०३ मार्च २०२०

चालू घडामोडी प्रश्नसंच

1)"डू यू नो" ट्विटर शृंखला _ याच्याशी संबंधित आहे.
(A) बँकिंगविषयी जागृती
(B) कौटुंबिक निवृत्तीवेतन.  √
(C) भारताविषयी जाणून घेण्यासाठी
(D) यापैकी नाही

2)भारतीय रेल्वेनी __ या शहरात त्याचे पहिले ‘फिरते उपहारगृह’ उघडले.
(A) असनसोल स्थानक.  √
(B) नवी दिल्ली स्थानक
(C) जयपूर स्थानक
(D) लखनऊ स्थानक

3)2020 या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना काय आहे?
(A) विमेन एम्पोवरमेन्ट अँड जेंडर इक्वलिटी
(B) जेंडर इक्वलिटी अँड विमेन एम्पोवरमेन्ट
(C) आय एम जेनेरेशन इक्वलिटी: रियलाईजिंग विमेन्स राइट्स.  √
(D) आय एम रियलाईजिंग विमेन्स राइट्स: जेनेरेशन इक्वलिटी

4)संशोधकांना ‘हेनेगुया साल्मीनिकोला’ नावाचा जीव आढळला. ‘हेनेगुया साल्मीनिकोला’ हा ____ आहे.
(A) ऑक्सिजनद्वारे जीवंत राहू शकणारा प्राणी
(B) ऑक्सिजनशिवाय जीवंत राहू शकणारा प्राणी.  √
(C) विषाणूचा एक प्रकार
(D) जिवाणूचा एक प्रकार

5)“RAISE 2020” कार्यक्रम _ या शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे.
(A) लखनऊ
(B) नोएडा
(C) शिमला
(D) नवी दिल्ली.  √

6)‘राष्ट्रीय तपास संस्था’ (NIA) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. ही केंद्रीय दहशतवादरोधी कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून काम करते.

2. ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेला पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही.  √
(D) ना (1), ना (2)

7)कोणत्या राज्याने भारतीय विमानतळ प्राधिकरणासोबत सहा उपकरणे व्यवस्थापन केंद्रांची उभारणी करण्यासाठी सामंजस्य करार केला?
(A) मेघालय
(B) त्रिपुरा.  √
(C) आसाम
(D) उत्तरप्रदेश

8)‘ऑफशोअर पेट्रोल व्हसेल-6’ या जहाजाचे _ येथे अनावरण झाले.
(A) गोवा
(B) चेन्नई.  √
(C) मुंबई
(D) केरळ

9)अकरावी ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद 2020’ _ या शहरात आयोजित करण्यात आली.
(A) पुणे
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) नवी दिल्ली.  √

10)29 फेब्रुवारी 2020 रोजी _ या शहरात ‘पेन्शन अदालत’ आणि ‘नॅशनल पेन्शन सिस्टम’ (NPS) जागृती व तक्रार निवारण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
(A) जम्मू.  √
(B) दिल्ली
(C) हैदराबाद
(D) चेन्नई

1)“RaIDer-X” नावाचे नवीन स्फोटक शोधन यंत्र _ यांनी तयार केले.
(A) रिलायन्स डिफेन्स
(B) संरक्षण संशोधन व विकास संस्था.  √
(C) इंडियन एअरफोर्स रिसर्च लॅबोरेटरीज
(D) बॉर्डर रिसर्च लॅबोरेटरीज

2)भारतीय हवाई दलाने  सोबत संरक्षण व धोरणात्मक अभ्यास विभागामध्ये एक 'चेअर ऑफ एक्सलन्स'चे पद निर्माण करण्यासाठी सामंजस्य करार केला.
(A) दिल्ली विद्यापीठ
(B) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली
(C) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.  √
(D) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू

3)_____ या शहरात भारताच्या गृहमंत्र्यांनी ‘NSG प्रादेशिक केंद्रस्थळ’ याच्या परिसराचे उद्घाटन केले.
(A) नवी दिल्ली
(B) जयपूर
(C) रायपूर
(D) कोलकाता.  √

4)दिव्यांग कारागीर व उद्योजकांच्या शिल्पकलेला व उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने  या ठिकाणी ‘एकम महोत्सव’ आयोजित करण्यात आला.
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) हैदराबाद
(D) नवी दिल्ली.  √

5)पर्यटन मंत्रीच्या हस्ते 2 मार्च 2020 रोजी नवी दिल्लीत बहुभाषिक ‘अतुल्य भारत’चे संकेतस्थळ उघडण्यात आले. संकेतस्थळामध्ये पुढीलपैकी कोणती भाषा समाविष्ट करण्यात आली?

1. चीनी

2. अरबी

3. स्पॅनिश

दिलेल्यापैकी अचूक उत्तर असलेला पर्याय निवडा:

(A) (1) आणि (2)
(B) (2) आणि (3)
(C) (1) आणि (3)
(D) (1), (2) आणि (3).  √

6)_____ या दिवशी ‘शून्य भेदभाव दिन’ साजरा केला जातो.
(A) 1 मार्च.  √
(B) 2 मार्च
(C) 3 मार्च
(D) 4 मार्च

7)_______ या राज्यात सहावी ‘इंडिया आयडिया परिषद’ आयोजित करण्यात आली.
(A) गुजरात.  √
(B) उत्तरप्रदेश
(C) दिल्ली
(D) गोवा

8)सरबानंद सोनोवाल यांना डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार _ क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी दिला गेला.
(A) राजकारण.  √
(B) ग्रामीण भागात सामाजिक सेवा
(C) हिंदी भाषेत गुणवत्तापूर्ण संशोधन
(D) यापैकी नाही

9)29 फेब्रुवारी 2020 रोजी _मध्ये ‘चिंतन बैठक’ या नावाखाली बंदरांची आढावा बैठक पार पडली.
(A) कोलकाता
(B) तामिळनाडू.  √
(C) चेन्नई
(D) मुंबई

10)____ या शहरात ‘पुसा कृषी विज्ञान मेळावा 2020’ आयोजित करण्यात आला.
(A) नवी दिल्ली.  √
(B) भोपाळ
(C) चेन्नई
(D) हैदराबाद

पोलीस भरती प्रश्नसंच

1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?
उत्तर : भारत

2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
उत्तर : चीन

3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?
उत्तर : निक्सन

4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?
उत्तर : माद्री

5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?
उत्तर : मजलीस

6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?
उत्तर : ओडिसा

7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?
उत्तर : अंकारा

8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?
उत्तर : खरगपूर

9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?
उत्तर : अल्फ्रेड नोबेल

10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?
उत्तर : रेडक्लिफ रेष

11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?
उत्तर : 14 नोव्हेंबर

13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे

14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
उत्तर : नागपूर

15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?
उत्तर : विदर्भ

16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते
उत्तर : जांभी

General Knowledge

▪ भारतातल्या कोणत्या शहरात सर्वाधिक डिजिटल व्यवहार झालेत?
उत्तर : बंगळुरू

▪ भुवनेश्वरमध्ये एका कार्यक्रमात कोणाकडून ‘1000 स्प्रिंग्ज’ पुढाकारांची घोषणा करण्यात आली?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

▪ “EASE 3.0” धोरण कशाशी संबंधित आहे?
उत्तर : बँकिंग क्षेत्रात सुधारणा

▪ कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय MSME पुरस्कार’ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला?
उत्तर : नवी दिल्ली

▪ पूर्व क्षेत्र परिषदेची 24वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर : भुवनेश्वर

▪ राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र कोणत्या शहरात आहे?
उत्तर : हैदराबाद

▪ ‘किनारपट्टी आपत्ती निवारण व स्थितिस्थापकत्व विषयक परिषद’ कुठे आयोजित करण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली

▪ कोणत्या मंत्रालयाने “मार्केट इंटेलिजेंस अँड अर्ली वॉर्निंग सिस्टम” (MIEWS) सादर केली?
उत्तर : अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय

▪ ताज्या ‘सस्टेनॅबिलीटी इंडेक्स’मध्ये भारताला कोणता क्रमांक प्राप्त झाला?
उत्तर : 77 वा

▪ भारतीय विधी आयोग हे कोणते मंडळ आहे?
उत्तर : अवैधानिक मंडळ

०२ मार्च २०२०

पाकिस्तानसाठी चीन पाठवणार बदकांची फौज

🦗 पाकिस्तानमध्ये सध्या टोळधाडीने धुमाकूळ घातला असून अनेक पिकांचे नुकसान केले आहे. टोळ कीटकांना नष्ट करण्यासाठी चीनने पाकिस्तानला 1 लाख बदकांची फौज पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

🧐 *प्रकरण काय? :*

▪ अलीकडेच टोळांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील संपूर्ण पीके नष्ट केली.  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टोळांशी लढा देण्यासाठी आपल्या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली.

▪ पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि येमेन हे टोळांचे प्रजनन केंद्र मानले जाते. येथे हिवाळ्यामध्ये टोळ किड्यांची पैदास होते. टोळ नियंत्रणात पाकिस्तानकडे प्रभावी व्यवस्थापन नाही.

🧐 *बदके खातात 200 टोळ :* चीन पूर्वेकडील झेजियांग प्रांतातून टोळ खाणाऱ्या बदकांना पाकिस्तानात पाठवले जाणार आहे. एक बदक दिवसाला 200 टोळ कीटक खाऊ शकतो. त्यामुळे 1 लाख बदकांची फौज दिवसाला 2 कोटी टोळ कीटकांना खाऊ शकते.

📍 दरम्यान, टोळ नाकतोड्याचाच एक प्रकार आहे. या कीटकामुळे पिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हानी होते.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच जॉईन करा

“मर्केरियन 231’ आकाशगंगेमध्ये ऑक्सिजन वायू आढळला

🔰 पृथ्वीपासून दीड अब्ज प्रकाशवर्षांच्या अंतरावर असलेल्या “मर्केरियन 231’ नावाच्या आकाशगंगेमध्ये खगोलशास्त्रज्ञांना आण्विक ऑक्सिजनचा शोध लागला आहे. पृथ्वीपासून 561 दशलक्ष प्रकाशवर्षांच्या अंतरावर असलेली “मर्केरियन 231’ आकाशगंगा ‘ओरियन नेबुला’ (मृगशीर्ष नक्षत्रसमूह) याचा एक भाग आहे.

🔴ठळक बाबी

🔰 आण्विक ऑक्सिजन शोधला गेला असलेल्या प्रदेशांपैकी एक म्हणजे ‘ओरियन नेबुला’ होय. असा विश्वास आहे की अंतराळात ऑक्सिजन पाण्याच्या बर्फाच्या रूपात हायड्रोजनसोबत बांधलेल्या अवस्थेत आहे, जो धूळीचे कण आणि लहान दगडांवर तयार होतो.

🔰 “मर्केरियन 231’ आकाशगंगेचा “क्वासर” नावाचा अत्यंत तेजस्वी सूर्य आहे, ज्याच्या मध्यभागी एक प्रचंड असे कृष्णविवर आहे. क्वासर हे विश्वातल्या अत्यंत तेजस्वी वस्तूंपैकी एक आहे. असे मानले जाते की ‘ओरियन नेबुला’वर हायड्रोजनच्या तुलनेत ऑक्सिजनचे प्रमाण 100 पटीने जास्त आहे.

🔰 ऑक्सिजन हा हायड्रोजन आणि हीलियम नंतर विश्वातला तिसरा सर्वात सामान्य घटक आहे. खगोलशास्त्रज्ञांनी मिलीमीटर रेडिओमेट्री आणि स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करून ऑक्सिजनचा शोध घेतला.

०१ मार्च २०२०

राजापुरची कजोल गुरव आशियाई पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी भारतीय संघात

- इंडोनेशिया येथे 6 ते 8मे, 2020 दरम्यान होणार्‍या आशियाई पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये राजापूरची सुकन्या काजोल अशोक गुरव हिची भारतीय पॉवरलिफ्टींग संघात निवड झाली आहे. यावर्षी सिनियर राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक आणी फेडरेशन कप स्पर्धेतील नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर काजोलची भारतीय संघात निवड झाली आहे.

- तिच्या या निवडीने राजापूर तसेच रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावली आहे. गेल्या 8 वर्षांपासून काजोल पॉवरलिफ्टींग हा खेळ खेळत आहे. यामध्ये तिने आजवर विद्यापीठस्तरीय तसेच ज्युनिअर, सिनिअर स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली आहे. गेल्या 3 वर्षातील तिच्या कामगिरीतील सातत्य आणि मेहनत यांच्या जोरावर भारतीय संघासाठी खेळण्याचे तिचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याचे काजोलने सांगितले. एवढेच नव्हे तर या स्पर्धेत देशासाठी पदक मिळवण्याचा विश्वास तिने व्यक्त केला आहे. यासाठी गेली काही वर्षे ती सातत्याने कसून सराव करत आहे.

- काजोल ही सध्या पश्चिम रेल्वेमध्ये सेवेत असून गेली 3 वर्षे ती पश्चिम रेल्वेकडून पॉवरलिफ्टींग स्पर्धा खेळत आहे. राजापूर येथे शिवशक्ती कीडा मंडळाच्या व्यायामशाळेत ती दररोज4 तास कसून सराव करते. आजवर राष्ट्रीय स्पर्धेत तीने स्कॉट 190 किलो, बेंचपेस 105 किलो, डेडलिफ्ट 180 किलो असे एकूण 475 किलो वजन अवघ्या 52 किलो वजनगटात उचलले आहे. आशियाई स्पर्धेमध्ये काजोल पुन्हा 52 किलो वजनीगटात भारतीय संघातून सहभागी होईल, या स्पर्धेत तिने आजवरची सर्वोच्च कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे.

- 2013 मध्ये काजोलचा भाऊ प्रतिक गुरव याने भारताचे प्रतिनिधीत्व करताना पॉवरलिफ्टींगमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून राजापूरचे नाव उंचावले होते. याचीच पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न तीच्या मनात आहे, असे काजोलने सांगितले. येत्या 7 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान काजोल हिमाचल प्रदेश येथे भारतीय रेल्वेच्या सराव शिबिराला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी जाऊन नंतर लगेचच इंडोनेशिया येथे आशियाई स्पर्धेसाठी रवाना होणार आहे

OYO'चा रितेश अग्रवाल ठरला जगातील दुसरा सेल्फ मेड बिलेनिअर

- ओयो हॉटेल्सचा 24 वर्षीय संस्थापक रितेश अग्रवाल जगातील दुसरा सर्वात तरूण अब्जाधीश ठरला आहे.
- हुरून ग्लोबर रिच 2020 च्या यादीनुसार, वयाच्या 24 व्या वर्षी रितेशची संपत्ती तब्बल 7,800 कोटी रुपये आहे. अग्रवालच्या आधी 22 वर्षीय कॉस्मेटिक क्वीन कायली जेनेर असून, तिची संपत्ती 1.1 मिलियन डॉलर एवढी आहे.
- 2013 साली सुरू झालेली ओयो हॉटेल्स हे भारतातील सर्वात मोठी हॉटेल चेन नेटवर्क आहे. या कंपनीचे मूल्य तब्बल 10 मिलियन डॉलर आहे. ओयो हॉटेल्सचे नेटवर्क यूएस आणि यूरोपमध्ये देखील आहे. याशिवाय ओयो हॉटेल्स चीनमधील दुसरे सर्वात मोठी हॉटेल चेन आहे.
रितेश कॉलेज ड्रॉपआउट असून, त्याने शिक्षण घेतलेले नाही. तो 40 वर्षांखालील सर्वात श्रींमत सेल्फ मेड अब्जाधीश आहे.

- झेरोधचे फाउंडर नितिन कामत आणि निखिल कामत हे देखील सेल्फ मेड अब्जाधीश आहेत. त्यानंतर फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिनी बन्सल यांची संपत्ती 1-1 अब्ज डॉलर आहे व बायजूचे संस्थापक रविंद्रन फॅमिलीची संपत्ती देखील 1.4 बिलियन डॉलर आहे.

- युवा आणि श्रींमत लोकांच्या 40 वर्षांखालील यादीत 90 जणांचा समावेश आहे. यातील 54 जण स्वतःच्या हिंमतीवर अब्जाधीश झाले आहेत, तर 36 जणांना वारसा हक्काने संपत्ती मिळाली आहे. या यादीमध्ये अमेरिका आणि चीनमधील प्रत्येकी 25 युवा अब्जाधीशांचा समावेश आहे.

- भारतात 2020 मध्ये 137 अब्जाधीश असून, मागील वर्षीच्या तुलनेत 33 जणांचा यात समावेश झाला आहे. यामध्ये 67 बिलियन डॉलर संपत्तीसह रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रींमत तर जगातील नववे सर्वात श्रींमत व्यक्ती आहेत.

देशात  सर्वाधिक
- 50 अब्जाधीश मुंबईमध्ये राहतात, बंगळुरू 17, अहमदाबाद 12 आणि हैदराबादमध्ये 7 अब्जाधीश राहतात

विश्वकर्मा पुरस्कार 2019

- 24 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ ह्यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘विश्वकर्मा पुरस्कार 2019’ यांचे वाटप करण्यात आले.
- हे पुरस्कार दोन श्रेणींमध्ये देण्यात आले आहे – छात्र विश्वकर्मा पुरस्कार आणि उत्कृष्ट संस्थान विश्वकर्मा पुरस्कार.

▪️ठळक बाबी

- विविध गटात एकूण 23 चमूला छात्र विश्वकर्मा पुरस्कार देण्यात आले आहेत. तर सहा संस्थांना उत्कृष्ठ संस्थान विश्वकर्मा पुरस्कार देण्यात आला.
याव्यतिरिक्त, प्रत्येक उपश्रेणीतल्या पहिल्या तीन चमुला प्रशंसा प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस (51000, 31000 आणि 21000 रुपये) प्रदान करण्यात आले.
- पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला.

▪️ पुरस्काराविषयी

- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) वर्ष 2017 पासून विश्वकर्मा पुरस्कार स्पर्धांचे आयोजन करीत आहे. मान्यताप्राप्त संस्थांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कल्पक भावना आणि वैज्ञानिक गुण वाढविण्यासाठी या पुरस्काराची स्थापना केली गेली आहे.

▪️ AICTE: तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या सुविधांचे सर्वेक्षण करण्यासाठी आणि देशातल्या तांत्रिक शिक्षणाच्या समन्वित व समाकलित विकासासाठी राष्ट्रीय पातळीवरची सर्वोच्च सल्लागार संस्था म्हणून 1945 साली अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) याची स्थापना केली गेली. मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही संस्था मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेली एक वैधानिक संस्था आणि तांत्रिक शिक्षणासाठी एक राष्ट्रीय परिषद आहे.

मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर

- डाॅ. कानिटकर यांना लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली. कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड गेल्या वर्षीच झाली होती, पण जागा रिक्त झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला.
- या उच्च पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्याच मराठी महिला अधिकारी आहेत.
- नवी दिल्ली येथे त्यांनी एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. हा विभाग संरक्षण प्रमुख यंत्रणेच्या अंतर्गत आहे.
- लष्करात या श्रेणीचे पद मिळवणाऱ्या कानिटकर या तिसऱ्या महिला अधिकारी असून त्या बालरोगतज्ज्ञ आहेत. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- कानिटकर यांचे पती राजीव लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. ते नुकतेच निवृत्त झाले. पती-पत्नीने लष्करात लेफ्टनंट कर्नलपद भूषवल्याची ही पहिलीच घटना आहे.

● डाॅ. माधुरी कानिटकर
- डॉ. कानिटकर यांनी लष्करात ३७ वर्षे सेवा केली आहे. सीडीएस-वैद्यकीय पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- भारतीय लष्कराच्या तिन्ही सेवांबाबत (हवाई दल, नौदल आणि स्थलसेना) केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम त्या करतील.
- डाॅ. कानिटकर पुण्याच्या आर्म्ड  फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी असून त्यांना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. त्यांनी बालरोग विषयात पदव्युत्तर पदवी घेतली.
- अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रातून बालकांच्या मूत्रपिंड विकारांवर उपचाराचे प्रशिक्षण घेतले आहे.
- त्या पंतप्रधानांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार मंडळाच्या सदस्या आहेत.
- त्या लष्करी दलातील पहिल्या प्रशिक्षित बाल मूत्रपिंडविकार तज्ज्ञ आहेत.
- पुणे आणि दिल्लीत त्यांनी मुलांच्या मूत्रपिंड विकारावर उपचारासाठी केंद्रे स्थापन केली आहेत.
- २०१७ मध्ये त्या पुण्याच्या आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या पहिल्या अधिष्ठाता होत्या. तेथे दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी उधमपूर येथे मेजर जनरल (वैद्यकीय) पदाची जबाबदारी स्वीकारली.

● लष्करातील महिलांसाठी २०२० हे संस्मरणीय वर्ष ठरले असून याच वर्षी लष्करी दिन आणि प्रजासत्ताक दिन संचलनाचे नेतृत्व प्रथमच तानिया शेरगील या महिला लष्करी अधिकाऱ्याने केले होते.

● त्रितारांकित अधिकाऱ्यांचे पद नौदलात व्हाइस अ‍ॅडमिरल, स्थलसेनेत लेफ्टनंट जनरल तर हवाई दलात एअर मार्शल या नावाने ओळखले जाते. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. लेफ्टनंट जनरलपद भूषवण्याचा पहिला मान पुनिता अरोरा यांना आहे. त्यानंतर पद्मावती बंडोपाध्याय या पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या, तर आता माधुरी कानिटकर या लेफ्टनंट जनरल झाल्या आहेत.

शास्त्रज्ञांनी शोधला ऑक्सिजनशिवाय जिवंत राहू शकणारा जीव

🎢 हे जग अनेक चमत्कारिक गोष्टींनी भरलेले आहे. येथे अनेक असे जीव वास्तव्य करून आहेत ज्यांच्याविषयी अजूनही मानवाला फारशी माहिती नाही. पृथ्वीतलावरील बहुतांश जीवांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन घेतल्याशिवाय सजीव
फार काळ जिवंतर राहू शकत नाही. मात्र शास्त्रज्ञांनी असा एक विचित्र जीव शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे ज्याला ऑक्सिजनची गरज भासत नाही.

🎢 तर या जीवाचं वैशिष्ट्य म्हणजे ऑक्सिजनची गरज नसल्याने तो श्वासोच्छवास करत नाही.

🎢 इस्राइलमधील तेव अवीव विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या जीवाचा शोध लावला आहे. मायटोकॉन्डियल जीनोम नसलेला हा पहिला बहुकोशीय जीव आहे, त्यामुळे त्याला जीवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासत नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

🎢 तसेच शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा जीव जेलीफिशसारखा दिसतो. तसेच तो श्वसन करत नाही. शास्त्रज्ञांनी या जीवाचे शास्त्रीय नाव हेन्नीगुया साल्मिनीकोला असे ठेवले आहे. तसेच हा जीव इतर जीवांसाठी धोकादायक नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

सापडला पृथ्वीचा ‘दुसरा चंद्र..


🎯पृथ्वीला चंद्र किती आहेत असा प्रश्न विचारल्यास अगदी लहान पोरगाही एक असं उत्तर देईल. मात्र लवकरच या प्रश्नाचे उत्तर दोन असं द्यावं लागणार आहे. कारण पृथ्वीचा दुसरा चंद्र शोधल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे.

🎯तर संशोधकांनी पृथ्वीच्या दुसऱ्या चंद्राला 2020 सीडी थ्री असं नाव दिलं आहे.
तसेच मागील तीन वर्षांपासून हा अगदी लहानश्या आकाराचा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. अमेरिकेतील अॅरेझॉना येथील कॅटालीना स्काय सर्व्हे  येथील संशोधकांनी या चंद्राचा शोध लावला आहे.

🎯19 फेब्रुवारी रोजी येथील संशोधकांना हा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना दिसला. याआधीही संशोधकांना हा चंद्र सहा वेळा दिसला होता. त्यामुळे हा पृथ्वीचा मीनी मून असण्यावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केला आहे.तर हा चंद्र 1.9 मीटर लांब आणि 3.5 मीटर रुंद  आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर तो एका लहान गाडीच्या आकाराचा आहे.

🎯या नव्या चंद्राची परिक्रमण कशा ठरलेली नसून तो कधी पृथ्वीच्या जवळ असतो तर कधी लांब असंही संशोधकांनी सांगितलं आहे. याआधी 2006 साली  ‘आरएच वन 20’ ही छोटी खगोलीय वस्तू पृथ्वी भोवती फिरत होती.

🎯सप्टेंबर 2006 ते जून 2007 पार्यंत पृथ्वीभोवती भ्रमण केल्यानंतर ही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर केली.
‘आरएच वन 20’ प्रमाणे ‘2020 सीडी थ्री’ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून निघून जाईल असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे

भारताची सामान्य माहिती

· भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.

· भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.

· भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.

· भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%

· भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.

· भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात

· भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422

· भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248

· भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174

· भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%

· पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%

· महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%

· भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.

· भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.

· भारताची राजधानी : दिल्ली

· भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन

· भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते

· राष्ट्रीय गीत : वंदेमातरम

· 'जन-गण-मन' या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर

· राष्ट्रीय गीत 'वंदेमातरम' चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी

· भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा

· राष्ट्रीय फळ : आंबा

· राष्ट्रीय फूल : कमळ

· भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर

· भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ

· भारतात एकूण घटक राज्ये : 28

· भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 8
   ( सुरुवातीला 7 होती ,नंतर जम्मू काश्मीर आणि लढाक 2 नवे केंद्रशासित प्रदेश बनले ,तर ही संख्या 9 झाली होती ,परंतु पुन्हा 26 jan 2020 पासून दमण व दिव आणि दादरा नगर हवेली एकत्र झाल्यामुळे म्हणून आता संख्या 8 झाली आहे By.Sandip Patil Sir)

· भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ

· भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार

· भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...