२२ डिसेंबर २०१९

शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

🔺गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार.


◾️– गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार.

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा केली.

– ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच सर्व थकीत कर्ज माफ करणार.

– वर्तमानपत्राचा दाखला देऊन विदर्भाचा विकास झालेला नाही हे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

– तुम्ही काम केलेलं नाही असं मी कुठेही म्हटलेलं नाही.

– विदर्भाचा मी नातू आहे. आजोळचे आशिर्वाद माझ्यासाठी महत्वाचा आहे.

– विदर्भाच्या विकासात कुठलीही कसूर ठेवणार नाही.
– पंतप्रधान मंगोलियाला चार लाख कोटी डॉलर देतात, मग महाराष्ट्राला का देऊ शकत नाहीत.

– मोदीजी हे भाजपाचे नाही, देशाचे पंतप्रधान ते जागतिक नेते आहेत.

– प्रत्येक जिल्ह्यामध्ये CMO कार्यालय सुरु करणार. ते कार्यालय थेट मंत्रालयातील CMO कार्यालयाला जोडलेलं असेल.

– विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीसजी मला तुमची मदत लागेल, विदर्भाचा तुमच्या इतका माझा अभ्यास नाही.
– सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही.

– विदर्भात १२३ सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे.

– गोसी खुर्द प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करणार.

– यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी २५३ कोटी रुपये देणार
– सिंचनाचा कोणताही अनुशेष राहिल्यास माझ्या लक्षात आणून द्या, कोणताही अनुशेष ठेवणार नाही.

– समुद्धि महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार, कर्जामुळे व्याजापोटी पैसे द्यावे लागत होते. ते पैसे आता सरकार देईल.

– व्याजापोटी अडीच हजार कोटी वाचवले.

– कृषी समृद्धि केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करु.

– पाच लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल.

– धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिकचे २०० रुपये देणार.

– आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद.

– अन्न प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार.

– आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वंयपाकगृह स्थापन करणार.
– पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा.

– लोणार सरोवराचं सौंदर्य संमोहित करुन सोडणार आहे.

– विदर्भात पर्यटनाच्या सोयी-सुविधा वाढवणार.

– जून २०२३ पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार.

– विदर्भात मत्स्य व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार.

– मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही.
– गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘सजातीय’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

   1) उपजातीय      2) विजातीय   
   3) संकीर्णजातीय    4) अजातीय

उत्तर :- 2

2) ‘उचलली जीभ लावली टाळयाला’ या म्हणीचा अर्थ काय ?

   1) घशाला      2) एक सारखे बोलत राहणे
   3) मनात येईल तसे बोलणे  4) काहीच न बोलता गप्प राहणे

उत्तर :- 3

3) ‘धीर सोडणे’ हा अर्थ सूचित करणारा वाक्प्रचार ओळखा.

   1) हात टेकणे    2) हाडाची काडे करणे
   3) हातपाय गाळणे  4) हातखंडा असणे

उत्तर :- 3

4) “बोधपर वचन” या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

   1) सुभाषित    2) सुविचार   
   3) ब्रीदवाक्य    4) वरील सर्व

उत्तर :- 4

5) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता  ?

   1) नीयुक्त    2) नीयूक्त   
   3) नियुक्त    4) नियुत्क

उत्तर :- 3

6) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता?
   1) र      2) ग     
   3) ज      4) यापैकी नाही
उत्तर :- 3

7) उच्छेद या जोडशब्दातील अचूक पोटशब्द ओळखा.

   1) उ + च्छेद    2) उत + च्छेद   
   3) उच् + छेद    4) उत् + छेद

उत्तर :- 4

8) शब्दाची जात बदलून वाक्यरचना करा.
     ‘त्याच्या डोळयात पाणी आले.’

   1) त्याच्या डोळयात पाणी येते    2) त्याच्या डोळयातून पाणी वाहते
   3) त्याचे डोळे पाणावले      4) त्याच्या डोळयांना धरा लागतात

उत्तर :- 3

9) ‘अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप’ ही संख्यावाचक विशेषणे विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?

   1) पूर्णासूचक संख्या विशेषण    2) अपूर्णांकसूचक संख्याविशेषण
   3) अनिश्चित संख्यासूचक विशेषण    4) साकल्यवाचक संख्याविशेषण

उत्तर :- 2

10) जा, ये, उठ, बस, खा, पी वगैरे धातूंपासून जी क्रियापदे तयार होतात त्यांना .................... म्हणतात.

   1) सिध्द क्रियापद    2) साधित क्रियापद
   3) संयुक्त क्रियापद    4) व्दिकर्मक क्रियापद

उत्तर :- 1

CBI अधिकारी बी. पी. राजू: ‘इंडिया सायबर कॉप ऑफ द ईयर 2019’ पुरस्काराचे विजेता

🏵केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी बी. पी. राजू ह्यांना 'इंडिया सायबर कॉप ऑफ द ईयर 2019' हा सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.

🏵17 डिसेंबर 2019 रोजी हरयाणाच्या गुरुग्राम या शहरात झालेल्या वार्षिक माहिती सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

🏵राजस्थानातल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेत झालेल्या फसवणूकीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात त्यांच्या भूमिकेसाठी हा सन्मान बी. पी. राजू ह्यांना NASSCOM-DSCI यांच्यावतीने देण्यात आला आहे.

🏵त्या प्रकरणात बी. पी. राजू यांच्या नेतृत्वात असलेल्या चौकशी पथकाने नऊ आरोपींना अटक केली. छडा लावताना त्यांनी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल उपकरणांमधून महत्त्वाचे पुरावे देखील गोळा केले. मुख्य म्हणजे हा तपास अल्पावधीतच पूर्ण करण्यात आला होता.

🧩CBI विषयी:-

🏵केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation -CBI) ही भारताची प्रमुख तपास संस्था आहे. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिकया अधिकार क्षेत्रामध्ये ही संस्था कार्य करते. स्पेशल पोलीस इस्टेब्लीशमेंट (SPE) या मूळ नावाने त्याची स्थापना सन 1941 मध्ये झाली.

🏵ही एक वैधानिक संस्था आहे. हा विभाग सरकारी विभागातल्या लाचखोरी, भ्रष्टाचार, घोटाळे प्रकरणी तपास करते.

देशांतर्गत पर्यटन खर्चाचे सर्वेक्षण जानेवारीपासून

◾️देशांतर्गत पर्यटनासंदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील दुसरे ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षणा’स १ जानेवारी २०२०पासून प्रारंभ होणार आहे.

◾️देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. 

◾️केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण विभागामार्फत देशभरात ७८ वे सर्वेक्षण ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण आणि बहु निर्देशक’ विषयावर होणार आहे.

◾️१ जानेवारी २०२० पासून सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणात देशात १४,५०० नमुने, तर महाराष्ट्रात १२८८ नमुन्यांचे संकलन होणार आहे.

◾️पर्यटन उद्योगात केवळ पर्यटनच नाही, तर
📌इतर प्रवास,
📌 दूरसंवाद,
📌हॉटेल,
📌गाइड,
📌मनोरंजन,
📌पर्यटनस्थळी खरेदी आदी संलग्न क्षेत्रांचा अंतर्भाव असतो.

◾️ दर पाच वर्षांनी सर्व विभागांचे सर्वेक्षण केले जाते, देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण पाच वर्षांनंतर १ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. 

◾️सर्वेक्षणानंतर डेटा संकलन आणि त्यावर प्रक्रिया (प्रोसेसिंग) केली जाते, यानंतर सर्वेक्षण जाहीर केले जाते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकरिता हे सर्वेक्षण असल्याने पर्यटन विभाग याकरिता सॅटेलाइट अकाउंट तयार करते.

◾️या कार्यपद्धतीद्वारे पर्यटन क्षेत्राचे आपल्या देशाच्या जीडीपीत (एकूण राष्ट्रीय उत्पन्नात) अथवा अर्थव्यवस्थेत किती योगदान आहे, हे मांडले जाते.

✍ असे होणार सर्वेक्षण

◾️किमान १२०० लोकसंख्या असलेला शहरी व ग्रामीण कुटुंबांकडून वर्षभरातील त्यांच्या पर्यटनाची माहिती संकलन  

◾️पर्यटन करताना येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद घेणार प्रवास, मुक्काम, जेवण, खरेदी, मनोरंजन खर्चाचा अंतर्भाव

✍‘बहु निर्देशक सर्व्हे’

◾️पयर्टन खर्च सर्व्हेक्षणास जोडून ‘बहु निर्देशक सर्व्हे’ घेतला जाणार आहे.

◾️संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्‍वस विकास ध्येय २०३० निश्‍चितीअंतर्गत १७ उद्दिष्टे आहेत.

◾️जगभरातील १९३ देश सहभाग नोंदवीत आहेत.

◾️भारताच्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण विभागाद्वारे युनोकरिता पहिल्यांदाच असा सर्व्हे होणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अफगाणिस्तानने ‘इंडियन फार्माकोपीया’ (IP) पुस्तकाला मान्यता दिली

अफगाणिस्तान इस्लामिक प्रजासत्ताक या देशाने ‘इंडियन फार्माकोपीया’ या पुस्तकाला मान्यता दिली असून या पुस्तकाला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.

देशाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय औषधी व आरोग्य उत्पादने नियमन विभागाने ‘इंडियन फार्माकोपीया’ या पुस्तकाला औपचारिक मान्यता दिली.

‘इंडियन फार्माकोपीया’ पुस्तक

🔸इंडियन फार्माकोपीया भारताच्या ‘औषधी व सौंदर्यप्रसाधने कायदा-1940’ अन्वये असलेल्या मानकांचे अधिकृत असे मान्यताप्राप्त पुस्तक आहे.

🔸हे पुस्तक औषधांची ओळख, शुद्धता आणि क्षमता यांच्या बाबतीत भारतामध्ये उत्पादित आणि विक्री केली जाणार्‍या औषधांची मानके निर्दिष्ट करते.

🔸औषधांची गुणवत्ता, क्षमता आणि सुरक्षितता राखण्याच्या उद्देशाने भारतीय फार्माकोपीया आयोग (IPC) औषधी निर्मितीसाठी कायदेशीर व वैज्ञानिक मानके तयार करते आणि त्याची लिखित स्वरुपात नोंद करते.

🔸दरवर्षाच्या अखेरीस ‘इंडियन फार्माकोपीया’ पुस्तक प्रकाशित केले जाते.

भारतीय फार्माकोपीया आयोग (IPC) विषयी

भारतीय फार्माकोपीया आयोग (IPC) भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. भारत देशात तयार होणार्‍या औषधांची मानके ठरवण्यासाठी IPCची स्थापना करण्यात आली आहे. प्रदेशात असलेल्या रोगांवरच्या उपचारासाठी सामान्यत: आवश्यक असलेल्या औषधांचे मानके नियमितपणे अद्ययावत करणे, हे या संस्थेचे मूलभूत कार्य आहे. संस्थेची स्थापना 1956 साली झाली.

चालू घडामोडी प्रश्न

● कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘एक कुटुंब एक नोकरी’ योजना लागू केली
- सिक्किम.

●---या राज्यात सियांग नदीवर भारतामधील 300 मीटर लांबीचा सर्वात दीर्घ असा एकपदरी स्टील केबल सस्पेंशन ब्रिज (पूल) उभारण्यात आला
- अरुणाचल प्रदेश.

● ISRO भारतीय क्षेत्रात हवाई प्रवासादरम्यान संपर्क यंत्रणा प्रदान करण्यासाठी कोणती अंतराळ मोहीम पाठविणार - GSAT-20.

● कोणत्या शहरात ‘भागीदारी शिखर परिषद 2019’ आयोजित करण्यात आली
- मुंबई.

●दरवर्षी ७७ हजार जेष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा देणारी मुख्यमंत्रीतीर्थयात्रा योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे - दिल्ली

●power १८ ही मोहीम सुरु केली आजे .ज्याअंतर्गत २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये युवकांना सामावून घेण्यसाठी प्रेरणा दिली जाईल
-टीवटर इंडिया

● जगभरात वेगाने प्रवासी वाढणाऱ्या हवाई मार्गाच्या यादीत भारतातील कोणता मार्ग चौथ्या स्थानावर आहे
-पुणे -दिल्ली

●जगातील सर्वात उंच पुतळा गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचाउभारला आहे हा पुतळा कोणत्या नदीच्या किनारी आहे
-नर्मदा

●शेतकर्यांच्या सशक्तीकरणासाठी कोणत्या राज्यसरकारने रयत बंधू योजना सुरु केली आहे
- तामिळनाडू

● गायीला राष्ट्रमाता घोषित करणारे देशातील प्रथम राज्य कोणते
-उत्तराखंड

●देशातील पहिले आभासी चलन एटीएम खालीलपैकी कोठे सुरु करण्यात आले
- बंगळूरु

● कोणत्या शहराची भारतातील पहिले दीपस्तंभ शहर म्हणून निवड करण्यात आली
- पुणे

●  पहिली जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली
-जर्मनी

● नाबार्डचे हवामान बदल केंद्र कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे
-लखनौ

२१ डिसेंबर २०१९

पोलिस भरती प्रश्नसंच

🔳 कोणत्या देशाने ‘गांधी नागरिकत्व शिक्षण पुरस्कार’ देण्याची घोषणा केली?

(A) जर्मनी
(B) रशिया
(C) पोर्तुगाल✅✅
(D) अर्जेंटिना

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 भारतीय नौदलाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या अपहरण-रोधी सरावाचे नाव काय आहे?

(A) अद्भुत
(B) अपहरण ✅✅
(C) बंधक
(D) देश हमारा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 डिसेंबर 2019 मध्ये कोणत्या बँकिंग कंपनीने 100 अब्ज डॉलर एवढ्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला?

(A) HDFC ✅✅
(B) अ‍ॅक्सिस बँक
(C) कॅनरा बँक
(D) बँक ऑफ म्हैसूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 कोणत्या राज्याने ‘जलसाथी’ नावाने एका महत्वाकांक्षी कार्यक्रमाला सुरुवात केली?

(A) आंध्रप्रदेश
(B) तामिळनाडू
(C) उत्तरप्रदेश
(D) ओडिशा ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 दरवर्षी ____या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव एकात्मता दिवस साजरा केला जातो.

(A) 25 नोव्हेंबर
(B) 31 ऑक्टोबर
(C) 15 जानेवारी
(D) 20 डिसेंबर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 भारतीय रेल्वे “एक भारत श्रेष्ठ भारत” कार्यक्रमात भाग घेणार्‍या तरुणांना _________ सवलत देणार.

(A) 100 टक्के
(B) 25 टक्के
(C) 50 टक्के ✅✅
(D) 55 टक्के

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) Which of the following is not added to chewing tablet ?

A. Lubricant

B. Guidant

C. Disintegrant✅

D. Antiadhesive


2) Rabies bodies are.

A. Cowdry type A inclusion bodies

B. Bollinge bodies

C. Cowdry type B inculsion bodies

D. Negri bodies✅

3) सावळाच रंग तुझा पावसाळी नभावर ! अलंकार ओळखा.

A. उपमा

B. अनुप्रास

C. उत्प्रेक्षा

D. उपमेय ✅


4) जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी यावर्षी ……….जन्मली.

A. १९७५

B. १९८२

C. १९७८✅

D. १९८०

5) अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते.

A. १०

B. २०

C. १५

D. २५✅

6) कुरुक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

A. हरियाना

B. जम्मू-काश्मिर

C. पंजाब

D. राजस्थान✅

7) एच.आय.व्ही. काय आहे  ?

A. वरीलपैकी सर्व

B. एड्स ची चाचणी  

C. विषाणू  ✅

D. असाध्य रोग

8) सुपरसॅनिक’ म्हणजे काय ?

A. प्रकाशापेक्षा कमी वेगवान       

B. ध्वनीपेक्षा कमी   
.
C. ध्वनीपेक्षा अधिक वेगवान✅

D. प्रकाशापेक्षाही अधिक वेगवान


9 ) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?

A. निकाल्स

B. निकोटीन✅

C. कार्बोनेट

D. फॉस्फेट

10) जर ३४३ : 64 तर १००० : ?

A. १७२

B. १३१

C. १२१✅

D. १००

धक्कादायक ! फडणवीस सरकारच्या एका वर्षात ६५ हजार कोटींचा घोळ; कॅगचा ठपका

◾️: फडणवीस सरकारच्या २०१७-१८ या वर्षात ६५ हजार कोटीचा ताळमेळ लागत नसल्याचे सांगण्यात आले आहे. आज (ता.२०) सभागृहात २०१७-१८ या आर्थिक वर्षात राज्याची स्थिती काय होती यावरचा कॅगचा अहवाल मांडण्यात आला. त्यामध्ये कॅगने हा खळबळजनक खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या या एका आर्थिक वर्षात तब्बल ६५ हजार ९२१ कोटी रुपयांची उपयोगिता प्रमाणपत्रे जोडण्यात आलेली नव्हती. काम पूर्ण झाल्यावर तो-तो विभाग काम योग्यपणे पूर्ण झाले म्हणून जे प्रमाणपत्र देतो त्याला उपयोगिता प्रमाणपत्र म्हणतात. तब्बल ६५ हजार कोटी रुपयांची ही सर्टिफिकेट्स एकाच वर्षात बाकी असणं प्रचंड गंभीर असल्याची बाब निदर्शनास आली आहे. कॅगने स्वतःच यात पुढे निधीचा दुर्विनियोग व अफरातफरीचा धोका होऊ शकतो असं म्हटलं आहे.

दरम्यान, २०१४ साली फडणवीस सरकार सत्तेत आले त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारवर टीका करत सत्तेत आले होते. परंतु, कॅगने तब्बल ६० हजार कोटी रुपयांचा घोळ सांगत फडणवीस सरकारलाच आरोपांच्या पिंजऱ्याच उभे केले आहे.

🔹 कॅग अहवालातील काही बाबी

१) राज्यात २०१८ पर्यंत झालेल्या ६६ हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर झाली असल्याचा संशय कॅगने आपल्या अहवालात व्यक्त केला.

२) एखादे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र १२ महिन्यांच्या आत सादर करायचे असते.

३) काम योग्यरित्या पूर्ण झाल्याचं हे प्रमाणपत्र असतं. मात्र २०१८ पर्यंत विविध कामांसाठी दिलेल्या अनुदानाची उपयोगिता प्रमाणपत्र सादर केली नसल्याचं कॅगने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

४) मात्र 2018 पर्यंतच्या कालावधीत ६५ हजार ९२१ कोटी रुपयांच्या कामाची ३२ हदजार ५७० उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत

५) उपयोगिता प्रमाणपत्रे मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिल्याने निधीचा दुरुपयोग आणि अफरातफरीचा धोका संभवतो असा खळबळजनक संशय कॅगने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. आज विधानसभेत हा अहवाल सादर करण्यात आला.

२०१६-१७ पर्यंत सादर न केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांची संख्या - १३०६७

- कामांची किंमत - २८८९४
२०१६-२०१७ वर्षात सादर न केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांची संख्या - ४०२७ - कामांची किंमत - १२३०१
२०१७-२०१८ वर्षात सादर न केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांची संख्या - १५४७६

- कामांची किंमत - २४७२५

झटपट 10 महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

1) अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन या कंपनीने सीईओ कोण आहेत?
उत्तर : रिचर्ड व्हेंट्रे

2) ‘स्ट्रँडहॉग’ हे काय आहे?
उत्तर : ऑपरेटिंग सिस्टममधला बग

3) 2024 पॅरिस ऑलम्पिकमधल्या ‘सर्फिंग’ स्पर्धेचे आयोजन कोणत्या बेटावर केले जाणार आहे?
उत्तर : ताहिती

4) ‘ग्लोबल रिफ्यूजी फोरम’ (GRF) याची प्रथम बैठक कुठे आयोजित केली गेली?
उत्तर : जिनेव्हा

5) कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलिस स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेतला?
उत्तर : आंध्रप्रदेश

6) ‘स्टीलिंग इंडिया 2019’ नावाचा कार्यक्रम कधी आयोजित केला गेला होता?
उत्तर : 16 डिसेंबर

7) कोणत्या लेखकाने ‘दक्षिण आशियाई साहित्यासाठी DSC पारितोषिक 2019’ जिंकला?
उत्तर : अमिताभ बागची

8) "माइंड मास्टर" शीर्षक असलेले आत्मचरित्र कुणी लिहिले आहे?
उत्तर : विश्वनाथन आनंद

9) कोणत्या देशाच्या सैन्याला ‘संयुक्त राष्ट्रसंघ पदक’ प्राप्त झाले?
उत्तर : भारत

10) ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’च्या कमांडंट पदी कोणाची नेमणूक झाली?
उत्तर : डी. चौधरी

२० डिसेंबर २०१९

चीनचा डाव उधळून लावण्यास यश

काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर पाकिस्तान आणि चीन सातत्याने भारतावर अनेक प्रकारचे बिनबुडाचे आरोप करत आहेत.

-  काश्मीरमधील स्थितीबद्दल चीनने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत बंद दाराआड चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि रशियाच्या विरोधामुळे चीनने हा प्रस्ताव मागे घेतला आहे.

- चीनने अमेरिकेच्या दबावानंतर हा प्रस्ताव मागे घेण्याची हमी दिली आहे. फ्रान्सनेही काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुद्दा असून यात कुठल्याही तिसऱया देशाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे बजावले आहे.

- यासंबंधीच्या घडामोडींवर भारत नजर ठेवून आहे. भारत सुरक्षा परिषदेचा सदस्य नसल्याने चर्चेत थेट सहभाग नाही. फ्रान्स काश्मीरसंबंधीच्या भूमिकेवर ठाम आहे. काश्मीर मुद्दा द्विपक्षीय मार्गानेच हाताळला जावा, असे फ्रान्सच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.

- सुरक्षा परिषदेत या मुद्यावर ब्रिटननेही स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील असल्याने यावर चर्चेचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ब्रिटनकडून स्पष्ट करण्यात आले. सुरक्षा परिषदेत अन्य महत्त्वाच्या जागतिक मुद्दय़ांवर चर्चा केली जावी, असे रशियाने म्हटले आहे.

- 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेत सामील इंडोनेशियानेही काश्मीर मुद्यावरील चर्चेवर आक्षेप घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिकांची संख्या वाढविणे हा कुठल्याही देशाचा अंतर्गत विषय असून यावर अन्य देशाने आक्षेप घेऊ नये असे इंडोनेशियाने सांगितले आहे.

▪️भारत दौऱयाची पार्श्वभूमी

- सीमेच्या मुद्यावर विशेष प्रतिनिधी स्तरीय चर्चेसाठी चीनचे विदेशमंत्री वांग यी हे भारत दौऱयावर येणार आहेत.

-  या महत्त्वाच्या दौऱयापूर्वी सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारतावर दबाव टाकण्याचा चीनचा प्रयत्न होता. जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर सादर करण्यात आलेल्या नकाशांच्या कारणास्तव चीन ही चर्चा घडवून आणू इच्छित होता.
----------------------------------------------

चालू घडामोडी (जाने. २०१९ ते मार्च २०१९) खेलो इंडिया २०१९:-

* दुसऱ्या खेलो इंडिया २०१९ या स्पर्धा ९ जानेवारी ते २० जानेवारी २०१९ या दरम्यान पुणे येथे पार पडल्या
* स्पर्धेत महाराष्ट्राने ८० सुवर्णपदकासह २१३ पदके पटकावत पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले. गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत ३६ सुवर्णपदक पटकावत दुसरे स्थान पटकावले होते
* २०१९च्या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक १८ सुवर्णपदके पटकावली ती जलतरणात
पदक तालिका :-
राज्याचे नाव सुवर्ण रौप्य कास्य एकूण
महाराष्ट्र       ८५     ६२      ८१    २२८
हरियाणा      ६२      ५६      ६०    १७८
दिल्ली         ४८      ३७      ५१     १३६
-------------------------------------------------
● खेलो इंडिया:-
• भारतातले गुणवान खेळाडू शोधून काढण्यासाठी खेलो इंडिया स्कूल गेम्स ही सर्वात मोठी योजना आहे.या योजनेत भारतासाठी पदकांची कमाई करू शकतील अशा १५०० मुलांना केंद्र सरकार दर वर्षी सामावून घेत आहे .या गतीने २०२८ पर्यंत भारताकडे ऑलिम्पिकला भारताचे प्रतिनिधीत्व करू शकतील असे 15 हजार खेळाडू तयार होतील.ही संख्या इतकी मोठी आहे की,२०२८ पर्यंत भारत क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनून २०२८ हे ऑलीम्पिकमध्ये भारताचे वर्ष असू शकेल .
• २०१८ यावर्षी दिल्ली मध्ये खेलो इंडिया स्कूल गेम्स आयोजित केले होते.पहिल्याच स्पर्धेमध्ये ३५०० शाळकरी मुलांनी भाग घेतला .
• २०१९ मध्ये हे गेम्स फक्त शालेय स्तरापर्यंत मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढवून ते युथ गेम्स केले आहेत .आता महाविद्यालये तसेच विद्यापीठीय विध्यार्थी त्यातील २१ वर्षाखालील गटात भाग घेवू शकतात त्यामुळे या वर्षी स्पर्धकांची संख्या ७ हजारावर गेली आहे .या स्पर्धेत एकूण १८ क्रीडा प्रकार आहेत
• २०१९ मध्ये या स्पर्धा ९ ते २० जानेवारी दरम्यान पुणे येथे होणार आहे
• या स्पर्धेमधून निवडलेले १५०० क्रीडापटू खेलो इंडिया स्कॉलर बनतात .त्यांना पुढील ८ वर्षासाठी प्रशिक्षण ,क्रीडा ,साहित्य ,अन्न निवास आदि खर्चासाठी वर्षाला ५ लाख रु.दिले जातात,वरखर्चासाठी दरमहा १० हजार रु.दिले जातात
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...