२९ सप्टेंबर २०२१

पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था



(Primary Agricultural Credit Co-Operatives) 


प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात. 


🎯सथापना -


गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात.

  गरीब शेतकर्‍यांनाही संस्थेला सभासद होता यावे यासाठी सदस्यत्व शुल्क/प्रवेश शुक्ल नाममात्र ठेवले जाते.तसेच या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर (Unlimited liability) स्थापना केल्या जातात. म्हणजेच, ती संस्था अपयशी ठरल्यास तिची देणी (Liabilities) देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते. 


🎯कार्ये -


ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते. त्यांच्या ठेवी स्वीकारते व त्यांना कर्जे देते. कर्जे मुख्यत: अल्प मुदतीचे व मुख्यत: कृषीसाठी दिले जाते. मात्र सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्जे सुद्धा दिली जातात.ही संस्था ग्रामीण जनता व दुसर्‍या बाजुला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात दुव्याचे काम करते. 


🎯भांडवल उभारणी -


स्व-स्वामित्व निधी - सदस्यत्व फी, भागभांडवल व राखीव निधी.ठेवी - सदस्य तसेच, बिगर सदस्यां कडून मिळविलेल्या.कर्जे - जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेली. 


🎯विस्तार -


भारतात मार्च 2010 मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषि सह. संस्था कार्य करीत होत्या. त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या. 


🎯महाराष्ट्रातील विस्तार -


31 मार्च 2010 रोजी महाराष्ट्रात 21,392 प्राथमिक कृषि सह.पतसंस्था होत्या आणि त्यांची सभासद संख्या 149 लाख होती. 

राज्यघटनेतील परिशिष्ट्ये (Schedules)



सध्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट्ये आहेत.

परिशिष्ट – 1 –   घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी (28) व (7)


परिशिष्ट – 2 –   राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायाधीश, सभापती आणि इतर सदस्य यांच्या पगाराचा तपशील


परिशिष्ट – 3 –   विविध शपथा व प्रतिज्ञा यांचे नमुने


परिशिष्ट – 4 –   राज्य व केंद्रशासित प्रदेशातर्फे राज्यसभेवर किती सदस्य पाठवावे याची नोंद


परिशिष्ट – 5 –   अनुसूचित जाती व जमाती प्रशासन व नियंत्रण


परिशिष्ट – 6 –   उत्तर पूर्वीय राज्यातील आदिवासींचे प्रशासन


परिशिष्ट – 7 –   केंद्रसूची, राज्यसूची व समवर्ती सुचींची माहिती


परिशिष्ट – 8 –   राष्ट्रीय भाषांची माहिती (22 भाषा)


परिशिष्ट – 9 –   विविध कायद्यांची माहिती


परिशिष्ट – 10 – पक्षांतर विरोधी विधेयकाची माहिती


परिशिष्ट – 11 – पंचायत राज संबंधी तरतुदी


परिशिष्ट – 12 – नागरी प्रशासन (नगरपालिका) याविषयी तरतुदी


अजित पवारांकडे वस्तू आणि सेवा कर मंत्रिगटाचे अध्यक्षपद



🔰वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सुधारणा करून त्यातील गळती रोखून ती अधिक सुटसुटीत करण्याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यंच्या अध्यक्षतेखाली आठ राज्यांच्या वित्तमंत्र्यांचा मंत्रिगट के ंद्रीय वित्त मंत्रालयाने स्थापन के ला आहे. अजितदादा   राष्ट्रीय पातळीवर प्रथमच महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार आहेत.


🔰वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या अलीकडेच लखनौत झालेल्या बैठकीत प्रणालीतील गळती दूर करण्याबाबत चर्चा झाली.  सध्याच्या रचनेत काही बदल के ले जाणार आहेत. हे बदल सुचविण्यासाठी मंत्रिगट स्थापन करण्यात आलाआहे. 


🔰अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटात दिल्ली, हरयाणा, आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, ओडिशा आणि तमिळनाडू या राज्यांच्या वित्तमंत्र्यांचा समावेश आहे. हा मंत्रिगट वेळोवेळी वस्तू आणि सेवा परिषदेला सूचना किं वा शिफारसी करणार आहे.

महत्वाची बातमी - आरोग्य विभागाची परीक्षा आता २४ व ३१ ऑक्टोबरला - आरोग्यमंत्री टोपे



🔰आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला घेतली जाणारी लेखी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतपाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. शिवाय, भाजपाने देखील या मुद्य्यावरून सरकारवर जोरादार टीका सुरू केली आहे.


🔰दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षांसंदर्भात आज महत्वपूर्ण माहिती दिली. या परीक्षांच्या नव्या तारखा निश्चित झाल्या असल्याची त्यांनी सांगितले असून, त्यानुसार आता गट – क संवर्गाची परीक्षा २४ ऑक्टोबर व गट – ड संवर्गाची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय आज (सोमवार) आरोग्य विभाग व न्यासा कंपनीच्या अधिकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत झाला आहे.


🔰या संदर्भात सविस्तर माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, ”कोणताही धोका न पत्करता या दोन्ही दिवशी रविवार असल्याने, शाळा शंभर टक्के उपलब्ध होतातच. या अनुषंगाने या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. बैठकीत अन्य बाबींवर देखील चर्चा झाली. त्यामध्ये डॅशबोर्ड केला पाहिजे, त्यावर सगळ्या परीक्षा केंद्रांची यादी दिली पाहिजे,


🔰विद्यार्थ्यांची यादी डॅशबोर्डवर दर्शवली गेली पाहिजे. हे त्यांनी एक वेळापत्रक देऊन एक साधारणपणे १ ऑक्टोबरला त्यांनी डॅशबोर्ड द्यावा. संपूर्ण विद्यार्थ्यांची व परीक्षा केंद्रांची यादी त्यांनी दिली पाहिजे. याशिवाय त्या संबंधित शाळांनी देखील या परीक्षा केंद्रांना मान्यात दिलेली असलं पाहिजे. त्यामुळे योग्यप्रकारे ऑडिट करण्याचं काम होईल. त्यांना असं बंधनकारक केलं आहे जे अगोदर देखील केलेलं होतं की, ९ दिवस अगोदर सर्व परीक्षार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले पाहिजेत.याबाबत देखील खात्री केली जाईल.

स्पेनमधील ज्वालामुखीच्या उद्रेकात घट



🔰सपेनमधील बेटांवरील ज्वालामुखीच्या उद्रेकात पाचशे इमारती गाडल्या गेल्या असून सुमारे सहा हजार लोक विस्थापित झाले आहेत. आता गेल्या आठवडय़ापासून या ज्वालामुखीतून राख व लाव्हारस बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वैज्ञानिकांच्या मते सध्यातरी उद्रेकाची प्रक्रिया संपली असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. कॅनरी आयलंड टेलिव्हिजनन जी दृश्ये दाखवली त्यानुसार ला पामा बेटावर कुंब्रे  विजा पर्वतराजीत आता राखेचे लोट दिसत नाहीत.


🔰१९ सप्टेंबरला या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. ला  पामा ज्वालामुखी हा कमी सक्रियतेच्या टप्प्यात असून माद्रिद येथील इन्स्टिटय़ूट ऑफ जिओसायन्सेस या संस्थेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्वालामुखीची तीव्रता कमी झाली आहे. आगामी काळात त्याची वाटचाल कशी होते हे पहावे लागेल.


🔰सपेनमधील ला पामा बेटावरील लोकांनी विषारी वायू टाळण्यासाठी घरातच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. अजूनही लाव्हा रस एक हजार अंश तापमानापर्यंत जाऊ शकतो व त्याचे वहन होऊ शकते. अ‍ॅटलांटिक महासागरात हा लाव्हारस वीस अंश सेल्सियस तापमानाने मिसळत आहे. वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, औष्णिक धक्क्य़ाने पाण्याची वाफ होत असून हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत आहे. ज्वालामुखीपासून काचेसारखे कण तयार होत असून त्यामुळे श्वसनमार्गात अडथळे येतात.

भारतातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” याची मान्यता..


🐅वाघांचे उत्तमप्रकारे संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल, देशातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” (Global Conservation Assured | Tiger Standards) अशी मान्यता मिळाली आहे.


🐅मानस, काझीरंगा आणि ओरांग (आसाम)

🐅सातपुडा, कान्हा आणि पन्ना (मध्यप्रदेश)

🐅पच (महाराष्ट्र)

🐅वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प (बिहार)

🐅दधवा (उत्तरप्रदेश)

🐅सदरबन (पश्चिम बंगाल)

🐅पारंबीकुलम (केरळ)

🐅बदिपूर व्याघ्र प्रकल्प (कर्नाटक)

🐅मदुमलाई आणि अन्नामलाई (तामीळनाडू)

🐅“जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा

 

🌸(CA|TS)” विषयी...


🐅CA|TS या संज्ञा ‘मान्यता’ अथवा दर्जा निश्चित करण्यासाठीचे साधन म्हणून वापरण्यास ‘व्याघ्र अस्तित्व असलेल्या देशांच्या जागतिक संघटनेने (TRCs) मंजूरी दिली असून ते निकष व्याघ्र तसेच संरक्षित प्रदेशाच्या तज्ञांनी ठरवले आहेत.


🐅2013 साली या दर्जाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, व्याघ्र प्रजाती (मार्जार कूळ) याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठीचा किमान दर्जा निश्चित करण्यात आला आहे. तसेच, त्या संबंधित संवर्धन क्षेत्रात, हा दर्जा सांभाळला जातो आहे की नाही, याचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये असे निकष आहे, ज्याअंतर्गत व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणारे व्यवस्थापन संवर्धनासाठी पूरक आहे की नाही हे तपासले जाते.


🌸पार्श्वभूमी...


🐅दरवर्षी 29 जुलै या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करतात. 2021 साली हा दिवस “त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (Their Survival is in our hands) या संकल्पनेखाली पाळण्यात आला. 

आयुष्मान भारत डिजिटल योजना क्रांतिकारी - पंतप्रधान मोदी.



🔰आयुष्मान भारत डिजिटल योजना क्रांतिकारक बदल घडवील, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. या योजनेत लोकांना डिजिटल हेल्थ आयडी दिला जाणार असून त्यात आरोग्याविषयक नोंदी असतील  असे त्यांनी स्पष्ट केले.


🔰ही योजना कार्यान्वित करताना त्यांनी सांगितले की, आयुष्मान भारत योजनेत बदल होत गेले, त्यात हा नवा टप्पा आहे.


🔰यातील आयुष्मान भारत डिजिटल योजनेचा पथर्शक प्रकल्प हा पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्लय़ावरून १५ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर केला होता.  सध्या आयमुष्मान भारत डिजिटल योजना पथदर्शक पातळीवर सहा केंद्रशासित प्रदेशात राबवली जात होती.  आता ती देशभरात राबवण्यात येत असून त्याचवेळी राष्ट्रीय आरोग्य  प्राधिकरण आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची  तिसरी वर्षपूर्ती साजरी करीत आहे.

हवेत अचुक लक्ष्यभेद करणाऱ्या ‘आकाश प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.



🔰डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने जमीनीवरुन हवेत मारा करत लक्ष्यभेद करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राच्या सुधारीत आवृत्तीची ‘आकाश प्राईम’ ची यशस्वी चाचणी आज घेतली. ओडिशातील चांदीपुर इथल्या एकात्मित चाचणी तळावरुन ही चाचणी घेण्यात आली. सुरुवातीला विकसित करण्यात आलेल्या आकाश क्षेपणास्त्राच्या तुलनेत नव्या दमाच्या आकाश प्राईममध्ये स्वदेशी उपकरणांचा जास्त वापर करण्यात आला आहे. 


🔰आकाश प्राईममध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आणखी अचुकतेने ग्रहण करणारी स्वदेशी बनावटीची यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसंच उंचावर गेल्यावर थंड हवेतही खात्रीशीर काम करु शकेल अशा पद्धतीच्या सुधारणा या आकाश प्राईममध्ये करण्यात आल्या आहेत. आकाश प्राईमची चाचणी करतांना जमिनीवरील आवश्यक पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्वांमुळे जमीनीवरुन हवेतील लक्ष्यभेद करण्याची भारताची संरक्षण प्रणाली आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. 


🔰३० किलोमीटरच्या परिघातील जमिनीपासून २० किलोमीटर उंचीपर्यंतचे लक्ष्य अचूक भेदण्याची आकाश क्षेपणास्त्राची मूळ क्षमता आहे. ध्वनीपेक्षा ३ पट वेगाने आकाश क्षेपणस्त्र लक्ष्यभेद करु शकते. तेव्हा आकाश प्राईमच्या रुपात आकाश क्षेपणास्त्रात आणखी अचूकता आली आहे.

दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोगाचा देशव्यापी प्रशिक्षण कार्यक्रम..



🔰राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) दुग्ध व्यवसायात कार्य करणाऱ्या महिलांसाठी देशव्यापी प्रशिक्षण आणि क्षमताबांधणी कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे.


🔰27 सप्टेंबर 2021 रोजी हरियाणामधील हिसार येथील लाला लाजपत राय पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठात पहिला प्रकल्प महिला बचत गटाला प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


🔰दग्ध व्यवसाय क्षेत्राशी जुळलेल्या महिलांची प्रशिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग (NCW) देशभरातील कृषी विद्यापीठांसोबत भागीदारी करीत आहे.


🔰परशिक्षणादरम्यान क्षेत्रात विस्तार उपक्रम राबविण्यासाठी शास्त्रीय प्रशिक्षण आणि व्यवहारिक कल्पनांद्वारे महिला शेतकरी आणि बचत गटांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.


🔴राष्ट्रीय महिला आयोग (NCW) विषयी...


🔰राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ही भारत सरकारची एक संविधानिक संस्था आहे. आयोग सर्वसाधारणपणे महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींच्या संदर्भात सरकारला सल्ला देते. आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

अ‍ॅमेझॉन ही दुसरी ईस्ट इंडिया कंपनी.



🎬ऑनलाइन व्यापारातील महाकाय कंपनी अमेझॉन ही दुसरी ‘इस्ट इंडिया कंपनी’च आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘पांचजन्य’ या नियतकालिकातील मुख्य लेखात करण्यात आला आहे. ‘इस्ट इंडिया कंपनी २.०’ असे या लेखाचे शीर्षक आहे.


🎬‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी सोमवारी या नियतकालिकाच्या आगामी अंकाचे मुखपृष्ठ ट्वीटरवर प्रसारित केले. मुखपृष्ठावर अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचे छायाचित्रही आहे. ‘पांचजन्य’च्या ३ ऑक्टोबरला बाजारात येणाऱ्या अंकात अ‍ॅमेझॉनवर कडाडून टीका करणारी ‘मुखपृष्ठ कथा’ करण्यात आली आहे. त्यात या कंपनीचे वर्णन ‘ईस्ट इंडिया कंपनी २.०’ असे करण्यात आले आहे. ‘भारतावर कब्जा मिळवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने अठराव्या शतकात जे केले, तेच अ‍ॅमेझॉनच्या कृतींमधून दिसून येते,’ असे या लेखात नमूद केले आहे.


🎬‘अ‍ॅमेझॉन’ने सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी फार मोठी रक्कम वापरल्याचे उघड केल्याचे ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी ‘आयएएनस’ या वृत्तसंस्थेला सांगितले. आपल्या कुठल्या चुकीच्या गोष्टीमुळे लाच देण्याची गरज भासते असा प्रश्न अ‍ॅमेझॉनला विचारायला हवा, असे ते म्हणाले.

२५ सप्टेंबर २०२१

भारतातील लोकनृत्ये

🔸 महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
🔹 तामिळनाडू : भरतनाट्यम
🔸 केरळ : कथकली
🔹आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
🔸 गुजरात : गरबा , रास
🔹 ओरिसा : ओडिसी
🔸 जम्मू व काश्मीर : रौफ
🔹 पंजाब : भांगडा , गिद्धा
🔸 आसाम : बिहू , झूमर नाच
🔹 उत्तराखंड : गर्वाली
🔸 मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
🔹 मेघालय : लाहो
🔸 कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
🔹 मिझोरम : खान्तुंम
🔸 गोवा : मंडो
🔹 मणिपूर : मणिपुरी
🔸 अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
🔹 झारखंड : कर्मा
🔸 छत्तीसगढ : पंथी
🔹 राजस्थान : घूमर
🔸 पश्चिम बंगाल : गंभीरा
🔹 उत्तर प्रदेश : कथक

उज्ज्वला 2.0” योजना



🔰19 सप्टेंबर 2021 रोजी मध्य प्रदेश राज्यात “उज्ज्वला 2.0” (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना) योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जबलपूरमध्ये आयोजित केलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जवळपास 5 लक्ष महिलांना मोफत स्वयंपाकाचा गॅसच्या (LPG) जोडण्या देवून शुभारंभ करण्यात आला.


❄️उज्ज्वला 2.0 योजनेचे वैशिष्ट्य


🔰खड्यातून अनेकजण कामासाठी शहरात स्थलांतरीत होतात. तिथे त्यांना अधिवासाचा पुरावा दाखवण्याबाबतच्या अडचणींचा सामना करावा लागतो. आता कामगारांना अधिवासाचा पुरावा सिद्ध करण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नाही. गॅस जोडणी मिळवण्यासाठी त्यांना फक्त आपल्या पत्त्याबाबत स्वघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.


❄️परधानमंत्री उज्ज्वला योजना


🔰परधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक कल्याणकारी योजना आहे. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे 2016 रोजी उत्तरप्रदेशाच्या बलिया या शहरात पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे उद्घाटन केले गेले होते. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना पुढील 3 वर्षांत प्रत्येक जोडणीसाठी 1600 रुपये इतका आधार निधी देऊन 5 कोटी LPG जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाची हमी देण्याच्या हेतूने विशेषत: ग्रामीण भारतात LPG जोडणी कुटुंबातल्या महिलेच्या नावाने दिले जाते. सध्या जवळपास 6.28 कोटींपेक्षा जास्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना विनामूल्य LPG टाकी मिळत आहे.

MPSC 2022: पुढच्या महिन्यात जाहीर होणार वेळापत्रक



🔰राज्य सरकारमधील विविध विभागातील रिक्त पदांची माहिती ३० सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याच्या आदेशानंतर आता आयोगाने पटापट सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे. मागणीपत्र प्राप्त झाल्यास येत्या नोव्हेंबर महिन्यात पुढच्या वर्षात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं आयोगाने सांगितलं असून तसेच प्रलंबित निकाल ३० सप्टेंबरपर्यंत लावण्याचे देखील नियोजन आयोगाकडून केलं जात आहे. परिपत्रक जारी करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही माहिती दिली आहे.


🔰राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार मुंबईमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या विभागातील रिक्त पदांची माहिती ३० सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं द्यावी, अशा सूचना विभागांना देण्यात आल्याचं सांगितलं होतं. सरकारच्या या आदेशानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगदेखील कामाला लागला आहे.


🔰एमपीएससीकडून ऑक्टोबर महिन्यात पुढील वर्षाचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तसेच प्रलंबित निकालदेखील ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे एमपीएससीचे नियोजन आहे. विशेष म्हणजे एमपीएससीने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे.


🔰अजित पवार यांनी वेगवेगळ्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. “मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या विभागाच्या जागा भरायच्या आहेत. त्या जागांची माहिती एमपीएससीला कळवायची आहे. ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांना सांगितलं आहे.


🔰जागांची माहिती द्या, अशा सूचना दिल्या आहेत. आरक्षण आणि इतर नियमांचं पालन करुन याद्या द्याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विभागांकडून याद्या आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला माहिती दिली जाईल. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील”, असं अजित पवार म्हणाले होते.

करोनाबाधित आढळल्यानंतर ३० दिवसांत केलेली आत्महत्या म्हणजे करोनामृत्यूच- केंद्र



🔰कद्राने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सूचित केले की, करोनाबाधित आढळणाऱ्या व्यक्तीने 30 दिवसांच्या आत आत्महत्या केल्यास त्यास करोनामृत्यूच ठरवले जाईल. यामुळे मृताच्या नातेवाईकांना ५० हजारांची मदत मिळणार आहे.


🔰करोनामृत्यू कशास म्हणावे याबद्दलच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सरकारने म्हटले होते की करोना संसर्गादरम्यान विषबाधा, आत्महत्या, हत्या, अपघात इत्यादीमुळे झालेल्या मृत्यूला करोनामृत्यू मानले जाणार नाही. न्यायालयाने सरकारला या अटीवर पुनर्विचार करण्यास सांगितले होते.


🔰गरुवारी, सर्वोच्च न्यायालयाने महामारीला बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मदत निधी निश्चित केल्याबद्दल सरकारने आनंद व्यक्त केला. “आज आम्ही खूप आनंदी आहोत. ज्या लोकांना त्रास झाला आहे त्यांच्यासाठी हे सांत्वन ठरेल. सरकार करत असलेली प्रत्येक गोष्ट ज्यांना त्रास झाला त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आहे. त्यांच्यासाठी काहीतरी केले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे.


🔰भारताने जे केले ते इतर कोणताही देश करू शकला नाही याची आम्हाला न्यायालयीन दखल घ्यावी लागेल, ”अशी टिप्पणी न्यायमूर्ती शाह, न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने केली आहे.

महाराष्ट्रातील महानगरपालिका



🔰 नाव    -     शहर     -     स्थापना 🔰


१) बृहन्मुंबई महानगरपालिका - मुंबई - १९८८


२) पुणे महानगरपालिका - पुणे - १९५०


३) नागपूर महानगरपालिका - नागपुर - १९५१


४) ठाणे महानगरपालिका - ठाणे - १९८२


५) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका -  पुणे -१९८२


६) नाशिक महानगरपालिका - नाशिक - १९८२


७) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कल्याण - १९८२


८) वसई-विरार महानगरपालिका - पालघर - २००९


९) औरंगाबाद महानगरपालिका  - औरंगाबाद - १९८२


१०) नवी मुंबई महानगरपालिका - नवी मुंबई -  १९९२


११) सोलापूर महानगरपालिका - सोलापूर - १९६४


१२) मीरा-भाईंदर महानगरपालिका -ठाणे - २००२


१३) भिवंडी-निजामपुर महानगरपालिका - ठाणे - २००२


१४) अमरावती महापालिका - अमरावती - १९८३


१५) नांदेड-वाघाळा महानगरपालिका - नांदेड -१९९७


१६) कोल्हापूर महानगरपालिका - कोल्हापूर - १९७२


१७) अकोला महानगरपालिका - अकोला - २००१ 


१८) उल्हास नगर महानगरपालिका - ठाणे - १९९८


१९) सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका - सांगली - १९९८


२०) मालेगाव महानगरपालिका - नाशिक - २००३


२१) जळगाव महानगरपालिका - जळगाव - २००३


२२) लातूर महानगरपालिका - लातूर - २०१२ 


२३) धुळे महानगरपालिका - धुळे - २००३


२४) अहमदनगर महानगरपालिका - अहमदनगर - २००३


२५) चंद्रपूर महानगरपालिका - चंद्रपुर - २०११


२६) परभणी महानगरपालिका - परभणी - २०११


२७) पनवेल महानगरपालिका - रायगड  -  २०१६


🔸एकूण  महानगरपालिका : २७ ✅


🔹सर्वात मोठी महानगरपालिका : बृहन्मुंबई


🔸२७वी  महानगरपालिका : पनवेल

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1. टोकियो पॅरालिम्पिक 2020 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथीराज याने कोणते पदक जिंकले.
1. कांस्य
2. रौप्य
3. सुवर्ण
4. यापैकी नाही

उत्तर- 2

----------------------------------------------------------------

2. टोकियो पॅरालिम्पिक 2020 बॅडमिंटन SH6 या क्रीडाप्रकारात  कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.
1. सुहास यथीराज
2. कृष्णा नागर
3. प्रमोद भगत
4. मनीष नरवाल

उत्तर- 2
---------------------------------------------------------------

3. .........या दोन राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर "SIMBEX" हा नौदल सराव आयोजित केला आहे.
1. भारत आणि चीन
2. भारत आणि सिंगापूर
3. भारत आणि अमेरिका
4. भारत आणि ऑस्ट्रेलिया

उत्तर- 2

---------------------------------------------------------------

4. कोणत्या राज्यसरकारने कोव्हीड-19 साथीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बी वॉरियर" मोहीम सुरू करण्यात आली.
1. मध्य प्रदेश
2. महाराष्ट्र
3. केरळ
4. दिल्ली

उत्तर- 3

---------------------------------------------------------------

5. लवलीना बोर्गोहेन यांना...... या राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे.
1. सिक्कीम
2. आसाम
3. हिमाचल प्रदेश
4.  यापैकी नाही

उत्तर-2

  ---------------------------------------------------------------

6. टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोप समारंभात कोणता खेळाडू भारतीय ध्वजवाहक बनला आहे.
1. कृष्णा नागर
2. सुहास यथिराज
3. मनीष नरवाल
4. अवनी लेखारा

उत्तर- 4

---------------------------------------------------------------

7. कार्बो आंग्लॉंग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
1. मेघालय
2. अरुणाचल प्रदेश
3. सिक्कीम
4.आसाम

उत्तर – 4

---------------------------------------------------------------

8. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून साजरा केला जातो?

1. 3 सप्टेंबर
2. 4 सप्टेंबर
3. 5 सप्टेंबर
4. 6 सप्टेंबर

उत्तर- 3
---------------------------------------------------------------

9. एलआयसी ने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे .......मध्ये जवळपास 4%हिस्सा उचलला आहे.
1. बँक ऑफ इंडिया
2. बँक ऑफ महाराष्ट्र
3. Axis बँक
4. आयसीआयसीआय बँक

उत्तर- 1

----------------------------------------------------------------

10. प्लास्टिक करार सुरु करणारा......हा आशियातील पहिला देश बनला आहे.
1. चीन
2. नेपाळ
3. भारत
4. श्रीलंका

उत्तर- 3

बौद्ध परिषदा



1⃣ पहिली बौद्ध परिषद


▪️काळ:-483 इ स पू

▪️अद्यक्ष:-महाकश्यप

▪️ठिकाण:-राजगृह

🏵राजा:-अजातशत्रू


2⃣ दसरी बौद्ध परिषद


▪️काळ:-387 इ स पू

▪️अद्यक्ष:-महास्तवीर रेवत

▪️ठिकाण:-वैशाली

🏵राजा:-कालाशोक


3⃣ तिसरी बौद्ध परिषद


▪️काळ:-243 इ स पू

▪️अद्यक्ष:-मोगलीपुत्र तिस्स

▪️ठिकाण:-पाटलीपुत्र

🏵राजा:-अशोक


4⃣ चौथी बौद्ध परिषद


▪️काळ:-पहिले शतक

▪️अद्यक्ष:-वसुमित्र

▪️ठिकाण:-कुंडलवण

🏵 राजा :-कनिष्क

महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे


१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

---------------------------------------------------

२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

---------------------------------------------------

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

---------------------------------------------------

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

--------------------------------------------------

५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

---------------------------------------------------

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

--------------------------------------------------

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

--------------------------------------------------

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

--------------------------------------------------

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

--------------------------------------------------


१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

--------------------------------------------------

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-------------------------------------------------

१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

--------------------------------------------------

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

--------------------------------------------------

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

--------------------------------------------------


१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

--------------------------------------------------

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

--------------------------------------------------

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

--------------------------------------------------

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-------------------------------------------------

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-------------------------------------------------

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

---------------------------------------------------


२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

---------------------------------------------------

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

---------------------------------------------------

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

---------------------------------------------------

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

---------------------------------------------------

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई

भारताची राष्ट्रीय प्रतिके



Q : भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

उत्तर: वाघ


Q : भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

उत्तरः मोर 


Q : भारतातील राष्ट्रीय जलचर जीव कोणता आहे?

उत्तरः गंगा डॉल्फिन


Q : भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?

उत्तरः आंबा


Q :भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?

उत्तर: कमळ


Q :  भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?

उत्तर: वटवृक्ष (दिर्घायूचे प्रतिक)


Q : भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

उत्तरः हॉकी


Q : भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी आणि रुंदी यांच्यातील गुणोत्तर किती आहे?

उत्तर - 3 : 2


Q :भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?

उत्तर - रवींद्रनाथ टागोर


Q : भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?

उत्तरः वंदे मातरम्


राष्ट्रीय मुद्रा  रुपया

राष्ट्रीय फळ  आंबा    

राष्ट्रध्वज  तिरंगा  

राष्ट्रचिन्ह  राजमुद्रा  

ब्रीदवाक्य  सत्यमेव जयते (सत्याचा विजय होवो)

 1)कोणती भारतीय शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे ठरले?

(A) IIT मुंबई✅✅✅

(B) IIT मद्रास

(C) IIT दिल्ली

(D) IIT मंडी


 1)कोणी स्लोव्हाकिया या देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली?

(A) मारिया रोको

(B) एड्रियाना कारेमब्यू

(C) डेनिएला हांतुचोवा

(D) जुझाना कापुतोवा✅✅✅



🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚



3)कोणती शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे?

(A) मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी✅✅✅

(B) ऑक्सफर्ड विद्यापीठ

(C) मॅक्स प्लांक विद्यापीठ

(D) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू


🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚


 4)कोणत्या सालापर्यंत ‘भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण 35000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे केले जाणार आहे?

(A) सन 2025

(B) सन 2022✅✅✅

(C) सन 2030

(D) सन 2035



5)राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने भारताला 5 भूकंपीय विभागांमध्ये विभागले आहे. कोणता क्षेत्र सर्वात उच्च जोखमीचा क्षेत्र मानला जातो जो अतीव तीव्रतेच्या भूकंपांना बळी पडतो?

(A) क्षेत्र 5✅✅✅

(B) क्षेत्र 1

(C) क्षेत्र 3

(D) क्षेत्र 2



🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚


6)भारतीय नौदलाच्या कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत 6 पाणबुडी तयार करण्यासाठी भारत सरकारने जून महिन्यात 45 हजार कोटी रुपयांच्या खर्चाने प्रकल्पाची सुरुवात केली?

(A) प्रोजेक्ट 17A

(B) प्रोजेक्ट 75-I✅✅✅

(C) प्रोजेक्ट 71A

(D) प्रोजेक्ट 79-I



7)भारताने सॉलिड फ्युएल डक्टेड प्रणोदन समर्थित क्षेपणास्त्राचे चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पाडले. या क्षेपणास्त्राचे नाव काय आहे?

(A) कर्णजेट

(B) जेटएक्स

(C) जेट-ओ

(D) रामजेट✅✅✅


📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹


8) भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण (ZSI) आणि भारतीय वनस्पतीशास्त्रीय सर्वेक्षण (BSI) च्या प्रकाशनानुसार, 2017 साली वनस्पती आणि प्राण्यांच्या किती प्रजाती शोधल्या गेल्या?


(A) 539✅✅✅

(B) 739

(C) 639

(D) 439



9) कोणते कण हृदयरोग आणि श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरणार्‍या PM2.5 या प्रदूषकाच्या वर्गामधील सर्वात मोठे घटक आहे?

(A) कार्बन डाय ऑक्साइड

(B) नायट्रोजन✅✅✅

(C) मिथेन

(D) सल्फर डाय ऑक्साईड


📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹


10) स्पेनमधील सेव्हिले विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शहरी सांडपाण्यामधून बहुतेक प्रदूषके शोषून घेणारा पदार्थ शोधून काढला. त्या पदार्थाचे नाव काय आहे?

(A) Na-माईका-4

(B) CL-माईका-4

(C) N4-माईका-4

(D) C18-माईका-4✅✅✅


1 '' स्मार्ट ब्लँक बोर्ड '' योजना राज्यात लागु केली  गेली आहे ?

1) अरूणाचल प्रदेश

2)महाराष्ट्र

3)तामिळनाडू✅✅

4)गुजरात




 2. कोणत्या देशाने २०२६ पर्यंत चंद्रावर अणुभट्टी स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे ?

भारत

चीन 

अमेरिका ✔️✔️

इस्त्राईल


3. जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी भारताला कोणत्या  देशाने मदत केली ? 

 अमेरिका

 फ्रान्स

 रशिया

 जपान✔️✔️



 4. कोणत्या राज्य सरकारने "एक मास्क अनेक जिंदगी " मोहिम राबविण्यास सुरूवात केली?

राजस्थान

मध्यप्रदेश✔️✔️

महाराष्ट्र

गुजरात


 5. आशियातील एकमात्र ठिकाण जेथे सौर तलावाचे निर्माण होत आहे , ते कोठे आहे ?

 भूज ( गुजरात )

 कच्छ ( गुजरात )✔️✔️

 मुत्पनडल ( तामिळनाडू )

 मनिकरण ( हिमाचल प्रदेश )


6. GSTला मान्यता देणारे पहिले राज्य कोणते?

छत्तीसगड़

आसाम✅✅

बिहार

झारखंड


 7.  भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोठे आहे ?


 कानपूर

 मुंबई

 नवी दिल्ली✔️✔️

 कर्नाल


8.सरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या  शहरात भारताच्या पहिल्या प्रगत ' हायपरसॉनिक विंड टनेल ' चे उद्घाटन केले ?

 दिल्ली

 तिरुअनंतपुरम

 हैदराबाद ✔️✔️

 इंदौर



 9. भारताचे प्रथम लिंग डेटा केंद्र ...... मध्ये   स्थापित केले जाईल ?

मुंबई

केरळ ✔️✔️

दिल्ली

हैदराबाद




 10. '' बँक टू व्हिलेज '' कार्यक्रमाचा तिसरा टप्पा कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येणार आहे ?

1) दिल्ली 

2) गोवा

3) जम्मु काश्मिर✅✅

4) दमण -  दीव


 कोणत्या राज्य सरकारकडून नुकतेच वर्ष 2021-2022 च्या अर्थसंकल्पात कोणत्या ठिकाणी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आणि मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट  स्थापन करण्यास मंजूरी दिली.


चालू घडामोडी

 Q1) कोणती आदिवासी जात ‘अनामलाई व्याघ्र प्रकल्प’ येथे वास्तव्यास आहे?

उत्तर :- पुलियार


Q2) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅनडेमीक रिस्पॉन्स’ याची स्थापना केली?

उत्तर :-  यूएस चेंबर ऑफ कॉमर्स


Q3) कोण ‘मॅड्रिड ओपन 2021’ या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेती ठरली?

उत्तर :- आर्यना सबलेन्का


Q4) कोणत्या संस्थेने ‘ई-संजीवनी ओपीडी’ उपक्रमाचा प्रारंभ केला?

उत्तर :- आर्म्ड फोर्स वेटेरन डॉक्टर्स


Q5) कोणत्या शहराने ‘नाइट फ्रँक प्राइम ग्लोबल सिटीझ इंडेक्स Q1 2021’ या यादीत प्रथम क्रमांक पटकावला?

उत्तर :-  शेन्झेन


Q6) कोणत्या संकल्पनेखाली 2021 या वर्षी ‘जागतिक रेडक्रॉस व रेड क्रिसेंट दिवस’ साजरा करण्यात आला?

उत्तर :- अनस्टॉपेबल


Q7) ‘द बेंच’ या बाल पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर :- मेघन मर्केल


Q8) कोणत्या दिवशी सीमा रस्ते संघटना (BRO) याचा स्थापना दिवस साजरा केला जातो?

उत्तर :- 7 मे


Q9) कोणत्या राज्यात लसींच्या दृष्टीपलीकडील वितरणासाठी प्रायोगिक तत्वावर ड्रोन यंत्राचा वापर करण्याची सशर्त परवानगी मिळाली?

उत्तर :- तेलंगणा


Q10) शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्याकरिता शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींचे सशक्तीकरण विभागाकडून वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळाचे नाव काय आहे?

उत्तर :- युनिक डिसेबिलिटी आयडी


Q11) ऑक्सिजनचे वाटप सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या राष्ट्रीय कृती दलात किती सदस्य आहेत?

उत्तर :- 12


Q12) कोणत्या देशाने तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक आयोजित केली?

उत्तर :-  जपान


Q13) कोणत्या संस्थेने "2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG)" नामक कोविड-19 प्रतिबंधक औषध विकसित केले?

उत्तर :- संरक्षण संशोधन व विकास संघटना


Q14) कोणत्या रोग वा संसर्गाला ‘म्यूकोरमायकोसिस’ असे देखील म्हणतात?

उत्तर :-  ब्लॅक फंगस


Q15) कोण द्वितीय नियामक पुनरावलोकन प्राधिकरण (RRA 2.0) याला सहाय्य करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या सल्लागार गटाचे अध्यक्ष आहेत?

उत्तर :- एस. जानकीरमन


Q16) कोणती 2021 साली ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस’ याची संकल्पना आहे?

उत्तर :- सिंग, फ्लाय, सोअर – लाइक ए बर्ड!


Q17) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल मिथेन असेसमेंट’ या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?

उत्तर :-  क्लायमेट अँड क्लीन एअर कोएलिशन


Q18) ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे कोणत्या प्रकाराचे अभयारण्य आहे?

उत्तर :- सागरी अभयारण्य


Q19) कोणत्या संस्थेने लेखा आणि लेखापरीक्षण मानदंडांचे पालन करण्यासंबंधी कंपन्या व लेखा परीक्षकांचा तात्पुरता माहितीसंग्रह तयार केला?

उत्तर :-  राष्ट्रीय आर्थिक अहवाल प्राधिकरण


Q20)कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या ‘ड्राइव्ह-इन लसीकरण केंद्र’ याचे उद्घाटन झाले?

उत्तर:- मुंबई


Q21) कोणत्या व्यक्तीची आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड झाली?

उत्तर :- हेमंत बिस्वा सरमा


Q22) कोणत्या व्यक्तीने ‘2021 लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर’ हा पुरस्कार जिंकला?

उत्तर :-  राफेल नदाल


Q23) कोणता देश द्वितीय विश्वयुद्धात जर्मनी देशाने आत्मसमर्पण केल्याचा दिवस 'विजय दिन' म्हणून साजरा करतो?

उत्तर :- रशिया


Q24) कोणत्या संस्थेने ‘नेचर इन ए ग्लोबलाइज्ड वर्ल्डः कन्फ्लिक्ट अँड कन्झर्वेशन’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?

उत्तर :- IUCN


Q25) हिंद महासागरात अनियंत्रित स्थितीत पडलेला ‘लाँग मार्च 5B’ अग्निबाण कोणत्या देशाचा आहे?

उत्तर :- चीन


Q26) विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक सामाजिक कल्याणसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) तयार केलेल्या मोबाइल अॅपचे नाव काय आहे?

उत्तर :-  CBSE दोस्त फॉर लाइफ


Q27) राजकीय आणि धार्मिक संस्थांना SSE मंचाद्वारे निधी उभा करण्यास परवानगी न देण्याची शिफारस करण्यात आलेल्या सोशल स्टॉक एक्सचेंज (SSE) या मंचांच्या संदर्भातील तांत्रिक गटाचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :-  हर्ष कुमार भानवाला


Q28) कोणत्या राज्यात ‘हक्की पिक्की’ ही आदिवासी जमाती आढळते?

उत्तर :-  कर्नाटक


Q29) कोणते जल जीवन अभियानाच्या अंतर्गत ‘हर घर जल’ संकल्प पूर्ण करणारे दुसरे केंद्रशासित प्रदेश ठरले?

उत्तर :-  पुडुचेरी


Q30) कोणत्या संस्थेने “कनेक्टेड कॉमर्स: क्रिएटिंग ए रोडमॅप फॉर ए डिजिटली इंक्लूसिव भारत" या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला?

उत्तर :- नीती आयोग



आजची स्मार्ट प्रश्नमंजुषा


1)जागतिक नागरी संरक्षण संघटनेचे सदस्य देश किती आहेत?

1)59✅✅

2)18 निरीक्षक देश

3)56

4)45




2)जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी असतो?

1)28एप्रिल 

2)1जानेवारी

3)18मार्च

4)1मार्च✅✅




3)1मार्च 2021पासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिली लस कोणाला दिली?

1)गृहमंत्री अमित शहा

2)राष्ट्रपती रामनाथ कोविंद

3)उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू

4)पंतप्रधान नरेंद्र मोदि✅✅


पहिला टप्पा =6जानेवारी 2021



4)गोल्डन ग्लोबल पुरस्कार 2021 चा उकृष्ट परदेशी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटला मिळाला?

1)सोल

2)लो सी

3)मीनारी✅✅

4)नोमॅडलँड (93वा ऑस्कर :- सर्वोत्तम चित्रपट:- दिग्दर्शक क्लोई झाओ :- आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार फ्रान्सेस एम सीडॉर्मंड




5)भारतीय शाळकरी विद्यार्थीनी किती लघुग्रहांचा शोध लावला?

1)6

2)8

3)10

4)18✅✅





 9)PSLV-C-51 चे वजन किती आहे?

1)1500kg

2)1300kg

3)670kg

4)673kg✅✅ 28February 2021 successfully launched


Hight=44.4miter




 8)"जॉन्सन अँड जॉन्सन" च्या एका डोसच्या लशीला कोणत्या देशात मान्यता मिळाली?

1)रशिया

2)भारत

3)अमेरिका✅

4)कॅनडा




10)'ड'प्रथीनयुक्त गहू कोणी विकसित केला?

1)डॉ के. शिवन

2)डॉ आर उमामहेश्वरन

3)चिंतल वेंकट रेड्डी✅✅

4)राजीव मल्होत्रा

चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान



थेट प्रवाह कार्यवाही ( live stream proceedings) करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे?

(अ) कोलकाता

(ब) गुजरात✔️✔️

(क) चेन्नई

(ड) दिल्ली


 डीएसटी (DST) चा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी विशेष मुखपृष्ठ (a special cover) कोणी जारी केले आहे?

(अ) रविशंकर प्रसाद

(ब) नितीन गडकरी

(क) डॉ. हर्षवर्धन ✔️✔️

(ड) प्रकाश जावडेकर


जागतिक त्सुनामी जागृती दिन कधी साजरा केला जातो?

(अ) 4 नोव्हेंबर

(ब) 5 नोव्हेंबर✔️✔️

(क) 3 नोव्हेंबर


(ड) 2 नोव्हेंबर


# : फिशर लोकांच्या चांगल्या उपजीविकेसाठी कोणत्या राज्यात "Parivarthanam" योजना सुरू केली?


(अ) कर्नाटक

(ब) ओडिशा

(क) गोवा

(ड) केरळ✔️✔️

Explanation  : scheme for better livelihood of fisher folk?


कोणत्या देशाला दहशतवाद (State sponsors of Terrorism List) यादीमधून वगळण्यात आले आहे?

(अ) लेबनॉन

(ब) युएई

(क) सुदान✔️✔️

(ड) पाकिस्तान   


 

#  :देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती दिवस म्हणून साजरा केला जातो? 

अ) राष्ट्रीय शिक्षक दिन 

ब) राष्ट्रीय शिक्षण दिन ✔️✔️

क) जगातील विद्यार्थी दिन 

ड) शिक्षक दिन     


  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? 

अ) 25 वे 

ब) 26 वे    

क) 27 वे  

ड) 28 वे✔️     


अलीकडे केरळ सरकारने जेसी डॅनियल पुरस्कार 2020 कोणाला दिला आहे?

(अ) जयराम

(ब) मोहनलाल

(क) हरिहरन✔️✔️

(ड) दिलीप


Answer  : the JC Daniel Award 2020   

 अलीकडेच प्रसिद्ध व्यक्ती ‘फराज खान’ यांचे निधन झाले, ते कोण होते?

(अ) अभिनेता

(ब) लेखक✔️✔️

(क) गणितज्ञ

(ड) वैज्ञानिक


आंतर संसदीय संघटनेचे (IPU) नुकतेच अध्यक्ष कोण बनले?

(अ) अल्विरो क्लार्क

(ब) जेम्स केन

(क) रॉली फेरिस

(ड) डुआर्ते पाचेको✔️✔️


Answer  : Duarte Pacheco :- (Inter Parliamentary Union)


ऑक्टोबर 2020  रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?

(अ) 150 वी

(ब) 147 वी

(क) 155 वी

(ड) 145 वी✔️✔️


नुकतेच पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड ( Petronet LNG Limited) चे नवीन सीईओ कोण बनले?

(अ) राकेश कुमार सिंह

(ब) अक्षय कुमार सिंग✔️✔️

(क) मनीषसिंग राजपूत

(ड) आकाश प्रीत देवगौडा


कोणत्या टेनिस खेळाडूने नुकतेच पॅरिस मास्टर्स 2020 चे विजेतेपद जिंकले आहे?

(अ) डोमिनिक थीम

(ब) अलेक्झांडर झेवरेव

(क) डॅनियल मेदवेदेव✔️✔️

(ड) जिमी कॉनर्स


Answer  :-  Daniel Medvedev (the title of Paris Masters 2020 ) 


# : कोणत्या राज्यात, नुकताच भारताचा पहिला सौर आधारित पाणीपुरवठा प्रकल्प सुरू झाला?

(अ) मध्य प्रदेश

(ब) अरुणाचल प्रदेश

(क) हिमाचल प्रदेश✔️✔️

(ड) उत्तर प्रदेश


# : नुकताच अमेरिकेचा 46 वा राष्ट्राध्यक्ष कोण झाला?

(अ) हिलरी क्लिंटन

(ब) मार्टिन जोसेफ    

(क) रॉबिन चार्ल्स

(ड) जो बायडेन ✔️✔️   



ऑस्कर नामांकनासाठी कोणती शॉर्ट फिल्म पात्र ठरली आहे?

(अ) गल्ली बॉय 

(ब) मर्दानी 2

(क) नटखट✔️✔️

(ड) यापैकी काहीही नाही


आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिवस(International Day of Radiology) कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) November नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर





प्रशासकीय व अर्थसंकल्पीय प्रश्नांसाठी (Administrative and Budgetary Questions) यूएनच्या सल्लागार समितीत कोणाला निवडले गेले आहे?

(अ) विदिशा मैत्र✔️✔️

(ब) स्मृती इराणी

(क) निर्मला सीतारमण

(ड) किरण बेदी


 जागतिक शहरीकरण दिन (World Urbanism Day) कधी साजरा केला जातो?

(अ) 6 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर


 राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन (National Legal Services Day) दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) 7 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर

(क ) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर


प्रश्नः कोणत्या मंत्रालयाचे विस्तार व नाव बदलून, " बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालय " करण्यात आले आहे?

(अ) परिवहन मंत्रालय

(ब) नौवहन मंत्रालय✔️✔️

(क) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

(ड) यापैकी काहीही नाही


 केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी 3 नोव्हेंबर 2020 रोजी कोणत्या राज्यात साई (SAI) च्या नवीन क्षेत्रीय केंद्राचे उद्घाटन केले?

(अ) बिहार

(ब) हरियाणा

(क) पंजाब✔️✔️

(ड) राजस्थान

२४ सप्टेंबर २०२१

आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द : राजेश टोपे


मुंबई: आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे.

यासाठी उद्या शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत न्यासा नावाच्या कंपनीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रियेचे काम दिले होते.

उमेदवारांच्या अडचणी

- परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही

- अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळाले नाही

- प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही

- दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे अशक्य

- संकेतस्थळ अनेकदा हँग होते

आरोग्य विभागातील पदे

१) गट क : रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरीचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक

२) गट ड : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष/स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस... आदी

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१ :

संवर्ग : पदांची संख्या : आलेले अर्ज

गट क : २७२५ : ४,०५,०००

वस्तुनिष्ठ महाराष्ट्र :


महाराष्ट्रातील :अष्टविनायक
-----------------------------------------------------:
०१) महागणपती रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)
०७) वरद विनायक. महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला ठाणे.
०४) एकलहरे नाशिक.
०५) बीड. परळी वैजनाथ.
०६) फेकरी भुसावळ.
०७) पारस. अकोला.
०८) ऊरण. रायगड.
------------------------------------------------------------
-----------------------
🐆🐅🐿🐇 महाराष्ट्र : अभयारण्ये.🐇🐿🐅🐆
------------------------------------------------------------
-----------------------
कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) कर्नाळा, फनसाड रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.
०३) मालवण. सिंधुदुर्ग.
------------------------------------------------------------
-----------------------
पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे
------------------------------------------------------------
-----------------------
नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद
व जळगांव.
------------------------------------------------------------
-----------------------
अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.
अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.
नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) नागनागझिरा गोंदिया
०२) बोर. वर्घा व नागपुर
०३) अंधारी चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड.  गडचिरोली....

पुणे करार :- 24 सप्टेंबर 1932

◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी

◾️पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला.

◾️ दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता.

◾️ त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "येरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.

२३ सप्टेंबर २०२१

मिहान प्रकल्‍प

🔸नाव : Multi-Model International Passenger and Cargo Hub Airport at Nagpur’ (MIHAN).

🔹ठिकाण : नागपूर✅

🔸जागा : विमानतळालगतच्‍या अंदाजे 2000 हेक्‍टर परीसर

🔹 उद्दोगाचा समावेश : सौंदर्य प्रसाधने व दागिने, वस्‍ञोदृोग, इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तू, औषधे, अन्‍न धान्‍य प्रकिया, उदृोग आणि अशाच स्‍वरुपाच्‍या अन्‍य.

🔸क्षमता :  सुमारे 900 ट्रक एकाचवेळी ठेवता येतील एवढा वाहनतळ, मोठे भांडारग़ृह शीतसाठा खुले गुरांचे गोठे असलेला विस्‍तीर्ण थांबा आणि त्‍यालगतच ज्‍यावरुन एकाचवेळी दोन रेल्‍वे धावू शकतील अशी रेल्‍वे लाइनची सुविधा

🟠विशेष आर्थिक क्षेत्र (एसइझेड) पायाभूत सुविधा :

🔸सहापदरी, चारपदरी, तीनपदरी व दोनपदरी रस्‍त्‍यांचे जाळे

🔹कला- दूरसंचारण विस्‍तार

🔸रहिवासी/बिगर रहिवासी कारणाकरीता पाणीपूरवठा व्‍यवस्‍था (100 एमएलडी क्षमतेची)

🔹सांडपाण्‍याची निचरा व्‍यवस्‍था

🔸246 मेगावॅटचा व 25 एम डब्‍ल्‍य डिझेल बॅकअपचा विदृूत प्रकल्‍प

🔹करमणुकीची साधने- बहुविध चित्रपटगृह, गोल्‍फ कोर्स, पत्‍यांचा क्‍लब

🔸मिहान प्रकल्‍पाअंतर्गत काम करणा-या नोकरवर्गासाठी राहण्‍याची सुविधा

२२ सप्टेंबर २०२१

अंकगणित प्रश्नमंजुषा

डिजिटल कृषीव्यवस्था पुढे नेण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पाच खासगी कंपन्यांसोबत सामंजस्य करार..



🔰14 सप्टेंबर 2021 रोजी नवी दिल्लीत कृषी भवन येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने खासगी कंपन्यांसोबत पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.


🔰सिस्को, निंजाकार्ट, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, आयटीसी लिमिटेड आणि एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड (NeML) या खासगी कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले आहेत.


🔴ठळक बाबी...


🔰या प्रायोगिक प्रकल्पांनंतर, शेतकऱ्यांना शेतात कुठली पिके लावायची, कोणत्या प्रकारची बियाणे वापरायची, जास्तीत जास्त पीक येण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करायचा, अशा सगळ्या प्रश्नांवर, तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती पुरवली जाईल.


🔰पराप्त माहितीच्या आधारे ते अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्णय घेऊ शकतील. कृषी पुरवठा साखळी उद्योगात असलेले लोकही त्यांच्या खरेदीविषयक तसेच मालाच्या दळणवळणासाठीची मालवाहतूक व्यवस्था याविषयी अचूक आणि नेमका निर्णय घेऊ शकतील. 


🔰तयाशिवाय, आपल्या पिकांची विक्री करायची की साठा ठेवायचा याचा निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी हवामानाची पूर्वसूचनाही याच तंत्रज्ञानातून मिळू शकेल.

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती..



🔶 मानवी डोक्याचे वजन ?

→   १४०० ग्रॅम.

 

🔶 सामान्य रक्तदाब ? 

→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 


🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?

→   न्यूरॉन. 


🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?

→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.

→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 


🔶 शरिरातील एकूण रक्त ? 

→   ५ ते ६ लीटर.

 

🔶 सर्वात लहान हाड ? 

→   स्टेटस ( कानाचे हाड ) 


🔶 सर्वात मोठे हाड ?

→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 


🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?

→   १२० दिवस. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? 

→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? 

→   २ ते ५ दिवस. 


🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?

→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 


🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?

→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. 

→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 


🔶 हरदयाचे सामान्य ठोके ? 

→   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 


🔶 नाडी दर (पल्स रेट) ?

→   ७२ प्रतिमिनिट. 


🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?

→   थायरॉईड ग्रंथी. 


🔶 सर्वात मोठा स्नायू ?

→   ग्लुटियस म्याक्सीमस. 


🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?

→   ६३९.


🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?

→   मोनोसाईटस - ३ ते ८%. 

→   बेसोफिल्स - ०.५%. 

→   लिम्फोसाईटस - २० ते २५%. 

→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 


🔶 शरीराचे तापमान ? 

→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 


🔶 परौढांमधील दातांची संख्या ?

→   ३२.


 🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ?

→   २० दूधाचे दात. 


🔶 सर्वात पातळ त्वचा ? 

→   पापणी (कंजक्टायव्हा)


SCO देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 21 वी बैठक दुशान्बे (ताजिकिस्तान) येथे झाली.



🔰SCO (शांघाय सहकार्य संघटना) गटाच्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 21 वी बैठक संमिश्र स्वरुपात 17 सप्टेंबर 2021 रोजी दुशान्बे (ताजिकिस्तान) येथे पार पडली.


🔴ठळक बाबी...


🔰ही बैठक ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमाली रहमोन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.


🔰शिखर परिषदे नंतर शांघाय सहकार्य संघटना आणि सामुहिक सुरक्षा करार संघटना यांच्यात अफगाणिस्तानसंदर्भात सत्र झाले.


🔰पतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आणि अफगाणीस्तानसंदर्भातल्या SCO-CSTO संयुक्त सत्रात व्हिडीओ संदेशाद्वारे सहभागी झाले.


🔰भारताच्या विकास कार्यक्रमात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या भारताचे अनुभव पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले आणि ते ओपन सोर्स उपाय शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर देशांसमवेत सामायिक करण्याची तयारी दर्शवली.

ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’



💫भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या परिचारिका सेवेचे उपमहासंचालिका ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’ देवून सन्मानित केले.


💫राष्ट्रपती श्री  राम नाथ कोविंद यांनी एका आभासी समारंभात ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती सहीत एकूण 51 परिचारिकांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’ प्रदान केला आहे.


☄️पार्श्वभूमी..


💫1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातल्या जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत फिरणाऱ्या आणि आधुनिक परिचर्येचा पाया घालणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल (जन्‍म 12 मे 1820) यांचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश वंशाच्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका मानले जाते.


💫फलोरेन्स नायटिंगेल या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या. अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. नायटिंगल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करीत असत. रात्री हातात दिवा घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असल्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” असेही म्हटले जात असे.


💫1965 साली आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषद (इंटरनॅशनल काउंसिल ऑफ नर्सेस -ICN) तर्फे पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला होता. 1974 साली 12 मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ पाळण्याची घोषणा केली गेली.

२१ सप्टेंबर २०२१

सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प

🔸सुवर्ण चतुष्कोण हा भारत सरकारने हाती घेतलेला भारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प आहे.

🔹भारताचे माजी पंतप्रधान  अटलबिहारी  वाजपेयी  ह्यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाची घोषणा केली. 

🔸भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (भाराराप्रा) सुवर्ण चतुष्कोणासाठी जबाबदार आहे.

🔹ह्या योजनेअंतर्गत भारताची चार प्रमुख महानगरे  दिल्ली,  मुंबई,  कोलकाता  आणि चेन्नई ही भारताची चार प्रमुख महानगरे जोडली गेली आहेत.✅

🔸ही महानगरे चौपदरी वा सहापदरी द्रुतगतीमार्गांनी जोडली गेली आहेत.

🔹ह्या प्रकल्पातील रस्त्यांची एकुण लांबी ५,८४६ किमी आहे.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो २०२२ ला पाठवणार उपग्रह.



🔰सर्याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह २०२२ च्या तिसऱ्या तिमाहित प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने केली आहे. ‘आदित्य एल १’ असे या उपग्रहाचे नाव आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर ‘एल वन’ या पॉईंटवर हा उपग्रह कार्यरत असेल असं ‘मानव अवकाश उड्डाण केंद्र’ ( human spaceflight center )चे संचालक डॉ उन्नीकृष्णन नायर यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केलंय. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जिथे दोघांची गुरुत्वाकर्षण शक्ती समसमान असते त्या पॉइंटला ‘एल वन’ पॉईंट या नावाने ओळखलं जातं. या ठिकाणाहून सुमारे १५०० किलो वजनाचा ‘आदित्य एल वन’ उपग्रह विविध संवेदक आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करणार आहे.


🔰‘आदित्य’ मोहिम ही पूर्णपणे वैज्ञानिक मोहिम असणार आहे. पण त्या आधी आणखी एक वैज्ञानिक मोहिम हाती घेत असल्याची माहिती डॉ नायर यांनी दिली आहे. ‘X-PoSat’ही आणखी एक अवकाश दुर्बीण इस्त्रो पुढल्या वर्षी २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत अवकाशात पाठवणार आहे. अवकाशातील ‘वैश्विक क्ष किरण’ च्या स्त्रोताचा अभ्यास ही अवकाश दुर्बीण करणार आहे.


🔰विशेष म्हणजे ‘X-PoSat’ ही अवकाश दुर्बीण इस्त्रोच्या नव्या प्रक्षेपकासह प्रक्षेपित केली जाणार आहे. Small Satellite launch Vehicle ( SSLV ) असे या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून या वर्षाअखेरीस याचे उड्डाण नियोजित केले आहे. या प्रक्षेकामुळे अत्यंत कमी वेळेत तयारी करत ३०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह हे ५०० किलोमीटर उंचीपर्यंत पाठवणे शक्य होणार आहे.


🔰२०२०-२१ या काळांत तब्बल २० अवकाश मोहिमांचे नियोजन इस्त्रोने केले होते. मात्र करोनोनामुळे जेमतेम ४ उपग्रह प्रक्षेपण मोहिमा या शक्य झाल्यात. तेव्हा येत्या काळात अवकाश मोहिमांना वेग येईल अशी अपेक्षा आहे.

विश्वचषकानंतर विराट टी-२० कर्णधारपद सोडणार .



🔰सयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहलीने गुरुवारी ट्विटरवरून जाहीर केले; परंतु कसोटी आणि एकदिवसीय संघांचे कर्णधारपद सांभाळणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.


🔰२०१७मध्ये कोहलीने भारताच्या दोन्ही मर्यादित षटकांच्या संघांची कर्णधारपदाची सूत्रे महेंद्रसिंह  धोनीकडून स्वीकारली. 


🔰यानंतरच्या ६७ सामन्यांपैकी ४५ सामन्यांतच विराटला खेळवले गेले. त्याच्यावरील ताण कमी करण्यासाठी त्याला हल्ली टी-२० सामन्यांमधून विश्रांती दिली जाते.


🔰माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय टी-२० संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली. ही नियुक्ती विराटवर दबाव आणण्यासाठी आहे की त्याला साह्य करण्यासाठी आहे, याविषयी तर्क लढवले जाऊ लागले आहेत.

भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग



1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44

- पर्वीचे नाव NH 07

- लांबी 3745 km

- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)


2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27

- लांबी 3507 km

- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)


3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48

- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08

- लांबी 2807 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)


4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52

- लांबी 2317 km

- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)


5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30

- पूर्वीचे नाव NH 221

- लांबी 2040 km

- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)


6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06

- लांबी 1873 km

- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)


7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53

- लांबी 1781 km

- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)


8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16

- पूर्वीचे नाव NH 05

- लांबी 1711 km

- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)


9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66

- पूर्वीचे नाव NH 17

- लांबी 1622 km

- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)


10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19

- पूर्वीचे नाव NH 02

- लांबी 1435 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)

संपूर्ण मराठी व्याकरण-काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ


अढल : हुशार ,वाकबगार


अन्नगुरु : खादाड


अपट : पडदा, आडोसा


अपलाप : सत्य लपविणे


अपुत : अशुध्द ,अपवित्र


अपेत : दूर गेलेला


अबू : बाप


अबाब : सरकारी कर


आंदोली  :  हेलकावा, झोका


आदिष्ट  :  आज्ञा , हुकूम केलेला


आपगा  :  नदी


आभु  :  ब्रम्हा


आमण  :  आवण, चाकाचा आस ज्यात फिरतो ते


आयतन  :  जागा ,स्थळ


आलक  :  कपटी, लबाड, गुन्हेगार


आली  :  सखी, मैत्रीण,रांग,ओळ


महाराष्ट्रातील पंचायत राज महत्वाचे प्रश्न उत्तरे

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
> स्थानिक स्वराज्य संस्था.

2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
> 2 ऑक्टोबर 1953.

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
> 16 जानेवारी 1957.

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
> वसंतराव नाईक समिती.

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
> 27 जून 1960.

6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
> महसूल मंत्री.

7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
>226.

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
> जिल्हा परिषद.

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद).

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
>  1  मे 1962.

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966.

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
> 7 ते 17.

13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
>जिल्हाधिकारी.

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
> जिल्हाधिकारी.

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
> 5 वर्षे.

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
> पहिल्या सभेपासून.

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
> तहसीलदार.

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
> विभागीय आयुक्त.

19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> सरपंच.

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
>पंचायत समिती सभापती.

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> दोन तृतीयांश (2/3).

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> तीन चतुर्थांश (3/4).

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> पंचायत समिती सभापती.

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> संबंधित विषय समिती सभापती.

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> विभागीय आयुक्त.

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
> ग्रामसेवक.

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
> जिल्हा परिषदेचा.

30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून.

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
> ग्रामसेवक.

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे).

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
> राज्यशासनाला.

34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
> विस्तार अधिकारी.

35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
> ग्रामविकास खाते.

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
> जिल्ह्याचे पालकमंत्री.

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
> जिल्हाधिकारी.

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
> दहा (स्थायी+9 विषय समित्या).

39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा.

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
> वसंतराव नाईक.

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
> स्थानिक स्वराज्य संस्था.

2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
> 2 ऑक्टोबर 1953.

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
> 16 जानेवारी 1957.

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
> वसंतराव नाईक समिती.

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
> 27 जून 1960.

6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
> महसूल मंत्री.

7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
>226.

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
> जिल्हा परिषद.

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद).

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
>  1  मे 1962.

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966.

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
> 7 ते 17.

13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
>जिल्हाधिकारी.

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
> जिल्हाधिकारी.

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
> 5 वर्षे.

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
> पहिल्या सभेपासून.

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
> तहसीलदार.

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
> विभागीय आयुक्त.

19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> सरपंच.

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
>पंचायत समिती सभापती.

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> दोन तृतीयांश (2/3).

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> तीन चतुर्थांश (3/4).

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> पंचायत समिती सभापती.

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> संबंधित विषय समिती सभापती.

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> विभागीय आयुक्त.

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
> ग्रामसेवक.

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
> जिल्हा परिषदेचा.

30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून.

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
> ग्रामसेवक.

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे).

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
> राज्यशासनाला.

34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
> विस्तार अधिकारी.

35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
> ग्रामविकास खाते.

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
> जिल्ह्याचे पालकमंत्री.

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
> जिल्हाधिकारी.

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
> दहा (स्थायी+9 विषय समित्या).

39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा.

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
> वसंतराव नाईक.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...