०१ ऑक्टोबर २०२२

काही जिल्हे व त्यांचे पालकमंत्री 

मुंबई शहर , कोल्हापूर  - दीपक केसरकर  

मुंबई उपनगर - मंगलप्रभात लोढा 

अहमदनगर , सोलापूर - राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक - दादा भुसे 

पुणे - चंद्रकांत पाटील

बुलडाणा - गुलाबराव पाटील

सिंधुदुर्ग - दीपक केसरकर 

रत्नागिरी , रायगड - उदय सामंत 

हिंगोली - अब्दुल सत्तार 

संभाजीनगर - संदिपान भुमरे 

जालना , बीड - अतुल सावे 

यवतमाळ , वाशीम - संजय राठोड

ठाणे , सातारा - शंभूराज देसाई 

परभणी - तानाजी सावंत

सांगली - सुरेश खाडे 

पालघर - रवींद्र चव्हाण 

चंद्रपूर , गोंदिया - सुधीर मुनगंटीवार 

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे 
= नागपूर - वर्धा - अमरावती - अकोला - भंडारा - गडचिरोली 

महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था 

नाना शंकरशेठ:-

बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी - 1823 मुंबई ,

बॉम्बे असोसिएशन:- 1852

न्या. म. गो. रानडे:-

विधवा विवाहोत्तेजक मंडळ (१८६५)

डेक्कन सभा :- 1896 , पुणे

रमाबाई रानडे :-

आर्य महिला समाज :-  1882(पंडिता रमाबाई, काशिताई कानिटकर)

हिंदू लेडिज सोशल क्लब :- 1894, मुंबई

सेवा सदन :-1908 ,मुंबई

भारत महिला परिषद :- 1904 ,मुंबई

महर्षी वि. रा. शिंदे :- 

डिप्रेस्ड क्लासेस मिशन (१९०६),

राष्ट्रीय मराठा संघ.

अहिल्याश्रम.

तरुण मराठा संघ.

जनाक्का शिंदे :-

निराश्रित सेवासदन

कर्मवीर भाऊराव पाटील :-

रयत शिक्षण संस्था, काले (१९१९),

वि. दा. सावरकर : -

मित्रमेळा(1900).

अभिनव भारत(1904).

महात्मा गांधी:-

हरिजन सेवक संघ (१९३२) .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर:-

बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४).

मजुर पक्ष (१९३६).

अ.भा. समता सैनिक दल (१९२७)
नाम. गो. कृ. गोखले :-

भारत सेवक समाज (१९०५)

गणेश वासुदेव जोशी(सार्वजनिक काका) :-

सार्वजनिक सभा (पुणे),

देशी व्यापारोत्तजक मंडळ (पुणे)

सरस्वतीबाई जोशी:-

स्त्री-विचारवंती संस्था, पुणे

पंडिता रमाबाई:-कृपासदन

शारदा सदन (मुंबई),

मुक्तीसदन (1896, केडगाव),

आर्य महिला समाज, पुणे

चालू घडामोडी सराव प्रश्न

Q.1 जागतिक पत्रकरिता स्वातंत्र्य निर्देशांक 2022 नुसार भारताचा क्रमांक कितवा?
1) १५० वा
2) १६० वा
3) १७० वा
4) १५४ वा
उत्तर 150

Q.2 प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे?
1) ५३वा
2) ५४वा
3) ५५वा
4) ५६ वा
उत्तर 54 वा

Q.4 अलीकडे स्वदेशी बनावटीच्या...... या युद्धनौकेचे जलअवतरण करण्यात आले?
1) कारागिरी
2) तारागिरी
3) विक्रांत
4) यापैकी नाही
उत्तर तरागिरी

Q.6 सिंगापूर ने भारताची माजी नौदल प्रमुख..... यांना मेरीटोरियस सर्विस मिडल प्रदान केले?
1) सुनील लांबा
2) राकेश सक्सेना
3) राकेश यादव
4) यापैकी नाही
उत्तर सुनील लांबा

Q.7 अटल इनोव्हेशन मिशनला..... वर्षापर्यंत मुदतवाढ मिळाली आहे?
1) 2023
2) 2024
3) 2025
4) 2026
उत्तर 2023

Q.8 राष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला?
1) जम्मू काश्मीर
2) पंजाब
3) ओडिसा
4) बंगळूर
उत्तर जम्मू काश्मीर

Q.9 बिमस्टेक शिखर परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली?
1) कोलंबो श्रीलंका
2) दिल्ली भारत
3) टोकियो जपान
4) बीजिंग चीन
उत्तर कोलंबो श्रीलंका

Q.10 आंतरराष्ट्रीय भुवैज्ञानिक काँग्रेस परिषद 2022 कोठे आयोजित करण्यात आली?
1) दिल्ली
2) मुंबई
3) बंगळूर
4) कोलकत्ता
उत्तर दिल्ली

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे महाराष्ट्राविषयी माहिती 

 महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.

महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

 महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

 महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

 महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

 विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

 महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

 संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
 संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

 महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

भारतीय राज्यघटना आणि स्त्रोत (कोणत्या देशांमधून)

ब्रिटन - संसदीय व्यवस्था, कायदा निर्मिती,  एकल नागरिकत्व

अमेरिकन - न्यायालयीन पुनर्विलोकन, स्वातंत्र्याचा हक्क आणि मूलभूत हक्क

जर्मनी - आणीबाणीचे तत्त्व

फ्रान्स - लोकशाही व्यवस्था

कॅनडा - संघराज्य पद्धती

आयर्लंड - मार्गदर्शक धोरणाची तत्त्वे

ऑस्ट्रेलिया - समवर्ती सूची

दक्षिण आफ्रिका - घटना दुरुस्ती प्रक्रिया

लॉर्ड चेम्सफोर्ड (सन 1916 ते 1921)

लॉर्ड हार्डिंगनंतर लॉर्ड चेम्सफोर्ड भारताचा व्हॉईसरॉय झाला.

याच काळात गांधीजीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाला सुरुवात झाली.

मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा (सन 1919):-

डिसेंबर 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा – 1919 पास केला.

या कायद्यामध्ये प्रांतिक कायदेमंडळातील काही खाती भारतीयांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

जी खाती भारतीयांकडे सोपविण्यात आली त्यांना सोपीव खाती असे म्हटले जात व जी खाती शासनाने स्वत:कडे राखून ठेवली त्या खात्यांना आली त्यांना सोपीव खाती असे म्हटले जात व जी खाती शासनाने स्वत:कडे राखून ठेवली त्या खात्यांना राखीव खाती म्हणून ओळखली गेली आणि केंद्रीय कायदेमंडळात व्दिगृही सभागृहाची स्थापना करण्यात आली.

रौलॅक्ट कायदा:-

भारतातील क्रांतिकारक कारवायांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सर सिडने रौलॅक्ट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.

या समितीच्या शिफारसीवर आधारित भारत सरकारने अनार्किकल अँड रिव्होल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.

हा कायदा भारताच्या इतिहासात रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा म्हणून ओळखला जातो.

३० सप्टेंबर २०२२

आधुनिक वैद्यकीय उपकरणे व त्यांचे उपयोग

सोनोग्राफी
शरीराच्या अंतर्भागाचे विशेषतः पोटाचे निरीक्षण करणारे यंत्र.

सीटी स्कॅनर
संपूर्ण शरीराच्या अंतर्भागाचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी वापरावयाचे यंत्र.

पेसमेकर
हृदयाचे ठोके नियंत्रण करणारे यंत्र.

इसीजी ( इलेक्टो कार्डिओग्राफ )
हृदयाची नियमितता तपासण्यासाठी स्पंदन आलेख काढणारे यंत्र.

क्ष - किरण यंत्र
रोगनिदान करण्यासाठी शरीराच्या अंतर्भागाचे छायाचित्रण.

रेस्पिरेटर
कृत्रिम श्वसन घडवून आणणे.

हार्टलंग मशीन
हृदयाची शस्त्रक्रिया चालू असताना हृदयाचे कार्य करणे.

डायलिसीस यंत्र
मुत्रपिंड नीट काम करत नसेल, तेव्हा रक्तातील अशुद्ध / घातक द्रव्ये काढून  टाकने.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राज्यात लागू करण्यासाठी समितीची स्थापना.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राज्यात लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे.

यासंदर्भातला ठराव उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयानं सोमवारी जारी केला आहे.

या समितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री, कृषी मंत्री आणि शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण तसंच वैद्यकीय शिक्षण या तीन मुख्य शिक्षण क्षेत्रातल्या  मंत्र्यांचा समावेश असेल.

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव या समितीचे सचिव असतील.

या समितीची बैठक दर तीन महिन्यांतून एकदा होईल.

अर्थशास्त्रातील पुस्तके आणि लेखक

पुस्तक - वेल्थ ऑफ नेशन्स
लेखक - एडम स्मिथ

पुस्तक - फाउंडेशन ऑफ इकॉनोमिक
                  एनालिसिस
लेखक - सैम्युलसन

पुस्तक - प्रिंसिपल्स ऑफ
                  इकोनॉमिक्स
लेखक - मार्शल

पुस्तक - नेचर एंड सिग्नीफिकेन्स ऑफ
                  इकॉनोमिक साइंस
लेखक - रॉबिन्स

पुस्तक - दास कैपिटल
लेखक - कार्ल मार्क्स

पुस्तक - द जेनरल थ्योरी ऑफ
                  इम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी
लेखक - जे.एम. कीन्स

पुस्तक - हाऊ टू पे फॉर वार
लेखक - कीन्स

भारतातील सर्वात लांब

1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

राष्ट्रीय लॉजिस्टीक्स धोरणाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण.


राष्ट्रीय लॉजिस्टीक्स धोरणाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतंच अनावरण केलं.

माल वाहतूक, साठवणूक आणि पुरवठा यावरील खर्चामध्ये कपात करुन उद्योगांना अधिक बळ देण्याचा या धोरणाचा उद्देश आहे.

त्यामुळे औद्योगिक संकुलं आणि वखार क्षेत्रातील गुंतवणूक वाढेलच पण त्याहीपेक्षा पुढे वाहतूक आणि logistics मध्ये होणारा तोटा हा वैश्विक तोटा आहे.

त्यामुळे वेळ, पैसा आणि नैसर्गिक सम्पत्ती यांचं न भरून येणारं नुकसान होत असतं, ते कमी होण्यास मदत होईल.

Unified regulatory environment मुळे कागदपत्रे आणि क्लिष्टता कमी होईल.

डिजिटायझेशनमुळे ही प्रक्रिया अधिकाधिक मोकळी होईल. लॉजिस्टीक्समधला वेग वाढून सर्वच क्षेत्रात फायदा होईल.

निर्यात-आयातीपासून ते अगदी भाजीच्या वाहतुकीमध्येही फायदा होईल.

ही सकारात्मक पावलं पडत असताना जल वाहतूक हा जो जगातली सर्वात स्वस्त दळणवळणाचा मार्ग मानला जातो त्या क्षेत्रातील प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचं आहे.

जगातल्या पहिल्या पन्नास कंटेनर हाताळणी बंदरांमध्ये भारतातील केवळ 2 बंदरांचा समाविष्ट होतो.

न्हावाशेवा हे बंदर ३५ व्या क्रमांकावर आहे. त्याबाबतीत जयगडसारख्या इतर बंदरांचा विकास लवकरात लवकर करणं गरजेचं आहे.

चीन, द नेदरलॅंड्स, कोरिया यांच्यापेक्षा भारताला समुद्राची नैसर्गिक खोली म्हणजे ड्राफ्ट कमी आहे.

तरीही त्यावर मात करून उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यातल्या कागदपत्रांच्या कारभारातील येणारा सहजपणा खूप अंशी कंटेनरच्या वाहतुकीची गती वाढवू शकेल.

व्यापारातील स्पर्धात्मकता आणि रस्ते, रेल्वे, समुद्र, आणि विमान वाहतुकीच्या समन्वयामुळे हे धोरण भारतातल्या सगळ्या इंडस्ट्रीज साठी नक्कीच स्वागतार्ह आणि फायदेशीर आहे.

लॉजिस्टीक्स क्षेत्रातील तज्ञ, संग्राम कुलकर्णी यांनी या धोरणाचं स्वागत करताना काही मौलिक सूचनाही केल्या आहेत.

दैनंदिन चालू घडामोडी सराव प्रश्नसंच

01. 'फॉर्च्युन इंडिया रिच लिस्ट 2022' मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनली आहे?
उत्तर- गौतम अदानी

02. 'UNESCO ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज' मध्ये प्रथमच कोणत्या भारतीय शहरांचा समावेश करण्यात आला?
Uttar-त्रिशूर (केरळ), वारंगल (केरळ) आणि निलांबूर (तेलंगणा)

03. विषाणूच्या प्रसारामुळे अमेरिकेतील कोणत्या राज्यात पोलिओवर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे?
उत्तर- न्यूयॉर्क

04. F-16 फायटर जेट फ्लीटच्या देखभालीसाठी अमेरिकेने कोणत्या देशाला 450 दशलक्ष डॉलर्सची मदत मंजूर केली आहे?
उत्तर -पाकिस्तान

05. अरुणाचल प्रदेश राज्यातील भारतातील सर्वात पूर्वेकडील 'मिलिटरी गॅरिसन' कोणत्या नावाने आहे?
उत्तर -जनरल बिपिन रावत

06. अर्जेंटिना मध्ये शिक्षक दिन सप्टेंबर मध्ये चुंबन दिवस साजरा केला जातो?
उत्तर -11 सप्टेंबर

07. कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आरोन फिंचने एकदिवसीय (एकदिवसीय आंतरराष्ट्रीय) सामन्यातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर -ऑस्ट्रेलिया

08. कोणत्या देशाने युरोपीय देशांसाठी $02 अब्ज लष्करी मदत जाहीर केली आहे?
उत्तर -अमेरिका

09. कोणत्या पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतीचे निधन?
उत्तर -द्वारका पीठ (द्वारका शारदा मठ) आणि ज्योतिष पीठ (ज्योतिर्मठ)

10. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'सिनेमॅटिक' लाँच केले आहे?
उत्तर -गुजरात

ज्योतिर्लिंग      -      ठिकाण

१)सोमनाथ - सोमनाथ( गुजरात)

२)मल्लिकार्जुन - श्रीशैलम( आंध्रप्रदेश)

३)महाकालेश्वर - उज्जैन(म. प्रदेश)

४)अंमलेश्वर - ओंकारमांधाता( म.प्र.)

५) वैद्यनाथ - परळी ( महाराष्ट्र)

६) रामेश्वर - तामिळनाडू

७) औंढा नागनाथ - हिंगोली ( महाराष्ट्र)

८) काशी विश्वेश्वर - वाराणसी (उ.प्रदेश)

९) घृष्णेश्वर - औरंगाबाद( महाराष्ट्र)

१०) केदारेश्वर - केदारनाथ( उत्तराखंड)

११)त्र्यंबकेश्वर - नाशिक ( महाराष्ट्र)

१२) भीमाशंकर - पुणे (महाराष्ट्र)

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षापरिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्य मिळावं यासाठी रशियाचा पाठिंबा जाहीर.


 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षापरिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्य मिळावं यासाठी रशियानं आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

अमेरिकेत सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ७७व्या आमसभेला संबोधित करतांना रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी भारताला पाठिंबा जाहीर करताना म्हटलं की, सुरक्षा परिषदेला व्यापक लोकशाही स्वरुप येण्यासाठी त्यात आफ्रिका, आशिया आणि लॅटीन अमेरिकेतील देशांचा समावेश व्हायला हवा.

विशेषतः भारत आणि ब्राझील हे दोन देश आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महत्वाचे देश असल्यानं त्यांना परिषदेचं कायमस्वरुपी सदस्यत्व मिळणं गरजेचे.

हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार दिलीप तिर्की यांची ऐतिहासिक निवड.

भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि 1998 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघाचे सदस्य दिलीप तिर्की यांची काल हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली.

इतिहासात प्रथमच एक माजी खेळाडू आणि एक ऑलिम्पिकपटू राष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आहे.

44 वर्षीय तिर्की यांनी 15 वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकीर्दीत बचावपटू म्हणून 412 आंतरराष्ट्रीय सामन्यात सहभाग नोंदवला आहे.

त्यांनी 1996 च्या अटलांटा इथं झालेल्या ऑलिंपिक खेळात, तसंच 2000 साली सिडनी आणि 2004 साली अथेन्स इथं झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

स्वच्छ वायू सर्वेक्षण- राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत(एनसीएपी) शहरांचे मानांकन.


 
गुजरातमध्ये एकता नगर येथे 23-24 सप्टेंबर दरम्यान पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या परिषदेचे उद्घाटन केले.

प्रदूषण नियंत्रण आणि प्रतिबंध यावर आयोजित एका समांतर सत्रामध्ये राज्यांना राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत(एनसीएपी) प्रकाशित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण- शहरांचे मानांकन’ याविषयी माहिती देण्यात आली.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंत्रालय स्वच्छ वायू सर्वेक्षण सुरू करणार आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचा(एनसीएपी) भाग म्हणून 2025-26 पर्यंत वायू प्रदूषणात 40 टक्क्यापर्यंत घट करण्यासाठी शहर कृती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी देशातील 131 शहरांना मानांकन दिले जाणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य विषयक निष्कर्ष (2018-19) जाहीर.....


नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य), डॉ. विनोद के. पॉल यांनी आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत, वर्ष 2018-19 साठीचे देशासाठीचे राष्ट्रीय आरोग्य लेखापरीक्षण (NHA) अंदाजांचे निष्कर्ष जारी केले.

2013-14 पासूनचा हा सलग सहावा अहवाल आहे.
या निष्कर्षांमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या अनेक संकेतांमध्ये, एक महत्वाचा संकेत म्हणजे, देशांत आरोग्य सुविधांवरील खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे, विशेष म्हणजे ही वाढ कायमस्वरूपी असेल, असे दिसते आहे.

वर्ष 2018-19 साठी राष्ट्रीय आरोग्य लेखा अंदाजांनुसार, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात,सरकारने, आरोग्यावरील खर्चात वाढ केल्याचे दिसते आहे. 2013-14 मध्ये जीडीपीच्या 1.15% असलेली हि तरतूद 2018-19 मध्ये 1.28% पर्यंत पोहोचली आहे.
याव्यतिरिक्त, आरोग्यावरील एकूण खर्चामध्ये सरकारच्या आरोग्यावरील खर्चाचा वाटा देखील वाढला आहे. 2018-19 मध्ये, सरकारी खर्चाचा वाटा 40.6% होता, जो 2013-14 मधील 28.6% च्या वाट्यापेक्षा लक्षणीयरित्या अधिक आहे.

सरकारचा 2018-19 वर्षातील आरोग्य खर्च 34.5% पर्यंत वाढला आहे. 2013-14 मध्ये हा खर्च 23.2% इतका होता, असेही यात म्हटले आहे.

केंद्र सरकारचा आरोग्यावरील दरडोई खर्च देखील 74%  नी वाढला आहे. 2013-14 मध्ये 1042 इतका असलेला हा खर्च 2018-19 मध्ये 1815 इतका झाला आहे.

तर नागरिकांचा स्वतःच्या खिशातून होणाऱ्या आरोग्य खर्च मात्र आठ टक्क्यांनी  कमी झाला आहे. 2013-14 मध्ये 2,366 इतका असलेला हा खर्च, सध्या दरडोई 2,155 इतका आहे.

सामाजिक सुरक्षा योजनांवर भर दिल्यामुळे, आरोग्यावरील एकूण खर्चात 6% वरुन 9.6% पर्यंत वाढ झाली आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत आरोग्य विम्याच्या खर्चात देखील 2013-14 नंतर 167% ची लक्षणीय वाढ झाली आहे.

भारतातील थंड हवेची ठिकाणे

महाराष्ट्र
१.महाबळेश्वर
२. पाचगणी
३. माथेरान

हिमाचल प्रदेश
१.कुलु
२.मनाली
३.शिमला
४. डलहौसी

उत्तराखंड
१.मसुरी
२.नैनिताल

तामिळनाडू
१. उदगमंडलम
२.कोडाईकॅनॉल

राजस्थान
१. माउंट अबू

मध्य प्रदेश
१. पंचमढी

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :   भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...