२६ ऑगस्ट २०१९

जीना यांचे चौदा मुद्दे

🔹नेहरू रिपोर्ट हा मुस्लिम लीगला मान्य नव्हता. त्यामुळे नेहरू रिपोर्ट चा फेरविचार करण्यासाठी आगाखान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर १९२८ मध्ये मुस्लिम लीगचे दिल्ली येथे अधिवेशन याच्या मध्ये मुस्लिम लीगच्या दिल्ली येथे अधिवेशन भरले व या अधिवेशनाचे जीनांनी मुस्लिम लीगच्या दृष्टीकोनातून पुढील १४ मुद्दे प्रसिद्ध केले ते पुढीलप्रमाणे आहेत.

🔸जीना यांचे चौदा मुद्दे

* हिंदी राज्यघटना संघात्मक ठेवून प्रांताकडे शेषाधिकार असावे.

* देशातील सर्व घटक राज्यांना सारखेच स्वतंत्र प्राप्त व्हावे.

* सर्व कायदेमंडळात अल्पसंख्याकांना योग्य व परिणाम कारक प्रतिनिधित्व मिळावे.

* केंद्रीय कायदे मंडळात एकूण सभासदांच्या १३ प्रतिनिधी मुस्लिम असावे.

* स्वतंत्र मतदार संघ अस्तित्वात राहतील एखाद्या समाजाला स्वतंत्र मतदार संघाचा त्याग करायचा असेल तर करता येईल.

* बंगाल पंजाब वायव्य सरहद्द प्रदेशाची पुनर्रचना करीत असताना मुस्लिम मताधिक्य कमी येणार नाही याची काळजी घ्यावी.

* मुंबई प्रदेशापासून सिंध प्रदेश वेगळा करावा.

* सर्व समाजाला आपल्या धर्माचे आचरण करण्यास प्रचार आणि धार्मिक शिक्षण देण्यास पूर्ण स्वतंत्र राहील.

* वायव्य सरहद्द प्रदेशामध्ये आणि बलुचिस्तान या प्रदेशमध्ये इतर प्रांतासारखा राजकीय सुधारणा राबवाव्यात.

* स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनात मुस्लिमांना योग्य त्या नोकऱ्या प्राप्त व्हाव्यात.

* कोणत्याही कायदे मंडळात समाजाविषयी ठराव पास होत असेल तर त्या ठरावाला त्या समाजातील ३४ सभासदांनी जर विरोध दर्शविला तर तो ठराव पास होऊ नये.

* मुस्लिमांनी संस्कृती, भाषा, शिक्षण संस्था इत्यादींना संरक्षण प्राप्त होण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

* प्रत्येक प्रांताच्या मंत्रीमंडळामध्ये १३ मुस्लिम सदस्य असले पाहिजेत.

* केंद्रीय कायदे मंडळात बदल करायचा असेल तर त्यासाठी प्रांतीय कायदे मंडळाची समंती असावी.

 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 24 वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश

​​​

👉 इंग्लंडमध्ये 2022 साली होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब झालं आहे.

👉 राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून नुकतीच याची घोषणा करण्यात आली. आयसीसीनंही याबाबत ट्वीट करुन याची माहिती दिली.

👉 त्यामुळे 24 वर्षांनी राष्ट्रकुलमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेश होणार आहे.

🍁 क्रिकेटच सर्व समाने बर्मिंहॅम येथील एजबेस्टन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

👉 यामध्ये एकूण आठ महिला संघ सहभागी होणार आहेत. याआधी 1998 च्या क्वालालंपूर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने सुवर्ण पदक जिंकलं होतं.

👉 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष लुईस मार्टिन यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केल्याचं आम्ही स्वागत करतो. स्पर्धेत महिला टी-20 क्रिकेटसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चांगला मंच असल्याच लुईस मार्टिन यांनी म्हटलं.

👉 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 27 जुलै ते 7 ऑगस्ट 2022 पर्यंत इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये पार पडणार आहे.

🍁 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 18 खेळांमधील जवळपास 45 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.

कोमालिका बारीला जगज्जेतेपद

🏹कोमालिका बारी हिने आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या जपानच्या सोनोडा वाका हिला एकतर्फी झालेल्या अंतिम फेरीत पराभूत करत रिकव्‍‌र्ह कॅडेट गटात
जगज्जेतेपदाला गवसणी घातली.

🏹भारताने जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.

🏹जमशेदपूर येथे जन्मलेल्या आणि टाटा तिरंदाजी अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या कोमालिकाने सुरुवातीलाच ४-० अशी आघाडी घेतली होती.

🏹त्यानंतर ७-३ अशा फरकाने तिने अंतिम फेरीवर वर्चस्व गाजवले.

🏹 रिकव्‍‌र्ह कॅडेट (१८ वर्षांखालील) गटात १७ वर्षीय कोमालिका ही भारताची दुसरी जगज्जेती ठरली आहे.

🏹यापूर्वी दीपिका कुमारीने २००९ मध्ये जगज्जेतेपद पटकावले होते.

🏹भारतीय तिरंदाजी संघटनेवर जागतिक तिरंदाजी महासंघाने बंदी घातल्यामुळे यापुढे भारतीय तिरंदाजांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही.

🏹मात्र या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई केली.

फ्रान्समध्ये जी-7 शिखर परिषद 2019 आयोजित

फ्रान्स देशाच्या बिआरिट्झ या शहरात 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2019 या काळात 45 वी जी-7 शिखर परिषद आयोजित केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सुरू असलेल्या या शिखर परिषदेत उपस्थित राहणार आहेत. तेथे ते पर्यावरण, हवामान आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या जागतिक विषयांवर चर्चा करतील आणि जागतिक नेत्यांची भेट घेतील.

💁‍♂जी-7 (ग्रुप ऑफ सेव्हन) बद्दल

1975 साली प्रथम फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली आणि अमेरिका या सहा देशांनी जी-6 समूहाची स्थापना केली. पुढे 1976 साली कॅनडा यात सामील झाले आणि समूहाचे नाव ‘जी-7’ समूह हे पडले.

सन 1997 ते सन 2014 या काळात, या गटात रशियाचा समावेश होता आणि त्यामुळे हा ‘ग्रुप ऑफ एट’ म्हणून ओळखला जात होता. म्हणूनच 2014 साली याची पुनर्रचना झाली असून ते स्थापना वर्ष आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार, या समूहाच्या सदस्यत्वासाठी उच्च निव्वळ राष्ट्रीय संपत्ती आणि उच्च मानव विकास निर्देशांक असणे आवश्यक आहे. या गटातल्या प्रगत अर्थव्यवस्थांची एकत्रित संपत्ती निव्वळ जागतिक संपत्तीच्या 58% आहे.

स्पेनमध्ये जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धेत भारताने दोन सुवर्णपदके जिंकली

स्पेन देशाच्या माद्रिद शहरात खेळविण्यात आलेल्या जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये ज्युनियर (अंडर-21) मिश्र संघ गटातल्या मार्कू रागिनी आणि सुखबीर सिंग यांच्या जोडीने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले.

तसेच भारताची कोमलिका बारी ही स्पर्धेतली रिकर्व्ह कॅडेट विश्वविजेती बनली. तिने अंतिम फेरीत जापानच्या सोनोदा वाका हिला पराभूत करून भारतासाठी दुसरे सुवर्णपदक जिंकले. 2009 साली विश्वविजेती बनणार्‍या दिपीका कुमारी नंतर हे जेतेपद जिंकणारी 17 वर्षाची कोमलिका भारताची दुसरी रिकर्व्ह कॅडेट विश्वविजेती (18 वर्षाखालील) आहे.

या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण व एक कांस्यपदक असे एकूण तीन पदके मिळवून त्याच्या मोहिमेची सांगता केली. कंपाऊंड ज्युनियर पुरुष संघात भारताने कांस्यपदक जिंकले.

✍जागतिक तिरंदाजी बद्दल

जागतिक तिरंदाजी महासंघ ही तिरंदाजी या खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. 156 राष्ट्रीय महासंघ आणि इतर तिरंदाजी संघटना याचे सदस्य  बनलेले आहे आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने त्याला मान्यता दिली आहे. त्याची स्थापना 04 सप्टेंबर 1931 रोजी झाली. स्वित्झर्लंडच्या लुसाने या शहरात त्याचे मुख्यालय आहे.

२५ ऑगस्ट २०१९

🌴सुवर्ण'सिंधू'; जागतिक स्पर्धेत जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय

👉भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली.

👉जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदाचा दुष्काळ संपवला.

👉तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले.

👉जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

👉या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली.

👉या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत.

🌹🌳🌴वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदकविजेते भारतीय🌴🌳🌹

👉1983 - प्रकाश पादुकोण ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक

👉2011 - ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा ( महिला दुहेरी) - कांस्यपदक

👉2013 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक

👉2014 -   पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक

👉2015 - सायना नेहवाल ( महिला एकेरी) - रौप्यपदक

👉2017 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक

👉2017- सायना नेहवाल ( महिला एकेरी) - कांस्यपदक

👉2018 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक

👉2019 - बी साई प्रणित ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘चंद्रोदय’ या जोडशब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा.

   1) आ + उ = ओ    2) द्र + ओ = द्रो   
   3) अ + उ = ओ      4) र + ओ = रो

उत्तर :- 3

2) नामाच्या उपप्रकारांपैकी फक्त ......................... अनेकवचन होते.

   1) विशेषनामाचेच    2) धर्मवाचक नामाचेच 
   3) भाववाचक नामाचेच    4) सामान्य नामाचेच

उत्तर :- 4

3) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – हा माझा वर्गबंधू आहे.

   1) दर्शक सर्वनाम    2) संबंधी सर्वनाम   
   3) आत्मवाचक सर्वनाम    4) पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर :- 1

4) ‘कडक ऊन पडले आहे’ अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.

   1) धातुसाधित      2) संख्यावाचक   
   3) गुणवाचक      4) सार्वनामिक

उत्तर :- 3

5) ‘मला दोन मैल चालवते.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

   1) प्रयोजक क्रियापद    2) संयुक्त क्रियापद   
   3) शक्य क्रियापद    4) अनियमित क्रियापद

उत्तर :- 3

6) भजन करा सावकाश | तुला झालासे कळस. यांतील सावकाश हे .......................... अव्यय आहे.

   1) गतिदर्शक क्रियाविशेषण    2) स्थितीदर्शक क्रियाविशेषण
   3) रीतिवाचक क्रियाविशेषण    4) कालवाचक क्रियाविशेषण

उत्तर :- 3

7) योग्य विधाने निवडा.

   अ) काही शब्दयोगी अव्यये विभक्ती प्रत्यययाची कामे करतात.
   ब) व ती लागण्यापूर्वी त्याचे बहुधा सामान्यरूप होते.

   1) अ योग्य    2) ब योग्य    3) दोन्ही योग्य    4) दोन्ही अयोग्य

उत्तर :- 3

8) खालील उभयान्वयी अव्यये व त्यांचे उपप्रकार यांच्या जोडया जुळवा.

  अव्यये      उपप्रकार

         अ) स्वरूपदर्शक    I) म्हणून
         ब) समुच्चय बोधक    II) पण
         क) उद्देश दर्शक    III) आणि
         ड) न्यूनत्वबोधक    IV) म्हणजे

    अ  ब  क  ड

           1)  IV  III  I  II
           2)  III  I  IV  II
           3)  II  IV  III  I
           4)  IV  II  I  III

उत्तर :- 1

9) खालीलपैकी किती तिरस्कारदर्शक अव्यये आहेत.

     इश्श, छत, छी, शीड, हुड, छे
   1) पाच      2) सर्व      3) चार      4) तीन

उत्तर :- 1

10) पुढीलपैकी अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण कोणते ?

   1) मी निबंध लिहिला आहे      2) मी निबंध लिहीत आहे
   3) मी निबंध लिहीत असतो    4) मी निबंध लिहितो

उत्तर :- 2

आता प्लास्टिकमुक्त अभियान, मोदींची घोषणा

◼️ स्वच्छ भारत अभियानानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 'प्लास्टिकमुक्त अभियान' सुरू करण्याची घोषणा केलीय. येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची १५०वी जयंती आहे. यानिमित्ताने देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबण्यात येणार आहे. '

◼️महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबवणार

◼️नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा आणि अभियानात सहभागी व्हावे

◼️संपूर्ण सप्टेंबर महिना 'पोषण अभियान' म्हणून राबवणार

◼️‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान ११ सप्टेंबरपासून राबवण्यात येईल

◼️दरवर्षी आपण २९ ऑगस्टला 'राष्ट्रीय क्रीडा दिन' साजरा करतो. यानिमित्ताने आपण 'फिट इंडिया मूव्हमेंट' म्हणजे 'तंदुरुस्त भारत अभियान' सुरू करणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. जागृकतेअभावी कुपोषणाची समस्य गरीबांसह सधन कुटुंबांमध्येही दिसून आली आहे. यामुळे संपूर्ण सप्टेंबर महिना 'पोषण अभियान' म्हणून राबवला जाईल. नागरिकांनी यात सहभागी व्हावं आणि आल्यापरिने योग्य ते सहकार्य करावं, असं आवाहन मोदींनी जनतेला केलंय.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌19 ऑगस्टला निधन झालेल्या ज्येष्ठ संगीतकाराचे नाव काय होते?

(A) मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी✅✅✅
(B) नौशाद
(C) रवी शंकर
(D) मदन मोहन

📌कोणत्या खेळाडूने 2019 सालाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जिंकला आहे?

(A) बजरंग पुनिया✅✅✅
(B) शिखर धवन
(C) सुनील छेत्री
(D) मिताली राज

📌ग्रीनपीस या संस्थेच्या मते, कोणता देश जगात सर्वाधिक मानवनिर्मित सल्फर डायऑक्साइड (SO2) उत्सर्जित करणारा देश आहे?

(A) जर्मनी
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) स्वित्झर्लंड
(D) भारत✅✅✅

📌19 ऑगस्टला निधन झालेल्या बिहारच्या माजी मुख्यमंत्रीचे नाव काय होते?

(A) अचल त्यागी
(B) जगन्नाथ मिश्रा✅✅✅
(C) ए. के. मिश्रा
(D) देवेश्वर दत्त

📌2019 साऊथ एशियन स्पेलिंग बी कोंटेस्ट नावाची स्पर्धा जिंकणार्‍या भारतीय वंशाच्या अमेरीकावासीचे नाव ओळखा.

(A) नवनीत मुरली✅✅✅
(B) दिपक गुप्ता
(C) सुधीर वर्मा
(D) नलिन गुप्ता

महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रीय पोषण अभियान पुरस्कार’

◼️पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते आज विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राला पाच पुरस्कार प्रदान करण्यात आले.

◼️केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने आज येथील हॉटेल अशोकमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय पोषण अभियान पुरस्कार-2018-19’ चे वितरण करण्यात आले.

🔘 क्षमता संवर्धनात महाराष्ट्र देशात दुसरा 🔘

◼️केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पोषण कार्यक्रम देशभर राबविण्यात येत असून महाराष्ट्रात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जुलै 2018 पासून राज्यात सुरु असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीच्या आधारे ‘क्षमता संवर्धन, अभिसरण, वर्तणूक बदल आणि समुदाय जोडणी’ या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या आयुक्त इंद्रा मालो आणि उपायुक्त जामसिंग गिरासे यांनी पुरस्कार स्वीकारला. 50 लाख रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

🔘 उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम 🔘

◼️ पोषण अभियानाच्या अंमलबजावणींतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याने निश्चित उद्दीष्ट्ये पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये समुदाय विकास आधारित कार्यक्रमांची उत्तम अंमलबजावणी झाली आहे. क्षमता बांधणी व विकासांतर्गत जिल्ह्यातील सर्व 2015 अंगणवाड्यांमध्ये 3 लाख उपक्रम राबविण्यात आले आहेत. यासोबतच पर्यवेक्षिकांमार्फत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण, कुपोषण मुक्ती बालग्राम विकास केंद्र आदी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत.

◼️केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते आज उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) बी.एच.निपानीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

🔘 नेवासा व नाशिक प्रकल्पांच्या सांघिक कार्याचा सन्मान 🔘

◼️पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा आणि ए.एन.एम. कार्यकर्त्या यांच्या उत्तम समन्वयातून राष्ट्रीय पोषण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा आणि नाशिक जिल्ह्यातील नाशिक-2 (शहरी) या दोन प्रकल्पांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

◼️नेवासा प्रकल्पातील अंगणवाडी सेविका अलका पंडीत आणि योगिता गुजर, एएनएम कार्यकर्त्या राखी पंडीत, अंगणवाडी मदतनीस उषा टाके आणि पर्यवेक्षिका श्यामला गायधने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2 लाख 50 हजार रूपये, प्रशस्ती पत्र आणि प्रत्येकी सन्मान पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

◼️नाशिक-2 (शहरी) प्रकल्पातील अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसूळे, एएनएम कार्यकर्त्या उषा लोंढे, अंगणवाडी मदतनीस मोहिनी इप्पर आणि पर्यवेक्षिका विद्या गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1 लाख 50 हजार रूपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

🔘 करवीर ब्लॉक राज्यात सर्वोत्कृष्ट 🔘

◼️राष्ट्रीय पोषण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर ब्लॉक राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या प्रकल्पाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी गुणाजी नलावडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशस्ती पत्र आणि प्रत्येकी सन्मान पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

बोरिस जॉन्सन: ब्रिटनचे नवे पंतप्रधान ब्रिटनच्या (UK) पंतप्रधानपदाची सूत्रे

आता बोरीस जॉन्सन यांच्याकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रक्झिटनंतर थेरेसा मे यांनी 7 जून रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. थेरेसा मे यांच्या राजीनामानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठीची निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत बोरीस जॉन्सन यांनी जेरमी हंट यांचा पराभव झाला. त्यामुळे बोरीस जॉन्सन हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील. 55 वर्षांचे जॉन्सन यांच्यासमोर आता ब्रेग्झिटचा तिढा सोडवण्याचे मोठे आव्हान असेल.

वैश्विक नवकल्पकता निर्देशांकमध्ये भारत 52 व्या क्रमांकावर

कॉर्नेल विद्यापीठ, INSEAD, संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) आणि GII नॉलेज पार्टनर्स यांनी यावर्षीचा ‘वैश्विक नवकल्पकता निर्देशांक 2019’ (global innovation index) प्रसिद्ध केला. त्यामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या देशांच्या यादीत भारत 52 व्या क्रमांकावर आहे.

यादीमध्ये स्वित्झर्लंड अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ स्विडन, अमेरीका, नेदरलँड, ब्रिटन, फिनलँड, डेन्मार्क, सिंगापूर, जर्मनी आणि इस्राएल या देशांचा क्रम लागतो आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS): भारतातली सर्वाधिक मौल्यवान कंपनी

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही पुन्हा एकदा देशातली सर्वाधिक मौल्यवान कंपनी बनली. दिनांक 25 जुलै 2019 रोजी शेयर मार्केटचा व्यापार बंद झाला तेव्हा बाजारपेठेच्या मूल्याप्रमाणे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) याचे एकूण बाजार भांडवल (market capitalisation / m-cap) 7,98,620.04 कोटी रुपये होते. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे भांडवल 7,81,164.46 कोटी रुपये होते.

लाहोर येथील बायोमेकॅनिक्स लॅबला ICCची मान्यता

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनी (ICC) पाकिस्तान देशातल्या लाहोर या शहरात पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (PCB) उभारण्यात आलेल्या “बायोमेकॅनिक्स लॅब” याला मान्यता दिली. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (PCB) संशयास्पद वाटणारी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी एक तपास केंद्र म्हणून “बायोमेकॅनिक्स लॅब” उभारलेली आहे.

ही प्रयोगशाळा लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) येथे उभारण्यात आली आहे आणि ICC या संस्थेद्वारे मान्यता देण्यात आलेली पाचवी बायोमेकॅनिक्स लॅब आहे.

📲 "डेटा सबस्क्रिप्शन रिपोर्ट" अहवाल📲



-केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे (ट्राय) जारी

-इंटरनेट वापरून वेगवेगळ्या साईट सर्फिंगमध्ये 'महाराष्ट्र' देशात प्रथम स्थानी

●2018 वर्षात 'डेटा' वापराचा आधार घेत अहवाल

●देशातील डेटा वापरात अग्रेसर 5 राज्ये
1. महाराष्ट्र (4 कोटी 80 लाख नागरिक)
2. आंध्रप्रदेश (4 कोटी 40 लाख)
3. तामिळनाडू (4 कोटी 10 लाख)
4. उत्तरप्रदेश (4 कोटी)
5. कर्नाटक (3 कोटी 6 लाख)

◆भारतात 4G चा वापर 86% इंटरनेट वापरकर्ते करतात.

◆3G चा वापर अजूनही - 12.19%वापरकर्ते करतात

पूरपरिस्थितीच्या अभ्यासासाठी जलसंपदातर्फे दहा जणांची समिती


👉भीमा व कृष्णा नदीच्या खोर्‍यामध्ये आलेल्या महापुराची कारणे शोधण्यासाठी व त्यावर उपायोजनात्मक अहवाल तयार करण्याकरिता जलसंपदा विभागाच्या वतीने दहा जणांची अभ्यास समिती स्थापन केली आहे.

👉जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

👉दहा सदस्यीय समितीने तीन महिन्यात अहवाल द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

👉जास्तीत तीन महिन्यात म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत अहवाल द्यावा.

👉यावर्षीच्या पावसाळ्यात कृष्णा नदीच्या खोर्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील गावे मोठ्या संख्येने बाधित झाली. त्याचप्रमाणे जीवित व वित्त हानीदेखील प्रचंड झाली.

👉पुराच्या कारणांबाबत विविध स्तरांवरून मतमतांतर व्यक्त होत आहेत. चालूवर्षीची पूरपरिस्थिती अधिकच गंभीर आहे.

👉अलमट्टी धरण तसेच दोन्ही राज्यांतील अन्य प्रकल्पही पूर्णत्वास आलेले आहेत. यात अनेक तांत्रिक गुंतागुंतीच्या बाबी आहेत. या सर्व बाबींचे सखोल तांत्रिक अन्वेषण करून पूरपरिस्थितीची कारणे शोधणे, भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपाययोजना आखण्याकरिता तज्ज्ञ अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे.

👉त्यामध्ये भारतीय हवामान खाते, भारतीय प्राद्योगिक संस्था (आयआयटी), महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, जलक्षेत्रातील विश्लेषक अशा तज्ज्ञांचा समावेश आहे.

✅नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये समावेश करण्यात आलेल्यांची नावे पुढील प्रमाणे :

👉विनय कुलकर्णी (तांत्रिक सदस्य, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण),

👉संजय घाणेकर (सचिव, प्रकल्प समन्वयक, जलसंपदा विभाग)

👉प्रा. रवी सिन्हा (आयआयटी, मुंबई),

👉नित्यानंद रॉय (मुख्य अभियंता, केंद्रीय जलआयोग, नवी दिल्ली),

👉संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदना उपयोजिता केंद्र, नागपूर,

👉उपमहासंचालक, भारतीय हवामान विभाग,

👉संचालक, आय. आय. टी. एम. पुणे,

👉प्रदीप पुरंदरे (सामाजिक कार्यकर्ते व तज्ज्ञ),

👉राजेंद्र पवार (सचिव, जलसंपदा विभाग, मुंबई)

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...