२९ ऑगस्ट २०२३

सामान्य ज्ञान प्रश्न -उत्तर

🌀थोडक्यात महत्वाचे सर्वांनी वाचून घ्या,लिहून काढा ,वाचलेले वाया जातं नाही.🙏

1) आजाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती?
👉 रास बिहारी बोस

2) राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?
👉सर ए. ओ. ह्युम

3) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय  महिला अध्यक्ष कोण होती?
👉 सरोजिनी नायडू

4) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
👉 व्योमेशचंद्र बॅनर्जी

5) काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते?
👉 मुंबई

6) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
👉 लॉर्ड रिपन

7) डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
👉 पंडित जवाहरलाल नेहरू

8) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
👉 रायगड

9) थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

10) शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे?
👉कागल

11) शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

12) मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती?
👉 महात्मा फुले

13) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे?
👉 महात्मा फुले

14) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हणतात?
👉 बाळशास्त्री जांभेकर

15) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते?
👉 तुकडोजी महाराज

16) पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे?
👉 दर्पण

17) भारत रत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत?
👉 महर्षी धोंडो केशव कर्वे

18) भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?
👉 26 जानेवारी 1950

19) लोकसभेची कमाल म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते?
👉 552

20) राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते?
👉 250

21) राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात?
👉238

22) राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो?
👉 राष्ट्रपती

23) राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते?
👉 सहा वर्षे

24) राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
👉 उपराष्ट्रपती

25) महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात?
👉 48

26) महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात?
👉 19

27) भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
👉 राष्ट्रपती

28) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
👉 दिल्ली

29) भारतात सध्या किती उच्च न्यायालये आहेत?
👉 25

30) महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते?
👉 288

31) महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती असते?
👉 78

32) विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
👉 स्थायी / कायमस्वरूपी

33) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?
👉शेती

34) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते?
👉 महाराष्ट्र

35) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते?
👉 महाराष्ट्र

36) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
👉वित्त सचिव

37) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
👉 रिझर्व बँकेचे गव्हर्नर

38) ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता?
👉 राजीव गांधी

39) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?
👉 1 मे 1962

40) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
👉 ग्रामसेवक

41) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?
👉 7 ते 17

42) जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता?
👉 पंचायत समिती

43) जिल्हा परिषदेचे सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
👉स्थायी समिती

44) गावात कोतवालाची नेमणूक कोण करते?
👉 तहसीलदार

45) सातबारा उतारा कोण देतो?
👉 तलाठी

46) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
👉 जिल्हाधिकारी

47) गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?
👉 पोलिस पाटील

48) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे?
👉 34

49) सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे?
👉 आठ

50) पृथ्वीला किती उपग्रह आहेत?
👉 एक

51) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
👉 गुरू

52) चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण?
👉 नील आर्मस्ट्रॉंग

53) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात?
👉 परिवलन

54) रिश्टर स्केल काय आहे?
👉 भूकंप मापक

55) दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या महासागरामध्ये उभारलेले आहे?
👉 अंटार्टिका

56) अ जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो?
👉रातांधळेपणा

57) कुत्रा चावल्यानंतर वापरण्यात येणारी रेबीजची लस कोणी शोधून काढली आहे?
👉लुई पाश्चर

58) डेसीबल हे कशाचे एकक आहे?
👉 आवाजाची तीव्रता मोजण्याचे

59) मानवी शरीराचे सर्व सामान्य तापमान किती असते?
👉 37°c

60) सैनिक पेशी कोणत्या पेशींना म्हणतात?
👉 पांढऱ्या पेशी

61) उस्ताद बिस्मिल्ला खाँ हे कोणत्या वाद्याची संबंधित आहेत?
👉 शहनाई

62) बिहू हा लोक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
👉आसाम

63) संयुक्त राष्ट्रसंघ दिन केव्हा असतो?
👉 24 ऑक्टोबर

64) केंद्र सरकारकडून क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता?
👉 अर्जुन पुरस्कार

65) भारताच्या अनु विज्ञानाचे जनक असे कोणास म्हणतात?
👉 डॉ. होमी भाभा

66) मॅक् मोहन ही रेषा कोणत्या दोन देशात दरम्यान आहे?
👉 भारत आणि चीन

67) जगातील सर्वात लांब नदी कोणती?
👉नाईल

68) डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांची सर्च संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 गडचिरोली

🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓

२७ ऑगस्ट २०२३

तलाठीनंतर आता वनविभागाची परीक्षाही वादात? संशयित गुसिंगेकडे वनविभागाच्याही प्रश्नपत्रिका सापडल्या!

Nashik Talathi Exam : तलाठी भरती परीक्षेनंतर आता वनविभागाची परीक्षा देखील वादात सापडल्याची चिन्हे आहेत. कारण....

नाशिक : तलाठी परीक्षेत (Talathi Exam) हायटेक कॉपीच्या प्रकारानंतर (Hightech Copy) अनेक अपडेट समोर येत आहेत. अशातच नुकतीच पार पडलेली वनविभागाची परीक्षा देखील वादात सापडल्याची चिन्हे आहेत. याबाबत खुद्द नाशिक पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली असून तलाठी परीक्षेतील मुख्य आरोपी असलेल्या गणेश गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये चक्क वनविभागाच्या प्रश्नप्रत्रिका आढळून आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.  

नाशिकच्या (Nashik) तलाठी भरती परीक्षेत काही दिवसांपूर्वी हायटेक कॉपीचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. यानंतर संशयित आरोपी गणेश गुसिंगे यास ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रकार समोर आले. पिंपरी चिंचवड परीक्षेतही हा पाहिजे आरोपी आहे. तसेच इतर परीक्षांत त्याने घोळ केल्याचे समोर आले होते. अशातच काल गणेश गुसिंगे (Ganesh Gusinge) हा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पास झाल्याचं आले. या भरतीच्या परीक्षेमध्ये गणेश गुसिंगेला 138 गुण प्राप्त झाल्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर आज नाशिक पोलिसांकडून (Nashik) धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनविभागाच्या प्रश्नपत्रिका गुसिंगेच्या मोबाईलमध्ये आढळून आल्या आहेत. 

दरम्यान नाशिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार तलाठी भरती परीक्षा (Talathi Exam 2023) घोटाळ्यातील मुख्य संशयित गणेश गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये वनविभागाच्या प्रश्नपत्रिका देखील सापडल्या. इतर परीक्षेत देखील गैरव्यवहार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेच्या (Talathi Exam) जाहीर झालेल्या यादीत 138 गुण मिळाल्याचं दिसून आलं. गणेश गुसिंगे हाच पिंपरी चिंचवड पोलिस भरती आणि म्हाडाच्या पेपरफुटीमध्येही आरोपी आहे. त्यामुळे नुकत्याच मेरिट लिस्ट जाहीर झालेल्या DMER परीक्षेची देखील चौकशी होणार असून नाशिक पोलीस खोलवर तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचं दिसून येतंय. या सर्व प्रकारानंतर आता या परीक्षांच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. 

संशयित गणेश नुसिंगे कोण? 
तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी नाशकात अटक करण्यात आलेला आरोपी गणेश नुसिंगे (Ganesh Nusinge) हा म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात फरार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात म्हाडा परीक्षा भरतीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी खेरवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. तर पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2019मध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर याच गुसिंगेवर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि हायटेक कॉपी करण्यामध्ये एक टोळीच कार्यरत असल्याचा संशय समितीला असून यामध्ये गणेश गुसिंगे आणि त्याचे साथीदार असल्याचा आरोप संघटनेकडून केला जातो आहे. 

२३ ऑगस्ट २०२३

सराव प्रश्न संच

Q1. खालीलपैकी कोणत्या राज्यात तांब्याचा साठा सर्वात जास्त आहे?
(a) बिहार
(b) झारखंड
(c) कर्नाटकक
(d) राजस्थान✅

Q2. स्टॉक फार्मिंग म्हणजे काय?
(a) एकाच वेळी 2-3 पिकांची वाढ
(b) प्राण्यांची पैदास✅
(c) पीक फेरपालट
(d) वरीलपैकी कोणतेही नाही

Q3. हवेतून नायट्रोजन सोडविण्यास सक्षम असलेल्या पिकाचा प्रकार कोणता आहे?
(a) गहू
(b) शेंगा✅
(c) कॉफी
(d) रबर

Q4. ‘हरिजन सेवक संघ’ कोणी स्थापन केला होता?
(a) महात्मा गांधी✅
(b) डॉ. बी.आर. आंबेडकर
(c) जी डी बिर्ला
(d) स्वामी विवेकानंद

Q5. खालीलपैकी कोणते बेट लक्षद्वीप समूहातील नाही?
(a) कावरत्ती
(b) अमिनी
(c) मिनिकॉय
(d) नील✅

Q6. खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार जम्मू आणि काश्मीर राज्याचा आहे?
(a)बिडेसिया
(b) कर्म
(c) रौफ✅
(d) स्वांग

Q7. ‘पुसा, सिंधू, गंगा’ या कशाच्या जाती आहेत?
(a) गहू✅
(b) भात
(c) मसूर
(d) हरभरा

Q8. माजुली नदीचे बेट जे “भारतातील पहिले आणि एकमेव बेट जिल्हा” बनले आहे ते कोणत्या राज्यात आहे?
(a) हिमाचल प्रदेश
(b) जम्मू आणि काश्मीर
(c) कर्नाटक
(d) आसाम✅

Q9. मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनाचे (1940) अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
(a) लियाकत अली खान
(b) चौधरी खालिक-उझ-जमान
(c) मोहम्मद अली जिना✅
(d) फातिमा जिना

Q10. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले खेळाडू कोण आहेत?
(a) ध्यानचंद
(b) लिएंडर पेस
(c) सचिन तेंडुलकर✅
(d) अभिनव बिंद्रा

Q.1) ब्रिक्स शिखर परिषद 2023 कोठे होणार आहे?
✅ - दक्षिण आफ्रिका 

Q.2) सिंगापूर मॅथ ऑलिम्पियाडमध्येराजा अनिरुद्ध श्रीराम या विद्यार्थ्याने कोणते पदक मिळवले आहे?
✅ – रौप्य

Q.3) भारतातील पहिली हायड्रोजनवर चालवणारी बस कोठे सूरू झाली आहे?
✅ - लडाख 

Q.4) UIDAI चे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ - नीलकंठ मिश्रा

Q.5) दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठ्या डिसॅलिनेशन प्रकल्पाची पायाभरणी कोठे करण्यात आली 
✅ –  तामिळनाडू 

Q.6) ‘डिजी यात्रा’ सुविधा मिळवणारे ईशान्येतील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे?
✅ - गुवाहाटी विमानतळ

Q.7) निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
✅ - सचिन तेंडुलकर 

Q.8) जागतिक जल साप्ताह 2023 केव्हां साजरा केला जात आहे?
✅ - 20 ते 24 ऑगस्ट 

Q.9) 20 ते 31 ऑगस्ट या कालावधीत ओणम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणार आहे?
✅ – केरळ 

Q.10) दरवर्षी कोणत्या दिवशी धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचाराच्या बळींचे स्मरण करणारा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो?
✅ - 22 ऑगस्ट

1. सम्राट अशोकाचे शिलालेख वाचणारे पहिले इंग्रज कोण होते?
उत्तर:- जेम्स प्रिन्सेप

2. महावीर स्वामींनी 'जैन संघ' कोठे स्थापन केला?
उत्तर :- पावपुरी

3. कोणत्या परदेशी राजदूताने स्वतःला 'भागवत' घोषित केले?
उत्तर :- हेलिओडोरस

4. वैदिक काळातील लोकांनी प्रथम कोणता धातू वापरला?
उत्तर :- तांबे

5. कोणता वेद गद्य आणि पद्य या दोन्हीमध्ये रचला आहे?
उत्तर :- यजुर्वेद

6. कोणत्या व्यक्तीला 'मुकुटाशिवाय राजा' म्हणतात?
उत्तर :- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

7. हडप्पा काळात तांब्याचा रथ कोणत्या ठिकाणाहून सापडला?
उत्तर :- दायमाबाद (महाराष्ट्र)

8. महावीर स्वामींना 'यति' केव्हा म्हटले गेले?
उत्तरः घर सोडल्यानंतर

9. मोहेंजोदारोच्या स्नानगृहाच्या पश्चिमेला असलेला स्तूप कोणत्या काळात बांधला गेला?
उत्तर :- कुशाण काळ

10. हडप्पा संस्कृतीच्या कोणत्या प्राचीन स्थळाला 'सिंधचा बाग' किंवा 'मृतांचा टिळा' असे संबोधले जाते?
उत्तर :- मोहेंजोदारो

11. पहिला सूफी संत कोण होता, ज्याने स्वतःला अनहलाक घोषित केले?
उत्तर:- मन्सूर हलाज

12. “तलवारीच्या जोरावर हिंदुस्थान जिंकला” हे विधान कोणाचे आहे?
उत्तर :- लॉर्ड एल्गिन II

13. विष्णूच्या दहा अवतारांची माहिती कोणत्या पुराणात आहे?
उत्तर :- मत्स्य पुराण

14. बौद्ध धर्माच्या कोणत्या शाखेत मंत्र, हठयोग आणि तांत्रिक पद्धतींना महत्त्व दिले गेले आहे?
उत्तर :- वज्रयान

15. प्रसिद्ध 'विजयविठ्ठल मंदिर' कोठे आहे, ज्याचे 56 तक्षीत स्तंभ संगीतमय नोट्स उत्सर्जित करतात?
उत्तर:- हम्पी (कर्नाटक)

16. चित्तोडचा 'कीर्तीस्तंभ' कोणत्या शासकाने बांधला?
उत्तर :- राणा कुंभा

17. 'इंडिया डिवाइडेड' या पुस्तकाचे लेखक कोण होते?
उत्तर:- डॉ. राजेंद्र प्रसाद

18. शेरशाह नंतर आणि अकबराच्या आधी दिल्लीवर राज्य करणाऱ्या हिंदू राजाचे नाव काय होते?
उत्तर :- हेमू

19. 'आर्य' या शब्दाचा शाब्दिक अर्थ काय?
उत्तर :- सर्वोत्तम किंवा अभिजात

20. 'चरक संहिता' नावाचा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
उत्तर: चिकित्सा

मूलभूत कर्तव्य


■पार्श्वभूमी :

◆ समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात त्याच प्रमाणे त्या व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदारया पार पाडणे अपेक्षित असते.

◆कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्याने अधिकराची प्राप्ती होते,म्हणून आर्य चाणक्य ने कर्तव्याला ' स्वधर्म' म्हटलं आहे.

◆ कर्तव्य म्हणजे नीतिमत्ता व कायदा यांच्याद्वारे व्यक्तीवर एखादी कृती करणे वा न करणे ह्या संबंधी टाकलेले बंधन होय.

◆प्रथमतः मूळ संविधानात मु.कर्तव्यांचा समावेश नव्हता.

◆ घटनादूरूस्थी ४२ वी (१९७६) नूसार भाग-४,कलम-५१ (क) मध्ये १० मूलभूत करव्ये समवीष्ट करण्यात आली. 

◆८६ वी घटना दूरस्ती (२००२)-११ वे करव्ये समाविष्ट 

◆मूलभूत कर्तव्ये - स्वीकार - सोव्हिएत रशिया

◆ यु.एस. ए,कँनडा,जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रमुख देशाच्या घटनेमध्ये मु. कर्तव्ये नाहीत.(जपान याला अपवाद)

◆ समाजवादी देशांनी नागरिकांच्या मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्यांना सारखेच महत्व प्रदान केले आहे. 

■सरदार स्वर्ण सिंह समिति-१८

◆आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने ही समिती स्थापन 

◆ शिफारस-मूलभूत करवव्याचे एक स्वतंत्र प्रकरण समाविष्ट करणे.

◆ त्यांनी १० मूलभूत कर्तव्यांची यादी दिली मात्र ८ च कर्तव्यांची शिफारस केली.

★मूलभूत कर्तव्यांची यादी:-

१) संविधांनाचे पालन करणे आणि संविधानातील आदर्श व संस्था ,राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

२) राष्ट्रीय लढ्यात ज्या उदात्त आद

आदर्शामुळे स्फूर्ती मिळाली. त्या आदर्श तत्वांची जोपासना व अनुकरण करणे.

३) भारताचे सार्वभौमत्व ,एकता ,व एकात्मता  यांचा सन्मान करून त्यांचे रक्षण करणे.

४) देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास तयार राहणे.

५) धर्म ,भाषा ,प्रदेश ,वर्गभेद विसरून अखिल भारतीय जनतेत एकोपा व बंधुभाव वाढीस लावणे,स्त्रीयांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणें.

६) आपल्या संमिश्र संस्कृती च्या वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

७) नैसर्गिक पर्यावरण ज्यात अरण्य,सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, सजीव प्राण्यांबाबत भूतदया बाळगणे.

८) विज्ञाननीष्ठ दृष्टीकोण ,मानवतावाद,शोकबुद्धि व सुधारणावाद यांचा विकास करणे.

९) सार्वजनिक संपत्ती चे रक्षण करणे, हिंसाचार चा निग्रहपूवक त्याग करणे.

१०) आपले राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल ,अश्या प्रकारे सर्व व्यतिगत व सामुदायिक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रयत्न शील राहणे.

११) 6 ते 14 वरश्यापर्यंत मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देणे.(२००२ च्या ८६ व्या घटनादुरीस्ती ने जोडण्यात आले)

★मूलभूत कर्तव्यवरील टीका:-

१) संविधानाविषयी दुराग्रह 

२) सर्व समावेशक नाहीत.

३)मोघम तरतुदी 

४) नैतीकतेची जंत्री

५) नागरिकांच्या गुलामीची सनद

६) व्याहरिक गोंधळ

७) चुकीच्या ठिकाणी समावेश- ही कर्तव्य भाग-४ ला जोडण्या ऐवजी भान-३ ला जोडून त्यांना मु.हक्कच्या बरोबरिचा दर्जा देने आवश्यक 

★मूलभूत कर्तव्याचे महत्व:-

●आपल्या ला देश,समाज व इतर नागरिकांप्रति आपली काही कर्तव्य आहेत याची जाणीव करून देण्याचे कार्य ही कर्तव्य करतात.

● राष्ट्रविरोधी व समाजविरोधी कृत्य करण्याविरुद्ध ही कर्तव्य ताकीद देतात.

● कर्तव्यामुळे शिस्त व जबाबदारी च्या भावनेशी प्रोत्साहन मिळते.

● एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्या साठी न्यायालयास मु.कर्तव्याचा आधार घेत येतो.उदा: 1992-सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात निर्णय दिला की,मु.कर्तव्याची अमलबजावणी करणारा कायदा कलम-१४(कायद्यासमोर समानता)व कलम-१९(सहा स्वतंत्र)च्या संदर्भात 'पर्याप्त 'असल्याचे मान्य केले जाऊ शकते.

★इंदिरा गांधींच्या मते:-"मूलभूत कर्तव्याचे नैतीक मूल्य....लोकांना आपल्या हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याची जाणीव निर्माण करून लोकशाही संतुलन प्रस्थापित करेल".

★ मोरारजी देसाई यांच्या जनता पार्टी सरकारने ४३ व्या,४४व्या घटनादुरुस्थि अन्वेये ४२ व्या घटनांदूरस्थिने समवीष्ट केलेल्या अनेक तरतुदी काढून टाकण्याची प्रयत्न केला ,मात्र मूलभूत कर्तव्यांना त्यांनी स्पर्श केला नाही.

★वर्मा समिती (१९९९):-

मु.कर्तव्याच्या अमलबजावणी साठी करण्यात आलेल्या कायद्याच्या तरतुदी ची ओळख केली होती.

प्रश्न मंजुषा


🔴 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे? 


१) ३ वेळा

२) ४ वेळा ✔️✔️

३) २ वेळा

४) ५ वेळा

________________________________

🟤 घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?


१) अमेरिका 

२) ऑस्ट्रेलिया

३) चीन

४) ब्रिटेन  ✔️✔️

________________________________

⚫️ भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?


१) मुंबई 

२) दिल्ली 

३) अलाहाबाद  ✔️✔️

४) कलकत्ता

________________________________

🔵 विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?


१) ४ थे 

२) ५ वे 

३) ६ वे 

४) ७ वे ✔️✔️

________________________________

🟢 महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?


१) रंजना सोनवणे 

२) प्रज्ञा पासून 

३) राहीबाई पोपरे ✔️✔️

४) स्मिता कोल्हे

________________________________

🟡 संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला? 


१) २४ जानेवारी १९५०  ✔️✔️

२) २५ जानेवारी१९५०

३) १४ ऑगस्ट १९४७

४) १५ ऑगस्ट १९४७

________________________________

🟠 ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ?  


१) पुष्पा भावे

२) राम लक्ष्मण

३) फ्रान्सिस दिब्रिटो ✔️✔️

४) शरद पवार

________________________________

🔴 बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ? 


१) अश्वघोष 🚔

२) नागार्जुन 

३) वलुनिय

४) नागसेन


🟠 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान .....येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.?  

  

      A) दिल्ली

      B) पाटणा ✅✅

      C) मुंबई

      D) मद्रास

________________________________

🟡....... रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले?


     A) 15 ऑगस्ट 1947

     B) 22 जुलै 1947

     C) 24 जानेवारी 1950✅✅

     D) 25 डिसेंबर 1952

________________________________

🟢 संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते ?


     A) जवाहरलाल नेहरू

     B) वल्लभाई पटेल 

    C) डॉ.के.एम. मुन्शी✅✅

    D) एच. सी .मुखर्जी

________________________________


🔵 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे ?


     A) जपान

     B) जर्मनी ✅✅

     C) फ्रान्स

     D) दक्षिण आफ्रिका

________________________________


⚫️ घटना दुरुस्तीची पद्धत कलम......... मध्ये देण्यात आली.*


       A)368 ✅✅

      B)365

      C)360

      D)352

________________________________

⚪️ मतदानाचे किमान वय........ व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.?


      A) 42 व्या

      B) 61 व्या ✅✅

      C) 86 व्या

      D) 92 व्या

________________________________


🟤 बलवंतराय मेहता समिती......  मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापना केली.?


     A)1962

     B)1957✅✅

     C)1960

     D)1966

________________________________

🔴 ......... मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले.?


     A) 2 जून 2013

     B) 2 जून 2014 ✅✅

     C) 13 डिसेंबर 2016

     D)10 मार्च 2011

________________________________


🟠स्वातंत्र्याचा हक्क कलम .......ते.......मध्ये देण्यात आला.?


     A)14 ते 18

     B)19 ते 22✅✅

     C)25 ते 28

     D)23 व 24

________________________________


🔴 अमेरिकेच्या घटनेमध्ये किती कलमे आहेत?

     A)21

     B)15

     C)7 ✅✅

     D)14


🟣 देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ................... होय.


1) राज्य विधिमंडळ  

2) कार्यकारी मंडळ    

3) संसद ✔️✔️    

4) न्यायमंडळ


___________________________________

🔵 सनदी सेवकांना ........................ बनण्याची परवानगी नाही.


1) संसद सदस्य     ✔️✔️

2) मुख्य निर्वाचन आयुक्त    

3) विद्यापीठाचे कुलगुरू    

4) चौकशी आयोगाचे प्रमुख


___________________________________

🟡 घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?


1) 2016    

2) 2021      

3) 2026  ✔️✔️    

4) 2031


___________________________________

🟠 विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.

 कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.


1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही✔️✔️.

3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.

4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.


___________________________________

🔴 राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?


1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ✔️✔️

2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा

3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला

4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

अन्नपचन प्रक्रिया


🔶सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.

🔶अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.

🔶या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.

🔶या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.

🔶खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.  


🔴 अंग पदार्थ – मुख व गुहा

स्त्राव – लाळ  

विकर – टायलिन

माध्यम – अल्पांशाने

मूळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ  

क्रिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)


🔴 अंग पदार्थ – जठर

स्त्राव – हायड्रोक्लोरिक

माध्यम – आम्ल, अॅसिड  

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने  

क्रिया आणि अंतिम – जंतुनाशक


🔴 अंग पदार्थ – जठररस  

स्त्राव – पेप्सीन,रेनीन

माध्यम – आम्ल

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध

क्रिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर  


🔴 अंग पदार्थ – लहान आतडे

स्त्राव – पित्तरस

माध्यम – अल्कली

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद

क्रिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.


🔴 अंग पदार्थ – स्वादुपिंडरस  

विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ

माध्यम – अल्कली, अल्कली

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद

क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल


🔴 अंग पदार्थ – आंत्ररस

विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ

माध्यम – अल्कली

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद  

क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.

प्रश्नमंजुषा

  

1) कोणाच्या शिफारशी शिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही.

A) मुख्यमंत्री

B) राज्यपाल✔️✔️

C) राष्ट्रपती

D) विधानसभा अध्यक्ष




2) भारतीय रेल्वे संदर्भात कोणते विधान सत्य आहे.

अ) रेल्वे वाहतुकीचा बाजार हिस्सा  थोडाच वाढला आहे

ब) अपुरे  क्षमता जाळे आणि पायाभूत सुविधा या समस्यांचा रेल्वे सामना करावा लागतो.


पर्याय:-

A) अ, ब दोन्ही बरोबर

B) अ , ब दोन्हीं चुक

C) अ बरोबर

D) ब बरोबर✔️✔️




3) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.

A) केंद्र शासन

B) राज्य शासन

C) केंद्र आणि राज्य शासन दोन्ही✔️✔️

D) वरीलपैकी नाही.




4 ) सन 2011 मध्ये साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटत्या  क्रमाने मांडणी करा.

अ) पश्चिम बंगाल

ब) महाराष्ट्र

क) हिमाचल प्रदेश


A) अ, ब,क

B) क, ब, अ✔️✔️

C) ब, क, अ

D) ब , अ, क




5) कोणते विधान बरोबर आहे.

अ) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिम 2015 मध्ये सुरू करण्यात आली.

ब) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा हेतू आणि कुटुंबकल्याण कार्यक्रमाना बळकटी देणे हा आहे.


A) अ बरोबर

B) ब बरोबर ✔️✔️

C) अ ,ब दोन्ही बरोबर

D) अ, ब दोन्ही चूक




6) पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे.

अ) भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट दहाव्या पंचवार्षिक योजनेत होते.

ब) राष्ट्रीय व राज्य रस्ते किमान दुमार्गी श्रेणीचे करायचे हे 12 व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे.


A) अ

B) ब

C) अ , ब दोन्ही बरोबर✔️✔️

D) एक ही नाही





7) भारत निर्माण कार्यक्रम 2005 या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या  आहेत.

अ) जलसिंचन व ग्रामीण रस्ते

ब) ग्रामीण निवारा

क) ग्रामीण पाणीपुरवठा

ड) ग्रामीण विद्युतीकरण

इ) ग्रामीण दूरध्वनी


A) ब ,क, ड

B) अ, ब, क, ड

C) अ, क, ड, इ

D) अ, ब, क, ड, इ✔️✔️





8) सन 2009 साठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट परिषदे ने 5-15  दशलक्ष प्रवासी वाहतूक हाताळणाऱ्या  विमानतळा मध्ये कोणत्या विमानतळा जगातील उत्कृष्ट म्हणून गौरविले आहे.

A) एअरपोर्ट नवी दिल्ली

B) एअरपोर्ट मुंबई

C) एअरपोर्ट शमशाबाद हैदराबाद

D) एअरपोर्ट बेंगलोर



9 ) सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वीजनिर्मितीचा वाटत सर्वाधिक आहे.

अ) जलविद्युत

ब) औण्विक विद्युत

क) अनुउर्जा

ड) पवन ऊर्जा


A) फक्त अ

B) फक्त ब✔️

C) अ आणि ब

D) अ, ब, ड, क





10) ग्रामीण भागात शहरी सुखसोयी चे प्रावधान हे पुढील पैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या प्रवक्ता त्यांचे स्वप्न आहे.

A) डॉ. मनमोहन सिंग

B) डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम✔️

C) सी रंगराजन

D) डॉ. अमर्त्य सेन


Q 1️⃣

सुपरसॉनिक विमाने आकाशात उडताना फारसा आवाज करत नाहीत कारण............. 

A. त्यांचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो

B. त्यांची कंपने कमी असतात

C. ती फार उंची वरून प्रवास करतात✅✅

D. ती वजनाने फार हलकी असतात


Q 2️⃣

हायड्रोमीटर हे उपकरण खालीलपैकी काय मोजण्यासाठी वापरले जाते ? 

A. द्रव पदार्थाचे विशिष्ट गुरूत्व ✅✅

B. द्रव पदार्थाची घनता

C. द्रव पदार्थाची तरलता

D. हवेतील हायड्रोजनचे प्रमाण


Q 3️⃣

क्षरण प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या पध्दती वापरतात ? 

अ) गॅल्व्हानायझेशन 

ब) कथीलीकरण 

क) विद्युत विलेपन 

ड) धनाग्रीकरण 


A. फक्त अ आणि ब

B. फक्त अ, ब आणि क

C. फक्त अ, ब आणि ड

D. वरील सर्व ✅✅


Q 4️⃣

C-C या बंधाची सर्वात कमी लांबी कोणत्या संयुगामध्ये असते ? 


A. इथेन

B. इथिलीन

C. बेन्झीन

D. एसटीलीन ✅✅



Q 5️⃣

दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय साकारले जाते ? 

A. वस्तूभिंग

B. संयुक्त नेत्रभिंग ✅✅

C. विशालक

D. वरीलपैकी एकही नाही


Q 6️⃣

ऑक्सीश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भुमिका बजावतो ? 


A. इलेक्ट्रॉन दाता

*B. इलेक्ट्रॉन ग्राही* ✅✅

C. प्रोटॉन दाता

D. प्रोटॉन ग्राही


Q 7️⃣

खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ? 


A. गर्द पिवळे मुत्र- मेलॅन्युरीया

B. रंगहीन मुत्र-निर्जलीकरण

C. रक्तरंग मुत्र -हीमॅच्युरीया ✅✅

D. हिरवट रंगाचे मुत्र - बीट खाल्यामुळ


Q 8️⃣

खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रीयंट कोणते आहे ? 

A. मॅग्नेशिअम✅✅

B. मॉलीबडेनिअम

C. बोरॉन

D. झिंक


Q 9️⃣

सामान्यतः अमोनिया वायू औद्योगिक पातळीवर तयार करतात कारण त्याचा उपयोग ..................... 

A. प्रथिने तयार करण्यासाठी होतो

B. साबण तयार करण्यासाठी होतो

C. रसायनिक खते तयार करण्यासाठी होतो ✅✅

D. कृत्रिम खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी होतो


Q 🔟

 अटल पेन्शन योजनेबाबत खालीलपैकी काय चुकीचे आहे? 


A. सहभागी होण्याचे किमान वय 18 वर्ष

B. सहभागी होण्याचे कमाल वय 40 वर्ष

C. वर्गणीदारने आपला हिस्सा भरण्याचा किमान कालावधी 20 वर्ष किंवा अधिक

D. सुरवात 1 जानेवारी 2016 पासून ✅

डीएनए





50 एस राइबोसोमल सब्यूनिटचे त्रिमितीय प्रतिनिधित्व . रिबोसोमल आरएनए ब्लूमध्ये प्रथिने जेरो मध्ये आहेत. सक्रिय साइट लाल रंगात दर्शविलेल्या आरआरएनएचा एक छोटा विभाग आहे.

🍁आरएनएची रासायनिक रचना डीएनए प्रमाणेच आहे , परंतु तीन प्राथमिक मार्गांनी ती भिन्न आहेः

🍁दहेरी अडकलेल्या डीएनए विपरीत, आरएनए त्याच्या अनेक जैविक भूमिकांमधील एकल-अडकलेला रेणू आहे
🍁आणि त्यात न्यूक्लियोटाइड्सच्या लहान साखळ्या असतात.
🍁तथापि, एकल आरएनए रेणू, टीआरएनए प्रमाणे पूरक बेस जोड्याद्वारे इंट्रास्ट्रॅन्ड डबल हेलिक्स बनवू शकतो.

डीएनएच्या साखर-फॉस्फेट "बॅकबोन" मध्ये डीऑक्सिरीबोज असते , तर आरएनएऐवजी राईबोज असते. []] रिबोजचा पेंटोज रिंगला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला असतो जो २ मध्ये स्थित असतो . राइबोस पाठीचा कणा मध्ये hydroxyl गट आरएनए अधिक रासायनिक करा जी रासायनिक द्रव्ये उष्णतेने त्वरित बदलतात अशांना ही संज्ञा लावली जाते कमी डीएनए पेक्षा सक्रियन ऊर्जा च्या पाण्याबरोबर संयोग होऊन लहान कणात पृथ : क्करण होणे .

डीएनएमध्ये enडेनिनचा पूरक आधार थाईमाइन असतो , तर आरएनएमध्ये तो युरेसिल असतो , जो थायमाइनचा एक अखंड प्रकार आहे.


❇️Deoxyribonucleic❇️

🍂 आम्ल ( डीएनए ) एक परमाणू दोन साखळ्या की गुंडाळी बनलेला आहे एकमेकांना सुमारे एक तयार करण्यासाठी दुहेरी Helix घेऊन अनुवांशिक , विकासाच्या सुचना कार्य, वाढ आणि पुनरुत्पादन सर्व ज्ञात organismsअनेक आणि व्हायरस . डीएनए आणि रिबोन्यूक्लिक acidसिड (आरएनए) न्यूक्लिक idsसिड असतात ; हळूच प्रथिने , lipids आणि गुंतागुंतीच्या कर्बोदकांमधे ( polysaccharides ), nucleic ऍसिडस् चार मुख्य प्रकार आहेत macromolecules सर्व ज्ञात
 फॉर्म आवश्यक असलेल्या जीवन .




गोवर



गोवर हा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात एक्झॅन्थम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. गोवर हा रुबेला, पाच दिवसाचा गोवर किंवा हार्ड मीझल्स या नावानेसुद्धा ओळखला जातो.
वर्णन : गोवर हा जगभर आढळणारा आजार आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. एक वर्षाआड येणारी लहान गोवराची साथ ही सामान्य बाब होती. तान्ह्या मुलापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मुलामध्ये गोवराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. ही प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भाशयातील पेशींमधून मुलास मिळालेली असते.

माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर होऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही.

◾️कारण आणि लक्षणे

गोवराचे कारण पॅरामिक्झोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. ८५% गोवर या प्रकारे पसरतो. एकदा गोवराच्या विषाणूचा संसर्ग झाला की आठ ते पंधरा दिवसात विषाणूचा संसर्ग झालेल्या ९५% व्यक्तींना गोवर होतो. गोवराची लक्षणे दिसण्यापूर्वी तीन ते पाच दिवस गोवर विषाणूचा संसर्ग झालेला असतो. नंतरच्या चार दिवसात गोवराचे पुरळ अंगावर येण्यास प्रारंभ होतो.

गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक वाहणे , डोळे तांबडे होऊन डोळ्यातून पाणी येणे आणि खोकला. काहीं दिवसात तोंडामध्ये गालाच्या आतील बाजूस पुरळ उठतात. ते वाळूच्या आकाराचे पांढरे पुरळ तांबूस उंचवट्यावर असतात. या पुरळांस कॉप्लिक पुरळ असे म्हणतात. हे गोवराचे नेमके लक्षण आहे. घसा सुजतो, तांबडा होतो आणि खवखवतो.

◾️उपचार

गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जीवाणू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अ‍ॅस्पिरिन देऊ नये

◾️परतिबंध

गोवराचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते.. वयाच्या १५ महिन्यापूर्वी बालकाची प्रतिकारशक्ती पुरेशी निर्माण न झाल्याने गोवराची लस १५ महिन्यानंतर देण्यात येते. या वयात लस टोचल्यास तयार होणारी प्रतिकार शक्ती दीर्घकाळ टिकते.

गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बळास गोवर होण्याची शक्यता असते.

प्रथिने (Proteins)-

√ प्रथिने ही अमिनो आम्लापासून बनलेली असतात.
√ शरीराला २४ अमिनो आम्लाची गरज असते.
√ त्यापैकी नऊ (९) अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाही.
√ त्यामुळे ती आहारात पुरवावी लागतात, म्हणून अशा अमिनो आम्लांना "आवश्यक अमिनो आम्ल'' असे म्हणतात.

√ आवश्यक अमिनो आम्ल पुढील प्रमाने आहे.

१) लायसिन
२) ल्यूसिन
३) आयसोल्युसिन
४) व्हलिन
५) हिस्ट्रीटीन
६) थ्रिओनिन
७) टिष्ट्रोफॅन
८) मितिओनिन
९) फिनाईल अॅलनिन

√ अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधीकधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.

● प्रथिनांचे कार्य-

√१)शरीरांची वाढ व विकास करणे.
√२) उतींचे प्रमाण वाढविण्यासाठी.
√३) प्रति पिंडे (Anti bodies), विकरे, संप्रेरके, हार्मोन्स यांच्या निर्मितीसाठी.
√४) रक्त निर्मितीतील व ऊर्जा निर्मितीसाठी प्रथिने कार्य करतात.

● प्रथिनांचे स्त्रोत-

√१) प्राणीज स्त्रोत : दुध, अंडी, मासे, मांस
√२) वनस्पतीज स्त्रोत :
i) दाळी- तुर, मुंग, हरभरा, उडीद, मसूर
ii) धान्य-ज्वारी, बाजरी, नाचणी, गहु
iii) तेलबिया - तीळ, कडई, शेंगदाणे, सोयाबिन, बदाम

● प्रथिनांचे प्रमाण-

१. डाळीमध्ये: २० ते २५ टक्के
२. सोयाबिनमध्ये: ४३.२ टक्के (सर्वाधिक)
३. दुधामध्ये: ३.२ ते ४.३ टक्के
४. अंडी: १३टक्के
५. मासे: १५ ते २३ टक्के
६. मांस: १८ ते २६ टक्के

√ प्राणिज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा अधिक महत्वाची असतात, कारण त्यामध्ये सर्वाधिक अमिनो आम्ल' असतात.

★★★★★★★★★★★★★★★★★★

२२ ऑगस्ट २०२३

तलाठी भरती : परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्राचा मालक लॅपटॉप बाहेर घेऊन गेला आणि..

मंगळवारी वर्धा येथील एका परीक्षा केंद्रावर चक्क त्या परीक्षा केंद्राचा मालकच संशयाच्या भूमिकेत आढळून आला आहे.

नागपूर : तलाठी भरतीची परीक्षा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून रोज नवनवीन गोंधळ समोर येत आहेत. सोमवारी अनेक परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन असल्याने गोंधळ उडाला होता. तर मंगळवारी वर्धा येथील एका परीक्षा केंद्रावर चक्क त्या परीक्षा केंद्राचा मालकच संशयाच्या भूमिकेत आढळून आला आहे.


या केंद्रावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून तानिया कम्पुटर लॅब या परीक्षा केंद्राचा मालक परीक्षा सुरू असताना त्याचा लॅपटॉप बाहेर घेऊन आला. यावर उमेदवारांनी आक्षेप घेतल्यावर, आत मोबाईल जॅमर असल्याने नेटवर्क नसल्याने मी बाहेर पेपर डाऊनलोड करण्यासाठी गेलो होतो, असे उत्तर त्याने दिले. त्यामुळे त्याच्या भूमिकेवर संशय उपस्थित होत आहे. तो परीक्षार्थी नसल्याने त्याला प्रश्नपत्रिकेची गरज काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सांगितले की, आजवर आम्ही इतके पेपर दिले पण आम्हाला कधी कोणीही लॅपटॉप बाहेर घेऊन जाताना दिसले नाही. पेपर लॉगिनमध्ये उपलब्ध असतो. जर कर्मचाऱ्याने पेपर बाहेर डाऊनलोड केला असेल तर त्याने बाहेरच्या-बाहेर कोणाला पाठविला नसेल कशावरून म्हणता येईल, अशी शंका घेतली.

२० ऑगस्ट २०२३

19 ऑगस्ट चालू घडामोडी

1) महाराष्ट्र राज्यात क्रांती गाथा या भारतीय क्रांतिकारकांच्या दालनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी

2) जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 कोठे आयोजित केली जाणार आहे?
✅ डेन्मार्क

3) जागतिक नमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत इशा सिंह आणि शिवा नरवाल यांनी कोणते पदक जिंकले?
✅ सुवर्ण

4) डोप चाचणीत अपयशी ठरल्याने कोणत्या भारतीय खेळाडूवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे?
✅ दुती चंदवर

5) अलीकडेच मोफत अन्न पॅकेट योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे?
✅ राजस्थान

6) भारत आणि कोणत्या देशात स्थानिक चलनात पहिला कच्चा तेलाचा व्यवहार अलीकडे झालेला आहे?
✅ UAE

7) कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी केंद्रिय मंत्री मंडळाने 32,500 कोटी रुपयांच्या किती रेल्वे प्रकल्पांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली?
✅ सात

8) महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती नवीन योजना सुरू केली आहे?
✅  'लखपती दीदी’

9) नुकतेच जागतिक अँथलेटिक्स कार्यकारी मंडळावर कोणाची निवड झाली आहे?
✅ अदिले सुमारीवाला

10) भारतीय नौदलाच्या ताफ्यात नवीनतम INS विंध्यगिरी कोणी लाँच केली?
✅ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१९ ऑगस्ट २०२३

मराठवाडा मुक्ती संग्राम



मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे.

मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये 

1)औरंगाबाद

2)नांदेड 

3)परभणी 

4)बीड 

5)जालना 

6)लातूर 

7)उस्मानाबाद व 

8) हींगोली 

हे 8 जिल्हे, 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत

लोकसंख्या ही जवळपास 2 कोटी आहे. साक्षरता 76% तर लोकसंख्या घनता ही 352 एवढी आहे. लिंग गूणोत्तर 932 एवढे आहे.

दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.

यामध्ये वेरूळ,अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण,तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.


पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात विलीन होता.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.


हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.


मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील  जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.


या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.


निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यमूळे ते भारताचे तत्कालीन ग्रहमंत्री होते खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला. 

मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद  काबिज केले.

15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.


हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या 17 सप्टेंबर रोजी तब्बल 68वर्षे पूर्ण होत आहेत. 68 वर्षांपूर्वी 17सप्टेंबर 1948 रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता.

 या संग्रामाच्या उज्ज्वल  पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्तीनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्‍या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.

    आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्‍चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ? हा माञ एक पडलेला प्रश्न आहे.


१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाउ लागला.

साक्षरतेच्या बाबतीत प्रथम पाच राज्ये



🎯भारतातील केरळ हे राज्य भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य असून त्याची एकूण साक्षरता 93.91 टक्के एवढी आहे. त्याच्या पाठोपाठ लक्षद्वीप ची साक्षरता आहे आणि त्याची एकूण साक्षरता 92.28 एवढी आहे. 


🛑साक्षरतेच्या बाबतीत प्रथम येणारी प्रथम पाच राज्य खालीलप्रमाणे सांगता येतील.

 1) केरळ (93.91%), 

 2) लक्षद्वीप (92.28%), 

 3) मिझोराम(91.58%),

 4) त्रिपुरा(87.75%), 

 5) गोवा(87.40%), 


🛑साक्षरतेच्या बाबतीत शेवटची दहा राज्ये


1) बिहार (63.82 टक्के )

2) तेलंगणा (66.5 टक्के )

3) अरुणाचल प्रदेश (66.95 टक्के )

4) राजस्थान (67.06 टक्के )

5) आंध्र प्रदेश (67.4 टक्के)

6) झारखंड (67.63 टक्के)

7) जम्मू आणि कश्मीर (68.74 टक्के) 

8) उत्तर प्रदेश ( 69.72 टक्के )

9) मध्य प्रदेश (70.63 टक्के) 

10) छत्तीसगड (71.04 टक्के)

महाराष्ट्र - सामान्यज्ञान



★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०
★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई
★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६
★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५
★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६
★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७
★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६
★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७
★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४
★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८
★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५
★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )
★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )
★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे
★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर
★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर
★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : ठाणे
★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%
★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी
★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)
★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मा. देवेंद्र फडणवीस
★ महाराष्ट्राचे राज्यपाल : चेन्नमनेनी विद्यासागर राव
★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा
★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा
★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर
★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई
★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)
★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)
★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश (१

दुहेरी राज्यव्यवस्था



०१. १६ ऑगस्ट १७६५ मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार,ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले. बंगालच्या नबाबने फेब्रुवारी १७६५ मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले. परंतु राज्यकारभारची व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या नबाबकडेच राहिली. त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे अधिकार केंद्रित झाले.


०२. पंरतू प्रत्यक्षात संपूर्ण राजकीय सत्ता कंपनीने स्वत:कडे घेतली नाही. कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची त्यासोबतच अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती. भारतात राज्य कारभार करण्यासाठी भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता. बंगालवर कंपनीने पूर्ण अधिकार बसवला असता तर एतद्देशीय सत्ताधीशानी कंपनीशी संघर्ष सुरु केला असता व बंगाल इंग्रजांना पचू दिला नसता.


०३. म्हणून लॉर्ड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली वन्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सत्ता विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात. या कार्यासाठी बंगालच्या नबाबला ५३ लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. १७६५-१७७२ या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.


०४. परंतु या दुहेरी राज्यव्यव्यस्थेत राज्याची सत्ता व जबाबदारी यांची फारकत करण्यात आली होती. ही गंभीर चूक होती. राज्यात दुष्काळ पडला तरी सामान्य जनतेचा विचार न करता कंपनी निर्दयीपणे जमीन महसूल गोळा करीत असे व प्रचंड संपत्ती मिळवीत असे. त्यामुळे कोटी माणसे अन्नान्न करुन तडफडून मेली. बंगालमध्ये स्मशानकळा पसरली.


०५. या व्यवस्थेमुळे गोंधळ व भ्रष्टाचार निर्माण झाल्याने १७७२ मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली. शेवटी इंग्रज सरकारने कंपनीच्या कारभाराची चौकशी करुन तिच्यावर नियंत्रण प्रस्थपित करणारा रेग्युलेंटिग अॅक्ट पास केला. (१७७३)


०६. वॉरेन हेस्टीन्ग्जने सरकारच्या मालकीची सर्व जमीन असते, या भूमिकेतून जमीन महसूल व्यवस्था पद्धतीत बदल करून महसूल रकमेचा लिलाव करण्याची पद्धत लागू केली. रोबर्ट क्लाइव्ह महसूल रकमेचा वार्षिक लिलाव करीत असे. वॉरेन हेस्टीन्ग्जने हा लिलाव पंचवार्षिक केला. परंतु त्याने पुन्हा वरशील लिलाव पद्धती आणली.

मूलभूत अधिकार/हक्क



· भारतीय राज्यघटनेच्या तिसर्‍या प्रकरणात 14 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्काविषयी माहिती आहे. 


· घटनेनुसार नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरूवातीस 7 होते मात्र 44 व्या घटना दुरूस्ती (1978) नुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करून तो कायदेशीर अधिकार केला आहे. 


· म्हणून सध्या 6 अधिकार आहेत. 


1. समतेचा अधिकार = कलम 14 ते 18




2. स्वातंत्र्याचा अधिकार = कलम 19 ते 22




3. शोषणाविरुद्धचा अधिकार = कलम 23 ते 24




4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार = कलम 25 ते 28




5. संस्कृती व शिक्षणाचा अधिकार = कलम 29-30




6. न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार - कलम 32

Imp इन्फॉर्मशन.....


1) ✅️ कच्ची फळे पिकवण्यासाठी गॅस  - इथिलीन



2) ✅️ शक्तीचे एकक  - वॅट



3) ✅️ हवेचा दाब मोजण्यासाठी  - बॅरोमीटर



4) ✅️ संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना - मुंबई



5) ✅️ अभिनव भारत संघटना - स्वातंत्र्यवीर सावरकर



6) ✅️ उर्दू भाषेचा निर्माता  - अमीर खुसरो



7) ✅️ शेतकऱ्यांचा आसूड  - महात्मा फुले



8) ✅️ केसरी वर्तमानपत्र  - बाळ गंगाधर टिळक



9) ✅️ भोगावती नदीवरील धरण  - राधानगरी



10) ✅️ मनसर टेकड्या  - नागपूर



11) ✅️ तिस्ता नदीचा उगम  - पश्चिम बंगाल



12) ✅️ नर्मदा नदीचा उगम  - अमरकंटक



13) ✅️ मसूरी थंड हवेचे ठिकाण  - उत्तराखंड



14) ✅️ जगामध्ये साखरेचे सर्वाधिक उत्पादन   - भारत



15) ✅️ जीवन रेखा सिंचन प्रकल्प - जालना



16) ✅️ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान   - आसाम



17) ✅️ भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार  -  नवी दिल्ली



18) ✅️ जगातील सर्वात लांब नदी  - नाईल



19) ✅️ भारताचे मध्यवर्ती ठिकाण  - नागपूर



20) ✅️ इंटरपोलचे मुख्यालय  - फ्रान्स



21) ✅️ भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती  - 1843



22) ✅️ माहिती अधिकार कायदा  - 2005



23) ✅️ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय   - हेग



24) ✅️ इस्राईलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव   - मोझाद



25) ✅️ महाराष्ट्राचे निमलष्करी दल   - SRPF



26) ✅️ महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय   -  मुंबई



27) ✅️ महाराष्ट्रात आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची वने  - पानझडी



28) ✅️ भारतातील सर्वात मोठा दिवस - 21 जून



29) ✅️ अफगाणिस्तान देशाची राजधानी  - काबुल



30) ✅️ केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक   - गोपाळ गणेश आगरकर

माहितीचा अधिकार कायदा (RTI - Right to Information Act)

 माहितीचा अधिकार कायदा स्वीकारण्यामध्ये जगातील पहिला देश स्वीडन हा ठरला आहे.

 1766 मध्ये फ्रिडम ऑफ प्रेस अक्ट असा कायदा करून स्वीडने महितीचा अधिकार सर्वप्रथम मान्य केला.

 स्वीडननंतर डेन्मार्क, फीनलँड व नॉर्वे या देशांनी माहितीच्या अधिकारचे कायदे केले.

 1966 साली अमेरिकेत 'फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन अॅक्ट' स्वीकारण्यात आला.

 1966 मध्ये ब्रिटनने महितीचा अधिकार स्वीकारला....

 1982 च्या दरम्यान कॅनडा, फ्रान्स व ऑस्ट्रेलिया या राष्ट्रकुलातील देशांनी माहितीच्या अधिकाराचा पुरस्कार केला.

 1990 पर्यंत जगातील 13 राष्ट्रांनी माहितीचा अधिकार कायदा लागू केला होता.

 १९९० नंतर भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू केला होता...

 28 डिसेंबर 2005 रोजी चीनने 'द फ्रीडम ऑफ गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन ऑफ लॉ' असा कायदा लागू केला..

 जागतिक माहिती अधिकार सप्ताह 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत असतो.

 महाराष्ट्र माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर हा असतो.

 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त केंद्र सरकारने माहितीचा अधिकार हा कायदा संपूर्ण भारतात 12 ऑक्टोबर 2005 रोजी लागू केला.

 माहितीचा अधिकार हा कायदा एकूण 31 कलमांचा आहे. या कायद्यातील कलम 12 नुसार, केंद्रीय माहिती आयोगाची रचना केली आहे.

 केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना 2005 साली करण्यात आली. याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.

 आयोगात 1 मुख्य माहिती आयुक्त असतो. तर जास्तीत जास्त इतर 10 माहिती आयुक्त असतात.

 केंद्रीय माहिती आयुक्तांचा दर्जा निवडणूक आयुक्तांसारखा असतो. यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण करेपर्यंत असतो.

 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांना दरमहा 90000 इतके वेतन असते.

 भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबिबुल्लाह हे होते.

विभागीय आयुक्त



     राज्याने प्रशासन योग्यरीत्या चालविले जावे यासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आले आहेत. कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद.

प्रत्येक महसूल विभागांचा एक प्रमुख महसूल प्रशासकीय अधिकारी असतो त्यास विभागीय आयुक्त म्हणतात. विभागीय आयुक्त हा सर्वात महत्वाचा प्रादेशिक अधिकारी असतो. तो आपल्या क्षेत्रात राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करतो. लॉर्ड विल्यम बेन्गटिंकने १८२९ मध्ये महसूल आयुक्त हे पद निर्माण केले. जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायाधीश यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी हे पद निर्माण करण्यात आले.

– राजस्थान सरकारने १९६१ ला आपल्या राज्यातून विभागीय आयुक्त हे पद रिक्त ( रद्द ) केले.

– उत्तरप्रदेशमध्ये विभागीय आयुक्तांच्या संख्येमध्ये कपात करण्यात आली.

पात्रता                       पदवीधर

निवडणूक                   UPSC मधून बढतीद्वारे

नेमणूक                      राज्य शासन

दर्जा                          IAS  चा असतो.

कार्यक्षेत्रे                     महसूल आणि प्रशासकीय विभाग

वेतन व भत्ते                 राज्य शासन

कार्यकाळ                    महसूल आणि प्रशासकीय विभाग

वेतन व भत्ते                  राज्य शासन

कार्यकाल                     ३ वर्ष ( ३ वर्षानंतर बदली )

राजीनामा                     राज्य शासनाकडे

रजा                            राज्य शासन

बडतर्फी                       केंद्र शासनाद्वारे


विभागीय आयुक्तांचे अधिकार व कार्य 


१) विभागीय महसूल प्रशासकीय अधीकारी म्हणून भूमिका पार पाडणे.

२) आपल्या क्षेत्रातील शासनाच्या विविध विबीभागामध्ये काही वाद झाल्यास त्यांचे निराकरण करणे.

३) पंचायतिराजसंबंधित भूमिका पार पाडणे.

४) जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार

५) गावातील पडीक जमिनीचे मागासवर्गीयांमध्ये वाटप करणे.

६) जमीनदारी पद्धतीवर अंकुश ठेवणे.

७) पोलीस प्रशासनावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

८) विभागीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्यांचे निराकरण करणे.

९) विभागातील विविध यंत्रणामधून माहिती, आकडेवारी, तक्ते, अहवाल मागविणे त्यांची तपासणी करणे व राज्य शासनास अहवाल देणे.

१०) शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेणे.

११) विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.


Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...