१४ जुलै २०२१

संसदेचे अधिवेशन १९ जुलैपासून.



🔰संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याचे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. १९ सत्रांचे हे अधिवेशन पूर्णवेळ चालणे अपेक्षित असून, लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज नेहमीप्रमाणे एकाच वेळी सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील.


🔰करोनाची दुसरी लाट ओसरू लागली असली तरी, करोनासंदर्भातील नियमांचे पालन करूनच संसदेचे कामकाज होईल, असे बिर्ला यांनी सांगितले. लशीची किमान एक मात्रा घेतलेल्या खासदारांना ‘आरटी-पीसीआर’ चाचणीची सक्ती केली जाणार नाही. मात्र, लसीकरण न झालेल्यांनी नमुना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन बिर्ला यांनी केले.


🔰गल्या वेळी अर्थसंकल्पीय अधिवेशात संसदेच्या आवारात प्रवेश करण्यासाठी सर्वाना चाचणी सक्तीची होती. संसदेच्या आवारात नमुना चाचणीची सुविधा २४ तास उपलब्ध असून, सदस्यांच्या साहाय्यकांच्या लसीकरणाचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती बिर्ला यांनी दिली

भारताची चिंता वाढवणारी बातमी; चाचणीमध्ये अत्याधुनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र झालं Fail .



🔰भारताच्या ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान अपेक्षित लक्ष्याचा भेद घेण्यात अपयश आल्याची दुर्मिळ प्रकार सोमवारी घडला. ४०० किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम असणारं हे क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान अपेक्षित अंतर पूर्ण करण्याआधीच पडलं.


🔰ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी ही चाचणी घेण्यात आली होती. सामान्यपणे ४०० किमी अंतरावरील लक्ष्याचा भेद घेणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या नव्या व्हर्जनची चाचणी घेतली जात होती. यामध्ये ४५० किमी दूरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला जो अपयशी ठरला.


🔰कषेपणास्त्र डागल्यानंतर अवघ्या काही काळामध्येच ते पडलं. सोमवारी सकाळी ही चाचणी करण्यात आली. हे असं का घडलं या मागील कारणांचा तपास डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) वैज्ञानिक आणि ब्रम्होस अरोस्पेस कॉर्परेशनच्या टीम्सकडून केला जाणार आहे,” अशी माहिती सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

भारतीय रिझर्व्ह बँकेची 'RBI रिटेल डायरेक्ट' योजना..



🩸सरकारी कर्जरोख्यांमध्ये किरकोळ सहभाग वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे गुंतवणूकदारांचे “गिल्ट सिक्युरिटीज अकाऊंट” ('रिटेल डायरेक्ट') उघडण्याच्या सुविधेसह सरकारी कर्जरोख्यांच्या बाजारपेठेमध्ये (प्राथमिक व माध्यमिक असे दोनही) ऑनलाईन प्रवेशाद्वारे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ऑनलाइन प्रवेशात सुधारणा करण्यासाठी 'RBI रिटेल डायरेक्ट' सुविधा जाहीर करण्यात आली आहे.


🧬योजनेची वैशिष्ट्ये....


🩸किरकोळ गुंतवणूकदारांना (व्यक्ती) RBI याकडे ‘रिटेल डायरेक्ट गिल्ट अकाउंट’ (RDG खाता) उघडण्याची आणि व्यवस्थापित करण्याची सुविधा असेल.योजनेच्या उद्देशाने तयार केलेल्या ‘ऑनलाईन संकेतस्थळाच्या’ माध्यमातून RDG खाते उघडता येते.


🩸‘ऑनलाइन संकेतस्थळ’ नोंदणीकृत वापरकर्त्यांना पुढे नमूद सुविधा देखील प्रदान करणार - सरकारी कर्जरोख्यांच्या प्राथमिक वाटपासाठी प्रवेश; निगोशिएट डीलिंग सिस्टम-ऑर्डर मॅचिंग सिस्टम (NDS-OM) यामध्ये प्रवेश.

नेपाळच्या पंतप्रधानपदी देऊबा यांच्या नेमणुकीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.



🔷नपाळच्या पंतप्रधानपदी नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांची नेमणूक करण्याचा व विसर्जित केलेली संसद पुन्हा प्रस्थापित करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून पाच महिन्यांपूर्वी दोन वेळा संसद बरखास्त करण्यात आली होती.


🔶पाच सदस्यांच्या घटनात्मक पीठाचे प्रमुख न्या. चोलेंद्र शमशेर राणा यांनी असा निकाल दिला की, अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांचा संसदेचे प्रतिनिधिगृह बरखास्त करण्याचा निर्णय हा पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या शिफारशीनुसार असला तरी तो घटनाबाह्य़ आहे. मध्यावधी निवडणुका घेऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्यांच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने असा आदेश दिला की, देऊबा यांना पंतप्रधानपदी नेमण्यात यावे. या आदेशाची कारवाई मंगळवारीच करण्यात यावी.


🔷दऊबा हे ७४ वर्षे वयाचे आहेत. त्यांनी चार वेळा पंतप्रधानपद सांभाळले आहे. न्यायालयाने नवीन संसदेचे अधिवेशन १८ जुलैला सायंकाळी पाच वाजता घेण्याचा आदेशही जारी केला आहे. सरन्यायाधीश राणा यांनी सांगितले की, मतदानात सहभाग घेण्याचा पक्षादेश नवीन पंतप्रधानांची निवड करताना राज्य घटनेच्या कलम ७६(५) अन्वये लागू होत नाही. न्यायापीठात दीपक कुमार कार्की, मिरा खाडका, ईश्वर प्रसाद खाटीवाडा, डॉ. आनंदा मोहन  भट्टराय यांचा समावेश होता.

विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय



👤 नोबेल : रविंद्रनाथ टागोर

👤 जञानपीठ : जी शंकर कुरुप

👤 मगसेसे : विनोबा भावे 

👤 वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन

👩‍🦰 दादासाहेब फाळके : देविका राणी

👤 परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा 

👤 गोल्डन ग्लोब : एक आर रहमान

👩‍🦰 मन बुकर : अरुंधती रॉय 

👤 एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन

👩‍🦰 ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया

👤 महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे

👤 खलरत्न पुरस्कार : विश्वनाथन आनंद

👦 बाल शांतता पुरस्कार : ओमप्रकाश गुर्जर

👤 गौरी लंकेश पुरस्कार : रविश कुमार

👤 गलोबल टीचर प्राईज् : रणजितसिंह डिसले

👤 कलिंगा प्राईज् : जगजित सिंह

👤 जपान प्राईज् : गुरदेव एस खुश 

👤 जी डी बिर्ला पुरस्कार : ए दत्ता


Online Test Series

१२ जुलै २०२१

भारतातली जागतिक वारसा स्थळे



संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.


आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.


▪️सांस्कृतिक


1) आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश


2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र


3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार


4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)


5) चपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात


6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र


7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट


8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र


9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र


10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश


11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू


12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक


13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू


14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक


15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले


16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर


17) हमायूनची कबर, दिल्ली


18) खजुराहो, मध्यप्रदेश


19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार


20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)


21) कतुब मिनार, दिल्ली


22) राणी की वाव, पटना, गुजरात


24) लाल किल्ला, दिल्ली


25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश


26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा


27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश


28) ल कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड


29) जतर मंतर, जयपूर


30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत


▪️नसर्गिक


1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश


2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम


3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम


4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान


5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल


6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड


7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)


▪️मिश्र


1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम


▪️UNESCO बाबत


संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

भारत-नेपाळ रेल सेवा करार



🔰नेपाळ आणि भारत या देशांनी ‘भारत-नेपाळ रेल सेवा करार (RSA) 2004’ यासाठी विनिमय पत्रावर (LoE) स्वाक्षरी केली आहे.


🔰या करारामुळे दोनही देशांमधील सर्व अधिकृत मालवाहू रेलगाडी संचालकांना नेपाळमधून भारतात तसेच भारतातून नेपाळकडे आणि भारताकडून इतर तिसऱ्या देशावाटे नेपाळकडे मालवाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वे जाळ्याचा वापर करण्यास परवानगी मिळते.


💢नपाळ देश


🔰नपाळ हा भारत व चीन (तिबेट) या दोन राष्ट्रांदरम्यान, हिमालयाच्या दक्षिण उतारावर वसलेला एक स्वतंत्र सार्वभौम देश आहे. याच्या उत्तरेस चीन (तिबेट) आणि पूर्वेस सिक्कीम व पश्चिम बंगाल, दक्षिणेस बिहार व उत्तर प्रदेश आणि पश्चिमेस उत्तर प्रदेश ही भारताची राज्ये असल्यामुळे हा देश संपूर्णतः भूवेष्टित आहे. देशाची राजधानी काठमांडू हे शहर आहे. नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.


💢भारतीय रेल्वे विषयी


🔰भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे कें‍द्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो.


🔰भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.


🔰भारतात पहिली रेलगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले गेले होते.

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना


.

♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.


♦️ सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.


♦️राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.


♦️तयामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.


♦️कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळ

Combine पूर्व परीक्षा

 📌 आयोग काही दिवसात Combine पूर्व परीक्षा तारीख घोषित करेल  कमीत कमी उमेदवारांना 30 दिवस दिले जातील 


21 ऑगस्ट - IBPS RRB Prelim 

29 ऑगस्ट -IBPS Clerk Prelim

5 सप्टेंबर - UPSC EPFO

12 सप्टेंबर - NEET Exam

19 सप्टेंबर -

26 सप्टेंबर- MH-SET Exam

3 ऑक्टोबर -

10 ऑक्टोबर- UPSC CSE Prelim


सध्या विचार करता आयोगाकडे 19 सप्टेंबर तसेच 3 ऑक्टोबर ह्या तारखा शिल्लक आहेत.  यांचा Combine पूर्व साठी आयोग विचार करेल .

तरीपण तातडीची बाब म्हणून आयोग 28 ऑगस्ट , 4 किंवा 11 सप्टेंबर रोजी ( शनिवारी) परीक्षा घेऊ शकते .

Combine पूर्व नंतर 7 किंवा 15 दिवसानंतर AMVI मुख्य परीक्षा  2020 होईल 


दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान.


  

🅾️ ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.


🅾️ ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.


🅾️ ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’शरीरातीलप्रतिकारशक्ती वाढविते.


🅾️ आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.


🅾️० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्केघनपदार्थ

असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,३.५ ते३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व

०.६ ते०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात,म्हणूनदुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.


🅾️मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम

दुधाची आवश्यकता असते.


🅾️ ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोगहोतो.


🅾️ मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधितआहे.


🅾️माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंशसेल्शिअसअसते.


🅾️ डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारातकेला जातो.


🅾️ मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.


🅾️ इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.


🅾️मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.रक्तामध्ये

मँगेनिज हे द्रव्य असते.


🅾️ ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर

कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.


🅾️ मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटकजास्तप्रमाणात असते.


🅾️ मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.


🅾️ कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोगकरतात.


🅾️ तबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्येकॅफीन हेअपायकारक द्रव्य असते.


🅾️ रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढझाल्यासब्लड कॅन्सर होतो.


🅾️पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वरवकावीळ.


🅾️हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय वइन्फ्लुएंझा


🅾️ मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळेहोतो.


🅾️मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम वलॅप्सो स्पायरसी


🅾️ रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्णदगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.


🅾️नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.


🅾️सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.


🅾️ हदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेलेअसते.


🅾️परुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोकेअधिक असतात.


🅾️रक्तदाबाच्या विकारावर तुळस हीवनस्पती उपयुक्तआहे.


🅾️शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्यानेहृदयविकाराचा झटका येतो.


🅾️ रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारेकोलेस्टेरॉलरक्तातून वाहते.


🅾️ शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारेमोजलेजाते.


🅾️ शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’

हा घटक करतो.

११ जुलै २०२१

केरळमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळला



🌼जलै 2021 महिन्यात केरळ राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. राज्यात एक गर्भवती महिला झिका विषाणू संक्रमित आढळली आहे. याचसोबत, मच्छरांमुळे पसरणाऱ्या झिका विषाणूचे संक्रमण भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.


🌼तयानंतर तिरुवनंतपुरम शहरात झिका विषाणूचा संसर्ग झालेले आणखी 13 रुग्ण आढळून आल्यानंतर केरळ आणि तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने पुणे शहरातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' या संस्थेकडे पाठविण्यात आले होते.


🌼याआधी भारतात 2016-17 या वर्षात गुजरात राज्यात झिका विषाणूच्या संक्रमणाची प्रकरणे समोर आली होती.


⭕️झिका विषाणू


🌼एडीज प्रकारचा डास चावल्याने हा रोग पसरतो. झिका संक्रमणाची लक्षणे डेंग्यू समान असून त्यामध्ये ताप येणे, त्वचेवर लाल रंगाचे डाग, सांधे दुखी तसेच डोळे लाल होणे अशी अनेक लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. परंतु हा आजार जीवघेणा नाही.


🌼झिका विषाणू संक्रमित व्यक्ती सात ते आठ दिवस या संक्रमणाच्या प्रभावाखाली राहतो. गर्भवती महिलांना झिका विषाणू संक्रमणाचा अधिक धोका असून त्यामुळे जन्माला येणारे मूल अविकसित मेंदूसहीत जन्माला येण्याचा धोका अधिक असतो. बाळाचे डोकं जन्माच्या वेळी सामान्यतः नेहमीपेक्षा लहान असू शकते.

प्रथम CII हिंद-प्रशांत व्यवसाय शिखर परिषद..



🔑विदेश मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय उद्योग महासंघाने (CII) 6 जुलै ते 8 जुलै 2021 या कालावधीत, ‘हिंद-प्रशांत व्यवसाय शिखर परिषद’ची पहिली आवृत्ती आयोजित केली.


🔑कद्रीय वाणिज्य व उद्योग, रेल्वे, ग्राहक कार्य आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी हिंद-प्रशांत प्रदेशातील व्यापारी समुदायाला विकास, व्यापार आणि प्रगतीला उत्तेजन देण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सक्रीय सहभाग घेण्यासाठी आमंत्रित केले.


🔑“सामायिक समृद्धीसाठीचा आराखडा विकसित करताना” या विषयाखाली ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली.


🗝भारतीय उद्योग महासंघ (CII) विषयी...


🔑भारतीय उद्योग महासंघ (CII) ही एक अशासकीय, ना-नफा, उद्योग-चालित आणि उद्योग-व्यवस्थापित संस्था आहे, ज्यात खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतलेले 9000 हून अधिक सदस्य आहेत.


🔑भारताच्या विकासास अनुकूल असे वातावरण, भागीदारी करणारे उद्योग, सरकार आणि नागरी समाज यांच्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे व ते टिकवून ठेवण्याचे कार्य CII करते.


🔑भारतीय उद्योग महासंघ (CII) याची स्थापना 1895 साली झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय.


🥀कद्रीय मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आल्यानंतर पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलं आहे. माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला असून कामकाजाला सुरुवात केली.


🥀दरम्यान पहिल्याच दिवशी त्यांनी मोठा निर्णय घेतला असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. रेल्वे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील असा आदेशच त्यांनी दिला आहे.


🥀“रेल्वेमंत्र्यांनी सर्व कार्यालयं आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील असा आदेश दिला आहे. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ४ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते १२ असेल. आजपासून या आदेशाची अमलबजावणी सुरु झाली आहे,” अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजी पीआर डी जे नारायण यांनी दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषद निर्माण करण्यास मंजुरी.


🎯पश्चिम बंगालच्या विधानसभेत संविधानातील कलम 169 अन्वये राज्यात विधानपरिषद निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.


♟बगाल विधानपरिषदेची रचना...


🎯बगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. विधानपरिषदेची स्थापना झाल्यावर विधानपरिषदेत एकूण 98 सदस्य असतील. भारतीय संविधानानुसार विधानसभेच्या जागेच्या एक तृतियांश जागांपेक्षा विधानपरिषदेच्या जागा अधिक असता कामा नये.


🎯राज्यातील विधानसभेने विशेष बहुमताने विधानपरिषदेच्या संदर्भात कोणताही ठराव संमत केल्यास भारतीय संविधानातील कलम 169 अन्वये संसद कायद्याने राज्यातील द्वितीय सभागृह बनवू किंवा रद्द करू शकते.


♟इतिहास...


🎯पश्चिम बंगालमध्ये पाच दशकांपूर्वी विधानपरिषदेची व्यवस्था होती. नंतर विधानपरिषद विसर्जित करण्यात आली. 21 मार्च 1969 रोजी 51 सदस्य असलेली विधानपरिषद विसर्जित करण्यात आली होती.


🎯वर्तमानात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगना, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहेत.


♟विधानसभा आणि विधानपरिषद...


🎯भारत सरकारच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या घटकराज्याच्या प्रमुखपदी राज्यपाल असतात. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ती नेमणूक रद्द होऊ शकते. राज्यपाल हे जरी राज्याचा घटनात्मक प्रमुख असले, तरी ते केंद्रीय सरकारचे प्रतिनिधित्व करतात. राज्यात संविधानाप्रमाणे राज्य चालते किंवा नाही हे ते पाहतात आणि तसे नसल्यास राष्ट्रपतींकडे अहवाल सादर करतात.

ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांना बंदी.



🖲टोक्योमधील करोनारुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आणीबाणीमध्ये वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकसाठी स्टेडियमवरील प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे, असे ऑलिम्पिकमंत्री तामायो मारूकावा यांनी सांगितले.


🖲सध्याची आणीबाणी रविवारी संपल्यानंतर लगेच सोमवारपासून लागू होणारी आणीबाणी २२ ऑगस्टपर्यंत लागू असेल. त्यामुळे ऑलिम्पिकचा २३ जुलैला होणारा उद्घाटन सोहळा आणि ८ ऑगस्टचा समारोप सोहळा यांच्यापुढे आणीबाणीचे आव्हान असेल. दूरचित्रवाणीनुरूप ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांवर बंदी असेल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषद (आयओसी) आणि ऑलिम्पिक संयोजन समितीने जाहीर केले.


🖲‘‘करोनाच्या डेल्टा उत्परिवर्तनाचा धोका लक्षात घेऊन महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना ऑलिम्पिक पाहण्यासाठी स्टेडियमला हजर राहता येण्याची शक्यता कमी आहे,’’ असे पंतप्रधानांनी आणीबाणी जाहीर करताना म्हटले होते. आणीबाणीच्या कालावधीत मद्यपींचा वावर असलेले बार, रेस्टॉरंट आणि कराओके पार्लर्सवर बंदी घालण्यात आली आहे. टोक्योमधील रहिवाशांकडून घरी थांबून दूरचित्रवाणीवर ऑलिम्पिकचा आस्वाद घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे. गुरुवारी टोक्यो शहरात ८९६ करोनारुग्णांची नोंद झाली आहे.

Online Test Series

१० जुलै २०२१

Online Test Series

1.
दमण व दीव येथील मुख्य भाषा कोणती?
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator

०९ जुलै २०२१

राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर.



🔰शक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्यात इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, विद्यार्थी शाळेत येण्यासाठी बॅक टू स्कूल मोहीम राबवण्याची सूचना करण्यात आली आहे. गावस्तरावर समिती स्थापना करणे आवश्यक असून, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी देखील आवश्यक असणार आहे.


🔰यासंदर्भात काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकात म्हटले आहे की, १५ जुलै २०२१ पासून राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीनी ठराव करून खालील निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.


🔰गरामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा.

मिल्खा सिंग यांची कारकीर्द

 


- मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेबर 1929 रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. 

- मिल्खा सिंग भारतीय सैन्यातही कार्यरत होते, त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले खेळ सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. 

- आशियातील सर्वश्रेष्ठ खेळाडूत यांची गणना केली जाते. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.

- सिंग यांनी 1958 टोकियो येथे आयोजित आशियाई खेळ स्पर्धेत 400 मीटर मध्ये सुवर्ण पदक जिंकले.

- 1958 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 200 आणि  400 मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी. 

- 1958 मध्ये इंग्लंडमधील कार्डिफ येथे आयोजित तत्कालिन ब्रिटीश साम्राज्य आणि राष्ट्रमंडल खेळात ऐतिहासिक 400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी ही त्यांची विशेष कामगिरी आहे. 

- राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण तर एका सिल्व्हर पदकाची कमाई, कटक (200 मीटर सुवर्ण 1958), कटक (400 मीटर सुवर्ण 1958) आणि कलकत्ता (400 मीटर सिल्व्हर 1964)

- आशियाई स्पर्धेत चार वेळा सुवर्णपदक विजेते, टोकियो (200 मीटर 1958), टोकियो (400 मीटर 1958), जकार्ता (400 मीटर 1962) आणि जकार्ता (4 × 400 मीटर रिले 1962)

- ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व, मेलबर्न (1956), रोम (1960) आणि टोकियो (1964). 

- 1960 च्या रोम ऑलिंपिकमध्ये स्पर्धेत 0.1 सेकंदाच्या फरकामुळे मिल्खाजी पदक जिंकू शकले नव्हते पण 400 मीटर धावण्यातील यांचा वेळ 38 वर्षापर्यंत राष्ट्रीय विक्रम राहिला होता, जो 1998 मध्ये पराजित सिंग यांनी मोडला.

- मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून 46.6 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर 200 मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ 21.6 सेकंदात पूर्ण केली. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.

- 1962 मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर आणि 4×400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. 

- पाकिस्तानमध्ये एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानचा खेळाडू अब्दुल खालिक याचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानी राष्ट्रपती जनरल आयुब खान यांनी मिल्खा सिंग यांना फ्लाईंग सिख या नावाने गौरविले. 

- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मिल्खा सिंग यांचा विक्रम 50 वर्षांहून अधिक काळ कायम राहिला होता. 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये कृष्णा पूनियाने डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण जिंकून हा विक्रम मोडित काढला.

- भारताचे प्रसिद्ध गोल्फपट्टू जीव मिल्खा हे मिल्खा सिंग यांचे पुत्र आहेत.


चर्चेतील अर्थव्यवस्थांचे प्रकार



✔️ Goldilock Economy 


-  गोल्डीलाॅक अर्थव्यवस्था म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जास्त गरम आणि जास्त थंड नाही.

- या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक प्रणालीसाठी एक आदर्श राज्याचे वर्णन आहे. या परिपूर्ण राज्यात पूर्ण रोजगार, आर्थिक स्थिरता आणि स्थिर वाढ असते. 

- अर्थव्यवस्था विस्तारीत किंवा मोठ्या फरकाने संकुचित होत नाही. मंदी रोखण्यासाठी स्थिर आर्थिक वाढीसह गोल्डीलॉक्सची अर्थव्यवस्था पुरेशी उबदार असते.


✔️ Circular Economy 


- ही अर्थव्यवस्था उत्पादन आणि उपभोगाचे एक मॉडेल आहे, ज्यात शक्य तितक्या सध्या अस्तित्वात असलेली सामग्री आणि उत्पादनांचे सामायिकरण, भाडेपट्टी, पुनर्वापर, दुरुस्ती, नूतनीकरण आणि पुनर्वापर करणे समाविष्ट आहे. 

- अशा प्रकारे, उत्पादनांचे जीवन चक्र वाढविले जाते.


✔️ Gig Economy 


- या अर्थव्यवस्थामध्ये, तात्पुरती, लवचिक रोजगार सामान्य गोष्ट आहे आणि कंपन्या पूर्ण-वेळेच्या कर्मचार्‍यांऐवजी स्वतंत्र कंत्राटदार आणि स्वतंत्ररित्या काम करणार्‍यांच्या नोकरीकडे पाहतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

- ही अर्थव्यवस्था पूर्णवेळ कामगारांच्या पारंपारिक अर्थव्यवस्थेला कमजोर करते जे क्वचितच पदे बदलतात आणि त्याऐवजी आजीवन कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करतात.


लोकसभा सभापती



1. गणेश वासुदेव मावळणकर

15 मे 1952 ते 27 फेब्रुवारी 1956


2. एम. ए. अय्यंगर

8 मार्च 1956 ते 10 मे 1957 आणि

11 मे 1957 ते 16 एप्रिल 1962


3. एस. हुकूम सिंग 

17 एप्रिल 1962 ते 16 मार्च 1967


4. गुरूद्याल एस. धिल्लन

8 ऑगस्ट 1969 ते 19 मार्च 1971 आणि 

22 मार्च 1971 ते 1 डिसेंबर 1975


5. बळीराम भगत 

15 जानेवारी 1976 ते 25 मार्च 1977


6. नीलम संजीव रेड्डी 

26 मार्च 1977 ते 13 जुलै 1977 आणि 

17 मार्च 1967 ते 19 जुलै 1969


7. के. एस. हेगडे

21 जुलै 1977 ते 21 जानेवारी 1980


8. बळीराम जाखर

22 जानेवारी 1980 ते 15 जानेवारी 1985 आणि 

16 जानेवारी 1985 ते 18 डिसेंबर 1989


9. रबी राय

19 डिसेंबर 1989 ते 9 जुलै 1991


10. शिवराज पाटील 

10 जुलै 1991 ते 22 मे 1996


11. पी. ए. संगमा

23 मे 1996 ते 23 मार्च 1998


12. जी. एम. सी. बालयोगी

24 मार्च 1998 ते 19 ऑक्टोबर 1999 आणि 

22 ऑक्टोबर 1999 ते 3 मार्च  2002


13. मनोहर जोशी 

10 मे 2002 ते 2 जून 2004


14. सोमनाथ चॅटर्जी

4 जून 2004 ते 30 मे 2009


15. मीरा कुमार 

30 मे 2009 ते 4 जून 2014


16. सुमित्रा महाजन 

6 जून 2014 ते 16 जून 2019


17. ओम बिर्ला

18 जून ते आतापर्यंत 

भारत सरकार कायदा 1935



- या कायद्यात 321 कलमे आणि 10 परिशिष्ट 

- भारतात संपूर्ण उत्तरदायी सरकार स्थापन्याच्या वाटचालीतील हा दुसरा महत्वाचा टपा 

- अखिल भारतीय संघराज्य स्थापन करणयाची तरतूद होती. 

- तीन सूचांच्या (केंद्र 59, प्रांत 54, समवर्ती 36) माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकाराचे विभाजन केले शेषाधिकार व्हाईसराॅयला देण्यात आले. 

- कायद्यान्वये प्रांतामधील दुहेरी शासनव्यवस्था रद केली गेली व प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली 

-  केंद्रात दुहेरी शासनध्यवस्था सुरू करण्यात आली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

- अकरापैकी सहा प्रांतामध्ये द्विगृही कायटेमंडाची तरतूद करण्यात आली. त्यानुसार बंगाल, बाम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत या प्रांतामध्ये विधान परिषद (वरिष्ठ गृह) आणि विधान सभा (कनिष्ठ गृह) अशी द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात आली. 

- भारत सरकार कायदा १८५८ नुसार स्थापलेली इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आली.

- मताधिकार वाढविण्यात आला. एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.

- भारतीय रिझर्व बैंक स्थापनेची तरतूद करण्यात आली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

- संघ लोकसेवा आयोगाबरोबरच प्रांतिक लोकसेवा आयोग व संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली.

- संघराज्यीय न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती; त्यानुसार १६३७ फेडरल कोर्ट स्थापना करण्यात आली.

भरती ओहोटी



- समुद्रतट: भरतीच्या पाठ्याची कमाल व ओहटीच्या पाण्याची किमान मर्यादा यातील भाग.

- अपतट: ओहटीच्या किमान मर्यादेपलीकडील समुद्राच्या दिशेकडेच्या खंडात उताराचा उथळ भाग.

- अग्रतट: ओहटीच्या किमान मर्यादेपासून भरतीच्या सरासरी मर्यादेपर्यंतचा भाग.

- पश्च तट: भरतीच्या सरासरी मर्यादेपासून किनाऱ्यावरील समुद्रकड्यांचा पायथ्या पर्यंतचा भाग.


● सन 1919 च्या 'रौलट कायद्या' नुसार 


- इंग्रज कोणत्याही ठिकाणाची झडती घेऊ शकत होते.

- कोणत्याही व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होती.

- गुन्हेगाराला अपील करता येणार नव्हते.


● सन 1942 मध्ये इंग्रज विरोधात सुरू झालेली ' चले जाव' (छोडो भारत) चळवळ अपयशी ठरली कारण


- या चळवळीस मुस्लीम लिगने पाठिंबा दिला

- सशस्त्र इंग्रजापुढे नि:शस्त्र भारतीयांचा नि गगला नाही.

- देशव्यापी चळवळीची आखणी करण्य कमी पडले.


● महाराष्ट्राचे पहिले इलेक्ट्रॉनिक वेस्ट युनिट इको रिसायकलिंग लिमिटेड सुरु झाले आहे. 


- ते अंधेरी येथे मुंबईत स्थित आहे.

- ते आपल्या घरी/कार्यालयात त्यांची पिक अप व्हॅन पाठवून ई-कचरा गोळा करतात मग ते कॉम्प्यूटर असो वा ... टिव्ही/सेल फोन.

- ई-कचरा सरते शेवटी बेल्जियमला धातू काढण्यास्तव पाठविले जाते.


गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती



1. डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता)

- 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात

- 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था 


2. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण)

- कमी गुणसूत्रामुळे

- स्त्रीयांमध्ये आढळतो


3. क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम (क्लाईनफेल्टर्स संलक्षण)

- जास्त गुणसूत्रामुळे 

- पुरूषांमध्ये आढळतो 


● एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग / एकजनुकीय विकृती


1. वर्णकहीनता (Albinism)

- मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे


2. दात्रपेशी पांडूरोग (सिकलसेल अॅनिमिया)

- गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो.

- आनुवांशिक आजार

भारतातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प



1. थेरी जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 2400 MW

- राज्य: उत्तराखंड 

- नदी: भागीरथी 


2. कोयना जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 1960 MW

- राज्य: महाराष्ट्र 

- नदी: कोयना


3. श्रीसालेम जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 1670 MW

- राज्य: आंध्रप्रदेश 

- नदी: कृष्णा 


4. नाथ्पा झाक्री जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 1530 MW

- राज्य: हिमाचल प्रदेश 

- नदी: सतलज 


5. सरदार सरोवर धरण जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 1450 MW

- राज्य: गुजरात

- नदी: नर्मदा 


✔️सध्या भारत हा जलविद्युत निर्मितीमध्ये जगातील पाचवा देश ठरला आहे.

✔️भारताची निर्मिती क्षमता 50 GW आहे.

✔️नर्मदा बचाओ आंदोलन मेधा पाटकर यांच्याशी संबंधित. 

✔️भारतात बारमाही वाहणाऱ्या नद्यावरून मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्मिती होते.


17 वी लोकसभा निवडणूक 2019



- 543 मतदार संघात 7 टप्प्यात ही निवडणूक पार पडली.

- 24 मे 2019 रोजी निकाल जाहिर झाला. 


● देशातील प्रमुख पक्ष आणि त्यांना मिळालेल्या जागा


- तृणमूल काँग्रेस 22

- बहुजन समाज पक्ष 10

- भारतीय जनता पक्ष 303

- बिजू जनता दल 12

- द्रविड मुन्नेत्र कळघम 23

- काँग्रेस पक्ष 52

- जनता दल (U) 16

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 05

- शिवसेना 18

- युवाजन श्रमिक रयथु काँग्रेस पक्ष 22


● महाराष्ट्र 


- महाराष्ट्रात 48 जागांसाठी 4 टप्प्यात मतदान झाले.

[पक्षाचे नाव- जिंकलेल्या जागा- मतांची टक्केवारी]

- भारतीय जनता पक्ष 23 (27.59%)

- काँग्रेस पक्ष 1 (16.27%)

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 4 (15.52%)

- शिवसेना 18 (23.29%)

- AIMIM 1 (0.72%)

- Independent 1


भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग



1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44

- पर्वीचे नाव NH 07

- लांबी 3745 km

- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)


2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27

- लांबी 3507 km

- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)


3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48

- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08

- लांबी 2807 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)


4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52

- लांबी 2317 km

- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)


5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30

- पूर्वीचे नाव NH 221

- लांबी 2040 km

- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)


6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06

- लांबी 1873 km

- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)


7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53

- लांबी 1781 km

- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)


8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16

- पूर्वीचे नाव NH 05

- लांबी 1711 km

- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)


9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66

- पूर्वीचे नाव NH 17

- लांबी 1622 km

- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)


10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19

- पूर्वीचे नाव NH 02

- लांबी 1435 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)


नागरिकत्व दुरूस्ती कायदा 2019



- 2019 ची सहावी दुरूस्ती (6th Amendment) आहे. 

- याअगोदर 1986, 1992, 2003, 2005 & 2015 ला या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती.

- नागरिकत्व (Citizenship) घटनेचा भाग 2 कलम 5 ते 11 मध्ये समावेश

- कलम 11 नुसार नागरिकत्वासंबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे.

- नागरिकत्व हा संघसूचीतील विषय आहे.

- 1955 च्या कायद्यानुसार तुम्हाला 6 प्रकारे नागरिकत्व मिळतं तर 3 प्रकारे नागरिकत्व नष्ट होतं


● 2019 ची दुरूस्ती:


- 2019 च्या दुरूस्तीनुसार ईशान्य पूर्वेकडील 4 राज्यातील 6 जमातींना या कायद्यातून सूट देण्यात आली आहे.

- बांग्लादेश, पाकिस्तान आणि आफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्याक हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारसी आणि ईसाई यांना नागरिकत्व दिले जाणार

- या देशातील मुस्लिमांना नागरिकत्व दिले जाणार नाही

- घटनेच्या 6 व्या अनुसूचित समाविष्ट असलेल्या आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यातील आदिवासींना हा कायदा लागू नाही.

- बेकायदेशीर स्थलांतरित सोडून सर्वांना नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

- नागरिकत्व मिळवण्यासाठी रहिवाशी असण्याची अट 11 वर्षांवरून 5 वर्षे करण्यात आली आहे.


Most Important 


CAA, NRC & NPR या तिन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत.


👉 Citizenship Amendment Act (CAA) 1955

- पहिली दुरूस्ती: 1986

- शेवटची आणि सहावी दुरूस्ती: 2019


👉 National Register of Citizens (NRC)

- आसामशी संबंधित 

- 1951 मध्ये पहिल्यांदाच NRC करण्यात आली

- 2010 मध्ये ही Uodate करण्यात आली. 

- 2013 ला सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल आपले मत दिले.

- 2019 ला यावर चर्चा सुरू झाली


👉 National Population Register (NPR)

- 2010 मध्ये हे पहिल्यांदा आले.

- 2015 मध्ये update करण्यात आले.


NRC आणि NPR हे जनगणनेसारखे (Census) आहे.


MPSC - १५,५११ हजार पदांची भरती.



🌻लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही रोजगाराची संधी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या के ल्याच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने राज्यात लवकरच १५ हजार ५११ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.


🌻राज्य लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया गतीमान करण्यासाठी सदस्यांची संख्या ११ पर्यंत वाढविण्याचा तसेच आयोगाच्या कामकाजाचे ‘डिजिटलायजेशन’ करण्याचाही निर्णय सरकारने घेतला असून, त्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मंगळवारी के ली.


🌻सवप्नील लोणकर याच्या आत्महत्येचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या कारभारात सुधारणा करण्याबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या लाखो तरूणांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याचे आठ जण.



🎙पतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले असून या चार मंत्र्यांमुळे राज्याला मिळालेल्या मंत्रीपदाची संख्या आठ झाली आहे.  माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर व अकोल्याचे खासदार व शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांची मात्र वगळण्यात आले आहे.


🎙महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (रस्तेबांधणी व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री), पियुष गोयल (रेल्वेमंत्री व उद्य्ोगमंत्री) व ग्राहक संरक्षण व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे या तिघांचे मंत्रीपद कायम राहिले आहे. मंत्रिमंडळाच्या फेरबदलापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एकमेव घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे.


🎙कद्रीय मंत्रिमंडळाच्या नव्या रचनेत डॉ. भारती पवार या राज्यातून मंत्रीपद मिळालेल्या एकमेव महिला मंत्री आहेत. नारायण राणे यांच्यामुळे मराठा, कपिल पाटील यांच्यामुळे आगरी, भागवत कराड यांच्यामुळे ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे.

मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे.



🔰पश्चिम बंगालच्या कूचबिहार येथील ३५ वर्षांचे खासदार निसिथ प्रामाणिक हे नव्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री असून, ७२ वर्षांचे सोम प्रकाश हे सर्वात ज्येष्ठ आहेत. सध्या मंत्रिमंडळात ७७ मंत्री आहेत.


🔰पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ५० वर्षांहून कमी वयाच्या मंत्र्यांमध्ये स्मृती इराणी (४५), किरेन रिजिजु (४९), मनसुख मंडाविया (४९), कैलाश चौधरी (४७), संजीव बालयान (४९), अनुराग ठाकूर (४६),


🔰डॉ. भारती पवार (४२), अनुप्रिया पटेल (४०), शंतनू ठाकूर (३८), जॉन बारला (४५) व डॉ. एल. मुरुगन (४४) यांचा समावेश आहे.


🔰नव्याने शपथ घेतलेल्या ४३ मंत्र्यांचे सरासरी वय ५६ वर्षे असून, नव्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे आहे. यापूर्वीच्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ६१ वर्षे होते.

Online Test Series

०८ जुलै २०२१

ध्वनी:



🅾️'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'.

ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते'.


🅾️धवनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.


🅾️परत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.


🅾️कपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.


उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने




🅾️धवनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.


🅾️वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.


🅾️धवनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.


🅾️धवनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.


🅾️परत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.

ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :


🅾️जव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.


🅾️सपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.


🅾️सपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.


🅾️विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.


🅾️विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.


🅾️दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.


🅾️तयाचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.


🧩वारंवारता :


🅾️घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.


🅾️एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.


🅾️धवनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.


🅾️तयाचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.


🅾️(note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )

तरंगकाल :


🅾️लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे 'तरंगकाल' होय.


🅾️माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.


तो 'T'ने दर्शविला जातो.


SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.


u=1/t



🧩धवनीचा वेग :


🅾️तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.


वेग=अंतर/काल


एका तरंगकालात कापलेले अंतर,


वेग= तरंगलांबी/तरंगकाल


वेग= वारंवारता*तरंगलांबी


🧩मानवी श्रवण मर्यादा :


🅾️मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.


🅾️पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.



🧩शरव्यातील ध्वनी :


🅾️20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्‍या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.


🅾️निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.


🧩उपयोग :


🅾️जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.


🧩धवनीचे परिवर्तन :


🅾️धवनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.


🅾️धवनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.


🧩परतिध्वनी :


🅾️मल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.


अंतर= वेग*काल


🧩निनाद :


🅾️एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.



🧩सोनार (SONAR):


🅾️Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.


🅾️पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.

आरोग्यशास्ञ


🅾️ हत्तीरोगाचा रक्त नमुना कधी घेतात - राञी


🅾️ लाल रक्तपेशी तयार होण्याकरीता कोणता घटक आवश्यक असतो - फॉलिक अँसिड


🅾️ जन्मताच ह्रदयात दोष असणार्या मुलांना ब्लू बेबी म्हणतात


🅾️ करडई तेलातील - लिनोलिक हे मेदाम्ल रक्तात्ल कोलेस्टेरॉलची माञा कमी राखते


🅾️ सोयाबिन मध्ये - ४०% प्रथिन असतात


🅾️ परुषांमधिल कुटूंबनियोजन शस्ञक्रियेस - व्हँसेक्टॉमि म्हणतात


🅾️ सञियांमधिल कुटूंबनियाेजन शस्ञक्रियेस - ट्युबोक्टोमी म्हणतात


🅾️ आयुर्वेदाची निर्मिती अथर्ववेदा पासुन झाली आहे


🅾️ शरीराच्या एकुन वजनाच्या सुमारे २\३ भाग स्नायुंनी बनलेला असतो 


🅾️ हरदयास ऑक्सिजन चे प्रमाण कमि पडल्यास - हायपरटेंशन हा आजार होतो


🅾️ हरदयाचा एक ठोका पडन्यास - ०.८ सेतंद लागतात 


🅾️ शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि आरबीसीचे प्रमाण मोजण्यासाठी - फॉस्फरस ३२ वापरतात.


हेलिअम



🅾️१८ ऑगस्ट १८६८ या दिवशी फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ ‘पीअर जॅनसन’ हे खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी भारतात आले. सूर्यग्रहण पाहताना सूर्याच्या वर्णपटात (सूर्यकिरण लोलकातून जाऊ दिले असता, बाहेर पडताना सप्तरंगी वर्णपट पाहायला मिळतो) एक पिवळ्या रंगाची रेषा त्यांना आढळली. सूर्यग्रहण नसतानाही निरीक्षण केले असता सूर्याच्या वर्णपटात पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसला. सोडिअम या मूलद्रव्याचे ज्वलन झाले असता, त्याची ज्वाला पिवळ्या रंगाची दिसते. पण ‘पीअर जॅनसन’ यांना सूर्याच्या वर्णपटात दिसलेला पिवळा रंग सोडिअम या मूलद्रव्याच्या पिवळ्या रंगापेक्षा वेगळा आढळला. त्याच वर्षी जोसेफ नॉर्मन लॉकयेर आणि एडवर्ड फ्रँकलँड यांनाही सूर्याच्या वर्णपटात हा पिवळा रंग आढळला. आणि तो सूर्यात असणाऱ्या मूलद्रव्याचा आहे असा शोध लागला. या रंगाची तरंगलांबी ५८७.४९ नॅनोमीटर म्हणजेच ०.००००००५८७४९ मीटर होती. जोसेफ नॉर्मन लॉकयेर आणि एडवर्ड फ्रँकलँड या दोघांनीही या मूलद्रव्यास सूर्याला ग्रीक भाषेत असलेल्या हेलिओज (helios) या नावावरून हेलिअम असे नाव दिले. पृथ्वीवर सापडण्याआधी पृथ्वीबाहेर सापडलेले हे पहिलेच मूलद्रव्य. भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे हेलिअमचा शोध ‘पीअर जॅनसन’ यांना भारतातून लागला.


🅾️सर्यावर आढळलेले हे मूलद्रव्य दोन वर्षांनंतर, लुईंगी पामित्री या भौतिकतज्ज्ञाला इटली देशातील ‘व्हेसुव्हिअस’ पर्वताच्या ज्वालारसात आढळले. १८९५ मध्ये रसायन शास्त्रज्ञ सर विल्यम रामसे यांनाही पृथ्वीवर हेलिअमच्या अस्तित्वाचा शोध लागला.


🅾️यरेनियम या किरणोत्सारी असलेल्या मूलद्रव्याचा ऱ्हास होत असताना हेलिअम तयार होते. वातावरणात अत्यल्प प्रमाणात असल्याने वातावरणातून हेलिअम मोठय़ा प्रमाणात मिळविणे फार खर्चीक आहे त्यामुळे नैसर्गिक वायूंच्या साठय़ातून मिळत असलेला हेलिअम साठवला जातो. लष्करी आणि अन्य प्रकारच्या फुग्यांमध्ये वापर होत असल्याने, भविष्यातील वापराच्या दृष्टीने यू.एस.ए.मधील टेक्सास येथे हेलिअम तयार करून साठवला जातो.


🅾️रॉकेट्समध्ये इंधन म्हणून हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर – निष्क्रिय आणि न जळणारा असल्याने – हेलिअमचा उपयोग केला जातो. तांबे, अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम यांची संमिश्रे जी उष्णतेचे सुवाहक आहेत 

विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे.



1. सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t) 


2. त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)


3. बल = वस्तुमान * त्वरण 


4. गतिज ऊर्जा = 1/2mv2


5. स्थितीज ऊर्जा = mgh


6. आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा 


7. विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u


8. सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता


9. प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान 


10. रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान 


11. प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान


12. द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार 


13. दोन बिंदूमधील विभवांतर = कार्य / प्रभार 


14. विद्युतधारा = विद्युतप्रभार / काळ


15. वाहनाचा रोध (R) = विभवांतर (V) / विद्युतधारा (I)


16. समुद्राची खोली = ध्वनीचा पाण्यातील वेग * कालावधी / 2


17. ध्वनीचा वेग = अंतर / वेळ 


18. पदार्थाने शोषलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील वाढ 


19. पदार्थाने गमावलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील घट


20. उष्णता विनिमयाचे तत्व = उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता


21. ओहमचा नियम = I = V / R


22. विद्युतप्रभार = विद्युतधारा * काल


भारताच्या अध्यक्षतेखाली ‘BRICS संस्कृती मंत्र्यांची सहावी बैठक’ संपन्न



🔰भारताचे केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र व प्रभार) प्रह्लादसिंग पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 2 जुलै 2021 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे BRICS देशांच्या संस्कृती मंत्र्यांची सहावी बैठक आयोजित करण्यात आली होती.


🔰बराझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या संस्कृती मंत्रालयांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला होता. बैठकीत BRICS देशांतील मूर्त आणि अमूर्त वारशाच्या ज्ञानावर सांस्कृतिक अनुभवांची ऑनलाइन देवाणघेवाण करण्याच्या क्षेत्रामधील सहकार्यांवर मंत्र्यांनी भर दिला.


⭕️ठळक बाबी


🔰“संबंध आणि सुसंवाद सांस्कृतिक समन्वय” या संकल्पनेच्या अंतर्गत BRICS देशांमधील सांस्कृतिक उपक्रमांच्या प्रगतीसाठी आणि विस्तारासाठी चर्चा झाली.


🔰समतोल आंतरराष्ट्रीय मानवतावादी संवाद स्थापित करण्यासाठी संस्कृतीच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले गेले. देशांकडील हस्तलिखितांमध्ये असलेल्या माहितीच्या अमूल्य खजिन्याचा उपयोग करण्याच्या उद्देशाने, प्राचीन हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि डिजिटलीकरण क्षेत्रात BRICS आघाडी स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला.

मेरी कोम, मनप्रीत सिंग भारताचे ध्वजवाहक



🔰महान बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे टोक्यो ऑलिम्पिकच्या  उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक असतील. ८ ऑगस्ट रोजी रंगणाऱ्या समारोप सोहळ्यासाठी बजरंग पुनिया याच्याकडे ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


🔰भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) टोक्यो स्पर्धा संयोजन समितीशी चर्चा करून ध्वजवाहकांची निवड केली आहे. लैंगिक समानतेला महत्त्व देत भारताने पुरुष आणि महिलांमधून प्रत्येकी एक असे दोन ध्वजवाहक निवडण्याचे ठरवले होते.


🔰‘‘ही अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असल्याने माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस म्हणता येईल. भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याचा अभिमान वाटत आहे. याबद्दल मी क्रीडा मंत्रालय आणि ‘आयओए’ची ऋणी आहे. यामुळे मला प्रेरणा मिळाली असून देशाला पदक मिळवून देण्याचे आश्वासन मी देते,’’ असे सहा वेळा जगज्जेती ठरलेल्या मेरी कोमने सांगितले.

भारत सरकारचे नवीन 'सहकार मंत्रालय'.



🔰'सहकारातून समृद्धी' हा विकासात्मक दृष्टिकोन वास्तवात उतरवण्यासाठी, भारत सरकारने पूर्णपणे वेगळ्या 'सहकार मंत्रालयाची' स्थापना करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.


🔰सहकारी संस्थांसाठी 'व्यवसाय सुलभीकरण' प्रक्रिया सुरळीत करण्याचे आणि बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम, सहकार मंत्रालयाद्वारे होऊ शकेल.


🔰दशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी हे मंत्रालय एक प्रशासकीय, वैधानिक आणि धोरणात्मक चौकट नव्याने निर्माण करू शकेल. त्यामुळे सहकारी संस्थांची मुळे घट्ट रुजून सहकार चळवळीला खऱ्या अर्थाने जनाधार मिळू शकेल.


🅾️‘सहकार’ या संज्ञेची व्याख्या...


🔰मानवप्राणी जातीतील समूहजीवन जगण्याची उपजत असणारी सहजप्रवृत्ती तसेच पारस्परिक सहकार्य करण्याची पद्धत म्हणजे सहकार होय. तांत्रिकदृष्टया सहकार म्हणजे विशेष पद्धतीने व्यवसाय करण्याचा प्रकार होय. सहकार हा को-ऑपरेशन या इंग्रजी शब्दाचा मराठी पारिभाषिक शब्द आहे.


🔰रॉबर्ट ओएन हे आधुनिक सहकारी चळवळीचे जनक होय. वयाच्या एकविसाव्या वर्षी स्कॉटलंडमधील गिरणीत ते भागीदार बनले. अमेरिकेतील इंडियाना येथे त्याने ‘ न्यू हार्मनी कॉलनी’ ही सहकारी वसाहत स्थापन केली. 


🔰गरेट ब्रिटनमधील रॉचडेल या सुती कापड गिरण्यांच्या छोटया गावातील 28 कामगारांनी 21 डिसेंबर 1844 रोजी इक्विटेबल पायोनिअर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी नावाच्या सहकारी भांडाराची स्थापना केली. त्यांनी स्वीकारलेली तत्त्वे सहकार चळवळीला मार्गदर्शक ठरली. सहकारी चळवळीतील उपक्रम सहकारी पद्धतीने, स्वेच्छेने व लोकशाही पद्धतीने चालविले जातात.

न्याय विभागाचा ‘टेली-लॉ’ कार्यक्रम.



🔰भारत सरकारच्या न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘टेली-लॉ’.कार्यक्रमाच्या अंतर्गत 9 लक्ष लाभार्थ्यांचा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. हे यश साजरे करण्यासाठी आणि “आझादी का अमृत महोत्सव”चा प्रारंभ करण्यासाठी न्याय विभागाने 6 जुलै 2021 रोजी नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित केला होता.


🅾️ठळक बाबी...


🔰सामान्य नागरिकांच्या दैनंदिन सामाजिक समस्या / संघर्षाचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यात नागरिकांना मदत करण्यासाठी VLE, PLV, राज्य समन्वयक आणि पॅनेल वकिलांची मदत होते.


🔰टली-लॉ उपक्रमाने 2017 साली 1800 CSC केंद्रांच्या माध्यमातून 11 राज्यातील 170 जिल्ह्यांमधून प्रवास सुरु केला. 2019 साली CSC केंद्रांची संख्या 29,860 पर्यंत नेताना 115 महत्वाकांक्षी जिल्हे जोडले गेले. आज 50,000 CSC व्यापलेल्या 34 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील 633 जिल्ह्यात टेली-लॉ कार्यरत आहे.


🔰गल्या एका वर्षात टेली-लॉ उपक्रमाने लाभार्थींच्या संख्येत 369 टक्के वाढ नोंदवली. जून 2021 महिन्यात टेली-लॉ उपक्रमाद्वारे 9.5 लक्षाहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला आहे.

क्लिनिकल ट्रायल रेजिस्ट्री ऑफ इंडिया.



🔰(CTRI) संकेतस्थळावरील आयुर्वेद-विषयक माहितीसंग्रह

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) या संस्थांच्या मदतीने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने क्लिनिकल ट्रायल रेजिस्ट्री ऑफ इंडिया (CTRI) संकेतस्थळावरील आयुर्वेदाच्या विषयाशी संबंधित माहितीसंग्रह तयार केला आहे.


🔰5 जुलै 2021 रोजी आयुष मंत्रालयाकडून CTRI याचा भाग असलेल्या अमर (AMAR), RMIS, SAHI आणि ई-मेधा (e-MEDHA) या चार महत्त्वाच्या संकेतस्थळांचे उद्घाटन करण्यात आले. ही संकेतस्थळे केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) याने तयार केली आहेत.


🔰अमर / AMAR (Ayush Manuscripts Advanced Repository) हे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि सोवा-रिग्पा यांच्या संदर्भात हस्तलिखिते व सूचिपत्रे यांसाठी डिजिटल भांडार आहे.


🔰CCRAS-संशोधन व्यवस्थापन माहिती प्रणाली (RMIS) हे संकेतस्थळ आयुर्वेद आधारित अभ्यासाच्या संशोधन आणि विकासासाठी एक-स्थळ उपाय असेल.


🔰ई-मेधा (इलेक्ट्रॉनिक मेडिकल हेरिटेज अॅक्सेशन) संकेतस्थळावर NIC याच्या ई-ग्रंथालय मंचाच्या माध्यमातून 12 हजारपेक्षा जास्त भारतीय वैद्यकीयशास्त

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचा “निपुण भारत” उपक्रम..


⏹कद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने 5 जुलै 2021 रोजी “निपुण भारत (समजून घेत वाचनातील प्राविण्य मिळवणे आणि संख्यावाचन यासाठी राष्ट्रीय उपक्रम - NIPUN)” उपक्रमाचा प्रारंभ केला.


⏹या उपक्रमाचे पायाभूत साक्षरता आणि अंक साक्षरतेचे सार्वभौम अधिग्रहण सुनिश्चित करण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे हे लक्ष्य आहे, जेणेकरुन प्रत्येक मुलाला वर्ष 2026-27 पर्यंत त्याच्या तिसऱ्या इयत्तेपर्यंत वाचन, लेखन आणि अंकलेखन या विषयात आवश्यक शैक्षणिक क्षमता प्राप्त होईल.


⏹हा उपक्रम शालेय शिक्षण व साक्षरता विभाग राबविणार असून “समग्र शिक्षा” या नावाने या केंद्र-पुरस्कृत योजनेच्या अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय-राज्य-जिल्हा-गट-शाळा पातळीवर योजनेची पाच स्तरीय अंमलबजावणी करणारी यंत्रणा कार्यरत करण्यात येईल.

पर्यावरण आणीबाणी घोषित करणारे देश



🇬🇧 बरिटन : ०१ मे २०१९

🇮🇪 आयर्लंड : ०९ मे २०१९

🇵🇹 पोर्तुगाल : ०७ जून २०१९

🇨🇦 कनडा : १७ जून २०१९ 

🇫🇷 फरान्स : २७ जून २०१९

🇦🇷 अर्जेंटिना : १७ जुलै २०१९

🇪🇸 सपेन : १७ सप्टेंबर २०१९

🇦🇹 ऑस्ट्रीया : २५ सप्टेंबर २०१९

🇧🇩 बांग्लादेश : १३ नोव्हेंबर २०१९

🇪🇺 यरोपियन युनियन : २८ नोव्हेंबर

🇮🇹 इटली : १२ डिसेंबर २०१९

🇦🇩 अडोरा : २३ जानेवारी २०२०

🇲🇻 मालदीव : १२ फेब्रुवारी २०२०

🇰🇷 दक्षिण कोरिया : २४ सप्टेंबर २०२०

🇯🇵 जपान : २० नोव्हेंबर २०२०

🇳🇿 नयुझीलंड : ०२ डिसेंबर २०२०

🇸🇬 सिंगापूर : ०१ फेब्रुवारी २०२१ .

वेगवेगळ्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला



1] अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमानं उडवणाऱ्या महिला


2] इंदिरा गांधी: देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान


3] कल्पना चावला: अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला


4] दुर्गाबाई कामत: दुर्गाबाई कामत या पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री होत्या.


5] प्रिया जिंघन: भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या पहिल्या महिला


6] पी.व्ही.सिंधू: रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूने रौप्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी पहिली महिला ठरली


7] आनंदीबाई गोपाळ जोशी: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला.


8] अदिती पंत: अंटार्टिकावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला


9] बचेंद्री पाल: या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. १९९४ साली त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर सर केले. भारत सरकारने २०१९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.


10] रिटा फेरिया पॉल: मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी पहिली भारतीय महिला


11] हिना सिंधू: वर्ल्डकप शुटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला.


12] मिताली राज: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा पार करणारी पहिली भारतीय महिला. एकदिवसीय सामन्यात २०० एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे


13] होमी वरारावाला: छायाचित्रकार म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या (फोटो जर्नालिस्ट) पहिल्या भारतीय महिला साडी नेसून खांद्यावर कॅमेरा घेतलेला त्यांचा फोटो त्या काळाची प्रचिती देतो.


14] सायना नेहवाल: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू


15] फातिमा बेवी: सर्वोच्च न्यायलयातील पहिल्या महिला न्यायाधीश


16] दीपा मलिक: २०१६ साली रिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला


17] पी. टी. उषा: ऑलिम्पिक खेळांच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू

QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी :- आशिया 2020



◆ 27 नोव्हेंबर 2019 रोजी जाहीर

◆ जाहीर करणारी संस्था :- Quacquarelli Symonds(QS)

◆ पहिल्यांदा जाहीर :- 2014

◆ 96 भारतीय विद्यापीठांचा समावेश

◆ सिंगापूर विद्यापीठ सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या स्थानी.

◆ भारतीय विद्यापीठांमध्ये IIT मुंबई (34) पहिल्या स्थानी.


■ पहिले तीन विद्यापीठ :- 

1) नॅशनल युनिव्हर्सिटी सिंगापूर

2) नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (सिंगापूर)

3) युनिव्हर्सिटी ऑफ हॉंगकॉंग


■ भारतीय विद्यापीठांची क्रमवारी :- 

1) IIT मुंबई (34)

2) IIT दिल्ली (43)

3) IIT मद्रास (50)

Online Test Series

०७ जुलै २०२१

राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश


👤 पी के मिश्रा : छत्तीसगड उच्च न्यायालय


👤 राजेश बिंदल : कोलकता उच्च न्यायालय


👤 सजय यादव : अलाहाबाद उच्च न्यायालय


👤 ज के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय


👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय


👤 पकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय


🙎‍♀ हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय


👤 मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय


👤 आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय


👤 एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय


👤 सजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय 


👤 सधांशू धुलिया : गुवाहाटी उच्च न्यायालय

यशाचा राजमार्ग राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

 

स्पर्धेमध्ये कसे सहभागी व्हाल?

✅मोबाईल किंवा कॅमेऱ्याचा वापर करून  वक्तृत्व स्पर्धेचा एक व्हिडीओ तयार करून आम्हाला पाठवा.

✅व्हिडीओ 7798653068 या WhatsApp नंबरवर किंवा yashacharajmarg@gmail.com या E-mail वर  पाठवा.

✅व्हिडीओ पाठवण्याचा कालावधी 15 जुलै  2021 ते  5 ऑगस्ट 2021

✅15 ऑगस्ट 2021 रोजी स्वातंत्र्य दिनानिमीत्त व्हिडीओ आमच्या YouTube channel वर अपलोड केले जातील.



स्पर्धेच्या अटी व नियम

✅वक्तृत्व स्पर्धा

गट क्र. १ – पहिली ते चौथी 
गट क्र. २ – पाचवी ते नववी 
गट क्र. ३ – खुला गट

विषय :
  1. माझ्या स्वप्नातील भारत 
  2. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज 
  3. माझा आवडता समाजसुधारक 

प्रत्येक गटातून खालीलप्रमाणे क्रमांक काढण्यात येतील.
1. प्रथम क्रमांक- 1
2. द्वितीय क्रमांक -1
3. तृतीय क्रमांक -1
4. उत्तेजनार्थ चतुर्थ क्रमांक - 5


✅मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचा वापर करू शकता.

✅व्हिडीओच्या सुरुवातीला स्पर्धकाचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता व स्पर्धेचे नाव ( यशाचा राजमार्ग राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ) सांगावे. खुल्या गटासाठी नाव ,पत्ता व स्पर्धेचे नाव सांगावे .

✅व्हिडीओ २ ते ५ मिनिटांचा असावा. वेळ जास्त झाला तरी चालेल पण कमी नको. गट क्र. १ साठी वेळेचे  बंधन नाही. पाच मिनिटापेक्षा जास्त वेळेचा व्हिडीओ असेल तर परीक्षणासाठी ५ मिनिटेच धरली जातील.

✅खुल्या गटासाठी वयाचे बंधन नाही. विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी होऊ शकतात.

✅सर्व स्पर्धकांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र pdf स्वरुपात देण्यात येईल. 100 views पूर्ण होणाऱ्या स्पर्धकांना offline  प्रमाणपत्राची प्रिंट  पाठवली जाईल.

✅views चे गुण ठरवताना व्हिडीओची लांबी पण लक्षात घेतली जाईल. उदा. दोन स्पर्धकांचे समान views असतील तर ज्या स्पर्धकाचा व्हिडीओ जास्त वेळेचा असेल त्याला जास्त गुण मिळतील.

✅व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट आहे . सर्व व्हिडिओ आमच्या यूट्यूब चैनल वर अपलोड केले जातील.


व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना घ्यावयाची काळजी

✅मोबाईल वर व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असाल तर मोबाईल आडवा धरा. मोबाईल आडवा धरून व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यामुळे युट्युब वर व्हिडिओ अपलोड करणे व पाहणे सोपे होते.

✅व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना  बॅकग्राऊंड ला अनावश्यक आवाज होणार नाही याची काळजी घ्या.

✅स्पर्धकांचा आवाज  स्पष्ट व मोठा  ऐकू येईल या पद्धतीने रेकॉर्डिंग करा.

✅स्पर्धेचा व्हिडिओ सलग असावा. तुकडे तुकडे जोडून एडिट केलेला व्हिडिओ स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

✅व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना प्रकाश योजनेकडे लक्ष द्या. योग्य प्रकाशामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. रेकॉर्डिंग करताना स्पर्धकाच्या दोन्ही बाजूला समान उजेड राहील याची काळजी घ्या. 

✅हा व्हिडीओ युट्युब ला अपलोड केल्यानंतर आपण आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करणार आहोत त्यामुळे व्हिडीओ आकर्षक होईल अशा पद्धतीने रेकॉर्ड करा

✅शक्‍यतो बॅकग्राऊंड एकाच रंगाचे असावे

✅शक्य झाले तर घराच्या बाहेर ही रेकॉर्ड करू शकता पण उन्हामध्ये रेकॉर्डिंग करू नका

✅व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना स्पर्धकाच्या मागे घरातील अनावश्यक गोष्टी दिसणार नाहीत याची काळजी घ्या.

✅रिकॉर्डिंग शक्यतो दिवसा करावे. रात्रीच्या वेळी प्रकाश कमी असल्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही

✅रेकॉर्डिंग करत असताना मोबाईल स्थिर ठेवा. हलू देऊ नका

✅आपले उच्चार स्पष्ट असावेत. घाई करू नये. घाईगडबडीत बोलल्यामुळे तुम्ही काय बोलताय हे प्रेक्षकांना कळत नाही त्यामुळे तुमचा व्हिडिओ चांगला असेल तरीही प्रेक्षक पाहत नाहीत.

✅व्हिडिओच्या सुरवातीला स्पर्धकाचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता व स्पर्धेचे नाव  स्पष्ट आवाजामध्ये सांगावे.

✅खुल्या गटातील स्पर्धकांनी आपले नाव  स्पर्धेचे नाव व थोडक्यात पत्ता सांगावा

✅व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याअगोदर चांगली प्रॅक्टिस करून मगच व्हिडिओ रेकॉर्डिंग करा

✅आपला व्हिडीओ दर्जेदार होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.


यशाचा राजमार्ग राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2021 चा निकाल कसा तयार केला जाणार आहे?


1️⃣ गुरुवार दि. 12 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आपण आपला व्हिडीओ share करून व्हिडिओचे views वाढवू शकता.

2️⃣ रविवार  दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी या स्पर्धेचा निकाल आमच्या यशाचा राजमार्ग  Youtube chanel व website  वर घोषित केला जाईल. 

3️⃣निकालाची प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवली जाईल व परीक्षकांचा निकाल हा अंतिम असेल 


 अधिक माहितीसाठी  7798653068 या क्रमांकावर संपर्क साधावा.






Online Test Series

०५ जुलै २०२१

कोव्हिशिल्ड’ला नऊ युरोपीय देशांची मान्यता



🔰यरोपातील ९ देश तेथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोव्हिशिल्ड लशीला मान्यता देत असल्याचे सूत्रांनी गुरुवारी सांगितले. ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड व स्पेन हे देश कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या लोकांना प्रवासासाठी परवानगी देत आहेत. शेंझेन देश म्हणून स्वित्झर्लंडही कोव्हिशिल्डला मान्यता देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


🔰याशिवाय, जे भारतीय इस्टोनियाला जाणार आहेत, त्यांच्या बाबतीत भारत सरकारने प्राधिकृत केलेल्या लशींना आपण मान्यता देणार असल्याचे त्या देशाने सांगितले आहे. ज्या भारतीय लोकांनी कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या लशी घेतल्या आहेत व जे युरोपला जाऊ इच्छितात, त्यांना परवानगी देण्याबाबत स्वतंत्रपणे विचार करावा, अशी विनंती भारताने यापूर्वीच युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांना केली आहे.


🔰करोना महासाथीच्या काळात मुक्तपणे प्रवास करता यावा यासाठी युरोपीय महासंघाचे डिजिटल कोविड प्रमाणपत्र किंवा ‘ग्रीन पास’ गुरुवारपासून अमलात येत आहे. त्याच्या व्यवस्थेनुसार, युरोपीय औषध यंत्रणेमार्फत (ईएमए) प्राधिकृत केलेल्या लशी घेतलेल्या व्यक्तींना युरोपीय महासंघ क्षेत्रात प्रवासविषयक निर्बंधांपासून सूट दिली जाणार आहे.

देशातलं पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्र पुण्यात सुरू.


🎯 महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्तानं, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर, म्हणजेच एमसीसीआयए या संस्थेनं नाबार्डच्या सहकार्यानं स्थापन केलेल्या देशातल्या पहिल्या कृषी निर्यात सुविधा केंद्राचं पुण्यात नुकतंच उद्घाटन झालं.


🎯 कोरोना नियमावलीचं पालन करत नाबार्डच्या पुणे विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक जी. एस. रावत यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. यावेळी 'एमसीसीआयए'च्या कृषी समितीचे अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी आणि ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते.


🎯 या केंद्राचं १५ मे रोजी दूर दृश्य प्रणालीच्या स्वरुपात उद्घाटन झालं होतं. आता महाराष्ट्रातल्या कृषी-अन्न उत्पादन क्षेत्रातल्या संभाव्य निर्यातदारांसाठी प्रत्यक्ष सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे.


🎯 या केंद्राच्या माध्यमातून निर्यातदारांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारचं सहकार्य मिळेल, असं मराठा चेंबरनं काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 


🎯 आवश्यक आणि योग्य ती माहिती पुरवून, योग्य वेळी मार्गदर्शन करून आणि प्रशिक्षण शिबिरे राबवून राज्यातून कृषी आणि अन्न उत्पादनांच्या निर्यातीत वाढ करणं, हा हे सुविधा केंद्र स्थापन करण्यामागचा उद्देश आहे. 


🎯 निर्यात प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांच्या, शेतकरी उत्पादक संघटनांच्या, कृषी अन्न प्रक्रिया उद्योगातल्या कंपन्यांच्या आणि नव्या-जुन्या निर्यातदारांना या केंद्राच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे

आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अतंर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग उन्नती योजनेला एक वर्ष पूर्ण



🌻अन्न प्रक्रीया उद्योगातील असंघटित गटात सध्या व्यक्तिगत पातळीवर कार्यरत सूक्ष्‍म उद्योगात स्पर्धा वाढवणे आणि या क्षेत्राला प्रोत्‍साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून आत्‍मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत केंद्र-पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्‍म अन्न उद्योग उन्‍नती योजनेने (PMFME) एक वर्ष पूर्ण केले आहे.


योजनेची कामगिरी


🌻योजनेच्या ‘एक जिल्हा एक उत्‍पादन’ (ODOP) घटकाच्या अंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने राज्‍ये/ केंद्रशासित प्रदेशांद्वारे प्राप्‍त शिफारशीनुसार 137 वैशिष्ट्यपूर्ण उत्‍पादनांसह 35 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांतील 707 जिल्ह्यांकरीता ODOPला मंजूरी दिली आहे.


🌻योजनेच्या अंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने ग्राम विकास मंत्रालय, आदिवासी कार्य मंत्रालय आणि गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय यांच्यासोबत तीन संयुक्‍त पत्रांवर स्वाक्षरी केली आहे.


🌻योजनेच्या नोडल बँकेच्या रुपात यूनियन बँक ऑफ इंडिया सोबत एक करार केला आहे. 11 बँकासह योजनेकरीता आधिकृत कर्ज घेणाऱ्या भागीदारांच्या रुपात करारपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.


🌻योजनेच्या अतंर्गत, क्षमता बांधणी घटकाखाली, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM) आणि अन्न प्रक्रीया तंत्रज्ञान संस्था (IIFPT) प्रशिक्षण तसेच संशोधन विषयक सहकार्यात मोलाची भूमिका वठवत आहेत.


🌻 तयाअंतर्गत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 371 तज्ञ प्रशिक्षणार्थीं आणि 469 जिल्हा पातळीवरील प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण घेले असून इतर राज्यात ही प्रक्रीया सुरु आहे.


🌻अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने IIFPT संस्थेच्या सहयोगाने समान अंत:पोषण केन्द्रांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल आणि देशभरात अंत:पोषण केन्द्राच्या तपशीलाच्या सुविधेसाठी एक ऑनलाइन समान अंत:पोषण केंद्र नकाशा विकसित केला आहे.


🌻योजनेच्या अंतर्गत बचत गटांना बीज भांडवल उपलब्ध केले जाते. त्यासाठी राज्य पातळीवर कार्यरत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM) आणि राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (SRLMs) सहकार्य घेतले जाते.


🌻 आतापर्यंत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने राज्य नोडल संस्थेला (SNA) 43,086 बचतगट सदस्यांना 123.54 कोटी रुपये भांडवल देण्याची शिफारस केली आहे. राज्य नोडल संस्थेने 8040 सदस्यांना बीज भांडवल मंजूर केले असून 25.25 कोटी रुपयांचे वाटप SRLMला झाले आहे.


🌻परत्येकी 10 उत्पादनांच्या विपणन आणि नाममुद्रा प्रचारासाठी NAFED आणि TRIFED या संस्थांच्यासोबत योजनेच्या अतंर्गत सामंजस्य करार केला आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...