१४ मार्च २०२४

आणीबाणी (भारत)

आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.


राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५2 खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण संघ अणिबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभा राहिला.

मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली ह्या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हार पत्कारावी लागली.

आणीबाणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासामधील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक मानली जाते.


घटनाक्रम


१९७५


१२ जून : निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून इंदिरा गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषी ठरविले. गांधी यांनी १९७१च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी आणि यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.


२२ जून : जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी आणीबाणीच्या विरोधात दिल्लीत रामलीला मैदानात मोठ्या सभेचे आयोजन केले.


२४ जून : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घालत स्थगिती दिली. तसेच, संसदेचे सदस्य रहण्यास इंदिरा गांधींना परवानगी दिली. मात्र संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले.


२५ जून : देशात आणीबाणी लागू केल्याची घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली, त्याचवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज सेवा खंडित करण्यात आली.


३० जून : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणार्‍यांना थेट अटक करण्यास सुरुवात झाली.


१ जुलै : आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी २० कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.


५ जुलै : जमात ए इस्लामी, आनंद मार्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी २६ संघटनांवर बंदी घालण्यात आली.


२३ जुलै : आणीबाणीला राज्यसभेची मंजुरी.


२४ जुलै : लोकसभेतही आणीबाणीच्या बाजूने मतदान.


५ ऑगस्ट : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात आला.


१९७६


२१ मे : न्यायालयाचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली.


२५ ऑगस्ट : विवाहाचे वय वाढविण्याची तरदूत असलेले विधेयक मांडण्यात आले.


३ नोव्हेंबर : घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेची मंजुरी.


१ सप्टेंबर : लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्तीची नसबंदी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात.


१९७७


१८ जानेवारी : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा.


२० जानेवारी : लोकसभा विसर्जित करण्यात आली.


२४ जानेवारी : मोरारजी देसाई यांची जनता पक्षाच्याअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


११ फेब्रुवारी : राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांचे निधन.


२१ मार्च : आणीबाणी मागे घेण्यात आली.


२२ मार्च : जनता पक्षाला निवडणुकीत बहुमत.

ससदेविषयी महत्त्वाची माहीती

· एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्‍यावी लागतात.


· संसदेच्‍या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्‍तीत जास्‍त सहा महिने असू शकतो.


· नागरिकत्‍व नियमित करण्‍याचा अधिकार संसदेस आहे.


· राज्‍यघटनेतील तरतुदी बदलण्‍याचा अधिकार केवळ संसदेला आहे.


· घटनेच्‍या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्‍याचे अधिकार संसद यांना आहेत.


· संरक्षण या विषयावर कायदा करण्‍याचे सर्वस्‍वी अधिकार संसदेस आहेत.


· जेव्‍हा राज्‍यात राष्‍ट्रपती-शासन कलम ३५६ अन्‍वये लागू होते, तेव्‍हा राज्‍य यादीतील कर कायदे संमत करण्‍याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.


· विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्‍यासाठी त्‍यांला तीन टप्‍प्‍यातून जावे लागते.


· करात कपात किंवा कर रद्द करण्‍याविषयी तरतूद असलेले विधेयक राष्‍ट्रपतीच्‍या शिफारशीशिवाय मांडता येतो.


· सामान्‍यत: वित्त विधेयकाची मसंडणी व प्रविष्‍टीकरण राष्‍ट्रपतींची शिफारस असल्‍याशिवाय शक्‍य होत नाही.


· वित्त विधेयकाची मांडणी राष्‍ट्रपती यांच्‍या शिफरशीवरून केली जाते.


· विधेयक वित्त विधेयक आहे/नाही असा प्रश्‍न उद्भवचल्‍यास अंतिम निर्णय लोकसभेचे सभापतीचा असतो.


· वित्त विधेयक हे कर, कर्जे व खर्च याबाबत असते.


· वित्त-विधेयक प्रथमत: लोकसभेत मांडले जाते.


· सर्व वित्त विधेयके (Financial Bills) ही धन विधेयके (Money Bills) असतात.


· राज्‍यघटनेच्‍या कलम ३३० व ३३२ अनुसार लोकसभा व राज्‍याच्‍या विधानसभांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी खास राखीव जागा ठेवल्‍या आहेत.


· लोकसभेमध्‍ये केंद्रशासित प्रदेशांमधून १३ सदस्‍य निवडले जातात.


· लोकसभेच्‍या पहिल्‍या मध्‍यावधी निवडणुका १९७१ मध्‍ये घेण्‍यात आल्‍या.


· आणीबाणीच्‍या काळात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्ष पर्यंत वाढवता येतो.


· राज्‍यसभा कधीच बरखास्‍त केली जात नाही.


· राज्‍यसभेच्‍या सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षाचा असतो.


· लोकसभेने पारित केलेले व राज्‍य सभेकडे शिफारशीकरिता पाठवलेले वित्त विधेयक १४ दिवसात परत पाठवणे हे राज्‍यसभेवर बंधनकारक आहे.  

असहकार चळवळ

◾️ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.

➡️ तयात पुढील बाबींचा समावेश होता.

1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.

2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.

3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे

4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.

5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.

6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.

7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.

◾️ असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

◾️  शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

◾️ चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.


🟢 विधायक कार्यक्रम :-

◾️ गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.

◾️ तयामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.

चालू घडामोडी :- 13 मार्च 2024

◆ महाराष्ट्र राज्य सरकारने अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता.

◆ पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता महाराष्ट्र राज्य सरकारने दिली आहे.

◆ दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी "No smoking day" साजरा करण्यात येतो.

◆ गोरासम कोरा महोत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यात साजरा करण्यात येतो.

◆ महाराष्ट्र राज्यात 100 महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात येणार आहे.

◆ हिमाचल प्रदेश राज्यात स्पायडर (कोळी) च्या नविन प्रजातीचा शोध लागला आहे.

◆ रणजी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक झळकवणारा मुशीर खान हा सर्वात युवा मुंबईकर ठरला आहे.

◆ ‘नायब सिंग सैनी’ हरियाणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत.

◆ जपानी वास्तुविशारद रिकेन यामामोटो यांना प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 मिळाला आहे.

◆ स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) या जागतिक संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश बनला आहे.

◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 'दिल्ली ग्रामोदय अभियान' प्रकल्पाचे उद्घाटन केले.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील साबरमती येथे ‘कोचरब आश्रमा’चे उद्घाटन केले.

◆ 12 मार्च 2024 रोजी 'स्वामी रामकृष्ण परमहंस' यांची जयंती साजरी करण्यात आली.

◆ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोनितपूरमध्ये 50 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले.

◆ 'ॲनाबेल सदरलँड' आणि 'यशस्वी जैस्वाल' यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ'चा किताब पटकावला आहे.

◆ भारतीय लेखक अमिताव घोष यांना हवामान बदलाच्या संकटावर प्रकाश टाकल्याबद्दल नेदरलँड्सच्या प्रीमियम इरास्मियनम फाउंडेशनने 'इरास्मस पुरस्कार' 2024 ने सन्मानित केले आहे.

◆ जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे उत्तर भारतातील पहिले 'सरकारी होमिओपॅथिक कॉलेज' स्थापन केले जाणार आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

१३ मार्च २०२४

मंत्रिमंडळ निर्णय

✅ मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर.

✅ पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये.

✅ अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता.

✅ केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता.

✅ श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार.

✅ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प.

✅ भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज.

✅ राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ.

✅ महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार.

✅ मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार.

✅ मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार.

✅ शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता संस्थांना २५ हजार रुपये अनुदान.

✅ मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.

✅ आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.

✅ कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.

✅ शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार
११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता.

✅ पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार.

✅ पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता.

✅ म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन.

✅ आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ.

✅ मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार.

✅ मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता.

✅ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते.

✅ भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार.

✅ महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन.

✅ जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता.

✅ दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

राज्यसेवा प्रश्नसंच

1. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?


 97,000

 9,700

 10,000

 21,000

उत्तर : 97,000


2. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल —— आहे.


 5 km/s

 18 km/s

 18 m/s

 5 m/s

उत्तर : 5 m/s


3. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?


 यकृत ग्रंथी

 लाळोत्पादक ग्रंथी

 स्वादुपिंड

 जठर

उत्तर : यकृत ग्रंथी


4. सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?


 A

 B

 D

 C

उत्तर : D


5. 100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युतरोध —– असेल.


 42 ओहम

 576 ओहम

 5760 ओहम

 5.76 ओहम

उत्तर : 576 ओहम


6. लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?


 A

 B

 C

 D

उत्तर : A


7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?


 मुकनायक

 जनता

 समता

 संदेश

उत्तर : संदेश


8. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?


 9800 J

 980 J

 98 J

 9.8 J  

उत्तर : 980 J


9. दिन. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?


 वि.दा. सावरकर

 अनंत कान्हेरे

 विनायक दामोदर चाफेकर

 गणेश दामोदर चाफेकर

उत्तर : अनंत कान्हेरे


10. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?


 गांधीजींना अटक

 काँग्रेसचा विरोध

 चौरी-चौरा घटना

 पहिले महायुद्ध

उत्तर : चौरी-चौरा घटना


11. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?


 अनंत कान्हेरे

 खुदिराम बोस

 मदनलाल धिंग्रा

 दामोदर चाफेकर

उत्तर : मदनलाल धिंग्रा


12. 1919 च्या मॉटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती?


 135 व 50

 135 व 60

 145 व 50

 145 व 60

उत्तर : 145 व 60


13. ‘लुकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?


 अप्पासाहेब परांजपे

 तात्यासाहेब केळकर

 भास्करराव जाधव

 धोंडो केशव कर्वे

उत्तर : धोंडो केशव कर्वे


14. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?


 राजा राममोहन रॉय

 केशव चंद्र सेन

 देवेंद्रनाथ टागोर

 ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर : राजा राममोहन रॉय


15. इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?


 उदारमतवादी पक्ष

 स्वराज्य पक्ष

 काँग्रेस पक्ष

 मुस्लिम लीग

उत्तर : स्वराज्य पक्ष


16. ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?


 स्वामी दयानंद

 स्वामी विवेकानंद

 अॅनी बेझंट

 केशवचंद्र सेन

उत्तर : अॅनी बेझंट


17. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?


 इस्लामाबाद

 ढाका

 अलाहाबाद

 अलिगड

उत्तर : ढाका


18. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?


 1895

 1896

 1897

 1898

उत्तर : 1897


19. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?


 डॉ. बी.आर. आंबेडकर

 वि.रा. शिंदे

 महात्मा जोतिबा फुले

 भास्करराव जाधव

उत्तर : वि.रा. शिंदे


20. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औध्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?


 1915

 1916

 1917

 1918

उत्तर : 1916



1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
1⃣पणे ✅
2⃣नागपुर
3⃣औरंगाबाद
4⃣कोल्हापूर

2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?
1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅
 2⃣फिरोझशहा मेहता
3⃣नया. तेलंग
4⃣बहराम मलबारी

3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव हाहाहाहा आहे?
1⃣प. जवाहरलाल नेहरू
2⃣हदयनाथ 
3⃣कझरू✅
4⃣सरदार वल्लभभाई पटेल


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.
1⃣रद्रप्रयाग
2⃣ऋषिकेश✅
3⃣अलाहबाद
4⃣गाढवाल

5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.
1⃣१८०.०
2⃣१३७.२✅
3⃣११०.०
4⃣१२०.५

6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?
1⃣बॉम्बे हाय
2⃣दिग्बोई
3⃣अकलेश्वर✅
4⃣बरौनी

7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?
1⃣१८२४
2⃣१८४५✅
3⃣१८४८
4⃣१८५३

8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.
1⃣खर ✅
2⃣कसूम
3⃣कडोल
4⃣शलार्इ

9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.
1⃣कष्णा
2⃣दामोदर
3⃣अलमाटी
4⃣सतलज✅

10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?
1⃣अमेरिकन राज्यक्रांती
2⃣रशियन राज्यक्रांती
3⃣नहरू रिपोर्ट
4⃣फरेंच राज्यक्रांती✅

१) कोणत्या मूल्यांकनाच्या एककास “कागदी सोने” म्हणतात ?

   1) युरो डॉलर 

   2) एस. डी. आर. 

   3) पेट्रो डॉलर   

   4) जी. डी. आर.


उत्तर :- 2✔️✔️


२) खालील विधाने विचारात घ्या.

   अ) ॲडम स्मिथ ने तुलनात्मक खर्च सिध्दांत मांडला.

   ब) अन्योन्य मागणी सिध्दांत व्यापार शर्तीची निश्चिती स्पष्ट करतो.

   क) डेनिस रॉबर्टसन यांनी वृध्दिचे इंजिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्णन केले आहे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ व ब  

  2) ब व क 

   3) अ व क    

4) वरीलपैकी सर्व


उत्तर :- 2✔️✔️


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

३) कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?


   1) नाबार्ड   

 

  2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया


   3) स्टेट बँक ऑफ इंडिया


    4) वरील सर्व


उत्तर :- 1✔️✔️


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️


४) भारतातील लघुउद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे ?



   1) कच्च्या मालाचा अभाव   

   2) अपु-या पायाभुत सुविधा

   3) आधुनिकीकरण   

   4) कामगारांची अनुपलब्धता


उत्तर :- 2✔️✔️


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️


५) सहकारी विपणन संस्थांनी या हेतूने महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

   अ) शेती उत्पादनाच्या ‍किंमती स्थिर करण्यासाठी मदत करणे. 

   ब) सभासदांना गोदामाच्या सुविधा पुरविणे.

   क) गैरव्यवहारापासुन सभासदांचे संरक्षण करणे.  

    ड) शेतक-यांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?


   1) अ फक्त  

  2) अ आणि ब फक्त 

   3) अ, ब आणि क  

  4) अ, ब आणि ड



उत्तर :- 3✔️✔️

वेव्हेल योजना विषयी माहिती


मे 1945 मध्ये युरोपातील युद्ध संपले. इंग्लंड विजयी झाले. लवकरच पार्लमेंटच्या निवडणुका होणार होत्या. चर्चिल भारताचा प्रश्न सोडवू इच्छित नव्हता.

त्यामुळे हुजूर पक्षीयांबद्दल स्वातंत्र्यप्रिय इंग्रज जनता नाराज होती. आंतरराष्ट्रीय दडपणही इंग्रज सरकारवर वाढत होते. युद्धसमाप्तीनंतर पारतंत्र्यातील राष्ट्रे स्वतंत्र झाली पाहिजेत, अशी रशियानेही घोषणा केली होती.

अशा परीस्थितीत चर्चिलला आपण भारताचा प्रश्न सोडविण्यास अत्यंत उत्सुक आहोत असा भास निर्माण करणे तरी आवश्यक होते. कारण मजूर पक्षाची पूर्ण सहानुभूती भारतीय स्वातंत्र्यलढ्याला होती.

मजूर पक्ष सत्तेवर आला तर भारताला स्वातंत्र्य लवकर मिळण्याची शक्यता होती.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

विलायत सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी वेव्हेल मार्च 1945 मध्ये इंग्लंडला गेले होते. ते जून 1945 मध्ये परत आले.

14 जून रोजी त्यांनी योजना जाहीर केली.

नवी घटना भारतीय लोकांनीच तयार केली पाहिजे.
जपानबरोबर करावयाच्या युद्धात सर्वांचे सहाय्य मिळेल अशी आशा आहे.

त्याकरिता केंद्रीय सरकारच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येईल. गव्हर्नर जनरल व कमांडर-इन-चीफ याशिवाय सर्व सभासद भारतीय असतील.

त्यात सजातीय हिंदू व मुस्लीम यांचे प्रमाण समान राहील.
भारतीय गृहस्थाकडे परराष्ट्रीय खाते राहील व तोच देशाबाहेर भारताचे प्रतिनिधित्व करील.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

पक्ष नेते, प्रांतांचे आजी व माजी पंतप्रधान यांची परिषद व्हाईसरॉय बोलावतील. ते त्यांना याद्या द्यावयास सांगतील व त्यातून केंद्रीय कार्यकारिणीकरिता सभासद निवडतील.

केंद्रीय सहकार्य सुरू झाले म्हणजे प्रांतांतील 93 कलमी कारभार संपेल.

विद्यमान घटनेप्रमाणे जास्तीतजास्त व्यवहार्य सत्ता दिली जाईल. त्यामुळे भविष्यकालीन घटनांवर किंवा घटनेवर परिणाम होणार नाही.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

25 जून, 1945 रोजी परिषद चांगल्या वातावरणात सुरू झाली. युद्धाप्रयत्नात भारताचे सहकार्य, युद्ध संपेपर्यंत हंगामी सरकारचे अस्तित्व इत्यादी प्रश्नांवर सर्वांचे एकमत होते. तथापि, व्हॉईसरॉयच्या मंडळाच्या रचनेवर चर्चा येताच चर्चासत्राचे घोडे अडले. बॅ. जीनांनी नेहमीप्रमाणे अडवणुकीची भूमिका घेतली.

व्हॉईसरॉयच्या मंडळात हिंदू व मुस्लीम यांचे समान प्रतिनिधी असावेत हे राष्ट्रसभा व लीग यांना तत्वत: मान्य असल्यासारखे असले तरी राष्ट्रसभेने फक्त हिंदू, मुस्लीम, पारशी, हरिजन, शीख इत्यादी धर्माचे व जातीचे प्रतिनिधी पाठविण्याचा नैतिक हक्क होता. तो हक्कच जिना अमान्य करीत होते.

याशिवाय राज्यकारभाराच्या कोणत्याही प्रश्नावर मुस्लीम सभासदांनी बहुमताने संमती दिल्याशिवाय निर्णय होऊ नये असाही आग्रह त्यांनी धरला. हा आग्रह व्हॉईसरॉय मान्य करू शकले नाहीत.

त्यांनी 14 जुलैला परिषद अपयशी होऊन बरखास्त झाल्याचे जाहीर केले. याचा अर्थ, आता भारताचा राजकीय प्रश्न सोडविण्याच्या किल्ल्या इंग्रजांनी बॅ. जीनांच्या हाती दिल्या होत्या.

भारतातील सर्व मुस्लिमांचे आपण एकमेव प्रतिनिधित्व करत आहोत, हा त्यांचा दावा फोल होता. भारतात पंजाब व सरहद्द प्रांत या ठिकाणी इतरही मुस्लीम संघटना होत्या व तेथे पूर्वी त्यांची प्रांतीय सरकारेही होती. मुस्लिमांच्या इतर संघटना होत्या.

त्यांनाही कळून चुकले की, लीगशी सहकार्य केल्याशिवाय राजकीय प्रश्न सुटू शकत नाही. म्हणजे लीगचा पाया अधिकच भक्कम होऊ लागला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

"चलेजाव चळवळ १९४२"

नुकतेच ७५ वर्ष पुर्ण

(संकल्प से सिध्दी - घोषणा)


२अधिवेशने-

१-वर्धा -प्रस्ताव संमत

२-गवालिया टँक,मुंबई-सुरु


◾️ठराव मंजुर-८ अॉगस्ट १९४२


◾️कारण-

क्रिप्स वाटाघाडी फिस्कटल्या

जपाण आक्रमण

महागाईचा भडका

महायुध्द


◾️घोषणा-

चले जाव (युसुफ मेहेरअली)

करा अथवा मरा(गांधी)


◾️अटक-(अॉपरेशन झिरो अवर)

गांधी-आगाखाण पॕलेस,पुणे

नेहरु-अल्मोडा

जयप्रकाश नारायण-हजारीबाग कारागृह


◾️असहभागी घटक-

मुस्लीम लीग,

हिंदु महासभा

लिबरल पार्टी

भारतीय कम्युनीस्ट पक्ष


◾️पत्रीसरकार-

महाराष्ट्र - सातारा

उत्तर प्रदेश -बलिया (भारतातील पहिले )

बंगाल -मिदनापुर /तामलुक-(गांधी बुढी-मतंगिणी हाजरा)

बिहार -पुर्णिया


◾️गव्हर्नर -लाॕर्ड लिनलिथगो

INC चे अध्यक्ष-मौलाना आझाद


◾️९ अॉगस्टला गवालिया टॕंक वर झेंडा फडकवणारी महिला-अरुणा असफ अली.


सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे

* १८२९ : सती बंदीचा कायदा

* १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.

* १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.

* १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना

* १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव

* १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.

* १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.

* १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.

* १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत

* १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.

* १९०४ : अभिनव भारतची स्थापना

* १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.

* १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.

* १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.

* १९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.

* १९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह

* १९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.

* १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.

* १९०९ : मोर्ले- िमंटो सुधारणा.

* १९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.

* १९१५ : होरूल लीगची चळवळ.

* १९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.

* १९१६ : लखनौ करार.

* १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.

१९१९ : माँटफर्ड कायदा.

* १९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.

* १९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.

* १९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.

* १९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत  िहंसा

* १९२२ः राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.

* १९२३ : झेंडा सत्याग्रह.

* १९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.

* १९२७ : बार्डोली सत्याग्रह

* १९२७ मार्च : महाड सत्याग्रह.

* १९२८ : qहदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

* १९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू  रिपोर्ट

* १९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.

* १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.

* १९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.

* १९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.

* १९३१ : गांधी-आयर्विन करार.

* १९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.

* १९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसèया गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.

* १९३१ : भगतqसग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.

* १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.

* १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित

* १९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.

* १९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार

* १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.

* १९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.

* १९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन

* १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.

* १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.

* १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.

* १९३९ सप्टेंबर ३ : दुसèया महायुद्धाला सुरुवात.

* १९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.

* १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना

* १९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.

* १९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.

* १९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.

* १९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.

* १९४२ ऑगस्ट ८ : ङ्कछोडो भारतङ्कचा ठराव संत.

* १९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.

* १९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

* १९४४ मे : आझाद qहद सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे qजकले व भारतीय भूीवर पाय ठेवला.

* १९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.

* १९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.

* १९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.

* १९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.

* १९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.

* १९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.

* १९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश.

* १९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार

* १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.

* १९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.

* १९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.

* १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1) ग्लुकोजचा द्रवणांक ...... इतका आहे.

1) 150⁰c✅✅

2) - 150⁰c 

3)-218⁰c

4)218.4⁰c





2) अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डोमिश्रण हे .... आणि  .... पासून तयार करतात.

1) लाईम आणि सल्फर

2) लाईम आणि सोडियम

3) काॅपर सल्फेट आणि लाईम✅✅

 4)काॅपर सल्फेट आणि वेटेबल सल्फर





3) ब्रास हा मिश्र खालीलपैकी कोणत्या घटकानी बनलेला असतो ?

 1) काॅपर 80% + झिंक 10% + टिन 10%

2) काॅपर 80% + झिंक 20 %✅✅

3) काॅपर 80% + टीन 20 %

4) काॅपर 90 % + टीन 10 %




4)प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?

अ. प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर 

ब. प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर

क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर

ड. प्रकाशाच्या अपस्करण तत्वावरपर्यायी उत्तरे  


 1) अ, ब आणि क 

 2) फक्त क  

 3) ब आणि ड ✅✅

 4) फक्त ड






5)कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होताना .... वायूचे बुडबुडे धातूच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शियम पाण्यावर तरंगते.   

1) हायड्रोजन✅✅ 

2) ऑक्सिजन

3) कार्बन डायाॅक्साइड

4) अमोनिया






6) विद्युत दिव्यामध्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते, कारण :

1) टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत.✅✅ 

2) टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवितात.     

3)निष्क्रिय वायू विपूल व स्वस्त असतात. 

4) प्रकाशाची तीव्रता वाढविण्यास मदत करतात.






7) खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यास  ' फूल्स  गोल्ड ' ( मुर्खांचे सोने ) असे म्हणतात. 

1)  हेमाटाईट 

2) मॅग्नाटाईट

3) सायडेरेईट 

4) पायराईट ✅✅





8) C7H5NO3S हे खालीलपैकी कोणाचे रासायनिक सूत्र आहे. 

1) सेल्यूलोज

2) सुक्रोज

3) सॅकॅरिन ✅✅

4) ग्लुटेन 






9) सल्फर ट्रायऑक्साईडच्या उत्पादनासाठी...... चा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात .

1) व्हॅनॅडिअम पेंटाॅक्साईड ✅✅

2) मॅगेनीज डायऑक्साईड 

3) कॅल्शियम कार्बोनेट 

4) सिल्व्हर नायट्रेट   







10) पृथ्वीवरील महासागर व किनारी परिसंस्था यांनी खेचून घेतलेला ..... हा वायू ' ब्लू कार्बन ' या नावाने ओळखला जातो. 

1) नायट्रोजन 

2) ऑक्सिजन 

3) कार्बन डायऑक्साईड✅✅

4) हायड्रोजन

पचायत राज व्यवस्थेचा पूर्व इतिहास


पंचायत राज व्यवस्थेच्या मुळाचा शोध घ्यावयाचा झाल्यास भारतात अगदी प्राचीन काळापासून पंचायती अस्तित्वात असल्याचे दिसते. 


अर्थात आजच्या पंचायत राज पद्धतीपेक्षा त्याचे स्वरूप खूपच वेगळे होते.

गावातील हुशार, अनुभवी, आदरणीय अशी पंचमंडळी असायची. 


गावातील चावडी सारख्या सार्वजनिक ठिकाणी रोज सकाळी ही मंडळी बसायची आणि गावातील लोकांच्या अडचणी समजावून घेऊन मार्गदर्शन करावयाची.


 गावामध्ये काही वाद, भांडणे झाल्यास त्यामध्ये लक्ष घालून सोडविणे, गावचा विकास होण्यासाठी योजना आखणे, गावाचा कारभार चालविणे, गावाचा कर गोळा करून राजाला खंड वसूली देणे इ. कामे ही पंचमंडळी पार पाडीत असत.


 गावात त्यांना फार मान होता. गावकरी त्यांच्या शब्दाबाहेर जात नसत.

मौर्याच्या काळामध्ये तर त्यांना ग्रामशासनाचा अधिकार होता. व त्या दृष्टीने ह्या पंचायती खूपच विकसित झालेल्या होत्या. 


सन ८०० ते १००० च्या दरम्यान बोल घराण्याच्या इतिहासातील एकल येथील चौदा शिळा खऱ्या ग्रामपंचायतीच्या निर्देशक आहेत. आजच्या ग्रामपंचायती करीत असलेली विविध गाव विकासाची कामे या ग्रामपंचायती त्या वेळी करीत होत्या. 


ग्रामपंचायतीची निवडणूक दरसाल होत असे व सर्व सभासद लोकनियुक्त असत. त्यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांची देखरेखीसाठी नेमणूक होई.


 ग्रामपंचायतीकडे स्वतःच्या निधी असायचा.न्याय निवाडे ही पंचायत करी, फाशीची शिक्षा क्वचितच अंमलात येई. देवळात नंदादीप लावणे अगर पंचायतीस अमुक इतक्या गाई पुरविणे या गोष्टी शिक्षा म्हणून देत असत.



भारतात अनेक साम्राज्ये आली होती. बाहेरून आलेल्या मोगलांनी ही पद्धत स्विकारली. भारता सारख्या खंडप्राय खेडया पाड्यात विखुरलेल्या देशाला विकेंद्रित शासनाचीच जरुरी होती.


 त्यामुळेच ही पद्धत अनेक वर्षे टिकून होती. त्यातूनच खेडी स्वयंपूर्ण बनत होती. ग्रामीण कारागीर, कष्टकरी यांना पोट भरण्याकरीता व्यवसाय मिळत होता.



शिवाजी महाराजांच्या काळात

 ग्रामपंचायतीची पद्धत चोहीकडे चालू होती. तीच रयतेच्या सोयीची वाटल्यावरून महाराजांनी कायम ठेवली.


 रयतेला न्याय मिळवण्यासाठी लांब कुठे जावे लागू नये म्हणून गावातील पंचांनीच फुकट न्याय दयावा हे अभिप्रेत होते. छत्रपतीच्या काळात ग्रामपंचायती पूर्वीप्रमाणे चालू होत्या.



ब्रिटीशांच्या आगमनानंतर त्यांनी मात्र आपल्या आपल्या स्वार्थासाठी गावगड्यांची चालू व्यवस्था मोडीत काढून तलाठी पोलीस पाटील यांच्यापासून ते कलेक्टर पर्यंत नोकरशाहीची फौज निर्माण केली. 


१८८२ साली लॉर्ड रिपनने मर्यादित स्वरुपात स्थानिक स्वराज संस्थेचा कार्यक्रम अंमलात आणला. परंतु आरोग्य आणि प्राथमिक सोयी सुविधा पुरतेच त्यांचे उद्दिष्ट मर्यादित होते. 


त्यामध्ये स्वराज्याचा मागमूसही नव्हता. याच काळात तालुका लोकल बोर्ड, जिल्हा लोकल बोर्ड व काही मोठया गावात ग्रामपंचायती स्थापन झाल्या. या स्थानिक स्वराज्य संस्था स्वातंत्र्य प्राप्ती नंतरही काही काळ चालू होत्या.



देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात देशाच्या पुनुरुत्थापनाचा व नवनिर्माणाचा विचार सुरु झाला. त्यामध्ये गाव विकासाच्या दृष्टीने विचार होणे स्वाभाविक होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात खेडयाकडे जाण्याचा मार्ग दाखविला आणि ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नवा मुलभूत आणि व्यापक अर्थ मिळाला. 


१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि घटना समितीची स्थापना झाली. स्वातंत्र्य लढयात लोकांनी उराशी बाळगलेल्या ध्येयात ग्राम स्वराज्य हे सूत्र होते. 


त्यामुळे देशाची घटना होत असताना ग्रामपंचायतीचा स्वतंत्र तिसरा सत्र असावा अशी सूचना मांडण्यात आली. त्या सूचनेला घटना समितीतील काही लोकांनी विरोध केला. 


भारतीय समाज व्यवस्था जाती व्यवस्थेच्या उतरंडीवर आधारीत असल्यामुळे तथाकथित उच्च वर्गीय जातींना पंचायत व्यवस्थेत पंच म्हणून स्थान मिळत असे.


 तसेच गांवातील उच्च जातीय लोकच निर्णय घेण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असत. अशा रितीने या पूर्ण व्यवस्थेमध्ये स्त्रिया आणि तथा कथित खालच्या जातींना कोणतेही स्थान नव्हते..


 ही व्यवस्था समानतेवर आधारीत नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांचा या व्यवस्थेला विरोध होता. 


🔹परस्तावना🔹


आपल्या देशाच्या घटनेत १९९२ साली ७३ वी दुरुस्ती केली या दुरुस्तीमुळे आपल्या देशात पंचायत राज्यपद्धती सुरु झाली. या पंचायत राज्य पद्धतीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा नावाची एक यंत्रणा निर्माण केली आहे.

महाराष्ट्रात १९५८ साली ग्रामपंचायतीचा कायदा केला गेला. या कायद्यानेही प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा निर्माण केल्या होत्या. त्यांना आता ७३ वी घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने ग्रामसभा संदर्भामध्ये ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये काही सुधारणा मारून १६ ऑक्टोबर २००२ रोजी ग्रामपंचायत ‘सुधारणा अध्यादेश’ काढलेला आहे. त्यामुळे ग्रामसभांना अनन्य साधारण महत्त्व दिलेले असून पूर्वीच्या चार ग्रामसभा ऐवजी एकूण सहा ग्रामसभा अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत. तसेच महिलांच्या ग्रामसभा घेणेही बंधनकारक आहे. ग्रामसभांना या दुरुस्तीमुळे इतरही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत.


🔹गरामसभेचे सदस्य 🔹


पूर्वी राजे राज्य करीत. आता लोक राज्यकारभार पाहतात. ज्या कारभारात सर्व लोक सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या पद्धतीला प्रत्यक्ष सरकार अथवा प्रत्यक्ष [ स्थानिक पातळीवरची ] लोकशाही असे म्हणतात. ज्या कारभारात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या कारभार पद्धतीला अप्रत्यक्ष सरकार किंवा प्रतिनिधीचे सरकार असे म्हणतात.


🔹आपली ग्रामपंचायत ही अप्रत्यक्ष🔹


 कारभाराचे उदाहरण आहे तर ग्रामसभा ही प्रत्यक्ष कारभाराचे उदाहरण आहे आणि ग्रामपंचायतीच्या मतदारांची संस्था आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या गावातील व वाड्यावस्त्यामधील ग्रामपंचायतीचे मतदार हे ग्रामसभेचे सदस्य आहेत.


🔹गरामसभेचा कारभार 🔹


ग्रामसभेच्या सदस्यांनी एकत्र यावे. लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे. ग्रामपंचायतीला सल्ला दयावा आणि मार्गदर्शन करावे. थोडक्यात सांगावयाचे तर ग्रामसभेच्या सदस्यांनी गावांच्या विकासात सहभागी व्हावे. याशिवाय ग्रामसभेने, ग्रामपंचायतीने वर्षभरात गावांच्या विकासाची जी कामे केली असतील त्यांची माहिती व आढावा घ्यावा. ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विकासाची जी कामे करावयची ठरविले असेल त्यांची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने वर्षभर केलेल्या खर्चाचा हिशोब घ्यावा आणि पुढील वर्षी किती खर्च केला जाणार आहे त्याची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने हिशोब तपासताना हिशोब तपासणाऱ्या अधिकाऱ्याला ज्या शंका आल्या असतील त्या शंका जाणून घ्याव्यात आणि त्या शंकांना ग्रामपंचायतीने जी उत्तरे दिली असतील ती उत्तरे समजून घ्यावीत. ग्रामपंचायत करीत असलेल्या कारभाराची प्रश्न विचारून माहिती घ्यावी आणि ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात. म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामसभेने नियंत्रण ठेवावे आणि ग्रामपंचायतीवर निवडून दिलेल्या सदस्यांनी चांगली कामे केली तर प्रोत्साहन दयावे व त्यांच्याकडून कामे नीट होत नसतील तर त्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा आहे.


🔹गरामसभेचे पदाधिकारी 🔹


ग्रामसभेला पदाधिकारी नाहीत. ग्रामसभेला एक अध्यक्ष आहे. निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष व आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंचच असतो. त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच अध्यक्ष असतो. इतर ग्रामसभासाठी ग्रामसभेस उपस्थित असलेल्या सभासदापैकी एकाची बहूमताने अध्यक्ष म्हणून निवड करावी लागते. [ सन १९५९ चा अधिनियम क्रमांक ३ ]

अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीने ग्रामसभेची संपूर्ण बैठक पार पडेपर्यंत बैठकीचे नियमन करावे लागते. सुरुवातीस विषय पत्रिकेतील विषयांची यादी सर्वांना वाचून दाखवावी लागते. विषयास सुसंगत असा प्रश्न विचारण्याचा अधिकार ग्रामसभा सदस्यांना आहे. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अध्यक्षाने तोंडी दयावी लागतात. विषयाचे स्वरूप लक्षात घेऊन एखादया सभासदास चर्चा करण्यास किती वेळ द्यावयाचा हे ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. विषय पत्रिकेत नमुद केलेल्या विषयाशिवाय इतर विषयावर अध्यक्षांच्या परवानगी शिवाय चर्चा करता येत नाही.


🔴राज्य घटनेत करण्यात आलेला बदल🔴


७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाने “पंचायती” या शिर्षकाखाली “भाग ९-अ” हा नवा भाग राज्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये कलम २४३ ते कलम २४३-ओ अशी कलमे समाविष्ट केलेली आहेत. याशिवाय या कायदयाने राज्य घटनेला ११ वे परिशिष्ट जोडले असून त्यामध्ये पंचायत राज संस्थाच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या विषयांची माहिती दिली आहे.

७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज्यांची स्थापना करण्याचे बंधन प्रत्येक राज्यावर घातले आहे. त्यामुळे पंचायत राज्याची स्थापना ही आता राज्याची “घटनात्मक जबाबदारी” ठरली आहे. राज्य घटनेच्या २४३-बी या कलमान्वये राज्यामध्ये ग्राम, मध्य व जिल्हा स्तरावर पंचायतीची स्थापना करता येईल. मात्र ज्या राज्यांची लोकसंख्या वीस लाखांपेक्षा कमी असेल अशा राज्यात मध्यस्तरावरील पंचायतीची स्थापना केली नाही तरी चालेल, अशी सवलत देण्यात आली आहे.


🔴घटना दुरुस्तीचा मुख्य उद्देश🔴

पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणे हा ७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाचा मुख्य उद्देश होता. या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक संरक्षण मिळाले आहे. याचाच अर्थ असा की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याप्रमाणे पंचायत राज्यालाही राज्य घटनेची मान्यता मिळाली आहे. या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारे आता पंचायत राज्य संस्थांच्या बाबतीत पूर्वीप्रमाणे हस्तक्षेप व मनमानी करू शकत नाहीत. पंचायत राज्य संस्थांच्या निवडणूका घेणे किंवा त्यांना अधिकार देणे या गोष्टी आता राज्य सरकारच्या मर्जीवर पूर्वीप्रमाणे अवलंबून राहीलेल्या नाहीत. बऱ्याचशा वेळा राज्यामध्ये शासन करणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक घेण्याकरीता अनुकूल परिस्थिती नसल्यास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना मुदतवाढ देऊन निवडणुका पुढे ढकलल्या जात असत. महाराष्ट्रात एकेकाळी निवडणुकींना मुदतवाढ देऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका तब्बल १२ वर्षानंतर घेण्यात आल्या होत्या. आता दर पाच वर्षांनी निवडणुका घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. घटना दुरुस्तीमुळे राज्य घटनेमध्ये ज्याकाही तरतूदी असतील त्यांचे पालन करणे राज्य सरकारांना बंधनकारक आहे.


यशाची त्रिसूत्री

कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तीन गोष्टी अत्यंत आवश्यक असतात.

'✔️वेळ, 😥नियोजन आणि ✔️अंमलबजावणी'

कुठल्याही कामाला पुरेसा वेळ द्यावा लागतो. उगाच घाई-गडबड करून काम लवकर होण्याऐवजी बिघडण्याचीच जास्त शक्यता असते. त्यामुळे कुठलीही गोष्ट व्यवस्थित होण्यासाठी पुरेसा वेळ हा द्यावाच लागतो. हे समजून घेण्यासाठी रासायनिक अभिक्रियेचं(chemical reaction) उदाहरण नक्की समोर ठेवलं पाहिजे. आपल्याकडे आवश्यक ती सर्व साधने आहेत, प्रयोगशाळा आहे, आवश्यक ती तज्ज्ञता आहे, सर्व अभिक्रियाकारके (reactants) आणि उत्प्रेरके(catalysts) हे सर्व असलं आणि आपण सर्व प्रक्रिया पूर्ण केली तरीही हवा तो product तयार होण्यासाठी आपल्याला आवश्यक तो वेळ हा द्यावाच लागतो. याला म्हणायचं time constant, हा ठरलेला असतोच. आपल्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातही तो असतोच आवश्यक त्या सर्व गोष्टी पुस्तकं, अभ्यासिका, test series हे सर्व उपलब्ध असूनही वेळ द्यावा लागणारच असतो कारण काही गोष्टींमध्ये वेळेनुसारच maturity येत असते. Teachers/Mentors हे Catalysts प्रमाणे काम करून हा वेळ थोडाफार कमी करू शकतात एवढंच परंतू हवं ते product म्हणजे यश मिळवण्यासाठी स्वत:च transform होणं आवश्यक असतं.

दुसरं म्हणजे नियोजन. कितीही वेळ दिला तरीही आपल्याकडे योग्य नियोजन नसेल तरीही आपल्याला यश मिळणं अवघड आहे. कारण क्षेत्र कुठलंही असलं तरीही यश हा काही अपघात किंवा योगायोग नसतो म्हणून काटेकोर नियोजन असणं अत्यावश्यक आहे. यामध्ये long term, short term planning तसेच macro and micro management चं महत्त्व असतं.

तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंमलबजावणी कारण प्रत्यक्ष कृतीविना सर्व संकल्प निरर्थक असतात.
(क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे) ही बऱ्याच जणांची समस्या असते.. कळतंय पण वळत नाही अशी स्थिती असते.. प्रत्यक्ष कृती करणे आणि त्यात सातत्य आणि सुधारणा राखने हे सर्वात मोठं आव्हान असतं. ह्याच टप्प्यावर out of the control factors आपल्याला सर्वाधिक त्रास देतात म्हणून अंमलबजावणीच्या वेळी मानसिक स्थिरता अत्यंत आवश्यक असते. ही स्थिरता आपण केलेल्या नियोजनावर आणि करत असलेल्या अभ्यासावर आपला पूर्ण विश्वास असल्यास मिळू शकते. अभ्यासिकेत किती वेळ बसतोय किंवा किती pages वाचून काढलेत यापेक्षा किती घटकांचा अभ्यास मी व्यवस्थित पूर्ण केला या गोष्टीला यामध्ये सर्वाधिक महत्त्व आहे. म्हणून दिखाऊपणा किंवा अवडंबर म्हणून पहाटे चार ला उठून अभ्यासाला बसने किंवा रात्र जागून काढून अभ्यास करणे असं काहीही अचाट न करताही व्यवस्थित, नियोजनपूर्वक आणि सातत्यपूर्ण पद्धतीने आपला अभ्यास आपण पूर्ण केला, micro notes काढल्या, multiple revisions केल्या तर यश आपल्याला नक्की मिळेल.

शेवटी पुन्हा एकच  क्षेत्र कुठलंही असलं तरीही यश हा काही अपघात किंवा योगायोग नसतोच तर परिपूर्ण नियोजन आणि कठोर अंमलबजावणीचा तो परीणाम असतो.
म्हणून वेळ द्या, नियोजन करा आणि अंमलात आणा.
स्व.बाबा आमटेंच्या शब्दांत सांगायचं झालं तर "भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा"

सयुक्त पूर्वपरीक्षा चा अभ्यास कसा करावा?

पूर्व परीक्षा (थोडक्यात)

 

 स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करताना आपल्या मनात खूप गोष्टी आश्वासक पणे भरलेल्या असतात...लायब्ररी  मधे बसुन जेव्हा कंटाळा येतो तेव्हा प्रेरणादायी भाषण ऐकून आपन खूप उत्साहित होतो (माझेच भाषण ऐकून प्रेरित होणारे खूप आहेत पण अशी प्रेरणा 4-5 दिवसच  टिकते) तो उत्साह मनापासून यावा लागतो..नुसत inspirational speech बघून पोस्ट निघत नाही त्यासाठी खूप मनापासून कष्ट करावे लागतात.. नुसत घोकंपट्टी किंवा पुस्तके संपवून काही उपयोग नसतो..एकाच टॉपिक साठी 5-6 पुस्तके वापरतो आपन जे की पूर्णपणे चुकीचे आहे..चहाच्या नावाखाली 1-2 तास घालवणे म्हणजे refreshment अशी व्याख्या बनवली आपण..आठवड्यातून एक दिवस सुट्टी fix (पन मित्रांनो परीक्षा ही परीक्षा असते, ती रविवार, दिवाळी, दसरा, जत्रा, गणपती, ऊन,वारा, पाऊस असल काही बघत नसते, ती त्याच दिवशी होते..ONLINE STUDY च्या नावाखाली what's app, फेसबुक जोमात चालू असत. ऑनलाईन अभ्यास करून जास्त फायदा नाही (माझ वैयक्तिक मत आहे) कारण ऑनलाईन अभ्यासाची revision आपल्याकडून होत नाही…

#पूर्व परीक्षा - सर्वप्रथम आपल्या हे लक्षात आले पाहिजे की पूर्व परीक्षा कशासाठी आहे. 4-5 लाख विद्यार्थ्यांमध्ये 300-400 विद्यार्थी निवडायचे म्हणजे पूर्व लाच मोठी चाळण आहे. त्यासाठी पूर्व परीक्षेचा अभ्यास मुख्य परिक्षा पेक्षा जास्त लागतो. स्कोर असा आणायचा की merit मधे १० ते १५ मार्क्स जास्त.. पूर्व परीक्षेला topic खूप लिमिटेड असतात आणि फिक्स पण असतात.

#जेव्हा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा अगोदर जुन्या question paper बघणे. आपल जेवढे चुकेल तेवढे लक्षात राहत. . त्यातून कळत काय करायच अणि काही नाही. मधे मधे कंटाळा आला तरी लगेच Question paper किंवा maps उघडायचे.. मी खूप question paper सोडवले, अगोदर आयोगाचे सोडवणे नंतर क्लासेस चे. (पैसे नसतील तर झेरॉक्स कॉपी आणून लायब्ररी मधे बसुन सोडवणे) . जेणेकरून मला पेपर चा पॅटर्न कळायला सोप गेल. एक वेळ वाचन कमी पण प्रश्ण जास्त. 

#उदाहरणार्थ - आधुनिक भारत आणि महाराष्ट्र चा detail अभ्यास करावा लागतो.

#भूगोल - संयुक्त पूर्व साठी साठी महाराष्ट्र आणि भारत या दोन गोष्टींकडे खूप वेळ द्यावा..आणि भूगोल चा अभ्यास करताना नेहमी ATLAS समोर असावा...कंटाळा आला की ATLAS पहायचा म्हणजे bor पण होत नाही... कोरे कागद घेऊन नद्या, पर्वत, ठिकाणे रेखाटत रहायची. Blank नकाशे घेऊन त्यावर पण नुसते marking करायच्या.. त्याने वाचायचा तान कमी होतो..  आपल्या संयुक्त पूर्व साठी महाराष्ट्र पूर्ण फोकस आणि भारत questions बघून करायला हवा. जग आणि फिजिकल चा एवढा उपयोग होत नाही. 

#Polity- संयुक्त पूर्व साठी आपन पूर्ण पुस्तक माहीत असण्यापेक्षा कलम 1 ते कलम 51A यांच्या बरोबरच कलम 52 ते 202 पर्यन्त सविस्तर माहिती, सर्व घटनादुरुस्ती, सर्व भाग अणि सर्व कलमाचे titles माहीत हवेत...पंचायतराज पण महत्वाचा आहे. (म्हणजे 2-3 प्रश्न येतात). आपण किमान निवडख घटक करून ठेवले तर फायदा आहे. या निवडक घटकांवर मी लिस्ट आपल्या The Achiever's Mentorship या टेलिग्राम चॅनल वर दिलेली आहे.

#अर्थशास्त्र - हा विषय बर्‍याच जणांना अवघड, किचकट वाटतो पण out of मार्क्स देणारा आहे हा.. पूर्व साठी खूप लिमिटेड टॉपिक आहेत. आर्थिक विकास (HDI) दारिद्रय़, बेरोजगारी. बॅंकिंग, World trade organization, IMF. world Bank. And some basic concepts like GDP. GNI. etc..


#Science -यामधे biology(human diseases, various systems,) अणि अलीकडे गणिते(mostly based on physics) यावर जास्त भर द्यावा लागेल कारण गेल्या दोन वर्षी पासून त्यावर जास्त question विचारतात. खर तर science खूप मोठा subject आहे पण त्याचे मार्क्स सुद्धा तेवढेच येतात. 14-15 question येतात.. पूर्व परीक्षेत science आणि csat (apti reasoning) या दोन गोष्टींवर मोठे लीड मिळू शकते..



#चालू घडामोडी - हमखास मार्क्स देणारा टॉपिक.. मागच्या एक वर्षातील परिक्रमा आणि कुठलेही 2 पुस्तके म्हणजे कुठल्याही एकाच प्रकाशन च्या मागील दोन आवृत्त्या. (dnyndeep, Unique, अभिनव प्रकाशन) वापरले तर बर्‍यापैकी मार्क्स मिळतात..


आपल्या ला mpsc मधे ज्ञान नाही तर मार्क्स मिळवावे लागतात (पर्सनल ओपिनियन) ..हा वास्तववादी दृष्टिकोन आहे. 

राहिला प्रश्ण गणिताचा तर बर्‍याच लोकांना गणिते अवघड जातात. मला पण खुप अवघड जायचे पण सगळेच गणिते सुटावी अस काही बंधन नाही. 15 पैकी 7-8 reasoning and 7-8 aptitude असतात.. 12 प्रश्न सोडवले तरी एक दोन चुकून देखील जास्त मार्क्स मिळतात. आणि गणित येत नसेल तर रिजनिंग व्यवस्थित सोडवणे 


# जर group discussion करायला जमत असेल तर नक्की करा. कारण दिवसभर अभ्यास करून कंटाळा आला असतो मग discussion मूळे refreshment होत राहते. थोडा फार जोक्स. मस्ती चालू असते पण खूप वेळ नको घालवायला त्यातच. 

मी booklistऑलरेडी अपलोड केली आहे..

शेवटी# MINIMUM READING, MAXIMUM REVISION. हेच परीक्षा पास होण्याच सूत्र आहे.. 

तुम्हाला येणाऱ्या मधील पूर्व परीक्षा साठी खूप खूप शुभेच्छा. मी BEST LUCK अस म्हणत नाही तर MAKE YOUR LUCK BEST अस म्हणतोय कारण आपल नशीब आपणच घडवू शकतो. 

#Share करा. जर at least 10-12 जणांना तरी याचा फायदा झाला तर मी एवढ टाइप केलेल सार्थक झाल म्हणुन समजेल. 

Thank you. 


गणितातील महत्वाची सूत्रे

🔴 सरासरी 🔴

1) N संख्यांची सरासरी = दिलेल्या संख्यांची बेरीज / n, n = एकूण संख्या

 

2) क्रमश: संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते.

उदाहरणार्थ – 12, 13, [14], 15, 16  या संख्या मालेतील संख्यांची सरासरी = 14

 

संख्यामाला दिल्यावर ठरावीक संख्यांची (n) सरासरी काढण्यासाठी

 

n या क्रांश: संख्यांची सरासरी = (पहिली संख्या + शेवटची संख्या) / 2

 

उदा. 1) क्रमश: 1 ते 25 अंकांची सरासरी = 1+25/2 = 26/2 = 13

 

2) 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी =1+19/2 =20/2 =10

 

3) N या क्रमश:  संख्यांची बेरीज = (पहिली संख्या + शेवटची संख्या) x n/ 2

 

उदा. 1) 1 ते 100 अंकांची बेरीज = (1+100)x20/2 = 81x20/2 = 810

 

(31 ते 50 संख्यांमध्ये एकूण 20 संख्या येतात. यानुसार n = 20) 

 

 सरळव्याज :-

·         सरळव्याज (I) = P×R×N/100

·         मुद्दल (P) = I×100/R×N

·         व्याजदर (R) = I×100/P×N

·         मुदत वर्षे (N) = I×100/P×R

·         चक्रवाढव्याज  रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे  

 नफा तोटा :-

·         नफा = विक्री – खरेदी    
 

·         विक्री = खरेदी + नफा     

·         खरेदी = विक्री + तोटा 

·         तोटा = खरेदी – विक्री    
 

·         विक्री = खरेदी – तोटा   
 

·         खरेदी = विक्री – नफा 

·         शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 

·         शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 

·         विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100 

·         विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100 

·         खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)

·         खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 – शेकडा नफा)  

 आयात, चौरस, त्रिकोण, कोन :-

·         आयत -
आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी)   
    

·         आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी 

·         आयताची लांबी = (परिमिती ÷ 2) – रुंदी    
 

·         आयताची रुंदी =(परिमिती÷2) – लांबी 

·         आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.

·         आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. 

·         चौरस -

·         चौरसाची परिमिती= 4×बाजूची लांबी     

·         चौरसाचे क्षेत्रफळ=(बाजू)2 किंवा (कर्ण)2/2 

·         चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. 

·         दोन चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या मापांच्या वर्गाच्या पटीत असते.

   समभुज चौकोण -

·         समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ     

·         = कर्णाच्या लांबीचा गुणाकार/2 

·         समलंब चौकोण -

·         समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = समांतर बाजूंच्या लांबीचा बेरीज×लंबांतर/2 

·         समलंब चौकोनाचे लंबांतर = क्षेत्रफळ×2/समांतर बाजूंची बेरीज 

·         समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज = क्षेत्रफळ×2/लबांतर 

·         त्रिकोण -

·         त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची/2

·         काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ    
 

·          

·         = काटकोन करणार्‍या बाजूंचा गुणाकार/2

·          

·         पायथागोरस सिद्धांत -

·         काटकोन त्रिकोणात (कर्ण)2 = (पाया)2+(उंची)2 

 प्रमाण भागिदारी :-

·         नफयांचे गुणोत्तर = भंडावलांचे गुणोत्तर × मुदतीचे गुणोत्तर 

·         भंडावलांचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ मुदतीचे गुणोत्तर 

·         मुदतीचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ भंडावलांचे गुणोत्तर 

 गाडीचा वेग – वेळ – अंतर :-

A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 

B) पूल ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी / ताशी वेग × 18/5 

C) गाडीचा ताशी वेग  = कापवयाचे एकूण एकूण अंतर / लागणारा वेळ  × 18/5

 

D) गाडीची लांबी  = ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारा वेळ × 5/18

 

E) गाडीची लांबी + पूलाची लांबी = ताशी वेग × पूल ओलांडताना लागणारा वेळ × 5/18

 

F) गाडीची ताशी वेग व लागणारा वेळ काढताना 18/5 ने गुण व अंतर काढताना 5/18 ने गुणा.

1 तास = 3600 सेकंद / 1 कि.मी. = 1000 मीटर  = 3600/1000 = 18/5

 

G) पाण्याचा प्रवाहाचा ताशी वेग = (नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग – प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग) ÷ 2

 

H) गाडीने कापावायचे एकूण अंतर – गाडीची लांबी = बोगध्याची लांबी

 

I) भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ

 

= वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा वेग / वेगातील फरक

 

लागणारा वेळ = एकूण अंतर / दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज

 

************************************************************************

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...