११ जानेवारी २०२४

महादेव गोविंद रानडे



जन्म - 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).

मृत्यू - 16 जानेवारी 1901.

रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .

तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .

रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.

1886 - भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय.

रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते .

त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात .

समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत.

रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .

1887 - सामाजिक परिषद.

1890 - औद्योगिक परिषद.

त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.

संस्थात्मिक योगदान :


1865 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.

1867 - मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.

1870 - सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.

उद्दीष्ट - थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार, संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे केले.

वकृत्वोत्तेजक सभा - पुणे.

नगर वचन मंदिर - पुणे.

1875 वसंत व्याख्यान - माला (पुणे).

1882 - हुजूरपागा शाळा (पुणे).

31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.

1896 - हिंदू विडोज होम.

इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .

मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.

पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.

1889 - Industrial As Sociation Of Western India स्थापन.

रानडे यांनी केलेले लेखन :


इंदु प्रकाश (मासिक).

एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.

1874 - जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.

1888 - ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.

मराठी सत्तेचा उदय.

मराठी पत्रकारितेचा पाया घातला.

निबंध - प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.

'तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य' हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.

वैशिष्ट्ये :

ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.

भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.

1873 - 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.

पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.

संमतीवय विधेयकास पाठिंबा.

इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.

दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.

'महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.' टिळकांचे मत.

बकसार लढाई



ब्रिटिश सैन्याने लढाईत गुंतलेली संख्या ७०७२ होती ज्यात ८५९ ब्रिटिश, ५०२७ भारतीय सिपाही आणि ९१८ भारतीय घोडदळांचा समावेश होता. 

युतीची संख्या ४०,००० पेक्षा जास्त असल्याचे अनुमान होते. बंगाल, अवध आणि मोगल साम्राज्याने बनलेल्या भारतीय राज्यांच्या युतीशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी युद्ध करीत होती. यात ४०,००० पुरुष असून ब्रिटिश सैन्याने १०,००० पुरुषांचा पराभव केला होता. बक्सरच्या युद्धानंतर नवाबांनी अक्षरशः आपली लष्करी सत्ता गमावली होती. तीन भिन्न मित्रपक्षांमध्ये मूलभूत समन्वयाचा अभाव त्यांच्या निर्णायक पराभवासाठी जबाबदार होता. 


मिर्झा नजाफ खानने मुघल शाही सैन्याच्या उजव्या बाजूची सेनापती म्हणून काम केले आणि दिवसाच्या वेळी मेजर हेक्टर मुनरो यांच्याविरुध्द सैन्य चालवणारे पहिले सैन्य होते; वीस मिनिटांत ब्रिटीश ओळी तयार झाल्या व त्यांनी मोगलांची प्रगती उलटवली. ब्रिटीशांच्या म्हणण्यानुसार, दुर्राणी आणि रोहिल्ला घोडदळ देखील उपस्थित होते आणि विविध झगडांमध्ये लढाई चालू असताना लढले. पण मध्यरात्रीपर्यंत लढाई संपली आणि शुजा-उद-दौलाने मोठी टंब्रिल्स आणि गनपाऊडरची तीन भव्य मासिके उडून टाकली. 


मुनरोने आपली सेना वेगवेगळ्या स्तंभांमध्ये विभागली आणि विशेषत: अवधच्या नवाब मोगल ग्रँड विझियर शुजा-उद-दौलाचा पाठलाग केला, त्यांनी नदी पार केल्यावर बोट-पूल उडवून प्रत्युत्तर दिल्याने त्यांनी मोगल बादशाह शाह आलम दुसरा आणि त्याच्या सदस्यांचा त्याग केला. 


स्वत: ची रेजिमेंट. मीर कासिम देखील त्याच्या ३० दशलक्ष रुपयांच्या रत्नांसह पळून गेला आणि नंतर १७७७ मध्ये दारिद्र्य संपादन केला. मिर्झा नजाफ खानने शाह आलम दुसराच्या आसपासच्या स्थापनेची पुनर्रचना केली. त्यांनी माघार घेत नंतर विजयी इंग्रजांशी बोलणी करण्याचे निवडले. इतिहासकार जॉन विल्यम फोर्टेस्के यांनी असा दावा केला आहे की ब्रिटिशांचा मृत्यू युरोपियन रेजिमेंटमधील एकूण ८४७:३९ ठार आणि ६४ जखमी आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सिपाह्यांमध्ये २५० मृत्यू, ४३५ जखमी आणि ८५ बेपत्ता आहेत. त्यांनी असा दावाही केला की, तीन भारतीय सहयोगी २००० जणांचा मृत्यू झाला आणि बरेच लोक जखमी झाले. आणखी एक स्रोत असे म्हणतात की ब्रिटिश बाजूने ६९ युरोपियन आणि ६६४ आणि मोगल बाजूने ६००० लोक जखमी झाले होते. तेथील तोफखान्यांनी १३३ तोळे आणि १० लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. युद्धानंतर लगेचच मुनरोने मराठ्यांना मदत करण्याचे ठरविले, ज्यांना "युद्धासारखी शर्यत" म्हणून वर्णन केले गेले होते, ते मुघल साम्राज्य आणि त्याचे नवाब आणि म्हैसूर यांच्याविषयी अविरत आणि अटळ द्वेषासाठी परिचित होते.


पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती:

महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.

पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.

निवडणूक : प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


सभासदांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.


आरक्षण :

1. महिलांना : 50 %

2. अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात (महिला 50%)

3. इतर मागासवर्ग : 27% (महिला 50%)


विसर्जन : 

राज्य सरकार करते व विसर्जन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.


कार्यकाल : 5 वर्ष


राजीनामा :

सभापती - जिल्हा परिषदेच्याअध्यक्षांकडे

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे 


त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 

30 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन : 

सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 30 दिवसाच्या  आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन :

 सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - दरमहा रु 8,000/- व इतर सुखसुविधा पंचायत समितीची बैठक - कलम क्र. 117 व 118 नुसार वर्षात 12 म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1 अंदाज पत्रक - गटविकासअधिकारी तयार करतो व त्याला जिल्हा परिषदेची मान्यता आवश्यक आहे.


गटविकास अधिकारी :

निवड - गटविकास अधिकारी

नेमणूक - राज्यशासन

कर्मचारी - ग्रामविकास खात्याचा वर्ग-1 व वर्ग-2 चा अधिकारी

नजिकचे नियंत्रण - मुख्य कार्यकारी अधिकारी

पदोन्नती - उपमुख्य कार्यकारी अधिकारी


कार्य व कामे :

1. पंचायत समितीचा सचिव

2. शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.

3. वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्यांच्या राजा मंजूर करणे.

4. कर्मच्यार्यांवर नियंत्रण ठेवणे.

5. पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

6. पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणे.

7. पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांस सादर करणे.

8. अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.

9. महत्वाची कागदपत्रे सांभाळणे.


पंचायत समितीची कामे :

1. शिक्षण

2. कृषी

3. वने

4. समाजकल्याण

5. पशुसंवर्धन व दुग्धविकास

6. सार्वजनिक आरोग्य सेवा

7. दळणवळण

8. समाजशिक्षण

चालू घडामोडी :- 10 जानेवारी 2024

◆ युरोपातील जर्मनी सौरऊर्जेच्या निर्मितीत आघाडीवर असून, त्याखाली अनुक्रमे 2) इटली, 3) स्पेन, 4) नेदरलँड, 5) फ्रान्स हे देश आहेत.

◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा नवी दिल्लीत 'नॅशनल PACS मेगा कॉन्क्लेव्ह चे नेतृत्व करणार आहेत.

◆ सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषदेची बैठक झाली.

◆ आसामचे राज्यपाल गुलाब कटारिया आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुवाहाटी येथे ई-गव्हर्नन्सवरील प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन केले.

◆ मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मोइरांग कॉलेजमध्ये कॉलेज फागथांसी मिशनचे उद्घाटन केले.

◆ पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे राज्यातील महानगपालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक जाहीर करण्यात आला. त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक बटकावला. तर मुंबई महापालिका द्वितीय आणि कोल्हापूर महापालिका तृतीय स्थानी आहे.

◆ फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी आत्तापर्यंत सर्वात तरुण असणारे ग्याब्रियल अटल यांची निवड झाली आहे.

◆ ग्याब्रियल अटल हे फ्रान्स या देशाचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत.

◆ प्रसिध्द हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. ते "रामपूर सहस्वान" संगीत घराण्याचे गायक होते.

◆ शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार हे पुरस्कार मिळालेले आहेत.

◆ प्रसिध्द हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांना 2022 वर्षी भारत सरकारच्या वतीने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

◆ शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. त्यांना 2012 साली "पश्चिम बंगाल" राज्याच्या सर्वोच्च बंगभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

◆ महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे पाहिल्या पर्यावरणीय शास्वतत्ता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ ऑस्ट्रेलिया ची महिला क्रिकेट पटू एलिस पेरी हिने 300 अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे.

◆ फ्रॅझ बेकनबॉर(जर्मनी) यांचे निधन झाले. ते जर्मनीच्या 1974 वर्षीच्या फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार होते.

◆ केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड व लोणावळा या दोन नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या आहेत.

◆ चीन या देशाने आईनस्टाइन प्रोब या खगोलशास्त्रीय उपगृहाचे प्रक्षेपण केले आहे.

◆ भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीने "विजय प्रकाश श्रीवास्तव" सर्वोत्तम वित्तीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ भारतात 2006 वर्षापासून 10 जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो.

◆ क्रिर्गीस्तान देशाने हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषीत केले आहे.

◆ 2023 या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये भारत देशाचे पर्यटक देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आजचे महत्वाचे करंट अफेअर्स 10 January


🔖 प्रश्न - फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली?

ANS - ग्याब्रियल अटल यांची - ते फ्रान्स देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. 

🔖 प्रश्न - राशीद खान यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

ANS - संगीत

🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यात कोठे पाहिल्या पर्यावरणीय शास्वतत्ता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले?

ANS - मुंबई येथे

🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यातील महानगर पालिकेच्या ई गव्हर्नन्स निर्देशकांत कोणत्या महानगर पालिकेने प्रथम क्रमांक पटकावला?

ANS - पिंपरी चिंचवड

🔖 प्रश्न - केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील कोणत्या दोन नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या?

ANS - सासवड व लोणावळा नगरपालिका

🔖 प्रश्न - खालीलपैकी कोणत्या देशाने आईनस्टाइन प्रोब या खगोलशास्त्रीय उपगृहाचे प्रक्षेपण केले?

ANS - चीन

🔖 प्रश्न - भारताच्या राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू यांच्या हस्ते यावर्षी किती क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

ANS - २६

🔖 प्रश्न - राष्ट्रीय गून्हे संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार देशात बाल गुन्हेगारीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

ANS - महाराष्ट्र

🔖 प्रश्न - भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीने कोणाला सर्वोत्तम वित्तीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

ANS - विजय प्रकाश श्रीवास्तव यांना

🔖 प्रश्न - १० जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो?

ANS - विश्व हिंदी दिवस म्हणून - २००६ पासून भारतात १० जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो.

🔖 प्रश्न - कोणत्या देशाने हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणुन घोषीत केले?

ANS - क्रिर्गीस्तान ने

🔖 प्रश्न - २०२३ या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या देशामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे?

ANS - भारत - २०२३ या वर्षात २.९० लाख भारतीय पर्यटकांनी मालदीव देशाला भेट दिली.

१० जानेवारी २०२४

चालू घडामोडी :- 09 जानेवारी 2024

◆ स्वदेशी असॉल्ट रायफल 'उग्रम' पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापनाने (एआरडीई) ही रायफल विकसित केली आहे.

◆ आयर्लंड च्या सिलियन मर्फी ला Oppenheimer चित्रपटात केलेल्या मुख्य भूमिकेसाठी मिळाला गोल्डन ग्लोब सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार.

◆ गोल्डन ग्लोब अवॉर्ड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लीली ग्लॅडस्टोन ला जाहीर.

◆ भारतातील महिला करिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहराच्या निर्देशकांच्या यादीत चेन्नई हे शहर प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारतातील महिला करिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहराच्या निर्देशकांच्या  यादीत पहिल्या टॉप 5 मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे आणि मुंबई शहराचा सामावेश आहे.

◆ भारतात 2003 वर्षापासून 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करतात येतो.

◆ गांधीनगर मध्ये आयोजीत या वर्षीच्या व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचा मुख्य विषय "गेट वे टू द फ्युचर" आहे.

◆ उग्रम रायफल देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरली आहे.

◆ भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम पुणे ठिकाणच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रशिक्षण अस्थपनाने ARDE विकसित केली आहे.

◆ अमेरिका देशाच्या युनायटेड लॉन्च अलायंस कंपनीच्या व्हल्कन या रॉकेट ने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण केले आहे.

◆ 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ओपेनहायमर चित्रपटाला मिळाला आहे.

◆ 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये ओपेनहायमर चित्रपटाला एकून 5 पुरस्कार मिळाले आहेत.

◆ 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लिली ग्लॅडस्टोन यांना मिळाला आहे.

◆ 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता चा पुरस्कार सीलियन मर्फी याला मिळाला आहे.

◆ गोल्डन ग्लोब पुरस्कार अमेरिकेत 1944 या वर्षापासून दरवर्षी आयोजीत करण्यात येतात.

◆ शेख हसीना ह्या बांगलादेश देशाच्या पाचव्यांदा पंतप्रधान होणार आहेत.

◆ कोलकता येथे सुरु असलेला 85 व्या आंतरराज्य आणि 19 वर्षाखालील राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सुवर्ण पदक पटकावले आहे.

◆ अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे.

◆ नवी दिल्ली येथे इंट्सफूड शो 2024 या दक्षिण आशियातील सर्वात मोठया खाद्य पर्दशनाचे उद्घाटन सुनील बर्थवाल यांच्या हस्ते झाले आहे.

◆ अँगर मॅनेजमेंटमध्ये हे पुस्तक अजय बिसारीया यांची भारतीय माजी उच्चआयुक्ताने लिहिले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आजचे महत्वाचे करंट अफेअर्स 09 January - Current Affairs

🔖 प्रश्न - खालीलपैकी कोणती रायफल देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरली आहे?

ANS - उग्रम रायफल

🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील पुरव्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय करण्यासाठी जागतीक बँकेने मंजुरी दिली आहे?

ANS - सांगली आणि कोल्हापूर

🔖 प्रश्न - कोणत्या देशाच्या युनायटेड लॉन्च अलायंस कंपनीच्या व्हल्कन या रॉकेट ने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण केले आहे?

ANS - अमेरिका - अमेरिका ५० वर्षानंतर हि चंद्रयान मोहिम राबवत आहे.

🔖 प्रश्न - ८१ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?

ANS - ओपेनहायमर - या चित्रपटाला एकूण ५ पुरस्कार मिळाले आहेत.

🔖 प्रश्न - शेख हसीना ह्या बांगलादेश देशाच्या कितव्यांदा पंतप्रधान होणार आहेत?

ANS - पाचव्यांदा

🔖 प्रश्न - कोलकता येथे सुरु असलेला ८५ व्या आंतरराज्य आणि १९ वर्षाखालील राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने कोणते पदक पटकावले आहे?

ANS - सुवर्ण पदक

🔖 प्रश्न - भारताच्या वरून तोमर आणि ईशा सिंग यांनी आशिया ऑलिम्पिक पात्रता फेरीत कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकून भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला आहे?

ANS - नेमबाजी मध्ये

🔖 प्रश्न - केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाची एकून निर्यात २०३० पर्यंत किती कोटी डॉलर वर नेण्याचे उद्दीष्ट आहे?

ANS - २ लाख

🔖 प्रश्न - नवी दिल्ली येथे इंट्सफूड शो २०२४ या दक्षिण आशियातील सर्वात मोठया खाद्य पर्दशनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?

ANS - सुनील बर्थवाल यांच्या हस्ते

🔖 प्रश्न - अँगर मॅनेजमेंटमध्ये हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी उच्चआयुक्ताने लिहिले आहे?

ANS - अजय बिसारीया यांनी

🔖 प्रश्न -  देशात प्रवासी भारतीय दीन म्हणुन कोणता दिवस साजरा करण्यात येतो?

ANS - ९ जानेवारी - २००३ पासून हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

🔖 प्रश्न - देशात व्हायब्रंट जागतिक परिषद कोठे आयोजीत करण्यात येते?

ANS - गांधीनगर येथे

०९ जानेवारी २०२४

महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 08 January

🔖 प्रश्न - इस्रो ने श्रीहरीकोठा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून आदित्य एल १ यानाचे प्रक्षेपण कधी केले होते?

ANS - २ सप्टेंबर २०२३ ला

🔖 प्रश्न - भारतीय ऑलम्पिक संघटनेच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

ANS - रघुराम अय्यर यांची

🔖 प्रश्न - रॉयल कॅरिबियन ने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रुझ ठरली आहे?

ANS - आयकॉन ऑफ दी सिज - या क्रुझची लांबी ११९८ फूट आहे - तसेच या क्रुझचे वजन २,५०,८०० टन आहे

🔖 प्रश्न - देशातील पहिले बीच गेम्स २०२४ चे आयोजन कोणत्या बीचवर करण्यात आले आहे?

ANS - घोघला बीच, दीव व दमण

🔖 प्रश्न - भारतात कोठे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे?

ANS - अहमदाबाद येथे

🔖 प्रश्न - केंद्र सरकारच्या फार्मर आयडी या पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याची निवड झाली आहे?

ANS - बीड जिल्ह्याची

🔖 प्रश्न - ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

ANS - शशी सिंह यांची

🔖 प्रश्न - खालीलपैकी कोणत्या भारतीय अधिकाऱ्याने नुकताच बिमस्टेक च्या सरचिटणीस पदाचा पदभार स्वीकारला आहे?

ANS - इंद्रमणी पांडे यांनी - त्यांची ३ वर्षासाठी निवड करण्यात आली आहे

🔖 प्रश्न - १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणाहून झाले आहे?

ANS - पिंपरी चिंचवड येथून - या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार असणार आहेत.

🔖 प्रश्न - सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी कोणत्या राज्यात ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे?

ANS - हिमाचल प्रदेश

श्री राम मंदिर (अयोध्या)

1. मंदिराची रचना:
- पारंपारिक नगर शैलीचे अनुसरण करते.
- परिमाणे: 380 फूट (लांबी), 250 फूट (रुंदी), 161 फूट (उंची).
- 20 फूट उंच मजले, 392 खांब आणि 44 दरवाजे असलेले तीन मजली.
- मुख्य गर्भगृह: भगवान श्री रामाचे बालपण; पहिला मजला: श्री राम दरबार.
- पाच मंडप: नृत्य, रंग, सभा, प्रार्थना आणि कीर्तन मंडप.
- देवतांच्या मूर्तींनी सुशोभित केलेले खांब आणि भिंती.

2. प्रवेश आणि प्रवेशयोग्यता:
- सिंह द्वार मार्गे 32 पायऱ्यांद्वारे पूर्वेकडील प्रवेश.
- दिव्यांग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्ट.
- परकोटा: आयताकृती कंपाऊंड वॉल (732 मीटर लांबी, 14 फूट रुंदी).

3. सहायक संरचना:
- कंपाऊंड कोपऱ्यांवरील मंदिरे: सूर्यदेव, देवी भगवती, गणेश भगवान, भगवान शिव, माँ अन्नपूर्णा, हनुमान जी.
- जवळच ऐतिहासिक विहीर (सीताकूप).
- संकुलातील प्रस्तावित मंदिरे: वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषाद राज, माता शबरी, देवी अहिल्या.
- कुबेर टिळा: जटायू स्थापनेसह भगवान शिव मंदिराचा जीर्णोद्धार.

4. बांधकाम वैशिष्ट्ये:
- लोखंड वापरले नाही.
- पाया: कृत्रिम खडक दिसण्यासाठी 14m-जाड रोलर-कॉम्पॅक्टेड काँक्रीट (RCC).
- संरक्षण: जमिनीतील ओलाव्यापासून ग्रॅनाइटसह 21 फूट-उंच प्लिंथ.

5. पायाभूत सुविधा आणि सुविधा:
- सांडपाणी प्रक्रिया, पाणी प्रक्रिया, अग्निसुरक्षा पाणीपुरवठा, स्वतंत्र वीज केंद्र.
- पिलग्रिम्स फॅसिलिटी सेंटर (PFC): 25,000 लोकांसाठी क्षमता, वैद्यकीय आणि लॉकर सुविधा.
- आंघोळीसाठी जागा, वॉशरूम, वॉशबेसिन, उघडे नळ इत्यादीसह अतिरिक्त ब्लॉक.

6. पर्यावरणीय फोकस:
- भारताच्या पारंपारिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले.
- 70-एकर क्षेत्रापैकी 70% क्षेत्र हिरवे राहिले.

स्रोत: श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र❤️

प्रश्न मंजुषा

 🔰मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते..?

1} सेल्युलेज ✅

2} पेप्सीन

3} सेल्युलीन

4} सेल्युपेज



🔰आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.?

1} अवअणू

2} अणू

3} रेणू ✅

4} पदार्थ



🔰डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५ ✅

2} अल्बम-३०

3} ल्युथिनिअरम-१७७

4} सेसिअम-१३७


🔰कोणत्या आम्लाच्या रेणूंच्या एकत्रीकरणातून प्रोटिन्स तयार होतात. ?

(1) आयोडीक आम्ल

(2) फाॅरमिक आम्ल 

(3) अमिनो आम्ल ☑️

(4) नायट्रस आम्ल



🔰 वस्तूंच्या किंमती नियमित करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रभावी साधन म्हणजे  ?

(1) नैतिक समजावणी

(2) व्याजांच्या दरात बदल करणे 

(3) खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी -विक्री करणे ☑️

(4) राखीव निधीच्या प्रमाणात बदल करणे



🔰 राज्य अल्पसंख्यांक आयोगास कायदेशीर अधिकार देणारे देशातील पहिले राज्य कोणते  ?

(1) महाराष्ट्र 

(2) गुजरात 

(3) राजस्थान 

(4) बिहार ☑️



🔰  जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालयाचा (सचिवालय) दर्जा देण्यात यावा ही शिफारस कोणत्या समितीची आहे ?*

(1) अशोक मेहता ☑️

(2) एल एम.संघवी

(3) पी.के थुंगन 

(4) जे.के.व्ही.राव समिती

भारतातील शिक्षणासंबंधी आयोग/समित्या

1. सनदी कायदा 1813

2. एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका

3. Committee of Public Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम

4. लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव 1835

5. चार्ल्स वुडचा खलिता (1854) भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा

6. हंटर शिक्षण आयोग (1882) प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर

7. थाॅमस रॅले आयोग (1902) भारतातील विद्यापीठय शिक्षणाचा आढावा

8. भारतीय विद्यापीठ कायदा (1904)

9. सॅडलर आयोग (1917) विद्यापीठय शिक्षण समस्येच्या अभ्यासासाठी

10. हार्टोग समिती (1929) प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्यावे

11. सार्जंट योजना (1944) 

12. राधाकृष्णन आयोग (1948)

13. कोठारी आयोग (1964)

गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती



1. डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता)
- 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात
- 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था

2. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण)
- कमी गुणसूत्रामुळे
- स्त्रीयांमध्ये आढळतो

3. क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम (क्लाईनफेल्टर्स संलक्षण)
- जास्त गुणसूत्रामुळे
- पुरूषांमध्ये आढळतो

● एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग / एकजनुकीय विकृती

1. वर्णकहीनता (Albinism)
- मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे

2. दात्रपेशी पांडूरोग (सिकलसेल अॅनिमिया)
- गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो.
- आनुवांशिक आजार

सवतंत्र भारताची राज्यघटना

🔅लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुध्द समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्र्वासन देण्यात आले व १९४६ च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.


🔅 तरिमंत्री योजनेनुसार १० लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेमध्ये सर्वसामान्य २१० मुस्लीम ७८ शीख ४ इतर ४ अशा २९६ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले. त्यांच्या अध्याक्षतेखाली अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणुन डॉ. एच. सी. मुखर्जी यांची तर समितीचे सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड झाली. याचबरोबर सा समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणुन पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राधाकृष्णन, के.एम. मुन्शी डॉ. जयकर इत्यादींचा सहभाग होता.


🔅 घटना परिषदेमार्फत २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसूदा समितीची निवड झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मसूदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बी. एन. राव, एस, एन. मुखर्जी, इ. मसुदा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले घटनेच्या मसुद्यामध्ये ३१५ कलमे व ७ परिशिष्टे आहेत. घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. तर गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता, या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी नवीन राज्यघटनेला मंजूरी देण्यात आली. राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.


🔅 महणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. २६ जानेवारी १९५० पासून नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. म्हणून हा दिवस सर्व देशभर साजरा केला जातो. भारताचे संविधान हा राज्यघटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. घटनेची ध्येये आणि उद्दिष्टे यात प्रतिबिंब्ंिात झाली आहेत. भारताचे संविधान खालीलप्रमाणे.


🔶 भारताचे संविधान


🔅 आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता:

निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्र्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन,

आमच्या संविधान सभेस आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.



💠 भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-



(१) लिखित घटना


भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे. इंग्लंडच्या घटनेप्रमाणे ती अलिखित नाही. राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आयली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.



(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना


भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.



(३) लोकांचे सार्वभौमत्व


घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सज्ञ्ल्त्;ाा आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फ़त राज्यकारभार चालविते राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणुन साजरा केला जातो.


(४) संसदीय लोकशाही


स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. घटनाकारांनी इंग्लंडचा आदर्श समोर ठेवून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती, मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.


(५) संघराज्यात्मक स्वरूप


भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.



(६) घटना अंशत परिवर्तनीय व अंशत परिदृढ


लिखित व अलिखित याप्रमाणेच परिवर्तनीय व परिदृढ असे घटनेचे प्रकार आहेत. इंग्लंडची राज्यघटना अतिशय लवचीक तर अमेरिकेची राज्यघटना अतिशय ताठर स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटना इंग्लंइतकी लवचीक नाही व अमेरिकेइतकी ताठरही नाही. भारतीय घटनादुरुस्तीची पध्दत कलम ३६८ मध्ये देण्यात आलेली आहे. एखाद्या साधारण मुद्यावर संसदेच्या साध्या बहुमताने घटनेत दुरुस्ती करण्यात येते मात्र राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत केंद्र व प्रांत यांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इ. महत्वपूर्ण बाबीविषयी घटनेत दुरुस्ती करताना संसदेच्या २/३ सदस्यांची अनुमती निम्म्याहून अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाची अनुमती आवश्यक असते. त्यामुळे भारतीय घटना अंशत, परिवर्तनीय व अंशत परिदृढ अशा स्वरुपाची बनविण्यात आली आहे.


(७) मूलभूत हक्क


भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क्ांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.


(८) धर्मनिरपेक्ष राज्य


भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्माना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.



(९) एकेरी नागरिकत्व


अमेरिकन व स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र व प्रांत यांचे दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे. भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेल आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली .


(१०) एकच घटना


ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे



(११) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ


देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.


(१२) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती


भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फ़त चालतो. भारताचा राष्ट्रपती हा इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेनुसार नसतो, तर अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.


(१३) मार्गदर्शक तत्वे


व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे


(१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात 

(२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा 

(३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. 

(४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे 

(५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये 

(६) देशातील साधनसंपज्ञ्ल्त्;ा्ीचे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. 

(७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.



(१४) स्वतंत्र न्यायालय व्यवस्था


लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.



(१५) राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार


भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सज्ञ्ल्त्;ाा केंदि्रत झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आह


(१६) हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा


भारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराजयाची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्या राज्यांना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.


(१७) प्रौढ मताधिकार


भारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला. आहे निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली आह


MPSC Combine Syllabus 2024

1) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.

2) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

3) अर्थव्यवस्था –

  • भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
  • शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

4) चालू घडामोडी – जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.

5) राज्यशास्त्र

6) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).

7) अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी

8) बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

MPSC Group B & Group C Combine Mains Syllabus 2023

MPSC Combine Mains : Paper 1

पेपर क्रमांक – 1 (मराठी, इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.)

1) मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

2) इंग्रजी : Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

MPSC Combine Mains : Paper 2

पेपर क्रमांक – 2 (सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.)

1) सामान्य बुध्दिमापन व आकलन : उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

2) चालू घडामोडी : जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.

3) अंकगणित व सांख्यिकी

4) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 (as updated) व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

5) भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी :

घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी

6) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास :

सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी

7) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल :

महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.

पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी.

8) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :

  • अ) भौतिकशास्त्र (Physics)
  • ब) रसायनशास्त्र (Chemistry)
  • क) प्राणीशास्त्र (Zoology)
  • ड) वनस्पतीशास्त्र (Botany)
  • इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, | Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.)
  • फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.)

9) अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र :

समग्रलक्षी अर्थशास्त्र

  • १.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र
  • १.२ वृद्धी आणि विकास
  • १.३ सार्वजनिक वित्त
  • १.४ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल

भारतीय अर्थव्यवस्था

  • २.१ भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा
  • २.२ भारतीय शेती व ग्रामीण विकास
  • २.३ सहकार
  • २.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र
  • २.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था
  • २.६ उद्योग व सेवा क्षेत्र
  • २.७ पायाभूत सुविधा विकास
  • २.८ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल
  • २.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...