११ मार्च २०२४

नवरत्न दर्जा प्राप्त उद्योग (ऑक्टोबर 2023 पर्यंत)

1) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)
2) कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
3) इंजिनियर्स इंडिया लिमिटेड
4) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
5) महानगर टेलिफोन निगम लिमिटेड
6) नॅशनल ल्युमिनियम कंपनी लिमिटेड
7) नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड
8) एनएमडीसी लिमिटेड
9) नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड
10) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
11) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
12) रेल विकास निगम लिमिटेड
13) ओएनजीसी विदेश लिमिटेड
14) राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड
15) इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON)
16) RITES लिमिटेड

नवरत्न दर्जा :- 1997 पासून नवरत्न दर्जा दिला जातो.

यासाठी खालील निकष पूर्ण करावे लागता :-
1] कंपनीला मिनीरत्न (श्रेणी-1) दर्जा असावा.
2] गेल्या पाच वर्षांपैकी तीन वर्षांमध्ये मेमोरँडम ऑफ अंडरस्टैंडिंग सिस्टम अंतर्गत 'उत्कृष्ट' किंवा 'अतिशय चांगले' रेटिंग प्राप्त केलेले असावे.
3] त्या कंपनीच्या संचालक मंडळावर 4 स्वतंत्र संचालक असावे.
4] पुढील सहा निवडलेल्या कामगिरी निकषांमध्ये 60 किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त होणे गरजेचे असते.
a] निव्वळ मूल्याशी निव्वळ नफ्याचे प्रमाण
b] एकूण उत्पादन खर्चापैकी एकूण मनुष्यबळ खर्च
c] नफ्याचे वापरलेल्या भांडवलाशी प्रमाण
d] नफ्याचे उलाढालीशी प्रमाण
e] प्रती शेअर प्राप्ती
f] अंतर-क्षेत्रीय प्रगती

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पाचवी व्याघ्रगणना 2022

◆ 9 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी भारताची व्याघ्र गणना 2022 ची आकडेवारी जाहीर केली.

◆ Project Tiger सुरुवात :- 1 एप्रिल 1973.

◆ "Project Tiger" ला 1 एप्रिल 2023 रोजी 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "50₹" चे एक विशेष नाणे जारी केले.

◆ पहिली व्याघ्र गणना 2006 साली करण्यात आली. जगातील एकूण वाघांपैकी 75% वाघ भारतात आहेत.

◆ 2022 च्या आकडेवारी नुसार भारतात
"एकूण वाघांची संख्या 3167" इतकी आहे.

◆ मागील चार वर्षात एकूण वाघांच्या संख्येत 6.7%(चार वर्षात 200 वाघांची वाढ) वाढ झाली आहे.

➤ 2022 च्या पाचव्या व्याघ्रगणनेनुसार पाहिले पाच राज्ये :-
1) मध्यप्रदेश (526), 2) कर्नाटक (524),
3) उत्तराखंड (442), 4) महाराष्ट्र  (312),
5) तामिळनाडू (264)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या

1] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (BHEL)
2] भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL)
3] कोल इंडिया (CIL)
4] गेल इंडिया (GAIL)
5] हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL)
6] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL)
7] NTPC लिमिटेड
8] तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC)
9] पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC)
10] पॉवर ग्रिड कॉर्पो. ऑफ इंडिया (PGCIL)
11] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL)
12] ग्रामीण विदयुतीकरण निगम (RECL)
13] ऑइल इंडिया लिमिटेड (OIL)

महारत्न दर्जा :-
19 मे 2010 पासून महारत्न दर्जा देण्यास सुरुवात झाली.

यासाठी आवश्यक निकष :-
1] संबंधित कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त असावा.
2] ती कंपनी भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असावी.
3] मागील 3 वर्षांतील सरासरी वार्षिक उलाढाल 25,000 कोटी रुपयांपेक्षा पेक्षा जास्त असावे.
4] मागील 3 वर्षांतील सरासरी वार्षिक निव्वळ मूल्य 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावे.
5] मागील 3 वर्षांतील वार्षिक निव्वळ नफा 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावा.
6] कंपनीची लक्षणीय जागतिक उपस्थिती असावी.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

देशात CAA कायदा लागू! केंद्र सरकारकडून सीएएची अधिसूचना जारी !

👉 नागरिकत्व सुधारणा कायदा, 2019 :-
◆ CAA :- Citizenship (Amendment) Act, 2019
◆ 2016 मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) सादर करण्यात आले. 12 ऑगस्ट 2016 रोजी ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले.
◆ 09 डिसेंबर 2019 :- अमित शहा यांनी विधयक लोकसभेत मांडले.
◆ 09 डिसेंबर 2019 :- लोकसभेत 311 विरुद्ध 80 मतांनी मंजूर
◆ 11 डिसेंबर 2019 :- राज्यसभेत 125 विरुद्ध 105 मतांनी मंजूर
◆ 12 डिसेंबर 2019 :- राष्ट्रपतींची स्वाक्षरी
◆ 10 जानेवारी 2020 :- CAA देशभरात लागू झाला.
◆ या कायद्यानुसार नागरिकत्व कायदा, 1955 मध्ये सुधारणा करण्यात आली.

👉 CAA मधील महत्त्वाच्या बाबी :-
सहा धर्म :- हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि ख्रिश्चन.
तीन देश :- अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश.
31 डिसेंबर 2014 च त्यापूर्वी आलेल्या अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांगलादेशमधील अल्पसंख्याकांना नागरिकत्व दिले जाणार.

👉 कायदा कुठे लागू नसणार :-
हा कायदा सहाव्या अनुसूचीमध्ये असणाऱ्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी क्षेत्रांना.
इनर लाईन परमिट असणाऱ्या अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मणिपूर राज्यांतील प्रतिबंधित क्षेत्रांना.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

96 व्या ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी

• बेस्ट फिल्म- ओपेनहायमर
• बेस्ट अ‍ॅक्टर- सिलियन मर्फी (ओपेनहायमर)
• बेस्ट अ‍ॅक्ट्रेस- एम्मा स्टोन (बार्बी)
• बेस्ट डायरेक्टर- सिलियन मर्फी (ओपेनहायमर)
• बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस- डा'वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओवर्स)
• बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट- वॉर इज़ ओव्हर
• बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर- द बॉय अँड द हेरॉन
• बेस्ट अ‍ॅडेप्टेड स्क्रीनप्ले कॅटेगरी- अमेरिकन फिक्शन
• बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले- अ‍ॅनाटॉमी ऑफ ए फॉल (जस्टिन ट्रिट आणि ऑर्थर हरारी)
• बेस्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंग- पुअर थिंग्स
• बेस्ट प्रोडक्शन डिझाइन- पुअर थिंग्स (डिझायनर जेम्स प्राइस आणि शोना हीथ)
• बेस्ट कॉस्ट्यूम कॅटेगरी- पुअर थिंग्स
• बेस्ट इंटरनॅशनल फीचर- द ज़ॉन ऑफ़ इंटरेस्ट (जोनाथन ग्लेज़र)
• बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर- रॉबर्ट डाउनी ज्युनिअर (ओपेनहायमर)
• बेस्ट व्हिज़ुअल इफ़ेक्ट- गॉडज़िला मायनस वन
• बेस्ट फिल्म एडिटिंग- ओपेनहायमर
• बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट- द लास्ट रिपेयर शॉप
• बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर- 20 डेज इन मारियुपोल
• बेस्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट- द वंडरफुल लाईफ ऑफ हेनरी शुगर
• बेस्ट सिनेमॅटोग्राफी - डच-स्वीडिश सिनेमॅटोग्राफर होयटे वॅन होयटेमा (ओपेनहायमर)
•बेस्ट ओरिजनल स्कोर-  लुडविग गोरान्सन (ओपेनहायमर)
• बेस्ट ओरिजनल साँग- व्हाट वॉज आय मेड फॉर? (बॉर्बी)

(आगामी परीक्षेसाठी महत्वाचे वाचून घ्या)🙏

══━━━━━ ❉ ━━━━━══

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :

1) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र

2) जीएसटीमध्ये नवीन 522 पदांना मान्यता

3) बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार

4) बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार.

5) एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी 24 हजार कोटीची शासन हमी

6) मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून 850 कोटी अर्थ सहाय्य घेणार

7) राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद

8) राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प

9) एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना 3 आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने

10) विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना

11) अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड

12) मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार

13) डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश

14) शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक

15) उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ

16) 61 अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता

17) राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना; 53 कोटी 86 लाख खर्चास मान्यता

18) आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना

19) राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता

══━━━━━ ❉ ━━━━━═

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे



📌 महाराष्ट्र पठार निर्मिती ही   🌋जवालामुखीच्या  उद्रेकामुळे झालीआहे

📌 गरम पाण्याचे झरे हे ज्वालामुखी उद्रेकाचे पुरावे देतात

📌 यातूनच सहयाद्री पर्वतरांग तयार झाली जी प्रमुख पश्चिम वाहिनी आणि पुर्व वहिनी नद्यांची जलविभाजक बनली.

📌 महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची उंची ही उत्तरे कडून दक्षिणेकडे कमी कामी होत जाते

🔰 महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे 🔰

  🎇 कळसुबाई  1,646 मी अहमदनगर

  🎇 साल्हेर 1,567 मी नाशिक

  🎇 महाबळेश्वर 1,438 मी सातारा

  🎇 हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर
 
  🎇 सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार

  🎇 तोरणा 1,404 मी पुणे

  Trick 👇👇
🏆 कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो 🏆

  🌸 क  = कळसुबाई
  🌸 सा  = साल्हेर
  🌸 मी  = महाबळेश्वर
  🌸 हा   = हरिश्चंद्रगड
  🌸 स   =सप्तश्रृंगी
  🌸 तो   = तोरणा
  🌸 अ  =  अस्तंभा
  🌸  तर  =  त्र्यंबकेश्वर
  🌸 तिला =  तौला
  🌸 वि    = विराट
  🌸 चा    = चिखलदरा

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)



गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.

त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.

१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.

आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते.

या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या.

प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले.

प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,

त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.

या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.

भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.

या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.

आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती.

अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.

चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.

राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.

या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.

या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.
-----------------------------

खिल्जी घराण्याचा कर्तबगार सुल्तान

🔹अल्लाउद्दीन खिलजी


सुलतान अल्लाउद्दीन खिलजी

अधिकारकाळ- १२९० ते १३१६

राज्याभिषेक- १२९६

राजधानी- दिल्ली

पूर्ण नाव- अल्लाउद्दीन जलालुद्दीन खिलजीलख्नौती (बंगाल)

मृत्यू- १३१६ दिल्ली

पूर्वाधिकारी- जलालुद्दीन फिरोझ खिलजी

उत्तराधिकारी- कुतुबुद्दीन मुबारक शाह

राजघराणे- खिलजी


अल्लाउद्दीन खिलजी (मृत्यू: इ.स. १३१६) इ.स.च्या तेराव्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता. त्याने इ.स. १२९६ ते इ.स. १३१६ या कालावधीत राज्य केले. तो खिलजी घराण्यातील सर्वात कर्तबगार सुलतान समजला जातो. त्याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्याचा वजीर मलिक काफूर ह्याने कारभार चालवला.


अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीवर राज्य करणाऱ्या खिलजी घराण्यातला दुसरा सुलतान होता. पहिला सुलतान त्याचा काका जलालुद्दीन खिलजी. अल्लाउद्दीनने गादीवर येण्यापूर्वी जलालुद्दीनची २२ ऑक्टोबर १२९६ला हत्या केली होती.

महाराष्ट्राचा इतिहास




*⭕️ मौर्य ते यादव ⭕️*

*(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)*


*👉 मौर्य साम्राज्याचा काळ*

महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.


*👉 सातवाहन साम्राज्याचा काळ*

सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.


*👉 वाकाटकांचा काळ*

वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.


*👉 कलाचुरींचा काळ*

वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.


*👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ*

वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.


*👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ*

वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.


*👉 यादवांचा काळ*

महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.
________________________________

वडियार घराणे :: म्हैसूर

◾️राजधानी :- म्हैसूर, श्रीरंगपट्टण

◾️राष्ट्रप्रमुख:- पहिला राजा: यदुराय
(इ.स. १३९९-१४२३)

◾️अंतिम राजा: जयचामराज वडियार
(इ.स. १९४०-४७)

◾️सद्याचे  म्हैसूर शहराजवळ  इ.स. १३९९ च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले

◾️ सुरुवातीस विजयनगरच्या अध्यापत्याखाली होते

◾️पराक्रमी राजे:- पहिला नरसराज वडियार व चिक्कदेवराज वडियार, यदुराय, जयचामराज

◾️1565 मध्ये विजयगनर साम्राज्य संपल्यावर म्हैसुर सार्वभौम झाले

◾️18 व्या शतकाच्या मध्यात म्हैसुरचा वारस लहान असल्याचा फायदा सेनापती हैदर अलीने घेतला

◾️हैदर ने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली

◾️संस्थानाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी हैदर इंग्रजांबरोबर 2 युद्ध लढले

◾️हैदर नंतर टिपू सुलतान ही 2 युद्ध लढला

◾️ मात्र 1799 च्या वेलस्ली बरोबरच्या 4थ्या युद्धात पराभव झाला, टिपू मारला गेला

🔺 चौथ्या श्रीरंगपट्टणमच्या युध्दाने म्हैसुर घराणे मुळ राजा वडीयार यांना परत केले

चंद्रगुप्त मौर्य

🦚  (राज्यकाल इ.स.पू. ३२२ ते इ.स.पू. २९८) हा मौर्य घराण्याचा संस्थापक होता.

🌷   मौर्य घराण्याची राजकीय कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो.

🦚  चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून इ.स.पू. ३२२ साली आर्य चाणक्य याच्या मदतीने सिंहासनावर विराजमान झाला.खर याला कोठे ही पुरावे सापडले नाही आहे की चाणक्य होता..

🌺🌺   चंद्रगुप्त मौर्य  🌺🌺

जन्म

जन्म -इ.स.पू. ३४० आणि सम्राट म्हणून कारकीर्द -इ.स.पूर्व ३२० ते इ.स.पूर्व २९८ मध्ये जन्म

🌺  राज्यकाल

नंद घराणेशाहीची समाप्ती करून सिंहासनावर विराजमान होताच चंद्रगुप्ताने राज्याच्या सीमा वाढविण्यास सुरुवात केली व ग्रीक राजा अलेक्झांडरचा एक निष्ठावंत सरदार सेल्युकस निकेटर याचा पराभव करून वायव्य दिशेला असलेली बरीच राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली

हे युद्ध हरल्यामुळे सेल्युकसने आपली कन्या कार्नेलिया हिचा विवाह चंद्रगुप्ताशी ठरवला आणि तह घडवून आणला. लग्नात चंद्रगुप्ताने सेल्युकसला ५०० हत्ती भेटीदाखल दिले आणि त्यानंतर चाणक्याच्या मदतीने सेल्युकसबरोबर ऐतिहासिक तह करून त्याच्या कन्येशी विवाह केला व नवीन मैत्रीचा प्रारंभ केला.

या यशस्वी कारवाईनंतर चंद्रगुप्ताची ख्याती जगभर पसरली आणि इजिप्त व सिरिया या तत्कालीन बलाढ्य साम्राज्यांनी आपल्या राजकीय दूतावासांची आशिया खंडात प्रथमच स्थापना केली व या देशांच्या राजदूतांची चंद्रगुप्ताच्या दरबारी नेमणूक करण्यात आली. ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या राज्यकारभाराने व मौर्यांच्या ऐश्वर्याने इतका प्रभावित झाला की त्याने इंडिका या नावाचा ग्रंथ लिहिला

दुर्दैवाने या ग्रंथाचा बराचसा भाग आज अस्तित्वात नाही . परंतु जो भाग आजही उपलब्ध आहे त्यावरून चंद्रगुप्ताच्या सामर्थ्याची व चाणक्याच्या परिणामकारक नीतीची प्रचिती येते.

☘☘☘🍂🍂☘☘☘🍂🍂☘☘☘🍂☘☘

आधुनिक भारताचा इतिहास


भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).


१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.


२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.


लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.


लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.


भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

महाराष्ट्र विधान परिषद



महाराष्ट्र विधान परिषद. 

  (Maharashtra Legislative Council)
      हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत ७८ सदस्य आहेत.
   महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा, ओडिशा या ७ घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद अस्तित्वात आहेत.

 बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.
  राज्यघटनेच्या कलम १६९ (१) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास भारतीय संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे राज्यघटनेने निश्चित केलेले नाही. कलम १७१ नुसार विधान परिषदेत किमान ४० सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत (विधानसभेच्या तुलनेत).



विधानपरिषदेबद्दल माहिती

घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सहा घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.

विधानपरिषदेची रचना 

१९५६ च्या ७ व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या १/३ पेक्षा जास्त नसावी आणि ४० पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात.



विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी

रचना :

१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.

१/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.

१/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

१/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

१/६ राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.



सदस्यांची पात्रता

१) तो भारताचा नागरिक असावा.

२) त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.

३) संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.



सदस्यांचा कार्यकाल 

सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष इतका असतो.


विधानपरिषदेचा कार्यकाल

विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे
 ते कधीही विसर्जित होत नाही.
     दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.


गणसंख्या

१/१० इतकी गणसंख्या असतो.




   अधिवेशन

दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.



सभापती व उपसभापती

विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्‍या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

🍃🍂🍃🍁🍁🍃🍂🍁🍁🍃🍂🍃

राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन




1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.

2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष

3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष

4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष

5)1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष

7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू

 11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.

12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी  -वंदे मातरम टागोरांनी गायले.

16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष

22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच          चतुसुत्रीचा स्विकार केला.

23) 1907  -सुरत  -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट

26) 1911 - कलकत्ता  बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.

31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य -करार/लखनौ करार

32) 1917 - कलकत्ता  -अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष

35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य-  काँग्रेसच्या घटनेत बदल

39) 1924-  बेळगाव  -महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष

40) 1925  -कानपूर  -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा

43) 1926 - कलकत्ता  -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक  अधिवेशन

44) 1929  -लाहोर  -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी

50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन

51) 1938  -हरिपूरा  -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव

52) 1939  -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट

53) 1940 - रामगड  -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष

61) 1955 - आवडी  -यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला

नेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारशी विषयी माहिती.


✅ भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तद्नंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील.


✅ भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्ताता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात व्हावी.


❇️ भारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल.


❇️ अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत.


❇️ सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा.


❇️ जगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मत:च स्वतंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे. (अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेले होती.)


❇️ इग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल. प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठगृहात बसतील तर कनिष्ठगृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील.


✅ आता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील. काही संघर्ष पैदा झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल.


❇️ गव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी. 


❇️ गव्हर्नर जनरलने मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल.

प्रांतांच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल. 


❇️ गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नराने कारभार करावा. 


5⃣ परांतीय कायदेमंडळाची मुदत पाच वर्ष असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा.


❇️ गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा.


❇️ परधानमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा.

०५ मार्च २०२४

हृदयद्रावक.. वनरक्षक भरतीदरम्यान नागपुरात वणीच्या तरुणाचा मृत्यू.

नागपुरात वनरक्षक पदावर भरतीसाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुणाचा शेतातच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या तरुणाला एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचे वृत्त आहे.

वणी तालुक्यातील पेटूर गावातील सचिन दिलीप लांबट हा युवक वनविभागाच्या वनरक्षक पदाच्या भरतीची तयारी करत होता. वणी येथील शासकीय मैदानावर तो नियमितपणे सरावासाठी येत असे. सचिन मंगळवारी ४ मार्च रोजी भरतीसाठी नागपुरात आला. वनरक्षक भरतीच्या शारीरिक तंदुरुस्ती चाचणीसाठी पाच किलोमीटरचे अंतर कापत असताना सचिन अचानक अवघ्या 10 ते 15 मीटर अंतरावर पडला, असे वृत्त आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाली. वनविभागाच्या पथकाने त्यांना नागपुरातील एम्स रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले

पालकांचा हा अपघात
सचिनच्या आई-वडिलांना घटनेची माहिती मिळताच ते नागपूरहून पेटूरकडे रवाना झाले. दरम्यान, बुटीबोरीजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती आहे. मात्र, या अपघातात ते किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे

शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न अधुरे आहे. 
सचिन हा सर्वसामान्य कुटुंबातील तरुण होता. हलाखीच्या परिस्थितीत राहून त्यांनी सरकारी सेवेत येण्याचे स्वप्न उराशी बाळगले. तो दररोज वणीच्या शासकीय मैदानावर येऊन सराव करत असे. मात्र या घटनेने सचिनचे स्वप्न मैदानावरच राहिले

०१ मार्च २०२४

चालू घडामोडी प्रश्नसंच


1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे?
[अ] श्रीलंका
[ब] इंडोनेशिया
[क] भारत
[डी] बांगलादेश
Ans C

2.कवच तंत्रज्ञान __ शी संबंधित आहे:
[अ] रेल्वे
[ब] क्रिप्टोकरन्सी
[क] खाण
[डी] ऑटोमोबाईल
AnsA

3.आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (IMO) कौन्सिलमध्ये सर्वाधिक संख्येसह कोणता देश नुकताच पुन्हा निवडला गेला आहे?
[अ] भारत
[ब] रशिया
[सी] यूएसए
[डी] जपान
AnsA

4. 'JT-60SA', जगातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रगत अणु संलयन अणुभट्टी, युरोपियन युनियन आणि कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे?
[अ] भारत
[ब] जपान
[सी] यूएसए
[डी] ऑस्ट्रेलिया
AnsB

5.कोणत्या बँकेने UPI-आधारित डिजिटल रुपे क्रेडिट कार्ड सादर केले आहे?
[अ] स्टेट बँक ऑफ इंडिया
[B] IDFC फर्स्ट बँक
[C] इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
[D] HDFC बँक
AnsB

1.अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेल्या समर्थ योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?
[अ] ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करणे
[ब] शेतकऱ्यांना मदत देणे
[C] एमएसएमईंना सहाय्य प्रदान करणे
[डी] मुलांना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करणे
Ans C

2.AICTE ने सादर केलेल्या ‘परदेशातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सहाय्य’ (SSPCA) योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?
[अ] देशांतर्गत स्पर्धांना प्रोत्साहन देणे
[ब] तांत्रिक शिक्षणात भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे
[C] स्थानिक कार्यक्रमांसाठी आर्थिक मदत प्रदान करणे
[डी] सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे
Ans B

3.जागतिक शाश्वत विकास (WSDS) शिखर परिषद, नुकतीच बातम्यांमध्ये दिसली, ती दरवर्षी कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केली जाते?
[अ] ऊर्जा आणि संसाधन संस्था
[ब] जागतिक बँक
[C] पर्यावरण मूल्यांकन संस्था
[डी] पर्यावरण शिक्षण केंद्र
Ans A

4.अलीकडे, कोणत्या शहराने ट्रान्सजेंडर समुदायासाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केली?
[अ] लखनौ
[ब] इंदूर
[क] दिल्ली
[डी] जयपूर
Ans C

5 किलकारी कार्यक्रम, मोबाईल हेल्थ (m-health) उपक्रम, अलीकडे कोणत्या राज्यांमध्ये सुरू करण्यात आला?
[अ] उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश
[B] बिहार आणि झारखंड
[C] गुजरात आणि महाराष्ट्र
[डी] राजस्थान आणि कर्नाटक
AnsC 

1.'वायु शक्ती 24' सराव कुठे होणार आहे?
[अ] जोधपूर
[ब] पोखरण
[सी] बालासोर
[डी] अजमेर
Ans B
हा सराव भारतीय वायुसेनेच्या आक्षेपार्ह आणि बचावात्मक क्षमतेचे प्रदर्शन करेल.

2.नुकतेच निधन झालेले हेगे गिनगोब हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते?
[A] अंगोला 
[B] बोत्सवाना
[क] झांबिया
[डी] नामिबिया
Ans D 

3.भारताचे पहिले डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीचे उद्घाटन कोठे करण्यात आले?
[अ] हैदराबाद
[बी] बेंगळुरू
[सी] चेन्नई
[डी] जयपूर
Ans A 

4.अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या 'अभ्यास'चे खालीलपैकी कोणते वर्णन सर्वोत्तम आहे?
[A] A Transit method to detect planets
[B] A high-speed expendable aerial target
[C] A satellite
[D] A next generation Stealth aircraft
AnsB

5.अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला मेरा गाव मेरी धरोहर कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो?
[अ] अर्थ मंत्रालय
[ब] ग्रामीण विकास मंत्रालय
[सी] सांस्कृतिक मंत्रालय
[डी] संरक्षण मंत्रालय
Ans C
सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेल्या मेरा गाव मेरी धरोहर (MGMD) कार्यक्रमाचे उद्दिष्ट 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या भारतातील 6.5 लाख गावांचा सांस्कृतिक नकाशा तयार करण्याचे आहे.

1.बालकामगारांच्या सुटकेसाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडे ‘ऑपरेशन स्माईल एक्स’ सुरू केले?
[अ] राजस्थान
[ब] उत्तर प्रदेश
[क] तेलंगणा
[डी] कर्नाटक
Ans C

2.जागतिक कर्करोग दिन 2024 ची थीम काय आहे?
[A] Close the Care Gap
[B] Not Beyond Us
[C] Together let’s do something
[D] We can I can
Ans A 

3.गॅमा रे खगोलशास्त्र PeV EnergieS फेज-3 (GRAPES-3) प्रकल्पाचा प्राथमिक फोकस काय आहे?
[अ] वैश्विक किरणांचा अभ्यास करणे(To study cosmic rays)
[ब] एक्सोप्लॅनेटचा अभ्यास करणे(To study exoplanet)
[सी] गडद पदार्थाचा शोध घेणे(Investigating dark matter)
[डी] पृथ्वीच्या नैसर्गिक संसाधनांचे मोजमाप करणे(Measuring Earth’s natural resources)
Ans A

4.अलीकडेच, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता (UCC) अहवालाला मंजुरी दिली?
[अ] राजस्थान
[ब] उत्तर प्रदेश
[क] उत्तराखंड
[डी] हिमाचल प्रदेश
AnsC

5.अलीकडे, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता देश बनला आहे?
[अ] जर्मनी
[ब] इटली
[सी] फ्रान्स
[डी] स्पेन
AnsC 

1.अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली ‘कलैग्नार स्पोर्ट्स किट’ योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
[A] तमिळनाडू 
[B] केरळ
[क] कर्नाटक
[डी] महाराष्ट्र
Ans A 

2.बातमीत नुकताच उल्लेख केलेला ‘व्होल्ट टायफून’ म्हणजे काय?
[अ] एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता साधन
[बी] एक नवीन पर्यावरण उपक्रम
[सी] एक सायबर हॅकिंग गट
[डी] एक क्रिप्टोकरन्सी
Ans C

3.C- CARES वेब पोर्टल, अलीकडे बातम्यांमध्ये पाहिले गेले आहे, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
[अ] पेट्रोलियम क्षेत्र
[B] अक्षय ऊर्जा क्षेत्र
[C] कोळसा क्षेत्र
[डी] कृषी क्षेत्र
AnsC

4.‘डिजिटल डिटॉक्स’ उपक्रम, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला, कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
[अ] केरळ
[ब] कर्नाटक
[सी] राजस्थान
[डी] महाराष्ट्र
AnsB

5.अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेल्या ‘GHAR Portal’ चे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?
[अ] ऐतिहासिक वास्तूंच्या जीर्णोद्धाराचे निरीक्षण करा आणि त्याचा मागोवा घ्या
[ब] मुलांच्या जीर्णोद्धार आणि परत पाठवण्याचा डिजिटली मागोवा घेणे आणि त्यांचे निरीक्षण करणे
[C] मुलांना आरोग्य सेवा देणे
[डी] आगामी आपत्तींबद्दल रिअल टाइम अपडेट प्रदान करण्यासाठी
Ans B

1.नुकतेच इस्रोने प्रक्षेपित केलेला इनसॅट-३डीएस हा कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे?
[अ] भूस्थिर उपग्रह
[ब] हवामानविषयक उपग्रह
[C] संप्रेषण उपग्रह
[डी] पृथ्वी निरीक्षण उपग्रह
AnsB 

2.अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेला रातले जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला गेला आहे?
[अ] चिनाब नदी
[ब] तवी नदी
[C] सतलज नदी
[D] कावेरी नदी
Ans A 

3.नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेली ‘INS सुमित्रा’ हे जहाज कोणत्या प्रकारचे आहे?
[अ] गस्तीचे जहाज
[ब] फ्रिगेट
[क] नाश करणारा
[डी] विमानवाहू वाहक
AnsA

4.स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया (SPAI) च्या अहवालानुसार, कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक हिम बिबट्या आहेत?
[अ] लडाख
[ब] जम्मू आणि काश्मीर
[C] हिमाचल प्रदेश
[डी] सिक्कीम
AnsA

5.अलीकडे, ऑस्ट्रेलियन ओपन, 2024 मध्ये कोणत्या खेळाडूने महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले?
[A] अंकिता रैना
[ब] आरिना सबलेन्का
[सी] झेंग क्विनवेन
[डी] बार्बोरा क्रेजिकोवा
AnsB

1.अलीकडे, कोणती जागतिक वित्तीय संस्था भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट (InvIT) मध्ये अँकर गुंतवणूकदार बनली आहे?
[अ] युरोपियन गुंतवणूक बँक
[ब] जागतिक बँक
[C] आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
[डी] एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB)
Ans D 

2.नुकतीच संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाष चंद्र बोस आपदा  प्रबंध पुरस्कार-2024 साठी कोणत्या संस्थेची निवड करण्यात आली आहे?
[A] 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल, UP
[बी] 30 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल, यूपी
[सी] केजेएमयू, लखनौ
[डी] एम्स, दिल्ली
Ans A 

3.भारतीय हवाई दलाने आयोजित केलेल्या 'डेझर्ट नाइट' या सरावात आणखी कोणत्या दोन देशांनी भाग घेतला?
[अ] इजिपी आणि सुदान
[बी] फ्रान्स आणि युएई
[सी] फ्रान्स आणि रशिया
[डी] यूएई आणि इजिप्त
AnsB
भारतीय वायुसेनेने (IAF) 23-24 जानेवारी 2024 रोजी फ्रेंच हवाई आणि अंतराळ दल (FASF) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) हवाई दलासह डेझर्ट नाइटचा सराव केला.

4.CoRover.ai ने भारतात अलीकडेच सादर केलेल्या पहिल्या मोठ्या भाषेच्या मॉडेलचे (large language model)नाव काय आहे?
[अ] रोव्हरजीपीटी
[ब] ऑटोजीपीटी
[सी] चॅटजीपीटी
[डी] भारतजीपीटी
Ans D 

5.भारतीय सैन्यात सुभेदार पदावर असणारी पहिली महिला कोण बनली आहे?
[अ] प्रीती रजक
[ब] राजेश्वरी कुमारी
[क] मनीषा कीर
[डी] श्रेयसी सिंग
Ans A

1.द्विपक्षीय मालिकेसाठी ICC ने प्रथम महिला तटस्थ पंच म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
[अ] स्यू रेडफर्न
[B] निदा दार
[C] शिवानी मिश्रा
[डी] मेरी वॉल्ड्रॉन
AnsA

2.अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले Chang’e 6 मिशन कोणत्या देशाशी संबंधित आहे?
[अ] चीन
[ब] भारत
[सी] रशिया
[डी] यूके
Ans A 

3.कोणत्या आयआयटीने अलीकडेच ई-मोबिलिटी सिम्युलेशन लॅबची स्थापना करण्यासाठी अल्टेअरशी सहकार्य केले?
[अ] आयआयटी बॉम्बे
[ब] IIT मद्रास
[C] IIT कानपूर
[डी] आयआयटी रुरकी
AnsB

4.अलीकडेच कोणत्या राज्याने शैक्षणिक परिवर्तनासाठी ‘माझी शाळा-माझा अभिमान’ मोहीम सुरू केली?
[अ] हिमाचल प्रदेश
[ब] मध्य प्रदेश
[क] उत्तर प्रदेश
[डी] हरियाणा
Ans A

5.19वी Non-Aligned Movement (NAM) शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?
[अ] ब्राझील
[ब] दिल्ली
[C] कंपाला
[D] घाना
Ans C

1.2030 पर्यंत अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी सरकारने कोणते लक्ष्य ठेवले आहे?
[A] 50 %
[B] 40 %
[C] 60 %
[D] 30 %
AnsA

2.अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले FASTag खालीलपैकी कोणत्या तंत्रावर काम करते?
[अ] वायफाय वारंवारता ओळख ( WiFi Frequency Identification)
[बी] इन्फ्रारेड वारंवारता ओळख (Infrared Frequency Identification)
[C] रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळख   (Radio Frequency Identification)
[डी] विद्युत वारंवारता ओळख   (Electrical Frequency Identification)
AnsC

3.अलीकडे, तेलंगणाने चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र (C4IR) स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सहकार्य केले?
[अ] जागतिक बँक
[ब] जागतिक व्यापार संघटना
[C] जागतिक आर्थिक मंच
[डी] आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
AnsC

4.अलीकडेच, 2022 च्या भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंगमध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा म्हणून स्थान देण्यात आले?
[अ] तामिळनाडू
[ब] बिहार
[क] मणिपूर
[डी] राजस्थान
AnsA

5.कोणत्या राज्याने नुकतीच महतरी वंदना योजना सुरू केली?
[अ] छत्तीसगड
[ब] मध्य प्रदेश
[क] उत्तर प्रदेश
[डी] बिहार
AnsA

1.2024 हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक काय आहे?
[अ] ८३ वा
[ब] 80 वा
[क] ८२ वा
[डी] 90 वा
AnsB

2.उच्च शिक्षण संस्थांमध्ये मानवी मूल्ये आणि व्यावसायिक नैतिकता रुजवण्यासाठी भारतातील विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे नाव काय आहे?
[अ] उत्साह
[ब] NEP सारथी
[क]मुल्य प्रवाह २.०
[डी] दीक्षा
Ans C

3.अलीकडेच, बेरोजगार पदवीधर आणि पदविकाधारकांना आर्थिक मदत देण्यासाठी कर्नाटक सरकारने कोणती योजना सुरू केली?
[अ] युवा निधी योजना
[B] युवा विकासासाठी राज्य कार्यक्रम
[C] कौशल विकास योजना
[डी] युवा शक्ती योजना
AnsA

4.भारतातील कोणत्या बँकेने ग्रीन रुपया मुदत ठेव सुरू केली आहे?
[अ] स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
[B] HDFC बँक
[C] ICICI बँक
[डी] इंडियन बँक
Ans A

5.ASTRA क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे, जे अलीकडे बातम्या बनवत होते?
[अ] हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
[ब] सरफेस-टी0-सरफेस क्षेपणास्त्र
[C] हवेतून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र
[डी] पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
Ans A

1.2024 मध्ये UNESCO च्या जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे यजमान आणि अध्यक्ष कोणता देश आहे?
[अ] यूके
[ब] चीन
[क] भारत
[डी] नेपाळ
AnsC

2.संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने अलीकडेच लाँच केलेल्या असॉल्ट रायफलचे नाव काय आहे?
[अ] अग्नी
[ब] निर्भय
[क] उग्राम
[डी] तेजस
AnsC

3.अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा चांदुबी उत्सव कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो?
[अ] आसाम
[B] गोवा
[C] केरळ
[डी] मणिपूर
AnsA

4.अश्वारूढ खेळासाठी(Equestrian Sports)अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली?
[ए] पी. व्ही. सिंधू
[B] मेरी कोम
[C] सायना नेहवाल
[D] दिव्यकृती सिंग
AnsD


5.भारताच्या 43 व्या अंटार्क्टिक मोहिमेत कोणत्या दोन देशांचे शास्त्रज्ञ सामील झाले?
[अ] सिंगापूर आणि मॉरिशस
[ब] बांगलादेश आणि भूतान
[C] मॉरिशस आणि बांगलादेश
[डी] नेपाळ आणि म्यानमार
AnsC

1.अलीकडेच बांगलादेशच्या पंतप्रधानपदी सलग चौथ्यांदा विक्रमी निवड झालेल्या शेख हसीना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत?
[A] बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP)
[B] राष्ट्रीय पक्ष
[C] अवामी लीग
[डी] बांगलादेश जमात-ए-इस्लामी
AnsC

2.वांचो वुडन क्राफ्ट, ज्याला नुकताच भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला आहे, तो कोणत्या राज्याचा आहे?
[अ] अरुणाचल प्रदेश
[ब] बिहार
[क] उत्तर प्रदेश
[डी] मध्य प्रदेश
AnsA

3.बंगालच्या उपसागरात कृष्णा गोदावरी खोरे खोल समुद्र प्रकल्प (Deep Sea Project)कोणती कंपनी चालवत आहे?
[अ] रिलायन्स इंडस्ट्रीज
[ब] इंडियन ऑइल
[क] भारत पेट्रोलियम
[डी] तेल आणि नैसर्गिक वायू निगम लिमिटेड (ONGC)
AnsD


4. कोणत्या राज्याने अलीकडेच “योगश्री” नावाची सर्वसमावेशक सामाजिक कल्याणकारी योजना सुरू केली आहे?
[अ] पश्चिम बंगाल
[ब] आंध्र प्रदेश
[क] झारखंड
[डी] बिहार
Ans A

5.अलीकडेच चर्चेत आलेल्या अल्वारो या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाशी कोणता प्रदेशाशी संबंधित आहे?
[अ] आग्नेय आशिया
[ब] मादागास्कर
[C] दक्षिण अमेरिका
[डी] ऑस्ट्रेलिया
Ans B

1.नुकतेच प्रकाशित झालेल्या “व्हाय भारत मॅटर्स” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
[A] अमित शहा 
[B] निर्मला सीतारामन
[क] एस. जयशंकर
[डी] राजनाथ सिंह
AnsC

2.विकसित भारत अभियान उपक्रमासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली?
[अ] सोनू सूद
[ब] अमिताभ शहा
[क] उज्ज्वल पाटणी
[डी] संदीप माहेश्वरी
AnsB

3.पश्चिम बंगाल सरकारने कोणत्या नदीच्या काठावर चहाचे उद्यान विकसित करण्याची योजना आखली आहे?
[अ] गंगा
[ब] हुगळी
[क] अंजना
[डी] कालिंदी
Ans B

4.नुकतेच २०२३ चा कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार (Kuvempu Rashtriya Puraskar) जिंकणारे शिरशेंधु मुख्योपाध्याय हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध लेखक आहेत?
[A] कन्नड
[B] बंगाली
[क] तमिळ
[डी] हिंदी
Ans B
Kuvempu Rashtriya Puraskar is a national award, which is presented annually in memory of the late poet laureate Kuvempu. It is given to a writer who has contributed in any of the languages recognised by the Indian Constitution.

5.मॅपल्स ॲपवर अपघातातील सर्व ब्लॅक स्पॉट्स मॅप करणारे कोणते राज्य अलीकडे पहिले राज्य बनले आहे?
[अ] राजस्थान
[ब] कर्नाटक
[क] महाराष्ट्र
[डी] पंजाब
Ans D

1.चीनच्या अत्याधुनिक महासागर ड्रिलिंग जहाजाचे नाव काय आहे जे पृथ्वीच्या कवचामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि मानवी इतिहासात प्रथमच आवरणापर्यंत पोहोचण्यासाठी डिझाइन केलेले आहे?
[अ] मेंग्झिआंग
[ब] टियांकी
[क] शुजिंग
[डी] युलियांग
Ans A

2.‘प्रजा पालन हमी दारकस्तु’ कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
[अ] आंध्र प्रदेश
[ब] तेलंगणा
[क] कर्नाटक
[डी] तामिळनाडू
Ans B

3.कोणत्या देशाने अलीकडेच इस्रायलवर नरसंहाराचा आरोप करत आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला आहे?
[अ] इजिप्त
[ब] कतार
[क] इराण
[डी] दक्षिण आफ्रिका
Ans D

4.भारतीय नौदलाचे नवे मार्शल प्रमुख म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
[A] व्हाइस ॲडमिरल संदीप नैथानी
[ब] व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख
[सी] व्हाइस ऍडमिरल एस. आर. सरमा
[डी] व्हाइस ॲडमिरल जी. एस. पॅबी
Ans B

5.अलीकडेच, भारतीय नौदलाच्या कोणत्या समुद्रशास्त्रीय संशोधन जहाजाने सागर मैत्री मिशन-4 ओमानला रवाना केले आहे?
[अ] INS मकर
[ब] INS संध्याक
[C] INS सागरध्वनी
[डी] INS ध्रुव
Ans.C

अलीकडेच, UPI पेमेंट प्रणाली कोणत्या दोन देशांमध्ये सुरू करण्यात आली आहे?
[अ] श्रीलंका आणि मॉरिशस
[ब] ऑस्ट्रेलिया आणि इजिप्त
[सी] चिली आणि पेरू
[डी] इराण आणि इस्रायल
Ans A

6 अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेला ‘अलास्कापॉक्स’ म्हणजे काय?
[अ] जिवाणू संसर्ग
[बी] डीएनए विषाणू
[क] बुरशी
[डी] हेल्मिंथ्स
AnsB
(2015 मध्ये सापडलेल्या ऑर्थोपॉक्स विषाणूमुळे अलीकडेच अलास्काचा एक माणूस मरण पावणारा पहिला ठरला)

7 अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेली फास्ट टेलिस्कोप (FAST Telescope) कोणत्या देशाने विकसित केली आहे?
[अ] रशिया
[बी] यूएसए
[सी] चीन
[डी] भारत
ANS C

8 महासागर आणि वातावरणाचे सर्वेक्षण करण्यासाठी NASA ने अलीकडे प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे?
[अ] तारे-१(ASTARS-1)
[ब] रोसॅट(ROSAT)
[क] PACE
[डी] खगोल ए(ASTRO A)
ANS C

8 झिरकॉन क्षेपणास्त्र, सुपरसॉनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, अलीकडे कोणत्या देशाने प्रक्षेपित केले?
[अ] रशिया
[ब] इस्रायल
[क] युक्रेन
[डी] चीन
Ans A

1.बातमीत नुकत्याच नमूद केलेल्या ‘ई-जागृती पोर्टल’चे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?
[A] ग्राहक विवाद निवारण सुलभ करण्यासाठी
[B] कृषी पिकांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी
[C] छोट्या व्यवसायांना कर्ज देऊ करणे
[D] दुर्गम भागात आरोग्य सुविधा पुरवणे
AnsA

2.अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला ‘कुस्कुटा डोडर’ म्हणजे काय?
[अ] आक्रमक तण
[ख] मासा
[क] व्हायरस
[डी] कोळी
Ans A

3.अलीकडेच, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये कोणत्या देशाने AI पॉवर्ड सरकारी सेवांसाठी 9वा GovTech पुरस्कार जिंकला?
[अ]  UAE
[ब] भारत
[क]  कतार
[डी]  तुर्की
Ans B

4.कोणत्या राज्य सरकारने अधिकृतपणे काजी नेमू (Citrus limon) हे राज्य फळ म्हणून घोषित केले आहे?
[अ] नागालँड
[ब] मणिपूर
[क] आसाम
[डी] सिक्कीम
Ans C

२७ फेब्रुवारी २०२४

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी



Q.1) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला?
उत्तर - तमिझगा वेत्री कळघम (TVK)

Q.2) नुकतेच वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - डॉ राजाध्यक्ष

Q.3) सलग सहा वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या अर्थमंत्री कोण ठरल्या आहेत?
उत्तर – निर्मला सीतारामन

Q.4) खेलो इंडिया विंटर गेम 2024 च्या शुभंनकराला काय नाव देण्यात आले आहे?
उत्तर – शीन-ए-शी

Q.5) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे प्रकाशित करप्शन परप्शन इंडेक्स 2023 मध्ये भारत किती वाजता आली आहे?
उत्तर – 93 व्या

Q.6) अलीकडेच प्रकाशित भारतातील हिमबिट्या स्थितीबाबतच्या अहवालानुसार भारतातील हिम बिबट्यांची संख्या किती आहे?
उत्तर – 718

Q.7) भारत ऊर्जा सप्ताहाची दुसरी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?
उत्तर – गोवा

Q.8) अलीकडेच राष्ट्रपती द्रोपती मर्मु यांनी राज्यसभा सदस्य म्हणून कोणाला नामनिर्देशित केले आहे?
उत्तर – सतनाम सिंग संधू

Q.9) महाराष्ट्राचे उदय विश्वनाथ देशपांडे यांना 2024 चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
उत्तर – मल्लखांब

Q.10) मेघालय खेळांच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
उत्तर – द्रोपती मुर्मु

Q.11) सुलतान इब्राहिम इस्कंदर हे कोणत्या देशाची 17वे राजा बनले आहेत?
उत्तर – मलेशिया

Q.12) नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या ‘एक समंदर, मेरे अंदर’ या कवितासंग्रहाचे लेखक कोण आहेत?
उत्तर – संजीव कुमार जोशी

Q.13) जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर – 2 फेब्रुवारी

Q.14) भारतीय तटरक्षक दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – 1 फेब्रुवारी

Q.15) अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवली आहे?
उत्तर –  श्रीलंका

२५ फेब्रुवारी २०२४

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा.


🔶 देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर्वताच्या रांगा राज्याचा प्राकृतिक कणा असून उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा व पूर्वेस असलेल्या भामरागड-चिरोली-गायखुरी या डोंगररांगा राज्याच्या नैसर्गिक सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस गुजरात उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस आंध्रप्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व नैऋृत्येस गोवा ही राज्ये आहेत. 

🔶राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्‍या हिवाळ्यात टिकून राहते. 

🔶पश्‍चिम समुद्र तटावरून येणार्‍या पावसाळी ढगांमुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर 400 सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. समुद्र किनारपट्टीवरील कोकणात मुसळधार पाऊस पडतो व तो उत्तरेकडे सकरताना कमी होत जातो. सह्याद्रीच्या पूर्वेला पश्‍चिम पठारावरील जिल्ह्यात 70सेंमी एवढा अत्यल्प पाऊस पडत असून सोलापूर व अहमदनगर हे सर्वाधिक कोरडे जिल्हे आहेत. पूर्वेस विदर्भ व मराठवाड्याकडे सरकताना पावसाचे प्रमाण काहीसे वाढते. 

🔶लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असून राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3.08 लक्ष चौ.कि.मी. आहे. जनगणना, 2011 नुसार राज्याची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी असून ती देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.3 टक्के आहे.

🔶राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून 45.2 टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते. राज्यात 36 जिल्हे असून प्रशासकीय सुविधेसाठी ते कोकण, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा महसुली विभागातविभागले आहेत.

🔶जिल्हा स्तरावरील नियोजनासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. स्थानिक प्रशासनासाठी राज्याच्या ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या व 27,920 ग्रामपंचायती आहेत, तर नागरी भागात 26 महानगरपालिका, 230 नगरपरिषदा, 110 नगरपंचायती व सात कटक मंडळे आहेत.

🔶 मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून बहुतांशी प्रमुख खाजगी कंपन्या व वित्तीय संस्थांची मुख्यालये या शहरात आहेत. देशातील प्रमुख वायदे व भांडवली बाजार आणि विक्रेय वस्तू व्यापार विनिमय केंद्रे मुंबईत आहेत.

🔶राज्यातील 234 लाख हेक्टर जमीन लागवडीखाली तर 52.1 लाख हेक्टर वनांखाली आहे. सिंचनात वाढ व्हावी यासाठी अनेक सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. बिगर सिंचन क्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे गतीने होण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 

🔶महाराष्ट्राला ‘2019 पर्यंत पाणी टंचाई मुक्त राज्य’ करण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले असून याद्वारे दरवर्षी 5,000 गावे पाणी टंचाई मुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. 

🔶पशुसंवर्धन हे कृषि क्षेत्राशी संबंधीत महत्त्वाचे क्षेत्र आहे. देशातील पशुधन व कुक्कुट पक्ष्यांच्या संख्येमध्ये राज्याचा हिस्सा अनुक्रमे 6.3 टक्के व 10.7 टक्के आहे.

🔶 महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे. लघु उद्योगात हे अग्रेसर असून देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगि क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याने सातत्य राखले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे हे प्रमुख केंद्र आहे.

🔶जनगणना 2011 नुसार अखिल भारतीय स्तरावरील 73 टक्के साक्षरता दराच्या तुलनेत राज्याचा साक्षरता 82.3 टक्के आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिले जात असून राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या उत्कृष्ट संस्था आहेत. 

🔶भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसारदेशाचा मानव विकास निर्देशांक 0.467 आहे तर राज्यासाठी तो 0.572 आहे. मानव विकास निर्देशांकात भारताचा सध्या 130 वा क्रमांकआहे. 

🔶महिला धोरण राबविणारे तसेच महिलांच्या विकासासाठी ‘महिला व बालकल्याण’ या स्वतंत्र विभागाची स्थापना करुन अर्थसंकल्पीय तरतूद करणारे हे पहिले राज्य आहे. रोजगार हमी योजना राबविणारे हे आद्यप्रवर्तक राज्य असून केंद्र शासनाने ही येाजना अंगिकारली आहे. 

🔶महाराष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमांनी रेखांकित केलेले राज्य नसून येथील जनतेने संघटितरित्या परिश्रमपूर्वक घटविलेले राज्य आहे. या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृती विकसित होण्यास नैसर्गिक तसेच सांस्कृतिक विविधता सहाय्यभूत झाली आहे. स्वतःची अध्यात्मिक बैठक असलेले हे राज्य ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. 

🔶 राज्याने देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावली आहे. 

२७ जानेवारी २०२४

चालू घडामोडी :- 26 जानेवारी 2024

◆ यंदा देशातील एकूण 1132 पोलिस, अग्नीशामक सेवा, ग्रहरक्षक कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर झाली आहेत.

◆ महाराष्ट्र पोलीस दलाला एकून 62 राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत.

◆ महाराष्ट्रातील सोमय मुंडे या पोलिस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झाले आहे.

◆ केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमध्ये 30 महिलांचा समावेश आहे.

◆ भारताच्या पहिल्या महिला माहूत पार्बती बरुआ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे त्या आसाम राज्याशी संबधित आहेत.

◆ भारताच्या पहिल्या सिकलसेल ऍनिमिया नियंत्रण कार्यक्रमाचे प्रणेते यासदी मांनकेशा इटालिया यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

◆ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायधिश एम फातेमा बिबी यांना यावर्षीचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ महाराष्ट्र शासनाचे दुसरे विश्व मराठी संमेलन 27 ते 29 जानेवारी या कालावधीत नवी मुंबई येथे होणार आहे.

◆ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आर.आश्विन ने 150 विकेट पूर्ण केल्या आहेत.

◆ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 150 विकेट पूर्ण करणारा आर.आश्विन हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

◆ कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणुन शपथ घेतली आहे.

◆ प्रसन्ना वराळे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 34वे न्यायाधिश ठरले आहेत.

◆ राष्ट्रपती द्रोपद्री मर्मु यांच्या हस्ते 'डॉ. विपीन इटनकर' सर्वोत्कृष्ट मतदार नोंदनी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ राष्ट्रपतीच्या हस्ते सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले डॉ. विपीन ईटनकर हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत.

◆ ब्रिक्स बिझनेस एक्सलंस् अवॉर्ड मध्ये मुथुट फायनान्स ला लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...