१३ नोव्हेंबर २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) व्याकरणातील पुरुष ही संज्ञा लौकिक जीवनातील पुरुष या व्यक्तीशी संबंधित असून तृतीय पुरुषाच्या बाबतीत तिन्ही लिंगे
     येतात.

   1) या विधानाचा उत्तरार्ध चूक आहे      2) हे संपूर्ण विधान चूक आहे
   3) या विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे    4) हे संपूर्ण विधान बरोबर आहे

उत्तर :- 3

2) लाटणे – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

   1) लाटण    2) लाटण्या    3) लाटणी    4) लाटणा

उत्तर :- 3

3) योग्य जोडया जुळवा.

   a) व्दितीया    अ) चा, ची, चे
   b) तृतीया    ब) ने, ए, शी
   c) पंचमी    क) स, ला, ते
   d) षष्ठी      ड) ऊन, हुन

   1) a – अ, b - ब, c - क, d – ड    2) a – ड, b - क, c - ब, d – अ
   3) a – क, b - ब, c - ड, d – अ    4) a – क, b - अ, c - ब, d – ड   

उत्तर :- 3

4) ‘सर्कशीत काम करणा-या प्राण्यांचे हाल मला बघवत नाहीत’ – वाक्यप्रकार ओळखा.

   1) केवल    2) मिश्र      3) गौण      4) संयुक्त

उत्तर :- 1

5) ‘मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर बांधतो’ – या केवल वाक्याचे पृथ्थकरण करा.

   1) उद्देश्य – पक्षी, उद्देश्य विस्तार – मोठा, क्रियापद – बांधतो, कर्म – आपलले सुंदर घरटे, विधेय विस्तार – उंच झाडावर.

   2) उद्देश्य – मोठा, उद्देश्य विस्तार – पक्षी, क्रियापद – बांधतो, कर्म – आपलले सुंदर घरटे, विधेय विस्तार – उंच झाडावर.

   3) उद्देश्य – घरटे, उद्देश्य विस्तार – मोठा पक्षी, क्रियापद – बांधतो, कर्म –सुंदर, विधेय विस्तार – उंच झाडावर.

   4) उद्देश्य – उंच , उद्देश्य विस्तार – मोठा पक्षी , क्रियापद – बांधतो, कर्म – सुंदर घरटे, विधेय विस्तार – उंच झाडावर.

उत्तर :- 1

6) कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

   1) गाय गुराख्याकडून बांधली जाते      2) त्त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने
   3) शिक्षक मुलांना शिकवितात      4) शिक्षकांनी मुलांना शिकवावे

उत्तर :- 1

7) खालीलपैकी ‘गुळांबा’ या शब्दाचा समास ओळखा.

   1) कर्मधारय      2) तत्पुरुष   
   3) मध्यमपदलोपी    4) बहुव्रीही

उत्तर :- 3

8) खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – अबब ! केवढी मोठी ही भिंत.

   1) -      2) ?     
   3) !      4) ”

उत्तर :- 3

9) उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा .................. हा अलंकार होतो.

   1) श्लेष      2) आपन्हुती   
   3) यमक      4) दृष्टांत

उत्तर :- 2

10) ‘तद्भव’ शब्द निवडा.

   1) ओठ    2) आठव   
   3) आयुष्य    4) आठशे

उत्तर :- 1

मानवी हक्क संरक्षण कायदा : 1993

प्रारंभिक:

(या कायद्यामध्ये एकूण 43 कलम आहेत.)

1. संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

या अधिनियमाला मानवी हक्क संरक्षण कायदा असे संबोधण्यात येईल.

याचा विस्तार जम्मू-काश्मीर सोडून संपूर्ण भारतभर असेल.

तो दिनांक 28 सप्टेंबर 1993 रोजी अंमलात आल्याचे मानण्यात येईल.

2. व्याख्या :

सशस्त्र दले याचा अर्थ नौदल, भुदल, हवाईदल आणि त्यामध्ये संघातील इतर कोणत्याही सशस्त्र दलाचा समावेश होतो.

अध्यक्ष म्हणजे आयोगाच्या किंवा राज्य आयोगाच्या अध्यक्ष्यस्थानी असलेली व्यक्ती होय.

आयोग म्हणजे कलम 3 नुसार राष्ट्रीय मानवी हक्क आयोग होय.

मानवी हक्क म्हणजे व्यक्तीचे जीवनस्वातंत्र्य, समता व प्रतिष्ठा यासंबधीचे संविधानाने हमी दिलेले किंवा आंतरराष्ट्रीय करारामध्ये समाविष्ट असलेले आणि भारतातील न्यायालयांना अमलबजावणी करता येईल असे हक्क होय.

मानवी हक्क न्यायालये म्हणजे कलम 30 नुसार करण्यात आलेली मानवी हक्क न्यायालये होय.

आंतरराष्ट्रीय करार म्हणजे नागरी व राजकीय हक्कांवरील आंतरराष्ट्रीय करार जे 16 डिसेंबर,1966 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये स्वीकारण्यात आलेले आहेत; आणि केंद्र सरकार अधिसूचनेव्दारे निर्दिष्ट करेल त्याप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेकडून स्वीकृत करण्यात येईल अशी संधी किंवा करार होय.

सदस्य म्हणजे आयोगाचा किंवा राज्य आयोगाचा सदस्य होय.

अल्पसंख्यांकसाठी राष्ट्रीय आयोग म्हणजे अल्पसंख्याकासाठी राष्ट्रीय आयोग कायदा 1992 च्या कलम 3 नुसार स्थापन करण्यात आलेला अल्पसंख्याकासाठी राष्ट्रीय आयोग असा होतो.

अनुसूचित जातीकरीता राष्ट्रीय आयोग म्हणजे राज्य घटनेच्या कलम 338 मध्ये निर्देशित करण्यात आलेल्या अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग, असा आहे.

अनुसूचित जमातीकरीता राष्ट्रीय आयोग म्हणजे राज्य घटनेच्या कलम 338 (क) मध्ये निर्देशित केलेल्या अनुसूचित जमातींकरिता राष्ट्रीय आयोग असा आहे.

महिलांसाठी राष्ट्रीय आयोग म्हणजे महिलांसाठी राष्ट्रीय आयोग कायदा 1990 च्या कलम 3 नुसार स्थापन करण्यात आलेला राष्ट्रीय महिला आयोग असा होतो.

अधिसूचना म्हणजे राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना होय.

विहित म्हणजे या कायद्याद्वारे करण्यात आलेल्या नियमांव्दारे विहित करण्यात आलेले होय.

लोकसेवक या संज्ञेस भारतीय दंडसंहितेच्या (1860 ई ) कलम 21 मध्ये जो अर्थ दिला आहे तोच अर्थ असेल.

राज्य आयोग म्हणजे कलम 21 नुसार स्थापण्यात आलेला राज्य मानवी हक्क आयोग होय.

जम्मू व काश्मीर राज्यात अस्तित्वात नसलेल्या कोणत्याही कायद्याचा निर्देश या कायद्यात करण्यात आला असेल तर त्याचा अर्थ त्या राज्यात या कायद्याशी अनुरूप असा कोणताही कायदा अस्तित्त्वात असेल तर त्याचा निर्देश आहे असा समजण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग

✍महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची जुलै २००७ मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा २००५ (२००६ मधील ४) अन्वये राज्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे. सी आर सी म्हणजेच बालहक्क परिषदेत निर्देषित मानांकना बरहुकूम वर्तणूकीकरिता आयोग विविध उपक्रम राबवितो. यामध्ये खाली दिलेल्या काही प्रमाण मानांकनांचा समावेश होतो:

✍बालकांना सर्व प्रकारच्या जातीपाती, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मते, राष्ट्रीय पंरपरा किंवा सामजिक मुळ, संपत्ती, व्यंग किंवा इतर दर्जा याच्या भेदभावा पासून संरक्षण आहे.

✍बालकांसंदर्भातील कृती मध्ये, बालकाच्या सर्वोत्तम हिताला सर्वाधिक प्राथमिकता दिली जाईल.

✍बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे.

✍प्रत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा, जिवनमानाचा आणि विकासाचा, कोणत्याही प्रकारच्या आजारावर सर्वोत्तम दर्जाचा उपचार मिळण्याचाही, बालकाच्या संपूर्ण क्षमतेने व्यक्तिमत्व विकासाचा, बुध्दिमत्ता आणि  शारीरिक क्षमता यांच्याकडे निर्देशित शिक्षणाचा अधिकार तसेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे.

✍बालकाला आराम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा तसेच खेळणे आणि मनोरंजक कृती मध्ये रमण्याचा अधिकार आहे.

✍प्रत्येक बालकाचा योग्य त्या प्रमाणात शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, मनोबल आणि सामाजिक विकास होईल अशा प्रमाण जीवनमानाचा अधिकार आहे.

✍कोणत्याही बालकाला बेकायदेशीर हस्तातंरण, अपहरण, विक्री किंवा वाहतूक इत्यादी उद्देशाने किंवा कोणत्याही प्रकारे हानि होता कामा नये.

✍बालकाच्या दृष्टीकोनाला योग्य तो सन्मान द्यायला हवा.

✍बालकाला त्याच्या  मनाविरुध्द त्याच्या पालकांपासून विभक्त करू नये, अपवादात्मक परिस्थितीत जेव्हा असे विभक्त करणे बालकाच्या उत्तम हीतासाठी साठी आवश्यक असते.

✍कौटुंबिक वातावरणापासून वंचित असलेल्या बालकाला राज्याकडून विशेष संरक्षण आणि मदत मिळण्याचा हक्क असतो.

✍बालकांची काळजी घेणे किंवा संरक्षण करणे यासाठी जबाबदार संस्था, सेवा आणि सुविधांनी संस्थापित मानाकंनाना धरून राहण्याची निश्चिती करावी.

✍मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या मुलांना त्यांचा सन्मान राखणाऱ्या परिस्थिती, स्वावलंबंत्वाचा पुरस्कार आणि समाजामध्ये सक्रिय सहभागाने आयुष्याचा संपूर्ण आनंद घेता यावा आणि चांगले जीवन जगता यावे.

💕आर्थिक शोषणापासून बालक संरक्षित आहेत.

✍मुलांनी अंमली पदार्थ आणि मनावर विपरित परिणाम करणाऱ्या औषधांचे बेकायदेशीर सेवन करता कामा नये.

✍बालकांना सर्व प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक हिंसा, इजा किंवा गैरवर्तन, दुर्लक्ष किंवा निष्काळजीत्व,  दुर्वतन किंवा शोषण, लैंगिक गैरवर्तनासकट सर्व बाबींपासून संरक्षण आहे.

✍प्रत्येक मुलं सर्व प्रकारच्या लैंगिक शोषण आणि लैंगिक गैरवर्तनापासून संरक्षित आहे.

✍कोणत्याही मुलाला बेकायदेशीरपणे किंवा स्वैरपणे यातना किंवा इतर क्रूर वर्तणूक, अमानवीय किंवा मानहानिकारक वर्तणूक किंवा शिक्षा किंवा स्वातंत्र्य मूकायला लागता कामा नये.

✍कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष, शोषण किंवा गैरवर्तणूक, यातना पिडीत मुलांचे शारीरिक आणि मानसिक हानि भरून येण्यासाठी आणि त्यांचा समाजात समावेश होण्याकरिता आवश्यक त्या सर्व गोष्टी योग्य प्रकारे केल्या गेल्या पाहिजेत.

✍सैन्य हमल्या बाधित मुलांना आंतरराष्ट्रीय मानवता कायदा लागू आहे.

✍आरोपित, आरोप असलेले किंवा कायद्याचे उल्लंघन करतांना आढळलेल्या मुलांना योग्य त्या सन्मानाने आणि न्यायाने वर्तणूक मिळण्याचा अधिकार आहे.

✍कोणत्याही मुलाच्या खाजगी जीवनात मनमानीपणे किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप, त्याच्या/तिच्या घरावर किंवा त्याच्या/तिच्या सन्मान आणि नावलौकीकावर आघात होता कामा नये.

RBI ने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली!

📍 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली आहे

👉 चालू आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एक नोटही छापली नाही, माहिती अधिकारात माहिती समोर

💁‍♂ वर्ष आणि नोटांची छपाई :

● 2016-17मध्ये : 354.29 कोटी
● 2017-18 मध्ये : 11.15 कोटी
● 2018-19मध्ये : 4.66 कोटी

💫 चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे

भारतीयांच्या वापरात नसलेल्या स्विस खात्यांतील पैसा सरकारजमा..

🍀स्विस बँकेतील भारतीयांची अनेक खाती ही वापरात नसून त्यातील पडून असलेला पैसा आता स्वित्र्झलड सरकारकडे हस्तांतरित केला जाणार आहे.

🍀स्विस सरकारने बंद असलेल्या अशा खात्यांची यादी २०१५ मध्ये जाहीर केली होती.

🍀या खात्यांवर कुणीही दावा केलेला नाही.

🍀या खात्यांबाबत पुरावे देऊन ती चालू करण्याचा प्रस्ताव बँकेने दिला होता. त्यातील किमान १० खाती भारतीयांशी संबंधित आहेत.

🍀भारतीय निवासी, नागरिक, यांची ही खाती असून त्यातील काही ब्रिटिश काळातील आहेत.

🍀या दहाही खात्यांपैकी एकावरही कुणी सहा वर्षांत दावा केलेला नाही, असे स्विस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

🍀या खात्यांवर दावा करण्याचा कालावधी पुढील महिन्यात संपत आहे. काही खात्यांवर २०२० अखेपर्यंत दावा करता येणार आहे.

१२ नोव्हेंबर २०१९

मंदीचा फेरा; मूडीजकडून भारताला निगेटीव्ह दर्जा

📌देशात आर्थिक मंदीमुळे चिंतेचे वातावरण आणखी दाट होत असताना  या आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर सर्व्हीस संस्थेने भारताला दिलेला 'स्थिर' हा दर्जा हटवून आना 'निगेटीव्ह' असा दर्जा दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताचा विकासदर धिमा राहील असेही या संस्थेने म्हटले आहे.

📌कॉर्पोरेट करात कपात आणि सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा मंदावलेला वेग पाहता, मार्च २०२० मध्ये संपणाऱ्या वित्तीय वर्षादरम्यान अर्थसंकल्पीय तूट ३.७ टक्के इतकी राहू शकते असा अंदाज मूडीजने व्यक्त केला आहे. या वर्षासाठी अर्थसंकल्पीय तुटीचे लक्ष्य ३.३ इतके ठेवण्यात आले होते.

📌ऑक्टोबर २०१९ मध्ये मूडीजने २०१९-२० मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या विकासाच्या अंदाजात घट करून तो ५.८ टक्के इतका धरला होता. यापूर्वी मूडीजने जीडीपी ६.२ असेल असा अंदाज व्यक्त केला होता.

📌भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती आणि संबंधित संभाव्य धोके लक्षात घेत मूडीजने भारताच्या रेटींगमध्ये घट केली आहे, असे मूडीज या संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. याचाच अर्थ मागील वाढीच्या तुलनेत आता भारताची अर्थव्यवस्थेचा धीम्या गतीने मार्गक्रमण करेल असा आहे.

📌केद्र सरकारने मंदीशी दोन हात करण्याबाबतच्या धोरणांची योग्य अंमलबजावणी न होणे हेच या मागे कारण असल्याचे मूडीजने म्हटले आहे. देशावरील कर्जाचा भारही हळूहळू वाढत जाईल, असाही मूडीजचा अंदाज आहे.

📌मंदीशी लढण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम पडेल,असे मूडीजला वाटते. शिवाय यामुळे मंदीचा कालावधी देखील कमी होऊ शकतो, असे मूडीजला वाटते.

📌मंदीमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून रोजगाराच्या संधीही कमी झाल्या आहेत. इतकेच नाही, तर गैर बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) देखील संकटात सापडल्या असल्याचे मूडीजने म्हटले आहे.

📌उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक आणि विकासाचा दर वाढवण्यासाठी करावयाच्या सुधारणा आणि करप्रणालीचा पाया मजबूत बनवण्याच्या प्रयत्नांनाही खिळ बसली असल्याचे मूडीजचे म्हणणे आहे.

📌एप्रिल ते जून अशा तिमाहीच्या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था ५.० टक्के दराने पुढे सरकत आहे. हा दर २०१३ च्या नंतरचा सर्वात कमी दर आहे.

📌मागणीत झालेली घट आणि वाढता सरकारी खर्च ही या मागची कारणे असल्याचे मूडीजने म्हटले आहे. हे लक्षात घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली. याबरोबरच सरकारने देखील कॉर्पोरेट करात कपात करण्याचे पाऊल उचलले.

भारत 2023 पुरुष हॉकी विश्वचषक आयोजित करेल..

🔰भारत 1323 ते 29 जानेवारी दरम्यान 2023 पुरुष हॉकी विश्वचषक आयोजित करेल.

🔰आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) आज जाहीर केले की भारत पुरुषांच्या स्पर्धेचे आयोजन करेल तर स्पेन आणि नेदरलँड्स या संघांचे सह-यजमान म्हणून निवड करण्यात येणार आहे. २०२२ महिला विश्वचषक स्पर्धा १ ते २२ जुलै या कालावधीत होणार आहे.  .  .

🔰स्वित्झर्लंडच्या लॉझने येथे एफआयएच कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

🔰एफआयएचने पुढे सांगितले की पुरुष व महिला वर्ल्ड कप या दोन्ही ठिकाणांची घोषणा यजमान देशांनी नंतरच्या तारखेला केली जाईल.

महाराष्ट्रातील महामंडळे.


१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२

२) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६

३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२

४) महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२

५) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८

६) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२

७) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५

८) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१

९) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित) - १९६३

१०) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५

११) मराठवाडा विकास महामंडळ - १९६७

१२) कोकण विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०

१३) विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०

१४) महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६

१५) विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७

१६) कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७

१७) तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७

१८) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८

१९) महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८

२०) म्हाडा - १९७६

संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीवर मनमोहन सिंग नियुक्त


माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसचे आधीचे सदस्य दिग्विजय सिंह यांच्या जागी डॉ. मनमोहन सिंग यांची नियुक्ती केली आहे.

दिग्विजय सिंह यांची नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्तीही नायडू यांनीच केली आहे. मनमोहन सिंग यांच्यासाठी दिग्विजय सिंह यांनी संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचा राजीनामा दिला होता.

मनमोहन सिंग हे १९९१ ते १९९६ दरम्यान देशाचे अर्थमंत्री होते, तसेच सप्टेंबर २०१४ ते मे २०१९ दरम्यान ते अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य व राज्यसभेचे सदस्य होते.

नंतर जूनमध्ये त्यांची राज्यसभेची मुदत संपली व ऑगस्टमध्ये राजस्थानातून ते राज्यसभेवर पुन्हा बिनविरोध निवडून आले.

मागील काळात अर्थविषयक स्थायी समितीने वस्तू व सेवा कर, निश्चलनीकरण म्हणजे नोटाबंदी हे विषय हाताळले होते. दरम्यान, आता नवीन बदलात दिग्विजय सिंह यांना नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीचे सदस्यपद देण्यात आले आहे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘क्षुध्+ पीडा’ याची योग्य संधी कोणती?
   1) क्षुत्पीडा    2) क्षुतपीडा    3) क्षुत्पिडा    4) क्षुत्‍पिडा

उत्तर :- 1

2) पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे  ?

   1) मी आत्ताच नगरहून आलो    2) आमची बेबी आता कॉलेजात जाते
   3) माधुरी उद्या मुंबईला जाईल    4) शेजारची तारा यंदा बी.ए. झाली

उत्तर :- 3

3) ‘ज्याला कर नाही त्याला डर कशाला ?’ सर्वनामाचा अधोरेखित प्रकार सांगा.

   1) दर्शक सर्वनाम  2) संबंधी सर्वनाम    3) अनिश्चित सर्वनाम  4) आत्मवाचक सर्वनाम

उत्तर :- 2

4) विशेषण ज्या नामबद्दल, विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला ...................... असे म्हणतात.

   1) विशेष्य    2) अव्यय सदृश्य सर्वनाम
   3) धातुसाधित    4) अव्ययसाधीत

उत्तर :- 1

5) पुढे दिलेल्या वाक्यांमधील भावकर्तृक क्रियापद असलेले वाक्य ओळखा.

   1) आई बाळाला हसविते        2) आईच्या आठवणीने प्रज्ञाचे डोळे पाणावले
   3) आई घरी पोचण्यापूर्वीच सांजावले    4) आईने स्वत:च जेवण बनविले

उत्तर :- 3

6) ‘जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

   1) स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य      2) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य
   3) रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य      4) कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य

उत्तर :- 2

7) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

     स्तव

   1) तुलनावाचक      2) हेतुवाचक    3) दिक्वाचक    4) विरोधवाचक

उत्तर :- 2

8) पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?
    ‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’

   1) परिणामबोधक    2) स्वरूपबोधक    3) कारणबोधक    4) विकल्पबोधक

उत्तर :- 2

9) पुढील शब्द कोणत्या शब्दजातीतील ओळखा. – ‘फक्कड’

   1) उभयान्वयी      2) केवलप्रयोगी    3) सर्वनाम    4) ‍क्रियापद

उत्तर :- 2

10) ‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) वर्तमानकाळ      2) अपूर्ण वर्तमानकाळ
   3) पूर्ण वर्तमान काळ    4) रीतिवर्तमान काळ

उत्तर :- 4

उत्पन्नात स्टॅच्यू ऑफ युनिटीने अव्वल

◾️ताजमहालाचे उत्पन्न ५६ कोटी रु. मात्र, पर्यटकांची संख्या पहिल्या स्थानी

◾️लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पूर्णाकृती पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यटकांचे आकर्षणकेंद्र ठरला आहे.

◾️ सरदार पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबर रोजी झाली. याच दिवशी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण होण्यास एक वर्ष पूर्ण झाले.

◾️वर्षभरात तिकिटांचा हिशेब ठेवणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्टला विक्रमी ६३.३९ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले.

◾️ तिकिटांच्या उत्पन्नाबाबत ही आकडेवारी ताजमहालासह देशातील पाच ऐतिहासिक स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या स्मारकांपेक्षा जास्त आहे.

◾️ ताजमहाल पाहण्यास ६४.५८ लाख लोक आले. ही संख्या सर्वाधिक आहे.

◾️तर एका वर्षांत स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी २४ लाख लोक आले आहेत. मात्र, ताजमहाल देश-विदेशातील पर्यटकांना आजही आकर्षित करतो.

✍कोठे किती प्रेक्षक आले, किती उत्पन्न

❗️स्मारक आवक। ❗️  (रुपये) ❗️ पर्यटक❗️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

◾️स्टॅच्यू ऑफ युनिटी ❗️६३ कोटी❗️ २४.४४ लाख

◾️ताजमहाल ❗️५६ कोटी❗️ ६४.५८ लाख

◾️आग्र्याचा किल्ला❗️ ३०.५५ कोटी ❗️२४.९८ लाख

◾️कुतुबमिनार❗️ २३.४६ कोटी ❗️२९.३३ लाख

◾️फतेपुर सिक्री❗️ १९.०४ कोटी ❗️१२.६३ लाख

◾️लाल किला❗️ १६.१७ कोटी❗️ ३१.७९ लाख

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

झटपट 10 चालुघडामोडी प्रश्न उत्तरे

1) क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी केंद्र सरकारने कोणते वर्ष मुदतनिश्चिती म्हणून ठरवले आहे?
उत्तर : सन 2025

2) बाजारभांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जगातील कितवी मोठी ऊर्जा संस्था बनली आहे?
उत्तर : सहावी

3) आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे नवे महासंचालक कोण आहेत?
उत्तर : राफेल ग्रोसी

4) संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत किती सदस्यदेश आहेत?
उत्तर : 171

5) निर्मल पुरजा कोणत्या देशाशी संबंधित आहेत?
उत्तर : नेपाळ

6) “द अनक्वायट रिव्हर: ए बायोग्राफी ऑफ द ब्रह्मपुत्रा” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : अरुपज्योती सैकिया

7) लेबनॉन या देशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर : बैरूत

8) ‘रोडटेक विषयक आंतरराष्ट्रीय परिषद’ कुठे भरली होती?
उत्तर : नवी दिल्ली

9) UNESCOच्या वतीने जागतिक शहर दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 31 ऑक्टोबर

10) आंतरराष्ट्रीय सौर युतीची दुसरी सभा कुठे भरविण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली

राज्यसभा

      हे भारतीय लोकशाहीचे वरचे सभागृह आहे . लोकसभा म्हणजे खालचे प्रतिनिधीमंडळ. राज्यसभेत 245 सदस्य असतात. ज्यामध्ये 12 सभासदांना भारतीय राष्ट्रपती नियुक्त करतात . त्यांना 'नामित सदस्य' म्हणतात. इतर सदस्य निवडले जातात. राज्यसभेवर years वर्षे सभासद निवडले जातात, त्यापैकी एक तृतीयांश दर 2 वर्षांनी सेवानिवृत्त होतात.

कोणत्याही संघीय नियमात, घटनात्मक बंधन असल्यामुळे फेडरल विधानसभेच्या वरच्या भागाला राज्य हितसंबंधांचे फेडरल लेव्हल डिफेन्डर बनविले जाते. राज्यसभेची स्थापना या तत्त्वामुळे झाली आहे. या कारणास्तव, राज्यसभेला संसदेचे दुसरे सभागृह म्हणून स्थापन झालेल्या सदनांची समानता म्हणून पाहिले जाते. लोकसभेने मंजूर केलेल्या प्रस्तावांचा आढावा घेण्यासाठी राज्य सभा स्थापन करण्यात आली आहे. मंत्रिमंडळातील तज्ञांची कमतरतादेखील भरून काढू शकते कारण त्यामध्ये किमान 12 तज्ञ नेमलेले आहेत. राष्ट्रपतींपुढे आणीबाणी लागू करण्याचे सर्व प्रस्ताव राज्यसभेनेदेखील मंजूर केले पाहिजेत. जुलै 2018 पासून राज्यसभेचे खासदार सभागृहात 22 भारतीय भाषांमध्ये भाषणे करू शकतात कारण वरच्या सभागृहात सर्व 22 भारतीय भाषांमध्ये एकाचवेळी भाषांतर केले जाते. 

भारताचे उपराष्ट्रपती (सध्या वैकेय्या नायडू ) राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. राज्यसभेचे पहिले अधिवेशन १ May मे १९५२ रोजी झाले.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...