१२ एप्रिल २०२०

लॉकडाउन हटवण्यात घाई केली तर घातक परिणाम होतील, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

🅾करोनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध उठवण्यास घाई केली तर त्याचे घातक परिणाम होतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेले असतानाही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना योग्य उपाययोजना करत लॉकडाउन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

🅾लॉकडाउनचे निर्बंध हटवण्यात घाई केली तर त्याचे घातक परिणाम भोगावे लागतील असं टेड्रोस एडहानोम याचं म्हणणं आहे. जिनेवामधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. काही ठिकाणी करोनाचा फैलाव वाढत असल्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, जर योग्य काळजी घेतली नाही तर खूप मोठा धोका आहे.

🅾“लॉकडाऊन हटवावं अशी सगळ्यांसारखीच आमचीदेखील इच्छा आहे. पण घाईघाईत लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल. योग्य पद्धतीने करोनाचा सामना करण्याची गरज आहे अन्यथा त्याचे घातक परिणाम होतील,” असं टेड्रोस एडहानोम यांनी म्हटलं आहे.

राज्यावर अर्थसंकट २०१९-२० मध्ये अपेक्षित महसुलापेक्षा सुमारे ३५ हजार कोटींचा फटका बसला आहे.

🔰विषाणूमुळे तब्बल ३५ हजार कोटींचा तोटा; महसुलात मोठी घट
करोनाच्या साथीमुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने उद्योग-व्यापार उदीम, घरांची खरेदी-विक्री असे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्य सरकारच्या तिजोरीला करोनाचे चटके बसले असून मार्च २०१९ च्या तुलनेत यंदा मार्च मध्ये जवळपास २५ हजार कोटींचा फटका बसला. आर्थिक वर्षांचा विचार करता २०१९-२० मध्ये अपेक्षित महसुलापेक्षा सुमारे ३५ हजार कोटींचा फटका बसला आहे.
गेल्या आर्थिक वर्षांचा जमा-खर्चाचा तपशील आता मंत्रालयात मांडण्यात येत आहे. त्यानुसार महसुलात मोठी घट झाली आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीवरील मूल्यवर्धित कराच्या माध्यमातून ३८ हजार ६६ कोटी रुपयांची अपेक्षा होती. पण त्यात ४३६ कोटी रुपये कमी मिळाले.मुळात अर्थव्यवस्थेत थोडी मंदी असल्याने वस्तू व सेवा कराची वसुली कमी राहिली. त्यात करोनाच्या साथीमुळे आणखी फटका बसला. करोनामुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले. त्याचा मोठा परिणाम मार्चमधील महसुलावर झाला.
परिस्थिती काय?

🔰 मार्च २०१९ मध्ये राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता.

🔰 यंदा उद्योग-व्यापार घरांची खरेदी-विक्री, उत्पादन शुल्क, इंधनावरील कर अशा सर्वच आघाडय़ांवरील महसूल आटला आणि मार्च २०२० मध्ये राज्याच्या तिजोरीला अवघे १७ हजार कोटी रुपये मिळाले.

🔰 म्हणजेच सुमारे २५ हजार कोटींचा फटका एकटय़ा मार्च महिन्यात आपल्याला बसला आहे. सरत्या आर्थिक वर्षांचा विचार केला तर सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला, अशी माहिती अर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
सारी अनिश्चितता.. वस्तू व सेवा करातून राज्याला २०१९-२० मध्ये १ लाख ३ हजार ७६० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता. प्रत्यक्षात त्यातून ८२ हजार ५९० कोटी रुपये मिळाले. हा २१ हजार १७० कोटी रुपयांचा फटका बसला. अर्थात केंद्र सरकारकडून त्याची भरपाई अपेक्षित असली तरी ती कधी मिळेल हे याची सद्यस्थितीत खात्री देता येत नाही.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

🔰1) पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता?
     ‘बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिग भरली होती.’

▪️1) ती गाडी  
▪️ 2) शिगोशिग   
▪️3) भरली होती  
▪️ 4) बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ✅

🔰2) ‘आजी दृष्ट काढते’ वाक्यातील प्रयोग ओळखा.

◾️ 1) कर्मणी प्रयोग  
◾️ 2) कर्तरी प्रयोग    ✅
◾️ 3) भावे प्रयोग  
◾️ 4) शक्यकर्मणी प्रयोग

🔰3) ‘चक्रपाणी’ या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा.

▪️ 1) मध्यमपद लोपी समास    
▪️ 2) समाहार व्दंव्द
▪️ 3) इतरेतर व्दंव्द      
▪️ 4) कोणताही नाही✅

🔰4) विरामचिन्हांचा वापर करताना ‘संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो.’

▪️अ) दोन शब्द जोडताना       
▪️ब) संबोधनाकरिता वापर केला जातो▪️क) दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी  
▪️ ड) ओळीच्या शेवटी शब्द अपूरा राहिल्यास

▪️1) ब बरोबर
▪️2) ब, ड बरोबर
▪️3) क     
▪️4) अ, ड बरोबर ✅

🔰5) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! (अलंकार ओळखा.)

▪️1) श्लेष अलंकार   
▪️2) यमक अलंकार  
▪️ 3) अतिशयोक्ती अलंकार
▪️4) उपमा अलंकार ✅

🔰6) सिध्द शब्द ओळखा.
  
▪️1) येऊन  
▪️2) ये      ✅
▪️3) येवो    
▪️4) येणार

🔰7) ‘चला पानावर बसा’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

▪️1) व्यागार्थ  
▪️ 2) लक्षार्थ    ✅
▪️3) वाच्यार्थ   
▪️4) संकेतार्थ

🔰8) ‘पाणी’ या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा :

▪️1) जल      ✅
▪️2) जलद    
▪️3) ढग     
▪️4) क्षार

🔰9) ‘अवरोहण’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द निवडा.

▪️1) उन्नत   
▪️2) अवनत  
▪️ 3) आरोहण    ✅
▪️4) प्रारंभ

🔰10) ‘फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात.’ – हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य म्हण निवडा.

▪️1) हात ओला तर मित्र भला    ✅
▪️2) मूल होईना सवत साहीना
▪️3) मनास मानेल तोच सौदा  
▪️ 4) फुले वेचली तेथे गोव-या वेचू नये

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

🔰खालील विधाने विचारात घ्या:

अ) भारतात सर्वात जास्त काल इंग्रजांनी शासन केले.
ब) पोर्तुगीजांनी भारतातून सर्वप्रथम आपली सत्ता मागे घेतली.
क) पोर्तुगीजांनी आपली पहिली वसाहत गोवा इथे स्थापन केली.
ड) ब्रिटीश खलाशी वास्को-द-गामा १४९८ मध्ये भारतात आला.

१) फक्त अ,ब, क योग्य
२) फक्त क योग्य 📚✍️
३) सर्व अयोग्य
४) सर्व योग्य

🔰कोणत्या वर्षी भारत सरकारने जागतीक व्यापार संघनेशी करार केला आहे ? आणि जागतीक व्यापार संघटना (डब्ल्यु. टी. ओ.) कधी अस्तित्वात आली. 

A) 1981-1982 
B) 1994-1995  ✅
C) 1996-1997 
D) 1998-1998 

🔰 भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली ?

M) मार्च 1950 ✅
P) एप्रिल 1950
K) मार्च 1951
H) मार्च 1949

🔰 _________ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.

A) भुवनेश्वर
B) हाजीपूर 
C)  गुहाटी
D) गोरखपुर ✅

🔰द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील __ परिसरात दाट लोकवस्ती आढळते.*

A) लातूर - उस्मानाबाद
B) जलगाव - भुसावल
C) पंढरपूर - सोलापूर
D) पिंपरी -चिंचवड✅

🔰 मानव विकास निर्देशांक यांची जनक खालीलपैकी कोण आहे

१.  दादाभाई नवरोजी
२.  मॉरीस डी मॉरीस
३. जेके मेहता
४.  वरीलपैकी एकही नाही✅✅
(स्पष्टीकरण:-
जनक मेहबूब उल हक)

🔰 कोणती दारिद्र्य सर्व देशात आढळते?

१.  सापेक्ष दारिद्र्य✅✅
३. निरपेक्ष दारिद्र्य
२. नागरी दारिद्र्य
४.  शहरी दारिद्र्य

🔰 कोणता रोग हा एकदा होऊन गेला की पुन्हा होत नाही बहुदा पुन्हा होत नाही

१.  कॉलरा
२. विषम ज्वर
३. खरुज
४. इसब
५. वरीलपैकी एकही नाही✅✅

🔰 चारकोल म्हणजे काय ?

१. लोणारी कोळसा ✅✅
२. दगडी कोळसा
३. कच्चा कोळसा
४. खाणीतील कोळसा

🔰 एक किलोग्रॅम लाकडा पासून सुमारे किती जुल एवढी ऊर्जा मिळते?

1.  १७००✅✅
2 १८००
३. १५००
4. १२००

🔰 पेलागा हा रोग............ या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो ?

१. क
२. ई
३. ड
४. वरीलपैकी एकही नाही✅✅
(स्पष्टीकरण:-
पेला ग्ररोग्य  ब या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो)

महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे


◆प्रवरा नदी व मुळा नदी  -  नेवासे, अहमदनगर

◆मुळा व मुठा नदी - पुणे

◆गोदावरी व प्राणहिता  -  सिंगेचा, गडचिरोली

◆तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव तिर्थक्षेत्र, जळगाव

◆कृष्णा व वेष्णानदी -  माहुली, सातारा

◆तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे

◆कृष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी, सांगली

◆कृष्णा व कोयना -  कराड, सातारा

◆गोदावरी व प्रवरा  - टोके, अहमदनगर

◆कृष्णा व येरळ -  ब्रम्हनाळ, सांगली

आणीबाणी

   " 21 महिन्यांच्या कालावधीत 1975 पासून 1977 पंतप्रधान तेव्हा संदर्भित इंदिरा गांधी एक होती तात्काळ राज्य देशभरातील घोषित केले. अधिकृतपणे अध्यक्ष जारी फकरुद्दीन अली अहमद लेख 352 अंतर्गत राज्यघटना कारण प्रचलित "अंतर्गत दंगल" च्या, आणीबाणी लागू 26 जून 1975 त्याच्या मागे होईपर्यंत जानेवारी 1977 अधिकार पंतप्रधान यावर बहाल करण्यासाठी होता राज्य डिक्री , निवडणुका स्थगित करण्यास आणि नागरी स्वातंत्र्यांना आळा घालण्याची मुभा. आणीबाणीच्या बराच काळ गांधींचे बहुतेक राजकीय विरोधक तुरुंगात होते आणि पत्रकार होतेसेन्सर . पंतप्रधान मानवाचे पुत्र संजय गांधी यांच्या नेतृत्वात जबरदस्ती जन-नसबंदी मोहिमेसह इतर अनेक मानवाधिकार उल्लंघनांची नोंद झाली . आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा सर्वात वादग्रस्त कालखंड आहे .

आणीबाणी लागू करण्याचा अंतिम निर्णय इंदिरा गांधींनी मांडला होता, त्यावर राष्ट्रपतींनी सहमती दर्शविली होती आणि त्यानंतर मंत्रिमंडळ आणि संसदेने (जुलै ते ऑगस्ट 1975 पर्यंत) मंजूर केले होते, तेथे निकटवर्ती अंतर्गत व बाह्य धोके असल्याच्या युक्तिवादावर आधारित होते.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आणीबाणी (भारत)

आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.

 राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण संघ अणिबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभा राहिला.

मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले कॉंग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली ह्या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हार पत्कारावी लागली.

आणीबाणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासामधील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक मानली जाते.

घटनाक्रम

१९७५

१२ जून : निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून इंदिरा गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषी ठरविले. गांधी यांनी १९७१च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी आणि यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.

२२ जून : जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी आणीबाणीच्या विरोधात दिल्लीत रामलीला मैदानात मोठ्या सभेचे आयोजन केले.

२४ जून : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घालत स्थगिती दिली. तसेच, संसदेचे सदस्य रहण्यास इंदिरा गांधींना परवानगी दिली. मात्र संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले.

२५ जून : देशात आणीबाणी लागू केल्याची घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली, त्याचवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज सेवा खंडित करण्यात आली.

३० जून : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणार्‍यांना थेट अटक करण्यास सुरुवात झाली.

१ जुलै : आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी २० कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.

५ जुलै : जमात ए इस्लामी, आनंद मार्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी २६ संघटनांवर बंदी घालण्यात आली.

२३ जुलै : आणीबाणीला राज्यसभेची मंजुरी.

२४ जुलै : लोकसभेतही आणीबाणीच्या बाजूने मतदान.

५ ऑगस्ट : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात आला.

१९७६

२१ मे : न्यायालयाचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली.

२५ ऑगस्ट : विवाहाचे वय वाढविण्याची तरदूत असलेले विधेयक मांडण्यात आले.

३ नोव्हेंबर : घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेची मंजुरी.

१ सप्टेंबर : लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्तीची नसबंदी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात.

१९७७

१८ जानेवारी : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा.

२० जानेवारी : लोकसभा विसर्जित करण्यात आली.

२४ जानेवारी : मोरारजी देसाई यांची जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

११ फेब्रुवारी : राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांचे निधन.

२१ मार्च : आणीबाणी मागे घेण्यात आली.

२२ मार्च : जनता पक्षाला निवडणुकीत बहुमत.

प्रश्न मंजुषा.. success point

1) महाराष्ट्रात चिकनगुनिया ची साथ कोणत्या वर्षी पसरली
  -1965

2) चंडीपूरा रोग कोणत्या प्रकारचा आहे
- विषाणुजन्य रोग

3) झिका रोग कोणत्या प्रकारचा आहे
-विषाणुजन्य

4) डांग्या खोकला या अजाराला इंग्रजीत काय म्हणतात
-हुपिंग कफ

5) सुधारित राष्ट्रीय उपचार पद्धति कधी अमलात अली
-2013

6)डेंगू रोगाचा अधिशयन काल कीती कालावधी चा असतो
-5 ते 7 वर्ष

7)चिकनगुनिया विषाणु चा शोध कधी लागला
-1953

8)लहान बालकांना लसिकरनाद्वारे कीती एकक घटसर्प प्रतिविष दिल्या जाते
-5000 ते 1000 एकक

9) उष्णता सूर्यप्रकाश व अतिथंड तापमानाला कोणती लस सवेंदनशील असते
-पेंटा ,डीटीपी, टीटी

10)लस वाहकामध्ये लसी कीती तास सुश्थितित राहु शकतात
-24 तास

११ एप्रिल २०२०

शेजारी देशांमध्ये विशेष विमानाने पोहोचवली औषधे.

🔷भारताप्रमाणे अन्य शेजारचे देशही करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. भारताने या देशांना मदत पाठवायला सुरुवात केली आहे.

🔷तर सध्याच्या घडीला अत्यंत महत्वाचे ठरणारे हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन हे औषध भारताने या देशांना पाठवले आहे. साऊथ ब्लॉकमधील अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.तसेच हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन ही गोळी करोना व्हायरसवर अत्यंत प्रभावी ठरत आहे. अमेरिकेने याच औषधाच्या निर्यातीसाठी भारतावर दबाव टाकला होता.

🔷भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत.
मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून 10 टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे.

🔷अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.

मेक्सिको वगळता इतर देशांची तेल उत्पादन घटवण्यास मान्यता

मेक्सिको वगळता इतर प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये तेलाच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयावर मतैक्य झाले आहे. ओपेक या तेल उत्पादक व निर्यातदार देशांची बैठक होऊन त्यात जुलैपर्यंत तेलाचे उत्पादन दर दिवशी १ कोटी पिंपे व वर्षअखेरीपर्यंतच्या काळात ८० लाख पिंपांनी कमी करण्यावर मतैक्य झाले. पण त्याला मेक्सिकोने मान्यता दिलेली नाही.
ओपेक व रशियासह काही मित्र देश यांची आभासी बैठक गुरुवारी झाली. तेलाचे दर दोन दशकातील नीचांकी होत आले असून घसरण रोखण्यासाठी तेलाचे उत्पादन कमी करणे गरजेचे आहे, पण मेक्सिकोने त्यासाठी मान्यता देणे गरजेचे आहे. मेक्सिकोने त्यांच्या वाटय़ाचे तेल उत्पादन दिवसाला चार लाख पिंपानी कमी करणे गरजेचे आहे.
मेक्सिकोच्या ऊर्जा मंत्री रोसिओ नहले गार्सिया यांनी सांगितले, आम्ही दिवसाला १ लाख पिंपे उत्पादन कमी करण्यास तयार आहोत. मार्चपर्यंत मेक्सिकोने १७ लाख पिंपे उत्पादन केले आहे. दिवसाला १ कोटी पिंपे तेल उत्पादन घटवण्याचा सौदी अरेबिया आणि रशियाचा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे असे व्हेनेझुएलाने म्हटले आहे.
जगात

कोविड-19: बंदरावरील कामकाज सुरळीत ठेवण्यात नौवहन मंत्रालयाची सक्रिय भूमिका.

✅कोविड -19 च्या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर नौवहन आणि बंदरातील कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी, अडचणींना कमी करण्यासाठी आणि त्याच वेळी लॉकडाऊन दरम्यान लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करण्यासाठी नौवहन मंत्रालयाने सक्रिय पावले उचलली आहेत.

✅महत्वाच्या बंदरांवर झालेली मालवाहतूकगतवर्षी मार्च ते एप्रिल या काळात 699.10 दशलक्ष टन मालवाहतूक झाली होती जी यावर्षी याच कालावधीत 0.82% वाढून 704.63 दशलक्ष टन झाली आहे.

〽️कोविड-19 चा सामना करण्यासाठी नौवहन मंत्रालयातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या जसे की:-

📛थर्मल स्कॅनिंग....

✅महत्वाच्या बंदरांवर बंदर वापर करणाऱ्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्क, विलंब शुल्क, दंड किंवा भाड्यात सूट

✅प्रमुख बंदरांना निर्देश देण्यात आले आहेत की सवलत कराराच्या तरतुदीनुसार विद्यमान आणि कार्यान्वित पीपीपी ( सरकारी-खाजगी भागीदारी) प्रकल्पांसाठी सर्व दंडात्मक परीणामांना ते माफ करू शकतात.

✅कोविड-19 चा सामना करण्यासाठी महत्वाच्या बंदरांच्या ठिकाणची रुग्णालयांची सज्जता..

✅कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 7 कोटी रुपये पंतप्रधान मदत निधीत

✅नौवहन मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली बंदरे आणि मालवाहू कंपन्यांच्या सीएसआर निधीतून पंतप्रधान मदत निधीत 52 कोटी रुपयांहून अधिक साहाय्य.

✅कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी नौवहन मंत्रालयाने नौवहन कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत. सर्व भारतीय नौवहन कंपन्यांसह नौवहन क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांसाठी या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
 
✅मालाच्या आयात-निर्यातीसाठी बंदरात उतरवण्यात आलेल्या कंटेनरना त्यांच्या करारातील अटीनुसार किंवा त्यापेक्षा अधिक काळ थांबण्याच्या व्यवस्थेसाठी 22 मार्च 2020 ते14 एप्रिल 2020 (या दोन्ही तारखा धरून) अतिरिक्त शुल्क न आकारण्याबाबत नौवहन मंत्रालयाने सर्व सागरी मालवाहतूक कंपन्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

भारताचे संशोधक करोनावर शोधणार लस, ऑस्ट्रेलियाशी केला करार

- आजवर जगभरात सुमारे ८८००० लोकांचा बळी घेणाऱ्या आणि लाखो लोकांना लागण झालेल्या कोरोना विषाणू (कोविड-19)वर लस शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केल्याची घोषणा इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड (आयआयएल) या आघाडीच्या लस उत्पादक कंपनीने केली आहे. 

- भारतात हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ युनिव्हर्सिटीसोबत कराराच्या माध्यमातून सहयोग साधला आहे. कोरोना विषाणूवर परिणामकारक लस शोधून काढण्यासाठी या सहयोगातून प्रचंड प्रमाणावर संशोधन हाती घेतले जाणार आहे.

- या दोन खंडांमधील या लक्षणीय सहकार्यामुळे आयआयएल आणि ग्रिफिथ युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया)मधील वैज्ञानिक कोडोन डी-ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून 'लाइव्ह अटेन्युएटेड सार्स - सीओव्ही-2 लस' किंवा कोविड-19 लसीचा शोध लावणार आहेत. अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह हे रोगप्रतिबंधक, सक्रिय, सिंगल डोस प्रतिकारात्मक औषध मानवी शरीरात कोरोना विषाणूंशी लढण्यासाठीची लस तयार करण्यासाठी हे तंत्रज्ञान आश्वासक आहे. या लसीमुळे एकाच डोसमधून दीर्घकाळ सुरक्षितता आणि इतर अधिकृत सक्रिय रोगप्रतिकारक लसींप्रमाणे लाभ मिळणे अपेक्षित आहे.

- संशोधन पूर्ण झाल्यानंतर या लसीचे अंश इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडला हस्तांतरित केले जातील आणि लस बनवणाऱ्या कंपन्या देशातील सीडीएससीओ (द सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन)च्या नियमनानुसार टप्प्याटप्प्याने पुढील क्लिनिकल चाचण्या घेतील.

- या संदर्भात इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के आनंद कुमार म्हणाले, "या संशोधन सहकार्यातून तातडीच्या सार्वजनिक आरोग्य गरजा पूर्ण करण्यास आयआयएल बांधिल आहे. आयआयएलची मोहीमच आहे 'वन हेल्थ' मोहिमेला पाठबळ देणाऱ्या लसी तयार करणे आणि त्यांचा पुरवठा करणे.

- कोविड-19 या साथीच्या संकटासाठी लस तयार करण्याचा उपक्रम आयआयएलने हाती घेतला आहे. मानवजात आणि प्राण्यांसाठी सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरातील लसी तयार करण्यातील आमच्या नेतृत्व स्थानामुळे या उपक्रमात यश मिळवणे आम्हाला शक्य होणार आहे."

- कोडोना डी-ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानामुळे आम्ही एंटेरोवायरस सी (), ह्युमन इम्युनोडेफिशीअन्सी वायरस टाइप 1, झिका वायरस अशा विविध आरएनए विषाणूंचा प्रसार यशस्वीरित्या कमी करू शकलो आहोत.
---------------------------------------------------

महामारीच्या काळात सुरक्षित कार्य करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी TRIFED आणि UNICEF यांच्यात भागीदारी

- भारतातल्या आदिवासी जमातीचे लोक सुरक्षितपणे आपले काम चालू ठेवण्यासाठी भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) या संस्थेनी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या आंतरराष्ट्रीय संघटनेबरोबर भागीदारी केली आहे.

- कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्याविषयीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बचत गटांसाठी (SHG) डिजिटल मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक डिजिटल संपर्क धोरण’ विकसित करणे, हे या भागीदारीचे लक्ष्य आहे.

- भागीदारीनुसार, UNICEF बचत गटांना डिजिटल मल्टीमीडिया सामग्रीच्या रूपात माहिती प्रसारित करण्यासाठी आवश्यक ती मदत देणार. तसेच महामारीला प्रतिसादासाठी आभासी प्रशिक्षण देण्यासाठी आभासी कार्यशाळा, मुख्य प्रतिबंधक वर्तन; सामाजिक अंतर राखण्याविषयी सोशल मीडिया मोहीमा; आणि वन्य रेडिओ याविषयी आवश्यक ती मदत दिली जाणार.

- हा उपक्रम सर्व 27 राज्यांमध्ये राबावविला जाणार आहे. देशात सुमारे 18,075 वन धन बचत गट आहेत. त्यापैकी 15 हजार बचत गट डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून वन धन सामाजिक अंतर जनजागृती नि उपजीविका केंद्र’ म्हणून नेमले जाणार आहेत. ही केंद्रे महामारीच्या काळात काय करावे आणि काय करू नये याविषयी जागरूकता निर्माण करणार.

- आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) याची स्थापना 1987 साली झाली. आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करणारी ही राष्ट्रीय पातळीवरील शिखर संस्था आहे.

- संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (United Nations Children's Fund –UNICEF) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक शाखा आहे जी जगभरातल्या बालकांपर्यंत मानवतावादी आणि विकासात्मक मदत पुरविण्यासाठी जबाबदार आहे.

- या संघटनेची उपस्थिती 192 देश आणि प्रातांमध्ये आहे. संघटनेची स्थापना 11 डिसेंबर 1946 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय न्युयॉर्क शहर (अमेरिका) येथे आहे.
---------------------------------------------------

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...