नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
०३ डिसेंबर २०२०
३० नोव्हेंबर २०२०
भारतात विदेशी कोरोना लसीचं उत्पादन...
💫 भारतात सध्या ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीचं भारतात ट्रायल सुरू असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियामार्फत या लशीचं भारतात उत्पादन घेतलं जातं आहे.
✨ दरम्यान, आता भारतात आणखी एका विदेशी कोरोना लशीचं उत्पादन घेतलं जाणार आहे. रशियाच्या Sputnik V लशीचं भारतात उत्पादन घेतलं जाणार आहे.
👉 RDIF आणि हैदराबादमधील हेट्रो फार्मा कंपनीचा करार झाला असून हेट्रो कंपनी भारतात वर्षाला 100 दशलक्षपेक्षा अधिक डोस तयार करणार असल्याची माहिती रशियानं दिली.
📍 2021 पासून भारतात रशियन कोरोना लशीचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. डॉ. रेड्डीज कंपनीमार्फत या लशीचं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.
📌 दरम्यान, या लशीला11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली असून यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला आहे.
जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या GDP दरात 7.5 टक्क्यांची घट
🔰कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, 2020-21 या आर्थिक वर्षांच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) दरात 7.5 टक्क्यांची घट झाली.
🔰चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत GDP दरात 23.9 टक्क्यांची घट झाली होती. मागील तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात आकुंचन झाल्यानंतर लक्षणीय सुधारणा झाली आहे.
🔴सथूल देशांतर्गत उत्पादन (GDP) विषयी...
🔰उत्पादन, उत्पन्न आणि उत्पादन व्यय असे हे तीन प्रवाह राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहाची तीन स्वरूपे आहेत. यांपैकी कोणत्याही स्वरूपातले वर्ष किंवा इतर हव्या असलेल्या कालखंडातला एकूण प्रवाह म्हणजे त्या वर्षातले किंवा कालखंडातले ‘राष्ट्रीय उत्पन्न’ होय.
🔰एकूण राष्ट्रीय उत्पादन दोन घटकांचे बनलेले असते. त्यांपैकी पहिला व अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवाकर्मे, ज्याला ‘स्थूल देशांतर्गत उत्पादन’ (GDP) असे म्हणतात. ‘GDP’मधून भांडवली वस्तूंची झीज वजा केली म्हणजे ‘निव्वळ देशांतर्गत उत्पादन’ (NDP) मिळते. ‘एकूण राष्ट्रीय उत्पादन’चा दुसरा घटक म्हणजे देशातील रहिवाशांना त्यांच्या परदेशांतल्या मालमत्तेवर मिळणारे उत्पन्न वजा परदेशांतल्या रहिवाशांना देशातल्या त्यांच्या मालमत्तेवर मिळणारे उत्पन्न, ज्याला परदेशातून प्राप्त होणारे निव्वळ घटक उत्पन्न असे म्हणतात.
🔰राष्ट्रीय उत्पन्नाची जगातली पहिली परिगणना 1665 साली इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रज्ञ सर विल्यम पेटी यांनी केली.भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली परिगणना विख्यात नेते आणि अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नवरोजी यांनी 1876 साली 1867-68 या वर्षासाठी केली.
ओबीसींसाठी केंद्राचा निर्णय, सैनिक शाळांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर
🔶 दशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून (२०२१-२२) हे आरक्षण लागू होणार आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी सैनिक स्कूल सोसायटी देशभरातील ३३ निवासी शाळांचं कारभार पाहतं.
🔶यासंबंधीचा अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सैनिक शाळांमध्ये आता अनुसूचित जाती १५ टक्के, अनुसूचित जमाती सात टक्के, ओबीसी २७ टक्के, संरक्षण विभाग १३ टक्के आणि खुल्या प्रवर्गासाठी ३८ टक्के अशी विभागणी असणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. १३ ऑक्टोबर रोजीचं हे परिपत्रक देशभरातील सैनिक शाळांच्या प्राध्यापकांना पाठवण्यात आलं आहे.परिपत्रकातील माहितीनुसार, सैनिक शाळा ज्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात असते तेथील मुलांसाठी ६७ टक्के जागा राखीव असतात. उर्वरित ३३ टक्के जागा इतर राज्यांमधील मुलांसाठी असतात. A आणि B अशा पद्दतीनं या यादीची क्रमवारी केली जाते. आरक्षणाचा निर्णय दोन्ही याद्यांमध्ये लागू असणार आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी २०२१-२२ शैक्षणिक सत्रात सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा प्रस्ताव मान्य केला होता. टप्प्याटप्प्याने मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. मिझोराममधील सैनिक शाळेतील पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
२९ नोव्हेंबर २०२०
पृथ्वी संबंधीची सविस्तर माहिती
पृथ्वीचा जन्म - 46000 अंदाजित कोटी वर्षापूर्वी
पृथ्वीचा आकार - जिऑइड
पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर - 14,88,00,000 कि.मी.
पृथ्वीचे क्षेत्रफळ - 5101 कोटी चौ.कि.मी.
पृथ्वीचे पाण्याचे क्षेत्रफळ - 3613(71%) कोटी चौ.कि.मी.
पृथ्वीचे जमीन क्षेत्रफळ - 1484(29%) कोटी चौ.कि.मी.
पृथ्वीची त्रिज्या - 6371 कि.मी.
पृथ्वीचा ध्रुवीय व्यास - 12714 कि.मी.
पृथ्वीचा विषवृत्तीय व्यास - 12,758 कि.मी.
पृथ्वीच्या विषवृत्तीय परिघाची लांबी - 40,077 कि.मी.
पृथ्वीच्या ध्रुवीय परिघाची लांबी - 40,009 कि.मी.
पृथ्वीच्या परिघाचे मापन करण्याचा पहिला प्रयत्न एरॅटोस्थेनिसने केला.
🎯पृथ्वीला प्राप्त झालेल्या गती व त्याचे परिणाम :
पृथ्वी सूर्याभोवती तसेच स्वत:भोवती फिरते. यामुळे पृथ्वीला परिवलन आणि परीभ्रमण अशा दोन गती प्राप्त झालेल्या आहेत.
५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.
◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे.
◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.
◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे.
‼️ पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.
केशवानंद भारती खटला
संपुर्ण नक्की वाचा...
🔘 राज्यशास्त्र Imp घटक
🔸केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला.
🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते.
🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले.
🔸ससदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे?
🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले.
🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की *घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.*
🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले.
🔸या *खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन* केले गेले.
🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की
' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.
🔸ससदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.
🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं.
🔸या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं.
🔸कशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. *म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.*
आझाद हिंद सेना -
◾️ जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी 1942 साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली.
◾️ नताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
◾️ नताजींनी 1943 आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले.
◾️ आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
◾️ 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली.
◾️ आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले.
◾️ लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.
पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती
पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.
उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.
उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.
विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.
अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.
रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.
स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.
महणी व अर्थ
🔰 गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य - निरुपयोगी माणसावर केलेले उपकार अनाठायी जातात
🔰 गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता - मुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नाही
🔰 गाढवाला गुळाची चव काय - ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही, त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही
🔰 गाव करी ते राव न करी - श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावर जे करु शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या जोरावर करु शकतात
🔰 गाव तेथे उकीरडा - प्रत्येक समाजात काही वाईट माणसे असतातच
🔰 गरुची विद्या, गुरुलाच फळली - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य
🔰 गळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी - गरिबीमुळे आपण काही करु शकत नसलो तरी गोड बोलणे शक्य असल्यास गोड तरी बोलावे
🔰 गळाचा गणपती, गुळाचाच नैवेद्य - एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच अर्पण करणे
🔰 गोगलगाय आणि पोटात पाय - बाह्यरुप एक आणि कृती दुसरीच
🔰 गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे - कोणत्याही कामात ताळमेळ नसणे
🔰 गोरा गोमटा आणि कपाळ करंटा - फक्त दिखावट चांगली आणि प्रत्यक्षात काहीच नसणे
🔰 गोष्ट लहान, सांगणं महान - क्षुल्लक गोष्टीचा उदो उदो करणे
🔰 गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी - लांबलचक गोष्टी करत बसलो तर मूळ कामधंदा बाजूलाच राहतो व नुकसान होते
🔰 गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट - निर्लज्ज माणसाशी झगडल्यामुळे फायद्यापेक्षा हानीच अधिक होते
🔰 घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते - प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मानुसार वेगवेगळे सुखदुःखादि भोग प्राप्त होतात
🔰 घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी - कधी खूप लाड करावे, प्रेम करावे आणि कधी शिव्या द्याव्यात
🔰 घर चंद्रमौळी पण बायकोला साडीचोळी - स्वतःच्या घरची गरिबी असूनही बायकोसाठी खूप खर्च करणे
🔰 घर ना दार, चावडी बिऱ्हाड -
बायको पोरे नसणारा
भारतातली जागतिक वारसा स्थळे
🍀 आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत,
🍀 तयात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे,
🍀 7 नैसर्गिक ठिकाणे
🍀 एक मिश्रित ठिकाण आहे.
🎇 ♻️सांस्कृतिक♻️ 🎇
💐आग्रा किल्ला 🏰, आग्रा( उत्तरप्रदेश)
💐अजिंठा लेणी, महाराष्ट्र
💐 नालंदा विद्यापीठ 🏢 , बिहार
💐 बौद्ध स्मारक , सांची, मध्यप्रदेश (1989)
💐 चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
💐 छत्रपती शिवाजी टर्मिनस
🚂🚃🚃, मुंबई, महाराष्ट्र
💐 गोव्याचे चर्च 🏥आणि कॉन्व्हेंट
💐 एलिफंटा लेणी/ 🗿 घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
💐 वल्लोर/ 🗿वरूळ लेणी, महाराष्ट्र
💐 फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश
💐 चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू
💐 हंपीमधील मंदिरे, कर्नाटक
💐 महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू
💐 पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
💐राजस्थानामधील 🏔पर्वतीय किल्ले
💐 अहमदाबाद 🛣ह ऐतिहासिक शहर
💐 हुमायूनची कबर, दिल्ली
💐 खजुराहो, मध्यप्रदेश
💐महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
💐 भारतातली पर्वतीय रेल्वे🚂🚃 (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
💐 कुतुब मिनार🕌, दिल्ली
💐 राणी की वाव🏟, पटना, गुजरात
💐 लाल किल्ला 🏰🗼, दिल्ली
💐 दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश
💐 कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा
💐 ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश
💐 ले कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड
💐 जंतर मंतर, जयपूर
💐 मबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत
🎇♻️ नैसर्गिक ♻️🎇
💐 ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान 🦌🐕 , कुल्लू, हिमाचल प्रदेश
💐 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान🦏🦏, आसाम
💐 मानस राष्ट्रीय उद्यान 🐘 , आसाम
💐 केवलदेव राष्ट्रीय उद्यान 🦢🦌, राजस्थान
💐 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान 🐅🏝, पश्चिम बंगाल
💐 नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान🌻, उत्तराखंड
💐 पश्चिम घाट⛰⛰ (सह्याद्री पर्वतरांगा)
🎇♻️ मिश्र ♻️🎇
💐 खांगचेंडझोंगा 🐼 🐆राष्ट्रीय उद्यान, सिक्किम
“भारत हा गणराज्य किंवा प्रजासत्ताक ” (Republic) आहे याचा अर्थ.....
🔸गणराज्यात “राष्ट्रप्रमुख” हा लोंकामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जातो. तो वंशपरंपरागत नसतो.
🔸भारत हे गणराज्य आहे कारण, भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारे राष्ट्रपती (President) हे लोकांद्वारे ५ वर्षांच्या कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात.
🔸राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हाती असून राजा किंवा राणीसारख्या एका व्यक्तीच्या हाती नसते.
🔸गणराज्यात कोणताही अधिकार संपन्न वर्ग (priviledged class) नसतो आणि सर्व सार्वजनिक कार्यालये विना भेदभाव सर्वांना खुली असतात.
🔸 “भारत आणि अमेरिका” हे दोन Republic देशांची प्रमुख उदाहरणे आहेत.
🔸२६ जानेवारी १९५० ला भारत हा प्रजासत्ताक झाला.
🔸 महत्वाचे म्हणजे, भारताचे राष्ट्रपती आपल्या दस्तऐवजावर “PRESIDENT REPUBLIC OF INDIA” असेच लिहतात.
महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे
🔸परवरा नदी व मुला नदी - नेवासे,
अहमदनगर
🔸मळा व मुठा नदी - पुणे
🔸गोदावरी व प्राणहिता - सिंगेचा,
गडचिरोली
🔸तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव
तिर्थक्षेत्र, जळगाव
🔸कष्णा व वेष्णानदी - माहुली,
सातारा
🔸तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे
🔸कष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी,
सांगली
🔸कष्णा व कोयना - कराड, सातारा
🔸गोदावरी व प्रवरा - टोके,
अहमदनगर
🔸कष्णा व येरळ - ब्रम्हनाळ, सांगली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२८ नोव्हेंबर २०२०
वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या भारतीय इंजिनिअर्सना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातून मोठ्या ऑफर्स.
🔰भारतीय टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्स जे सध्याच्या करोनाच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. त्यांना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातील इतर कंपन्यांकडून कामाच्या अनेक ऑफर येत आहेत. कोविडच्या उद्रेकानंतर आता जगभरात कामाची ही नवी पद्धत रुजू पाहत आहे.
🔰इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, जगभरातील अनेक कंपन्या भारतातील हायप्रोफाईल टेक्निकल टॅलेंटच्या शोधात आहेत. करोनाचा काळ सुरु होण्यापूर्वी या प्रोफेशनल्सना जेवढी मागणी होती त्यापेक्षा दोन ते तीन टक्के जास्त मागणी सध्या या लोकांना मिळत आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं आहे.
🔰या हायप्रोफाईल टेकीजना अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मध्य आशियातील Instahyre, Interviewbit, Rocket, Techfynder, CIEL HR Services and Pesto Tech यांसारख्या कंपन्या कामावर रुजू करुन घेण्यास उत्सुक आहेत.
🔰इन्स्टाहायरचे सहसंस्थापक सरबोजित मलिक बिझनेस लाईनशी बोलताना म्हणाले, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत कंपन्या नवी भरती करण्यास उत्सुक नव्हत्या. त्यांचा व्यवसाय थंड पडला होता. मात्र, त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या काळात भरती प्रक्रियेत वाढ झाली आहे. इन्स्टाहायर सध्या ८,७०० कंपन्यांसोबत काम करत आहे. गेल्या वर्षी हा आकडा ५,३०० इतका होता. त्याचबरोबर कंपनीचा महसूलही तीन ते चार टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये बहुतकरुन त्यांचे क्लायन्ट्स हे अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील आहेत.
संविधान लोकांना समजले पाहिजे.
🔰अलीकडे आपण नो युवर कस्टमर (केवायसी) हा शब्द सातत्याने ऐकतो. याचा अर्थ ‘ग्राहकाला जाणून घ्या’ असा होतो. आता त्याचा अर्थ ‘नो युवर कॉन्स्टिटय़ुशन’ म्हणजे आपले संविधान समजून घ्या असा घेता येईल. देशातील नागरिकांना संविधानाची माहिती असली पाहिजे, त्याची जाण व्यापक झाली पाहिजे. त्यासाठी लोकांना संविधान समजावून सांगणेही गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८० व्या परिषदेत व्यक्त केले.
🔰नव्या पिढीला संविधानामध्ये नेमके काय आहे हे समजले पाहिजे, त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये सातत्याने जागरूकता मोहीम राबवली पाहिजे. संविधान लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, ते तरुण पिढीत अधिक लोकप्रिय केले पाहिजे, त्यासाठी अभिनव मोहीम राबवण्याचा सल्ला मोदींनी पीठासीन अधिकाऱ्यांना दिला.
🔰आपल्या संविधानामध्ये नागरिकांच्या कर्तव्याला महत्त्व दिले गेले आहे. महात्मा गांधीही त्याबद्दल आग्रही असत. नागरिकांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्य हे एकमेकांशी जोडलेले असतात. नागरिक आपले कर्तव्य पार पाडतात तेव्हा त्यांच्या हक्कांचेही रक्षण होते यावर गांधीजींचा विश्वास होता. नागरिकांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल अशी अपेक्षा संविधानातही व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वानी आपल्या संविधानाने दिलेल्या कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले. गेल्या पाच वर्षांपासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभरा साजरा केला जातो.
वरुणास्त्र’: भारताचा स्वदेशी टॉरपीडो
➡️भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांच्या हस्ते ‘वरुणास्त्र’ या स्वदेशी टॉरपीडोच्या पहिल्या निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन झाले. पाणबुडी किंवा जहाज नष्ट करण्यासाठी टॉरपीडो हे सर्वात अचूक शस्त्र आहे.
💎ठळक वैशिष्ट्ये ..
‘➡️वरुणास्त्र’ हा भारताचा पहिला पूर्ण स्वदेशी टॉरपीडो आहे.वरुणास्त्र 40 किलोमीटर अंतरापर्यंत कोणतीही पाणबुडी नष्ट करण्यास सक्षम आहे. ते ताशी 74 किलोमीटर वेगाने हल्ला करते.वरुणास्त्र टॉरपीडोचे वजन सुमारे दीड टन आहे. ते पाणबुडीभेदी टॉरपीडो असून यात 250 किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.
➡️खोल आणि उथळ पाण्यातल्या पाणबुड्यांनाही या टॉरपीडोने लक्ष्य करता येणार. त्यात जोडलेल्या ‘GPS’ यंत्रणेमुळे लक्ष्याचा अचूकपणे वेध घेणे या टॉरपीडोला सहज शक्य आहे.
इतर बाबी
➡️वरुणास्त्राने भारतीय युद्धनौका आणि सिंधू श्रेणीतली पाणबुडी सुसज्ज असणार.संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (DRDO) विशाखापट्टणम येथील ‘नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी’ने (NSTL) वरुणास्त्र विकसित केले आहे. तर ‘भारत डायनॉमिक्स लिमिटेड’ने (BDL) त्याचे उत्पादन सुरू केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट
१८९१ महू मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म (१४ एप्रिल)
१९०७ मँट्रीक परीक्षा पास
१९०७ रमाबाई वलंगकर सोबत मंगल परिणय
१९१० इन्टरमीडिएट परीक्षा पास
१९१२ BA परीक्षा पास
१९१३ उच्च शिक्षणाकरिता न्युयॉर्क ला रवाना
१९१५ अँन्शंट इंडियन काँमर्स या प्रबंधावर MA ची उपाधी
१९१६ Ph d पदवी बहाल
१९१८ सिडेनहँम काँलेज मध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती (११ नोव्हेंबर)
१९२० राजश्री शाहू यांच्या साहाय्याने 'मुकनायक'चा पहिला अंक (३१ जानेवारी)
१९२२ बॅरिस्टरची परीक्षा पास
१९२३ डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी बहाल
१९२४ बहिष्कृत हितकारणी सभा ची स्थापन मुंबई (२० जुलै)
१९२७ बहिष्कृत भारत पाक्षिकाचे प्रकाशन (३ एप्रिल)
१९२७ मुंबई विधीमंडळात सदस्य म्हणून नियुक्ती
१९२७ महाडचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर)
१९२८ समता पाक्षिकाचा आरंभ (२९ जून)
१९३० काळाराम मंदीर नाशिक सत्याग्रह प्रारंभ (३ मार्च)
१९३० लंडन येथे गोलमेज परिषदे साठी मुंबईहून रवाना (२ ऑक्टोबर)
१९३० जनता साप्ताहिकाचा आरंभ (२४ नोव्हेंबर)
१९३१ मनीभवण मुंबई येथे गांधी सोबत पहिली भेट (१४ ऑगस्ट)
१९३१ अल्पसंख्याकाच्या प्रश्नाबाबत गांधीजींच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध (८ ऑक्टोबर)
१९३१ गांधी-आंबेडकर-पंचम जाँर्ज यांची भेट (२६ नोव्हेंबर)
१९३२ पुणे करारावर स्वाक्षरी (२५ सप्टेंबर)
१९३५ मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती (२ जून)
१९३५"हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही" डाँ आंबेडकराची धर्मातराची घोषणा, येवला (१३ ऑक्टोबर)
१९३६ स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना (१५ ऑगस्ट)
१९३७ मुंबई असेंब्ली निवडणूक डाँ आंबेडकर विजयी (१७ फेब्रुवारी)
१९४२ अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना (१७ एप्रिल)
१९४२ मजूर मंत्री म्हणून नियुक्ती
१९४६ मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना (२० जून)
१९४७ भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून नियुक्ती (२९ ऑगस्ट)
१९४७ संविधान मसुदा समितीच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती (२९ ऑगस्ट)
१९४८ बाबासाहेब यांचा दुसरा परिणय (१५ एप्रिल)
१९४९ घटना समितीने घटना स्विकार केली (२६ नोव्हेंबर)
१९५० औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना (१९ जून)
१९५१ हीन्दु कोड बिल व मागास वर्गीयाच्या आरक्षणा बाबत मंत्री परिषदेचा राजीनामा (२७ सप्टेंबर)
१९५२ प्रथम सार्वत्रिक निवडणूक मध्ये पराभव (जानेवारी)
१९५२ राज्य सभेसाठी निवड (मार्च)
१९५२ कोलंबिया विद्यापीठा तर्फे डाँक्टर आँफ लाँ पदवी बहाल (५ जून)
१९५३ हैद्राबाद उस्मानीया विद्यापीठा तर्फे डाँक्टर आँफ लीटरेचर पदवी बहाल (१२ जानेवारी)
१९५४ भंडारा पोट निवडणूकी मध्ये पराभव (मे)
१९५५ भारतीय बौद्ध महासभेची स्थापना (४ मे)
१९५६ नरेपार्क येथे आँक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेईल अशी घोषणा (२४ मे)
१९५६ नागपुरात पुज्य भन्ते महास्थवीर चंद्रमनी यांच्या हस्ते पत्नी सोबत धम्म दीक्षा घेतली व नंतर ५ लाख अस्पृश बांधवाना बौद्ध धम्माची दीक्षा दिली (१४ ऑक्टोबर)
१९५६ चंद्रपूर येथे २ लाख अस्पृश बांधवाना धम्म दीक्षा दिली (१६ ऑक्टोबर)
१९५६ दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (६ डिसेंबर)
१९५६ मुंबई येथे दादर चौपाटीवर १० लाख लोकांच्या साक्षीने बौद्ध पद्धतीनुसार अंतिम संस्कार (७ डिसेंबर)
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना
🔴 महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग
1]. कोकण किनारपट्टी
2]. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट
3]. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी
1]. कोकण किनारपट्टी :
🔶 स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.
🔸 विस्तार: उत्तरेस - दमानगंगा नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.
🔸 लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमी, रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.
🔸क्षेत्रफळ: 30,394 चौ.कि
2] सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :
🔸 स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.
🔶 यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.
🔶 पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.
3]महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :
🔸 स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.
🔸लांबी-रुंदी: पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.
🔸 ऊंची: 450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.
▪️महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्यांनी व्यापले आहे
हृदयाचे ठोके
हृदयाचे एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय.
एका ठोक्यासाठी ०.८ सेकंद लागतात.
प्रौढ व्यक्तींमध्ये – ६० ठोके / मिनिट
झोपेत असताना – ५५ ठोके / मिनिट लहान मुलांमध्ये – १२०-१६० ठोके/ मिनिट
▪️हदयाच्या ठोक्यांची सुरुवात (Origin Of heart Beat) – ठोक्याची सुरुवात उजव्या कर्णिकेवरील Sino-Auricular node (S-A Node) मध्ये होते. त्याला pacemaker असे म्हणतात.
▪️हदयाच्या ठोक्यांचा दर अनियंत्रित असेल तर तो नियंत्रित करण्यासाठी Pacemaker नावाचेच इलेक्ट्रिक यंत्र शरीरात त्वचेखाली बसवतात.
▪️ठोके मोजण्यासाठी Sthethescope वापरला जातो.
▪️ठोक्यांच्या स्पंदनांचा आलेख काढण्यासाठी ECG (Electro Cardio Gram) चा वापर केला जातो. अनियमित ठोक्यांच्या निदानासाठी
1) ECG – ठोक्यांच्या स्पन्दनांचा आलेख
2) CT Scan – Computerised Tomography
3) MRI – Magnetic Resonance Imaging
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार
🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद
🔰 देश : सौदी अरेबिया
🏆 स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान
🔰 देश : अफगाणिस्तान
🏆 ग्रँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार
🔰 देश : पॅलेस्टाईन
🏆 ऑर्डर ऑफ झायेद
🔰 देश : संयुक्त अरब अमिरात
🏆 सियोल शांती पुरस्कार
🔰 देश : दक्षिण कोरिया
🏆 यु एन चँपियन्स ऑफ द अर्थ
🔰 संस्था : संयुक्त राष्ट्र
🏆 ग्लोबल गोलकीपर पुरस्कार
🔰 संस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन
🏆 किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां
🔰 देश : बहरीन
🏆 निशान इज्जुद्दीन पुरस्कार
🔰 देश : मालदीव
🏆 ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू
🔰 दश : रशिया
🏆 टाईम्स पर्सन ऑफ द ईयर : २०१६ .
बायडेन यांच्याकडून जागतिक नेत्यांना मोठय़ा अपेक्षा.
🔶अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन तर उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या निवडीचे जागतिक पातळीवर विविध देशांच्या प्रमुखांनी स्वागत केले असून सुरक्षा, व्यापार, हवामान बदल या महत्त्वाच्या सामुदायिक अग्रक्रमाच्या विषयांवर मोठय़ा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
🔶कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडो यांनी सांगितले, अमेरिकेशी कॅनडाचे निकटचे संबंध आहेतच, भौगौलिक स्थिती व व्यक्तिगत संबंध यामुळे दोन्ही देशांत आर्थिक संबंध मजबूत आहेत. कोविड १९ साथीचा मुकाबला, शांतता व सर्वसमावेशकता, आर्थिक भरभराट, हवामान बदल या मुद्दय़ांवर नवीन प्रशासनाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. हे दोन्ही देश एकत्रितपणे जागतिक आव्हानांना तोंड देतील.
🔶ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले, अमेरिका हा आमचा महत्त्वाचा मित्र देश आहे. सामुदायिक अग्रक्रमांच्या मुद्दय़ांवर आम्ही काम करू. त्यात हवामान बदल, व्यापार व सुरक्षा यांचा समावेश आहे.
🔶ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बायडेन यांच्याकडून नव्या भागीदारीची अपेक्षा व्यक्त केली असून नवीन अध्यक्षांची निवड ही अमेरिकेसाठीच नव्हे तर आमच्यासाठीही महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.
इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले
1) अलीपूर कट:- 1908
🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष
2) नाशिक कट:- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर
3) दिल्ली कट:- 1912
🔶 रासबिहारी बोस
4) लाहोर कट:- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस
5) काकोरी कट:- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन
6) मीरत/मेरठ कट:- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे
7) लाहोर कट:- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद
8) चितगाव कट:- 1930
🔶 सर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष
🔴 टीप:- इतिहासात कटावर प्रश्न आला तर या बाहेरचा प्रश्नच बनू शकत नाही.
प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types)
वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.
🔶मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
🌱कर्तरी प्रयोग
🌱कर्मणी प्रयोग
🌱भावे प्रयोग
1. कर्तरी प्रयोग (Active Voice) :
जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.
उदा .
👉तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी)
👉ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)
👉त चित्र काढतात. (कर्ता- वचन)
कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.
1. सकर्मक कर्तरी प्रयोग
2. अकर्मक कर्तरी प्रयोग
1. सकर्मक कर्तरी प्रयोग :
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
राम आंबा खातो.
सीता आंबा खाते.
ते आंबा खातात. (वचन)
2. अकर्मक कर्तरी प्रयोग :
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
राम पडला
सिता पडली (लिंग)
ते पडले (वचन)
2. कर्मणी प्रयोग (Passive Voice) :
क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.
उदा .
राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)
राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग)
राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन)
प्रसिद्ध व्यक्तींचे मृत्यू महत्वाचे प्रश्न
❇️परश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली?
१) किस देश मे है मेरा दिल✅✅
२)पवित्र रिस्ता
३) जरा जिके दिखा
४) यापैकी नाही
❇️परश्न 2️⃣:-अभिनेता इरफान खान यांचा पहिला चित्रपट कोणता?
१)हासिल
२) चाणक्य
३) सलाम बॉम्बे✅✅
४) बनगी आपनी बात
❇️परश्न 3️⃣:- रत्नाकर मतकरी यांनी खालीलपैकी कोणत्या बँक मध्ये काम केले होते?
१) बँक ऑफ बडोदा
२) बँक ऑफ महाराष्ट्र
३) बँक ऑफ इंडिया ✅✅
४) स्टेट बँक ऑफ इंडिया
❇️परश्न 4️⃣:-आत्मनेपदी हे मनोगत खालीलपैकी कोणाचे आहे?
१)रत्नाकर मतकरी✅✅
२) जयराम कुलकर्णी
३) पाटील संजय
४) यापैकी नाही
❇️परश्न 5️⃣:- चल रे लक्ष्या मुंबई ला हे नाटक कोणाचे आहे ?
१) रत्नाकर मत्कारी
२) जयराम कुलकर्णी ✅✅
३) अर्जुन गाडगीळ
४) उत्तम तुपे
❇️परश्न 6️⃣:- ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट कोणता?
१) शर्माजी नमकीन
२) सलामत
३) अग्निपथ
४) द बॉडी✅✅
❇️परश्न 7️⃣ :- रणजी स्पर्धा मध्ये सर्वाधिक बळी कोनि मिळवले आहेत?
१) राजेंद्र गोयल✅✅
२) रणजित गोयल
३) जितेंद्र गोयल
४) यापैकी नाही
❇️परश्न 8️⃣:- प्रसिद्ध संगीतकार वाजीद खान यांचे शेवटचे गाणे कोणते?
१) तुमको चाहते है
२) हम आपके है
३) भाई भाई✅✅
४) यापैकी नाही
❇️परश्र 9️⃣ :- इरफान खान यांनी खालीलपैकी कोणत्या मालिकेतून सिनेसृष्टीत प्रवेश केला?
१) सलामत
२) भारत एक खोज
३) जय हनुमान
४) चाणक्य ✅✅
❇️परश्न १० :- अरुण जेटली यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नाही?
१) कायदा व न्याय मंत्री
२) वित्त मंत्री
३) संरक्षण मंत्री
४) गृह मंत्री ✅✅
मानवधर्म सभा
◾️सथापना:-22 जून 1844
◾️ठिकाण:-सुरत
◾️पढाकार:-दादोबा तर्खडकर व दुर्गाराम मंचाराम
🔺सहभाग:-
◾️दिनमनी शंकर
◾️दामोदरदास
◾️दलपत राम भागूबाई
🔺प्रार्थना दिवस:-रविवार
🔺तत्वे:-
◾️ईश्वर एकच असून पूज्य व निराकार आहे
◾️जातिभेद पाळू नये
◾️परत्येकाला विचार करण्याचे स्वंतत्र आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गौरवगाथा प्रश्न सराव
🔹परश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ?
१) शाहू महाराज ✅✅
२) डॉ.बेव्हरेल निकोल्स
३) जोतिबा फुले
४) यापैकी नाही
🔹परश्न २:- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ.बी.सी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली ?
१) कलम ३४०✅✅
२) कलम ३४१
३) कलम ३४२
४) कलम ३४३
🔹परश्न ३:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली ?
१) भंते संघरत्न
२) भंते प्रज्ञानंद
३) भंते चंद्रमणी महास्थीर ✅✅
४) भंते सद्दतिस्स
🔹परश्न ४:- विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?
१) १९९२
२) १९८९
३) १९९०✅✅
४) १९९१
🔹परश्न ५:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ?
१) थॉटस ऑन पाकिस्तान
२) बुद्ध आणि त्यांचा धम्म ✅✅
३) हू वेअर शुद्राज
४) दि अनटचेबल्स
🔹परश्न ६ :- १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉ.आबेडकरांना कोणती पदवी बहाल केली ?
१) एम.ए
२) पी.एच.डी
३) एल.एल. डी✅✅
४) डी.एस सी
🔹परश्न ७ :- महाडचा क्रांती स्तंभ किती उंच आहे ?
१) ५१ फूट ✅✅
२) ५५ फूट
३) ५७ फूट
४) ५४ फूट
🔹परश्न ८:- डॉ.आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरू पैकी दुस-या क्रमांकावर कोणाला गुरू मानले ?
१) तथागत गौतम बुद्ध
२) महात्मा ज्योतिबा फुले
३) संत कबीर ✅✅
४) यापैकी नाही
🔹 परश्र ९ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातरांची घोषणा कधी केली ?
१) १४ ऑक्टोबर १९३५
२) १३ ऑक्टोबर १९५५
३) १४ ऑक्टोबर १९५५
४) १३ ऑक्टोबर १९३५ ✅✅
🔹 परश्न १० :- जगाच्या शिल्पकारामधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो ?
१) पहिला
२) दुसरा
३) तिसरा
४) चौथा ✅✅
भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल संपूर्ण माहिती
🔶भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे.
🔶बरिटिश कालखंडात ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या रचनेप्रमाणे भारताने न्यायव्यवस्था स्वीकारली आहे.
🔶 1935 च्या भारतीय संघराज्यांच्या कायद्याने 26 जानेवारी 1950 रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली.
🔴भारतीय न्यायव्यवस्थेची रचना पुढील प्रमाणे आहे.
🔶शिरोभागी सर्वोच्च न्यायालय त्यानंतर विभागीय पातळीवर खंडपीठे त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय तर तालुका पातळीवर तालुका न्यायालय.
🔰सर्वोच्च न्यायालय : घटना कलम क्र. 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
🔴 रचना :
1. न्यायाधीशांची संख्या :
🔶सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधिश आणि नव्याने तरतूद केल्याप्रमाणे इतर 30 न्यायाधिश असतात.
🔶नयायाधिशांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.
2. न्यायाधिशांची नेमणूक :
🔶सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधिशांची नेमणून राष्ट्रपती स्वतःच्या सहीने करतो.
🔶इतर न्यायाधिशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधिशांचा सल्ला घेतो.
🔴 न्यायाधीशांची पात्रता :
🔶तो भारताचा नागरिक असावा.
🔶तयाने कमीत कमी पाच वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधिश म्हणून काम केलेले असावे.
🔶कमीत कमीत दहा वर्षापर्यंत एक किंवा जास्त न्यायालयात वकिली केलेली असावी.
🔶राष्ट्रपतीच्या मते तो कायदेपंडित असावा.
🔴 कार्यकाल :
🔶वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो पदावर राहतो किंवा तत्पूर्वी तो आपल्या स्वाइच्छेने राष्ट्रपतीकडे राजीनामा देतो.
🔴 शपथविधी :
🔶घटना कलम क्र. 124/6 नुसार तिसर्या परिशिष्टात दिलेल्या नमुन्यानुसार भारताचा राष्ट्रपती शपथ देतो.
🔴 पदमुक्ती :
🔶कोणत्याही न्यायाधीशास गैरवर्तन व अकार्यक्षमता या कारणावरून बडतर्फ करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे .
🔶परंतु असे करण्यापूर्वी संसदेच्या प्रत्येक सभागृहाणे 2/3 बहुमताने तसा ठराव पास करणे आवश्यक आहे.
🔶निवृत्तींनंतर व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे :
🔶सर्वोच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशाला सेवानिवृत्तींनंतर भारतातील कोणत्याही न्यायालयात वकिली करता येणार नाही.
🔶 कारण श्रेष्ठ न्यायाधिश जर वकिली करू लागले तर संबंधित न्यायाधीशांवर दबाव येऊ शकतो.
🔴सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी क्षेत्र :
🔶कायदातज्ज्ञांच्या मतानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला जगातील कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक अधिकार प्राप्त झाले आहे ते पुढीलप्रमाणे आहेत.
1. प्रारंभीक अधिकार क्षेत्र :
🔶जया खटल्यांची सुरवात फक्त सर्वोच्च न्यायालयातच होते त्याला प्रारंभीक अधिकार क्षेत्र असे म्हणतात.
🔰पुढीलपैकी खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच चालतात.
1. भारत सरकार आणि घटकराज्य सरकार त्यांच्यातील वाद.
2. घटकराज्यातील वाद.
3. केंद्रसरकार आणि राज्यसरकारचा कायदेविषयक प्रश्न.
4. मूलभूत अधिकारांचे संरक्षण इत्यदी.
🔴 पुनर्निर्णयाचे अधिकार क्षेत्र :
🔶भारतीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे.
🔴 परमार्षदायी अधिकार :
🔶घटना कलम क्र. 43 नुसार भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
🔴 अभिलेख न्यायालय :
129 व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे.
त्याला त्या न्यायालयाच्या बेअब्रुकरीत शिक्षा करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
🔴मूलभूत अधिकारांचे संरक्षण :
🔶दशातील नागरिकाला मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे.
चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे
Q1) कोणता संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन या देशानंतर इस्रायल देशाला एक स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देणारा तिसरा देश ठरला?
------- सुदान
Q2) भारताचे प्रथम आंतरग्रही अभियान आहे?
-------- MOM
Q3) कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभाग (ZSI) कार्य करते?
------- पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय
Q4) कोणती आंतरसरकारी संस्था बेकायदेशीर कृत्यांना वित्तीय सहाय्य बंद करण्यासाठी कायदेशीर उपायांची प्रभावीपणे अंमलबजावणी करते?
------ वित्तीय कृती कार्य दल
Q5) कोणत्या भारतीय राज्यात ‘बम ला’ हे ठिकाण आहे?
--------- अरुणाचल प्रदेश
Q6) कोणत्या राज्यात ‘किसान सूर्योदय योजना’चा आरंभ करण्यात आला?
--------- गुजरात
Q7) कोणता देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) या संस्थेच्या 190व्या सदस्याच्या रूपाने सहभागी झाला?
---------- अंडोरा
Q8) कोणत्या जिल्ह्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) याची अंमलबजावणी करण्यात पहिला क्रमांक देण्यात आला?
----------- मंडी ( हिमाचल प्रदेश )
Q9) कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ दिन साजरा केला जातो?
----------- 24 ऑक्टोबर
Q10) गिरनार रोपवे कुठे उभारण्यात आला आहे?
-------- गुजरात
पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे महाराष्ट्राविषयी माहिती
▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.
▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
▪️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
▪️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
▪️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
▪️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
▪️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
▪️ परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
▪️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
▪️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
▪️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
▪️ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
▪️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.
🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी
🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी
🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स
🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी
🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी
🔶मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी
🔶 पराणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी
🔶पथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी
🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी
🔶धातूंचा अभ्यास - मेटलर्जी
🔶 भगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी
🔶जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी
🔶 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी
🔶 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स
🔶पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी
🔶सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी
🔶आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स
🔶 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी
🔶 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी
🔶 हरदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी
🔶अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स
🔶पराणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी
🔶 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी
🔶जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री
🔶सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी
🔶 रगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स
🔶मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी
🔶 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर
🔶शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी
🔶 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी
🔶 मतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी
🔶 भपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ
सविधान सभा
👁🗨9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक
👁🗨11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड
👁🗨13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली
👁🗨22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला
👁🗨25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली
👁🗨22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला
🔻24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले
🔻29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन
🔴26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली
🔴24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या
👉26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू झाला
अंकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिणामे
1) अंतरासाठीची परिमाणे
▪️ 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर
▪️ 100 सेंटीमीटर = 1 मीटर
▪️ 1000 मीटर = 1 किलोमीटर
2) वस्तुमानासाठीची परिमाणे
▪️ 1000 मिलिलिटर = 1 लिटर
▪️ 1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम
▪️ 100 किलोग्रॅम = 1 क्विंटल
▪️ 10 क्विंटल = 1 टन
3) कालमापनासाठीची परिमाणे
▪️ 60 सेकंद = 1 मिनिट
▪️ 60 मिनिट = 1 तास
▪️ 24 तास = 1 दिवस
4) इतर परिमाणे
▪️ 24 कागद = 1 दस्ता
▪️ 20 दस्ते = 1 रिम
▪️ 12 नग = 1 डझन
▪️ 12 डझन = 1 ग्रॉस
▪️ 100 नग = 1 शेकडा
▪️ 100 पैसे = 1 रुपया
बारा ज्योतिर्लिंगे
१) सोमनाथ -
सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.
२) मल्लिकार्जुन -
गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकिरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
३) महाकाळेश्वर -
उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. शिवशंभोचे 'महाकाल'रूप आहे.
४) अमलेश्वर -
ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.
५) वैद्यनाथ -
शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.
६) भीमाशंकर -
भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात.
७) रामेश्वर -
दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.
८) नागेश्वर -
श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.
९) काशीविश्वेश्वर -
वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप आहे.
१०) केदारेश्वर -
हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.
११) घृष्णेश्वर -
(घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.
१२) त्र्यंबकेश्वर -
नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले. जप मंत्र - ओम त्र्यंबकम यजामहे ,सुगन्धिम पुष्टी वर्धनम। ऊर्वारुकमीव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात।।
भारतातील जनक विषयी माहिती
🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी
🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू
🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक
🔶सथानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन
🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम
🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन
🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके
🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन
🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी
इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे
१) १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ कुळ कायदा
३) १८२९ सतीबंदी कायदा
४) १८३५ वृत्तपत्र कायदा
५) १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ राणीचा जाहीरनामा
८) १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० इंडियन पिनल कोड
१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ कुळ कायदा
१६) १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ भारतीय चलन कायदा
१८) १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ रौलेक्ट कायदा
२५) १९३५ भारत सरकार कायदा
२६) १९४४ राजाजी योजना
२७) १९४५ वेव्हेल योजना
जगातील औद्योगिक उत्पादने व देश
🔰 इलेक्ट्रॉनिक वस्तु : जपान, अमेरिका, तैवान, कोरिया, चीन.
🔰 कागद(वर्तमानपत्राचा) : कॅनडा, अमेरिका, जपान, रशिया.
🔰 कागद (लगदा) : अमेरिका, कॅनडा, स्वीडन, ब्रिटन, रशिया, नॉर्वे.
🔰 जहाज बांधणी : जपान, द.कोरिया, ब्रिटन.
🔰 मोटारी : अमेरिका, जपान, प.जर्मनी, कोरिया.
🔰 लोह-पोलाद : रशिया, चीन, जपान, अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, जर्मनी.
🔰 साखर : क्युबा, ब्राझिल, भारत, रशिया व अमेरिका.
🔰 सीमेंट : रशिया, चीन, अमेरिका.
🔰 खते : अमेरिका, रशिया, जर्मनी.
🔰 विमाने : अमेरिका, ब्रिटन.
🔰 यंत्र सामुग्री : अमेरिका, जर्मनी.
🔰 रसायने : अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, भारत, कॅनडा.
महाराष्ट्र जिल्हे
जिल्हे व तालुका संख्या
◆अकोला 7 तालुके
◆ अमरावती 14 तालुके
◆ औरंगाबाद 9 तालुके
◆ अहमदनगर 14 तालुके
◆ बीड 11 तालुके
◆ बुलढाणा 13 तालुके
◆ भांडारा 7 तालुके
◆ चंद्रपूर 15 तालुके
◆धुळे 4 तालुके
◆ गोंदिया 8 तालुके
◆ गडचिरोली 12 तालुके
◆ हिंगोली 5 तालुके
◆ जालना 8 तालुके
◆ जळगांव 15 तालुके
◆ कोल्हापूर 12 तालुके
◆ लातूर 10 तालुके
◆ मुंबई उपनगर 3 तालुके
◆ मुंबई शहर एक ही तालुका नाही
◆ नागपूर 14 तालुके
◆ नाशिक 15 तालुके
◆नांदेड 16 तालुके
◆नंदुरबार 6 तालुके
◆ पुणे 14 तालुके
◆ परभणी 9 तालुके
◆ पालघर 8 तालुके
◆ रायगड 15 तालुके
◆ रत्नागिरी 9 तालुके
◆ सिंधुदुर्ग 8 तालुके
◆ सोलापूर 11 तालुके
◆ सांगली 10 तालुके
◆ सातारा 11 तालुके
◆ ठाणे 7 तालुके
◆ उस्मानाबाद 8 तालुके
◆ वाशीम 6 तालुके
◆ वर्धा 8 तालुके
◆ यवतमाळ 16 तालुके
■एकही तालुका नसलेला जिल्हा मुंबई शहर
■राज्यातील सर्वाधिक तालुके
असणारे दोन जिल्हे यवतमाळ व नांदेड १६
■राज्यात एकच जिल्हा असा आहे की त्यात फक्त 13 जिल्हे आहेत तो म्हणजे बुलढाणा
■असे एकूण चार जिल्ह्ये आहेत की ज्यात 14 तालुके आहेत.पूणे. नागपूर. अमरावती. अहमदनगर
■असे एकूण चार जिल्ह्ये आहेत की त्यात 15 तालुके आहेत चंद्रपूर. जळगाव.रायगड. नाशिक
■असे दोन जिल्ह्ये आहेत की जेथे फक्त 10 तालुके आहेत.सांगली. लातूर
■असा एकमेव जिल्हा आहे की जेथे फक्त तीन तालुके अहेत तो म्हणजे मुंबई उपनगर
■असे :सतरा:जिल्ह्ये आहेत जी त्यांच्या तालुक्यांची संख्या दहाच्या खाली आहे
■धुळे हा एकमेव जिल्हा आहे की ज्यात फक्त चार तालुके आहेत.
■हिंगोली हा असा एकमेव जिल्हा आहे की त्यात फक्त पाच तालुके आहे
नक्की वाचा - भारताच्या सर्व पंतप्रधानांची यादी....
1. जवाहरलाल नेहरू
कार्यकाळ:-
15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964
16 वर्षे, 286 दिवस
भारताचे पहिले पंतप्रधान आणि प्रदीर्घ काळ सेवा देणारे पंतप्रधान
२. गुलझारी लाल नंदा
कार्यकाळ:-
27 मे 1964 ते 9 जून 1964
13 दिवस
पहिले कार्यवाहक पंतप्रधान, सर्वात कमी काळ पंतप्रधान
3. लाल बहादूर शास्त्री
कार्यकाळ:-
9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966
1 वर्ष, 216 दिवस
1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी "जय जवान जय किसान" हा नारा दिला.
4. गुलझारी लाल नंदा
कार्यकाळ:-
11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966
13 दिवस
5. इंदिरा गांधी
कार्यकाळ:-
24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977
11 वर्षे, 59 दिवस
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
5. मोरारजी देसाई
कार्यकाळ:-
24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979
2 वर्षे, 126 दिवस
सर्वात वयोवृद्ध पंतप्रधान (८१ वर्षे) आणि पदाचा राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान
6. चरणसिंग
कार्यकाळ:-
28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980
170 दिवस
एकमेव पंतप्रधान ज्यानी संसदेला तोंड दिले नाही..
7. इंदिरा गांधी
कार्यकाळ:-
14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984
4 वर्षे, 291 दिवस
दुस-यांदा पंतप्रधानपदावर काम करणारी पहिली महिला
8. राजीव गांधी
कार्यकाळ:-
31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989
5 वर्षे, 32 दिवस
सर्वात तरुण पंतप्रधान (40 वर्षे)
9. विश्वनाथ प्रताप सिंह
कार्यकाळ:-
2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990
343 दिवस
अविश्वास ठराव मंजूर करून पद सोडणरे पंतप्रधान
10. चंद्रशेखर
कार्यकाळ:-
10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991
223 दिवस
कार्यकाळ:-
समाजवादी जनता पार्टीशी संबंधित
11. पीव्ही नरसिंहराव
कार्यकाळ:-
21 जून 1991 ते 16 मे 1996
4 वर्षे, 330 दिवस
दक्षिण भारतातूंन पहिले पंतप्रधान
12. अटलबिहारी वाजपेयी
कार्यकाळ:-
16 मे 1996 ते 1 जून 1996
16 दिवस
सरकार केवळ 1 मताने पडले
13. एचडी देव गौडा
कार्यकाळ:-
1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997
324 दिवस
जनता दलाचे पंतप्रधान
14. इंदर कुमार गुजराल
कार्यकाळ:-
21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998
332 दिवस
स्वतंत्रपणे भारताचे 13 वे पंतप्रधान
15. अटलबिहारी वाजपेयी
कार्यकाळ:-
19 मार्च 1998 ते 22 मे 2004
6 वर्षे, 64 दिवस
कॉंग्रेस व्यतिरिक्त प्रथम पंतप्रधान ज्यांनी संपुर्ण कार्यकाळ पूर्ण केलेले पंतप्रधान
16. मनमोहन सिंग
कार्यकाळ:-
22 मे 2004 ते 26 मे 2014
10 वर्षे, 2 दिवस
प्रथम शीख पंतप्रधान
17. नरेंद्र मोदी
कार्यकाळ:-
26 मे 2014 आत्तापर्यंत
२७ नोव्हेंबर २०२०
वासुदेव बळवंत फडके
🖍वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म 4 नाेव्हेंबर 1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण येथे एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला.
🖍फडके यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते.
🖍1857 च्या उठावानंतर भारतात इंग्रजांविरोधात जो पहिला सशस्त्र उठाव झाला तो फडके यांचा होता.
🖍 पशवाईच्या काळात पनवेल जवळील कर्नाळ जिल्ह्याची किल्लेदारी ही फडक्यांच्या घराण्यात होती.
त्यांना सुभेदार फडके म्हणून देखील ओळखले जात असे.
🖍उदरनिर्वाहासाठी वासुदेव फडके यांनी प्रथम रेल्वे खात्यात लिपिक म्हणून कामास सुरुवात केली व नंतर ते लष्करी खात्यात नोकरीस लागले.
🖍 इग्रजांकडून त्यांना नेहमी अपमानास्पद वागणूक मिळत असे व त्यांच्या या नोकरीमुळे त्यांना त्यांच्या आईच्या अंत्यविधीस देखील जाता आले नाही.
🖍फडकेंवर न्या. रानडे व गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचा प्रभाव होता.
🖍1873 मध्येफडकेंनी स्वदेशी वस्तु वापरण्याची शपथ घेतली तसेच समाजात समानता, ऐक्य व
समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धीनी संस्था सुरू केली.
🖍 पणे येथे फडकेंने 1874 मध्ये पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशन ही शाळा स्थापन करुन स्वदेशीचा पुरस्कार देखील केला.
🖍फडके हे दत्त उपासक होते व त्यांनी दत्तमाहात्म्य हा 7,000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला
होता.
🖍शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज भारतातून जाणार नाहीत असे त्यांना वाटत असल्यामुळे इंग्रजांविरोधी उठावास त्यांनी सुरूवात केली व इंग्रजांना आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढविली व वैराग्याचा वेश घेवून जन जागृती करत ते गावोगावी फिरू लागले.
🖍 दौलतराव नाईकांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर त्यांनी पहिला दरोडा घातला यामध्ये त्यांना केवळ 3,000 रुपये मिळाले.
🖍 सरकारी खजिन्यास कडक बंदोबस्त असल्यामुळे सरकारी खजिना लुटण्यापेक्षा खेड्यापाड्यातील श्रीमंताची व सावकारांची घरे लुटण्यावर त्यांचा भर होता. त्यांनी लोणी, खेड, जेजुरी जवळील वाल्हे, पुरंदर, हुरणे, सोलापूर, वरसगाव येथे दरोडा टाकून लुटमार केली. याच काळात त्यांनी रामदरा, मल्हारगाव येथील जंगलांचा आश्रय घेवून आसपासचा प्रदेश देखील लुटला.
🖍 अखेर दिवसेंदिवस या लुटीच्या बातमीने हादरुन पुण्याचा पोलीस प्रमुख मेजर डॅनिअल याने फडकेंचा शोध घेत असता शुक्रवार पेठेत पोचला व त्याठिकाणी त्यास तलवारी, बंदुका मिळाल्या व डॅनीअलने लगेलच फडकेंवर अटक वॉरंट काढले व यानुसार फडकेंना पकडण्यासाठी मुंबई सरकारने 4,000 रुपयांचे रोख बक्षिस घोषित केले.
🖍 यावर प्रतिउत्तर म्हणून फडकेंनी जाहीर केले की, मुंबईचा गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल याचे डोके कापून आणणाऱ्यास 10,000 रुपयांची बक्षिस दिले जाईल. परंतु फडकेंचा उत्साह फार काळ टिकू शकला नाही व रामोशांनी देखील त्यांची साथ सोडली होती.
🖍 अखेर 23 जुलै 1879 रोजी विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बाैध्द विहारमध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली होती.
🖍 नया. अल्फ्रेड केसर यांच्या समोर सदरील खटला सुरू झाला व त्यांनी सत्र न्या. न्युनहॅमकडे हा खटला वर्ग केला. फडकेंचे वकीलपत्र ग.वा. जोशींनी घेतले होते व उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले होते.
🖍 फडके यांच्या बचावासाठी जनतेने उस्ताहाने निधीदेखील गोळा केला परंतू कोर्टाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
🖍 अखेर जानेवारी 1880 मध्ये त्यांची तेहरान बोटीने एडण येथे रवानगी करण्यात आली व तेथेच 17 फेब्रुवारी 1883 रोजी तेथील इंग्रजांच्या होणारया छळाला बळी पडून त्यांचे निधन झाले.
🖍 " देशप्रेमाने ओथंबलेला हिमलया सारखा उत्तुंग महापुरुष " असा फडकेंचा गौरव बंगालमध्ये प्रसिध्ह अमृतबाजार पत्रिकेने त्यांच्या अटकेनंतर एका पत्रात केला होता.
'मलबार नौदल युद्ध सराव' ( malabar exercise 2020)
04 नोव्हेंबर 2020
⚓️ सहभागी देश :
भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया
⚓️ ठिकाण :
बंगालचा उपसागर, अरबी समुद्र
⚓️ कालावधी :
हा सराव दोन टप्प्यात होईल.
- पहिला टप्पा विशाखापट्टणममध्ये ३ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर या काळात होणार आहे.
- दुसरा टप्पा नोव्हेंबरच्या मध्यात अरबी समुद्रात प्रस्तावित आहे.
⚓️ उद्देश :
प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी पोषक वातावरण तयार करणे.
⚓️ पार्श्वभूमी :
- क्वाड सदस्य देशांमध्ये भविष्यात लष्करी सहकार्य राहावे याचा प्रयत्न म्हणून या कवायतींकडे पाहिले जात आहे.
- जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचेही अनेक वादग्रस्त प्रश्नांवरून चीनशी संबंध ताणले गेले आहेत.
- इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा वाढणारा प्रभाव हा प्रश्न प्रामुख्याने चर्चेचा मुद्दा आहे.
- या कवायतींमध्ये सहभाग घेतलेले देश इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संरक्षणविषयक सहकार्य करण्यास बांधील आहेत हे यावरून स्पष्ट होते
⚓️ विशेष :
- यंदाच्या मलबार युद्ध सरावाचं विशेष महत्त्व म्हणजे १३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया या सरावात पुनरागमन करत आहे.
- करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चार देशातील हा नौदलाच्या युद्ध सरावात कुठलाही प्रत्यक्ष संपर्क नसेल.
राज्यघटना बाबत मते
❇️एन श्रीनिवासन:-
🔳भाषा आणि आशय या बाबतीत घटना जवळजवळ 1935 च्या कायद्यासारखीच आहे
❇️आयव्हर जेंनीग्स:-
🔳1935 च्या कायद्यातून काही तरतुदी जशास तश्या घेतल्या आहेत
❇️के हनुमंतय्या:-
🔳आम्हला विना किंवा सतार याचे संगीत हवे होते पण येथे इंग्लिश घोष विभागाचे संगीत आहे
🔳जया प्रकारची घटना गांधीजींना नको होती व त्यांना अपेक्षित न्हवती नेमक्या त्याच प्रकारची ही घटना आहे
❇️लोकनाथ मिश्र:-
🔳पश्चिमचे गुलामी अनुकरण,त्याहून पश्चिमेला गुलामी शरणागती
❇️लक्ष्मीनारायण साहू:-
🔳मसुदा ज्या विचारधारावर आधारलेला आहे त्याचे मूळ भारतीय विचारधाराशी कोणतेही नाते दिसत नाही
❇️एच बी कामत:-
🔳आपल्या समितीसाठी हत्ती हे चिन्ह स्वीकारले आहे ते राज्यघटनाशी सुसंगत आहे.
विभक्ती व त्याचे प्रकार
🔰 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.
🔰 नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.
🔰 नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.
⭕️ परथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत –
कर्ता
⭕️ वदितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते –
कर्म
⭕️ ततीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण
⭕️ चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते –
संप्रदान
⭕️ पचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान
⭕️ षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध
⭕️ सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ –
अधिकरण
⭕️ सबोधन – नो – संबोधन
लोकपाल
पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष
गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम
न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी
🛑 लोकपाल निवड समिती
1)पंतप्रधान
2)सरन्यायाधीश
3)लोकसभा अध्यक्ष
4)लोकसभा विरोधी पक्षनेते
5)कायदेतज्ज्ञ
🛑 लोकपाल पात्रता
1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश
2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव
🛑 अध्यक्ष अपात्रता
45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती संसद व विधिमंडळ सदस्यअपराधी दोषी
🛑 कार्यकाल
5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर संपेल तो
🛑 पगार
अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे
सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे
🛑 लोकपाल कायदा 2013
राज्यसभा:-17 डिसेंबर 2013
लोकसभा:-18 डिसेंबर 2013
राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014
अंमलबजावणी :-16 जानेवारी 2014
🛑 रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर
केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दहशतवाद्यांविरोधात मोठा पाऊल उचलत, एक नवी यादी जाहीर केली आहे. बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक (यूएपीए) अंतर्गत गृह मंत्रालयाने १८ दहशतवाद्यांची यादी घोषित केली आहे. या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिमच्या अनेक सहकाऱ्यांची नावं आहेत. छोटा शकील, टायगर मेमन यांचा देखील या यादीत समावेश आहे.
या १८ दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानस्थित असलेल्या दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे. सरकारने २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी लष्कर ए तोयबाचा युसूफ मुजम्मील, लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा मेव्हणा अब्दुर रहमान मक्की, १९९९ मधील कंधार आयसी-८१४ विमान अपहरणातील आरोपी युसूफ अजहर, मुंबई बॉम्ब स्फोटाचा कट रचणारा टायगर मेमन, छोटा शकील, हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या भटकल बंधूंना देखील दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
हे आहेत १८ दहशतवादी -
१. साजिद मीर (लष्कर ए तोयबा), २. युसूफ भट्ट (लष्कर ए तोयबा), ३.अब्दुर रहमान मक्की (लष्कर ए तोयबा), ४. शाहीद महमूद (लष्कर ए तोयबा) ५. फरहातुल्लाह गोरी ६.अब्दुल रऊफ असगर ७. इब्राहीम अतहर ८. युसूफ अजहर ९. शाहीद लतीफ १०. मोहम्मद युसूफ शाह (हिजबुल मुजाहिद्दीन) ११. गुलाम नबी खान (हिजबुल मुजाहिद्दीन) १२. जफर हुसैन भट्ट १३. रियाज इस्माइल १४. मोहम्मद इकबाल १५. छोटा शकील १६. मोहम्मद अनीस १७. टाइगर मेमन १८. जावेद चिकना
२०१९ व २०२० मधील काही महत्त्वाची पुस्तके / आत्मचरित्रे व त्यांचे लेखक
🔰 बाय बाय कोरोना : पी के श्रीवास्तव
🔰 यवर बेस्ट डे ईस टुडे : अनुपम खेर
🔰 द इंडिया वे : एस जयशंकर
🔰 पोर्टरेटस् ऑफ पॉवर : एन के सिंह
🔰 द बँटल ऑफ बिलोंगिंग : शशी थरुर
🔰 वन अरेंजड् मर्डर : चेतन भगत
🔰 विशेष : कोड टु विन : निरुपमा यादव
🔰 बाबू द अनफॉर्गेटेबल : मनीष सिसोदिया
🔰 वॉईसेस ऑफ डिसेंट : रोमिला थापर
🔰 अ प्रोमिसड लॅन्ड : बराक ओबामा
🔰 आझादी : फ्रीडम . फॅसिझम. फिक्शन : अरुंधती रॉय
🔰 माय लाईफ इन डिझाईन : गौरी खान
🔰 लट अस ड्रीम : पोप फ्रान्सिस
🔰 करिकेट द्रोना : जतिन परांजपे
🔰 अमेझिंग अयोध्या : नीना राय
🔰 द एंडगेम : हुसैन झैदी
🔰 अ सॉंग ऑफ इंडिया : रस्किन बाँड
🔰 ओवरड्राफ्ट : सेविंग द इंडियन सेवर : उर्जित पटेल
🔰 लिजेंन्ड ऑफ सुहेलदेव : अमिश त्रिपाठी
🔰 कोर्टस् ऑफ इंडिया : रंजन गोगोई
🔰 लिसनिंग , लर्निंग , लिडींग : वैकय्या नायडू
🔰 माय लाईफ , माय मिशन : बाबा रामदेव
🔰 वी आर डीसप्लेसड् : मलाला युसुफजाई
🔰 एवरी वोट काऊंटस् : नवीन चावला
🔰 विराट : द मेकिंग ऑफ ए चॅम्पियन : नीरज झा
🔰 द थर्ड पिलर : रघुराम राजन
🔰 आय डु व्हाँट आय डु : रघुराम राजन
🔰 गम चेंजर : शाहिद आफ्रीदी
🔰 चजिंग इंडिया : मनमोहन सिंह
🔰 द पँराडॉक्सीकल प्राईम मिनिस्टर : शशि थरुर
🔰 मातोश्री : सुमित्रा महाजन
🔰 सिटीझन दिल्ली : माय टाईम , माय लाईफ : शिला दिक्षित
🔰 २८१ अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण
🔰 आवर हाऊस इस ऑन फायर : ग्रेटा थनबर्ग
🔰 माइंड मास्टर : विश्वनाथन आनंद .
महत्वाचे प्रश्नसंच
(०१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर- २४ डिसेंबर.
(०२) सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर- मॅकमिलन.
(०३) 'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?
उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.
(०४) भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
उत्तर- १९२० मध्ये.
(०५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?
उत्तर- सोलापूर.
(०६) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
उत्तर- वड.
(०७) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.
(०८) कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
उत्तर- विंबलडन.
(०९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
उत्तर- २० मार्च १९२७.
(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?
उत्तर- C₁₂H₂₂O₁₁
(११) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- दादासाहेब फाळके.
(१२) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- रूडाल्फ डिझेल.
(१३) 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी
(१४) व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.
(१५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.
(१६) महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
उत्तर- पुणे.
(१७) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- जेम्स वॅट.
(१८) 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
उत्तर- राम गणेश गडकरी.
(१९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
उत्तर- ८ जुलै १९३०.
(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?
उत्तर- C₆H₁₂O₆
(२१) राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?
उत्तर- त्याग आणि शौर्य.
(२२) टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.
(२३) ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
उत्तर- रानकवी.
(२४) अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?
उत्तर- २९ आॅगस्ट.
(२५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?
उत्तर- २७ मे १९३५.
(२६) न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
उत्तर- किवी.
(२७) ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.
(२८) मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?
उत्तर- विवेकसिंधू.
(२९) 'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सुनील गावस्कर.
(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?
उत्तर- महात्मा फुले.
(३१) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
उत्तर- व्हाइट हाऊस.
(३२) अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?
उत्तर- ब्रेल लुईस.
(३३) ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*
उत्तर- अरूणा ढेरे.
(३४) 'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- पी. टी. उषा.
(३५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?
उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.
(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?
उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची
(३७) महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप
(३८) देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?
उत्तर- कोल्हापूर.
(३९) श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते ?
उत्तर- प्र.के.अत्रे
(४०) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?
उत्तर- 1990
(४१) तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?
उत्तर- कावेरी नदी.
(४२) पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.
(४३) आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
उत्तर- कृष्णाजी केशव दामले.
(४४) अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- अॅथेलेटिक्स.
(४५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?
उत्तर- २५ डिसेंबर १९२७.
(४६) सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?
उत्तर- रोम.
(४७) डायनामाइटचा शोध कोणी लावला ?
उत्तर- आल्फ्रेड नोबेल.
(४८) आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर- ह. ना. आपटे.
(४९) 'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सायना नेहवाल.
(५०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?
उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा.
लव्ह जिहाद विरोधात योगी सरकारने केला कायदा; अध्यादेशाला मंजुरी
उत्तर प्रदेश कॅबिनेटने ‘लव्ह जिहाद’विरोधातील अध्याधेशास आज मंजुरी दिली आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा अध्यादेश पारीत केला गेला.
अध्यादेशानुसार धर्मपरिवर्तन करण्यास जबरदस्ती करणाऱ्यास एक ते पाच वर्षे कारावासाची शिक्षा व १५ हजार रुपये दंड असणार आहे. तसेच, अल्पवयीन व अनुसूचित जाती / जमातीमधील महिलांच्या धर्मांतरणासाठी तीन ते दहा वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंड असणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
तसेच, अनेकांचे जबरदस्ती धर्मांतरण केल्याप्रकरणी अध्यादेशात तीन ते दहा वर्षे कारावसाच्या शिक्षेसह ५० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीस धर्मांतरण करून विवाह करायचा असल्यास, त्याला दोन महिने अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडून तशी परवानगी घ्यावी लागणार आहे, असे देखील सांगण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावलं उचलली आहेत. काही दिवसांअगोदरच या संदर्भात राज्याच्या गृहमंत्रालयाने कायदे व विधी विभागाकडे प्रस्ताव देखील पाठवला होता.
लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल, असा गंभीर इशारा या अगोदरच दिलेला आहे.
'अलाहाबाद न्यायालयानं निर्णय दिला आहे की, केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही. धर्म परिवर्तन नाही केले गेले पाहिजे. याला मान्यता मिळाली नाही पाहिजे.
यासाठी सरकार देखील निर्णय घेत आहे की, लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचं काम केले जावे. सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशारा देत आहे, जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधाराला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे.” असं योगी आदित्यनाथ यांनी एका सभेत बोलून दाखवलं होतं.
भारतीय रेल्वेनं 13 लाख कर्मचाऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट
🔰भारतीय रेल्वेने आपल्या 13 लाख कर्मचार्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. रेल्वेने कर्मचार्यांच्या सोयीसाठी आता डिजिटल ऑनलाईन मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) सुरू केली आहे.
🔰तर या सुविधेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्स मॉड्यूलद्वारे त्यांचे पीएफ बॅलेन्स चेक करता येणार आहे. याशिवाय त्यांना अॅडव्हान्स पीएफसाठी ऑनलाईन अर्जही करता येणार आहे.
🔰रल्वे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, की सुधारित उत्पादकता आणि कर्मचार्यांना फायदा मिळवून देण्यासाठी भारतीय रेल्वेने एचआरएमएस हा एक खास प्रकल्प सुरू केला आहे.
🔰रल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने, रेल्वे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी उपयुक्त एचआरएमएस (HRMS) आणि यूझर डेपोची मॉड्यूल्स लॉन्च करण्यात आले आहेत. यात कर्मचारी सेल्फ सर्व्हिसचा (ESS) लाभ घेऊ शकतात.
आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच
🔰आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतला आहे.
🔰यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असं जाहीर करण्यात आलं होतं. पण करोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
🔰नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने परिपत्रक जारी करुन याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, या कालावधीत ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या खास विमानांना उड्डाणाची परवानगी असेल.
तसंच, डीजीसीएकडून परवानगी मिळालेल्या विशेष विमानांवर बंदी नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
🔰यापूर्वी डीजीसीएने आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. करोना व्हायरसमुळे यावर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावेळी देशांतर्गत विमानांवरही बंदी होती, पण 25 मेपासून देशांतर्गत विमानांना पुन्हा परवानगी देण्यात आलीये.
🔰तर, आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक 30 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता होती, पण आता करोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याने 31 डिसेंबर 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे.
लाच घेण्यात भारत आशिया खंडात अव्वल.
🔰ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेनुसार, भारतात लाचखोरीचं प्रमाण हे 39 टक्के आहे. गेल्या 12 महिन्यांत भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे 47 टक्के लोकांचं म्हणणं आहे.सरकार भ्रष्टाचार संपवण्यासाठी योग्य पावलं उचलत असल्याचं या सर्व्हेत सहभागी झालेल्या 63 टक्के लोकांचं म्हणणं आहे.
🔰भारतात 46 टक्के लोक आपलं काम करुन घेण्यासाठी वैयक्तिक संबंधांचा फायदा उठवतात. लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये सुमारे निम्म्या लोकांकडून लाच मागण्यात आली आहे.
तर वैयक्तिक संबंधांचा वापर करणारे 32 टक्के लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी जर असं केलं नाही तर त्याचं काम होतच नाही.
🔰भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे कंबोडिया. या देशात 37 टक्के लोक लाच देतात. यानंतर भ्रष्टाचाराचं प्रमाणं 30 टक्के असल्याने इंडोनेशिया तिसऱ्या स्थानी आहे. तर सर्वात कमी लाचखोरी चालणारे देश आहेत मालदीव आणि जपान. या दोन्ही देशांमध्ये दोन टक्के लोकच लाच घेतात.
🔰आशिया खंडातील दक्षिण कोरियामध्ये भ्रष्टाचाराचा दर 10 टक्के आहे. तसेच नेपाळमध्ये 12 टक्के लोकचं भ्रष्टाचार करतात. मात्र, या सर्व्हेमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने ‘ग्लोबल करप्शन बॅरोमीटर-आशिया’या नावाने आपला अहवाल सादर केला आहे.
तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन
🔰कद्रीय सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ‘तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संकटात सापडलेल्या तृतीयपंथी व्यक्तींना निवारा देण्यासाठी गुजरातच्या वडोदरा शहरात ‘गरिमा गृह’ या नावाने एका केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.
🔰29 सप्टेंबर 2020 रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या “तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम-2020” यामध्ये समर्पित असे एक राष्ट्रीय संकेतस्थळ तयार करण्याची तरतुद आहे.
🔰ह व्यासपीठ एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीला देशात कोणत्याही भागातून प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात मदत करते. प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कोणत्याही कार्यालयाला भेट न देता त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे.
🔴‘गरिमा गृह’ विषयी...
🔰‘गरिमा गृह’चे व्यवस्थापन संपूर्णपणे तृतीयपंथीयांकडून संचालित केल्या जाणाऱ्या ‘लक्ष्य ट्रस्ट’कडून केले जाणार आहे. तृतीयपंथी व्यक्तींना निवारा, अन्न, वैद्यकीय सेवा आणि करमणुकीच्या सुविधा या मूलभूत सुविधा पुरवणे तसेच त्यांना कौशल्य विकासाचे धडे देऊन त्यांना सक्षम करणे, ज्यामुळे त्यांना सन्मानाने जीवन जगता येणार, या उद्देशाने ही संस्था आहे.
🔰‘गरिमा गृह’ प्रमाणेच आणखी 13 केंद्रांची स्थापना करण्यासाठी 10 शहरांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यात वडोदरा, नवी दिल्ली, पटना, भुवनेश्वर, जयपूर, कोलकाता, मणीपुर, चेन्नई, रायपूर, मुंबई या शहरांचा समावेश आहे. या योजनेत मंत्रालयाने निश्चित केलेल्या प्रत्येक केंद्रावर किमान 25 लोकांचे पुनर्वसन केले जाणार.
चीनच्या आणखी 42 उपयोजनांवर बंदी.
🔰चीनच्या 42 मोबाइल उपयोजनांवर इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा समावेश आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपयोजनांमुळे धोका असल्याचे सांगण्यात आले.तर मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने दिलेल्या अहवालाच्या आधारे या उपयोजनांवर बंदी घालण्यात येत आहे.
🔰तसेच 29 जुलै रोजी सरकारने चीनच्या 59 उपयोजनांवर बंदी घातली होती त्यात टिक टॉक, युसी ब्राउजर यांचा समावेश होता. त्यानंतर 2 सप्टेंबरला 118 उपयोजनांवर बंदी घालण्यात आली त्यात पबजी नॉर्डिक मॅप,लिव्हिक, पबजी मोबाइल लाइट, वुई चॅट वर्क, बायडू, टेनसेंटर वेयुन यांचा समावेश होता. त्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 69 ए अन्वये बंदी घालण्यात आली.
चद्रावरील खडकांचे नमुने आणण्यासाठी चीनचे यान रवाना.
🔰चद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले आहे.चीनच्या चँग इ -5 या शोधक यानाने दक्षिणेकडील हैनान प्रांतात वेंगचँग अवकाशयान उड्डाण तळावरून यशस्वी झेप घेतल्याची माहिती सीजीटीएन या संस्थेने दिली आहे.
🔰तर हे यान लाँग मार्च 5 या प्रक्षेपकाच्या मदतीने बीजिंगच्या प्रमाणवेळेनुसार पहाटे 4.30 वाजता अवकाशात झेपावले.
चँग इ- 5 ही अतिशय गुंतागुंतीची चांद्रमोहीम असून त्यात अवकाश इतिहासावर भर देण्यात आला आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जगात प्रथमच चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याची मोहीम राबवली जात आहे.
🔰तसेच अमेरिकेने चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर पाठवले होते. रशियाने खडकांचे नमुने आणण्यासाठी मानवरहित मोहिमा राबवल्या होत्या. ही अवकाशयाने चंद्रावर जाऊन परत आली होती. चीनची मोहीम गुंतागुंतीची आहे कारण त्यात हे यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केले जाणार असून तेथील खडकांचे जास्तीत जास्त नमुने गोळा करणार आहे.
भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)
🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश
✔️ नाव दिले : इराण
🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : बांग्लादेश
🌀 वायु : भारत , पाकिस्तान
✔️ नाव दिले : भारत
🌀 हिक्का : गुजरात
✔️ नाव दिले : मालदीव
🌀 महा : ओमान , श्रीलंका , भारत
✔️ नाव दिले : ओमान
🌀 बलबुल : बांग्लादेश , भारत
✔️ नाव दिले : पाकिस्तान
🌀 कयार : सोमालिया , भारत , येमन
✔️ नाव दिले : म्यानमार
🌀 पवन : सोमालिया , भारत
✔️ नाव दिले : श्रीलंका
🌀 अम्फान : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : थायलंड
🌀 निसर्ग : महाराष्ट्र , गोवा , गुजरात
✔️ नाव दिले : बांग्लादेश .
उमंग इंटरनॅशनल”: उमंग मोबाईल अॅपची आंतरराष्ट्रीय आवृत्ती
♒️कद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते उमंग अॅपच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीचे अनावरण करण्यात आले.
♨️ठळक बाबी ...
♒️परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समन्वयाने “उमंग इंटरनॅशनल” अॅपमार्फत भारत सरकारच्या सेवा दिल्या जाणार आहेत.
ही आवृत्ती अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड या निवडक देशांसाठी तयार करण्यात आली आहे.
♒️अपमार्फत भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, अनिवासी भारतीय, परदेशातले भारतीय पर्यटक यांना भारत सरकारच्या सेवांचा कोणत्याही वेळी लाभ घेता येणार.
उमंग अॅपवर उपलब्ध असणाऱ्या भारतीय सांस्कृतिक सेवांमुळे भारताला जागतिक पातळीवर नेण्यास मदत होणार आणि परदेशी पर्यटकांमध्ये भारताला भेट देण्याविषयी आवड निर्माण होणार.
♨️उमंग अॅपविषयी...
♒️“उमंग” (UMANG - युनिफाईड मोबाईल अॅप्लीकेशन फॉर न्यू-एज गवर्नन्स) मोबाईल अॅप हा भारत सरकारचा एकल, एकात्मिक, सुरक्षित, बहुविध, बहु-भाषी, बहु-सेवा मोबाईल अॅप (सुपर-अॅप) आहे. अॅपमार्फत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागाच्या उच्च प्रभावित सेवा प्रदान केल्या जातात.
♒️उमंगची निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग (NeGD) यांनी केली आहे. त्याचे लोकार्पण 23 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आले होते.
♒️“उमंग” अॅपने तीन वर्षे पूर्ण केली असून 2000 पेक्षा अधिक सेवांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. अॅपवर सध्या 2039 सेवा (88 केंद्रीय विभागाच्या 373 सेवा, 27 राज्यांच्या 101 विभागाच्या 487 सेवा आणि 1179 सेवा उपयोगिता बिल देयके) उपलब्ध आहेत आणि यात निरंतर वाढ होत आहे.
२६ नोव्हेंबर २०२०
२६ नोव्हेंबर : संविधान दिन
🟢 घटना समितीत १५ महिला सदस्यांचा समावेश होता
🙎♀ १) अम्मू स्वामीनाथन
🙎♀ २) एनी मस्करीन
🙎♀ ३) बेगम एजाज रसूल
🙎♀ ४) दक्षयानी वेलायुधन
🙎♀ ५) दुर्गाबाई देशमुख
🙎♀ ६) हंसा मेहता
🙎♀ ७) पुर्णिमा बँनर्जी
🙎♀ ८) रेणुका रे
🙎♀ ९) सरोजिनी नायडू
🙎♀ १०) विजयालक्ष्मी पंडित
🙎♀ ११) सुचिता कृपलानी
🙎♀ १२) कमला चौधरी
🙎♀ १३) लीला रे
🙎♀ १४) मालती चौधरी
🙎♀ १५) राजकुमारी कौर
चालू घडामोडी प्रश्नसंच
📍विम्बलडन टेनिस स्पर्धा – २०१६ चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोणता?
A) अँडी मरे ✅✅
B) नोव्हाक जोकोविच
C) राफेल नदाल
D) रॉजर फेडरर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍‘द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
A) प्रणव मुखर्जी ✅✅
B) शरद पवार
C) लालकृष्ण आडवाणी
D) बरखा दत्त
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍भारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?
A) अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ✅✅
B) कंट्रोलर ऍड ऑडीटर जनरल ऑफ इंडिया
C) ऑडीटर जनरल ऑफ इंडिया
D) सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे?
A) विश्वास नांगरे पाटील
B) सतीश माथुर ✅✅
C) संजीव द्याल
D) प्रवीण दीक्षित
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍धळे-नागपूर -कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे?
A) AH-48
B) AH-45
C) AH-47
D) AH-46 ✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌भारताचा कॉर्पोरेट कर दरात कपात करत ____ एवढा केला, ज्यामुळे खासगी क्षेत्रासाठी अप्रत्यक्षपणे 1.45 लक्ष कोटी रुपयांचे भांडवल मिळणार.
(A) 24 टक्के
(B) 22 टक्के✅✅✅
(C) 26 टक्के
(D) 28 टक्के
📌कोणते राज्य सरकार सरकारी रुग्णालयात काम करणार्या डॉक्टरांच्या खासगी सरावावर बंदी घालणार आहे?
(A) आंध्रप्रदेश✅✅✅
(B) पंजाब
(C) महाराष्ट्र
(D) कर्नाटक
📌कोणत्या राज्यात NTPC भारतातले सर्वात मोठे सौर पार्क तयार करणार?
(A) तामिळनाडू
(B) कोलकाता
(C) राजस्थान
(D) गुजरात✅✅✅
📌खालीलपैकी कोणते विधान ‘INS खंदेरी’ बाबत अचूक नाही?
(A) INS ‘खंदेरी’ स्कॉर्पियन पाणबुडी मझगाव डॉक लिमिटेड (MDL) द्वारे तयार करण्यात आली आहे.
(B) INS ‘खंदेरी’ ही कलवरी श्रेणीतली डिझेल-इलेक्ट्रिक वर चालणारी लढाऊ पाणबुडी आहे
(C) पाणबुडी खंदेरीची संरचना अमेरिकेच्या नेवल ग्रुप या संस्थेने तयार केली आहे.
(D) पाणबुडी खंदेरीचे नाव हिंद महासागरात सापडणार्या घातक सॉफिश खंदेरी याच्या नावावरून ठेवले गेले आहे.
📌चीन आणि तैवान यांच्यातल्या तणावावरून तैवान आणि ___ या देशाने त्यांच्यातले राजनैतिक संबंध तोडले.
(A) किरीबाती✅✅✅
(B) फिलीपिन्
(C) जापान
(D) अफगाणिस्तान
📌कोणत्या मंत्रालयाने “नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी (NEAT) आर्टिफिश्यल इंटेलिजेंस (AI)” या नावाने योजना सादर केली?
(A) इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय✅✅✅
(C) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
📌 शतकऱ्यांना 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते ?
1) गोवा
2) तेलंगणा✅✅
3) गुजरात
4) पंजाब
📌 भारतातील पहिली करेन्सी प्रिंटिंग प्रेस ( टाकसाळ ) कोठे स्थापन करण्यात आली ?
1) मुंबई
2) कोलकाता
3) नाशिक✅✅
4) हैदराबाद
📌 महाराष्ट्रात सर्वात जास्त खेडी असणारा जिल्हा कोणता ?
1) पुणे ✅✅
2) सिंधुदुर्ग
3) अमरावती
4) सोलापूर
📌कोणत्या ठिकानांदरम्यान दक्षिण आशिया प्रदेशातली पहिली क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइन आहे?
(A) मोतिहारी आणि अमलेखगंज✅✅✅
(B) सबा आणि सारवाक
(C) हजीरा आणि विजयपूर
(D) ताशकंद आणि बिश्केक
📌कोणत्या सालापर्यंत पाय व मुखरोगांचे निर्मूलन करणे हे पाय व मुखरोग (FMD) यासाठीच्या ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’चे उद्दीष्ट आहे?
(A) 2025
(B) 2035
(C) 2030✅✅✅
(D) 2027
📌भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ____ यांनी संयुक्तपणे दक्षिण आशिया प्रदेशातल्या पहिल्या क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइनचे उद्घाटन केले.
(A) बांग्लादेशी पंतप्रधान शेख हसीना
(B) नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली✅✅✅
(C) चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
(D) म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष विन मिंट
📌कोणते राज्य सरकार भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (iWTC) याची स्थापना करणार आहे?
(A) दिल्ली
(B) राजस्थान
(C) महाराष्ट्र
(D) केरळ✅✅✅
📌“सावरकर: इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट, 1883-1924” पुस्तकाचे लेखक कोण आहेत? #books
(A) विक्रम संपथ✅✅✅
(B) श्री प्रह्लादसिंग पटेल
(C) रीना बॅरॉन
(D) व्यंकय्या नायडू
📌कोणत्या देशाच्या मंजुरीनंतर ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ ठराव आंतरराष्ट्रीय कायदा झाला आहे?
(A) बोलिव्हिया
(B) ब्रुनेई
(C) क्रोएशिया
(D) कंबोडिया
📌कोणत्या समूहाने भारतासह वस्तूंसंदर्भातल्या मुक्त व्यापार कराराचा (FTA) आढावा घेण्यास सहमती दर्शविली?
(A) जागतिक व्यापार संघटना
(B) ASEAN✅✅✅
(C) BRICS देश
(D) बांग्लादेश
डेली का डोज 23 नवम्बर 2020
1.केंद्र सरकार ने किस राज्य में सूक्ष्म सिंचाई परियोजनाओं के लिए 3,971 करोड़ रुपये के ऋण को मंजूरी दी?
a. बिहार
b. तमिलनाडु✔️
c. पंजाब
d. झारखंड
2.निम्न में से किस देश को 2023 में होने वाली G-20 देशों की बैठक की अध्यक्षता प्रदान की गयी है?
a. भारत✔️
b. नेपाल
c. पाकिस्तान
d. बांग्लादेश
3.अरब सागर में भारत, सिंगापुर एवं किस देश के बीच “सिटमैक्स-20” सैन्य अभ्यास के दूसरे संस्करण को शुरू किया गया है?
a. नेपाल
b. चीन
c. रूस
d. थाईलैंड✔️
4.अमेरिका के निर्वाचित राष्ट्रपति जो बाइडन ने अपनी पत्नी जिल बाइडन के लिए निम्न में से किस भारतीय मूल की महिला को नीति निदेशक नियुक्त किया है?
a. प्रमिला जयपाल
b. कमला हैरिस
c. माला अडिगा✔️
d. मेधा नार्वेकर
5.राष्ट्रीय कैडेट कोर (एनसीसी) ने 22 नवंबर को अपना कौन सा स्थापना दिवस मनाया है?
a. 50वां स्थापना दिवस
b. 72वां स्थापना दिवस✔️
c. 65वां स्थापना दिवस
d. 62वां स्थापना दिवस
6.अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आईसीसी) ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट में डेब्यू करने की उम्र क्या निर्धारित की है?
a. 15 साल✔️
b. 20 साल
c. 25 साल
d. 12 साल
7.विश्व दूरदर्शन दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 22 अगस्त
b. 10 मार्च
c. 21 नवंबर✔️
d. 15 अप्रैल
8.विश्व मत्स्य दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 21 नवंबर✔️
b. 15 मार्च
c. 10 अप्रैल
d. 12 जून
Latest post
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...
-
1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior) 1. Brave – Courageous (शूर) 2. Honest – Truthful (प्रामाणिक) 3. Happy – Joyful (आनंद...
-
601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे? 👉 अनक्रीप्शन 602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी ब...
-
◾️जायकवाडी : नाथसागर (छत्रपती संभाजीनगर) ◾️पानशेत : तानाजी सागर (पुणे) ◾️गोसिखुर्द : इंदिरा सागर (भंडारा) ◾️वरसगाव : वीर बाजी पासलकर (पुणे ज...