२२ सप्टेंबर २०२१

अंकगणित प्रश्नमंजुषा

डिजिटल कृषीव्यवस्था पुढे नेण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पाच खासगी कंपन्यांसोबत सामंजस्य करार..



🔰14 सप्टेंबर 2021 रोजी नवी दिल्लीत कृषी भवन येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने खासगी कंपन्यांसोबत पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.


🔰सिस्को, निंजाकार्ट, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, आयटीसी लिमिटेड आणि एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड (NeML) या खासगी कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले आहेत.


🔴ठळक बाबी...


🔰या प्रायोगिक प्रकल्पांनंतर, शेतकऱ्यांना शेतात कुठली पिके लावायची, कोणत्या प्रकारची बियाणे वापरायची, जास्तीत जास्त पीक येण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करायचा, अशा सगळ्या प्रश्नांवर, तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती पुरवली जाईल.


🔰पराप्त माहितीच्या आधारे ते अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्णय घेऊ शकतील. कृषी पुरवठा साखळी उद्योगात असलेले लोकही त्यांच्या खरेदीविषयक तसेच मालाच्या दळणवळणासाठीची मालवाहतूक व्यवस्था याविषयी अचूक आणि नेमका निर्णय घेऊ शकतील. 


🔰तयाशिवाय, आपल्या पिकांची विक्री करायची की साठा ठेवायचा याचा निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी हवामानाची पूर्वसूचनाही याच तंत्रज्ञानातून मिळू शकेल.

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती..



🔶 मानवी डोक्याचे वजन ?

→   १४०० ग्रॅम.

 

🔶 सामान्य रक्तदाब ? 

→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 


🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?

→   न्यूरॉन. 


🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?

→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.

→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 


🔶 शरिरातील एकूण रक्त ? 

→   ५ ते ६ लीटर.

 

🔶 सर्वात लहान हाड ? 

→   स्टेटस ( कानाचे हाड ) 


🔶 सर्वात मोठे हाड ?

→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 


🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?

→   १२० दिवस. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? 

→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? 

→   २ ते ५ दिवस. 


🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?

→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 


🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?

→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. 

→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 


🔶 हरदयाचे सामान्य ठोके ? 

→   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 


🔶 नाडी दर (पल्स रेट) ?

→   ७२ प्रतिमिनिट. 


🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?

→   थायरॉईड ग्रंथी. 


🔶 सर्वात मोठा स्नायू ?

→   ग्लुटियस म्याक्सीमस. 


🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?

→   ६३९.


🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?

→   मोनोसाईटस - ३ ते ८%. 

→   बेसोफिल्स - ०.५%. 

→   लिम्फोसाईटस - २० ते २५%. 

→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 


🔶 शरीराचे तापमान ? 

→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 


🔶 परौढांमधील दातांची संख्या ?

→   ३२.


 🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ?

→   २० दूधाचे दात. 


🔶 सर्वात पातळ त्वचा ? 

→   पापणी (कंजक्टायव्हा)


SCO देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 21 वी बैठक दुशान्बे (ताजिकिस्तान) येथे झाली.



🔰SCO (शांघाय सहकार्य संघटना) गटाच्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 21 वी बैठक संमिश्र स्वरुपात 17 सप्टेंबर 2021 रोजी दुशान्बे (ताजिकिस्तान) येथे पार पडली.


🔴ठळक बाबी...


🔰ही बैठक ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमाली रहमोन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.


🔰शिखर परिषदे नंतर शांघाय सहकार्य संघटना आणि सामुहिक सुरक्षा करार संघटना यांच्यात अफगाणिस्तानसंदर्भात सत्र झाले.


🔰पतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आणि अफगाणीस्तानसंदर्भातल्या SCO-CSTO संयुक्त सत्रात व्हिडीओ संदेशाद्वारे सहभागी झाले.


🔰भारताच्या विकास कार्यक्रमात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या भारताचे अनुभव पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले आणि ते ओपन सोर्स उपाय शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर देशांसमवेत सामायिक करण्याची तयारी दर्शवली.

ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’



💫भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या परिचारिका सेवेचे उपमहासंचालिका ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’ देवून सन्मानित केले.


💫राष्ट्रपती श्री  राम नाथ कोविंद यांनी एका आभासी समारंभात ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती सहीत एकूण 51 परिचारिकांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’ प्रदान केला आहे.


☄️पार्श्वभूमी..


💫1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातल्या जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत फिरणाऱ्या आणि आधुनिक परिचर्येचा पाया घालणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल (जन्‍म 12 मे 1820) यांचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश वंशाच्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका मानले जाते.


💫फलोरेन्स नायटिंगेल या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या. अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. नायटिंगल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करीत असत. रात्री हातात दिवा घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असल्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” असेही म्हटले जात असे.


💫1965 साली आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषद (इंटरनॅशनल काउंसिल ऑफ नर्सेस -ICN) तर्फे पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला होता. 1974 साली 12 मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ पाळण्याची घोषणा केली गेली.

२१ सप्टेंबर २०२१

सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प

🔸सुवर्ण चतुष्कोण हा भारत सरकारने हाती घेतलेला भारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प आहे.

🔹भारताचे माजी पंतप्रधान  अटलबिहारी  वाजपेयी  ह्यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाची घोषणा केली. 

🔸भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (भाराराप्रा) सुवर्ण चतुष्कोणासाठी जबाबदार आहे.

🔹ह्या योजनेअंतर्गत भारताची चार प्रमुख महानगरे  दिल्ली,  मुंबई,  कोलकाता  आणि चेन्नई ही भारताची चार प्रमुख महानगरे जोडली गेली आहेत.✅

🔸ही महानगरे चौपदरी वा सहापदरी द्रुतगतीमार्गांनी जोडली गेली आहेत.

🔹ह्या प्रकल्पातील रस्त्यांची एकुण लांबी ५,८४६ किमी आहे.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो २०२२ ला पाठवणार उपग्रह.



🔰सर्याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह २०२२ च्या तिसऱ्या तिमाहित प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने केली आहे. ‘आदित्य एल १’ असे या उपग्रहाचे नाव आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर ‘एल वन’ या पॉईंटवर हा उपग्रह कार्यरत असेल असं ‘मानव अवकाश उड्डाण केंद्र’ ( human spaceflight center )चे संचालक डॉ उन्नीकृष्णन नायर यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केलंय. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जिथे दोघांची गुरुत्वाकर्षण शक्ती समसमान असते त्या पॉइंटला ‘एल वन’ पॉईंट या नावाने ओळखलं जातं. या ठिकाणाहून सुमारे १५०० किलो वजनाचा ‘आदित्य एल वन’ उपग्रह विविध संवेदक आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करणार आहे.


🔰‘आदित्य’ मोहिम ही पूर्णपणे वैज्ञानिक मोहिम असणार आहे. पण त्या आधी आणखी एक वैज्ञानिक मोहिम हाती घेत असल्याची माहिती डॉ नायर यांनी दिली आहे. ‘X-PoSat’ही आणखी एक अवकाश दुर्बीण इस्त्रो पुढल्या वर्षी २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत अवकाशात पाठवणार आहे. अवकाशातील ‘वैश्विक क्ष किरण’ च्या स्त्रोताचा अभ्यास ही अवकाश दुर्बीण करणार आहे.


🔰विशेष म्हणजे ‘X-PoSat’ ही अवकाश दुर्बीण इस्त्रोच्या नव्या प्रक्षेपकासह प्रक्षेपित केली जाणार आहे. Small Satellite launch Vehicle ( SSLV ) असे या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून या वर्षाअखेरीस याचे उड्डाण नियोजित केले आहे. या प्रक्षेकामुळे अत्यंत कमी वेळेत तयारी करत ३०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह हे ५०० किलोमीटर उंचीपर्यंत पाठवणे शक्य होणार आहे.


🔰२०२०-२१ या काळांत तब्बल २० अवकाश मोहिमांचे नियोजन इस्त्रोने केले होते. मात्र करोनोनामुळे जेमतेम ४ उपग्रह प्रक्षेपण मोहिमा या शक्य झाल्यात. तेव्हा येत्या काळात अवकाश मोहिमांना वेग येईल अशी अपेक्षा आहे.

विश्वचषकानंतर विराट टी-२० कर्णधारपद सोडणार .



🔰सयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहलीने गुरुवारी ट्विटरवरून जाहीर केले; परंतु कसोटी आणि एकदिवसीय संघांचे कर्णधारपद सांभाळणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.


🔰२०१७मध्ये कोहलीने भारताच्या दोन्ही मर्यादित षटकांच्या संघांची कर्णधारपदाची सूत्रे महेंद्रसिंह  धोनीकडून स्वीकारली. 


🔰यानंतरच्या ६७ सामन्यांपैकी ४५ सामन्यांतच विराटला खेळवले गेले. त्याच्यावरील ताण कमी करण्यासाठी त्याला हल्ली टी-२० सामन्यांमधून विश्रांती दिली जाते.


🔰माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय टी-२० संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली. ही नियुक्ती विराटवर दबाव आणण्यासाठी आहे की त्याला साह्य करण्यासाठी आहे, याविषयी तर्क लढवले जाऊ लागले आहेत.

भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग



1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44

- पर्वीचे नाव NH 07

- लांबी 3745 km

- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)


2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27

- लांबी 3507 km

- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)


3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48

- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08

- लांबी 2807 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)


4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52

- लांबी 2317 km

- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)


5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30

- पूर्वीचे नाव NH 221

- लांबी 2040 km

- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)


6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06

- लांबी 1873 km

- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)


7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53

- लांबी 1781 km

- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)


8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16

- पूर्वीचे नाव NH 05

- लांबी 1711 km

- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)


9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66

- पूर्वीचे नाव NH 17

- लांबी 1622 km

- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)


10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19

- पूर्वीचे नाव NH 02

- लांबी 1435 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)

संपूर्ण मराठी व्याकरण-काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ


अढल : हुशार ,वाकबगार


अन्नगुरु : खादाड


अपट : पडदा, आडोसा


अपलाप : सत्य लपविणे


अपुत : अशुध्द ,अपवित्र


अपेत : दूर गेलेला


अबू : बाप


अबाब : सरकारी कर


आंदोली  :  हेलकावा, झोका


आदिष्ट  :  आज्ञा , हुकूम केलेला


आपगा  :  नदी


आभु  :  ब्रम्हा


आमण  :  आवण, चाकाचा आस ज्यात फिरतो ते


आयतन  :  जागा ,स्थळ


आलक  :  कपटी, लबाड, गुन्हेगार


आली  :  सखी, मैत्रीण,रांग,ओळ


महाराष्ट्रातील पंचायत राज महत्वाचे प्रश्न उत्तरे

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
> स्थानिक स्वराज्य संस्था.

2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
> 2 ऑक्टोबर 1953.

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
> 16 जानेवारी 1957.

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
> वसंतराव नाईक समिती.

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
> 27 जून 1960.

6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
> महसूल मंत्री.

7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
>226.

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
> जिल्हा परिषद.

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद).

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
>  1  मे 1962.

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966.

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
> 7 ते 17.

13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
>जिल्हाधिकारी.

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
> जिल्हाधिकारी.

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
> 5 वर्षे.

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
> पहिल्या सभेपासून.

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
> तहसीलदार.

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
> विभागीय आयुक्त.

19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> सरपंच.

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
>पंचायत समिती सभापती.

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> दोन तृतीयांश (2/3).

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> तीन चतुर्थांश (3/4).

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> पंचायत समिती सभापती.

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> संबंधित विषय समिती सभापती.

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> विभागीय आयुक्त.

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
> ग्रामसेवक.

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
> जिल्हा परिषदेचा.

30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून.

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
> ग्रामसेवक.

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे).

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
> राज्यशासनाला.

34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
> विस्तार अधिकारी.

35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
> ग्रामविकास खाते.

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
> जिल्ह्याचे पालकमंत्री.

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
> जिल्हाधिकारी.

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
> दहा (स्थायी+9 विषय समित्या).

39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा.

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
> वसंतराव नाईक.

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
> स्थानिक स्वराज्य संस्था.

2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
> 2 ऑक्टोबर 1953.

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
> 16 जानेवारी 1957.

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
> वसंतराव नाईक समिती.

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
> 27 जून 1960.

6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
> महसूल मंत्री.

7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
>226.

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
> जिल्हा परिषद.

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद).

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
>  1  मे 1962.

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966.

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
> 7 ते 17.

13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
>जिल्हाधिकारी.

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
> जिल्हाधिकारी.

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
> 5 वर्षे.

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
> पहिल्या सभेपासून.

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
> तहसीलदार.

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
> विभागीय आयुक्त.

19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> सरपंच.

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
>पंचायत समिती सभापती.

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> दोन तृतीयांश (2/3).

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> तीन चतुर्थांश (3/4).

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> पंचायत समिती सभापती.

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> संबंधित विषय समिती सभापती.

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> विभागीय आयुक्त.

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
> ग्रामसेवक.

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
> जिल्हा परिषदेचा.

30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून.

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
> ग्रामसेवक.

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे).

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
> राज्यशासनाला.

34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
> विस्तार अधिकारी.

35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
> ग्रामविकास खाते.

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
> जिल्ह्याचे पालकमंत्री.

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
> जिल्हाधिकारी.

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
> दहा (स्थायी+9 विषय समित्या).

39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा.

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
> वसंतराव नाईक.

आज २१ सप्टेबर जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन...

विज्ञान युगात अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन आहे कि, २१ सप्टेबर १९९५ मध्ये गणपती दुध प्यायला अशी भली मोठी अफवा पसरवली होती, तिचे उच्चाटन व प्रबोधन करून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सत्यशोधन करून हि निव्वळ अफवा आहे हे सिद्ध केले होते, त्या दिवसापासून अंनीस ने २१ सप्टेबर हा दिवस "चमत्कार सत्यशोधन दिन "
म्हणजेच जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून घोषित केला आहे. श्रद्धा तपासून पाहण्याचं भान ठेवा. 'विज्ञानाच्या विकासाचा सारा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे' असे डॉ.दाभोळकर नेहमी म्हणत असे. समाजात वर्षानुवर्षे ज्या चुकीच्या रुढी-परंपरांचा पगडा आहे, त्या रुढी हद्दपार करण्यासाठी प्रवाहाविरुद्ध पोहत असताना होणाऱ्या त्रासाचं, येणाऱ्या अडचणीना न जुमानता महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज यांसारख्या समाजसुधारकांचे विचार प्रत्यक्षात यावेत, हाच या परिवर्तनवादी चळवळीमागचा हेतू आहे.

२० सप्टेंबर २०२१

शब्दाच्या जाती

1)नाम -
जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.

उदाहरण - घर, आकाश, गोड

2)सर्वनाम-

जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.

उदाहरण - मी, तू, आम्ही

3) विशेषण-

जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
उदाहरण - गोड, उंच

4)क्रियापद-

जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.

उदाहरण - बसणे, पळणे

5)क्रियाविशेषण-

जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरण - इथे, उद्या

6) शब्दयोगी अव्यय-

जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी

7) उभयान्वयी अव्यय-

जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - व, आणि, किंवा

8) केवलप्रयोगी अव्यय-

जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - अरेरे, अबब
___________________________________

सह्याद्रीतील प्रमुख घाट

घाट (किलोमीटरमध्ये लांबी) जोडलेली शहरे

आंबाघाट (११) रत्‍नागिरी-कोल्हापूर

आंबेनळी घाट () महाबळेश्वर-पोलादपूर

आंबोली-रामघाट (१२) सावंतवाडी– कोल्हापूर

कुंभार्ली घाट() चिपळूण-कराड

खंबाटकी-खंडाळा () पुणे-सातारा

चंदनापुरी घाट () नाशिक-पुणे

ताम्हिणी घाट () माणगाव (कोकण)-पुणे

दिवा घाट() पुणे-सासवड

थळघाट-कसार्‍याचा घाट (७)

नाशिक-मुंबई (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३)

पसरणी घाट () वाई-महाबळेश्वर

पारघाट (१०) सातारा-रत्नागिरी

फोंडाघाट (९) कोल्हापूर-गोवा

बोरघाट-खंडाळ्याचा घाट (१५)

पुणे-मुंबई (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४)

माळशेज घाट() आळेफाटा-कल्याण

रणतोंडी घाट () महाड-महाबळेश्वर

वरंधा घाट (६) भोर-महाड

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
नाईल (4,132 मैल)

2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
आशिया

3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
रशिया

4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
थ्री गोर्जस डँम (three gorges dam)

5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)

6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
ग्रीनलँड (Greenland)

7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?
अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)

8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
माउंट एव्हरेस्ट

9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
मौसीमराम

10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
जेफ बेझोस

11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?
बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)

12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?
बुर्ज खलिफा

13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
व्हॅटिकन सिटी

14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 
5

15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?
वॉल-मार्ट

16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
कतर

17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?
कांगो

18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 
एंजल फॉल्स

19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?
जपानमधील बुलेट ट्रेन

20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)

21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
चीन

22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 
इनलंड ताईपान

23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
गुरु

24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?
बुध

25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
21 जून

26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?
22 डिसेंबर

27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?
पॅसिफिक समुद्र

28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?
आर्टिक समुद्र

29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
बी हमिंग बर्ड

30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
शहामृग

31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?
नील आर्मस्ट्रॉंग

32) विमानाचा शोध कोणी लावला?
राईट बंधू

33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?
सनातन धर्म

34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?
हिरोशिमा

35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?
एस. भंडारनायके (लंका)

36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
टोकियो

37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?
महाभारत

38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?
द टाइम्स ऑफ इंडिया

39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?
नार्वे सुरंग

40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?
ग्रेट वॉल ऑफ चीन

41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?
चीन

42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?
पंडित जवहरलाल नेहरू

43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका

44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?
सिकंदर

45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?
दयाराम साहनी

46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?
गुरुगोविंद सिंग

47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?
रझिया सुलतान

48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?
राजा हरिश्चंद्र

49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?
झाशीची राणी

50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?
लॉर्ड मेकॉले

स्पर्धा परीक्षा तयारी-चालू घडामोडी प्रश्न


१) ‘हूरुन इंडिया फ्यूचर युनिकॉर्न लिस्ट २०२१’ याच्यानुसार, कोणता देश जगातील तिसरी सर्वात मोठी युनिकॉर्न/स्टार्टअप परिसंस्था ठरते?
उत्तर :- भारत

२) कोणत्या खेळाडूने ‘२०२० टोकियो पॅरालिम्पिक’मध्ये, पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकले?
उत्तर :-  हरविंदर सिंग

३) कोणत्या राज्यात ‘बैरासिउल वीजनिर्मिती केंद्र’ आहे?
उत्तर :-  हिमाचल प्रदेश

४) कोणत्या संस्थेला 'ड्युन अँड ब्रॅडस्ट्रीट - कॉर्पोरेट अवॉर्ड २०२१' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला?
उत्तर :- SJVN लिमिटेड

५) कोणत्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १२ सदस्यांच्या समितीची स्थापना केली, जी पत्रकार कल्याण योजनेच्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करणार आहे?
उत्तर :- अशोक कुमार टंडन

६) भारतीय हवाईदलाचे प्रमुख _ येथे ३० ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर २१ या कालावधीत झालेल्या ‘पॅसिफिक एअर चीफ्स सिम्पोजियम २०२१ (PACS-२१) या कार्यक्रमात उपस्थित होते.
उत्तर :- जॉइंट बेस पर्ल हार्बर-हिकम

७) कोणत्या रेल्वे स्थानकांना ५-स्टार 'ईट राइट स्टेशन' प्रमाणपत्र देण्यात आले आहे?
उत्तर :- चंदीगड रेल्वे स्थानक

८) कोणत्या ठिकाणी ३ सप्टेंबर २०२१ रोजी ६ वी ‘ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (EEF) शिखर परिषद’ याचे उद्घाटन झाले?
उत्तर :-  व्लादिवोस्तोक ( रशिया )

९) कोणत्या अंतराळ संस्थेने मंगळ ग्रहावरील खडकाचा पहिला नमुना यशस्वीरित्या गोळा केले?
उत्तर :- नासा ( अमेरिका )

१०) कोणत्या संघटनेने जगभरातून लीड-मिश्रित पेट्रोलचा वापर पूर्णपणे बंद झाला असल्याची घोषणा केली?
उत्तर :- UNEP ( संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम )

अनुशीलन समिती

🔸विसाव्या शतकाच्या प्रारंभीच पी. मित्र यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये कलकत्त्यास स्थापन झालेली पहिली क्रांतिकारी राजकीय संस्था

🔸युवकांना शिक्षण देण्यासाठी ह्या संस्थेतर्फे मंडळे स्थापण्यात येत व त्यांत शारीरिक कवायत, हत्यारे वापरणे, घोड्यावर बसणे, पोहणे, मुष्टियुद्ध इ. प्रकार शिकवले जात.

🔸गुप्त कार्यक्रमात निवडक लोकच घेतले जात. जे प्राणार्पणाची शपथ घेत त्यांना क्रांतिकारक चळवळीचे प्रशिक्षण देण्यात येत असे.

🔸वंगभंगाविरूद्ध झालेल्या प्रचंड चळवळीमुळे (१९०५) अनुशीलन समितीच्या कार्यास फार प्रोत्साहन मिळाले. ह्याच सुमारास अरविंद घोष, त्यांचे धाकटे बंधू बारिंद्रकुमार घोष व इतर अनेक देशाभिमानी लोक समितीच्या कार्यात सामील झाले.

🔸अध्यक्ष पी. मित्र ह्यांच्या प्रयत्नाने बंगालमध्ये समितीच्या अनेक शाखा स्यापन झाल्या. त्यातील प्रमुख शाखा डाक्का येथे पुलीनदास ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापण्यात आली.

🔸पुढे समितीत कार्यपद्धतीसंबंधी मतभेद होऊ लागले. बारिंद्रकुमार व त्यांचे तरुण सहकारी ह्यांना बाँब तयार करणे हे समितीचे आद्य कर्तव्य असावे असे वाटे,
तर समितीचे अध्यक्ष पी. मित्र ह्यांचे मत तात्कालिक हिंसक क्रंतीच्या विरुद्ध होते.

🔸 ह्या मतभेदांमुळे अनुशीलन समितीतच अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली ‘युगांतर समिती’ हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.

🔸पुढे समितीत तात्त्विक मतभेद वाढू लागले आणि त्यांतून तीन गट निर्माण झाले. डाक्का येथील पुलीनदास ह्यांचा, कलकत्त्यात पी. मित्र ह्यांचा व राशबिहारी बोस ह्यांचा असे तीन गट कार्य करू लागले; तथापि एकमेकांशी संपर्क मात्र ठेवला जात असे. आर्थिक व इतर स्वरूपाचा मदतही एकमेकांस देण्यात येई.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...