१२ सप्टेंबर २०१९

न्युझीलंड मध्ये जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर


✍  न्युझीलंडचे अर्थमंत्री ग्रांट रॅाबर्टसन यांनी ३० मे २०१९ रोजी गरीबी, मानसिक आरोग्य, घरगुती हिंसा यासारख्या वाईट प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर केला.

✍ न्युझीलंड सरकाने हा अर्थसंकल्प देशातील असमानता, गरीबी या आव्हांनाचा सामना करण्यासाठी सादर केला आहे.

✍ या अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक विकास दराला प्राधान्य न देता जनतेच्या कल्याणासाठी प्रधान्य देण्याचे उद्दिष्टे समोर ठेवले आहे.

✍ आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते न्युझीलंडचा आर्थिक विकास दर २०१९ मध्ये २.५% वरून २०२० मध्ये २.९%पर्यंत वाढू शकेल असा अंदाज आहे

✍ न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच मानसिक आरोग्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी १.९ अब्ज न्युझीलंड डॉलर एवढा निधी राखून ठेवण्यात आला.

✍ या अगोदर भूतान या देशाने जगात प्रथमच आनंद निर्देशांक (Happiness Index) ही संकल्पना मांडली होती.

✍ याआधारे देशातील किती लोक समाधानाने आयुष्य जगू शकता याचे मापन करण्याचा प्रयत्न प्रथमच करण्यात आला होता.

✍  यासाठी २००८ मध्ये नागरिकांच्या आनदांचे मापन करण्यासाठी भूतान ने ग्राॅस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

✍  त्यानंतर न्युझीलंडने प्रथमच आपल्या अर्थसंकल्पात मोठा वाटा जनतेच्या आंनद आणि कल्याणकारी साठी राखून ठेवण्यचा निर्णय घेतला आहे.

नासा- इस्रोच्या सौरमाला मोहिमेचा प्रस्ताव

✍चांद्रयान २ मोहिमेतून अमेरिकेच्या नासा या अवकाश संस्थेलाही प्रेरणा मिळाली आहे. यापुढे इस्रोसमवेत सौर मालेचे संशोधन करण्यासाठी संयुक्त संशोधन मोहिमा राबवण्यास आम्ही तयार आहोत, असे नासाने स्पष्ट केले.

✍चांद्रयान २  या मोहिमेत भारताने केलेल्या कामगिरीचे नासाने कौतुक करताना म्हटले आहे,की अवकाश मोहिमा कठीणच असतात. चांद्रयान २ मोहिमेत यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते पण त्यात अपयश आले असले तरी जो टप्पा गाठला गेला तेही काही कमी महत्त्वाचे नाही.

✍ट्रम्प प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकारी अलाइस जी वेल्स यांनी  सांगितले, की चांद्रयान २ मोहिमेत इस्रोने केलेले प्रयत्न हे मोलाचे आहेत. त्यासाठी इस्रोचे आम्ही अभिनंदन करतो. भारतासाठी हे मोठे पाऊल आहे. वैज्ञानिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली बरीच माहिती यातून निर्माण होणार आहे. भारत त्याच्या आशाआकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे.

✍नासाचे माजी अवकाशवीर जेरी लिनेन्गर यांनी असे म्हटले आहे, की भारताने चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा केलेला प्रयत्न महत्त्वाचा होता. त्यात अपयश आले असले तरी या अनुभवाचा फायदा पुढील मोहिमात होणार आहे, त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. भारताने अतिशय अवघड अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. लँडर चांद्रभूमीवर उतरत असताना सुरूवातीला सर्व काही व्यवस्थित पार पडले पण नंतर ते नियंत्रणाबाहेर गेले असावे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

पर्यटकांसाठी कोलंबोत ‘नव्या दुबई’ची उभारणी.

✍ जगभरातील पर्यटक आणि उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी कोलंबोत थेट समुद्रात तब्बल २६९ हेक्टरवर दुबईच्या धर्तीवर नवीन ‘पोर्ट सिटी’ उभारण्याची झेप या देशाने घेतली आहे.

✍या नव्या शहरात मुंबईप्रमाणेच वित्तीय केंद्र उभारण्यात येणार असून पाच वर्षांत या देशाचा चेहरा आणि आर्थिक स्थितीही बदललेली असेल, असा दावा केला जात आहे.

✍देशाच्या आर्थिक राजधानीला-कोलंबो शहराला लागूनच असलेल्या समुद्रात तब्बल २६९ हेक्टर जागेवर भराव टाकून सिंगापूर, हाँगकाँग, दुबईप्रमाणेच दक्षिण आशियातील सर्वात मोठी अशी पोर्ट सिटी निर्माण केली जात आहे

✍चीनची चायना हार्बर इंजिनीअरिंग कंपनी या पोर्ट सिटीची उभारणी करीत असून त्यापैकी १६९ हेक्टर जमीन या कंपनीला दिली जाणार आहे.

✍विशेष म्हणजे या शहराच्या उभारणीसाठी श्रीलंका सरकारने स्वतंत्र कायदा करीत पोर्ट सिटीच्या उभारणीत पर्यावरण किंवा अन्य कोणत्याही कायद्याचा अडथळा येणार नाही याची खबरदारी घेतली असून पुढील २० वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

✍या ठिकाणी देश-विदेशातील कंपन्यांना उद्योग उभारण्यासाठी आमंत्रित करण्यात येत असून त्यांना ९९ वर्षांच्या कराराने भाडेपट्टय़ाने जमीन दिली जाणार आहे.

✍या प्रकल्पामुळे श्रीलंकेचा भौगोलिक आणि वित्तीय चेहराही बदलणार असून लवकरच जागतिक नकाशावर देशाची नवी ओळख निर्माण होईल, असा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला.

✍पुढील २० वर्षांत श्रीलंकेमध्ये कोलंबो शहराला लागूनच असलेल्या समुद्रात तब्बल २६९ हेक्टर जागेवर भराव टाकून

✍दक्षिण आशियातील सर्वात मोठी अशी पोर्ट सिटी विकसित केली जात आहे.

✍ यात जागतिक दर्जाचे व्यापार केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य, शिक्षणसंस्था, मरिना पार्क, पंचतारांकित हॉटेलसह ११० एकरमध्ये पब्लिक पार्क, ३०० एकरमध्ये वॉटर स्पोर्ट्स आणि मनोरंजन पार्क, रिसॉर्ट उभारण्यात येणार आहेत.

✍या ठिकाणी जगभरातील किमान ५०० कंपन्या येतील आणि त्यातून देशातील लोकांसाठी ८० हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

गोव्याच्या प्रियव्रत पाटीलने रचला इतिहास; सोळाव्या वर्षी 'महापरीक्षा' उत्तीर्ण


🅾पणजी : दक्षिण गोव्यातील रिवण येथील 16 वर्षीय प्रियव्रत पाटीलने सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होत इतिहास रचला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी प्रियव्रतने तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये यश मिळवलं आणि सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं ट्विटरद्वारे अभिनंदन करत पाठ थोपटली आहे.

🅾तेनाली परीक्षेचे 14 स्तर असतात आणि वर्षातून दोन वेळा ही परीक्षा होते. जे विद्यार्थी शास्त्रांचं शिक्षण घेतात त्यांच्यासाठी ही परीक्षा महत्वपूर्ण असते. "प्रियव्रतने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन. त्याने मिळवलेलं यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल", असं ट्वीट करत मोदींनी प्रियव्रतच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

🅾"काल श्रीमती अपर्णा आणि श्री देवदत्ता पाटील यांच्या 16 वर्षांच्या मुलाने इतिहास रचला. आपल्या वडिलांकडून वेद व न्यायाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्याने सर्व व्याकरण महाग्रंथांचं श्री मोहन शर्मा यांच्याकडून शिक्षण घेतलं. यासोबतच तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये घवघवीत यश मिळवून सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होण्याचा मान त्याने मिळवला", असं ट्वीट चामू कृष्णाशास्त्री यांनी करुन पंतप्रधान मोदींना त्यात टॅग केल होतं. त्याला उत्तर देताना पंतप्रधानांनी प्रियव्रत पाटीलचं अभिनंदन केलं.

राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धा - नेमबाज मेहुली घोषला दुहेरी विजेतेपद


✍नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मेहुली घोष हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातही बाजी मारत राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

✍अनहद जावंडा आणि पारुल कुमार यांनी अनुक्रमे पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात आणि ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराचे विजेतेपद मिळवले. डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत मेहुलीने महिलांच्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवले.

✍तिने १० मीटर एअर रायफलमध्ये मध्य प्रदेशच्या श्रेया अगरवाल हिच्यावर मात करत २५२ गुणांनिशी विजेतेपद संपादन केले. श्रेयाला २५१.२ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली राजस्थानची अपूर्वी चंडेला २२९.३ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली.

✍कनिष्ठ गटात, मेहूलीने पंजाबच्या खुशी सैनी हिचे आव्हान मोडीत काढत २५२.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. खुशीने २४८.८ गुणांसह रौप्यपदक प्राप्त केले. मध्य प्रदेशची मानसी कठैत २२७.५ गुणांसह तिसरी आली. अनहद याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात ऑलिम्पियन गुरप्रीत सिंग याला मागे टाकत सुवर्णपदक मिळवले. केरळचा थॉमस जॉर्ज तिसरा आला.

WEFच्या प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत 34 व्या क्रमांकावर


जागतिक आर्थिक मंचाने (WEF) त्याचा ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल’ प्रसिद्ध केला आहे, ज्यात जागतिक पातळीवर पर्यटनासंबंधीची 140 देशांची क्षमता नमूद करण्यात आली आहे.

अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत भारत आपल्या समृद्ध नैसर्गिक आणि सांस्कृतिक संसाधनांमुळे सहा जागांची उडी घेत 34 व्या क्रमांकावर आला आहे.

*मुख्य बाबी*

भारत यादीतल्या अव्वल 35 देशांमध्ये असणारा एकमेव अल्प-मध्यम उत्पन्न असलेला देश आहे. हवाई पायाभूत सुविधा (33) आणि भू आणि बंदरे पायाभूत सुविधा (28), आंतरराष्ट्रीय मुक्तता (51), नैसर्गिक (14) आणि सांस्कृतिक संसाधने (8) या घटकांच्या बाबतीत भारताने चांगली प्रगती दर्शविलेली आहे.

यादीत स्पेन हा देश अव्वल स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ फ्रान्स, जर्मनी आणि जापान या देशांचा क्रमांक लागतो आहे.

या वर्षीच्या क्रमवारीत आशिया-प्रशांत क्षेत्र प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता या बाबतीत सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या क्षेत्रापैकी एक होता.

जापान हे देश आशियातली सर्वाधिक स्पर्धात्मक प्रवास व पर्यटन अर्थव्यवस्था ठरली असून त्याचा जगभरात चौथा क्रमांक लागतो आहे.

*WEF बाबत*

जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum) हे एक स्विस ना-नफा प्रतिष्ठान आहे.

याचे संस्थापक क्लाउस श्वाब यांनी सन 1971 मध्ये युरोपियन मॅनेजमेंट फोरम या नावाने स्थापना केली.

याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वीत्झर्लंड येथे आहे.

ही सार्वजनिक-खासगी सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून स्विस प्रशासनाकडून मान्य करण्यात आलेली आहे.

ईस्टर संडे’च्या धक्क्यातून सावरत श्रीलंकेची नवी झेप


✍‘ईस्टर संडे’ला म्हणजेच २१ एप्रिल रोजी तीनशेहून अधिक निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटाच्या धक्क्यातून सावरलेली श्रीलंका अवघ्या चार महिन्यांत पूर्वपदावर आली आहे. एवढेच नव्हे, तर ‘युद्धाचा देश’ अशा प्रतिमेच्या पलीकडे जात जगभरातील पर्यटक आणि उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी कोलंबोत थेट समुद्रात तब्बल २६९ हेक्टरवर दुबईच्या धर्तीवर नवीन ‘पोर्ट सिटी’ उभारण्याची झेप या देशाने घेतली आहे.

✍या नव्या शहरात मुंबईप्रमाणेच वित्तीय केंद्र उभारण्यात येणार असून पाच वर्षांत या देशाचा चेहरा आणि आर्थिक स्थितीही बदललेली असेल, असा दावा केला जात आहे.

✍दोन ते तीन दशके लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम( एलटीटीई) सोबत चाललेला रक्तरंजित संघर्ष मार्च २००९मध्ये संपुष्टात आल्यानंतर गेल्या काही वर्षांत जनजीवन पूर्वपदावर आले होते. मात्र २१ एप्रिल रोजी ईस्टर संडेला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेने श्रीलंका पुन्हा हादरून गेला. मात्र या हल्ल्यातून सावरून या देशाने केवळ चार महिन्यांत बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांना धडा शिकवीत देशातील परिस्थितीही पूर्वपदावर आणली आहे. एवढेच नव्हे तर आर्थिक पातळीवर देशाला भक्कम करण्यासाठी तेथील सरकारने एक नवा प्रयोग हाती घेतला आहे.

✍देशाच्या आर्थिक राजधानीला-कोलंबो शहराला लागूनच असलेल्या समुद्रात तब्बल २६९ हेक्टर जागेवर भराव टाकून सिंगापूर, हाँगकाँग, दुबईप्रमाणेच दक्षिण आशियातील सर्वात मोठी अशी पोर्ट सिटी निर्माण केली जात आहे. चीनची चायना हार्बर इंजिनीअरिंग कंपनी या पोर्ट सिटीची उभारणी करीत असून त्यापैकी १६९ हेक्टर जमीन या कंपनीला दिली जाणार आहे.

✍विशेष म्हणजे या शहराच्या उभारणीसाठी श्रीलंका सरकारने स्वतंत्र कायदा करीत पोर्ट सिटीच्या उभारणीत पर्यावरण किंवा अन्य कोणत्याही कायद्याचा अडथळा येणार नाही याची खबरदारी घेतली असून पुढील २० वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘माझा भाऊ आनंदाने रसगुल्ले खातो’ या वाक्यातील उद्देश्यविस्तार ओळखा.

   1) रसगुल्ले    2) माझा      3) भाऊ      4) आनंदाने

उत्तर :- 2

2) ‘राणी प्रधानाला बोलावतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) कर्मणी    3) भावे      4) प्रधानकर्तृक

उत्तर :- 1

3) ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते, त्या समासास ............. म्हणतात.

   1) तत्पुरुष समास  2) अव्ययीभाव समास  3) बहुव्रीही समास    4) कर्मधारय समास

उत्तर :- 2

4) संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल ?

   1) स्वल्पविराम    2) अर्धविराम    3) संयोगचिन्ह    4) अपूर्णविराम

उत्तर :- 1

5) ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्याशी’ अलंकार ओळखा.

   1) अतिशयोक्ती    2) व्यतिरेक    3) श्लेष      4) अन्योक्ती

उत्तर :- 1

6) खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ?

   1) पद      2) नयन      3) वडवानल    4) डोळा

उत्तर :- 4

7) उष:काल होता होता, काळरात्र झाली ........... या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

   1) वाच्यार्थ    2) शब्दार्थ    3) व्यंगार्थ    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

8) ‘अवडंबर’ म्हणजे –

   1) अगडबंब    2) अवघड    3) स्तोम      4) यापैकी नाही

उत्तर :- 3

9) ‘चोर चोरी करून पळून जात असताना पोलिसांनी त्याला पाहिले’ या वाक्यातील चोर या शब्दाचा विरुध्दार्थी अर्थ असलेला
     शब्द निवडा.

   1) साधू    2) सन्याशी    3) प्रामाणिक    4) साव

उत्तर :- 4

10) जो वेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो – या अर्थाने कोणती म्हण वापरली जाते ?

   1) तळे राखील तो पाणी चाखीन      2) साखरेचे खाणार, त्याला दैव देणार
   3) पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा      4) हाजिर तो वजीर

उत्तर :- 4

एका ओळीत सारांश, 12 सप्टेंबर 2019

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉पुढील पाच ते सात वर्षांमध्ये सर्व सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी एवढी रक्कम खर्च करण्याची भारत सरकारने योजना आखली आहे – 130 अब्ज डॉलर.

👉भारतीय हवाई दलाने या तळाचे पुनरुज्जीवन केले, जेथे राफेल लढाऊ विमानांचे पहिले पथक तैनात असणार - 17 स्क्वाड्रेन 'गोल्डन अ‍ॅरो' (अंबाला).

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉भारतीय रिझर्व्ह बँकेनी यू. के. सिन्हा समितीच्या शिफारसीला दुजोरा दिला आहे की या राज्याच्या स्टार्टअप उद्योगांसाठीच्या कल्पक मॉडेलचे मूल्यांकन केले जावे जे इतर राज्यांमध्ये अंमलात आणले जाऊ शकणार - तेलंगणा.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 यामध्ये “गोल्डन लायन” पुरस्कार जिंकणारा चित्रपट - जोकर (टॉड फिलिप्स).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉ही व्यक्ती अमेरिकेत होणार्‍या वार्षिक ‘48व्या अल्बुक्वेर्क इंटरनॅशनल बलून फिएस्टा (AIBF)’ या कार्यक्रमात प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करणार - कॅप्टन संग्राम पवार.

👉11 सप्टेंबरपासून पंतप्रधानांचे नवे प्रधान सचिव - डॉ. पी. के. मिश्रा.

👉11 सप्टेंबरपासून पंतप्रधानांचे नवे प्रधान सल्लागार - पी. के. सिन्हा.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉7 आणि 8 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या आठव्या ‘लद्दाख मॅरेथॉन’च्या 72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज गटाचे विजेते - शबीर हुसेन (पुरुष), क्रिस्टीनावॉल्टर (आयर्लंडची महिला).

👉इटालियन ग्रँड प्रिक्स 2019 फॉर्म्युला वन मोटार शर्यतीचा विजेता - चार्ल्स लेकलर्क (फेरारी).

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉समुद्रसपाटीपासून 11,000 फूटांहून अधिक उंचीवर आयोजित केली जाणारी जगातली सर्वोच्च उंचीवरची धावशर्यत - लद्दाख मॅरेथॉन (जम्मू व काश्मीर).

👉अखिल भारतीय व्यापारी संघटना (CAIT) याचे स्थापना वर्ष – सन 1990.

👉अमेरिकेत झालेला पहिला अल्बुक्वेर्क इंटरनॅशनल बलून फिएस्टा (AIBF) – सन 1972.

पाकच दहशतवादाचा केंद्रबिंदू

✍जीनिव्हा : जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या व्यासपीठावर मांडण्याचा पाकिस्तानने केलेला प्रयत्न मंगळवारी धुडकावून लावताना, ‘‘पाकिस्तान हा दहशतवादाचा केंद्रबिंदू असून काश्मीरबाबतच्या त्याच्या प्रचारातील खोटेपणाला जग भुललेले नाही,’’ अशी घणाघाती टीका भारताने केली आहे.

✍भारताच्या परराष्ट्र सचिव विजय ठाकूर सिंग यांनी पाकिस्तानने काश्मीरवरून भारताविरोधात केलेल्या आरोपांचा स्पष्ट शब्दांत समाचार घेताना सांगितले की, जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा ठेवायचा की नाही, हा निर्णय घेण्याचा आम्हाला सार्वभौम अधिकार आहे. आमच्या संसदेने तो निर्णय घेतला आहे. त्यात कोणत्याही अन्य देशाला हस्तक्षेप करण्यास वावच नाही.

✍जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक तऱ्हेने सामाजिक आणि आर्थिक विकास घडावा, यासाठी देशाने लोकशाही मार्गाने हा निर्णय घेतला आहे. काश्मिरी जनतेला सर्वाधिक झळ दहशतवादानेच बसली असून पाकिस्तानच्या चिथावणीने हा दहशतवाद फोफावत असल्याचे अनेकवार सिद्ध झाले आहे. खरे पाहता संपूर्ण जगानेच संघटितपणे दहशतवादाचा कणा मोडण्याची गरज आहे, असेही सिंग यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार 'मेघदूत


◾️ यापुढे शेतकऱ्यांना घर बसल्या हवामान आणि कृषी सल्ल्याची माहिती मिळणार आहे. हवामान विभाग आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामान विज्ञान संस्थेने 'मेघदूत' हे ऍप विकसित केले आहे. या मोबाईल ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

◾️मेघदूत ऍपमुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेत आपल्या पिकांचे नियोजन करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसानही टाळण्यास हातभार लागणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांना आपआपल्या जिल्ह्यानुसार आपल्या मातृभाषेत ही माहिती उपलब्ध होणार आहे.

◾️मागील दीड महिन्यांपासून या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली जात असल्याची माहिती कृषी हवामान विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. यापूर्वी एसएमएसद्वारे आणि संकेस्थळावर माहिती दिली जात होती. मात्र या ऍपमुळे आता शेतकऱ्यांना अधिक माहिती उपलब्ध होईल.

◾️'मेघदूत' ऍपच्या माध्यमातून देशभरातील 658 जिल्ह्यांत माहिती दिली जाईल. आतापर्यंत 150 जिल्ह्यांना माहिती मिळत आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये माहिती देण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. लवकरच तेथेही ही व्यवस्था उपलब्ध होईल.

◾️'मेघदूत' ऍपमध्ये तापमान, पाऊस आणि पीक सल्ल्याची माहिती दिली जाते. या ऍपच्या माध्यमातून मागील 10 दिवसांची आणि पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नियोजन करण्यास मोलाची मदत होत आहे. पुढील एक-दोन दिवसात पाऊस पडणार असेल, तर शेतकरी पिकाला पाणी देणे आणि औषध फवारणी करणे टाळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचणार असून पिकाला फायदा होणार आहे.

माता, बालमृत्यू रोखण्यासाठी 'लक्ष्य मान्यता

◾️आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुण्यात या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या उपक्रमामुळे प्रसूती सेवेचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

◾️राज्यातील माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि खासगी रुग्णालयातील प्रसूती सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 'लक्ष्य मान्यता' उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमातून प्रसूती सेवेचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

◾️सार्वजनिक आरोग्य विभाग आणि फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनोकॉलोजिकल सोसायटी ऑफ इंडिया (फॉग्सी) यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्य मान्यता उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

◾️याचा शुभारंभ नुकताच पुण्यातील औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

◾️याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री शिंदे म्हणाले, "राज्यातील महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी तसंच खाजगी संस्थांमध्ये सेवांचा दर्जा सुधारून प्रसूतीदरम्यान होणाऱ्या माता मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी लक्ष्य मान्यता उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रसूतीदरम्यान आणि प्रसूती पश्चात गुणात्मक सेवा उपलब्ध करून माता आणि नवजात बालकांचे होणारे मृत्यू कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे"

◾️"लक्ष्य मान्यता दर्जात्मक सेवा मानांकनाचा अवलंब करण्यासाठी नोंदणीकृत रूग्णालयांना दर्जात्मक सेवेच्या 26 मानाकांवर आधारित रूग्ण काळजी, सुरक्षितता, गुणवत्ता आणि सुविधा सुधारणे याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खाजगी प्रसूती रुग्णालयांमध्ये गुणवत्ता मानकांना चालना देण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असून या उपक्रमामुळे माता आणि बालकांना गुणात्मक सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल", असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

पियुष गोयल थायलंडमध्ये आयोजित RECPच्या मंत्रिस्तरीय बैठकीत उपस्थित

​​

8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2019 या काळात थायलंड देशांची राजधानी बँकॉकमध्ये सातवी RCEP मंत्रिस्तरीय बैठक, सोळावी ASEAN-भारत आर्थिक मंत्री बैठक आणि सातवी पूर्व आशिया आर्थिक मंत्री शिखर परिषद 2019 हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांमध्ये भारताच्यावतीने केंद्रीय वाणिज्य व उद्योग व रेल्वे मंत्री पियुष गोयल उपस्थित आहेत.

✅ RCEP बद्दल

प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (Regional Comprehensive Economic Partnership -RCEP) हा आग्नेय आशियाई देशांचा संघ (ASEAN)

याचे दहा सदस्य (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलँड, व्हिएतनाम) आणि त्याचे सहा FTA भागीदार (चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड) यांच्या दरम्यानचा एक प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) आहे. नोव्हेंबर 2012 साली कंबोडियात झालेल्या ASEAN शिखर परिषदेत RCEP वाटाघाटी औपचारिकपणे लागू झाली. RCEP हा जगातला सर्वात मोठा आर्थिक गट आहे आणि जवळपास निम्मी जागतिक अर्थव्यवस्था या गटात समाविष्ट आहे. या भागात 3.4 अब्ज लोकसंख्या असून एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP, PPP) 49.5 लक्ष कोटी डॉलर इतके आहे.

✅ ASEAN आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (Association of Southeast Asian Nations -ASEAN): हा विविध स्वरुपात आर्थिक आणि विकास क्षेत्रांमध्ये सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी ब्रुनेई दरुसालेम, कंबोडिया, म्यानमार, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, लाओ PDR, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे. याची निर्मिती मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी दिनांक 8 ऑगस्ट 1967 रोजी केली आणि याचे मुख्यालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे. ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...