०९ मार्च २०२३

आजचे प्रश्नसंच

 गुजरात या राज्याचे क्षेत्रफळ कोणत्या देशाच्या क्षेत्रफळाइतके आहे. ?

⚪️ रमनिया 

⚪️ ओमान 

⚫️ सेनेगल ☑️

⚪️ य. के 



 भारतातील पहिले ई-कोर्ट सुरु करण्याचा मान ......या शहराला मिळाला आहे. ?

⚪️ पणे 

⚫️ नागपूर ☑️

⚪️ औरंगाबाद 

⚪️ नाशिक 



 कोणत्या नदीमुळे कोकणाचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे भाग पडले आहेत.  ?

⚪️ आबा नदी 

⚫️ कुंडलिक नदी ☑️

⚪️ यमुना नदी 

⚪️ पातळगंगा नदी 



 जम्मू काश्मीर ची राजधानी श्रीनगर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे. ?

⚪️ चिनाब नदी 

⚪️ वयास नदी 

⚪️ रावी नदी 

⚫️ *झेलम नदी ☑️



 विडी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले तिरोडा व सालेकसा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. ?

⚪️ चद्रपूर 

⚪️ नागपूर 

⚫️ गोंदिया ☑️

⚪️ भडारा 



 भारताच्या संचित निधीतून देयके देण्यासाठी ....द्वारे अधिकृत केले जाते .?

⚪️ वित्त विधेयक

⚫️ विनियोजना अधिनियम ☑️

⚪️ वित्तिय अधिनियम 

⚪️ सचित निधी अधिनियम 



 अनुसुचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यासाठी गुणांची अट मर्यादित प्रमाणात शिथिल करण्याबाबत ची तरतुद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलेले आहे. ?

⚫️ कलम 335 ☑️

⚪️ कलम 17

⚪️ कलम 340

⚪️ कलम 338



 खालीलपैकी कोण पंतप्रधानांचे डोळे व कान आहेत असे श्री एस. एस. खेरा यांनी म्हटले आहे. ?

⚪️ मत्रिमंडळ 

⚫️ मंत्रिमंडळ सचिवालय ☑️

⚪️ लोकसभा राज्यसभा 

⚪️ वरील सर्व 



 भारतीय राज्य घटनेमध्ये केंग हा सर्वात महत्वाचा अधिकारी आहे, असे कोणी म्हटले आहे. ?

⚪️ जवाहरलाल नेहरु 

⚪️ क. एम. मुंशी 

⚪️ क मेनन 

⚫️ डाँ. आंबेडकर ☑️



 भगतसिंह कोषारी हे हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री होते. ?

⚫️ चूक ☑️

⚪️ बरोबर 

⚪️ तटस्थ 

⚪️ यापैकी नाही

पहिली पंचवार्षिक योजना (First Panchwarshik Scheme)



कालावधी : 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956.

मुख्य भर : या योजनेचा भर कृषि क्षेत्रावर होता.

प्रतिमान : हेरोल्ड-डोमर चे प्रतिमान या योजनेत वापरण्यात आले.

योजनेचे उपनाव : पुंनरुस्थान योजना.

अपेक्षा वृद्धी दर : 2.1%.

प्रत्यक्षा वृद्धी दर : 3.6%.



प्रकल्प :


दामोदर खोरे विकास प्रकल्प (झारखंड-प.बंगाल, दामोदर नदीच्या खोर्यात)

भाक्रा-नानगल प्रकल्प (हिमाचल प्रदेश–पंजाब, सतलज नदी)

कोसी प्रकल्प (बिहार, कोसी नदीवर)

हिराकुड योजन(ओरिसा, महानदी)


कारखाने :


सिंद्री (झारखंड) खत कारखाना

चित्तरंजन (प.बंगाल) रेल्वे इंजिन कारखाना

पेरांबूर (तमिळनाडू) रेल्वे डब्यांचा कारखाना

HMT(बंगलोर)

हिंदुस्तान (पिंपरी,पुणे)


मूल्यमापन :


योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली कारण, योजनेचा कालावधी मान्सूनला अनुकूल होता, योजनेची लक्षे कमी होती.

अन्नधान्याचे उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरून 65.8 दशलक्ष टनापर्यंत वाढले.

मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जेचा पायाभूत सोयींना सुरवात.

राष्ट्रीय उत्पन्न 18% नी तर दरडोई उत्पन्न 11% नी वाढले.



विशेष घटनाक्रम :


8 मे, 1952 पासून ओधोगिक विकास व नियमन अधिवेशन 1951 लागू करण्यात आला.

2 ओक्टोंबर, 1952 रोजी सामुदायिक विकास कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.

हातमाग उधोगाचा विकास करण्यासाठी 1952 मध्ये अखिल भारतील हातमाग बोर्डची स्थापना करण्यात आली .

1955 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीच्या शिफारसीनुसार (गोरवाल समिती) एम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले.

जानेवारी 1955 मध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (ICICI) स्थापन करण्यात आले, ज्याने मार्च 1955 मध्ये आपले कार्य सुरू केले.


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

अग्रणी बँक योजना



14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली. 


*शिफारस -*


डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली. 


*सुरुवात -*


1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. 


*योजना -*


देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली. 


*कार्ये -*


जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -


जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलत समित्या (Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -

 जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.

 जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.

 अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.

 जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.

 भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला. 


*महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)*


स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना. 


*सध्यस्थिती -*


सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत.     फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती. 


*उषा थोरात समिती -*


भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.

राज्ये व राजधान्या


🔲 अरुणाचल प्रदेश - इटानगर


🔲 आध्रप्रदेश - अमरावती (नवीन), हैदराबाद (जुनी राजधानी)


🔲 आसाम - दिसपूर


🔲 उत्तर प्रदेश - लखनऊ


🔲 उत्तराखंड - देहराडून


🔲 ओरिसा - भुवनेश्वर


🔲 कर्नाटक - बंगलोर


🔲 करळ - तिरूवनंतपुरम


🔲 गजरात - गांधीनगर


🔲 गोवा - पणजी


🔲 छत्तीसगड - अटल नगर (नया रायपूर)


🔲 झारखंड - रांची


🔲 तामिळनाडू - चेन्नई


🔲 तलंगणा - हैदराबाद


🔲 तरिपुरा - अागरताळा


🔲 नागालॅंड - कोहिमा


🔲 पजाब - चंदीगड


🔲 पश्चिम बंगाल - कलकत्ता


🔲 बिहार - पटणा


🔲 मणिपूर - इंफाळ


🔲 मध्यप्रदेश - भोपाळ


🔲 महाराष्ट्र - मुंबई


🔲 मिझोराम - ऐझाॅल


🔲 मघालय - शिलॉंग


🔲 राजस्थान - जयपूर


🔲 सिक्कीम - गंगटोक


🔲 हरियाणा - चंडीगड


🔲 हिमाचल प्रदेश - सिमला


🛑 कद्रशासित प्रदेश आणि राजधानी 🛑

1. अंदमान-निकोबार - पोर्ट ब्लेअर

2. चंदीगड - चंदीगड

3. दमण आणि दीव - दमण दादरा व नगर हवेली - सिल्व्हासा

4. दिल्ली - नवी दिल्ली

5. पुदूचेरी - पुदूचेरी

6. लक्षद्वीप - कवारत्ती

7. जम्मू काश्मीर -श्रीनगर व जम्मू

8. लडाख - लेह


(दीव - दमण व दादरा नगर हवेली या 2 केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. 26 जानेवारी 2020)

लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?



देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमेदवार का निवडून देतो? याबाबतचे गणित आज जाणून घेऊयात... 


सध्या लोकसभेच्या 543 जागा (मतदारसंघ) आहेत. त्यापैकी 79 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी (एससी) आणि 41 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव आहेत. जनतेमार्फत निवडून येणाऱ्या 543 सदस्यांमध्ये घटक राज्यांच्या कमाल मर्यादेनुसार 530 खासदार निवडून येतात. 


तर केंद्रशासित प्रदेशांतून (दिल्ली 7, अंदमान-निकोबार 1, चंदीगड 1, दादरा व नगर हवेली 1, दमण व दीव 1, लक्षद्वीप 1, आणि पुदुचेरी 1) एकूण 13 सदस्य निवडून येतात. म्हणजेच, अद्याप केंद्रशासित प्रदेशांतील 7 जागा रिक्त आहेत. तशी गरज भासल्यास संसदेला या जागांमध्ये वाढ करता येईल.


▪️कमाल मर्यादा 550


भारतीय राज्यघटनेत कलम 81 नुसार लोकसभा सदस्यांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील घटक राज्यांतील खासदारांची संख्या हि 530 पेक्षा अधिक व केंद्रशासित प्रदेशांतील खासदारांची संख्या 20 पेक्षा अधिक असता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 


देशातील प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडून खासदारांची कमाल मर्यादा हि 550 इतकी आहे. शिवाय, अँग्लो इंडियन समाजातील दोन सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी तरतूद असल्याने लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा हि 552 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

विधानपरिषद



विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती:


घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सात घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश,जम्मू काश्मीर आणि कर्नाटक , तेलंगणा , आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.


विधानपरिषदेची रचना :

1956 च्या 7 व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी आणि 40 पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात 78 इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. 171/2 नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात त्यांची रचना पुढीलप्रमाणे आहे.


विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी :

1. 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.


2. 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.


3. 1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.


4. 1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.


5. 1/6 राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.


सदस्यांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


सदस्यांचा कार्यकाल : 

सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष इतका असतो.


विधानपरिषदेचा कार्यकाल :

विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.


गणसंख्या : 1/10

अधिवेशन : 

दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


सभापती व उपसभापती :

विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे



Ques. भारतातील निवडणूका लोकशाही पद्धतीने होतात, हे देर्शविणारे वाक्ये खाली दिली आहेत. त्यापैकी अयोग्य वाक्ये ओळखा.


A. जगातील सर्वाधिक मतदार भारतात आहे✅📚

B. भारतात निर्वाचन आयोग खूप शक्तिशाली आहे

C. भारतात 18 वर्षांपेक्षा अधिक वयाची प्रत्येक व्यक्ती मतदाता आहे.

D. भारतात निवडणूकीत पराभाव
 झालेली पार्टी जनादेश स्वीकार करणे

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. भारतीय दंड संहितेमधील कोणते कलम बलात्कार या गुन्ह्याबाबत वापरले जाते ?

A. कलम 180
B. कलम 376✅📚
C. कलम 476
D. कलम 576

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. कमाल जमीन धारणा कायद्याचे उद्दिष्ठ कोणते ?

अ. मोजक्या हातात जमीन संकलित होण्यास प्रतिबंध करणे.

ब. अतिरिक्त जमिनीवर भूमिहीन शेतमजुरांचे पुनर्वसन करणे.

क. सामाजिक न्याय प्रस्तापित करणे.


A. अ आणि ब
B. अ आणि क
C. ब आणि क
D. वरील सर्व✅📚

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. न्यायपालिकेच्या बाबतीत कोणते विधान चुकीचे आहे-

A. . संसदेद्वारे पारित प्रत्येक कायद्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजूरी लागते.✅📚
B. जर एखादा कायदा राज्यघटनेच्या विरूध्द असेल तर न्यायपालिका तो रद्द करू शकतो.
C. न्यायपालिका कार्यकारी मंडळापेक्षा स्वतंत्र असते.
D. जर एखाद्या नागरिकाच्या

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार काही खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित केले जातात ?

A. कलम 139 ब
B. कलम 139 क
C. कलम 139 अ✅📚
D. कलम 138

📚💐📚💐📚💐📚💐📚

Ques. खालीलपैकी कोणत्या खटल्यांचा भारतीय संविधानात दिलेल्या मुलभूत हक्क प्रकरणाशी संबंधीत नाही ?

A. केशवानंद वि. केरळ राज्य
B. गोलकनाथ वि. पंजाब राज्य
C. मोहिरीबिबी वी. धरमदास घोष✅📚
D. शंकरीप्रसाद खटाला

📚💐📚💐📚💐📚💐📚

Ques. आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये लोकशाही व्यवस्थेची गरज आहे , कारण.................

A. विकसित राष्ट्रांच्या शब्दाला जास्त किमत प्राप्त होईल
B. विभिन्न राष्ट्रांच्या समस्यांचे निराकरण त्यांच्या सैन्य बळाकडे बघुन केले जावे
C. राष्ट्रांना त्यांच्या लोकसंख्येचा प्रमाणात सुविधा मिळाव्यात
D. जगातील सर्व राष्ट्रांशी समान व्यवहार व्हावे✅📚

📚💐📚💐📚💐📚💐📚

Ques. UPSC द्वारे घेतल्या जाणार्या स्पर्धा परीक्षांसंबंधी सुधारण्यासाठी डॉ. अरूण निगवेकर समितीने कोणत्या शिफारसी केल्या आहेत ?

 1.उमेदवारांकडे गतिमान प्रशासनासाठीचे कौशल्य असावे.

2.समाज व सरकार यामधील दुवा बनवण्याची क्षमता.

3. परीक्षांच्या (प्रक्रिया) कालावधी 6 महिन्यां पर्यंत कमी करावा.

4. विषय ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान असावे.

A. फक्त अ, क आणि ड
B. फक्त ब, क आणि ड
C. फक्त अ, ब आणि ड✅📚
D. वरील सर्व

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. 11 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे झालेल्या घटनासमितीच्या बैठकीत खालीलपैकी कोणाची संविधान समितीच्या कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली ?

A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. डॉ. बाबासाहेब आंबे़डकर
C. वल्लभभाई पटेल
D. ए.सी. मुखर्जी✅📚

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. घटना समितीच्या झेंडा समितीच्या अध्यक्ष कोण होते ?

A. पंडित नेहरू
B. जे.बी.क्रपलनी✅📚
C. डॉ.राजेंद्रप्रसाद
D. वल्लभभाई पटेल


📚💐📚💐📚💐📚💐📚💐

 रत्नागिरी जिल्ह्यातील मुम्बई गोवा महामार्गावरील चिपळूण हे शह र कोणत्या नदीकाठी वसलेले आहे

Ans:- वाशिष्ठी

देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना


•देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड


•देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा


•देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत


•देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश


•देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू


•देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर


•देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश


•देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)


•देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल


•देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश


•देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान


•देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)


•देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा


•देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)


•देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र


•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली


•देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)


•देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)


•देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली


•देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)


•देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड


•देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर


•देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश


•देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी


•देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)


•देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी


•देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र


•देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर


•देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर


•देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई


•देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात


•देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)


•देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे


•देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश


•देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर


•देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र


•देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र


•देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई


•देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)


•देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली


•देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे


•देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक


•देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)


•देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश


•देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर


•देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे


•देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम


•देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे


•देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा

परीक्षेसाठी महत्वाचे



◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक


◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच


◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक


◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच


◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच


◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती


◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी


◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO


◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष


◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी


◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 


◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी


◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त


◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर


◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त


इतिहास प्रश्नसंच

 १)  आग्रा शहराचे संस्थापक कोण होते ?

    १) मोहम्मद तुघलक 

    २) अल्लादिन खिल्जी 

    ३) सिकंदर लोधी 📚📚

    ४) इब्राहिम लोधी




२) 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण होते ? 

        १) अशोक कोठारी 

        २) अशोक मेहता 📚📚

        ३) डॉ. एस. एन.सेन 

        ४)  वी.डी सावरकर




३) केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती ?

      १) शिवराम   

      २) नारायण गुरु📚📚

      ३) राजगुरू 

      ४)  पेरियार




४) होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली ?

          १) दक्षिण आफ्रिका

          २) आयर्लंड📚📚

          ३) नेदरलँड

          ४) भारत




५) महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी 'सत्याग्रह' केला.........?     

         १) असहकार चळवळीच्या वेळी  📚📚

         २)  जालियनवाला बाग हत्याकांडा वेळी 

         ३) रौलेट ॲक्ट विरोधात 

         ४) खिरापत चळवळीच्या वेळी




६) चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा .......... शी संबंधित होता.

          १) ऊस 

          २) नीळ 📚📚

          ३) कापूस

          ४) भात




७) खालील पैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण? 

           १) महात्मा गांधी 

           २) लोकमान्य टिळक

           ३) चित्तरंजन दास📚📚

           ४) न्यायमूर्ती रानडे





८) खालील पैकी कोणत्या कायद्याने मुस्लीमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ? 

            १) १८१३

            २) १९०९📚📚

            ३) १९१९

            ४) १९३५




९) भारतातील कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा मोठ्या प्रमाणावर  प्रभाव पडला ? 

            १) अमेरिकन क्रांती

            २) फ्रेंच क्रांती 

            ३) रशियन क्रांती📚📚

            ४) यापैकी नाही




१०) कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ? 

              १) कायमधारा 

              २) जमीनदारी 

              ३) रयतवारी 📚📚

              ४) मिरासदारी


अकबराचे साम्राज्य



अकबरने राज्यावर आले  की ठरवले की शेरशाह सुरीच्या, ज्याने हुमायूॅला दिल्लीतून हाकलुन देउन दिल्लीचे तख्त काबीज केले होते, वंशाचा नायनाट करायचा.


 शेरशाहची तीन मुले वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र राज्ये चालवित होती. अकबरने त्यातील सगळ्या बलाढ्य अशा सिकंदरशाह सुरी वर चाल केली. दिल्लीची सल्तनत तर्दी बेग खानच्या हातात सोपवून अकबर स्वतः पंजाबकडे चालून गेला.


सिकंदरशाहने अकबरचा सामना न करता त्याला हुलकावण्या देणे पसंत केले. 


अकबर त्याचा पाठलाग करीत असताना दिल्लीवर सिकंदरशाहचा भाऊ आदिलशाह सुरीच्या हेमचंद्र विक्रमादित्य नावाच्या हिंदू सेनापतीने चाल केली. तर्दी खानने दिल्लीची तटबंदी केलेली नव्हती व हेमूचा हल्ला होताच तो शहर सोडून पळून गेला.


 हेमूने दिल्ली जिंकल्यावर आदिलशाहची सत्ता झुगारून दिली व स्वतःला राजा विक्रमादित्य या नावाने राज्याभिषेक करून घेतला. अशा प्रकारे हेमू दिल्लीवर राज्य करणारा शेवटचा हिंदू सम्राट झाला.


दिल्लीने अशाप्रकारे नांगी टाकल्याची खबर अकबरला मिळाल्यावर त्याच्या सल्लागारांनी त्याला आल्यावाटेने काबूलला पळ काढण्याचा सल्ला दिला.


 राजधानी गमावलेली असताना व सम्राट होउन अवघे काही महिने झालेले असताना राज्य परत मिळवण्याऐवजी काबूलमधील आपल्या नातेवाईकांचा आसरा घेणे जास्त हितावह असल्याचा तो सल्ला होता.


 अकबरच्या सेनानींपैकी एक बयराम खानने याचा विरोध केला व दिल्लीतून घूसखोरांना हाकलून देउन आपले राज्य परत घेण्यास अकबरला उद्युक्त केले.


 अकबरने आपले असलेले सगळे सैन्य घेउन दिल्लीवर चाल केली. दिल्लीतून पळालेला तर्दी बेग खान आता परत अकबरला येउन मिळाला व त्यानेही दिल्लीकडे न जाता परस्पर काबूलला जाण्याचा सल्ला दिला. 


काही काळानंतर बयरामखानने तर्दी बेग खानवर पळपुटेपणाचा आरोप ठेवून त्याला मृत्यूदंड दिला. अबुल फझल व जहांगीरच्या मते बयरामखानने हे निमित्त काढून आपल्या प्रतिस्पर्ध्याचा निकाल लावला.


०८ मार्च २०२३

स्त्री जन्माची कहाणी :- ज्ञानेश्वरी गजानन शेळके


मी "स्त्री" आणि ही माझी कहाणी, 

आता तुम्ही म्हणाल काय आहे हीची रडगाणी ..

रडगाणी नाही हो आयुष्य आहे माझं ,

स्त्री जन्माचं लपलं आहे त्यात राजं...


जन्म झाला तेव्हा बाबा म्हणाले "लक्ष्मी आली", 

चांगला सहवास आणि प्रेमाने मी "लाडात वाढली"... 

मोठी झाली तशी "मासिक पाळी" ची "समस्या" जाणवली, आई म्हणाली बाळा हीच तर देते मुलीला "एक ओळख वेगळी" ...


इच्छा होती माझी ही खूप सारं शिकायचं ,

पण; शिकून काय करणार शेवटी "परक्याचं धनंच" म्हणायचं ...

लोकांच्या "वाईट नजरा" नेहमी मला "छळायच्या", 

त्यांना माझ्यात "त्याची बहिणी" नाही का दिसायच्या?...


मुलगी आहे म्हणून नेहमी माझ्यावर "बंधने घातली", शेवटी लग्न होऊन मी माझ्या सासरी आली....

लग्नात माझ्या खूप सारा "हुंडा" दिला, 

तेव्हा वाटलं कोणी हा "मुलगी विकत घेण्याचा" "व्यवसाय" सुरू केला ?


लग्नानंतर झाला माझा खूप सारा "छळ" ,

पण ; "आई -वडिलांच नाव नाही गमवायचं" यातून सहन करण्याचा मिळालं बळ...

मी नाही हो कुठेही कमी ,

पण ;"स्त्री कमजोर हे ठरवलचं तुम्ही" ...


"नवजीवन निर्माण" करायचा एक गुण मला लाभला, म्हणूनच देवाने मला "स्त्रीचा जन्म" दिला...

देवाने घडवलय मला "थोडीशी वेगळी", 

पण; मीही आहे "एक तुमच्यातली"....


"मुलगी ,बहिण ,पत्नी ,आई" एवढीच ओळख नाहीये माझी ,

एक स्त्री म्हणून मला आहे माझी "एक वेगळी सुंदर अस्मिता" जागवायची... 


नाव: ज्ञानेश्वरी गजानन शेळके

पत्ता: द्वारकानगर, छ. संभाजीनगर

महाराष्ट्राचा इतिहास - मौर्य ते यादव



*(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)*


*👉 मौर्य साम्राज्याचा काळ*

महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.


*👉 सातवाहन साम्राज्याचा काळ*

सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.


*👉 वाकाटकांचा काळ*

वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.


*👉 कलाचुरींचा काळ*

वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.


*👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ*

वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.


*👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ*

वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.


*👉 यादवांचा काळ*

महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या

▪️371 :-  महाराष्ट्र

👉 विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे.


 ▪️371 :- गुजरात

👉 सौराष्ट्र व कच्छसाठी स्वंतत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.


 ▪️371(A) :- नागालँड 

   13 (घटनादुरुस्ती ) 1962

👉 नागाहिल्स व ट्युएनसांग प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी करणे.


▪️371(B) :- आसाम

(22(घटनादुरुस्ती) 1969 हे कलम समाविष्ठ).

👉 आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.


▪️371(B) :- :-मणिपूर

(27 (घटनादुरुस्ती) 1971 ने समाविष्ठ)

👉 राज्यातील डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.


▪️371(F) :-  सिक्कीम

(36 घटनादुरुस्ती) 1975 ने समाविष्ठ)

👉  शांतता व जनतेच्या विविध गटांच्या सामाजिक आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी.


▪️371(H) :-अरुणाचल प्रदेश

 (55(घटनादुरुस्ती) 1986 ने समाविष्ट)


👉 राज्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी.


▪️371(D) &(E) :- आंध्रप्रदेश व तेलंगणासाठी विशेष तरतुदी


▪️371(G) :- मिझोरमसाठी

👉 (53 घटनादुरुस्ती 1986 ने समाविष्ठ)


▪️371(I) :-गोव्यासाठी विशेष तरतुदी

👉 (56 घटनादुरुस्ती 1987 ने समाविष्ठ)


▪️371(j) :-कर्नाटक - हैद्राबाद प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.

 👉 (98 घटनादुरुस्ती 2012 ने समाविष्ट).


42वी घटनादुरुस्ती 1976: या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते

1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.

2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.

3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.

4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद

5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती

6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.

7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.

8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.

9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.

10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.

11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण

12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.

13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.

14) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले.
शिक्षण ,जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण , वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना.

15) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.

16) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद

८ वी पंचवार्षिक योजना

👉 कालावधी: इ.स. १९९२ - इ.स. १९९७

👉 पराधान्य : मनुष्यबळ विकास          👉 घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व 

👉 उत्पादकता' मॉडेल : Export-led Growth Model 

👉 खर्च : 

👉 परस्तावित खर्च- ४,३४,१२० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- ४,७४,११२ कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. राष्ट्रीय महिला कोष-१९९२-९३ 

👉 २. Employment Assurance Scheme (EAS) 

👉 ३. Prime Minister's Rozgar Yojana (PMRY) 

👉 ४. Mahila Samridhi Yojana 

👉 ५. Member of Parliament Local Area Development Scheme (MPLADS) 

👉 ६. NATIONAL SOCIAL ASSISTANCE PROGRAMME(NSAP) 

👉 ७. Mid-Day Meal Scheme 

👉 ८. Indira Mahila Yojana


👉 महत्वपूर्ण घटना : 

👉 सार्वजनिक शेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणूकीची प्रक्रिया सुरु झाली. १९९४-९५ मध्ये रुपया चालू खात्यावर पूर्ण परीवातानीय करण्यात आला.

👉 (Full convertibility of Rupee on Current account) १९९२ मध्ये SEBI ला संविधानिक दर्जा देण्यात आला. 

👉 १९९२ मध्ये ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेस संविधानिक दर्जा देण्यात आला .

केशवानंद भारती खटला :- संपुर्ण नक्की वाचा.



🔰कशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला.

🔰घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते.

🔰राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले.

🔰ससदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे?

🔰या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले.

🔰गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की *घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.*

🔰या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले.

🔰या *खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन* केले गेले.

🔰 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की
' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.

🔰ससदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.

🔰 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्‍लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं.

🔰या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं.

🔰कशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्‍लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. *म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.*

भारतीय राज्यघटना

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ४४८ (जानेवारी २०२०) कलमे असून भारतीय संविधान हे विस्ताराने जगातले सर्वांत मोठे संविधान आहे. भारताची राज्यघटना ही अतिशय लवचीक असून तिच्या मदतीने जगातील इत्तर राज्यघटनांपेक्षा जास्त प्रकारचे कायदे करता येतात. आपल्या घटनेने प्रत्येकाला एकच नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. आपली घटना हि जगातील सगळ्यात मोठी घटना आहे.


🔑भारतीय राज्यघटना : घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये , केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत ग्क्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका


एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे


भाग I  कलम १ ते ४ संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र 


भाग II कलम ५ ते ११  नागरिकत्व 


भाग III कलम १२ ते ३५ मूलभूत अधिकार 


भाग IV कलम ३६ ते ५१ राज्याचे मार्गदर्शक तत्वे 


भाग IVA कलम ५१ A मूलभूत कर्त्यव्ये


भाग V  कलम ५२ ते १५१ केंद्र सरकार (संघराज्य)


भाग VI कलम १५२ ते २३७ राज्य सरकार 


भाग VII 7 वी घटनादुरुस्ती रद्द


भाग VIII कलम२३९-२४२ केंद्रशासित प्रदेश क्षेत्र


भाग IX कलम २४३-२४३O पंचायतराज

– ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद

– नगर पंचायत 


भाग IX A कलम २४३P – २४३ZG  नगरपालिका


भाग IX B  कलम ZH – कलम ZT  सहकारी संस्था


भाग X  कलम २४४-२४४A  अनुसूचित जाती व जमातीप्रदेश /क्षेत्र, आदिवासी क्षेञ


 भाग XI  कलम २४५ – २६३  केंद्र – राज्य संबंध 


 भाग XII  कलम २६४-३००A  महसुल – वित्त, मालमत्ता, करार व फिर्याद


 भाग XIII  कलम ३०१-३०७  व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध


 भाग XIV  कलम ३०८-३२३  केंद्र आणि राज्यांतर्गत सेवा, प्रशासकीय लोकसेवा आयोग


 भाग XIV A  कलम ३२३A, ३२३B  न्यायाधिकरण


 भाग XV  कलम ३२४-३२९A  निवडणूक आयोग


 भाग XVI कलम ३३०-३४२   अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी


 भाग XVII   कलम ३४३-३५१  कार्यालयीन भाषा


 भाग XVIIII  कलम ३५२-३६०  आणीबाणी विषयक तरतुदी


 भाग XIX  कलम ३६१-३६७  संकीर्ण


 भाग XX  कलम ३६८ संविधान दुरुस्ती बाबत 


 भाग XXI  कलम ३६९-३९२  अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष तरतुदी


 भाग XXII  कलम ३९३-३९५  संक्षिप्त रूपे, प्रारंभ आणि निरसने




📝परिशिष्ट


1. परिशिष्ट I राज्य व केंद्र शासित प्रदेश


2. परिशिष्ट II वेतन आणि मानधन (राष्ट्रपती, राज्यपाल,लोकसभेचा सभापती व उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती, राज्यातील विधानपरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक)


3. परिशिष्ट III पद ग्रहण शपथा (केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, संसद सदस्य, सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, राज्यातील मंत्री, विधिमंडळांच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळ सदस्य, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश)


4. परिशिष्ट IV राज्यसभा जागांचे राज्ये आणि संघराज्य प्रदेशात विवरण


5. परिशिष्ट V भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती


6. परिशिष्ट VI आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती संबंधित तरतुदी


7. परिशिष्ट VII केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची (केंद्र सूची – ९८ विषय सुरुवातीला ९७ विषय होते. राज्यसूची – ५९ विषय सुरुवातीला ६६ विषय होते. समवर्ती सूची ५२ विषय सुरुवातीला ४७ विषय होते.


8. परिशिष्ट VIII भाषा घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची संख्या पूर्वी १४ इतकी होती सध्या या परिशिष्टात २२ भाषा आहेत.


9. परिशिष्ट IX  कायद्यांचे अंमलीकरण. हे परिशिष्ट पहिली घटनादुरुस्ती अधिनियम, १९५१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.


10. परिशिष्ट X   पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभांचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी यात आहेत. सन १९८५ च्या ५२ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये याचा समावेश करण्यात आला. हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणूनच ओळखले जाते.


11.  परिशिष्ट XI  पंचायत राज चे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात २९ विषय आहेत. हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले.


12.  परिशिष्ट XII  हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७४ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले. नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत

परिशिष्ट



1. परिशिष्ट I राज्य व केंद्र शासित प्रदेश


2. परिशिष्ट II वेतन आणि मानधन (राष्ट्रपती, राज्यपाल,लोकसभेचा सभापती व उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती, राज्यातील विधानपरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक)


3. परिशिष्ट III पद ग्रहण शपथा (केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, संसद सदस्य, सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, राज्यातील मंत्री, विधिमंडळांच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळ सदस्य, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश)


4. परिशिष्ट IV राज्यसभा जागांचे राज्ये आणि संघराज्य प्रदेशात विवरण


5. परिशिष्ट V भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती


6. परिशिष्ट VI आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती संबंधित तरतुदी


7. परिशिष्ट VII केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची (केंद्र सूची – ९८ विषय सुरुवातीला ९७ विषय होते. राज्यसूची – ५९ विषय सुरुवातीला ६६ विषय होते. समवर्ती सूची ५२ विषय सुरुवातीला ४७ विषय होते.


8. परिशिष्ट VIII भाषा घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची संख्या पूर्वी १४ इतकी होती सध्या या परिशिष्टात २२ भाषा आहेत.


9. परिशिष्ट IX  कायद्यांचे अंमलीकरण. हे परिशिष्ट पहिली घटनादुरुस्ती अधिनियम, १९५१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.


10. परिशिष्ट X   पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभांचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी यात आहेत. सन १९८५ च्या ५२ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये याचा समावेश करण्यात आला. हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणूनच ओळखले जाते.


11.  परिशिष्ट XI  पंचायत राज चे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात २९ विषय आहेत. हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले.


12.  परिशिष्ट XII  हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७४ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले. नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात १८ विषय आहेत.

विधान परिषद


- राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह

- घटनेचे कलम 169 विधानपरिषदेची स्थापना किंवा रद्द करण्याशी संबंधित आहे: संबंधित राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने (2/3) असा ठराव पारित करावा लागतो आणि हा ठराव संसदेत साध्या बहुमताने मंजूर करावा लागतो. 

-------------------------------------

● पात्रता 

- उमेदवार भारताचा नागरिक असावा

- त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावीत. 

- संसदेने ठरवून दिलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक

-------------------------------------

● सदस्य संख्या

- कमीत कमी 40 (J&K: 36) तर जास्तीत जास्त संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश इतके सदस्य

- एक तृतीयांश सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात (स्थायी सभागृह)

- सदस्याचा कालावधी 6 वर्षांचा असतो

--------------------------------------

● रचना: कलम 171

[सदस्य: मतदार संघ: महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील संख्या]


- 1/12 सदस्य: पदवीधर मतदारसंघातून: 7 सदस्य

- 1/12 सदस्य: शिक्षक मतदारसंघातून: 7 सदस्य

- 1/6 सदस्य: राज्यपाल नियुक्त: 12 सदस्य

- 1/3 सदस्य: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून: 26 सदस्य

- 1/3 सदस्य: विधानसभा सदस्य निवडून देतात: 26 सदस्य

■ विधानपरिषदेच्या गणपूर्तीसाठी 1/10 सदस्यांची आवश्यकता असता.

--------------------------------------

● विधानपरिषद असलेली राज्ये

[राज्याचे नाव आणि सदस्य संख्या]


- उत्तर प्रदेश (100)

- महाराष्ट्र (78)

- बिहार (75)

- कर्नाटक (75)

- आंध्र प्रदेश (50)

- तेलंगणा (40)

- जम्मू-काश्मिर (36)

■ ओरिसा हे विधानपरिषद स्थापन करणारे देशातील आठवे राज्य ठरले आहे.

● महाराष्ट्राची विधानपरिदषद




- भारत सरकार कायदा 1935 नुसार 1937 मध्ये विधानपरिषद अस्तित्वात आली.
- परीषदेची पहिली बैठक 20 जुलै 1937 रोजी पुण्याच्या कौन्सिल हाॅलमध्ये पार पडली.
- 1960 पासून हिवाळी अधिवेशन (ऑक्टो नोव्हें) नागपूर येथे होते.
- 1987 मध्ये परीषदेला 50 वर्षे पूर्ण झाली, सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला.
- 2000 पासून 22 जुलै हा दिवस महाराष्ट्र विधानपरिषदेचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो.
---------------------------------------
● सदस्य संख्या

- 1937 मध्ये 29, 1957 मध्ये 108 करण्यात आली तर वेगळ्या महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ही सदस्य संख्या 78 करण्यात आली. यापैकी -
30 सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे
22 सदस्य स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारे
07 सदस्य पदवीधर आणि शिक्षकांद्वारे
12 सदस्य राज्यपालांद्वारे निवडले जातात.
- गणपूर्तीसाठी कमीत कमी 10 सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे.
--------------------------------------
● सभापती

- पहिले सभापती: मंगलदास मच्छाराम पक्वासा (22 जुलै 1937 ते 16 ऑगस्ट 1947)
- सध्या: रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर
- आजपर्यंत एकही महिला सभापती झाली नाही.
----------------------------------------
● उपसभापती

- पहिले उपसभापती: आर. जी. सोमण (22 जुलै 1937 ते 16 ऑक्टोबर 1947)
- पहिल्या महिला उपसभापती: जे. टी. सिपाहिमलानी (19 ऑगस्ट 1955 ते 24 एप्रिल 1962)
- सध्या: नीलम गोर्हे


शेवटचे 50 दिवस आणि आपण.

आज ही Post लिहिण्याचा उद्देश एकच आहे की Combine पुर्व साठी राहिलेले शेवटचे 50 दिवस तुमच्यासाठी Game Changer ठरू शकतात. त्याच अनुषंगाने काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न.

  1. आता तुमची Revision ची phase चालू असेल त्यामुळे नवीन हातात काहीच घेऊ नका. जे आत्तापर्यंत वाचलंय तेच Revise करा.

2. इथून पुढे कमीत कमी 3 Revision व्हायला पाहिजेत असं नियोजन करा. पुढील 50 दिवसाचे 25-15-10  अशा दिवसांमध्ये 3 Revision चे Planning करू शकता.    

3. कमीत कमी 5 विषयांवर आपला जबरदस्त Control असला पाहिजेत. आणि इतर कोणतेही 2 विषय ते सुद्धा above average हवेत तरच 60+ च Target गाठता येऊ शकते.

4. कुठल्याही विषयाला गृहीत धरू नका विशेषतः गणित बुद्धिमत्ता आणि इतिहास. या विषयांकडेसुद्धा Specific लक्ष असू दया. कारण मार्कांची गोळबेरीज ही सर्व विषय मिळूनच होत असते.       

5. Polity चे Imp Articles, Subjects, Schedules,पंचायत राज च्या काही Facts या पाठ असू दया.

6. Combine Prelims चे 2022,2021,2020,2019 या चार वर्षांच्या Papers च बारकाईने विश्लेषण करा. त्यामध्ये आयोग कुठे फसवतो, आयोगाची अपेक्षा, काही Tricks, प्रश्न विचारण्याची पद्धती, विषयानुसार आयोगाचा कल या सर्व बाबींचा आढावा घेणं योग्य राहील.

7. Practice Test papers Solve करायला हवेत. कारण आपल Time Management होत आहे का नाही हे त्यातूनच समजू शकते. किमान 5 Test Papers तरी वेळ लावून सोडवून व्हायला हवेत.       

8.आता Revision करत असताना प्रत्येक विषयाचा प्रत्येक उपघटक, प्रत्येक कोपरा चांगला धुंढाळून घ्यायला हवा.

9. Exam Hall मधील 1 तास-
आपण कितीही अभ्यास केला तरी हा एक तासच बऱ्याच गोष्टी ठरवतो. त्यामुळे त्या 1 तासामध्ये मानसिकता सकारात्मक असायला हवी. इतर गोष्टींचे विचार कमीत कमी यायला हवेत. त्यामुळे आत्ताच Practice करत असताना आयोगाचा Paper Solve करत आहोत असा Approach समोर ठेऊन Solve करा.

 शेवटी Combine हा जरी 20-20 चा खेळ असला तरी त्याच्या पाठीमागे असलेली मेहनतच आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे शेवटचे 50 दिवस शक्य तेवढा जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा.      

  सर्वांना शुभेच्छा 💐💐.

०६ मार्च २०२३

भूगोल प्रश्नसंच ( Online Test )

लॉर्ड लिटन (१८७६-१८८०)




👉  लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. म्हणून डिझरायलीने त्याची भारताच्या व्हाइसरॉयपदी १८७६ मध्ये नेमणूक केली. त्याच्या काळात १८७६-७७ मध्ये मद्रास, मुंबई, पंजाब या भागात दुष्काळ पडला. या काळात दुष्काळाने ५० लाख व्यक्ती मृत्यू पावल्या व २० लाख हेक्टर जमीन नापीक झाली.

👉  वहाइसरॉयने दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनेच्या हेतूने  स्ट्रची दुष्काळ निवारण समिती  नेमली. (अहवाल १८८०). तिचा अहवाल स्वीकारून सरकारने १८८३ साली दुष्काळ संहिता जाहीर केली. लिटनच्या उद्दाम धोरणामुळे दुसरे अफगाण युद्ध उद्भवले.

👉   १८७७ साली पहिला दिल्ली दरबार भरवण्यात येऊन राणी व्हिक्टोरियाने भारत सम्राज्ञी हा किताब धारण केल्याचे जाहीर केले. त्याच्यावर देशी वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवल्याने देशी वृत्तपत्रांवर र्निबध टाकणारा देशी कायदा मार्च, १८७८ मध्ये पास करून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी केली. अमृतबझार पत्रिका  हे देशी वृत्त तेव्हापासून इंग्रजी भाषेत सुरू आहे.

👉 १८७८ मध्ये शस्त्रबंदी कायदा  करून विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी. लिटनच्या काळात भारतीय मुलकी सेवा कायदा १८७९ पास केला.

👉  आयसीएस परीक्षेचे वय २१ वरून १९ वर्षांवर आणले. त्याविरुद्ध सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची (आयसीएस पास प्रथम भारतीय व्यक्ती) इंडियन असोसिएशनच्या वतीने जनजागरण मोहीम.

आधुनिक भारताचा इतिहास

💎

भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).

१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.

२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.

लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.

भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

44वी घटनादुरुस्ती 1978


1)  लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (५ वर्षे) पुनर्स्थापित केला.

2) लोकसभा आणि राज्यविधिमंडळाच्या गंपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली.

3) संसदीय विशेषाधिकाराबाबद ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहाचा संदर्भ वगळण्यात आला.

4) संसद आणि राज्यविधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपध्द्तीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण दिले.

5) मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.

6) अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली.

7) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले.

8) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात ‘अंतर्गत अशांतता’ या शब्दा ऐवजी ‘सशस्त्र बंडाळी’ हा शब्द योजण्यात आला.

9) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित करू शकतात. अशी तरतूद केली.

10) राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षण तरतुदी केल्या.

11) मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला.

12) कलम २० आणि कलम २१ अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाहीत.

13) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूकवादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत ही तरतूद वगळण्यात आली.


गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी (१८४८-५६)

१८४८ मध्ये लॉर्ड हार्डिगच्या जागी डलहौसी गव्हर्नर जनरल बनला. डलहौसीने आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत भारतात इंग्रज प्रशासनाचा पाया मजबूत केला. त्याच्या कार्यकाळात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी..


डलहौसी हा त्याच्या व्यपगत सिद्धान्तासाठी (Doctrine of Lapse) ओळखला जातो.

डलहौसीने संस्थानांना दत्तकपुत्र घेण्यास अनुमती दिली, पण दत्तकपुत्र हा गादीचा वारस मानण्यास त्याने नकार दिला. त्याचप्रमाणे द्वितीय आणि तृतीय प्रकारच्या संस्थानाला दत्तकपुत्र वारसा नेमण्यास मान्यता नाकारली.


डलहौसीने या सिद्धान्तानुसार सातारा (१८४८), संबलपूर व जैतपूर (१८४९), बगाढ (१८५०), उदयपूर (१८५२), झाशी (१८५३) व नागपूर (१८५४) खालसा केले.

लॉर्ड डलहौसीकृत सुधारणांचा एकमेव उद्देश सत्ता केंद्रीकरण हा होता.

लॉर्ड डलहौसीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याचा पश्चिम भागात विस्तार झाला.

लॉर्ड डलहौसीने सैन्यात तीन रेजिमेंटची भर घातली.

१८५३ मध्ये ठाणे ते मुंबई दरम्यान रेल्वे सुरू झाली.

भारतात टपाल तिकिटांचा वापर लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाला. त्याच्या काळात भारतात रेल्वेचे जाळे ठेके पद्धतीने बांधण्यात आले.

लॉर्ड डलहौसीला भारतात ‘विद्युत तारेचा प्रारंभकर्ता’ असे म्हणतात.

लॉर्ड डलहौसीने व्यापारासाठी सर्व बंदरे खुली करून कर रद्द केला.

१८५४मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली.

१८५४चा वुडचा खलिता : त्यानुसार प्राथमिक शिक्षणापासून विश्वविद्यालयीन शिक्षणापर्यंत एक शिक्षण योजना बनविण्यात आली. यानुसार प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण असावे अशी शिफारस करण्यात आली.

त्याच्या कार्यकालात १८५६ साली विधवा विवाहासंदर्भात ‘विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला. त्यासाठी त्याला ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मदत केली.


१८५७ चा उठाव आणि डलहौसी : 


स्मिथच्या मतानुसार, १८५७ च्या उठावाला डलहौसीच जबाबदार होता. त्याने कोणत्याही कारणावरून, भारतीय राज्यांना ब्रिटिश प्रशासनात विलीन केले. यामुळे राजांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्याची परिणती १८५७ च्या उठावात झाली.


लॉर्ड कॅनिंग (१८५६ ते १८६२) : 


कॅनिंग हा ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल व ब्रिटिश संसदेद्वारा नियुक्त पहिला व्हॉईसरॉय होता. १८५८चा उठाव कॅनिंगच्या काळात झाला. उठाव मोडून काढण्याचे महत्त्वाचे काम त्याने केले. कॅनिंगने १८६१ साली पोलीस खात्यात सुधारणा केल्या. पोलीस विभागपदी इन्स्पेक्टर जनरल (कॅ), जिल्हा पोलीस प्रमुखपदी पोलीस अधीक्षक (रढ), तालुका प्रमुखपदी डेप्युटी इन्स्पेक्टर इत्यादी नेमणुका केल्या. कॅनिंगने मेकॉलेद्वारा तयार केलेली (१८३७ भारतीय दंडविधान) संहिता १८६० मध्ये लागू केली. १८६२ पासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली. कॅनिंगने मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे उच्च न्यायालयाच्या शाखा स्थापन केल्या. याच काळात १८६१ चा भारतीय विधिमंडळ कायदा (इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट) संमत झाला तसेच ‘इंडियन सिव्हिल सव्‍‌र्हिसेस’ परीक्षा सुरू झाल्या. इ.स. १८५७ मध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता (कलकत्ता- २४ जानेवारी) विश्वविद्यालयांची स्थापना करण्यात आली. राणीचा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंगने १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबादच्या दरबारात वाचून दाखवला. १८५९ मध्ये भारतमंत्री म्हणून चार्ल्स वुड आला. वुडच्या सहाय्याने कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षण खात्याची स्थापना केली. १८६१ च्या दुष्काळ परिस्थितीच्या चौकशीसाठी कर्नल स्मिथच्या अध्यक्षतेखाली हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिला चौकशी आयोग कॅनिंगने नेमला.

विद्यापीठ आयोग, 1904


🖍 27 जानेवारी 1904 :- ‘विद्यापीठ आयोग’ स्थापन करण्यात आला.  


 🖍 अध्यक्ष :- सर थॉमस रॅले (कार्यकारी मंडळाचा विधीसदस्य) 


 🖍 या आयोगात निजामाच्या संस्थानातील शिक्षणखात्याचा संचालक सईद हुसेन बिलग्रामी या एकमेव भारतीयाचा अंतर्भाव करण्यात आला होता. 


🖍  भारतात हिंदु बहुसंख्य असून देखील त्यांचा एकही प्रतिनीधी या समितीवर नसल्याने सुशिक्षित भारतीयांकडून तीव्र निषेध व्यक्त केला गेला म्हणून नंतर कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गुरुदास बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली. 

म्हणजेच न्या. गुरूदास बॅनर्जी हे या अायोगातील एकमेव हिंदु होते. 


🖍 भारतीय विद्यापीठ स्तरावरील उच्च शिक्षण व्यवस्थेत सुधारणा सुचविणे हा या आयोगाचा उद्देश होता असे वाटत असले तरी शिक्षणाचा प्रसार करणे किंवा शिक्षणाचा दर्जा उंचावणे हा या शिफारशींमागील हेतू मूळीच नव्हता तर उच्च शिक्षण हे सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याचा तो एक प्रयत्न हाेता. 


🖍  बनर्जी, मेहता, गोखले यांनी या विधेयकाचा उघड निषेध करण्यासाठी कलकत्ता टाऊन हॉलमध्ये जाहीर सभा घेतली व या विधेयकामागे कर्झनचे उद्दिष्ट शिक्षण सुधारणेचे नसून राजकीय स्वरुपाचे आहे हे जनतेला पटवून सांगितले. 


🖍 भारतातील वाढत्या राष्ट्रवादी भावनेला आवर घालण्यासाठी या कायद्याने विद्यापीठांवर सरकारी  

नियंत्रणे आणली व यान्वये सरकारी संमतीशिवाय काहीही करण्याची मोकळीक आता विद्यापिठांना  

उरनार नव्हती. 


 🖍 या कर्झनच्या धोरणामुळे यावर्षीपासून विद्यापीठांच्या सुधारणांसाठी दरवर्षी 5 लक्ष रू. प्रमाणे पाच वर्षांसाठी देण्याचे ठरविण्यात आले. 

         या समितीच्या शिफारसीनुसार ‘भारतीय विद्यापीठ कायदा, 1904’ पारित करण्यात आला.

राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.


🔶राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील.


🔶राज्य मानवी हक्क आयोगामध्ये-🔶

अध्यक्ष - उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश

 एक सदस्य - उच्च न्यायालयाचा विद्यमान किंवा माजी न्यायाधीश किंवा किमान 7 वर्षे अनुभव असलेला जिल्हा न्यायाधीश

 एक-दोन सदस्य - मानवी हक्कांसंबंधी ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्ति

 सचिव हा आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल.

राज्य आयोगाचे मुख्यालय राज्यशासन विनिर्दिष्ट करेल अशा ठिकाणी असेल.


🔶राज्य आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांच्या नेमणुका:

अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल पुढील समितीच्या शिफारशिनुसार करतील.


🔶समितीची रचना -

मुख्यमंत्री- सभाध्यक्ष

विधान मंडळाचा अध्यक्ष - सदस्य

त्या राज्याच्या गृहविकासाचा प्रभारी मंत्री - 

विधानसभेतील विरोधी पक्षनेता - सदस्य

ज्या राज्यात विधानपरिषद असेल त्या ठिकाणी त्याचा सभापती व विरोधी पक्षनेता - सदस्य


 🔶राज्य आयोगाच्या सभाध्यक्षांची किंवा सदस्यांची नोंदणी आणि त्यांना पदावरून दूर करणे:🔶


🔶राज्य आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य राज्यपालांना उद्देशून त्याच्या पदाचा राजीनामा देवू शकेल.


🔶तसेच अध्यक्ष किंवा सदस्यास पुढील कारणावरून पदावरून दूर करता येईल .

अभिनिर्णीत नादार असेल; किंवा -

त्याने लाभाचे पद धारण केले आहे ; किंवा

 मानसिक किंवा शारीरिक अस्वास्थ्य  ; किंवा

राष्ट्रपतींच्या मते नैतिक अध : पतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधासाठी दोषी ठरविलेली व्यक्ती.


🔶राज्य आयोगाच्या अध्यक्षाचा आणि सदस्याचा पदावधी:

अध्यक्षांचा कार्यकाल - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत.

 पुनर्नियुक्ति होवू शकते.

वित्त आयोग

*◾️सथापना* : 

वित्त आयोगाची स्थापना आजपासून ६७ वर्षांपूर्वी म्हणजे २२ नोव्हेंबर १९५१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पदाधिकारी कायदा मंत्री यांनी मिळून केली. भारत सरकारच्या अधिपत्याखाली या आयोगाचे कार्यक्षेत्र कार्य करते. वित्त आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

 

*⚫️रचना* :

 वित्त आयोग ५ लोकांचे मिळून बनते. त्यापैकी एक अध्यक्ष असतो व इतर चार सदस्य असतात. चार सदस्यांपैकी दोन सदस्य हे पूर्ण-वेळ सदस्य असतात. उरलेले दोन सदस्य अर्ध-वेळ सदस्य असतात.

  

🔺*नियुक्ती* :

 वित्त आयोग व त्यातील सदस्यांची नियुक्ती ही भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींमार्फत कलम २८० नुसार केली जाते. 


*🔻पात्रता* :

 वित्त आयोगाचा अध्यक्ष म्हणून असा व्यक्ती निवडला जातो ज्याला लोकांच्या आर्थिक समस्या व गरज याबद्दल सखोल ज्ञान असते. (उदाहरणार्थ निवृत्त आय.ए.एस.अधिकारी). इतर चार सदस्यांपैकी एक सदस्य उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असलेला नियुक्त करतात. तर दुसरा जयला सरकारी वित्त व खाती याबद्दल संपूर्ण ज्ञान आहे असा व्यक्ती नेमला जातो. तिसरा व्यक्ती ज्याला प्रशासनाबद्दल पूर्ण माहिती आणि वित्तीय तज्ज्ञ असला पाहिजे व चौथा सदस्य अर्थतज्ज्ञ असला पाहिजे. 


*◾️कालावधी* :

 वित्त आयोगाचा कालावधी हा साधारणपणे पाच वर्षांचा असतो. पाच वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा त्यापूर्वी(गरज असेल तर) राष्ट्रपती नवीन वित्त आयोग(नवीन सदस्य) नेमू शकतात. 


*♻️कार्य* :

१) करातून वसूल झालेला निधी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये समप्रमाणात विभागणे. 

२) राज्यांना लागणाऱ्या निधीसाठी कारणीभूत घटक व त्याचे परिणाम शोधून निश्चित करणे. 

३) जमा झालेल्या निधीतून ज्या राज्यांना आवश्यकता आहे अशा राज्यांना निधीसाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करणे. 

४) वित्त अहवाल राष्ट्रपतींपुढे सादर करून त्यावर चर्चा करून अव्सज्याक सूचना सूचित करणे. 

५) आर्थिकदृष्ट्या मागास व सधन राज्य यांच्यातील वित्तीय दरी कमी करून त्यांना एकसमान बनवण्याचा प्रयत्न करणे. 



*🔺आतापर्यंतचे वित्त आयोग व अध्यक्ष* :


१) पहिला वित्त आयोग(१९५१ साली स्थापना) - के.सी.नियोगी 

२) दुसरा (१९५६) - के.संथानम 

३) तिसरा(१९६०) - ए.के.चंदा 

४) चौथा(१९६४) - पी.व्ही.राजमन्नावर 

५) पाचवा(१९६८) - महावीर त्यागी 

६) सहावा(१९७२) - के.ब्रम्हानंद रेड्डी 

७) सातवा(१९७७) - जे.एम.शेलार 

८) आठवा(१९८३) - यशवंतराव चव्हाण 

९) नववा(१९८७) - एन.पी.के.साळवे 

१०) दहावा(१९९२) - के.सी.पंत 

११) अकरावा(१९९८) - ए.एम.खुश्रो 

१२) बारावा(२००२) - सी.रंगराजन 

१३) तेरावा(२००७) - विजय केळकर 

१४) चौदावा(२०१३) - आयव्ही.व्ही.रेड्डी 

१५) पंधरावा(२०१७) - एन.के.सिंग 



*🔘पधराव्या वित्त आयोगाबद्दल* :

अध्यक्ष - एन.के.सिंग(I.A.S.)

पूर्ण-वेळ सदस्य:- १) शक्तिकांत दास, २)अनुप सिंग, 

अर्ध-वेळ सदस्य:-१)रमेश चांद २)अशोक लहरी


राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग



स्थापना : १३ ऑगस्ट १९९३

मुख्यालय : दिल्ली 

रचना : १ अध्यक्ष व ४ सदस्य

कार्यकाळ : ३ वर्षे


अध्यक्ष व सदस्य पात्रता 

अध्यक्ष : सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असायला पाहिजे

१ सदस्य सचिव असतील

१ सदस्य समाज शास्त्रज्ञ असतील

२ सदस्य इतर मागासवर्गीय घटकातील विशेष तज्ञ असतील


स्थापना

मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने झाली. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली.



यातील इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय दिला. त्यांनतर भारत सरकारने १९९३ साली राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन केला.


कार्य

OBC घटकांच्या तक्रारी सोडविणे, एखाद्या जातीला OBC घटकांमध्ये समावेश करण्याची शिफारस करणे. तसेच एखाद्या जातीला OBC घटकांमधून काढून टाकण्याची शिफारस करणे.

राज्य निवडणूक आयोग

♦️सथापना- संविधान अनुच्छेद 243k.

♦️पचायतीच्या निवडणुकीची जबाबदारी :- 243k नुसार.

♦️नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी :- 243 ZA नुसार.

♦️राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती :- राज्यपाल.

♦️पदावरून काढण्याची पध्दत :- उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून काढण्याच्या पध्दतीप्रमाणे.

♦️नियुक्तीनंतर आर्थिक लाभात अहितकारक बदल नाही. आयोगाला स्वत:चा कर्मचारीवर्ग नसतो.

♦️महाराष्ट्रात स्थापना :- 23 एप्रिल 1994.

♦️पहिले आयुक्त :- श्री डी. एन. चौधरी.





मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती


निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

🔸मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक ➖


👉पंतप्रधान,

👉 विरोधी पक्षनेते आणि

👉 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 


यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी,


✅ तसेच विरोधी पक्षनेते नसतील तर, तेव्हा संसदेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते या समितीचे सदस्य असतील असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

✅ निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तींबाबत सर्वोच्च न्यायालयाने संसदेला नवीन कायदा बनविण्याचे निर्देश दिले आहेत.


तसेच जोपर्यंत हा कायदा बनत नाही तोपर्यंत निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या समितीद्वारे करण्यात यावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.


जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती



०१) 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (NDA) कुठे आहे ?

- खडकवासला.(पुणे)


०२) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय  आहे ?

- मुरलीधर देविदास आमटे. 


०३) जगातील कोणत्या खंडास बर्फाळ खंड असे म्हणतात ?

- अंटार्क्टिका.


०४) शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती  ?

- यकृत.


०५) गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे ?

- पणजी.


०१) महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचे नाव काय होते ?

- यशवंतराव चव्हाण.


०२) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे नाव काय आहे ?

- नागपूर.


०३) अजिंठा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

- औरंगाबाद.


०४) सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?

- ३६.


०५) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदीचे नाव काय आहे ?

- गोदावरी.


०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषेचे नाव काय आहे ?

- मराठी.


०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता?

- हरियाल.


०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

 - आंबा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

- कबड्डी.


०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

- मुंबई.


०१) भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी कोण ?

- किरण बेदी.


०२) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?

- पुरंदर किल्ला.


०३) नेपाळची राजधानी कोणती आहे ?

- काठमांडू.


०४) रेबिजची लस कोणी शोधली ?

- लुईस पाश्चर.


०५) सुशीलकुमार हा खेळाडू कोणता खेळ खेळतो ?

- कुस्ती.


०१) १ ते ९ अंकाची बेरीज किती होते ?

- ४५.


०२) इटली या देशाची राजधानी कोणती ?

- रोम.


०३) 'कऱ्हेचे पाणी' हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

- प्र.के.अत्रे.


०४) ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?

- उस्मानाबाद.


०५) इराक या देशाची राजधानी कोणती ?

- बगदाद.


१) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?

- होन आणि शिवराई.


०२) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोणास म्हणतात ?

- डॉ.होमी भाभा.


०३) अंधासाठीच्या ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ?

- लुईस ब्रेल.


०४) संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय ?

- डेंबुजी झिंगराजी जानोरकर.


०५) 'स्कर्व्ही' हा रोग कोणत्या जीवनसत्वाभावी होतो ?

- सी जिवनसत्व.


०१) 'इस्रो' (ISRO)चे मुख्यालय भारतात कोठे आहे ?

- बंगळुरू. 


०२) राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- १४ सप्टेंबर.


०३) रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

- कुलाबा.


०४) 'विश्वनाथन आनंद' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- बुद्धिबळ.


०५) मराठवाड्याच्या राजधानीचा जिल्हा कोणता ?

- औरंगाबाद.


०१) ज्वारीच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो ? 

- महाराष्ट्र.


०२) प्रसिद्ध 'शनिवारवाडा ' कोठे आहे ?

- पुणे.


०३) सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकारची स्थापना केली ?

- क्रांतिसिंह नाना पाटील.


०४) गरीबाचे 'बदाम'असे कशास म्हटले जाते ?

- शेंगदाणे.


०५) पृथ्वीच्या स्वतःच्या आसाभोवती फिरण्याच्या क्रियेस काय म्हणतात ?

- परिवलन.


०१) 'ऊसतोड कामगारांचा जिल्हा' म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

- बीड.


०२) ऑक्सीजन चा शोध कोणी लावला ?

- जोसेफ प्रिस्टले. 


०३) बांगलादेशची राजधानी कोणती आहे ?

- ढाका.


०४) भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यास किती कालावधी लागला ?

- २ वर्ष ११ महिने १७ दिवस.


०५) 'श्रीमान योगी' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

- रणजित देसाई.



०१) जपान या देशाची राजधानी कोणती ?

- टोकियो.


०२) कोणाचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो ?

- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.


०३) महाराष्ट्रातील कोणत्या संतांची पदे 'गुरु ग्रंथसाहेब' या शीख धर्मीयांच्या धर्मग्रंथात आहेत ?

- संत नामदेव महाराज.


०४) 'क्ष'(X-ray) किरणांचा शोध कोणी लावला ?

- रॉंन्टजेन.


०५) फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ?

- पॅरिस.


०१) 'विवेकसिंधू' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

- मुकुंदराज.


०२) चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

- कर्नाटक.


०३) राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे ?

- त्यागाचे.


०४) मिठाचे रासायनिक नाव काय आहे ?

- सोडियम क्लोराइड.


०५) 'धवलक्रांती' म्हणजे  कशाच्या उत्पादनात वाढ ?

- दूध उत्पादन.


०१) सरदार सरोवर' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


०२) 'आग्रा' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

- यमुना.


०३) शिवाजी सागर' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

- कोयना.


०४) 'संजय गांधी' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

- बोरिवली.(मुंबई)


०५) महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- चंद्रपूर.


०१) महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?

- ७२० कि.मी.


०२) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- पुणे.


०३) 'भंडारदरा' धरण कोणत्या नदीवर आहे ?

- प्रवरा.


०४) पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?

- सातपाटी.


०५) 'बिहू' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

- आसाम.


१) भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?

- दादासाहेब फाळके.


०२) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

- रूडाल्फ डिझेल.


०३) 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

- अनंत भवानीबाबा घोलप.


०४) व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

- २७० ते २८० ग्रॅम.


०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

- ४ सप्टेंबर १९२७.


०१) महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

- पुणे.


०२) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

- जेम्स वॅट.


०३) 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

- प्रल्हाद केशव अत्रे.


०४) ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ?

- भावार्थ दीपिका.


०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

- ८ जुलै १९३०.

लक्षात ठेवा



🔸१) पुण्याजवळ .... येथे 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (National Defence Academy) आहे.

- खडकवासला


🔹२) राज्यातील .... या नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्यांबद्दल प्रसिद्ध आहे.

- वर्धा


🔸३) राज्यातील नियोजित औष्णिक विद्युत केंद्रामुळे अधिक (प्रकाशझोतात आलेले .... हे ठिकाण दगडी कोळशाच्या खाणींबद्दलही प्रसिद्ध आहे. 

- उमरेड (नागपूर)


🔹४) राज्यातील मधुमक्षिकापालन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण .....

- महाबळेश्वर


🔸५) महाराष्ट्र पठारावरील ..... या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.

- महादेव डोंगररांगा


🔸१) आणीबाणी जारी असता संसद लोकसभेचा कार्यकाल जास्तीत जास्त .... वाढवू शकते. 

- एक वर्ष


🔹२) संसदेच्या अधिवेशनासंदर्भातील घटनात्मक तरतुदी पाहता संसदेची वर्षातून किमान .... अधिवेशने होणे आवश्यक ठरते.

- दोन


🔸३) लोकसभेतील प्रत्येक राज्याची सदस्यसंख्या लोक संख्येच्या निकषावर निश्चित केलेली आहे. लोकसभेतील प्रत्येक राज्याची सध्याची संख्या निश्चित करताना .... या वर्षीची जनगणना आधारभूत धरण्यात आली आहे.

- १९७१


🔹४) कलम २८०(१) मधील तरतुदींनुसार .... हा अर्थ आयोगाची रचना करतो.

- राष्ट्रपती


🔸५) .... हे संसदेचे स्थायी सभागृह होय. ते कधीही विसर्जित होत नाही.

- राज्यसभा

जगभरातील सर्वात लांब, सर्वात मोठी, सर्वात उंच, सर्वात लहान



1. सौर मंडळामधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

उत्तर: बृहस्पति ग्रह


2. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

 उत्तर: रशिया


3. लोकसंख्येनुसार सर्वात मोठा देश कोणता आहे?

उत्तर: चीन.


4. लोकसंख्येनुसार सर्वात मोठे शहर कोणते आहे?

उत्तर: टोकियो, जपान.


5. जगातील सर्वात मोठे विमान वाहक कोण आहे?

उत्तर: अँटोनोव्ह अन -225 / Antonov An-225


6. जगातील सर्वात मोठी बँक कोणती आहे?

 उत्तर: Industrial & Commercial Bank of China (ICBC) / आयसीबीसी, चीन


7. जगातील सर्वात मोठी सार्वजनिक कंपनी कोणती आहे?

उत्तर: आयसीबीसी, चीन.


8. जगातील सर्वात मोठे डिस्नेलँड कोणते आहे?

उत्तर: ऑरलँडो, फ्लोरिडा मधील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड रिसॉर्ट.


9. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?

उत्तर: अंटार्क्टिका, अंटार्क्टिका.


10. जगातील सर्वात मोठे इंग्रजी बोलणारे राष्ट्र कोणते आहे?

उत्तर: अमेरिका


11. जगातील सर्वात मोठे फुटबॉल (किंवा सॉकर) स्टेडियम कोणते आहे?

उत्तर: रुंगनाडो मे डे स्टेडियम, उत्तर कोरिया / Rungnado May Day Stadium, North Korea.


12. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे तलाव कोणते आहे?

उत्तर: लेक सुपीरियर, उत्तर अमेरिका.


13. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

उत्तर: आशिया / Asia


14. जगातील सर्वात मोठी हॉटेलची साखळी कोणती आहे?

उत्तर: इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स गट / Inter Continental Hotels Group.


15. क्षेत्रानुसार जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

उत्तर: ग्रीनलँड, उत्तर अटलांटिक


16. जगातील सर्वात मोठे शॉपिंग मॉल कोणते आहे?

उत्तर: न्यू साउथ चायना मॉल.


17. जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

उत्तर: ग्रीनलँड नॅशनल पार्क.


18. सर्वात मोठा अणुबॉम्ब कोणता आहे?

उत्तर: झार बोंबा / Tsar bomb


19. जगातील सर्वात मोठे महासागर कोणते आहे?

उत्तर: पॅसिफिक महासागर.


20. लोकांच्या संख्येने सर्वात मोठा धर्म कोणता आहे?

उत्तर: ख्रिश्चन

21. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

उत्तर: नाईल – करेगा.


22. जगातील सर्वात मोठे ज्वालामुखी कोणते आहे?

उत्तर: हवाईच्या बिग बेटावरील मौना लोआ.


23. जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय कोणते आहे?

उत्तर: ओमाहा, नेब्रास्का मधील हेनरी डोरली प्राणीसंग्रहालय.


24. जगातील सर्वात लांब माउंटन साखळी कोणती आहे?

उत्तर: अँडीज.


25. जगातील सर्वात लांब रेल्वे पूल कोणता आहे?

उत्तर: दानियांग-कुन्शन ग्रँड ब्रिज, चीन.


26. जगातील सर्वात लांब गुहा कोणती आहे?

उत्तर: अमेरिकेतील केंटकी, ब्राउनस्विलेजवळील, मॅमथ गुहा.


27. सर्वात लांब इंग्रजी शब्द कोणता आहे?

उत्तर: pneumonoultramicroscopicsilicovolcanoconiosis / न्यूमोनॉल्ट्रॅमिकोस्कोपिक्सिलिकोव्होलकेनोकोनिसिस – हा एक फुफ्फुसाचा रोग आहे – 45 अक्षरे


28. जगातील सर्वात लांब महामार्ग कोणता आहे?

उत्तर: ऑस्ट्रेलियाचा हायवे १.


29. सर्वात लांब प्राणी कोणता आहे?

उत्तर: Ocean Quahog


30. जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे?

उत्तर: बुर्ज खलिफा, दुबई


31. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

उत्तर: माउंट एव्हरेस्ट.


32. जगातील सर्वात उंच लाईटहॉउस कोणते आहे?

उत्तर: जेद्दाह लाइट, जेद्दाह, सौदी अरेबिया – 436 फूट (133 मीटर)


33. जगातील सर्वात उंच कार्यालय इमारत कोणती आहे?

उत्तर: बुर्ज खलिफा, दुबई.


34. जगातील सर्वात उंच / सर्वात मोठे पिरॅमिड कोणते आहे?

उत्तर: गीझाचा ग्रेट पिरॅमिड (ज्याला खुफूचा पिरॅमिड किंवा चॉप्सचा पिरॅमिड देखील म्हणतात).


35. जगातील सर्वात उंच झाड कोणते आहे?

उत्तर: जगातील सर्वात उंच वृक्ष म्हणजे कोस्ट रेडवुड, 115.72 मीटर (379.7 फूट) उंच.



हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 (24व्या) :-


◆ स्थळ :- बीजिंग (चीन), 

◆ उद्घाटन स्थळ :- बीजींग नॅशनल स्टेडियम

◆ कालावधी :- 4 ते 20 फेब्रुवारी 2022 (17 दिवस)


➤ उद्घाटन सोहळ्यातील क्रीडाज्योत प्रज्वलन :-

1) डिनीजीर यीलामुजिआंग (चीन)

2) झाओ जिआवेन (चीन) 


उद्घाटन सोहळ्याची मुख्य संकल्पना :- "एक जग एक कुटुंब"


◆ शुभंकर :- बिंग डेवन (एक प्रकारचा पांडा)


➤ एकूण सहभागी देश :- 91

➤ घोषवाक्य :- "सामायिक भविष्यासाठी एकत्र".


➤ भारतातील सहभागी खेळाडू :- 1 (मोहम्मद आरिफ खान)


◆ या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एकही पदक मिळाले नाही.


◆ उन्हाळी तसेच हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे बीजिंग हे पहिले शहर बनले. 


◆ हैती आणि सौदी अरेबिया हे देश हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पहिल्यांदाच सहभागी झाले.

कर्नाटकने बयंदूर येथे देशातील पहिल्या मरीनाची योजना आखली आहे.


◆ कर्नाटकातील किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी कर्नाटक सरकार देशातील पहिले मरीना किंवा डॉकेज देणारे बोट बेसिन, उडुपी जिल्ह्यातील बाइंदूर येथे बांधणार आहे. 


◆ किनारी भागात समुद्रकिनारा पर्यटन आणि तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) शिथिल करण्यासाठी सरकार केंद्राकडून परवानगी मागणार आहे. 


◆ सरकार पुरातत्व विभागाकडून गंगा, कदंब, राष्ट्रकूट, चालुक्य आणि होयसाळ या महान राजवंशांचा इतिहास संकलित करेल आणि राज्यातील पर्यटनाचा इतिहास विकसित करेल. यामुळे पर्यटनाचा विकास तर होईलच शिवाय लोकांना राज्याचा समृद्ध इतिहास समजण्यास मदत होईल.


➤ कर्नाटक राज्यासंबंधी :-


◆ राजधानी :- बेंगळुरू (कार्यकारी शाखा),

◆ राज्यपाल :- थावर चंद गहलोत,

◆ मुख्यमंत्री :- बसवराज बोम्मई.

कॅच द रेन 2023' मोहीम द्रौपदी मुर्मूने सुरू केली आहे.




🔹राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी असा दावा केला की अनियंत्रित शहरीकरणामुळे जलसंधारणाच्या पारंपारिक पद्धती देशात सोडल्या गेल्या आहेत.


🔸पाण्याची टंचाई आणि ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांचे परिणाम आहेत यावर राष्ट्रपतींनी भर दिला.


🔹नवीन तंत्रज्ञानाचा वापर करूनही, जुनी जलसंधारण तंत्रे टिकवून ठेवणे आणि पुनर्संचयित करणे अत्यावश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.


🔸जलसंधारण आणि स्वच्छता यांमध्ये महिलांनी बजावलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी स्वच्छ भारत मिशनच्या अनेक श्रेणींमध्ये ग्रामीण, जल जीवन मिशन आणि राष्ट्रीय जल मिशनसह "स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023" प्रदान केले.


-------------------------------------------------------

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...