०२ मे २०२०

तिसरा लॉकडाउन : आणखी दोन आठवडे टाळेबंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

📌देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे.

📌 ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे.

📌या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचेही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

📌दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही  सवलती देण्यात येतील.

📌 परंतु रेड झोनमध्ये कोणत्याही भागांना  कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

📌 रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी नव्या गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत.

📌ग्रीन झोन्समध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही किंवा २१ दिवसांमध्ये करोनाचा एक नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे.

📌तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान; निवडणूक कार्यक्रम जाहीर


त्यानुसार येत्या २१ मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.

राज्यात विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त असून या जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत आहे.

*निवडणुकीसाठी*

✅ ४ मे 🔜 पासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार असून ११ मेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारता येणार आहे.

✅ १२ मे 🔜 रोजी अर्जांची छाननी होणार आहे.

✅ १४ मे 🔜 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

✅ २१ मे 🔜 रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.

✅ 21 मे 🔜 त्याच दिवशी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

✅ २७ मेच्या आत विधिमंडळाच्या दोन्ही पैकी एका सभागृहाचं सदस्य होणं मुख्यमंत्री यांना बंधनकारक असल्यामुळे पेच निर्माण झाला होता.

विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या नसत्या तर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं असतं.

०१ मे २०२०

सर्वाना पुढील वर्गात प्रवेश!

- सर्व अभ्यासक्रमांतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश देण्यात यावेत, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेची अतिरिक्त संधी देण्यात यावी, अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने केली आहे.

- यंदा सर्व प्रवेश प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचेही आयोगाने सुचवले आहे.
करोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे कामकाज मार्चपासून बंद करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक वेळापत्रक आणि परीक्षा यांबाबत अभ्यास करून उपाय सुचवण्यासाठी समित्या नेमल्या होत्या.

- या समित्यांनी त्यांचे अहवाल आयोगाला सादर केले आहेत. त्यानुसार परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी, अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील सत्रासाठी प्रवेश देण्यात यावा, अशी शिफारस या समितीने केली. मात्र, विद्यापीठ ज्यावेळी पुढील परीक्षा घेईल, त्यावेळी विद्यार्थ्यांना आधीच्या सत्राच्या राहिलेल्या विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल. विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठी अतिरिक्त परीक्षेची संधी देण्याचेही या समितीने सुचवले आहे.

- प्रवेश प्रक्रियेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
यंदा विद्यापीठांच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्यात याव्यात. परीक्षेपूर्वी किमान आठ दिवस विद्यार्थ्यांना कल्पना देण्यात यावी. विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल १४ ऑगस्टपर्यंत जाहीर करण्यात यावेत. परीक्षांसाठी आवश्यक त्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घ्याव्यात, मात्र या सर्व परीक्षा, निकाल यांसह प्रवेश प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी.

-  गरज असल्यास तात्पुरता प्रवेश देण्याचा मार्ग अवलंबावा. त्यानंतर परीक्षांचे निकाल आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ३० सप्टेंबपर्यंत प्रवेश निश्चित करण्यात यावेत, असे समितीने सुचवले आहे.

- आता पावसाळी सुट्टी
यंदाचे शैक्षणिक वर्ष पुढे गेल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षही (२०२१-२२) उशिरा सुरू होणार आहे. साधारण एप्रिल-मे महिन्यात अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा संपून सुट्टी लागते.

- आता मात्र उन्हाळ्याऐवजी पावसाळ्यात शैक्षणिक वर्षांअखेरीची सुट्टी मिळणार आहे. सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षांची सुट्टी १ ते ३० जून या कालावधीत, तर येत्या शैक्षणिक वर्षांची (२०२०-२१) सुट्टी १ ते ३० जुलै २०२१ या कालावधीत देण्याची शिफारस आयोगाच्या समितीने केली आहे.

▪️वेळापत्रक कसे असेल?
- १६ ते ३१ मे - प्रकल्पाची पूर्तता
- १ ते ३० जून - वार्षिक सुट्टी (उन्हाळी सुट्टी)
- १ ते ३१ जुलै - विद्यापीठांच्या परीक्षा
- १ ऑगस्ट - जुन्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात
- १४ ऑगस्टपर्यंत - विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करणे
- ३१ ऑगस्ट - पुढील वर्षांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत
- १ सप्टेंबर - नव्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात
- ३० सप्टेंबर - तात्पुरते प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत
- १ ते २५ जानेवारी २०२१ - पहिली सत्र परीक्षा
- २७ जानेवारी २०२१ - दुसऱ्या सत्राची सुरुवात
- २६ मे ते २५ जून २०२१ - दुसरी सत्र परीक्षा
- १ ते ३० जुलै २०२१ - वार्षिक सुट्टी
- २ ऑगस्ट २०२१ - नव्या शैक्षणिक वर्षांची (२०२१-२२) सुरुवात
परीक्षा कशी?

- कमीतकमी वेळेत आणि गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात, असे सुचवण्यात आले आहे. लघुत्तरी, बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देणे, परीक्षेत पुस्तक बाळगण्याची मुभा (ओपन बुक टेस्ट), लेखी परीक्षेऐवजी सादरीकरण करण्यास सांगणे, पन्नास टक्के अंतर्गत मूल्यमापन ग्राह्य़ धरून पन्नास टक्क्य़ांसाठी प्रकल्प करण्यास सांगणे, असे पर्याय समितीने सुचवले आहेत. लेखी परीक्षा ही साधारण अडीच ते तीन तास असते, त्याऐवजी कमी वेळात परीक्षा घेण्याचे पर्याय विद्यापीठांनी शोधून काढावेत, असे आवाहनही समितीने केले आहे.

-  एमफील, पीएचडीसह इतर अभ्यासक्रमांच्याही तोंडी परीक्षा किंवा मुलाखती ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात याव्यात, अशी शिफारस करण्यात आली आहे.
---------------------------------------------------

आयआयटीची यंदा शैक्षणिक शुल्क वाढ नाही.

- भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) व भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) यांचे शैक्षणिक शुल्क २०२०-२१ या वर्षांत वाढवण्यात येणार नाही, असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले.

- करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून  ते म्हणाले की, आयआयटी संचालकांची स्थायी समिती व आयआयटी संचालक यांच्याशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

- आयआयआयटी म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थामधील ज्या संस्था केंद्राच्या अनुदानावर चालतात त्यांच्या स्नातक पूर्व अभ्यासक्रमांसाठी १० टक्के शैक्षणिक शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण त्याची अंमलबजावणी या वर्षी करण्यात येणार नाही.

- या संस्थांच्या कुठल्याच वर्गासाठी शुल्कवाढ करू नये असे संचालकांना सांगण्यात आले आहे.

- ज्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) सरकारी खासगी भागीदारीत चालतात त्यांचीही शुल्क वाढ करू नये असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
--------------------------------------------------

संचारबंदीच्या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत खासगी धान्याच्या मालवाहतुकीत मोठी वाढ


- संचारबंदीच्या काळातही अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तू देशभरात उपलब्ध राहणार याची खबरदारी भारतीय रेल्वे त्याच्या माल व पार्सल सेवेच्या माध्यमातून घेत आहे.

- संचारबंदी जाहीर झाल्यापासून 25 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत 7.75 लक्ष टनांहून अधिक खासगी धान्याची मालवाहतूक भारतीय रेल्वेनी देशभरात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे 6.62 लक्ष टन धान्याची मालवाहतूक झाली होती.

▪️इतर ठळक बाबी

- रेल्वेद्वारे खासगी धान्याची मालवाहतूक करण्यामध्ये आंध्रप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू ही आघाडीची राज्ये आहेत.

- कोविड19 महामारीमुळे जाहीर संचारबंदीच्या काळात अन्नधान्यासारखी कृषी उत्पादने वेळेवर गोळा केली जाणार आणि देशभरात त्यांचा पुरवठा सुरळीत राहणार यासाठी भारतीय रेल्वे सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.

- फळ, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ यासारख्या नाशवंत वस्तू आणि शेतीसाठी बियाणे याकरिता विशेष पार्सल गाड्यांसाठी भारतीय रेल्वेने मार्ग निश्चित केले आहेत.

- देशाच्या सर्व भागात अविरत पुरवठा राहावा यासाठी ज्या ठिकाणी मागणी कमी आहे अशा मार्गावरही गाड्या चालवल्या जात आहेत. मार्गावर शक्य त्या सर्व ठिकाणी रेल्वेगाडयांना थांबा देण्यात आला आहे.

महत्त्वाचे प्रश्नसंच

📕 कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?

(A) हैदराबाद✅✅
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) बंगळुरू

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?

(A) बियास नदी
(B) रावी नदी✅✅
(C) चिनाब नदी
(D) झेलम नदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📘 वैद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?

(A) अल्जेरिया
(B) ट्युनिशिया
(C) लिबिया
(D) लेबनॉन✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?

(A) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस✅✅
(B) फ्लिपकार्ट
(C) पेटीएम
(D) इन्फोसिस

📘 कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?

(A) मध्यप्रदेश
(B) राजस्थान
(C) उत्तराखंड✅✅
(D) हरयाणा

🔴"थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान
B. बॅ. महमद अली जीना
C. मौलाना अब्दुल करीम आझाद
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

______________________________
🟠 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅
B. समता
C. सुलभ समाचार
D. बहिष्कृत भारत
______________________________
⚫️ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

A. 8 सप्टेंबर, 1873
B. 10 ऑक्टोबर, 1873
C. 14 सप्टेंबर, 1873 ✅
D. 15 ऑगस्ट, 1873
______________________________
🔵 सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅
B. विरेंद्रकुमार घोष
C. अरविंदो घोष
D. हेमचंद्र दास

🟢 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले
B. गणेश वासुदेव जोशी
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. जगन्नाथ शंकर शेठ✅
______________________________
🟡 ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

A) भारत आणि म्यानमार☑️
B) भारत आणि नेपाळ
C) भारत आणि बांग्लादेश
D) भारत आणि थायलँड

🟠 कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?
A) नेपाळ
B) म्यानमार
C) इंडोनेशिया
D) इराक
______________________________
🔴 राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113

______________________________
🟢 कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ
(2)राजाराम मोहन रॉय✅✅
(3)पं. मदनमोहन मालविय
(3)यापैकी नाही
______________________________
🟤' द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन
वि.डी.सावरकर
अशोक मेहता✅✅
अशोक कोठारी
______________________________
⚫️ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?अशोक मेहता✅अशोक मेहता✅

दोदाबेटा
कळसुबाई✅✅✅
साल्हेर
मलयगिरी
______________________________
🔵 निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी
2)दोडाबेटा✅✅
3) अन्ना मलाई
4) उदकमडलम
______________________________
🟡 संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

१) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅
२) 25 ऑक्टोबर 1 9 45  
३) 24 ऑक्टोबर 1 9 54  
४) 25 ऑक्टोबर 1 9 54  

______________________________

बौद्ध परिषदा

🎯पहिली बौद्ध परिषद

👁‍🗨काळ:-483 इ स पू

👁‍🗨अद्यक्ष:-महाकश्यप

👁‍🗨ठिकाण:-राजगृह

👉राजा:-अजातशत्रू

🎯दुसरी बौद्ध परिषद

🔘काळ:-387 इ स पू

🔘अद्यक्ष:-महास्तवीर रेवत

🔘ठिकाण:-वैशाली

👉राजा:-कालाशोक

🎯तिसरी बौद्ध परिषद

👁‍🗨काळ:-243 इ स पू

👁‍🗨अद्यक्ष:-मोगलीपुत्र तिस्स

👁‍🗨ठिकाण:-पाटलीपुत्र

👉राजा:-अशोक

🎯चौथी बौद्ध परिषद

🔘काळ:-पहिले शतक

🔘अद्यक्ष:-वसुमित्र

🔘ठिकाण:-कुंडलवण

👉राजा :-कनिष्क

General Knowledge

▪️ कोणत्या कंपनीने नेत्रहीन लोकांसाठी “टॉकबॅक” कीबोर्ड विकसित केले आहे?
उत्तर : गुगल

▪️ कोणत्या कायद्याच्या अन्वये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा एक गुन्हा ठरविण्यात आला आहे?
उत्तर : आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५

▪️ कोविड-19 महामारीमुळे रद्द केलेला ‘टूर डी फ्रान्स’ कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : सायकल शर्यत

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘इंटरनॅशनल प्राइज फॉर अरबी फिक्शन 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : अब्देलौहब एसाओई

▪️ “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स” याची स्थापना करण्याची शिफारस केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : एम. एस. साहू

▪️ कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?
उत्तर : हैदराबाद

▪️ कोणत्या शहराने ‘स्मार्ट शहरे’ अभियानाच्या अंतर्गत ‘सय्यम’ अॅप तयार केले?
उत्तर : पुणे

▪️ 2020 या वर्षासाठी जागतिक पुस्तक दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : शेयर ए मिलियन स्टोरीज

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘सुजलाम सुफलाम जलसंचय अभियान’ आरंभ केले?
उत्तर : गुजरात

▪️ 2020 या सालाचा ‘विल्यम ई. कोल्बी पुरस्कार’ कुणी जिंकला?
उत्तर : अ‍ॅडम हिगिनबॉथम

प्रश्न मंजुषा

१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद 🚔
४) नरेंद्र मोदी

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)🚔
२) CH4
३) NO2
४) CO2

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८🚔
३) २०१३
४) २०१८

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा 🚔
३) २ वेळा
४) ५ वेळा

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर🚔
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  🚔

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028🚔
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  🚔
४) कलकत्ता

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका 🚔
४) दक्षिण आफ्रिका

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  🚔
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा 🚔
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे 🚔
४) स्मिता कोल्हे

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५०  🚔
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो 🚔
४) शरद पवार

१६) बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ?

१) अश्वघोष 🚔
२) नागार्जुन
३) वलुनिय
४) नागसेन

१६) स्वातंत्र्य आधी भारतात कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात होती ?
माफ करा या प्रश्नाचे उत्तर

उत्तर:-आसाम

________________________________
🔴 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✔️✔️
३) २ वेळा
४) ५ वेळा
________________________________
🟤 घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✔️✔️
________________________________
⚫️ भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✔️✔️
४) कलकत्ता
________________________________
🔵 विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे ✔️✔️
________________________________
🟢 महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✔️✔️
४) स्मिता कोल्हे
________________________________
🟡 संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५०  ✔️✔️
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७
________________________________
🟠 ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✔️✔️
४) शरद पवार
________________________________
🔴 बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ?

१) अश्वघोष 🚔
२) नागार्जुन
३) वलुनिय
४) नागसेन
____________________________________

_____________

महाराष्ट्रतील ग्रामीण भागाच्या विद्युतीकरणासाठी कर्ज.

🌿महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे विद्युतीकरण  करण्यासाठी आशियायी विकास बँकेने भारत सरकारला 2616 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

🌿महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावरचे राज्य असून ग्रामीण भागात कृषी क्षेत्रामध्ये सर्वाधिक लोक अजूनही काम करतात.

🌿कृषी उत्पादनाला पाटबंधारे व वीज, पाणी यांच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे फटका बसत आहे. ग्रामीण भागात उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याची गरज असून महाराष्ट्रात नवीन वीज संजालातून वीज देण्यासाठी या कर्जाचा वापर केला जाणार आहे.

🌿या कर्जातून 33/11 केव्हीची 121 उपकेंद्रे सुरू  करण्यात येणार असून 46,800 कि.मी.ची 11 किलोव्होल्टचे विस्तारित वीज संजाल सुरू करण्यात येणार आहे.

🌿महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची क्षमताही यात वाढवली जाणार आहे. महाराष्ट्र सरकार व ही कंपनी 703.1 दशलक्ष डॉलर्सच्या प्रकल्पातच 357.1 दशलक्ष डॉलर्सचा वाटा उचलणार आहे.

२०२८च्या ऑलिम्पिकमध्ये भारत अव्वल १० देशांत.

💢२०२८च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला अव्वल १० देशांत स्थान मिळवणे नक्कीच शक्य आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी व्यक्त केली.

💢या ध्येयाच्या दिशेने शासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

💢‘‘ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात.

💢गेल्या काही वर्षांत भारताला अनेक युवा आणि कौशल्यवान क्रीडापटू गवसले असून २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये आपण नक्कीच अव्वल १० देशांत स्थान मिळवू शकतो, असे मला वाटते. त्यादृष्टीने क्रीडा खात्यासह शासनानेही आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत,’’ असे रिजिजू म्हणाले.

💢‘‘२०२८च्या ऑलिम्पिकसाठी अद्याप आमच्याकडे आठ वर्षांचा कालावधी असल्याने खेळाडूंच्या शोधमोहिमेची अंतिम रुपरेषा कशी असावी, याविषयी आम्ही सध्या चर्चा करत आहोत.

💢त्याचप्रमाणे २०२१च्या ऑलिम्पिकसाठी खेळाडू कसे तयारी करत आहेत, याकडेही आमचे लक्ष आहे,’’ असे रिजिजू यांनी नमूद केले.

आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या मदतीला HCARD रोबोटची साथ.

☄दुर्गापूर येथील CSIR-सेंट्रल मेकेनिकल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट या प्रयोगशाळेनी HCARD (हॉस्पिटल केअर असिस्टिव्ह रोबोटिक डिव्हाइस) रोबोटिक उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि नेव्हिगेशनच्या स्वयंचलित तसेच मानवचलित अशा दोन्ही पद्धतीने कार्य करते.

☄संसर्ग झालेल्या लोकांची काळजी घेताना रुग्णालयातल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कोविड-19 विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे HCARD रोबोट आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांपासून शारीरिक अंतर राखण्यास मदत करू शकते.

🌑यंत्राची वैशिष्ट्ये...

☄संचालन, रूग्णांना औषधे आणि खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी ड्रॉव्हर अ‍ॅक्टिवेशन, नमुना संकलन आणि दृकश्राव्य संवाद यासारख्या वैशिष्ट्यांसह नियंत्रण कक्ष असलेल्या परिचारिका बूथद्वारे या रोबोटचे नियंत्रण आणि परीक्षण केले जाऊ शकते.

☄या उपकरणाची किंमत 5 लक्ष रुपयांहून कमी आहे आणि त्याचे वजन 80 किलोहून कमी आहे.

पृथ्वीच्या जवळून गेले मोठे संकट.

🔰अंतराळातून रॉकेटच्या तिप्पट वेगाने जाणारा एक मोठा उल्कापिंड 1998 OR2 पृथ्वीच्या जवळून गेला आहे.

🔰या उल्कापिंडमुळे पृथ्वीला कोणताही धोका नव्हता. कारण हा उल्कापिंड 63 लाख किमीवरून पुढे गेला आहे.

🔰तर तो याआधी 12 मार्च 2009 मध्ये पृथ्वीपासून 2.68 कोटी किमी लांबीवरून गेला होता. आता घाबरायचे कारण नसल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.

🔰तसेच हा उल्कापिंड पृथ्वीच्या शेजारून यापुढेही जाणार असून त्याचा वेग पाहता तो 11 वर्षांनी पुन्हा येणार आहे. यावेळी त्याचे अंतर हे पृथ्वीपासून 1.90 कोटी किमी असणार आहे.

🔰हा उल्कापिंड दर 11 वर्षांनी पृथ्वीजवळून जातो. भविष्यात हा उल्कापिंड 2031, 2042 आणि नंतर 2068 व 2079 मध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे.

🔰यापैकी 2079 मध्ये हा उल्कापिंड पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. यावेळी त्याचे अंतर हे आतापेक्षा 3.5 पटींनी कमी असणार आहे. आज हा उल्कापिंड 63लाख किमी लांबून गेला आहे. 2079 मध्ये हा उल्कापिंड 17.73 लाख किमी अंतरावरून जाणार आहे. हे या उल्कापिंडाचे पृथ्वीपासूनचे सर्वांत कमी अंतर असणार आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...