२६ डिसेंबर २०२०

Online Test Series

17वी बिहार विधानसभा निवडणूक - 2020



👉 या निवडणुकीचे एकूण 3 टप्पे


📌पहिला टप्पा - 28 ऑक्टोबर : 71 जागा


📌दसरा टप्पा 3 नोव्हेंबर : 94 जागा


📌 तिसरा टप्पा 7 नोव्हेंबर :- 78 जागा

 

▪️मतदानाचा निकाल : 10 नोव्हेंबर 2020


▪️बिहार विधानसभा जागा : 243


▪️बिहार विधानसभा पक्ष : 13


📌सर्वाधिक जागा राष्ट्रीय जनता दल पक्षांनी जिंकल्या आहेत (75) त्यानंतर भारतीय जनता पक्षाने (74) जागावर विजय मिळवला.


📌या निवडणुकीत एकूण 7 लाख 6 हजार 252 मतदारांनी नोटा पर्यायाचा स्वीकार केला. (एकूण मतदारांपैकी 1.7% )


📌या निवडणुकीत एनडीए ला 125 जागा मिळाल्या तर युपीएला 111 जागा तर इतर पक्षांना 67 जागा


♦️नितीशकुमार 17 व्या बिहार विधानसभेचे मुख्यमंत्री


📌नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले ते बिहार राज्याचे 37 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. 


📌बिहार विधानसभा निवडणूकीत 243 पैकी 125 जागा जिंकलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) नेते व संयुक्त जनता दलाचे प्रमुख म्हणून नितीश

कुमार यांची ओळख आहे.


📌मागील दोन दशकात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची ही त्यांची सातवी वेळ आहे.


📌शपथ बिहारचे राज्यपाल फागु चौव्हान यांनी दिली. 


♦️उपमुख्यमंत्री पदी शपथ -


1. तारकिशोर प्रसाद (भाजप),


2. रेणू देबी


📌बिहारच्या इतिहासातील सर्वात अल्पकालीन मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार (80 दिवस) यांना ओळखले जाते.


♦️JDU जनता दल (युनायटेड) 


📌सथापना : 30 ऑक्टोबर, 2003


📌सस्थापक अध्यक्ष : नितिश कुमार


📌जनतादल युनायटेड हे बिहार आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत राज्यपक्ष म्हणून ओळखले जातात.


📌लोकसभेमध्ये सदस्य संख्येच्या दृष्टीने हा 7 व्या क्रमांकाचा पक्ष आहे.


♦️NDA - नॅशनल डेमाक्रॉटिक अलायन्स


📌सथापना : 1998


📌सस्थापक : अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी,बाळासाहेब ठाकरे


📌अध्यक्ष : नरेंद्र मोदी


📌2019 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये NDA ने एकूण 543 पैकी 350 जागा मिळविल्या.


♦️पक्षनिहाय जिंकलेल्या जागा.


राष्ट्रीय जनता दल  -75


भारतीय जनता पक्ष -74


जनता दल -43


राष्ट्रीय काँग्रेस - 19


कम्युनिस्ट पार्टी - 12


एमआयएम- 05


हिंदुस्थान अवाम मोर्चा -


विकसील इन्सान पार्टी-


♦️भारतीय निवडणूक आयोग


📌कलम 324 (1)अंतर्गत स्थापन (स्वतंत्र घटनात्मक संस्था)


📌कार्यकाळ : 6 वर्षे (वयाची 65)


 📌रचना : 2 + 1


📌 सध्या मुख्य निवडणूक आयुक्त : सुनील अरोरा (नेमणूक-राष्ट्रपती) 


📌पहिले निवडणुक आयुक्त : सूकुमार सेन

चालू घडामोडी

 1). NCAER ने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे.. ?

(National Council Of Applied Economic Research) 

>>>  -7.3 %


2). भारतातील पहिले अवयवदाता स्मारक नुकतेच कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे. ?

>>> राजस्थान 


3). कोणत्या राज्याने फायर सेफ्टी कंपलायन्स नावाचे पोर्टल सुरु केले आहे. ?

>>> गुजरात 


4). कोणत्या राज्यसरकारने विद्यार्थ्यांना 1.3 लाख स्मार्टफोन वितरित केले आहे. ?

>>> पंजाब 


5). कोणत्या राज्यसरकारने महिलांसाठी 'BC सखी योजना' सुरु केली आहे. ?(Banking corresponding)

>>> उत्तरप्रदेश 


6). खेलो इंडिया युथ गेम्सची चौथी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे. ?

  4). हरियाणा    

1). दिल्ली

2). मुंबई

3). आसाम


7). कोणत्या खेळाला प्रतिस्पर्धी खेळ म्हणून मान्यता दिली आहे. ?

>>> योगासन 


8). बाँक्सीग वर्ल्ड कप 2020 मध्ये भारताने किती सुवर्णपदके मिळवली आहेत. ?

>>> सुवर्ण - 3  रजत -2 कांस्य -4


अमित पंघाल - 52 KG

मनिषा मौन - 57 KG 

सिमरनप्रीत कौर - 60 KG 


आयोजन - जर्मनी (कोलोन) 


9).  भारतातील पहिली डायव्हरलेस मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात चालू करणार आहे. ?*

>> दिल्ली 


10). महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये गाढवांसाठी पहिला पूर्ण वेळ दवाखाना उभारण्यात येत आहे. ?

>>> नांदेड (बिलोली) - सगरोळी 


BCCI ने नुकतीच भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. ?

>>> चेतन शर्मा 


*12). सुगंधाकुमारी यांचे नुकतेच वयाच्या 86 व्या वर्षात निधन झाले आहे. त्या कोण होत्या..?*


>>> कवयित्री 


13). कोणता दिवस 'सुशासन दिन म्हणून साजरा करतात. ?

>>> 25 डिसेंबर 


14). कोणता दिवस राष्ट्रीय हक्क दिन  म्हणून साजरा करतात. ?

>>> 24 डिसेंबर 


*15). आंतराष्ट्रीय गीता महोत्सव -2020 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ?*


>>> कुरुक्षेत्र 


16). ADB ने कोणत्या राज्यासाठी 2100 करोड रुपयांचे कर्ज म्हणून मंजूर केले आहे.. ?

>>> त्रिपुरा 


17). कोणत्या बँकेने 'infinite India' नावाचे आँनलाईन पोर्टल लाँन्च केले आहे. ?

>>> ICICI बँक


18). धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या " तेल व वायू रिझर्व" चे उद्घाटन केले आहे. ?

>>> पश्चिम बंगाल 


19). अंदमान आणि निकोबार चे पोलिस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. ?

>>> सत्येंद्र गर्ग


20). कोणत्या बँकेने सुरक्षा दलांसोबत मिळून 'बडोदा मिलिट्री सँलरी पँकेज" समझौत्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ?

>>> बँक आँफ वडोदा

महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू नेमका कशासाठी? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले


🔰ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्यात मंगळवारपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. करोना काय फक्त रात्री फिरतो का? असा उपरोधिक सवालही विरोधक विचारत आहे. विरोधकांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.


🔰राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झाली होती. नववर्षांच्या सुरुवातीला शाळा-महाविद्यालयांप्रमाणेच सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने राज्य सरकार अधिक सावध झाले.


🔰मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे रविवारी दुपारी समाजमाध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदी वा रात्रीची संचारबंदीची शक्यता फेटाळली होती. परंतु ब्रिटनमधील करोनाचा नवा प्रकार लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.

FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही


❇️1 जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे फास्टॅग आत प्रत्येक वाहनाला लावावा लागणार आहे.


❇️तसेच जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर तुम्हाला थर्ड पार्टी विमाही काढता येणार नाहीय. एप्रिल, 2021 पासून हा नियम लागू होणार आहे. याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे.


❇️जानेवारीपासून फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे जुन्या गाड्यांनाही फास्टॅग लावावा लागणार आहे. 2017 पासूनच्या वाहनांना फास्टॅग अनिवार्य होते.


❇️फास्टॅग खरेदी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसनची फोटो कॉपी, वाहनाचे आरसी बुक लागणार आहे. फोटो आयडीसाठी आधार कार्ड, पासपोर्ट किंवा पॅनकार्ड द्यावे लागणार आहे.


❇️एनएचएआयनुसार तुम्ही फास्टॅग कोणत्याही बँकेकडून खरेदी करू शकतात. यासाठी 200 रुपये  घेतले जातात.


❇️फास्टॅगवर कमीत कमी 100 रुपये रिचार्ज करता येणार आहे. सरकारने बँक आणि पेमेंट वॉलेटमधून रिचार्ज करण्य़ासाठी अतिरिक्त चार्ज लावण्यासाठी सूट दिलेली आहे.

जव्हारमध्ये १२ व्या शतकातील आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा


🎗शरपारख ते नाशिक व  शूरपारख ते भरूच या दरम्यान प्राचीन काळी असलेल्या व्यापारी मार्गावर जामसर हे महत्त्वाचे शहर असल्याचे तसेच सहाव्या ते बाराव्या शतकांदरम्यान या भागात आदिवासी लोकसंस्कृतीचे प्रबळ प्रस्थ असल्याचे पुरावे पुरातत्त्व अभ्यासकांना मिळाले आहेत. जामसर तलाव पाणथळ जागा मिळून घोषित करण्यात आली असून जैवविविधतेने नटलेला हा संपूर्ण परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची संधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाली आहे.


🎗परातत्त्व अभ्यासक सदाशिव टेटीवलकर यांनी १९८० च्या सुमारास जामसेर भागास भेट दिली होती. त्यानंतर २०१८ साली ठाणे, जिल्हा वेटलँड समितीने ‘स्येंमंतक’सह या परिसरास भेट दिली तेव्हा विखुरलेले अवशेष निदर्शनास आले. ठाणे जिल्ह्य़ाच्या या जैववैविध्य समितीमध्ये समर्थ परब या अभ्यासकाचादेखील समावेश होता. जैववैविध्य आणि पुरातत्त्व असे दोन्ही विषय त्याच्या अभ्यासाचे असल्याने त्याला या ठिकाणी पाचारण करण्यात आले.


🎗‘‘हे सर्व अवशेष मध्ययुगीन काळातील संस्कृतीचे असल्याचे अभ्यासावरून दिसून आले असून त्या काळात या भागात आदिवासी संस्कृती प्रबळपणे अस्तित्वात असल्याचे प्रकाशझोतात आले आहे. या संशोधनामुळे संस्कृतीमधील टप्प्यांमध्ये सलगता प्रस्थापित झाली असून संस्कृतिबदलाचे पुरावेदेखील पुढे आले आहेत.

Good Governance Day : 25 डिसेंबरला साजरा केला जातो सुशासन दिन, काय आहे कारण?



भारताचे माजी पंतप्रधानअटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात 'गुड गवर्नेंस डे' अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. 


2014 सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी 'गुड गवर्नेंस डे' साजरा करण्याची घोषणा केली होती.


भारत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे की, प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा केला जावा. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कामातून श्रद्धांजली अर्पण केली जावी. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण केली जाते. तसेच अनेक ठिकाणी सेमिनार आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तित्व आणि कृतित्वाचा परिचय करुन दिला जातो.

2021 च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते..


◾️ करोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-3 मोहिमेला विलंब झाला आहे.


◾️ 2021च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते.


◾️“2021या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-3चंद्राच्या दिशेने झेपावेल. चांद्रयान-2 सारखी चांद्रयान-3 मोहिम असेल.


 ◾️ चांद्रयान-2 प्रमाणे चांद्रयान-3 तीन मोहिमेत लँडर, रोव्हर असेल पण ऑर्बिटर नसेल” केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली.सध्या चांद्रयान-2 चा ऑर्बिटर चंद्रभोवती भ्रमण करत आहे.


◾️ या ऑर्बिटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती वैज्ञानिकांना मिळत आहे.

सीरमने बनविली पहिली स्वदेशी न्यूमोनिया लस



🔶न्यूमोनिया तापाविरोधात सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेली पहिली स्वदेशी बनावटीची लस येत्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे.


🔶भारतामध्ये न्यूमोनियामुळे अर्भके मरण पावण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यासाठी सीरमची स्वदेशी लस वरदान ठरणार आहे.


🔶फायझर व ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या विदेशी कंपन्यांनी न्यूमोनियावर बनविलेल्या लसी सध्या बाजारात उपलब्ध असून त्यापेक्षा सीरमच्या लसीची किंमत खूपच कमी आहे.


🔶सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या न्यूमोनियावरील स्वदेशी लसीची बाजारपेठेत विक्री करण्यास औषध महानियंत्रकांनी जुलैमध्ये परवानगी दिली होती.


🔶तर या लसीच्या मानवी चाचण्यांचे तीन टप्पे सीरम इन्स्टिट्यूटने भारत तसेच आफ्रिकेतील गाम्बिया  या देशात पार पडले होते.

चार राज्यांत पुढील आठवडय़ात करोना लसीकरण सराव फेऱ्या


🔶कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी जी यंत्रणा उभारण्यात आली आहे त्याच्या सुसज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने 28 आणि 29 डिसेंबर रोजी पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये सराव फेऱ्यांचे आयोजन केले आहे.


🔶तसेच लशीच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठीचा ऑनलाइन मंच को-विनमध्ये आवश्यक ती नोंदणी करणे, चाचणीपत्र आणि त्याचे वितरण, पथकातील सदस्य तैनात करणे, सायंकाळच्या बैठका आणि अहवाल यांचा सराव फेऱ्यांमध्ये अंतर्भाव करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे कोविड-19 लशी ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या शीतकरण व्यवस्थेची चाचणी, चाचणीसाठी येणाऱ्या गर्दीचे शारीरिक अंतर ठेवून व्यवस्थापन करणे यांचाही सराव फेऱ्यांमध्ये समावेश करण्यात येणार आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.


🔶तर प्रत्येक राज्याने दोन जिल्ह्य़ांत अशा फेऱ्या आयोजित करावयाच्या आहेत. जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण भाग येथे मुख्यत्वे फेऱ्यांचे आयोजन अपेक्षित आहे.

मेघालयमध्ये ‘स्नेकहेड’ माशाची नवी प्रजाती



मेघालयच्या डोंगराळ भागात ‘स्नेकहेड’ या माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. चमकदार रंग आणि सापाप्रमाणे तोंड असणाऱ्या चन्ना कुळातील माशांची संख्या मेघालयात मोठय़ा प्रमाणात असून, या कुळातील नवीन प्रजाती नुकतीच समोर आली आहे.


भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संशोधक प्रवीणराज जयसिन्हा, अरुमुगम उमा, एन.मौलीथरन, गजेंद्र सिंह, बंकित के. मुखिम आणि तेजस ठाकरे यांच्या चमूने या प्रजातीवर संशोधन केले आहे. नुकतेच अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट आणि हर्पेटोलॉजिस्टच्या ‘कोपिया’ या नियतकालिकामध्ये यासंदर्भात शोधनिबंध प्रकाशित झाला.


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मेघालयमधील एरिस्टोन रेडॉन्ग्संगी यांनी या प्रजातीचे छायाचित्र जयसिन्हा यांना पाठवले. त्यानंतर त्यांनी आपल्या चमूसह मेघालयाचा दौरा करून या प्रजातीचा अभ्यास केला. गुणसूत्रे, आकारशास्त्राच्या अभ्यासाद्वारे जयसिन्हा यांनी त्यावर जानेवारीमध्ये शोधनिबंध लिहिला. त्यानंतर एक वर्षांने कोपियाने त्यावर शिक्कामोर्तब केले.


एरिस्टोन यांनी ही प्रजाती सर्वप्रथम आमच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे या प्रजातीचे नामकरण ‘चन्ना एरिस्टोनी’ असे करण्यात आल्याचे जयसिन्हा यांनी सांगितले. डोंगराळ भागातील वाहत्या पाण्याच्या प्रवाहांमध्ये हा मासा हमखास सापडतो. 


तसेच पाण्यात दगडांच्या सांद्रीमधून त्याचा अधिवास असतो असे त्यांनी नमूद केले. तसेच या माशास वर्षभर थंड पाणी आणि भरपूर ऑक्सिजनची गरज असते. 


या माशास चांगली मागणी असते.

महाराष्ट्रात चन्ना कुळातील प्रजाती ‘डाकू’ या नावाने ओळखली जाते, असे जयसिन्हा यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत राज्यातून या प्रजातीचे अस्तित्व जवळपास नामशेष झाले असून, गेल्या वर्षी रत्नागिरीजवळ नोंद झाली होती.

1 जानेवारीपासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य



नवीन वर्षात 1 जानेवारी 2021 पासून देशात सर्व प्रकाराच्या नवीन अथवा जुन्या सर्व वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णयाची येत्या दि. 1 जानेवारी, 2021 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

केंद्रीय सरकारच्या रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने फास्टॅगच्या आवश्यकतेसंदर्भात घोषणा केली असून ‘केंद्रीय मोटार वाहन नियम-1989’ यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.


फास्टॅग सुविधा


‘फास्टॅग’ सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलित करण्यात येत आहे. फास्टॅग - इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ETC) योजनेच्या अंतर्गत ही सुविधा अंमलात आणली जात आहे. फास्टॅग ऑनलाइन रिचार्ज केले जाऊ शकते.


रेडिओ-फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानावर ही सुविधा चालते. गाडीच्या वाहकाला ऑनलाइन पद्धतीने ‘फास्टॅग’चे टॅग मिळते. त्याच्या खात्यात वाहक काही रक्कम टाकणार. नाक्यावरचे टॅग रीडर प्रत्येक वेळी वाहकाने वाहनावर चिपकवलेले टॅग वाचणार आणि त्यातून टोल रक्कम वजा होणार.

देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवर हा प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) राबवित आहे. 


स्वयंचलित पद्धतीने तात्काळ होणारा व्यवहार वाहनांच्या दळणवळणाला गती देणार. त्यामुळे वाहनांच्या रांगा नाक्यावर दिसणार नाहीत. उभ्या अवस्थेत असलेल्या चालू गाड्यांमुळे वायफळ जाणार्‍या इंधनाची बचत होण्यास मदत मिळणार.

देवनागरीत मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ मिरजेत!


देवनागरी लिपीमध्ये मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ आणि जगातील पहिली मुद्रित भगवद्गीता मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात समाविष्ट झाली आहे.


 इसवीसन १८०५ मध्ये छपाई झालेल्या या भगवद्गीतेनंतरच देवनागरीमध्ये ग्रंथ छपाईची परंपरा सुरू झाली. इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात असलेल्या या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संशोधक मिरजेस भेट देत आहेत.


कुरूक्षेत्रावर झालेल्या कौरव-पांडव युद्धावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले तत्त्वज्ञान म्हणजे गीता हा ग्रंथ. श्रीकृष्णाने गीतेतून अर्जुनाला केलेले हे उपदेश आजच्या जगालाही तेवढेच लागू आहेत, असे मानले जाते. त्यामुळेच शेकडो वर्षांनंतरही भगवद्गीता या ग्रंथाचा प्रभाव भारतीय समाजावर तर दिसतोच, पण या ग्रंथातील या तत्त्वज्ञानाचा शोध घेत अनेक परदेशी अभ्यासकही भारताकडे आकर्षित होत असतात. 


यातील अनेकजण या महाकाव्याचा आणि त्यानिमित्ताने त्याच्या पहिल्या मुद्रित प्रतीचा शोध घेत अगदी मिरजेतही दाखल होतात. आज, २५डिसेंबरच्या गीता जयंतीनिमित्त हा ग्रंथ पाहण्यास खुला ठेवला आहे.


देवनागरीमध्ये छपाई सुरू होण्यापूर्वी गीतेच्या हस्तलिखित प्रती काढण्यात येत होत्या. परंतु या पद्धतीत प्रती तयार करण्यावर मर्यादा होत्या.


 त्यामुळे हा ग्रंथ सामान्यांना सहजप्राप्त होत नव्हता. ब्रिटिशांच्या आगमनानंतर मुद्रणकलेला प्रारंभ झाला. मात्र सुरुवातीस देवनागरीतील ही छपाई रोमन लिपीमध्ये केली जात होती.

इसवीसन १८०५ मध्ये बंगालमध्ये श्रीरामपूर येथे विल्यम कॅरे याने देवनागरी लिपीमध्ये ‘ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज’ प्रसिद्ध केले होते.


 याच वर्षी पुणे येथे सवाई माधवरावांच्या दरबारात असलेला इंग्रज वकील चार्लस् मॅलेट याने येथील एका तांबट कारागिराला तांब्याच्या पत्र्यावर मुद्रण करण्यास शिकविले. त्याच्याकडून त्याचवर्षी देवनागरी लिपीतून छपाईस प्रारंभ होणार होता. 


हे समजल्यावर या कारागिराला मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन उर्फ पहिले बाळासाहेब यांनी मिरजेत बोलावून घेतले. त्याच्याकडून देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ म्हणून भगवद्गीतेची छपाई करवून घेतली. एकप्रकारे १८०५ मध्येच छपाई झालेला हा ग्रंथही देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ ठरला.


१६६ पृष्ठांची गीता


या ग्रंथासाठी प्रथम तांब्याच्या पत्र्यावर भगवद्गीता कोरण्यात आली. या ठशांच्या आधारे पुढे छपाई करत या भगवद्गीतेच्या काही प्रती मुद्रित करून घेण्यात आल्या. या प्रथम मुद्रित प्रतीमधील एक प्रत मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात आहे. 


१६६ पृष्ठांच्या या भगवद्गीता ग्रंथाच्या शेवटी मुद्रणस्थळ, काळाचा उल्लेख केला आहे. यामध्ये मिरजेचा उल्लेख ‘मरकडेय मुनीक्षेत्रे’ असा तर काळाचा उल्लेख ‘शके १७२७, क्रोधननाम संवत्सरे’ असा आलेला आहे.

२५ डिसेंबर २०२०

Online test Series

वय (वयवारी)


🏮🏮🏮 परकार पहिला 🏮🏮🏮


📍नमूना पहिला –

उदा.👁

अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती?


1) 15 वर्षे 2)10 वर्षे 3)5 वर्ष 4) 20 वर्षे


उत्तर : 5 वर्षे

स्पष्टीकरण :-

वय वाढले तरी दोघांच्या वयांतील फरक तेवढाच राहतो.

अश्विन राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे फरक 5 वर्षेच राहील.

 

📍नमूना दूसरा –

उदा.👁

जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती ?


1)11 वर्षे   2 )36 वर्षे  3)  34 वर्षे  4) 38 वर्षे


उत्तर : 38 वर्षे

क्लृप्ती :-

दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज+दोन संख्यातील फरक)÷2

(49+27) ÷ 2 = 38

लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2 (49-27) ÷ 2 = 11

 

🏮नमूना तिसरा –

उदा.👁

रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयांतील फरक 16 वर्षे असल्यास; त्या दोघांच्या वयांची बेरीज किती?


1) 24 वर्षे  2) 32 वर्षे

3) 40 वर्षे   4) 48 वर्षे


उत्तर : 32 वर्षे

स्पष्टीकरण :-

राम व हरीच्या वयांचे प्रमाण = 3x : x    

दोघांच्या वयांची बेरीज = 3x + x = 4x

फरक = 3 x – x = 2x =16,   

:: x=8

:: 4x = 4×8 = 32

 

👁 नमूना चौथा –

उदा.🌷

अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. सुरेशचे वय 10 वर्षे असल्यास अजयचे वय किती?

21 वर्षे

23 वर्षे

15 वर्षे

28 वर्षे

उत्तर : 21 वर्षे

स्पष्टीकरण :-

सुरेशचे वय = 10 वर्षे, म्हणून अशोकचे वय = 2x-5= 20 -5 = 15 वर्षे,

:: अशोकचे वय = 15 वर्षे यानुसार अजयचे वय x मानल्यास     

x/3+8=15 म्हणून x/3=7, :

: x=21




🏮🏮🏮 परकार दूसरा🏮🏮🏮

नमूना पहिला –

उदा.

सीता व गीता यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते, तर सीताचे आजचे वय किती?

10 वर्षे

12 वर्षे

15 वर्षे

18 वर्षे

उत्तर : 12 वर्षे

स्पष्टीकरण :-

    सीता     :    गीता

आजचे वय      6x     :     5x

दोन वर्षापूर्वीचे (6x-2)2    :     (5x-2)

 

6x-2/5x-2 = 5/4b

:: 4(6x-2) =5(5x-2)    24x-8=25x-10     :: x=2

:: सीताचे आजचे वय = 6x = 6×2=12 वर्षे

 

📍नमूना दूसरा –

उदा.👈

मुलगी व आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांचे गुणोत्तर 1:5 होते, परंतु 5 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5 होईल, तर मुलीचे आजचे वय किती?

6 वर्षे

10 वर्षे

35 वर्षे

11 वर्षे

उत्तर : 11 वर्षे

स्पष्टीकरण :-

                         मुलगी    :    आई

5 वर्षांपूर्वी                 1      :     5            

आजचे वयांचे                         

गुणोत्तर               (x+5)    :    (5x+5)            

5 वर्षांनंतर                         

वयांचे गुणोत्तर        (x+10)   :    (5x+10)

        

x+10/5x+10 = 2/5

:: 5(x+10) = 2(5x+10)

5x=50=10x+20

5x=30

:: x=6

मुलीचे आजचे वय = x+5     

:: 6+5 = 11 वर्षे

 

🛑 नमूना तिसरा –

उदा.👁 

मुलगा, आई, वडील यांची आजची वये अनुक्रमे 10 वर्षे, 30 वर्षे व 40 वर्षे आहेत, तर किती वर्षांनी त्यांची वये 3:7:9 या प्रमाणात होतील ?

10

6

3

5

उत्तर : 5

स्पष्टीकरण:

3+7+9=19 भाग,  उदाहरणाप्रमाणे (10+30+49) = 80     

80+3x/19 =19×5 = 95  

85 – 80 = 15,

3x=15     

:: x=5

काळ ,काम & वेग पायाभुत संकल्पनांसह सोडवलेली उदाहरणे "आपणही सोडवुन पाहावीत"


(पायाभुत संकल्पनांसह सोडवलेली उदाहरणे "आपणही सोडवुन पाहावीत")


   🚇🏃🚴‍♀

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

     ✍️मजा निर्मळ (STI)

     👉9595805222

〰️〰️〰️🔥〰️〰️〰️🔥〰️〰️〰️〰️


🚀 ‘काळ’ म्हणजे काम करण्यासाठी लागणारा वेळ . काळ आणि काम यांचे ‘सम प्रमाण’ असते. कारण कमी वेळ काम केले तर कमी काम होईल. जास्त वेळ काम केले तर जास्त काम होईल.


🚀 वग म्हणजे काम करण्याची गती. वेळ आणि वेग यांचे ‘व्यस्त प्रमाण’ असते. म्हणजे काम करण्याचा वेग वाढविला तर काम कमी वेळेत पूर्ण होते. उलट वेग कमी केला तर जास्त वेळ लागेल.


         ❤️ IMP points ❤️


1)    काळ व काम : एखादे काम पूर्ण करण्यास लागणारा काळ (वेळ) ते काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येवर अवलंबून असतो. 


2)    काम आणि लागणारा काळ (वेळ) हे सम चलनात असते.


3)    काम करणाऱ्या संख्या व लागणारा काळ (वेळ) हे व्यस्त चलनात असते.


4)    काळ, अंतर व वेग (सूत्र) : अंतर = वेग x वेळ


https://telegram.me/Rajmargbymunjanirmal


🚨 सोडवून दाखविलेली उदाहरणे 🚨


1) 3 कागद टाईप करावयास 40 मिनिटे लागली, तर 12 कागद टाईप करावयास किती वेळ लागेल?


1) 2 तास 40 मिनिटे 

2) 2 तास 30 मिनिटे 

3) 3 तास 

4) 3 तास 20 मिनिटे


स्पष्टीकरण


टाईप करावयाचे कागद वाढले म्हणून त्यासाठी जास्त वेळ लागणार.


3 कागदांना 40 मिनिटे


12 कागदांना 160 मिनिटे = 2 तास 40 मिनिटे


काम चौपट वेळ चौपट ( सम प्रमाण) पर्याय क्र. 1 हे उत्तर✅


2) एका मजुराने 8 खड्डे दोन तासांत खोदले, तर आणखी दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?


1) 35 मिनिटे 2) 30 मिनिटे 3) 25 मिनिटे 4) 40 मिनिटे


स्पष्टीकरण – 8 खड्डे तयार करण्यास 2 तास 120 मिनिटे


दोन खड्डे तयार करण्यास 30 मिनिटे


काम कमी वेळ कमी ( सम प्रमाण ) पर्याय क्र. 2 हे उत्तर✅


3) एक मजूर एक काम 12 दिवसांत पूर्ण करतो, तर तो एका दिवसात किती काम करील?


1) 1/3 2) 1/6 3) 1/8 4) 1/12


स्पष्टीकरण


मजुराला काम पूर्ण करण्यास 12 दिवस लागतात.


म्हणजे एका दिवसात तो कामाचा 12 वा भाग किंवा 1/12 भाग तयार करतो.


:. पर्याय क्र. 4 हे उत्तर✅


4) एक मजूर एक काम 12 दिवसांत पूर्ण करतो, तर 4 दिवसांत तो किती काम करील?


1) ¼ 2) 1/3 3) 1/6 4) 1/12


स्पष्टीकरण


संपूर्ण कामाला 12 दिवस लागतात.


म्हणून 1 दिवसाचे काम 1/12 आणि 4 दिवसांचे काम 4/12 = 1/3


:. पर्याय क्र. 2 हे उत्तर✅


5) 2 माणसे एक काम 6 दिवसांत करतात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसांत करतील?


1) 3 दिवस 2) 4 दिवस 3) 2 दिवस 4) 5 दिवस


स्पष्टीकरण


माणसे वाढली तर काम कमी दिवसांत पूर्ण होईल म्हणून हे ‘व्यस्त प्रमाण’


आहे .


2 माणसांना 6 दिवस लागतात.


4 माणसांना 3 दिवस लागतात.


माणसे दुप्पट झाली म्हणून दिवस निमपट लागणार. :. पर्याय क्र. 1 हे उत्तर✅


https://telegram.me/Rajmargbymunjanirmal


6) घर बांधण्याचे काम 12 सुतार 8 दिवसांत करतात. जर 4 सुतार वाढले तर ते काम किती दिवसांत पूर्ण होईल?


1) 3 दिवस 2) 4 दिवस 3) 5 दिवस 4) 6 दिवस


स्पष्टीकरण


4 सुतार वाढविले म्हणजे 12+ 4 = 16 झाले.


सुतारांचे गुणोत्तर 12/16 , दिवसांचे गुणोत्तर 8/ क्ष चा व्यस्त क्ष /8


12/16 = क्ष /8 तिरकस गुणाकाराने 12 x 8 = 16 x क्ष


16 क्ष = 12 x 8


:. क्ष = 6 :. पर्याय क्र. 4 हे उत्तर✅


7) एक भिंत बांधण्यास 6 गवंड्यांना 14 दिवस लागतात. काही कारणामुळे त्यांपैकी 2 गवंडी निघून गेले, तर बाकीचे गवंडी ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?


1) 20 दिवस 2) 21 दिवस 3) 22 दिवस 4) 24 दिवस


स्पष्टीकरण


6 गवंडी – 2 गवंडी = 4 गवंडी राहिले.


6 गवंड्यांना 14 दिवस लागतात.


4 गवंड्यांना क्ष दिवस लागतील.


6/4 = क्ष /14 तिरकस गुणाकाराने 6 x 14 = 4 क्ष


4 क्ष = 84


:. क्ष = 21 दिवस :. पर्याय क्र. 2 हे उत्तर✅


8) 100 मीटर लांबीची एक आगगाडी एका खांबास 9 सेकंदांत ओलांडते, तर गाडीचा दर ताशी वेग काय ?


1) 50 कि.मी. 2) 45 कि.मी. 3) 40 कि.मी. 4) 36 कि.मी.


स्पष्टीकरण


आगगाडी एका खांबास ओलांडते म्हणजे स्वतःच्या लांबीइतके अंतर तोडते . आगगाडी 9 सेकंदात 100 मीटर जाते तर 3,600 सेकंदात किती जाईल?


3,600 x 100/9 = 40,000 मीटर.


40,000 मीटर ÷ 1,000 = 40 किलोमीटर :. पर्याय क्र. 3 हे उत्तर✅


9) 150 मीटर लांबीची आगगाडी 250 मीटर लांबीच्या पुलास ओलांडून जाते. गाडीचा वेग दर ताशी 40 किलोमीटर असेल, तर पूल ओलांडण्यास गाडीला किती वेळ लागेल?


1) 200 सेकंद 2) 300 सेकंद 3) 32 सेकंद 4) 36 सेकंद


स्पष्टीकरण


आगगाडीस तोडावयाचे एकूण अंतर =


स्वतःची लांबी 150 मीटर + पूलाची लांबी 250 मीटर = एकूण 400 मीटर


गाडीचा वेग दर ताशी 40 किलोमीटर आहे.


40 किलोमीटर जाण्यास गाडीला 3,600 सेकंद लागतात.


1 किलोमीटर जाण्यास 3,600सेकंद ÷ 40 = 90 सेकंद लागतील.


400 मीटर म्हणजे 0.4 किलोमीटर जाण्यास


90 x 0.4 = 36 सेकंद लागतील. :. पर्याय क्र. 4 हे उत्तर✅


10) ताशी 24 किलोमीटर वेगाने गेल्यास एका


भावी अधिकारी®, [14.06.17 08:30]

गावी पोहोचण्यास 2 तास 30 मिनिटे लागतात, तर ताशी 30 कि.मी. वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?


1) 2 तास 2) 2 तास 10 मिनिटे 3) 1 तास 35 मिनिटे 4) 1 तास 45 मिनिटे


स्पष्टीकरण


24 किलोमीटर वेगाने 150 मिनिटे लागतात.


30 किलोमीटर वेगाने किती मिनिटे लागतील?


वेग वाढल्याने वेळ कमी लागेल. ( व्यस्त प्रमाण)


वेगाचे गुणोत्तर 24/30, वेळेचे गुणोत्तर 150 / क्ष चा व्यस्त क्ष/ 150


24/30 = क्ष /150 तिरकस गुणाकाराने 24 x 150 = 30 क्ष


30 क्ष = 24 x 150


:. क्ष = 120 मिनिटे = 2 तास :. पर्याय क्र. 1 हे उत्तर✅

〰️〰️〰️〰️〰️👇👇〰️〰️〰️〰️〰️

https://telegram.me/Rajmargbymunjanirmal

〰️〰️〰️〰️👆👆👆👆〰️〰️〰️〰️

11) ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी एका खांबास 18 सेकंदांत ओलांडते , तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?


1) 235 मीटर 2) 240 मीटर 3) 200 मीटर 4) 242 मीटर


स्पष्टीकरण


आगगाडीची लांबी म्हणजे तिने 18 सेकंदांत तोडलेले अंतर


आगगाडीचा ताशी वेग 48 कि.मी.


3,600 सेकंदांत 48,000 मीटर


36 सेकंदांत 480 मीटर


18 सेकंदात 240 मीटर


:. आगगाडीची लांबी = 240 मीटर :. पर्याय क्र. 2 हे उत्तर✅


12) जे काम ‘अ’ 60 दिवसांत करतो तेच काम एकटा ‘ब’ 40 दिवसांत करतो, तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसांत करतील?


1) 22 दिवस 2) 42 दिवस 3) 24 दिवस 4) 27 दिवस


स्पष्टीकरण

एकटा ‘अ’ 60 दिवसांत काम करतो.

त्याचे 1दिवसाचे काम 1/60

एकटा ‘ब’ 40 दिवसांत काम करतो.

त्याचे 1 दिवसाचे काम 1/40

‘अ’ आणि ‘ब’ दोघांचे 1 दिवसाचे काम

1/60 + 1/40 = 5 / 120 = 1/24

‘अ’ आणि ‘ब’ दोघांचे 1 दिवसाचे काम 1/24

म्हणजेच त्या दोघांना ते काम करण्यास 24 दिवस लागतील.

:. पर्याय क्र. 3 हे उत्तर✅


13) रस्ता तयार करण्याचे एक काम 60 मजूर रोज 6 तास काम करून 56 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 40 मजूर रोज 7 तासांप्रमाणे काम करून किती दिवसांत संपवतील?


1) 72 दिवस 2) 70 दिवस 3) 75 दिवस 4) 80 दिवस


स्पष्टीकरण


60 मजूरांना 56 दिवस लागतात.

60 x 56 = 40 x (व्यस्त प्रमाण )

40x = 3,360

:. x = 84

40 मजूरांना रोज 6 तासांप्रमाणे 84 दिवस लागतील.

6 x 84 = 7x (व्यस्त प्रमाण )

7x = 504

:. x = 72

7 तासांप्रमाणे 72 दिवस लागतील . पर्याय क्र. 1 हे उत्तर✅



14) ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्‍या 380 मीटर लांबीच्या आगगाडीला त्याच दिशेला ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी 320 मीटर लांबीची आगगाडी किती वेळात ओलांडील?


1) 9 मिनिटे 2) 7 मिनिटे 3) 2 मिनिटे 4) 3 मिनिटे


स्पष्टीकरण

एका आगगाडीने दुसर्‍या आगगाडीस ओलांडून जाण्यासाठी तोडावयाचे अंतर=

380 मीटर + 320 मीटर = 700 मीटर

दोन्ही आगगाड्यांची जाण्याची दिशा एकच असल्यामुळे तोडावयाचे अंतर दोन्हींच्या वेगांच्या वजाबाकीने म्हणजे ताशी

(54 – 40 ) 14 कि.मी. वेगाने तोडले जाईल.

14,000 मीटर अंतर तोडण्यास 60 मिनिटे लागतील.

1,400 मीटर अंतर तोडण्यास 6 मिनिटे लागतील

700 मीटर अंतर तोडण्यास 3 मिनिटे :. पर्याय क्र. 4 हे उत्तर✅



15) एका हौदात एका नळातून पाणी सोडले असता तो भरण्यास पाच तास लागतात.


त्या हौंदातील पाणी सोडण्यास दोन तोट्या आहेत; त्यापैकी कोणतीही एक तोटी सोडली तर 20 तासांत हौद रिकामा होतो. जर हा नळ आणि या दोन तोट्या एकाच वेळी सोडल्या तर तो हौद भरण्यास किती वेळ लागेल?


स्पष्टीकरण

नळामुळे हौद पाच तासात पूर्ण भरतो.

:. तो हौद एका तासांत 1/5 इतका भरतो.

एका तोटीमुळे तो 20 तासांत रिकामा होतो.

:. एका तासात तो 1/20 इतका रिकामा होतो.

:. दोन तोट्या वापरल्यास एका तासात तो 2/20 किंवा 1/10 इतका रिकामा होईल.

आता नळ व दोन्ही तोट्या एकाच वेळी सोडल्यासतो हौद 1 तासात 1/5 भरला जाईल आणि 1/10 इतका रिकामा होईल. एका तासात तो 1/5 – 1/10 इतका भरेल.

1/5 = 2/10 :. 2/10 – 1/10 = 1/10

:. एका तासात हौद 1/10 इतका भरेल .

म्हणजेच हौद भरण्यास 10 तास लागतील. :. पर्याय क्र. 3 हे उत्तर✅



वेग , वेळ आणि अंतर गणित उदाहरण





🚨नमूना पहिला 🚨–


उदा.

300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?


45 से.

15 से.

25 से

.35 से. 


उत्तर : 15 से.


क्लृप्ती :-


एका तासाचे सेकंद = 3600 व 1 कि.मी. = 1000 मी. 3600/1000=18/5, या आधारे वेग व वेळ काढताना 18/5 ने गुणा व अंतर काढताना 5/18 ने गुणा.  


खांब ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 ∶:  300/72×18/5=15 सेकंद


🚨नमूना दूसरा –🚨


उदा.


ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्याल 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?


1मि. 12से.

1मि. 25से.

36से

.1मि. 10से. 


उत्तर : 1मि. 12से.


क्लृप्ती :-


एकूण कापावयाचे अंतर = गाडीची लांबी + पूलाची लांबी = 400+400 =800 मि.

पूल ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी/ताशी वेग × 18/5


🚨नमूना तिसरा –🚨


उदा.


ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?


540मी.

 162मी. 

270मी. 

280मी. 


उत्तर : 270 मी.


सूत्र :-


गाडीची लांबी = वेग × वेळ × 5/18 = 54×18×5/18 = 270 मी.


🔴नमूना चौथा 🔴–


उदा.


800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडण्यार्‍या गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?


54 कि.मी.

40 कि.मी.

  50 कि.मी.

60 कि.मी. 


उत्तर : 40 कि.मी.  


क्लृप्ती :-


वेग = अंतर/वेळ ×18/5 = 800/72 × 18/5 = 40     

(वेग काढताना 18/5 ने गुणणे)




🔴नमूना पाचवा 🔴–


उदा.


मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?


दु.12 वा.

12.30 वा.

1.30 वा.

11.30 वा. 


उत्तर : 12.30 वा.


क्लृप्ती :-


भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ

= वेळेतील फरक × पहिल्या गाडी चा/वेगातील फरक = 1 तास×60/75-60 = 60/15 = 4 तास


🔴नमूना सहावा –🔴


उदा.


मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्याा गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?


दु.12.30वा.

दु.12वा.

दु.1.30वा.

दु.1वा. 


उत्तर : दु.12.30वा.


क्लृप्ती :-


लागणारा वेळ = एकूण अंतर/दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज


🚨नमूना सातवा 🚨–


उदा.


ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?


300 कि.मी.

240 कि.मी.

210 कि.मी.

270 कि.मी. 


उत्तर : 240 कि.मी.


स्पष्टीकरण :-


60 व 75 चा लसावी = 300

300 ÷ 60 = 5 तास     :: 60 मिनिटे फरक = 60×5=300 कि.मी.

300 ÷ 75 = 4 तास     :: 48 मिनिटे फरक = 4×60 = 240 कि.मी.

〰️〰️〰️〰️〰️〰️🚨🚨〰️〰️〰️〰️

विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना



🔶राजश्री योजना : राजस्थान 


🔶 कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल 


🔶 भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक


🔶 लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश 


🔶 लाडली : दिल्ली व हरियाणा


🔶 मख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश 


🔶 मख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार


🔶 किशोरी शक्ति योजना : ओडिशा 


🔶 ममता योजना : गोवा 


🔶सरस्वती योजना : छत्तीसगढ


🔶 माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र


🔶 नदा देवी कन्या योजना : उत्तराखंड .

रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय; जागा, नाव आणि कधी सुरु होणार हे ही ठरलं.


🔥कापड, टेलिकॉमबरोबरच अनेक श्रेत्रांमध्ये असणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय उभारणार आहे. हे प्राणी संग्रहालय गुजरातमधील जामनगर येथे उभारण्यात येणार आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.


🔥रिलायन्सच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या प्राणीसंग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी तसेच सपरटणारे प्राणीही पर्यटकांना पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील वेगेगवेळ्या भागांमधील प्राणी या संग्रहालयामध्ये असतील असं सांगण्यात आलं आहे.


🔥ह प्राणीसंग्रहालय २८० एअर परिसरावर निर्माण केलं जाणार आहे. जामनगरमधील मोती खावेडी येथे रिलायन्सचा रिफायनरी प्रोजेक्ट आहे. या ठिकाणापासूनच जवळच हे प्राणीसंग्रहालय उभारलं जाणार आहे. रिलायन्सचा हा रिफायनरी प्रोजेक्ट जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. येथून रिलायन्स समुहाचा पेट्रोकेमिकल्समधील सर्व व्यवसाय चालतो.

रशियात पुतीन सरकारचा नवा कायदा.


🥀रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रुपांतर झालं आहे.


🥀तर या नवीन कायद्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदाचा त्याग केल्यानंतरही राष्ट्रध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीविरोधात कोणत्याच प्रकारचा कायदेशीर खटला दाखल करता येणार नाही. म्हणजेच एकदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीला कायदेशीर खटल्यांपासून मरेपर्यंत संरक्षण मिळणार आहे.


🥀तसेच या कायद्यासंदर्भातील माहिती मंगळवारी ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आली. या कायद्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी या कालावमध्ये केलेल्या गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यात आलं आहे.


🥀तर या व्यक्तींविरोधात या नवीन कायद्यानुसार कोणताही न्यायालयीन खटला चालवता येणार नाही. केवल खटल्यापासून मुक्ती नाही तर माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्याचा हक्क पोलीस किंवा इतर तपास यंत्रणांना असणार नाही अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे.

‘एमपीएससी’ परीक्षार्थीना दिलासा

 राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा तब्बल चार वेळा स्थगित करून पुन्हा काही महिन्यांनी घेण्यात येणार असली तरी ‘चालू घडामोडी’ या महत्त्वाच्या विषयाच्या अभ्याक्रमात कुठलाही बदल होणार नसल्याची खात्रीशीर माहिती आयोगातील एका मोठय़ा अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे पुढे होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मार्च २०२० पर्यंतच्या ‘चालू घडामोडीं’वरच प्रश्न येणार हे स्पष्ट झाले आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा अवांतर विषयांवर असला तरी आयोग विविध विषयांचा अभ्यासक्रम निश्चित करून देतो. यातील बहुतांश विषयांमध्ये फारसा बदल होत नसला तरी ‘चालू घडामोडी’ हा दैनंदिन विषय असल्याने त्यात बदल अपेक्षित असतो. त्यामुळे आयोग ‘चालू घडामोडीं’साठी परीक्षेच्या तारखेनुसार एक निश्चित कालमर्यादा ठरवून देत असते. त्यामुळे विद्यार्थी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यासही परीक्षेच्या तारेखा अंदाज घेऊन करीत असतात. मात्र, यंदा मार्च महिन्यापासून लागलेली टाळेबंदी व अन्य कारणांनी आयोगाने पूर्व परीक्षा तब्बल चारदा स्थगित केली. ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा अगदी तोंडावर आली आली असताना मुख्यमंत्र्यांनी ९ ऑक्टोबरला मराठा आंदोलनाचा धसका घेत परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. याला दोन महिने लोटूनही परीक्षेच्या नवीन तारखेबाबत अद्यापही निश्चिती नाही. परीक्षेची मूळ तारीख आणि आताच्या कालावधीमध्ये तब्बल दहा महिन्यांचा कालावधी लोटून गेल्याने पुढील काही महिन्यात होणाऱ्या परीक्षेमध्ये विशेषत: ‘चालू घडामोडी’ विषयाच्या अभ्यासक्रमात बदल होणार की जुन्याच तारखेच्या आधारावर अभ्यासक्रम राहणार, असा प्रश्न परीक्षार्थीसमोर होता. ‘चालू घडामोडी’ हा विषयच वारंवार बदलणारा असल्याने आयोग अभ्यासक्रम बदल करणार, अशीही चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती. या सर्वाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही होत होता. मात्र, परीक्षांच्या तारखा बदलल्या तरी अभ्यासक्रमात कुठलाही बदल होणार नसून चालू घडामोडींसाठी मार्च २०२० पर्यंतचाच अभ्याक्रम दिला जाणार असल्याची माहिती आयोगातील एका अधिकाऱ्याने दिली. याशिवाय परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

नव्या प्रश्नपत्रिका काढणे कठीण

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आयोगाने यंदा परीक्षा केंद्रांमध्ये वाढ केली. राज्यात तब्बल ७६१ केंद्रांवर परीक्षा होणार होती. सर्व जिल्हा केंद्रांवर प्रश्नपत्रिका आताही सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या प्रश्नपत्रिका आयोगाने अद्यापही परत बोलावल्या नसल्याने याच प्रश्नपत्रिकांवर परीक्षा होणार आहे. शिवाय नव्याने प्रश्नपत्रिका काढणे कठीण असल्याने अभ्यासक्रमात कुठलाही बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

ठाकरे सरकारकडून रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा.


📜ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा दिला आहे. रेस्तराँ आणि बार चालकांच्या परवाना शुल्कात राज्य सरकारने ५० टक्क्यांची कपात केली आहे. करोना आणि लॉकडाउनच्या काळात इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच लिकर इंडस्ट्रीला मोठा फटका बसला होता.


📜कोविड काळात लॉकडाउन असताना राज्यातील परवानाधारक मद्यविक्रीची दुकानं बंद होती. त्यामुळे या बंद असलेल्या दुकानांच्या परवाना शुल्कात सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. जी मान्य करण्यात आली आहे. ज्यांनी आधीच परवाना शुल्काची रक्कम भरली आहे त्यांना ती पुढील आर्थिक वर्षात दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे .


📜लॉकडाउनमधून सूट देत असताना म्हणजेच अनलॉकमध्ये जात असताना ठाकरे सरकारने मंदिरांच्या आधी बार सुरु केले, दारु दुकानांना संमती दिली आणि दारु परवान्यांच्या शुल्कात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे समाजातले इतरही घटकही त्रस्त झाले आहेत. वारंवार मागण्या करुनही त्यांना दिलासा मिळत नाही.


📜मग हे सरकार दारुवाल्यांवर मेहरबान का? का दारुवाले या सरकारमधल्या काही मंत्र्यांवर मेहरबान आहेत? असा प्रश्न विचारत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या निर्णयावर टीका केली आहे. सामान्य माणूस भरमसाठ वीज बिलात सवलत मागत होता. त्यासाठी रस्त्यावरही उतरला तरीही या सरकारने सूट दिली नाही. घरपट्टी, पाणीपट्टी असेल कशातच सामान्य माणसांना दिलासा दिला नाही. मग दारुवाल्यांनाच दिलासा का? दारुवाल्यांचं भलं करणं हाच या सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे का? असाही प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

मराठा समाजाला EWS चा लाभ, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय.


🔓मराठा समाजाला EWS चा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.


🔓तयानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.


🔓मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमेदवारांची होणारी फरफट लक्षात घेऊन ठोस पाऊल टाकण्यात आलं आहे.


🔓एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरता ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मराठा समाजासाठी हा खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

२४ डिसेंबर २०२०

आयपीलमध्ये आता ‘दस का दम’; दोन नव्या संघांना मंजुरी

‘आयपीएल’मध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. २०२२ च्या हंगामात आयपीएलचे एकूण दहा संघ असतील. गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय प्रथम श्रेणीच्या सर्व खेळाडूंना (महिला आणि पुरुष ) करोना महामारीमुळे सामने न होऊ शकल्यामुळे योग्य तो मोबदला देण्यावरही एकमत झालं आहे. २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही या सभेमध्ये निर्णय झाला.

‘‘२०२१मध्ये ‘आयपीएल’चे संघ वाढवणे अतिशय घाईचे ठरेल. निविदा प्रक्रिया, खेळाडूंचा लिलाव, आदी प्रक्रिया इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणे कठीण जाईल. त्यामुळेच २०२२पासून १० संघांचे ‘आयपीएल’ असेल. त्यामुळे स्पर्धेमधील सामन्यांची संख्या वाढणार आहे. 

नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. आयपीएल २०२१ नंतर नव्या दोन संघाबाबत लिलाव प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

लेवांडोस्की सर्वोत्तम

🔥अर्जेटिनाचा लिओनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या मातब्बर खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात आणून पोलंडचा कर्णधार रॉबर्ट लेवांडोस्कीने ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर नाव कोरले. महिलांमध्ये इंग्लंडच्या लुसी ब्राँझने सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली.

🔥झुरिच येथे झालेल्या या आभासी सोहळ्यादरम्यान विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. परंतु ‘फिफा’चे अध्यक्ष जिआनी इन्फॅन्टिनो यांनी म्युनिक येथे जाऊन लेवांडोस्कीला पुरस्कार प्रदान केल्याची चित्रफीत या सोहळ्यादरम्यान दाखवण्यात आली. नेहमीप्रमाणे जगभरातील निवडक राष्ट्रीय फुटबॉल संघांचे कर्णधार, प्रशिक्षक, क्रीडा पत्रकार आणि चाहत्यांच्या मतांचा आढावा घेऊन विजेत्यांची निवड करण्यात आली.

🔥३२ वर्षीय लेवांडोस्कीने यंदा बायर्न म्युनिकला चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने हंगामात सर्वाधिक ५५ गोल करतानाच बायर्नला बुंडेसलिगाचे जेतेपदही जिंकून दिले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी Live Tv वर घेतली करोना लस

🔥अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीरपणे करोना लस घेतली आहे.

🔥 जेव्हा करोना लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्या मनात भीती नसावी आणि ते लस घेण्यासाठी तयार असावेत यासाठीच आपण जाहीरपणे लस घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

🔥जोय बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये Pfizer-BioNTech ची लस घेतली.

सावित्रीबाई फुले जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी होणार


🔶 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 


🔶 स्त्री शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.


🔶 या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. 


🔶सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांत, शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.


🔶 त्यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल, अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

Online Test Series

गोवा मुक्ती लढा


🔺पोर्तुगालने  आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश हाती सोपवण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागला.


🔺पोर्तुगीज शासनाविरुध्द जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य प्रथम डॉ. टी. बी. कुन्हा यांनी केले.


🔺आपल्या लिखाणातून त्यांनी पोर्तुगिजांच्या शोषक कारभारावर कोरडे ओढले.


🔺पोर्तुगिजांविरुध्द लढा देण्यासाठी लोकांना संघटित करण्याच्या हेतूने त्यांनी गोवा काँग्रेस समिती स्थापन केली.


🔺1946 साली गोवा मुक्तीसाठी डॉ. राममनोहर लोहिया यांनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. याच सुमारास गुजरातमधील दादरा व नगरहवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमांतक दलाची स्थापना करण्यात आली होती.


🔺2 ऑगस्ट, 1954 रोजी या दलाच्या तरूणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा व नगरहवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला.


🔺या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, नानासाहेब काजरेकर, सुधीर फडके इत्यादींनी भाग घेतला होता.


🔺1954 सालापासून गोवा मुक्ती चळवळीला विशेष गती मिळाली. गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली.


🔺 या समितीने सत्याग्रहींच्या अनेक तुकडया गोव्यात पाठवल्या. त्यात सेनापती बापट, महादेवशास्त्री जोशी व त्यांच्या पत्नी सुधाताई तसेच सुधीर फडके, नानासाहेब गोरे इत्यादी नामवंतांनी भाग घेतला.


🔺भारत सरकार पोर्तुगालशी सामोपचाराने वाटाघाटी करत होते. परंतु त्याला प्रतिसाद मिळेना. अखेरीस डिसेंबर 1861 मध्ये भारताचे सैन्य गोव्यात शिरले.


🔺काही दिवसांतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली.


· गोवा मुक्त झाला.


· भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

ब्राम्हो समाज व त्याची स्थापना



धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर (बंगाल) येथे झाला.


 विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषा चा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी राजवट कशी स्थिर झाली हे प्रत्यक्ष पाहिले.


 ब्रिटिशांचे अनेक गुण भारतीय विचारवंतांना अंतर्मुख करु लागले होते. आपल्या समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, याची जाणीव रॉय यांना होती. त्यांनी काही काळ ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीपण केली होती त्या काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते. हिंदू धर्मातील एकेश्र्वरवाद, मुर्तिपूजा, आणि जातिभेद, समाजाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत. असे त्यांचे मत होते. त्यामुळे भारतीय समाजाला जागृत करावयाचे असेल तर या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्याग केला पाहिजे असा प्रसार रॉय यांनी सुरु होता. सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला. अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता. स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती. पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता. संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली. रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.


▪️ब्राम्हो समाजाची स्थापना :


त्या सुमारास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले होते. हे हल्ले परतवून हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते. हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञानावर आहे हे ओळखून रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदांत सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले. अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले. वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी 1828 मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे.


📚 दी इंडियन स्पेक्टॅटर :-

 बेहरामजी मलबारी..


📚 इडियन :-

 फिल्ड किशोरीचंद मित्र..


📚 अबला बांधव :-

 द्वारकानाथ गांगुली..


📚 फरी हिन्दुस्थान :-

तारकानाथ दास..


📚 परिदर्शक :-

 बिपिनचंद्र पाल..


📚 जन्मभूी :- 

पट्टाभि सितारामय्या..


📚 मबई समाचार :-

 फरदुनजी मर्झबान..


📚 तलवार :-

 विरेंद्रनाथ चटोपाध्याय..


📚 लीडर पं. मदन :-

 मोहन मालवीय..


📚 पख्तून :- 

खान अब्दुल गफारखान..


📚 इडियन मजलीस :-

 अरविद घोष (केम्ब्रिज)..

विभक्ती व त्याचे प्रकार


🔶 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.


🔶 नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.


🔰 नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.


▪️ प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – 

      कर्ता


▪️ व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – 

      कर्म


▪️ तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण


▪️ चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – 

      संप्रदान


▪️ पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान


▪️ षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध


▪️ सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – 

     अधिकरण

मानव विकास अहवाल 2020 प्रसिद्ध; भारताचे स्थान एकाने घसरून 131 वर.


🔰 सयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने ‘मानव विकास निर्देशांक 2020’ अहवाल प्रसिद्ध. 


🔰 दशातले आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या जीवनमानाचे मोजमाप करण्यासाठी मानव विकास निर्देशांकाचा वापर केला जातो.


✳️ ठळक बाबी :-


🔰निर्देशांकामध्ये नॉर्वे देश प्रथम स्थानी असून त्याच्यापाठोपाठ आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि आईसलँड यांचा क्रमांक लागतो.


🔰 यदा भारताच्या स्थानामध्ये पुन्हा एकदा घसरण होऊन तो 189 देशांच्या यादीमध्ये 131 व्या क्रमांकावर आहे.


🔰 भारताचे गेल्या वर्षीचे मानव विकास निर्देशांकातले मूल्य 0.645 एवढे आहे. त्यामुळे भारताला मध्यम मानव विकासाच्या श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.


🔰 गल्या वर्षी भारतीयांचे जीवनमान हे 69.7 वर्षे एवढे होते, जेव्हा की ते बांगलादेशात 72.5 वर्षे आणि पाकिस्तानात 67.3 वर्षे एवढे आहे.मध्यम मानवी विकासाच्या क्रमवारीमध्ये भारत व भुटान 129 व्या, बांगलादेश 133 व्या आणि पाकिस्तान 154 व्या स्थानी आहे.


🔰 दशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये घसरण होऊन ते वर्ष 2018 मधल्या 6829 डॉलरवरून 6681 डॉलरवर आले आहे.


🔰 कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत भारत देशाने अधिक प्रगती केली आहे.


🔰 आर्थिक सुरक्षितता आणि जमिनीच्या मालकीमुळे महिलांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लिंगभेदावरून होणारे छळ देखील कमी झाले आहे.


🔰 मानव विकास निर्देशांक हा देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. 


🔰 हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.


🔰1990 साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मानव विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.

अमेरिकेतील पोस्ट ऑफिसला भारतीय वंशाच्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव.


🔺अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एका विधेयकावर स्वाक्षरी केली असून त्याचे कायद्यात रुपांतर झालं आहे.


🔺तर या नवीन कायद्यानुसार टेक्सास राज्यातील एका पोस्ट ऑफिसला दिवंगत शीख पोलीस अधिकारी संदीप सिंह धालीवाल यांचे नाव  देण्यात आलं आहे.


🔺एका वर्षापूर्वी ह्यूस्टन शहरामध्ये आपले कर्तव्य बजावत असतानाच धालीवाल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केला होता. या हल्ल्यात जखमी झालेले धालीवाल हे उपचारादरम्यान मरण पावले. त्यांच्या सन्मानार्थ टेक्सासमधील पोस्ट ऑफिसचे नाव बदलण्यात आलं आहे.


🔺तसेच टेक्सासमधील ह्यूस्टन येथील 315 एडिक्स होवेल रोडवरील पोस्ट ऑफिसचे नाव डेप्युटी संदीप सिंह धालीवाल पोस्ट ऑफिस बिल्डिंग असं करण्याबद्दलचा कायदा संमत करण्यात आला आहे.

लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप टेन खासदारांच्या यादीत राहुल गांधी



लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप १० खासदारांमध्ये राहुल गांधी यांचा समावेश झाला आहे. 


GovernEye या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक मदत केलेल्या १० खासदारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राहुल गांधी यांचं नाव आहे. नेल्लोरचे खासदार अडाला प्रभाकर रेड्डी, वायनाडचे खासदार राहुल गांधी, भाजपाचे खासदार अनिल फिरोजिया यांचाही या यादीत समावेश आहे.


१ ऑक्टोबरला GovernEye या संस्थेने त्यांचं सर्वेक्षण सुरु केलं होतं. त्यामध्ये एकूण २५ खासदारांची निवड करण्यात आली होती. त्यातून एकूण १० खासदारांची यादी निश्चित करण्यात आली. या यादीत राहुल गांधींच्या नावाचीही समावेश आहे.


प्रत्यक्ष मतदारसंघात घेण्यात आलेल्या नागरिकांच्या मुलाखती आणि अभिप्राय यातून सर्वाधिक मदत केलेल्या २५ खासदारांची नावं ठरवण्यात आली. त्यातून १० नावांची यादी तयार करण्यात आली असंही या संस्थेने म्हटलं आहे.


कोण आहेत टॉप १० खासदार


अनिल फिरोजिया – भाजपा

अडाला प्रभाकर रेड्डी-वायएसआरसीपी

राहुल गांधी-काँग्रेस

महुआ मोइत्रा-तृणणूल काँग्रेस

एल.एस. तेजस्वी सूर्या-भाजपा

हेमंत तुकाराम गोडसे – शिवसेना

सुखबीर सिंग बाद-एसएडी

शंकर लालवानी -भाजपा

नितीन गडकरी-भाजपा

डॉ. सुमाती थमीझाची-डीएमके

प्रौढ स्त्रीला इच्छेनुसार लग्नाचा आणि धर्मांतराचा हक्क.


🔶परौढ स्त्री आपल्या इच्छेनुसार लग्न करण्यास आणि इतर कुठलाही धर्म स्विकारण्यास मुक्त असून तिच्या या निर्णयामध्ये कोणतंही कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही, असा महत्वूपर्ण निर्णय कोलकाता हायकोर्टानं दिला आहे.


🔶नया. संजीब बॅनर्जी आणि न्या. अरिजीत बॅनर्जी  यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे.


🔶दशात सध्या लव्ह जिहाद या संकल्पनेची चर्चा असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी भाजपाशासित राज्यांनी यासंदर्भात कायदे केले आहेत. लग्नासाठी जबरदस्तीनं धर्मांतर केल्यास कडक शिक्षेची तरतूद या कायद्यांमध्ये करण्यात आली आहे.

भारतात महामार्गांचा हरित विकास.


🔶 जागतिक बँकेची 500 दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पाला मान्यता

भारत सरकार आणि जागतिक बँक यांनी राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये सुरक्षित आणि हरित राष्ट्रीय महामार्ग मार्गिका तयार करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर एवढा अंदाजित खर्च असलेल्या प्रकल्पावर स्वाक्षरी केली आहे.


🔶भारत सरकारच्या वतीने डॉ. महापात्रा आणि जागतिक बँकेच्या वतीने कार्यवाहक संचालक सुशिला गुल्याणी यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.


🛑 ठळक बाबी....


🔶या प्रकल्पामुळे सुरक्षा आणि हरित तंत्रज्ञानातली रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची क्षमता वृद्धिंगत होणार.

हरित राष्ट्रीय महामार्ग मार्गिका प्रकल्प स्थानिक आणि किरकोळ साहित्य, औद्योगिक उप-उत्पादने आणि इतर जैवविज्ञान उपायांसाठी सुरक्षित आणि हरित तंत्रज्ञानाचा आरखडा एकत्रित करून रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय विविध भौगोलिक क्षेत्रातल्या एकूण 783 किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्यासाठी मदत करणार आहे.हा प्रकल्प महामार्गांच्या बांधकाम आणि देखरेख क्षेत्रात हरितगृह वायु (GHG) उत्सर्जन कमी करण्यात मदत करणार.


🔴 जागतिक बँक (WB) विषयी....


🔶जागतिक बँक (WB) ही भांडवल पुरविण्यासाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association -IDA), अश्या दोन संस्थांचा समावेश आहे.जागतिक बँक हा संयुक्त राष्ट्रसंघ प्रणालीचा एक भाग आहे.


🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झालेल्या ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.संयुक्त राज्ये अमेरिका या देशाची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे.

२३ डिसेंबर २०२०

महाराष्ट्रातील अभयारण्ये



नरनाळा – अकोला

टिपेश्वर -यवतमाळ

येडशी रामलिंग – उस्मानाबाद

अनेर – धुळे, नंदुरबार

अंधेरी – चंद्रपूर


औट्रमघाट – जळगांव

कर्नाळा – रायगड

कळसूबाई – अहमदनगर

काटेपूर्णा – अकोला

किनवट – नांदेड,यवतमाळ


कोयना – सातारा

कोळकाज – अमरावती

गौताळा औट्रमघाट – औरंगाबाद, जळगांव

चांदोली – सांगली, कोल्हापूर

चपराला – गडचिरोली


जायकवाडी – औरंगाबाद

ढाकणा कोळकाज – अमरावती

ताडोबा – चंद्रपूर

तानसा – ठाणे

देऊळगांव रेहेकुरी – अहमदनगर


नवेगांव – भंडारा

नागझिरा – भंडारा

नांदूर मध्यमेश्वर -नाशिक

नानज – सोलापूर

पेंच – नागपूर


पैनगंगा – यवतमाळ, नांदेड

फणसाड – रायगड

बोर – वर्धा

बोरीवली(संजय गांधी) – मुंबई

भिमाशंकर – पुणे, ठाणे

रल्वे झोनचे मुख्यालय



1. दक्षिण रेल्वे - चेन्नई


2. दक्षिणपूर्व रेल्वे - कोलकाता


3. दक्षिण मध्य - सिकंदराबाद


S. दक्षिणपूर्व मध्य - बिलासपूर


5. दक्षिण पश्चिम रेल्वे - हुबळी


6. पूर्व रेल्वे  - कोलकाता


7. पूर्व मध्य - हाजीपूर


8. पूर्व किनारा - भुवनेश्वर


9. पश्चिम रेल्वे  - मुंबई


१०. मध्य रेल्वे  - मुंबई


11. उत्तर रेल्वे  - दिल्ली


१२. उत्तर मध्य रेल्वे - अलाहाबाद


13. उत्तर पश्चिम - जयपूर


14. पश्चिम मध्य रेल्वे - जबलपूर


15. ईशान्य रेल्वे - गोरखपूर


16. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे - मालीगाव (गुवाहाटी)


17. कोलकाता मेट्रो - कोलकाता


18. दक्षिण कोस्ट रेल्वे - विशाखापट्टणम (नवीन 27 जुलै 2019)


राष्ट्रीय राजमार्गों (National Highways)


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1 (km. 456) – दिल्ली से अमृतसर तथा भारत-पाकिस्तान सीमा तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1A (km. 663) – जलंधर से उरी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1B (km. 274) – बटोटे से खानाबल तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1C (km. 8) – डोमेल से कटरा तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1D (km. 422) – श्रीनगर से कारगिल से लेह तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 2 (km. 1,465) – दिल्ली से कोलकाता तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 2A (km. 25) – सिकन्दरा से भोगनीपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 2B (km. 52) – बर्धमान से बोलपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 3 (km. 1,161) – आगरा से मुम्बई तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 4 (km. 1,235) – थाणे के पास राष्ट्रीय राजमार्ग 3 से चेन्नई तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 4A (km. 153) – बेलगाम से पणजी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 4B (km. 27) – नवाशेवा से पाल्सपे तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 5 (km. 1,533) – राष्ट्रीय राजमार्ग 6 से चेन्नई तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 5A (km. 77) – राष्ट्रीय राजमार्ग 5 के पास से पारादीप बंदरगाह तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 6 (km. 1,949) – हजीरा से कोलकाता तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 7 (km. 2,369) – वाराणसी से कन्याकुमारी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग NH) 7A (km. 51) – लयमकोट्टई से तूतीकोरन बंदरगाह तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8 (km. 1,428) – दिल्ली से मुंबई तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8A (km. 473) – अहमदाबाद से मांडवी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8B (km. 206) – बामनबोर से पोरबंदर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8C (km. 46) – चिलोड़ा से सरखेज तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8D (km. 127) – जेतपुर से सोमनाथ तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8E (km. 220) – सोमनाथ से भावनगर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) NE 1 (km. 93) – अहमदाबाद से वडोडरा तक


🚧 एक्सप्रेस वेराष्ट्रीय राजमार्ग (NH) 9 (km. 841) – मुणे से मछलीपट्टनम तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 10 (km. 403) – दिल्ली से फज़िल्का से भारत पाकिस्तान सीमा तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 11 (km. 582) – आगरा से बीकानेर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 11A (km. 145) – मनोहरपुर से कोथम तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 11B (km. 180) – लालसोट से धौलपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 12 (km. 890) – जबलपुर से जयपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 12A (km. 333) – जबलपुर से झाँसी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 13 (km. 691) – शोलापुर से मंगलौर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 14 (km. 450) – बीवार से राधापुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 15 (km. 1,526) – पठानकोट से समाखियाली तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 16 (km. 460) – निजामाबाद से जगदलपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 17 (km. 1,269) – पानवेल से इदपल्ली तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 17A (km. 19) – राष्ट्रीय राजमार्ग 7 के पास कोर्टलम से मढ़गाव तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 17B (km. 40) – पोंडा से वास्को तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 18 (km. 369) – राष्ट्रीय राजमार्ग 7 के पास कुरनूल से राष्ट्रीय राजमार्ग 4 के पास चित्तूर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 18A (km. 50) – तिरुपति से पुथलपट्टू तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 19 (km. 240) – गाजीपुर से पटना तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 20 (km. 220) – पठानकोट से मंडी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 21 (km. 323) – चंड़ीगढ़ के पास राष्ट्रीय राजमार्ग 22 से मनाली तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 21A (km. 65) – पिंजौर से स्वारघाट तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 22 (km. 459) – अंबाला से भारत चीन सीमा के पास शिपकिला तकराष्ट्रीय राजमार्ग (NH) 23 (km. 459) – चस से राष्ट्रीय राजमार्ग 42 के संगम तक


https://telegram.me/sailakshya

🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 24 (km. 438) – दिल्ली से लखनऊ तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 24A (km. 17) – बख्शी का तालाब से चेन्हट (राष्ट्रीय राजमार्ग 28) तकराष्ट्रीय राजमार्ग (NH) 25 (km. 352) – लखनऊ से शिवपुरी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 25A (km. 31) – राष्ट्रीय राजमार्ग 25 से बख्शी का तालाब तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 26 (km. 396) – झाँसी से लखनादौन तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 27 (km. 93) – इलाहाबाद से मंगावन तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 28 (km. 570) – बरौनी के पास राष्ट्रीय राजमार्ग 31 से लखनऊ तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 28A (km. 68) – पिपरा के पास राष्ट्रीय राजमार्ग 28 से भारत नेपाल सीमा तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 28B (km. 121) – छपवा से छपरा से राष्ट्रीय राजमार्ग 28 ए के पास बाघा तकराष्ट्रीय राजमार्ग (NH) 28C (km. 184) – बारबंकी से नेपाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा " लीजन ऑफ मेरिट " पुरस्कार जाहीर



◾️ पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने हा पुरस्कार भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी स्वीकारला


◾️ लीजन ऑफ मेरिट पुरस्कार अमेरिकेतील प्रतिष्ठीत पुरस्कार समजला जातो . अतुलनीय आणि असामान्य कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो


◾️ हा पुरस्कार इतर देशांच्या प्रमुखांसह अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना प्रदान केला जातो


🤝 पतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत झाले . या आधारेच ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला


◾️ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन व जपानचे पुर्व पंतप्रधान शिंझो आबे यांना सुध्दा " लीजन ऑफ मेरिट " जाहिर


✅ पतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार


🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद 

🔰 दश : सौदी अरेबिया


🏆 सटेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान 

🔰 दश : अफगाणिस्तान 


🏆 गरँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार 

🔰 दश : पॅलेस्टाईन


🏆 ऑर्डर ऑफ झायेद 

🔰 दश : संयुक्त अरब अमिरात 


🏆 सियोल शांती पुरस्कार 

🔰 दश : दक्षिण कोरिया


🏆 य एन चँपियन्स ऑफ द अर्थ 

🔰 सस्था : संयुक्त राष्ट्र 


🏆 गलोबल गोलकीपर पुरस्कार 

🔰 सस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन


🏆 किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां

🔰 दश : बहरीन


🏆 निशान इज्जुद्दीन पुरस्कार

🔰 दश : मालदीव


🏆 ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू 

🔰 दश : रशिया


🏆 लीजन ऑफ मेरिट

🔰 दश : अमेरिका .

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मराठा समाजाला EWS चा लाभ, शिक्षण-नोकरीत फायदा



एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश, व सेवाभरतीसाठी देणार


आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे.


त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाविषयी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना दिलासा



 ✍🏻✍🏻✍🏻_ मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेता येणार आहे. एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ देत शैक्षणिक प्रवेश आणि सेवाभरतीसाठी देणार, असं शासनाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे.


♦️_ मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्याने आरक्षणाविषयी पेच निर्माण झाला होता. त्यातच मराठ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं आरक्षण देऊ नये, यामुळे कोर्टातील मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर परिणाम होईल, अशी भूमिका काही मराठा संघटनांकडूनच मांडण्यात येत होती. अशातच सरकारने घेतलेल्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आज घेतले अन्य 7 मोठे निर्णय


♦️1. गृह/राज्य उत्पादन शुल्क विभाग


कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन काळात राज्यातील परवानाधारक (अनुज्ञप्ती) मद्यविक्रीची दुकाने बंद होती. या बंद असलेल्या दुकानांचे परवाना (अनुज्ञप्ती )शुल्कात सूट देण्याची मागणी होती. त्यानुसार या परवानाधारक मद्यविक्रेत्यांना हे शुल्क भरण्यास सूट देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता


♦️2. अन्न, पुरवठा व ग्रा.संरक्षण विभाग


लक्ष्यनिर्थारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा तसेच यंत्रणेचे बळकटीकरण करुन अन्नधान्याची वाहतूक शिधावाटप दुकानांपर्यंत थेट करण्यासाठी धोरण निश्चित करण्यास मान्यता.


♦️3. अन्न, पुरवठा व ग्रा.संरक्षण विभाग


पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ (Fortified Rice) वितरणाची केंद्र सहाय्यित योजना संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मंजुरी देण्यात आली.


कुपोषणाचे (एनिमिया) प्रमाण कमी करण्यासाठीची ही योजना राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत राबविण्यात येणार.


♦️4. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग


राज्यातील 53 शासकीय तंत्र माध्यमिक शाळा/केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालयातील 2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचे (HSC Vocational) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेतंर्गत व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये रुपांतर करण्यास मान्यता .


♦️5. पशुसंवर्धन, दुग्ध विकास विभाग


‌राष्ट्रीय सहकार विकास निगम पुरस्कृत योजनेतील कुक्कुट पालन सहकारी संस्थांची थकबाकी प्रथम एक मुस्त करार (वन टाईम सेटलमेंट) पध्दतीने भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता.


♦️6. शालेय शिक्षण विभाग


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करणार


♦️7. सार्वजनिक बांधकाम विभाग


महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करणार

Online Test Series

सह्यादीतील घाट



उत्तर दक्षिण घाट


सह्याद्री पर्वतातले महाराष्ट्र राज्याअंतर्गत येणारे मोटारीने वाहतूक करता येण्यासारखे घाट


●सह्याद्रीतील प्रमुख घाट


□ घाट जोडलेली शहरे


•आंबाघाट  रत्‍नागिरी-कोल्हापूर

•आंबेनळी घाट  महाबळेश्वर-पोलादपूर

•आंबोली-रामघाट सावंतवाडी– कोल्हापूर

•कुंभार्ली घाट चिपळूण-कराड

•खंबाटकी-खंडाळा  पुणे-सातारा

•चंदनापुरी घाट  नाशिक-पुणे

•ताम्हिणी घाट  माणगाव (कोकण)-पुणे

•दिवा घाट  पुणे-सासवड

•थळघाट-कसार्‍याचा घाट  नाशिक-मुंबई

               (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३)

०पसरणी घाट वाई-महाबळेश्वर

०पारघाट  सातारा-रत्नागिरी

०फोंडाघाट कोल्हापूर-गोवा

०बोरघाट-खंडाळ्याचा घाट पुणे-मुंबई 

             (राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक ४)

०माळशेज घाट आळेफाटा-कल्याण

०रणतोंडी घाट  महाड-महाबळेश्वर

०वरंधा घाट   भोर-महाड




            महाराष्ट्राचा भूगोल 


महत्त्वाचे घाट...               स्थान


 उत्तरेकडून दक्षिणेकडे


● थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक


○ माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर


●बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे


○वरंधा घाट=भोर - महाड


● खंबाटकी घाट=पुणे - सातारा


○ पसरणी घाट= वाई - महाबळेश्वर


● आंबेनळी घाट =महाबळेश्वर - महाड


○ कुंभार्ली घाट =कराड - चिपळूण


● आंबा घाट = कोल्हापूर - रत्नागिरी


○ फोंडा घाट= कोल्हापूर - पणजी


●हनुमंते घाट = कोल्हापूर - कुडाळ


○ अंबोली घाट= बेळगाव - सावंतवाड

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय



अलाहाबाद बैंक - कोलकाता


• बैंक ऑफ इंडिया - मुंबई


• बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे


• केनरा बैंक - बैंगलोर


• सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई


• कॉरपोरेशन बैंक - मंगलौर


• देना बैंक - मुंबई


• इंडियन बैंक - चेन्नई


• इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई


• ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली


• पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली


• पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली


• सिंडिकेट बैंक - मणिपाल


• यूको बैंक - कोलकाता


• यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई


• यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता


• विजया बैंक - बैंगलोर


• आंध्रा बैंक - हैदराबाद


• बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न


(1) 1 ते 100 या संख्यांमध्ये एक अंकी संख्या 

      एकूण किती आहेत ?


--->  9


(2) 1 ते 100 या संख्यांमध्ये दोन अंकी संख्या 

       एकूण किती आहेत ?


--->  90


(3) 1 ते 100 या संख्यांमध्ये तीन अंकी संख्या 

        एकूण किती आहेत  ?


---> 1


(4) 1  ते 100 या संख्यांमध्ये 11 वेळा येणारा 

      अंक कोणता  ?


--->  0


(5)  1 ते 100 या संख्यांमध्ये 21 वेळा येणारा 

      अंक कोणता  ?


--->  1


(6)  1 ते 100 या संख्यांमध्ये 8 हा अंक किती 

      वेळा येतो  ?


--->  20


(7) 1 ते 100 या संख्यांमध्ये एककस्थानी 7 

    हा अंक असलेल्या एकूण संख्या किती  ?


---> 10


(8) 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 ते 9  हे अंक 

    एकूण किती वेळा येतात  ?


---> 192


(9) 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 हा अंक 

    एकूण किती वेळा येतो ?


---> 10


(10) 10 ते 99 या दोन अंकी संख्यांपैकी सम आणि  विषम 

    एकूण संख्या किती ?


---> 45


(11)  1 ते 100 पर्यंत च्या संख्यांमध्ये सम आणि  विषम 

    एकूण संख्या किती ?


---> 50

आज राष्ट्रीय किसान दिन- 23 Dec 2020



🔸जगभरात कृषि प्रधान देश अशी ओळख असलेल्या भारतातील शेतकऱ्याची जगातील कृषीशी निगडीत असलेल्या क्षेत्रातात प्रगती की अधोगती सुरू आहे. 


🔸शेती उद्योगाला गती देण्यासाठी शेतकऱ्यासाठी कृषि व्याख्याने, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार, कृषि प्रदर्शन, मेळावे असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे. 


🔸दश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा राष्ट्राच्या उत्पन्नात शेतीचा वाटा हा पन्नास टक्यांच्या आसपास होता. तो आज २२ ते २५ टक्याच्या आसपास आला आहे. 


🔸आज समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करते. मात्र देशाचा व जगाचा पोशिंदा अशी मोठी बिरुदावली असलेल्या शेतकरी व शेतीच्या प्रगतीसाठी, शेतीमालच्या दरवाढीसाठी, शेतकऱ्याची आर्थिक, सामाजिक स्थिति सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होतात का हाही संशोधनाचा विषय आहे.

गरजू देशांना ‘युनिसेफ’ पुरवणार लस.


💉युनिसेफने पुढाकार घेतला असून जगातील गरजू देशांना महिन्याला 850 टन करोना प्रतिबंधक लसीचे डोस पोहोचवणार आहे. या कामात कोणत्याही प्रकारचा अभाव ठेवला जाणार नाही, तसेच प्राधान्याने हे काम केले

जाईल.


💉तर करोना प्रतिबंधक लस विविध देशांमध्ये पोहोचवण्यासाठी व्यावसायिक विमानांचाच वापर करण्यात येईल. जर गरज पडलीच तर चार्टर्ड विमानही वापरली जातील.


💉या जीवघेण्या आजारावर लस विकसित करणाऱ्या देशांकडून गरीब देशांमध्ये 70 हजार फ्रीजची खरेदी करुन ते पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत बसवले जातील.


💉तर या आधुनिक फ्रीजच्या माध्यमातून करोना महामारीच्या लसीच्या उपलब्धतेचा परीघ वाढवण्यात येईल. ‘कोवैक्स’ लसीला सुरक्षित ठेवण्यासाठी 2 ते 8 डिग्री तापमानाची गरज असते. या कामात हे फ्रीज महत्वाची भूमिका बजावतील.तसेच या फ्रीजची सर्वात मोठी विशेष बाब म्हणजे हे फ्रीज सौर ऊर्जेवर चालतील.

अनेक देशांकडून ब्रिटिश प्रवाशांवर निर्बंध.


🧧ब्रिटनमध्ये वेगाने पसरणारा करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली असून फ्रान्सने त्या देशासमवेतच्या सीमा बंद केल्या आहेत.


🧧जर्मनी, बल्गेरिया, आयरिश प्रजासत्ताक, तुर्कस्तान व कॅनडा यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारताकडूनही विमानांवर बंदी लागू करण्यात आली आहे.


🧧बरिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर ज्या देशांनी निर्बंध लादले त्यात हाँगकाँग, इस्रायल, इराण, क्रोएशिया, अर्जेटिना, चिली, मोरोक्को व कुवेत यांचा समावेश आहे.


🧧करोना विषाणूचा हा नवीन प्रकार सत्तर टक्के संक्रमणशील व संसर्गजन्य असून आरोग्य तज्ज्ञांनी असे म्हटले आहे, की हा विषाणू घातक नाही, तो लशींना दाद देत नाही हेही खरे नाही.


🧧UK अर्थात युनायटेड किंग्डममधून भारतात येणाऱ्या विमानांवर 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे.

देशात 12,852 बिबटे आहेत: ‘भारतात बिबट्यांची स्थिती, 2018’ अहवाल..


🐆कद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत बिबट्यांच्या स्थिती सांगणारा ‘भारतात बिबट्यांची स्थिती, 2018’ अहवाल प्रकाशित करण्यात आला.


🌵ठळक माहिती.....


🐆वर्ष 2018 मध्ये, भारतात आता 12,852 बिबटे असून 2014च्या सर्वेक्षणात  ही संख्या 7910 होती. अर्थात बिबट्यांच्या संख्येत 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे.


🐆मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे 3421, 1783 आणि 1690 बिबटे असल्याचा अंदाज आहे.पूर्व घाटात सर्वाधिक म्हणजेच 8.71 बिबटे तर पश्चिम घाटात 3387 बिबटे आढळून आली आहेत.


🐆बिबट्यांच्या 51,337 छायाचित्रात एकूण 5,240 प्रौढ बिबटे आढळले आहेत.

संरक्षित आणि बहुउपयोगी जंगल परिसरात वाघ आणि बिबटे आढळतात. बिबट्यांची वाढती संख्या म्हणजे पर्यावरण जतनासाठीच्या प्रयत्नांचे आणि वन्य जीवन आणि जैव विविधता बहरत असल्याचे द्योतक आहे.

वाचा :- महाराष्ट्रातील महामंडळे



१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२


२) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६


३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२


४) महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२


५) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८


६) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२


७) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५


८) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१


९) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित) - १९६३


१०) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५


११) मराठवाडा विकास महामंडळ - १९६७


१२) कोकण विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०


१३) विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०


१४) महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६


१५) विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७


१६) कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७


१७) तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७


१८) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८


१९) महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८


२०) म्हाडा - १९७६

सवच्छ सर्वेक्षण २०२०


🎯 कद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे . स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे


१) इंदूर - मध्यप्रदेश 

२) सुरत - गुजरात 

३) नवी मुंबई - महाराष्ट्र 

४) अंबिकापूर - छत्तीसगड 

५) म्हैसूर - कर्नाटक 

६) विजयवाडा - आंध्रप्रदेश 

७) अहमदाबाद - गुजरात 

८) नवी दिली शहर - दिल्ली 

९) चंद्रपूर - महाराष्ट्र

१०) खारगोन - मध्यप्रदेश 

१८) धुळे - महाराष्ट्र

२५) नाशिक - महाराष्ट्र


 मध्यप्रदेशातील इंदूर शहराला सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर


 प्राचीन पवित्र नगरी वाराणसीला गंगा नदीच्या किनाऱ्यावरील सर्वात स्वच्छ शहराचा सन्मान


 कराड नगरपरिषदेनं एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे


 सासवड दुसऱ्या तर लोणावळा तिसऱ्या क्रमांकावर आहे .

नोबेल पुरस्कार २०२० विजेते


🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)

👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)

👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)


🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)

👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)

🙎‍♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)


🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)

🙎‍♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)


🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )


🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२० 

🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम


🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)

👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

UNDP मानव विकास अहवाल 2020.


🎗सयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने ‘मानव विकास निर्देशांक 

2020’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशातले आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या जीवनमानाचे मोजमाप करण्यासाठी मानव विकास निर्देशांकाचा वापर केला जातो.


🎯ठळक बाबी....


🎗निर्देशांकामध्ये नॉर्वे देश प्रथम स्थानी असून त्याच्यापाठोपाठ आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि आईसलँड यांचा क्रमांक लागतो.यंदा भारताच्या स्थानामध्ये पुन्हा एकदा घसरण होऊन तो 189 देशांच्या यादीमध्ये 131 व्या क्रमांकावर आहे.भारताचे गेल्या वर्षीचे मानव विकास निर्देशांकातले मूल्य 0.645 एवढे आहे. त्यामुळे भारताला मध्यम मानव विकासाच्या श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.


🎗गल्या वर्षी भारतीयांचे जीवनमान हे 69.7 वर्षे एवढे होते, जेव्हा की ते बांगलादेशात 72.5 वर्षे आणि पाकिस्तानात 67.3 वर्षे एवढे आहे.मध्यम मानवी विकासाच्या क्रमवारीमध्ये भारत व भुटान 129 व्या, बांगलादेश 133 व्या आणि पाकिस्तान 154 व्या स्थानी आहे.


🎗दशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये घसरण होऊन ते वर्ष 2018 मधल्या 6829 डॉलरवरून 6681 डॉलरवर आले आहे.

कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत भारत देशाने अधिक प्रगती केली आहे.

आर्थिक सुरक्षितता आणि जमिनीच्या मालकीमुळे महिलांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लिंगभेदावरून होणारे छळ देखील कमी झाले आहे.


🎗मानव विकास निर्देशांक हा आकडा जगातल्या देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.


🎗1990 साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी मानव विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.

२२ डिसेंबर २०२०

पाच राज्यांना १६ हजार कोटींच्या अर्थउभारणीस केंद्राची परवानगी.


💰नवी दिल्ली : तमिळनाडू व तेलंगणसह पाच राज्यांना उद्योगस्नेही सुधारणा पूर्ण केल्यानंतर १६,७२८ कोटी रुपये उसने घेण्यास केंद्रीय अर्थमंत्रालयाने परवानगी दिली आहे. आंध्र प्रद्रेश, कर्नाटक, मध्य प्रद्रेश ही यातील इतर तीन राज्ये आहेत.


💰रकारने मे महिन्यात असे ठरवले होते, की त्या राज्यांनी उद्योगस्नेही सुधारणा केल्यास अतिरिक्त उसनवारीला परवानगी देण्यात येईल. यात जिल्हा पातळीवरील उद्योग सुधारणा आराखडय़ाची पूर्तता ही प्रमुख अट होती. केंद्राच्या विशिष्ट कायद्यांनुसार या संबंधित उद्योगांना परवाने देणे हा या सुधारणांचा एक भाग होता. पाच राज्यांनी उद्योगांना अनुकूल स्थिती निर्माण करण्यात बरीच प्रगती केली असून त्यांना खुल्या बाजारातून १६,७२८ कोटी रुपयांची उसनवारी करण्यास परवानगी देण्यात येत आहे, असे अर्थमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.


💰कोविड १९ साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत केंद्र सरकारने राज्यांना उद्योगस्नेही उपाययोजना करण्याच्या अटींवर उसनवारीची परवानगी देताना  राज्यांना खुल्या बाजारपेठेतून उसनवारीची मर्यादा त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या २ टक्के इतक्या प्रमाणात वाढवली होती. आर्थिक उत्तरदायित्व व अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यानुसार ही मर्यादा तीन टक्के होती. 


💰उसनवारीची मर्यादा वाढवली असली तरी सरकारने त्यासाठी चार प्रमुख सुधारणांची अट घातली होती, त्यात ‘एक देश एक शिधापत्रिका’, ‘उद्योगस्नेही उपाय’, ‘शहरी स्थानिक स्वराज्य संस्था सुधारणा’ व ‘ऊर्जा क्षेत्रात सुधारणा’ यांचा समावेश होता. या सुधारणाराबवण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत मुदत दिली होती.

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पर्मनन्ट कामगारांना कंपन्या कान्ट्रॅक्टवर आणू शकत नाहीत; केंद्र सरकारचा इशारा.


👉कद्र सरकारने करोनाच्या कालावधीमध्ये कंपन्यांना दिलासा देण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल केले होते. या बदलांच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्यांनी मनमानी कारभार सुरु केला. या कायद्याचा संदर्भ देत कायमस्वरुपी म्हणजेच पर्मनन्ट नोकरदारांना करारावर म्हणजेच कान्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये बदलण्यास कंपन्यांनी सुरुवा केली. मात्र आता अशा कंपन्यांना थेट सरकारनेच इशारा दिला आहे.


👉कोणत्याही कंपनीला नवीन कर्मचारी कायद्यानुसार कोणतीही कंपनी कोणत्याही पर्मनन्ट कर्मचाऱ्याला करारानुसार म्हणजेच कॉन्ट्रॅक्टवर ट्रान्सफर करु शकत नाही असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबरच नोकरकपात करताना नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांची मदत करण्यासाठी कंपन्या विशेष आर्थिक निधी म्हणून सीएसआर फंडचा वापर करु शकतात, असंही केंद्राने सांगितलं आहे.


👉नवीन कर्मचारी कायद्यासंदर्भात लवकरच कामगार आणि रोजगार मंत्रालयची बैठकही होणार असून यामध्ये नवीन कायद्यासंदर्भातील नियम अधिक स्पष्ट केले जाण्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे.


👉सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारने सेवा नियमांमध्ये लवकरच मोठे बदल करण्याची शक्यता आहे. तसेच कंपन्यांना कायमस्वरुपी नोकरदारवर्गाला करारावर आणता येणार नाही. 


👉कामगार आणि रोजगार मंत्रालय नवे नियमांनुसार कर्मचारी कपात झाल्यानंतर विशेष निधीसंदर्भातही नियम बनवणार आहे. या निधीचा वापर कर्मचाऱ्यांना कुशल बनवण्यासाठी आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी करण्यात येणार आहे. 


👉कामगार आणि रोजगार मंत्रालयाला यासंदर्भात कंपन्यांनाही सल्ले दिले आहेत. त्याचबरोबरच कामगार संघटना आणि कंपन्यांचे एकूण मुल्य किती आहे यासंदर्भातील नियमांमध्ये अधिक स्पष्टता आणावी अशी मागणीही करण्यात आलीय.

मल्लखांब खेळाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता.



🏉केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी चार स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली. त्यात मल्लखांबसहित, गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या देशी खेळांचा समावेश आहे.


🏉तर हरयाणा येथे पुढील वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत या चार खेळांचाही आता समावेश  असेल.


🏉तसेच कलरीपायूट्टू हा खेळ प्रामुख्याने केरळमध्ये खेळला जात असून मल्लखांब हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसहित संपूर्ण भारतात खेळला जातो.

 

🏉गटका पंजाबमध्ये खेळला जात असून थांग-ता हा मणिपूर मार्शल-आर्टवर आधारित आहे.

पश्चिम बंगालमधील पहिले तेल, वायू क्षेत्र देशाला समर्पित.



💭पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्य़ातील तेल व वायू क्षेत्र केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी देशाला समर्पित केले आहे. त्यामुळे तेल व वायू उत्पादन क्षेत्रात पश्चिम बंगालला प्रथमच स्थान मिळाले आहे.


💭तर कोलकात्यापासून 47 कि.मी अंतरावरील पेट्रोलियम साठय़ातून तेल निर्मिती सुरू करण्यात आली असून हे तेल हल्दीया येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडे शुध्दीकरणासाठी पाठवले जात आहे.


💭अशोकनगर तेल व वायू साठा क्षेत्रात प्रथमच तेल उत्पादन सुरू झाले असून हा तेल व वायू साठा 2018 मध्ये सापडला होता. अशोकनगर क्षेत्र हे महानदी-बंगाल-अंदमान खोऱ्यात असून ते व्यावसायिक पातळीवर योग्य आहे.

विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा : सिम्रनजीत, मनीषाचे सुवर्णयश.


🥊नवी दिल्ली:भारतीय बॉक्सिंगपटूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जर्मनीतील कलोन येथे झालेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदांसह एकूण नऊ पदकांची कमाई केली. अमित पंघालच्या सुवर्णपदकानंतर महिला बॉक्सिंगपटू सिम्रनजीत कौर (६० किलो) आणि मनीषा मौन (५७ किलो) यांनी शनिवारी रात्री सुवर्णयश संपादन केले.


🥊मनीषाने भारताच्याच साक्षी चौधरी हिचा ३-२ असा पराभव केला. साक्षीने पहिल्या फेरीत जोरदार ठोसे लगावत मनीषासमोर कडवे आव्हान उभे केले होते. पण पुढील दोन फेऱ्यांमध्ये मनीषाने सरशी साधत सुवर्णपदकाची कमाई केली. सिम्रनजीतने जर्मनीच्या माया क्लिएनहान्स हिच्यावर ४-१ अशी सरशी साधत सुवर्णपदकावर नाव कोरले. 


🥊भारताने नऊ पदके मिळवत या स्पर्धेत सर्वसाधारण दुसरे स्थान प्राप्त केले. शनिवारी पुरुषांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अमितने (५२ किलो) सुवर्णपदकाची कमाई केली होती.


🥊भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत ६७ दिवसांच्या युरोपमधील प्रशिक्षण शिबिराची यशस्वी सांगता केली.भारताच्या सतीश कुमारला (९१ किलो) जर्मनीच्या नेल्वी टियाफॅकविरुद्धच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...