२७ जानेवारी २०२०

आजचे महत्त्वाचे प्रश्नसंच


(1)कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ साजरा केला जातो?
⏩⏩25 जानेवारी

(2)भारत आणि आफ्रिका या देशांच्या दरम्यान रिअल-टाइम आंतरसीमा पैशाची देवाणघेवाण सुविधा कार्यरत करण्याकरिता _____ या कंपनीने वेस्टर्न युनियन या कंपनीसोबत भागीदारी केली.
⏩⏩एअरटेल

(3)भारतीय रिझर्व्ह बँकेनी _____ पेमेंट बँकेचे अधिकृतता प्रमाणपत्र (CoA) रद्द केले.
⏩⏩वोडाफोन एम-पेसा

(4)कोणत्या शहरात “विमेन विथ व्हील्स” टॅक्सी सेवा कार्यरत झाली?
⏩⏩नवी दिल्ली

(5)कतरिना साकेल्लारोपौलौ हया कोणत्या देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत?
⏩⏩ग्रीस

(6)कोणती दूरसंचार कंपनी UPI पेमेंट्स वैशिष्ट्य सादर करणारी पहिली दूरसंचार कंपनी ठरली?
⏩⏩रिलायन्स जिओ

(7)25 जानेवारी रोजी पाळण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय मतदार दिन’ याची संकल्पना काय होती?
⏩⏩बळकट लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता

(8)जागतिक तिरंदाजी महासंघाने कोणत्या देशावरचे निलंबन मागे घेते?
⏩⏩भारत

(9)आशुगंज-अखौरा महामार्ग चौपदरी करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला?
⏩⏩बांग्लादेश

(10)_______________ राज्याने आसामच्या गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स 2020’ या स्पर्धांचे अजिंक्यपद जिंकले ?
⏩⏩महाराष्ट्र

 

141 पद्म पुरस्कार जाहीर

- देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेले पद्म पुरसकार आज जाहीर करण्यात आले. यंदा 141 पद्म पुरस्कार दिले जाणार असून यात 7 पद्म विभूषण, 16 पद्मभूषण आणि 118 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

- जॉर्ज फर्नांडिस, अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिले आहेत. मॉरिशसचे ए. जगन्नाथ यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

- यंदा महाराष्ट्रातल्या 13 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

▪️पद्मभूषण

आनंद महिंद्रा, उद्योगपती

▪️पद्मश्री

-झहीर खान, क्रिकेटपटू
-पोपटराव पवार, समाजसेवक
-डॉ. रमण गंगाखेडकर, विज्ञान आणि अभियांत्रिकी
-करण जोहर, चित्रपट निर्माता
-सरिता जोशी, अभिनेत्री
-एकता कपूर, चित्रपट निर्माती
-राहिबाई पोपरे, कृषी
-कंकणा राणावत, अभिनेत्री
-अदनान सामी, गायक
-सय्यद मेहबूब शाह कादरी उर्फ सय्यद भाई, सामाजिक कार्य
-डॉ. सांद्र देसा सौजा,  वैद्यकीय
-सुरेश वाडकर, गायक
——————————————

पोलीस भरती प्रश्नसंच


1) भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट कोण बनली आहेत?
उत्तर : लेफ्टनंट शिवांगी

2) ‘YSR मत्स्यकारा भरोसा’ योजना कोणत्या राज्य सरकारने लागू केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

3) ‘आंतरराष्ट्रीय बाल शांती परितोषिक 2019’ कोणी जिंकले?
उत्तर : ग्रेटा थुनबर्ग

4) “हाऊ ए फॅमिली बिल्ट ए बिजनेस अँड ए नेशन” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : गिरीश कुबेर

5) “अॅग्रोव्हिजन 2019” या भारताच्या प्रमुख कृषी शिखर परिषदेची संकल्पना काय आहे?
उत्तर : स्मार्ट टेक्नॉलॉजीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट

6) “शिखर से पुकार” हे शब्द कशाशी संबंधित आहे?
उत्तर : जलसंधारण विषयक माहितीपट

7) दहशतवादविरोधी टेबल-टॉप सराव प्रथम कोणत्या संस्थेकडून आयोजित करण्यात आला?
उत्तर : राष्ट्रीय अन्वेषण विभाग

8) ‘कार्टोसॅट-3 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे?
उत्तर : PSLV C47

9) आरबीआयच्या माहितीनुसार भारताचा परकीय चलन साठा किती आहे?
उत्तर : 448.249 अब्ज डॉलर

10) ‘जागतिक दूरदर्शन दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 21 नोव्हेंबर

Q1) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य ?
-- राजस्थान

Q2) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठे राज्य?
-- उत्तरप्रदेश

Q3) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- गोवा

Q4) भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य?
-- सिक्कीम

Q5) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा?
-- लेह ( लदाख )

Q6) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- माही ( पददूचेरी )

Q7) भारतातील क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश?
-- अंदमान निकोबार

Q8) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- लक्षद्वीप

Q9) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश ?
-- दिल्ली

Q10) भारतातील लोकसंख्यानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- दिबांग व्हॅली ( अरुणाचल प्रदेश )

विषय = अर्थशास्त्र प्रश्नसंच

८२१) अर्थशास्त्राचे जनक, भांडवलशाहीचे जनक राष्ट्राची संपत्ती या सर्वाचा कोणत्या अर्थशास्त्रज्ञ संदर्भ येतो?
अ) रॉबीन सन्स    ब) मार्शल    क) अॅडम स्मीथ     ड) थॉमस
१) वरील सर्व बरोबर    २) वरील सर्व चूक
३) फक्त क बरोबर      ४) ब आणि ड चूक

८२२) भारतीय मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणत्या पंतप्रधानानी केला?
१) लाल बहादुर शास्त्री    २) पंडित जवाहरलाल नेहरू
३) डॉ. मनमोहनसिंग      ४) वरीलपैकी एकही नाही

८२३) भारतीय अर्थव्यवस्थेत सातत्याने कोणत्या क्षेत्राचा वाटा वाढत आहे?
अ) सेवा       ब) उद्योग    क) कृषी    ड) सेवा व उद्योग
१) वरील सर्व बरोबर    २) वरील सर्व चूक
३) फक्त अ बरोबर      ४) ब आणि ड चूक

८२४) श्रमाच्या बदल्यात जे देयके दिले जाते. त्यास.. म्हणतात?
अ) व्याज        ब) खंड       क) वेतन       ड) नफा
१) वरील सर्व बरोबर       २) वरील सर्व चूक
३) फक्त क बरोबर        ४) ब आणि ड चूक

८२५) औद्योगिक अर्थव्यवस्थेचे निकष सांगा.
अ) अर्थव्यवस्थेत द्वितीयक क्षेत्राचा वाटा ५०%
ब) एकूण श्रमिकापैकी ५०% श्रमिक असावेत
क) अर्थव्यवस्थेत प्राथमिक क्षेत्राचा वाटा ५०%
१) अ, ब आणि क बरोबर       २) सर्व चूक
३) फक्त अ बरोबर              ४) अ आणि ब बरोबर

उत्तर :- ८२१ -३, ८२२ -२, ८२३ -३, ८२४ -३, ८२५ - ४.
===========================

संपूर्ण पणे जाणून घ्या :- 'स्वर भास्कर 'पंडित भीमसेन जोशी'

भारतरत्न' पंडित भीमसेन जोशी यांचा आज (24 जानेवारी) स्मृतिदीन. धारवाड जिल्ह्यातील रोण येथे 14 फेब्रुवारी 1922 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गुरुराज व चुलते गोविंदाचार्य हे साहित्यिक होते व त्यांचे आजोबा भीमाचार्य हे त्यांच्या काळातील नाणावलेले गायक होते.

भीमसेन यांना लहाणपणापासूनच गायनाचे विलक्षण आकर्षण होते. त्यांची ही आवड लक्षात घेऊन वडिलांनी त्यांच्यासाठी गायन शिक्षकाची नेमणूक केली. मात्र त्यांचे इतक्यात समाधान न झाल्याने ते गाणे शिकण्यासाठी घरातून पळून गेले व मुंबई, विजापूर, जालंधर, कलकत्ता आदी ठिकाणी फिरले.

दरम्यान त्यांनी काही काळ लखनऊच्या आकाशवाणी केंद्रावर नोकरीही केली. शेवटी त्यांनी सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) यांचेकडे गाण्याची दीक्षा घेतली. ते गुरुसेवा करून अति कष्टाने गानविद्या शिकले. सवाई गंधर्वानीही त्यांना 5 वर्षे चांगली शिकवण दिली.

सवाई गंधर्व हे किराणा घराण्याचे श्रेष्ठ गायक. त्यांनी भास्करबुवा बखले व ग्वाल्हेरचे निसार हुसेन खाँ यांच्या गायकीचे विशेष आत्मसात करून किराणा शैली समृद्ध केली.

भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ 1952 पासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.

भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल 1942 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यांच्या लोकप्रियतेमुळे संगीत मैफिलींसाठी त्यांची धावपळ वाढली. दरम्यान वारंवार होणार्‍या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करत असत.

भीमसेन जोशी यांनी 1940 च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील प्रसिद्ध गायकांकडून ठुमरी शिकून घेतली. भीमसेन जोशींनी 'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे हजारो कार्यक्रम केले.

भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी व कर्नाटकी या 2 प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या गोष्टी हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत असत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.

अशा या महान गायकाचे 24 जानेवारी 2011 रोजी पुणे येथे वयाच्या 88 व्या वर्षी देहावसान झाले.

शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचा भूगोल पुस्तक नक्की वाचून पहा

🎖 पुरस्कार : पंडितजींना खालील अनेक पुरस्कारांनी व सन्मानांनी गौरविण्यात आले.

● 4 नोव्हेंबर 2008 : भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार
● 1985 : पद्मभूषण पुरस्कार
● 1976 : संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार
● 1972 : पद्मश्री पुरस्कार
● 1971 : संगीत-रत्न

जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने संगीताचार्य ही पदवी दिली, तर पुण्याच्या टिळक विद्यापीठाने डि. लिट्. ही पदवी दिली.

👍 इतर पुरस्कार : पुण्यभूषण पुरस्कार, स्वरभास्कर पुरस्कार, तानसेन पुरस्कार आदी. पुणे आणि गुलबर्गा येथील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेटने सन्मानित केले आहे.

विषय = इतिहास प्रश्नसंच

७२६) लक्ष्मीबाई टिळक यांच्याबाबत पुढील विधाने वाचा चुकीचे विधान ओळखा.

१) 'स्मृतिचित्रे' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
२) नारायण वामन टिळक हे त्यांच्या पतीचे नाव.
३) लक्ष्मीबाई टिळक व त्यांचे पती नारायण वामन टिळक यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
४) ब्राह्मण कन्या विवाह विचार हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

१)२ ४,          २)४,        ३) १ व २,        ४) २

७२७) विधाने वाचा समाजसुधारक स्त्री ओळखा.
१) १९२० मध्ये पुण्यात मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे यासाठी त्यांनी मोर्चा काढला.
२) स्त्रियांना मतधिकार मिळावेत यासाठी त्यांनी आंदोलन हाती घेतले होते.
३) येरवडा तुरुंगाच्या त्या मानद सचिव होत्या.
४) गांधीजींच्या मते, त्या वैधव्य जीवनाचा आदर्श होत्या.

१) अवंतिका गोखले,        २) पंडिता रमाबाई,
३) अनुसया काळे,           ४) रमाबाई रानडे

७२८) विधाने वाचा समाजसुधारक ओळखा.

१) 'वेदोक्त धर्म प्रकाश' या ग्रंथाचे ते लेखक होते.
२) पुनर्विवाह, प्रौढ विवाह, घटस्फोट, बाल विवाह, समुद्र पर्यटन, सती याबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते.
३) मार्क्सच्या विचारांशी त्यांचे विचार काही प्रमाणात जुळतात.

१) विष्णुशास्त्री चिपळूणकर,       २) विष्णुबुवा ब्रह्मचारी,
३) विष्णुशास्त्री पंडित,             ४) रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक

७२९) गोपाळराव जोशी यांच्या बाबत पुढील विधाने वाचा. बरोबर विधान ओळखा.
१) गोपाळराव जोशी हे एक विक्षिप्त,जिद्दी,तहेवाईक,जिभेला हाड नसलेले व कशाचा धरबंध नसणारे एक सामान्य गृहस्थ होते. ते पोस्ट खात्यात नोकरीस होते.
२) गोपाळराव जोशी यांनी आपली पत्नी आनंदीबाई जोशींच्या मृत्युनंतर ४ वर्षानी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
३) श्री. ज. जोशी यांच्या 'आनंदी गोपाळ' या चरित्रपर कादंबरीमुळे व त्यावर अंधारलेल्या नाटकामुळे गोपाळराव जोशी हे नाव महाराष्ट्राला माहित झाले.
४) आगरकरांची निंदानालस्ती करण्यात ते आघाडीवर होते.
आगरकरांची जिवंतपणीच त्यांनी प्रेतयात्रा काढली होती.

१)१ व ३,           २) १,२,३,४,        ३) १,३,४,         ४)१ व २

७३०) त्र्यंबकजी डेंगळे यांचे दोन पुतणे गोदांजी व महिपा यांनी L000 .... ची पलटण उभी केली होती.
१) भिल्ल,        २) रामोशी,           ३) कोळी,         ४) यापैकी

उत्तर - ७२६- २, ७२७- ४, ७२८-२, ७२९ -२, ७३०-१

तामिळनाडू सरकार राज्यपातळीवर ‘एक राज्य, एक रेशन कार्ड’ योजना राबवत आहे.

🔰 भारत सरकारच्या ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ योजनेच्या पार्श्वभूमीवर, तामिळनाडू सरकारने रेशनकार्डांची आंतरराज्य मान्यता देण्यासाठीच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.

🔰 या योजनेमुळे राज्यातल्या शिधापत्रिकाधारकांना राज्यातल्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य खरेदी करता येणार आहे.

☑️ योजनेविषयी..

🔰 ही योजना प्रायोगिक तत्वावर थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे आणि नंतर ती राज्यभरात लागू केली जाणार.

🔰 राज्यभरात सध्या 35,233 स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यापैकी एकूण 9,635 ही अर्धवेळ दुकाने आहेत. एकूणच 2,05,03,379 कुटुंबांना स्मार्ट रेशन कार्ड वितरित करण्यात आले आहेत.
ही योजना स्थलांतरित कामगारांना उपयुक्त ठरणार. ते स्मार्ट कार्ड, आधार कार्ड किंवा OTP मार्फत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाचा वापर करून त्यांच्या हक्काच्या वस्तू मिळवू शकतात.
‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना

🔰 1 जून 2020 पासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना लागू होणार आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातल्या कोणत्याही भागातून सध्याच्या रेशनकार्डवरच स्वस्त धान्य घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

🔰 'एक देश, एक रेशन कार्ड' या योजनेचा सर्वात मोठा फायदा दैनंदिन मजूर, कामगार आणि स्थलांतरित कामगारांना होणार आहे. देशभरात 'एक देश, एक रेशन कार्ड' ही योजना लागू करण्यापूर्वी सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या चार राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प म्हणून राबविण्यात आला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

विज्ञान प्रश्नसंच

1)सामन्यत: सूक्ष्मजीव  असतात.
एकपेशी
बहुपेशी
अतिसूक्ष्म
विविध आकारांचे
A. एकपेशी
-----------------------------------------------------------------------------
2) प्रकाश संश्लेषनात _ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.
हरितद्रव्यामुळे
झथोफिलमुळे
कॅरोटीनमुळे
मग्नेशिंअममुळे
A. हरितद्रव्यामुळे
-----------------------------------------------------------------------------
3) ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ____ म्हणतात.
पोषण
स्वयंपोषण
परपोषण
अंत:पोषण
A. पोषण
-----------------------------------------------------------------------------
4) _ पेशीमुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो.
पेशी - भित्तिका
प्रद्रव्य पटल
पेशीद्रव्य
केंद्रक
A. पेशी - भित्तिका
-----------------------------------------------------------------------------
5) ___ हे सजीवांच्या रचनेचे व कार्याचे एकक आहे.
पेशी
उती
अवयव
अणु
A. पेशी
-----------------------------------------------------------------------------
6)  संघातील प्राण्यांचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात.
प्लटिहेल्मिन्थस
पोरीफेरा
आर्थ्रोपोडा
ईकायनोडर्माटा
C. आर्थ्रोपोडा
-----------------------------------------------------------------------------
7) किण्वन हा ___ चा प्रकार आहे.
ऑक्सिश्वसन
विनॉक्सिश्वसन
प्रकाशसंश्लेषण
ज्वलन
B. विनॉक्सिश्वसन
-----------------------------------------------------------------------------
8) अहरित वनस्पती  असतात.
स्वयंपोषी
परपोषी
मांसाहारी
अभक्षी
B. परपोषी
-----------------------------------------------------------------------------
9) सौरऊर्जा _ स्वरुपात असते.
प्रकाश प्रारणांच्या
विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या
अल्फा प्रारणांच्या
गामा प्रारणांच्या
B. विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या
-----------------------------------------------------------------------------
10) बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर _ प्रारणांचा मारा करतात.
अल्फा
बिटा
गामा
क्ष-किरण
C. गामा
-----------------------------------------------------------------------------
11) पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ......... इतकी असते.
M
N
A
X
B. N
-----------------------------------------------------------------------------
12) जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण.........आहे.
०.०३%
०.३%
३%
०.००३%
A. ०.०३%
-----------------------------------------------------------------------------
13) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरीडोफायटा या सवंहिनी वनस्पती वर्गात येत नाही.
फिलीसीनी
मुसी
लायकोपोडियम
इक्विसेटीनि
B. मुसी
-----------------------------------------------------------------------------
14) मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण..........हे विकर त्याच्या जठरात नसते.
सेल्युलेज
पेप्सीन
सेल्युलीन
सेल्युपेज
A. सेल्युलेज
-----------------------------------------------------------------------------
15) पाण्याची घनता ................ ला उच्चतम असते.
४'C
२५'C
०'C
७३'C

A. ४'C

-----------------------------------------------------------------------------
16) आधुनिक जैवतंत्रज्ञान ............. पातळीवर कार्य करते.
अवअणू
अणू
रेणू
पदार्थ
C. रेणू
-----------------------------------------------------------------------------
17) डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?
आयोडीन-१२५
सामारिअम-१५३
ल्युथिनिअरम-१७७
सेसिअम-१३७
A. आयोडीन-१२५
-----------------------------------------------------------------------------
18) किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?
१०० डी.बी.च्या वर
११० डी.बी.च्या वर
१४० डी.बी.च्या वर
१६० डी.बी.च्या वर
A. १०० डी.बी.च्या वर
-----------------------------------------------------------------------------
19) इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन...
कमी होते
वाढते
सारखेच राहते
शून्य होते
A. कमी होते
-----------------------------------------------------------------------------
20) 'फ्यूएल सेल' पासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती कशापासून केली जाते?
पाणी
अल्कोहोल
इथेनॉल
सेंद्रिय पदार्थ
A. पाणी

महत्त्वाचे 10 चालुघडामोडी प्रश्न उत्तरे

1) भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट कोण बनली आहेत?
उत्तर : लेफ्टनंट शिवांगी

2) ‘YSR मत्स्यकारा भरोसा’ योजना कोणत्या राज्य सरकारने लागू केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

3) ‘आंतरराष्ट्रीय बाल शांती परितोषिक 2019’ कोणी जिंकले?
उत्तर : ग्रेटा थुनबर्ग

4) “हाऊ ए फॅमिली बिल्ट ए बिजनेस अँड ए नेशन” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : गिरीश कुबेर

5) “अॅग्रोव्हिजन 2019” या भारताच्या प्रमुख कृषी शिखर परिषदेची संकल्पना काय आहे?
उत्तर : स्मार्ट टेक्नॉलॉजीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट

6) “शिखर से पुकार” हे शब्द कशाशी संबंधित आहे?
उत्तर : जलसंधारण विषयक माहितीपट

7) दहशतवादविरोधी टेबल-टॉप सराव प्रथम कोणत्या संस्थेकडून आयोजित करण्यात आला?
उत्तर : राष्ट्रीय अन्वेषण विभाग

8) ‘कार्टोसॅट-3 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे?
उत्तर : PSLV C47

9) आरबीआयच्या माहितीनुसार भारताचा परकीय चलन साठा किती आहे?
उत्तर : 448.249 अब्ज डॉलर

10) ‘जागतिक दूरदर्शन दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 21 नोव्हेंबर

अरूण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण

- भारतरत्न पुरस्कारानंतर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्काराची प्रजासत्ताक दिनाच्या काही तास आधी घोषणा करण्यात आली.

-  भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली,
-  माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज
-  माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर
झाला आहे.

- क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या - खासदार मेरी कोम,
- छन्नुलाल मिश्रा,
- अनेरूद जुगुनाथ जीसीएसके,
- विश्वेतीर्थ स्वामीजी पेजवरा अधोखाजा - - मठ उडुपी यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

▪️पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या नावाची केंद्र सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आली. यात राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात काम करणाऱ्या देशविदेशातील १४१ मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

- माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्म भूषण -माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

- आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी
- मुमताज अली,
- सय्यद मुझीम अली (मरणोत्तर),
- मुझफ्फर हुसेन बेग,
- कला क्षेत्रातील कार्यासाठी अजोय चक्रवर्ती,
- मनोज दास,
- बालकृष्ण दोशी,
- क्रिष्णम्मल जगन्नाथन,
- एस. सी. जमीर,
- अनिल प्रकाश जोशी,
- डॉ. त्सेरिंग लंडोल,
- आनंद महिंद्रा,
- निळकांता रामकृष्णा माधवा मेनन (मरणोत्तर),
- जगदीश शेठ,
- बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधू,
- वेणू श्रीनिवासन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

▪️महाराष्ट्रातील या मान्यवरांचा गौरव -
पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचाही गौरव करण्यात येणार आहे. यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

- भारतीय संघातील माजी गोलंदाज झहीर खान,
- डॉ. रमण गंगाखेडकर,
- चित्रपट दिग्दर्शक करण जोहर,
- ज्येष्ठ अभिनेत्री सरिता जोशी,
आदर्श गाव योजनेचे प्रणेते पोपटराव पवार,
- दिग्दर्शक एकता कपूर,
- बीजमाता राहीबाई पोपेरे,
- अभिनेत्री कंगना राणौत,
- गायक अदनान सामी,
- सामाजिक कार्यकर्ते सय्यद मेहमूद शाह कादरी उर्फ सय्यदभाई,
-  साँड्रा डिसूझा,
- गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
-----------------------------------------------

ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट करारावर केली स्वाक्षरी.

🎆 युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी करत ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या इतिहासातल्या नव्या अध्यायाला आज सुरुवात केली. यानंतर युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा मार्ग मोकळा झाला आहे. 

🎆 डाउनिंग स्ट्रिट इथं युरोपीय महासंघ आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमोर जॉन्सन यांनी या करारावर स्वाक्षरी केली. 

🎆 ब्रिटनच्या नागरिकांच्या जनमताचा आदर ठेवून, येत्या ३१ जानेवारीपासून युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर आपण स्वाक्षरी केली असल्याचं, जॉन्सन यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

भारताच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ.

🎆 जानेवारीच्या १७ तारखेला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन संपत्तीत ८६७ दशलक्ष डॉलर्सची वाढ होऊन ती ४२८.४५ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोचली, यामुळे भारताच्या परकीय गंगाजळीत ९४३ दशलक्ष अमेरिकी डॉर्लसची घसघशीत वाढ होऊन, ती ४६२.१६ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या पोचली आहे. हा आजवरच्या उच्चांक आहे. 

🎆 याच आठवड्यात भारताचा सुवर्णसाठी ७० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सनं वाढून २८ पूर्णांक ५६ दशांश अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोचला आहे.

🎆 यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतही भारताचा वाटा ३ दशलक्ष डॉलर्सनं वाढून, ३.७० अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोचला आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...