२८ एप्रिल २०२२

लक्षद्वीप भारताच्या नैऋत्य भागातील केंद्रशासित प्रदेश

लक्षद्वीप
भारताच्या नैऋत्य भागातील केंद्रशासित प्रदेश

लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ फक्त ३२ चौ.किमी. आहे. लक्षद्वीपची लोकसंख्या ६४,४२९ एवढी आहे. मल्याळी ही येथील प्रमुख भाषा आहे. लक्षद्वीपची साक्षरता ९२.२८ टक्के आहे, ही साक्षरतेच्या बाबतीत केरळनंतर भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नारळ, लिंबू, चिंच, केळी ही येथील प्रमुख पिके आहेत. कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथून जवळच असलेले मिनिकॅाय बेट अतुलनीय निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. फॅास्फेट, कॅल्शियम, कार्बोनेट ही येथील प्रमुख खनिजे आहेत.

 
भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
कवरत्ती समुद्री किनारा
कवरत्ती समुद्री किनारा

प्रमाणवेळ
भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
३२ चौ. किमी
राजधानी
कवरत्ती
मोठे शहर
कवरत्ती
जिल्हे

लोकसंख्या
• घनता
६०,५९५ (७ वा) (२००१)
• १,८९४/किमी२
भाषा
मल्याळम
राज्यपाल
बी.वी. सिल्वराज
स्थापित
१ नोव्हेंबर १९५६
संकेतस्थळ: लक्षद्वीप संकेतस्थळ

मिनिकाॅय बेट
) लक्षद्वीप बेटे हा अरबी समुद्रातील बेटांचा एक समूह आहे.
) ही बेटे भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून खूप दूर, अरबी समुद्रात स्थित आहेत.
) बहुतांशी लक्षदीप बेटे प्रवाळाची कणकंदविप आहेत.
) लक्षदीप बेटे विस्ताराने लहान असून, त्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची तुलनेने कमी आहे.
इतिहाससंपादन करा
स्थानिक दंतकथांनुसार केरळचा अखेरचा राजा चेरमान पेरुमाल याच्या कारकिर्दीत या बेटांवरील पहिली वसाहत झाली असावी. काही अरब व्यापाऱ्यांच्या हुकुमावरून जेव्हा राजाला इस्लाम धर्म स्वीकारावयास लावण्यात आला, तेव्हा राजधानी क्रंगनोर (सांप्रतचे कोडुंगलूर)मधून त्याने मक्केला जाण्याच्या निमित्ताने पलायन केले. त्याच्या शोधार्थ किनाऱ्यावरील अनेक ठिकाणांवरून मक्केकडे जाणाऱ्या खलाशी बोटी सोडण्यात आल्या. त्यांपैकी कननोरच्या राजाची बोट तीव्र वादळात सापडून फुटली. तेव्हा अरबी समुद्रातच काही दिवस काढल्यानंतर शेवटी राजा व त्याच्याबरोबरील लोक एका बेटावर आले, ते बेट म्हणजेच ‘बंगारम बेट’ असल्याचे मानतात. त्यानंतर ते जवळच्या अगत्ती बेटावर आले. शेवटी वातावरण निवळल्यानंतर वाटेतील वेगवेगळ्या बेटांवर थांबत थांबत ते मुख्य भूमीवर आले. हा राजा परतल्यावर खलाशी आणि सैनिकांची दुसरी तुकडी अरबी समुद्रात पाठविण्यात आली. तेव्हा त्यांनी अमिनी बेटाचा शोध लावून तेथे ते राहू लागले. या पथकामध्ये पाठविलेले लोक हिंदू होते. आज जरी या बेटांवर इस्लामचे प्रभुत्व स्पष्टपणे दिसत असले, तरी अजूनही हिंदूंच्या काही सामाजिक परंपरा या लोकांमध्ये पहावयास मिळतात. अमिनी, काव्हारट्टी, ॲन्ड्रोथ व काल्पेनी या बेटांवर प्रथम लहान लहान वसाहती स्थापन झाल्या व त्यानंतर या बेटांवरील लोकांनी अगत्ती, किल्टन, चेटलट व काडमट या बेटांवर स्थलांतर केले.

ओबेदुल्ला या अरबी फकिराने येथे इस्लामवर प्रवचने केल्याचे सांगितले जाते. ॲन्ड्रोथ बेटावर ओबेदुल्लाची कबर असून आज ते एक पवित्र स्थळ मानले जाते. श्रीलंका, मलेशिया आणि ब्रह्मदेशातही ॲन्ड्रोथच्या धर्मोपदेशकांचा आदर केला जातो. पोर्तुगीजांचे भारतात सोळाव्या शतकात आगमन झाल्यावर समुद्रपर्यटकांच्या दृष्टीने लखदीवला विशेष महत्त्व आले. जहाजांसाठी काथ्याच्या दोरखंडांना खूप मागणी होती, त्यासाठी बेटांवरील जहाजांची लूट करण्यास पोर्तुगीजांनी सुरुवात केली. नारळाचा काथ्या मिळविण्यासाठी पोर्तुगीज लोक काही वेळा जबरदस्तीने अमिनी बेटावर उतरत, परंतु बेटावरील लोकांनी या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना विष घालून मारले. अशा रीतीने पोर्तुगीजांच्या अतिक्रमणाचा शेवट करण्यात आला.

सर्व बेटांवरील लोकांचे इस्लामिकरण केल्यानंतरही पुढे काही वर्षे चिरक्कलच्या (छिराकल) हिंदू राजाचेच अधिराज्य या बेटांवर होते. सोळाव्या शतकाच्या मध्यात चिरक्कलच्या राजाकडून कननोरच्या अरक्कल (अली राजा) या मुस्लिम घराण्यातील राजाच्या हातात बेटांची सत्ता आली. अरक्कलची कारकीर्द खूपच जुलमी व असह्य होती. तिला कंटाळून सन १७८३मध्ये अमिनी बेटावरील काही लोक मोठ्या धैर्याने मंगलोरला टिपू सुलतानकडे गेले व अमिनी गटातील बेटांची सत्ता स्वतःकडे घेण्याची विनंती त्यांनी टिपू सुलतानला केली. टिपू सुलतानने अरक्कलच्या पत्नीशी मैत्रीपूर्ण बोलणी केली, तेव्हा विचारविनिमय होऊन अमिनी गटातील बेटांची सत्ता टिपू सुलतानकडे देण्यात आली. अशा प्रकारे बेटांची विभागणी दोन अधिराज्यांत झाली. पाच बेटे टिपू सुलतानाच्या अधिसत्तेखाली आली व उरलेली तशीच अरक्कलच्या अधिसत्तेखाली राहिली. श्रीरंगपट्टणच्या युद्धात टिपू सुलतान मारला गेल्यानंतर बेटांचा ताबा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आला. त्यावेळी बेटाचा राज्यकारभार मंगलोरहून चाले. सन १८४७मध्ये एका तीव्र चक्रीवादळाचा तडाखा ॲन्ड्रोथ बेटाला बसला. तेव्हा चिरक्कलच्या राजाने बेटावरील लोकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व त्यांना मदत देण्यासाठी ॲन्ड्रोथला जाण्याचे ठरविले. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी सर विल्यम रॉबिन्सन यानेही राजाबरोबर ॲन्ड्रोथला जाण्याचे ठरविले. ॲन्ड्रोथला गेल्यावर तेथील लोकांच्या सर्वच मागण्या पुरविणे राजाला अशक्य वाटले, तेव्हा विल्यमने कर्जाच्या स्वरूपात काही मदत राजाला देऊ केली. ही मदत पुढे चार वर्षेपर्यंत चालू ठेवली. कर्जाची रक्कम खूपच वाढली. इंग्रजांनी राजाकडे कर्ज परतफेडीची मागणी केली; परंतु परतफेड करणे राजाला अशक्य होते. तेव्हा १८५४मध्ये उरलेल्या सर्व बेटांचे प्रशासन ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आले. अशा प्रकारे सर्व बेटांवर ब्रिटिशांचे अधिराज्य आले. दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात ही बेटे घेतली म्हणून त्यांचे नाव ‘लक्षद्वीप’ पडले असे म्हटले जाते.

भूगोल
देशातील या सर्वात लहान केंद्रशासित प्रदेशाचा भूभाग कमी असला, तरी याला ४,२०० चौ. कि.मी.चे खाजणक्षेत्र, २०,००० चौ.कि.मी.चे जलक्षेत्र व सात लाख चौ.कि.मी.चे आर्थिक क्षेत्र लाभलेले आहे. या समूहातल्या कोणत्याही बेटाची समुद्रसपाटीपासूनची उंची दहा मीटरपेक्षा अधिक नाही. पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पुढील सुमारे पन्नास ते शंभर वर्षांच्या कालावधीत लक्षद्वीप बेटे पाण्याखाली बुडतील, असा अंदाज राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेने व्यक्त केला आहे. या बेटांवर कोणतीही पर्वतश्रेणी नाही किंवा बेटावरून कोणतीही नदी वाहत नाही.

हवामान
लक्षद्वीप बेटांवरील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६० सेंमी. असून दोन्हीही मॉन्सूनचा पाऊस येथे पडतो. मार्च, एप्रिल व मे महिन्यांत कडक उन्हाळा जाणवतो. नारळ, केळी, अळू, शेवगा, विलायती फणस, फणस व रानटी बदाम ह्या वनस्पती या प्रदेशात आढळतात. पुळणींच्या जवळ थॅसिआ हेंप्रिचीन व साइमॉड्सीए आयसोएटिफोलिया असे दोन भिन्न प्रकारांचे सागर गवत आढळते. सागरामुळे होणारे क्षरण व पुळणींवर होणारे गाळाचे संचयन यांवर या गवतामुळे मर्यादा घातल्या गेल्या आहेत. लक्षद्वीपमध्ये सागरी प्राणिजीवन समृद्ध आहे. भूभागावर गुरेढोरे व पाळीव खाद्यपक्षी आढळतात. सामान्यपणे आढळणारे थराथसी (स्टर्ना फुस्काटा) व कारिफेटू (ॲन्वहस स्टॉलिड्स) हे समुद्रपक्षी आहेत. हे बेट पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

अर्थतंत्र
कवारत्ती
ही लक्षद्वीपची राजधानी असून येथे सर्व शासकीय कार्यालये आहेत. याच बेटावर मत्स्यालय व जलजीवालय आहे. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या विकासास लक्षद्वीपमध्ये खूप वाव आहे; परंतु भारताच्या मुख्य भूमीवरून लक्षद्वीपला जाण्यासाठी पूर्वी असलेल्या कडक निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसायाचा विशेष विकास झालेला नव्हता; तथापि वरील निर्बंध थोड्या प्रमाणात सौम्य करण्यात आल्यामुळे लक्षद्वीपला जाणाऱ्या स्थानिक तसेच परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास चालना मिळालेली आहे. पर्यटकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सन १९८७-८८मध्ये ३१६ परदेशी पर्यटकांनी तसेच भारताच्या मुख्य भूमीवरील १,६३० पर्यटकांनी लक्षद्वीप बेटांना भेट दिली. खारकच्छच्या उथळ व नितळ पाण्यात वाढणारे प्रवाळ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. अगत्ती बेटावर धावपट्टी तयार करण्यात आली असून एप्रिल १९९८पासून भारताची मुख्य भूमी व अगत्ती यांदरम्यान वायुदूतसेवा कार्यान्वित झाली आहे. बंगारम बेटावर मनुष्यवस्ती नसली, तरी तेथे वेगवेगळ्या सुविधा पुरवून पर्यटन केंद्र म्हणून त्याचा विकास करण्यात आला आहे.

प्रमुख शहरे
कवरत्ती हे लक्षद्वीपमधील एकमात्र मोठे शहर आहे.

भारतीय बेटे

भारतीय बेटे
भारतीय बेटे
भारतीय बेटे

मुख्य भूमीपासून अलग असलेली बेटे ही देशाच्या प्राकृतिक रचनेचाच एक भाग आहेत.
अ) अरबी समुद्रातील बेटे (लक्षद्वीप, मिनिकॉय व अमिनीदिवी बेटे)
लक्षद्वीप, मिनिकॉय व अमिनीदिवी बेटे ही प्रवाळांच्या संचयनातून निर्माण झालेली बेटे आहेत. लक्षद्वीप, मालदीव व छागोस द्वीपसमूह ही अरबी समुद्रातील बेटे म्हणजे जलमग्न पर्वतीय रांगेचे अतिउत्तरेकडील भाग आहेत. 'लक्षद्वीप' याचा शब्दशः अर्थ ‘एक लाख बेटे' असा असला तरी प्रत्यक्षात अरबी समुद्रातील या द्वीपसमूहात केवळ ३६ बेटांचा किंवा शैलभित्तीचा समूह आढळतो.
अरबी समुद्रात ज्वालामुखी पर्वतांच्या शिखरांभोवती कीटकांच्या संचयनामुळे निर्मिती झालेल्या बेटांना प्रवाळ बेटे म्हणतात. लक्षद्वीप बेटे ही या बेटांचाच भाग असल्याने ती ज्वालामुखी निर्मित बेटे आहेत, असे मानले जाते. येथे डोंगर अथवा नदी आढळत नाही. लक्षद्वीप बेटसमूहात मिनीकॉय, कावरती, लखदीव, अमिनी, किलतान, कादमत इत्यादी बेटांचा समावेश होतो. लक्षद्वीप बेटांचे क्षेत्रफळ ३२ चौ. किमी असून तो भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे.
लक्षद्वीपमधील एकमेव विमानतळ ‘अगाती विमानतळ' हा मुख्यभूमीवर केरळमधील कोची या शहरास जोडला गेला आहे. लक्षद्वीप परिसरात स्कूबा डायव्हिंग, विंडसर्किंग, वॉटरस्किइंग इत्यादी जलक्रीडांच्या माध्यमातून हा परिसर पर्यटकांचे आकर्षणस्थान बनविण्यात आला आहे. कॅनेनोर बेटे व अमीनीदिवी बेटे ही लक्षद्वीप बेटांचेच भाग आहेत.
ब) बंगालच्या उपसागरातील बेटे (अंदमान-निकोबार बेटे)
बंगालच्या उपसागरातील बेटे ही समुद्रात बुडालेल्या 'आव्हाकानयोमा' या पर्वताची शिखरे आहेत. उदा. अंदमान आणि निकोबार बेटसमूह (जगातील सर्वांत मोठा बेटसमूह) ।
अंदमान-निकोबार बेटसमूहात ५७२ बेटे असून यापैकी ३४ बेटांवर मानवी वस्ती आहे. - अंदमान बेटसमूहात लहानमोठी सुमारे ३०४ बेटे आहेत तर निकोबार बेटसमूहात सुमारे २२ बेटे आढळतात. (काही संदर्भ ग्रंथांत अंदमान बेटसमूहात २०३ बेट तर निकोबार बेटसमूहात १९ बेटे असा उल्लेख आढळतो.) अंदमान बेटे निकोबार बेटांपासून १०° चॅनेल'द्वारा विभागली गेली आहेत.
अंदमान बेटाचे मोठे अंदमान व लहान अंदमान असे दोन भाग आहेत. मोठे अंदमानचे उत्तर, मध्य व दक्षिण अंदमान असे भाग आहेत.
दहा अक्षांश खाडीच्या दक्षिणेकडील निकोबार हा २२ बेटांचा समूह असून त्यातील १० बेटांवर मानवी वस्ती आहे. अंदमान-निकोबारची राजधानी असलेले पोर्ट ब्लेअर मुख्य भूमीशी चेन्नई, विशाखापट्टणम व कोलकाता या शहरांना जोडलेले आहे.
अंदमान-निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथे 'वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ' हा एकमेव विमानतळ आहे. अंदमान-निकोबारमध्ये लक्षद्वीपच्या तुलनेत पर्यटन क्षेत्र पोर्ट ब्लेअर व त्याच्या जवळच्या काही बेटांपुरतेच मर्यादित आहे, कारण या बेटसमूहातील कमी होत चाललेल्या आदिवासी जमातींना संरक्षण देणे हे सरकारने मुख्य ध्येय मानले आहे. अंदमान बेटसमूहात प्रवाळ बेटे आढळत नाहीत.
भारतातील अन्य बेटे :
भारतात समुद्रातील सुमारे १३८२ बेटे आहेत. (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स, २२ सप्टेंबर २०१६) .
बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर 'अवसादी बेटे' आहेत.
कच्छच्या आखातात झालरीसदृश्य प्रवाळांच्या शैलभित्तींच्या स्वरूपातील बेटे आहेत.
कोकण व मलबार किनाऱ्यालगत छोटी बेटे आढळतात.
न्यू-मुरे : हे बंगालच्या उपसागरातील बेट (हरिभंगा नदीलगत) भारताच्या मालकीचे आहे. या बेटावरून भारत व बांगला देश या राष्ट्रांमध्ये वाद सुरू आहे.
Barrier Island : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर वाळूच्या संचयनाने श्रीहरिकोटा हे Barrier Island तयार झाले आहे.

____________________________

भारतीय बेटे (Indian Islands) : Mpsc Notes

भारतीय बेटे (Indian Islands)

भारतीय बेटे (Indian Islands)

– भारतीय सागरी बेटात एकूण ५९९ बेटे आहेत, यापैकी अंदमान आणि निकोबार बेटसमूहात ५७२ बेटे आहेत तर लक्षद्वीप बेटसमूहात २७ बेटे आहेत. -देशाच्या मुख्य भूमीपासून ही बेटे वेगळी असली तरी ती देशाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे. समुद्रातील स्थानानुसार भारतीय बेटांची विभागणी अरबी समुद्रातील बेटे व बंगालच्या उपसागरातील बेटे अशी केली जाते.

१) अरबी समुद्रातील बेटेलक्षद्वीप बेट समूह

– अरबी समुद्रातील ज्वालामुखी पर्वताच्या शिखराभोवती प्रवाळ कीटकांचे संचयन होऊन या बेटाची निर्मिती झाली .म्हणून याना प्रवाळ बेटे असे म्हणतात .


– लक्षद्वीप बेटसमूहात फक्त २७ बेटे आहेत. त्यापैकी फक्त ११ बेटांवर मनुष्य वस्ती आहे.

– ही बेटे ८” उत्तर अक्षवृत्त ते १२२१’ उत्तर अक्षवृत्त आणि ७१ ४५’ पूर्व रेखावृत्त ते ७४ रेखावृत्त दरम्याण आहे

– बेटांचा क्षेत्रफळ फक्त ३२ चौ.कि.मी. आहे. केरळ मधिल कालिकत पासून लक्षद्वीप बेट फक्त १०९ कि.मी.अंतरावर आहे.

– या बेटसमूहात उत्तरेस अमिनदीत बेट, मध्यभागी लखदीव बेट तर दक्षिणेस मिनीकॉय ही बेटे आहेत. १९७३ साली लखदीव, अमिनदीव, मिनीकॉय बेटसमूहाचे नाव लक्षद्वीप असे ठेवण्यात आले.

– ११” उत्तर अक्षवृतताच्या उत्तरेकडे अमिनदिवी बेटे, या अक्षवृतताच्या दक्षिणेकडे कन्नोर बेटे, तर अति दक्षिणेकडे मिनिकॉय बेटे आहेत.

– लक्षद्वीप बेटे ८ खाडीमुळे (8°chanmel) मालदीव बेटापासून अलग झालेली आहे.

– लक्षद्वीप या प्रवाळ बेटात = १२ प्रवाळभित्ती ( Atolls) ,३ अनुतट प्रवाली (Fringing reef),निम्मजन वाळू किनारे (Submerged bunks)

– लक्षद्वीप बेटात मिनिकॉय बेट सर्वात मोठे असून त्याचे क्षेत्रफळ ४.५३ चौ.कि.मी. आहे. तर सर्वात छोटे बित्रा बेट आहे.

– लक्षद्वीप बेटांची उंची समुद्रसपाटीपासून ५ मीटरपेक्षा कमी आहे. या बेटावर पर्वतश्रेणी किंवा नदी नाही. पृथ्वीचे तापमान सतत वाढत असल्यामुळे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पुढील सुमारे ५० ते १०० वर्षाच्या कालावधीत लक्षद्वीप बेटे पाण्याखाली बुडतील असा अंदाज राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेने व्यक्त केला आहे.

– अनुतट प्रणाली (Fringing Reef) : खंडाच्या किनाऱ्याला लागून समुद्रभागात या प्रकारचे प्रवाळ खडक आढळतात, यांना अनुतट प्रणाली म्हणतात. – प्रणालभित्ती / वलयाकार प्रवाळ खडक (Atols) : समुद्राच्या तळभागावर समुद्रातील प्रवाळ कीटकांच्या अवशिष्ट भागापासून वलायाकार प्रवाळ खडकांची निर्मित होते. यांचा आकार पसरट बशीसारखा असतो.

२) बंगालच्या उपसागरातील बेटे (अंदमान व निकोबार बेटे)

– ही बेटे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने अराकन योमा/राखीन योमा या समुद्रात बुडालेल्या पर्वतरांगांची पाण्यावर दिसणारी शिखरे आहेत, या बेट समुहांचे दोन गट रिची द्वीपसमूह (Ritchic’s Archipelago) आणि लॅबिरिंथ बेटे (Labyrinth Islands)

– याचा अक्षांश विसतार ६ ४५’ उत्तर अक्षवृत्त ते १३.४५’ उत्तर अक्षवृत्त आणि रेखांश विस्तार ९२ १० पूर्व रेखावृत्त ते ९४१५’ पूर्व रेखावृत्त आहे.

– अंदमान आणि निकोबार बेट समूह ऐकमेकापासून १० खाडी पासून अलग झालेले आहेत.

– एकूण क्षेत्रफळ ८२४९ ची.कि.मी. आहे, एकूण बेटांची संख्या ५७२ आहे; फक्त ३८ बेटावर मानवी वस्ती आहे. भारताच्या मुख्यभूमीषासून अंतर, कोलकत्यापासून १२५५, कि.मी. तर चेन्नाईपासून ११९० कि.मी. आहे.

– अंदमान बेटसमूह : याचे क्षेत्रफळ सुमारे ६५९६ चौ.कि.मी. अंदमान बेटसमूहाची पुढील गटात विभागणी केली जाते.

१) मोठे अंदमान

२) छोटे अंदमान

– मोठे अंदमान समुहात – उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान बाराटांग, रटलॅंड हे बेटे आहेत. उत्तर अंदमान बेटेत अंदमान निकोबार बेट समूहातील सर्वात उंच शिखर सँडल शिखर आहे.

– पोर्ट ब्लेअर Port Blair राजधानी दक्षिण अंदमान वर आहे.

– मोठे अंदमान आणि छोटे अंदमान दरम्यान डकन मार्ग आहे. अंदमानापासून पूर्वेकडे ८० कि.मी. अंतरात बरेन आणि नार्कीडम ही दोन ज्वालामुखी बेटे आहे.या बेट समूहामध्ये प्रमुख बाळूचा खडक, चुनखडी आणि शेल आहे.

– निकोबार बेटसमूह : एकूण क्षेत्रफळ १६५३ चौ.कि.मी.

– निकोबार बेटे प्रामुख्याने प्रवाळ खडकापासून बनलेले आहे.

– निकोबार बेटात कार निकोबार, छोटे निकोबार, मोठे निकोबार, नानकवरी, कोमोती, काचाल इ. बेटे आहे.

– मोठे निकोबार हे सर्वात मोठे असून ते सर्वात दक्षिणेला आहे, भारताचे सर्वात दक्षिण टोक इंदिरा पाईंट (पिगमॅलिय पाईंट) या बेटावर आहे.

३) अपतट बेटे offshore islands)

– भारतात अनेक अपतट बेटे आहेत.

पश्चिम किनारपट्टी लगत :

१) कच्छ-वैदा, नोरा, प्रितन २) काठेवाड-पिरम ३) नर्मदा-तापी मुख – अलिया बेट ४) महाराष्ट्र-करंजा, घारापुरी, कासा ५) मंगळूर-सेंटमेरी, भटकळ, पीजनलॉक ६) गोवा अंजीदीव

पूर्व किनारपट्टी लगत :

१) मन्नारचे अखात-पांबन, क्रोकोडाइल २) आंध्र प्रदेश – श्रीहरिकोटा Noto ३) महानदी मुख-व्हीलर, शॉर्ट ४) गंगा त्रिभूज प्रदेश – न्यू मूर, गंगासागर, सागर.

सुभाष चन्द्र बोस माहिती

सुभाष चन्द्र बोस माहिती –

सुभाषचंद्र बोस, ज्यांना नेताजी म्हणून ओळखले जाते, हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी आणि महान नेते होते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी जपानच्या पाठिंब्याने आझाद हिंद फौजची स्थापना केली.

त्यांनी दिलेला जय हिंदचा नारा हा भारताचा राष्ट्रीय घोषवाक्य ठरला आहे. “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा” हे त्यांचे भाषणही त्यावेळी खूप लोकप्रिय होते.

काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की नेताजींनी जपान आणि जर्मनीकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ब्रिटीश सरकारने त्यांच्या हेरांना १९४१ मध्ये त्यांना संपवण्याचे आदेश दिले.

५ जुलै १९४३ रोजी नेताजींनी सिंगापूरच्या टाऊन हॉलसमोर सैन्याला “सुप्रीम कमांडर” म्हणून संबोधित केले, “दिल्ली चलो!” घोषणा दिली आणि इम्फाल आणि कोहिमासह जपानच्या सैन्यासमवेत ब्रिटीश आणि राष्ट्रकुल सैन्याने एकत्रितपणे बर्मामध्ये जोरदार मोर्चा काढला.

१९४४ मध्ये आझाद हिंद फौजने पुन्हा इंग्रजांवर हल्ला केला आणि काही भारतीय प्रांत ब्रिटिशांपासून मुक्त केले.

४ एप्रिल १९४४ ते २२ जून १९४४ या काळात कोहिमाची लढाई एक भयंकर लढाई होती. या युद्धात जपानी सैन्याला माघार घ्यावी लागली आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरला.

६ जुलै १९४४ रोजी त्यांनी रंगून रेडिओ स्टेशन वरून महात्मा गांधींकडे एक प्रसारण जाहीर केले ज्यामध्ये त्यांनी या निर्णायक युद्धामध्ये विजयाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागितला.

१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.

  सुभाष चन्द्र बोस यांची थोडक्यात माहिती
पूर्ण नावसुभाष चन्द्र बोस
जन्म२३ जानेवारी १८९७ रोजी जन्म
जन्मस्थानओडिशा विभाग कटक, बंगाल प्रेसीडेंसी, ब्रिटिश भारत
वडीलजानकीनाथ
आईप्रभावती
पत्नीएमिली शेंकल
अपत्येअनिता बोस फफ
नातेवाईकशरतचंद्र बोस भाई
शिशिरकुमार बोस भाचा
चळवळभारतीय स्वातंत्र्यलढा
संघटनाअखिल भारतीय काँग्रेस,
फॉरवर्ड ब्लॉक,
आझाद हिंद फौज,
राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय कांग्रेस
राष्ट्रीयत्वभारतीय
धर्महिंदू
भाषाहिंदी, इंग्लिश,
शिक्षणबी.ए.
कलकत्ता विद्यापीठ
आरंभिक जीवन आणि कुटुंब – Netaji Subhash Chandra Bose life in Marathi
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिशाच्या कटक शहरात हिंदू कायस्थ कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते.

जानकीनाथ बोस कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते. आधी ते सरकारी वकील होते पण नंतर त्यांनी खासगी प्रॅक्टिस सुरू केली.

कटकच्या राजशाहीमध्ये त्यांनी बराच काळ काम केले आणि बंगाल विधानसभेचे सदस्यही होते.

ब्रिटिश सरकारने त्यांना रायबहादूर ही पदवी दिली. प्रभावती देवीच्या वडिलांचे नाव गंगनारायण दत्त होते.

दत्त कुटुंब हा कोलकाताचा कुलीन कुटुंब मानला जात असे. प्रभावती आणि जानकीनाथ बोस यांना एकूण 14 मुले होती ज्यात 6 मुली आणि 8 मुले होती.

सुभाष त्यांचा नववा मुलगा होता. सुभाष यांना त्याच्या सर्व भावांमध्ये शरदचंद्र सर्वाधिक आवडत होते.

शरद बाबू प्रभावती आणि जानकीनाथ यांचा दुसरा मुलगा होता. सुभाष त्याला मेजदा म्हणत असे. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.

सुभाषचंद्र बोस जीवन परिचय (Subhash chandra bose Biodata)


नावसुभाषचंद्र जानकीनाथ बोसजन्म23 जानेवारी 1897जन्मस्थानकटक, ओरिसा राज्य, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारतवडिलांचे नावजानकीनाथ बोसआईचे नावप्रभावती देवीजोडीदाराचे नावएमिली शेनक्लेमुले (मुलीचे नाव)अनिता बोस फाफशिक्षण1909 मध्ये बाप्टिस्ट मिशनची स्थापना झाल्यानंतर

रेव्हेनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये शिक्षण घेतले.

1913 मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला

त्यांनी प्रेसिडेंसी विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर

जेथे त्याने अभ्यास केलासंघटनाआझाद हिंद फौज,

ऑल इंडिया नॅशनल ब्लॉक फॉरवर्ड,

स्वतंत्र भारत सरकारचे हंगामी सरकारमृत्यूची18 ऑगस्ट 1945

सुभाषचंद्र बोस (निबंध) माहिती (Subhash Chandra Bose (Essay) Information)


काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की नेताजींनी जपान आणि जर्मनीकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा 1941 मध्ये ब्रिटीश सरकारने आपल्या हेरांना तेथून दूर करण्याचा आदेश दिला.


5 जुलै 1943 रोजी नेताजींनी सिंगापूरच्या टाऊन हॉलसमोर सैन्याला ‘सुप्रीम कमांडर’ म्हणून संबोधित केले, “दिल्लीत या!” आणि जपानी सैन्याने एकत्रितपणे ब्रह्मदेशासह इम्फाल आणि कोहिमा येथे ब्रिटीश आणि राष्ट्रकुल सैन्यातून जोरदार आघाडी घेतली.


21 ऑक्टोबर 1943 रोजी सुभाष बोस यांनी आझाद हिंद फौजचा सर्वोच्च कमांडर म्हणून स्वतंत्र भारतातील तात्पुरते सरकार स्थापन केले, ज्याला जर्मनी, जपान, फिलिपिन्स, कोरिया, चीन, इटली, मंचूकुओ आणि आयर्लँडसह 11 देशांच्या सरकारांनी मान्यता दिली. या अस्थायी सरकारला जपानने अंदमान आणि निकोबार बेटे दिले. सुभाष त्या बेटांवर जाऊन त्यांचे नाव बदलले.


1944 मध्ये आझाद हिंद फौजने पुन्हा इंग्रजांवर हल्ला केला व काही भारतीय प्रांत ब्रिटिशांपासून मुक्त केले. कोहिमाची लढाई 4 एप्रिल 1944 ते 22 जून 1944 या काळात लढाईसाठी भयंकर लढाई होती. या युद्धात जपानी सैन्याला माघार घ्यावी लागली आणि ते एक निर्णायक बिंदू सिद्ध झाले.


6 जुलै 1944 रोजी त्यांनी रंगून रेडिओ स्टेशनवरून महात्मा गांधींकडे एक प्रसारण केले ज्यामध्ये त्यांनी या निर्णायक लढाईत विजयाच्या शुभेच्छा आणि शुभेच्छा मागितल्या.


नेताजींच्या मृत्यूबद्दल अजूनही वाद आहे. त्यांचा शहीद दिन प्रत्येक वर्षी जपानमध्ये 18 ऑगस्ट रोजी साजरा केला जात असताना, सुभाष 1945 मध्ये मरण पावला नाही असे त्यांचे कुटुंबिय अजूनही मानतात. त्यानंतर ते रशियामध्ये नजरकैदेत होते. जर तसे नसेल तर भारत सरकारने अद्याप त्यांच्या मृत्यूशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक का केली नाहीत?


16 जानेवारी 2014 कोलकाता हायकोर्टाने नेताजींच्या बेपत्ता होण्या संदर्भातील गुप्तचरांची कागदपत्रे अमान्य करण्याच्या उद्देशाने जनहित याचिका ऐकण्यासाठी विशेष पीठ तयार करण्याचे आदेश दिले.


आझाद हिंद सरकारची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, इतिहासात प्रथमच, 2018 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. (Subhash chandra bose information in Marathi) 23 जानेवारी 2021 रोजी नेताजींच्या 12 व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने ते परकराम दिवा म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.


सुभाषचंद्र बोस जन्म (Subhash Chandra Bose was born)


त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसाच्या कटक शहरात झाला होता. त्यांचे वडील जानकी नाथ बोस एक प्रख्यात वकील होते. त्यांची आई प्रभावती देवी सती आणि एक धार्मिक स्त्री होती. प्रभावती आणि जानकी नाथ यांना 14 मुले, सहा मुली आणि आठ मुलगे होते. त्यापैकी सुभाष नववा होता. सुभाष लहानपणापासूनच अभ्यासाचे आश्वासन देत होता.


दहावीच्या परीक्षेत त्याने प्रथम क्रमांक मिळविला होता आणि पदवीपर्यंतही प्रथम आला होता. कलकत्ता येथील स्कॉटिश चर्च कॉलेजमधून तत्त्वज्ञान विषयात त्यांनी पदवी संपादन केली. त्याच वेळी तो सैन्यात भरती होता. त्याने सैन्यात भरती होण्याचा प्रयत्नही केला परंतु दृष्टीक्षेपामुळे तो अपात्र ठरला. ते स्वामी विवेकानंदांचे अनुयायी होते. आपल्या कुटूंबाच्या इच्छेनुसार 1919 मध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या तयारीसाठी इंग्लंडमध्ये शिकण्यासाठी गेले.


सुभाषचंद्र बोस शिक्षण (Subhash Chandra Bose Education)


कटक येथील प्रोटेस्टंट स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर 1909 मध्ये ते रेव्हेनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये दाखल झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य बेनिमाधव दास यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुभाषच्या मनावर चांगला परिणाम झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी सुभाष यांनी विवेकानंद साहित्याचा संपूर्ण अभ्यास पूर्ण केला होता. 1915  मध्ये ते आजारी असूनही दुसऱ्या वर्गात इंटरमीडिएटची परीक्षा उत्तीर्ण झाले.


1916 मध्ये जेव्हा ते तत्त्वज्ञान मध्ये बीएचे विद्यार्थी होते तेव्हा प्रेसिडेंसी कॉलेजमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील काही विषयांवरुन भांडण चालू होते, तेव्हा सुभाष यांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व घेतले आणि त्यासाठी त्यांना प्रेसिडेंसी कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. एक वर्ष आणि परीक्षा दिल्यानंतर. बंदीही घातली.


49 व्या बंगाल रेजिमेंटमध्ये भरतीसाठी त्यांनी परीक्षा दिली, परंतु दृष्टी कमी असल्यामुळे ते सैन्यात अपात्र ठरले. कसा तरी त्याने स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण मन फक्त सैन्यात जाण्यास विचारत होता. आपल्या मोकळ्या वेळेचा उपयोग करण्यासाठी, त्याने टेरिटोरियल आर्मीची परीक्षा दिली आणि गोंधळाच्या रूपात फोर्ट विल्यम आर्मीमध्ये दाखल झाला.


मग हे लक्षात आले की इंटरमीडिएट प्रमाणे सुभाष यांनाही बीएमध्ये कमी गुण मिळू नयेत, त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास केला आणि 1919 मध्ये प्रथम श्रेणीत बीए (ऑनर्स) परीक्षा उत्तीर्ण झाली. कलकत्ता विद्यापीठात त्यांचे दुसरे स्थान होते.


वडिलांची इच्छा होती की सुभाष आयसीएस झाला पाहिजे, परंतु त्यांचे वय लक्षात घेता, त्यांना फक्त एकाच जागी ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागली. (Subhash chandra bose information in Marathi) त्याने त्याच्या वडिलांना चोवीस तास विचार करायला सांगितले जेणेकरून परीक्षा द्यावी की नाही याविषयी अंतिम निर्णय घेता येईल. काय करावे या संभ्रमात तो रात्रभर जागे राहिला.


अखेर त्याने परीक्षा घेण्याचे ठरविले आणि 15 सप्टेंबर 1919 रोजी इंग्लंडला गेले. परीक्षेच्या तयारीसाठी लंडनमधील कोणत्याही शाळेत प्रवेश न मिळाल्याने सुभाषने मानसिक व नैतिकतेच्या ट्रायपास परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी किट्स विल्यम हॉलमध्ये कसा तरी प्रवेश घेतला. विज्ञान. यामुळे त्यांच्या राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न सुटला. अलीकडेच प्रवेश घेणे ही एक निमित्त होती, खरा उद्देश आयसीएसमध्ये उत्तीर्ण होणे दर्शविणे हा होता. म्हणूनच तो 1920 मध्ये उत्तीर्ण झाला आणि गुणवत्ता यादीत चौथ्या क्रमांकावर आला.


यानंतर सुभाषने आपला मोठा भाऊ शरतचंद्र बोस यांना एक पत्र लिहिले. आणि स्वामी विवेकानंद आणि महर्षि अरबिंदो घोष यांच्या आदर्शांनी त्यांचे हृदय व मनावर कब्जा केला आहे हे त्यांचे मत जाणून घ्यायचे होते, तर मग ते इंग्रजांना गुलाम कसे बनवू शकतील? आयसीएस होत. आयसीएसचा राजीनामा देण्यासाठी 22 एप्रिल 1921 रोजी भारताचे सचिव ईएस मॉन्टॅगु यांना पत्र लिहिले.


देशबंधू चित्तरंजन दास यांना पत्र लिहिले. पण आईवडिलांकडून हे पत्र मिळताच “वडील, कुटुंबातील सदस्य किंवा इतर कोणीही आपल्या मुलाच्या या निर्णयाबद्दल अभिमान बाळगू शकतात.” सुभाष जून 1921 मध्ये मेंटल आणि नैतिक विज्ञान विषयातील ट्रायपास (ऑनर्स) पदवी घेऊन मायदेशी परतला.


नेताजींचे राजकीय जीवन (Netaji’s political life)


1927 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस तुरुंगातून बाहेर आले आणि त्यानंतर त्यांनी राजकीय कारकीर्द आधार देऊन दिली. सुभाषचंद्र बोस यांनी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीसपद मिळवले आणि ब्रिटीशांच्या तावडीतून गुलाम असलेल्या भारताला मुक्त करण्याच्या लढाईत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर काम करण्यास सुरवात केली.


सुभाषचंद्र बोस आपल्या कामांमुळे लोकांवर आपला प्रभाव सोडत होते, म्हणून 3 वर्षांनंतर त्यांची कलकत्ता महापौरपदी निवड झाली. 1930 च्या दशकाच्या मध्यभागी, नेताजींनी बेनिटो मुसोलिनीसह युरोपमध्ये प्रवास केला.


आपल्या कामांमुळे नेताजींनी काही वर्षांत लोकांमध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आणि त्याच बरोबर त्यांनी एक तरुण मन आणले, ज्यामुळे ते लोकांचे आवडते आणि युवा नेते म्हणून राष्ट्रीय नेते बनले.



Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...