२२ ऑक्टोबर २०२१

चेतासंबंधीचे रोग

● Huntingtons Chorea: मेंदूचा रोग
- कारण: जनुकीय बदल
- सरासरी वयाच्या तिशीनंतर हा रोग होतो.
- लक्षणे: अनैच्छिक नाचणे, अतिविसराळूपणा

● Alzheimers Disease
- कारण: मेंदुमध्ये विशिष्ट प्रकारच्या ताऊ प्रथिनांच्या संचयामुळे
- लक्षणे: स्मृतीभंश, संभ्रमावस्था, वागणूकीतील बदल

● Parkinson's Disease
- कारण: चेतापेशींच्या र्हासामुळे मेंदूतील चेतापारेषकांची (डोपामीन) होणारी कमतरता
- लक्षणे: स्नायूंचा कंप, हालचालींचा कमी समन्वय, चेहर्यावरील हवभावांचा र्हास.

● Meningitis
- कारण: मेनिंगोकोक्कस आणि स्ट्रेप्टोकोक्क या जीवाणूमुळे
- लक्षणे: प्रमस्तिक आवरणांचा दाह

पचन संस्था (Digestive System)

मानवी शरीरात अन्न पचनासाठी विविध अवयव मिळून पचनसंस्था तयार झालेली आहे. खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.
पचन संस्थेमध्ये अन्ननलिका (Alimentary Canal) व पाचकग्रंथी (Digestive Glands) यांचा समावेश होतो.
अन्ननलिका एक लांब, स्नायुमय नलिका असून ती मुखापासून गुदद्वारापर्यंत असते.
अन्ननलिकेची लांबी 9 meter (950cm, 32 Ft.) असते.
मानवी शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अन्ननलिकेचा व्यास वेगवेगळा असतो.

🔳अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील भागांचा समावेश होतो.

▫️मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)

▫️ग्रसनी (Pharynx)

▫️ग्रसिका (Esophagus)

▫️जठर/ आमाशय (Stomach)

▫️लहान आतडे (Small Intestine)

▫️मोठे आतडे (Large Intestine)

▫️मलाशय (Rectum) आणि

▫️गुदद्वार (Anus) यांचा समावेश होतो.

◾️लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात.

◾️पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात.

◾️अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचनेंद्रिये वेगळे आहे आणि विशिष्ट टप्प्यावरील ती ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात.

◾️मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
 
◾️तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते तोंडातील अन्न दातांनी चावले जाते. त्याचे बारीक बारीक तुकडे होतात.
आपण जे अन्न खातो ते जटील स्वरूपात असते. त्या अन्नाचे अमायलेज/ टायलिन या जैविक उत्प्रेरकांच्या म्हणजेच विकरांच्या साहाय्याने सध्या पदार्थांमध्ये रूपांतर केले जाते. त्यामुळेच पचनाची सुरुवात मुखापासून होते असे म्हणतात.

◾️ग्रासिका  (Pharynx)

अन्ननलिकेचे व श्वसननलिकेचे तोंड म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते.
श्वसननलिकेच्या तोंडावर एपीग्लॉटिस (Epiglottus) नावाचा पडदा असतो त्यामुळे गिळलेले अन्न श्वसननलिकेत.

◾️ जठर/अमाशय (Stomach)

जठरातील जाठरग्रंथींमधून जाठररस स्रवताे. जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते.
हायड्रोक्लोरिक आम्ल (HCL), पेप्सिन(Pepsin), म्यूकस (श्लेष्म)(Mucous) हे जाठररसाचे तीन घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते.
जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले

◾️लहान आतडे (Small Intestine)

लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब (20-25 फूट) असते व तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे.
अन्नाचे मुख्यत्वे पचन इथे होते.

जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण इथे होते.
लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.

लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला आद्यांत्र (Duodenum) असे म्हणतात. आद्यांत्र्यामध्ये स्वादुपिंड रस (Pancreatic Juice) आणि पित्तरस (Bile) मिसळले जातात.

◾️स्वादुपिंड रस (Pancreatic Juice)

स्वादुपिंडातून स्त्रवतो व तो आद्यांत्रात येऊन मिसळतो. यामध्ये Trypsin, Amylase व Lypase अशी ३ विकरे असतात.

◾️पित्तरस (Bile)◾️

पित्तरस यकृतातून स्त्रवतो व तो आद्यांत्रात येऊन मिळतो.

स्निग्ध पदार्थांचे Emulsification घडवून आणण्यात पित्तरस (Bile Juice) मदत करतो.

लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब (20-25 फूट) असते व तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे.

अन्नाचे मुख्यत्वे पचन इथे होते.
जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण इथे होते.
लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.

लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला आद्यांत्र (Duodenum) असे . आद्यांत्र्यामध्ये स्वादुपिंड रस (Pancreatic Juice) आणि पित्तरस (Bile) मिसळले जातात.


◾️मोठे आतडे (Large Intestine)◾️

 मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते.

येथे फक्त पाण्याचे शोषण होते.

मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला ‘ॲपेंडिक्स’ हा छोटा भाग जोडलेला असतो.

लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो.

पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात.

◾️यकृत

यकृत ही शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी आहे.
यकृताला भरपूर रक्तपुरवठा हाेत असतो.
यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे.
यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो.
हा पित्तरस लहान आतड्यात पाेहोचला, की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते.
स्निग्धपदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरसात क्षार असतात.

विज्ञान प्रश्नसंच

1.  मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?
32
33
40
15

उत्तर : 33

 2. मानवी ‘मज्जासंस्थेचा’ अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?
न्यूरॉलॉजी
नफोललॉजी
डी.एन.ए.
यापैकी नाही

उत्तर :न्यूरॉलॉजी

 3. जीवनसत्व ‘क’ कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?
आवळा
गाजर
केळी
पेरु

उत्तर :आवळा

 4. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?



उत्तर :क

 5. हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व आवश्यक असते?



उत्तर :ड

 6. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
 डॉ. हॅन्सन
डॉ. रोनॉल्ड
 डॉ.बेरी
 डॉ. नेकेल्सन

उत्तर :डॉ. हॅन्सन

 7. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?
 1975
 1974
 1973
 1972

उत्तर :1974

 8. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?
 पायोप्सी
 सर्जरी
 डेप्सोन
 यापैकी नाही

उत्तर :पायोप्सी

 9. खालीलपैकी कोणते औषध ‘क्षयरोगासाठी’ वापरतात?
 स्ट्रेप्टोमायसिन
 पेनिसिलिन
 डेप्सोन
 ग्लोबुळिन

उत्तर :स्ट्रेप्टोमायसिन

 10. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?
 हाड
 डोळा
 पाय
 मज्जासंस्था

उत्तर :मज्जासंस्था

 11. ‘बीसीजी लस’ —– या रोगापासून बचाव करते?
 पोलिओ
 क्षयरोग
 रातअंधळेपणा
 कुष्ठरोग

उत्तर :क्षयरोग

 12. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?
 विल्यम हार्वे
 डॉ. एडिसन
 ख्रिश्चन बर्नार्ड
 डेव्हिडसन

उत्तर :ख्रिश्चन बर्नार्ड

 13. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हत्तीरोग संशोधन केंद्र’ आहे?
 पुणे
 वर्धा
 नागपूर
 मुंबई

उत्तर :वर्धा

 14. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले ‘माफीन’ कोणत्या झाडापासून मिळवितात?
 अफू
 गांजा
 उस
 खैर

उत्तर :अफू

 15. खालीलपैकी कोणता रोग ‘गरोदर स्त्रीला’ घातक ठरू शकतो?
 क्षयरोग
 देवी
 पोलिओ
 कावीळ

उत्तर :कावीळ

 16. रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
 क्षयरोग
 मलेरिया
 नारू
 मोतीबिंदु

उत्तर :मलेरिया

 17. मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?
 खरूज
 एक्झिमा
 वरील दोन्ही
 यापैकी नाही

उत्तर :वरील दोन्ही

 18. 98 मी. उंचीच्या मनोर्‍यावरुन खाली फेकलेला एक चेंडू किती सेकंदामध्ये खाली पडेल?
 15 सें.
 8 सें.
 10 सें.
 12 सें.

उत्तर :10 सें.

 19. समुद्रसपाठीवर पाण्याचा ‘उल्कलन’ बिंदु किती आहे?
 100° से.
 120° से.
 1000° से.
 90° से.

उत्तर :90° से.

 20. एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?
 4.2 कॅलरी
 3.4 कॅलरी
 2.4 कॅलरी
 9.0 कॅलरी

उत्तर : 4.2 कॅलरी

ज्ञानेंद्रिये (Sensory Organs):-

◆ प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ.
■ डोळे (Eyes):
◆ ८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.
◆ पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.
◆ अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.
========================

■ बुबुळ (Cornea):-
◆ नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.
◆ बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.
========================

■ दृष्टिपटल (Retina):
◆ हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.
========================

■ दृष्टीसातत्य :
◆ वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.
========================

■ दृष्टिदोष (Defects Of Vision):
◆ दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.
१) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Near-sightedness):
◆ जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते.
◆ प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.
उपाय: अंतर्गोल भिंगाचा चष्मा
========================

२) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):
◆ दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.
उपाय: बहिर्गोल भिंगाचा चष्मा.
========================

३) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):
◆ बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो.
◆ त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो.
उपाय: दंडगोलाकार भिंगाचा चष्मा.
========================

४) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):
◆ वाढत्या वयामुळे होणार दोष दूरदृष्टीतेचा एक प्रकार समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.
उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे.
========================

विज्ञान सरावप्रश्न

१) विद्युत चुंबकीय पट्ट्यापैकी मानवी डोळ्याला दिसणारा प्रकाश ...... ते ....... तरंगलांबी असणारा आहे.

   A. ३०००Å ते ७०००Å
   B. २०००Å ते ६०००Å
   C.४०००Å ते ८०००Å
   D. ३५००Å ते ७५००Å

A. ३०००Å ते ७०००Å
----------------------------------------
२) इन्फ्रा-रेड किरणांचा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो?

अ) रंग सुकवण्याच्या कामात.
ब) कोंबडीच्या पिल्लांच्या जलद वाढीसाठी.
क) स्नायू दुखी आणि सांधे दुखीवर उपाय म्हणून.
ड) टेलेव्हिजन, स्टिरीओ यांसारख्य साधनांसाठी वापरले जाणारे रिमोट कंट्रोल मध्ये.

   A. अ आणि ब
   B. केवळ ब
   C. अ, ब आणि क
   D. वरील सर्व

D. वरील सर्व
------------------------------------
३) फ्लुरोसंट लॅम्प मध्ये खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर 'फ्लोरोसन्स' ही प्रक्रिया घडवण्यासाठी होतो?

   A. इन्फ्रा-रेड किरणे
   B. अति-नील किरणे
   C. रेडीओ लहरी
   D. क्ष-किरणे

B. अति-नील किरणे
---------------------------------------
४) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

अ) विद्युत क्षेत्रामुळे किंवा चुंबकीय क्षेत्रामुळे क्ष-किरणांचे विचलन होते.
ब) एखाद्या वायुतून जात असताना क्ष-किरण त्या वायूचे आयनन करतात.

   A. केवळ अ
   B. केवळ ब
   C. अ आणि ब दोन्ही
   D. अ आणि ब दोन्ही नाही

B. केवळ ब
-------------------------------------
५) अपवर्तनाच्या क्रियेतून पूर्ण अंतर्गत परावर्तन निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची आवश्यकता असते?

अ) प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असावा.
ब) आपाती कोन क्रांतिक कोनापेक्षा अधिक असावा.

   A. केवळ अ
   B. केवळ ब
   C. अ आणि ब दोन्ही
   D. अ आणि ब दोन्ही नाही

C. अ आणि ब दोन्ही
------------------------------------
६) पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात पृथ्थकरण होण्याच्या प्रक्रियेस ....... म्हणतात.

   A. प्रकाशाचे अपस्करण
   B. प्रकाशाचे विकिरण
   C. प्रकाशाचे अपवर्तन
   D. पूर्ण अंतर्गत परावर्तन

A. प्रकाशाचे अपस्करण
----------------------------------------
७) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

अ) तांबड्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात जास्त तर जांभळ्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात कमी होते.
ब) पावसाळ्यात आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपस्करनामुळेच दिसते.

   A. केवळ अ
   B. केवळ ब
   C. अ आणि ब दोन्ही
   D. अ आणि ब दोन्ही नाही

B. केवळ ब
-------------------------------------
८) खालीलपैकी कोणत्या घटना प्रकाशाचे विकिरण या प्रक्रियेमुळे घडतात?

अ) दिवसा सर्वत्र उजेड असतो.
ब) आकाश निळे दिसते.
क) खोल समुद्रात पाणी निळे दिसते.
ड) वाळवंटातील मृगजळ

   A. अ आणि ब
   B. फक्त ड
   C. अ,ब आणि क
   D. वरील सर्व

C. अ,ब आणि क
--------------------------------
९) चंद्र क्षितिजावर मोठा दिसण्याचे कारण काय?

   A. दृष्टिभ्रम
   B. प्रकाशाचे विकिरण
   C. प्रकाशाचे अपस्करण
   D. प्रकाशाचे अपवर्तन

A. दृष्टिभ्रम
------------------------------------
१०) जोड्या जुळवा.

    कॅमेऱ्याचे भाग       डोळ्याचे भाग
अ) शटर                 १) पापणी(eye-Lid)
ब) डायफ्रॅम             २) परीतारिका(Iris)
क) अॅपेरचर            ३) बाहुली(Pupil)
ड) फिल्म               ४) दृष्टीपटल(retina)

             अ   ब   क   ड
   A. १    २    ३    ४
   B. २    ३    ४    १
   C. १    २    ४    ३
   D. २    १    ३   ४

A. १ २ ३ ४

२१ ऑक्टोबर २०२१

मार्क झुकरबर्ग ‘फेसबुक’चं नाव बदलणार?; ‘या’ कारणामुळे सुरु आहे नामांतरणाचा विचार

🔰जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुक आयएनसी आपलं नाव बदलण्याचा विचार करत आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्याचा विचार सुरु असून पुढील आठवड्यामध्ये यासंदर्भात चर्चा होणार आहे. मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलण्याचा विचार सुरु असल्याचं वृत्त द व्हर्जने मंगळवारी दिलं आहे.

🔰फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग या विषयावर कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलणार असल्याची माहिती समोर येत आहे. २८ ऑक्टोबर रोजी ही बैठक होणार आहे. मात्र त्याआधीच यासंदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्हर्जच्या वृत्तामध्ये व्यक्त करण्यात आलीय.

🔰मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हटलं जातं.

देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ ३ ठाण्यांचा समावेश, जयंत पाटलांकडून माहिती


🔰देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ३ पोलीस स्टेशनचा समावेश झाल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. यवतमाळ, चंद्रपूर आणि शिराळा या तीन पोलीस स्टेशनचा या यादीत समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राज्यात अनेक चांगले पोलीस स्टेशन आहेत.

🔰पहिलाय आणि दुसऱ्या रांगेतील नेत्यांनी कोणतीही केस रदबदली घेऊन न जाता हे काम पाहण्यासाठी जावं, असाही सल्ला त्यांनी दिला. सांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील हे बोलत होते.

🔰जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर आणि शिराळा येथील पोलीस ठाण्यांचा समावेश आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये झालाय. दीक्षित गेडाम यांनी सर्व पोलीस स्टेशन आयएसओ प्रमाणित करण्याची मोठी मोहीम हाती घेतली. राज्यात अनेक चांगले पोलीस स्टेशन आहेत. माझी पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत बसलेल्या नेत्यांना विनंती आहे कोणतीही केस रदबदली घेऊन न जाता फक्त चहा घ्यायला जाऊन या.”

भारतीय पाणबुडी रोखल्याचा पाकिस्तानचा दावा

🔰भारताची एक पाणबुडी पाकिस्तानच्या सागरी हद्दीत येत असताना रोखल्याचा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

🔰ही भारतीय पाणबुडी पाकिस्तानी नौदलाच्या गस्ती विमानाने पाहिली होती, असे पाकिस्तानी लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाने म्हटले आहे की, १६ ऑक्टोबरला ही पाणबुडी पाकिस्तानी सागरी हद्दीत येताना दिसली.  भारतीय नौदलाकडून हा  प्रकार तिसऱ्या वेळी झाला असून  तीनही वेळा या पाणबुड्या शोधण्यात  पाकिस्तानी नौदलाच्या लांब पल्ल्याच्या गस्ती विमानांनी यश मिळवले आहे. आताच्या घटनेचे चित्रीकरणही पाकिस्तानने प्रसारित केले आहे.

🔰पाकिस्तानी नौदल सतत सज्ज असून व्यावसायिक सतर्कता बाळगून आहे. आम्ही पुन्हा एकदा भारताची पाणबुडी येताना शोधली आहे असे पाकिस्तानी लष्कराने ट्विटरवर म्हटले आहे.

🔰यापूर्वी असा प्रकार मार्च २०१९ मध्ये घडला होता. त्यावेळी पाकिस्तानी नौदलाने भारतीय पाणबुडीचा सागरी हद्दीत प्रवेश रोखला होता. पाकिस्तानी नौदलाने त्यांचे विशेष कौशल्य वापरून भारतीय the पाणबुडीला घुसण्यापासून रोखले असे निवेदनात म्हटले आहे. नोव्हेंबर २०१६ मध्येही भारतीय लष्कराच्या पाणबुडीने पाकिस्तानी सागरी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

२० ऑक्टोबर २०२१

स्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेकडून १ कोटीचा दंड



🔰निर्देशांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने सोमवारी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेसह, स्टँडर्ड चार्टर्ड बँक (स्टॅन्चार्ट) या विदेशी बँकेला दंड ठोठावला.


🔰सटेट बँकेकडून १ कोटी रुपयांचा, तर स्टॅन्चार्टकडून १ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. आर्थिक अनियमितता व फसवणुकांचे वर्गीकरण आणि त्यांचे मध्यवर्ती बँकेला नियमित विवरण सादर करण्याच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.


🔰नियम पालनातील कुचराईमुळे ही कारवाई करण्यात आली असून, बँकेच्या ग्राहकांसोबतच्या व्यवहारावर त्यातून कोणताही परिणाम करण्याचा हेतू नाही, अशी स्पष्टोक्तीही मध्यवर्ती बँकेने निवेदनाद्वारे केली आहे.

अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री पॉवेल यांचे निधन



🔰अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री कॉलीन पॉवेल यांचे करोनापश्चात प्रकृतीत उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी सोमवारी दिली. ते ८४ वर्षांचे होते. 


🔰पॉवेल यांच्या कुटुंबियांनी समाजमाध्यमांद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पॉवेल यांना करोना संसर्ग झाला होता. त्यांचे  लसीकरणही  झाले होते, अशी माहिती  कुटुंबियांनी दिली. पॉवेल यांच्या रूपाने आम्ही एक असामान्य आणि प्रेमळ पती, वडील, आजोबा आणि महान अमेरिकी असामी गमावली आहे, असेही त्यांच्या कुटुंबियांनी  म्हटले आहे.


🔰पॉवेल १९८९ मध्ये पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री आणि ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ’चे अध्यक्ष होते. १९९१च्या आखाती युद्धानंतर त्यांची प्रशंसा केली गेली. पॉवेल यांच्याच कारकीर्दीत अमेरिकेने पनामावर आक्रमण केले आणि १९९१ मध्ये कुवैतमधून इराकी लष्कराला हुसकावण्यासाठी लष्करी कारवाई केली होती.


🔰परंतु २००३ मध्ये इराक युद्धाचे समर्थन करताना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला त्यांनी दिलेल्या असत्य माहितीमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. सद्दाम हुसैन  यांनी नरसंहारासाठी गुप्तपणे शस्त्रे सज्ज ठेवल्

‘प्रधान मंत्री फसल बिमा योजना’मध्ये दुरुस्ती करण्यासाठी कार्यगटाची नेमणूक



🔰“खरीप 2022” या हंगामापासून सुधारित ‘प्रधान मंत्री फसल बिमा योजना’ लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवून, केंद्रीय सरकारने योजना राबविण्यासाठी "शाश्वत, आर्थिक आणि कार्य पद्धती" सुचविण्यासाठी एका कार्यगटाची नेमणूक केली आहे, ज्यामध्ये केंद्रीय सरकारमधील कार्यरत पदाधिकारी, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचे उच्च कार्यकारी अधिकारी आणि मुख्य पीक उत्पादक राज्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. हा गट सहा महिन्यात त्याचा अहवाल सादर करेल.


🔰कार्यगट योजनेमधील उच्च प्रीमियम दराची कारणे शोधून काढेल आणि जोखीम उचलण्याच्या पर्यायासह त्यांना तर्कसंगत करण्यासाठी यंत्रणा सुचवेल.


🔰योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नव्याने तयार झालेल्या या गटामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आसाम, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यांचे प्रमुख सचिव (कृषी) सदस्य म्हणून असतील.


💢पार्श्वभूमी


🔰सरकारला असे आढळून आले आहे की, प्रीमियम बाजारातील अलवचिकपणा, निविदांमध्ये पुरेसा सहभाग नसणे, विमाधारकांची अपुरी क्षमता हे प्रमुख मुद्दे आहेत, ज्याने योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान ‘प्रधान मंत्री फसल बिमा योजना’ यावर विपरित परिणाम केला.


🔰योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना भरावा लागणारा हप्ता / प्रीमियम रब्बी पिकांसाठी विमा रकमेच्या 1.5 टक्के आणि खरीप पिकांसाठी 2 टक्के निश्चित करण्यात आला आहे, तर नगदी पिकांसाठी तो 5 टक्के आहे. शिल्लक हप्ता केंद्रीय सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समान प्रमाणात विभागला जातो. अनेक राज्यांनी त्यांच्या प्रीमियम अनुदानाचा भाग 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याची मागणी केली आहे तर काही इतरांनी सरकारकडे संपूर्ण अनुदान उचलण्याची मागणी केली आहे.


🔰19 राज्यांच्या (कर्नाटक वगळता) तात्पुरत्या आकडेवारीनुसार, खरीप 2021 हंगामात पीक विम्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या नावनोंदणीत मागील हंगामातील 1.68 कोटींच्या संख्येत 10 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून आले आहे.

१९ ऑक्टोबर २०२१

भारताची राज्यघटना

राज्य लोकसेवा आयोगाबद्दल संपूर्ण माहिती

1. लिखित घटना

2. एकेरी नागरिकत्व

3. एकेरी न्यायव्यवस्था

4. धर्मनिरपेक्षता

5. कल्याणकारी राज्य

6. मूलभूत हक्कांचा समावेश

7. मूलभूत कर्तव्यांचा समावेश
घटना समितीतील महत्वाच्या समित्या :

1. मसुदा समिती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2. संघराज्य राज्यघटना समिती : पं. जवाहरलाल नेहरू

3. घटना समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

4. मूलभूत हक्क समिती : सरदार वल्लभभाई पटेल

5. प्रांतीय राज्यघटना समिती : सरदार वल्लभभाई पटेल

6. वित्त व स्टाफ समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

7. सुकून समिती : डॉ. के. एक. मुन्शी

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी :

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिकाय

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा

उद्देश पत्रिका :

1. संविधान निर्मिती मागचा संविधानकर्त्यांचा उद्देश

2. उद्देशाला संविधानमध्ये किती स्थान देण्यात आलेले आहे जर देण्यात आले नसेल तर घटनेतील दुरूस्ती करून त्याची पूर्तता करणे

3. घटनेतील काही अस्पष्ट गोष्टी स्पष्ट करण्यासाठी उद्देशपत्रिकेचा उपयोग होतो.

उद्देश पत्रिका : आम्ही भारतीय जनता, भारताच सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना
न्याय : सामाजिक, आर्थिक आणि राजकीय
स्वातंत्र्य : विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचे
समता : दर्जा आणि संधी याबाबतीत
बंधुता : व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता राखणारी यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज 26 नोव्हेंबर, 1949 रोजी विचारपूर्वक ठरवीत आहोत. व ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य स्वीकृत करीत आहोत.

राज्य व्यवस्थेचे स्वरूप :

1. सार्वभौम : म्हणजे भारत आता इतर कोणत्याही देशाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली नाही. अंतर्गत आणि बाह्य परदेशी संबंध निर्माण करण्यास भारत स्वातंत्र्य आहे.

2. प्रजासत्ताक : म्हणजे लोकनियुक्त शासन होय. प्रजासत्ताक राज्यामध्ये अंतिम सत्ता लोकांकडे असते.

3. गणराज्य : म्हणजे राजा नसलेले राज्य होय.

राज्य व्यवस्थेची उद्देश : भारतीय घटनेच्या तिसर्‍या भागामध्ये राज्य व्यवस्थेचा उद्देश स्पष्ट करण्यात आला आहे. त्यासाठी भारतीय घटनेत पुढीलपैकी चार उद्देश उद्देशपत्रिकेत सांगितली आहेत.

न्याय : सामाजिक, आर्थिक, राजकीय

स्वातंत्र्य : विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना

समता : दर्जा आणि संधी याबाबतीत

बंधुता : व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता

41 व्या घटना दुरूस्तीनुसार उद्देशपत्रिकेत केलेला बदल :

समाजवादी : हा शब्द या दुरुस्तीनुसार उद्देशपत्रिकेत नमूद करण्यात आला आहे.

धर्मनिरपेक्ष : कोणत्याही धर्माला अनुसरून राज्यकारभार केला जाणार नाही.

अखंडता : भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही. भारतातील अखंडता टिकून राहील.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...