मुकुलायन यो अलैंगिक पद्धतीने किंवा / आणि लैंगिक पद्धतीने होते. याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते

उदाहरणे :  सायकॉन, यूस्पोंजिया (आंघोळीचा स्पंज), हायालोनिमा, वुप्लेक्टेल्ला, इत्यादी.

IIT गुवाहाटी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 'परम कामरूपा' सुपर कॉम्प्युटर सुविधेचे उद्घाटन केले

भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहाटी येथे एका सुपर कॉम्प्युटर सुविधेचे उद्घाटन केले आणि पदभार स्वीकारल्यापासून आसामच्या त्यांच्या पहिल्या भेटीदरम्यान इतर अनेक प्रकल्प सुरू केले.

"परम-कामरूपा" नावाची ही सुपर कॉम्प्युटर सुविधा विविध वैज्ञानिक क्षेत्रात प्रगत संशोधन करण्यास सक्षम असेल.

तिने संस्थेमध्ये समीर नावाच्या उच्च-शक्तीच्या सक्रिय आणि निष्क्रिय घटक प्रयोगशाळेचे उद्घाटन देखील केले.

महिला आशिया चषक 2022:

महिला आशिया चषक 2022: भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव केला

महिला आशिया चषक 2022 च्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव केला .

भारताने सातव्यांदा हे स्थान पटकावले आहे.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

श्रीलंकेने 20 षटकांत 10 गडी गमावून 65 धावा केल्या.

भारताने 8.3 षटकात केवळ 2 विकेट गमावून 71 धावा करत लक्ष्याचा पाठलाग केला.

स्मृती मानधनाने 25 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या.

श्रीलंकेविरुद्ध रेणुका सिंग ठाकूरने तीन तर राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले

लक्षात ठेवा

इ. स. १८४८ मध्ये आपल्या स्वतःच्या घरात मुलींची मुंबईतील पहिली शाळा स्थापन केली ....
- नाना शंकरशेठ

मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी जमशेदजी जिजीभाय यांच्याबरोबरच .... यांनीही विशेष प्रयत्न केले होते.
- नाना शंकरशेठ

एरवी इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या .... यांनीच वेळप्रसंगी “दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचा कारभार पाहत आहे." अशा शब्दांत ब्रिटिश शासनावर टीका केली.
- लोकहितवादी

अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना .... यांनी १८५७ चे भिल्लांचे बंड मोडून काढले.
- दादोबा पांडुरंग

स्वधर्मात राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करावयाचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडवून आणावयाचे, असे मानणारा सुधारकांचा एक वर्ग देशात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आपणास ..... यांनी स्थापन केलेल्या 'मानव धर्मसभा' व 'परमहंस सभा' यांचा उल्लेख करावा लागेल.
- दादोबा पांडुरंग

दुर्गाराम मंछाराम यांच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग यांनी १८४४ मध्ये 'मानवधर्म सभा' या सभेची स्थापना केली. कोठे ?
- सुरत

दादोबा पांडुरंग यांनी मुंबई येथे 'परमहंस सभे'ची स्थापना केली ....
- ३१ जुलै, १८४९

हिंदुधर्मातील स्त्रियांची दुःस्थिती व विशेषतः विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती यांवर प्रकाश टाकणारी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहिली ....
- बाबा पद्मनजी

सन १८६७ मध्ये मुंबई येथे 'प्रार्थना समाजा'ची स्थापना करण्यात आली. या समाजाच्या स्थापनेचे श्रेय विशेषत्वाने देण्यात येते .... यांना.
- आत्माराम पांडुरंग

.... रोजी मुंबईतील कोळीवाडा (मांडवी) येथील समारंभात जोतीराव फुले यांना 'महात्मा' ही पदवी दिली गेली.
- ११ मे, १८८८

भारतीय नौदलाने प्रस्थान नावाचा ऑफशोअर सुरक्षा सराव आयोजित केला.

'प्रस्थान' एक ऑफशोर सुरक्षा सराव ईस्टर्न नेव्हल कमांडद्वारे काकीनाडाजवळ ऑफशोअर डेव्हलपमेंट एरिया (ODA) मध्ये आयोजित करण्यात आला होता .

'प्रस्थान' हा एक अर्धवार्षिक व्यायाम आहे जो केजी बेसिनमध्ये SOPs प्रमाणित करण्यासाठी, विविध आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी आणि सागरी सुरक्षेसाठी कमांड आणि कंट्रोल ऑर्गनायझेशन मजबूत करण्यासाठी आयोजित केला जातो.

प्रस्थान' एक ऑफशोर सुरक्षा सराव ईस्टर्न नेव्हल कमांडद्वारे काकीनाडाजवळ ऑफशोअर डेव्हलपमेंट एरिया (ODA) मध्ये आयोजित करण्यात आला होता .

'प्रस्थान' हा एक अर्धवार्षिक व्यायाम आहे जो केजी बेसिनमध्ये SOPs प्रमाणित करण्यासाठी, विविध आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी आणि सागरी सुरक्षेसाठी कमांड आणि कंट्रोल ऑर्गनायझेशन मजबूत करण्यासाठी आयोजित केला जातो.

मुलींसाठी एनटीएलमध्ये कौशल्याबाबत राष्ट्रीय परिषद 'बेटियां बने कुशल'

महिला आणि बाल विकास मंत्रालय ( MWCD) मुलींसाठी अपारंपरिक आजीविका (NTL) मध्ये कौशल्य या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करणार आहे.

11 ऑक्टोबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ या बॅनरखाली “ बेटियां बने कुशल ” असे या कार्यक्रमाचे नाव आहे .

बेटियां बने कुशल मोहिमेशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे :-

मुलींनी विविध प्लॅटफॉर्मवर त्यांची कौशल्ये विकसित करावीत याची खात्री करण्यासाठी ही परिषद मंत्रालये आणि विभाग यांच्यातील अभिसरणावर भर देईल.

व्यवसायांच्या संचामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यांचा समावेश होतो.

या कार्यक्रमात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय यांच्यासोबत तरुण मुलींच्या कौशल्यासाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली जाईल.

या प्रकल्पाचा उद्देश समानता वाढवणे आणि मुलींचे सक्षमीकरण करणे आहे.

१५ ऑक्टोबर २०२२

ब्राह्मणेतरांची पत्रकारिता


दीनबंधू:  पुणे येथे १ जानेवारी १८७७ रोजी कृष्णराव भालेकरांनी सुरु केले.

दीनमित्र :  ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र होते. १८८८ मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी मासिकरुपात दीनमित्र सुरु केले.

तरुण मराठा:  शाहू महाराजांच्या इच्छेनुसार दिनकरराव जवळकर यांनी  १९२२ मध्ये तरुण मराठा हे पत्र सुरु केले. चिपळूणकर व टिळक यांच्यावरील टीकेमुळे (देशाचे दुश्मन ही पुस्तिका) जवळकरांचे नाव गाजले.

कैवारी  :   फेब्रुवारी १९२८ मध्ये दिनकरराव जवळकर यांनी कैवारी हे पत्र भास्करराव जाधव व जेधे बंधु याच्या प्रेरणेने व सहकार्याने सुरु केले.

डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता :

मूकनायक : ३१ जानेवारी १९२०,

बहिष्कृत भारत:  १९२७,

जनता: १९३०

प्रबुद्ध भारत : १९५६.

मराठी वृत्तपत्र


मित्रोदय:  पुण्यातून निघालेले पहिले मराठी वृत्तपत्र म्हणजे मित्रोदय. ते १८४४ मध्ये निघाले;

ज्ञानप्रकाश

१२ फेब्रुवारी १८४९ रोजी ज्ञानप्रकाश सुरु झाले  .

कृष्णाजी त्रिंबक रानडे

१९०९ मध्ये ‘भारत सेवक समाजा’ने हे वृत्तपत्र चालविण्यास घेतले.

त्यानंतर नेमस्तांचे मुखपत्र अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली.


ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक होण्याचा मान विख्यात मराठी कादंबरीकार हरी नारायण  आपटे यांना मिळाला.

‘सत्य, सौख्य आणि ज्ञान’ हे त्याचे ब्रीदवाक्य होते.

महादेव गोविंद रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या नामवंत व्यक्ती ज्ञानप्रकाशमधून लेखन करीत.

इंदुप्रकाश

जानेवारी १८६२ पासून इंदुप्रकाश हे वृत्तपत्र साप्ताहिकरुपात मुंबईहून प्रसिद्ध होऊ लागले.

ते काढण्यात लोकहितवादींचाच पुढाकार होता.

इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे होते, तर मराठी विभागाचे संपादक म्हणून जनार्दन सखाराम गाडगीळ काम पाहत.

प्रभाकर

प्रभाकर हे वृत्तपत्र २४ ऑक्टोबर १८४१ रोजी सुरु झाले.

भाऊ महाजन हे प्रभाकरचे संपादक होते. .

प्रभाकरचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे त्यात प्रसिध्द झालेली शतपत्रे. ही शतपत्रे गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी  लिहीत असत.

हे साप्ताहिक १८६५ साली बंद पडले.

प्रभाकरशी स्पर्धा करणाऱ्या वर्तमानदीपिका या वृत्तपत्राला तोंड देण्यासाठी भाऊ महाजन यांनी धूमकेतू (१८५३) नावाचे वृत्तपत्र काढले .

मराठी वृत्तपत्रांचा आढावा


दर्पण

मराठीतील पहिले वृत्तपत्र

दि. ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईतून सुरु केले.

दर्पण प्रारंभी पाक्षिक होते. ४ मे १८३२ पासून ते साप्ताहिक झाले.

या पत्रात इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत मजकूर छापला जात असे.

जांभेकर यांना संपादनाच्या कार्यात भाऊ महाजन (ऊर्फ गोविंद विठ्ठल कुंटे) यांचे सहकार्य लाभत असे.

बेअदबी प्रकरणाची झळ लागून दर्पण बंद पडले (१८४०). ते बंद पडल्यावर त्याच्या चालकांनी युनायटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल हे नियतकालिक सुरु केले.

दिग्दर्शन

जांभेकरांनी  १८४० च्या मे महिन्यात दिग्दर्शन हे मराठी नियतकालिक सुरु केले.

ते साहित्य, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांना वाहिलेले भारदस्त मासिक होते.

ज्ञानोदय :  जून १८४२ मध्ये अहमदनगर येथे ख्रिस्ति मिशनऱ्यांनी ज्ञानोदय हे मासिक सुरु केले. १८७३ मध्ये ज्ञानोदय साप्ताहिक झाले. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतून प्रसिध्द होणाऱ्या या साप्ताहिकाचे रेव्हरंड हेन्री बॅलंटाइन हे पहिले संपादक होते.

भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे


भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला.
१८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले.
भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.

मिरात-उल्-अखबार

राजा राममोहन रॉय यांनी १८२२ मध्ये मिरात-उल्-अखबार हे साप्ताहिक फार्सी भाषेत खास सुशिक्षितांसाठी सुरु केले.

लवकरच १८२२ च्या ‘प्रेस अॅक्ट’च्या निषेधार्थ त्यांनी अखबार बंद केले.

संवाद कौमुदीच्या आधीपासून कलकत्ता येथे जाम-ए-जहाँनुमा (१८२२) व शम्‌सुल अखबार ही वृत्तपत्रे फार्सी भाषेत चालू होती.

दिग्दर्शन: श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी  आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले.

समाचार दर्पण:  २३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो.

सोमप्रकाश: पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.

तत्त्वबोधिनी पत्रिका: देवेंद्रनाथ टागोर  यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक.

सुलभ समाचार : केशवचंद्र सेन (१८७८).

अमृत बझार पत्रिका : मोतीलाल घोष यांनी १८६८ मध्ये सुरु केले.

भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास:

भारतातील वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रकाशनाने झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या गैरव्यवहारांना वाचा फोडण्याचे काम ही वृत्तपत्रे करीत.

भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट हे कलकत्ता येथे २९ जानेवारी १७८० रोजी जेम्स ऑगस्टस हिकी या ब्रिटिश व्यक्तिने सुरु केले. ते हिकिज बेंगॉल गॅझेट म्हणूनही ओळखले जाते. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खाजगी भानगडींना वाचा फोडावयाची, हाच हिकीचा प्रमुख खटाटोप होता. त्यातूनच कटकटी निर्माण झाल्या व टपालातून त्याचे साप्ताहिक पाठविण्याची त्याची सवलत रद्द झाली. तसेच एकदोनदा त्यास दंड होऊन शिक्षाही भोगावी लागली.
मद्रासमधील पहिले इंग्रजी वृत्तपत्र मद्रास कुरिअर हे होय. ते १७८५ साली रिचर्ड जॉन्सन या सरकारी मुद्रकाने सुरु केले.

मुंबईमधील पहिले नियतकालिक बाँबे हेरल्ड १७८९ मध्ये सुरु झाले. १७९१ मध्ये बाँबे गॅझेट प्रकाशित झाले. प्रारंभापासून त्याला राजाश्रय मिळाला होता. पुढच्याच वर्षी बाँबे हेरल्ड त्यात विलीन झाले. बाँबे गॅझेट १९१४ पर्यंत चालू होते.

1857 च्या उठावाची कारणे

- सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन 1856 पर्यंत जवळ-जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.
- 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिध्द आहे. 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दांत देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग असल्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला. यामागे असणारी कारणे जाणून घेऊयात...

राजकीय कारणे:

- इ.स.1600 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया स्थापना झाली.
- इ.स.1757 च्या प्लासीच्या लढाईने ब्रिटीश सत्तेचा पाया भारतात रचला गेला.
- इ.स.1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.

- तैनाती फौजेच्या पद्धतीचा अवलंब करुन साम्राज्य विस्तारावर भर दिला.
- वेलस्लीने निजाम मराठ्यांचे शिंदे, होळकर, भोसले इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आविला व अनेक संस्थाने बरखास्त केली.
- लॉर्ड क्लाईव्ह, लॉर्ड वॉरन हेस्टिंग, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलनी देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.

आर्थिक कारणे:

- ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता.
- 18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली.
- शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता. शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता.

लष्करी कारणे :

- शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यंत उठाव घडून येणे शक्य नव्हते. पण राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला.

- शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली.

- ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बंध लादले.

- इ.स.1806 मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली.

धार्मिक कारणे:

- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने धार्मिक साम्राज्यवादाचा पुरस्कार केला.

- इ.स.1813 च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.
- अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.

- कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली.

युरोपीयांचे भारतात आगमन


ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ प्रथमच्या काळात ३१ डिसेंबर, १६०० साली लंडन येथे झाली.

सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीस १५ वर्षांसाठी व्यापारी सनद देण्यात आली होती. तथापि, राजा जेम्स पहिला याने इ.स. १६०९ साली कंपनीस कायमची सनद बहाल केली.

भारतात प्रथम पोर्तुगीज, त्यानंतर डच, त्यानंतर इंग्रज व शेवटी फ्रेंच या क्रमाने युरोपियन सत्ता आल्या.

अल्बकुर्क हा पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक मानला जातो. १५१० मध्ये त्याने विजापूरच्या अदिलशाहकडून गोवा प्रांत जिंकून घेतला.

पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाइसरॉय- डी अल्मेडा, दुसरा व्हाइसरॉय- अल्फान्सो डी अल्बकुर्क.

भारतात सर्वात जास्त म्हणजे ४५० वर्षे राहिलेली युरोपियन सत्ता म्हणजे पोर्तुगीज सत्ता होय.

डी अल्मेडा (१५०४ ते १५०९) – भारतातील पोर्तुगीजांचा प्रथम व्हाइसरॉय. याने पोर्तुगीज साम्राज्याच्या विस्तारासाठी ब्ल्यू वॉटर पॉलिसीचा स्वीकार केला. भारतात साम्राज्य विस्तारासाठी, भूप्रदेशावर ताबा घेण्यासाठी सागरावरील प्रमुख केंद्रे ताब्यात घेतली.

अल्बकुर्क (१५०९ ते १५१५) – भारतातील पोर्तुगीजांचा दुसरा व्हाइसरॉय. अल्बकुर्कला भारतातील पोर्तुगीजांच्या साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखले जाते. डॉड वेल नामक इतिहासकाराने अल्बकुर्कची तुलना लॉर्ड क्लाइव्हशी केली आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे



‘गुरु नानक’ हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात.
गुरु गोविंदसिंग नांदेड मध्ये मुक्कामी असताना इ.स.1708 मध्ये दोन पठाणांकडून त्यांची हत्या झाली.
19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली.
6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले.
1761 मध्ये तिसरे पानीपतचे युद्ध घडून आले.

1761 मध्ये तिसरे पानीपतचे युद्ध घडून आले.
1802 मध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यात वसईचा तह होऊन मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली.
शिवाजी महाराजांनी जमीन मोजण्यासाठी एक काठी तयार केली होती तिला ‘शिवशाही काठी’ असे म्हटले जात असे.
शिवाजी महाराजांनी दोन नाणी सुरू केली होती त्यामध्ये ‘होन’ हे सोन्याचे तर ‘शिवराई’ हे तांब्याचे नाणे होते.
दक्षिण भारतामध्ये ‘नायनार आणि अलवार’ या भक्ती चळवळी उदयास आल्या.
महाकवी सूरदास यांनी ‘सुरसागर’ हे काव्य लिहिले.
शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकूटाचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुसर्‍या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून 630 च्या सुमारास नेमले व चांदोर सध्याचे चंद्रपुर ही आपली राजधानी बनवली.

23 जून 1757 च्या प्लासीच्या युद्धात बंगालच्या नवाबचा पराभव करून ब्रिटीशांनी बंगालमध्ये आपली सत्ता निर्माण केली.
1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...