२४ सप्टेंबर २०२३

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.



०१) जगात सर्वाधिक वाघ असणारे पहिले तीन देश कोणते ?

- भारत,रशिया,इंडोनेशिया.


०२) कोणत्या संघटनेमार्फत २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे ?

- संयुक्त राष्ट्र संघ.


०३) 'कोसलाकार' असे कोणाला संबोधले जाते ?

- डॉ.भालचंद्र नेमाडे.


०४) महाराष्ट्रातील सर्वात लहान किल्ला कोणता ?

- तुंग.


०५) राष्ट्रध्वज केव्हा उतरवतात ?

- सूर्यास्ताच्या वेळी.


०१) अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस कोणती भरती म्हणतात ?

- उधाणाची भरती.


०२) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?

- निकोटीन.


०३) अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला काय म्हणतात?

- आकाशगंगा.


०४) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

- वाघ.


०५) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

- वड.


०१) भारत देश कोणत्या खंडात आहे ?

- आशिया.


०२) भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंगाचे पट्टे आहेत ?

- तीन-केशरी,पांढरा,हिरवा.


०३) राष्ट्रध्वजावरील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

- त्याग आणि शौर्याचे प्रतिक.


०४) राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो ?

- शांततेचा.


०५) राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे ?

- समृद्धीचे प्रतिक


०१) हॉकी इंडियाने भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती केली आहे ?

- क्रेग फुल्टन,दक्षिण आफ्रिका.


०२) महाराष्ट्रातील कोणत्या संताची पदे 'गुरू ग्रंथसाहेब' या शीख धर्मियांच्या धर्मग्रंथात आहेत ?

- संत नामदेव महाराज. 


०३) जागतिक ध्रुवीय अस्वल दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- २७ फेब्रुवारी.(२०११ पासून)


०४) छत्रपती शिवाजी महाराज कोणता किल्ला जिंकू शकले नाही ?

- जंजिरा किल्ला.


०५) नांदेड जिल्ह्यात एकूण महानगरपालिका किती आहेत ?

- एक.


०१) चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- ओरिसा.


०२) कळसुबाई हे नाव कशाशी संबधित आहे ?

- पर्वत शिखर.


०३) ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

- प्रथम.


०४) चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?

- कर्नाटक.


०५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


०१) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

- रवींद्रनाथ टागोर.


०२) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

- मोर.


०३) शीखांचा मुख्य सण कोणता ?

- बैसाखी.


०४) कोणत्या महापुरुषाला ‘लोहपुरुष’ म्हणतात ?

- सरदार पटेल.


०५) आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ?

- ८ मार्च.


०१)भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

- कमळ.


०२)भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता आहे ?

- डॉल्फिन.


०३) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?

 - आंबा.


०४) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे ?

- ३:२


०५) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ?

- हॉकी.


०१) भारतातील पहिला अंतराळवीर कोण ?

- राकेश शर्मा.


०२) अवकाशयात्री पहिली महिला कोण ?

- कल्पना चावला.


०३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोठे घेतली ?

- नागपूर.


०४) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण ?

- प्रतिभाताई पाटील.


०५) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे ?

- ९.७ %


०१) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला ?

- जॉन लोगी बेअर्ड.


०२) भारताची पहिली महिला शासिका कोण होती ?

- रजिया सुलताना.


०३) "अग्निपंख" ( Wings of Fire ) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.


०४) जलग्रह असे कोणत्या ग्रहास म्हटले जाते ?

- पृथ्वी.


०५) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात ?

- कल्ले.


०१) दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात ?

- संयुक्त स्वर.


०२) ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ कोणी यांनी लिहिला आहे?

- गागाभट्ट.


०३) महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ?

- रायगड.


०४) सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ?

- अल्बर्ट आईन्स्टाईन.


०५) 'शाकुंतल' हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले ?

- कालिदास.


०१) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो ?

- ८ मिनिटे २० सेकंद.


०२) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढऱ्या पेशी.


०३) गायत्री मंत्र कोणत्या ग्रंथात लिहिलेला आहे ?

- ऋग्वेद.


०४) 'पंजाब केसरी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- लाला लजपतराय.


०५) सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?

- बुध.


०१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कधी असतो ?

- ६ डिसेंबर.


०२) सातही खंडातील सर्वोच्च पर्वत शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला कोण.

- प्रेमलता अग्रवाल.


०३) सर्वात जास्त सौर ऊर्जेचा उत्पादन करणारा देश कोणता ?

- जर्मनी.


०४)डायनामाइट चा शोध कोण लावला.

 - अल्फ्रेड नोबेल.


०५) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

- छोटा मेंदू.


०१)भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते ?

- मौलाना अबुल कलाम आझाद.


०२) महाराष्ट्रातील पहिला १००% साक्षर जिल्हा कोणता आहे?

- सिंधुदुर्ग.


०३)भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण आहेत ?

- रवींद्रनाथ टागोर.


०४) जय जवान, जय किसान, जय विज्ञान हा नारा कोणी दिला ?

- अटलबिहारी वाजपेयी.


०५) माउंट एव्हरेस्ट चढणाऱ्या भारतातील पहिल्या महिलेचे नाव?

- बचेंद्री पाल.


०१) मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०२) प्रसिद्ध कैलास लेणी कोठे आहे ?

- वेरूळ.


०३) दातांच्या आवरणात सापडणारे क्षार कोणते ?

- फ्लोरिन.


०४) भारतातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?

- सिंद्री.


०५) सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात ?

- जपान.


०१) सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?

- बुध.


०२) दौलताबाद किल्ला एकेकाळी कोणत्या नावाने ओळखला जायचा ?

- देवगिरी.


०३) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असेही संबोधतात.?

- मंगळ.


०४) पृथ्वीवरून चंद्राचा जास्तीत जास्त किती टक्के भाग दिसतो ?

- ५९ टक्के.


०५) चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो ?

- ५० मिनिटे.


०१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढऱ्या पेशी.


०२) राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- १२ जानेवारी.


०३) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

- टंगस्टन.


०४) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

- न्यूटन.


०५) कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?

- यकृत.


०१) 'राष्ट्रीय विज्ञान दिन' केव्हा साजरा केला जातो ?

- २८ फेब्रुवारी.


०२) "काव्यफुले" हा ग्रंथ कोणी लिहला ?

- सावित्रीबाई फुले.


०३) संत गाडगेबाबा यांचा जन्म कोठे झाला ?

- शेंडगाव,जि.अमरावती.


०४) विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली ?

- कर्मवीर भाऊराव पाटील.


०५) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

- पायगोंडा पाटील.


०१) ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?

- करनाम मल्लेश्वरी.


०२) जय जवान,जय किसान हा नारा कोणी दिला ?

- लालबहादूर शास्त्री.


०३) अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणी केली ?

- पंडित जवाहरलाल नेहरु.


०४) आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह कधी सोडण्यात आला ?

- १९७५.


०५) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

- डॉ.होमी भाभा.


०१) बॉर्डर - गावस्कर कसोटी चषक २०२३ भारताने किती फरकाने जिंकला ?

- २ - १ ने.


०२) ऑस्कर पुरस्कार २०२३ प्राप्त सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ?

- एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स.


०३) कोणत्या राज्याने अलीकडे ५४ वर्षांनी संतोष ट्रॉफी जिंकली आहे ? 

- कर्नाटक.


०४) तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

- दुसरा.


०५) मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

- कोनराड संगमा.


०१) भारत पाकिस्तान या दोन देशात संघर्ष सोडवण्यासाठी १९६६ ला जो करार झाला त्याला कोणता करार म्हणतात ?

- ताश्कंद करार.


०२)भारतात राष्ट्रीय आणीबाणी चा काळ किती वर्ष चालला ?

- दोन वर्ष.(१९७५-१९७७)


०३) लालबहादूर शास्त्री यांचे निधन कधी व कोठे झाले ?

- १९६६,ताश्कंद येथे.


०४) भारताने अणुचाचण्या कोठे केल्या ?

- पोखरण,जि.जैसलमेर राजस्थान.


०५) 'इन्कलाब जिंदाबाद' चा अर्थ काय होतो ?

- क्रांती अमर रहे.


०१)भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ?

- पाच.


०२) पृथ्वी पेक्षा सूर्य किती पटीने मोठा आहे?

- १३.(तेरा)


०३) अंदमान निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रात आहेत ?

- बंगालचा उपसागर.


०४) भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते ?

- हिराकुंड.


०५) मानवाने सर्वप्रथम वापरलेला पहिला धातू कोणता ?

- तांबे.


०१) ' देवी ' या रोगावर परिणामकारक लस कोणी शोधून काढली ?

- एडविन जेन्नर.


०२) सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ?

- ७२.


०३) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?

- ३७ अंश सेल्सिअस.


०४) कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते ?

- ओ.( O )


०५) पोलिओ प्रतिबंधक लस कोणी शोधून काढली ?

- साॅल्क जोनास एडवर्ड.


०१) भारत पाकिस्तान या दोन देशात संघर्ष सोडवण्यासाठी १९६६ ला जो करार झाला त्याला कोणता करार म्हणतात ?

- ताश्कंद करार.


०२)भारतात राष्ट्रीय आणीबाणी चा काळ किती वर्ष चालला ?

- दोन वर्ष.(१९७५-१९७७)


०३) लालबहादूर शास्त्री यांचे निधन कधी व कोठे झाले ?

- १९६६,ताश्कंद येथे.


०४) भारताने अणुचाचण्या कोठे केल्या ?

- पोखरण,जि.जैसलमेर राजस्थान.


०५) 'इन्कलाब जिंदाबाद' चा अर्थ काय होतो ?

- क्रांती अमर रहे.


०१) 'बालकवी' हे कोणाचे टोपण नाव आहे ?

- त्र्यंबक बापूजी ठोंबरे.


०२) हॅलेचा धुमकेतू किती वर्षांनंतर परत दिसतो ?

- ७६ वर्षांनी.


०३) वातावरणातील कोणता वायू अतिनील किरणे शोषून घेतो ?

- ओझोन.


०४) वातावरणातील सर्वांत खालच्या थरास काय म्हणतात ?

- तपांबर.


०५) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?

- वाघ.


०१) संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

- आळंदी.


०२) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?

- मुंबई शहर.


०३) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?

- जायकवाडी.


०४) 'शक्तीस्थळ' हे कोणाचे समाधी स्थळ आहे ?

- इंदिरा गांधी.


०५) 'उपरा' ही कोणाची कादंबरी आहे ?

 - लक्ष्मण माने.




१७ सप्टेंबर २०२३

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌

               मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या.

या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश या घटकांवर प्रश्न विचारताना पॅटर्न काय होता?

तुम्हा सर्वांना येणाऱ्या परीक्षांसाठी आयबीपीएस(IBPS) चा काय पॅटर्न आहे, हे लक्षात यावं म्हणून हा अट्टहास .

📌📌 English 📌📌

1)  Error detection.( यामध्ये Tense, articles, prepositions, homophones या घटकांवर प्रामुख्याने विचार करायचा.)

2) Para-jumbles / Sentence Rearrangement ( 6 jumbled sentences देऊन त्यांचा योग्य क्रम लावून त्यावर 5 questions असतात.)

3) TCS विचारते तसे सोपे -सोपे One Word Substitutions / idioms IBPS विचारत नाही; पण vocab चा भाग म्हणून आपण हे घटक करत चला.

4)  Fill in the blanks  / Cloze text
( ज्यामध्ये एक छोटासा पॅसेज देऊन त्यामध्ये काही ब्लँक दिले जातात आणि त्यामध्ये आपल्याला words भरावायचे असतात.)

5) Spelling error

6) Prepositions

7) Articles

8) Word interchange / swapping
( वाक्यामधील कुठलातरी एक शब्द बोल्ड करून त्या शब्दाला कोणता शब्द रिप्लेस करेल हे विचारलं जातं.)

9) Fill appropriate word ( दिलेल्या वाक्याच्या सेन्सनुसार आपल्याला एक शब्द निवडायचा असतो.)

📌📌मराठी 📌📌

मराठीचे प्रश्न attempt करताना कधी कधी असं वाटतं वाळंबे-  शिंदे हे सगळं साईडला ठेवून द्यावं की काय😄 पण असं नाही आपले स्रोत वापरून अभ्यास सुरू ठेवा.

1) मराठी पॅराजेम्बल जे की वेळ घेते .

2) लिंग ओळखा

3) योग्य -अयोग्य शब्द

4) योग्य वाक्यरचना ओळखा

5) शुद्धलेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा

6) वाक्प्रचार व म्हणी यांचा वाक्यात उपयोग करून विचारले जातात.

7) उतारा

8) काळ या घटकावर सुद्धा प्रश्न होते.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ZP पद भरतीसाठी परीक्षा होत आहेत. परीक्षांसाठी मार्गदर्शक ठरावी म्हणून ही पोस्ट.

तुम्हा सर्वांना येणाऱ्या परीक्षांसाठी शुभेच्छा 💐

०९ सप्टेंबर २०२३

तलाठी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत; आरोपीला अटक करताच थेट मंत्रालयातून फोनाफानी

Talathi Bharti Exam : आरोपीला पोलिसांनी अटक करताच थेट मंत्रालयातून पोलिसांना फोनाफानी सुरु झाली आहे


औरंगाबाद : राज्यात सुरु असलेल्या तलाठी भरती परीक्षेत (Talathi Bharti Exam) गैरप्रकार होत असल्याचे समोर येत असतानाच, परीक्षेच्या टीसीएस केंद्राताल कर्मचारीच परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये (Aurangabad) उघडकीस आला आहे. औरंगाबादच्या आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्राबाहेरून एकजण कॉपी पुरवत असताना पोलिसांनी त्याला 5 सप्टेंबरला बेड्या ठोकल्या होत्या. राजू भीमराव नागरे (वय 29 वर्षे, रा. कातराबाद, औरंगाबाद) असे या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, नागरेला पोलिसांनी अटक करताच थेट मंत्रालयातून पोलिसांना फोनाफानी सुरु झाल्याने, या घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याची चर्चा आहे. 


मागील काही दिवसांत परीक्षा घोटाळ्याचा औरंगाबाद आता केंद्रबिंदू बनला आहे. कधी पोलीस भरती, तर कधी वन विभागाच्या घोटाळ्यात औरंगाबादचे नाव समोर आले. त्यात आता औरंगाबादचं कनेक्शन थेट तलाठी घोटाळ्यात देखील समोर आले आहे. 5 सप्टेंबर रोजी झालेल्या तलाठी भरती परीक्षेत शहरातील  आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्राबाहेरून एकजण कॉपी पुरवत असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यामुळे पोलिसांनी संशयित राजू नागरेला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे मास्टर कार्डसह, दोन मोबाईल मिळाले होते. तसेच त्याच्या मोबाईलमधील टेलिग्रामवर काही प्रश्नांचे छायचित्र होते. नागरे हा परीक्षा केंद्राच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घरून आतमध्ये कॉपी पुरवत होता. यासाठी तो या कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपये देत होता. मात्र, संशय आल्याने परीक्षा केंद्राबाहेर उभा असलेल्या नागरेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. या सर्व प्रकरणात एकूण 7 आरोपी आहेत. 


नागरेसाठी थेट मंत्रालयातून फोनाफानी... 

मागील काही दिवसांत वेगवेगळ्या भरती परीक्षेत होणारे गैरप्रकार वाढले आहेत. या प्रकरणी अनेक गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. थेट परीक्षा केंद्रातील कर्मचारीच या सर्व घोटाळ्यात सहभागी होत असल्याने खळबळ उडाली आहे. तर या सर्व प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा आरोप होत असतानाच, आता मंत्रालय कनेक्शन देखील समोर येत आहे. औरंगाबाद पोलिसांनी कॉपी पुरवणाऱ्या नागरेला ताब्यात घेतल्यावर त्यासाठी थेट मंत्रालयातून पोलिसांना फोन येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत असल्याची चर्चा आहे. 


परीक्षा केंद्रातील कर्मचारीच घोटाळ्या सहभागी...

औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसी भागात टीसीएस कंपनीमार्फत आय ऑन डिजिटल हे परीक्षा केंद्र चालवले जाते. या केंद्रात राज्य आणि केंद्राच्या अनेक परीक्षा घेतल्या जातात. दरम्यान याठिकाणी अनेक कर्मचारी शिफ्टनुसार काम करतात. मात्र, आता हे केंद्र कॉपीच्या घटनांमुळे चर्चेत आला आहे. यापूर्वी वनरक्षक भरतीत याच टीसीएस केंद्रातील कर्मचारीच बाथरूममध्ये कॉपी पुरवत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता तलाठी भरतीत देखील राजू नागरेला टेलिग्रामद्वारे प्रश्नपत्रिका बाहेर पाठवण्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहेत. 



०६ सप्टेंबर २०२३

येणाऱ्या सर्व सरळसेवा भरतीसाठी इंग्रजी व्याकरण विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे आणि तयारीचा रोडमॅप

 नमस्कार विद्यार्थी मित्रानो,

सध्या अनेक सरळसेवा परीक्षा नियोजित असून काही परीक्षा पूर्ण झाल्या आहे.या सर्व परीक्षांमध्ये अतिशय महत्वाचा असा इंग्रजी विषय..या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मागील काही दिवसात TCS ने वनरक्षक आणि इतर विविध पदांसाठी परीक्षा घेतली .या सर्व पेपर चे विश्लेषण करून इंग्रजी विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे मी आपल्यासमोर मांडत आहे..

♦️इंग्रजी व्याकरणातील एक एक उपघटक समजून घेऊया..

1) PARTS OF SPEECH : (शब्दांच्या जाती )
          मराठीप्रमाणेच इंग्रजी मध्ये या उपघटकाचे महत्त्व अधिक आहे .यामध्ये विशेषतः Noun या घटकावर जास्त भर द्यायला हवा.. 2 ते 3 प्रश्न यावर दिसून येतात. Common noun , collective noun यावर प्रश्न विचारले गेले आहे..बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील noun टॉपिक व्यवस्थित अभ्यासायला हवा.यामध्ये  प्राण्यांचे आवाज , कळप त्यांचे पिल्ले ह्यावर प्रश्न दिसून येत आहे .त्यामुळे हे घटक व्यवस्थित अभ्यासायला हवे.

2)Active voice and passive voice
        यावर Tcs ने घेतलेल्या पेपर मध्ये 2  प्रश्न साधारणपणे दिसून येतात. हा घटक अभ्यासताना to be + v3 यावर लक्ष असायला हवे कारण elimination पद्धतीने आपण सहज उत्तरापर्यंत पोहचत असतो.

3)Tense : काळ
        मराठी व्याकरणापेक्षा इंग्रजी व्याकरणात काळाचे महत्व खूप जास्त आहे.यामध्ये साधारणता 2 प्रश्न दिसून येतात.या घटकातील core अभ्यासावर लक्ष द्यावे.विविध नियम तसेच अपवाद देखील व्यवस्थित करून ठेवावे .

4)Direct & Indirect Speech-
        यामध्ये TCS ने विद्यार्थ्यांना फसवण्याचं काम केलेले आहे .त्यामुळे इथे key word वर भर देणे क्रमप्राप्त ठरते .म्हणजे शेवटी जे शब्द बदलत असतात त्यावर लक्ष असू द्यावे .उदा .now - then , before - after

5)Types of Sentence-
    या उपघटकात वाक्यरूपांतराचे प्रश्न दिसून येतात. positive वाक्य negative करणे यासारखे सोप्पे प्रश्न दिसून येत आहे.

6)Spelling Mistake
        TCS ने यावर सर्व पेपर मध्ये भर दिलेला आहे.एका वाक्यात अनेक शब्द देऊन चुकीची spelling विचारली जाते .या घटकाच्या तयारीसाठी pal & suri या पुस्तकातील spelling error चा घटक व्यवस्थित  अभ्यासायला हवा.

7)Parajumbles-
         हा अतिशय किचकट व अवघड वाटणारा विषय आहे.वाक्यांचा अर्थपूर्ण क्रम लावणे यामध्ये अपेक्षित असते .यामध्ये दिलेल्या 4 वाक्यामध्ये कोणत्याही दोन वाक्यांचा क्रम जर समजून घेतला तर elimination करून उत्तरापर्यंत पोहचता येऊ शकते. पहिलेच वाक्य कोणते आहे हे शोधायचा अट्टहास करून वेळ वाया घालवू नये.

♦️Vocabulary-
      Mpsc च्या विविध परीक्षामधील vocab TCS च्या पेपर मध्ये दिसून येत आहे.त्यासाठी अगोदरचे सर्व pyq त्यांच्या पर्यायासह व्यवस्थित अभ्यासले पाहिजे.
Synonyms  व antonyms  या घटकांवर प्रत्येकी 2 प्रश्न दिसून येतात .यासाठी pyq वरती जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे.
याप्रमाणेच TCS ने Idiom phrases व one word substitution यावर देखील प्रश्न विचारत आहे .तो घटक देखील व्यवस्थित अभ्यासायला हवा.

♦️ Books -
1)बाळासाहेब शिंदे सर
किंवा तुम्ही वापरात असलेल्या कोणत्याही क्लास नोट्स

2) कोणताही एक प्रश्नसंच
   
      वरील सर्व विश्लेषण बघता TCS ने घेतलेले पेपर फार सोप्पे नाही आणि फार अवघड देखील नाही .दोन्हीचा मेळ इथे दिसून येतो. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप समजून अभ्यास केल्यास निश्चित तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल हीच अपेक्षा..

०४ सप्टेंबर २०२३

मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे

ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे

1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर

2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन

3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले

4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत

5) छावा –            शिवाजी सावंत

6) श्यामची आई –      साने गुरूजी

7) श्रीमान योगी –     रणजित देसाई

8) स्वामी –        रणजित देसाई

9) पानिपत –      विश्वास पाटील

10) युगंधर –     शिवाजी सावंत

11) ययाती –     वि.स.खांडेकर

12) कोसला –    भालचंद्र नेमाडे

13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे

14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर

15) शाळा –       मिलिंद बोकील

16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर

17) बलुत –     दया पवार

18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे

19) राधेय –      रणजित देसाई

20) दुनियादारी -सुहास शिरवळकर

21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव

22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर

23) पार्टनर – व.पु काळे

24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर

25) राऊ – ना.सं ईनामदार

26) असा मी असामी – पु.ल देशपांडे

27) पावनखिंड – रणजित देसाई

28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर

29) गोलपिठा – नामदेव ठसाळ

30) रणांगन -विश्राम बेडेकर

31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी

32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे

33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे

34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक

35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल

36) झूंज – ना.सं ईनामदार

37) झोंबी – आनंद यादव

38) उपरा – लक्ष्मण माने

39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी

40) चेटकीण – नारायण धारप

41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे

42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर

43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर

44) विनोद गाथा – पी.के अत्रे

45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर

46) उचल्या – लक्षमण गायकवाड

47) हास्यतुषार -पी.के अत्रे

48) भुमी -आशा बागे

49) मारवा – आशा बागे

50) पैस – दुर्गा भागवत

51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत

52) प्रेषित – जयंत नारळीकर

53) अजगर – सी.टी खानोलकर

54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव

55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर

56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर

57) महानायक – विश्वास पाटील

58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे

59) गुलामगिरी -महात्मा फुले

60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे

61) पाचोळा – रा.रं बोराडे

62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले

63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे

64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार

65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील

66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर

67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे

68) अमृतवेल – वि.स.खांडेकर

69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे

70) धग – उद्दव शेळके

71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात

72) हिंदु – भालचंद्र नेमाडे

73) फकिरा -अन्नाभाऊ साठे

74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा

75) अग्नीपंख – अब्दुल कलाम

76) मुसाफिर – अच्युत गोडबोले

77) पांगिरा -विश्वास पाटील

78) झाडाझडती – विश्वास पाटील

79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे

80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले

81) मर्मभेद – शशी भागवत

82) फास्टर फेणे – भारा भागवत

83) सखी – व.पु काळे

84) राशीचक्र -शरद उपाध्ये

85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी

86) चौघी जणी – शांता शेळके

87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर

88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर

89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत

90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार

91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे

92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी

93) वीरधवल -नाथ माधव

94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर

95) पावनखिंड – रणजित देसाई

96) प्रकाशवाटा – बाबा आमटे

97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे

98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे

99) एकच प्याला – राम गणेश गडकरी

100) किमयागार – अच्युत गोडबोले

101) युगांत – ईरावती कर्वे

102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती

103) निळावंती – मारूती चितमपल्ली

104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर

105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी

106) पडघवली – गो नी दांडेकर

107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी

108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे

109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे

110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर

111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत

112) लज्जा – तस्लिमा नसरीन

113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे

114) ईलल्म -शंकर पाटील

115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर

━━━━━━━━━━━━━━━━

३० ऑगस्ट २०२३

चालू घडामोडी

1) महाराष्ट्र राज्यात क्रांती गाथा या भारतीय क्रांतिकारकांच्या दालनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी

2) जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 कोठे आयोजित केली जाणार आहे?
✅ डेन्मार्क

3) जागतिक नमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत इशा सिंह आणि शिवा नरवाल यांनी कोणते पदक जिंकले?
✅ सुवर्ण

4) डोप चाचणीत अपयशी ठरल्याने कोणत्या भारतीय खेळाडूवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे?
✅ दुती चंदवर

5) अलीकडेच मोफत अन्न पॅकेट योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे?
✅ राजस्थान

6) भारत आणि कोणत्या देशात स्थानिक चलनात पहिला कच्चा तेलाचा व्यवहार अलीकडे झालेला आहे?
✅ UAE

7) कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी केंद्रिय मंत्री मंडळाने 32,500 कोटी रुपयांच्या किती रेल्वे प्रकल्पांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली?
✅ सात

8) महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती नवीन योजना सुरू केली आहे?
✅  'लखपती दीदी’

9) नुकतेच जागतिक अँथलेटिक्स कार्यकारी मंडळावर कोणाची निवड झाली आहे?
✅ अदिले सुमारीवाला

10) भारतीय नौदलाच्या ताफ्यात नवीनतम INS विंध्यगिरी कोणी लाँच केली?
✅ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q.1) ब्रिक्स शिखर परिषद 2023 कोठे होणार आहे?
✅ - दक्षिण आफ्रिका 

Q.2) सिंगापूर मॅथ ऑलिम्पियाडमध्येराजा अनिरुद्ध श्रीराम या विद्यार्थ्याने कोणते पदक मिळवले आहे?
✅ – रौप्य

Q.3) भारतातील पहिली हायड्रोजनवर चालवणारी बस कोठे सूरू झाली आहे?
✅ - लडाख 

Q.4) UIDAI चे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ - नीलकंठ मिश्रा

Q.5) दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठ्या डिसॅलिनेशन प्रकल्पाची पायाभरणी कोठे करण्यात आली 
✅ –  तामिळनाडू 

Q.6) ‘डिजी यात्रा’ सुविधा मिळवणारे ईशान्येतील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे?
✅ - गुवाहाटी विमानतळ

Q.7) निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
✅ - सचिन तेंडुलकर 

Q.8) जागतिक जल साप्ताह 2023 केव्हां साजरा केला जात आहे?
✅ - 20 ते 24 ऑगस्ट 

Q.9) 20 ते 31 ऑगस्ट या कालावधीत ओणम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणार आहे?
✅ – केरळ 

Q.10) दरवर्षी कोणत्या दिवशी धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचाराच्या बळींचे स्मरण करणारा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो?
✅ - 22 ऑगस्ट

Q.1) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे?
✅ –  भारत 

Q.2) थायलंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
✅ - श्रेथा थाविसिन

Q.3) खेलो इंडिया महिला लीग आता काय म्हणून ओळखली जाईल?
✅ - “अस्मिता महिला लीग”

Q.4) FIDE विश्वचषक 2023 चा उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारा आर प्रज्ञानंदा हा विश्वनाथ आनंद नंतर कितवा भारतीय ठरलेला आहे?
✅ -  पहिला

Q.5) कोणत्या राज्याला नैसर्गिक आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहे?
✅ - हिमाचल प्रदेश

Q.6) भारत नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे?
✅ – नितीन गडकरी

Q.7) कोणत्या देशाने त्यांच्या इतिहासात प्रथमच महिला विश्वचषक जिंकला आहे?
✅ – स्पेन

Q.8) जगातील सर्वात गंभीर पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवा युको-हिरो पुरस्कार 2023 मध्ये किती भारतीय तरुणांची नावे आहेत?
✅ – पाच 

Q.9) जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस कधी साजरा केला जातो?
✅ – 21 ऑगस्ट

Q.10) CSIR ने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतूट समर्पणाला सन्मान म्हणून कोणती विशिष्ट कमळाची प्रजाती सादर केली?
✅ - 'नमोह 108’

Q.1) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
Ans - ग्रीस

Q.2)  69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामधे सर्वात्कुष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
Ans - एकदा काय झाल

Q.3)  भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने किती मीटर फाला फेकुन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला?
Ans - 88.77 मीटर

Q.4) नुकतेच सीमा देव यांचे निधन झाले आहे, त्या कोण होत्या?
Ans - अभिनेत्री

Q.5) 03 वर्षांसाठी इन्फोसिसचा राजदूत म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Ans - राफेल नदाल

Q.6) स्वच्छ वायु सर्वेक्षण-2023 मध्ये मध्य प्रदेशच्या IT हब इंदूरने क्रमांक मिळवला?
Ans - प्रथम

Q.7) NHA ने पहिले ABDM मायक्रोसाइट कोठे लाँच केले आहे?
Ans - मिझोरम

Q.8) दरवर्षी महिला समानता दिन केव्हां साजरा केला जातो?
Ans - 26 ऑगस्ट

Q.9) विंडहॅम रोटुंडा (ब्रे व्याट) यांचे वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाल, ते कोण होते?
Ans - WWE कुस्तीपटू

२९ ऑगस्ट २०२३

थोडक्यात महत्वाचे सर्वांनी वाचून घ्या,लिहून काढा ,वाचलेले वाया जातं नाही.


🌀🙏

1) आजाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती?
👉 रास बिहारी बोस

2) राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?
👉सर ए. ओ. ह्युम

3) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय  महिला अध्यक्ष कोण होती?
👉 सरोजिनी नायडू

4) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
👉 व्योमेशचंद्र बॅनर्जी

5) काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते?
👉 मुंबई

6) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
👉 लॉर्ड रिपन

7) डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
👉 पंडित जवाहरलाल नेहरू

8) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
👉 रायगड

9) थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

10) शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे?
👉कागल

11) शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

12) मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती?
👉 महात्मा फुले

13) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे?
👉 महात्मा फुले

14) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हणतात?
👉 बाळशास्त्री जांभेकर

15) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते?
👉 तुकडोजी महाराज

16) पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे?
👉 दर्पण

17) भारत रत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत?
👉 महर्षी धोंडो केशव कर्वे

18) भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?
👉 26 जानेवारी 1950

19) लोकसभेची कमाल म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते?
👉 552

20) राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते?
👉 250

21) राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात?
👉238

22) राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो?
👉 राष्ट्रपती

23) राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते?
👉 सहा वर्षे

24) राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
👉 उपराष्ट्रपती

25) महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात?
👉 48

26) महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात?
👉 19

27) भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
👉 राष्ट्रपती

28) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
👉 दिल्ली

29) भारतात सध्या किती उच्च न्यायालये आहेत?
👉 25

30) महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते?
👉 288

31) महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती असते?
👉 78

32) विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
👉 स्थायी / कायमस्वरूपी

33) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?
👉शेती

34) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते?
👉 महाराष्ट्र

35) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते?
👉 महाराष्ट्र

36) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
👉वित्त सचिव

37) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
👉 रिझर्व बँकेचे गव्हर्नर

38) ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता?
👉 राजीव गांधी

39) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?
👉 1 मे 1962

40) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
👉 ग्रामसेवक

41) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?
👉 7 ते 17

42) जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता?
👉 पंचायत समिती

43) जिल्हा परिषदेचे सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
👉स्थायी समिती

44) गावात कोतवालाची नेमणूक कोण करते?
👉 तहसीलदार

45) सातबारा उतारा कोण देतो?
👉 तलाठी

46) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
👉 जिल्हाधिकारी

47) गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?
👉 पोलिस पाटील

48) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे?
👉 34

49) सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे?
👉 आठ

50) पृथ्वीला किती उपग्रह आहेत?
👉 एक

51) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
👉 गुरू

52) चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण?
👉 नील आर्मस्ट्रॉंग

53) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात?
👉 परिवलन

54) रिश्टर स्केल काय आहे?
👉 भूकंप मापक

55) दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या महासागरामध्ये उभारलेले आहे?
👉 अंटार्टिका

56) अ जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो?
👉रातांधळेपणा

57) कुत्रा चावल्यानंतर वापरण्यात येणारी रेबीजची लस कोणी शोधून काढली आहे?
👉लुई पाश्चर

58) डेसीबल हे कशाचे एकक आहे?
👉 आवाजाची तीव्रता मोजण्याचे

59) मानवी शरीराचे सर्व सामान्य तापमान किती असते?
👉 37°c

60) सैनिक पेशी कोणत्या पेशींना म्हणतात?
👉 पांढऱ्या पेशी

61) उस्ताद बिस्मिल्ला खाँ हे कोणत्या वाद्याची संबंधित आहेत?
👉 शहनाई

62) बिहू हा लोक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
👉आसाम

63) संयुक्त राष्ट्रसंघ दिन केव्हा असतो?
👉 24 ऑक्टोबर

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...