२८ मे २०२२

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते


🔹1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 


🔸2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 


🔹3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 


🔸4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 


🔹5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 


🔸6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 


🔹7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 


🔸8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 


🔹9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 


🔸10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 


🔹11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 


🔸12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 


🔹13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 


🔸14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 


🔹15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 


🔸16) बोरघाट - पुणे - कुलाबा


🔹17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 


🔸18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 


🔹19) वरंधा घाट - पुणे - महाड 


🔸20) रूपत्या घाट - पुणे - महाड 


🔹21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 


🔸22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 


🔹23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई


 🔸24) थळ घाट - नाशिक - ठाणे 


🔹25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  


🔸26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

लोकशाही निर्देशांक 2021


👉 या निर्देशांकात भारत 46 व्या क्रमांकावर आहे


✔️ विशेष निरीक्षण :- 


या वर्षीच्या अहवालात असे दिसून आले आहे की लोकशाहीने 2010 नंतरची सर्वात मोठी वार्षिक घसरण अनुभवली आहे



💥 निर्देशांक जाहीर करणारी संस्था :-  


इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट  ( Economic Intelligence Unit )



🟢 2006  पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो.


🟢 भारताचा क्रमांक :-  46 🟢


( 5 अंकांनी सुधारणा )


मागील वर्षी 51 वा क्रमांक होता



✔️ इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट  लोकशाही निर्देशांक  मोजमाप पद्धत  :-



-  लोकशाही निर्देशांक 60 निर्देशकांवर आधारित आहे


✔️  पाच श्रेणींमध्ये विभाजन केले आहेत :-


1) निवडणूक प्रक्रिया आणि बहुलवाद 


2) नागरी स्वातंत्र्य 


3)सरकारचे कार्य 


4)राजकीय सहभाग 


5) राजकीय संस्कृती .



 🟢 सहभागी  देशांना शून्य ते दहा अंकामध्ये  रेटिंग दिले जाते 


🟢 एकूण अनुक्रमणिका पाच एकूण श्रेणी गुणांची सरासरी असते.



प्रत्येक देशाला त्यांच्या सरासरी गुणांच्या आधारे चार प्रकारच्या शासनांमध्ये वर्गीकृत केले जाते :-


1) पूर्ण लोकशाही


2) सदोष लोकशाही


3) संकरित शासन 


4) हुकूमशाही शासन

मानवी शरीर:


1: हाडांची संख्या: 206

2: स्नायूंची संख्या: 639

3: मूत्रपिंडांची संख्या: 2

4: दुधाच्या दातांची संख्या: 20

5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)

6: हार्ट चेंबर क्रमांक: 4

7: मोठी धमनी: महाधमनी

8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी

9: रक्त पीएच: 7.4

10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33


11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7

12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6

13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14

14: कवटीतील हाडांची संख्या: 22

15: छातीत हाडांची संख्या: 25

16: हात मध्ये हाडांची संख्या: 6

17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72

18: हृदयातील पंपांची संख्या: 2

19: सर्वात मोठा अवयव: त्वचा

20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत


21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय

22: सर्वात लहान सेल: शुक्राणू

23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान

24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड

25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी

26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी

27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो

28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा

29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)

30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर


31: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस

32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस

33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)

34: मानवी पायात हाडांची संख्या: 33

35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8

36: हातात हाडांची संख्या: 27

37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड

38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा

40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर

:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)


41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)

42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306

43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5

44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ

45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी

46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट

47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट

48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया

49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा

50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त


51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल

52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....



◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓

   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला


◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓

   - बॉम्बे हेराॅल्ड.


◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓

   - मुस्लिम लीग


◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई 


◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓

   - लॉर्ड कॅनिंग 


◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.

   - बंगाल प्रांतात


◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓

   - लॉर्ड स्टैनले


◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓

   - 34 वी एन. आय. रजिमेंट 


◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓

   - कलकत्ता विद्यालय

गोवा



- 19 डिसेंबर 1961 पोर्तुगीज वसाहतीकडून स्वतंत्र

- 30 मे 1987 पर्यंत दमण व दीव या केंद्र शासित प्रदेशाचा भाग होते.

- भारतीय संघराज्याचे 25 वे राज्य.

- राजधानी: पणजी

- सर्वात मोठे शहर: वास्को दी गामा

- अधिकृत भाषा: कोंकणी

- क्षेत्रफळ: 3702 चौकिमी (भारत 29 व्या क्रमांकावर)

- दोन महसुली जिल्हे: उत्तर गोवा & दक्षिण गोवा

--------------------------------------

● लोकसंख्या (2011 नुसार)


- एकूण लोकसंख्या: 1458545 (भारतात 26 व्या क्रमांकावर)

[64.68% हिंदू, 29.86% ख्रिश्चन, 5.25% मुस्लिम]

- लिंग गुणोत्तर: 973

- लोकसंख्या घनता: 364

- साक्षरता: 88.70% (भारतात तिसर्‍या क्रमांकावर)

------------------------------------

● राजकीय

- एक सभागृहीय राज्य विधिमंडळ: विधानसभा 40 जागा

- राज्यसभा: 1 जागा

- लोकसभा: 2 जागा

- राजकीय पक्ष: भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फाॅर्वड

-----------------------------------

● मुख्य व्यवसाय

- शेती: भात, नारळ

- खाणकाम

- पर्यटन

अभिमानास्पद! महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने जिंकलं सुवर्णपदक.


💥भारतासाठी अभिमानाची बातमी आहे. भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. यासह जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पाचवी भारतीय महिला आहे. तिने इस्तांबुलमध्ये झालेल्या सामन्यात थायलंडची जुतामास जितपाँगला ५-० ने पराभूत केलं.


💥निखत झरीनने ५२ किलो गटात महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचवली आहे. आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉिक्सगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत. यात आता निखत झरीनचा समावेश झाला आहे.


💥दरम्यान, उपांत्य सामन्यात निखतने आत्मविश्वासाने खेळ करीत ब्राझिलच्या कॅरोलिन डी अल्मेडाला ५-० असे सहज नामोहरम केले होते. कनिष्ठ विश्वविजेत्या निखतने संयमी खेळाचे प्रदर्शन करीत कॅरोलिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. पण, मनीषाने टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या इटलीच्या इरमा टेस्टाकडून ०-५ अशी हार पत्करली, तर परवीनने युरोपियन कांस्यपदक विजेत्या आर्यलडच्या एमी ब्रॉडहस्र्टकडून १-४ असा पराभव पत्करला होता.

२७ मे २०२२

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


 गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ?
गया.( बोधगया )

गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेला झाली ?
वैशाख पौर्णिमा.

 गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन कोठे झाले ?
सारनाथ.

 गौतम बुद्धांनी प्रथम किती लोकांना दीक्षा दिली ?
पाच.

 बौद्ध धम्मातील त्रिरत्ने कोणती ?
बुद्ध,धम्म,संघ.

 त्रिपिटक या बौद्ध धम्मग्रंथाचे किती भाग पाडण्यात आले आहे ?
तीन.

जगामध्ये दु:ख आहे हे कोणी सांगितले ?
गौतम बुद्ध.

 गौतम बुद्धांचे पत्नीचे नाव काय होते ?
यशोधरा.

 गौतम बुद्धांचे मुलाचे नाव काय होते ?
राहूल.

 'लाईट ऑफ एशिया' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
तथागत गौतम बुद्ध.

 गौतम बुद्धांनी प्रथम किती लोकांना दीक्षा दिली ?
पाच.

 बौद्ध धम्मातील त्रिरत्ने कोणती ?
बुद्ध,धम्म,संघ.

 त्रिपिटक या बौद्ध धम्मग्रंथाचे किती भाग पाडण्यात आले आहे ?
तीन.

जगामध्ये दु:ख आहे हे कोणी सांगितले ?
गौतम बुद्ध.

 गौतम बुद्धांचे पत्नीचे नाव काय होते ?
यशोधरा.

 गौतम बुद्धांचे मुलाचे नाव काय होते ?
राहूल.

 'लाईट ऑफ एशिया' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
तथागत गौतम बुद्ध..

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा.

भारतातील विविध गोष्टींचे / क्षेत्रांचे जनक

भारतातील विविध गोष्टींचे / क्षेत्रांचे जनक

⭐ नौदल : छत्रपती शिवाजी महाराज
👤 संविधान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
👤 चित्रपट : दादासाहेब फाळके
👤 मिसाईल : डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
👤 अवकाश कार्यक्रम : विक्रम साराभाई
👤 अणुऊर्जा कार्यक्रम : होमी भाभा
👤 आधुनिक भारत : राजा राममोहन रॉय
👤 विमानचालन : जे आर डी टाटा
👤 हवाई दल : सुब्रतो मुखर्जी
👤 हरीत क्रांती : एम एस स्वामीनाथन
👤 दुग्ध क्रांती : वर्गीस कुरियन
👤 गुलाबी क्रांती : दुर्गेश पटेल
👤 लाल क्रांती : विशाल तिवारी
👤 पिवळी क्रांती : सॅम पित्रोदा
👤 सुपर कॉम्प्युटर : विजय भटकर
👤 फलोत्पादन : एम एच मारीगौडा
👤 कायदा शिक्षण : माधव मेनन
👤 आयटी उद्योग : एफ सी कोहली

━━━━━━━━━━━━━━━━

इंग्रज अधिकारी व कामगिरी

⭕️ इंग्रज अधिकारी व कामगिरी ⭕️
______

▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट*

◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त

◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा

◾️ चार्ल्स मेटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता

◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक..

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिर


महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिर

◾️लेण्या  ठिकाण/जिल्हा

◾️अजिंठा, वेरुळ - औरंगाबाद

◾️एलिफंटा, घारापुरी - रायगड

◾️कार्ला, भाजे, मळवली - पुणे

◾️पांडवलेणी - नाशिक

◾️बेडसा, कामशेत - पुणे

◾️पितळखोरा - औरंगाबाद

◾️खारोसा, धाराशीव (जैर) – उस्मानाबाद.

कोकणातील प्रमुख नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे.

.       🟠कोकणातील प्रमुख नद्या🟠
              (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

◾️ पालघर जिल्हा -
         दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

◾️ ठाणे जिल्हा -
         भातसई , काळू , उल्हास

◾️ रायगड जिल्हा -
         पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

◾️ रत्नागिरी जिल्हा -
           सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

◾️ सिंधुदुर्ग जिल्हा -
          काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल.

२४ मे २०२२

नक्की वाचा :- भारतात घडलेल्या पहिल्या गोष्टी



🎯 चद्रावर मानव पाठवणारा पहिला देश : अमेरिका

🎯पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात प्रेक्षेपित करणारा देश : रशिया

🎯  पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणारा देश : द. आफ्रिका

🎯पहिली चेहरारोपण शस्त्रक्रिया करणारा देश : फ्रान्स

🎯भारतातील पहिली विज्ञान नगरी : कोलकाता

🎯  भारतातील पहिला महासंघ : परम 10,000

🎯भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र : नवी दिल्ली (1959)

🎯  भारतातील पहिले स्वदेशी क्षेपणास्त्र : पृथ्वी (1988)

🎯 भारतातील पहिले कुटुंबनियोजन केंद्र : मुंबई (1925)

🎯भारताचा पाहीला उपग्रह : आर्यभट्ट

🎯  भारतातील पहिला दूरसंवेदन उपग्रह : आय.आर.एस-1ए

🎯  भारतातील पहिली अणूभट्टी : अप्सरा (1954)

🎯 भारतातील पहिली जनगणना : ए.स. 1872

🎯  भारतातील स्वदेशी निर्मिती पहिली आण्विक पाणबुडी : आय.एन.एस.अरिहंत

🎯भारतातील पहिली अणुचाचणी : पोखरण (1974)

महाराष्ट्रातील समाजसुधारकमहादेव गोविंद रानडे

महादेव गोविंद रानडे :

जन्म – 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).

मृत्यू – 16 जानेवारी 1901.

रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .

तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .

रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.

1886 – भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय.

रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते .

त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात .

समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत.

रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .

1887 – सामाजिक परिषद.

1890 – औद्योगिक परिषद.

त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.

संस्थात्मिक योगदान :

1865 – विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.

1867 – मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.

1870 – सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.

उद्दीष्ट – थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार, संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे केले.

वकृत्वोत्तेजक सभा – पुणे.

नगर वचन मंदिर – पुणे.

1875 वसंत व्याख्यान – माला (पुणे).

1882 – हुजूरपागा शाळा (पुणे).

31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.

1896 – हिंदू विडोज होम.

इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .
मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.
पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.

1889 – Industrial As Sociation Of Western India स्थापन.

रानडे यांनी केलेले लेखन :

इंदु प्रकाश (मासिक).

एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.

1874 – जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.

1888 – ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.
मराठी सत्तेचा उदय.

मराठी पत्रकारितेचा पाया घातला.

निबंध – प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.

‘तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य‘ हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.

वैशिष्ट्ये :-

ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.
भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.

1873 – 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.
पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.
संमतीवय विधेयकास पाठिंबा.
इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.
दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.
‘महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.’ टिळकांचे मत.

परीक्षेसाठी महत्वाचे

◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक

◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच

◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक

◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच

◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच

◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती

◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी

◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO

◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष

◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी

◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष

◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी

◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त

◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर

◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त

भारत का मध्यकालीन इतिहास - सामान्य ज्ञान प्रश्न

भारत का मध्यकालीन इतिहास - सामान्य ज्ञान प्रश्न

1.बहमनी राज्य वास्तु कला के क्षेत्र में जाना जाता है। इसके बारे में निम्नलिखित में कौन सा कथन गलत है?
[A] हैदराबाद शहर की स्थापना बीजापुर के इब्राहिम आदिल शाही ने की।
[B] बीजपुर को गोलगुंबज सबसे बड़ा गुम्बज है।
[C] हैदराबाद की चार मीनार का निर्माण गोलकुण्डा के मुहम्मद कुली कुतुब शाह ने कराया।
[D] महमूद गवन ने बीदर में एक कॉलेज बनवाया।

Correct Answer: A [हैदराबाद शहर की स्थापना बीजापुर के इब्राहिम आदिल शाही ने की।]
Notes:
हैदराबाद शहर की स्थापना गोलकुण्डा के राजा मुहम्मद कुली कुतुब शाह ने 1591 में मुसि नदी के उत्तर किनारे पर की।

2.निम्न में किस प्रदेश के हिस्से कृष्ण देव राय के राज्य में नहीं थे?
[A] केरल
[B] तमिलनाडु
[C] उड़ीसा
[D] महाराष्ट्र

Correct Answer: D [महाराष्ट्र]
Notes:
कृष्णदेव राय दक्षिण भारत के राज्य विजयनगर के सबसे महान राजा थे। उन्होंने 1509 से 1529 तक राज्य किया।

3.कौन से उर्दू कवि असद नाम से कविताएं लिखते थे?
[A] ताकि मिर
[B] मिर्ज़ा ग़ालिब
[C] दुष्यंत
[D] अमीर खुसरो

Correct Answer: B [मिर्ज़ा ग़ालिब]
Notes:
मिर्ज़ा ग़ालिब ग़ालिब उपनाम से कविता लिखते थे। लेकिन वो उससे पहले असद नाम से कविता लिखते थे।

4.महाराजा रणजीत सिंह की राजधानी थी:-
[A] लाहौर
[B] पटियाला
[C] अमृतसर
[D] जम्मू

Correct Answer: A [लाहौर]
Notes:
महाराजा रणजीत सिंह 1799 से 1837 तक पंजाब के राजा थे। वे अहलूवालिया मिस्ल से थे। उन्होंने एक विशाल राज्य की स्थापना की। उनकी राजधानी लाहौर थी।

5.मुस्लिम राजाओं के आक्रमण से पहले कौन सी प्रथा प्रचलित थी?
[A] पर्दा प्रथा
[B] बाल विवाह
[C] सती प्रथा
[D] दास प्रथा

Correct Answer: D [दास प्रथा]
Notes:
पर्दा प्रथा, बाल विवाह और सती प्रथा मुस्लिम आक्रमणों की देन थी। मुस्लिम राजाओं के अपहरण से महिलाओं, लड़कियों को बचाने के लिए हिंदुओं ने पर्दा प्रथा, बाल विवाह, सती प्रथा, जौहर प्रथा प्रारम्भ की थी। मुस्लिम आक्रमणों से पहले यह कोई प्रथा भारत में नहीं थी।

हालांकि दास प्रथा पहले से प्रचलित थी।
6.कबूलियत और पट्टा किसने शुरू किया?
[A] जहाँगीर
[B] अकबर
[C] हुमायूँ
[D] शेरशाह

Correct Answer: D [शेरशाह]
Notes:
शेरशाह सूरी वंश का एक राजा था जिसने 1540 से 1545 तक राज्य किया। कबूलियत और पट्टा उसने ही प्रारंभ की थी।

7.खुर्रम किसको कहा जाता था?
[A] अकबर
[B] जहाँगीर
[C] शाहजहाँ
[D] औरंगजेब

Correct Answer: C [शाहजहाँ]
Notes:
शाहजहाँ के बचपन का नाम खुर्रम था लेकिन वो शाहजहाँ के नाम से राजा बना।

8.चंगेज खान ने किसके समय भारत पर आक्रमण किया?
[A] कुतुबुद्दीन ऐबक
[B] इल्तुतमिश
[C] अलाउद्दीन खिलजी
[D] इनमें से कोई नहीं

Correct Answer: B [इल्तुतमिश]
Notes:
चंगेज खान मंगोल राजा था जिसने इल्तुतमिश के समय भारत पर आक्रमण किया।

9.गोगुंडा का युध्द किस प्रदेश में हुआ?
[A] गुजरात
[B] राजस्थान
[C] मध्य प्रदेश
[D] उत्तर प्रदेश

Correct Answer: B [राजस्थान]
Notes:
गोगुंडा या हल्दीघाटी का युध्द अकबर के सेनापति मानसिंह और महाराणा प्रताप के बीच 21 जून 1576 को हुआ।

10.राजस्थान में शाकम्भरी किस राजवंश से सम्बंधित है?
[A] गड़हवाल
[B] चौहान
[C] सोलंकी
[D] परमार

Correct Answer: B [चौहान]

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे


१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी.

आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक


                                                                                 
         जन्म : 7 सप्टेंबर 1791
         (भिवडी, पुरंदर, पुणे)

        फाशी : 3 फेब्रुवारी 1832
                   (पुणे)
━━━━━━━━━━━━━━━
            ◾️सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साता-याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशाची जास्त दहशत होती.

           ◾️सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबुर्ड्याचा लष्करी खजिना 1924 - 25 साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या  हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण  उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.
          ◾️सत्तू नाईक नंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईकवडे आले. भूजाजी, कृष्णाजी, येसाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू सरदार होते. उमाजी स्वत: ला राजे समजून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी 1791 साली उमाजीचा जन्म झाला होता.

           ◾️ब्रिटिश काळात रामोशांची संख्या 18000 होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसात दहशत पसरवली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी 1826 साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणा-यास 100 रुपये ईनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
         
◾️सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून ईनामाची रक्कम 1200 रूपये कली आणि जाहीरनाम्यात असे म्हटले की, "सरकारला मदत केली नाही तर बंडवाल्यात सामिल झालात, असे समजण्यात येईल." यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणा-या  शिवनाक यास रामोशांनी ठार केले.

            ◾️त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच . डी . रॉबर्टसन  याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गददारी न केल्यामुळे त्याच्या हाती काहीच आले नाही.

             ◾️रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्याठी बंडखोरांची माहिती देणा-यासाठी खास बक्षिस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्हयातील लोकांनी ब्रिटिशांकडे महसूल न भरता उमाजीकडे दयावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर  संस्थानातील 13 गावानी उमाजीकडे महसुल भरला.

             ◾️शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्हयात शांतता व सुव्यवरथा राखण्याचे काम उमाजींकडे देण्यात आले. पण पुढे नंतर 13 गावांच्या महसुलावरुन उमाजी व ब्रिटिश यांच्यात वाद सुरू झाला.

           ◾️1831 साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिध्द करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली. उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणा-यास 5000 रूपये व 2 बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकटया उमाजीस पकडून देणा-यास 2500 रूपये व 1 बिघा जमीन जाहीर करण्यात आली. बक्षीसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी, नाना रामोशी यानी गददारी केली. उमाजीचा जुना शत्रु बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. 15 डिसेंबर 1831 रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला  अटक केली. पुण्याच्या तहसिलदार कचेरीत 3 फेब्रुवारी 1832 रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.  त्याठिकाणी आता पुतळा स्वातंत्र्याचा संदेश देत ठामपणे उभा आहे.

          ◾️उमाजीचा पहिला चरित्रकार व उमाजीस पकडण्याच्या मोहीमेचा प्रमुख मैकिन्तोश म्हणतो, “उमाजीच्या नजरेसमोर शिवाजी राजांचे उदाहरण होते. स्वराज्य संस्थापक शिवाजी हे त्याचे श्रध्देय व स्फूर्तीचे स्थान होते. शिवाजीच त्याचा आदर्श होता. मोठमोठया लोकांनी मला स्वतः  सांगितले की, उमाजी हा काही असला तसला भटक्या दरोडेखोर नाही. त्याच्या नजरेसमोर नेहमी शिवाजीचे उदाहरण होते. शिवाजी महाराजांप्रमाणे आपण मोठे राज्य कमवावे  अशी त्याची इच्छा होती."

महाराष्ट्रातील विविध संख्या

🌷 महाराष्ट्रातील विविध  संख्या🌷

✍ महाराष्ट्रात जिल्हे : ३६

✍ महाराष्ट्रात तालुके : ३५८

✍ महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग : ०६

✍ महाराष्ट्रात महानगरपालिका : २७

✍ महाराष्ट्रात विधानसभा जागा : २८८

✍ महाराष्ट्रात विधानपरिषद जागा : ७८

✍ महाराष्ट्रात लोकसभा जागा : ४८

✍ महाराष्ट्रात राज्यसभा जागा : १९

✍ महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे : ०२

✍ महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे : ०४

✍ महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे : ०५

✍ महाराष्ट्रात रामसर स्थळे : ०२

✍ महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने : ०६

✍ महाराष्ट्रात रेल्वे विभाग : ०२

✍ महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र : ०६

✍ महाराष्ट्रात वाघ : एकुण ३१२.

२० मे २०२२

स्पर्धा परीक्षा उपयोगी पुस्तके


1) मराठी व्याकरण- १) मो. रा. वाळिंबे 

                                २) बाळासाहेब शिंदे


2) इंग्रजी व्याकरण-  १) बाळासाहेब शिंदे

                               २) एम जे शेख


3) अंकगणित -      १) नितीन महाले

                             २)पंढरीनाथ राणे

                            ३) सचिन ढवळे 

                             

5) इतिहास -            १) ग्रोव्हर, बेल्हेकर

                              २) रंजन कोळंबे


6) भूगोल -               १)ए. बी. सवदी

                               २) खतीब


7) अर्थशास्त्र -       १) रंजन कोळंबे

                             २)किरण देसले 


8) राज्यव्यवस्था  -    १) रंजन कोळंबे

                              २) किशोर लवटे


9) सामान्य विज्ञान-   १) सचिन भस्के

                              २) रंजन कोळंबे


10) PSI /STI /ASST- पूर्व परीक्षा गाईड  

                              १) एकनाथ पाटील

                              २) प्रकाश गायकवाड



वरील पुस्तकांपैकी प्रत्येक विषयाचे किमान एक तरी पुस्तक आपल्या कडे असावे.


    तर लागा तयारीला... All The Best


नक्की वाचवा असा लेख ..



👉 तम्ही Mpsc चा अभ्यास खूप दिवसापासून करत असाल आणि तरीही तुमच्या कडे Syllabus ची Print नसेल तर समजून घ्या की तुम्ही Timepass करत आहात..


(ज्यांच्या कडे नसेल त्यांनी उद्या 10 परेंत राज्य सेवा Mainच्या syllabus ची प्रिंट काढून घ्या)


👉 राज्य सेवा देणार असाल तर लेख लिहायला सुरू करा ...स्वतःचे मत मांडायला शिका..Sunday la एक तरी Essay लिहीत चला..


मुलींसाठी महत्वाचे ...

अग तो ओळखीचा नाही त्याला का बोलते..

बाई सगळी मुलं सारखीच असतात ..त्यांच्या पासून दूर असलेलेच बरं...

तिथ चहा नको घ्यायला...तिथे खूप मुलं असतात...ETC ETC😜😜


तत्सम वाक्य बोलणे सोडून द्या..

जेव्हा तुम्ही अधिकारी बनाल तेव्हा दिवसात 1000 लोकांना तोंड द्यावे लागते..

त्या मुळे तुमच्यातील अधिकाऱ्याला आत्ता पासून Developing mode वर ठेवा..


👉 मला खूप वेळा एकच प्रश्न विचारला जातो की 

अभ्यासाची Basic सुरवात कशी करावी..?

Ans is here in 3 Steps👇


1 Syllabus ( पाठ होत नाही तो परेंत वाचा तरच पुढे जे वाचलं त्याला अर्थ राहील)


2 क्रमिक पुस्तक + NCERT (GEO HIS Sci and Eco)

( क्रमिक पुस्तक वाचा विकत घेऊन तेव्हाच जास्त समजेल त्या वर बाजारात आलेले पुस्तक घेऊ नका )


3 Reference Book + Current जे की खूप प्रमाणात उपलब्द आहेत...त्याची लिस्ट Telegram वर सर्व चॅनेल वर आहे.


(आपण फक्त Book list गोळा करत बसलो आहोत पुस्तक मात्र घेत नाही )


👉हल्ली रोज एक नवीन MPSC चा लेखक जन्माला येत आहे नवीन पुस्तक घेऊन..

त्या मुळे जे उत्तम लेखक आहेत त्यांचे पुस्तक वाचा उगाच पैसे आणि वेळ वाया घालवू नका.


👉 Below 25 age चे आहेत त्यांच्या साठी महत्वाचे...


हो अर्थातच मी GF/BF बद्दल बोलत आहे.😂😂


Gf BF नावाचा प्राणी तुमच्या LIFE मध्ये असेल तर तुमची already वाट लागली आहे असे इतर म्हणतात...😂😂


मला तुम्हला जरा वेगळ सांगायचे आहे की 


भांडण, Doubt आणि Restrictions मध्ये तुमचे नाते असेल तर समजून घ्या की MPSC मध्ये तुमच काय खर नाही..

कोणाचा call होता ..? दे मग Screenshot हे वाक्य तुमच्या Relationship मध्ये असेल तर तुमचं अवघड आहे 😂😂😂


(Hello I m not Interrupt in ur personal life ..It's just affecting to MPSC study so just telling u.🙃)


👉 जया दिवशी तुमचा छान स्टडी होतो ना तेव्हा तुम्ही By Soul happy असतात...


शब्द खूप टोचणारे आहेत पण मला स्पस्ट बोलायची सवय आहे...


घराबाहेर राहून अभ्यास करता ना तुम्ही..

मग महिन्याला 6000 खर्च तर होतच असतील 


म्हणजे तुमच्या घरचे तुम्हला 200 रुपय रोजाणे बाहेर ठेवत आहेत...


बस त्या एक दिवसाची 200 रुपय किंमत आहे ना तिच्या इतका अभ्यास करा...🙏🙏


ज्या दिवशी तुमचा 6 तास अभ्यास होणार नाही त्या दिवशी तुम्हला जेवण करण्याचा अजिबात अधिकार नाही ...नाही म्हणजे नाही🙏🙏🙏



फुकटचे सल्ले नाहीत हो ...खूप हृदयापासून लिहले आहे तुमच्यासाठी


वाचून विचार करा 

Online Test Series

जागतिक भूगोल विशेष


1. जगातील सर्वात मोठा महासागर - पॅसिफिक महासागर


2. महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता - मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर)


3. सर्वात मोठे आखात - मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी.


4. सर्वात मोठा उपसागर - हडसन बे (कॅनडा) - 12,32,320 चौ.कि.मी.


5. सर्वात मोठा व्दिपकल्प - अरेबिया


6. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (प.बंगाल)


7. सर्वात मोठे भूखंड - युरेशिया (युरोप+आशिया)


8. सर्वात लहान भूखंड - ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी.


9. सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी.


10. सर्वात मोठे व्दिपसमूह - इंडोनेशिया (13,000) बेटे


11. सर्वात उंच शिखर - माऊंट एव्हरेस्ट (8848 मी)


12. सर्वात मोठी पर्वतरांग - हिमालय पर्वताची


13. सर्वात मोठे व उंचीवरील पठार - तिबेटचे पठार.


14. सर्वात मोठी नदी व खोरे - अॅमेझोन (द. अमेरिका)


15. सर्वात लांब नदी - नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी.


16. सर्वात लांब हिमनदी - लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी.


17. सर्वात उंच धबधबा - एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6 मी.


18. सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर - कॅस्पियन समुद्र (रशिया व इराण यांच्या दरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी.


19. सर्वात गोड्या खार्‍या पाण्याचे सरोवर - सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी)


20. सर्वाधिक उंचीवरील सरोवर - टिटीकाका (द.अमेरिका - पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान)


21. सर्वात मोठे वाळवंट - सहारा (आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी.


22. सर्वात कमी तापमानाचे ठिकाण - वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें.


23. सर्वात उष्ण ठिकाण - डेथ व्हॅली (अमेरिका)


24. सर्वात मोठा देश (आकारमान) - रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी.


25. सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) - टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी.


26. सर्वात छोटा देश (आकारमान) - व्हेटिकन सिटी (44 हेक्टर)


27. सर्वाधिक शेजारी असणारा देश - चीन 13 शेजारी


28. सर्वाधिक लोकसंख्येचा देश - चीन 126 कोटी (2011)


29. सर्वात कमी लोकसंख्येचा देश - व्हेटकिन सिटी - 900 फक्त (2011)


30. सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश - मकाव (चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला 24,411 व्यक्ती.


31. सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश - अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती)


32. सर्वाधिक वस्तीचे शहर - टोकियो (जपान) - 2 कोटी 70 लाख (2000)


33. सर्वाधिक उंचीवरील राजधानी - ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी.


34. सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) - न्यूयॉर्क


35. सर्वात गजबजलेले बंदर - रोटरडॅम (हॉलंड)


36. सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 2,95,000 कि.मी.


37. सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी.


38. सर्वात लांब मानवनिर्मित कालवा - सुवेझ कालवा (इजिप्त) 162 कि.मी.


39. सर्वात लांब बोगदा - न्यूयॉर्क डेलावेअर जलवाहिनी 170 कि.मी.


40. सर्वात लांब बोगदा (रेल्वे) - सेइकन रेल टनेल जपान. समुद्राखालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी.


41. सर्वात लांब बोगदा (रस्ता) - सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16 किमी.)


42. सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन - बोलीव्हीयामधील कंडोर स्टेशन (4800 मी)


43. सर्वात मोठे रेल्वे स्टेशन - ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्यूयॉर्क)


44. सर्वाधिक उंचीवरील विमानतळ - ल्हासा विमानतळ, तिबेट उंची 4363 मी.


45. सर्वात मोठे विमानतळ - राजा खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रियाध (अरबस्तान) विस्तार 222 चौ.कि.मी.


46. सर्वात मोठे स्टेडीयम - झेकोस्लावियातील प्राग येथील स्ट्राव्ह स्टेडीयम सुमारे


47. सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ - नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी


48. सर्वात मोठा पुतळा - हैदराबाद येथील हुसेनसागर तलावातील भगवान बुद्धाचा पुतळा, वजन सुमारे 350 टन, इंची 17.2 मीटर


49. सर्वात मोठा नियोक्ता - भारतीय रेल्वे - सुमारे 16.5 लाख कर्मचारी


50. सर्वात मोठी बँक - वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन


51. सर्वाधिक शाखा असणारी बँक - भारतीय स्टेट बँक


52. सर्वात मोठे संग्रहालय - अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क


53. सर्वात मोठे ग्रंथालय - लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन


54. सर्वात जुनी भाषा - चीन 6000 - 7000 वर्ष जुनी.


55. सर्वाधिक लोकांकडून बोलली जाणारी भाषा - मॅडारिन (उत्तर चीनमध्ये बोलली जाणारी चीनी बोली.)


56. सर्वात मोठी संसद - नॅशनल पीपल्स काँग्रेस (चीन)


57. सर्वात मोठे लष्कर - रशियन लष्कर 50 लाख (1985)


58. सर्वात लांब भिंत - चीनची भिंत 3500 कि.मी.


59. सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म (फलाट) - खरगपूर (प.बंगाल) 820 मी.


60. सर्वात मोठा ग्रह - गुरु


दारिद्र्य

 दारिद्र्य पाहता येते मात्र  दारिद्र्याची व्याख्या करता येत नाही.  गरिबीची व्याख्या ही तत्कालीन परिस्थिती व देशाचा विकास यावर आधारित प्रत्येक देशानुसार किंवा अर्थ व्यवस्थेनुसार वेगवेगळी असू शकते. म्हणून भारतातील दारिद्र्य  आणि दारिद्र्य विषयक समित्या यामध्ये विविधता आढळून येते. या सर्व समितीचा अभ्यास आपण पाहणार आहोत.


दारिद्र्य संकल्पना सविस्तर पाहणार आहोत. मानवी जीवनाच्या गरजा न भागवता येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य असे म्हणता येईल. 


मानवी गरजा या सतत वाढणाऱ्या व अमर्यादित असतात. मात्र काही गरजा या मानवी जीवनासाठी आवश्यक ठरतात. त्या मूलभूत गरजा शिवाय मानवी जीवन अशक्य ठरते. अशा मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक असते.  अशा मानवी मूलभूत व अत्यावश्यक गरजा भागवणे देखील या लोक समूहाला अशक्य ठरते. अशा लोकांना आपण दारिद्र्य या संकल्पने अंतर्गत घेऊ शकतो.दारिद्र्याची संकल्पना सापेक्ष व निरपेक्ष अशा पद्धतीने मांडता येते –

1)  सापेक्ष दारिद्र्य –   देशातील उच्चतम पाच किंवा दहा टक्के लोकसंख्याची संपत्ती, उत्पन्न आणि उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम पाच किंवा दहा टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्र्य असे म्हणतात.


2) निरपेक्ष दारिद्र्य –  दारिद्र्याच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार करून त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. या स्तरापेक्षा कमी उपभोग करणाऱ्या लोकसंख्येला दारिद्र्या खालील जनता असे समजले जाते. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्र्यरेषा असे म्हणतात.


दारिद्र्य रेषा –    

दारिद्र्याचे प्रमाण मोजण्यासाठी दारिद्र्यरेषा(Poverty Line) या संकल्पनेचा वापर केला जातो. दारिद्र्य रेषा उपभोग खर्चाच्या आधारावरती ठरवली जाते. दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी एका व्यक्ती मागे एका महिन्याच्या उपभोग खर्चाचा एक न्यूनस्तर निश्चित केला जातो. त्याला मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च (Monthly Per Capita Consumption Expenditure) म्हणून संबोधले जाते.

                या खर्चापेक्षा कमी उपभोग खर्च करणाऱ्या व्यक्तीला गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असे म्हटले जाते. तर त्या पेक्षा अधिक खर्च करणाऱ्या व्यक्तीला किंवा कुटुंबांना दारिद्र्यरेषेवरील म्हणून संबोधले जाते.               


मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च ठरवण्यासाठी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) च्या घरगुती उपभोग सर्वेक्षण आकडेवारी चा वापर केला जातो. एन. एस. एस. ओ. मात्र अशी आकडेवारी काढण्यासाठी रिकॉल पिरीयड चा वापर करते. 1. यूआरपी  2. एमआरपी आणि

3. एम एम आर पी.


युनिफॉर्म रिकॉल पिरीयड (Uniform Recall Period: URP) – सर्व उपभोग्य वस्तूंचा काहीच दिवसांच्या कालावधीतील रिकॉल रेफरन्स या ठिकाणी घेतला जातो.


मिक्स्ड रिकॉल पिरीयड (Mixed Recall Period: MRP) – पाच प्रकारच्या अधून-मधून खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूंसाठी एका वर्षाच्या कालावधीतील रिकॉल लक्षात घेतला जातो.


मॉडिफाइड मिक्स्ड रिकॉल पिरीयड (Modified Mixed Recall Period: MMRP) – यामध्ये सात दिवसाच्या कालावधीत लागणाऱ्या वस्तू , 30 दिवसांच्या कालावधीत लागणाऱ्या वस्तू आणि एका वर्षाच्या कालावधीत लागणाऱ्या वस्तू अशा सर्व वस्तूंचा विचार या प्रकारात केला जातो.


दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी पुढील प्रक्रिया आवश्यक ठरते


1) अत्यावश्यक वस्तू सेवांचा एक गट  निश्चित करणे.

2) अशा वस्तू व सेवांच्या उपभोगासाठी एक महिन्यासाठी आवश्यक असलेला एमपीसीइ(Monthly Per Capita Consumption Expenditure) निश्चित करणे. 

3) MPCE म्हणजे दारीद्र्य रेषा होय. अशा तीन दारिद्र्य रेषा केल्या जातात. अखिल भारतीय दारिद्र्य रेषा, राष्ट्रीय ग्रामीण दारिद्र्य  रेषा आणि राष्ट्रीय शहरी दारिद्र्य  रेषा यावरून दारिद्र्याचे प्रमाण ठरवले जाते.

4) राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासून राज्यासाठी ग्रामीण व शहरी असा विभक्त दारिद्र्य रेषा प्रमाण ठरवणे.

दारिद्र्य समित्या

भारतातील दारिद्र्याच्या संदर्भात विविध समित्यांनी आपले विविध पद्धतींनी आणि आपल्या विविध प्रकारे त्यांनी दारिद्र्याचे मोजमाप केले आहे.  याचा आढावा आपल्याला पुढील प्रकारे घेता येईल.


1)   पी. डी. ओझा समिती – 

                    या समितीने 2250 कॅलरी प्रतिदिन प्रतिव्यक्ती हा निकष वापरून दारिद्र्याचे प्रमाण मोजले. 1960 – 61 मध्ये ग्रामीण भागात दहा ते अकरा रुपये व शहरी भागात 15 ते 18 रुपये मासिक दरडोई खर्चाची पातळी ठरवून दारिद्र्याचे प्रमाण मोजले आणि ते ग्रामीण भागात 51.6 टक्के तर शहरी भागात 7.6 टक्के आढळले. एकूण दारिद्र हे 44 टक्के होते.


2) अलघ समिती –

                          सर्वप्रथम नियोजन आयोगाने जुलै 1977 मध्ये वाय के अलघ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. त्यांनी आपला अहवाल 1979 मध्ये सादर केला. या कृती दलाने दारिद्र्य टोपली ही संकल्पना सुचवली. या टोपलीत अन्नघटक बसवला. किमान दोन वेळचे अन्न मिळवू न शकणारा म्हणजे ही टोपली भरू न शकणारा गरीब समजावा. 

                            ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागातील व्यक्तींसाठी 2100 कॅलरी देईल इतके अन्न या समितीने गृहीत धरले. 2400 कॅलरी रोज मिळवण्यासाठी 1.64 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजे महिन्याला 49.09 रुपये खर्च करावे लागतील. हा खर्च करू शकणार गट म्हणजे दारिद्र्यरेषेवरील आणि हा खर्च करू न शकणारे घटक म्हणजे दारिद्र्यरेषेखालील असे या समितीने सुचवले.


3) डी टी लकडावाला समिती –

                                      1990 मध्ये डी टी लकडावाला यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली गेली. यांनी 1993 मध्ये आपला अहवाल मांडला. या अहवालाचा स्वीकार भारत सरकारने 1997 पासून केला. या समितीने प्रत्येक राज्यासाठी शहरी व ग्रामीण दारिद्र्य रेषा निश्चित केली. लाकडावाला समितीने एम पी सी इ ने मोजमाप यूआरपी म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरीयड चा वापर करून केला होता.


4) सुरेश तेंडुलकर समिती –

                            दारिद्र्य मोजणीची नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी नियोजन आयोगाने 2009 मध्ये सुरेश तेंडुलकर समितीची स्थापना केली.या समितीने दारिद्र्याची रेषा मोजण्यासाठी कॅलरी या निकषाचा वापर बंद करण्याची शिफारस केली. कारण समितीच्या मते कॅलरी, उपभोग व पोषण यांच्यामध्ये कमी परस्परसंबंध आहे.                       


या गटाने एम आर पी उपभोगा वर आधारित दारिद्र्य रेषा चा वापर केला. तेंडुलकर समितीने ग्रामीण व शहरी दारिद्र्य रेषा मांडण्याच्या प्रकाराचा त्याग केला व एकच राष्ट्रीय दारिद्र्यरेषा मांडली. या गटाने 2009 – 10 साठी दारिद्र्य रेषा दारिद्र्याच्या प्रमाणाचे मोजमाप केले. तेंडुलकर गटाने 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी 466.68 रुपये तर शहरी भागासाठी 578.8 रुपये अशी दारिद्र्यरेषा सुचवली.


                           याच्या आधारे देशातील दारिद्र्याचे प्रमाण 37.2 टक्के, ग्रामीण भागात 41.5 टक्के तर शहरी भागात 25.7 टक्के इतके असल्याचे निश्चित केले.

              तेंडुलकर समितीने 2009 – 10 साठी ग्रामीण भागासाठी 673 रुपये तर शहरी भागासाठी 860 रुपये अशी दारिद्र्यरेषा सुचवली या दारिद्र्यरेषेच्या आधारे देशातील दारिद्र्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे व्यक्त केले. एकूण दारिद्र्य 29.7 टक्के तर ग्रामीण भागात 33.8 टक्के आणि शहरी भागात 20.9 टक्के इतके दारिद्र्य असल्याचे सांगितले.


5) सी रंगराजन समिती चे मोजमाप –

                                          2012 मध्ये रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ गटाची स्थापना केली या गटामध्ये महेंद्र देव, के सुंदरम, महेश व्यास आणि के दत्ता हे अर्थतज्ञ सदस्य होते. रंगराजन समितीने तेंडुलकर पद्धतीचा त्याग करून लकडावाला पद्धतीचाच स्वीकार करण्याची शिफारस केली. म्हणजे अन्न व इतर वस्तू व सेवांच्या उपभोग खर्चाच्या आधारावर दारिद्र्य रेषा व प्रमाण मोजण्याची शिफारस त्यांनी केली.                                 


रंगराजन समितीने कॅलरी उपभोगाचा निकष ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी प्रति व्यक्ती प्रति दिन इतका तर शहरी भागासाठी 2090 कॅलरी प्रतिव्यक्ती प्रतिदिन इतका गृहीत धरला. रंगराजन समितीच्या मोजमापानुसार 2011 – 12 मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण 29.5 टक्के ग्रामीण भागातील दारिद्रयाचे प्रमाण 30.9 टक्के तर शहरी भागातील दारिद्र्याचे प्रमाण 26.4 टक्के असे व्यक्त केले.


              रंगराजन समितीने गरीब लोकांची सर्वाधिक संख्या असणारी पाच राज्ये पुढीलप्रमाणे सांगितली आहेत –

उत्तर प्रदेश (809 लाख), बिहार (438 लाख), मध्य प्रदेश (328 लाख), पश्चिम बंगाल (275 लाख),महाराष्ट्र (228 लाख)             


दारिद्र्याच्या प्रमाणानुसार सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण असलेली पाच राज्य पुढीलप्रमाणे सांगितली –

छत्तीसगड(48%), मणिपूर (47.7%), ओडिशा (46%), मध्य प्रदेश (44%) आणि झारखंड (42%)

रंगराजन समितीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दारिद्र्याचे प्रमाण 20 टक्के होते.

राज्यसेवा प्रश्नसंच

 🔰 मानव विकास निर्देशांक यांची जनक खालीलपैकी कोण आहे

१.  दादाभाई नवरोजी

२.  मॉरीस डी मॉरीस

३. जेके मेहता

४.  वरीलपैकी एकही नाही✅✅

(स्पष्टीकरण:-

जनक मेहबूब उल हक)


🔰 कोणती दारिद्र्य सर्व देशात आढळते?

१.  सापेक्ष दारिद्र्य✅✅

३. निरपेक्ष दारिद्र्य

२. नागरी दारिद्र्य

४.  शहरी दारिद्र्य


🔰 कोणता रोग हा एकदा होऊन गेला की पुन्हा होत नाही बहुदा पुन्हा होत नाही

१.  कॉलरा

२. विषम ज्वर

३. खरुज

४. इसब

५. वरीलपैकी एकही नाही✅✅




🔰 चारकोल म्हणजे काय ?

१. लोणारी कोळसा ✅✅

२. दगडी कोळसा

३. कच्चा कोळसा

४. खाणीतील कोळसा


🔰 एक किलोग्रॅम लाकडा पासून सुमारे किती जुल एवढी ऊर्जा मिळते?

1.  १७००✅✅

2 १८००

३. १५००

4. १२००


🔰 पलागा हा रोग............ या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो ?

१. क

२. ई

३. ड

४. वरीलपैकी एकही नाही✅✅

(स्पष्टीकरण:-

पेला ग्ररोग्य  ब या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो)

सारख्या नावाचे तालुके

🔴 सारख्या नावाचे तालुके 🔴

❇️तालुका व जिल्हा❇️

🔳आष्टी:-बीड-वर्धा

🔳शिरूर:-बीड-पुणे

🔳कळंब:-यवतमाळ-उस्मानाबाद

🔳खेड:-पुणे-रत्नागिरी

🔳कर्जत:-नगर-रायगड

🔳मालेगाव:-वाशीम-नाशिक

🔳कारंजा:-वाशीम-वर्धा

🔳सेलू:-वर्धा-परभणी

🔳नांदगाव:-नाशिक-अमरावती.

नेशनल पार्क ~राज्यवार

🎓  नेशनल पार्क ~राज्यवार 🎓

🌴राजस्थान
1. केवला देवी राष्ट्रीय उद्यान
2. रणथ्मभोर राष्ट्रीय पार्क
3. सरिस्का राष्ट्रीय उद्यान
4. डैजर्ट राष्ट्रीय पार्क
5. दर्रा राष्ट्रीय पार्क
6. घना पक्षी राष्ट्रीय पार्क
7. केवला देवी राष्ट्रीय पार्क
8. ताल छापर अभ्यारण्य
9. माउंट आबू वाईल्ड लाइफ सैंचुरी

🌴मध्य प्रदेश
1. कान्हा राष्ट्रीय पार्क
2. पेंच राष्ट्रीय पार्क
3. पन्ना राष्ट्रीय पार्क
4. सतपुड़ा राष्ट्रीय पार्क
5. वन विहार पार्क
6. रुद्र सागर झील राष्ट्रीय पार्क
7. बांधवगढ नेशनल पार्क
8. संजय नेशनल पार्क
9. माधव राष्ट्रीय पार्क
10. कुनो नेशनल पार्क
11. माण्डला प्लांट फौसिल राष्ट्रीय पार्क

🌴अरुणाचल प्रदेश
1. नामदफा राष्ट्रीय पार्क

🌴हरियाणा
1. सुलतानपुर राष्ट्रीय पार्क
2. कलेशर राष्ट्रीय पार्क

🌴उत्तर प्रदेश
1. दूदवा राष्ट्रीय पार्क
2. चन्द्रप्रभा वन्यजीव विहार

🌴झारखंड
1. बेतला राष्ट्रीय पार्क
2. हजारीबाग राष्ट्रीय पार्क
3. धीमा राष्ट्रीय पार्क

🌴मणिपुर
1. काइबुल लाम्झो राष्ट्रीय पार्क
2. सिरोही राष्ट्रीय पार्क

🌴सिक्किम
1. खांचनजोंगा राष्ट्रीय पार्क

🌴तरिपुरा
1. क्लाउडेड राष्ट्रीय पार्क

🌴तमिलनाडु
1. गल्फ आफ मनार राष्ट्रीय पार्क
2. इन्दिरा गांधी ( अन्नामलाई ) राष्ट्रीय पार्क
3. प्लानी हिल्स राष्ट्रीय पार्क
4. मुकुरूथी नेशनल पार्क
5. गुनीडे नेशनल पार्क

🌴ओडिसा
1. भीतरगनिका राष्ट्रीय पार्क
2. सिंमली राष्ट्रीय पार्क
3. नन्दनकानन राष्ट्रीय चिड़ीयाघर
4. चिल्का झील अभयारण्य

🌴मिजोरम
1. माउन्टेन राष्ट्रीय पार्क
2. मुरलेन राष्ट्रीय पार्क
3. फांगपुई नेशनल पार्क
4. डाम्फा अभ्यारण्य

🌴जम्मू-कश्मीर
1. दाचीग्राम राष्ट्रीय पार्क
2. सलीम अली राष्ट्रीय पार्क
3. किस्तवाड़ राष्ट्रीय पार्क
4. हैमनिश नेशनल पार्क
5. जैव मण्डल रीजर्व , श्रीनगर

🌴पश्चिम बंगाल
1. सुन्दरवन राष्ट्रीय पार्क
2. बुक्सा राष्ट्रीय पार्क
3. जलधपारा राष्ट्रीय पार्क
4. गोरूवारा राष्ट्रीय पार्क
5. सिंघालिला राष्ट्रीय पार्क
6. नियोरा वैली नेशनल पार्क

🌴असम
1. मानस राष्ट्रीय पार्क
2. काजीरंगा राष्ट्रीय पार्क
3. नामेरी राष्ट्रीय पार्क
4. राजीव गांधी ओरांग पार्क
5. डिब्रूगढ़ शेखोवाल राष्ट्रीय पार्क

🌴आध्र प्रदेश
1. कसरू ब्रह्मानंदा रेड्डी नेशनल पार्क
2. इन्दिरा गाँधी प्राणी विज्ञान पार्क
3. मरूगवामी नेशनल पार्क
4. श्री वेंकटेश्वरम राष्ट्रीय पार्क
5. कावला राष्ट्रीय पार्क
6. नागार्जुन सागर राष्ट्रीय पार्क
7. नेलापत्तु पक्षी राष्ट्रीय पार्क

🌴महाराष्ट्र
1. बोरीवली ( संजय गांधी ) राष्ट्रीय पार्क
2. चांदोली राष्ट्रीय पार्क
3. तबोड़ा राष्ट्रीय पार्क
4. गुग्गामल राष्ट्रीय पार्क
5. नवागांव राष्ट्रीय पार्क
6. तन्सा नेशनल पार्क, थाणे
7. मेलघाट राष्ट्रिय अभ्यारण्य

🌴अण्डमान-निकोबार
1. सैडिल पीक राष्ट्रीय उद्यान
2. महात्मा गाँधी मैरीन ( वंदूर ) राष्ट्रीय उद्यान
3. फोसिल राष्ट्रीय पार्क
4. कैंपबैल नेशनल पार्क
5. गलेथा राष्ट्रीय पार्क
6. माऊंट हैरिट नेशनल पार्क
7. रानी झांसी मैरीन राष्ट्रीय पार्क

🌴हिमाचल प्रदेश
1. पिन वैली पार्क
2. ग्रेट हिमालय राष्ट्रीय पार्क
3. रोहल्ला राष्ट्रीय पार्क
4. किरगंगा राष्ट्रीय पार्क
5. सीमलबरा राष्ट्रीय पार्क
6. इन्द्रकिला नेशनल पार्क
7. शिकरी देवी अभ्यारण्य

🌴गजरात
1. गिर राष्ट्रीय पार्क
2. मरीन राष्ट्रीय पार्क
3. ब्लेक बुक राष्ट्रीय पार्क
4. गल्फ आफ कच्छ
5. वंसदा नेशनल पार्क

🌴उत्तराखण्ड
1. जिम कार्बेट राष्ट्रीय पार्क
2. वैली आफ फ्लावर राष्ट्रीय पार्क
3. नन्दा देवी राष्ट्रीय पार्क
4. राजाजी नेशनल पार्क
5. गोविन्द पासू विहार नेशनल पार्क
6. गंगोत्री राष्ट्रीय पार्क

🌴छत्तीसगढ
1. कांगेर घाटी ( कांगेर वैली ) राष्ट्रीय पार्क
2. इन्द्रावती राष्ट्रीय पार्क
3. गुरू घासीदास ( संजय ) राष्ट्रीय उद्यान

🌴करल
1. साइलेंट वैली राष्ट्रीय पार्क
2. पेरियार नेशनल  पार्क
3. मैथीकेतन नेशनल पार्क
4. अन्नामुदाई नेशनल पार्क
5. एर्नाकुलम नेशनल पार्क

🌴कर्नाटक
1. बांदीपुर राष्ट्रीय पार्क
2. नागरहोल ( राजीव गांधी ) राष्ट्रीय उद्यान
3. अंसी राष्ट्रीय पार्क
4. बनेरघाटला नेशनल पार्क
5. कुडूरमुख नेशनल पार्क
6. तुंगभद्रा राष्ट्रीय पार्क

🌴 पंजाब
1. हरिकै वैटलैण्ड नेशनल पार्क

🌴 तेलंगाना
1. महावीर हरीना वनस्थली नेशनल पार्क
2. किन्नरसानी अभ्यारण्य

🌴 गोआ
1. सलीम अली बर्ड सैंचुरी
2. नेत्रावली वन्यजीव पार्क
3. चौरा राष्ट्रीय पार्क
4. भगवान महावीर नेशनल पार्क

🌴 बिहार
1. वाल्मिकी नेशनल पार्क
2. विक्रमसिला गंगटिक डॉल्फिन सैंचुरी
3. कंवर लेक बर्ड सैंचुरी

🌴 नागालैण्ड
1. इंटांग्की अभ्यारण्य, कोहीमा

🌴 मेघालय
1. बलफकरम नेशनल पार्क
2. सीजू अभ्यारण्य
3. नांगखिलेम अभ्यारण्य
4. नोकरे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...