नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२१ नोव्हेंबर २०२०
अपंग व्यक्ति अधिकार कायदा - २०१६
🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻
*# कलम ३ (१)*
दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल.
*# कलम ४ (१)*
दिव्यांग स्त्रिया व मुले त्यांचे हक्क इतरांप्रमाणेच उपभोगतील हे सुनिश्चित करण्यासाठी शासन व स्थानिक प्राधिकरणे उपाययोजना करतील.
*# कलम ५ (१)*
दिव्यांग असलेल्या व्यक्तींना समाजामध्ये राहण्याचा अधिकार असेल. *(२)* कोणत्याही विशिष्ट निवासी व्यवस्थेत राहणे दिव्यांगांना बंधनकारक करता येणार नाही. वय, लिंग विचारात घेऊन राहण्याकरता अावश्यक असणारी वैयक्तिक मदत समाविष्ट आहे. यामध्ये प्रवेश दिला जाईल.
*# कलम ६ (१)*
सुयोग्य शासन अपंगत्व असलेल्या व्यक्तिंना अत्याचार, क्रूर, अमानुष किंवा अपमानास्पद वागणुकीपासुन संरक्षण देण्यासाठी योग्य उपाय योजना करील.
*# कलम ७ (४)*
कोणताही पोलीस अधिकारी ज्याकडे अपंग व्यक्तीशी गैरवर्तन, हिंसा, किंवा शोषण केले गेल्याची माहिती कळते त्याने पिडीत व्यक्तीस योग्य कायदेशीर मदत करावी. ज्यात मोफत कायदेशीर मदत मिळविण्याचा अधिकार असेल.
*# कलम ८*
अपंग असलेल्यांना धोका, सशस्त्र संघर्ष, मानवहितवादी आणीबाणी, नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत समान सुरक्षितता व संरक्षण मिळेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्ह्यातील अपंग व्यक्तींच्या तपशिलाची नोंद ठेवेल.
*# कलम ९*
अपंगत्वाच्या कारणांमुळे अपंग व्यक्तीस पालकांपासून वेगळे करता येणार नाही. पाल्याच्या सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने अावश्यक असल्यामुळे सक्षम न्यायालयाच्या आदेशानुसार असेल तर असे प्रकरण वगळून.
*# कलम १०*
अपंग व्यक्तिस पुनरुत्पादन करण्याचा अधिकार तसेच कुटूंब नियोजन माहिती मिळवण्याचा तसेच संमती शिवाय वैद्यकीय प्रक्रियेला सामोरे न जाण्याचा अधिकार असेल.
*# कलम ११*
अपंग व्यक्तीस निवडणूक आयोग मतदानामध्ये सुगम्यता / सुलभता प्रदान करेल.
*# कलम १२*
अपंग व्यक्तीस भेदभावाशिवाय न्यायालयीन किंवा इतर कोणत्याही पंचायतीमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार राहिल. उच्च आधाराची गरज असल्यास शासन योग्य त्या आधाराच्या योजना व्यवस्थित राबविण्यासाठी पावले उचलेल इत्यादी.
*# कलम १३*
अपंग व्यक्तीस इतरांप्रमाणे चल, अचल मालमत्तेवर मालकी किंवा वारसाने प्राप्त करण्याचे, आर्थिक मुद्द्यांना नियंत्रित करण्याचे, बँकेचे कर्ज घेण्याचे हक्क असतील. अपंग व्यक्तीला सहाय्य देणारी कोणतीही व्यक्ती अवास्तव प्रभावाचा वापर करणार नाही. स्वायत्तता, सन्मान व खाजगीपणाचा आदर करेल.
*# कलम १४*
अपंग व्यक्तिस पालकत्वासंबंधी अधिकार आहेत.
*# कलम १६*
अपंग व्यक्तीस शिक्षणात सोयी सुविधा मिळविण्याचे हक्क आहेत.
*# कलम १७*
अपंग व्यक्तीस मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती, शिक्षण संस्था इत्यादी विषयी तरतुदी आहेत.
*# कलम १९*
अपंग व्यक्तिच्या व्यावसायिक शिक्षण व स्वयंरोजगार विषयी तरतुदी आहेत.
*# कलम २०*
कोणतीही शासकीय आस्थापना अपंग कर्मचारी व्यक्तीशी भेदभाव करणार नाही. वाजवी सोयी आणि योग्य असे अडथळामुक्त व अनुकूल वातावरण निर्माण व उपलब्ध करून देईल. अपंगत्वाच्या आधारे बढती / पदोन्नती नाकारली जाणार नाही. सेवेच्या दरम्यान अपंगत्व आलेल्या व्यक्तीला बडतर्फ करणार नाही. सांभाळत असलेल्या पदासाठी कर्मचारी योग्य ठरत नसेल तर त्याला दुसर्या पदावर स्थानांतरीत केले जाऊ शकते. तसेच जर दुसर्या पदावर समाऊन घेणे शक्य नसेल तर त्याला दुसरे योग्य पद मिळेपर्यंत किंवा तो सेवानिवृत्तीच्या वयाला पोचत नाही तोवर त्याला एका सुपर न्युमरी / मानद पदावर ठेवले जाऊ शकते. सुयोग्य प्रशासन अपंग कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि स्थानांतराबद्दल धोरण आखेल.
*# कलम २२*
प्रत्येक आस्थापना अपंग कर्मचारी व्यक्तींच्या अभिलेखांची नोंद ठेवेल. प्रत्येक रोजगार केंद्र सुद्धा रोजगार शोधणार्या अपंग व्यक्तीच्या नोंदी ठेवतील.
*# कलम २३*
प्रत्येक शासकीय आस्थापना तक्रार निवारण अधिकार्यांची नेमणूक करेल. कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवल्यास दोन आठवड्याच्या आत चौकशी केली जाईल. पिडीत व्यक्ती केलेल्या कारवाईने समाधानी नसल्यास जिल्हास्तरीय अपंग समितीला संपर्क करु शकतो.
*# कलम २५*
अपंग व्यक्तीस प्राधान्यक्रमाने आरोग्य सेवा मिळविण्याचा अधिकार आहे.
*# कलम २९*
अपंग व्यक्तीस सांस्कृतिक जीवन आणि इतरांसह मनोरंजक उपक्रमात सहभागी होण्याचा हक्क आहे. अपंग कलाकार आणि लेखकांना त्याची आवड आणि गुणांचा पाठपुरावा करण्यासाठी सुविधा, सहाय्य आणि प्रायोजकत्व इत्यादी अधिकार.
*# कलम ३०*
अपंग व्यक्तीस क्रिडा विषयक सुविधा मिळविण्याचा हक्क आहे.
*# कलम ३४*
अपंग व्यक्तींना किमान ४% शासकीय आस्थापनेत आरक्षण असेल.
*# कलम ३५*
अपंग व्यक्तींना खाजगी क्षेत्रात किमान ५% आरक्षण असेल.
*# कलम ३७*
अपंग व्यक्तीस शेतजमीन आणि घर वाटपात ५% आरक्षण आणि अपंग महिलांना योग्य प्राधान्य.
*# कलम ३८*
लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्तिस उच्च सहाय्य.
*# कलम ४१*
अपंग व्यक्तीस सुगम्य वाहतुक सुविधा - बस थांबे, रेल्वे स्टेशन, विमान तळ इत्यादीवरील जागा, तिकिट काऊंटर, शौचालय इत्यादी अपंग व्यक्तीशी सुसंगत असावे.
*# कलम ७४* नुसार मुख्य आयुक्त तर *# कलम ७९* नुसार राज्य आयुक्त अपंगांना न्याय देण्यासाठी असतील.
*# कलम ८४* नुसार विषेश न्यायालय तर *# कलम ८५* नुसार विषेश सरकारी वकील अपंगांसाठी असतील.
*# कलम ८८*
शासन अपंग व्यक्तींसाठी राज्य निधीची तरतूद करेल.
*# कलम ८९*
नियमाचे उल्लंघन केल्यास ₹ १०,०००/- ते ₹ ५,००,०००/- पर्यंत दंडाची तरतुद.
*# कलम ९२*
जो कुणी अपंग व्यक्तीचा सार्वजनिक ठिकाणी अपमान करतो, धमकी देतो, मारहाण करतो, शक्ती वापरतो, अप्रतिष्ठा करतो, अपंग महिलेचा विनयभंग करतो, अपंग व्यक्तीवर ताबा व नियंत्रण मिळवतो, अन्न किंवा द्रव्य नाकारतो, लैंगिक शोषण करतो, कोणत्याही अंगाला किंवा ज्ञानेंद्रियाला स्वेच्छेने जखमी करतो, सहायक साधनांना क्षती पोहोचवतो किंवा तसा प्रयत्न किंवा हस्तक्षेप करतो, अपंगत्व असलेल्या महिलेवर तिच्या संमतीशिवाय वैद्यकीय प्रक्रिया निर्देशित करणे किंवा चालवणे, ज्यामध्ये गर्भाचा गर्भपात होतो किंवा होण्याची शक्यता असते (मात्र वैद्यकीय तज्ञांच्या व पालकाच्या व अपंग स्त्रीच्या संमतीने वैद्यकीय प्रक्रिया केली जाऊ शकते.) यासाठी ६ महिने ते ५ वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा तसेच दंडही होऊ शकतो.
*# कलम ९३*
जो कुणी अपंग हिताची माहिती, दस्तावेज, लेखा किंवा अन्य कागदपत्रे सादर करण्यास अपयशी ठरतो जे त्याचे कर्तव्य आहे. यातील प्रत्येक गुन्ह्याबाबतीत जास्तीत जास्त ₹ २५,०००/- पर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते आणि सातत्याने अपयश आल्यास किंवा नकार दिल्यास दंडाची शिक्षा दिलेल्या मुळ आदेशाच्या तारखेनंतर पुढील प्रत्येक दिवसासाठी ₹ १०००/- असेल.
*# कलम ९६*
या कायद्यातील तरतुदी इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या अतिरिक्त असतील, ना की त्यांचे महत्व कमी करणार्या.
२० नोव्हेंबर २०२०
कर्कवृत्त
❇️भारतातील 8 राज्यातून जाते
❇️खालील शहराजवळून जाते
🔳गांधीनगर:-गुजरात
🔳बनसवारा:-राजस्थान
🔳विदिशा:-मध्य प्रदेश
🔳अबिकापूर:-छत्तीसगड
🔳रांची:-झारखंड
🔳कष्णनगर:-पश्चिम बंगाल
🔳उदयपूर:-त्रिपुरा
🔳शियालसुक:-मिझोराम
महाराष्ट्रातील सात आश्चर्ये
जगात जशी सात आश्चर्ये आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात राज्यातील काही अद्भुत आणि सुंदर स्थळांना जून २०१३ रोजी आश्चर्यांचा दर्जा दिला आहे. जगभरातून साधारणपणे २२ लाख मतांच्या आधारे ही सात आश्चर्ये निवडण्यात आलेली आहेत. चला तर बघूया कोणती आहेत ती आश्चर्ये :
१) *विश्व विपश्यना पॅगोडा(स्तूप)* :
हा पॅगोडा जगातील सर्वात मोठा खांब-विरहित पॅगोडा आहे, जो मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला आहे. गौतम बुद्धांच्या स्मृतींची जपणूक करण्यासाठी हा पॅगोडा बांधण्यात आलेला आहे. या पॅगोडाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पती यांच्या हस्ते ८ फेब्रुवारी २००९ साली करण्यात आले. हा पॅगोडा शांती आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. दररोज येथे दीड ते दोन हजार पर्यटक भेट देत असतात. स्तूपाच्या कळसाची उंची २९ मी. असून भूकंपरोधक आहे. एकावेळी ८ ते १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था केली आहे.
२) *छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)* :
हे रेल्वे स्थानक व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त १८८७ मध्ये बांधले गेले आहे. मुंबई शहरातील ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक व मध्य रेल्वेचे मुख्यालय अशी याची ओळख आहे. सर्वात व्यस्त व गजबजलेले स्थानक अशीही याची ख्याती आहे. या स्थानकावर एकूण १८ फलाट आहेत. २००८ साली अतिरेक्यांनी याच स्थानकावर अतिरेकी हल्ला केला होता.
३) *अजिंठा लेणी* :
इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक या काळात या बौद्धलेण्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण २९ लेणी आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या वाघुर नदीच्या परिसरात ही लेणी अस्तित्वात आहेत. ही लेणी नदीपात्रापासून ४० ते १०० फुट उंचीवर डोंगररांगांमध्ये कोरलेली आहेत. या लेण्यांत गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्र तसेच बौद्ध तत्वज्ञान चित्रशिल्प रुपात तयार केले आहे.
४) *कास पठार* :
या पठारावर पावसाळ्यात असंख्य रानफुले फुलतात. या फुलांमध्ये अनेक दुर्मिळ प्रकारची फुले आढळून येतात. हे पठार विविध प्रकारची फुले आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराचे क्षेत्रफळ १० चौ.कि.मी. असून पठारावर २८० फुलांच्या जाती व वनस्पती, वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. रंगीबेरंगी फुले व फुलपाखरे पाहण्यासाठी पर्यटकांची येथे तुडुंब गर्दी असते.
५) *रायगड किल्ला* :
स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला म्हणजे रायगड होय. या डोंगरी किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ८२० मीटर आहे. या किल्ल्याला अजून १५ नावानी संबोधले जाते. गडाला १४३५ पायऱ्या आहेत. अवघड व दुर्गम भागातील भागातील हा गड एक पर्यटनस्थळ म्हणून नावाजलेला आहे. गडावर एकूण २५ हून अधिक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
६) *लोणार सरोवर* :
एका उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून हे सरोवर पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. या सरोवराचे पाणी अल्कधर्मी आहे. सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार सरोवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या परिसारत बाराशे वर्षांपूर्वीची १५ मंदिरे अस्तित्वात आहेत. या सरोवराचे क्षेत्रफळ १.१३ चौ.कि.मी. इतके असून सरासरी खोली १३७ मीटर आहे. अमेरिकेतील अनेक संस्थांनी येथे येऊन संशोधन केलेले आहे.
७) *दौलताबादचा किल्ला* :
हा गड यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे. देवगिरी किल्ल्याला २८ नोव्हेंबर १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मेंढातोफ होय. या तोफेत एकाच माऱ्यात पूर्ण गड उध्वस्त करण्याची क्षमता होती. ती तोफ पंचधातूंपासून बनवलेली आहे. प्राचीन काळातील गड म्हणून हा गड प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावाजला गेला आहे. या गडावर लोक भरपूर प्रमाणात भेट देतात.
नागरिकत्व: काय आहे नेहरू-लियाकत करार?
- मंजूर होण्यापूर्वी नेहरू-लियाकत कराराचा अनेक नेत्यांनी दाखलाGदिला. भारत आणि पाकिस्तान या दोन देशाच्या प्रमुखांमध्ये सहा दिवस चाललेल्या चर्चेनंतर ८ एप्रिल १९५० रोजी दिल्ली करार झाला, ज्याला दिल्ली पॅक्ट असंही बोललं जातं.
- नेहरू-लियाकत नावाने प्रसिद्ध असलेला हा करार उभय देशांमधील अल्पसंख्यांकांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं. याशिवाय दोन्ही देशातील युद्ध टाळणं हाही या कराराचा महत्त्वाचा उद्देश होता.
-१९४७ च्या फाळणीनंतरचा रक्तरंजित इतिहास सर्वांना परिचित आहे. दोन्हीही बाजूंना दंगली उसळल्या, ज्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला, हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आला, अल्पवयीन मुलींचं अपहरण झालं आणि त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. या संघर्षामुळे दोन्ही देशातील अल्पसंख्यांक असुरक्षित होते.
- डिसेंबर १९४९ मध्ये भारत-पाकिस्तानमधील व्यापारिक संबंधही बंद झाले. जीव वाचवण्यासाठी अल्पसंख्यांक घर-दार सर्व काही सोडून निघून गेले. लाखोंच्या संख्येने हिंदू-मुस्लिमांचं स्थलांतर झालं.
- स्वतःचा देश सोडून जे लोक कुठेही गेले नाही, त्यांना संशयास्पद नजरेने पाहिलं जाऊ लागलं.
ब्रिटिश काळातील शिक्षण विषयक समिती आणि आयोग
1.जेम्स थॉमसन शिक्षण व्यवस्था-1843-53
2.मेकॉले समिती-1853
3.वुडचा खलिता-1854
4.हंटर समिती-1882-83
5.थॉमस रॅले-1904 यांच्या शिफारशीने भारतीय विद्यापीठ कायदा 1904
6.सॅडलर समिती-1917-18
7.हारटोग समिती-1929
8.वर्धा योजना/मौलिक व आधारभूत शिक्षण-1937
9.सार्जंट योजना-1944
10.राधाकृष्ण आयोग-1948
Trick :
शिक्षणासाठी=( थॉमसन,मेकॉले,वुडला )-हंटर ने मारल्याने ते रडले(रॅले),सॅड झाले,हर्ट झाल्याने -वर्ध्यास अर्जंट(सार्जंट) राधाकृष्ण यांच्याकडे गेले.
मराठी म्हणी
1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे
2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे
4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा
7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे
10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही
11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा
12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे
13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर
15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो
17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी
22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते
21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती
23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे
24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण
25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे
26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे
28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
29. पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे
30. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये
31. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे
32. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही
33. कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
34. गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
35. घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे
36. डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे
37. भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे
38. वरातीमागून घोडे – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे
39. पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?
40. खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
41. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे
42. नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी
43. हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
44. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे
45. गर्जेल तो पडेल काय? – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही
46. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्टाशिवाय यश मिळत नाही
47. वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे
48. कुंपणानेच शेत खाणे – रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे
49. दगडावरची रेघ- कायमची गोष्ट
कोकण खाडी
कोकणातल्या सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये उगम पावण्या पश्चिमे सखल जीवनयात्रा अरबी समुद्रास रहेका। संपूर्ण पाणी पाणी नदीच्या उतारात भागास “खादी” असे म्हणतात. कोकणचा किनारा अनेक खडके बनलेला आहे.
..
१) डहानुची खाडी, जि. राहतात
२) दातीवाडी खादी, जि. राहतात
३) वसईची खाडी, जि. राहतात
४) धरमतरची खाडी, जि. मत दिले
५) रोह खादी, जि. मत दिले
६) राजपुरी खाडी, जि. रत्नागिरी
७) बाणकोट्टीची खाडी, जि. रत्नागिरी
८) दाझलची खाडी, जि. रत्नागिरी
९) जय, जि. रत्नागिरी
१०) विजयदुर्ग, जि. सिंधुदूर्ग
११) तेरेखोलची खाडी, सिंधुदूर्ग
१८ नोव्हेंबर २०२०
प्रश्नसंच
1. कोणत्या राज्याला 28 ऑगस्ट 2018 पासून आणखी सहा महिन्यासाठी "अशांत शेत्र" म्हणून घोषित करण्यात आले आहे?
A) बिहार
B) आसाम 💬
C) अरुणाचल प्रदेश
D) सिक्किम
2. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना 27 टक्के आरक्षण देताना कोणत्या सालच्या जनगणनेचा आधार घेण्यात आला होता?
A) 1931💬
B) 1971
C) 1951
D) 1961
3. यावर्षीचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार कोणास देण्यात आला आहे?
A) फ्रान्सिस दिब्रिटो
B) रामकृष्ण महाराज लहवितकर
C) किसन महाराज साखरे💬
D) रामकृष्ण महाराज बोधले
4. जगात सर्वाधिक इंटरनेट ग्राहकांच्या बाबतीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
A) चीन 💬
B) ब्राझील
C) भारत
D) अमेरिका
5. BIMSTEC या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
A) 1991
B) 1996
C) 1997💬
D) 1998
6. कोणता देश 29व्या " अबू धाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक " मेळाव्याचा (ADIBF) " सन्माननीय पाहुणा " आहे?
A) बांग्लादेश
B) इराण
C) भारत 💬
D) पाकिस्तान
7. कोणत्या भारतीयास UN च्या सहाय्यक महासचिव तसेच संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) न्यूयॉर्क येथील कार्यालयाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केले गेले आहे?
A) सत्या त्रिपाठी💬
B) प्रज्ञा झा
C) शशी थरूर
D) यापैकी नाही
8. भारतातील किती राज्यांमध्ये सध्या विधानपरिषद अस्तित्वात आहे?
A) पाच
B) सहा
C) सात💬
D) आठ
9. कोणत्या हवाई वाहतूक कंपनीने नुकताच जैवइंधनावर विमान वाहतुकीचा प्रयोग यशस्वी केला आहे?
A) इंडिगो
B) स्पाइस जेट 💬
C) एअर इंडिया
D) गो एअर
10. "अटल जी ने कहा" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A) नरेंद्र मोदी
B) ब्रिजेंद्रा रेही 💬
C) व्ही एस नाईक
D) सत्येन्द्र अगरवाल
11. चर्चेत असलेली नाओमी ओसाका ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाची आहे?
A) जपान 💬
B) अमेरिका
C) इंग्लंड
D) सर्बिया
12. "अभयम-181" या नावाचे मोबाईल अॅप हे महिलांना सुरक्षा देण्याच्या हेतूने कोणत्या राज्य सरकारने लॉंच केले आहे?
A) गुजरात💬
B) महाराष्ट्र
C) मध्य प्रदेश
D) तामिळनाडू
13. कम्युनिशंस कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी एग्रीमेंट
(COMCASA) हा करार खालील कोणत्या दोन देशात झाला?
A) भारत - फ्रान्स
B) भारत - जपान
C) जपान - अमेरिका
D) भारत - अमेरिका💬
14. रंजन गोगोई हे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश असून ते सर्वोच्च न्यायालयाचे कितवी सरन्यायाधीश आहे?
A) 44
B) 45
C) 46💬
D) 47
15. खालीलपैकी कोणत्या देशाने ' NOPE ' या मंगळ मोहिमेची घोषणा केली आहे?
A) इस्राईल
B) यूएई 💬
C) सौदी अरेबिया
D) इराण
16. नुकताच निवृत्त झालेला क्रिकेटपटू ऍलिस्टर कुक हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
A) दक्षिण आफ्रिका
B) ऑस्ट्रेलिया
C) वेस्ट इंडिज
D) इंग्लंड💬
17. भारतात प्रथमच भरविण्यात आलेल्या 'FIBA 3×3 world tour master' ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A) बास्केटबॉल 💬
B) बॉक्सिंग
C) ब्रिज
D) बॅटमिंटन
18. भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये कोणत्या संघाला नमवत ब्राँझ पदक मिळविले?
A) जपान
B) दक्षिण कोरिया
C) पाकिस्तान💬
D) फिलिपिन्स
19. "Moving on, moving forward : A year in office" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A) व्यंकय्या नायडू 💬
B) रामनाथ कोविंद
C) सुमित्रा महाजन
D) अरुण जेटली
20. नुकतेच निधन झालेले आर्थर परेरा हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?
A) बुद्धिबळ
B) बॅटमिंटन
C) फुटबॉल💬
D) टेनिस
21. राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत देण्यात येणारा 2016- 17 चा " तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम " या पुरस्कारात प्रथम क्रमांक कोणत्या ग्रामपंचायतीस मिळाला?
A) शेळगाव गौरी
B) मन्याचीवाडी
C) हिवरे बाजार 💬
D) खाटाव
22. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी कोणास देण्यात आला?
A) विजय भटकर
B) गिरीश प्रभुणे
C)सुहास बहुळकर 💬
D) यापैकी नाही
23. दुसरी "जागतिक हिंदू परिषद" कुठे पार पडली?
A) नवी दिल्ली
B) लंडन
C) शिकागो 💬
D) न्यूयॉर्क
1. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित न्हवती
ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती.
क) ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या
ड) ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे.
1.अ आणि ब
2. ब आणि क
3. अ आणि ड✅
4 वरील सर्व
2.खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही
1. भारतीय प्रशासकीय सेवा
2. भारतीय पोलीस सेवा
3. भारतीय विदेश सेवा✅
4. भारतीय वन सेवा
3.घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?
1. सिमला परिषद
2. कॅबिनेट मशीन✅
3. क्रिप्स योजना
4.यापैकी नाही
4.राज्यपालांची नेमणूक कोण करतात?
1. पंतप्रधान
2. मुख्यमंत्री
3. राष्ट्रपती✅
4. उपराष्ट्रपती
5.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
1.लोकसभेपेक्षा राज्यसभेला व्यापक अधिकार आहेत
2.राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत✅
3. राज्यसभेचा कालावधी 6 वर्ष असतो
4. लोकसभा हे स्थायी सभागृह आहे.
6.राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?
1. राष्ट्रपती
2. पंतप्रधान
3 उपराष्ट्रपती✅
4. गृहमंत्री
7.भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे ......
1. कल्याणकारी राज्याची निर्मिती✅
2. समाजवादी व निधर्मी समाज रचना
3. व्यक्तीस्वातंत्र्याची हमी
4. मूलभूत हक्कांना बाधा पोहोचविण्यास प्रतिरोध
8.भारतीय राज्यघटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे?
1. भारतीय नियोजन आयोग
2. भारतीय निवडणूक आयोग
3. संघ लोकसेवा आयोग
4. भारतीय वित्त आयोग✅
9.वन हा विषय कोणत्या सुचितील आहे?
1. केंद्र
2. राज्य✅
3. समवर्ती
4. यापैकी सर्व
10.वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकाला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास ....
1. अंदाजपत्रक दुरुस्त करून फेरसादर केले जाते
2. राज्यसभेचा अभिप्राय घेण्याकरिता पाठविले जाते
3. राष्ट्रपतींचे अभिप्रायासाठी पाठविले जाते
4. पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.
प्रश्न 1 मातृत्व वंदना योजना महाराष्ट्रात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकचा ठरला आहे?
A कोल्हापूर
B सातारा
C पुणे
D नाशिक
उत्तर 2
प्रश्न 2 इम्रान खान हे पाकिस्तान या देशाचे 22 वे पंतप्रधान ठरले आहेत त्यांनी जो पक्ष स्थापन केला होता तेहरिक-ए-इन्साफ याची स्थापना पुढील पैकी केव्हा करण्यात आली होती?
A 14 ऑगस्ट 1993
B 16 जुलै 1996
C 22 एप्रिल 1996
D 16 ऑक्टोबर 1998
उत्तर C
प्रश्न 3 पुढील विधाने अभ्यासा?
अ इस्रोने 23 नोवेंबर 2018 रोजी तीस उपग्रह अवकाशात सोडले
ब 30 पैकी पंचवीस उपग्रह हे अमेरिकेचे आहेत
क या मोहिमेत भारतासह एकूण दहा देश सहभागी आहेत
वरीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहे
1 फक्त अ
2 ब आणि क
3 फक्त क
4 अ आणि ब
उत्तर 4
प्र 4 इसरो ने जे 30 उपग्रह सोडले त्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही?
1 अमेरिका
2 जपान
3 स्पेन
4 नेदरलँड
उत्तर 2
प्र 5 हाइपर सपेक्ट्रल इमेजिंग सॅटॅलाइट हा उपग्रह कोणत्या कोणत्या देशाने विकसित केला आहे?
1 फ्रांस
2 रशिया
3 भारत
4 चीन
उत्तर 3
प्र 6 इंडियन पोस्टल पेमेंट बँक ची सुरुवात प्रायोगिक तत्वावर खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आली होती?
1 पुणे
2 रांची
3 अलाहाबाद
4 लखनऊ
उत्तर 2
प्र 7 पुढील पैकी कोणती बँक ही ग्राहकांना क्रेडिट कार्ड सेवा पुरवत नाही?
1 बंधन बँक
2 देना बँक
3 महाराष्ट्र ग्रामीण बँक
4 पोस्टल पेमेंट बँक
उत्तर 4
8 वारसा यादीत पुढिलपैकी कोणत्या रेल्वेचा समावेश होत नाही?
1 निलगिरी
2 दार्जिलिंग
3 पठाणकोट
4 कलका
उत्तर 3
प्र 9 नुकतेच भारतीय रेल्वे ने कोणत्या देशाच्या रेल्वे सोबत करारावर हस्ताक्षर केले?
1 चीन
2 रशिया
3 नेपाळ
4 म्यानमार
उत्तर 3
प्र 10 महाराष्ट्रत पहिला समलिंगी विवाह कोठे पार पडला?
1 नाशिक
2 नागपूर
3 यवतमाळ
4 पुणे
उत्तर 3
१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?
१)विजयालक्ष्मी पंडित
२)हंसाबेन मेहता✅✅✅
३)सरोजिनी नायडू
4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही
२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?
१)२६जानेवारी१९५०
२)२६जानेवारी१९४९
३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅
५)२६नोव्हेंबर १९५०
३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?
१)डॉ बाबासाहेब आंबेडकर
२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅
३)पंडित नेहरू
४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते
४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?
१)दक्षिण आफ्रिका
२)अमेरिका
३)आयर्लंड ✅✅✅
४)वरीलपैकी एकही नाही
५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे?
१)सहावा
२)नववा✅✅✅
३) पाचवा
४)वरीलपैकी नाही
६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?
१)कलम ५१ब
२)कलम५१अ✅✅✅
३)कलम ५१क
४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही
७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?
१)उच्च न्यायालय
२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅
३)जिल्हा न्यायालय
४)कुटुंब न्यायालय
८.खालील पैकी संसद बरोबर काय?
१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा
२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल
३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅
४)मुळात अस काही नसतं
९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?
१)९
२)१०✅✅✅
३)११
४)यापैकी नाही
१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?
१)१०९✅✅✅
२)१०८
३)१०७
४)१०६
११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात?
१)सवरक्षण मंत्री
२)गृहमंत्री
३)पंतप्रधान
४)राष्ट्रपती✅✅✅
१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?
१)हे विधान असत्य आहे
२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार (राष्ट्रपती काढता)
३)वरीलपैकी दोन्ही बरोबर
४)वरीलपैकी दोन्ही चूक
१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?
१)राष्ट्रपती
२)उपराष्ट्रपती
३)राज्यपाल✅✅✅
४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?
१)१४७
२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे
३)१४९
४)१५१
१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?
1.केंद्र सूची
2.राज्य सूची
3.समवर्ती सूची
१)५२,६१,१००
२)१००,६१,५२✅✅✅
३)६१,५२,१००
४)५२,१००,६१
१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.
हे विधान चूक की बरोबर
१)चूक
२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
३)काही अंशी चूक
४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध नाही
१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?
१)राज्यपाल
२)राष्ट्रपती
३)पंतप्रधान✅✅✅
४)उपराष्ट्रपती
१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
१)धर्मनिरपेक्ष
२) गणराज्य
३)समाजवादी
४)साम्यवादी✅✅✅
१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?
१)सर्वोच्च न्यायालय
२)राष्ट्रपती
३)भारतीय जनता
४)कायदेमंडळ✅✅✅
२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
१)६२
२)६१✅✅✅
३)७१
४)८९
डॉ एे पी जे अब्दुल कलाम
◾️जन्म : 15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर येथे.
◾️अबुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम
◾️ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते.
◾️कार्यकाळ
25 जुलै 2002 – 25 जुलै 2007
◾️
◾️तयांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले
◾️1963 मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेतला
◾️इदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला
◾️अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले.
◾️सरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
◾️भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला
◾️कलाम हे राष्ट्रपती भवनवर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते
🚀 1985 : त्रिशूल,
🚀1988 : पृथ्वी,
🚀1989 : अग्नी,
🚀1990 : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
◾️5 अग्नी बाणांमुळे त्यांना मिसाईल मँन म्हणतात
◾️ सप्टेंबर 2015 : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
◾️ए.पी.जे. अब्दुल कलाम 27 जुलै 2015 रोजी कलाम शिलॉंग येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे "पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे" या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले.
◾️तथेच त्यांचे निधन झाले
◾️अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना.
🔰कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी यासंबंधी आदेश दिला आहे.
🔰मराठा विकास प्राधिकरणासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
🔰तसेच कर्नाटक राज्यात तसंच खासकरुन सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
🔰तर अधिकृत आदेशानुसार, गेल्या कित्येक दशकांपासून कर्नाटक राज्यात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
🔰मराठा विकास प्राधिकरणाचं मुख्य लक्ष्य समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाकडे असणार आहे.
आरसेप व्यापार करारावर 15 प्रमुख देशांच्या स्वाक्षऱ्या .
🅾️‘आरसेप’ म्हणजे प्रादेशिक सर्वंकष इकॉनॉमिक पार्टनरशिप) करारावर आशिया—पॅसिफिकमधील चीनसह पंधरा प्रमुख देशांनी स्वाक्षरी केली आहे.तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार मानला जात आहे.
🅾️‘आसियान’ (‘असोसिएशन ऑफ साउथ इस्ट एशियन नेशन्स’) देशांच्या वार्षिक परिषदेच्यावेळी रविवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
🅾️करोनामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी या देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून भारत व अमेरिका मात्र त्यापासून दूर राहिले आहेत.
🅾️जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नात या देशांचा वाटा 30 टक्के आहे. 2012 मध्ये आरसेप कराराची संकल्पना मांडली गेली होती. या करारावर आग्नेय आशिया शिखर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यामुळे करोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थांना सावरण्याची संधी मिळणार आहे.
राज्यपालांना विधान परिषद नामनिर्देशित सदस्यांची नावे फेटाळण्याचा अधिकार आहे का ?
👉घटनात्मक तरतुद :- कलम 171( 3, 5 ) कलमानुसार राज्यपालास विधान परिषदेत साहित्य, विज्ञान, कला सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रातील विशेषज्ञान असलेल्या व्यक्तींना नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे.
अर्थातच या नेमणुका नेहमीच वादग्रस्त ठरतात व यातून सरकार व राज्यपाल असा नवावाद उद्भवतो. केंद्र आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाची सरकारे असतील तर हा वाद अधिक तीव्रपणे दिसून येतो.सध्या अशीच परिस्थिती महाराष्ट्रात दिसून येत आहे.
♦️ इतर घटनात्मक मुद्दे व पेचप्रसंग.
📌कलम 167 नुसार मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या प्रशासकीय व कायदेशीर बाबी संबंधी माहिती मागविणे हा राज्यपालांचा घटनात्मक
स्वेचछाधिन अधिकार आहे. याच कलमांतर्गत नामनिर्देशित सदस्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागण्याचा अधिकार राज्यपालांना मिळतो.परंतु नामनिर्देशित सदस्यांच्या नावांना मंजुरी देणे हा राज्यपालांचा स्वेचछाधिन अधिकार आहे का/नाही याबाबत स्पष्टपणे तरतुद आढळत नाही.
👉 आरंभी उच्च न्यायालयांचे सुद्धा याबाबत एकमत नव्हते.
📌163(1) कलमानुसार घटनात्मक
स्वेचछाधिन अधिकार वगळता राज्यपालांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्री परिषदेची तरतूद आढळते. परंतु हा सल्ला राष्ट्रपती प्रमाणे राज्यपालांवरती बंधनकारक नाही. याआधारे राज्यपाल नावांची यादी फेटाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.(रामनाईक यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव सरकारने दिलेली यादी नामंजूर केली होती)
♦️राज्यपाल काय आक्षेप घेतील ?
📌शिफारस केलेल्या यादीतील काही ठराविक नावे वगळली तर इतर नावांना राजकीय पार्श्वभूमी आहे.
📌अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय:-
एखाद्या व्यक्तीने राजकारणात तसेच प्रशासनात दीर्घकाळ भाग घेतला असेल तर तिला समाजसेवेचा व्यावहारिक अनुभव आहे असे गृहीत धरता येईल.
(याच व इतर निर्णयांच्या आधारे राज्यपालांचा आक्षेप न्यायालयीन लढाईमध्ये खोडून काढला जाईल )
📌 1974 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की राज्यपालाचे स्वेचछाधिन अधिकार वगळता त्याला आपली कार्य पार पाडताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वागावे लागेल. (या आधारे राज्यपालांना शिफारस केलेल्या नामनिर्देशीत सदस्यांची यादी नामंजूर करता येणार नाही).
♦️तात्पर्य :- वरील सर्व चर्चेवरून असे दिसते की घटनात्मकदृष्ट्या सरकारने दिलेली नामनिर्देशित सदस्यांची यादी मंजूर करणे राज्यपालांवर बंधनकारक आहे की नाही हा मुद्धा विवादास्पद आहे परंतु नावांची शिफारस घटनात्मक तरतुदींना अनुसरून नसेल तर राज्यपाल अशी यादी नामंजूर करू शकतात हे मात्र फिक्स.
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:
1) कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
2) पुणे प.महाराष्ट्र
(57268 चौ.किमी) : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
3) नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी):
नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
4) औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
5) अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
6) नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
अरुणाचल प्रदेशात सर्वोत्तम स्त्री-पुरुष प्रमाण आहे:
🔰 एक अहवाल
‘व्हाईटल स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया बेस्ड ऑन द सिविल रजिस्ट्रेशन सिस्टम’ अहवालात दिलेल्या आकडेवारीमधून असे दिसून आले आहे की, अरुणाचल प्रदेशात सर्वोत्तम स्त्री-पुरुष प्रमाणाची नोंद झाली आहे.
🔴ठळक बाबी....
🔰अरुणाचल प्रदेशात दर एक हजार पुरुषांमागे 1084 महिला असल्याची नोंद झाली असून त्याच्यापाठोपाठ नागालँड (965), मिझोरम (964), केरळ (963) आणि कर्नाटक (957) असा राज्यांचा क्रम लागतो आहे.
🔰मणीपूर राज्यात अत्यंत वाईट स्त्री-पुरुष प्रमाणाची नोंद झाली आहे. मणीपूरमध्ये दर एक हजार पुरुषांमागे 757 महिला असल्याची नोंद झाली असून त्याच्यावरती लक्षद्वीप (839), दमण व दीव (877), पंजाब (896) आणि गुजरात (896) ही राज्ये आहेत.
🔰राजधानी दिल्लीत स्त्री-पुरुष प्रमाण दर एक हजार पुरुषांमागे 929 एवढे आहे. जम्मू व काश्मीरमध्ये हे प्रमाण 952 एवढे आहे.
🔰2018 साली जन्म नोंदणीचा दर 89.3 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो 2009 साली 81.3 टक्के होता.सरासरी, जन्म किंवा मृत्यूच्या नोंदणीसाठी विहित कालावधी 21 दिवसांचा आहे.
अरबी समुद्रात मलबार नौदल कवायती सुरू.
🛳 भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपान यांच्या नौदलांनी मंगळवारी उत्तर अरबी समुद्रात मलबार नौदल कवायती सुरू केल्या.
🛳 यात दोन विमानवाहू जहाजांसह अनेक आघाडीची लढाऊ जहाजे, पाणबुडय़ा आणि सागरी टेहळणी विमाने सहभागी झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
🛳 चार दिवसांच्या या कवायतीचे प्रमुख आकर्षण भारतीय नौदलाच्या विक्रमादित्य कॅरियर बॅटल ग्रुप आणि अमेरिकी नौदलाच्या निमित्झ स्ट्राईक ग्रुप यांचा सहभाग आहे.
🛳 यएसएस निमित्झ हे जगातील सर्वात मोठे लढाऊ जहाज आहे.
🛳 मलबार कवायतींचा पहिला टप्पा ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात पार पडला. त्यात पाणबुडीरोधक आणि हवाई युद्धरोधक मोहिमांसह अनेक गुंतागुंतीच्या कवायती करण्यात आल्या.
🛳 ऑस्ट्रेलियन नौदलाने त्यांच्या एचएमएएस बलार्ट हे अंकाझ श्रेणीचे लढाऊ जहाज तैनात केले असून, जपानी नौदलाने त्यांची आघाडीची विनाशिका जेएस मुरासामे या कवायतींसाठी पाठवली आहे.
🛳 भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये सीमेवर सहा महिन्यांपासून तणाव असतानाच्या काळातच ही मोठी कवायत होत आहे.
🛳 ‘क्वाड’ आघाडीचे भाग असलेल्या ४ देशांच्या नौदलांमध्ये गुंतागुंतीच्या मोहिमा समन्वयाने पार पाडणे हा त्यांचा उद्देश आहे.
१७ नोव्हेंबर २०२०
१६ नोव्हेंबर २०२०
१५ नोव्हेंबर २०२०
नागझिरा अभयारण्य
▪️निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणून नागझिराच्या औचित्यपूर्ण गौरव केला जातो. जंगलात एक तळ असावं, तळ्याकाठी आज्ञाधारक रक्षाकाप्रमाणे उभे असणारे सरळ बुन्ध्यचे वृक्ष असावे, त्या वृक्षाचा प्रतिबिंब तळ्यात पडलेलं असावं. तळाच्या काठानें जाणारी वाट असावी, आजूबाजूला डोंगररांगा असाव्या, असे सारे कल्पनेत वाटणारे, प्रत्यक्ष पाहण्यासाठी नागझीरालाच जावे. रानात राहून या सर्व सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी या अभयारण्यात आधुनिक दर्जाची निवासगृहे पर्यटकांच्या सेवेसाठी हजर आहेत.
▪️गोंदिया जिल्ह्यातील हे अभयारण्य पानझडी वृक्षाचे आहे.
✓तब्बल १५३ चौ.कि. मी. इतक्या मोठया क्षेत्रात पसरलेल्या या परिसरावर निसर्गाने आपले सगळे रंग मुक्तहस्ते उधळले आहेत.
✓या अभयारण्यात साग, अंजान, धावडा, ऐन, तिवस, सप्तवर्णी यांचे उंच वृक्ष आढळतात. शिवाय मोहफुले, चार, आवळा, बेहडा, तेंभूर्णी इ. फळझाडेही बघावयास मिळतात. अंगाचा ताठा कायम ठेवून आकाशाला भिडणारी बांबूची बेटे देखील नजरेस भुरळ पाडून जातात.
▪️वन्य प्राण्यांच्या अस्तित्वामुळे या अभयारण्याचे अरण्यपण अधिकच गडद होताना दिसते.
✓वाघ, बिबटे, रानगवे, चितळ, सांभर, नीलगाय, अस्वल इ. प्राणी इथे मुक्तपणे संचार करतात. येथील वनविभाग येणा-या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नेहमीच तत्पर असतो. वनविभागाच्या वतीने जवळच्या पिटेझारी व चोर ख्म्बारा गावातील तरुणांना गाईड साठीचे प्रशिक्षण दिले गेले आहे.
✓आग टेहळणी बुरुजावरून लांबवर पसरलेल्या या अभयारण्याचे विहंगम अवलोकन करताना त्याचा विशालतेची व विशेषतेची खात्री पटते.
✓ शिवाय टायगर पॉईंट, बंदर चूवा पॉईंट, वाकडा वेहाडा, हत्ती खोदारा रोड अशी विविध ठिकाणी निसर्गाची निरनिराळी रूपे पहावयास मिळतात.
✓हे सारे निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवताना अक्षरशः कसरत करावी लागते. म्हणूनच महाराष्ट्रातील या वैविध्यतेने नटलेल्या अभयारण्याची वाट पुनःपुन्हा येण्यासाठी खुणावत राहते.
बारा ज्योतिर्लिंगे
१) सोमनाथ -
सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.
२) मल्लिकार्जुन -
गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकिरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
३) महाकाळेश्वर -
उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. शिवशंभोचे 'महाकाल'रूप आहे.
४) अमलेश्वर -
ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.
५) वैद्यनाथ -
शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.
६) भीमाशंकर -
भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात.
७) रामेश्वर -
दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.
८) नागेश्वर -
श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.
९) काशीविश्वेश्वर -
वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप आहे.
१०) केदारेश्वर -
हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.
११) घृष्णेश्वर -
(घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.
१२) त्र्यंबकेश्वर -
नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले. जप मंत्र - ओम त्र्यंबकम यजामहे ,सुगन्धिम पुष्टी वर्धनम। ऊर्वारुकमीव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात।।
महाराष्ट्रातील लघुउद्योग
1. गाव - लघुउद्योग
2. सोलापूर - चादरी
3. नागपूर - सूती व रेशमी साड्या
4. येवले (नाशिक) - पीतांबर व पैठण्या
5. इचलकरंजी - साड्या व लुगडी
6. अहमदनगर - सुती व रेशमी साड्या
7. भिवंडी - हातमाग उद्योग
8. एकोडी (भंडारा) - कोशा रेशीम
9. सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - लाकडी खेळणी
10. पैठण (औरंगाबाद) - पैठण्या व हिमरूशाली
11. साबळी व नागभीड (चंद्रपूर) - रेशिम कापड
12.वसई(ठाणे) - सुकेळी
13. मालेगाव (नाशिक), इंचलकरंजी (कोल्हापूर) -हातमाग उद्योग
14. गोंदिया, सिन्नर, कामठी - बीडया तयार करणे
-------------------------------------------
महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण
विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान
👉 मबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई
👉पणे विद्यापीठ (१९४९) - पुणे
👉राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (१९२५)- नागपूर
👉कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (१९८३)- अमरावती
👉 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (१९५८)- औरंगाबाद
👉शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर
👉यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक (१९८८)
👉 नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक
👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (१९८९)- लोणेरे (रायगड)
👉उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव
👉कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (१९९८)- रामटेक (नागपूर)
👉सवामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड
👉 महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान
विद्यापीठ (२०००) - नागपुर
दामोदर नदी :
बिहार आणि प. बंगाल राज्यांतील खनिजसमृद्ध प्रदेशातून वाहणारी गंगेची उपनदी. लांबी सु. ६२५ किमी. जलवाहनक्षेत्र २०,७०० चौ.किमी. ही छोटा नागपूर पठारातील रांची पठारावर पालामाऊ जिल्ह्याच्या तोरी परगण्यात रांचीपासून ५६ किमी., रांची–लोहारडागा रस्त्यावरील कुरू गावाच्या पूर्व ईशान्येस १६ किमी. वर, समुद्रसपाटीपासून सु. ६१० मी. उंचीवर उगम पावते. तिचा दुसरा उगमप्रवाह हजारीबाग जिल्ह्यातील तोरी–समारिया रस्त्यावरील बालुमाथ गावाच्या दक्षिणेस सु. ३ किमी. वरून निघून पहिल्या मुख्य प्रवाहाला सु. २० किमी. वर मिळतो. सुरुवातीला दामोदर सु. ४२ किमी. डोंगराळ भागातून वाहते. नंतर ती पठारावरील विभंगद्रोणीतून करणपुरा व रामगढ कोळसाक्षेत्रांतून सु. ७५ किमी. पूर्वेकडे गेल्यावर ईशान्येस सु. २३ किमी. जाते व पुन्हा सामान्यतः पूर्वेकडे वाहू लागते. बोकारो कोळसाक्षेत्रातून आलेली गोमिया व उत्तरेकडून आलेली कोनार यांचा संयुक्त प्रवाह तिला गोमिया व बेर्मो यांदरम्यान मिळतो. जमुनिया व इतरही अनेक प्रवाह तिला दोन्ही बाजूंनी येऊन मिळतात. धनबाद जिल्ह्यातील झरिया कोळसाक्षेत्रातून गेल्यावर राणीगंज कोळसाक्षेत्राच्या पश्चिम भागात तिला तिची उत्तरेकडील सर्वांत महत्त्वाची व मोठी उपनदी बराकर मिळते. येथून ती आग्नेय वाहिनी होऊन प. बंगाल राज्यात शिरते. येथून ती नौसुलबही होते. बरद्वानजवळून गेल्यावर सु. २० किमी. वर ती एकदम दक्षिण वाहिनी होते. नंतर बरद्वान व हुगळी जिल्ह्यांतून जाऊन ती कलकत्त्याच्या नैर्ऋत्येस ५६ किमी. वरील फाल्टा येथे हुगळी या गंगेच्या फाट्यास मिळते.
सुरुवातीच्या सु. २०० किमी. भागात नदीप्रवाहाचा उतार दर किमी.ला १·९ मी., नंतरच्या सु. १६० किमी. भागात दर किमी.ला ०·५७ मी. व अखेरच्या सु. १५० किमी. भागात तो दर किमी.ला फक्त ०·१९ मी. आहे. यामुळे सुरुवातीच्या भागात दामोदर वेगाने वाहते आणि पठाराची झीज करून पुष्कळच दगडमाती आपल्या प्रवाहाबरोबर वाहून नेते. पुढे वेग कमी झाल्यावर पात्रात व आजूबाजूला गाळ साचू लागतो. बरद्वानच्या आधीच्या सु. १०० किमी. भागात नदीच्या पात्रात ठिकठिकाणी वाळू साचते व प्रवाहाला त्यातून मार्ग काढावा लागतो. अखेरच्या भागात प्रदेश इतका सपाट आहे की, प्रवाहाला फाटे फुटून त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेशाचे स्वरूप येते.
दामोदरचे वैशिष्ट्य म्हणजे तिला येणारे विनाशकारी पूर. दामोदरच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी तिच्यातून व तिच्या उपनद्यांतून जलाभेद्य स्फटिकी खडकांवरून येते व त्यामुळे पावसाळ्यात नद्या खूपच फुगतात. हे सर्व पाणी आसनसोलजवळच्या निरुंद भागातून पुढे जाते व बरद्वान आणि हुगळी जिल्ह्यांच्या सपाट प्रदेशात एकदम पसरते. या प्रदेशाचे अशा पुरांमुळे फारच नुकसान होत आले आहे. जंगलतोड व भूपृष्ठाची झीज यांमुळे हे पूर अधिकच विध्वंसक ठरले आहेत. काही वेळा दामोदरच्या पुराचे पाणी दक्षिणेकडे पसरून रूपनारायण नदीलाही मिळते. पूर्वी दामोदर कलकत्त्याच्या वरच्या बाजूस सु. ६२ किमी. वर नया सराई येथे हुगळीला मिळत असे. परंतु अठराव्या शतकात पुराचे पाणी व नदीचे पात्र दक्षिणेकडे सरकू लागले. १७७० मध्ये पुरामुळे बरद्वान शहर पार उद्ध्वस्त झाले. नदीकाठचे बांध मोडून गेले व मोठा दुष्काळ पडला. पुढे एकोणिसाव्या शतकातही पुरांमुळे अनेक वेळा नुकसान झाले. चालू विसाव्या शतकात भारत स्वतंत्र झाल्यावर या पुरांचे नियंत्रण करण्यासाठी व वीजउत्पादन, वाहतूक इ. इतर हेतूंसाठी दामोदर खोरे निगमाची स्थापना होऊन बहूउद्देशीय योजना कार्यान्वित झाली. दामोदर व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांतून लोहमार्ग व सडका यांना सुलभ मार्ग उपलब्ध झाले आहेत.
दामोदर व तिच्या दक्षिणेची कासई या नद्यांदरम्यानचा भूप्रदेश संथाळ लोकांची पवित्र भूमी होय. ते दामोदरला समुद्रच मानतात आणि त्यांच्या मृतांच्या शरीराचा काही जळका भाग त्या नदीत टाकल्यावरच त्याचे और्ध्वदेहिक पुरे होते. तो भाग पुढे महासागरात जातो असे ते मानतात.
दामोदर खोऱ्याच्या विकास योजनेमुळे तो प्रदेश भारतातील एक अग्रेसर औद्योगिक विभाग बनला आहे. तेथील लोकवस्ती फार दाट (दर चौ.किमी. स ३८४ लोक) आहे.
दामोदर खोऱ्याची भौगोलिक रचना : दामोदर खोऱ्यात अनेक उंचसखल भाग समाविष्ट आहेत. हजारीबाग आणि गया जिल्ह्यांत सु. ३८० मी. उंचीचे कोडार्मा पठार असून ते गिरिदिहकडे विस्तारले आहे. या पठारावर दामोदरची प्रमुख उपनदी बराकर उगम पावते. हजारीबाग पठाराच्या ईशान्य कोपऱ्यात १,३६५·५ मी. उंचीचा पारसनाथचा डोंगर आहे. सिंगभूम, पुरूलिया व रांची यांच्या सीमेवर डास्मा डोंगररांग असून यातून सुवर्णरेखा नदी मार्ग काढते. याच्या दक्षिणेस सिंगभूमच्या सपाट प्रदेशात अनेक अवशिष्ट शैल व माथ्यावर जांभा दगडांचा थर असलेली छोटी पठारे आहेत. चक्रधरपूर व चैबासा यांच्या पश्चिमेस छोटानागपूर पठाराची कड आहे. या पठारावर अनेक उपपठारे असून त्यांपैकी रांची पठार सु. ६१० मी. उंच आहे. ते पश्चिमेस ३१४ मी. पर्यंत उंच होत गेले असून त्यालाही अनेक अवशिष्ट शैल व कटक आहेत. रांची पठाराच्या उत्तरेस हजारीबाग पठार असून दोहोंच्या दरम्यान दामोदर नदी विभंग दरीतून वाहते.
दामोदर खोऱ्यात हुगळीला मिळणारी दामोदर, बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या सुप्रसिद्ध शोण नदीला मिळणारी उत्तर कोएल व महानदीस मिळणारी दक्षिण कोएल या प्रमुख नद्या असून त्यांच्या अनेक उपनद्या आहेत. नद्यांना येणाऱ्या पुरांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पूरनियंत्रण हा दामोदर खोरे प्रकल्पाचा एक प्रमुख उद्देश आहे.
शिवालिक नदी :
उत्तर भारतातील जलोत्सारण प्रणालीच्या (नदीनाल्यांच्या) रचनेत अनेक मोठे बदल तृतीय कल्पानंतर (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळानंतर) घडून आले. यामुळे तेथील मोठ्या नद्या अगदी उलट दिशेने वाहू लागल्या. हिमालयाच्या पायथ्याशी ⇨ शिवालिक संघाच्या खडकांचा लांब पातळ पट्टा तयार होऊन तो पश्चिमेकडे अधिक रुंद झाला. हे खडक वायव्येकडे वाहणाऱ्या एका मोठ्या नदीच्या पूरभूमीत साचलेले आहेत, असे मानतात. आसाम (पोटवार पठाराच्या पूर्वेकडील ब्रह्मपुत्रा खोरे) ते पंजाबच्या सर्वांत वायव्येकडील कोपऱ्यापर्यंत (पाकिस्तानातील बन्नू मैदानापर्यंत) ही नदी वाहत होती. या बन्नू मैदानात ती दक्षिणेकडे वळून सावकाशपणे आटत असलेल्या मायोसीन (सु. २ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील समुद्राला मिळाली होती. जी. ई. पिलग्रिम यांनी गंगा व यमुना नद्यांच्या दरम्यान असलेल्या शिवालिक टेकड्यांवरून या नदीला शिवालिक नदी हे नाव दिले, तर ई. एच्. पॅस्को यांनी सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या एकत्रित प्रवाहावरून हिचे इंडोब्राह्म असे नामकरण केले. हिमालयाच्या मुख्य उत्थानानंतर समुद्राच्या अवशिष्ट अरुंद पट्ट्यांतून ही नदी निर्माण झाली, असे मानतात. या नदीच्या त्रिभूज प्रदेशाच्या आक्रमणाने समुद्राचा हा पट्टा सावकाशपणे मागे हटत गेला. येथील विस्तृत द्रोणीत मुरी शिवालिक निक्षेपांचे जाड थर साचले. शिवालिक संघाच्या काळानंतर (सु. १·२ कोटी वर्षांपूर्वी) वायव्य पंजाबात भूकवचात झालेल्या हालचालींनी ही जलोत्सारण प्रणाली भंग पावून सिंधू, तिच्या पाच उपनद्या, गंगा व तिच्या उपनद्या या तीन जलोत्सारण उपप्रणाल्या निर्माण झाल्या. सुमारे १·२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या प्लाइस्टोसीन हिमयुगात शिवालिक नदी नाहीशी झाली. वायव्य आसामात आढळलेल्या नदीमुखामुळे बंगाल-आसाममधील शिवालिक नदीच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली जाते. शिवालिक नदीत प्रवेश करणाऱ्या हिमनद्यांमार्फत पंजाबातील पाहुणे पाषाण त्यांच्या सध्याच्या ठिकाणी वाहून आले असल्याचे ए. एल्. कूलसन यांचे मत आहे.
सरमा नदी :
भारत व बांगला देशातून वाहणारी व मेघना नदीचा शीर्षप्रवाह असलेली एक नदी. लांबी सु. ९०२ किमी. मणिपूर टेकड्यांमध्ये माओसोंगसंगच्या दक्षिणेस २५० २८' उत्तर अक्षांश व ९४० १८' पूर्व रेखांश यांदरम्यान या नदीचा उगम आहे. ही नदी उत्तर मणिपूर टेकड्यांमधून पश्चिमेकडे वाहत जाऊन मणिपूर राज्याच्या पश्चिम सीमेवर तिपाईमुख येथे उत्तराभिमुख होऊन आसाम राज्यात प्रवेश करते व काचार भागातून वेड्यावाकड्या वळणांनी सुरमा खोऱ्यातून पश्चिमेकडे वाहत जाते. सुरमा खोऱ्यात सिद्घेश्वर (सारसपूर) टेकड्या असून त्यांची सस.पासूनची उंची १८३ मी. ते ६१० मी. दरम्यान आहे. काचारच्या पश्चिम सरहद्दीजवळ सुरमा दोन शाखांत विभागली गेली आहे. तिची दक्षिण शाखा प्रथम कुशियारा नावाने प्रसिद्घ आहे. पुढे तिचे पुन्हा दोन फाटे बराक व बिबियाना नावांनी बांगला देशातून वाहतात. हे पुढे सुरमा नदीच्या उत्तर प्रवाहास मिळतात. सुरमा नदीचा विभागलेला उत्तरेकडील दुसरा प्रवाह सुरमा नावाने खासी टेकड्यांमधून बांगला देशातील सिल्हेट व चाटाक शहरांतून वाहत जातो व सुनामगंजजवळ एकदम दक्षिणेस वाहत जाऊन पुढे ब्रह्मपुत्रेच्या जुन्या प्रवाहास भैरब बाझार येथे मिळतो. तद्नंतरचा हा संयुक्त प्रवाह मेघना नदी या नावाने ओळखला जातो.
सुरमा नदीस उत्तरेकडून जिरी, जटिंगा, बोगापानी, जादूकता, तर दक्षिणेकडून सोनाई, ढालेश्वरी, सिंग्ला, लोंगाई, मनू, खोवाई या महत्त्वाच्या उपनद्या येऊन मिळतात. वरच्या भागात नदी दऱ्याखोऱ्यांतून वाहते. त्यामुळे पुराचे पाणी लगतच्या प्रदेशात क्वचितच पसरते; मात्र हिचा खालचा भाग त्यामानाने उथळ असल्याने पुराचे वेळी पाणी लगतच्या भागात पसरुन काही प्रमाणात नुकसान होते.
सुरमा नदीस दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्व असून आसाम-बंगाल लोहमार्ग होण्यापूर्वी या नदीतून जलवाहतूक होत असे. त्या वेळी ती या भागातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग होती. तुडुंबी, कारग, तिपाईमुख, सिल्वर, बदरपूर, करीमगंज, सिल्हेट, मनुमुख, हबीगंज, बालागंज, सुनामगंज इत्यादी सुरमा नदीकाठावरील काही प्रमुख शहरे होत.
माण नदी :
महाराष्ट्र राज्यातील भीमा नदीची उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी. आंधळी धरणाच्या योजनेमुळे हिला महत्त्व प्राप्त झाले असून नदीची लांबी सु. १६० किमी., पैकी सोलापूर जिल्ह्यातील लांबी सु. ८० किमी. आहे. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यात, फलटणजवळच्या डोंगरात हिचा उगम होतो. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातून आग्नेय दिशेस वाहत जाऊन पुढे ती सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात प्रवेश करते. सांगली जिल्हाच्या उत्तर भागातून आग्नेय दिशेने थोडे अंतर वहात गेल्यावर ती सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात प्रवेशते. सांगोला तालुक्यातून प्रथम पूर्वेस व नंतर ईशान्येस वाहत जाते. पुढे काही अंतर पंढरपूर-मंगळवेढे तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन पंढरपूरच्या आग्नेयीस १७ किमी. वर असलेल्या सरकोलीजवळ भीमेला मिळते. नदीचे काठ सपाट व कृषियोग्य असून नदीपात्रात रेती आढळते. बेलवण, खुर्डू, सानगंगा व वांकडी हे प्रवाह माण नदीला मिळत असून ते कोरड्या ऋतूत पूर्ण आटतात. माण तालुक्यातील बोडके गावाजवळ या नदीवर आंधळी धरण बांधावयाची योजना आज अनेक वर्षे रेंगाळत आहे. दहिवडी, म्हसवड, दिघंची, सांगोला ही माण नदीकाठीवरील प्रमुख गावे आहेत.
मांजरा नदी :
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. सुमारे ६१६ किमी. लांबीची ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. सुरुवातीच्या भागात ही पूर्ववाहिनी असून बीड-उस्मानाबाद तसेच बीड-लातूर या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. कासारखेडजवळ ही नदी लातूर जिल्ह्यात प्रवेश करते व जिल्ह्याच्या माध्यातून आग्नेयीस वाहत जाऊन निलंगा गावाजवळ कर्नाटक राज्यात व पुढे बीदरच्या पूर्वेस आंध्र प्रदेश राज्यात जाते. आंध्र प्रदेशातील संगरेड्डीपेटजवळ मांजरा नदी एकदम वळण घेऊन वायव्य दिशेने वाहू लागते. निझामाबाद जिल्ह्यात या नदीवर धरण बांधण्यात आले असून (१९३१) प्रसिद्ध निझामसागर तलाव तयार करण्यात आला आहे. पुढे ही नदी पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्ह्यातील शेळगावपासून ईशान्येस, राज्याच्या सरहद्दीवरून वाहत जाते व याच जिल्ह्यातील कुंडलवाडी गावाजवळ गोदावरी नदीस उजवीकडे मिळते. तेरणा, कारंजा, तावरजा, लेंडी व मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. या नदीस तेरणा नदी लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर निलंग्याच्या पूर्वेस, तर कारंजा नदी आंध्र प्रदेश राज्यात मिळते, लेंडी व मन्याड या नद्या नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीवर या नदीला डावीकडून मिळतात.
मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो. नदीखोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या नदीच्या वरच्या खोऱ्यात मुख्यत्वे कापसाचे पीक घेतले जाते, तर खालच्या खोऱ्यात ज्वारी, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन होते. बहुतेक ठिकाणी नदीकाठ मंद उताराचे असल्याने या नदीचा फेरी वाहतुकीसाठीही थोड्याफार प्रमाणात उपयोग होतो.
काटेपूर्णा नदी :
अकोला जिल्हयाच्या मध्य भागातून वाहणारी पूर्णा नदीची उत्तरवाहिनी उपनदी. लांबी सु.९७किमी.; नदीखोऱ्याचे क्षेत्रफळ १,१६० चौ.किमी. ही वाशिम तालुक्यातील काटा या गावाजवळ अजिंठ्याच्या पर्वतराजीत उगम पावून मंगरुळ, अकोला आणि मुर्तिजापूर या तालुक्यांतून वाहत जाऊन भटोरी गावाजवळ पूर्णेस मिळते. अकोल्यापासून आग्नेयीकडे ३५ किमी. वरील वास्तापूर या गावानजीक या नदीवर मातीचे धरण बांधून अंदाजे २४,००० हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलत करण्याची योजना आहे.
भवानी नदी :
द. भारतातील कावेरी नदीची प्रमुख उपनदी. ही केरळ राज्यातील पालघाट (पालक्काड) जिल्ह्याच्या वेल्लुवनाड तालुक्यात, साइलेंट व्हॅलीच्या जंगल भागात उगम पावते. या पूर्ववाहिनी नदीची लांबी सु. १६९ किमी. आहे. ही नदी पुढे तमिळनाडू राज्याच्या कोईमतूर जिल्ह्यात प्रवेश करीत पूर्व दिशेने वाहत जाऊन भवानी गावाजवळ कावेरी नदीस मिळते. धन्यकोट्टैजवळ मिळणारी मोयार ही भवानी नदीची प्रमुख उपनदी असून कोरंगपल्लम्, कुंदा, पेरिङ्गपलम्, सिरुवनी, कूनूर या अन्य नद्याही तिला मिळतात. नैऋत्य मोसमी पर्जन्यकाळात या नदीस मोठे पूरही येतात.
जलसिंचनाच्या दृष्टीने भवानी नदीस महत्त्व आहे. या नदीवर मोयार नदी-संगमाच्या खालील बाजूस सु.२ किमी. व सत्यमंगलमपासून सु. ७ किमी. अंतरावर लोअर भवानी प्रकल्पातील धरण बांधण्यात आले आहे. या धरणापासून ८३,८७० हे. क्षेत्रास पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे कोईमतूर जिल्ह्यात कापूस व अन्नधान्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य झाले आहे.
महीनदी :
(माही नदी). मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात या तीन राज्यांतून वाहणारी नदी. मही नदीची लांबी ५३३ किमी. असून मध्य प्रदेश राज्याच्या धार जिल्ह्यात विंध्य पर्वतात ६१७ मी. उंचीवर ती उगम पावते. या राज्यातून वायव्य दिशेने ती १६० किमी. अंतर वाहत जाते. पुढे राजस्थान राज्यातील डूंगरपूर या जिल्ह्याच्या उत्तरेकडील मेवाड टेकड्यांमुळे ती नैर्ऋत्यवाहिनी होऊन डूंगरपूर व बांसवाडा या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत जाऊन गुजरात राज्याच्या गोध्रा जिल्ह्यात प्रवेशते व पुढे खंबायतच्या आखाताला मिळते. या नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र ३४,८४२ चौ. किमी. आहे. डाव्या तीरावरील अनास व पानम आणि उजव्या तीरावरील सोम या तिच्या प्रमुख उपनद्या होत. उधानाच्या भरतीच्या वेळी मही नदीमुखातून आत सु. ३२ किमी. पर्यंत पाणी येते.
पूर्वीपासून महापूर, खोल दऱ्या व उंच काठ यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मही नदीवरील जलसिंचन प्रकल्पांमुळे तिला महत्त्व प्राप्त झाले असून राजस्थान व गुजरात राज्यांतील शेतीच्या दृष्टीने ती जास्त उपयुक्त ठरली आहे. गुजरात राज्यात या नदीवर ‘मही प्रकल्प’ ही दोन टप्प्यांची योजना असून पहिल्या टप्प्यात वनकबोरी गावजवळ ७९६ मी. लांब व २०·६ मी. उंचीचा चिरेबंदी बंधारा बांधण्याची योजना आहे. याच्या उजव्या कालव्यामुळे (७४ किमी. लांब) सु. १·८६ लक्ष हे. जमिनीस पाणीपुरवठा होईल. दुसऱ्या टप्यात कडाणाजवळ १,४३० मी. लांब व ५८ मी. उंचीचे माती-काँक्रीटचे संयुक्त धरण बांधलेले असून त्यामुळे ८९,००० हे. क्षेत्रास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. यांशिवाय राजस्थान राज्यातील या नदीवरील प्रकल्पांमुळेही त्या राज्याला जलसिंचनाचा लाभ मिळाला आहे.
मही नदीचा उल्लेख महाभारतात व पुराणांतही आढळतो. पुराणांत तिला ‘मनोरमा’ असे म्हटले आहे. गुजरात राज्यात मही नदीच्या काठावर नवनाथ, ८४ सिद्ध व इतर देवता यांची मंदिरे आहेत. मिंग्रड, फाझिलपूर, अंगद, मसपूर ही कोळी लोकांची पवित्र स्थळे मही नदीच्या काठावरच आहेत. ‘महिसागर संगम’ या नावाने ओळखले जाणारे खंबायतच्या आखातातील या नदीचे मुख हे पवित्र तीर्थक्षेत्र मानेल जाते.
------------------------------------------
कदा नदी :
निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम पावणाऱ्या अॅवलांच व एमेरल्ड या प्रवाहांनी मिळून कुंदा नदी झालेली आहे. तिच्या व दक्षिणेकडील अपर भवानीच्या
कुंदा नदीप्रकल्प
खोऱ्यादरम्यान निलगिरी पठाराच्या नैर्ऋत्येस कुंदा पर्वतरांग आहे. तिच्यात अॅवलांच, बेअरहिल, माकुर्ती ही २,५०० मी. हून अधिक उंचीची शिखरे असून, त्या भागात नैर्ऋत्य व ईशान्य मान्सूनचा पाऊस दरवर्षी सु. ४०० सेंमी. पडतो. ते पाणी भवानीला आणि कुंदेला मिळते. सिल्लाहल्ला, कनारहल्ला, पेंगुबहल्ला इ. उपनद्यांचे पाणी घेऊन कुंदा अपर भवानीला मिळते. या दोन्ही नद्या मग भवानी या नावाने कावेरीला मिळतात. निलगिरीच्या उभ्या उतारांवरून कुंदा वेगाने खाली येते. मंडनायूजवळ तिला सु. ६६ मी. उंचीचा एक धबधबा आहे. कुंदेच्या परिसरातील वनश्री अत्यंत नयनरम्य आहे.
कुंदेचे पाणी आणि तिचा वेग व शक्ती यांचा उपयोग करून कुंदा योजना किंवा लोअर भवानी योजना १९५६ मध्ये सुरू झाली. या योजनेत लहानमोठी बारा धरणे, यांना जोडणारे सु. ४० किमी. लांबीचे बोगदे, विद्युत्गृहे, कालवे इ. असून, चौथ्या पंचवार्षिक योजनेअखेर ११० मेगॅवॉट वीज उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. पूरनियंत्रण, ७९,००० हे. शेतीला पाणीपुरवठा तसेच अॅल्युमिनियम, कॉस्टिक सोडा, सिमेंट, कागद इ. उद्योगांना आणि शेकडो खेड्यांना घरगुती वापरासाठी व छोट्या उद्योगधंद्यांसाठी वीजपुरवठा, हे या योजनेचे उद्देश असून, कोलंबो योजनेनुसार या प्रकल्पासाठी कॅनडाचे मोठे साहाय्य झालेले आहे.
सीना नदी :
भीमा नदीची एक उपनदी. लांबी सु. ३७५ किमी. पाणलोट क्षेत्र सु. १२,७४२ चौ. किमी. महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर शहराच्या उत्तरेस ही नदी उगम पावते. हिचे तीन शीर्षप्रवाह मानले जातात. त्यांपैकी एक अहमदनगर शहराच्या पश्चिमेस जामगावजवळ, तर दुसरे दोन प्रवाह शहराच्या ईशान्येस जेऊर आणि पिंपळगाव उजनीजवळ उगम पावतात. त्यांचा एकत्रित प्रवाह सीना नदी या नावाने ओळखला जातो. सुरुवातीच्या टप्प्यात अहमदनगर शहरापर्यंत ही नदी दक्षिणवाहिनी आहे. तेथून पुढे ती आग्नेयवाहिनी बनते. या टप्प्यात या नदीमुळे अहमदनगर व बीड या जिल्ह्यांची सु. ५५ किमी. लांबीची नैसर्गिक सरहद्द बनली आहे. पुढे अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या ऐतिहासिक ठिकाणाजवळ ही नदी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. या जिल्ह्यातील खांबेवाडी गावापासून पुढे या नदीमुळे सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील म्हैसगावपासून हिचा प्रवाह याच जिल्ह्यातून पुढे वाहत जातो. कर्नाटक राज्य आणि सोलापूर जिल्हा यांच्या सरहद्दीवर कुडल गावाजवळ ही नदी भीमा नदीस मिळते. सीना नदीचे पात्र उथळ असून उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ते कोरडे पडते.
मेहेक्री ही सीना नदीची प्रमुख उपनदी असून ती बीड जिल्ह्यामध्ये सांगवीजवळ सीना नदीला डावीकडून मिळते. याशिवाय तलवार, इंचाना, कामुही, भेंडी, नल्की, चांदली इ. तिच्या उपनद्या आहेत. सीना-निमगाव व सीना-कोळेगाव हे या नदीवरील प्रकल्प असून, सीना-कोळेगाव योजनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सु. ९,३०० हे. क्षेत्र ओलिताखाली आले आहे. चोंडी ( अहमदनगर जिल्हा ), मोहोळ, वडवळ, कुडल (सोलापूर जिल्हा) इ. या नदीवरील महत्त्वाची ठिकाणे आहेत.
----------------------------------------------
लुशाई टेकड्या
लुशाई टेकड्या ईशान्य भारताच्या पर्वतीय प्रदेशातील डोंगर टेकड्या. यांचा विस्तार प्रामुख्याने मिझोराम राज्यात असून त्यांना ‘मिझो टेकड्या’ असेही म्हणतात. आराकान योमा या पर्वतश्रेणीचा हा उत्तरेकडील भाग होय. उत्तर-दक्षिण दिशेत परस्परांना समांतर पसरलेल्या या टेकड्या मुख्यत: तृतीयक कालखंडातील वालुकाश्म व शेल खडकांपासून तयार झाल्या आहेत. या घडीच्या टेकड्यांच्या दक्षिणेस पातकई टेकड्या आहेत. लुशाईच्या पश्र्चिमेस त्रिपुरा सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत लहानलहान आठ रांगा व दऱ्या आहेत.
जलप्रवाहांच्या खनन कार्यामुळे या टेकड्यांमध्ये तीव्र उताराच्या खोल दऱ्या, घळ्या वव काही ठिकाणी लहान मैदानी द्रोणी प्रदेश तयार झालेले आहेत. या टेकड्यांचे पश्र्चिमेकडील उतार हे पूर्वेकडील उतारांपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आहेत. पश्चिमेकडे जलप्रवाहांची खोरी रुंद व पूर्वेस अरुंद आढळतात. या प्रदेशात १,३७१ मी. उंचीवर टेकड्यांनी वेढलेली सुपीक गाळाची मैदाने आहेत. मैदानामध्ये चांफाई हे मोठे मैदान (लांबी सु. ११ किमी. व रुंदी ५ किमी.) आहे. गाळाने भरून गेलेल्या पूर्वीच्या सरोवराच्या जागी हे मैदाने तयार झाली असावीत.
या टेकड्यांची सस.पासून सरासरी उंची पश्र्चिमेस ९१४ मी. पासून पूर्वेस १,२१८ मी. पर्यंत आढळते; परंतु काही ठिकाणी मात्र ती १,६७५ मी. पर्यंत वाढत जाते. दक्षिण भागात‘ब्लू मौंटन’ वा ‘फ्वंगपूरी’ (२,१६५ मी.) येथे सर्वाधिक उंची आढळते.
या प्रदेशातील जलप्रणाली गुंतागुंतीची आहे. उत्तरेस सुरमा नदीची उपनदी बराक, दक्षिणेस कलदन व पश्र्चिमेस कर्णफुली या नद्यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. उत्तर भागात ढालेश्र्वरी, सोनई व तुइव्हावल या बराक नदीच्या, तर दक्षिण भागात पूर्वेस मट, तुईचुंग, त्याओ, तुईपाई या कलदन नदीच्या आणि पश्र्चिमेकडील जलप्रणालीमध्ये चितगाँगजवळ तुईचंग, कओ, देह फायरंग व तुईलिपनुई या कर्णफुली नदीच्या मुखालगत येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत.
या टेकड्यांच्या प्रदेशातील हवामान मानवी जीवनास प्रतिकूल आहे. खोल दऱ्यांमधून रोगट हवामानामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मार्च-एप्रिलमध्ये वायव्येकडून येणाऱ्याभयानक स्वरूपाच्या वादळी वाऱ्यांचा प्रादुर्भाव होतो. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोरडा दुष्काळ पडत नाही. उतारावर घनदाट सदारहित जंगले, बांबूंची वने व इतर उपयुक्त वृक्ष आहेत. खोलगट भागात पाम व माथ्यावरील भागात ओक, फर, चेस्टनट इ. वृक्ष आढळतात. या प्रदेशात हत्ती, गेंडा, हरिण, वाघ, अस्वले इ. प्राणीही आढळतात. या प्रदेशात बहुतांश आदिवासी लोक रहात असून ते ‘झूम शेती’ करतात. शेतीतून भात, तीळ, ऊस, तंबाखू व संत्री इ. उत्पादने घेतली जातात.
महेंद्रगिरी
महेंद्र पर्वत दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. प्राचीन भारतातील भूगोलवेत्त्यांनी पूर्व घाटाला ‘महेंद्र पर्वत’ अथवा महेंद्रगिरी म्हटल्याचे दिसून येते. याच्या विस्ताराविषयी मतभेद आढळतात. काही ग्रंथांतील वर्णनांनुसार याचा विस्तार ओरिसा राज्यातील गंजाम जिल्ह्यापासून दक्षिणेस मदुराई (तमिळनाडू राज्य) जिल्ह्यापर्यंत असावा, असे काही तज्ञांचे मत आहे. ओरिसा राज्यातील महानदीचे खोरे आणि गंजाम यांदरम्यानच्या पूर्व घाटाच्या टेकड्या अद्यापही ‘महेंद्रमलई’ किंवा महेंद्र टेकड्या या नावाने ओळखल्या जातात. यावरूनच या भागातील पूर्व घाटाच्या सर्वोच्च शिखराला ‘महेंद्रगिरी’ हे नाव दिले असावे.
पुराणांत या पर्वताला ‘महेंद्राचल’, ‘महेंद्राद्रि’ अशीही नावे असल्याचे दिसून येते. अगस्त्य ऋषींनी या पर्वताची सागरात निर्मिती केली, असा रामायणात निर्देश आहे. श्रीरामाकडून पराभूत झाल्यानंतर परशुरामाने या पर्वतावर येऊन वास्तव्य केल्याच्या अनेक पुराणकथा आहेत. कालिदासाच्या रघुवंशात हा पर्वत कलिंग देशात असल्याचा व कलिंग देशाचा राजा महेंद्राधिपती असल्याचा निर्देश आढळतो.
बाणाच्या हर्षचरितात महेंद्र पर्वत मलय पर्वताशी जोडलेला असल्याविषयीचा उल्लेख मिळतो. पार्जिटरच्या मते महानदी, गोदावरी, वैनगंगा या नद्यांदरम्यानचा प्रदेश अथवा विस्तारांने गोदावरीच्या उत्तरेकडील पूर्व घाटाचा प्रदेश म्हणजे प्राचीन महेंद्र पर्वत असावा.
महेंद्रगिरी हे पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर ओरिसा राज्याच्या गंजाम जिल्ह्यात १८° ५८′ उ. अक्षांश व ८४°२४ पू. रेखांशावर, सस. पासून १,५०१ मी. उंचीवर आहे. दाट वनश्री आणि समुद्रसान्निध्य (सु. २५ किमी. अंतरावर) यांमुळे याचा परिसर निसर्गरम्य बनला आहे.
ब्रिटिशांच्या काळात महेंद्रगिरी हे कलकत्त्याचे आरोग्यधाम म्हणून विकसित करण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु या टेकडीवजा शिखराच्या तीव्र उताराचा माथा आणि पाण्याचा तुटवडा यांमुळे ती योजना मागे पडली. येथून ‘महेंद्रतनय’ नावांचे दोन प्रवाह उगम पावतात. त्यांतील एक दक्षिणेस वंशधारा नदीस मिळतो, तर दुसरा बारूआ गावाजवळ बंगालच्या उपसागराला मिळतो.
या शिखरावर प्रचंड शिळांनी रचलेली अकराव्या शतकातील चार मंदिरे असून त्यांतील एक भग्नाचवस्थेत आहे. मंदिरात संस्कृत आणि तमिळ भाषांतील शिलालेख आहेत. ‘चोल वंशीय राजा राजेंद्र याने आपला मेहुणा विमलादित्य याचा पराभव केल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या जंगलप्रदेशात उभारलेले हे विजयस्तंभ आहेत’, असा उल्लेख त्या शिलालेखांतून आढळतो.
मलय
1) मलयगिरि :
दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. हा पर्वत ‘चंदनगिरि’ या नावानेही ओळखला जात असे. मलई (मळे) म्हणजे डोंगर; या मूळ द्राविडी शब्दावरून ‘मलय’ हा संस्कृत शब्द रूढ झाला. पुराणांतील उल्लेखांवरून पश्चिम घाटाचा (सह्याद्रीचा) दक्षिणेकडील भाग म्हणजे मलयगिरी असे मानतात. भवभूतीच्या महावीरचरितातील उल्लेखावरून हा पर्वत कावेरी नदीच्या दक्षिणेस होता असे दिसून येते.
अग्नि, कूर्म, विष्णु इ. पुराणांतील उल्लेखांवरून सांप्रतच्या कोईमतुर खिंडीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या त्रावणकोर व कार्डमम् टेकड्या म्हणजे मलयगिरी असावा. पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या ताम्रपर्णी व कृतमाला (सांप्रत वैगई) या नद्या मलय पर्वतात उगम पावतात , असा उल्लेख मार्कंडेय, वायु, मत्स्य इ. पुराणांत मिळतो; त्यावरून या घाटाचा दक्षिण भाग म्हणजे मलयगिरी या विधानाला दुजोरा मिळतो.
पार्जिटरच्या मते पश्चिम घाटातील निलगिरीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंतची डोंगररांग म्हणजे मलयगिरी होय. माळव्याच्या परमार घराण्यातील राजांच्या कागदपत्रांत भोज राजाचा राज्यविस्तार दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत होता, असा उल्लेख मिळतो.
या पर्वताच्या पावित्र्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. मनूने या पर्वतावर तपश्चर्या केल्याचा उल्लेख मत्स्य पुराणात आहे. या पर्वतावरील पोथिगेई शिखरावर अगस्त्य (स्ती) ऋषींचे वास्तव्य होते. असा चैतन्यचरितामृतात उल्लेख आहे. त्यामुळे याला अगस्ती कूट असेही म्हणतात. पुराणात मलय पर्वत चंदनाने समृद्ध होता असे. उल्लेख आढळतात.
2) भारतातील एक प्राचीन ठिकाण.
याच्या स्थाननिश्चितीविषयी वेगवेगळी मते आहेत. तेलंगांच्या मते हे पश्चिम घाटाच्या दक्षिण टोकाला होते, तर केशवलाल ध्रुव यांच्या मते हे ठिकाणचे नाव नसून ही एक जमात आहे. या जमातीचे लोक हिंदूस्थानाच्या उत्तर सरहद्दीवर राहत असावेत.
रामायण, महाभारत रत्न्कोश इ. संस्कृत ग्रंथाच्या अभ्यासावरून जेम्स बर्जेस यांच्या मते गंडकी व राप्ती नद्यांच्या वरच्या बाजूस असलेला मलयभूमी नावाचा जिल्हा म्हणजेच मलयांचा देश असे दिसून येते.
Latest post
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...
-
1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior) 1. Brave – Courageous (शूर) 2. Honest – Truthful (प्रामाणिक) 3. Happy – Joyful (आनंद...
-
601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे? 👉 अनक्रीप्शन 602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी ब...
-
◾️जायकवाडी : नाथसागर (छत्रपती संभाजीनगर) ◾️पानशेत : तानाजी सागर (पुणे) ◾️गोसिखुर्द : इंदिरा सागर (भंडारा) ◾️वरसगाव : वीर बाजी पासलकर (पुणे ज...