२२ नोव्हेंबर २०१९

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान

🌸दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

🌸परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

🌸सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

🌸प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

🌸परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

🌸मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

🌸सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

🔶प्रार्थना समाजाचे कार्य🔶

🌺प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

🌺न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

🌺ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

🌺देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🌺अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🌺प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

🌺मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

🌺४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

🌺मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

🌺इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

🌺इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

🌺प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

🔶प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन🔶

🌺प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

◾️धाकट्या भावाकडून घेतली पदाची शपथ

◾️महिंदा राजपक्षे यांनी गुरुवारी श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

◾️लहान भाऊ गोताबाय राजपक्षे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दोनच दिवसांत ही घडामोड झाल्यानंतर आता एकाच परिवाराकडे सत्ता एकवटली आहे.

◾️देशात ऑगस्ट २०२०मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असून, तोपर्यंत महिंदा काळजीवाहू सरकार चालवतील.

◾️महिंदा यांना अध्यक्षीय कार्यालयात त्यांच्याच भावाने शपथ दिली.

◾️तत्पूर्वी विक्रमसिंघे यांनी त्यांचा राजीनामा अध्यक्षांकडे सोपविला.

◾️शपथविधी सोहळ्यास माजी पंतप्रधान रानील विक्रमसिंघे, माजी अध्यक्ष मैत्रिपला सिरिसेना आणि इतर अनेक राजकीय नेते उपस्थित होते.

◾️महिंदा यांची ही दुसरी वेळ आहे.

◾️यापूर्वी देशात राजकीय अस्थिरता होती तेव्हा,
📌२०१८मध्ये ते काही काळ पंतप्रधान होते. त्यांनी
📌 २००५ ते २०१५ या काळात अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
📌वयाच्या २४व्या वर्षी ते प्रथम संसद सदस्य झाले होते.

◾️लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम अर्थात 'एलटीटीई'ला संपविण्यात राजपक्षे बंधूंची भूमिका होती.

◾️दरम्यान, नव्या पंतप्रधानांसाठी मावळते पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी त्वरित निवासस्थान मोकळे केले आहे.

◾️अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीच्या (यूएनपी) उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर त्यांनी बुधवारी राजीनामा दिला होता.

महाराष्ट्र राज्य भूगोल प्रश्नसंच

प्र.०१) महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे ?

अ) 3,07,713 चौ.कि.मी. ✅
ब) 3,09,715 चौ.कि.मी.
क) 3,78,981 चौ.कि.मी.
ड) 3,79,490 चौ.कि.मी.

स्पष्टीकरण : महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713  आहे.

प्र.०२) क्षेत्रफळाच्या द्रष्टीने महाराष्ट्राचा देशात - - - - - - - -क्रमांक लागतो.

अ) पहिला
ब) दुसरा
क) तीसरा ✅
ड) चौथा

स्पष्टीकरण : पहिला क्रमांक : राजस्थान क्षेत्रफळ : 3,42,239 चौ.कि.मी.
दुसरा क्रमांक : मध्य प्रदेश : 3,08,252 चौ.कि.मी.
तीसरा क्रमांक : महाराष्ट्र राज्य क्षेत्रफळ : 3,07,713 चौ.कि.मी.

प्र.०३) भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्र - - - - - - - टक्के एवढा प्रदेश व्यापलेला आहे.

अ) 9.00
ब) 9.36 ✅
क) 9.50
ड) 10.00

स्पष्टीकरण : भारताचा महाराष्ट्र राज्याने 9.36 एवढा प्रदेश व्यापलेला आहे.

प्र.०४) महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार आहे ?

अ) आयातक्रती
ब) त्रिकोणाक्रती ✅
क) चौरसक्रती
ड) वर्तुळक्रती

स्पष्टीकरण : महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाक्रती आहे.

प्र.०५) महाराष्ट्रातील कोणते ठिकाण कोकणात आहे ?

अ) चिखलदरा
ब) तोरणमाळ
क) आंबोली
ड) गडचिरोली

स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील आंबोली हे ठिकाण कोकणात आहे.

प्र.०६) कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

अ) चंद्रपूर
ब) अमरावती
क) रायगड ✅
ड) ठाणे

स्पष्टीकरण : कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड येथे आहे.

प्र.०७) व्रदांवन बाग कोणत्या राज्यात आहे ?

अ) गुजरात
ब) जम्मू - काश्मीर
क) कर्नाटक ✅
ड) महाराष्ट्र

स्पष्टीकरण : व्रदांवन बाग कर्नाटक राज्यात आहे.

प्र.०८) - - - - - - हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

अ) दिल्ली
ब) चेन्नई
क) मुंबई ✅
ड) हैद्राबाद

स्पष्टीकरण : मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

प्र.०९) मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर - - - - - हे आहे.

अ) कांडला
ब) मार्मागोवा
क) हल्दीया
ड) न्हावा - शेवा ✅

स्पष्टीकरण : मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर न्हावा - शेवा हे आहे

प्र.१०) खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या द्रष्टीने सर्वात मोठा आहे ?

अ) पुणे
ब) नागपूर
क) ठाणे ✅
ड) कोल्हापूर

स्पष्टीकरण : खालीलपैकी ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या द्रष्टीने सर्वात मोठा आहे.

प्रश्नसंच 22/11/2019

१) .  खालीलपैकी कोणती सरकारी लेखापरीक्षणाची उद्दिष्टये आहेत ?

   अ) तज्ञ अधिका-याने खर्चासाठी निधीची तरतूद केली आहे ते पाहणे.

   ब) खर्च हा मंजूर केला आहे ते पाहणे.

   क) खर्चाचे देय योग्य व्यक्तीला केले आहे हे पाहणे.

   ड) खर्चाचे वर्गीकरण केले आहे का ते पाहणे.

   1) अ व ब 
    2) ब व क   
    3) अ, ब व क
    4) वरील सर्व

    उत्तर :- 4
२) .  सार्वजनिक उपक्रमांच्या अंकेक्षणाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही ?

   1) सरकारी विभागाचे अंकेक्षण

   2) सरकारी वैधानिक महामंडळाचे अंकेक्षण

   3) सहकारी संस्थांचे अंकेक्षण

   4) सरकारी प्रमंडळाचे अंकेक्षण

    उत्तर :- 3

३) . 1991 नंतर पुढीलपैकी कोणत्या वर्षी परकीय चलन साठयात घट झाली ?

    1) 1993 – 94
    2) 2000 – 01
    3) 2007 – 08
    4) 2008 – 09

     उत्तर :- 4

४) .  अ) जुलै 1991 मध्ये भारतीय रूपयाचे 18 टक्के अवमूल्यन करण्यात आले.

    ब) अवमूल्यनामुळे व्यापारतूट भरून काढण्यास मदत होते.

   1) फक्त अ बरोबर आहे. 

    2) फक्त ब बरोबर आहे.

   3) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत.

   4) अ आणि ब दोन्हीही चूक आहेत.

    उत्तर :- 3

५) .  2012-2013 मध्ये रोखतेची स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने

   अ) सी.आर.आर. व एस्.एल्.आर. कमी केले.

   ब) सी.आर.आर. कमी केला पण एस्.एल्.आर. बदलला नाही.

   क) एस्.एल्.आर. कमी केला पण सी.आर.आर. बदलला नाही.

   1) अ फक्त बरोबर आहे. 
   2) अ आणि ब बरोबर आहे.
   3) अ आणि क बरोबर आहे.
   4) वरीलपैकी एकही नाही.

   उत्तर :- 1

६) .  2011-12 मध्ये भारताच्या रूपया प्रमाणे खालीलपैकी कोणत्या ‍विकसनशील अर्थव्यवस्थांच्या चलनाचे अवमूल्यनाचे झाले ?

   1) ब्राझील, मेक्सिको, रशिया

   2) मेक्सिको, साऊथ कोरिया, जर्मनी

   3) रशिया, साऊथ आफ्रिका, हाँगकाँग

  4) साऊथ कोरिया, जपान, चीन

  उत्तर :- 1

७) . भारतातील पैसा पुरवठयाचे M1 व M2 हे प्रकार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात ?

   1) सार्वजनिक व खासगी पैसा

   2) अंतर्गत व बाह्य पैसा

   3) संकुचित व विस्तारित पैसा 

  4) स्थिर व बदलता पैसा (गतिमान)

   उत्तर :- 3

८) . भारतीय रिझर्व्ह बँकेव्दारा मुद्रापुरवठा मापनाच्या प्रचलांची नव्याने व्याख्या करण्यासाठी अलिकडच्या काळात नियुक्त केलेल्या
     कार्य गटाने भारतातील मुद्रापुरवठयाच्या संकल्पनेतून खालील घटक रद्द केला आहे.

    1) M1 
   2) M2     
   3) M3     
   4) M4

   उत्तर :- 4

९) . पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे ?

   अ) भारतीय रूपयाचे अवमूल्यन, पूर्ण परिवर्तनियतेकडे प्रथम पाऊल होते.

   ब) भारताने चालू खात्यावरील पूर्ण परिवर्तनियता 19 ऑगस्ट, 1995 रोजी स्वीकारली.

   1) केवळ अ
   2) केवळ ब  
   3) दोन्हीही  
   4) एकही नाही

    उत्तर :- 1

१०).  मध्यवर्ती बँकेच्या मौद्रिक व पतविषयक धोरणातील खालीलपैकी कोणत्या मौद्रिक साधनांचा पैशाच्या विस्तारावर सारखाच
     परिणाम होतो.

   1) रोख राखीव गुणोत्तर 
   2) वैधानिक रोखता गुणोत्तर
   3) वरील दोन्ही  
   4) वरील एकही नाही

    उत्तर :- 3

११) .  योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)

   अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान   करणे 
 
ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे

   क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे

   ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

    1) अ, ब, क, ड
    2) अ, ड, क, ब  
    3) अ, ब,  ड, क
    4) अ, ड, ब, क

उत्तर :- 2

१२) . ‘मुलभूत कर्तव्या’ बाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

   अ) म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते.

   ब) ती 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

   क) ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग IV अ मध्ये व कलम 51 अ मध्ये दिली आहेत.

   ड) अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

          वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

    1) अ, ब
    2) ब, क 
    3) क, ड  
    4) अ, ब, क

     उत्तर :- 4

१३).  खालीलपैकी कशाचा मुलभूत कर्तव्यांशी संबंध नाही ?

   अ) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे.

   ब) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

   क) कमकुवत घटकांच्या विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे.

   ड) ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीय दृष्टया महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे.

   1) अ, ब 
   2) ब, क   
   3) क, ड  
   4) फक्त ड

    उत्तर :- ३

१४).  भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?

   1) डॉ. राजेंद्र प्रसाद 
   2) डॉ. झाकीर हुसेन
   3) आर. व्यंकटरमण्‍  
   4) के. आर. नारयणन्

    उत्तर :- 1

१५).  भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ?

   1) लोकसभेचे निर्वाचित सदस्य
   2) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य
   3) विधानसभेचे निर्वाचित सदस्य
   4) वरील सर्वच

    उत्तर :- 4

१६) .  खालील विधाने विचारात घ्या.

   अ) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीने नागरिकांची मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

   ब) 2002 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची संख्या वाढून अकरा झाली आहे.

   क) मूलभूत कर्तव्यांची शिफारस संथन्म समितीने केली होती.

         वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ, ब  
   2) ब, क     
   3) अ, क    
   4) अ, ब, क

उत्तर :- 1

२४७).  भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली ?

   1) एम. सी. छागला
   2) एम. हिदायतुल्ला 
   3) वाय. चंद्रचूड   
   4) वरीलपैकी नाही

    उत्तर :- 2

२४८).  भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?

   1) पंतप्रधान   
   2) राज्यपाल 
   3) राष्ट्रपती   
   4) मुख्य न्यायाधीश

    उत्तर :- 3

३४९) .  राष्ट्रपतींच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो ....................

      अ) जर तो स्वत: उमेदवार असेल.  

       ब) जर त्याने बहुमत सिद्ध केले नसेल.

      क) जर तो राज्यविधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल. 

  ड) जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल.

   1) अ      2) ब      3) क      4) ड

    उत्तर :- 3

२५०).  खालीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे ?

   अ) जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात.

   ब) राष्ट्रपतींच्या निवडणूकीच्या संदर्भात किमान आणि कमाल वयोमर्यादा भारतीय संविधानात नमूद आहे.

   क) भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहेत.

     1) अ, ब  
     2) ब, क    
     3) अ, क
     4) फक्त क

     उत्तर :- 4

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पर्यायी उत्तरांतून योग्य ते उत्तर सांगा? ‘ईश्वरनिर्मित’

   1) नत्रतत्पुरुष समास    2) तृतीया तत्पुरुष समास
   3) प्रादी समास      4) कर्मधारय समास

उत्तर :- 2

2) बोलणा-याच्या तोंडचे शब्द सूचित करण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात ?

   1) एकेरी अवतरण (´    ´)    2) दुहेरी अवतरण (“   ”)
   3) उद्गार चिन्ह ( ! )    4) स्वल्प विराम ( , )

उत्तर :- 2

3) ‘अणूरेणूहून थोकडा | तुका आकाशा एवढा’ यातील अलंकार ओळखा.

   1) चेतनगुणोक्ती    2) भ्रांतिमान    3) विरोधाभास    4) सार

उत्तर :- 3

4) अभ्यस्त शब्द ओळखा.

   1) बारीक सारीक  2) बारकुडा    3) बारकावा    4) बारावा

उत्तर :- 1

5) ‘गंगेत गवळयांची वसती’ या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?

   1) अभिधा    2) लक्षणा    3) व्यंजना    4) योगरूढ

उत्तर :- 2

6) ‘पथ’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

   1) रस्ता    2) वळण      3) रूळ      4) पूल

उत्तर :- 1

7) ‘भंग’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द सांगा.

   1) भग्न    2) निर्भय      3) सभंग      4) अभंग

उत्तर :- 4

8) ‘पिकते तेथे विकत नाही’ या म्हणीचा अचूक पर्याय कोणता ?

   1) मिळेल त्यावर संतोष मानणे    2) निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते
   3) कुठेही काही विकले जात नाही    4) कुठेही काहीही पिकते

उत्तर :- 2

9) खालीलपैकी ‘मारामारी करणे’ हा अर्थ कोणत्या वाक्प्रचाराचा आहे  ?

   1) दोनाचे चार हात होणे      2) हात पसरणे
   3) हाती हात घेणे      4) दोन हात करणे

उत्तर :- 4

10) खालील विधानातील अधोरेखित शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता ?

      पंधरा दिवसातून एकदा भरणारी अशी आमची बैठक असते.

   1) दैनिक    2) वार्षिक    3) पाक्षिक    4) मासिक

उत्तर :- 3

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 22/11/2019

१)  भारतीय राज्यघटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द
     विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाचे नमुद केले आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत ?

   अ) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व  देशातील कायद्याचा आदर करणे.
   ब) स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे.
   क) सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.
   ड) आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे.
   1) अ, क    2) ब      3) ड      4) सर्व

उत्तर :- 4
२)  मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये .................... च्या अपेक्षा आहेत.

   1) मंत्रीमंडळ    2) जनता      3) प्रतिनिधी    4) सर्वोच्च न्यायालय

उत्तर :- 2

३)   योग्य क्रम निवडा.
   अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे    ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे
   क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे    ड) संविधानाचा सन्मान करणे

   1) अ, ड, क, ब    2) ड, अ, क, ब    3) ड, ब, अ, क    4) ड, अ, ब, क

उत्तर :- 2

४)  खालीलपैकी भारतीय नागरिकाचे कोणते मुलभूत कर्तव्य नाही  ?
   1) देशाचे संरक्षण करणे            
   2) नियमित कर भरणे
   3) सहा ते 14 वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यास शिक्षणाच्या संधी देणे    4) एकही नाही

उत्तर :- 2

५)  राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे ?
   अ) जेव्हा राज्यघटना सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे.
   ब) राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजेत.
   क) ही कर्तव्ये मुलभूत हक्कांना पूरक आहेत.
   ड) समावेशनामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकामध्ये नागरी जाणीव विकसित होईल.
        वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?
   1) अ   
    2) ब, क 
    3) अ, ब, क
    4) सर्व

उत्तर :- 4

६)  मुलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा.

अ) सार्वभौमत्वाचे रक्षण 

ब) राष्ट्रगीताचा सन्मान

क) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण

ड) वैज्ञानिक दृष्टिकोन

    1) अ, ब, क, ड
    2) ब, अ, क, ड  
    3) ब, अ, ड, क  
    4) ड, क, ब, अ

उत्तर :- 3

७)  एका विशिष्ट मुलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक अशा सर्वोच्च न्यायालयापुढील 138 निवडयांचा उल्लेख मुलभूत कर्तव्यांविषयीच्या वर्मा आयोगाने केला आहे. खाली नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी कोणत्या मुलभूत कर्तव्याचा उल्लेख यासंदर्भात समितीने केला आहे ?

   1) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रधज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

   2) भारतातील जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे.

   3) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे.

   4) 6 ते 14 वयोगटातील बालकास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

उत्तर :- 3

८)  खालीलपैकी कोणते मुलभूत कर्तव्य नाही ?

   1) संविधानाचे पालन करणे, संविधानातील आदर्श, संस्था व राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

   2) देशाचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे.

   3) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून जतन करणे.

   4) पंचायत राजची निर्मिती करणे.

उत्तर :- 4

९)  खालील विधाने लक्ष्यात घ्या :

   अ) स्वर्ण सिंह समितीच्या
मुलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला.

   ब) मुलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत.

   क) केशवानंद भारती केस मुलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे.

        वरीलपैकी कोणते / ती विधान/ ने बरोबर आहे / त ?

   1) अ, ब
   2) ब, क   
   3) अ, क  
   4) क

उत्तर :- 1

१०) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) सरदार स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीवरून 42 व्या घटनादुरुस्तीने मुलभूत कर्तव्यांची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली गेली.

   ब) 2006 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीव्दारे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मुक्त व अनिवार्य प्राथमिक शिक्षण देणे शासनासबंधनकारक केले गेले.

        वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

   1) अ 
    2) ब  
   3) अ, ब  
   4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 1

११) .  योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)

   अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान   करणे 
 
ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे

   क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे

   ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

    1) अ, ब, क, ड
    2) अ, ड, क, ब  
    3) अ, ब,  ड, क
    4) अ, ड, ब, क

उत्तर :- 2

१२) . ‘मुलभूत कर्तव्या’ बाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

   अ) म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते.

   ब) ती 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

   क) ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग IV अ मध्ये व कलम 51 अ मध्ये दिली आहेत.

   ड) अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

          वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

    1) अ, ब
    2) ब, क 
    3) क, ड  
    4) अ, ब, क

     उत्तर :- 4

१३).  खालीलपैकी कशाचा मुलभूत कर्तव्यांशी संबंध नाही ?

   अ) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे.

   ब) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

   क) कमकुवत घटकांच्या विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे.

   ड) ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीय दृष्टया महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे.

   1) अ, ब 
   2) ब, क   
   3) क, ड  
   4) फक्त ड

    उत्तर :- ३

१४).  भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?

   1) डॉ. राजेंद्र प्रसाद 
   2) डॉ. झाकीर हुसेन
   3) आर. व्यंकटरमण्‍  
   4) के. आर. नारयणन्

    उत्तर :- 1

१५).  भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ?

   1) लोकसभेचे निर्वाचित सदस्य
   2) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य
   3) विधानसभेचे निर्वाचित सदस्य
   4) वरील सर्वच

    उत्तर :- 4

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...