१७ जानेवारी २०२४

चालू घडामोडी :- 16 जानेवारी 2024

◆ राज्य शासनाकडून सन 2023 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना जाहीर.

◆ भारतीय नौदलाची चित्ता, गुलदार आणि कुंभीर, पोलनोकनी श्रेणीतील लैंडिंग जहाजांचा भाग, जवळजवळ चार दशकांच्या समर्पित सेवेनंतर बंद करण्यात आली.

◆ तैवानच्या नागरिकांनी विल्यम लाई यांना त्यांचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडले.

◆ हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सुरु केलेल्या 'अपना विद्यालय'चे उद्दिष्ट सरकारी शाळा सुविधा वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय नेते आणि व्यावसायिक यांच्यात सहकार्य वाढवणे आहे.

◆ केरळच्या ऑपरेशन AMRITH चे उद्दिष्ट प्रतिजैविक प्रतिकाराचा सामना करणे आहे.

◆ AMRITH म्हणजे अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स इंटरव्हेंशन फॉर टोटल हेल्थ.

◆ केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी लाइफ सायन्सेस पार्क येथे ग्लोबल सायन्स फेस्टिव्हल केरळचे उद्घाटन केले.

◆ वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र(मृत-48) प्रथमस्थानी असून मध्य प्रदेश दुसऱ्या तर उत्तराखंड तिसऱ्या क्रमंकावर आहे.

◆ महाराष्ट्र शासनाचा 2021 चा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हिराबाई कांबळे यांना जाहीर झाला आहे.

◆ महाराष्ट्र शासनाचा 2022 चा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार अशोक पेठकर यांना जाहीर झाला आहे.

◆ महाराष्ट्र कृषी पणन महासंघाच्या वतीने मिलेट महोत्सव 2024 चे आयोजन पणजी येथे आयोजीत करण्यात आले आहे.

◆ लोकप्रिय उर्दू शायर मुनुव्वर राणा यांचे नुकतेच लखनऊ या ठिकाणीं निधन झाले आहे.

◆ ऑक्सफॅम या संस्थेने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार जगातील गरीबी संपण्यासाठी 229 वर्षाचा कलावधी लागणार आहे.

◆ "सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी" या भारतीय टेनिस जोडीने मलेशिया बॅडमिंटन सुपर 1000 स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे.

◆ 2024 ची स्विझरलँड मधील दोवोस येथे world economic foram आयोजित जागतिक अर्थिक परिषद 54व्या क्रमांकाची आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

१६ जानेवारी २०२४

चालू घडामोडी :- 15 जानेवारी 2024

◆ राजस्थानमधील बिकानेर या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्ह्यात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला.

◆ महाराष्ट्र शासनाने नुकतेच सांगली जिल्ह्यातील आटपाडी विभागात 'आटपाडी संवर्धन राखीव' नावाने नवीन संवर्धन अभयारण्य स्थापन केल्याची घोषणा केली आहे.

◆ भारतीय सैन्य 2024 हे तंत्रज्ञान अवशोषणाचे वर्ष म्हणून पाळणार आहे.

◆ भारतीय आणि जपानी तटरक्षक दलांनी चेन्नईच्या किनारपट्टीवर 'सहयोग केजिन' नावाचा यशस्वी संयुक्त सराव केला आहे.

◆ तैवान देशाच्या राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंग ते विजयी झाले आहेत.

◆ तैवान देशातील राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाने विजय मिळवला आहे.

◆ तैवान देशाच्या राष्ट्रअध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष तिसऱ्यांदा विजयी झाला आहे.

◆ डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक होत्या.

◆ हिंदुस्थान शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने 2022 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

◆ ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांच्या नावावर एकाच मंचावरून 11 संगितावरील पुस्तके प्रकाशीत करण्याचा जागतिक विक्रम आहे.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांना 2002 वर्षी भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना मध्यप्रदेश राज्य सरकारने कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित केले होते.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना 2023 मध्ये "अटल संस्कृती पुरस्कार" प्रदान करण्यात आला होता.

◆ जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ 102व्या स्थानावर आहे.

◆ 2023 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा कोलकाता येथे पार पडला.

◆ राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळासाठी मॉरिशस देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना 2 तासाची रजा मंजूर केली आहे.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सरकारने पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.

◆ 18 वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात अमळनेर येथे होणार आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील अमळनेर येथे 3 ते 4 फेब्रुवारी 2024 कालावधी दरम्यान विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

◆ अमळनेर येथे होणाऱ्या 18 विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड झाली आहे.

◆ भारतीय सेना दिवस 15 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.

◆ भारतीय क्रिकेपटू रोहित शर्मा हा 150 आंतरराष्ट्रिय टी 20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.

◆ ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन, दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी :- 13 जानेवारी 2024

◆ पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञांसाठी जगातील पहिले 'डिजिटल थेरॅप्युटिक्स' सहभाग प्रमाणपत्राची सुरुवात केल्याची घोषणा झाली.

◆ आकाश-एनजी' क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी करण्यात आली असून आकाश शस्त्र प्रणाली DRDO द्वारे स्वदेशी डिझाइन आणि विकसित केली गेली आहे.

◆ केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून "भारतासाठी हरित संक्रमणाचे मार्ग " या संकल्पनेवर आधारित हवामान परिषद, 2024 आयोजीत करण्यात आली.

◆ ट्युनिशिया प्रजासत्ताक देशाने "नंदकिशोर कागलीवाल" यांची मानद वाणिज्य दुत म्हणून मुंबई येथे नियुक्ती केली आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा सागरी सेतू पूलाची लांबी 22 किलोमीटर आहे.

◆ टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला टीम साऊदी न्यूझीलंड  या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

◆ ओडिशा येथील चांदीपूर किनाऱ्यावरून DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या आकाश एन जी क्षेपणास्त्राचा पल्ला 80 किलोमीटर आहे.

◆ CNN News 18 तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडीया ऑफ दि एअर पुरस्कार ISRO ला प्रदान करण्यात आला आहे.

◆ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्दारे  तिसरी अंतरराष्ट्रीय साखर परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे.

◆ केंद्र सरकारने गार्भाशय व मुखाचा कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुलीसाठी HPV ही लसीकरण [वर्षात 8 कोटी] मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ गर्भाशय व मुखाचा कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारत 5व्या क्रमांकावर आहे.

◆ जपान या देशाने H2A या रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे.

◆ शेरिंग तोबगे यांची भूतान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ भारतात 1989 वर्षापासून दरवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.

◆ Microsoft हि कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे.

◆ टाईम मासिकाच्या 2023 च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादित इन्फोसिस या कंपनीला स्थान मिळाले आहे.

◆ अलीप्त चळवळीची 2024 मध्ये 19वी शिखर परिषद युगांडा(यजमान पद) मध्ये आयोजित करण्यात आली आहे.

◆ इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक अरविंद नरेन हे आहेत.

◆ भारताचा युवा नेमबाज अखिल शेरॉन ने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आजचे महत्वाचे करंट अफेअर्स 15 January - Current Affairs

🔖 प्रश्न - तैवान देशाच्या राष्ट्रअध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली?

ANS - लाई चिंग-ते यांची  

🔖 प्रश्न - कोणत्या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढली?

ANS - मिझोराम

🔖 प्रश्न - डॉ.प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?

ANS - संगीत क्षेत्राशी

🔖 प्रश्न - जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या स्थानावर आहे?

ANS - १०२ व्या स्थानावर

🔖 प्रश्न - २०२३ चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

ANS - विशाखा विश्वनाथ यांना - हा सोहळा कोलकाता येथे पार पडला.

🔖 प्रश्न - राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळासाठी कोणत्या देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना २ तासाची रजा मंजूर केली?

ANS - मॉरिशस

🔖 प्रश्न - १८ वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कोठे होणार?

ANS - अमळनेर येथे - डॉ. वासुदेव मुलाटे हे या संमेलनाच्या अध्यक्षपदी असतील.

🔖 प्रश्न - भारतीय सेना दिवस कधी साजरा करतात येतो?

ANS - १५ जानेवारी ला

🔖 प्रश्न - भारतीय क्रिकेपटू रोहित शर्मा हा किती आंतरराष्ट्रिय टी २० क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला?

ANS - १५० आंतरराष्ट्रिय टी २० क्रिकेट सामने

🔖 प्रश्न - संघ लोकसेवा आयोगाचे (UPSC) सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

ANS - शीलवर्धन सिंग यांची

१५ जानेवारी २०२४

चालू घडामोडी :- 14 जानेवारी 2024

◆ कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना "स्वतःला स्वतः विरुद्ध उभं करताना" या कवितासंग्रहास साहित्य अकादमीचा 'युवा' साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[विशाखा विश्वनाथ यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे.]

◆ साहित्य अकादमीच्या वर्ष 2023 च्या युवा साहित्य पुरस्कारासाठी 20 प्रादेशिक भाषांमधील साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली होती.

◆ 'युवा' साहित्य अकादमी पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रुपये रोख असे आहे.

◆ मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्यिक डॉ. अक्षयकुमार काळे, बाबा भांड आणि प्रा. डॉ. विलास पाटील यांचा समावेश होता.

◆ 13 जानेवारी रोजी ‘लोहरी’ हा सण साजरा करण्यात आला.

◆ मॉरिशस सरकारने राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनिमित्त हिंदू धर्माच्या अनुयायांना दोन तासांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली आहे.

◆ विल्यम लाई हे तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

◆ ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी युक्रेनला अडीच अब्ज पौंडांची लष्करी मदत देण्याची घोषणा केली आहे.

◆ मुंबईत ‘जयपूर समिट 2024’चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ दिवंगत उत्तरकाशी गिर्यारोहक सविता कंसवाल यांना मरणोत्तर तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ नवी दिल्लीत ‘नमो-नव-मतदार नोंदणी पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे.

◆ ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ‘मलकानगिरी’ येथील नवीन विमानतळाचे उद्घाटन केले.

◆ रिअर अ‍ॅडमिरल उपल कुंडू हे दक्षिणी नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ बनले आहेत.

◆ दीपा भंडारे साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार जिंकणारी पहिली महिला ठरली आहे.

◆ रिंदम सांगवानने आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक जिंकले.

◆ CREA अहवालानुसार, मेघालयातील 'बर्निहाट' हे 2023 मध्ये भारतातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

१४ जानेवारी २०२४

चालू घडामोडी :- 13 जानेवारी 2024

◆ पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञांसाठी जगातील पहिले 'डिजिटल थेरॅप्युटिक्स' सहभाग प्रमाणपत्राची सुरुवात केल्याची घोषणा झाली.

◆ आकाश-एनजी' क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी करण्यात आली असून आकाश शस्त्र प्रणाली DRDO द्वारे स्वदेशी डिझाइन आणि विकसित केली गेली आहे.

◆ केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून "भारतासाठी हरित संक्रमणाचे मार्ग " या संकल्पनेवर आधारित हवामान परिषद, 2024 आयोजीत करण्यात आली.

◆ ट्युनिशिया प्रजासत्ताक देशाने "नंदकिशोर कागलीवाल" यांची मानद वाणिज्य दुत म्हणून मुंबई येथे नियुक्ती केली आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा सागरी सेतू पूलाची लांबी 22 किलोमीटर आहे.

◆ टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला टीम साऊदी न्यूझीलंड  या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

◆ ओडिशा येथील चांदीपूर किनाऱ्यावरून DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या आकाश एन जी क्षेपणास्त्राचा पल्ला 80 किलोमीटर आहे.

◆ CNN News 18 तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडीया ऑफ दि एअर पुरस्कार ISRO ला प्रदान करण्यात आला आहे.

◆ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्दारे  तिसरी अंतरराष्ट्रीय साखर परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे.

◆ केंद्र सरकारने गार्भाशय व मुखाचा कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुलीसाठी HPV ही लसीकरण [वर्षात 8 कोटी] मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ गर्भाशय व मुखाचा कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारत 5व्या क्रमांकावर आहे.

◆ जपान या देशाने H2A या रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे.

◆ शेरिंग तोबगे यांची भूतान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ भारतात 1989 वर्षापासून दरवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.

◆ Microsoft हि कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे.

◆ टाईम मासिकाच्या 2023 च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादित इन्फोसिस या कंपनीला स्थान मिळाले आहे.

◆ अलीप्त चळवळीची 2024 मध्ये 19वी शिखर परिषद युगांडा(यजमान पद) मध्ये आयोजित करण्यात आली आहे.

◆ इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक अरविंद नरेन हे आहेत.

◆ भारताचा युवा नेमबाज अखिल शेरॉन ने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी :- 13 जानेवारी 2024

◆ पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञांसाठी जगातील पहिले 'डिजिटल थेरॅप्युटिक्स' सहभाग प्रमाणपत्राची सुरुवात केल्याची घोषणा झाली.

◆ आकाश-एनजी' क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी करण्यात आली असून आकाश शस्त्र प्रणाली DRDO द्वारे स्वदेशी डिझाइन आणि विकसित केली गेली आहे.

◆ केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून "भारतासाठी हरित संक्रमणाचे मार्ग " या संकल्पनेवर आधारित हवामान परिषद, 2024 आयोजीत करण्यात आली.

◆ ट्युनिशिया प्रजासत्ताक देशाने "नंदकिशोर कागलीवाल" यांची मानद वाणिज्य दुत म्हणून मुंबई येथे नियुक्ती केली आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा सागरी सेतू पूलाची लांबी 22 किलोमीटर आहे.

◆ टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला टीम साऊदी न्यूझीलंड  या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

◆ ओडिशा येथील चांदीपूर किनाऱ्यावरून DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या आकाश एन जी क्षेपणास्त्राचा पल्ला 80 किलोमीटर आहे.

◆ CNN News 18 तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडीया ऑफ दि एअर पुरस्कार ISRO ला प्रदान करण्यात आला आहे.

◆ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्दारे  तिसरी अंतरराष्ट्रीय साखर परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे.

◆ केंद्र सरकारने गार्भाशय व मुखाचा कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुलीसाठी HPV ही लसीकरण [वर्षात 8 कोटी] मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ गर्भाशय व मुखाचा कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारत 5व्या क्रमांकावर आहे.

◆ जपान या देशाने H2A या रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे.

◆ शेरिंग तोबगे यांची भूतान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ भारतात 1989 वर्षापासून दरवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.

◆ Microsoft हि कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे.

◆ टाईम मासिकाच्या 2023 च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादित इन्फोसिस या कंपनीला स्थान मिळाले आहे.

◆ अलीप्त चळवळीची 2024 मध्ये 19वी शिखर परिषद युगांडा(यजमान पद) मध्ये आयोजित करण्यात आली आहे.

◆ इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक अरविंद नरेन हे आहेत.

◆ भारताचा युवा नेमबाज अखिल शेरॉन ने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

१३ जानेवारी २०२४

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

 


🔶मचकुंदी प्रकल्प 

मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🔶शरीशैलम प्रकल्प

आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🔶बियास प्रकल्प

पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.


🔶भाक्रा-नानगल

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.


🔶दामोदर खोरे योजना

पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.


🔶फराक्का योजना 

हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.


🔶हिराकूड 

प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.


🔶चबळ योजना

हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.


🔶उकाई प्रकल्प

तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.


🔶कोसी प्रकल्प

विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर जनरल

1. लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-

भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना.
प्लासिचे युद्ध :- जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला.
बक्सरची लढाई :- बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला.
अलाहाबादचा तह :- बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली.

2. सर वॉरन हेस्टिंग (सन 1772 ते 1773) :-

सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली.
भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट (1781) याच काळात सुरू झाले.

3. लॉर्ड कॉर्नवॉलीस (1786 ते 1793) :-

लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात.

4. लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-

लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला.
तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली.
सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला.

5. मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-

मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली.
जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली.

6. लॉर्ड विल्यम बेंटीक (1823 ते 1833) :-

लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला.
भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे



●1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन


●1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी


●1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष


●1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष


●1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष


●1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.


●1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.


●1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.


●1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.


●1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.


●1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.


●1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.


●1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.


●1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


●1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.


●1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.


●1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.


●1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

तिसरी गोलमेज परिषद



  तारिख :- 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932

  कार्यकाळ :- 1 महिना

  उपस्थित सदस्य :- 46 प्रतिनिधी उपस्थित होते व तेही सरकारशी एकनिष्ठ होते.

🖍काँग्रेसने या परिषदेवर बहिष्कार टाकला.

🖍इग्लंडमधील मजुर पक्षाने देखील या परिषदेस अनुपस्थिती दर्शविली.

🖍 सरकारचे धोरण यावेळेस अधिकच प्रतिगामी होते.

🖍 या परिषदेला जिना, इक्बाल यांनाही बोलविले नाही.

🖍तसेच हिंदु महासभेलाही नाही.

🖍बरिटीशशासित भारताचे केवळ 22 व संस्थांनाचे 12 एवढेच प्रतिनिधी या परिषदेसाठी आमंत्रीत केले गेले होते.

🖍मजुर पक्षानेही या परिषदेतुन अंग काढुन घेतले.

🖍महत्वाचे उपस्थित असेलेल प्रतिनिधी :-
       👉आगाखान,
       👉आबेडकर,
       👉तजबहादुर सप्रु,
       👉कळकर,
       👉बगम शहनवाझ.

           महत्वाचे म्हणजे हे महत्वाचे प्रतिनिधी तिनही परिषदेला हजर होते.

 🖍 यातील योजनेत मुलभुत हक्कांचा समावेश करण्यात यावा अशी भारतीय प्रतिनिधींनी मागणी केली पण  ती मंजुर झाली नाही.

🖍  एकुण 3 परिषदांपैकी 2 परिषद मध्ये काँग्रेसचा सहभाग नसल्याने यांना फारशी लोकप्रियता मिळाली नाही.

   📚या परिषदेमध्ये पुढील बाबींवर चर्चा झाली.

       👉मतदान अधिकारात स्त्रियांचा सहभाग.

       👉कद्रीय संघटनेच्या बाबतीत मतदान पध्दती, अर्थव्यवस्था व राज्याचे अधिकार.

🖍वरील 3 परिषदेमधील चर्चेनुसार मार्च 1933 मध्ये सरकारतर्फे एक श्वेत पत्रिका प्रसारीत करण्यात आली.

🖍या श्वेतपत्रिकेच्या आधारे ब्रिटन संसदेमध्ये एक कायदा पारित करण्यात आला व यालाच 1935 चा 
भारत सरकारचा कायदा असे म्हणतात.

📚 सदर्भ :- "आधुनिक भारताच्या इतिहासाची आवर्तसारनी", बी पब्लिकेशन, पुणे.
लेखन व संकलन - अॅड. वरद देशपांडे

गांधी युगाचा उदय :

सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला. 


आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 


जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले. 


जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.


1. भारतातील चळवळी :

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या. 


चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -


चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली. 


साराबंधी चळवळ (सन 1918) -


1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत. 


गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली. 


शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 


हा गांधीजीचा दूसरा विजय होता. 


रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -


भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला. 


या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता. 


या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. 


हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय. 


13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली. 


या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.


2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.


सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले. 


फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली. 


या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.


या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.


3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या. 


असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 


काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.


4. सायमन कमिशन (1928) :

 


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले. 


या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते. 


या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते. 


या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.


5. नेहरू रिपोर्ट (1928) :


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले. 


राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. 


नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.


6. सविनय कायदेभंग आंदोलन :


1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते. 


या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :

सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला. 


12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली. 


385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. 


यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. 


महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.


सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली. 


6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. 


आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.

8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :

सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. 


महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. 


विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.

9. भारत छोडो आंदोलन (1942) :

क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला. 


14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला. 


8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली. 


प्रति सरकारे -


इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. 


प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.

चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले. 


महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली. 


सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -


सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.


या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले. 


भारतीय सैनिकाचा उठाव -


चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.

या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला. 


नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला. 


सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.

10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :

सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता. 


मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली. 


त्रिमंत्री योजना (सन 1946) -


या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले. 


या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे  मांडली. ही योजना त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध आहे. 


हंगामी सरकार -


त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. 


माऊंट बॅटन योजना -


24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले. 


भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली. 


3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. 


मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.

___________________________________

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...