१६ मे २०२२

50 Important Idioms And Phrases Asked In various Competitive Exams.

✍ 50 Important Idioms And Phrases Asked In various Competitive Exams.

1. At sixes and seven – In disorder or confusion

2. Lose head – Panic 

3. Take to task – To criticize severely/ to punish

4. Sit in judgement – To pass judgement(or comment on someone ) especially when you have no authority

5. Leave in the lurch – To desert someone

6. Cry over spilt milk – Cry over irreparable loss

7. Bad blood – Active enmity

8. Close shave – A narrow escape

9. Grease palms – To bribe someone

10. Carrot and stick – Reward and punishment policy

11. To cut teeth – To gain experience of something for the first time

12. Cut no ice – Had no influence

13. Close the book - Stop working on something

14. In fits and starts - Irregularly

15. Bird’s eye view – An overview 

16. Run in the same groove – Clash with each other 

17. Keep your head – Remain calm 

18. Pull strings – Use personal influence

19. Pot luck dinner – Dinner where somebody brings something to eat

20. To hit below the belt – To attack unfairly 

21. All at sea - Puzzled 

22. Sought after – Wanted by many people because it’s of good quality or difficult to find/Pursued by 

23. Build castle in the air - Daydreaming 

24. On the spur of the moment – To act suddenly, without planning

25. To have something up one’s sleeve – To have a secret plan

26. A red letter day – An important or joyful occasion in one’s life

27. To explore every avenue – To try every opportunity 

28. At one’s beck and call – Ready to follow orders/ To be dominated by someone 

29. By fair or foul means – In honest or dishonest way 

30. Status quo – As it is/ unchanged position 

31. To burn candle at both ends – To be extravagant/ Spend without any worry

32. To hit the jackpot – To make money quickly 

33. To bring to light – to reveal 

34. At the eleventh hour – At the last possible moment 

35. Go scot-free – To escape without punishment

36. To shed crocodile tears – To pretend grief 

37. To look down one’s nose – To regard with contempt 

38. To miss the bus – To miss an opportunity 

39. A white elephant – Costly and troublesome possession, with much use to its owner

40. To call spade a spade – To be frank

41. To fight tooth and nail – To fight heroically, in very determined way

42. Birds of same feather – Persons of same character

43. Take exception – To object over something 

44. High handed – Using authority in an unreasonable way, overbearing

45. Too fond of one’s own voice – To like talking without wanting to listen to other people/Very selfish 

46. By leaps and bounds – Rapidly

47. An open book – Straight forward and honest dealings 

48. Fall short – Fail to meet expectation/ have no effect 

49. Heart to heart talk – Frank talk 

50. Give the game away – Give out the secret(unintentionally).

१५ मे २०२२

नोबेल पुरस्कार बद्दल माहिती आणि २०२० चे नोबेल पुरस्कार विजेते


नोबेल पुरस्कार बद्दल माहिती ..

नोबेल पुरस्कार ची सुरवात हि स्वीडिश वैज्ञानिक आल्फेड नोबल यांनी नोबेल प्राईज देण्याची सुरवात केली..

● १९०१ मध्ये त्यांनी ,
Physics , chemistry , laterature , peace physiology or medicien इ.

(१९६९ ला अर्थशास्त्र चा पुरस्कार देण्यात सुरवात झाली)

★ पुरस्काराचे स्वरूप :- ९० लाख स्वाडीश क्रोनर (२०१९ च्या आकडेवारीनुसार) रु रोख आणि २४ कॅरेट गोल्ड मेडल.

★ नोबेल हा पुरस्कार हा १० डिसेंबर रोजी दिला जातो..
● आल्फ्रेड नोबेल यांच्या जयंती निमित्त दिला जातो..

★ पहिले भारतीय व्यक्ती ..
●● रवींद्रनाथ टागोर  (१९१३)
●● सी व्ही रमण (१९३०)
●● हर गोबिंद खुराणा ( १९६८)
●● मदर टेरेसा( १९७९)
●● सुब्रमण्यम चंद्रशेखर (१९८३)
●● अमर्त्य सेन (१९९८)
●● व्यंकटरामन रामकृष्ण ( २००९)
●● व्ही.एस.नायपॉल (२००१)
●● कैलास सत्यार्थी  (२०१४)
●● अभिजित बॅनर्जी (२०१९) (भारतीय वंशीय व्यक्ती सध्या अमेरिकेचे नागरिक आहे.)

टीप :-  १) नोबेल पुरस्कार आत पर्यंत 10 भारतीय व्यक्तींना मिळाला आहे.

२) सर्वात जास्त पुरस्कार अमेरिका या देशातील व्यक्तींना मिळाला आहे.

◆● महात्मा गांधी यांना १९३७, १९३८, १९३९, आणि १९७४ ला नोबेल साठी नोमिनेट केले होते..

★★ २०२० चे नोबेल पुरस्कार विजेते★★

1) रसायनशास्त्र :-  इमॅन्युएल चार्पेंटीर(फ्रांस) , जेनिफर ए.दौदना(अमेरिका)

2) भौतिकशास्त्र :- अँड्रिया एम.गेझ , रॉजर पेनरोस , रेइनहार्ड गेन्झेल

3) वैद्यकशास्त्र :- हार्वी जे.आल्टर(अमेरिका) ,मायकल ह्युटन(ब्रिटन) , चार्ल्स.एम राईस(अमेरिका)

4) अर्थशास्त्र :-  पॉल मिलग्रोम रॉबर्ट विल्सन

5) शांतता :- WFP - जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Programme)

6) साहित्य :- लुईस ग्लक ( अमेरिका ).

भारतीय संविधान... जाणून घ्या १० महत्त्वाच्या गोष्टी

भारतीय संविधान... जाणून घ्या १० महत्त्वाच्या गोष्टी.


१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?
-२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.

२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

३. कसं लिहीलं गेलं संविधान?

-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

४.संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?
-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.

५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?
-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.

७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?
- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?
-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.

९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?
- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.

१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?
-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

मूलभूत कर्तव्ये

मूलभूत कर्तव्ये


                    व्यक्तीला जेव्हा हक्क प्राप्त होतात तेव्हा त्या हक्का सोबत काही जबाबदाऱ्या ही पार पाडाव्या लागतात. भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क दिले तसे काही मुलभुत कर्तव्ये/ FUNDAMENTAL DUTIES ही सांगितलेली आहेत.

भारताच्या राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता.मात्र १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने घटनेत १० मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला. २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीने अकरावे मूलभूत कर्तव्य देण्यात आले.

भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य यांची यादी सोवियत रशियाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आली आहे.

अशाप्रकारची मूलभूत कर्तव्य Fundamental duties केवळ जपानच्या राज्यघटनेमध्ये दिसून येतात.


स्वर्ण सिंह समिती १९७६
आणीबाणीच्या काळातील निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारत सरकारने १९७६ मध्ये सरदार स्वर्ण सिंह समितीची स्थापना केली. या समितीने मुलभूत कर्तव्यांचे एक स्वतंत्र प्रकरण घटनेत समाविष्ट करण्याची शिफारस केली. १९७६ मध्ये ही शिफारस मान्य करून ४२ व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये घटनेतील भाग चार A मध्ये कलम ५१ समाविष्ट करण्यात आले. यामध्ये दहा मूलभूत कर्तव्ये Fundamental Duties देण्यात आली आहेत.

महत्वाचे मुद्दे

मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत? 11 fundamental duties

महत्व – Importance of fundamental duties

a. संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर राखणे.
b. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे.
c. भारताचे सार्वभौमत्व एकता एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.
d. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे.
e. धार्मिक भाषिक प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.
f.आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसांचे जतन करणे.
g.वने सरोवरे नद्या वन्यजीव सृष्टी अशा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे.
h.विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद आणि शोधक बुद्धी त्यांचा विकास करणे.
i.सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे.
j.राष्ट्राला प्रगतीपथावर नेणे यासाठी व्यक्तिगत व सामुदायिक कार्यामध्ये उत्तमता संपादन करणे.
k.जन्मदाता किंवा पालक आपल्या पाल्यास वयाच्या सहाव्या वर्षापासून 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. (हे कर्तव्य 86 व्या घटनादुरुस्तीने 2002 मध्ये समाविष्ट करण्यात आले.)
मूलभूत कर्तव्ये – वैशिष्ट्ये

मूलभूत कर्तव्य यांच्या यादी मधील काही कर्तव्य ही नैतिकतेवर आधारित आहेत तर काही नागरिक कर्तव्य आहेत.

मूलभूत कर्तव्ये भारतीय जीवनपद्धतीचासमृद्ध वारसा जतन करण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहेत.

मूलभूत हक्क भारतीय नागरिकांना प्राप्त होतात तसे ते अपवाद वगळता परकीयांना ही प्राप्त होतात. मूलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांना लागू होतात.

मूलभूत कर्तव्ये न्यायप्रविष्ठ नाहीत.

मूलभूत कर्तव्ये –

नागरिकांचे वर्तन कायद्याद्वारे नियंत्रित करता येते त्यामुळे मूलभूत कर्तव्य यांचा समावेश म्हणजे कायद्याविषयी दुराग्रह अशी एकटी का मूलभूत कर्तव्य यांच्याबाबतीत केली जाते.
मूलभूत कर्तव्यांची यादी पुरेशी नाही. यामध्ये कर भरणे कुटुंबनियोजन मतदान करणे यासारख्या कर्तव्यांचा समावेश नाही.

मूलभूत कर्तव्य मध्ये काही संकल्पना अस्पष्ट आहेत. स्वतंत्र लढ्यातील आदर्श, संस्कृती, उपक्रम ई.
मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नसणे म्हणजे दंड सत्तेचा आधार नाही त्यामुळे ही कर्तव्य नैतिक तत्त्वे ठरतात.
मूलभूत कर्तव्य भाग-3 मध्ये असणे जास्त योग्य ठरले असते. भाग चार मध्ये चुकीच्या ठिकाणी यांचा समावेश करण्यात आला आहे.

महत्व – Importance of fundamental duties
नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे महत्त्वाची आहेत.

मूलभूत हक्कांची बजावणी करत असताना समाजविघातक व हिंसक कृती करण्यापासून नागरिकांना अटकाव करतात.


नागरिकांमध्ये शिस्त व जबाबदारीच्या वर्तणूक इस प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी मूलभूत कर्तव्य महत्त्वाचे आहेत.

एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी न्यायालयास मूलभूत कर्तव्य यांचा आधार घेता येऊ शकतो.

मूलभूत कर्तव्य fundamental duties नुसार नागरिकाचे वर्तन नसल्यास संसद त्यावर एखादा कायदा करून शिक्षेची तरतूद करू शकते.

महिला कल्याणासाठीचे कायदे जिल्हा महिला सहायता समिती : लैंगिक छळाविरुद्ध मार्गदर्शक तत्त्व : महिलांच्या अटकेसंबंधी : महिला आयोग : महिला कल्याणासाठीचे कायदे

महिला कल्याणासाठीचे कायदे

जिल्हा महिला सहायता समिती :

लैंगिक छळाविरुद्ध मार्गदर्शक तत्त्व :

महिलांच्या अटकेसंबंधी :

महिला आयोग :

महिला कल्याणासाठीचे कायदे

हुंडा प्रतिबंधक कायदा : १९६१'च्या या कायद्यान्वये हुंडा मागणे आणि हुंडा देणे गुन्हे आहेत. हा कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी भारतीय दंड संहितेमधे ३०४ (ख) आणि ४९८ (क) ही नवीन कलमे अंतर्भूत आहेत.

महिला संरक्षण कायदा : कौटुंबिक छळ (महिला संरक्षण) प्रतिबंधक कायदा स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक, आथिर्क व शारीरिक संरक्षण देतो. हा कायदा फक्त पुरुषांविरुद्धच लागू होतो. यात अंतरिम आदेश देणे, नुकसान भरपाई देणे, संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, भागीदारीच्या घरात राहण्याचा अधिकार, कायदेशीर व वैद्यकीय मदत देण्याची तरतूदही आहे.

अश्लीलताविरोधी कायदा : भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ ते २९४ मध्ये महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे जाहिराती, पुस्तकं, चित्र आदी माध्यमांतून महिलांची विटंबना करणाऱ्या चित्र किंवा लेखनातून 'अश्लीलता सादर करणाऱ्याविरोधी कायदा १९८७'नुसार वॉरण्टशिवाय अटक करण्याचा अधिकारही आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायदा : बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी 'बालविवाह प्रतिबंधक अधिनियम (शारदा अॅक्ट)' १९८७ मध्ये सुधारणा झाल्या आहेत. लग्नाच्या वेळी मुलींचे वय किमान १८ आणि मुलाचे वय २१ वर्षाहून कमी असल्यास शिक्षेची तरतूद आहे. हा कायदा सर्व जातिधर्माच्या लोकांना सारखाच लागू आहे.

कौटुंबिक न्यायालय कायदा : दाम्पत्य व कौटुंबिक कलहाची प्रकरणे एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी कौटुंबिक अधिनियम १९८४ लागू करण्यात आला आहे. कुटुंब न्यायालय नसल्यास तिथल्या जिल्हा कोर्टांना कुटुंब न्यायालयाचा दर्जा देण्यात आला आहे.

छेडछाड करणे गुन्हा : स्त्रीची अब्रू लुटणे, हात धरणे, तिच्या वस्त्रांना हात घालणे अशा प्रकारे विनयभंग करणाऱ्यांना भारतीय दंड संहिता ३५४ खाली शिक्षेची तरतूद आहे. तसेच, छेडछाड केल्याबदल भारतीय दंड संहिता कलम ५०९ अंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल करता येते.

मुलावर हक्क : एखाद्या स्त्रीचा घटस्फोट झाल्यास तिच्या पाच वर्षापर्यंतच्या मुलांना ती स्वत:जवळ ठेवू शकते. मात्र पाच वर्षांहून अधिक वयाच्या मुलांच्या बाबतीत कोर्टाचा निर्णयच बांधील असतो.

समान वेतन कायदा : समान वेतन कायद्यानुसार एकाच कामासाठी स्त्री व पुरुष दोघांना समान वेतन मिळाले पाहिजे. विशिष्ट कार्यक्षेत्रातील नोकऱ्या सोडता अन्य ठिकाणी स्त्रियांना रात्र पाळीला कामाला बोलावता येत नाही.

लैंगिक गुन्हे : लैंगिक गुन्ह्यासंबंधात भारतीय दंडसंहिता कलम ३७५ व ३७३ अनुसार कडक शिक्षा देण्यात येतात. लैंगिक प्रकरणाची सुनावणी कोर्टाच्या बंद खोलीत होते.

हिंदू उत्तराधिकार : १९५६मध्ये निर्माण झालेल्या हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार महिलांना संपत्तीमध्ये व्यापक अधिकार देण्यात आले असून स्त्रीधनाचा उपभोग घेण्याचा आणि ते धन खर्च करण्याचा अनिर्बंध अधिकार स्त्रीला मिळाला आहे. हिंदू स्त्रीला एकत्र कुटुंबाच्या संपत्तीतसुद्धा वाटणी मागता येते. स्त्री धन मिळावे म्हणून स्त्री कोर्टात खटला दाखल करू शकते. स्त्रीला मुलाप्रमाणेच वडिलोपाजिर्त संपत्तीमध्येही समान हक्क दिला गेलाय.

हिंदू विवाह कायदा : भारतीय दंड संहिता कलम १२५ अनुसार स्त्रीला पोटगीची मागणी करण्याचा हक्क आहे. हिंदू विवाह कायदा १९५५ कलम २५ नुसार अर्ज दाखल केल्यानंतर कोर्ट पोटगीची रक्कम देण्याचे आदेश देते. पती-पत्नीच्या वादामधे निकाल लागेपर्यंतच्या मधल्या काळातसुद्धा पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी अंतरिम पोटगी रक्कम देण्याची तरतूद कायद्यात आहे.

प्रसूती सुविधा कायदा : नोकरीपेशातील स्त्रियांसाठी बाळंतपणाची आणि नवजात बाळाची देखभाल करण्यासाठी रजेची तरतूद असून त्या काळात स्त्रीला विशिष्ट दिवसाची भर पगारी रजा मिळते. मात्र कायद्यानुसार ती रजा व इतर फायदे फक्त दोन बाळंतपणासाठी असतात. गर्भपात झाल्यावरही स्त्रीला भर पगारी रजा मिळण्याची तरतूद कायद्यात आहे.

विशेष विवाह अधिनियम : विशेष विवाह अधिनियम १९५४च्या तरतुदीनुसार मानसिकदृष्ट्या सक्षम आणि १८ वषेर् पूर्ण झालेली स्त्री प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह स्वत:च्या इच्छेनुसार करू शकते. या विवाहाची नोंदणी करणे आवश्यक असून पुरुषाचे वय २१ वर्षापेक्षा अधिक असावे.

गर्भलिंग चाचणी : स्त्री भूण हत्या रोखणे व गर्भांचे लिंग जाणून घेण्याच्या तंत्राचा दुरुपयोग करणे यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रसूतीपूर्व निदान आणि तंत्रज्ञान विनिमय व दुरुपयोग निवारण अधिनियम १९९४ आहे.

जिल्हा महिला सहायता समिती :

महिलाचे शोषण व छळ होऊ नये म्हणून हायकोर्टाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला सहाय्यता समिती स्थापन झाली आहे. होणारे शोषण किंवा छळ याबद्दलची तक्रार या समितीकडे महिला लेखी स्वरूपात देऊ शकते. तसेच, न्याय मिळण्यासाठी कायदेशीर सल्लागार व स्वयंसेवी संस्थांची व्यवस्था समितीतफेर् केली जाते.

लैंगिक छळाविरुद्ध मार्गदर्शक तत्त्व :

नोकरीच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. खासगी, सार्वजनिक तसेच अन्य संस्थामध्येसुद्धा ती लागू आहेत. लैंगिक चाळे आणि तक्रारी थांबवण्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर तसेच कर्मचाऱ्यांवर आहे. तसेच, तक्रारींच्या झटपट निवारणासाठी प्रत्येक विभागात महिला अध्यक्षासह अर्ध्यापेक्षा अधिक महिला असणारी समिती स्थापन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महिलांच्या अटकेसंबंधी :

महिलांना फक्त महिला पोलिस सूयोर्दयानंतर आणि सूर्यास्तापूवीर् अटक करू शकतात. कुटुंबाच्या सदस्याच्या उपस्थितीत व योग्य कारण असेल तरच स्त्रीला पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावता येते. स्त्रीला अटक केल्यास तिला फक्त महिला कक्षामध्येच ठेवता येते.

महिला आयोग :

महिलांना संवैधानिक व न्यायिक सुरक्षा आणि अधिकार देण्यासाठी ३१ जानेवारी १९९२ रोजी महिला आयोगाची स्थापना झाली. प्रत्येक राज्यातही महिला आयोग स्थापन झाला आहे. महिला कोणतीही तक्रार थेट महिला आयोगाकडे करू शकतात. आयोगाला सिव्हिल कोर्टाप्रमाणे चौकशी आणि तपासाचे अधिकार आहेत. हा आयोग वेळोवेळी सरकारला महिला कल्याणाच्या योजनाही सादर करतो.

१५ मे – भारतीय वृक्ष दिन

१५ मे – भारतीय वृक्ष दिन 



✅१५ मे – घटना

१७१८: जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.

१७३०: रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.

 १८११: पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.

१८३६: सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी...

✅१५ मे – जन्म

१८१७: भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक देवेन्द्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९०५)

१८५९: नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९०६)

१९०३: साहित्य मीमांसक, कवी व... 


१५ मे – मृत्यू

१३५०: संत जनाबाई यांचे निधन.

१७२९: वैशाख व. १४, शके १६५१ मराठेशाहीच्या आपत्‌प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन.

१९९३: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम....

ब्राम्हणेतर पक्ष

🟢ब्राम्हणेतर पक्ष🟢

◾️स्थापना:-12 डिसेंबर 1920

◾️स्थळ:-जेधे मेन्शन पुणे

📌संस्थापक नेते:-

◾️भास्करराव जाधव

◾️केशवराव जेधे

◾️आनंदस्वामी

◾️धनाजीशहा कूपर

◾️गंगाजी काळभोर

◾️बाबुराव जगताप

◾️आनंद जगताप

◾️वालचंद कोठारी

◾️बापूराव जेधे

📌उद्देश:-

◾️ब्राम्हणच्या गुलामगिरी मधून मुक्त करणे

◾️सरकारी नोकऱ्यात हक्क मिळविणे

◾️समाजात बंधुभाव वाढविणे.

इंडियन असोसिएशन

🟢 इंडियन असोसिएशन 🟢

◾️स्थापना:-26 जुलै 1876

◾️ठिकाण:-कोलकत्ता

◾️संस्थापक:-

आनंदमोहन बोस व सुरेंद्रनाथ बॅनर्जी

◾️ध्येय:-अखिल भारतीय चळवळ उभी करणे

◾️हेतू:-हिंदू-मुस्लिम मित्रत्वाचे निर्माण करणे

📌कार्य:-

◾️सिव्हिल सर्व्हिस वयोमर्यादा साठी प्रयत्न केले

◾️राजकीय प्रश्न बाबत जनमत संघटित केले.

रॉबर्ट गिल


🟢  रॉबर्ट गिल  🟢

🔺स्मृतिदिन

◾️जन्म:- 26 सप्टेंबर 1804 बिशपगेट, लंडन

◾️मृत्यू: 10 एप्रिल 1879, भुसावळ

◾️ गिल 19 व्या वर्षी पी.ग्रेलीमरच्या शिफारशीने जेम्स पॅटीसच्या आदेशानुसार मद्रास येथील इस्ट इंडिया कंपनीच्या ‘‘44 मद्रास नेटिव्ह या सैन्य दलात’’ भरती झाल्यानंतर भारतात आला

◾️ते लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचा क्वालिफाइड आर्टिस्ट होते

◾️1844 रोजी अजिंठ्यातील चित्र-शिल्पांच्या आरेखनासाठी (ड्राफ्समन) अजिंठा येथे नियुक्ती दिली

◾️1846 ला रॉबर्ट गिलने अजिंठ्याच्या आठ चित्रकृतींचा पहिला टप्पा पूर्ण केला

◾️ लंडनच्या इंडियन कोर्ट ऑफ द क्रिस्टल पॅलेस, सिडनेहॅम येथे 1851 ला त्याच्या अजिंठ्यावरील चित्रांचे प्रदर्शन भरले

◾️या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतातील हा ठेवा सर्वप्रथम जगासमोर आला

◾️फोटोग्राफीतून अजिंठा, वेरूळ, लोणार सरोवर, मुक्तगिरी, हेमाडपंती मंदिरे, किल्ले, मुस्लिम वास्तुकलांची प्रकाशचित्रे काढून भारतातील विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला

◾️भुसावळच्या दवाखान्यात 10 एप्रिल 1879 रोजी निधनानंतर भुसावळ रेल्वे स्टेशनजवळ दफनभूमीत दफन करण्यात आले

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig

🟢  रॉबर्ट गिल  🟢 स्मृतिदिन

🔺प्रेमकथा

◾️1845 रोजी अजिंठा नियुक्ती दरम्यान स्थानिक भारतीय जमातीच्या पारो या तरुणीशी ओळख झाली या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले.

◾️परंतु रॉबर्ट- पारो यांचा विवाह झाल्याचे इतिहासात कोठेही नमूद नाही.

◾️1954-55 साली भारतात प्लेगची साथ आली आणि त्यात 23 मे 1856 ला पारो हिचा मृत्यू झाला. या घटनेने रॉबर्ट अत्यंत दु:खी झाला. देश, धर्म, भाषा, सामाजिक बंधने या सर्वांच्या पलीकडे जावून पारोने रॉबर्टला खूप सहकार्य केले होते

◾️पारोबद्दल असलेल्या अत्यंत प्रेमापोटी रॉबर्टने तिची कबर सिल्लोड तालुक्यात अजिंठा गावात बांधली.‘

🔺‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो हू डाईड 23 मे 1856’’ अशा ओळी तिच्या कबरीवर लिहिल्या आहेत.

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

1. हिवाळी ऑलम्पिक 2022 या स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे ..?
-- चीन

2. नीती आयोगाच्या आरोग्य निर्देशांकमध्ये कोणते राज्य प्रथम आहे ..?
-- केरळ 74.01

3. सुधीर मुनगंटीवार यांची कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली आहे ..?
-- गडचिरोली

4. गुलाबी शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे ..?
-- जयपूर ( जयपूरच्या प्रसिद्ध चारदिवारी ला युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.)

5. पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री कोण आहेत..?
-- ममता बॅनर्जी ( नुकतेच केंद्र सरकारने प बंगालचे नाव बदलण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे )

6. क्रोएशिया या देशाला भेट देणारे प्रथम राष्ट्रपती कोण..?
-- रामनाथ कोविंद ( यांना नुकताच क्रोएशिया या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे )

7. मराठा समाजाला नवीन कायद्यानुसार किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे ..?
-- शिक्षण संस्थेत 12% आणि शासकीय सेवेत 13% आरक्षण दिले आहे

8. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरवात कधी झाली..?
-- 22 जानेवारी 2015 पासून याची ( दूत :- साक्षी मलिक )

9. UIDAI चे पहिले आधार सेवा केंद्र कोठे उघडले आहे ..?
-- दिल्ली आणि विजयवाडा

10. लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत.?
-- ओम बिर्ला.

महत्वाचे दिन व परीक्षेच्या दृष्टीने

📒महत्वाचे दिन...📒 परीक्षेच्या दृष्टीने

============================
१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————————————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...