०६ एप्रिल २०२३

महत्वाचे दिन...परीक्षेच्या दृष्टीने


============================
१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————————————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

सामान्य ज्ञान

1. पृथ्वी पर दिन और रात होते हैं ?

(A) दैनिक गति के कारण

(B) वार्षिक गति के कारण

(C) छमाही गति के कारण

(D) तिमाही गति के कारण

ANSWER - (A) दैनिक गति के कारण


2. सबसे बड़ा ग्रह है ?

(A) बृहस्पति

(B) पृथ्वी

(C) युरेनस

(D) शुक्र

ANSWER - (A) बृहस्पति


3. सबसे छोटा ग्रह है ?

(A) मंगल

(B) शनि

(C) बुध

(D) नेप्चून

ANSWER - (C) बुध


4. अगुलहास धारा किस महासागर में बनती है ?

(A) प्रशान्त महासागर में

(B) हिन्द महासागर में

(C) आर्कटिक महासागर में

(D) अन्य

ANSWER - (B) हिन्द महासागर में


5. पृथ्वी का सबसे भीतर वाला भाग क्रोड किसका बना होता है ?

(A) ताँबा और जस्ता

(B) निकेल और ताँबा

(C) लोहा और जस्ता

(D) लोहा और निकेल

ANSWER - (D) लोहा और निकेल


6. मैंगनीज के उत्पादन में भारत का दूसरा स्थान है, प्रथम देश कौन सा है ?

(A) फ्रांस

(B) रुसी संघ

(C) कनाडा

(D) संयुक्त राज्य अमेरिका

ANSWER - (B) रुसी संघ


7. निम्नांकित में से कौन देश कोयले का सबसे बड़ा उत्पादक है ?

(A) ब्राजील

(B) भारत

(C) अमेरिका

(D) चीन

ANSWER - (C) अमेरिका


8. इनमें किसको जापान का मैनचेस्टर कहा जाता है ?

(A) ओसाका

(B) टोकियो

(C) नागासाकी

(D) याकोहामा

ANSWER - (A) ओसाका


9. भारत के स्वतंत्रता संघर्ष के दौरान 'Deccan Educational Society' नामक संस्था की स्थापना किसने की थी ?

(A) जवाहरलाल नेहरू

(B) रवीन्द्र नाथ टैगोर

(C) बाल गंगाधर तिलक

(D) व्योमेश चन्‍द्र बनर्जी

ANSWER - (C) बाल गंगाधर तिलक


10. 1857 के गदर के समय भारत का गवर्नर जनरल कौन था ?

(A) लॉर्ड केनिंग

(B) नील आर्मस्ट्रांग

(C) जॉन मथाई

(D) अन्य

ANSWER - (A) लॉर्ड केनिंग


11. 'भारत भारतीयों के लिए ' नारा किस संस्था ने दिया था ?

(A) अशासकीय संस्था

(B) आर्य समाज ने

(C) ब्राह्म समाज ने

(D) अन्य

ANSWER - (B) आर्य समाज ने


12. विन्ध्याचल और सतपुड़ा पहाड़ियों के बीच से होकर बहने वाली नदी है ?

(A) नर्मदा

(B) सिंधु नदी

(C) कोसी

(D) गोदावरी

ANSWER - (A) नर्मदा


13. इन्वेस्टर प्रोटेक्शन फण्ड (Investor Protection Fund) किस संस्था ने स्थापित किया है ?

(A) पूंजी मुद्दे ने

(B) DLF ने

(C) सेबी (SEBI) ने

(D) अन्य

ANSWER -(C) सेबी (SEBI) ने 


14. कुण्डापुर एंव करवार कच्छ वनस्पति स्थान कहाँ स्थित हैं ?

(A) केरल राज्य में

(B) कर्नाटक राज्य में

(C) तमिल नाडु राज्य में

(D) त्रिपुरा राज्य में

ANSWER -(B) कर्नाटक राज्य में 


15. भारत की प्रथम बहुउद्देशीय परियोजना किस नदी पर बनाई गई थी ?

(A) कावेरी नदी

(B) गंडक नदी

(C) दामोदर नदी पर

(D) यमुना नदी

ANSWER - (C) दामोदर नदी पर


16. भारत में प्रथम स्थापित परमाणु-संयंत्र (Atomic Plant) कौन-सा है ?

(A) तारापुर परमाणु संयंत्र

(B) कैटेनोम परमाणु संयंत्र.

(C) कुडनकुलम परमाणु संयंत्र

(D) अन्य

ANSWER - (A) तारापुर परमाणु संयंत्र


17. यूनाइटेड किंगडम (United Kingdom- U.K) में शामिल हैं -

(A) इंगलैण्ड तथा उतरी आयरलैण्ड

(B) उतरी आयरलैण्ड तथा वेल्स

(C) स्कॉटलैण्ड तथा वेल्स

(D) (A) और (D)

ANSWER - (D) (A) और (D)


18. आगरा शहर को किसने बसाया ?

(A) सिकन्द लोदी

(B) अकबर

(C) बहलोल लोदी

(D) शाहजहाँ

ANSWER -(D) शाहजहाँ 


19. राष्ट्रिय प्रतीक के निचले भाग में उत्क्रीर्णित शब्द 'सत्यमेव जयते' किस सन्दर्भ से लिए गए हैं ?

(A) पुराण

(B) जातक

(C) मुदकोपनिषद्

(D) महाभारत

ANSWER -(C) मुदकोपनिषद् 


20. अशोक के शिलालेखों की लिपि क्या है ?

(A) गुरुमुखी

(B) ब्राह्यी

(C) देवनागरी

(D) हयरोग्लाइफिक्स

ANSWER - (C) देवनागरी



21. बिहू निम्नलिखित में से किसका लोकप्रिय उत्सव है ?

(A) असम

(B) उड़ीसा

(C) बिहार

(D) बंगाल

ANSWER -(A) असम 


22. विवेकानन्द रॉक मेमोरियल कहाँ स्थित है ?

(A) अण्डमान निकोबार

(B) लक्षद्वीप

(C) केरल

(D) तमिलनाडु

ANSWER -(D) तमिलनाडु 


23. महात्मा गांधी को राष्ट्रपिता के रूप में उल्लेख सबसे पहले किसने किया था ?

(A) सुभाषचन्द्र बोस

(B) जवाहरलाल नेहरू

(C) बल्ल्भभाई पटेल सी

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER - (A) सुभाषचन्द्र बोस


24. प्रथम गोलमेज सम्मेलन कहाँ हुआ था ?

(A) नई दिल्ली में

(B) लन्दन में

(C) बम्बई में

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER -(B) लन्दन में 


25. देश का लोह पुरुष किसे कहा जाता है ?

(A) सरदार पटेल

(B) पं. जवाहरलाल नेहरू

(C) महात्मा गांधी

(D) लोकमान्य तिलक

ANSWER - (A) सरदार पटेल


26. महात्मा गांधीजी को 'अधनंगा फकीर' किसने कहा ?

(A) हिटलर

(B) जिन्ना

(C) चर्चिल

(D) माउण्टबेटन

ANSWER - (C) चर्चिल


27. महात्मा गांधी निम्नलिखित में से किनसे अधिक प्रभावित थे ?

(A) बर्नार्ड शा

(B) लिओ टॉलस्टॉय

(C) कार्ल मार्क्स

(D) इन में से कोई नहीं

ANSWER -(B) लिओ टॉलस्टॉय 


28. महात्मा गांधी का जन्म हुआ था ?

(A) 1859

(B) 1869

(C) 1879

(D) 1889

ANSWER -(B) 1869

आजची स्मार्ट प्रश्नमंजुषा


1)जागतिक नागरी संरक्षण संघटनेचे सदस्य देश किती आहेत?

1)59✅✅

2)18 निरीक्षक देश

3)56

4)45




2)जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी असतो?

1)28एप्रिल 

2)1जानेवारी

3)18मार्च

4)1मार्च✅✅




3)1मार्च 2021पासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिली लस कोणाला दिली?

1)गृहमंत्री अमित शहा

2)राष्ट्रपती रामनाथ कोविंद

3)उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू

4)पंतप्रधान नरेंद्र मोदि✅✅

पहिला टप्पा =6जानेवारी 2021



4)गोल्डन ग्लोबल पुरस्कार 2021 चा उकृष्ट परदेशी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटला मिळाला?

1)सोल

2)लो सी

3)मीनारी✅✅

4)नोमॅडलँड (93वा ऑस्कर :- सर्वोत्तम चित्रपट:- दिग्दर्शक क्लोई झाओ :- आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार फ्रान्सेस एम सीडॉर्मंड




5)भारतीय शाळकरी विद्यार्थीनी किती लघुग्रहांचा शोध लावला?

1)6

2)8

3)10

4)18✅✅





 9)PSLV-C-51 चे वजन किती आहे?

1)1500kg

2)1300kg

3)670kg

4)673kg✅✅ 28February 2021 successfully launched

Hight=44.4miter




 8)"जॉन्सन अँड जॉन्सन" च्या एका डोसच्या लशीला कोणत्या देशात मान्यता मिळाली?

1)रशिया

2)भारत

3)अमेरिका✅

4)कॅनडा




10)'ड'प्रथीनयुक्त गहू कोणी विकसित केला?

1)डॉ के. शिवन

2)डॉ आर उमामहेश्वरन

3)चिंतल वेंकट रेड्डी✅✅

4)राजीव मल्होत्रा

_______________________


Q 1. मानवाधिकाराचे जनक कोणाला म्हणतात? 

- रेने कॅसिन


Q 2. भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

- 12 ऑक्टोबर 1993


Q 3. सर्वाधिक उंच पर्वतरांगा कोणत्या खंडात आढळतात?

- आशिया खंडात


Q 4. जगातील सर्वात जास्त लांबीच्या पर्वतरांगा कोठे आहेत ? 

-अँडिज (7000 मीटर), रॉकी पर्वत रांग (4,500 मीटर)


Q 5. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रास अभयारण्याचा दर्जा बहाल केला ?

-कन्हारगाव अभयारण्य


Q 6. चीनने कोणत्या नदीवर बांध (धरण) बांधून जलविद्युत् प्रकल्प निर्माण करण्याचे योषित केले? - यारलुंग ल्सांग्पो (ब्रह्मपुत्रा) 


Q 7. शेतपीकांचा हमीभाव कोण ठरवितो?

- कमिशन फॉर अॅग्रिकल्चररल कॉस्ट अँड प्रायसेस आयोग 


Q 8. माऊंट एव्हरेस्टची उंची किती सेंटीमीटरने वाढली, अशी घोषणा नेपाळ व चीनने केली?

- 86 सेंटिमीटर


Q 9. माऊंट के-2 पर्वत शिरवरांची उंची किती आहे ?

- 8611 मीटर 


Q 10. माऊंट अॅल्बस कोणत्या पर्वत रांगेत आहे ?

- कॉकेशस पर्वतरांगेत (युरोप)

मूलभूत अधिकाराचा विकास

जगामध्ये सर्वप्रथम इसवी सन 1215 मध्य ब्रिटेन इथे चर्च चे अधिकार सामान्य लोकांनी मागितले ज्याला मॅग्ना कार्टा असे म्हणतात. इथूनच मूलभूत अधिकारांचे विकास मानले जाते. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये


समता (Equality)


स्वातंत्र्य (Freedom)


बंधुत्व


यांचा विकास झाला.


1931 मध्ये कराचीमध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात वल्लभ भाई पटेल अध्यक्ष होते. यांनी सर्वप्रथम काँग्रेसच्या अधिवेशनात मूलभूत अधिकारांची मागणी केली. यापूर्वी कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक नेता एम एन रॉय यांनी मूलभूत अधिकारांची मागणी केली होती.


M. N. Roy हे कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर मूलभूत अधिकार भारतीय संविधानामध्ये टाकण्यात आले व मुलभूत अधिकारांसाठी संविधान परिषदेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली या विषयाची मार्गदर्शक समिती नियुक्त करण्यात आली.


व या समितीच्या शिफारशींच्या अनुसार भारतीय संविधानाच्या भाग-3 मध्ये कलम 12 ते 35 च्या दरम्यान 7 मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला.


1) समतेचा अधिकार ( कलम 14 ते 18)


2) स्वातंत्र्याचा अधिकार ( कलम 19 ते 22)


3) शोषणाविरुद्धचा अधिकार ( कलम 23 ते 24)


4) धार्मिक स्वातंत्र्य ( कलम 25 ते 28)


5) शिक्षण संस्कृती जपण्याचा अधिकार ( कलम 29 ते 30)


6) संपत्तीचा अधिकार


7) संविधानिक उपचाराचा अधिकार (कलम 32 ते 35)


असे मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आले परंतु 44 वी घटना दुरुस्ती 1978 अनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार काढून टाकण्यात आला 1978 मध्ये मोरारजी देसाईंची सरकार आली होती त्यांनी निवडून येताच  संपत्तीचा अधिकार डिलीट केला.


संपत्तीच्या अधिकाराला कलम  300A अनुसार कायदेविषयक अधिकार बनवण्यात आले.


कलम 12:- यानुसार राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे कारण मूलभूत अधिकार राज्यच त्या राज्याच्या नागरिकांना देते व या अधिकारांवर नियंत्रणही राज्यच ठेवते.  इथे राज्य म्हणजे भारत.


कलम 13:-  न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार यामध्ये देण्यात आलेला आहे.


भाग 3 :- मूलभूत अधिकार ( कलम 12 ते 35)


असे अधिकार जे  व्यक्तीच्या जीवनास परिपूर्णता निर्माण करून देतात व ज्यांचा मुख्य उद्देश व्यक्तीचे संरक्षण आणि त्यांचा विकास हेच ध्येय असतो.  हे अधिकार भौतिक, मानसिक, नैतिक विकासाकरिता महत्त्वपूर्ण असतात. यामुळे व्यक्तीचा विकास तर होतोच देशाचाही विकास होतो. संविधानामध्ये याला सर्वोच्च स्थान आहे.


भाग – ३ मुलभूत हक्क ही भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारांची सनद आहे. ही सनद भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते. या मुलभूत हक्कांमध्ये कायद्यापुढे समानता, उच्चार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने कोठेही उपस्थित राहण्याचे व सभा स्वातंत्र्य, आणि नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी संवैधानिक प्रतिकारासाठी habeas corpus यासारख्या याचिकांचा अधिकार असे उदारमतवादी लोकतांत्रिक देशांमध्ये असलेल्या अधिकारांचा समावेश होतो. या अधिकारांचा भंग केल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय दंडविधान संहितेखाली शिक्षा होऊ शकते.


०३ एप्रिल २०२३

महानगरपालिका बद्दल संपुर्ण माहिती


🔸3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.


🔹महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.


🔸महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.


🔹महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.

महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात.


🔸महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.


🔹महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.


🔸आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो.


🔹महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.


🔸महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.


🔹महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.


🔸सध्या महाराष्ट्रात 28 महानगरपालिका आहेत. (28 वी - इचलकरंजी )


🔹पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका गणली जाते.

१००% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क असलेले हरियाणा हे भारतातील पहिले राज्य बनले आहे



◆ भारतातील हरियाणा राज्यातील रेल्वे नेटवर्क भारतीय रेल्वेद्वारे पूर्णपणे विद्युतीकरण करण्यात आले होते, ज्यामुळे ते आपल्या रेल्वे नेटवर्कचे १००% विद्युतीकरण साध्य करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे.


◆ हरियाणाचे विद्यमान ब्रॉडगेज नेटवर्क १,७०१ रूट किलोमीटर असून, जे आता १००% विद्युतीकरण झाले आहे, परिणामी कमी झालेल्या लाईन अंतराच्या खर्चात (सुमारे २.५ पट कमी), जास्त वाहण्याची क्षमता, वाढलेली विभागीय क्षमता, कमी ऑपरेटिंग आणि देखभाल खर्च यामुळे बचत होते.


➤ नवीनतम अद्यतनांनुसार, भारतातील सात विभागीय रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गांनी १००% विद्युतीकरणाचे लक्ष्य गाठले आहे.


◆ ईस्ट कोस्ट रेल्वे (ECoR)

◆ उत्तर मध्य रेल्वे (NCR) 

◆ उत्तर पूर्व रेल्वे (NER)

◆ पूर्व रेल्वे (ER)

◆ मध्य रेल्वे (CR)

◆ दक्षिण पूर्व रेल्वे (SER)

◆ पश्चिम मध्य रेल्वे (WCR)


चालू घडामोडी प्रश्नसराव


(1)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(2)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम .


(3)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- 20 फेब्रुवारी .


(4)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी .


(5)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू .


(6)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर .


(7)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा .


(8)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- 23 मार्च .


(9)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस .


(10)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.

━━━━━━━━━━━━━━

Daily Top 10 News : 4 April 2023

- - - - - - - - - - - -  - - - 

1) G20 एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची दुसरी बैठक गुवाहाटी इथं सुरू होणार


2) उपराष्ट्रपती यांच्या पत्नी सुदेश धनखड यांचा अर्थशास्त्रातल्या पीएचडी पदवीनं गौरव


3) कार्बन उत्सर्जन आटोक्यात ठेवण्यासाठी हरित हायड्रोजन हा आश्वासक पर्याय ठरेल असा भूपिंदरसिंग भल्ला यांचा विश्वास


4) भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू सलीम अझीझ यांचं निधन


5) आयपीएलमधे राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैद्राबादवर ७२ धावांनी विजय


6) पी. व्ही. सिंधू हिला माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत उपविजेतेपद


7) इस्रोची पुन्हा वापरता येणाऱ्या प्रक्षेपण यानाची स्वयं अवतरण मोहिम यशस्वी


8) भारतीय नौदलाचे नवे उपप्रमुख म्हणून व्हाइस अॅडमिरल संजय जसजित सिंग यांनी स्विकारला कार्यभार


9) मार्च 2023 मधलं जीएसटी संकलन 1 लाख 60 हजार कोटी रुपयांवर


10) शिक्षण हक्क कायदा अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरच्या प्रवेशाची ऑनलाईन सोडत पुढच्या आठवड्यात

 

भारतातील पहिले


◾️ 10,000 नवीन MSME ची नोंद करणारा पहिला जिल्हा ➖️ अर्नाकुलम


◾️ भारतातील पहिले खाजगीरीत्या तयार केलेले रॉकेट ➖️ Vikram -s ➖️ आंध्र प्रदेश


◾️ जगातील पाम लोफ हस्तलिखित संग्रहालय ➖️ केरळ


◾️ ग्रीन बॉन्ड लॉन्च करणारी देशातील पहिली नागरी संस्था ➖️इंदोर


◾️ ड्रोनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली ➖️ स्काय एअर


◾️ पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट ➖️ जम्मू आणि काश्मीर


◾️ कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 2023 ची प्रथम राष्ट्रीय लोक अदालत  ➖️  जम्मू-काश्मीर


◾️ पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस➖️  मुंबई


◾️ भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर ➖️  दिल्ली 


◾️ भारतातील पहिले फ्रोझर लेक मॅरेथॉन ➖️ लदाख


◾️ प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय ➖️  केरळ

प्रिय विद्यार्थी मित्रांनो... येणाऱ्या परीक्षेच्या बाबतीत खालील मुद्दे लक्षात घ्या;

1. 'परीक्षा होईल की नाही' यासारख्या चर्चांमध्ये लक्ष देऊ नका, परीक्षा नक्की होणार असे मनाला कायम सांगा.

2. उपलब्ध प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरा.

3.  दररोज 5 तासांचा वेळ revision साठी द्या.

4. दररोज 5 तासांचा वेळ CSAT ला द्या.

5. दररोज 2 तास जुन्या प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी यांना द्या.

6. Tension येत असल्यास सराव पेपर्स आता देऊ नका.

7. परीक्षेत आठवेल का नाही? असा विचार करू नका, आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या नसतात तर उपलब्ध पर्यायातून उत्तर शोधायचे असते.

8. पदांची संख्या , मेरिट यांचा विचार करू नका, ते तुमच्या हातात नाही.

9. पुरेशी झोप घ्या, यामुळे मन शांत राहण्यास मदत होईल.

10. आत्मविश्वास कायम ठेवा. नको त्या लोकांपासून दूर राहा.

11. राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाल्यावर लगेचच Combine पूर्वपरीक्षेवर focus ठेवा.

12.  stick to wicket, runs will come automatically.


combine रणनीती..

नमस्कार मित्रांनो,

आज आपण शेवटच्या 90 दिवसांमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी आणि 60 गुण कसे मिळवावेत याबाबत चर्चा करूयात..

♦️ 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल पाहता आता सुरक्षित गुण किती असतील याबाबत कोणीच निश्चित सांगू शकत नाही. पहिल्या उत्तरतालिका नुसार किमान 60 गुण मिळवले तरच मुख्य परीक्षेला असण्याची खात्री राहणार आहे. सर्वांनी पूर्व परीक्षेला ठरवून 60 गुणांच्या वर स्कोर करण्याची आवश्यकता आहे.

♦️ इतिहास -

मागील संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पाहता असे लक्षात येते की नेहमीच त्रास देणाऱ्या इतिहास या विषयाने विद्यार्थी मित्रांना भरपूर मदत केलेली आहे. 15 पैकी 14 गुण मिळवणारे बरेच विद्यार्थी मी स्वतः पाहिलेले आहेत त्यामुळे यंदा इतिहासामध्ये, जर पेपरचा दर्जा मागील प्रमाणेच राहिला तर, किमान 12 गुण मिळवणे अनिवार्य राहणार आहे. इतिहासाचे तयारी करण्यासाठी कोणतेही एकच आपण वापरू शकता. इतिहासामध्ये ज्ञान मिळवणे मर्यादीत असल्याने लॉजिक डेव्हलपमेंट आणि एलिमिनेशन टेक्निक्स खूप काम करतात.त्याबाबत आपण आवर्जून विचार करावा

♦️भूगोल-

बाबतीत,15 पैकी किमान 10 गुण मिळाले तर आपण पूर्व परीक्षा सहजासहजी पास होऊ शकतो.भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी सौदी सर किंवा खातीब सर किंवा दीपस्तंभ प्रकाशन यांचे पैकी कोणतेही एक महाराष्ट्राच्या भूगोल साठी वापरावे आणि भारताच्या भूगोलासाठी सौदी सरांचे पुस्तक वापरावे.

♦️पॉलिटी-

या विषयांमध्ये पूर्वी 10 पैकी 10 गुण मिळतात मात्र अभ्यासक्रमाचा आवाका व त्या तुलनेमध्ये कमी गुणांचा भारांक आणि आयोगाची प्रश्न विचारण्याची वाढत असलेली खोली पाहता सध्या आपणास 10 पैकी 7 ते 8 गुण मिळवणे आवश्यक असते. लक्ष्मीकांत सरांचे अथवा  कोळंबे सरांचे पुस्तक आपण यासाठी वापरू शकतो तसेच पंचायत राज या घटकावर येणाऱ्या 2 ते 3 प्रश्नांसाठी किशोर लवटे सरांचे पंचायत राज हे पुस्तक उपयुक्त ठरते. त्याचे वारंवार वाचन केले पाहिजे. शॉर्ट नोट्स बनवल्या पाहिजेत व त्याची वारंवार उजळणी झाली पाहिजे तरच प्रचंड डेटा आपल्या लक्षात राहू शकतो.

♦️अर्थशास्त्र-

येणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी सध्या कमी होत आहे म्हणजेच केवळ सर्वसामान्य अभ्यासावर आपण 15 पैकी 10 ते 12 गुण मिळवू शकतो. यासाठी देसले सर किंवा कोळंबे सर पैकी कोणतेही एक पुस्तक वाचण्यास पुरेसे ठरते. अर्थशास्त्राचे आयोगाचे मागील काही वर्षांचे प्रश्न पाहिल्यास आयोग कोणत्या घटकांवर किती आणि कसे प्रश्न विचारतो हे लक्षात येऊ शकते त्यामुळे पूर्वीच्या प्रश्नांना बिलकुल दुर्लक्षित करू नये.

♦️विज्ञान -

हा घटक सर्वसामान्यपणे सर्वच जनतेला किचकट वाटणारा विषय आहे तसेच प्रश्नांचा दर्जा मध्ये आयोगाने सातत्य राखलेले नाही. त्यामुळे कधी अभ्यास करून कमी मार्क तर कधी अभ्यास न करता ही सरासरी मार्क मिळतात मात्र तरीही स्टेट बोर्ड इयत्ता 7 ते 10 वी च्या पुस्तकांवर आपली कमांड असायला हवी किंवा सचिन भस्के सरांच्या पुस्तकाच्या किमान 3 ते 4 उजळण्या व्हायला हव्यात. लक्षात ठेवा की जर विज्ञान विषय अवघड आला तर तो सर्वांसाठी अवघड असेल आणि सोपा ला करतो सर्वांसाठीच सोपा असेल त्यामुळे या विषयावर ती मेरीट ठरण्याची शक्यता फार कमी असते.

♦️चालू घडामोडी-

हा पूर्व परीक्षांमधील सर्वांत अनिश्चित विषय मला वाटतो.यासाठी आयोग नक्की कोणता source वापरतो हे निश्चित समजत नाही. मात्र असे असले तरीही 15 पैकी 8 प्रश्न प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्याने सुटू शकतात. परिक्रमा हे मासिक किंवा अभिनव अथवा सिंपलिफाईड प्रकाशनाचे वार्षिकी यातून बऱ्याच अंशी घटना कव्हर होतात. त्या पुस्तकांच्या 2 ते 3 उजळण्या केल्यास किमान 7 ते 8 गुण पडण्यास हरकत नाही.

♦️गणित बुद्धिमत्ता -

हा विषय पूर्व परीक्षांमधील मार्क देणारा विषय म्हणून ओळखला जातो मात्र काही विद्यार्थ्यांना हा विषय की  किचकट जातो मात्र दररोज सराव केल्यास या विषयाची भीती मनातून निघू शकते. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका पहा व आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत यावरून बाजारात सापडणारे कोणतेही एक पुस्तक घेऊन त्यातून दररोज दोन ते अडीच तास सराव अपेक्षित आहे.

♦️अशाप्रकारे एकंदरीत आपण 60 गुणांची गोळाबेरीज परीक्षेपूर्वी जमा केली आणि त्यानुसार विषयांना वेळ वाटून दिला आणि उजळणी केली तर निश्‍चितपणे आपण संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 60 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतो. जितके जास्त गुण असतील तितकी पूर्व परीक्षा पास होण्याची खात्री अधिक असेल व त्यामुळे पूर्व परीक्षेचा निकाल पर्यंतचा वेळ वाट पाहण्यात जाणार नाही.
त्यामुळे वरील प्रमाणे अभ्यास करून अथवा आपल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करून 60 प्लस गुण मिळवणे आवश्यक ठरते.

❇️ तुमच्या अभ्यासासाठी अनेक अनेक शुभेच्छा.

👉The Achievers Mentorship.

Combine पूर्व ची घोडदौड...

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

✳️ आज आपण कम्बाईन पूर्व परीक्षेसंदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

✳️ प्रत्येकाच्या अभ्यासानुसार प्रत्येकाचे स्ट्रॉंगपॉईंट आणि विक पॉईन्ट असतात.
त्यानुसार आपण कुठल्या विषयांमध्ये स्ट्रॉंग आहोत किंवा कुठल्या विषयांमध्ये विक आहोत हे ओळखून आपले स्वतःचे रणनीती असली पाहिजे.
कारण जेव्हा तुम्ही स्वतः नियोजन करताना ते नक्कीच यशस्वी होण्याचे मार्ग असतात.
बस झाले आता सल्ले, बस झाले आता व्हिडिओ पाहून, बस झाले आता फुकटचे सल्ले घेऊन, जरा स्वतःचे डोकं वापरा.
  स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर निश्चितच मार्क्स येणार.
जो प्रामाणिकपणे करणार नाही त्याचं पुढं काय होतं हे सर्वांनाच ठाऊक आहे.

✳️ त्यामुळे तुम्ही तुमचे स्वतःचे नियोजन करा.
माझ्या माहितीप्रमाणे,
पुढील विषय मार्क मिळवून देणारे आहेत
जसे की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आणि विज्ञान.
इतिहासाविषयी पण आपण बोलणार आहोत
आणि शेवटचा उरतो करंट अफेयर्स आणि  गणित आणि बुद्धिमत्ता.

1. राज्यशास्त्र-

राज्यशास्त्र असा विषय, की सर्वजण म्हणतात यामध्ये खूप मार्क मिळतात खूप सोपा आहे
पण मित्रांनो यामध्ये खुप काही गोष्टी फॅक्च्युअल प्लस कन्सेप्ट तुमच्या जोपर्यंत क्लियर होत नाहीत तोपर्यंत मार्क येत नाहीत.
राज्यशास्त्र च्या बाबतीत लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक एक संजीवनी ठरते.
एवढं मोठं पुस्तक पाहून बर्‍याच जणांना घाम फुटतो.
मग काही जणांना अडचण वाटते
त्यांच्यासाठी रंजन कोळंबे सरांचे हे पुस्तक आहे.
यामध्ये खूप पाठांतराचा भाग असल्यामुळे
कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस खूप असतात
उदाहरणार्थ आणीबाणीला घ्या
राष्ट्रपती च्या ऐवजी संसद किंवा संसदेच्या ऐवजी राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या ऐवजी राज्यपाल अशी शाब्दिक गफलत केली जाते.
ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे
जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित कराल
निश्चितच मार्क मध्ये वाढ होईल.

2.भूगोल-

कम्बाईन पूर्व साठी साधारणता महाराष्ट्राच्या भूगोल वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात.
हा एक सोपा विषय आणि तुलनेने सर्वात जास्त म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय असं बघून आपण पाहिलं पाहिजे.
स्टेट बोर्डाची पुस्तके पाचवी ते बारावी पर्यंत
आणि सोबत सौदी सरांचे किंवा कुठंलेही एक पुस्तक व्यवस्थित पाठ केले पाहिजेत.
ह्या गोष्टी जरी व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे 15 पैकी तुम्हाला तेरा ते 11-12 मार्क पडू शकतात.

3.अर्थशास्त्र-

यासंदर्भात देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचे कुठले एक पुस्तक व्यवस्थित रित्या करणे गरजेचे आहे.
अर्थशास्त्राच्या संदर्भात अनिकेत सरांनी मागील एक पोस्ट शेअर केली होती
ती पुन्हा चाळी तर निश्चितच फायदा होईल.

4.विज्ञान-

इथं score करायला बऱ्याच लोकांना जड जाते.
साधारणता सायन्स बॅकग्राऊंड विद्यार्थी यामध्ये लीड घेऊ शकता, पण बाकीच्यांनी पण घाबरायचं कारण नाही.
कारण विज्ञाना मधले काही ठराविक टॉपिक केले तर निश्चित मार्का मध्ये वाढ होऊ शकते.
जसे की प्राण्यांचे वर्गीकरण etc..
बायलॉजी या विषयावर एक साधारणत जास्तीत जास्त प्रश्नांचा कल दिसतो.
तुलनेने फिजिक्स आणि केमिस्ट्री यावर कमी प्रश्न असतात.
त्या पद्धतीने तुमचं नियोजन असायला हवं.
इथं प्रश्न solving वर जास्त काम करा..

5. इतिहास-

सध्याचा ट्रेंड पाहता इतिहासावर तुलनेने सोपे प्रश्न विचारले जात आहेत.
पण याचा अर्थ असा नव्हे की इतिहास सोपा आहे.
तुम्हांला ठराविक टॉपिक व्यवस्थित रित्या करावे लागतात तर आणि तरच त्यामध्ये मार्गामध्ये वाढ होऊ शकते. अन्यथा सोपे प्रश्नांमध्ये पण तुमची गफलत होऊ शकते.
इतिहासाच्या संदर्भात राम सरांनी एक पीडीएफ शेअर केलेली आहे की कठारे सरांचे पुस्तक कशा संदर्भात कशा पद्धतीने वाचावे.
त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चित इतिहासामध्ये मार्क मिळू शकतात.

6. चालू घडामोडी-

यासंदर्भात एक वार्षीकी पुस्तक किंवा मग परिक्रमा.
वारंवार रिव्हिजन करणे.
आणि पाठांतर करणे.
कारण चालू घडामोडी हा असा विषय आहे
दोन ते तीन वेळा रिविजन केल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो.

अश्या रीतीने प्रत्येक विषयावर startegy आखली तर नक्कीच तुम्ही 60+ मार्क्स घेऊ शकतात..

सर्वाना शुभेच्छा.!

राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या.

💥संयुक्त पूर्व फोकस (Combine Focus)

▪️371 :-  महाराष्ट्र
👉 विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे.

▪️371 :- गुजरात
👉 सौराष्ट्र व कच्छसाठी स्वंतत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.

▪️371(A) :- नागालँड
   13 (घटनादुरुस्ती ) 1962
👉 नागाहिल्स व ट्युएनसांग प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी करणे.

▪️371(B) :- आसाम
(22(घटनादुरुस्ती) 1969 हे कलम समाविष्ठ).
👉 आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.

▪️371(B) :- :-मणिपूर
(27 (घटनादुरुस्ती) 1971 ने समाविष्ठ)
👉 राज्यातील डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.

▪️371(F) :-  सिक्कीम
(36 घटनादुरुस्ती) 1975 ने समाविष्ठ)
👉  शांतता व जनतेच्या विविध गटांच्या सामाजिक आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी.

▪️371(H) :-अरुणाचल प्रदेश
(55(घटनादुरुस्ती) 1986 ने समाविष्ट)
👉 राज्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी.

▪️371(D) &(E) :- आंध्रप्रदेश व तेलंगणासाठी विशेष तरतुदी

▪️371(G) :- मिझोरमसाठी
👉 (53 घटनादुरुस्ती 1986 ने समाविष्ठ)

▪️371(I) :-गोव्यासाठी विशेष तरतुदी
👉 (56 घटनादुरुस्ती 1987 ने समाविष्ठ)

▪️371(j) :-कर्नाटक - हैद्राबाद प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.
👉 (98 घटनादुरुस्ती 2012 ने समाविष्ट.

🔵 ट्रिक - NAMA ने SIMI चे नाव  ARUNA व GOKARNA ठेवले😄
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
N- Nagaland( 371-A)
A- Assam( 371-B)
M - Manipur(371-C)
A  - Andhra Pradesh  ( 371-D, (E)
SI-Sikkim( 371-F)
MI- Mizoram (371-G)
ARUNA - Arunachal Pradesh( 371-H)
GO- Goa (371-I)
KARNA- Karnataka (371-J)

एमपीएससी  मंत्र : दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा – अर्थशास्त्र

मागील लेखामध्ये दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये अर्थव्यवस्था या घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित करण्यात आला आहे.

अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.

ब) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.

या उपघटकांची तयारी करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते पाहू.

*  राष्ट्रीय उत्पन्न, परकीय व्यापार, मुद्रा, बँकिंग आणि राजकोषीय नीती.

*  राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी), सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीएनपी) यातील फरक समजून घेणे व त्याबाबतची अद्ययावत आकडेवारी माहीत असणे आवश्यक आहे.

*  भारताच्या परकीय व्यापारातील महत्त्वाचे भागीदार देश, सर्वात जास्त आयात / निर्यात होणारे देश किंवा संघटना, आयातीमधील व निर्यातीमधील सर्वाधिक मूल्य / वाटा असणाऱ्या वस्तू या बाबी सारणी पद्धतीत मांडून त्याचा अभ्यास करता येईल. यातील महत्त्वाच्या बाबींची मागील वर्षांच्या आकडेवारीशी तुलना करता आल्यास उत्तम.

*  चलनविषयक मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्या आधारे रिझव्‍‌र्ह बँक, तिचे अधिकार, कार्ये, विविध दर यांचा आढावा घ्यावा.

*  बँकिंगविषयक विविध व्याजदर, बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी यांचा आढावा घ्यायला हवा.

*  राजकोषविषयक संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. राजकोषीय तूट, आधिक्य, त्यांचा अर्थ, कारणे, परिणाम या बाबी परीक्षेत विचारल्या जात नाहीत पण त्या समजून घेतल्याशिवाय आत्मविश्वासाने पेपर सोडविणे सोपे होणार नाही.

*  शेती, उद्योग

*  शेती क्षेत्र याचा अर्थ प्राथमिक क्षेत्र असा घेऊन अभ्यास करायचा आहे. कृषी, पशुपालन, मत्स्यव्यवसाय या सर्व बाबींचा समावेश अभ्यासामध्ये करायला हवा.

* या क्षेत्रातील वृद्धीचे ट्रेंड, कमी उत्पादकतेची कारणे, उत्पादनास चालना देणाऱ्या विविध योजना यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.

* आर्थिक विकासामध्ये आर्थिक पाहणी अहवाल, अर्थसंकल्प, विविध आर्थिक निर्देशांक व अहवाल, पायाभूत सुविधा व इतर अर्थविषयक योजना आणि असल्यास नवे कायदे वा तरतुदी यांचा समावेश होतो. या सर्व बाबी चालू घडामोडींचाच एक भाग आहेत.

*  महत्त्वाचे उद्योग व त्यांच्यासाठी प्रसिद्ध शहरे / क्षेत्रे, महारत्न, नवरत्न, मिनीरत्न कंपन्या, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण धोरण, खासगी उद्योगांचे प्रकार, उद्योग क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीच्या मर्यादा यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

*  प्राथमिक व उद्योग क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा, आयात व निर्यातीमधील वाटा माहीत असायला हवा.

*  दारिद्रय़ व बेरोजगारी

*  दारिद्रय़ अभ्यासासाठी नेमलेल्या समित्यांच्या अहवालातील मुख्य शिफारशी माहीत असायला हव्यात.

* रोजगारविषयक संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. रोजगारविषयक निर्देशांक व ठळक अद्ययावत आकडेवारी नेमकेपणाने माहीत असायला हवी.

*    राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेची दारिद्रय़विषयक अहवाल व आकडेवारी अद्ययावत करून घ्यावी.

* पंचवार्षिक तसेच इतर योजनांत दारिद्रय़ निर्मूलनासाठी राबवलेले कार्यक्रम त्याची उद्दिष्टय़े आणि परिणाम यांचा आढावा घ्यावा.

* रोजगारनिर्मितीसाठीच्या तसेच स्वयंरोजगाराबाबतच्या महत्त्वाच्या योजना व त्यातील तरतुदी माहीत करून घ्याव्यात.

* कौशल्य विकासासाठीच्या योजना व त्यातील तरतुदी माहीत करून घ्याव्यात.

* अशा योजनांमधील तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, उद्दिष्टे यांचा अभ्यास आवश्यक आहे.

* लोकसंख्या अभ्यास

* सन २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीमधून एकूण लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, नागरी व ग्रामीण लोकसंख्या, नागरीकरण अशा घटकांची सारणी पद्धतीत मांडणी करून त्याची टिप्पणे काढून अभ्यास करणे सोपे व व्यवहार्य ठरेल.

* वरील सर्व मुद्दय़ांची सन २०११ व सन २००१मधील आकडेवारी / माहितीशी तुलना करणारी सारणी तयार करता आल्यास तोही उपयुक्त ठरेल.

* राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, धोरणाची उद्दिष्टय़े, दीर्घकालीन आणि अल्पकालीन ध्येय. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग – रचना, उद्दिष्टय़े, कार्यपद्धती हे घटक वस्तुनिष्ठ तयारीमध्ये समाविष्ट करावेत.

* जन्मदर, मृत्यूदर, जननदर, जन्मावेळचे आरोग्यमान यांबाबत ठळक बाबी व आकडेवारीचा आढावा घ्यावा.

*  शासकीय अर्थव्यवस्था

* अर्थसंकल्प मुद्दय़ामध्ये याबाबतची कायदेशीर प्रक्रिया, अर्थसंकल्पातील तूट/आधिक्य व त्याचे परिणाम, यातील संकल्पना समजून घ्यायला हव्यात. त्या त्या वर्षांतील अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी, योजना यांचा अभ्यास गरजेचा आहे.

* महसुली उत्पन्न, करांचे प्रकार व त्यांचा एकूण महसुलातील वाटा माहीत असायला हवेत.

* लेखा व लेखापरीक्षण याबाबत भारताचे नियंत्रक व लेखापरीक्षक यांचे अधिकार व कार्ये समजून घ्यावीत.

* अनुषांगिक तयारी

* व्यापार सुलभता/ दारिद्रय़/ भूक/ लिंगभाव असमानता/ मानव विकास हे जागतिक निर्देशांक व त्यातील भारताची कामगिरी याचा आढावा घ्यायला हवा. याबाबत विशिष्ट उल्लेखनीय मुद्दे माहीत असावेत.

* पंचवार्षिक योजनांमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आखलेल्या धोरणांचा थोडक्यात आढावा घ्यावा व त्याचे यशापयश लक्षात घ्यावे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...