०६ ऑक्टोबर २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘चंद्रोदय’ या जोडशब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा.

   1) आ + उ = ओ    2) द्र + ओ = द्रो   
   3) अ + उ = ओ      4) र + ओ = रो

उत्तर :- 3

2) नामाच्या उपप्रकारांपैकी फक्त ......................... अनेकवचन होते.

   1) विशेषनामाचेच    2) धर्मवाचक नामाचेच 
   3) भाववाचक नामाचेच    4) सामान्य नामाचेच

उत्तर :- 4

3) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – हा माझा वर्गबंधू आहे.

   1) दर्शक सर्वनाम    2) संबंधी सर्वनाम   
   3) आत्मवाचक सर्वनाम    4) पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर :- 1

4) ‘कडक ऊन पडले आहे’ अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.

   1) धातुसाधित      2) संख्यावाचक   
   3) गुणवाचक      4) सार्वनामिक

उत्तर :- 3

5) ‘मला दोन मैल चालवते.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

   1) प्रयोजक क्रियापद    2) संयुक्त क्रियापद   
   3) शक्य क्रियापद    4) अनियमित क्रियापद

उत्तर :- 3

6) पुढील वाक्यातील वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा.

   1) सूर्य पूर्वेस उगवतो    2) तुम्ही पुढे व्हा, मी येतो
   3) मी बसलो तोच तुम्ही हजर  4) गुरुजी आत शाळेत असतील

उत्तर :- 1

7) ‘साखरभात’ या शब्दाचे लिंग कोणते ?

   1) पुल्लिंगी    2) स्त्रीलिंग    3) नपुंसकलिंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

8) योग्य जोडया लावा.

  विभक्ती      कारक

         अ) प्रथमा      1) तुला
         ब) व्दितीया      2) तू
         क) तृतीया      3) तुजहून
         ड) पंचमी      4) तुजशी
  अ  ब  क  ड

         1)  2  1  4  3
         2)  2  1  3  4
         3)  2  3  1  4
         4)  1  2  3  4

उत्तर :- 1

9) ‘तू माझे ऐकलेस हे बरे झाले’ – वाक्याचा प्रकार ओळखा.

   1) प्रधान वाक्य    2) गौण वाक्य    3) मिश्र वाक्य    4) संयुक्त वाक्य

उत्तर :- 3

10) ‘मग त्यावर आकाशातल्या पणत्या तेवत असतात.’ – वरील वाक्यातील विधेय विस्तार सांगा.

   1) आकाशातल्या    2) पणत्या    3) मग त्यावर    4) तेवत असतात

उत्तर :- 3

०५ ऑक्टोबर २०१९

विद्युत चुंबकीय बल (Electromagnetic Force) :

· सामान्य पदार्थातील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवणार्याप बलास 'विद्युत चुंबकीय बल' असे म्हणतात.

· विधूतचुंबकीय बल गुरुत्वबलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे. उदा. हायड्रोजनच्या अनुमधील इलेक्ट्रॉन व प्रोटॉनमधील विधुत चुंबकीय बल जवळजवळ 10-7N असते.

इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्यावर प्रयुक्त गुरुत्वबल क्रमश: जवळपास 10-41N आणि 10-34N एवढे असते.

· विधुतचुंबकीय बलामुळेच नुकत्याच वापरलेल्या कंगव्याने कागदाचे बारीक कपटे ओढले जातात.

· लोखंडी खिळ्यावर लोहचुंबकामुळे प्रयुक्त झालेले बल हा विधुतचुंबकीय बलाचा प्रकार आहे.

· आपण निसर्गातील जी बहुतांश बले अनुभवतो, ती विधुत चुंबकीय बलेच असतात.

· धनप्रभारीत आणि ऋणप्रभारीत असे दोन प्रकारचे कण विधूतचुंबकीय बलात भाग घेतात.

· स्थिर विधुतकण गतीमान असतील तरच चुंबकीयबल प्रयुक्त होते. विधुतचुंबकीय बल आकर्षणबल किंवा प्रतिकर्षणबल असे शकते.

· अनुमधील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्यातील परस्पर आकर्षणाला कारणीभूत बल हे विधूतचुंबकीय बलच असते. त्यामुळे अणूंचे अस्तित्व टिकून असते.

· गुरुत्वबल आणि विधुतचुंबकीय बल ही दोन्ही बले दोन वस्तु बऱ्याच अंतरावर असतानासुद्धा कार्यरत असतात. या दोन्ही बलांना दीर्घमर्यादा क्षेत्र असलेली किंवा लांब पल्ल्याची बले असे म्हणतात.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌चीनच्या “DF-41” संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?

I) “DF-41” म्हणजे डॉन्कफेन्क-41 होय.

II) “DF-41” हे पृथ्वीवरचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते.

(A) केवळ I✅✅✅
(B) केवळ II
(C) केवळ I आणि II
(D) सर्व बरोबर आहेत

📌सन 2020 मध्ये लखनऊमध्ये पहिल्यांदाच भरविण्यात येणार्‍या 11व्या ‘डिफेंस एक्सपो’ची संकल्पना काय आहे?

(A) इंडिया: द एमर्जिंग डिफेंस
मॅन्युफॅक्चरींग हब ✅✅✅

(B) इंडिया: द एमर्जिंग केस फॉर फ डिफेंस

(C) इंडिया: कनेक्टिंग द डिफेंस कम्युनिटी वीथ इनसाइट, इंटेलिजेंस अँड ऑपर्चुनिटीज

(D) इंडिया: द केस फॉर द डिफेंस इनोव्हेशन


📌‘बेस्ट लर्निंग अँड शेअरींग स्पेस अवॉर्ड 2019’ जिंकलेल्या राज्याचे नाव काय आहे?

(A) मिझोरम
(B) जम्मू व काश्मीर✅✅✅
(C) केरळ
(D) महाराष्ट्र

📌“इंडिया अँड द नेदरलँड्स - पास्ट, प्रेझेंट अँड फ्यूचर” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) विलियम-अलेक्झांडर
(B) सौरभ कुमार
(C) मार्टेन व्हॅन डेन बर्ग
(D) वेणू राजामोनी✅✅✅

📌महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कोणत्या देशाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले?

(A) संयुक्त राज्ये अमेरिका
(B) पॅलेस्टाईन✅✅✅
(C) मॉरिशस
(D) दक्षिण आफ्रिका

📌पंजाब नॅशनल बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे?

(A) सुनील मेहता
(B) सुशीलचंद्र मिश्रा
(C) सुनील मिश्रा
(D) एस. एस. मल्लिकार्जुन राव✅✅✅

📌स्टेशन स्वच्छता सर्वेक्षणाच्या अहवालासंदर्भात खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान अचूक आहे ते ओळखा.

I) जयपूर, जोधपूर आणि विजयवाडा ही तीन सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानके आहेत.

II) अंधेरी, विरार आणि नायगाव रेल्वे स्थानके ही 109 उपनगरी स्थानकांपैकी अव्वल ठरलेली तीन स्थानके आहेत.

(A) केवळ I
(B) केवळ II✅✅✅
(C) केवळ I आणि II
(D) एकही नाही

📌महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते _ मूल्य असलेले एक स्मारक नाणे जाहीर करण्यात आले.

(A) रु. 100
(B) रु. 50
(C) रु. 150✅✅✅
(D) रु. 200

📌पान मसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालणार्‍या राज्य सरकारचे नाव ओळखा.

(A) ओडिशा
(B) तामिळनाडू
(C) राजस्थान✅✅✅
(D) पश्चिम बंगाल

1st- महाराष्ट्र
2nd-बिहार
3rd- राजस्थान

बंगालची फाळणी (1905)

📌.    लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली. 

📌.   बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळकम बिपीनचंद्र पाल व लाला लजपतराय यांनी रान उठविले. 

📌.  बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले. 

📌.  आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली. 

📌.  टिळकांनी यालाच चतु:सूत्री असे नाव दिले. 

📌. सन 1905 ते 1920 नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.

जीडीपी वृद्धीदरात पुन्हा घटीचे अनुमान : आरबीआय

चालू आर्थिक वर्षातील आर्थिक वृद्धी दर (जीडीपी)पूर्वी निश्चित केलेल्या 6.9 टक्क्याहून दरात कपात करुन 6.1 टक्क्यांपर्यंत कमी  होण्याचे अनुमान रिझर्व्ह बँकेने (आरबीआय)  नोंदवले आहे.

- या आर्थिक वर्षात 7.1 टक्के ठेवलेला होता. परंतु देशातील मंदीच्या फटक्यामुळे आलेल्या आर्थिक मरगळीतून सावरण्यासाठी सरकार वेगवेगळय़ा उपाय योजना करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

- उद्योगासह अन्य क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार योग्य पावले उचलत आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील उत्पादन वाढ ,उत्पादन मागणीस येणारी तेजी आणि कृषी क्षेत्रातील  सुधारणा व रोजगारसह उत्पादन क्षेत्राला गती प्राप्त होणार असल्याचे अनुमान आरबीआयने मांडले आहे

रोहित शर्मा नवा सिक्सरकिंग २५ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला

◾️टीम इंडियाचा 'हिटमॅन' अशी ओळख असलेल्या यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी षटकारांच्या नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.

◾️ रोहित शर्माने आता कसोटी, वन डे आणि टी-२० या तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम केला.

◾️रोहित शर्माने २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या एका वन डे सामन्यात १६ षटकार ठोकले होते. त्यानंतर त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना टी-२० सामन्यात एकूण १० षटकार ठोकले होते.

◾️तर रोहित शर्माने सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आतापर्यंत १० षटकार ठोकले आहेत

◾️याप्रकारे रोहित शर्माने भारताकडून खेळताना तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकणार तो एकमेव खेळाडू बनला आहे.

◾️ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने आतापर्यंत ४ षटकार ठोकले आहेत.

◾️याबरोबरच तो एका कसोटी सामन्यात भारताकडून सर्वाधिक १० षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे.

◾️याआधी हा विक्रम भारताचा माजी सलामीवीर फलंदाज नवज्योत सिंह सिद्धूच्या नावावर होता.

◾️ सिद्धूने १९९४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना एका डावात ८ षटकार ठोकले होते.

◾️याप्रमाणे रोहित शर्माने नवजोत सिंह सिद्धूचा २५ वर्षापूर्वीचा विक्रम मोडित काढला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चीन मिसाईलचे आज अनावरण

✍चीनमध्ये आज राष्ट्रीय दिवस साजरा केला जाणार  आहे. या निमित्त चीन ताकदीचे प्रदर्शन करणार आहे.

✍तर रस्त्यांवर 15 हजार जवान आणि अनेक अत्याधुनिक शस्त्रात्रांचे प्रदर्शन होणार आहे.

✍तसेच यामध्ये असेही एक मिसाईल आहे जे अमेरिकेच्या उरात धडकी भरवू शकते. चीन ते अमेरिका हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करू शकण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. याशिवाय अन्य काही शस्त्रास्त्रे आहेत जी याआधी दाखविण्यात आली नव्हती.

✍Dongfeng-17 एक लघू मध्यम पल्ल्याचे मिसाईल आहे जे हाइपरसोनिक ग्‍लाइड व्हेईकल लाँच करू शकते. हे मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने अंतर कापते. एवढेच नाही तर हे मिसाईल अमेरिकेच्या सुरक्षा प्रणाली
शिल्ड मिसाईलला भेदण्याची क्षमता ठेवते.

✍उड्डान करताना हे मिसाईल त्याच्या लक्ष्यानुसार उंची कमी किंवा जास्त करू शकते. याशिवाय हे मिसाईल आण्विक हत्यारांशिवाय कव्हेंशन वायरहेड नेण्यासही सक्षम आहे.

✍2017 मध्ये या मिसाईलची चाचणी झाली होती. या मिसाईलने पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाऊन पुन्हा कक्षेत येण्याचा विक्रम केला होता.

✍तर मिसाईलचे पूर्ण नाव Dongfeng-41 आहे. ही आयसीबीएम मिसाईल पहिल्यांदाच परेडमध्ये भाग घेणार आहे. ही मिसाईल 10 मॅकच्या वेगाने उड्डाण करते. या मिसाईलची रेंज 7500 मैल असून जगातील कोणत्याही भागात काही मिनिटांत हल्ला चढवू शकते.

✍या मिसाईलमुळे चीन अमेरिकेवर केवळ 20 मिनिटांत हल्ला करू शकते. महत्वाचे म्हणजे एका वेळी ही मिसाईल 10 लक्ष्यांचा भेद करण्यास सक्षम आहे.

✍तसेच अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. अमेरिका आणि रशियाकडेही अशा प्रकारची मिसाईल आहे. तसेच रडारलाही ही मिसाईल सापडत नाही. या मिसाईलमुळे चीनला वेगवेगळ्या ठिकाणी मिसाईल तैनात करण्यापासून मुक्ती मिळाली आहे.

✍विमान दिसायला साध्या प्रवासी विमानासारखे आहे. मात्र, या विमानातून लांबच्या ठिकाणी बॉम्बवर्षाव करता येतो. नॅशनल डे परेडच्या रिहर्सलवेळी हे विमान दिसले आहे. सहा विमानांनी आकाशात कसरती केल्या होत्या. या वेळी या विमानांना KD-20/CJ-10K आणि KD-63 क्रूझ मिसाईल लावलेली होती. हे विमान हवेतल्या हवेत इंधन भरू शकते.

प्रश्नसंच 5/10/2019

[प्र.१] सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे?

१] पंजाब ✅
२] जम्मू काश्मीर
३] हिमाचल प्रदेश
४] उत्तराखंड

------------------------------------------------------------

[प्र.२] कोणत्या नदीच्या वायव्येस पंजाब हिमालय पसरला आहे?

१] सिंधू
२] सतलज ✅
३] चिनाब
४] रावी

----------------------------------------------------------

[प्र.३] हेमवती, सिरपा, लोकपावनी, सुवर्णावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

१] कावेरी ✅
२] कृष्णा
३] गोदावरी
४] इरावती

------------------------------------------------------------

[प्र.४] जारवा हि जमात कोठे आढळते?

१] निकोबार
२] छोटे अंदमान ✅
३] अरुणाचल प्रदेश
४] लक्षद्वीप

------------------------------------------------------------

[प्र.५] खालील नद्यांचे खोरे त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा.
अ] गंगा नदी खोरे
ब] महानदी खोरे
क] कृष्णा नदी खोरे
ड] नर्मदा नदी खोरे

पर्याय
१] अ-ब-क-ड
२] अ-क-ब-ड ✅
३] अ-क-ड-
४] ड-ब-क-अ

-------------------------------------------------------------

[प्र.६] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ] ऑस्ट्रेलियाकडून भारताला खाद्यतेलाची आयात करावी लागते.
ब] महाराष्ट्र व पश्चिम बंगाल हे वृत्तपत्रांच्या कागद निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य ✅
४] दोन्ही अयोग्य

------------------------------------------------------

[प्र.७] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ] रावतभाटा हा औष्णिक विद्युत प्रकल्प राजस्थान राज्यात आहे.
ब] कुदनकुलम प्रकल्पाला अमेरिकेचे सहाय्य लाभले आहे.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य ✅

----------------------------------------------------------

[प्र.८] खालीलपैकी कोणते वृक्ष हिमालयात आढळत नाहीत?
अ] फर
ब] महोगनी
क] स्प्रुस

१] फक्त अ
२] फक्त ब ✅
३] फक्त क
४] वरील सर्व

-----------------------------------------------------------

[प्र.९] कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या वनांशी संबंधित आहे?
१] उष्णकटिबंधीय आर्द्र वने
२] उष्ण निम वाळवंटी वने
३] उष्णकटिबंधीय शुष्क वने
४] उष्णकटिबंधीय उपआर्द्र वने ✅

----------------------------------------------------------

[प्र.१०] उष्णप्रदेशीय पानझडी वनांच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.
अ] या वनांत साग, साल, पळस हे वृक्ष आढळतात.
ब] २०० सेमी पर्यंत पाउस पडतो.
क] यांना "मौसमी वने" असेही म्हणतात.
ड] जहाजबांधणीसाठी यांचा उपयोग होतो.

१] अ अयोग्य
२] ब अयोग्य
३] अ, ब आणि क अयोग्य
४] वरीलपैकी एकही नाही ✅

------------------------------------------------------------

जागतिक अंतराळ सप्ताह २०१९

जगभरात दि. ४ ते १०  ऑक्टोबर या काळात ‘जागतिक अंतराळ सप्ताह’चे आयोजन केले जाते.

२०१९  संकल्पना : “द मून: गेटवे टू द स्टार्स”

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) कर्नाटक राज्यामधल्या सात शैक्षणिक संस्थांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांपर्यंत खगोलशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या फायद्यांविषयी माहिती आणि ज्ञान पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, उपग्रहांचे नमुने, चित्रफिती आणि भारतीय अंतराळ मोहिमांविषयी चर्चा अश्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

▪️पार्श्वभूमी

दि. 4 ऑक्टोबर 1957 या तारखेला सोव्हिएत संघाकडून ‘स्पुतनिक 1’ नावाचा कृत्रिम उपग्रह सर्वप्रथम प्रक्षेपित करण्यात आला होता, तर 10 ऑक्टोबर 1967 रोजी सर्व देशांनी एकत्र येऊन अंतराळनिगडित विविध विषयांवर जागतिक करार (Outer Space Treaty) केला. अंतराळाचा मानवाच्या कल्याणासाठी, मानवाचे जीवन सुखकारक करण्यासाठी वापर करावा, हा उद्देश यामागे होता.

त्यामुळे या दोन्ही तारखांचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 4 ते 10 ऑक्टोबर या काळात जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करण्याचे घोषित केले. सन 1999 पासून भारतासह जगातल्या विविध 70 देशांमध्ये अंतराळ सप्ताह साजरा करण्यात येतो.
—————————————————————--

नेहरु ते मोदी.. जाणून घ्या भारताच्या पंतप्रधानांच शिक्षण

📚भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत या देशाला १४ पंतप्रधान लाभले आहेत. भारतीय पंतप्रधानपदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. केवळ भारतीय नागरिकत्व आणि लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य असणे, या दोन अटींची पूर्तता भारतीय पंतप्रधानांना करावी लागते. आजवर हे पद अनेक मान्यवरांनी भूषविले आहे. भारतीय पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेचा घेतलेला हा आढावा.

👇👇👇👇

1) पंडीत जवाहरलाल नेहरू – जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी १६ वर्षे, २८६ दिवस या पदाचा कारभार सांभाळला. माजी पंतप्रधान नेहरू यांनी त्यांचे सुरूवातीचे शिक्षण भारतात घेतले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी लंडनच्या हॅरो येथे गेले. या दरम्यानच्या काळात त्यांनी ट्रिनिटी महाविद्यालय आणि केंब्रिज विद्यापीठातून मूलभूत विज्ञानाचे शिक्षण घेतले. याशिवाय, त्यांनी इनर टेम्पल या संस्थेतून कायद्याचे शिक्षणही घेतले होते.

2) लाल बहादूर शास्त्री – भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. शास्त्री यांचे माध्यमिक शिक्षण सुरू असतानाच महात्मा गांधींनी देशातील विद्यार्थ्यांना सरकारी शाळा सोडण्याचे आवाहन केले. त्यानंतर देशप्रेमाने प्रेरित झालेल्या लाल बहादूर शास्त्री यांनी असहकार चळवळीत भाग घेतला. त्यानंतरच्या काळात वाराणसीच्या काशी विद्यापीठाने त्यांना शास्त्री ही पदवी बहाल केली.

3) इंदिरा गांधी – भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधी यांनी १९८० पासून सलग तीन टर्म पंतप्रधानपद भूषविले. पंतप्रधानपदाची चौथी टर्म सुरू असताना त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांनी इकोले नोउवेले, बेक्स, इकोले इंटरनॅशनल, जिनिव्हा, प्युपिलस ओन स्कूल, पुना अँड बॉम्बे, बॅडमिंटन स्कूल, ब्रिस्टॉल, विश्व भारती, शांतिनिकेतन, कोलंबिया विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतले होते.

  4) मोरारजी देसाई – स्वतंत्र भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सेंट बुसार हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबईच्या विल्सन सिव्हिल सर्व्हिसमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले.

5) चरण सिंग – चरण सिंग फक्त १७० दिवस भारताचे पंतप्रधान होते. त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आग्रा विद्यापीठातून घेतले. त्यानंतर काही काळ चरण सिंग यांनी गाझियाबादमध्ये वकिलीही केली होती

6) राजीव गांधी – इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्याकडे देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे आली. ते भारताचे सर्वात तरूण पंतप्रधान ठरले. राजीव गांधी यांनी वेलहॅम बॉईज स्कूल आणि डून स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ट्रिनिटी महाविद्यालय, केंब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठातूनही त्यांनी शिक्षण घेतले. याशिवाय, लंडनच्या इम्पिरिअल महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

7) व्ही.पी. सिंह – विश्वनाथ प्रताप सिंह यांनी २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० या काळात देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. त्यांनी अलाहाबाद व पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले होते.

8) चंद्र शेखर – भारताचे आठवे पंतप्रधान असलेले चंद्रशेखर यांचा कार्यकाळही वर्षापेक्षा कमी राहिला. तरूण वयातच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. उत्तर प्रदेशच्या सतिशचंद्र महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले.

9) पीव्ही नरसिंह राव– भारतीय अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवणाऱ्या पी व्ही नरसिंह राव १९९१ ते १९९६ या काळात देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी आंध्र प्रदेशमधील एका लहानशा खेड्यात शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उस्मानिया विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली. यानंतर नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयातून त्यांनी कायद्यातील मास्टर्सची पदवी संपादन केली

10) अटलबिहारी वाजपेयी– अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या १३ दिवसांमध्ये सत्ता सोडली होती. त्यानंतर १९९८ मध्ये ते पुन्हा सत्तेत आले आणि त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी ग्वाल्हेर व्हिक्टोरिया महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत विशेष प्राविण्य मिळवले. त्यानंतर कानपूरच्या डीएव्ही महाविद्यालयातून वाजपेयी यांनी राज्यशास्त्र विषय घेऊन एम.ए.ची पदवी मिळवली.

11) एच. डी. देवेगौडा– भारताचे ११ वे पंतप्रधान असलेले एच. डी. देवेगौडा यांनी कर्नाटकमधील एल. व्ही. पॉलिटेक्निक महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

12) इंद्रकुमार गुजराल– भारताचे १२ वे पंतप्रधान असलेले इंद्रकुमार गुजराल उच्चविद्याविभूषित होते. त्यांनी बी.कॉम., एम.ए., पीएचडी आणि डिलिट या शैक्षणिक पदव्या मिळवल्या होत्या.

13) डॉ. मनमोहन सिंग– भारताला लाभलेल्या विद्वान राजकारण्यांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांची वर्णी लागते. त्यांनी पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यूफिल्ड महाविद्यालयातून मनमोहन सिंग यांनी अर्थशास्त्रातील पदवी आणि डी. फिलपर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीसह पूर्ण केले.

14) नरेंद्र मोदी– भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी अनेक वाद असले तरी त्यांनी दिल्ली विद्यापीठातून मुक्त शिक्षण पद्धतीने कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर गुजरात विद्यापीठातून मोदींनी राज्यशास्त्र हा विषय करून मास्टर्स पदवीही मिळवली.



संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालील विधानातील ‘उद्देश्य’ कोणते ओळखा.

     मला आपल्यासमोर चार शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही.
   1) भाषण    2) समोर      3) अधिक    4) करवत नाही

उत्तर :- 1

2) आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे हे ................ या प्रयोगातील वाक्य आहे.

   1) कर्मणी    2) कर्तरी      3) संकरित    4) भावे

उत्तर :- 4

3) पुढील समास कोणत्या प्रकारचा आहे ? – पुरणपोळी

   1) मध्यमपदलोपी समास      2) तत्पुरुष समास 
   3) अव्ययीभाव समास      4) व्दंव्द समास

उत्तर :- 1

4) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

   1) अर्धविराम    2) स्वल्पविराम    3) संयोगचिन्ह    4) अपूर्णविराम

उत्तर :- 4

5) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’
     या काव्य ओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे ?

   1) उपमा    2) रूपक      3) उत्प्रेक्षा    4) अनन्वय

उत्तर :- 3

6) पुढीलपैकी ‘अभ्यस्त’ शब्द कोणता?

   1) दररोज    2) रात्रंदिवस    3) अभ्यास    4) यापैकी कोणताही नाही

उत्तर :- 4

7) ‘ढळला रे ढळला दिन सख्या, संध्या भिवविती हदया’ या काव्यपंक्तीतील ‘दिन ढळला’ या शब्दसमूहाचा ध्वन्यार्थ सांगा.

   1) दिवस मावळला  2) सूर्य बुडाला    3) आयुष्य संपत आले  4) दिवस संपला

उत्तर :- 3

8) खालील शब्दांपैकी विसंगत शब्द कोणता ?

   1) वाट      2) पंथ      3) रस्ता      4) पथ

उत्तर :- 2

9) ‘नैसर्गिक’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.

   1) प्राकृतिक    2) स्वाभाविक    3) कृत्रिम      4) सृष्टी

उत्तर :- 3

10) ‘बादरायण संबंध असणे’ चा योग्य अर्थ निवडा.

   1) घनिष्ठ मैत्री असणे      2) दुरान्वयाने संबंध असणे
   3) ओढून ताणून संबंध  लावणे    4) शत्रूत्व असणे

उत्तर :- 3

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...