२१ ऑक्टोबर २०१९

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌‘IMNEX-2019’ नावाचा भारत आणि म्यानमार यांच्यादरम्यानचा संयुक्त सागरी सराव _ येथे आयोजित करण्यात आला.

(A) कोची
(B) विशाखापट्टणम✅✅✅
(C) मुंबई
(D) कन्याकुमारी

📌कोणत्या ठिकाणी सातव्या “लष्करी जागतिक खेळ”चे आयोजन केले गेले?

(A) बिजींग
(B) वुहान(चीन)✅✅✅
(C) मुंगियॉंग
(D) सोची

📌___ या दिवशी जागतिक सांख्यिकी दिन साजरा केला जातो.

(A) 20 सप्टेंबर
(B) 20 ऑक्टोबर✅✅✅
(C) 21 ऑक्टोबर
(D) 19 ऑक्टोबर

📌____ या देशात चौथी ‘भारत-ASEAN व्यवसाय शिखर परिषद’ भरविण्यात आली.

(A) मलेशिया
(B) चीन
(C) फिलीपिन्स✅✅✅
(D) इंडोनेशिया

📌‘एकुव्हेरिन 2019’ हा भारत आणि _ या देशांदरम्यानचा संयुक्त सराव आहे.

(A) मलेशिया
(B) मालदीव✅✅✅
(C) सिंगापूर
(D) ओमान

📌कोणती कंपनी 9 लक्ष कोटी रुपये बाजार भांडवलाचा आकडा पार करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली?

(A) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
(B) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड✅✅✅
(C) इन्फोसिस
(D) बजाज फायनान्स

📌अंतराळात क्रिस्टिना कोच आणि जेसिका मीर या दोन महिला अंतराळवीरांनी संपूर्णपणे स्त्रियांचा स्पेसवॉक करून इतिहास रचला. हा स्पेसवॉक _ या संस्थेनी आयोजित केला होता.

(A) NASA✅✅✅
(B) ESA
(C) JAXA
(D) ISA

📌भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे उत्तराधिकारी म्हणून कोणाची शिफारस केली गेली आहे?

(A) न्या. चोकलिंगम नागप्पन
(B) न्या. चेलमेश्वर
(C) न्या. शरद बोबडे✅✅✅
(D) न्या. अर्जन कुमार सिक्री

📌11वी ‘अणुऊर्जा परिषद’  या देशात आयोजित केली गेली.

(A) दक्षिण कोरिया
(B) भारत✅✅✅
(C) फ्रान्स
(D) इंग्लंड

📌ईशान्येकडील कोणत्या राज्यात तिसर्‍या ‘शिरूई लिली महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले?

(A) मिझोरम
(B) मणीपूर✅✅✅
(C) नागालँड
(D) मेघालय

📌‘ईस्टर्न ब्रिज-5’ हा भारत आणि __ या देशादरम्यानचा संयुक्त हवाई सराव आहे.

(A) ओमान✅✅✅
(B) संयुक्त अरब अमिराती
(C) इस्त्राएल
(D) जापान

तुम्हाला हे ठाऊक आहे का ?? साहीत्यिक व टोपण नावे

🌷विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज

🌷 राम गणेश गडकरी - गोंविदाग्रज ( कवी म्हणून हे नाव )

🌷 कृष्णाजी केशव दामले- केशवसुत ( कवितेचे जनक  )

🌷 राम गणेश गडकरी - बाळकराम ( विनोद लेखनासाठी )

🌷 गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी

🌷 शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर ( नाट्यछटाकार )

🌷 माधव त्र्यंबक पटवर्धन- माधव ज्यूलियन

🌷 काशिनाख हरी मोडक - माधवानुढ

🌷 चिंतामणी त्र्यंबक खानोलकर - आरतीप्रभू

🌷 आत्माराम रावजी देशपांडे- अनिल

🌷 त्र्यंबक बापूजी ठोबंरे - बालकवी - निसर्गकवी

🌷 दत्तात्रय कोंडे घाटे- दत्त

🌷 गिरीश कानेटकर - गिरीश

🌷 सेतुमाधवराव पगडी  - कृष्णकुमार

🌷 प्रल्हाद केशव आत्रे- केशवकुमार

🌷 वसंत मंगळवेढेकर - राजा मंगळवेढेकर

🌷 जयंत दळवी - ठणठणपाळ

🌷 माणिक शंकर गोडघाटे- कवी ग्रेस

🌷दिनकर दत्तात्रेय भोसले - चारूता सागर

🌷 नारायण मुरलीधर गुप्ते - कवी " बी "

प्रश्नावली - गणित 21/10/2019

(1) 970 रुपयांत 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? (२०१७)
(1) 17
(2) 18
(3) 19
(4) 20

स्पष्टीकरण- 970 : 50 = भागाकार 19 बाकी 2
ंम्हणून 50 रुपयांच्या जास्तीत जास्त 19 नोटा येतील.
पर्याय 3 बरोबर आहे.
—————————————————
(2) धनेशजवळ 50, 20, 10 व 5 रुपयांच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1020 रु. असल्यास धनेशजवळ 50 रु. च्या किती नोटा आहेत?
(1) 50
(2) 12
(3) 68
(4) 34

स्पष्टीकरण- 50+20+10+5=85 ने 1020 रु. ला भागू
1020 : 85=12 : 50 रु. च्या 12 नोटा आहेत.
पर्याय क्र. 12 बरोबर
————————————————————-
(3) सुुशांतने रु. 35, 5 पैसे ही रक्कम 35.5 रु. अशी लिहिली, तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल? (2017)
(1) 45 पैसे
(2) 55 पैसे
(3) 50 पैसे
(4) काहीही फरक पडणार नाही.

स्पष्टीकरण- 35 रु. 5 पैसे आहे, पण लिहिली 35.5 रु. म्हणजे 35 रु. 50 पैसे म्हणून फरक 35 रु. 50 पै.- 35 रु. 5 पैसे.
पर्याय क्र. 1 बरोबर
——————————————————
(4) धनेशने 50 व 100 रुपयांच्या प्रत्येकी 8 नोटा बॅँकेत देऊन त्या रकमेच्या 10 च्या नोटा मागितल्या, तर त्याला 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील? (2018)
(1) 80
(2) 100
(3) 120
(4) 110

स्पष्टीकरण- 50७8 = 400, 100७8 = 800
800+ 400= 1200 रु., एकूण रक्कम आहे.
आता 10 रुपयांच्या नोटासाठी 1200 - 10 = 120 नोटा आहेत.
पर्याय क्र. 3 बरोबर
——————————————————————--
(5) 5 रु., 10 रु व 20 रु. मूल्यांच्या प्रत्येकी किती समान एकत्र केल्यास 875 रु. होतील?
(1) 25
(2) 50
(3) 21
(4) 35

स्पष्टीकरण- 5+10+20- 35 रु. होतात.
875 - 35 =25 नोटा घ्याव्या लागतात.
पर्याय क्र. 1 बरोबर
——————————————————
नमूना प्रश्न :-

(1) एक पुस्तक व एक वही यांची एकूण किंमत 64 रु. आहे. पुस्तकांची किंमत वहीच्या किंमतीपेक्षा 18 रुपयांनी जास्त आहे. तर 2 वह्यांची किंमत किती होईल?
(1) 41 रु. (2) 23 रु. (3) 36 रु. (4) 46 रु.

(2) प्रदीपजवळ 1०० रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या, निमपट नोटा 50 रुपयांच्या व दुप्पट नाणी 1 रुपयाची असे मिळून एकुण 10080 रु. आहेत, तर प्रदीपजवळ 100 रुपयांच्या किती नोटा आहेत ?
(1) 20 (2) 30 (3) 40 (4) 50

(3) 300 रुपयांत 20 रुपयांच्या किती नोटा येतील?
(1) 20 (2) 40 (3) 15 (4) 6000

(4) अथर्वने सुयशकडून 2 रुपयांची 80 नाणी घेतली व तिला 5 रुपयांची 32 नाणी दिली. 5 रुपयांची 32 नाणी देऊन त्याने आर्यनकडून 10 रुपयांची 15 नाणी घेतली. ही सर्व नाणी त्याने मिलिंदला दिली. तर एकूण रकमेत काही रक्कम कमी आढळली तर खालीलपैकी कोणी रक्कम कमी किंवा जास्त दिली.?
(1) सुयश (2) आर्यन (3) मिलिंद (4) अथर्व

(5) राजूभार्इंनी आपल्याजवळील 1000 रुपये रकमेच्या 1/8 रुपये आपल्या मोठ्या मुलास व आपल्या दोन मुलींना प्रत्येकीस सहलीसाठी दिले. एकूण तिघांना मिळून किती रुपये दिले?
(1) 250 (2) 375 (3) 400 (4) 125

(6) संग्रामजवळ 10 रुपये किमतीच्या, 5 रुपये किमतीच्या आणि 20 रुपये किमतीच्या अनुक्रमे 10, 10, 15 नोटा असल्यास त्याच्याजवळील एकूण रक्कम किती?
(1) 470 रु. (2) 360 रु. (3) 440 रु. (4) 395 रु.

(7) श्रावणीकडे 5 रु. व 10 रु.च्या समान नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत दीडशे रुपये असल्यास श्रावणीकडे एकूण किती नोटा आहेत?
(1) 5 (2) 10 (3) 2 (4) 20

(8) सम्यककडे 10 रुपयांच्या नाण्यांच्या रकमेच्या दुप्पट रक्कम 20 रुपयांच्या नाण्यांची रक्कम आहे. 10 रुपयांची नाणी 24 असल्यास त्याच्याकडील 20 रुपयांच्या नोटांचा संख्या किती?
(1) 48 (2) 44 (3) 30 (4) 24

(9) 5254 रुपयांत 50 रु.च्या 5 नोटा, 1 रु. च्या 4 नोटा व उरलेल्या 100 रु. च्या नोटा आहेत, तर 100 रु. च्या नोटांची संख्या किती?
(1) 50 (2) 55 (3) 56 (4) 52

(10) सृष्टीकडे 10 व 20 रुपयांच्या समान नोटा आहेत. त्याची एकूण रक्कम 900 रुपये असल्यास 10 रुपयांच्या नोटांची एकूण रक्क्म किती?
(1) 300 रु. (2) 600 रु. (3) 400 रु. (4) 500 रु.

(11) 192 रुपयांत 5 रु., 2 रु., व 1 रु.च्या समान संख्येत एकूण नोटा किती आहेत.?
(1) 24 (2) 72 (3) 48 (4) यापैकी नाही

(12) अडीच रुपये म्हणजे किती पैसे?
(1) 2500 पैसे (2) 150 पैसे (3) 750 पैसे (4) 250 पैसे

(13) सव्वा रुपया + साडेतीन रुपये = किती?
(1) 4 रु. 75 पै. (2) 5 रु. 75 पै. (3) 3 रु. 75 पै. (4) 4 रु. 75 पै.
————————————————————--
————————————————————--
उत्तर सूची :-

(1) 4 (2) 3 (3) 3 (4) 2 (5) 2 (6) 1 (7) 4 (8) 1 (9) 1 (10) 1 (11) 3 (12) 4 (13) 1

वेग, वेळ आणि अंतर विषयी संपूर्ण माहिती

नमूना पहिला –

उदा.  300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

45 से.

15 से.

25 से.

35 से.

उत्तर : 15 से.

क्लृप्ती :-एका तासाचे सेकंद = 3600 व 1 कि.मी. = 1000 मी. 3600/1000=18/5, या आधारे वेग व वेळ काढताना 18/5 ने गुणा व अंतर काढताना 5/18 ने गुणा. खांब ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 ∶:  300/72×18/5=15 सेकंद

 नमूना दूसरा –

उदा. ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्‍या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?

1मि. 12से.

1मि. 25से.

36से.

1मि. 10से.

उत्तर : 1मि. 12से.

क्लृप्ती :-एकूण कापावयाचे अंतर = गाडीची लांबी + पूलाची लांबी = 400+400 =800 मि.
पूल ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी/ताशी वेग × 18/5

 नमूना तिसरा –

उदा. ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?

540मी.

162मी.

270मी.

280मी.

उत्तर : 270 मी.

सूत्र :- गाडीची लांबी = वेग × वेळ × 5/18 = 54×18×5/18 = 270 मी.

 नमूना चौथा –

उदा. 800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?

54 कि.मी.

40 कि.मी.

50 कि.मी.

60 कि.मी.

उत्तर : 40 कि.मी.  

क्लृप्ती :-वेग = अंतर/वेळ ×18/5 = 800/72 × 18/5 = 40 (वेग काढताना 18/5 ने गुणणे)

 नमूना पाचवा –

उदा. मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?

दु.12 वा.

12.30 वा.

1.30 वा.

11.30 वा.

उत्तर : 12.30 वा.

क्लृप्ती :-भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ = वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा/वेगातील फरक = 1 तास×60/75-60 = 60/15 = 4 तास

 नमूना सहावा –

उदा. मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्‍या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

दु.12.30 वा.

दु.12वा.

दु.1.30 वा.

दु.1वा.

उत्तर : दु.12.30वा.

क्लृप्ती :- लागणारा वेळ = एकूण अंतर/दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज

 नमूना सातवा –

उदा. ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?

300 कि.मी.

240 कि.मी.

210 कि.मी.

270 कि.मी.

उत्तर : 240 कि.मी.

स्पष्टीकरण :-60 व 75 चा लसावी = 300
300 ÷ 60 = 5 तास     :: 60 मिनिटे फरक = 60×5=300 कि.मी.
300 ÷ 75 = 4 तास     :: 48 मिनिटे फरक = 4×60 = 240 कि.मी.

11व्या अणूऊर्जा परिषदेचे डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते उद्‌घाटन

- शांततापूर्ण वापरासाठी भारताच्या अणुऊर्जेचा वापर करण्याचे होमी भाभा यांचे स्वप्न पूर्ण करु शकलो असे केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. सरकारने विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये अणुऊर्जेचा वैविध्यपूर्ण वापर केल्याचे त्यांनी सांगितले. ते आज नवीन दिल्लीत 11व्या अणुऊर्जा परिषदेच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते.

- देशात वैज्ञानिक प्रति आवड निर्माण करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलल्याचे ते म्हणाले. यापूर्वी अणुऊर्जा प्रकल्प केवळ दक्षिण भारतापर्यंतच मर्यादित होते, मात्र आता देशाच्या विविध भागांमध्ये अणु प्रकल्प सरकार स्थापन करत आहेत, असे त्यांनी सांगितले. याचा एक भाग म्हणून हरियाणातील गोरखपूर येथे अणु ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आले असल्याचे सांगितले.

- अणुऊर्जेच्या वापरासंबंधी जनतेमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशाच्या वाढत्या ऊर्जा विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी अणुऊर्जा हा महत्वपूर्ण स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले.

- या परिषदेत विविध संकल्पनांवर आधारीत सत्रं घेण्यात आली.

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे 21/10/2019

1. ‘केसाने गळा कापणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय?

 दुसर्‍याला फसविणे

 विश्वासघात करणे

 दुसर्‍याचे नुकसाने करणे

 विश्वासाला पात्र नसणे

उत्तर : विश्वासघात करणे

2. ‘मनात मांडे खाणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय?

 मनोरथ रचणे

 कल्पनेत सुख मिळविणे

 मानसिक भूक भागविणे

 एखादी गोष्ट गुप्त ठेवणे

उत्तर :कल्पनेत सुख मिळविणे

 3. वचन कुणाचे आहे ते ओळखा?

‘बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले’

 संत ज्ञानेश्वर

 संत तुकाराम

 समर्थ रामदास

 तुकडोजी महाराज

उत्तर :संत तुकाराम

 4. शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे?

 देऊळगाव राजा

 पिंपळगाव राजा

 सिंदखेड राजा

 किनगाव राजा

उत्तर :सिंदखेड राजा

 5. मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत?

 12

 32  

 34

 37

उत्तर :34

 6. संधी ओळखा? कवीश्वर.

 स्वरसंधी

 व्यंजनसंधी

 विसर्गसंधी

 विशेषणसंधी

उत्तर :स्वरसंधी

 7. पुढील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा? बोका

 मांजर

 बोकी

 बोके

 भाटी

उत्तर :भाटी

 8. ‘मृत्युंजय’ व ‘छावा’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

 रणजीत देसाई

 वि.स. खांडेकर

 शिवाजी सावंत

 शिवाजी भोसले

उत्तर :शिवाजी सावंत

 9. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

 पुणे

 अहमदनगर

 नागपूर

 यवतमाळ

उत्तर :अहमदनगर

 10. भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी कोणती?

 तापी

 नर्मदा

 गंगा

 गोदावरी

उत्तर :नर्मदा

 11. ‘लोणार’ सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

 बुलढाणा

 अकोला

 यवतमाळ

 जालना

उत्तर :बुलढाणा

 12. बीड जिल्ह्याला किती जिल्ह्यांची सरहद्द लागते?

 पाच

 सहा

 सात

 चार

उत्तर :सहा

 13. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

 अमरावती

 बुलढाणा

 भंडारा

 गोंदिया

उत्तर :अमरावती

 14. ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

 महात्मा फुले

 महर्षी कर्वे

 महर्षी वि.रा. शिंदे

 डॉ. आंबेडकर

उत्तर :महात्मा फुले

 15. ‘मी अश्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही’ ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली?

 नागपूर

 मुंबई

 औरंगाबाद

 येवला

उत्तर :येवला

 16. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?

 राजाराम मोहन रॉय

 दादाभाई नौरोजी

 रविंद्रनाथ टागोर

 स्वामी विवेकानंद

उत्तर :राजाराम मोहन रॉय

 17. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण?

 विष्णू शास्त्री चिपळूणकर

 हरी नारायण आपटे

 बाळशास्त्री जांभेकर

 केशवसूत

उत्तर :बाळशास्त्री जांभेकर

 18. थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय?

 गोपाळ देवीदास आमटे

 दामोदर विनायक आमटे

 प्रभाकर देवीदास आमटे

 मुरलीधर देवीदास आमटे

उत्तर :मुरलीधर देवीदास आमटे

 19. ‘सतीबंदीचा कायदा’ खालीलपैकी कोणी पास केला?

 लॉर्ड

 लॉर्ड विल्यम बेटिंग

 जॉन अॅडम्स

 लॉर्ड मिंटो

उत्तर :लॉर्ड विल्यम बेटिंग

 20. सन ‘1857 चा उठाव म्हणजे शिपाईची भाऊगर्दी होय’ असे कोणी म्हटले?

 प्रा. न.र. फाटक

 आर.सी. मुजूमदार

 स्वातंत्र्यवीर सावरकर

 डॉ. सेन

उत्तर :प्रा. न.र. फाटक

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरता?

   1) पूर्णविराम    2) अर्धविराम    3) स्वल्पविराम    4) अपूर्ण विराम

उत्तर :- 3

2) ‘सरडयाची धाव कुंपणापर्यंत’ – या वाक्यातील अलंकार ओळखा.

   1) अन्योक्ती    2) चेतनगुणोक्ती    3) स्वभावोक्ती    4) अतिशयोक्ती

उत्तर :- 1

3) ‘धातुसाधित’ यास दुसरे नाव कोणते ?

   1) शुध्द शब्दयोगी  2) शब्द सिध्दी    3) उभयविध धातू    4) कृदंत

उत्तर :- 4

4) घडयाळाने पाच वाजल्याचे दर्शविले’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

   1) अभिधा     2) लक्षणा    3) लाक्षणिक    4) व्यंजना

उत्तर :- 4

5) ‘गाय’ शब्दाशी संबंधित नसलेला शब्द ओळखा :

   1) धेनू      2) गोमाता    3) गो      4) Go

उत्तर :- 4

6) ‘वाघ्या’ या शब्दाच्या विरुध्दलिंगी शब्द ओळखा.

   1) वाघीण    2) वाघी      3) मुरळी      4) मुरळीण

उत्तर :- 3

7) “खाई त्याला खवखवे” या म्हणीशी अर्थाच्या दृष्टीने जास्तीत जास्त जुळणारी म्हण निवडा.

   1) चोराच्या मनात चांदणे      2) उथळ पाण्याला खळखळाट फार
   3) नाचता येईना अंगण वाकडे    4) करावे तसे भरावे

उत्तर :- 1

8) ‘दुर्लक्ष करणे’ या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता ?

   1) कान टोचणे      2) कानाडोळा करणे
   3) कानात तेल घालून झोपणे  4) कानाला खडा लावणे

उत्तर :- 2

9) ‘ज्याला आई, वडिल नाहीत असा असलेला’ या शब्दसमुहासाठी योग्य पर्याय निवडा.

   1) सनाथ    2) दुबळा      3) पोरका    4) वनवासी

उत्तर :- 3

10) व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता, ते लिहा.

   1) दु:दैवी    2) दुदैवी      3) दुर्दैवी      4) दुर्वेवी

उत्तर :- 3

महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली

1) युवा ऑलिम्पीक स्पर्धा 2018 बाबत काय खरे आहे.
   अ) ठिकाण – ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना)  ब) कालावधी – 6 ते 18 ऑक्टोबर 2018
   क) भारतीय संघ ध्वजधारक – मनु भाकर  ड) भारत या स्पर्धेत पदकतालिकेत 17 व्या स्थानावर होता.
  1) अ, क, ड    2) अ, ब, ड    3) अ, ब, क, ड    4) अ, ब, क
उत्तर :- 3

2) इच्छामरणास परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता.
   अ) स्विर्त्झलँड  ब) नेदरलँड    क) न्युझीलँड    ड) आर्यलँड
  1) ब      2) अ      3) ड      4) क
उत्तर :- 1

3) खालील माहितीचा विचार करा.
   अ) कॅनडाचे प्रख्यात गणित तज्ञ डॉ. रॉबर्ट लँगलँड्स यांना गणित क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा अबेल पुरस्कार
         जाहीर करण्यात आला.
   ब) 2003 पासून अँबेल पुरस्काराची सुरूवात झाली.
   क) या पुरस्कारास गणिताचे नोबेल पुरस्कार समजले जाते.
  1) अ, क सत्य    2) अ, ब सत्य    3) अ सत्य    4) अ, ब, क सत्य
उत्तर :- 4

4) पर्यावरणविषयक कामगिरी निर्देशांक 2018 नुसार खालील देशांचा बिनचूक क्रम निवडा.
   अ) स्विर्त्झलँड, फ्रान्स, डेन्मार्क, माल्टा, स्विडन  ब) स्विर्त्झलँड, फ्रान्स, डेन्मार्क, स्विडन, माल्टा
   क) स्विर्त्झलँड, फ्रान्स, माल्टा, स्विडन, डेन्मार्क   ड) स्विर्त्झलँड, फ्रान्स, माल्टा, डेन्मार्क, स्विडन
  1) ड      2) क      3) ब      4) अ
उत्तर :- 4

5) फिनटेक (फायनान्शियल टेक्नॉलॉजी) धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
   1) तामिळनाडू  2) महाराष्ट्र    3) गुजरात    4) यापैकी नाही
उत्तर:- 2

राज्यसभा

हे भारतीय लोकशाहीचे वरचे सभागृह आहे . लोकसभा म्हणजे खालचे प्रतिनिधीमंडळ. राज्यसभेत 245 सदस्य असतात. ज्यामध्ये 12 सभासदांना भारतीय राष्ट्रपती नियुक्त करतात . त्यांना 'नामित सदस्य' म्हणतात. इतर सदस्य निवडले जातात. राज्यसभेवर years वर्षे सभासद निवडले जातात, त्यापैकी एक तृतीयांश दर 2 वर्षांनी सेवानिवृत्त होतात.

कोणत्याही संघीय नियमात, घटनात्मक बंधन असल्यामुळे फेडरल विधानसभेच्या वरच्या भागाला राज्य हितसंबंधांचे फेडरल लेव्हल डिफेन्डर बनविले जाते. राज्यसभेची स्थापना या तत्त्वामुळे झाली आहे. या कारणास्तव, राज्यसभेला संसदेचे दुसरे सभागृह म्हणून स्थापन झालेल्या सदनांची समानता म्हणून पाहिले जाते. लोकसभेने मंजूर केलेल्या प्रस्तावांचा आढावा घेण्यासाठी राज्य सभा स्थापन करण्यात आली आहे. मंत्रिमंडळातील तज्ञांची कमतरतादेखील भरून काढू शकते कारण त्यामध्ये किमान 12 तज्ञ नेमलेले आहेत. राष्ट्रपतींपुढे आणीबाणी लागू करण्याचे सर्व प्रस्ताव राज्यसभेनेदेखील मंजूर केले पाहिजेत. जुलै 2018 पासून राज्यसभेचे खासदार सभागृहात 22 भारतीय भाषांमध्ये भाषणे करू शकतात कारण वरच्या सभागृहात सर्व 22 भारतीय भाषांमध्ये एकाचवेळी भाषांतर केले जाते. 

भारताचे उपराष्ट्रपती (सध्या वैकेय्या नायडू ) राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. राज्यसभेचे पहिले अधिवेशन १ May मे १९५२ रोजी झाले.

जागतिक ब्रिज स्पर्धेत भारताला प्रथमच पदक

⭐️वुहान, चीन येथे झालेल्या जागतिक ब्रिज अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी सीनियर गटात ब्राँझपदकाची कमाई केली.

⭐️प्रथमच भारताने या स्पर्धेत पदकाची कमाई करण्याचा पराक्रम केला.

⭐️ या सीनियर गटात श्रीधरन, सुकमल दास, जितेंद्र सोलानी, दीपक पोद्दार, सुब्रत साहा आणि सुभाष धाक्रस यांचा समावेश होता.

⭐️ही ४४वी ब्रिज अजिंक्यपद स्पर्धा होती. दोन वर्षांपूर्वी भारताने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती.

⭐️यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला होता, पण ब्राँझपदकाच्या झुंजीत नेदरलँड्सला हरवून त्यांनी हे पदक जिंकले.

⭐️यावेळी खुला गट, महिला गट, मिश्र गट आणि सीनियर गट अशा चार गटात भारतीय खेळाडू खेळले.

⭐️या चारही गटासाठी भारत सरकार, क्रीडा प्राधिकरणाने भारतीय खेळाडूंचा संपूर्ण खर्च केला.

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे दि:- 21/10/2019

1. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO कोण आहेत?
-- सत्य नडेला

2. भारताचे राष्ट्रपती कोणत्या दोन देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत?
-- जपान , फिलिपिन्स

3. भारत आणि चीन या देशाची दुसरी अनौपचारिक दुसरी परिषद कोठे पार पडली?
-- तामिळनाडू ( माम्मलापूरम/महाबलीपूरम )

4. जागतिक भूक निर्देशांक 2019 मध्ये भारताचा कितव्या स्थानी आहे?
-- 102 ( एकूण सहभागी देश 117 2006 पासून दरवर्षी जाहीर केला जातो) @TOPPER9

5. लिब्रा हे डिजिटल चलन नुकतेच कोणी जारी केले?
-- फेसबूक

6. 2019 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
-- ( ब्रिटिश लेखिका बर्नाडिन एव्हरिस्टो पहिल्या कृष्णवर्णीय महिला ) ( केनेडीअन लेखिका मार्गारेट अडवूड )

7. देशातील पाहिल्या दृष्टहीन महिला IAS अधिकारी कोण ?
-- प्रांजला पाटील राज्य महाराष्ट्र ( कारभार केरळ मध्ये )

8. 2018 चा साहित्य चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळला आहे?
-- ओल्गो टोकारचुक ( 2018 देश पोलंड ) ( पिटर हांडके 2019 देश ऑस्ट्रिया )

9. वाचन प्रेरणा दिन कोणाच्या जयंती निमित्त साजरा करतात?
-- डॉ .ए.पी.जे.अब्दुल कलाम  15 ऑक्टोबर ( 1998 मध्ये भारतरत्न पुरस्कार )

10. विष्णू भावे पुरस्कार 2019 कोणाला मिळाला आहे?
-- रोहिणी हट्टंगडी

चालू घडामोडी प्रश्नसंच 21/10/2019

📌कोणत्या औषधीनिर्माता कंपनीने औषधी-प्रतिरोधक क्षयरोगावर उपचारांसाठी ‘प्रेटोमनाईड’ हे औषध तयार केले?

(A) सिप्ला
(B) मायलान✅✅✅
(C) सन फार्मास्युटिकल
(D) ल्युपिन

📌‘ईस्टर्न ब्रिज-5’ हा भारत आणि ____ या देशादरम्यानचा संयुक्त हवाई सराव आहे.

(A) ओमान✅✅✅
(B) संयुक्त अरब अमिराती
(C) इस्त्राएल
(D) जापान

📌एस. पी. मुखर्जी यांच्या नावावरून नामकरण करण्यात येणारा चेनानी-नाश्री बोगदा _ या राज्यात आहे.

(A) हिमाचल प्रदेश
(B) जम्मू व काश्मीर✅✅✅
(C) उत्तराखंड
(D) अरुणाचल प्रदेश

📌जागतिक पोलाद संघाच्या (वर्ल्डस्टील) उपाध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली?

(A) टी. व्ही. नरेंद्रन
(B) लक्ष्मी मित्तल
(C) शशी रुईया
(D) सज्जन जिंदल✅✅✅

📌राष्ट्रीय पोषण संस्था (NIN) याचे मुख्य कार्यालय _ येथे आहे.

(A) बेंगळुरू
(B) पुणे
(C) हैदराबाद✅✅✅
(D) नवी दिल्ली

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...