२३ ऑक्टोबर २०२०

भारतातून चहाची विक्रमी निर्यात.


🅾️भारताने यावर्षी चहाची विक्रमी निर्यात केली आहे. तब्बल ३५ वर्षांनंतर चहा निर्यातीत भारताला२३० दशलक्ष किलोचा टप्पा गाठण्यातयश आले आहे.गेल्या आर्थिक वर्षात देशातून २३२.९२ दशलक्ष किलो चहाचीनिर्यात झाली. 


🅾️तया मोबदल्यात देशाला ४,४९३.१० कोटी रुपये मिळालेआहेत. यापूर्वी १९८०-८१ या काणात २३१.७४ दशलक्ष किलो चहाची निर्यातझाली होती.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निर्यातीचे प्रमाण१७ टक्क्यांनी वाढले आहे. रशिया, इराण, जर्मनी, पाकिस्तान, बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात आणिपोलंड यासारख्या देशांनी मोठ्या प्रमाणात चहाची खरेदी केल्याने निर्यातीत वाढ झाली आहे.


🅾️दशात लिलावाद्वारे विक्री झालेल्या चहालादेखील चांगली किंमत मिळाली आहे. लिलाव झालेल्या चहाची किंमत आणि प्रमाण अनुक्रमे ८.०५ टक्के व१७.८२ टक्क्यांनी वाढले, असे ताज्या अहवालात नमूद आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या 🏳️ सीमा .


१) मध्य प्रदेश 🐯 :-

 नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया..


२) कर्नाटक 🌮 :-

 कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड..


३) आंध्र प्रदेश 🍂 :-

 गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड..


४) गुजरात 🌾 :- 

ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे..


५) दादरा, नगर-हवेली 🏄🏼 :-

 ठाणे, नाशिक..


६) छत्तीसगड ⛰:-

 गोंदिया, गडचिरोली..


७) गोवा 🌴:-

 सिंधुदुर्ग.. 


ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर यशस्वी अवतरण केले.


🔰नासाच्या ‘ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर मंगळवारी यशस्वी अवतरण केले असून यांत्रिक बाहूच्या मदतीने त्याच्यावरील खडकाचे नमुने घेतले आहेत.


🔰ह खडक सौरमालेच्या जन्मावेळचे आहेत. ते आता पृथ्वीवर आणले जातील असे नासाने म्हटले  आहे.दी ओरिजिन्स, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटीफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिथ एक्सप्लोरर (ओसिरिस-रेक्स ) अवकाशयान पृथ्वीनिकटच्या या लघुग्रहावर अलगद उतरले.


🔰तथील खडकाचे तुकडे व धूळ गोळा केली. आता ते नमुने 2023 पर्यंत पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहेत.बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीपासून 321 दशलक्ष किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीवेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल.

Online Test Series

२२ ऑक्टोबर २०२०

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना


🖌 भारतातील कयदेमंडळाच्या निवडणूक लढविनारया पहिल्या महिला?

- कमलादेवी(मद्रास)


🖌 दशातील कयदेमंडळाच्या सदस्या बनणारया पहील्या माहीला?

- डाॅ. मुथ्हुलक्ष्मी रेड्डी 


🖌 कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातिल सर्वात तरुण अध्यक्ष?

- अब्दुल कलम आझाद


🖌 तरुंगात असतानाच कयदेमंडळावर निवडून येणारे एकमेव भारतीय?

- सुभाषचंद्र बोस


🖌 तरुंगात असतानाच कांग्रेसचे अध्यक्ष झालेले पहिले व्यक्ती?

- चित्तरंजन दास


🖌 भारतीयांनी भारतीयांसाठी घटना तयार करण्याचा केलेला पहिला प्रयोग?

- नेहरु अहवाल


🖌 सर्वप्रथम कांग्रेस ची पक्ष घटना बनविण्याची मागणी कोणी केली?

- लोकमान्य टिळक 


🖌 अखिल भारतिय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा?

- महाराणी चिमबाईसाहेब गायकवाड.


📚 कषी सिंचन धोरण अंमलात आणण्यासाठी सुरुवातीची पाऊले उचलणारा प्रथम गव्हर्नर जनरल ?

- लॉर्ड बेंटींक 


📚 भारतात रेलवे स्थापन करण्याचा प्रथम निर्णय कोठे घेण्यात आला?

- मद्रास


📚 मलकी सेवांमधील नेमणूकीसाठी स्पर्धा परीक्षेच्या तत्वाचा स्विकार करण्याची शिफारस करणारा प्रथम व्यक्ती?

- लॉर्ड मेकॉले


📚 रलवे सुरु करण्याची सर्वप्रथम योजना कोनी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


📚 इग्रजांनी भरतातील पहिली वखार ही कोठे स्थापन केली?

- सुरत


📚भरतातील पहिली राजकिय संघटना कोणती?

- लैंड होल्डर्स सोसायटी.


📚 भारतातील कामगारांची पहिली संघटना स्थापन करणारे?

- नारायण मेघाजी लोखंडे


चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे


Q1) पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला CANI प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

उत्तर :-  सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल


Q2) कोणत्या राज्याने ‘इंदिरा वन मितान योजना’ लागू केली?

उत्तर :- छत्तीसगड


Q3) कोणत्या संस्थेनी वायू गुणवत्तेच्या संदर्भात व्यवस्थापनासाठी GIS-आधारित व्यासपीठ तयार करण्यासाठी बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत करार केला?

उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली


Q4) नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन (NIP) याच्या संदर्भातले इंडिया इन्वेस्टमेंट ग्रीड (IIG) व्यवस्था कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते?

उत्तर :-  वाणिज्य व उद्योग मंत्रालय


Q5 'सुरक्षा’ या नावाचे राष्ट्रीय संकेतस्थळ मानवाचा कोणत्या प्राण्याशी संघर्ष टाळण्याच्या संदर्भात आहे?

उत्तर :- हत्ती


Q6) भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान IC-IMPACTS वार्षिक संशोधन परिषद आयोजित केली जाते?

उत्तर :- कॅनडा


Q7) कोणत्या विमानतळाने भारताशी जुळलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी ‘एयर सुविधा’ या नावाने एक संकेतस्थळ विकसित केले?

उत्तर :- दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ


Q8) निधन झालेले मनीतोम्बी सिंग कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते?

उत्तर :- फुटबॉल


Q9) कोणत्या व्यक्तीची मुंबईत प्राप्तिकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त पदावर नेमणूक झाली?

उत्तर :- पतंजली झा


Q10) कोणत्या व्यक्तीची RoDTEP योजनेच्या अंतर्गत कमाल मर्यादा निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?

उत्तर :-  जी. के. पिल्लई

सयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 75 रुपयांच्या विशेष नाण्याचे प्रकाशन.


🔰सयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना (FAO) याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त 16 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 रुपये एवढे मूल्य असलेल्या एका विशेष नाण्याचे प्रकाशन होणार आहे.


🔴भारत आणि अन्न व कृषी संघटना....


🔰दशातल्या दुर्बल घटक आणि सर्वसामान्य जनतेला आर्थिक तसेच पोषक आहारादृष्ट्या अधिक मजबूत बनवण्यासाठी, अन्न आणि कृषी संघटनेने आजवर केलेले कार्य अतुलनीय आहे.

भारतीय सनदी अधिकारी डॉ. बिनय रंजन सेन यांनी वर्ष 1956-1967 मध्ये या संस्थेचे महासंचालक म्हणून जबाबदारी सांभाळली.


🔰वर्ष 2016 हे डाळींसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून आणि वर्ष 2023 हे बाजरीसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करावे, अशा भारताच्या दोन्ही प्रस्तावांचे अन्न आणि कृषी संघटनेने स्वागत आणि कौतुक केले आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) मार्गदर्शनाखाली, कार्यरत राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेने गेल्या पाच वर्षात असे 53 वाण विकसित केले आहेत. 


🔰2014 पूर्वी असे बायोफोर्टीफाईड म्हणजेच, अधिक पोषणमूल्य असलेले केवळ एकच वाण विकसित झाले होते.

संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना 


🔴(FAO) विषयी...


🔰सयुक्त राष्ट्रसंघाच्या कायमस्वरूपी प्रातिनिधिक संस्थांपैकी 16 ऑक्टोबर 1945 रोजी क्वेबेक (कॅनडा) येथे स्थापना झालेली ही पहिली संस्था आहे. FAOच्या सदस्य व सहसदस्य देशांची संख्या 197 आहे. भारत FAOचा स्थापनेपासूनचा सभासद आहे.


🔰जगातल्या सर्व देशांमधल्या लोकांचे आहारपोषण व जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तेथील कृषी, मत्स्योद्योग व वनोद्योगांचा विकास होत जाणार असे प्रयत्न करणे, हे FAOचे प्रधान उद्दिष्ट आहे.

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होणार.


🗺आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्याच्या ‘ए लॉन्ग अँड डिफिकल्ट अॅसेंट’ या शीर्षकाच्या सुधारित अहवालात व्यक्त केला आहे.


🎇इतर ठळक बाबी...


🗺पढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेऊन 8.8 टक्क्यांचा विकासदर गाठण्याची अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे.

कोविड-19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 4.4 टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


🗺जन महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेच्या घसरणीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा आता त्यामध्ये 0.8 टक्क्यांनी अधिक घट होण्याची अपेक्षा वर्तविली गेली आहे.

जगाच्या शीत प्रदेशामध्ये (युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व आशिया) हवामान बदलामुळे होणारे नुकसान हे उष्ण प्रदेशांपेक्षा कमी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


🎇आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) विषयी...


🗺आतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund -IMF) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्‍या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते.


🗺आतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी ब्रेटोन वूड्स परिषदेत झाली. संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका येथे आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP)

⛑जानेवारी 2019 मध्ये वायु प्रदूषणाविरोधी लढ्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) याची घोषणा केली होती.


⛑भारतातली हवेची गुणवत्ता 2024 सालापर्यंत 20 ते 30 टक्क्यांनी अधिक स्वच्छ करण्याचे लक्ष ठेवले गेले आहे.


⛑सन 2017 ते सन 2024 या कालावधीत कमीतकमी 102 शहरांमधल्या पार्टीकुलेट मॅटर (PM) या प्रदूषकाचे प्रदूषण 20 ते 30 टक्क्यांनी कमी करण्याचा भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाचा उद्देश आहे.

कार्यक्रमाची अंमलबजावणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) करीत आहे.

एका अभ्यासानुसर, भारतातल्या लोकांचे आयुर्मान खराब हवेच्या गुणवत्तेमुळे तब्बल 5 वर्षांनी कमी होत आहे.


🅾️हवा प्रदूषण


⛑परकृती निकोप राखण्यासाठी मानवाला सकस आहाराबरोबर स्वच्छ आणि शुध्द हवेची आवश्यकता आहे. हवेतल्या प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच वनस्पती आणि इतर जीवसृष्टीवर होतो. प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हा हवेतला महत्त्वाचा घटक आहे. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण 21 टक्के असते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वप्रथम मेंदूवर आघात होतो. विषारी अथवा अविषारी वायू केवळ आपल्या आस्तित्वाने हवेतला ऑक्सिजन कमी करतात.


⛑परदूषणास चार घटक जबाबदार आहेत - चालू नैसर्गिक स्थिती, मानवी लोकवस्ती, उत्पादनाची आणि खपाची पातळी, आणि तंत्रज्ञानाचा उपयोग. लाकूड, कोळसा, पेट्रोलियम पदार्थ यांच्या ज्वलनामुळे सल्फर डायक्साईड, कार्बन मोनोक्साईडन, नायट्रोजन ऑक्साईड हे प्रमुख प्रदूषके तयार होतात.


⛑वायू प्रदूषणामुळे मानवाला श्वसनाचे आणि फुफ्फूसाचे आजार होतात. त्याचप्रमाणे दमा, कर्करोग, बेशुध्द पडणे, घसा खवखवणे, डोळ्यातून पाणी येणे इ. विकार होतात. वनस्पतींच्या बाबतीत त्यांची वाढ खुंटणे, पाने वाळणे, वाकणे, झाड मरून जाणे किंवा उत्पन्न कमी येणे इत्यादी परिणाम होतात. तसेच वातावरणातले तापमान वाढते व त्याचा परिणाम हवामानावर तसेच पावसावर होतो.

भारतमाला प्रकल्प


💼‘भारतमाला’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात आहे.


🔷ठळक बाबी🔷


💼हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम (NHDP) यानंतर देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे, ज्याच्याअंतर्गत देशात सुमारे 50,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.


💼समारे 25 हजार किलोमीटर रस्त्याचे जाळे भारताच्या सीमांवर बनविण्याची यात तरतूद आहे. यात आणखी समुद्र किनारी क्षेत्र, समुद्री बंदरे, धार्मिक व पर्यटनाच्या क्षेत्रांचा देखील अंतर्भाव आहे. तसेच, 100 जिल्हा मुख्यालयांचाही यात समावेश आहे.


💼परकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 34 हजार 800 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येत आहे.


💼दशातली शहरे जोडणारा इकोनॉमिक कॉरिडॉर विकसित केला जाणार असून 9 हजार किलोमीटर रस्त्यांसाठी 1 लक्ष 20 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

भारताच्या शेजारी देशांसोबत दळणवळण वाढवण्यासाठी 


💼भारत-भुटान-बांगलादेश-नेपाळ-मान्यमार कॉरिडॉर विकसित केला जात आहे.

मराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन

🔥भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दातार भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरीयाची जागा घेतील.


🔥“आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी डीन श्रीकांत दातार हे हॉवर्ड बिझनेस स्कूलचे पुढील डीन असतील, अशी माहिती अध्यक्ष लॅरी बाको यांनी दिली. १ जानेवारी २०२१ पासून दातार या पदी रुजू होतील.


🔥“श्रीकांत दातार एक नाविन्यपूर्ण शिक्षक, एक प्रतिष्ठित विद्वान आणि एक अनुभवी प्राध्यापक आहेत,” असं नियुक्तीची घोषणा करताना बाको म्हणाले. व्यावसायीक शिक्षणाच्या भवितव्याविषयी ते अग्रगण्य विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. तसंच करोना महासाथीदरम्यान उद्र्भवलेल्या आव्हानंचा सामना करण्यासाठी हॉवर्ड बिझनेस स्तूलमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बाजवली आहे. हॉवर्ड बिझनेस स्तूलमध्ये गेली २५ वर्षे त्यांनी अनेक पदांवर आपली सेवा बजावली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कार 2020


🔰साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.


🔰नोबेल शांती पुरस्कार 2020 याचे विजेता - संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक खाद्यान्न कार्यक्रम (World Food Programme)


🔰साहित्यासाठी नोबेल पुरस्कार 2020 याचे विजेता - लुईसे ग्लूक (अमेरिकेची कवयित्री)


🚦जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाविषयी...


🔰जागतिक उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्यान्न सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी ही सर्वात मोठी संघटना आहे.


🔰ती एक आंतरसरकारी संस्था आहे. त्याची स्थापना 01 जानेवारी 1961 रोजी झाली. रोम (इटली) या शहरात त्याचे मुख्यालय आहे.


🔰यद्ध-संघर्षग्रस्त भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने मोलाची कामगिरी बजावली आहे. जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने 2019 साली 88 देशांतल्या जवळपास 100 दशलक्ष लोकांना मदत केली आहे.


🚦नोबेल पुरस्काराविषयी...


🔰नोबेल पुरस्कार हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडनच्या आणि नॉर्वेच्या संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.


🔰नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे       स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1895 सालापासून हा पुरस्कार दिला जातो. 


🔰तयांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 10 डिसेंबरला हे पुरस्कार दिले जातात. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये नोबेल दिले जाते. 


🔰सटॉकहोम (स्वीडन) या शहरातल्या रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या वतीने ‘स्वेरिगेस रिक्सबँक प्राइज इन इकनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल’ हा पुरस्कार दिला जातो.


🔰खाली पुरस्काराचा विषय आणि पुरस्कार देणारी संस्था यांच्या जोड्या दिल्या आहेत:


🔰भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस, स्वीडन


🔰शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्ली, स्वीडन


🔰साहित्य: स्वीडिश अकादमी, स्वीडन

शांती: हे पुरस्कार स्वीडनच्या संस्थेच्यावतीने नॉर्वे या देशातल्या नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.

दोन महिलांनी रसायनशास्त्राचे नोबेल पटकावण्याची ही पहिलीच वेळ


🔰जनुकीय संपादनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेणवीय कात्र्यांच्या संशोधनाला यंदा रसायनाशास्त्राचे नोबेल जाहीर झाले.


🔰या संशोधनामुळे रोगकारक जनुके काढून अनेक आनुवंशिक आजार तसेच कर्करोगही बरा करता येणे शक्य आहे.


🔰रसायनशास्त्राचे हे नोबेल फ्रान्सच्या इमॅन्युएल शापेंटी आणि अमेरिकेच्या जेनिफर ए. डाउडना यांना विभागून देण्यात येणार आहे.

दोन महिलांनी रसायनशास्त्राचे नोबेल  पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी प्राणी आणि माणसातील सदोष जनुके काढून टाकण्यासाठीचे ‘क्रिस्पर’ किंवा ‘कॅस 9’ तंत्रज्ञान शोधून काढले होते.


🔰ही पद्धत वनस्पती व सूक्ष्मजीवातील घातक किंवा सदोष जनुके काढून टाकण्यासाठी वापरता येते.


🔰रणवीय कात्र्यांचे हे जनुकीय साधन विशेष परिणामकारक असल्याचे रसायनशास्त्राच्या नोबेल समितीचे अध्यक्ष क्लेस गुस्ताफसन यांनी म्हटले आहे.

जागतिक वारसा स्थळे - देशनिहाय



●चीन - 55 (प्रथम स्थानी)

●इटली - 54

●जर्मनी - 47

●स्पेन - 47

●फ्रांस -  45

●भारत - 38 (भारत 38 स्थळांसह 6 व्या स्थानी)

●मेक्सिको - 35

●युनायटेड किंगडम - 31

●रशिया - 28

●इराण - 24

●अमेरिका - 23

●जपान - 23

●ब्राझील - 22

●ऑस्ट्रेलिया -  20

●कॅनडा - 20

●ग्रीस -  18

●तुर्कीस्थान -  18

●पोलंड -  16

●स्वीडन -  15

रोजर पेनरोज, रीनहार्ड गेंजेल आणि एंड्रिया गेज: भौतिकशास्त्रासाठी 2020 नोबेल पुरस्काराचे विजेते.


♓️भौतिकशास्त्रासाठी ‘2020 नोबेल’ पुरस्काराची घोषणा झाली; यावर्षी रोजर पेनरोज (ब्रिटिश), रीनहार्ड गेंजेल (जर्मनी) आणि एंड्रिया गेज (अमेरिका) यांना नोबेल दिला जाणार आहे.


♓️रोजर पेनरोज यांना अल्बर्ट आइंस्टीन यांच्या ‘सापेक्षतेचा सिद्धांत’ याबाबतची माहिती मिळवण्यासाठी गणिती पद्धत तयार केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे. तर, रीनहार्ड गेंजेल आणि एंड्रिया गेज यांना एकत्रितपणे कृष्णविवर आणि आकाशगंगा याचे रहस्य उलगडण्यासाठी पुरस्कार दिला जात आहे.


✴️नोबेल पुरस्काराविषयी....


♓️नोबेल पुरस्कार हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडनच्या आणि नॉर्वेच्या संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.


♓️नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे       स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1895 सालापासून हा पुरस्कार दिला जातो. त्यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 10 डिसेंबरला हे पुरस्कार दिले जातात. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये नोबेल दिले जाते. स्टॉकहोम (स्वीडन) या शहरातल्या रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या वतीने ‘स्वेरिगेस रिक्सबँक प्राइज इन इकनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल’ हा पुरस्कार दिला जातो.खाली पुरस्काराचा विषय आणि पुरस्कार देणारी संस्था यांच्या जोड्या दिल्या आहेत:


♓️भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस, स्वीडन

शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्ली, स्वीडन

साहित्य: स्वीडिश अकादमी, स्वीडन

शांती: हे पुरस्कार स्वीडनच्या संस्थेच्यावतीने नॉर्वे या देशातल्या नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.

12 वी BRICS शिखर परिषद.



🔰17 नोव्हेंबर 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने 12 वी BRICS शिखर परिषद आयोजित करण्याचे नियोजित आहे.


🔴ठळक बाबी...


🔰कार्यक्रमात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे प्रतिनिधी परस्पर सहकार्यावर चर्चा करणार.कार्यक्रमाचा विषय - “जागतिक स्थिरता, सामायिक सुरक्षा आणि नाविन्यपूर्ण वाढ यासाठी BRICS भागीदारी”.परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे आहे.


🔴BRICS विषयी...


🔰BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात.


🔰रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.

गोपाल हरी देशमुख


🧑‍🦰गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणतात 


🧑‍🦰लोकहितवादी हे त्यांचे टोपण नाव होतं कारण त्यांनी लिहिलेले जे

लीखान होतं ते लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध करत.


🧑‍🦰मबईहून प्रसिद्ध होणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात त्यांनी एकूण 108 पत्रे लिहिली


🧑‍🦰लोकहितवादींची जी प्रसिद्ध शतपत्रे आहेत ती हीच


🧑‍🦰तयांच पहिल शतपत्र 19 मार्च 1848 रोजी प्रसिद्ध झाले.


🧑‍🦰विधवांशी विवाह करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विधवा फंड उभारला पाहिजे असे त्यांना वाटत होते


🧑‍🦰पूणे नेटिव्ह जनरल लायब्ररी मध्ये त्यांचा वाटा होता (1848)

चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना.



🏞 अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगातील आघाडीची मोबईल आणि नेटवर्क क्षेत्रातील कंपनी नोकिया यावर काम करीत आहेत.


🏞 चद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना आखत आहेत.


🏞 नोकियाची संशोधन शाखा असलेली ‘बेल लॅब्ज’ या कंपनीला नासाने चंद्रावर अॅडव्हान्स्ड टिपिंग पॉईंट तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल नेटवर्क निर्माण करण्याच्या कामासाठी प्रमुख पार्टनर म्हणून निवडले आहे.


🏞 या प्रकल्पासाठी 14.1 मिलियन डॉलरचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.


🏞 याद्वारे चंद्रावर पहिले वायरलेस नेटवर्क प्रस्थापित करण्यात येणार आहे. 4G/LTE तंत्रज्ञानापासून याला सुरुवात होणार असून ते 5G तंत्रज्ञानामध्ये देखील रुपांतरीत करण्यात येणार आहे.


🏞 आपल्या या महत्वाकांक्षी योजनेबाबत बोलताना नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “चंद्रावर 4G/5G नेटवर्क स्थापित करण्यासाठी आम्हाला टेरेस्ट्रियल टेक्नॉलॉजीने प्रेरित केले आहे.


🏞 यासाठी प्रथम नोकियाने LTE/4G संप्रेषण प्रणाली अंतराळात तैनात करण्याचा प्रस्ताव ठेवला.”


महाराष्ट्रातील मुख्य संस्था


1. सत्यशोधक समाज

- स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे

- संस्थापक: महात्मा फुले 

- ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी


2. प्रार्थना समाज

- स्थापना: 31 मार्च 1867, मुंबई 

- संस्थापक अध्यक्ष: डाॅ. आत्माराम पांडुरंग 

- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.


3. सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना असोसिएशन)

- स्थापना: 2 एप्रिल 1870, पुणे 

- संस्थापक: न्या. रानडे & गणेश वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)

- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी


4. आर्य समाज

- स्थापना: 10 एप्रिल 1875, मुंबई 

- संस्थापक: स्वामी दयानंद सरस्वती 

भारताची आर्थिक पाहणी अहवाल 2019 -20



👉 दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आर्थिक सर्वेक्षण जाहिर करतात


👉 कष्णमूर्ती सुब्रम्हण्यम यांनी दुसऱ्यांदा आर्थिक पाहणी अहवाल जाहिर केला


👉 1950 -51 मध्ये पहिला आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. 1964

पर्यन्त केंद्रीय अर्थसंकल्पाबरोबर आर्थिक पाहणी प्रकाशित करण्यात येते. 1964 पासून मात्र अर्थसंकल्पापासून विभक्त करण्यात आले


👉 अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभाग आर्थिक सर्वेक्षण तयार करते


👉 दरवर्षी आर्थिक सर्वेक्षण जाहिर केले जावे असे कोणतेही घटनात्मक बंधन सरकारवर नाही.


👉 थीम-: 【 Enable Markets, Promote 'pro business' Policies and Strengthen 'Trust' in the Economy】


---------------------------------------------------


【GDP वृद्धिदर (स्थिर किंमतीला)】


👉 2016 - 17  -------------------- 8.2%


👉 2017- 18  --------------------- 7.2%


👉 2018 -19*  -------------------- 6.8%


👉 2019 - 20**------------------- 5.0 %


👉 2020 - 21# ------------------- 6%


(* तात्पुरते,  पाहिले अगाऊ अंदाज, *# अंदाजित)


---------------------------------------------------


  【 कृषी आणि संलग्न क्षेत्रातील वृद्धि】


👉 2017 - 18 --------------------- 5.0%


👉 2018-19* ---------------------- 2.9%


👉 2019- 20 ------------------- 2.8%


---------------------------------------------------


   【औद्योगिक क्षेत्रातील वृद्धिदर】-:


👉 2017 - 18 ---------------------- 5.9%


👉 2018-19* ---------------------- 6.9%


👉 2019-20** -------------------- 2.5%


---------------------------------------------------


  【सेवा क्षेत्रातील वृद्धिदर】-:


👉 2017- 18 ---------------------- 8.1%


👉 2018-19* ---------------------- 7.5%


👉 2019-20** --------------------- 6.9%


---------------------------------------------------


【 राजकोषिय तूट】 -:


👉 2017 -18 ----------------------- 3.5%


👉 2018-19 ------------------------ 3.4%


👉 2019-20 ------------------------ 3.3%



【प्राथमिक तूट】-:


👉 2017-18 ----------------------- 2.6%


👉 2018-19 ----------------------- 2.4%


👉2019-20 ------------------------ 2.3%


---------------------------------------------------

      

【 भारताचे पहिले 5 व्यापारी भागीदार देश】-:


1 चीन

2 अमेरिका

3 संयुक्त अरब अमिराती

4 सौदी अरेबिया

5 हाँग कॉंग


👉 भारताचा व्यापार आधिक्य -:


1 अमेरिका  2 संयुक्त अरब अमिराती


👉 भारताची व्यापार तूट-:

1 चीन  2 सौदी अरेबिया 3 इराक 

4 जर्मनी



【पहिल्या 5 निर्यात वस्तु】-:


1 पेट्रोलियम पदार्थ (13.7%)

2 मोती व मौल्यवान खड़े (7%)

3 औषधी उत्पादन (5%)

4 सोने व इतर धातूंची दागिने (4.5%)

5 लोह व पोलाद (3.0%)


【पहिल्या 5 आयात वस्तु】-:


1 कच्चे तेल ( 21%)

2 सोने (6.4%)

3 पेट्रोलियम पदार्थ(5.6%)

4 कोळसा व कोक (4.8%)

5 मोती व मौल्यवान (4.6%)


MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी सूचना

 MPSC Prelims पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला . यानंतर सर्वांच्या मनात सगळ्यात पहिले प्रश्न आला आता परीक्षा कधी होईल?


बघा या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.पण या स्थितीत आपण काय करावे याचा विचार करू..

1. अनेकांनी अभ्यास बंद केलाय तो लगेच सुरू करायला पाहिजे.

2.परीक्षा कधीही झाली तरी आपण पास झालो पाहिजे, हा आपला दृष्टिकोन पाहिजे.

3.ज्या विद्यार्थी मित्रांचा Prelims चा अभ्यास पूर्ण झाला आहे त्यांनी आता Mains चा वेगळा असलेला अभ्यास करावा. उदा. HR. HRD इ.

4.दुसरा पर्याय असा आहे की Prelims आणि Mains ला समान असलेले विषय करावेत.

 उदा. आधुनिक भारत, भूगोल, राज्यघटना इत्यादी.

5. दररोज 2 तास CSAT चालू ठेवावे.

6.Revision, MCQs सोडविण्यावर भर द्यावा.

7.ज्या मित्रांचा अभ्यास झाला नाही त्यांनी आपले कोणते विषय कमकुवत आहेत त्यावर लक्ष द्यावे.


मित्रहो, कोणीही अभ्यास बंद करू नका. हवं तर एक,दोन दिवस विश्रांती घ्या आणि परत जोरात अभ्यासाला लागा. हा काळ मेहनतीचा आहे,आपल्या अभ्यासात improvement करण्याचा आहे.


ग्रहांविषयी महत्त्वाची माहिती



सर्वात मोठा ग्रह - गुरु


सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह-  बुध


पूर्वेकडून पश्चिमकडे परिवलन करणारे ग्रह- शुक्र व युरेनस


 पश्चिमकडून पूर्वेकडे परिवलन-  बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून


सर्वात प्रकाशमान ग्रह - शुक्र


लाल ग्रह-/धुलीकामय ग्रह-  मंगळ


सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह - शुक्र.


 पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह - युरेनस 


सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह - गुरु 


सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह - शुक्र 


सूर्यापासून अंतरानुसार ग्रह-  बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून


आकारानुसार उतरत्या क्रमाने - गुरु,शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध.


** पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहांचा क्रम -  शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, युरेनस, नेपच्यून

भारतीय वायु सेना दिवस


◾️ सथापना 8 ऑक्टोबर 1932


◾️ 88 वा स्थापनादिन 


◾️26वे वायुसेना प्रमुख:- आर के एस भदौरिया


◾️बरीद वाक्य:-  "नभ: स्पृशं दीप्तम्"


◾️सवतंत्रपूर्व रॉयल इंडियन एयरफोर्स होते


◾️अभियान:- ऑपरेशन मेघदूत

ऑपरेशन पुमलाई

ऑपरेशन पवन

ऑपरेशन कैक्टस

कारगिल युद्ध


◾️लड़ाऊ विमाने:- सुखोई-30 एमकेआइ, मिराज २०००, मिग-२९, मिग-२१, एचएएल तेजस, राफेल


◾️हलीकॉप्टर:- 

ध्रुव, चेतक, चीता, एमआई-८, एमआई-१७, एमआई-२६, एमआइ-२५/३५, एचएएल लाइट कॉम्बैट हैलीकॉप्टर, एचएएल रुद्र


◾️ परशिक्षक:- हॉक एमके १३२, ऍचजेटी-१६ किरण, पिलैटस सी-७ एमके द्वितीय


◾️परिवहन:- सी-१३०जे, सी-१७ ग्लोबमास्टर तृतीय, आईएल-७६, एन-३२, ऍचएस ७४८, डू २२८, बोइंग ७३७, ईआरजे १३५


◾️जगातील चौथी सर्वात मोठी वायुसेवा आहे.


भारतीय महिला स्वातंत्र्यसेनानी



🔸सचेता कृपलानी


- गांधीवादी, स्वतंत्र सेनानी आणि राजकारणी 

- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग, उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री 

- 1940 मध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना


🔸 मातीगिनी हाजरा


- Gandhi Buri या नावाने प्रसिद्ध 

- चले जाव आणि असहकार चळवळीत सक्रीय सहभाग 


🔸 लक्ष्मी सेहगल


- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापलेल्या Indian National Army मध्ये कॅप्टन

- झाशीची राणी रेजिमेंटचे नेतृत्व 

- दुसर्या महायुद्धात सहभाग


🔸कित्तूरची राणी चनम्मा


- कर्नाटकातील कित्तूर संस्थानाची राणी

- वयाच्या 33 व्या वर्षी 1824 मध्ये ब्रिटिशांच्या खालसा धोरणाविरोधात सशस्त्र उठाव


🔸कनकलता बारूआ


- आसाममधील स्वतंत्रसेनानी, वीरबाला या नावाने प्रसिद्ध. 

- चले जाव (1942) चळवळीत सक्रीय सहभाग 

- वयाच्या 18 व्या वर्षी ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात शहीद


🔸कमलादेवी चटोपाध्याय


- 1930 मध्ये मीठाच्या सत्याग्रहात सहभाग

- परखड राष्ट्रभक्ती धोरणामुळे ब्रिटिश सरकारकडून अटक होणार पहिल्या महिला 

- कायदेमंडळाच्या पहिल्या महिला उमेदवार 

- अखिल भारतीय महिला परीषदेच्या स्थापनेत सहभाग


🔸मादाम भिकाजी कामा


- लिंग समानतेवर भर देणार्या भारतीय राष्ट्रीय चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या

- 1904 मध्ये भारतीय राजदूत या नात्याने जर्मनीत भारतीय राष्ट्रध्वज फडकवला


🔸 अरूणा असफ अली


- भारतीय स्वातंत्र्य चळवळीची The Grand Old Lady म्हणून ओळख. 

- भारत छोडो आंदोलना दरम्यान गवालिया टॅक मैदान मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा फडकवला .


💐💐💐💐💐💐

"अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) )"



◾️2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी  होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी  आहेत त्याचा आढावा.....


◾️कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.


1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.


2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.


3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.


4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.


5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.


6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.


7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.


८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.


9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.


10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.


11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.

लॉर्ड डलहौसी

🔘कालावधी:-1848 ते 1856


✍️खल्या व्यापार चे तत्व आणले


✍️सिमला उन्हाळी राजधानी केली


✍️खलसाधोरण साठी प्रसिद्ध होता


☀️दत्तकविधान नामंजूर खालसा


🔘सातारा:-1848 🔘सबलपूर:-1849


🔘जतपुर:-1849 🔘बघाट:-1850


🔘उदयपूर:-1852 🔘झाशी:-1853


🔘नागपूर:-1854


🌻अतर्गत राज्यकारभार गोंधळ


👁‍🗨सिक्कीम:-1850


👁‍🗨अवध:-1856


👉1853:-बिनतारी संदेशवहन सुरू


👉1854:-पोस्ट खाते सुरू


✍️पहिले पोस्ट तिकीट कराची ला


🎯16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे रेल्वे धावली


✍️1856:-विधवा पुनर्विवाह कायदा पास


✍️1856:-धार्मिक आयोग्यत कायदा


🔘1856:-सामान्य सेवा भर्ती कायदा


👉1854:-सार्वजनिक बांधकाम खाते सुरू


👉1856:-पहिले अभियांत्रिकी कॉलेज सुरू रुरकी येथे


👉1853:-पहिली कापड गिरणी सुरू


☀️1849:-दुसरे इंग्रज शीख युद्ध 


☀️1852:-इंग्रज ब्रम्ही युद्ध


गौतम बुद्ध : परिचय.

🧩 महामाया...

  🅾️या कोलिय वंशाच्या राजकुमारी होत्या. त्या शाक्य नरेश शुद्धोधन यांच्या पत्नी व  गौतम बुद्धांच्या आई होत्या.


🧩राहुल...

🅾️हा यशोधरा व गौतम बुद्धांचा एकमेव पुत्र होता. राहुल बुद्ध संघात सामील होऊन भिक्खू बनला.


🧩 महाप्रजापती गौतमी ...

🅾️महाप्रजापती गौतमी या महामाया बहिण व कोलिय वंशाच्या राजकुमारी होत्या. त्या शाक्य नरेश शुद्धोधन यांच्या दुसऱ्या पत्नी व गौतम बुद्धांच्या मावशी व सावत्र आई होत्या. नंतर या भिक्खूणी बनल्या.

गौतम बुद्ध : जन्म .

🅾️सिद्धार्थाचे जन्मस्थळ लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी, सध्याच्या नेपाळ मध्ये आहे. गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध साहित्यानुसार, त्यांचे पिता राजा शुद्धोधन शाक्य या कोशल प्रांताचे राजा होते. 

🅾️लोक कथेनुसार शुद्धोदन हे नागवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते.

🅾️ राजा शुद्धोदनाची पत्‍नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई. शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. हा दिवस थेरवाद राष्ट्रे वेसाक (वैशाख) म्हणून साजरा करतात.

 🅾️सिद्धार्थाच्या जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निधन झाले. बाळाचे नांव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. गौतम बुद्ध : प्रारंभिक जीवन.💠💠

🅾️राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. 

🅾️जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. 

🅾️तयाने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती.



गौतम बुद्ध : प्रारंभिक जीवन.

🅾️राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. 

🅾️जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. 

🅾️तयाने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती.

गौतम बुद्ध : विवाह.

🅾️सोळा वर्ष वय झाल्यावर शुद्धोदनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला. यथावकाश, तिने एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले. 

🅾️धनवैभव, मानमरातब, प्रेमळ पत्‍नी, राजस पुत्र- सौख्यास कांहीही कमी नाही असे २९ वर्षांचे आयुष्य, सिद्धार्थाला त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत चालले होते.

 गौतम बुद्ध : ज्ञानप्राप्ती.

🅾️गहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली.

 🅾️आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. 

🅾️जञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधी वृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.

गौतम बुद्ध : परिनिर्वाण.

🅾️इ.स.पू. ५६३ ते इ.स.पू. ४८३ हा भगवान गौतम बुद्धांचा कालावधी.

🅾️बद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या वृक्षाला बोधी वृक्ष (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.

 🅾️जञानी बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास धम्मचक्रप्रवर्तन किंवा धम्मचक्कपवत्तन असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला.

भारतातील सर्वात लांब.


1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल  

 - सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा) 

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे.


  🧩भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव


1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान 

3) काळे खंड - आफ्रिका 

4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार

9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

10) नाईलची देणगी - इजिप्त

11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन

12) पाचुचे बेट - श्रीलंका

13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान

14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

16) गव्हाचे कोठार - युक्रेन

फेब्रुवारी २०२१ पर्यंत आटोक्यात येईल करोनाचं संकट, शास्रज्ञांच्या समितीचा दावा.


🔰फब्रुवारी २०२१ पर्यंत करोनाचं संकट आटोक्यात येईल असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. सध्याच्या घडीला भारतात करोनाची साथ तिच्या सर्वोच्च सीमेवर आहे. आता करोनाच्या साथीचा आलेख हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल.


🔰फब्रुवारी २०२१ पर्यंत भारतातील करोनाची साथ आटोक्यात येईल असंही वैज्ञानिकांच्या या समितीने म्हटलं आहे. हळूहळू या साथीचा प्रादुर्भाव कमी होईल असंही या समितीने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. एवढंच नाही तर या समितीने असाही दावा केला आहे की भारतात करोनाच्या केसेस या १ कोटी ६ लाखांपेक्षा जास्त वाढणार नाहीत.


🔰सध्याच्या घडीला भारतात करोनाग्रस्तांची एकूण संख्या ७५ लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र त्यापैकी ६५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान मोदी सरकारने मार्च महिन्यात देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली असंही या समितीने म्हटलं आहे.


🔰सरकारच्या वैज्ञानिकांच्या समितीचे प्रमुख सल्लागार के. विजयराघवन यांनी या समितीची स्थापना केली आहे. या समितीने आणखी एक दावा केला आहे की जर मोदी सरकारने मार्च महिन्यात लॉकडाउन लागू केला नसता तर देशभरात करोनामुळे २५ लाख लोकांचे प्राण गेले असते.

ड्रॅगनला झटका, मलाबार युद्ध कवायतीसाठी भारताने जोडला एक नवा मित्र.



🔰दरवर्षी आयोजित होणाऱ्या मलाबार नौदल युद्ध कवायतींमध्ये आता आणखी एक देश सहभागी होणार आहे. या युद्ध कवायतीच्या निमित्ताने भारताने एक नवीन मित्र जोडला आहे. पूर्व लडाख सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनसाठी हा एक झटका आहे. कारण मलाबार नौदल कवायतीच्या निमित्ताने चीन विरोधात एक भक्कम आघाडी उभी करण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत.


🔰आता भारत, अमेरिका आणि जपानसह ऑस्ट्रेलियन नौदलही मलाबार युद्ध कवायतीमध्ये सहभागी होणार आहे. आतापर्यंत फक्त भारत, अमेरिका आणि जपान हे तीनच देश या कवायतीमध्ये सहभागी व्हायचे. नोव्हेंबर महिन्यात हा युद्धाभ्यास होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाला या कवायतीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देण्याविषयी विचार सुरु होता.


🔰या निर्णयावर चीनची प्रतिक्रिया काय असेल? याबद्दल थोडी चिंता होती. भारताप्रमाणेच चीनचे अमेरिका, जपान या देशांबरोबरही फारसे जमत नाही. ऑस्ट्रेलिया बरोबरही त्यांचे तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. या महिन्याच्या सुरुवातील टोक्योमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड गटाची बैठक पार पडली.


🔰कवाड गटातील चारही देश चीनच्या विस्तारवादी आणि वर्चस्व गाजवण्याच्या प्रवृत्तीमुळे त्रस्त आहेत. दक्षिण चीन समुद्र आणि व्यापारावरुन चीनचा अमेरिकेबरोबर वाद सुरु आहे. भारताबरोबर सीमावाद चालू आहे. “मलाबार कवायती २०२० ऑस्ट्रेलियन संरक्षण दलासाठी एक मोठी संधी आहे” असे ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया यापूर्वी २००७ साली शेवटचे मलाबार कवायतीमध्ये सहभागी झाला होता.

मक्तेदारीप्रकरणी गूगलविरुद्ध खटला.


🔰मक्तेदारी प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाने गूगलविरुद्ध खटला दाखल केला आहे. ऑनलाइन शोध आणि जाहिरात यावरील वर्चस्वाचा स्पर्धेला मारक ठरेल असा गैरवापर केल्याचा आणि पर्यायाने ग्राहकांना हानी पोहोचविल्याचा गूगलवर आरोप आहे.


🔰निकोप स्पर्धा असावी यासाठी सरकारने दावा दाखल करून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे मानले जात आहे. जवळपास २० वर्षांहूनही अधिक काळापूर्वी सरकारने मायक्रोसॉफ्टविरुद्धही दावा दाखल केला होता.


🔰सरकारकडून आणखीही काही कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असून  गूगलविरुद्धची कारवाई ही सुरूवात असू शकते. सरकारने अ‍ॅपल, अमेझॉन आणि फेसबुक या कंपन्यांच्या तपासालाही न्याय विभाग आणि मध्यवर्ती व्यापार आयोगाला हिरवा कंदील दाखविला आहे.


🔰अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांना दूर सारून गूगलने आपली मक्तेदारी प्रस्थापित केली ती बाजारातील स्पर्धेसाठी हानिकारक आहे, असे अमेरिकेचे डय़ेपुटी अ‍ॅटर्नी जनरल जेफ रॉसन यांनी वार्ताहरांना सांगितले.

प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही, बंद करण्याचा विचार सुरू; ICMRची महत्त्वाची माहिती.


🔰करोना रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपीबद्दल (रक्तद्रव्य उपचार पद्धती) अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज महत्त्वाची माहिती दिली. करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही. मृत्यू दर रोखण्यात ही उपचार पद्धती यशस्वी ठरलेली नाही, त्यामुळे ती उपचाराच्या यादीतून वगळण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती आयसीएमआरचे बलराम भार्गवा यांनी आज दिली.


🔰आयसीएमआरचे अध्यक्ष बलराम भार्गवा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्लाझ्मा थेरपीविषयी बोलताना भार्गवा म्हणाले,’अनेक अभ्यासाच्या निष्कर्षात असं दिसून आलं आहे की, करोनामुळे होणारा मृत्यू दर रोखण्यात प्लाझा थेरपी फारशी परिणामकारक ठरली नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे करोना रुग्णांसाठी ठरवण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य उपचार प्रोटोकॉलमधून ती वगळ्याचा विचार सुरू आहे,” असं भार्गवा यांनी सांगितलं.


🔰करोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही उपचार पद्धती फायदेशीर असल्याचं सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यावर नंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यापूर्वी आयसीएमआरनं प्लाझ्मा थेरपीच्या परिणामांवर प्रश्न उपस्थित केले होते. करोना उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी ऐवजी अँटिसेरा (प्राणी रक्तद्रव्य चाचणी) या पर्यायाचा वापर केला जाईल, असं म्हटलं होतं.

सर्वात प्रभावशाली देशांच्या ‘एशिया पॉवर इंडेक्स 2020’ यादीत भारत चौथ्या क्रमांकावर.


🔰सिडनी (ऑस्ट्रेलिया) शहरातल्या लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेनी ‘एशिया पॉवर इंडेक्स 2020’ नामक एक अहवाल प्रकाशित केला आहे. 


🔰कलेल्या अभ्यासामध्ये आशिया-प्रशांत प्रदेशामधल्या सर्वात प्रभावशाली / सामर्थ्यशाली देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे.


🔰जगातल्या प्रमुख देशांची आर्थिक क्षमता, लष्करी क्षमता, देशांतर्गत परिस्थिती, भविष्याचे नियोजन, जगातील इतर देशांसोबत असलेले संबंध, राजकीय व कूटनीतिक प्रभाव इत्यादी घटकांचा विचार करून दरवर्षी शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली जाते.


🔴ठळक बाबी...


🔰आशिया प्रशांत प्रदेशामध्ये भारत हा चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे. भारताला 2020 साली 39.7 गुण मिळाले आहेत.


🔰आशिया प्रशांत प्रदेशामध्ये प्रथम तीन सर्वात प्रभावशाली देश (अनुक्रमे) - अमेरिका, चीन आणि जपान

आशिया प्रशांत प्रदेशामध्ये महामारीमुळे सरासार परिस्थिती खालावत चाललेल्या 18 देशांमध्ये भारताचा समावेश आहे. 


🔰महामारीमुळे देशाच्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण पडला असून यामुळेच भारताचा विकास मंदावला आहे, असे अहवालात म्हटले आहे.


🔰आशियातल्या सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणारा भारत देश चांगली कामगिरी करणारा हिंद-प्रशांत प्रदेशातला मध्यम स्तरावरील देश आहे. भारताने राजनयिक प्रभावात दक्षिण कोरिया आणि रशियालाही मागे टाकले आहे.या दशकाच्या अखेरपर्यंत भारत चीनच्या एकूण आर्थिक उत्पादनाच्या केवळ 40 टक्केच पोहचू शकतो, तर 2019 आधी ही शक्यता 50 टक्के इतकी वर्तवण्यात आली होती.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीची याचिका फेटाळली


🔰महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार बरखास्त करावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.


🔰दिल्लीस्थित सामाजिक कार्यकर्ते विक्रम गेहलोत यांच्यासह तिघांची याचिका दाखल करून घेण्यास सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांच्या पीठाने नकार दिला. भारताचे नागरिक या नात्याने आपल्याला संबंधित मागणीसाठी राष्ट्रपतींकडे जाण्याची मुभा आहे. राष्ट्रपतींकडे दाद मागावी, त्यासाठी न्यायालयात येऊ  नये, असे सरन्यायाधीश बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना सांगितले. अशा स्वरूपाची जनहित याचिका न्यायालय दाखल करून घेऊ  शकत नाही वा हस्तक्षेप करू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.


🔰याचिककर्त्यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी तसेच, अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मुंबईतील स्थावर मालमत्तेवरील कारवाईचा संदर्भ दिला होता. या दोन उदाहरणांच्या आधारे राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर, याचिकेत दिलेल्या संदर्भातील घटना फक्त मुंबईतील आहेत.


🔰तम्हाला महाराष्ट्र राज्य किती मोठे आहे हे माहिती आहे का, असा प्रश्न सरन्यायाधीश बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना विचारला. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात घटना आणि कायद्याचे पालन करणारी एकही गोष्ट राज्य सरकारने केली नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे का, अशी विचारणाही न्यायालयाने केली.

उत्तराखंडमधील पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत


🔰उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला असून आहे.


🔰आसन हे रामसर दर्जा मिळवणारे उत्तराखंडमधील पहिले ठिकाण आहे.

1971 मध्ये इराणच्या रामसर या शहरात रामसर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती.


🔰रामसरने आसन या ठिकाणाचा समावेश यादीत केला असून भारतात अशी 38 ठिकाणे आहेत.


🔰दक्षिण आशियात भारताची एकूण 38 पाणथळ  ठिकाणे या यादीत आहेत.

जगात आतापर्यंत दोन हजार ठिकाणांना रामसर दर्जा मिळाला असून त्यांचे क्षेत्र 20 कोटी हेक्टरचे आहे.


🔰भारताच्या 10 पाणथळ जागांना जानेवारीत रामसर दर्जा मिळाला असून त्यात महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर, पंजाबमधील बियास व नांगल, केशोपूर व मियानी, उत्तर प्रदेशातील नवाबगंज, पार्वती आग्रा, सामान, समासपूर,संदी, सरसाईनवार यांचा समावेश त्यात होता.


🔰इतर ठिकाणे राजस्थान, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, मणिपूर, गुजरात, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश येथे आहेत.

जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ यादीत भारत 94 व्या स्थानी.


🔰इटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (IFPRI) या संस्थेच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जागतिक भूकबळी 2020’ अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ या 107 देशांच्या यादीत भारताला 94 व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.


🔴ठळक बाबी...


🔰शजारच्या नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशांच्याही खाली भारताचे स्थान आहे.


🔰सध्या भारत भूकबळीच्या अशा स्तरावर आहे, जो गंभीर मानला जातो.

देशातल्या 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्या निर्धारीत पौष्टीक आहारापासून वंचित आहे.भारतातली 14 टक्के लोकसंख्या कुपोषित आहे. देशात लहान मुलांमध्ये खुंटलेल्या वाढीचे प्रमाण 37.4 टक्के आहे.

१९ ऑक्टोबर २०२०

राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार- २०२०



-  प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. सूर्येदू दत्ता, डॉ. किंशूक दासगुप्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन यांना जाहीर झाला आहे.


◾️ वज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (सीएसआयआर) विज्ञान, संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो. 


- यंदा हा पुरस्कार देशभरातील बारा वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. त्यापैकी चार वैज्ञानिक राज्यातील आहेत.


◾️डॉ. अमोल कु लकर्णी- 

- डॉ. अमोल कु लकर्णी हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक आहेत.


-  अभियांत्रिकी विज्ञान शाखेत त्यांचे संशोधन आहे. औषधे, रंग, सुवासिक रसायने व नॅनोपदार्थ यांच्या निर्मितीत लागणाऱ्या घटकांच्या निर्मितीसाठी वापर के ल्या जाणाऱ्या रासायनिक भट्टय़ांची रचना आणि विकासामध्ये त्यांनी मोठे काम के ले आहे. 


-  भारतातील पहिली ‘मायक्रोरिअ‍ॅक्टर लॅबोरेटरी’ उभारण्याचा मान डॉ.

कुलकर्णी यांना जातो. 


- भटनागर पुरस्कारासह डॉ. कु लकर्णी आणखी एका सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. 


- डॉ. ए. व्ही. राव अध्यासनासाठीही त्यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असून त्याद्वारे त्यांना संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.


◾️डॉ. सूर्येदू दत्ता - 

डॉ. सूर्येदू दत्ता हे आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत. भूवैज्ञानिक म्हूणन कार्यरत आहेत.



 ◾️डॉ. यू. के . आनंदवर्धन-

-  डॉ. यू. के . आनंदवर्धनन हे आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत.


- डॉ. आनंदवर्धनन गणित वैज्ञानिक आहेत. 


◾️डॉ. किंशूक दासगुप्ता- 

- भाभा अणू संशोधन के ंद्रात काम करतात. 


- शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयर) ७९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. 


-  विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षांंपर्यंतच्या शास्त्रज्ञांना, पुरस्कार वर्षांच्या आधीच्या पाच वर्षांतील संशोधनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. 


- सीएसआयरचे संस्थापक संचालक शांती स्वरुप भटनागर यांच्या नावाने विज्ञान, तंत्रज्ञानात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.


-  पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

प्रशांत महासागर



 (इतर उच्चारः पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला दक्षिणेला दक्षिणी महासागर,पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत.


पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रशांत महासागर


प्रशांत महासागराचे एकुण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) इतकी खोली असलेला मेरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरामधील सर्वात मोठे बेट आहे.


युरोपियन शोधकांनी प्रशांत महासागराचा १६व्या शतकामध्ये शोध लावला. पॅसिफिक ओशन हे नाव पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मेजेलन ह्याने आपल्या विश्वसफरेदरम्यान ह्या महासागराला पोर्तुगीज भाषेत दिलेल्या मार पॅसिफिको (शांत समुद्र) ह्या वरून ठेवण्यात आले आहे.


जिल्हा परिषद



जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.


 नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली.


 महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.


रचना – प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.


सभासद संख्या – प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात.


 हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.


 जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.


सभासदांची निवडणूक – प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.


पात्रता (सभासदांची) – जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.


तो भारताचा नागरिक असावा.

त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.


1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.


आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.


तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.


कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.


अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.



कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.


राजीनामा :


अध्यक्ष – विभागीय आयुक्ताकडे

उपाध्यक्ष – जिल्हा परिषद अध्यक्षाकडे

मानधन :


1. अध्यक्ष – 20,000/-


अविश्वासाचा ठराव – अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.


सचिव – जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.


बैठक : जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.


मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :


 प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

वलाटी व खलाटी

 वलाटी 

कोकण किनारपट्टीचा सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतच्या भागाला वलाटी असे म्हणतात. उंची सरासरी 200 ते 300 मीटर असते, उतार तीव्र स्वरूपाचा आहे. डोंगराळ भाग, वेगाने वाहणाऱ्या नद्या, दऱ्याखोऱ्यांचा भाग हे या भागाचे वैशिष्ट्य सांगता येईल.


खलाटी:-

पश्चिमेकडील अरबी समुद्र लगतच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात. या भागाची उंची 5 ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक असते. उतार सौम्य आहे. या भागात लहान मैदाने, खाड्या, वाळूचे दांडे,  खाजणे, चौपाटी तसेच समुद्रलाटांनी तयार केलेली भूरूपे आढळतात.

समानार्थी शब्द



एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ


ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 


ओज - तेज, पाणी, बळ 


ओढ - कल, ताण, आकर्षण 


ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध 


ओळख - माहिती, जामीन, परिचय 


कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप 


कळकळ - चिंता, काळजी, फिकीर,

 आस्था

श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव,

 माधव 


कपाळ - ललाट, भाल, निढळ 


कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 


कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 


काक - कावळा, वायस, एकाक्ष 


किरण - रश्मी, कर, अंशू 


काळोख - तिमिर, अंधार, तम 


कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 


करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी


कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 


कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 


कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 


खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज,

 पाखरू 


खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 


खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड,


विभक्ती



नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.


वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात. 


शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.


जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे 


असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.


विभक्त्यार्थ दोन प्रकार 

१) कारकार्थ - कारक व कारकार्थ

२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म


विभक्तीची आठ नावे

१) प्रथमा 

२) द्वितीया 

३) तृतीया 

४) चतुर्थी  

५) पंचमी 

६) षष्ठी 

७) सप्तमी  

८)  संबोधन 


विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा


विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)

१) प्रथमा  -  प्रत्यय नाही  -  प्रत्यय नाही       

२) द्वितीया  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते    

३) तृतीया  -  ने, ए, शी  -  नी, शी, ही     

४) चतुर्थी  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते     

५) पंचमी  -  ऊन, हून  -  ऊन, हून     

६) षष्ठी  -  चा, ची, चे  -  चे, च्या, ची   

७) सप्तमी  -  त, ई, आ  -  त, ई, आ   

८) संबोधन  -  प्रत्यय नाही  -  नो


विभक्तीतील रूपे

विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)

१) प्रथमा -  फूल  -  फुले 

२) द्वितीया  -  फुलास, दुलाला  -  फुलांस, फुलांना

३) तृतीया  -  फुलाने, फुलाशी  -  फुलांनी, फुलांशी

४) चतुर्थी  -  फुलास, फुलाला  -  फुलांस, फुलांना

५) पंचमी  -  फुलातून, फुलाहून  -  फुलांतून, फुलांहून

६) षष्ठी  -  फुलाचा, फुलाची, फुलाचे  -  फुलांचा, फुलांची, फुलांचे

७) सप्तमी  -  फुलात  -  फुलांत

८) संबोधन  -  फुला  -  फुलांनी


वाचा :- मराठी विरामचिन्हे व त्याचे प्रकार



1]  पूर्णविराम(.) 


👉 कव्हा वापरतात : वाक्य पूर्ण झाल्यावर I शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अक्षरांपूढे.

उदा. माझे काम झाले. I लो.टि. (लोकमान्य टिळक)


2 ] अर्धविराम (;) 


👉 केव्हा वापरतात  ;  दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना.

उदा. सागर हुशार आहे; पण तो अभ्यास करत नाही.


3] स्वल्पविराम (‘) 


👉 केव्हा वापरतात : एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास I संबोधन (हाक मारणे) दर्शवितांना.

उदा. माझ्याकडे इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या सर्व विषयांचे पुस्तके आहेत. I राम, इकडे ये.


4] अपूर्णविराम (, उपपुर्णविराम) : 


👉 केव्हा वापरतात: वाक्याच्या शेवटी तपशील घावयाचा असल्यास.

उदा. पुढील क्रमांकाचे विधार्थी उत्तीर्ण झाले: 5, 7, 9, 12,15,18


5] प्रश्नचिन्ह (?) 


👉 केव्हा वापरतात: प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी.

उदा. तुझे नाव काय? I तू कोठून आलास?


विटामिन संबंधी महत्वपूर्ण तथ्य



● विटामिन - 'A'

》रासायनिक नाम : रेटिनाॅल

》कमी से रोग: रतौंधी

》स्त्रोत (Source):  गाजर, दूध, अण्डा, फल


● विटामिन - 'B1'

》रासायनिक नाम: थायमिन

》कमी से रोग: बेरी-बेरी

》स्त्रोत (Source): मुंगफली, आलू, सब्जीयाँ


● विटामिन - 'B2'

》रासायनिक नाम: राइबोफ्लेबिन

》कमी से रोग: त्वचा फटना, आँख का रोग

》स्त्रोत (Source):  अण्डा, दूध, हरी सब्जियाँ


● विटामिन - 'B3'

》रासायनिक नाम: पैण्टोथेनिक अम्ल

》कमी से रोग: पैरों में जलन, बाल सफेद

》स्त्रोत (Source): मांस, दूध, टमाटर, मंूगफली


● विटामिन - 'B5'

》रासायनिक नाम: निकोटिनेमाइड (नियासिन)

》कमी से रोग: मासिक विकार (पेलाग्रा)

》स्त्रोत (Source): मांस, मूंगफली, आलू


●विटामिन - 'B6'

》रासायनिक नाम: पाइरीडाॅक्सिन

》कमी से रोग: एनीमिया, त्वचा रोग

》स्त्रोत (Source): दूध, मांस, सब्जी


● विटामिन - 'H  / B7'

》रासायनिक नाम: बायोटिन

》कमी से रोग: बालों का गिरना , चर्म रोग

》स्त्रोत (Source): यीस्ट, गेहूँ, अण्डा


● विटामिन - 'B12'

》रासायनिक नाम: सायनोकोबालमिन

》कमी से रोग: एनीमिया, पाण्डू रोग

》स्त्रोत (Source): मांस, कजेली, दूध


● विटामिन - 'C'

》रासायनिक नाम: एस्कार्बिक एसिड

》कमी से रोग: स्कर्वी, मसूड़ों का फुलना

》स्त्रोत (Source): आँवला, नींबू, संतरा, नारंगी


● विटामिन - 'D'

》रासायनिक नाम: कैल्सिफेराॅल

》कमी से रोग: रिकेट्स

》स्त्रोत (Source):  सूर्य का प्रकाश, दूध, अण्डा


● विटामिन - 'E'

》रासायनिक नाम: टेकोफेराॅल

》कमी से रोग: जनन शक्ति का कम  होना

》स्त्रोत (Source): हरी सब्जी, मक्खन, दूध


● विटामिन - 'K'

》रासायनिक नाम: फिलोक्वीनाॅन

》कमी से रोग: रक्त का थक्का न बनना

》स्त्रोत (Source): टमाटर, हरी सब्जियाँ, दूध

मराठी व्याकरण


प्रश्न(१) 'दादा पायी चालत आले' या वाक्यातील 'पायी' या सप्तमी विभक्तीच्या रूपाचा कारकार्थ कोणता? 

१) अधिकरण

२) करण✅

३) अपदान

४) कर्ता

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(२) योग्य पर्याय निवडा

मृच्छकटीक 

१) मृच्छ + कटिक

२) मृत + छकटिक

3) मृत्+ शकटिक✅

४) मृच्च + कटिक

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(३) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शाषणाने ---------- यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

१) शाम मनोहर

२) कोतिकराव ठाले पाटील

३) नरेन्द्र जाधव

४) रंगनाथ पठारे✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(४) 'अधोमुख' या शब्दाचा विरुद्ध अर्थ सांगा.

१) संमुख

२) उन्मुख✅

३) विमुख

४) दुर्मुख

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(५) 'अश्वत्थ' या शब्दाचा समान अर्थ -

१) वड

२) पिंपळ✅

३) कदंब

४) उंबर

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(६) योग्य शब्दाची निवड करा.

पिस्तुल पाहून साक्षीदाराला न्यायालयातच  ........... आली.

१) घेरी

२) चक्कर

३) मूर्च्छा✅

४) भोवळ

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(७) पद्याची रचना ज्या शास्त्राच्या आधाराने होत असते किंवा अनेक प्रकारच्या पद्यांवरून जे शास्त्र तयार झालेले आहे त्याचे नाव कोणते?

१) काव्यशास्त्र

२) साहित्यशास्त्र

३) टीकाशास्त्र

४) छंदशास्र ✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(८) " होते जनात अपकीर्ती निरक्षरांची" या काव्यातील वृत्ते ओळखा.

१) इद्रवज्रा

२) उपेंद्रवज्रा

३) भ्रांतिमान

४) वसंततिलिका✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(९) पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत? 

म   स   ज   स   त   त   ग 

१) भुजंगप्रयात

२) वसंततिलिका

३) आर्या

४) शार्दूलर्विक्रीडित✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(१०) चुकीची जोडी ओळखा.

१) सलाम - मंगेश पाडगावकर

२) पैस - दुर्गा भागवत

३) झोंबी - आनंद गायकवाड✅

४) खूणगाठी - ना.घ. देशपांडे

🍁🍁🍁🍁🍁🍁


Q-1 ) महषी पंतजली व्याकरणाला काय म्हणत असत?

1) वाक्यनुशासन

2) शब्दानुशासन✅

3) अर्थनुशासन

4) व्याकरणशासन


Q-2) महाप्राण व्यंजने मानण्यास कोणी विरोध दर्शविला?

1) प्रा.सबनीस

2) प्रा.रंगनाथ पठारावर

3) प्रा.मंगरूळकर✅

4) प्रा.मो.रात्री.वाळिंबे


Q- 3)खालील पैकी संयुक्त स्वर कोणता?

1) ऋ

2) आ

3) लृ

4) ए✅


Q- 4) 'ड्' आणि 'ढ्' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा?

1) कठोर व्यंजने

2) उष्मे व्यंजने

3) मृदू व्यंजने✅

4) महाप्राण व्यंजने


Q- 5) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने.....अध्यक्षते खाली एक समिती नेमली होती?

1) शाम मनोहर

2) कौतिकराव ठाले पाटील

3) नरेंद्र जाधव

4) रंगनाथ पठारे✅


Q- 6) खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते?

1) सदाचार✅

2) सन्मती

3) वाड्:मय

4) समाचार


Q- 7)  योग्य विधाने निवडा

अ) दोन स्वर एकत्र येतात तेव्हा ती स्वरसंधी असते.

ब) पहिले व्यंजन व त्यानंतर व्यंजन/ स्वर एकत्र आल्यास ती व्यंजन संधी असते.

क) पहिला विसर्ग व त्यानंतर स्वर / व्यंजन आल्यास त्याला विसर्ग संधी म्हणतात.


1)  फक्त अ,ब बरोबर

2) फक्त ब,क बरोबर

3) सर्व बरोबर✅

4) सर्व चूक


Q- 8) त् पुढे ल् आल्यास त् चा ल् होतो या नियमानुसार होणारी संधी कोणती?

1) उज्ज्चल

2) तल्लीन✅

3) सज्जन

4) वाल्मीक


Q- 9) चुकीची जोडी ओळखा

१) यश: + धन = यशोधन

२) नि:  + काम = निष्काम

३) मनू + अंतर = मन्वंतर

४) नौ   + इक  = नावीक✅


Q - 10) 'गाय' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा?

1) गायी 

2) बैल

3) गाई✅

4) गाय


तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम



1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके

2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके

3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके

4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके

5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके

6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके


🌺महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे


1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

नयूटनचे गतीविषयक नियम :

💕पहिला नियम :

💕‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते’.

💕 यालाच ‘जडत्वाचा नियम’ असे म्हणतात.

💕उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.




💕दसरा नियम :

💕‘संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते’.

💕उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.

💕सवेग –

💕वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.

💕p=mv.

💕सवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ.

💕mv-mu/t.

💕m(v-u)/t.




💕तिसरा नियम :

💕‘प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात’.

💕उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.

१८ ऑक्टोबर २०२०

ससदेविषयी महत्त्वाची माहीती




· एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्‍यावी लागतात.


· संसदेच्‍या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्‍तीत जास्‍त सहा महिने असू शकतो.


· नागरिकत्‍व नियमित करण्‍याचा अधिकार संसदेस आहे.


· राज्‍यघटनेतील तरतुदी बदलण्‍याचा अधिकार केवळ संसदेला आहे.


· घटनेच्‍या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्‍याचे अधिकार संसद यांना आहेत.


· संरक्षण या विषयावर कायदा करण्‍याचे सर्वस्‍वी अधिकार संसदेस आहेत.


· जेव्‍हा राज्‍यात राष्‍ट्रपती-शासन कलम ३५६ अन्‍वये लागू होते, तेव्‍हा राज्‍य यादीतील कर कायदे संमत करण्‍याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.


· विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्‍यासाठी त्‍यांला तीन टप्‍प्‍यातून जावे लागते.


· करात कपात किंवा कर रद्द करण्‍याविषयी तरतूद असलेले विधेयक राष्‍ट्रपतीच्‍या शिफारशीशिवाय मांडता येतो.


· सामान्‍यत: वित्त विधेयकाची मसंडणी व प्रविष्‍टीकरण राष्‍ट्रपतींची शिफारस असल्‍याशिवाय शक्‍य होत नाही.


· वित्त विधेयकाची मांडणी राष्‍ट्रपती यांच्‍या शिफरशीवरून केली जाते.


· विधेयक वित्त विधेयक आहे/नाही असा प्रश्‍न उद्भवचल्‍यास अंतिम निर्णय लोकसभेचे सभापतीचा असतो.


· वित्त विधेयक हे कर, कर्जे व खर्च याबाबत असते.


· वित्त-विधेयक प्रथमत: लोकसभेत मांडले जाते.


· सर्व वित्त विधेयके (Financial Bills) ही धन विधेयके (Money Bills) असतात.


· राज्‍यघटनेच्‍या कलम ३३० व ३३२ अनुसार लोकसभा व राज्‍याच्‍या विधानसभांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी खास राखीव जागा ठेवल्‍या आहेत.


· लोकसभेमध्‍ये केंद्रशासित प्रदेशांमधून १३ सदस्‍य निवडले जातात.


· लोकसभेच्‍या पहिल्‍या मध्‍यावधी निवडणुका १९७१ मध्‍ये घेण्‍यात आल्‍या.


· आणीबाणीच्‍या काळात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्ष पर्यंत वाढवता येतो.


· राज्‍यसभा कधीच बरखास्‍त केली जात नाही.


· राज्‍यसभेच्‍या सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षाचा असतो.


· लोकसभेने पारित केलेले व राज्‍य सभेकडे शिफारशीकरिता पाठवलेले वित्त विधेयक १४ दिवसात परत पाठवणे हे राज्‍यसभेवर बंधनकारक आहे.

महाराष्ट्र नदी प्रणाली



🍀  महाराष्ट्र हा सह्याद्री पर्वतरांगा ⛰🏔मळे विभागला गेला आहे. कोकण आणि महाराष्ट्र पठार असे दोन विभाग पडले आहेत.


🍀 सहयाद्री पर्वत⛰⛰ हा महाराष्ट्र मध्ये प्रमुख जलविभाजक म्हणून काम करतो या मुळे पुर्व वाहिनी नद्या  आणि पश्चिम वाहिनी नद्या असे दोन प्रकार पडले आहेत.


🍀 पुर्व वाहिनी नद्या या आकाराने आणि लांबी ने ही पश्चिम वहिनी नद्यांच्या पेक्षा मोठ्या आहेत.


🍀  गोदावरी नदी ही महाराष्ट्रमधील सर्वांत मोठी नदी आहे


🍀 गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणूनदेखील ओळखलं जाते.


🍀महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांची लांबी


      🔥(लांबी फक्त महाराष्ट्रामधील🔥


🌸 गोदावरी     668 km 


🌸 पैनगंगा      495 km* 


🌸 वर्धा          455 km


🌸 भीमा        451 km


🌸 वैनगंगा      295 km 


🌸 कृष्णा        282 km 


🌸 तापी         208 km 


   ‼️ Trick -गप वर्धा भिवु नको ‼️


विधानपरिषद ट्रिक


🏆  भारतात सर्व मिळून 29 राज्यं आहेत

त्यापैकी 22 राज्यात फक्त विधानसभा अस्तित्वात आहे


🏆 आणि उरलेल्या 7 राज्यामध्ये विधानसभा   बरोबरच विधानपरिषद हे अस्तित्वात आहे


  🏆 Article 169 विधानपरिषद बनवणे किवा अस्तित्वात असलेली विधानपरिषद बरखास्त करणे यासाठी


🏆 विधानपरिषदची स्थापना किंवा आहे ती बरखास्त करणे यासाठी फक्त संसद कायदा करू शकते 


🏆 मात्र यासाठी त्या राज्याच्या विधानसभा ने विशेष बहुमत ठराव पास करून संसदेत पाठवावा लागतो


🏆 विधानपरिषद कोण कोणत्या राज्यात आहेत


☘️ Trick- TU B MJA KAR(तू भी मजा कर ) ☘️


🏆 T -Telangana ( तेलंगाणा)


🏆 U- UttarPradesh ( उत्तरप्रदेश)


🏆 B- Bihar ( बिहार)


🏆 M- Maharashtra ( महाराष्ट्र)


🏆 J - Jammu & Kashmir( जम्मू काश्मीर)


🏆 A- Andhrapradesh (आंध्रप्रदेश)


🏆 KAR- Karnatak (कर्नाटक)

'चांद्रयान-२'



🚀  यत्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचं 'चांद्रयान -२' 🛰अवकाशात झेपावणार आहे.


🚀   6 सप्टेंबरला "चांद्रयान-2'🛰 चद्रावर दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल, असा विश्‍वास "इस्रो'ने व्यक्त केला आहे. 


🚀   इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांनी या मोहिमेची माहिती दिली.


🚀   परेक्षपणासह या संपूर्ण मोहिमेवर 978 कोटी रुपये खर्च होतील, असं सिवान यांनी सांगितलं.


🚀  इस्रो'ने 2008 मध्ये "चांद्रयान-1 चे प्रक्षेपण केले होते.


🚀  श्रीहरीकोटा येथून "जीएसएलव्ही एमके-3 '(GSLV MK|||) या प्रक्षेपकाद्वारे "चांद्रयान-2'चे उड्डाण होणार आहे.


🚀   चांद्रयान-2'चे ऑर्बिटर, लॅंडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) असे तीन भाग आहेत.


🚀   इस्रो'चे संस्थापक आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांचे "विक्रम' हे नाव "चांद्रयान-2'मधील लॅंडरला देण्यात आले आहे


🚀  चांद्रयान-2' वैशिष्ट म्हणजे यात एकही उपकरण (पेलोड) विदेशी नाही(संपूर्ण स्वदेशी). या यानाचे सर्व भाग संपूर्णपणे स्वदेशी आहेत. "चांद्रयान-1'च्या अवकाश यानात युरोपचे तीन व अमेरिकेचे दोन पेलोड होते.


🚀  यानाचं एकूण वजन 3800(3.8 टन) किलो आहे


🚀  रोव्हरचं वजन २७ किलो  व लांबी १ मीटर आहे.


🚀  लँडरचं वजन १४०० किलो  आणि लांबी ३.५ मीटर आहे.


 🚀  ऑर्बिटरचं वजन २४०० किलो आणि लांबी २.५ मीटर आहे.


👇👇👇👇👇👇

🚀  रशियाची अंतराळ संस्था "रॉसकॉसमॉस'ने 2007 मध्ये "चांद्रयान-2' मोहिमेला सहकार्य करण्याची तयारी दाखविली होती पण त्यांनी नंतर त्यातून माघार घेतली 

इस्रो'ने स्वतःच स्वदेशी🇮🇳🇮🇳 लडर व रोव्हर तयार केले.

जीवनसत्वे आणि त्यांचे प्रकार



📌फक शास्त्रज्ञाने जीवनसत्वे शोध लावला

📌5 प्रकारची जीवनसत्वे आपणाला लागतात

📌जीवनसत्वे A,B,C,D,E,K

📌जीवनसत्वे B,C हे पाण्यात

विरघळतात बाकी सर्व मेदात विरघळतात

📌D हे एकमेव जीवनसत्वे आपले शरीर तयार करते(सूर्यप्रकाशाचा कोवळ्या उन्हात) बाकी सर्व आपणाला आपल्या आहारातुन मिळवावे लागले


🧬जीवनसत्व व त्यांची शास्त्रीय नावे🧬


📌Vitamin A-  Retinol(रेटिनॉल) 

📌Vitamin B-  Thiamine(थयमिन)

📌Vitamin C-  Ascorbic      Acid(असकरबीक ऍसिड)

📌Vitamin D- Calciferol(कॅलसिफेरोल)

📌Vitamin E- Tocoherol(टोकॉफेरोल)

📌Vitamin K- Phylloquinone(फिलॉकवेनॉन)


💡नावे लक्षात ठेवण्यासाठी Trick💡

रथा एकटी फिरली

VitA  र -रेटिनॉल

VitB  था-थयमिन

VitC  ए-असकरबीक ऍसिड

VitD  क-कॅलसिफेरोल

VitE  टी-टोकॉफेरोल

VitK  फी-फिलॉकवेनॉन

पहिली पंचवार्षिक योजना



कालावधी:-1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956


प्रतिमान:- हेरॉड डोमर


योजना


🔴दामोदर प्रकल्प(झारखंड व पश्चिम बंगाल)


🔴भाक्रा नांगल(हिमाचल प्रदेश व पंजाब)


🔴कोसी प्रकल्प (बिहार)


🔴हिराकुड योजना( ओडिशा महानदीवर)


🔴सिंद्री खत कारखाना(झारखंड)


🔴HMT बंगलोर


🔴चित्तरंजन इंजिन कारखाना


🔴हिंदुस्थान अँटिबायोटिक (पूणे)


1952:- समुदाय विकास कार्यक्रम


1952:- भारतीय हातमाग बोर्ड


1953:-खादी व ग्रामोद्योग बोर्ड


1955:- SBI स्थपना


1955:-ICICI स्थापना


👉राष्ट्रीय उत्पन्न 18 टक्के वाढ


👉दरडोई उत्पन्न 11 टक्के वाढ


👉किंमत निर्देशांक 13 टक्के ने कमी


🌷वृद्धी दर🌷


संकल्पित👉2.1%


साध्य👉3.6%

सराव प्रश्न

(1)1857 च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला?

तात्या टोपे

मंगल पांडे✅✅✅

नानासाहेब पेशवे

बहादुरशहा जफर



2)चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये करण्यात आला. चंपारण्य हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

उत्तरांखंड 

उत्तर प्रदेश

पंजाब

बिहार✅✅✅ 




3)जगात सर्वात जास्त बोलणाऱ्या एकूण भाषांपैकी हिंदी भाषेचा कितवा क्रमांक लागतो?

पाचवा

सहावा✅✅✅

सातवा

आठवा




4)नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10+2 ऐवजी कोणती पद्धत राबवली जाणार आहे?

5+3+3+4✅✅✅

5+10+12

5+8+4

5+4+3+2




5)कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्तत्कृष्ठ ठरले आहे?

नादौन पोलीस ठाणे✅✅✅

नानखारी पोलीस ठाणे

रामपूर पोलीस ठाणे

नेरवा पोलीस ठाणे

१७ ऑक्टोबर २०२०

राजा राममोहन रॉय



 भारतीय समाजसुधार होते. त्यांचा जन्म बंगालमधील हुगळी गावातील ब्राह्मण कुटुंबात २२ मे १७७२ रोजी झाला.त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अमेरिका होती. त्यामुळे पर्शियन व अरेबिक शिकण्यासाठी त्यांना पाटणा येथे पाठविण्यात आले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तिबेट व बनारसला गेले. पर्शियन व अरेबिक भाषेत त्यांनी वेदांत ग्रंथ हे पहिले पुस्तक लिहले. १८१५ मध्ये कोलकत्ता येथे परतल्यावर त्याचे बंगाली भाषेत रुपांतर(भाषांतर) केले. त्यांना "राजा"हि पदवी मुगल सम्राट अकबर{द्वितीय} याने बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते.राजा राममोहन रॉय यांना भारतात नव विचाराचे जनक म्हंटले जातात.त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका"नावाचे वृत्तपत्र सुरु केले.ते पहिले उच्चशिक्षित व्यक्ती होते. ते भारतातून इंग्लडला गेले.त्यांनी मूर्तीपूजेला,देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत होते. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता.भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती.त्यासाठी त्यांनी १८३० साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली.ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला.प्रथा ,परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरु केली.त्यांना भारतीय सुधारणेचे जनक म्हटले जाते. 


🌷वत्तपत्रे - 

त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कैमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन व्रतपत्र सुरु केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिदेन्शी कॉलेज सुरु केले.


🌷शिक्षण -

२२ मे १७७२ रोजी बंगालमधील राधानगर येथे जन्मलेल्या राममोहन यांच्या जडणघडणीत त्यांच्या माता-पित्यांच्या घराण्यांचा संबंध फार मोठा आहे. वडीलांकडील सर्व मंडळी आधुनिक शिक्षण घेतलेली आणि बहुतांश सरकार दरबारी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी होती. त्यामुळेे त्यांच्या वडीलांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांना अरबी, फारसी या त्याकाळच्या सरकारात / व्यवहारात वापरल्या जाणार्‍या भाषा आणि शास्त्र शिकण्यासाठी पाटण्याच्या एका मदरशात (मुक्तब) पाठवल. मदरशामधे अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.तिथ शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या प्रभावामुळे, ज्यांच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून बनारस (काशी) इथ त्यांना पाठवण्यात आल. तिथ त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदांत, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारस मधे वास्तव्य केल. हे अस दोन टोकाच्या किंवा पूर्ण वेगवेगळ्या व्यवस्थेत शिक्षण घेउन राम मोहन वयाच्या सोळाव्या वर्षी घरी परत आले. घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहीला. यामधे त्यांनी मूर्तीपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्यामते मूर्तीपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळ वडीलांशी त्यांचे पटेनास झाल आणि स्वत्:च घर सोडून निघून गेले.

प्राचीन भारताचा इतिहास :



 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विशेषतः

.

* सिंधू संस्कृती

०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.


०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.


०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.

०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.


०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.


०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.


०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.


०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.


१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.


११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.


१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.


१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.


१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.


१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.


१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.


१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.


१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना


.

1). ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.

2) सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.

3)  राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.

4)  त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.

5)  कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)



गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.


त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.


१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.


आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते. 


या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या. 


प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले. 


प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,


त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.


या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.


भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.


या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.


आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती. 


अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.


चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.


राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.


या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.


या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.

सरन्यायाधीश व त्याची कार्यकाळ


1)हरिलाल जेकिसनदास केनिया -      २६ जानेवारी १९५० ते ११ जून १९५१.


2)मंडकोलातुर पतंजली शास्त्री -          ७ नोव्हेंबर १९५१ ते ३ जानेवारी १९५४.


3) मेहर चंद महाजन -  ४ जानेवारी १९५४ ते २२ डिसेंबर १९५४.


4) बिजन कुमार मुखर्जी     -  ३ जानेवारी १९५५ ते ३१ जानेवारी१९५६.


5)सुधी रंजन दास - १ फेब्रुवारी १९५६ ते ३० सप्टेंबर १९५९.


6)भुवनेश्वरप्रसाद सिंह - १ ऑक्टोबर १९५९ ते ३१जानेवारी१९६४.


7)प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर - फेब्रुवारी १९६४ ते मार्च १९६६.


8)अमल कुमार सरकार - १६ मार्च १९६६ ते २९ जून १९६६.


9)कोका सुब्बा राव - ३० जून  १९६६ ते ११ एप्रिल १९६७.


10)कैलास नाथ वांचू - १२ एप्रिल १९६७ ते २४ फेब्रुवारी १९६८.


11)मोहम्मद हिदायत उल्लाह - २५ फेब्रुवारी १९६८ ते १६डिसेंबर१९७०.


12)जयंतीलाल छोटालाल शाह - १७ डिसेंबर १९७० ते २१जानेवारी१९७१.


13)सर्वमित्र सिकरी - २२ जानेवारी १९७१ ते २५ एप्रिल १९७३.


14)अजित नाथ राय - २५ एप्रिल १९७३ ते २८ जानेवारी १९७७.


15)मिर्झा हमीदुल्ला बेग - २९ जानेवारी १९७७ ते २१ फेब्रुवारी १९७८.


16)यशवंत विष्णू चंद्रचूड - २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५.


17)प्रफुलचंद्र नटवरलाल भगवती -  १२ जुलै १९८५ ते २० डिसेंबर १९८६.


18)रघुनंदन स्वरुप पाठक -  २१ डिसेंबर १९८६ ते १८ जून १९८९.


19)एंगलगुप्पे सीतारामैया वेंकटरामैया - १९ जून १९८९ ते १७ डिसेंबर १९८९.


20)सब्यसाची मुखर्जी -  १८ डिसेंबर १९८९ ते २५ सप्टेंबर १९९०.


21)रंगनाथ मिश्रा - २५ सप्टेंबर १९९० ते २४ नोव्हेंबर १९९१.


22)कमल नारायण सिंग - २५ नोव्हेंबर १९९१ ते १२ डिसेंबर १९९१.


23)मधुकर हिरालाल केणिया -  १३ डिसेंबर १९९१ ते १७ नोव्हेंबर १९९२.


24)ललित मोहन शर्मा - १८ नोव्हेंबर १९९२ ते १२ फेब्रुवारी १९९३.


25)मनेपल्ली नारायणराव वेंकटचलैया -१२ फेब्रुवारी १९९३ ते २४ ऑक्टोबर १९९४.


26)अझीझ मुशब्बर अहमदी -  २५ ऑक्टोबर १९९४ पासून २४ मार्च १९९७.


27)जगदीश शरण वर्मा - २५ मार्च १९९७ ते १८ जानेवारी १९९८.


28)मदन मोहन पूंछी - १८ जानेवारी १९९८ ते ९ ऑक्टोबर १९९८.


29)आदर्श सेन आनंद -  १० ऑक्टोबर १९९८ ते ३१ ऑक्टोबर २००१.


30)सॅम पिरोज भरुचा - ११ जानेवरी २००१ ते ५ मे २००२.


31)भुपिंदर नाथ किरपाल - ६ मे २००२ ते ८ नोव्हेंबर २००२


32)गोपाल बल्लव पटनाइक  -  ९ नोव्हेंबर २००२ ते १८ डिसेंबर २००२.


33)विश्वेश्वरनाथ खरे - १९ डिसेंबर २००२ ते २ मे २००४.


34)एस. राजेन्द्र. बाबू - २ मे २००४ ते १ जून २००४.


35)रमेश चंद्र लाहोटी -  १ जून २००४ ते १ नोव्हेंबर २००५.


36)योगेशकुमार सभरवाल - 2  नोव्हेंबर २००५ ते १३ जानेवारी २००७


37)के. जी. बालकृष्णन - १४ जानेवारी २००७ पासुन १२ मे २०१०.


38)सरोश होमी कापडिया - १० मे २०१० ते २८ सप्टेंबर  २०१२.


39)अल्तमस कबीर - २९ सप्टेंबर २०१२ ते १८ जुलै २०१३.


40)पलानिसमय सदाशिवम् - १९ जुलै २०१३ ते २६ एप्रिल २०१४.


41)राजेन्द्रमल लोढा - २७ एप्रिल २०१४ ते - २७ सप्टेंबर २०१४.


42)एच. लक्ष्मीनारायणस्वामी दत्तू - २८ सप्टेंबर २०१४ ते २ डिसेंबर २०१५.


43)तीरथ सिंग तथा टी.एस. ठाकुर - ३ डिसेंबर २०१५ ते ४ जानेवारी २०१७.


44)जगदीश सिंग खेहर -

४ जानेवारी, इ.स. २०१७ ते २८ ऑगस्ट, २०१७.


45)दीपक मिश्रा - २८ ऑगस्ट २०१७ ते 2 ऑक्टोबर 2018


46) रंजन गोगाई - 3 ऑक्टोबर 2018 पासून.. 


भारताची ‘मिसाईल पॉवर’


 एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम -आयजीएमडीपी) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते. बॅलेस्टिक मिसाईलमधील संशोधनास भारताने 1960 च्या दशकात प्रारंभ केला. 


▪️पथ्वी-1


सरकारच्या आयजीएमडीपी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र होय. फेब्रुवारी 1988 साली सादर करण्यात आलेल्या या क्षेत्रपणास्त्राची क्षमता 150 कि.मी. इतकी होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1994 साली लष्करात दाखल झाले.


▪️अग्नि-1


अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. अग्नि मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र 1983 मध्ये डीआरडीओने सादर केले. याची मारक क्षमता 700 कि.मी. इतकी होती.


▪️आकाश


जमिनीवर आकाशात मारा करणार्‍या आकाशची क्षमता 30 कि.मी. इतकी असून एकाच वेळी अनेक लक्ष्यही भेदता येते. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी याचा वापर केला जातो. 1997 साली याची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे रडारद्धारा संचालित केले जाते.


▪️नाग


रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची तिसरी पिढी म्हणजे ‘नाग’ होय. याची क्षमता 3 ते 7 कि.मी. इतकी आहे. रात्रीदेखील अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ‘नाग’मध्ये आहे. ‘नाग’चा उपयोग हेलिकॉप्टरमध्येही केला जातो. 


▪️तरिशूल


जमिनीवरून आकाशात मारा करणारे ‘त्रिशूल’ एअरक्राप्ट जामरला उद्ध्वस्त करण्याचे काम करते. याची क्षमता 9 कि.मी. असून लढाऊ जहाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो.


▪️अग्नि 2


एप्रिल 1999 साली अग्नि-2 ची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या ‘अग्नि’ ची क्षमता 2000 ते 2500 कि.मी. इतकी आहे. पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता यात आहे.


▪️पथ्वी 3


नौसेनेसाठी तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र 350 कि.मी.पर्यंत मारा करू शकते. याची चाचणी 2000 साली घेण्यात आली होती.


▪️बराह्मोस


भारत आणि रशियाद्धारे विकसित करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसने भारताला क्षेपणास्त्र तंत्राज्ञाता अग्रेसर देश म्हणून ओळख मिळवून दिली. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात गती आणि अचूकतेचा जबरदस्त संगम आहे. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कवा यांच्या नावावरून ‘ब्राह्मोस’ हे नाव त्याला देण्यात आले आहे. 300 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.


▪️सागरिका


समुद्रातून लाँच करता येणारे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून 750 कि.मी. पर्यंत लक्ष्य भेदता येते. 2008 साली याची पहिली चाचणी घेण्यात आली. अरिहंत या पाणबुडीसाठी हे खास तयार करण्यात आले.


▪️धनुष


पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे हे छोटे रूप. समुद्रातील मार्‍यासाठी हे खास तयार करण्यात आले. मार्च 2011 साली लढाऊ जहाजांवरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.


▪️अग्नि-3


अग्नि-2 ची ही सुधारित आवृत्ती असून मारक क्षमता 3500 ते 5000 कि.मी. इतकी मोठी आहे. शेजारील देशांमध्ये आतपर्यंत मारा अग्नि-3 करू शकते. 2011 साली लष्करात हे दाखल झाले.


▪️अग्नि-4


पहिल्या दोन अग्निची आणखी सुधारित आवृत्ती. पहिल्या दोन्ही क्षेपणास्त्रांपेक्षा वजनाने हलके, पण वाहक आणि मारक क्षमता जास्त.


▪️अग्नि-5


भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. 5000 कि. मी. पर्यंत क्षमता.


▪️निर्भया


जमीन, समुद्र आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणहून हे क्षेपणास्त्र सोडता येते. ब्राह्मोसला सहाय्य म्हणूनही या क्षेपणास्त्राची ओळख आहे.


▪️परहार


जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 150 कि.मी. क्षमता असलेल्या ‘प्रहार’ची 2011 साली पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. रोड मोबाईल लाँचरच्या मदतीने याचा मारा करता येतो. लष्कराला युद्धाच्या वेळी ‘प्रहार’चा चांगला उपयोग होतो.

आजचे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

Q.1) जगातील पहिला पाण्यावर तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला ?

⚫️ रशिया✅✅✅

⚪️ जर्मनी

🔴 फरान्स

🔵 इग्लंड


Q.2) नुकतीच कोणत्या जिल्हा सत्र न्यायालयाने भारतात सर्वप्रथम ई-पेमेंटची सुविधा सुरू केली ?

⚫️ शिवाजीनगर✅✅✅

⚪️ औरंगाबाद

🔴 मबई

🔵 नागपूर


Q.3) हॉकी वर्ल्ड कप 2018 कोणी जिंकला ?

⚫️ ऑस्ट्रेलिया

⚪️ नदरलँड

🔴 बल्जियम✅✅✅

🔵 इग्लंड


Q.4) हॉकी वर्ल्ड कप 2018 कोणत्या राज्यात पार पडली ?

⚫️ पजाब

⚪️ हरियाणा

🔴 पश्चिम बंगाल

🔵 ओडिशा✅✅✅


Q.5) हॉकी वर्ल्ड कप 2018 स्पर्धेचे शुभंकर चिन्ह काय होते ?

⚫️ आसामचा गेंडा

⚪️ गिरचा सिंह

🔴 बगाल टायगर

🔵 ओलिव रिडले कासव✅✅✅


Q.6) मिस युनिव्हर्स 2018 किताब कोणी पटकविला?

⚫️ टमारिन ग्रीन

⚪️ सटेफनी गुटेरझ

🔴 कट्रिओना ग्रे✅✅✅

🔵 यापैकी नाही

जम्मू, काश्मीर, लडाख हे भारताचे अंतर्गत भाग



🔰जम्मू, काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अंतर्गत भाग होते, आहेत आणि कायम राहतील, असे भारताने गुरुवारी स्पष्ट केले आणि चीनला भारताच्या अंतर्गत बाबींसंदर्भात भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही भारताने ठणकावले.


🔰लडाख या केंद्रशासित प्रदेशाला त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेश या राज्याला आमची मान्यता नसल्याचे चीनने म्हटले होते त्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी वरील बाब स्पष्ट केली.


🔰जम्मू, काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अंतर्गत भाग होते, आहेत आणि काम राहतील ही भारताची स्पष्ट आणि कायम भूमिका आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.

किर्गिझस्तानच्या अध्यक्षांचा राजीनामा


🔰वादग्रस्त संसदीय निवडणुकीनंतर देशात उसळलेला क्षोभ संपुष्टात आणण्याचा प्रयत्न म्हणून किर्गिझस्तानचे अध्यक्ष सूरोनबाय जीनबेकॉव्ह यांनी गुरुवारी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.


🔰राजकीय प्रतिस्पर्धी आणि निदर्शकांकडून जीनबेकॉव्ह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, किर्गिझस्तानात शांतता प्रस्थापित होणे, देशाची एकात्मता, जनतेचे ऐक्य आणि सामाजिक शांतता सर्वाहून महत्त्वाची आहे, सत्ता नव्हे असे जीनबेकॉव्ह यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनामध्ये म्हटले आहे.


🔰सरकार समर्थक पक्षांनी ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत बाजी मारली असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर देशात क्षोभ उसळला. मतांची खरेदी आणि अन्य गैरप्रकार निवडणुकीत करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला.


🔰तयानंतर निदर्शकांनी सरकारी इमारतींवर कब्जा केला, काही कार्यालये लुटण्यात आली. त्यानंतर मध्यवर्ती निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केली. त्यानंतर विरोधकांनी जीनबेकॉव्ह यांना हटविण्याची आणि नवे सरकार स्थापन करण्याची योजना जाहीर केली.

मराठी व्याकरण :- अलंकारिक शब्द



१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस


२) अकलेचा कांदा : मूर्ख


३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य


४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार


५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला


६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे


७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस


८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट


९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा

 कारभार


१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात


११) उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा


१२) उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू


१३) कर्णाचा अवतार : उदार माणूस


१४) कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा


१५) कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा


१६) काडी पहिलवान : हडकुळा माणूस


१७) कुंभकर्ण : झोपाळू माणूस


१८) कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा


१९) कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री


२०) कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी

संविधान सभा महिला सदस्य


✍️एकूण 15 महिलांचा सहभाग होता


✍️बगम रसूल या मुस्लिम लीग च्या होत्या..


✍️14 महिला काँग्रेस पक्षाच्या होत्या


🍀विजयालक्ष्मी पंडित:-UP


🍀बगम रसूल:-UP


🍀सचिता कृपलानी:-UP


🍀पर्णिमा बॅनर्जी:-UP


🍀कमला चौधरी:-UP


💥आम्मू स्वामिनाथन:-मद्रास


💥दर्गाबाई देशमुख:-मद्रास


💥दक्षयनी वेलायडून:-मद्रास


⚛️लीला रे:-बंगाल


⚛️रणुका रे:-बंगाल


⭕️राजकुमारी कौर:-केंद्रीय प्रांत


⭕️हसा मेहता:-बॉम्बे


⚛️सरोजिनी नायडू:-बिहार


⚛️मालती चौधरी:-ओरिसा


⚛️ऍनि मस्करीन:-त्रावणकोर

नोबेल पुरस्कार २०२० विजेते


🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)

👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)

👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)


🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)

👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)

🙎‍♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)


🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)

🙎‍♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)


🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )


🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२० 

🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम


🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)

👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

वाचा :- मराठी समानार्थी शब्द



चव = रुची, गोडी

चरण = पाय, पाऊल

चरितार्थ = उदरनिर्वाह  

चक्र = चाक  

चऱ्हाट = दोरखंड

चाक = चक्र 

चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू 

चिंता = काळजी

चिडीचूप = शांत

चिमुरडी = लहान 

चूक = दोष  

चेहरा = मुख 

चौकशी = विचारपूस 

छंद = नाद, आवड

छान = सुरेख, सुंदर 

छिद्र = भोक 

जग = दुनिया, विश्व

जत्रा = मेळा 

जन = लोक, जनता  

जमीन = भूमी, धरती, भुई 

जंगल = रान 

जीव = प्राण

जीवन = आयुष्य, हयात 

जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय  

झाड = वृक्ष, तरू

झोपडी = कुटीर, खोप 

झोप = निद्रा  

झोका = झुला 

झेंडा = ध्वज, निशाण

ठग = चोर 

ठिकाण = स्थान 

डोके = मस्तक, शीर्ष, शीर 

डोळा = नेत्र, नयन, लोचन

डोंगर = पर्वत, गिरी 

ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र 

ॠण = कर्ज 

तक्रार = गाऱ्हाणे 

तळे = तलाव, सरोवर, तडाग

त्वचा = कातडी

तारण = रक्षण 

ताल = ठेका

तुरंग = कैदखाना, बंदिवास 

तुलना = साम्य 

थट्टा = मस्करी, चेष्टा

थवा = समूह 

थोबाड = गालपट   

दगड = पाषाण, खडक 

दरवाजा = दार, कवाड

दाम = पैसा  

दृश्य = देखावा  

दृढता = मजबुती

दिवस = दिन, वार, वासर

दिवा = दीप, दीपक 

दूध = दुग्ध, पय

द्वेष = मत्सर, हेवा 

देव = ईश्वर, विधाता 

देश = राष्ट्र 

देखावा = दृश्य

दार = दरवाजा 

दारिद्र्य = गरिबी 

दौलत = संपत्ती, धन  

धरती = भूमी, धरणी 

ध्वनी = आवाज, रव 

नदी = सरिता  

नजर = दृष्टी

नक्कल = प्रतिकृती

नमस्कार = वंदन, नमन  

नातेवाईक = नातलग 

नाच = नृत्य 

निश्चय = निर्धार 

निर्धार = निश्चय 

निर्मळ = स्वच्छ

नियम = पद्धत 

निष्ठा = श्रद्धा 

नृत्य = नाच 

नोकर = सेवक


Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...