०२ जानेवारी २०२४

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी 2 जानेवारी 2024

Q.1) ITBP चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
✔️ राहुल रसगोत्रा

Q.2) नुकतेच बंगालचे नवे महासंचालक  म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✔️ राजीव कुमार
 
Q.3) पाँडिचेरीचे पदसिद्ध कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✔️  जगदीप धनखड

Q.4) नुकतीच बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन पॅनेलवर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✔️  अक्कला सुधाकर
 
Q.5) बिस्लेरीने कोणाला आपले ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे?
✔️ दीपिका पादुकोण

Q.6) 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला कोण ठरली आहे?
✔️ फ्रँकोईस मेयर्स
 
Q.7) 12व्या दिव्य कला मेळा 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?
✔️गुजरात

Q.8) अलीकडेच कोणाच्या हस्ते नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया (NCDFI) लिमिटेडच्या मुख्यालयाची पायाभरणी करण्यात आली?
✔️ अमित शहा

Q.9) अलीकडेच दिग्गज अभिनेते विजयकांत यांचे निधन झाले आहे ते कोणत्या पक्षाचे संस्थापक आहेत?
✔️ DMDK

Q.10) जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो?
✔️ 1 जानेवारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चालू घडामोडी :- 01 जानेवारी 2024

◆ डॉ. नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे 47वे मुख्य सचिव असणार आहेत.

◆ भारत सरकारने 2024 वर्षापर्यंत देशातील प्रत्येक गावाततील घरात नळाद्वारे पाणी पोहचविण्याचे उद्दीष्टे ठेवले आहे.

◆ सध्या देशातील 72.29 टक्के घरामध्ये नळाद्वारे पाणी पोहचले आहे.

◆ देशातील ग्रामीण भागातील 28 टक्के घरात अजून नळाद्वारे पाणी पोहचले नाही.

◆ लखबीर सिंग लांडा ला भारत देशाने अंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केले आहे.

◆ Production linkd intenshiv अर्थात PIL ही औषध क्षेत्रातील योजना आहे.

◆ Production linkd intenshiv या योजेअंतर्गत देशाच्या औषध क्षेत्रात 25000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

◆ जम्मू आणि काश्मीर मधील तेहरिक ए हुरियक संघटनेवर केंद्र सरकारने 5 वर्षे बंदी घातली आहे.

◆ भारताच्या 16 व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी ऋत्विक रंजनम पांड्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भारताच्या 16 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी ची अमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून होणार आहे.

◆ कुमार गटाच्या 42 व्या राष्ट्रिय खो खो स्पर्धेचे विजेतेपद मुले आणि मुली गटात महाराष्ट्र राज्याने पटकावले आहे.

◆ महाराष्ट्र राज्याने सलग नव्यांदा कुमार गटाच्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ 42 व्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा छत्तीसगड राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या.

◆ देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे अयोध्या ते दरभंगा पर्यंत सुरु झाली आहे.

◆ अयोध्या ते दरभंगा या पाहिल्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

तलाठी सराव प्रश्नपत्रिका

1)) गडी *गावरानात* गुरे घेउन गेला आहे. अधोरेखित शब्द कोनत्या प्रकारात येतो?

१) सामासिक शब्द✔️

२) अभ्यस्त शब्द

३) तत्सम शब्द

४) तद्भव शब्द


2) पर्यायातील " तोळवा " या शब्दाचा समानार्थी नसलेले शब्द कोनता?

१) धष्टपुष्ट शरिर

२) तोष✔️

३) लंबक

४) तुळई


3) ' हेमाने दारापुढे सुंदर रांगौळी काढली. या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा?

१) शब्दयोगी अव्यय✔️

२) उभयान्वयी अव्यय

३) क्रियाविशेशन अव्यय

४) केवलप्रयोगी


4) पुढील वाक्याचा प्रयोग सांगा.

" पारीजातकाची योजना करनारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे."

१) कर्तरी प्रयोग✔️

२) कर्मनी प्रयोग

३) भावे प्रयोग

४) संकिर्ण प्रयोग


5) " भाकरी " हा शब्द मराठीत कोनत्या भाषेतुन आला आगे?

१) कानडी✔️

२) डच

३) पोर्तुगीज

४) अरबी


6) हल्ली *सज्जन मित्र* मिळने कठीन झाले आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषन प्रकार ओळखा.

१) साधित विशेषन

२) नामसाधित विशेषन✔️

३) अविकारी विशेषन

४) परिनाम दर्शक विशेशन


7) ' घरी ' या शब्दाची विभक्ती कोनती?

१) षष्ठी

२) प्रथमा

३) द्वितिया

४)सप्तमी✔️


8) मुलांनी शिस्तित चालावे.प्रयोग ओळखा.

१) कर्मनी

२) अकर्मक कर्तरी

३) भावे✔️

४) सकर्मक कर्तरी


9) ' गजानन ' या शब्दाचा समास ओळखा.

१) तत्पुरुष

२) बहुव्रिही✔️

३) द्विगु

४) मध्यमपदलोपी


10) ' जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होइल ' वाक्याचा प्रकार ओळखा.

१) केवल वाक्य

२) संयुक्त वाक्य

३) मिश्रवाक्य✔️

४) आज्ञार्थी वाक्य


11) 'लक्ष्मीकांत ' या शब्दाचा समास ओळखा.

१) बहुव्रिही✔️ 

२) कर्मधार्य

३) तत्पुरुष 

४) अव्ययीभाव


12) कपिलाषष्ठीचा योग येणे या वाक्याचा अर्थ ओळखा.

१) अत्यंत उत्सुक असने

२) जबाबदारी स्विकारने

३) दुर्मिळ संधी मिळने✔️

४) माघार घेने


13) कवितेचे रस किती आहेत?

१) चार

२) पाच

३) नऊ✔️

४) सात


14) " भाटी " शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोनता.

१) भट

२) भाट

३) कुत्रा

४)बोका✔️


15) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोनता.

१) ज्

२) र

३) ग

४) म्


16) खालील संयुक्त वाक्य कोनत्या प्रकारचे आहे

" सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोन घेतो?

१) न्युनत्वबोधक✔️

२) परिनामबोधक

३) विकल्पबोधक

४) समुच्तयबोधक


17) " र् " या व्यंजनाची जोडाक्षरे लिहन्याच्या किती पद्धती आहेत.

१) पाच 

२) चार✔️

३) एक

४) तिन


18) खालील शब्दातुन " कटक " या अर्थाचा शब्द कोनता?

१) युद्ध✔️

२) सैन्य

३) राजा

४) सेनापती


19) समानार्थी शब्द ओळखा. " *अभिनिवेश* "

१) जोम✔️

२) अभिनय

३) प्रवेश 

४) अभियान


20) ---- Yamuna is ---- tributary of the gangas.

1) The , A✔️

2) no article ,a

3) The , an

4) The, the


21) I met him ----- accident during my visit ------ Mumbai.

1) in , to

2) by ,to✔️

3) on,in

4) an,in


22) Use correct word in the sentence .

We ------ obey our parents.

1) should

2) will

3) can

4) must✔️


23) The meaning of beech--

1) sea shore

2) a tree✔️

3) an animal

4) a vegetable


24) choose the correct word from the following.

1) commutes

2) committee✔️

3) committing

4) committee


25) The important thing is ------ listen ------ them and change our ways.

1) to , to✔️

2) to, for

3) to, with

4) to, no article


26) Select the correct meaning of the word " error"

1) wrong

2) true

3) incorrect

4) mistake✔️


27) महाराष्ट्रात एकुण किती जिल्हा परिषदा आहेत?

१) ३६

२) ३४✔️

३) ३५

४) ३३


२८) वातावरनात ऑक्सीजन वायुचे प्रमान किती टक्के असते?

१) २३%

२) ४०%

३) ९८%

४) २१%✔️


२९)़मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोन्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केला?

१) लुई पाष्चर

२) रोनॉल्डरॉस✔️

३) बेनडेर

४) डिओडर श्वान


३०) मानवी नाडीचे प्रती मिनीट किती ठोके पजतात?

१) ७२✔️

२) ६०

३) ४०

४) ३०


३१) टंगस्टन धातू किती अंश तापमानास वितळतो?

१) २०००°

२) १०००°

३) ३०००°✔️

४) १५००°


३२) कोनत्या रोगाचा प्रसार पान्यामार्फत होतो?

१) काविळ

२) अतिसार

३) विषमज्वर

४) यापैकी सर्व✔️


३३) नॉनस्टीक भांड्यावर कशाचा थर असतो?

१)टेफ्लॉन✔️

२) जिप्सम

३) इथिलीन

४) फॉक्झिन


३४) मानवी शरीरात पान्याचे प्रमान किती असते?

१) ६५%✔️

२) ८०%

३) ६०%

४) ४०%


३५) मानवी़ शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी कोनती?

१) यकृत✔️

२) किडनी 

३) फुफ्फुस

४) र्हदय


३६) भारताचे गवर्नर जनरल केंव्हापासुन व्हॉइसरॉ़य म्हनुन ओळखले जाउ लागले?

१) १८५५

२) १८५६

३) १८५७

४) १८५८✔️


३७) सत्यशौधक समाजाचे मुखपत्र कोनते?

१) सुधारक

२) केसरी

३)दिनबंधू✔️

४) प्रभाकर


३८) डॉ.आंबेडकरांनी मनुस्मृतिचे दहन कोठे केले?

१) नाशिक 

२) मुंबई

३) रत्नागिरी

४) महाड✔️


३९)पुन्याचा प्लेग कमिशनर रँड याची हत्या १८९७ मध्ये कोणी केली?

१) वासुदेव बळवंत फडके

२) अनंत कान्हेरे

३) दामोदर हरीचाफेकर✔️

४) सुरेंद्र बोस


४०) सह्याद्रीच्या पुर्वेकडील प्रदेश काय म्हनुन ओळखला जातो?

१) अति पर्जन्याचा प्रदेश

२) पर्जन्य छायेचा प्रदेश✔️

भूकंप लहरी :



» ज्या वेळी भूकंप होतो, त्या वेळी भूकवचात मोठय़ा प्रमाणात हालचाली होतात व मोठय़ा प्रमाणात कंप निर्माण होतात. यांनाच ‘भूकंप लहरी’ असे म्हणतात.


■ नाभी (Focus) : 

» भूकंप झाल्यावर भूकवचातील ज्या स्थानापासून उगम पावून सर्वदूर पसरतात, त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा नाभी म्हणतात.


■ अधीकेंद्र (Epicentre) : 

» नाभीच्या अगदी वर क्षितिजाजवळच्या लंब रेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो िबदू मिळतो, त्याला ‘अधीकेंद्र’ असे म्हणतात. भूकंपकेंद्रापासून निघणाऱ्या भूकंप लहरींचा सर्वात अधिक प्रभाव अधीकेंद्राच्या निकट दिसून येतो. अधिकेंद्रापासून जसजसे अंतर वाढत जाते, तसेतसे भूकंपाची तीव्रता कमी कमी होत जाते.


■ भूकंप अधिलेख (Seismogram) :-  

» भूकंप लहरींचा अभ्यास भूकंप अभिलेखांवरून करता येतो. भूकंप लहरींचे तीन प्रकार पडतात-  प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी.


भूकंप लहरींचे प्रकार :- 

■ प्राथमिक लहरी (P waves) : 

» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व लहरींपेक्षा जास्त असतो. 

» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप पदार्थावरून प्रवेश करू शकतात. 

» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे असतात. 

» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण दिशेने घडून येते.


■ दुय्यम लहरी (S waves) : 

» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे असून यात कणांचे कंपन संचरण दिशेशी समलंब दिशेने घडून येते. 

» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या जाऊ शकत नाहीत. 

» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.


■ भूपृष्ठ लहरी (L waves) : 

» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी लहरींप्रमाणे प्रवाहित होतात. 

» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात. 

» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करू शकत नाही. 

» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात. 

» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.

_____________________

■ रिश्टर स्केल (Richter Scale) : 

» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण शोधून काढले. याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा एक ते नऊ या दरम्यान असतात.


■ भूकंपाचे जागतिक वितरण 

■पॅसिफिक महासागराचा पट्टा : 

» जगातील ६५% भूकंप प्रदेश पॅसिफिक महासागराच्या सभोवतालच्या पट्टय़ात आढळतो. 

» याला प्रशांत महासागरातील पट्टा किंवा अग्निकंकण (Rings of Fire) असे म्हणतात. 

» यात इंडोनेशिया, फिलिपाइन्स, जपानची बेटे, कामचटका द्वीपकल्प व पूर्व सबेरियातील काही भाग येतो. 

» भूकंपाचा हा पट्टा उत्तर अमेरिकेत आल्प्सपासून रॉकीज पर्वत दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वताला अनुसरून पुढे अंटाक्र्टिका खंडापर्यंत गेलेला आहे. 

» या भागातच असलेल्या जपानच्या हांशू बेटांवर जगातील सर्वात जास्त विद्धंसक भूकंप होतात.


■ मध्य अटलांटिक पट्टा  : 

» या पट्टय़ात अटलांटिक महासागरातील मध्य अटलांटिक रिझ आणि रिझजवळील काही बेटांचा समावेश होतो. 

» येथे सर्वसाधारणपणे मध्यम तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झालेली आहे.


■ भूमध्य सागरीय पट्टा : 

» या पट्टय़ाचा विस्तार अटलांटिक महासागरातील जलमग्न पर्वतरांगेपासून होऊन भूमध्य समुद्राभोवती पसरलेला आहे.


राज्यसेवा पूर्वसाठी असलेल्या कम्बाईन पूर्वपेक्षा वेगळ्या घटकांचा अभ्यास कसा करावा?

१. प्राचीन आणि मध्ययुगीन भारत.

हा घटक संपूर्णपणे राज्यसेवा पूर्व साठी आयोग विचारतो. यावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या निश्चित नसते. सर्वसामान्यपणे दोन ते सात प्रश्न या घटकावर विचारले जातात. संपूर्ण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास करणे शक्य नसल्यास त्यातील काही महत्त्वाचे घटक करून जाणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ... हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती, महाजनपदे, मौर्य कालखंड, गुप्त कालखंड भारतातील विविध घराणे इत्यादी.  या घटकांचा अभ्यास करण्यासाठी तामिळनाडू state board book किंवा लुसेंट सामान्य ज्ञान चे पुस्तक वापरावे. महाराष्ट्रातील अकरावीचे स्टेट बोर्ड देखील चांगला सोर्स आहे.

२. पर्यावरण-

या घटकावर आयोग राज्यसेवा पूर्व साठी आतापर्यंत पाच प्रश्न विचारत होता. पर्यावरणाचे प्रश्न हे बहुतांशी भूगोलाच्या दृष्टीने विचारले जातात. त्यामुळे त्यातील साधारणता निम्मे प्रश्न हे भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये कव्हर होतात. पर्यावरणामध्ये -
1) मूलभूत संकल्पना (जसे की परिसंस्था, पर्यावरणीय परिस्थितीकी, नॅशनल पार्क इ.),
2) जैवविविधता (Biodiversity Hotspot, IUCN Redlist इ.),
3) हवामान बदल (UNFCC, UNCBD, UNCCD, Kyoto Protocol यांचेसारख्या आधुनिक जागतिक करार)
या घटकांवर आयोगाचे विशेष लक्ष आहे.
यांची तयारी करण्यासाठी बाजारातील कोणतेही एक संदर्भ पुस्तक वापरावे.

3) भूगोल-

यामध्ये पहिला मुख्य मुद्दा म्हणजे राज्यसेवा पूर्वसाठी आयोग प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलावरती भर देते. यामध्ये भूरूपशास्त्र (geomorphology), जलावरण (oceanography) आणि वातावरण (climatology) या तीन उपघटकांवर आयोग सर्वसामान्यपणे सहा ते नऊ प्रश्न विचारते. खरंतर राज्यसेवा पूर्व जवळपास 70 टक्के भूगोल या तीन घटकांवर आधारित आहे. त्यामुळे या तीन घटकांमधूनच सुरुवात करावी. त्यांची तयारी करण्यासाठी इयत्ता अकरावी ची फिजिकल भूगोलाची Fundamentals of Physical Geography ही एनसीईआरटी वापरावी.
यातील दुसरा मुद्दा म्हणजे भारताच्या भूगोलाचा अभ्यास. यावर आयोग दोन ते तीन प्रश्न विचारतो. त्यांचा अभ्यास करण्यासाठी अकरावीची ncert - India Physical Environment हा पुरेसा संदर्भ आहे.
भूगोलाच्या बाबतीत शेवटचा मुद्दा सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीवर आयोग साधारणतः दोन ते तीन प्रश्न विचारतो. त्यासाठी सौदी सरांचे महाराष्ट्र भूगोल अथवा अन्य कोणतेही बाजारातील एखादे पुस्तक आपण संदर्भासाठी घेऊ शकतो.

4) Economy

संयुक्त पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा यांमध्ये इकॉनोमी मध्ये बराच फरक जाणवतो. राज्यसेवा पूर्व मध्ये आयोग संकल्पनात्मक प्रश्न विचारतो तर संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आयोग factual data विचारतो.
राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये समावेशन, लोकसंख्या, शाश्वत विकास, पंचवार्षिक योजना या घटकांवय प्रामुख्याने प्रश्न विचारला जातो. या घटकांवर तयारी कशी करावी याबाबत आपण चॅनलवरती जुन्या पोस्ट केलेले आहेत. त्या एकदा वाचून घ्या.

5) Polity-

यासाठी लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक अत्यंत उत्तम संदर्भ पुस्तक आहे. या विषयाचे प्रश्न राज्यसेवा पूर्वचा अभ्यास करत असताना थोडेसे राष्ट्रीय पातळीकडे झुकलेले दिसतात. तसेच चालू घडामोडींच्या अनुषंगाने देखील राज्यसेवा पूर्वला. पॉलिटीचे प्रश्न विचारतात. याव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व चे प्रश्न हे Multiple Choice Questions असतात.

बाकी General Science आणि Current Affairs साठी तुम्ही कंबाईन पूर्व साठी जसा अभ्यास केला होता तसाच करा. फक्त General Science साठी प्रश्नांची संख्या जास्त, वैज्ञानिक गणितांचा समावेश एवढाच काय तो फरक.

विज्ञानाच्या अभ्यासासाठी लुसेंट हा सर्वोत्तम source वाटतो.
तर चालू घडामोडी साठी बाजारातील कोणतेही एका प्रकाशनाचे पुस्तक वापरावे.

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐💐

विज्ञानाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न

1: - स्नायूंमध्ये कोणते ऍसिड साचल्याने थकवा जाणवतो?

उत्तर: - लॅक्टिक ऍसिड


२: - द्राक्षात कोणते आम्ल आढळते?

उत्तर: - टार्टरिक ऍसिड


3: - कर्करोगाशी संबंधित आजारांचा अभ्यास म्हणतात

उत्तर: -ऑरगेनोलॉजी


4: - मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे?

उत्तर: - मज्जातंतूचा पेशी


5 .: - दात प्रामुख्याने कोणत्या पदार्थापासून बनलेले असतात?

उत्तर: - डेन्टाईनचे


6.: - कोणत्या जंतूंचा आकार पायातील चप्पल प्रमाणे असतो?

उत्तर: - पॅरामेटीयम


7: - गांडुळात किती डोळे आहेत?

उत्तर: - एकटा नाही


8: - गाजर कोणत्या व्हिटॅमिनचे समृद्ध स्रोत आहे?

उत्तर: - व्हिटॅमिन ए


9: - प्रथिने कोणत्या पदार्थामध्ये आढळत नाही?

उत्तर: - तांदूळ


10.: - मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅम आहेत?

उत्तर 1350 ग्रॅम

एल निनो म्हणजे काय?

अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेकडून अलीकडेच प्रकाशित करण्यात आले आलेल्या अहवालानुसार जून ते ऑगस्ट या काळात 'एल निनो'ची परिस्थिती उद्भवण्याचा अंदाज आहे. भारतात जून ते ऑगस्ट या काळात जवळपास 60 टक्के एल निनो परतण्याचा संस्थेचा अंदाज आहे.


भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) कडून प्राप्त माहितीनुसार हवामानाची जी सध्याची स्थिती आहे, त्यावरून असे दिसून येते की कमकुवत एल निनोच्या संदर्भात इशारा करीत आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांपर्यंत ही स्थिती राहण्याचा अंदाज आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यात आणि मेच्या शेवटपर्यंत याबाबत स्पष्टता मिळणार. तेव्हाच पावसावरील त्याच्या प्रभावाबाबत स्पष्टता दिली जाऊ शकणार.


▪️एल निनो म्हणजे काय?


डिसेंबर महिन्यात दक्षिण अमेरिकेतील किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलास एल निनो म्हणतात.


एल निनो प्रशांत महासागरात तयार होणारा एक जलवायू चक्र आहे, ज्याचा प्रभाव जगभरातल्या हवामानावर पडतो. हा चक्र तेव्हाच सुरू होतो जेव्हा पश्चिम उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरात गरम पाणी दक्षिण अमेरिकेच्या तटाकडे भूमध्य सीमेबरोबर पूर्वेकडे प्रवाहीत होतो.


‘एल-निनो’ परिणाम म्हणजे प्रशांत महासागरात असलेले ताहिती नावाचे बेट आणि पेरू या देशाच्या किनापट्टीजवळून वाहणारा गरम पाण्याचा प्रवाह होय. या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे हजारो चौरस किलोमिटर क्षेत्रफळावरील पाण्याचे तापमान वाढण्यास सुरुवात होते. ही तापमान वाढ एक अंश सेल्सियसपेक्षा कमी असल्यास त्याचा पावसाच्या अंदाजावर फारसा परिणाम होत नाही. 


परंतु तापमान एक ते दीड अंश सेल्सियसपर्यंत गेल्यास पावसाचा अंदाज वर्तविताना या तापमान वाढीचा प्रभाव विचारात घ्यावा लागतो. एल-निनो तीव्र असल्यास तापमान पाच अंश सेल्सियसपर्यंत वाढते. या वाढलेल्या तापमानामुळे प्रशांत महासागरात पाण्यालगतची हवा गरम होऊन तिचे बाष्पात रुपांतर होते व ती उंचावर निघून जाते. त्यामुळे या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो.


हिंदी महासागर व प्रशांत महासागर यांच्यावरील हवेचा दाब एकमेकांशी निगडित असल्याने हिंदी महासागरात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. चांगला मोसमी पाऊस पडण्यासाठी हवेचा दाब हा कमी असावा लागतो. त्यामुळे एल-निनो आल्यास मोसमी पाऊस भारत व त्याच्या शेजारील राष्ट्रांत कमी पडतो वा पडतही नाही. हा एल-निनो दरवर्षी येतोच असे नाही.


2017 साली निधन पावलेले हवामानशास्त्रज्ञ देव राज सिक्का यांनी 1982 साली पहिल्यांदा एल निनो घटना आणि भारतीय मान्सून यादरम्यान असलेला संबंध प्रस्तावित केला होता.


▪️एल निनोचा प्रभाव :-


विकसनशील देश हे शेती आणि मासेमारी यावर अवलंबून आहेत. ज्या देशांच्या सीमा प्रशांत महासागराला जोडलेल्या आहेत, तेथे हा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागल्याचे अनुभव आतापर्यंत आले आहेत.


गेल्या काही वर्षांत एल निनोमुळे पॅसिफिक महासागरातील समुद्राचा पृष्ठभाग उबदार होऊ लागला आहे. त्यामुळे वाऱ्याच्या वेगात आणि मार्गात बदल होत आहे आणि त्याचा ऋतुमानाच्या चक्रावरही वाईट परिणाम घडू लागल्यामुळे बऱ्याच देशात दुष्काळसदृश्य तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होताना दिसून आली आहे. 


▪️एल निनोची लक्षणे :-


अभ्यासानुसार, प्रशांत महासागराचे विषुववृत्तावरील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सतत तीन महिने 0.5 अंश सेल्सियस ते 0.9 सेल्सियसपर्यंत वाढल्यासच एल निनोचा प्रभाव दिसून येतो.


हिंदी महासागराच्या पाण्याचा पृष्ठभाग, तसेच इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियावरील हवेच्या दाबात वाढ होणे. ताहिती, मध्य पूर्व प्रशांत महासागराच्या भागावरील हवेचा दाब कमी होणे.  दक्षिण प्रशांत महासागराच्या भागातील ‘ट्रेड विन्डस्‘ म्हणजेच विषुववृत्तीय भागातून वाहणारे वारे कमकुवत असणे आणि त्यांची दिशा पूर्वेकडे असणे.  


पश्चिम प्रशांत महासागरातले आणि हिंदी महासागरातले उष्ण पाण्याचे प्रवाह पूर्व प्रशांत महासागराकडे पसरणे. त्याचा परिणाम पश्चिम प्रशांत महासागराजवळच्या भागात दुष्काळ आणि कोरड्या पूर्व प्रशांत महासागराच्या भागात पाऊस असा होतो. अश्या अनेक लक्षणांवरून याबाबत निश्चिती करण्यात येते.


उष्ण कटिबंधातील पूर्व मध्य प्रशांत महासागरात सातत्याने पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याने सातत्याने ‘एल निनो’साठी प्रभावी वातावरणनिर्मिती होते. त्यातूनच प्रशांत महासागराकडून वाहणाऱ्‍या वाऱ्‍याचा वेग कमी होतो. त्याचाच परिणाम पूर्वेकडील उत्तर भागातल्या ऑस्ट्रेलियामध्ये पाऊस होतो. प्रामुख्याने भारत, स्वीडन, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान या देशांवर परिणाम होतो.

MCQ effectively कसे Solve कराल आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवाल?

आपण या Series च्या भाग 1 मध्ये पुस्तकं कसे वाचावे आणि Pyq चे analysis कस करावे? याविषयी माहिती पाहिली होती. आजच्या भाग 2 मध्ये आपण केलेल्या वाचनाचे परीक्षेत Reflection कसे मिळवावे?अभ्यासाचे Consolidation कसे करावे? Out of Box प्रश्नांना कशा पद्धतीने सामोरे जावे याविषयी माहिती बघुयात.


 यावर्षी कधी नव्हे ते सर्व पदांसाठी ऍड आल्या आहेत.2022 वर्ष स्पर्धा परीक्षेसाठी एक सुवर्ण वर्ष ठरणार आहे.त्यासाठी आपल्याला सज्ज राहावे लागणार आहे आणि ते ही पुर्ण तयारीनिशी.


करूया सुरवात..


♦️आपण करत असलेला अभ्यास आणि त्याचे परीक्षेतील प्रतिबिंब -


बऱ्याच मुलांची सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे मी अभ्यास खूप करतो/करते पण परीक्षेमध्ये मार्क मिळत नाहीत. त्यासाठी नक्की काय कराव. मला असं वाटतं की आपण फक्त Books वाचत राहतो. ते परीक्षेसाठी किती महत्त्वाच आहे? एखादा टॉपिक आणि त्या टॉपिक मधील कोणता सबटॉपिक  महत्त्वाचा आहे हेच आपल्याला समजत नाही. त्यामुळे फर्स्ट टू लास्ट पेज आपण पुस्तक वाचत राहतो. आणि इथेच आपली खूप मोठी चूक होते. परीक्षेला नक्की काय विचारतात हेच आपल्याला समजलेल नसतं. ते समजण्यासाठी  सगळ्यात महत्त्वाचा Mirror  म्हणजे Previous Year Question Papers. ते पाहूनच आपण पुस्तकांचे वाचन करायला पाहिजे. त्यानीच आपल्या वाचनामध्ये Specificity येण्यास मदत होईल. अन्यथा आपले गाढवकाम हे वर्षानुवर्ष सुरूच राहील.

परीक्षेमध्ये अभ्यासाचा reflection न होण्याचं आणखी एक कारण म्हणजे आपण अभ्यासाचा घेतलेला अतिरिक्त ताण आणि काही झालं तरी पास व्हायचंच आहे अशी आपली तयार झालेली मानसिकता. मला देखील याचा अनुभव आहे. पण हे खूप धोकादायक आहे त्याऐवजी सकारात्मक विचार, अभ्यासातील सातत्य, Pass होण्याची कोणतीही भीती मनात नसणे इ. गोष्टींकडे आपण आपला Focus वळवला तर ते आपल्याला 100% फायद्याचं ठरेलं.


♦️दसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभ्यासाचे Consolidation (दृढीकरण ).


आपण वाचत असलेला Content हा खूप Fragmented स्वरूपात असतो.त्याला एका ठिकाणी गोळा करावे लागते. त्यासाठी लिमिटेड Sources आणि त्याच्या Maximum Revisions हाच रामबाण उपाय आहे.त्यामुळेच सर्व Toppers सांगत असतात की References Limited ठेवा त्याच्याच वारंवार revisions करा.ते अगदी बरोबर आहे.कारण आपण References ला जेवढे limited राहू तितका आपला अभ्यास Perfect होतो आणि डोक्यामध्ये Content च mixture होत नाही.उदा. आपण Combine/ Rajyaseva Mains साठी इंग्लिश विषयाला Vocabulary करत असतात pal & suri, Bakshi सर, बाळासाहेब शिंदे सर, कोणत्याही class चा Vocab ची notes इ. Data वाचत असतो. पण मला तुम्ही सांगा आपण जर एवढे सगळे sources वाचले तर आपल कोणतेही Vocab नीट होणार नाही आणि revision ला पण वेळ भेटणार नाही. थोडक्यात आपण वर mention केलेल्या sources पैकी कोणताही एकच source Vocab साठी वापरावा आणि त्याच्याच जास्तीत जास्त revisions कराव्यात. हीच गोष्ट आपल्याला प्रत्येक विषयाला आणि त्या विषयातील Subtopics ला लागू करायची आहे.


♦️तिसरा महत्वाचा मुद्दा येतो Out of Box प्रश्न कसे सोडवायचे?


मित्रांनो बघा, त्यासाठी आपल्याला खूप जास्त वाचन करण्याची गरज नाही. Exam Hall मध्ये आपली सदसदविवेकबुद्धी जागृत असली तरी बरेच प्रश्न सुटू शकतात.आणखी काही बाबी म्हणजे आयोगाची प्रश्न विचारण्याची भाषा(आयोगाने प्रश्नामध्ये उद्दिष्ट विचारल्यावर एकच उद्दिष्ट असत. आणि उद्दिष्टे विचारल्यावर एकापेक्षा जास्त उद्दिष्टे असतात. त्यावरून पर्यायकडे गेलो की आपण खूप लवकर उत्तरापर्यंत पोहोचू शकतो.आयोगाच्या प्रश्नामधील काही tricks (उदा. एखादा पर्याय लांब असेल तर शक्यतो ते Answer राहते.),आयोगाचा प्रश्न समोर आल्यानंतर त्याच उत्तर काय असू शकत याचा आपला develope झालेला एक Common sense(उदा.आयोगाने a, b, c अशी तीन वाक्ये दिली आणि पर्यायामध्ये ab, bc, ac आणि all of the above असं दिल तर आयोग यामधील नेमक कोणत उत्तर ठेवत आहे, चुकवलं तर कुठे चुकवत आहे हे तुम्ही बारकाईने Pyq मधून बघून घ्या)इ. गोष्टी खूप मॅटर करतात.  

उदा.2017 च्या MPSC Mains मध्ये असा प्रश्न आला होता की भारतीय पायाभूत सुविधा महामंडळ मर्यादित कंपनी हे अल्प मुदतीचे कर्ज देते. तर हे विधान बरोबर असूच शकत नाही. कारण पायाभूत विकासाची कामे दीर्घ कालावधीसाठी असतात. तर त्यासाठी स्थापन झालेली कंपनी अल्प मुदतीचे कर्ज कसे देऊ शकते? अशा पद्धतीने तो पर्याय eliminate झाला की आपण थेट उत्तरापर्यंत पोहोचतो.                                  आजच्यापुरत एवढंच.


यातील पुढील भागात आपण एक नवीन विषय घेऊन त्या अनुषंगाने चर्चा करूयात.

धन्यवाद.


क्रियाविशेषण :-



✔️करियाचा विशेष दाखविणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय. 

वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांचे लिंग वचन, पुरुष बदलले असले तरी काही शब्द हे जसेच्या तसेच राहतात. अर्थात त्याचा व्यव होत नाही. अशा शब्दांना अव्यये असे म्हणता येईल. असेच शब्द विशिष्ट क्रियेच्या संदर्भात असून आणि ते कोणत्याही कर्ता, कर्मानुसार बदलत नसेल तर त्याला क्रियाविशेषण अव्यव असे म्हणता येईल. 


🔹 करियाविशेषण अव्यय याचे प्रमुख प्रकार ते पुढील प्रमाणे :-


▪️अ. अर्थावरून 

▪️आ. स्वरूपावरून


   🔹कालवाचक क्रियाविशेषण

 

▪️अव्ययांचे तीन प्रकार

▪️अ) अर्थावरून पडणारे प्रकार 


🔹कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे तीन प्रकार पुढील प्रमाणे :


🔹१) कालदर्शक :-

वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शविणाऱ्या शब्दांना 'कालदर्शक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.


▪️उदा.

आधी, आता, सध्या, तूर्त, हल्ली, काल, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा इ.


१. मी काल शाळेत गेलो होतो.

२. मी उदया मुंबईला जाईन.


🔹२) सातत्यदर्शक :-

वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शविणार्‍या शब्दांना 'सातत्यदर्शक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.


▪️उदा.

सदा, नित्य, पुन्हा, वारंवार, दरवर्षी, दररोज, क्षणोक्षणी, दिवसेंदिवस, महिनोनमहिने इ. 


१. पाऊस सतत कोसळत होता.

२. सुरजचे आजकाल अभ्यासात लक्ष नाही.


🔹३) आवृत्तीदर्शक :-

वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शविणार्‍या शब्दांना 'आवृत्तीदर्शक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.


▪️उदा.

फिरून, वारंवार दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा इ.


१. आई दररोज मंदिरात जाते.

२. जानवी वारंवार आजारी पडते.


🔹 सथलवाचक क्रियाविशेषण अव्यय :-

वाक्यातील क्रियेचे स्थळ/ठिकाण दर्शविणार्याआ शब्दांना 'स्थलवाचक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.


▪️याचे दोन  प्रकार पडतात.


🔹अ) स्थितीदर्शक :-

▪️उदा.

येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे-तिकडे, समोवताल इत्यादि.


१. मी येथे उभा होतो.

२. जिकडे-तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे.


🔹२. गतिदर्शक :-

▪️उदा.

इकडून, तिकडून, मागून, पुढून, वरून, खालुन, लांबून, दुरून.


१. जंगलातून जातांना पुढून वाघ आला.

२. चेंडू दूर गेला.

३. घरी जातांना इकडून ये.


🔹  रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय :-

वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखविण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना 'रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.


🔹याचे तीन प्रकार पडतात.


🔹अ) प्रकारदर्शक

▪️उदा. असे, तसे जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद इत्यादी.


१) वैभव सावकाश चालतो.

२) ती जलद धावली.

३) सूरज हळू बोलतो.


🔹आ) अनुकरणदर्शक 

▪️उदा. झटकण, पटकण, पटापट, टपटप, चमचम, बदाबद, इत्यादी.


१) त्याने झटकण काम आटोपले.

२) प्रियंका पटापट फुले वेचते.

३) त्याने जेवण पटकण आटोपले.


🔹इ) निश्चयदर्शक 

▪️उदा. खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस इत्यादी.


१) रमेश नक्की प्रथम क्रमांक पटकावणार.

२) तू खुशाल घरी जा.

३) तुम्ही खरोखर जाणार आहात?



🔹 सख्यावाचक/परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय :-

वाक्यातील शब्द जेव्हा क्रियेची संख्या किंवा परिमाण दाखवितो तेव्हा त्याला 'संख्यावाचक/ परिमाणवाचक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

▪️उदा.

कमी, जास्त, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, अतिशय, मोजके, पूर्ण इत्यादी.


तुम्ही जरा शांत बसा.

सुरेश अतिशय प्रामाणिक आहे.

ती मुळीच हुशार नाही.



🔹 परश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय :-

वाक्यातील का/ना ही शब्द जेव्हा क्रियापदाला प्रश्नार्थक बनतात तेव्हा त्यांना 'प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.


▪️उदा.

१) तू सिनेमाला जातो का?

२) तुम्ही सिनेमाला याल ना?

३) तुम्ही अभ्यास कराल ना?



🔹निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय :-

वाक्यातील न/ना ही शब्द जेव्हा क्रियेचा निषेध किंवा नकार दर्शवतात तेव्हा त्याला 'निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.


▪️उदा.

१. मी न विसरता जाईन.

२. तो न चुकता आला.

३. तिने खरे सांगितले तर ना !



🔸सवरूपावरून पडणारे प्रकार


🔹सिद्ध क्रियाविशेषण अव्यय :-

काही शब्द मुळातच क्रियाविशेषण असतात त्यांना 'सिद्ध क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.


▪️उदा.

मागे, पुढे, येथे, तेथे, आज इत्यादी.


१) तो मागे गेला.

२) ती तेथे जाणार.



🔹 साधीत क्रियाविशेषण अव्यय :-

नाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय यांच्यापासून झालेल्या क्रियाविशेषणांना 'साधित क्रियाविशेषण' असे म्हणतात.


☑️याचे दोन प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे 




🔹अ) साधीत क्रियाविशेषण अव्यय :-


▪️नामसाधीत :- रात्री, दिवसा, सकाळी, व्यक्तिश:, वस्तूत:

▪️सर्वनामसाधीत :- त्यामुळे, यावरून, कित्येकदा,

▪️विशेषणसाधीत :- मोठयाने, एकदा, इतक्यात, एकत्र.

▪️धातुसाधीत :- हसू, हसत, हसतांना, पळतांना, खेळतांना

▪️अव्ययसाधीत :- कोठून, इकडून, खालून, वरून.

▪️परत्यय सधीत :- शास्त्रदृष्ट्या, मन:पूर्वक, कालानुसार.


▪️उदा.

१) तो रात्री आला.

२) मी त्यांना व्यक्तिश: भेटलो.

३) तिने सर्व रडून सांगितले.



🔹आ) सामासिक क्रियाविशेषण अव्यय :-

काही जोडशब्द किंवा सामाजिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे काम करतात अशा दोन शब्दांना सामासिक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखले जाते.


▪️उदा.

गावोगाव, गैरहजर, गैरकायदा, दररोज, प्रतिदिन, रात्रंदिवस, समोरासमोर, घरोघर, यथाशक्ती, आजन्म, हरघडी इत्यादी.


१) आज सचिन वर्गात गैर हजर आहे.

२) पाऊस दररोज पडतो.

३) विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात.

०१ जानेवारी २०२४

महत्वाचे करंट अफेअर्स-


🔖 प्रश्न - जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

ANS - चीन - चीनचा जगाच्या एकूण वाट्यापैकी ३४ टक्के वाटा आहे. 



🔖 प्रश्न - महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्स च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती केली आहे ?

ANS - डॉ. रमण गंगाखेडकर यांची 


🔖 प्रश्न - भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने किती सदस्यांची समिती स्थापन केली ?

ANS - ३ सदस्यांची


🔖 प्रश्न - देशातील पाहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे ?

ANS - चंदीगड येथे 


🔖 प्रश्न - सध्या चर्चेत असलेला गेलेफु स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे ?

ANS - भूतान



🔖 प्रश्न - टेस्ट अटलास या आंतरराष्ट्रीय पर्यटन ई मासिकाने जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्य नगरीची यादी जाहीर केली असून, प्रथम स्थानी कोणते शहर आहे ?

ANS -  रोम शहर


🔖 प्रश्न - १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?

ANS - डॉ. जब्बार पटेल 


🔖 प्रश्न - BBC sport personality of the years २०२३ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

ANS - मैरी ईअर्स 


🔖 प्रश्न - ८५ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले ?

ANS - चिराग सेन यांनी 


🔖 प्रश्न - ८५ वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडली ?

ANS - गुवाहटी


🔖 प्रश्न - खालीलपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे

ANS - अबुधाबी शहर



🔖 प्रश्न - बँक ऑफ बडोदा च्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ?

ANS - तिसऱ्या क्रमांकावर - भारतात महागाईचा दर ५.६ टक्के आहे. 


🔖 प्रश्न - केंद्र सरकारच्या अहवालानुसर देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे ?

ANS - राजस्थान - येथे १४६ कारागृहाची संख्या आहे


🔖 प्रश्न - २०२३ या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्या मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरला आहे ?

ANS - भारत 


🔖 प्रश्न - डॉ. सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला ?

ANS - उर्दू  भाषेतील - त्यांना राजदेव की आमराई या कादंबरी साठी हा पुरस्कार जाहीर झाला. 


🔖 प्रश्न - भारताकडून ऑस्कर २०२४ साठी पाठविण्यात आलेला २०१८: एव्हरिवन इज हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे ?

ANS - मल्याळम 


🔖 प्रश्न - भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी भाशीनी ही कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा कोणत्या मंत्रालया अंतर्गत राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे ?

ANS - इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत (जॉईन SAIMkatta टेलिग्राम)


🔖 प्रश्न - खालीलपैकी कोणाला जलमित्र पुरस्कार जाहीर झाला ?

ANS - प्रा.डॉ.रामचंद्र मोरवंचीकर यांना 


🔖 प्रश्न - आर्क्टिक प्रदेशावर —– चा आजवरचा सर्वात उष्ण उन्हाळा ठरला आहे ?

ANS - २०२३


🔖 प्रश्न - सन १९०० नंतर २०२३ हे कितवे सर्वात उष्ण वर्षे ठरले आहे ?

ANS - सहावे


🔖 प्रश्न - राज्याच्या पोलिस महासंचालक पदी कोणाची निवड करण्यात आली ?

ANS - रश्मी शुक्ला यांची


🔖 प्रश्न - संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे ?

ANS - नितीश कुमार यांची 


🔖 प्रश्न - ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत ?

ANS - अकोला येथे  


🔖 प्रश्न - कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकार सोबत शांतता करार केला आहे ?

ANS - आसाम 


🔖 प्रश्न - कोणत्या राज्यात ५० व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केली आहे ?

ANS - झारखंड सरकारने


🔖 प्रश्न - भारताचे कोणत्या देशातील उच्चायुक्त म्हणुन संतोष झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे ?

ANS - श्रीलंका 


🔖 प्रश्न - कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे ?

ANS - महाराष्ट्र - या प्रकल्प अंतर्गत एकूण १२ जिल्ह्यात ड्रोन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. 


🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरविण्यासाठी कोनाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे ?

ANS - सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली


🔖 प्रश्न - कमांडर डोंग जुन यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

ANS - चीन 


🔖 प्रश्न - SLIM ही चंद्रयान मिशन मोहीम कोणत्या देशाची आहे ?

ANS -  जपान 


🔖 प्रश्न -  भारतीय नौदल शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेल्या नवीन गणवेश कधी पासून स्वीकारणार आहेत ?

ANS - १ जानेवारी २०२४ पासून


राज्यसेवा परीक्षा जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत


 👉 सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.


📌1. सत्व – अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


📌2. सत्व – ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


📌3. सत्व – ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


📌4. सत्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


📌5. सत्व – ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


📌6. सत्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


📌7. सत्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


📌8. सत्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


📌9. सत्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


📌10. सत्व – के 

 

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी.       


MPSC राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी यशाचा राजमार्ग

     अभ्यास सुरू करताना आजपर्यंत कसे प्रश्न विचारले गेले ते पाहावे आणि अभ्यास करताना मनातल्या मानत प्रश्न तयार करावेत त्याचबरोबर जो भाग लक्षात राहणार नाही अथवा महत्वाचा वाटतो त्याच्या शॉर्ट मध्ये नोट्स काढा..वाचताना घाई करू नका..शांतपणे समजून उमजून वाचा..एखादा कन्सेप्ट समजत नसेल तर आपल्या ज्याला चांगली त्या विषयावर पकड आहे त्यांना विचारा..त्यावर अधाररीत प्रश्न कोणत्याही मार्केटमधील प्रश्नसंच मधून सोडवा..
     आपण मागील परीक्षेत का fail झालो याची कारणे शोधा आणि ती एका डायरी मध्ये लिहा आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा..अभ्यासासाठी छोटासा ग्रुप तयार करा..एकमेकांना नोट्स शेअर करा..खूप वेगवेगळ्या पुस्तकसूची आणि अभ्यासाच्या strategy मुळे गोंधळून जाऊ नका.कोणतेही तुम्हाला योग्य वाटेल ती वापरा.हि परीक्षा पास होण्याचा कोणताही एक विशिष्ट मार्ग नाही.वेगवेगळ्या मार्गाने यशस्वी होता येते.कोणतापण एक चांगला मार्ग निवडा.कोणतेही पुस्तकसूची वापरा.भरमसाठ पुस्तके खरेदी करू नका.कोणतेही एकच चांगले पुस्तक करा.हि परीक्षा पुस्तकांची परीक्षा नाही.आपण जे वाचले आहे त्यावर confident राहावा.खाली
     मी मोबाईल चा वापर कसा करता येईल ते लिहले आहे ते बघा तुम्हाला जमले तर use करा...किती तास अभ्यास केला यापेक्षा किती तो अभ्यास आत्मसात झाला यावर भर द्या..भरपूर प्रश्न हे शालेय पुस्तके,इकॉनॉमिक सर्व्हे, लोकराज्य मासिके,शासनाच्या वेबसाईट्स यावर आधारित असतात.त्यांचा चांगला अभ्यास करा...लक्षात घ्या हि तुमची आत्मविश्वासाची परीक्षा आहे..
      जे उमेदवार upsc आणि mpsc या दोघांचा अभ्यास करतात त्यांनी कोणत्यातरी एक परीक्षा द्यावी कारण दोघांचा अभ्यासक्रम, अभ्यास approach आणि परिक्षपद्धती मध्ये फरक आहे..जर तुम्ही upsc चा अभ्यास  सुरु केला नसेल तर mpsc द्या आणि जर तुमचा optional विषयाचा अभ्यास चांगला पूर्ण होत आला असेल तर  upsc करा..
        जे लोक नोकरी करत असतील त्यांना दिवसातून 5 ते 6 तास अभ्यास suffucient राहील....आणखी   या क्षेत्रात  नव्याने येणाऱ्या उमेदवारांनी जर तुमचा खरंच इंटरेस्ट असेल तर तयारी करा.competition खूप वाढले आहे आणि जागा त्या प्रमाणात कमी आहेत.अनिश्चितीता वाढली आहे..तुमचे आवडते क्षेत्र निवडा(कोणी सांगितले म्हणून अथवा कोणतातरी जाहिरात,विडिओ पाहून या क्षेत्रात येऊ नका)

प्रथमतः ही पुस्तके वाचण्याची परीक्षा नाही..आपण कशासाठी आणि का अभ्यास करतो याची जाणीव आपणास सतत असणे आवश्यक आहे...परीक्षेचे स्वरूप पहा..अभ्यासक्रम पहा..कोणत्या विषयावर आपली कमांड नाही तो विषय पाहीले घ्या..एक विषय एकदाच घ्यायचा आणि अभ्यास पूर्ण करायचा..प्रश्न सोडवायचे.. शॉर्ट नोट्स काढायच्या आणि प्रत्येक विषयात पारंगत परीक्षेच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे..अभ्यासाबरोबर स्वतःवर विश्वास आणि कंट्रोल असणे आवश्यक आहे

जर अभ्यास करताना एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा प्रथम बेसिक चांगले करून घ्या
--अभ्यास करताना घाई करू नका
--जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढचा टॉपिक घेऊ नका
--आपल्या मित्रकडून समजून घ्या
--त्या टॉपिक च्या शॉट मध्ये नोट्स काढा
जास्तीतजास्त प्रश्न सोडवा
मुख्य परीक्षेला जवळजवळ 40% भाग हा पूर्व परीक्षेतील syllabus मध्ये आहे..जो विषय तुम्हाला अवघड जातो त्याचा दररोज अभ्यास करा..कोणताही विषय optionla नका ठेऊ..अजून भरपूर वेळ आहे..सर्व कव्हर करू शकता..दररोज केलेल्या अभ्यासाची त्याच दिवशी revision करा(9pm rule--रात्री 9 नंतर कोणताही नवीन टॉपिक  वाचायचा नाही दिवसभर केलेल्या अभ्यासाची revision करायची..दररोज आपण काय अभ्यास करणार आहोत याची सकाळीच तयारी करायची आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करायचा..त्यामध्ये किती pages वाचणार असे नसावे तर syllabus चा किती भाग पूर्ण करणार असे नियोजन असावे..आपण केलेला अभ्यास फावल्या वेळेत आपल्या मित्राला सांगणे आपण काय अभ्यास केला ते..सांगितल्यामुळे अभ्यास आणखी पक्का होतो..
  


MPSC राज्यसेवा पूर्व मागील 2013  ते  2020 पर्यंत 🙏cut off... 🤔🤔


♦️2013- 177


♦️2014- 138


♦️2015- 125


♦️2016- 153


♦️2017- 189


♦️2018- 247


♦️2019- 197


♦️ 2020- 203.50


⚠️ मागील वर्षी चे cut off तुम्हाला idea यावी म्हूणन share केलेले आहेत..


राज्यसेवा, PSI-STI-ASO मुख्य परीक्षा प्रश्नसंच


📚 कोणत्याही यूरोपीयन सत्तेद्वारा एखाद्या सुसंस्कृत जनतेच्या देशात प्रशासन चालविण्याचा पहिला प्रयत्न म्हणजे कोणता कायदा होय?

= नियामक कायदा,1773(The Regulating Act,1773)


📚 एकूण 11 वर्षे अंमलात असणारया  नियामक कायद्यांतर्गत प्रशासन चालविणारा एकमेव गव्हरनर  जनरल?

= वाॅरन हेस्टिंग्ज 


📚 भारतात सर्वप्रथम कंपनी मधिल मुलकी सेवेच्या अधिकार्याना प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न करणारा पहिला व्यक्ती?

= लॉर्ड वेलस्ली


📚 भारतात मुलकी सेवेच्या सुधारणा करणारा पहिला व्यक्ती?

= रोबर्ट क्लाईव्ह 


📚 भारतात मुल्की सेवेचा खरा पाया रचनारा पहिला व्यक्ती?

= लॉर्ड कॉर्नवॉलीस


📚 परथम व्यक्ती ज्याने सर्वप्रथम यूरोपीयन सैन्य हे  भरतीय राज्यस पैशाच्या मोबदल्यात देवू केले?

= जोसेफ फ्रन्सीस डुप्ले


📚 कषी सिंचन धोरण अंमलात आणण्यासाठी सुरुवातीची पाऊले उचलणारा प्रथम गव्हर्नर जनरल ?

- लॉर्ड बेंटींक 


📚 भारतात रेलवे स्थापन करण्याचा प्रथम निर्णय कोठे घेण्यात आला?

- मद्रास


📚 मलकी सेवांमधील नेमणूकीसाठी स्पर्धा परीक्षेच्या तत्वाचा स्विकार करण्याची शिफारस करणारा प्रथम व्यक्ती?

- लॉर्ड मेकॉले


📚 रलवे सुरु करण्याची सर्वप्रथम योजना कोनी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


📚 इग्रजांनी भरतातील पहिली वखार ही कोठे स्थापन केली?

- सुरत


📚भरतातील पहिली राजकिय संघटना कोणती?

- लैंड होल्डर्स सोसायटी.


📚 भारतातील कामगारांची पहिली संघटना स्थापन करणारे?

- नारायण मेघाजी लोखंडे


घटनात्मक संस्था ,वैधानिक संस्था व कार्यकारी किंवा सह - संघटना यातील फरक.

▪️'कायदेशीरदृष्ट्या मंडळ व आयोग तीन प्रकारचे असतात—


💥घटनात्मक संस्था


(अ) प्रत्यक्ष राज्यघटनेनुसार किंवा राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार राष्ट्रपतीने स्थापन केलेले मंडळ किंवा आयोग यांन घटनात्मक मंडळ किंवा आयोग म्हणतात.


🎯 यामध्ये खालील मंडळांचा/आयोगांचा समावेश होतो


(१) निवडणूक आयोग 

(२) केंद्रीय लोकसेवा आयोग

(३) राज्य लोकसेवा आयोग

(४) वित्त आयोग

(५) अधिकृत भाषा आयोग

(६) मागासवर्ग आयोग

(७) अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग. (८) अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग.


💥वधानिक संस्था.


(ब) संसदेच्या विशेष कायद्यानुसार बनविलेले मंडळ व आयोग यांना वैधानिक संघटना म्हणतात. 


🎯यामध्ये खालील संघटनांच समावेश होतो.


(१) विद्यापीठ अनुदान आयोग

(२) तेल व नैसर्गिक वायू आयोग

 (३) प्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळ

(४) उत्पादन व आयातशुल्क केंद्रीय मंडळ

(५) रेल्वे मंडळ

(६) अणुऊर्जा आयोग

(७) पूर नियंत्रण मंडळ.

(८) महिलांसाठी राष्ट्रीय आयोग 

इत्यादी.


💥कार्यकारी किंवा सह - संघटना.


(क) केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाने किंवा आदेशाने बनविलेले मंडळ आणि आयोग. याला सह- संघटना म्हणतात. व संबंधित मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली असतात. 


🎯यामध्ये खालील संघटनांचा समावेश होतो.


(१) अखिल भारतीय हातमाग मंडळ

(२) नियोजन आयोग

(३) कर्मचारी निवड आयोग

(४) अखिल भारतीय हस्तकला मंडळ इत्यादी.

(५) निती आयोग.


सराव प्रश्नसंच

1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

 उत्तर............ क) कलम ३६० 

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

 उत्तर......... क) अंतर्गत अशांतता 

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

 उत्तर....... क) चार महिने  

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

 उत्तर..... क) दिल्ली  

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

 उत्तर........ अ) उच्च न्यायालय 

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर....... क) कलम २२६  

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

 उत्तर....... क) सरकारिया आयोग 

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

 उत्तर....... अ) कलम २८० 

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

 उत्तर....... ब) कलम २६२ 

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

 उत्तर........ अ) कलम ३२४ 

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

 उत्तर....... अ) संथानाम समिती 

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

 उत्तर........ अ) पाच वर्षे  

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

 उत्तर...... पर्याय (ड) 

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

 उत्तर....... ड) निवडणूक आयोग 

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर.......... ब) राज्य  

=====================


भारतीय संविधान :


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

 19 ते 22

 31 ते 35

 22 ते 24

 31 ते 51

उत्तर : 19 ते 22


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 राज्यपाल

उत्तर : राष्ट्रपती


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

 राष्ट्रपती

 राज्यपाल

 पंतप्रधान

 सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

उत्तर : सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती


4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

 11 डिसेंबर 1946

 29 ऑगस्ट 1947

 10 जानेवारी 1947

 9 डिसेंबर 1946

उत्तर : 11 डिसेंबर 1946


5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

 परिशिष्ट-1

 परिशिष्ट-2

 परिशिष्ट-3

 परिशिष्ट-4

उत्तर : परिशिष्ट-3


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 47

 48

 52

 यापैकी नाही

उत्तर : 47


7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. आंबेडकर

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 पंडित नेहरू

 लॉर्ड माऊंटबॅटन

उत्तर : डॉ. राजेंद्रप्रसाद


8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 डॉ. आंबेडकर

 महात्मा गांधी

 पंडित नेहरू

उत्तर : डॉ. आंबेडकर


9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

 लोकसभा

 विधानसभा

 राज्यसभा

घटनात्मक आयोग

उत्तर : राज्यसभा


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

 लोकसभा सदस्य

 मंत्रीमंडळ

 राज्यसभा सदस्य

 राष्ट्रपती

उत्तर :  लोकसभा सदस्य


11. लोकसभेची मुदत किती वर्ष असते?

 1.8 वर्षे

 6 वर्षे

 4 वर्षे

 5 वर्षे

उत्तर : 5 वर्षे


12. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

 राष्ट्रपती

 सभापती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

उत्तर : उपराष्ट्रपती


13. खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

 संरक्षण

 तार

 पोस्ट

 जमिनमहसूल

उत्तर : जमिनमहसूल


14. लहान मुलाला प्रथम नागरीकत्वाचे धडे ----- पासून मिळतात.

 कुटुंब

 शाळा

 दोन्हीही

 मंदिर

उत्तर : दोन्हीही


15. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 सरन्यायधीश

उत्तर : राष्ट्रपती


16. भारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?

 लष्करी

 अध्यक्षीय

 हुकूमशाही

 संसदीय

उत्तर : संसदीय


17. राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

 18

 12

 16

 20

उत्तर : 12


18. राज्यघटनेमध्ये एकूण सूची किती?

 2

 1

 3

 4

उत्तर : 3


19. योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 अर्थमंत्री

उत्तर : पंतप्रधान


20. राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती वर्षे असतो?

 4 वर्षे

 5 वर्षे

 6 वर्षे

 कायमस्वरूपी

उत्तर : 6 वर्षे

महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय

क्र.:-घटना दुरूस्ती:-वर्ष:-घटना दुरूस्तीचा विषय


1.:-1 ली घटना दुरूस्ती:-1951:-नवव्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला.


2.:-5 वी घटना दुरूस्ती:-1955:-राज्यांची सीमा, नावे, आणि क्षेत्रफळ यात बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला.


3.:-15 वी घटना दुरूस्ती:-1963:-उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले.


4.:-26 घटना दुरूस्ती:-1971:-संस्थानीकांचे तनखे बंद करण्यात आले.


5.:-31 वी घटना दुरूस्ती:-1973:-लोकसभेचा सभासदांची संख्या 545 करण्यात आली.


6.:-36 वी घटना दुरूस्ती:-1975:-सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला


7.:-42 वी घटना दुरूस्ती:-1976;-मूलभूत कर्तव्यांचा समावेश, लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष व समाजवाद या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला.


8.:-44 वी घटना दुरूस्ती:-1978:-संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून वगळण्यात आला.


9.:-52 वी घटना दुरूस्ती:-1985:-पक्षांतर बंधी कायदा आणि 10 व्या परिशिष्टाची निर्मिती


10.:-56 वी घटना दुरूस्ती:-1987:-गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.


11.:-61 वी घटना दुरूस्ती:-1989:-मतदारांची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्यात आली.


12.:-71 वी घटना दुरूस्ती:-1992:-नेपाळी, कोकणी व मणिपुरी भाषांना घटनात्मक दर्जा देण्यात आला.


13.:-73 वी घटना दुरूस्ती:-1993:-पंचायत राज, घटनात्मक दर्जा व अकरावी सूची


14.:-74 वी घटना दुरूस्ती:-1993:-नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक दर्जा व बारावी सूची


15.:-79 वी घटना दुरूस्ती:-1999:-अनुसूचीत जाती-जमातीच्या राखीव जागांमध्ये कालावधीत वाढ 2010 पर्यंत


16.:-85 वी घटना दुरूस्ती:-2001:-सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचीत जाती-जमातींना बढतीमध्ये आरक्षण


17.:-86 वी घटना दुरूस्ती:-2002:-6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण


18.:-89 वी घटना दुरूस्ती:-2003:-अनुसूचीत जाती जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना


19.:-91 वी घटना दुरूस्ती:-2003:-केंद्रीय मंत्रिमंडळ आणि घटक मंत्रिमंडळात एकूण सभासदांच्या 15% मंत्र्यांची संख्या निर्धारित करण्यात आली.


20.:-97 वी घटना दुरूस्ती:- -:-सहकारचा विकास


21.:-108 वी घटना दुरूस्ती;- -:-महिलाना लोकसभा व विधानसभेमध्ये 33% आरक्षण


22.:-109 वी घटना दुरूस्ती:- -:-मागासवर्गीयांची राजकारणातील आणि शासकीय नोकर्‍यांमधील आरक्षणाची मुदत 10 वर्षानी वाढवण्यात आली.


23.:-110 वी घटना दुरूस्ती:- -:-महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था/ पंचायत राजमध्ये 50% आरक्षण


24.:-113 वी घटना दुरूस्ती:- -:-ओडिशा राज्यातील नावातील बदल


25.:-115 वी घटना दुरूस्ती:-2011:-जिएसटी कराच्या संदर्भात

चालू घडामोडी :- 31 डिसेंबर 2023


◆ डॉ. नितीन करीर यांची मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ मराठी भाषा गौरव दिन 2024 संकल्पना :- '३५० वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव मराठी भाषा गौरव दिनाचा'


◆ दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी "विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज" यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.


◆ ठाणे या ठिकाणी जगातील सर्वात मोठा क्लस्टर प्रकल्प साकारला जात आहे.


◆ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त PM विश्वकर्मा योजना सुरू केली.


◆ परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लिहिलेल्या व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाची पहिली प्रत त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.


◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरविंद पनगरिया यांची 16 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.


◆ अरविंद पनगरिया यांची सप्टेंबर 2015 मध्ये G20 चर्चेसाठी भारताचे शेर्पा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


◆ अरविंद पनगरिया यांना अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरणाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल 2012 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने प्राप्त.


◆ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) मे 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती.


◆ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आवळेकर ठरल्या देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका.


◆ अजेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी ब्रिक्स सदस्यत्व नाकारले आहे.


◆ BRICS मधील देशांचा समावेश असलेल्या G20 गटामध्ये इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिराती हे 5 देश 01 जानेवारी 2024 रोजी सामील होणार.


◆ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 31 डिसेंबर 2023 रोजी महास्वच्छता अभियानाची सुरवात "गेट वे ऑफ इंडिया" या ठिकाणावरून केली.


३१ डिसेंबर २०२३

चालू घडामोडी :- 30 डिसेंबर 2023

◆ मॅग्नस कार्लसनने 2023 FIDE वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकली.

◆ ऑगस्ट 2023 मध्ये, मॅग्नस कार्लसनने भारतीय ग्रँडमास्टर रमेश बाबू प्रग्नानंदाचा पराभव करून FIDE विश्वचषक विजेतेपद जिंकले.

◆ वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2012 पासून सुरू झाली आहे.

◆ मॅग्नस कार्लसनने विक्रमी पाचव्यांदा जागतिक वेगवान बुद्धिबळाचा मुकुट पटकावला.

◆ मॅग्नस कार्लसनने 5 रॅपिड टायटल्स, 6 ब्लिट्झ टायटल्स आणि 5 क्लासिकल टायटल्ससह एकूण 16 वर्ल्ड चॅम्पियनशिप टायटल्स जिंकले आहेत.

◆ ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन, दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार.

◆ इस्रो 1 जानेवारी 2024 रोजी भारतातील पहिला एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.

◆ RBI ने ICICI Pru म्युच्युअल फंडाच्या फेडरल बँक, RBL बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेतील भागभांडवल खरेदीला मान्यता दिली.

◆ लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय परिषदेने (AC), जम्मू आणि काश्मीर पंचायती राज कायदा, 1989 मधील महत्त्वपूर्ण बदलांना अलीकडेच मान्यता दिली.

◆ UAE कडून कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने प्रथमच रुपयाचे पेमेंट केले.

◆ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्याधाम रेल्वे स्थानक येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे  'जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस' चा आज शुभारंभ करण्यात आला.

◆ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ आयपीएस रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक आहेत.

◆ संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी नितीश कुमार यांची निवड झाली आहे.

◆ 67 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा अकोला येथे पार पडल्या आहेत.

◆ 67 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली आहेत.

◆ 67 व्या राष्ट्रिय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक आठ सुवर्ण पदके जिंकली आहेत.

◆ 67 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत हरियाणा राज्याने सात सुवर्ण पदके जिंकली आहेत.

◆ आसाम राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकार सोबत शांतता करार केला आहे.

◆ उल्फा या आसाम राज्याच्या बंडखोर संघटनेने अमित शहा यांच्या उपस्थीत केंद्र सरकार सोबत शांतता करार केला आहे.

◆ उल्फा ही संघटना 1979 वर्षापासून स्वायत्त आसाम राज्याची मागणी करीत आहे.

◆ झारखंड राज्यात 50 व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केली आहे.

◆ भारताचे श्रीलंका देशातील उच्चायुक्त म्हणुन संतोष झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या या ठिकाणावरून 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन करणार आहेत.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथुन उद्घाटन करण्यात येणाऱ्या 6 वंदे भारत एक्सप्रेस मध्ये महाराष्ट्र राज्यातील "जालना ते मुंबई" या वंदे भारत एक्सप्रेस चा सामावेश आहे.

◆ केंद्र सरकारने सुकन्या समृध्दी योजनेच्या सध्याच्या व्याजदरात 8 टक्क्या वरून 8.20 टक्के वाढ केली आहे.

◆ महाराष्ट्र राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ महाराष्ट्र शासन पुढील पाच वर्षात मिशन ड्रोन प्रकल्प अंतर्गत 12 जिल्ह्यात ड्रोन केंद्र स्थापन करणार आहे.

◆ महाराष्ट्र सरकारने राज्यातील 116 बाजार समित्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ कमांडर डोंग जुन यांची चीन या देशाच्या संरक्षण मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ Why Bharat Matters या पुस्तकाचे लेखक एस.जयशंकर हे आहेत.

◆ SLIM ही चंद्रयान मिशन मोहीम जपान या देशाची आहे.

◆ भारतीय नौदल शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेल्या नवीन गणवेश 01 जानेवारी 2024 पासून स्वीकारणार आहेत.

━━

31 December 2023 Current Affairs in Marathi



📘National

▪️स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना हरित हायड्रोजन धोरण-2023 धोरण लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

▪️तांदळाच्या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी, भारत सरकारने भारत ब्रँड नावाने स्वस्त दरात तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे.

▪️नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तेलंगणा सरकारने प्रजा पालन कार्यक्रम सुरू केला आहे.

▪️आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या डेटावरून आयुष्मान भारत योजनेच्या यशामध्ये महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान दिसून येते, एकूण आयुष्मान कार्डांपैकी सुमारे 49% महिलांनी कार्डस बनवले आहेत.

▪️माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू यांनी वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टी (YSRCP) पक्षात प्रवेश केला आहे.

📔Economics

▪️भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ICICI बँक, HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या बँकाना देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाच्या बँका (D-SIBs -Domestic Systemically Important Banks) म्हणून जाहीर केले आहे.

📕Technology

▪️इस्रो 1 जानेवारी 2024 रोजी भारताचा पहिला एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.

▪️इस्रोने आखलेल्या भारताच्या या मोहिमेला XPoSat मिशन नाव देण्यात आले आहे.

▪️सीएनएन बिझनेसच्या ‘सीईओ ऑफ द इयर’ म्हणून सत्या नडेला यांची निवड झाली आहे.

📗Sports

2024 च्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये प्रथमच स्क्वॅश खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

📒 Awards

अलीकडेच IPS अधिकारी ‘नीना सिंह’ यांची CISF च्या पहिल्या महिला महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

📙Other

नुकतेच जर्मनचे प्रसिद्ध राजकारणी वुल्फगँग शॅकेबल यांचे 81 व्या वर्षी निधन झाले.


Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...