११ मार्च २०२४

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

Q.1) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला?
उत्तर - तमिझगा वेत्री कळघम (TVK)

Q.2) नुकतेच वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - डॉ राजाध्यक्ष

Q.3) सलग सहा वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या अर्थमंत्री कोण ठरल्या आहेत?
उत्तर – निर्मला सीतारामन

Q.4) खेलो इंडिया विंटर गेम 2024 च्या शुभंनकराला काय नाव देण्यात आले आहे?
उत्तर – शीन-ए-शी

Q.5) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे प्रकाशित करप्शन परप्शन इंडेक्स 2023 मध्ये भारत किती वाजता आली आहे?
उत्तर – 93 व्या

Q.6) अलीकडेच प्रकाशित भारतातील हिमबिट्या स्थितीबाबतच्या अहवालानुसार भारतातील हिम बिबट्यांची संख्या किती आहे?
उत्तर – 718

Q.7) भारत ऊर्जा सप्ताहाची दुसरी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?
उत्तर – गोवा

Q.8) अलीकडेच राष्ट्रपती द्रोपती मर्मु यांनी राज्यसभा सदस्य म्हणून कोणाला नामनिर्देशित केले आहे?
उत्तर – सतनाम सिंग संधू

Q.9) महाराष्ट्राचे उदय विश्वनाथ देशपांडे यांना 2024 चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
उत्तर – मल्लखांब

Q.10) मेघालय खेळांच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
उत्तर – द्रोपती मुर्मु

Q.11) सुलतान इब्राहिम इस्कंदर हे कोणत्या देशाची 17वे राजा बनले आहेत?
उत्तर – मलेशिया

Q.12) नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या ‘एक समंदर, मेरे अंदर’ या कवितासंग्रहाचे लेखक कोण आहेत?
उत्तर – संजीव कुमार जोशी

Q.13) जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर – 2 फेब्रुवारी

Q.14) भारतीय तटरक्षक दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – 1 फेब्रुवारी

Q.15) अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवली आहे?
उत्तर –  श्रीलंका

प्रश्न – नुकताच ‘जागतिक कर्करोग दिन’ 2024 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – ४ फेब्रुवारी

प्रश्न – कोरोमंडल खतावर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 5.92 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे?
उत्तर - तामिळनाडू

प्रश्न – NCPCR ने नुकतेच मुलांचे पुनर्संचयित करण्यासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी कोणत्या पोर्टलचे अनावरण केले आहे?
उत्तर – घर आणि ट्रॅक चाइल्ड

प्रश्न – अलीकडेच, आर्थिक वर्ष 2024-25 साठी सार्वभौम सुवर्ण रोखे जारी करण्याची रक्कम किती करण्यात आली आहे?
उत्तर - 3500

प्रश्न – कोणत्या देशाने अलीकडेच भारताला ३१ प्रिडेटर ड्रोन विकण्याची परवानगी दिली आहे?
उत्तर अमेरीका

प्रश्न – पूर्व क्षेत्र कृषी मेळा 2024 नुकताच कुठे सुरू झाला?
उत्तर - झारखंड

प्रश्न – अलीकडेच जरी रितू बहरी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - उत्तराखंड

प्रश्न – माहिती आणि प्रसारण सचिव म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - संजय जाजू

प्रश्न – नुकताच केरळमधील शंकर स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर – ईश्वरी प्रसाद नंबूदिरी

प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय डार्विन दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – १२ फेब्रुवारी

प्रश्न – अलीकडेच, कोणत्या राज्याने देशात प्रथमच सेमीकंडक्टर धोरण लागू केले आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश

प्रश्न – सुत्तूर यात्रा महोत्सव 2024 नुकताच कोठे सुरू झाला?
उत्तर - कर्नाटक

प्रश्न – अलीकडेच श्रीलंका आणि कोणत्या देशाने अक्षरशः UPI सेवा सुरू केली आहे?
उत्तर - मॉरिशस

प्रश्न – कोणत्या IIT ने अलीकडेच प्रगत आरोग्य सेवेसाठी स्वास्थ प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे?
उत्तर - IIT गुवाहाटी

प्रश्न – अलीकडेच अलेक्झांडर स्टबने कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे?
उत्तर - फिनलंड

प्रश्न – अलीकडेच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने 'जादुई उपायांवर' बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे?
उत्तर - आसाम

प्रश्न – अलीकडेच पीपी नंबियार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - एस सोमनाथ

चालू घडामोडी :- 10 मार्च 2024

◆ 10 मार्च रोजी भारतात ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना दिवस’ साजरा केला जाणार आहे.

◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 12 मार्च रोजी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

◆ ‘देवेंद्र झझारिया’ भारतीय पॅरालिम्पिक समितीचे (PCI) नवे अध्यक्ष बनले आहेत.

◆ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

◆ रमेश सिंग अरोरा हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील पहिले शीख मंत्री बनले आहेत.

◆ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरूमध्ये भारतातील सर्वात वेगवान 'मल्टीप्रोटोकॉल लेबल स्विचिंग राउटर' लाँच केले आहे.

◆ भारत आणि बांगलादेश दरम्यान 54 वी महासंचालक स्तरावरील परिषद झाली.

◆ हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी 'शहीद राजा हसन खान मेवाती' यांच्या 15 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले.

◆ पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष असिफ अली झरदारी यांची पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी(14वे राष्ट्राध्यक्ष) निवड करण्यात आली.

◆ असिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे दोनवेळा राष्ट्राध्यक्ष होणारे ते बिगर लष्करी नेते आहेत.

◆ 2020-21 साठी देण्यात येणारा शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक पुण्यातील जनसेवा फाउंडेशनला जाहीर करण्यात आला आहे.

◆ सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ या पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही.

◆ जगभरातील 112 देशांतील सौंदर्यवतींनी हजेरी लावलेल्या व मुंबईत रंगलेल्या 'मिस वर्ल्ड 2024' स्पर्धेत चेक रिपब्लिकच्या 'क्रिस्तिना पिझकोव्हा' ठरली 'मिस वर्ल्ड'ची मानकरी.

◆ 71व्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत लेबनॉनच्या यास्मिना झेतौन हिने द्वितीय स्थान पटकावले.

◆ 28 वर्षांनी भारतात झालेल्या या स्पर्धेत भारताच्या सिन्नी शेट्टी हिने भारताचे प्रतिनिधित्व केले.

◆ भारताने आतापर्यंत सहा वेळा 'मिस वर्ल्ड' ही स्पर्धा जिंकलेली आहे.

◆ 13 हजार फूट उंचीवरील जागतील सर्वाधिक लांबीच्या "सेला" बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मार्च 2024 रोजी अरुणाचल प्रदेशात केले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

नवरत्न दर्जा प्राप्त उद्योग (ऑक्टोबर 2023 पर्यंत)

1) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)
2) कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
3) इंजिनियर्स इंडिया लिमिटेड
4) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
5) महानगर टेलिफोन निगम लिमिटेड
6) नॅशनल ल्युमिनियम कंपनी लिमिटेड
7) नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड
8) एनएमडीसी लिमिटेड
9) नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड
10) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
11) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
12) रेल विकास निगम लिमिटेड
13) ओएनजीसी विदेश लिमिटेड
14) राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड
15) इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON)
16) RITES लिमिटेड

नवरत्न दर्जा :- 1997 पासून नवरत्न दर्जा दिला जातो.

यासाठी खालील निकष पूर्ण करावे लागता :-
1] कंपनीला मिनीरत्न (श्रेणी-1) दर्जा असावा.
2] गेल्या पाच वर्षांपैकी तीन वर्षांमध्ये मेमोरँडम ऑफ अंडरस्टैंडिंग सिस्टम अंतर्गत 'उत्कृष्ट' किंवा 'अतिशय चांगले' रेटिंग प्राप्त केलेले असावे.
3] त्या कंपनीच्या संचालक मंडळावर 4 स्वतंत्र संचालक असावे.
4] पुढील सहा निवडलेल्या कामगिरी निकषांमध्ये 60 किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त होणे गरजेचे असते.
a] निव्वळ मूल्याशी निव्वळ नफ्याचे प्रमाण
b] एकूण उत्पादन खर्चापैकी एकूण मनुष्यबळ खर्च
c] नफ्याचे वापरलेल्या भांडवलाशी प्रमाण
d] नफ्याचे उलाढालीशी प्रमाण
e] प्रती शेअर प्राप्ती
f] अंतर-क्षेत्रीय प्रगती

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पाचवी व्याघ्रगणना 2022

◆ 9 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी भारताची व्याघ्र गणना 2022 ची आकडेवारी जाहीर केली.

◆ Project Tiger सुरुवात :- 1 एप्रिल 1973.

◆ "Project Tiger" ला 1 एप्रिल 2023 रोजी 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "50₹" चे एक विशेष नाणे जारी केले.

◆ पहिली व्याघ्र गणना 2006 साली करण्यात आली. जगातील एकूण वाघांपैकी 75% वाघ भारतात आहेत.

◆ 2022 च्या आकडेवारी नुसार भारतात
"एकूण वाघांची संख्या 3167" इतकी आहे.

◆ मागील चार वर्षात एकूण वाघांच्या संख्येत 6.7%(चार वर्षात 200 वाघांची वाढ) वाढ झाली आहे.

➤ 2022 च्या पाचव्या व्याघ्रगणनेनुसार पाहिले पाच राज्ये :-
1) मध्यप्रदेश (526), 2) कर्नाटक (524),
3) उत्तराखंड (442), 4) महाराष्ट्र  (312),
5) तामिळनाडू (264)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या

1] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (BHEL)
2] भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL)
3] कोल इंडिया (CIL)
4] गेल इंडिया (GAIL)
5] हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL)
6] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL)
7] NTPC लिमिटेड
8] तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC)
9] पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC)
10] पॉवर ग्रिड कॉर्पो. ऑफ इंडिया (PGCIL)
11] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL)
12] ग्रामीण विदयुतीकरण निगम (RECL)
13] ऑइल इंडिया लिमिटेड (OIL)

महारत्न दर्जा :-
19 मे 2010 पासून महारत्न दर्जा देण्यास सुरुवात झाली.

यासाठी आवश्यक निकष :-
1] संबंधित कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त असावा.
2] ती कंपनी भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असावी.
3] मागील 3 वर्षांतील सरासरी वार्षिक उलाढाल 25,000 कोटी रुपयांपेक्षा पेक्षा जास्त असावे.
4] मागील 3 वर्षांतील सरासरी वार्षिक निव्वळ मूल्य 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावे.
5] मागील 3 वर्षांतील वार्षिक निव्वळ नफा 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावा.
6] कंपनीची लक्षणीय जागतिक उपस्थिती असावी.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

देशात CAA कायदा लागू! केंद्र सरकारकडून सीएएची अधिसूचना जारी !

👉 नागरिकत्व सुधारणा कायदा, 2019 :-
◆ CAA :- Citizenship (Amendment) Act, 2019
◆ 2016 मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) सादर करण्यात आले. 12 ऑगस्ट 2016 रोजी ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले.
◆ 09 डिसेंबर 2019 :- अमित शहा यांनी विधयक लोकसभेत मांडले.
◆ 09 डिसेंबर 2019 :- लोकसभेत 311 विरुद्ध 80 मतांनी मंजूर
◆ 11 डिसेंबर 2019 :- राज्यसभेत 125 विरुद्ध 105 मतांनी मंजूर
◆ 12 डिसेंबर 2019 :- राष्ट्रपतींची स्वाक्षरी
◆ 10 जानेवारी 2020 :- CAA देशभरात लागू झाला.
◆ या कायद्यानुसार नागरिकत्व कायदा, 1955 मध्ये सुधारणा करण्यात आली.

👉 CAA मधील महत्त्वाच्या बाबी :-
सहा धर्म :- हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि ख्रिश्चन.
तीन देश :- अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश.
31 डिसेंबर 2014 च त्यापूर्वी आलेल्या अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांगलादेशमधील अल्पसंख्याकांना नागरिकत्व दिले जाणार.

👉 कायदा कुठे लागू नसणार :-
हा कायदा सहाव्या अनुसूचीमध्ये असणाऱ्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी क्षेत्रांना.
इनर लाईन परमिट असणाऱ्या अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मणिपूर राज्यांतील प्रतिबंधित क्षेत्रांना.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

96 व्या ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी

• बेस्ट फिल्म- ओपेनहायमर
• बेस्ट अ‍ॅक्टर- सिलियन मर्फी (ओपेनहायमर)
• बेस्ट अ‍ॅक्ट्रेस- एम्मा स्टोन (बार्बी)
• बेस्ट डायरेक्टर- सिलियन मर्फी (ओपेनहायमर)
• बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस- डा'वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओवर्स)
• बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट- वॉर इज़ ओव्हर
• बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर- द बॉय अँड द हेरॉन
• बेस्ट अ‍ॅडेप्टेड स्क्रीनप्ले कॅटेगरी- अमेरिकन फिक्शन
• बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले- अ‍ॅनाटॉमी ऑफ ए फॉल (जस्टिन ट्रिट आणि ऑर्थर हरारी)
• बेस्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंग- पुअर थिंग्स
• बेस्ट प्रोडक्शन डिझाइन- पुअर थिंग्स (डिझायनर जेम्स प्राइस आणि शोना हीथ)
• बेस्ट कॉस्ट्यूम कॅटेगरी- पुअर थिंग्स
• बेस्ट इंटरनॅशनल फीचर- द ज़ॉन ऑफ़ इंटरेस्ट (जोनाथन ग्लेज़र)
• बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर- रॉबर्ट डाउनी ज्युनिअर (ओपेनहायमर)
• बेस्ट व्हिज़ुअल इफ़ेक्ट- गॉडज़िला मायनस वन
• बेस्ट फिल्म एडिटिंग- ओपेनहायमर
• बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट- द लास्ट रिपेयर शॉप
• बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर- 20 डेज इन मारियुपोल
• बेस्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट- द वंडरफुल लाईफ ऑफ हेनरी शुगर
• बेस्ट सिनेमॅटोग्राफी - डच-स्वीडिश सिनेमॅटोग्राफर होयटे वॅन होयटेमा (ओपेनहायमर)
•बेस्ट ओरिजनल स्कोर-  लुडविग गोरान्सन (ओपेनहायमर)
• बेस्ट ओरिजनल साँग- व्हाट वॉज आय मेड फॉर? (बॉर्बी)

(आगामी परीक्षेसाठी महत्वाचे वाचून घ्या)🙏

══━━━━━ ❉ ━━━━━══

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :

1) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र

2) जीएसटीमध्ये नवीन 522 पदांना मान्यता

3) बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार

4) बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार.

5) एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी 24 हजार कोटीची शासन हमी

6) मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून 850 कोटी अर्थ सहाय्य घेणार

7) राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद

8) राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प

9) एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना 3 आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने

10) विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना

11) अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड

12) मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार

13) डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश

14) शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक

15) उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ

16) 61 अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता

17) राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना; 53 कोटी 86 लाख खर्चास मान्यता

18) आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना

19) राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता

══━━━━━ ❉ ━━━━━═

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे



📌 महाराष्ट्र पठार निर्मिती ही   🌋जवालामुखीच्या  उद्रेकामुळे झालीआहे

📌 गरम पाण्याचे झरे हे ज्वालामुखी उद्रेकाचे पुरावे देतात

📌 यातूनच सहयाद्री पर्वतरांग तयार झाली जी प्रमुख पश्चिम वाहिनी आणि पुर्व वहिनी नद्यांची जलविभाजक बनली.

📌 महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची उंची ही उत्तरे कडून दक्षिणेकडे कमी कामी होत जाते

🔰 महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे 🔰

  🎇 कळसुबाई  1,646 मी अहमदनगर

  🎇 साल्हेर 1,567 मी नाशिक

  🎇 महाबळेश्वर 1,438 मी सातारा

  🎇 हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर
 
  🎇 सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार

  🎇 तोरणा 1,404 मी पुणे

  Trick 👇👇
🏆 कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो 🏆

  🌸 क  = कळसुबाई
  🌸 सा  = साल्हेर
  🌸 मी  = महाबळेश्वर
  🌸 हा   = हरिश्चंद्रगड
  🌸 स   =सप्तश्रृंगी
  🌸 तो   = तोरणा
  🌸 अ  =  अस्तंभा
  🌸  तर  =  त्र्यंबकेश्वर
  🌸 तिला =  तौला
  🌸 वि    = विराट
  🌸 चा    = चिखलदरा

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)



गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.

त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.

१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.

आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते.

या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या.

प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले.

प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,

त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.

या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.

भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.

या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.

आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती.

अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.

चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.

राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.

या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.

या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.
-----------------------------

खिल्जी घराण्याचा कर्तबगार सुल्तान

🔹अल्लाउद्दीन खिलजी


सुलतान अल्लाउद्दीन खिलजी

अधिकारकाळ- १२९० ते १३१६

राज्याभिषेक- १२९६

राजधानी- दिल्ली

पूर्ण नाव- अल्लाउद्दीन जलालुद्दीन खिलजीलख्नौती (बंगाल)

मृत्यू- १३१६ दिल्ली

पूर्वाधिकारी- जलालुद्दीन फिरोझ खिलजी

उत्तराधिकारी- कुतुबुद्दीन मुबारक शाह

राजघराणे- खिलजी


अल्लाउद्दीन खिलजी (मृत्यू: इ.स. १३१६) इ.स.च्या तेराव्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता. त्याने इ.स. १२९६ ते इ.स. १३१६ या कालावधीत राज्य केले. तो खिलजी घराण्यातील सर्वात कर्तबगार सुलतान समजला जातो. त्याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्याचा वजीर मलिक काफूर ह्याने कारभार चालवला.


अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीवर राज्य करणाऱ्या खिलजी घराण्यातला दुसरा सुलतान होता. पहिला सुलतान त्याचा काका जलालुद्दीन खिलजी. अल्लाउद्दीनने गादीवर येण्यापूर्वी जलालुद्दीनची २२ ऑक्टोबर १२९६ला हत्या केली होती.

महाराष्ट्राचा इतिहास




*⭕️ मौर्य ते यादव ⭕️*

*(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)*


*👉 मौर्य साम्राज्याचा काळ*

महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.


*👉 सातवाहन साम्राज्याचा काळ*

सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.


*👉 वाकाटकांचा काळ*

वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.


*👉 कलाचुरींचा काळ*

वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.


*👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ*

वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.


*👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ*

वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.


*👉 यादवांचा काळ*

महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.
________________________________

वडियार घराणे :: म्हैसूर

◾️राजधानी :- म्हैसूर, श्रीरंगपट्टण

◾️राष्ट्रप्रमुख:- पहिला राजा: यदुराय
(इ.स. १३९९-१४२३)

◾️अंतिम राजा: जयचामराज वडियार
(इ.स. १९४०-४७)

◾️सद्याचे  म्हैसूर शहराजवळ  इ.स. १३९९ च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले

◾️ सुरुवातीस विजयनगरच्या अध्यापत्याखाली होते

◾️पराक्रमी राजे:- पहिला नरसराज वडियार व चिक्कदेवराज वडियार, यदुराय, जयचामराज

◾️1565 मध्ये विजयगनर साम्राज्य संपल्यावर म्हैसुर सार्वभौम झाले

◾️18 व्या शतकाच्या मध्यात म्हैसुरचा वारस लहान असल्याचा फायदा सेनापती हैदर अलीने घेतला

◾️हैदर ने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली

◾️संस्थानाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी हैदर इंग्रजांबरोबर 2 युद्ध लढले

◾️हैदर नंतर टिपू सुलतान ही 2 युद्ध लढला

◾️ मात्र 1799 च्या वेलस्ली बरोबरच्या 4थ्या युद्धात पराभव झाला, टिपू मारला गेला

🔺 चौथ्या श्रीरंगपट्टणमच्या युध्दाने म्हैसुर घराणे मुळ राजा वडीयार यांना परत केले

चंद्रगुप्त मौर्य

🦚  (राज्यकाल इ.स.पू. ३२२ ते इ.स.पू. २९८) हा मौर्य घराण्याचा संस्थापक होता.

🌷   मौर्य घराण्याची राजकीय कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो.

🦚  चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून इ.स.पू. ३२२ साली आर्य चाणक्य याच्या मदतीने सिंहासनावर विराजमान झाला.खर याला कोठे ही पुरावे सापडले नाही आहे की चाणक्य होता..

🌺🌺   चंद्रगुप्त मौर्य  🌺🌺

जन्म

जन्म -इ.स.पू. ३४० आणि सम्राट म्हणून कारकीर्द -इ.स.पूर्व ३२० ते इ.स.पूर्व २९८ मध्ये जन्म

🌺  राज्यकाल

नंद घराणेशाहीची समाप्ती करून सिंहासनावर विराजमान होताच चंद्रगुप्ताने राज्याच्या सीमा वाढविण्यास सुरुवात केली व ग्रीक राजा अलेक्झांडरचा एक निष्ठावंत सरदार सेल्युकस निकेटर याचा पराभव करून वायव्य दिशेला असलेली बरीच राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली

हे युद्ध हरल्यामुळे सेल्युकसने आपली कन्या कार्नेलिया हिचा विवाह चंद्रगुप्ताशी ठरवला आणि तह घडवून आणला. लग्नात चंद्रगुप्ताने सेल्युकसला ५०० हत्ती भेटीदाखल दिले आणि त्यानंतर चाणक्याच्या मदतीने सेल्युकसबरोबर ऐतिहासिक तह करून त्याच्या कन्येशी विवाह केला व नवीन मैत्रीचा प्रारंभ केला.

या यशस्वी कारवाईनंतर चंद्रगुप्ताची ख्याती जगभर पसरली आणि इजिप्त व सिरिया या तत्कालीन बलाढ्य साम्राज्यांनी आपल्या राजकीय दूतावासांची आशिया खंडात प्रथमच स्थापना केली व या देशांच्या राजदूतांची चंद्रगुप्ताच्या दरबारी नेमणूक करण्यात आली. ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या राज्यकारभाराने व मौर्यांच्या ऐश्वर्याने इतका प्रभावित झाला की त्याने इंडिका या नावाचा ग्रंथ लिहिला

दुर्दैवाने या ग्रंथाचा बराचसा भाग आज अस्तित्वात नाही . परंतु जो भाग आजही उपलब्ध आहे त्यावरून चंद्रगुप्ताच्या सामर्थ्याची व चाणक्याच्या परिणामकारक नीतीची प्रचिती येते.

☘☘☘🍂🍂☘☘☘🍂🍂☘☘☘🍂☘☘

आधुनिक भारताचा इतिहास


भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).


१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.


२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.


लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.


लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.


भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

महाराष्ट्र विधान परिषद



महाराष्ट्र विधान परिषद. 

  (Maharashtra Legislative Council)
      हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत ७८ सदस्य आहेत.
   महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा, ओडिशा या ७ घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद अस्तित्वात आहेत.

 बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.
  राज्यघटनेच्या कलम १६९ (१) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास भारतीय संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे राज्यघटनेने निश्चित केलेले नाही. कलम १७१ नुसार विधान परिषदेत किमान ४० सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत (विधानसभेच्या तुलनेत).



विधानपरिषदेबद्दल माहिती

घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सहा घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.

विधानपरिषदेची रचना 

१९५६ च्या ७ व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या १/३ पेक्षा जास्त नसावी आणि ४० पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात.



विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी

रचना :

१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.

१/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.

१/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

१/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

१/६ राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.



सदस्यांची पात्रता

१) तो भारताचा नागरिक असावा.

२) त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.

३) संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.



सदस्यांचा कार्यकाल 

सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष इतका असतो.


विधानपरिषदेचा कार्यकाल

विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे
 ते कधीही विसर्जित होत नाही.
     दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.


गणसंख्या

१/१० इतकी गणसंख्या असतो.




   अधिवेशन

दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.



सभापती व उपसभापती

विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्‍या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

🍃🍂🍃🍁🍁🍃🍂🍁🍁🍃🍂🍃

राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन




1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.

2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष

3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष

4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष

5)1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष

7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू

 11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.

12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी  -वंदे मातरम टागोरांनी गायले.

16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष

22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच          चतुसुत्रीचा स्विकार केला.

23) 1907  -सुरत  -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट

26) 1911 - कलकत्ता  बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.

31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य -करार/लखनौ करार

32) 1917 - कलकत्ता  -अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष

35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य-  काँग्रेसच्या घटनेत बदल

39) 1924-  बेळगाव  -महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष

40) 1925  -कानपूर  -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा

43) 1926 - कलकत्ता  -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक  अधिवेशन

44) 1929  -लाहोर  -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी

50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन

51) 1938  -हरिपूरा  -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव

52) 1939  -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट

53) 1940 - रामगड  -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष

61) 1955 - आवडी  -यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला

नेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारशी विषयी माहिती.


✅ भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तद्नंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील.


✅ भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्ताता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात व्हावी.


❇️ भारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल.


❇️ अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत.


❇️ सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा.


❇️ जगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मत:च स्वतंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे. (अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेले होती.)


❇️ इग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल. प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठगृहात बसतील तर कनिष्ठगृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील.


✅ आता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील. काही संघर्ष पैदा झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल.


❇️ गव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी. 


❇️ गव्हर्नर जनरलने मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल.

प्रांतांच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल. 


❇️ गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नराने कारभार करावा. 


5⃣ परांतीय कायदेमंडळाची मुदत पाच वर्ष असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा.


❇️ गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा.


❇️ परधानमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...