नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२३ ऑगस्ट २०२१
२२ ऑगस्ट २०२१
उभरते सितारे फंड’: निर्यातक्षम लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी नवीन कोष
🔰निर्यातक्षम लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना समर्पित असलेला नवीन कोष तयार करण्यात आला आहे. भारताचे वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 21 ऑगस्ट 2021 रोजी लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे 'उभरते सितारे फंड' याचा प्रारंभ केला.
🔰हा कोष भारतीय निर्यात-आयात बँक (एक्झिम बँक) आणि भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) यांच्यातर्फे प्रायोजित आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत सहाय्यासाठी पात्र असलेल्या कंपनीच्या वाढीच्या अडचणी ओळखून त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
🏵ठळक वैशिष्ट्ये
🔰‘राइजिंग स्टार प्रोग्राम’ याच्या अंतर्गत निधी मिळवण्यासाठी कंपनीची उलाढाल 500 कोटी रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
मोटार-वाहन, वाहनांचे सुटे भाग, विमान निर्मिती, कॅपिटल गुड्स, रसायने, संरक्षण, अन्नप्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, औषध निर्मिती, वस्त्रोद्योग या क्षेत्रातील कंपन्या निधी मिळविण्यासाठी पात्र ठरू शकतात.
🔰तसेच यामध्ये आधुनिकीकरण, तंत्रज्ञान/क्षमता सुधारणा, संशोधन आणि विकास आणि उत्पादन सुविधा यांचा समतोल साधण्यासाठी गुंतवणूक तसेच सल्ला सेवांचा समावेश आहे.
🔰यत्रसामुग्री, उपकरणे, चाचणी आणि गुणवत्ता नियंत्रण उपकरणे, भूखंड आणि इमारतीमध्ये गुंतवणूकीसाठी मुदत कर्ज घेतले जाऊ शकते.
उत्पादन सुधारणे, परदेशात बाजारपेठ विकासासाठी होणाऱ्या खर्चाव्यतिरिक्त, क्षेत्र आणि बाजाराच्या अभ्यासात मदत घेता येते.
🔰परारंभी, या कोषचा आकार 250 कोटी रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे, जो आवश्यक असल्यास 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
🔰या कार्यक्रमाच्या अंतर्गत, उद्योजकांना पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) याकडून मदत मिळेल. निधीसोबतच तांत्रिक मदत अर्थात सल्लागार सेवा देखील उपलब्ध असेल. सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्या या कार्यक्रमाच्या कक्षेत येतील.
२१ ऑगस्ट २०२१
पोलीस भरती 2020 - 21
(०१) राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.
(०२) लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.
(०३) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.
(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.
(०५) रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.
(०६) अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.
(०७) रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.
(०८) जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.
(०९) रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.
(१०) भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.
(११) आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.
(१२) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.
(१३) जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.
(१४) अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.
(१५) भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.
(१६) चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.
(१७) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.
(१८) जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.
(१९) नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.
(२०) भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.
(२१) उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.
(२२) 'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.
(२३) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.
(२४) ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.
(२५) भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.
(२६) उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.
(२७) भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.
(२८) जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.
(२९) दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.
(३०) भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.
(३१) मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.
(३२) कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.
(३३) जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १४ जून.
(३४) अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- गोल्फ.
(३५) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला.
(३६) समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.
(३७) भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.
(३८) जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.
(३९) मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- नेमबाजी.
(४०) दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर- रझिया सुलताना.
(४१) नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.
(४२) शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बाॅक्सिंग.
(४३) भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.
(४४) राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.
(४५) जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ आॅगस्ट.
(४६) सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.
(४७) चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॅडमिंटन.
(४८) भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.
(४९) काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.
(५०) जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १६
भारतातील सर्वात मोठे
Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?
-- राजस्थान
Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?
-- उत्तरप्रदेश
Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?
-- मुंबई ( महाराष्ट्र )
Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?
-- आग्रा
Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?
-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )
Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?
-- थर ( राजस्थान )
Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?
-- भारतरत्न
Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?
-- परमवीर चक्र
Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?
--रामेश्वर मंदिर
Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?
-- सेंट कथेड्रल, गोवा
Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?
-- सुवर्णमंदिर ,अमृतसर
Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?
-- जामा म्हशजीद
Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?
-- चिलका सरोवर ( ओरिसा )
तालिबानचे महिलांना सरकारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
🔰तालिबानने मंगळवारी देशातील सर्व लोकांना सार्वत्रिक माफी जाहीर करतानाच अभय दिले आहे. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी देशातील लोकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी ही घोषणा केली असून काल अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी लोकांनी विमानतळावर गर्दी केली होती.
🔰तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य इनामुल्ला समनगानी यांनी देशातील संघराज्य प्रशासनाच्या पातळीवरून प्रथमच भाष्य केले. काबूलमध्ये हिंसाचाराच्या कुठल्याही घटना झाल्या नसून लोक घरात बसले आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून तालिबानने तुरुंगातील कैद्यांना मुक्त केले असून शस्त्रागारे लुटली आहेत.
🔰समनगानी यांनी सांगितले की, इस्लामी अमिरात महिलांना लक्ष्य करू इच्छित नाही. उलट त्यांनी शरिया कायद्यानुसार सरकारमध्ये सामील व्हावे. सरकार कसे असेल याची अजून निश्चिाती झालेली नाही. पण पूर्णपणे इस्लामी नेतृत्व राहील, सर्वांनी या सरकारमध्ये सहभागी व्हावे.
अफगाणी नागरिकांसाठी भारताचा आपत्कालीन इ-व्हिसा
🔰अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हस्तगत केल्याच्या पार्श्वभूमीवर जे अफगाणी नागरिक भारतात येऊ इच्छित असतील त्यांना आपत्कालीन इ-व्हिसा जारी करण्याचे भारताने मंगळवारी जाहीर केले आहे.
🔰अफगाणिस्तानचे कुठल्याही धर्माचे नागरिक इ आपत्कालीन व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्या अर्जांवर नवी दिल्ली येथे प्रक्रिया केली जाईल. तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर दोन दिवसांनी भारताने ही घोषणा केली आहे. गृह कामकाज खात्याने अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहून इलेक्ट्रॉनिक व्हिसाची सुरुवात केली आहे, त्याला इ इमर्जन्सी व्हिसा असे संबोधण्यात येत आहे. यात जे ऑनलाइन अर्ज येतील त्यावर तातडीने प्रक्रिया करून संबंधित नागरिकांना भारतात येण्यास परवानगी दिली जाईल असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
🔰अधिकाऱ्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद असल्याने ऑनलाइन व्हिसा अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यावर दिल्लीत प्रक्रिया करण्यात येईल. हा व्हिसा सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असणार आहे. सुरक्षा बाबींचा विचार अर्ज मंजूर करताना केला जाणार आहे, त्यानंतरच अफगाणी नागरिकांना प्रवेश दिला जाईल. सर्व धर्माचे अफगाणी नागरिक या व्हिसासाठी अर्ज करू शकणार आहेत. शेकडो अफगाणी लोक काबूलमध्ये मुख्य विमानतळावर आले होते व त्यांनी लष्कराच्या जेट विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता.
अफगाणिस्तानच्या प्रश्नावर जी-७ देशांची बैठकमी.
🔰अफगाणिस्तानात सैन्य माघारीनंतर तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतरच्या परिस्थितीवर जी ७ देशांची आभासी बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन व ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ठरवले आहे. बायडेन व जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली.
🔰लष्कराचे शौर्य व व्यावसायिकता याची प्रशंसा करून त्यांनी म्हटले आहे की, काबूलमधून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराने मदत केली. अफगाणिस्तानबाबतचे धोरण पुढे नेण्यासाठी जागतिक समुदायासह सर्व मित्र देशात समन्वय असण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. मानवतावादी पातळीवर अफगाणी लोकांना मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे. दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तानातील घडामोडींवर संयुक्त धोरण ठरवण्यासाठी जी ७ देशांची बैठक घेण्याचे ठरवले आहे.
🔰जी ७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे. दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे अफगाणिस्तानातील परिस्थितीवर जागतिक पातळीवर वेगवेगळ्या देशांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत.
🔰तयांनी कतारचे उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री महंमद अब्दुलरहमान अल थानी व कुवेतचे परराष्ट्र मंत्री शेख अहमद नासेर अल महंमद अल सबाह यांना दूरध्वनी करून अमेरिकी लोक तसेच तेथील दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित परतीसाठी मदत केल्याबाबत आभार मानले आहेत, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी दिली. यापुढेही संपर्कात राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. रविवारी अफगाणिस्तानात तालिबानने काबूल जिंकून सत्ता प्रस्थापित केली होती. त्यावेळी अध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून गेले.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे, न्यायवृंदातर्फे ९ नावांची शिफारस.
🔰सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या पदांसाठी उच्च न्यायालयातील ३ महिला न्यायमूर्तींसह ९ नावांची शिफारस केंद्र सरकारला केली आहे.
🔰१७ ऑगस्टला झालेल्या बैठकीत न्यायवृंदाने ४ वेगवेगळ्या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस केली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले.
🔰या चौघांव्यतिरिक्त, कर्नाटक उच्च न्यायालयातील बी.व्ही. नागरत्न, केरळ उच्च न्यायालयातील सी.टी. रविकुमार, मद्रास उच्च न्यायालयातील एम. सुंदरेश आणि गुजरात उच्च न्यायालयातील बेला त्रिवेदी यांच्याही नावांची शिफारस करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील आणि माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिंहा यांच्या नावाला मंजुरी मिळाल्यास, वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होणारे ते सहावे वकील ठरतील.
🔰जया निरनिराळ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे, त्यात अभय ओक (कर्नाटक उच्च न्यायालय), विक्रम नाथ (गुजरात उच्च न्यायालय), जितेंद्र कुमार माहेश्वारी (सिक्कीम उच्च न्यायालय) आणि हिमा कोहली (तेलंगण उच्च न्यायालय) यांचा समावेश आहे. न्या. आर. एफ. नरिमन हे १२ ऑगस्टला निवृत्त झाल्यानंतर, ३४ न्यायमूर्तींची मंजूर क्षमता असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या सरन्यायाधीशांसह २५ वर आली होती. न्या. नवीन सिन्हा हेही बुधवारी निवृत्त होत असून त्यामुळे ही संख्या ३३ वर येईल.
🔰उल्लेखनीय म्हणजे, तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १९ मार्च २०१९ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात एकाही न्यायमूर्तींची नियुक्ती झालेली नाही.
लढाऊ विमानासाठी DRDO संस्थेने विकसित केले प्रगत शाफ तंत्रज्ञान.
🔰भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) भारतीय हवाई दलासाठी ‘प्रगत शाफ तंत्रज्ञान’ (Advanced Chaff Technology) विकसित केले आहे.
🔰‘प्रगत शाफ तंत्रज्ञान’ हे शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्याच्या धोक्यापासून लढाऊ विमानांचे संरक्षण करणारे तंत्रज्ञान आहे.
🔰DRDO संस्थेच्या जोधपुर येथील संरक्षण प्रयोगशाळा आणि पुणे येथील उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा (HEMRL) येथे काम करणाऱ्या संशोधकांनी सहकार्याने भारतीय हवाई दलाच्या दर्जात्मक पात्रता पूर्ण करणारे शाफचे साहित्य आणि शाफचे 118/I कार्ट्रीज तयार केले.
🔰भारतीय हवाई दलाला दरवर्षी आवश्यक असलेल्या शाफचा पुरवठा व्हावा करण्याच्या उद्देशाने हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी उद्योगांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
🔴शाफ तंत्रज्ञानाचे महत्व..
🔰सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या युगात, आधुनिक रडार तंत्रज्ञानाचे धोके वाढत असल्यामुळे लढाऊ विमानांचे संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय झाला आहे. विमानांना वाचविण्याची खात्री करून घेण्यासाठी इन्फ्रा-रेड आणि रडार यांच्या धोक्याला अप्रत्यक्षपणे पायबंद घालणारी CMDS प्रणाली वापरण्यात येते. शाफ हे शत्रूच्या रडारच्या धोक्यापासून वाचविणारे अत्यंत महत्त्वाचे संरक्षण तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात वापरलेले शाफचे साहित्य हवेत असताना शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशाभूल करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि आणि त्यायोगे आपल्या लढाऊ विमानांचे संरक्षण करणे शक्य होते.
महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या 🏳️ सीमा
१) मध्य प्रदेश 🐯 :-
नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया..
२) कर्नाटक 🌮 :-
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड..
३) आंध्र प्रदेश 🍂 :-
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड..
४) गुजरात 🌾 :-
ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे..
५) दादरा, नगर-हवेली 🏄🏼 :-
ठाणे, नाशिक..
६) छत्तीसगड ⛰:-
गोंदिया, गडचिरोली..
७) गोवा 🌴:-
सिंधुदुर्ग..
सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे
1) काशी - बनारस
2) कोसल -लखनौ
3) मल्ल - गोरखपूर
4) वत्स - अलाहाबाद
5) चेदि - कानपूर
6) कुरु - दिल्ली
7) पांचाल- रोहिलखंड
8) मत्स्य - जयपूर
9) शूरसेन - मथुरा
10)अश्मक- औरंगाबाद(महाराष्ट्र)
11) अवंती - उज्जैन
12) अंग - चंपा-पूर्व बिहार
13) मगध - दक्षिण-बिहार
14) वृज्जी - उत्तर बिहार
15) गांधार -पेशावर
16) कंबोज -गांधारजवळ
महत्त्वाचे सरोवरे / तलाव
1] जम्मू काश्मीर
१) वूलर सरोवर
२) दाल सरोवर
३) सुरजताल
४) पोंग गोंग त्सो
________________________
2] हिमाचल प्रदेश
१) चुंद्रताल
२) खोजीहार सरोवर
३) नाको सरोवर
४) रेणुका सरोवर
________________________
3] उत्तराखंड
१) नैनीताल
२) भीमताल
३) सातरसाल
४)रामकुंड
५) पुनाताल
६) मालवताळ
७) नौकुचियाताल
________________________
4] राजस्थान
१) ढेंबर सरोवर (जैसा मंडप )
२) पुष्कर सरोवर
३) सांबर सरोवर
________________________
5] ओडिशा
१) चिल्का सरोवर
________________________
6] आंध्र प्रदेश
१) पुलिकत सरोवर
________________________
7] तामिळनाडू
१) कलीदेवी सरोवर
________________________
8] केरळ
१) अष्टमुडी सरोवर
२) सस्थम कोट्टा सरोवर
३) वेम्बनाड
________________________
9] सिक्कीम
१) खेचोपलरी सरोवर
२) त्सागमो सरोवर
________________________
10] ईशान्य भारत
१) लोकटक सरोवर (तरंगते सरोवर )
२) रामसार संकेतानुसार आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश
महत्त्वाचे विविध ऑपरेशन
❇️ऑपरेशन नमस्ते:-
✍️कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले.
❇️ऑपरेशन मिशन सागर:-
✍️विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारताने सुरू केले.
❇️ऑपरेशन शिल्ड:-
✍️कोरोना चा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केले.
❇️ऑपरेशन समुद्र सेतू:-
✍️इतर देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलने सुरू केले.
❇️ऑपरेशन संजीवनी:-
✍️मालदीव ला वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलने सुरू केले.
❇️ऑपरेशन क्रॅकडाऊन 2:-
✍️गन्हेगार ची झाडाझडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केले.
❇️ऑपरेशन ब्लॅक फेस:-
✍️चाईल्ड पोर्नोग्राफी वर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुरू केले.
❇️ऑपरेशन मुस्कान:-
✍️अपहरण झालेल्या मुलांना शोधण्यासाठी पालघर पोलिसांनी सुरू केले.
भारतातील प्रथम महिला
🔸1] जागतिक सौंदर्य - रीटा फरिया
🔹2] ऑलिम्पिक पदक विजेता - कर्णम मल्लेश्वरी
🔸3] एअरलाईन पायलट - दुर्बा बॅनर्जी
🔹4] अंतराळात जाणारी पहिली - कल्पना चावला
🔸5] माउंट एव्हरेस्ट - बचेंद्री पाल
🔹6] इंग्लिश खाडीमध्ये पोहोणारी -आरती साहा
🔸7] "भारतरत्न" प्राप्त करणारे संगीतकार - एम.एस. सुब्बुलक्ष्मी
🔹8] आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक - कमलजित संधू
🔸9] बुकर पुरस्कार विजेता - अरुंधती रॉय
🔹10] डब्ल्यूटीए टायटल विनर - सानिया मिर्झा
🔸11] नोबेल पारितोषिक विजेता - मदर टेरेसा
🔹12] ज्ञानपीठ पुरस्कार विजेता - आशापूर्णा देवी
🔸13] अशोक चक्र प्राप्तकर्ता - निरजा भनोट
🔸14] राष्ट्रपती - श्रीमती प्रतिभा पाटील
🔹15] पंतप्रधान - श्रीमती इंद्र गांधी
🔸16] मुख्यमंत्री - सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)
🔹17] सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश - मीरा साहिब फातिमा बीबी
🔸18] संयुक्त राष्ट्रातील राजदूत - विजयालक्ष्मी पंडित
🔹19] केंद्रीय मंत्री - राजकुमारी अमृता कौर
🔸20] मिस युनिव्हर्स - सुष्मिता सेन
🔹21] राज्यपाल - सरोजिनी नायडू
🔸22] शासक (दिल्लीची गादी) - रझिया सुल्तान
🔹23] आयपीएस अधिकारी - किरण बेदी
जागतिक महत्वाचे दिन
1. ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस
2. १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस
3. २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस
4. २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
5. ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस
6. ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन
7. २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस
8. २१ मार्च - जागतिक कविता दिवस
9. २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस
10. २२ मार्च - जागतिक जल दिवस
11. २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन
12. ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
13. २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस
14. २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन
15. २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस
16. ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस
17. १५ मे - जागतिक कुटुंब दिन
18. २२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस
19. ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन
20. १ जून - वैश्विक पालक दिन
21. ५ जून - जागतिक पर्यावरण दिन
22. ८ जून - जागतिक महासागर दिन
23. १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन
24. १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस
25. १९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन
26. २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस
27. २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन
28. २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस
29. ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन
30. १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन
31. १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस
32. १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन
33. १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन
34. २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस
35. ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
36. १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
37. १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस
38. २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन
39. २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस
40. १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन
41. २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
42. ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन
43. ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन
44. ९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन
45. १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन
46. ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन
47. १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस
48. १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन
49. १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस
50. २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस
51. ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन
52. ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस
53. १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन
54. १४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन
55. १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस
56. १७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस
57. २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन
58. २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस
59. २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस
60. २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस
61. ०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस
62. ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन
63. ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन
64. ०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस
65. ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन
66. १० डिसेंबर - मानवी हक्क दिवस
67. ११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस
68. १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस
69. २० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस
70. २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह
२०२१ : भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन
🇬🇧 बरिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले
🇮🇳 २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने तिरंगा हा ध्वज भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला
🎵 " जन गन मन " २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले
🎵 रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत , वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत
👤 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (त्यांना माउंटबॅटन यांनी पदाची शपथ दिली)
📌 भारताला १५१०६.७ किमी आंतरराष्ट्रीय सीमा तर ७५१६.६ किमी समुद्र सीमा लाभली आहे
🔝 सर्वाधिक लांब आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेले देश : ०१) रशिया ०२) चीन ०३) भारत
👮♂️ भारत - पाकिस्तान यांच्यातील सीमा रेषा " रेडक्लिफ " नावाने ओळखली जाते (३३२३ किमी)
👤 नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून यंदा सलग आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं
📌 सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान : पं. नेहरु (१७) , इं. गांधी (१६) , म. सिंह (१०)
🌐 १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन : बहरेन , कॉंगो , द. कोरिया , उ. कोरिया व लिकटेंस्टाईन
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.
२०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदकं जिंकली होती.
नीरज चोप्रा - सुवर्णपदक
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे.
मीराबाई चानू - रौप्यपदक
टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळाले. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिले पदक मिळून दिले.
भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. याआधी सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते.
पीव्ही सिंधू - कांस्यपदक
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला.
या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले.
लव्हलिना बोर्गोहेन - कांस्यपदक
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला.
उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे.
रवी दहिया - रौप्यपदक
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कामगिरी केली आहे. मात्र ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
फायनलमध्ये रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना ७-४ ने जिंकला. त्यामुळे रवीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
पुरुष हॉकी संघ - कांस्यपदक
तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव केला.
बजरंग पुनिया - कांस्यपदक
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरल.
चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे
प्रश्न१) माजी फुटबॉलपटू गेरहार्ड मुलर यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे निवासी होते?
उत्तर :- जर्मनी
प्रश्न२) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने १६ ऑगस्ट २०२१ रोजी ‘विधितः हस्तांतरण दिवस’ (De Jure Transfer day) साजरा केला?
उत्तर :- पुडुचेरी
प्रश्न३) अमेरिकेच्या संसदेत _ यांना मरणोत्तर “काँग्रेशनल गोल्ड मेडल” देवून सन्मानित करण्याविषयीचा ठराव मांडण्यात आला आहे.
उत्तर :- महात्मा गांधी
प्रश्न४) खालीलपैकी कोणता ‘सुभद्रा कुमारी चौहान’ यांचा व्यवसाय होता, ज्यांना गुगल कंपनी त्याच्या डूडलमार्फत श्रद्धांजली वाहिली?
उत्तर :- कवी
प्रश्न५) कोणत्या देशात २८,००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या ‘बोरिस’ आणि ‘स्पार्टा’ अशी टोपणनावे दिलेल्या गुहेत राहणाऱ्या सिंहाच्या पिल्लांचे जीवाश्म सापडले?
उत्तर :- रशिया
प्रश्न६) कोणत्या ठिकाणी जगातील द्वितीय क्रमांकाची सर्वात मोठी पुनर्वापरायोग्य राष्ट्रीय जीन बँक उघडण्यात आली?
उत्तर :- नवी दिल्ली
प्रश्न७) खालीलपैकी कोणते परिसरात अग्निशमन स्थानक असलेले पहिले रुग्णालय ठरले?
उत्तर :- AIIMS दिल्ली
प्रश्न८) _ या वर्षापर्यंत विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या तांदळाच्या प्रबलीकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली.
उत्तर :- २०२४
प्रश्न९) कोणत्या वनस्पती-जातीची नावे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन आणि माजी आरोग्य मंत्री के. शैलजा यांच्या नावावरून ठेवण्यात आले?
उत्तर :- वाइल्ड बाल्सम
प्रश्न१०) कोणत्या कंपनीने ‘विकास’ इंजिन तयार केले?
उत्तर :- गोदरेज अँड बॉयस आणि एमटीएआर टेक्नोलॉजीज
● कोणत्या व्यक्तीने “२०२१ स्पिलिम्बर्गो ओपन” बुद्धिबळ स्पर्धा जिंकली?
उत्तर : रौनक साधवानी
● पंतप्रधान मुहिद्दीन यासिन यांनी पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते?
उत्तर : मलेशिया
● कोणत्या भारतीय जहाजाचा भारत आणि ब्रिटन यांच्या नौदलांच्या दरम्यानच्या 'एक्झरसाइज कोंकण २०२१' या वार्षिक कवायतीमध्ये सहभाग होता?
उत्तर : INS तबर
● कोणत्या संस्थेने 'हिंदुस्थान-228' नावाने नागरीवाहतूकीचे विमान बनवण्यासाठी भू-चाचणी यशस्वीपणे पार पाडली?
उत्तर : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
● कोणत्या कार्यक्रमाच्या अंतर्गत “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 3.0” (SEP 3.0) याचा प्रारंभ करण्यात आला?
उत्तर : अटल इनोव्हेशन मिशन
● कोणत्या संस्थेला नागरी उड्डाण मंत्रालयाने विविध उद्देशांसाठी ड्रोन यंत्रांचा वापर करण्यासाठी सशर्त परवानगी दिली?
उत्तर : स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया
● कोणत्या संस्थेने “टोमॅटो लीफ कर्ल न्यू दिल्ली वायरस” (ToLCNDV) संसर्गावर प्रभावी संरक्षण पद्धती शोधून काढली?
उत्तर : नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जीनोम रिसर्च
● गाझा पट्टी किंवा गाझा हा भूमध्य समुद्राच्या पूर्व किनारपट्टीवर असलेला स्वशासनाखाली चालणारा कोणता भूप्रदेश आहे?
उत्तर : पॅलेस्टिन
महाराष्ट्र पोलीस दल विशेष
🔸महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?
दिलीपराव वळसे पाटील
🔸पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?
गृहमंत्रालय
🔸पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?
राज्यसूची
🔸राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते?
दक्षता
🔸भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?
तेलंगणा
🔸सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे?
हैदराबाद
🔸महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
संजय पांडे
🔸महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक कोण आहेत?
रजनीश सेठ
🔸महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?
सदरक्षणाय खलनिग्रहणाय
🔸महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?
पोलीस महासंचालक
🔸महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?
मुंबई
🔸सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?
सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट
🔸महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?
पंचकोणी तारा
🔸पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?
21 ऑक्टोबर
🔸सीआरपीएफचे पूर्ण नाव काय? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स
🔸महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
पुणे
🔸पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?
शिपाई
🔸महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?* काटोल, जि. नागपूर
🔸महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे? हाताचा पंजा
🔸जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?
पोलीस अधीक्षक
🔸महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?
गडद निळा
🔸शरी. संजय पांडे महाराष्ट्र राज्याचे कितवे पोलीस महासंचालक आहेत ?
48 वे
🔸मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?
हेमंत नगराळे
🔸मबई लोहमार्ग पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?
कायजर खालीत
🔸राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?
राज्यशासन
🔸पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?
महानिरीक्षक
🔸FIR चा फुल फॉर्म काय ?
first information report
🔸महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?
जय जीत सिंह
🔸गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?
गृहरक्षक दल , तुरुंग
🔸महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?
पुणे
🔸भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?
केपी-बोट
🔸राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?
1948
🔸भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ?
जनरल बिपिन रावत
🔸दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ? - _राजनाथ सिंह_
______________________________
🟠 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. 🟠
______________________________
🔸 राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?
पोलीस महासंचालक.
🔸 चद्रपूर जिल्ह्यात सर्वांत जास्त आढळणारी आदिवासी जमात कोणती ?
गोंड.
🔸 महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?
नागपूर.
🔸 मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो
२० ऑगस्ट २०२१
१५ ऑगस्ट २०२१
यशाचा राजमार्ग राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा निकाल
लहान गट :- पहिली ते चौथी
जय सचिन साळवे प्रथम
प्रणिती संग्रामसिंह जाधव द्वितीय
मृणाल मुकुंद वलेकर तृतीय
आर्या संदीप तरटे उत्तेजनार्थ
ईश्वरी प्रदीप जाधव उत्तेजनार्थ
किमया अभिषेक चोपडे उत्तेजनार्थ
अपेक्षा वैजनाथ गायकवाड उत्तेजनार्थ
अस्मिता आवी कोपर्डे उत्तेजनार्थ
मध्यम गट :- पाचवी ते नववी
रिया जितेंद्र जोगळे प्रथम
शिवानी रवींद्र येरकल द्वितीय
पूर्वा रामदास चांदरकर तृतीय
श्रेया सुरेश निंबाळकर उत्तेजनार्थ
शिवध्वज गणेश गोडसे उत्तेजनार्थ
शुभांगी सनिल कर्डक उत्तेजनार्थ
दिव्या संजय भोसले उत्तेजनार्थ
खुला गट :-
प्रांजली बाबु वाघमारे & मिनेश भाऊसाहेब मेंगल प्रथम
अभिजीत मोहन शिंदे द्वितीय
ऋतुजा धोंडीराम पारसे तृतीय
तेजश्री भाऊसाहेब पवार उत्तेजनार्थ
अपूर्वा अनिल पाटील उत्तेजनार्थ
मृणाल मोहन जाधव उत्तेजनार्थ
समिक्षा गणेश गुमटे उत्तेजनार्थ
सोनाली जालिंदर खराडे उत्तेजनार्थ
सर्वांचे हार्दिक अभिनंदन
०८ ऑगस्ट २०२१
जगावर आता ‘डेल्टा’ संकट.
🔰मळ करोना विषाणूपेक्षा घातक आणि अधिक वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या ‘डेल्टा’चा अमेरिका, चीनसह १३२ देशांमध्ये फैलाव झाला आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे करोनाविरोधातील लढ्याचे स्वरूप बदलले आहे, असे अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ने (सीडीसी) स्पष्ट केले आहे.
🔰‘डेल्टा’मुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या अनुषंगाने स्पष्ट संदेश प्रसारित करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरणाची सक्ती आणि मुखपट्टीचा वापर या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता ‘सीडीसी’ने अधोरेखित केली आहे.
🔰करोना विषाणूचा डेल्टा हा उत्परिवर्तित प्रकार प्रथम भारतात आढळला आणि आता त्याचा फैलाव जगभरात झाल्याचे ‘सीडीसी’च्या अंतर्गत अहवालामध्ये म्हटले आहे. हा विषाणू कांजण्यांच्या विषाणूप्रमाणे वेगाने पसरतो. तसेच सर्दीच्या विषाणूपेक्षाही त्याचा प्रादुर्भाव वेगाने होतो, असेही ‘सीडीसी’ने नमूद केले आहे.
🔰‘इम्प्रुव्हिंग कम्युनिकेशन्स अराऊंड व्हॅक्सिन ब्रेकथ्रू अँड व्हॅक्सिन इफेक्टिव्हनेस’ या अहवालात ‘डेल्टा’च्या धोक्याबद्दल इशारा देण्यात आला आहे. डेल्टाचा सामना करण्यासाठी नव्या योजना आखाव्या लागणार आहेत. त्याचा धोका लोकांना समजून सांगावा लागणार आहे.
१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणार ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार; मोदींचे ‘खास पाहुणे’ म्हणून लावणार उपस्थिती.
🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना भेटणार आहेत. या कार्यक्रमामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत १३० कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या १२७ खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे.
🔰सवातंत्र्यदिनानिमित्त हे सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. टोक्योमध्ये भारताचे १२७ खेळाडू १८ क्रीडा प्रकारांत सहभागी झालेत. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर या खेळाडूंना पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
🔰समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी प्रत्येक खेळाडूची भेट घेणार असून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. “१५ ऑगस्टर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूतील सर्व खेळाडूंना लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करणार आहेत. ते प्रत्येक खेळाडूची भेट गेणार आहेत तसेच त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत,” असं एएनआयने म्हटलं आहे.
🔰तसेच लाल किल्ल्यावरील सत्कार सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खेळाडूंना त्यांच्या शासकीय निवासस्थानी आमंत्रित करणार आहे. या ठिकाणी ते खेळाडूंशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं घडवला इतिहास, कांस्यपदकावर कोरलं नाव.
🔰भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे.
🔰अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.
🔰उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले.
सर्वाधिक उंचीवरचा रस्ता भारतात बांधण्यात आला.
🔰सीमा रस्ते संघटनेने (BRO) भारतीय हद्दीत जगातील सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधला आहे.
🔰पर्व लड्डाखमध्ये “उमलिंग ला पास” या ठिकाणी 19300 फूट उंचीवर हा रस्ता बनविण्यात आला आहे. 52 किलोमीटर लांबीचा हा रस्ता लडाखच्या चुमार सेक्टरच्या महत्वाच्या छोट्या छोट्या शहरांना जोडतो.
🔰याआधी जगात सर्वात उंचीवरचा रस्ता हा बोलिव्हिया देशामध्ये होता. तो रस्ता समुद्रसपाटीपासून 18,953 फूट एवढ्या उंचीवर आहे.
🔴सीमा रस्ते संघटना (BRO) विषयी..
🔰भारत सरकारची सीमा रस्ते संघटना (BRO) ही भारतीय सीमेलगतच्या भागात रस्त्यांचे जाळे उभारण्याचे काम करते. ही संस्था भारतीय लष्कराच्या भूदलाचा एक भाग असलेली संघटना आहे. तसेच लडाख, काश्मीर सारख्या दुर्गम भागात लष्करी दळणवळणासोबत सामान्यांच्या वापरासाठी ही संस्था रस्ते बनविते.
जर्मनी: सुधारित आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश..
🔰5 ऑगस्ट 2021 रोजी, जर्मनी हा आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर युती करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश ठरला आहे.
🔴आतरराष्ट्रीय सौर युती विषयी..
🔰2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.
🔰गडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.
🔰पतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली.
🔰आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) हा सुरुवातीला केवळ 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम होता. आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यापासून, आता आंतरराष्ट्रीय सौर युतीचा भाग बनण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य देशांसाठी हा करार खुला करण्यात आला आहे.
उडान योजनेच्या अंतर्गत 780 हवाई मार्गांना मान्यता..
🔰भारताला हवाई मार्गाने देशातील सर्व प्रदेशांशी जोडण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून उडान (UDAN) योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 780 मार्गांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 359 हवाई मार्ग वर्तमानात कार्यरत केले गेले आहेत.
🔴ठळक बाबी...
🔰कोविड महामारीच्या काळात, विमान कंपन्यांद्वारे मालाची हाताळणी 2 टक्क्यांवरून 19 टक्क्यांपर्यंत वाढली.
भारतात हवाई मालवाहतुक करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढविण्यात आली असून सध्या 28 संचालक कंपन्या मान्य करण्यात आल्या आहेत.
योजनेच्या अंतर्गत 59 नवीन विमानतळांची स्थापना करण्यात आली आहे.
🔴उडान (उडे देश का आम नागरिक) योजना..
🔰भारत सरकारची उडान (उडे देश का आम नागरिक) या नावाची प्रादेशिक जोडणी योजना (RCS) एप्रिल 2017 मध्ये सुरू करण्यात आली. भारतातील सामान्य नागरिकांना विमान प्रवास व्यापक आणि स्वस्त करण्याच्या उद्देशाने या योजनेची रचना करण्यात आली आहे.
🔰या योजनेच्या अंतर्गत पहिल्या फेरीत 5 हवाईसेवा कंपनींना 128 मार्गिका प्रदान करण्यात आल्या आहेत. योजनेच्या अंतर्गत निवडलेल्या विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण प्रवासभाड्यापैकी 50 टक्के भाडे केंद्र आणि राज्य सरकाराकडून अनुदान किंवा व्यवहार्यता तूट निधीदान (VGF) स्वरुपात मिळण्याचे प्रस्तावित आहे.
नीरज चोप्रा
🔷 खळ: ट्रॅक आणि फील्ड
🔷EVENT: भाला फेकणे
🔷 परशिक्षक: Uwe Hohn
✔️ जन्म :- खांद्रा गाव, पानिपत जिल्हा, हरियाणा
🟢 नीरज चोप्रा ची कामगिरी :-
🏆 सवर्णपदक - 2020 टोकियो ऑलिम्पिक
🏆 सवर्णपदक - आशियाई खेळ 2018 जकार्ता, इंडोनेशिया
🏆 सवर्ण पदक - राष्ट्रकुल खेळ 2018 गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया
🏆 सवर्णपदक - आशियाई चॅम्पियनशिप 2017 भुवनेश्वर, ओडिशा
🏆 सवर्ण पदक - दक्षिण आशियाई खेळ 2016 गुवाहाटी/शिलाँग
🏆 सवर्णपदक - वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2016 बायडगोस्झक, पोलंड
💠 नीरज चोप्राला 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
☑️ नीरज चोप्राने पोर्तुगालमध्ये लिस्बन athalatics संमेलनात पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकले.
पंजाबमध्ये सर्व शाळा सुरू.
पंजाबमध्ये सोमवारी सर्व वर्गाच्या शाळा काही महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाल्या असून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त होती. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. राज्य सरकारने शनिवारी २ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने करोना निर्बंध शिथिल केले होते.
करोनाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केले जाणार असून मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांकडून लेखी संमती घेतली जाणार आहे. शाळांची वेळ ही सकाळी ८ ते दुपारी २ अशी असणार आहे.
सोमवारी राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पूर्व प्राथमिक शाळा व पहिली दुसरीचे वर्ग मार्च २०२० नंतर १० महिन्यांनी सुरू झाले आहेत. सर्व शाळा दोन ऑगस्टपासून सुरू करण्याच्या आदेशापूर्वी २६ जुलैला दहावी व बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. जी मुले शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग उपलब्ध असणार आहेत.
डॉक्टर्स व शिक्षण तज्ज्ञ यांच्या कोणत्या अहवालानुसार सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते व आप नेते हरपाल सिंह चिमा यांनी केला आहे. राज्यात ६०.५ लाख विद्यार्थी असून एकूण २० टक्के लोकसंख्येचा जीव धोक्यात टाकला जात आहे असे त्यांनी सांगितले.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.
२०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदकं जिंकली होती.
नीरज चोप्रा - सुवर्णपदक
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे.
मीराबाई चानू - रौप्यपदक
टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळाले. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिले पदक मिळून दिले.
भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. याआधी सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते.
पीव्ही सिंधू - कांस्यपदक
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला.
या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले.
लव्हलिना बोर्गोहेन - कांस्यपदक
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला.
उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे.
रवी दहिया - रौप्यपदक
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कामगिरी केली आहे. मात्र ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
फायनलमध्ये रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना ७-४ ने जिंकला. त्यामुळे रवीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
पुरुष हॉकी संघ - कांस्यपदक
तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव केला.
बजरंग पुनिया - कांस्यपदक
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरल .
सुवर्णपदक जिंकल्यानंतर ‘हा’ देश देतो सर्वाधिक पैसा, तीन देश करतात आयुष्यभर मदत.
🗿जगातील २००हून अधिक देशांचे खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहेत. ११ हजार खेळाडू सुवर्णपदकासाठी लढत आहेत. अमेरिकेने ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वाधिक पदके जिंकली आहेत. सुवर्ण जिंकल्यावर अमेरिका खेळाडूंना सुमारे २८ लाख रुपये देईल. सिंगापूरसारख्या छोट्या देशात उपलब्ध असलेल्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा ही रक्कम खूपच कमी आहे. तीन मोठे देश ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंना आजीवन मदत करतात. त्याचबरोबर युरोपमधील काही मोठे देश कोणत्याही प्रकारची बक्षीस रक्कम देत नाहीत.
🗿फोर्ब्सच्या बातमीनुसार, एस्टोनियामध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला दरवर्षी सुमारे ४ लाख रुपये मिळतील. याशिवाय निवृत्तीवर अधिक भत्ता मिळतो. जर एखादा खेळाडू २९ वर्षात सुवर्ण जिंकतो आणि ७८ वर्षे जगतो, तर त्याला सुमारे २.२५ कोटी मिळतील. इंडोनेशिया आणि मलेशियामध्येही दरमहा भत्ता दिला जातो. ब्रिटन, न्यूझीलंड आणि स्वीडनमध्ये पदक जिंकण्यासाठी बक्षिसाची रक्कम दिली जात नाही. सुवर्णपदकांसाठी सर्वाधिक पैसे देणारे देश कोणते आहेत, ते जाणून घेऊया.
🗿सिंगापूर – सुवर्णपदक जिंकल्यावर जास्तीत जास्त बक्षीस रक्कम सिंगापूरमध्ये दिली जाईल. येथे सुवर्णपदक जिंकल्यावर तुम्हाला सुमारे ५.५० कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर रौप्यपदक विजेत्याला २.७५ कोटी तर कांस्यपदक मिळवणाऱ्याला १.३७ कोटी मिळतील. मात्र आतापर्यंत सिंगापूरला एकही पदक मिळालेले नाही. त्यांचे खेळाडू पुढील आठवड्यात महिलांच्या टेबल टेनिसमध्ये पदके जिंकू शकतात.
जलदगती विशेष न्यायालयांसाठीची योजना आणखी दोन वर्षे सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी..
🧩पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र-पुरस्कृत योजना म्हणून 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2023 पर्यंत 389 विशेष POCSO (Protection Of Children from Sexual Offences) न्यायालयांसह 1023 जलदगती विशेष न्यायालये सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली.
🧩तयासाठी 1572.86 कोटी रुपये (971.70 कोटी रुपये केंद्राचा वाटा आणि 601.16 कोटी रुपये राज्याचा वाटा) खर्च अपेक्षित आहे. निर्भया निधीमधून केंद्रीय सरकारचा वाटा देण्यात येईल.
☘️पार्श्वभूमी..
🧩महिला आणि बालकांची सुरक्षा आणि सुरक्षिततेला सरकारने नेहमीच सर्वोच्च महत्त्व दिले आहे. 12 वर्षांखालील मुलगी आणि 16 वर्षांखालील महिलांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनांमुळे संपूर्ण देशाच्या सद्सदविवेकबुद्धीला मोठा धक्का पोहोचला आहे. अशा प्रकारच्या घटना घडणे आणि त्यांचे खटले प्रदीर्घ काळ चालणे यामुळे असे खटले जलदगतीने चालवणारी आणि लैंगिक अत्याचार पीडितांना तातडीने दिलासा देणारी एक समर्पित यंत्रणा स्थापन करण्याची गरज निर्माण झाली होती.
🧩अधिक कठोर तरतुदी करण्यासाठी आणि अशा प्रकरणांचे खटले जलदगतीने चालावेत आणि त्यांचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी केंद्रीय सरकारने “गुन्हेगारी (दुरुस्ती) कायदा-2018” लागू केला आणि बलात्कार करणाऱ्यांना मृत्युदंडासहित कठोर शिक्षांची तरतूद केली. त्यामुळे जलदगती विशेष न्यायालयांची स्थापना होऊ लागली.
☘️योजनेविषयी .
🧩2 ऑक्टोबर 2019 रोजी जलदगती विशेष न्यायालय योजना सुरू करण्यात आली. जलदगती विशेष न्यायालये सहजतेने न्याय देणारी समर्पित न्यायालये आहेत. असहाय्य पीडितांना त्वरेने न्याय मिळवून देण्याबरोबरच लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेला देखील ती बळकट करत आहेत.
🧩सध्या 28 राज्यांमध्ये व्याप्ती असलेल्या या योजनेचा विस्तार पात्र असलेल्या सर्व 31 राज्यांमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. देशातील दुर्गम भागासह सर्वत्र लैंगिक अत्याचार पीडितांना कालबद्ध पद्धतीने न्याय देण्याच्या राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांच्या प्रयत्नांना त्यामुळे पाठबळ मिळत आहे.
जर्मनी: सुधारित आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश..
☑️5 ऑगस्ट 2021 रोजी, जर्मनी हा आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर युती करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश ठरला आहे.
☄️आतरराष्ट्रीय सौर युती विषयी..
☑️2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.
☑️गडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.
☑️पतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली.
☑️आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) हा सुरुवातीला केवळ 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम होता. आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यापासून, आता आंतरराष्ट्रीय सौर युतीचा भाग बनण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य देशांसाठी हा करार खुला करण्यात आला आहे.
वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा “आफ्रिका वंश असलेल्या लोकांचा स्थायी मंच”..
👍सयुक्त राष्ट्रसंघ महासभेने (UNGA) वंशभेद, असहिष्णुता, परदेशांबददल वाटणारा तिरस्कार आणि वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तज्ञांचा सल्ला मिळवण्यासाठी एक मंच स्थापन करण्यासाठी एका ठरावाला 2 ऑगस्ट 2021 रोजी मान्यता दिली.
👍तया मंचाचे “आफ्रिका वंश असलेल्या लोकांचा स्थायी मंच” (Permanent Forum of People of African Descent) हे नाव असेल. ती 10 सदस्य असलेली एक सल्लागार संस्था असेल, जी जिनेव्हा मानवी हक्क परिषदेसोबत कार्य करेल. एकूण सदस्यांपैकी 5 जणांना सदस्य देशांच्या सरकारांनी नामांकन दिलेल्या व्यक्तींमधून निवडले जाणार तर इतर पाच जणांची नियुक्ती संयुक्त राष्ट्रसंघ मानवी हक्क परिषद करणार.
🔴सयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी...
👍आतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.
👍1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.
👍सघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.
👍सयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.
👍सयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.
संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -
👍सयुक्त राष्ट्रसंघ महासभा (General Assembly)
👍सयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (Security Council)
👍सयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council / ECOSOC)
👍सयुक्त राष्ट्रसंघ सचिवालय
आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice)
👍सयुक्त राष्ट्रसंघ विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).
🔴सयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -
👍जागतिक बँक समूह
जागतिक आरोग्य संघटना (WHO)
जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Program)
संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization / UNESCO)
संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund / UNICEF)
झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चमू महाराष्ट्रात दाखल
🌼महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे ‘झिका’ विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. एका 50 वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने केलेल्या तपासण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे.
🌼या पार्श्वभूमीवर, झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी आणि रोगाच्या व्यवस्थापनामध्ये राज्य सरकारला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक चमू महाराष्ट्रात पाठवली आहे. या चमूत तीन सदस्य असून त्यात पुण्यातील प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ञ, नवी दिल्लीतील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च (ICMR-NIMR) या संस्थेचे कीटकशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.
🌼काही दिवसांपूर्वी केरळमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेले 14 रुग्ण आढळून आले होते.
💢झिका विषाणूविषयी
🌼डग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचे वाहक असलेल्या एडीस डासांमुळे झिका विषाणूचा संसर्ग पसरतो.
🌼झिका विषाणू संसर्गाची काही सामान्य लक्षणे - ताप, शरीर दुखणे, पुरळ, नेत्रश्लेष्मलाशोथ, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता किंवा डोकेदुखी
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लक्षणे साधारणपणे 2-7 दिवस टिकतात आणि संक्रमित बहुतेक लोकांना लक्षणे दिसत नाहीत.
🌼तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. अश्या बाळांचे डोकं जन्माच्या वेळी नेहमीपेक्षा लहान असू शकते. यास्थितीला मायक्रोसेफली असे म्हणतात. त्यामुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. तसेच गुलियन-बॅरे सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजारही यामुळे पसरण्याची शक्यता असते.
आतापर्यंत या विषाणूवर ना कोणती लस उपलब्ध नाही, ना कोणते ठराविक औषध उपलब्ध आहे.
भारतातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” याची मान्यता..
🐅वाघांचे उत्तमप्रकारे संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल, देशातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” (Global Conservation Assured | Tiger Standards) अशी मान्यता मिळाली आहे.
🐅मानस, काझीरंगा आणि ओरांग (आसाम)
🐅सातपुडा, कान्हा आणि पन्ना (मध्यप्रदेश)
🐅पच (महाराष्ट्र)
🐅वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प (बिहार)
🐅दधवा (उत्तरप्रदेश)
🐅सदरबन (पश्चिम बंगाल)
🐅पारंबीकुलम (केरळ)
🐅बदिपूर व्याघ्र प्रकल्प (कर्नाटक)
🐅मदुमलाई आणि अन्नामलाई (तामीळनाडू)
🐅“जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा
🌸(CA|TS)” विषयी...
🐅CA|TS या संज्ञा ‘मान्यता’ अथवा दर्जा निश्चित करण्यासाठीचे साधन म्हणून वापरण्यास ‘व्याघ्र अस्तित्व असलेल्या देशांच्या जागतिक संघटनेने (TRCs) मंजूरी दिली असून ते निकष व्याघ्र तसेच संरक्षित प्रदेशाच्या तज्ञांनी ठरवले आहेत.
🐅2013 साली या दर्जाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, व्याघ्र प्रजाती (मार्जार कूळ) याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठीचा किमान दर्जा निश्चित करण्यात आला आहे. तसेच, त्या संबंधित संवर्धन क्षेत्रात, हा दर्जा सांभाळला जातो आहे की नाही, याचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये असे निकष आहे, ज्याअंतर्गत व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणारे व्यवस्थापन संवर्धनासाठी पूरक आहे की नाही हे तपासले जाते.
🌸पार्श्वभूमी...
🐅दरवर्षी 29 जुलै या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करतात. 2021 साली हा दिवस “त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (Their Survival is in our hands) या संकल्पनेखाली पाळण्यात आला.
Filmfare Awards 2021
• सर्वोत्कृष्ट चित्रपट: थप्पड
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: ओम राऊत (चित्रपट:-'तान्हाजी: द अनसंग हीरो')
• सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): इरफान खान ( चित्रपट:- 'इंग्लिश मीडियम')
• सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): तापसी पन्नू ( चित्रपट:-'थप्पड')
• सर्वोत्कृष्ट अभिनेता, सहायकअभिनेता (पुरुष): सैफ अली खान (चित्रपट- तान्हाजी: द अनसंग हीरो)
• सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): फारुख जाफर - ( चित्रपट:-गुलाबो सीताभो)
• सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला: आलाया फर्निचरवाला - जवानी जानमन
•सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: राजेश कृष्णन (चित्रपट- लूटकेस)
• सर्वोत्कृष्ट संगीत: प्रीतम (चित्रपट:-लुडो)
• सर्वोत्कृष्ट गायक (पुरुष): राघव चैतन्य (चित्रपट:-एक तुकडा धूप - चापट)
• सर्वोत्कृष्ट गायक (महिला): असीस कौर - (चित्रपट:-मलंग
● समीक्षक पुरस्कार:-
---------------------------------------------------
• सर्वोत्कृष्ट चित्रपट: ऐब आले ऊ
• सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन - ( चित्रपट:-गुलाबो सीताबो)
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : तिलोटामा शोम (चित्रपट:- सर )
● फिल्मफेअर शॉर्ट फिल्म पुरस्कार:-
--------------------------------------------------
•सर्वोत्कृष्ट चित्रपट (पॉप्युलर चॉईस): देवी
• सर्वोत्कृष्ट चित्रपट (फिक्शन): अर्जुन
• सर्वोत्कृष्ट चित्रपट (नॉन-फिक्शन): बॅकयार्ड वाईल्ड लाईफ सेंचुरी
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : प्रुती सावर्दकर
• सर्वोत्कृष्ट अभिनेता : अर्णव अब्दगिरे
● विशेष पुरस्कार:-
---------------------------------------------------
• आरडी बर्मन पुरस्कार: गुलजार
• लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड: इरफान खान
०४ ऑगस्ट २०२१
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. 4 सप्टेंबरला होणार संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.
कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर
मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिपत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षेचं आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 3 ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. तर, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.
कोणत्या पदासाठी किती जागा?
सहायक कक्ष अधिकारी – MPSC ASO – 67 जागा
राज्य कर निरीक्षक – MPSC STI – 89 जागा
पोलीस उप निरीक्षक – MPSC PSI – 650 जागा
एकूण - 806 जागा
__________
०२ ऑगस्ट २०२१
अस्थाना यांची नियुक्ती ‘घटनाबाह्य’.
🔰राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती ही ‘घटनाबाह्य’ असल्याचा ठराव दिल्ली विधानसभेने गुरुवारी संमत केला. अस्थाना यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आपल्या पक्षाच्या नेत्यांना ‘त्रास देण्यासाठी’ घेण्यात आला असल्याचा आरोप करून, सत्ताधारी आम आदमी पक्षाने या नियुक्तीवरून केंद्र सरकावर टीका केली.
🔰दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अल्पावधीच्या चर्चेद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना; अस्थाना यांची नियुक्ती ‘घटनाबाह्य’ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचे नमूद करणारा ठराव ‘आप’चे आमदार संजय झा यांनी मांडला.
🔰गजरात कॅडरच्या या वादग्रस्त अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त म्हणून दिल्लीवर ‘थोपवण्यात’ आल्याबाबत या ठरावात नापसंती व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारने मंगळवारी अस्थाना यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आणि निवृत्तीपूर्वी या पदावर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली.
कोव्हॅक्सिन’ आयातीच्या निर्णयाला ब्राझीलची स्थगिती.
🔰भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या करोना प्रतिबंधक लशीच्या प्रस्तावित नैदानिक चाचण्या आणि तिच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीची विनंती स्थगित केल्यानंतर या लशीच्या ४० लाख मात्रा देशात आयात करण्याचा निर्णयही ब्राझीलने स्थगित केला आहे.
🔰बराझिलियन भागीदारांसोबतचा करार संपवल्याचे भारत बायोटेकने त्या देशाच्या सरकारला कळवल्यानंतर, कोव्हॅक्सिनची आयात आणि वितरण यांसाठी दिलेली तात्पुरती अधिकृत परवानगी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे नॅशनल हेल्थ सव्र्हेलन्स एजन्सी ऑफ ब्राझीलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
🔰बराझीलच्या प्रेसिसा मेडिकॅमेंटोस आणि एनव्हिक्झिया फार्मास्युटिकल्स एलएलसीशी केलेला करार आपण संपुष्टात आणला असल्याचे भारत बायोटेकने २३ जुलैला सांगितले होते.
राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार! आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा.
🔰राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
🔰यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल असं देखील ते म्हणाले.
🔰कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असं ते म्हणाले.
चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत - जितेंद्र सिंह.
🔰चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत होईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले. करोना साथीमुळे या मोहिमेची गती मंदावली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
🔰लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अवकाश खात्याचे राज्यमंत्री असलेल्या सिंह यांनी म्हटले आहे की, चांद्रयान ३ मोहिमेचे वेळापत्रक बदलावे लागत आहे. चांद्रयान ३ मोहिमेत अनेक प्रक्रिया असून त्यात अनेक उपप्रणाली, त्यांची जोडणी व तपासणी असे अनेक मुद्दे आहेत. या प्रकल्पाची प्रक्रिया करोनामुळे लांबली असून घरून जे काम करता येणे शक्य आहे तेवढे टाळेबंदीच्या काळात पूर्ण झाले आहे.
🔰चांद्रयान ३ मोहीम अमलात आणण्यासाठी टाळेबंदी उठल्यानंतर पुन्हा काम सुरू होईल व ही मोहीम तरीही प्रगतिपथावर आहे. यापूर्वी भारताने २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सोडले होते. जिथे कुठल्याही देशाने तोपर्यंत यान पाठवले नव्हते. भारताच्या शक्तिशाली प्रक्षेपकाच्या मदतीने ते यान सोडण्यात आले होते. त्या वेळी ७ सप्टेंबर २०१९ रोजी विक्रम या लँडरचे आघाती अवतरण झाल्याने भारताला चंद्रावर गाडी उतरवण्यात अपयश आले होते.
🔰अन्यथा पहिल्याच प्रयत्नात गाडी तेथे उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असता. चांद्रयान ३ मोहीम भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोसाठी महत्त्वाची असून त्यात आंतरग्रहीय मोहिमांमध्ये भारताच्या कामगिरीस बळ मिळणार आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बोम्मई यांचा शपथविधी
🔰कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई यांचा शपथविधी बुधवारी येथे झाला असून तेथील राजकीय अस्थिरतेला तूर्त पूर्णविराम मिळाला आहे. येडियुरप्पा पक्षाच्या आदेशानुसार पायउतार झाल्यानंतर बोम्मई यांच्या नावाची घोषणा भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी केली होती. त्यानुसार बोम्मई यांनी बुधवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.
🔰कर्नाटक भाजप विधिमंडळ पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत बोम्मई यांची नेतेपदी निवड केली होती. बोम्मई हे उत्तर कर्नाटकातील लिंगायत नेते असून येडियुरप्पा यांचे विश्वासू मानले जातात, त्यामुळे यापुढेही कर्नाटकच्या राजकारणावर येडियुरप्पा यांचा प्रभाव राहील असे सांगण्यात येते. बोम्मई हे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस.आर बोम्मई यांचे पुत्र असून येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात ते गृह कामकाज, कायदा, विधिमंडळ कामकाज या खात्याचे मंत्री होते. आता येडियुरप्पा यांचे मंत्रिमंडळ विसर्जित झाले असून बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली नवे मंत्रिमंडळ सत्तारुढ होत आहे.
🔰कर्नाटकात पिता-पुत्र जोडीने मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एच.डी. देवेगौडा तसेच एच.डी. कुमार स्वामी या पिता-पुत्रांनी मुख्यमंत्री पद सांभाळले होते. बोम्मई हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हावेरी जिल्ह्य़ातील शिगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व ते करतात.
राकेश अस्थाना दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त
🔰गुजरात कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांनी बुधवारी दिल्लीच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.
🔰अस्थाना हे येथील जयसिंह मार्गावरील दिल्ली पोलीस मुख्यालयात पोहोचले, त्या वेळी त्यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
🔰‘दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून मी आज पदभार स्वीकारला. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे रोखणे या पोलीस सेवेच्या प्राथमिक संकल्पनांवर माझा विश्वास असून आम्ही त्याच करणे अपेक्षित आहे. या गोष्टी योग्य रीतीने करण्यात आल्यास समाजात शांतता नांदेल’, असे अस्थाना यांनी पत्रकारांना सांगितले.
🔰सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून काम पाहणारे राकेश अस्थाना हे तत्काळ प्रभावाने दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी रुजू होतील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशात सांगितले. अस्थाना हे ३१ जुलैला निवृत्त होणार असताना काही दिवसांपूर्वी ही नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ १ वर्षांचा राहणार आहे.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस: 29 जुलै
🔰दरवर्षी 29 जुलै या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करतात. 2021 साली हा दिवस “त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (Their Survival is in our hands) या संकल्पनेखाली पाळण्यात आला.
🔰यानिमित्ताने व्याघ्र संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी जगभरात अनेक उपक्रम राबवले जातात.
⭕️काही ठळक बाबी
🔰भारत जगातल्या 70 टक्के वाघांचे निवासस्थान आहे. भारत 18 राज्यांत पसरलेल्या 51 व्याघ्र राखीव क्षेत्रांची भूमी आहे. 2018 साली झालेल्या व्याघ्र गणनेत वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले आहे. भारताने व्याघ्र संवर्धनाबाबत सेंट पिट्सबर्ग घोषणापत्रानुसार, निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट चार वर्षे आधीच पूर्ण केले आहे.
जगभरात, मुख्यत: आशिया खंडात, वाघांच्या केवळ काही हजार प्रजाती आढळून येतात. फक्त शंभर वर्षांत जगभरातून 90 टक्के वन्य वाघ लोप पावले आहेत. आता जवळपास 3,000 पेक्षा जास्त वाघ जंगलांत राहतात आणि बर्याच वाघांच्या प्रजाती आधीच नामशेष झालेल्या आहेत.
🔰अनेक देशात खिताब आणि औषधी उद्देशाने वाघाच्या शारीरिक अवयवांची मागणी वाढली असल्याने त्यांची तस्करी केली जाते.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” याला मंजूरी..
🔰“बाल न्याय कायदा-2015” यामध्ये दुरुस्ती सुचवणारे “बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” 28 जुलै 2021 रोजी राज्यसभेत मंजूर झाले. विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.
🔴विधेयकातील दुरुस्ती...
🔰परकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी आणि जबाबदारी वृद्धिंगत करण्यासाठी या सुधारणांमध्ये अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्याना बाल न्याय कायद्याच्या कलम 61 अंतर्गत दत्तक आदेश जारी करण्यास अधिकृत मान्यता समाविष्ट आहे. याची अंमलबजावणी सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कठीण परिस्थितीत मुलांच्या बाजूने प्रयत्न करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कायद्याअंतर्गत अधिक अधिकार देण्यात आले आहेत.
🔰कायद्याच्या सुधारित तरतुदींनुसार कोणत्याही बाल-देखभाल संस्थेची नोंदणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या शिफारसींचा विचार करून केली जाईल. जिल्हा दंडाधिकारी स्वतंत्रपणे जिल्हा बाल संरक्षण विभाग, बालकल्याण समित्या, बाल न्याय मंडळे, विशेष बालकांसाठी पोलिस विभाग, बाल देखभाल संस्था इत्यादींच्या कार्याचे मूल्यांकन करतील.
समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ
🌷 डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)
🌷 राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर
🌷 नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)
🌷 कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)
🌷 बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)
🌷 महात्मा फुले- पुणे
🌷 महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)
🌷 गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)
🌷 गोपाळ हरी देशमुख- पुणे
🌷 नया. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)
🌷 सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)
🌷 बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)
🌷 आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)
🌷 आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)
🌷 सवा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)
🌷 सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)
🌷 विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)
🌷 गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)
🌷 विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)
🌷 डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)
🌷 साने गुरुजी- पालघर (रायगड)
🌷 सत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)
🌷 सनापती बापट- पारनेर (अहमदनगर)
🌷 सत ज्ञानेश्वर- आपेगाव
🌷 सत एकनाथ- पैठण-
🌷 समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना )
आत्तापर्यंतचे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी
१९९६ पु. ल. देशपांडे : साहित्य
१९९७ लता मंगेशकर : कला, संगीत
१९९९ विजय भटकर : विज्ञान
२००० सुनील गावसकर : क्रीडा
२००१ सचिन तेंडुलकर : क्रीडा
२००२ भीमसेन जोशी : कला,संगीत
२००३ अभय बंग आणि राणी बंग : समाजसेवा व आरोग्यसेवा
२००४ बाबा आमटे : समाज सेवा
२००५ रघुनाथ अनंत माशेलकर : विज्ञान
२००६ रतन टाटा : उद्योग
२००७ रा.कृ. पाटील : समाज सेवा
२००८ नानासाहेब धर्माधिकारी : समाज सेवा
२००८ मंगेश पाडगावकर : साहित्य
२००९ सुलोचना लाटकर : कला, सिनेमा
२०१० जयंत नारळीकर : विज्ञान
२०११ अनिल काकोडकर : विज्ञान
२०१५ बाबासाहेब पुरंदरे : इतिहासलेखन
२०१९ राम सुतार : शिल्पकला
२०२० आशा भोसले : गायन
ऑस्ट्रेलियाच्या एम्मा मॅकेन यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये ०७ पदके जिंकली आहेत
📌 एम्मा मॅकेन टोकियो ऑलिंपिकमध्ये ०४ सुवर्ण व ०३ कांस्य पदकांची कमाई केली आहे
👩🦰 अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्या जलतरणपटू व २ऱ्या महिला खेळाडू ठरल्या आहेत
🤸♀️ यापुर्वी १९५२ मध्ये सोविएत युनियनच्या
जिम्नॅस्ट मारीया यांनी ०७ पदके जिंकली होती
🏅 एम्मा मॅकेन यांनी २०१६ रिओ ऑलिंपिकमध्ये ०४ पदके जिंकली होती (🥇१🥈२🥉१)
🏅 तया ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक
११ पदके जिंकणाऱ्या खेळाडू ठरल्या आहेत
🥇 एका ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक ०८ पदके जिंकण्याचा (सर्व सुवर्ण) विक्रम : मायकेल फेल्प्स
📌 २००८ बिजिंग ऑलिंपिकमध्ये अमेरिकेच्या मायकल फेल्प्सने ०८ सुवर्ण पदके जिंकली होती
३० जुलै २०२१
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज जन्मदिवस. आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊ सविस्तर...
*टिळकांचा जीवनप्रवास :*
▪️ लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी मधील चिखलगांवी झाला. स्वातंत्र्यसाठी लढणारी जी अनेक रत्ने होती. त्यांतील हे रत्नागिरीचे ‘रत्न’ होते. त्यांचे ‘केशव’ हे नांव ठेवण्यात आले होते.
▪️ पण ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. वडील शिक्षण खात्यात सेवेस होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बढती मिळाल्याने बदली झाली. वडिलांचे छत्र 19 व्या वर्षी निवर्तले.
▪️ 16 व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा झाल्याने टिळकांचे लग्न 17व्या वर्षी झाले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशाची फारशी अडचण भासली नाही.
▪️ 1876 साली टिळक बी. ए. ची परीक्षा गणित घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांचे गणित व संस्कृत हे दोन विषय उत्तम होते. पुढे टिळकांनी एल. एल. बी. पर्यंत मजल मारली.
▪️ महाविद्यालामध्ये टिळक असतांना गोपाळ गणेश आगरकर या तरुण मित्राची मैत्री जमली. दोघेही एका विचाराची मने घेऊनी चर्चा करीत. देशात सामाजिक सुधारणा व राजकीय स्वातंत्र्य हे झाले पाहिजे.
▪️ आगरकरांचा विषय तत्त्वज्ञान तर टिळक गणितवाले ‘जोडणारे तोडणारे’ पण मातृभूमीबद्दल खळबळ आंतरिक एकत्र आले की चर्चा असे विद्यार्थी हवे आहेत. असतीलही कदाचित.
▪️ दोघांवर पाश्चात्य विचारवंत मिल व स्पेन्सर यांचा प्रभाव होता. यातूनच 2 जानेवारी 1880 ला पुणमध्ये नू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. टिळक-आगरकर यांच्यासमवेत तिसरे सहकारी चिपळूणकर मिळाले व लोकशिक्षण प्रभावी करण्याच्या दृष्टीने ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करण्याचे ठरले.
▪️ ‘केसरी’ मधून टिळकांनी आपले जहाल विचार व्यक्त करणे सुरू केलने हे साप्ताहिक महाराष्ट्रात सर्वत्र परिचित झाले. सामाजिक प्रश्नावर आगरकर लिहू लागले. आधी सामाजिक की आधी राजकीय यावर आगरकर आधी सामाजिक तर टिळक आधी राजकीय असे विचार पर्यायाने मतभेद होऊ लागले.
▪️ टिळक म्हणायचे सामाजिक प्रश्न ही हृदयाची जखम आहे तिला सावकाशपणे हाताळले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक प्रश्न सोडविणे सोपे जाते. यातूनच मतभेद विकोपाला गेला व आगरकरांनी केसरीचे संपादकत्व सोडले.
▪️ आगरकरांनी सामाजिक प्रश्नासाठी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले. त्यातून टिळकांकडे केसरीचे संपादकत्व आले. टिळकांनी शैक्षणिक संस्थांचा राजीनामा दिला व पूर्णवेळ केसरीकडे दिला. अल्पावधीत ‘केसरी’ प्रसिद्धीस आला.
*टिळकांचं महत्वपुर्ण कार्य :*
▪️ 1880 साली पुण्यात न्यु इंग्लिश हायस्कुलची स्थापना
▪️ 1881 साली जनजागृतीकरता ’केसरी’ व ’मराठा’ अशी वृत्तपत्र सुरू
▪️ 1884 साली पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
▪️ 1885 साली पुणे येथेच फग्र्युसन काॅलेज सुरू केले
▪️ ’सार्वजनिक गणेशोत्सव’ आणि ’शिव जयंती’ उत्सवाला सुरूवात
▪️ 1897 राजद्रोहाचा आरोप लावुन टिळकांना दिड वर्षांची कैद
▪️ 1916 साली ’होमरूल लीग’ संघटनेची स्थापना
▪️ टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हंटले गेले
▪️ टिळक ’लाल बाल पाल’ या त्रिमूर्तीमधील एक
दरम्यान, 1 आॅगस्ट 1920 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला.
Latest post
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...
-
1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior) 1. Brave – Courageous (शूर) 2. Honest – Truthful (प्रामाणिक) 3. Happy – Joyful (आनंद...
-
601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे? 👉 अनक्रीप्शन 602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी ब...
-
◾️जायकवाडी : नाथसागर (छत्रपती संभाजीनगर) ◾️पानशेत : तानाजी सागर (पुणे) ◾️गोसिखुर्द : इंदिरा सागर (भंडारा) ◾️वरसगाव : वीर बाजी पासलकर (पुणे ज...