०१ मार्च २०२२

आधुनिक भारताचा इतिहास


🅾भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).

🅾१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.

🅾२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.

🅾लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.

🅾लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.

🅾भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

1935 च्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली.

❇️ 1935 च्या कायद्याने प्रतांत 1919 च्या कायद्याने सुरू केलेली व्दिदल राज्य पद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिंनिधीच्या हाती सोपवली.

❇️1935 च्या कायद्याने केंद्रात व्दिदल शासन पद्धती सुरू केली.

❇️संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली.

❇️या कायद्याने जवळजवळ 14 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.

❇️1935 च्या कायद्याने केंद्रीय, राज्य व संयुक्त अशा तीन सूच्या निर्माण केल्या.
❇️भारतमंत्र्यांचे ‘इंडिया कौन्सिल’ रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली.

❇️मुस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.

❇️1935 च्या कायद्याव्दारे ब्रम्हदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला.

❇️1935 चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती, ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्रच होते- पं.जवाहरलाल नेहरू.

ईश्वरचंद्र विद्यासागर.

🅾जन्म: २६ सप्टेंबर १८२० बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी

🅾मृत्यू: २९ जुलै १८९१

🅾बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक.

🅾१८३९ साली हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे ‘विद्यासागर’ ही उपाधी लावली होती.

🅾फोर्ट विल्यम कॉलेज मध्ये संस्कृत प्राध्यापकाची नोकरी.

🅾संस्कृत महाविद्यालयात पूर्वी ब्राह्मणेतर विद्यार्थांना शिक्षण मिळत नसे. ते धोरण रद्द करून त्यांनी सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश दिला.

🅾पराशर संहितेत विधवाविवाहास मान्यता असल्याचा दाखला त्यांनी काढून दाखविला.

🅾१८५६ साली विधवाविवाहाचा अधिनियम संमत करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

🅾कुलीन ब्राह्मणवर्गातील बहुपत्‍नीकत्वाची चाल, बालविवाह,  मद्यपान इ. अनिष्ट चालींविरुद्ध त्यांनी बंगालमध्ये चळवळी केल्या.

🅾आधुनिक बंगाली गद्याचे जनक

🅾पुनर्विवाहाच्या पुष्ट्यर्थ
त्यांनी विधवाविवाह(१८५५) हा ग्रंथ लिहिला.

🅾१८७७ साली कलकत्त्यास भरलेल्या दरबारात ईश्वरचंद्र यांना इंग्‍लंडच्या राणीकडून बहुमानाची सनद मिळाली व पुढे ‘सी. आय. इ.’ ही पदवीही मिळाली.

🅾 ‘मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱ्या जीवांचाच विचार करीत असतो. माणुसकीने वागणे हाच मी माझा धर्म मानतो’, असे ते म्हणत.

🅾बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना ‘दयासागर’ म्हणूनच अधिक ओळखते.

व्हाइसरॉय लिनलिथगो

कार्यकाळ

(१९३६-१९४३)

स्टॅनलेकडून लिनलिथगोने व्हाइसरॉयपदाची सूत्रे हाती घेतली. लिनलिथगोने भारतीय कृषी राज आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य  केले होते.

  लिनलिथगो भारतीय घटनात्मक सुधारणांच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष  होता. १९३५ च्या कायदा निर्मितीत लिनलिथगोचा सहभाग होता.

   १९३५ च्या कायद्याने केंद्रीय भागाऐवजी प्रांतीय तरतुदी मान्य करुन १९३७ मध्ये निवडणुका झाल्या. काँग्रेसने आठ प्रांतांत सरकार स्थापित केले.

दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहमतीशिवाय युद्धास पाठिंब्याची व्हाइसरॉयने १९३९ मध्ये घोषणा केली.

  सदर घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय शासनाने १९३९मध्ये राजीनामे दिले. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला.

  १९४२च्या चले जाव चळवळीस दडपशाहीने बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

  सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले.  १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले.

विधानपरिषद


विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती:

घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सात घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश,जम्मू काश्मीर आणि कर्नाटक , तेलंगणा , आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.

विधानपरिषदेची रचना :
1956 च्या 7 व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी आणि 40 पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात 78 इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. 171/2 नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात त्यांची रचना पुढीलप्रमाणे आहे.

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी :
1. 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.

2. 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.

3. 1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

4. 1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

5. 1/6 राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.

सदस्यांची पात्रता :
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल :
सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष इतका असतो.

विधानपरिषदेचा कार्यकाल :
विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.

गणसंख्या : 1/10
अधिवेशन :
दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती :
विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

__________________________

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक


🅾नियंत्रक आणि महालेखाकार (कॅग) भारत लेख 148 स्थापना करून एक अधिकार आहे, भारतीय संविधानाच्या , जे ऑडिट सर्व पावत्या आणि खर्च या भारत सरकारच्या आणि राज्य सरकार , संस्था आणि अधिकारी सेवनाने यांनी आर्थिक त्या सरकार.

🅾 कॅग ही सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य ऑडिटरही आहेआणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करते, म्हणजेच कोणतीही नॉन-बँकिंग / बिगर-विमा कंपनी ज्यात केंद्र सरकारची इक्विटी हिस्सा कमीतकमी 51१ टक्के किंवा विद्यमान सरकारी कंपन्यांच्या सहाय्यक कंपन्यांचा हिस्सा आहे.

🅾 कॅगचे अहवाल संसद / विधिमंडळात मांडले जातात आणि लोकलेखा समित्यांनी (पीएसी) आणि सार्वजनिक उपक्रमांवरील समित्यांनी (सीओपीयू) विचारात घेतल्या आहेत, ज्या भारतीय संसदेत आणि राज्य विधानमंडळातील विशेष समित्या आहेत . 

🅾कॅग भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स विभागाचे प्रमुख देखील आहेत, ज्याचे कामकाज भारतीय ऑडिट आणि अकाउंट्स सर्व्हिसेसच्या अधिका by ्यांमार्फत केले जातात आणि देशभरात (०१.०3.२०२० पर्यंत), 43,576 employees कर्मचारी आहेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠नियुक्ती.💠💠

🅾नियंत्रक आणि भारत महालेखापरीक्षक नियुक्त केले राष्ट्रपती भारत  एक शिफारसीचे अनुसरण पंतप्रधान . 

🅾भेटीनंतर, त्याने / तिला राष्ट्रपतींसमोर शपथ किंवा कबुली द्यावी लागेल.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠शपथ किंवा पुष्टीकरणसंपादन.💠💠

🅾"मी, (नियुक्त केलेल्या व्यक्तीचे नाव), भारताचे नियामक आणि महालेखा परीक्षक नियुक्त केल्यावर मी देवाच्या नावाने शपथ घेतो / कायद्याने स्थापित केल्यानुसार मी भारतीय संविधानाविषयी खरा विश्वास आणि निष्ठा बाळगू शकतो," मी भारतीय सार्वभौमत्व आणि अखंडतेचे समर्थन करीन, की मी योग्य रीतीने आणि विश्वासूपणाने आणि माझ्या योग्यतेनुसार, ज्ञान व निर्णयाने माझ्या पदाचे कार्य निर्भयपणे किंवा निष्ठेने, आपुलकीने किंवा वाईट इच्छाशक्तीशिवाय करेन आणि राज्यघटनेचे समर्थन करीन. आणि कायदे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

संसदेविषयीे काही शब्दावली


1) गणपूर्ती (Quorram) :-

◆ कलम 100 अनुसार सदनाच्या बैठकी करिता गणपूर्तीची आवश्यकता असेल.

◆ लोकसभा भरण्याकरिता एकूण सदस्यसंख्येच्या 1/10 म्हणजेच 55 सदस्यांची गरज असेल तर राज्यसभा भरण्याकरिता 25 सदस्यांची गरज असेल यालाच गणपूर्ती म्हणतात.
---------------------------------------------------
2) प्रश्न काळ (Question Hour) :-

◆ याचा संबंध त्यावेळी आहे ज्याद्वारे संसद सदस्य लोक महत्त्वाच्या कोणत्याही बाबींवर मंत्री परिषदेला प्रश्न विचारतात.

◆ हा सुरुवातीचा एक तासाचा काळ असतो यामध्ये चार प्रकारचे प्रश्न विचारले जातात
---------------------------------------------------
A. तारांकित प्रश्न:–

या प्रश्नांच्या सुरवातीला * असे चिन्ह असते म्हणून त्यास तारांकित प्रश्न असे म्हणतात.

असे प्रश्न ज्यावर विचारणारा तात्काळ उत्तर मौखिक स्वरूपात मंत्री परिषदेतील सदस्यांद्वारे देण्याची अपेक्षा करीत असतो.

◆ या प्रश्नाचे उत्तरावर अनुसरून इतर प्रश्नही विचारले जाऊ शकतात. कागदावर लिहून प्रश्न विचारतात. त्वरित उत्तर द्यावे लागते.

◆ पीठासीन अधिकाऱ्यास वाटल्यास ते तारांकित प्रश्नांचे रूपांतर अतारांकित प्रश्नात करू शकतात.
---------------------------------------------------
B. अतारांकित प्रश्न:-

◆ या प्रश्नांच्या समोर * हे चिन्ह नसते.

◆ हे प्रश्न लिखित स्वरूपात विचारले जातात व याचे उत्तरही लिखित स्वरूपात द्यावे लागते.

◆ आकडेवारी, दीर्घ तपशील असणारे हे प्रश्न असतात.
---------------------------------------------------
C. अल्प सूचना प्रश्न:- 

◆ यामध्ये उत्तर देण्याकरिता दहा दिवसांची कालावधी दिली जाते.

◆ सर्वसाधारण प्रश्नांसाठी १० दिवसांची पूर्वसूचना आवश्यक असते. परंतु अल्पसुचनावधी प्रश्नांना त्यापेक्षा कमी दिवसांची सूचना दिली जाते. हे प्रश्न तातडीचे व सार्वजनिक महत्वाचे असतात.

◆ पीठासीन अधिकाऱ्यांचा व संबंधित मत्र्यांच्या पूर्वसंमतीशिवाय कोणताही सदस्य कोणत्याही मंत्र्याला प्रश्न विचारू शकत नाही. आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे अशा अर्थाची सूचना सदस्याने संबंधित सभागृहाच्या महासचिवाला द्यावी.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ ज्या दिवशी प्रश्नाचे उत्तर अपेक्षित असेल, त्या दिवसापूर्वी १० दिवसापेक्षा जास्त व २१ दिवसापेक्षा कमी अशा कालावधीत हि सूचना महासचिवांना मिळावयास हवी.
---------------------------------------------------
D. गैर सरकारी सदस्यास विचारले जाणारे प्रश्न
---------------------------------------------------
3) शून्य काळ :-

◆ संसदेच्या दोन्ही सदनामध्ये प्रश्न काळ नंतर तात्काळ असणाऱ्या वेळेस शून्य काळ असे म्हटले जाते. हा 12 वाजता सुरू होतो व 1 वाजेपर्यंत चालते व त्यावर तुरंत कार्यवाही करणारे अपेक्षित प्रश्न विचारले जातात.
---------------------------------------------------
4) स्थगन (Adjournment) :-

◆ स्थगन प्रस्ताव हे अध्यक्ष (लोकसभेचे अध्यक्ष ) महोदयांद्वारे केले जातात.

◆ याचा अर्थ सभागृह निश्चित काळासाठी बरखास्त केल्या जाते. (तास, दिवस)
---------------------------------------------------
5) स्थगन अनिश्चित काळ (Prorogation) :-

◆ हे अनिश्चित काळासाठी स्थगन राष्ट्रपतीद्वारे केले जाते जसे बजेट सेशन नंतर माॅन्सून सेशन च्यामधील दिवस.

◆ माॅन्सून सेशन संपल्यानंतर हिवाळी अधिवेशन चालू होण्याच्या पूर्वीचे दिवस
---------------------------------------------------
6) विघटन (Dissolution) :- 

◆ राज्यसभेचे विघटन कधीच होत नाही कारण राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे.

◆ लोकसभेचे विघटन केले जाते व यानंतर निवडणुका होतात.

◆ बजेटच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपती येऊन म्हणतात आता गृह पुढचे session अनिश्चित काळासाठी स्थगित झाले आहे.

पचन संस्था (Digestive System)

🚩मानवी शरीरात अन्न पचनासाठी विविध अवयव मिळून पचनसंस्था तयार झालेली आहे. खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.
🚩पचन संस्थेमध्ये अन्ननलिका (Alimentary Canal) व पाचकग्रंथी (Digestive Glands) यांचा समावेश होतो.
अन्ननलिका एक लांब, स्नायुमय नलिका असून ती मुखापासून गुदद्वारापर्यंत असते.
🚩अन्ननलिकेची लांबी 9 meter (950cm, 32 Ft.) असते.
🚩मानवी शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अन्ननलिकेचा व्यास वेगवेगळा असतो.

💥अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील भागांचा समावेश होतो.

1)मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
2)ग्रसनी (Pharynx)
3)ग्रसिका (Esophagus)
4)जठर/ आमाशय (Stomach)
5)लहान आतडे (Small Intestine)
6)मोठे आतडे (Large Intestine)
7)मलाशय (Rectum) आणि
8)गुदद्वार (Anus)
यांचा समावेश होतो.

🚩लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात.
🚩पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात.
🚩अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत.

🌷खायचा  सोडा🌷

🌸बेकिंग सोडा सामान्य घटक असलेल्या खमीर एजंटसाठी, बेकिंग पावडर पहा .

🌸सोडियम बायकार्बोनेट, ( IUPAC नाव : सोडियम हायड्रोजन कार्बोनेट ), सामान्यतः म्हणून ओळखले बेकिंग सोडा , एक आहे रासायनिक संयुग सूत्र सह ना HCO 3 . हे सोडियम केशन (ना + ) आणि बायकार्बोनेट आयनॉन (एचसीओ 3 - ) बनलेले एक मीठ आहे . 

🌸सोडियम बायकार्बोनेट एक पांढरा घन आहे जो स्फटिकासारखे आहे , परंतु बर्‍याचदा दंड पावडर म्हणून दिसून येतो. 

🌸त्यात थोडासा खारट, क्षारयुक्त चव वॉशिंग सोडा ( सोडियम कार्बोनेट ) सारखा आहे . नैसर्गिक खनिज स्वरूप नहकोलाइट आहे. 

🌸हा खनिज नायट्रॉनचा एक घटक आहे आणि बर्‍याच खनिज झ ings्यांमध्ये विरघळलेला आढळतो .

क्रायोजेनिक इंजिन - criogenic engine

🛰भूस्थिर उपग्रह

भूस्थिर म्हणजेच जिओन्सिक्रोनस उपग्रह हे पृथ्वीच्या भूमध्य रेषेवर स्थित असतात व ते पृथ्वीच्या गतीनुसार पृथ्वीसोबत फिरत असतात. हे भूस्थिर उपग्रह आपल्या नावाप्रमाणे पृथ्वीच्या कक्षेत एकाच स्थानावर स्थिर असतात. भारताने याच भूस्थिर उपग्रह प्रक्षेपणात स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली. क्रायोजेनिक इंजिनाच्या माध्यमातून आता भारताने उपग्रह प्रक्षेपणात आपला झेंडा पृथ्वीबाहेर फडकवला आहे. यामुळे भारत क्रायोजेनिक क्लबचा सदस्य झाला.

🚀क्रायोजेनिक इंजिन

जीएसएलव्हीच्या तिसऱ्या टप्प्यात क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात येते. भौतिकशास्त्रात अत्याधिक कमी तापमान निर्माण करणे व त्याचा वापर करणे यास क्रायोजनिक्स म्हणतात. जीएसएलव्हीच्या टप्प्यात अवजड उपग्रहाला पुढे ढकलण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. त्यामुळे कमी इंधनाचा वापर करून उपग्रहाला सुमारे ८०० सेकंदापर्यंत ढकलत नेहण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात येतो. क्रायोजेनिक इंजिनमध्ये इंधन म्हणून उणे २५३ सेल्सिअस द्रवरूप हायड्रोजन तर ऑक्सिडायझर म्हणून उणे १८३ सेल्सिअस द्रवरूप ऑक्सिजन वापरले जाते. इंजिनसाठी लागणारे इंधन अतिशीत आहे. त्यामुळेच त्याला 'क्रायोजेनिक इंजिन' म्हणतात.

🚀क्रायोजेनिक क्लब

जगातील फारच मोजक्या देशांकडे क्रायोजेनिक इंजिनासारखे यान आहे. भारताने या क्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटवून अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स व चीन या देशांच्या पंक्तीमध्ये आपला समावेश पक्का केला.

⛽️चांगले इंधन

हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे चांगले इंधन वापरण्यात येत असल्यामुळे यापासून निर्माण होणारी ऊर्जा ही खूपच चांगली ऊर्जा असते. त्यामुळे रॉकेट उड्डान अति वेगाने करणे शक्य होते. भारताच्या इंजिनाचे नाव CE-२० असून, हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीने त्याचे उत्पादन केले आहे. त्याची चाचणी 'इस्रो'चे ज्वलन सुविधा केंद्र महेंद्रगिरी येथे केली जाते.

🔹फायदे

क्रायोजेनिक इंजिनच्या वापरामुळे फार मोठ्या प्रमाणात भारताची आर्थिक बचत होणार आहे. पूर्वी भारताचे उपग्रह युरोपीय अंतराळ संस्थेच्या 'एरिअन' या प्रक्षेपकांच्या माध्यमातून प्रक्षेपित केले जात होते. भारताचा आता तो खर्च वाचणार आहे. क्रायोजेनिक इंजिनच्या माध्यमातून जड उपग्रहाचे प्रक्षेपण करणेही आता सोपे होणार आहे. मार्क-३सारखी भारताची पहिली मानवी अवकाश मोहीम साकारणे शक्य होणार आहे. ही मानवी मोहिम २०२० ते २०२५ सालापर्यंत शक्य आहे. क्रायोजेनिक इंजिनमुळे जीएसएलव्हीच्या प्रक्षेपणात प्रगती झाल्याचे दिसून येते. भारताचे जी-सॅट ६, जीएसएलव्ही-डी-५ने यशस्वी प्रक्षेपण करून दाखवले.

🚀क्रायोजेनिक पुढची हॉटस्पॉट

एखाद्या प्रयोगशाळेत क्रायोजेनिक इंजिनासाठी लागणारे कमी तापमान तयार करणे आणि द्रवरूप वायूत साठवणे शक्य असले तरी उपग्रहात त्याचा वापर करणे अवघड जाते. हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूंना वेगवेगळ्या टाक्यामध्ये साठवून नंतर त्यांना एका पाइपद्वारे विशिष्ट कम्बशन चेंबरमध्ये आणणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे.

रेणुभार, आम्ले आम्लारी व क्षार रेणुभार

*✍🏻 मूलद्रव्ये आणि संयुगाचा रेनुभार त्याच्या रेणुसुत्रावरून त्यांच्या रेणुसुत्रावरून समजते ऑक्सिजनचे रेणूसुत्र O२ आहे. आणि अणुभार १६ आहे म्हणून त्याचा रेणुभार ३२ आहे. H२O =१८ H =२ व O =१६, =१८

* ✍🏻संयुगाच्या एका रेणूचा तुलनात्मक वास्तुमानाला संयुगाचा रेणुभार म्हणतात.

आम्ले आम्लारी व क्षार

*✍🏻 साबण तयार करण्यासाठी कॉस्टिक सोड्याचा वापर केला जातो.

* ✍🏻हायड्रोक्लोरिक आम्लात निळा लिटमस लाल होतो.

* ✍🏻सोडीअम हायड्रोक्साईड मध्ये लाल लिटमस निळा होतो व निळा निळाच राहतो.

* ✍🏻वरील आम्ल पदार्थात लिटमस रंग लाल रंग लालच राहतो. व आम्लारीत त्याचा रंग निळा राहतो.  पदार्थात रंगाबद्दल घडवून येत नाही पदार्थ उदासीन पदार्थ होय.

* ✍🏻सामान्यता अधातुंची ऑक्साइडे आम्लधर्मी धातूंची ऑक्साइडे अम्लारीधर्मी असतात.

*✍🏻 सल्फुरिक, नायट्रिक, ही आम्ले दाहक आणि उष्ण असतात.

* ✍🏻कार्बोनिक आम्ल सौम्य आम्ल असतात. सोडीअम हे पाण्यात विरघळतात त्यांना अल्कली म्हणतात.

* ✍🏻लिंबू, संत्रा, मोसंबी, यांच्यात सायट्रिक आम्ल असते.

*✍🏻 प्रसाधन गृहात स्वच्छतेसाठी हायड्रोक्लोरिक आम्ल उपयोगी असते.

*✍🏻 सोने चांदी यांना स्वच्छ करण्यासाठी HCL चा वापर करतात.

* ✍🏻लोणचे व मुरंबा साठवणीच्या पदार्थात असेटिक आणि बेंझॉंइक आम्ल वापरतात

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...