१० डिसेंबर २०२२

असहकार आणि खिलाफत आंदोलन

·         गांधीजींनी व काँग्रेसने असहकाराचे अहिंसक आंदोलन सप्टेंबर 1920 मध्ये सुरु केले.

·         पंजाबात व खिलाफतीबद्दल जो अन्याय झाला होता तो दूर होऊन स्वराज्य मिळेपर्यंत ते चालू राहावयाचे होते.

·         गांधीजींनी एका वर्षात स्वराज्य अशी घोषणा केली. सरकारमान्य शाळा महाविद्यालये, कोर्टकचेर्‍या, विधिमंडळे व परदेशी कापडहयांवर बहिष्कार घालण्याचा व सरकारने दिलेल्या पदव्या किताबांचा त्याग करण्याचा जनतेला आदेश देण्यात आला.

·         नंतर सरकारी नोकर्‍याचे राजिनामे आणि करबंदी सुरु करुन या आंदोलनाला जनतेच्या सत्याग्रहाचे स्वरुप देण्याचा कार्या होता. राष्ट्रीय शाळा व महाविद्यालये सुरु करण्यात आली. स्वहस्ते सूत कातून खादी तयार करण्याचे, अस्पृश्यता न पाळण्याचे व हिंदू मुस्लिम ऐक्याचे संवर्धन करुन ते टिकविण्याचे जनतेला आदेश देण्यात आले. भाषिक आधारावर प्रांतिक काँग्रेस समित्या संचलित करण्यात आल्या.

·         काँग्रेस संघटना अगदी खेडयांपर्यंत पोहोचली व तिच्या सभासदत्वाचे वार्षिक शुल्क केवळ चार आणे ठेवण्यात आले. ग्रामीण व शहरी भागांतील गरीब जनतेलाही सभासद होता यावे हा त्यामागचा उद्देश होता.

·         या पहिल्या जनआंदोलनास 1920 ते 1922 दरम्यान अभूतपर्व स्वरुप प्राप्त झाले. लाखो विद्याथ्र्यांनी शाळा महाविद्यालये सोडली. शेकडो वकिलांनी आपली प्रॅक्टिस सोडून दिली.

·         परदेशी कापडावरील बहिष्कार हे एक जनआंदोलन बनले व परदेशी कापडाच्या हजारो होळयांनी भारतीय नभोमंडळ उजळून गेले.

·         परदेशी कापड विकणार्‍या व दारुच्या दुकानांवरील निरोधनाचा कार्याही विशेष यशस्वी ठरला.

·         या आंदोलनात अनेक विभागांत कामगार आणि शेतकरी आघाडीवर होते. तरीही गांधीजी संतुष्ट नव्हते.

·         ता. 5 फेब्रुवारीस चौरीचौराची घटना घडली.

·         तीन हजार शेतकर्‍यांच्या एका काँग्रेस मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला व त्यचा सूड म्हणून प्रक्षुब्ध जमावाने पालिसचौकीच पेटवून दिली. त्यांत 22 पोलिस ठार झाले.

·         गांधीजींनी हया प्रकाराची विशेष गांभीर्याने दखल घेतली व अहिंसात्मक चळवळीची जनतेला अद्याप योग्य शिकवण मिळाली नाही, असे वाटून त्यांनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी हे आंदोलन मागे घेतले. मात्र या चळवळीचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहणारे होते.

(1) त्यामुळे प्रथमच लक्षावधी शेतकरी व नागरी विभागांतील गरीब जनता राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात आली. किंबहुना सार्‍या भारतीय जनतेलाच आता अस्मितेची जाणीव झाली. त्यात शेतकरी, कामगार, कारागीर, ददुकानदार, व्यापारी, डॉक्टर, इतर व्यावसायिक व कचेर्‍यांत काम करणार्‍या नोकरवर्गाचाही समावेश होता. स्त्रियांही या आंदोलनाकडे आकर्षित झाल्या. देशाच्या अगदी दूरवरच्या कोपर्‍यापर्यंत ही चळवळ फैलावली. किंबहुना जनतेची लढयाची प्रवृज्ञ्ल्त्;ाी आणि स्वार्थत्यागाची भावना यावरच गांधीजींनी आपले सर्व राजकारण आधारले होते. त्यांनी जनतेला राष्ट्रीय संग्रामाच्या आघाडीवर आणले व त्यांचे जनआंदोलनात रुपांतर केले.

(2) भारतीय जनता आता निर्भय बनली. आता ब्रिटिश साम्राज्यशाहीची तिला भीती वाटेनाशी झाली. नेहरुनी नंतर म्हटल्याप्रमाणे गांधीजींनी त्यांच्यातील पौरुषत्व जागृत केले. सार्‍या देशाच्या बाबतीत असेच घडले.

(3) या संदर्भात असे ध्यानात घ्यावयास हवे की अहिंसा हे दुबळया व भेकडांचे शस्त्र आहे. असे गांधीजी मुळीच मानीत नसत. अगदी खंबीरवृज्ञ्ल्त्;ाीची माणसेच त्याचा उपयोग करु शकत. भेकडपणापेक्षा मला हिंसाचार परवडेल, असे गांधीजींनी पुन: पुन्हा सांगितले आहे. १९२० मध्येच त्यांनी म्हटले होते की, ज्ञ्थ्ुेत्;भिरुता की हिंसा एवढाच पर्याय असेल तर खुशाल हिंसाचाराचा अवलंब करा असाच मी सल्ला देईन, भेकड वृत्तीवरने असहाय्यपणे आपला अवमान निमूटपणे पाहात राहण्यापेक्षा आपल्या मानाच्या रक्षणासाठी हिंदी जनतेने हिंसेचा अवलंब केला तरी मला चालेल.

·         असहकार चळवळीचा अत्यंत महत्वाचा परिणाम म्हणजे हिंदी जनतेचा आत्मविश्र्वास आणि स्वाभिमान फार मोठया प्रमाणात वाढला.

·         आता भारतीय जनतेचे साम्राज्यशाहीशी युध्दच सुरु झाले होते.

·         एखाद्या लढाईत तात्पुरता पराभव पत्करावा लागला तरी आपल्या ध्येयाकडील वाटचालीपासून आता कोणीही तिला विचलित करु शकणार नव्हते.

·         ता. 23 फेब्रुवारी 1922 ला चळवळ मागे घेताना गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे, ब्रिटिश जनतेला जाणीव करुन देण्यास हीच योग्य वेळ आहे.

·         1920 मध्ये जो संग्राम सुरु झाला तो आता शेवटाला जाईपर्यंत चालू राहणार आहे.

·         मग तो एक महिना वा एक वर्ष किंवा कित्येक महिने वा कित्येक वर्षे चालो अथवा स्वातंत्र्ययुध्दाच्या दिवसांत ब्रिटिशांच्या प्रतिनिधींनी जो वर्णनातील धुमाकूळ घातला तसा ते नव्या जोमाने घालोत वा न घालोत, संग्राम चालूच राहील.

दर वर्षी 1 प्रश्न Fix असतोच नक्की वाचा, एवढ्या माहितीमुळे तुमचा 1 मार्क वाढेल

     

               🔊🌸🔰 धवनी 🔰🌸🔊


‘🔊 धवनी म्हणजे ऐकण्याची संवेदना 👂


🔰 धवनीचे स्वरूप : ‘ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते’.


🔰 धवनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.


🔰 परत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.


🌷🌷कपन 🌷🌷


🔰 वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.


🔰 उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने


🔰 धवनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.


🔰 वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.


🔰 धवनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.


🔰 धवनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.


🔰 परत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.


🌷🌷धवनी तरंगाची वैशिष्ट्ये :🌷🌷


🔰 जव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.


🌷🌷सपीडने 🌷🌷


🔰 कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.


👉🏻 सपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.


🌷🌷विरलने 🌷🌷


🔰 कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.


👉🏻 विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.


🔰 दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.


👉🏻 तयाचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.


🌷🌷वारंवारता :🌷🌷


🔰 घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.


🔰 एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.


👉🏻 धवनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.


👉🏻 तयाचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.


🌷🌷तरंगकाल :🌷🌷


🔰 लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे ‘तरंगकाल’ होय.


🔰 माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.


👉🏻 तो ‘T‘ ने दर्शविला जातो.


👉🏻 SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.


👉🏻 u=1/t


🌷🌷धवनीचा वेग :🌷🌷


🔰 तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.


👉🏻 वग = अंतर/काल


👉🏻 एका तरंगकालात कापलेले अंतर,


👉🏻 वग = तरंगलांबी/तरंगकाल


👉🏻 वग = वारंवारता*तरंगलांबी


🌷🌷मानवी श्रवण मर्यादा :🌷🌷


🔰 मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.


🔰 पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.


🌷🌷शरव्यातील ध्वनी :🌷🌷


🔰 20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्‍या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.


🔰 निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.


👉🏻 उपयोग :


🔰 जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.


🌷🌷धवनीचे परिवर्तन :🌷🌷


🔰 धवनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.


🔰 धवनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.


🌷🌷परतिध्वनी :🌷🌷


🔰 मल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.


👉🏻 अतर = वेग*काल


🌷🌷निनाद :🌷🌷


🔰 एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.


🌷🌷सोनार (SONAR):🌷🌷


🔰 Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.


🔰 पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.


जालियनवाला बाग हत्याकांड :

लोकमान्य टिळकांना अखेरच्या काळात, भारतीय राष्ट्रीय चळवळीत महात्मा गांधीचे आगमन झाले.भारतीय जनतेच्या ब्रिटिश शासनाविरुध्दच्या असंतोषाला त्यांनी सत्याग्रह व व्यापक जनआंदोलनाव्दारे वाचा फोडली.इ.स. 1920 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्यलढयाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली.



🔶सुरवातीचे सत्याग्रह :-


भारताच्या राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी गांधीजीनी दक्षिण आफ़्रिकेतील गौरवणीय सरकारच्या वर्णव्देषी धोरणाविरूध्द सत्याग्रहाच्या तंत्राचा प्रथमत: आणि यशस्वीरीत्या वापर केला.

दक्षिण आफ़्रिकेतून परत आल्यानंतर 1917 साली चंपारण्य येथील नीळ-उत्पादक शेतकर्‍यांच्या आणि गुजरातमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या अहिंसात्मक आंदोलनाद्वारा गांधीजीनी आपले सत्याग्रहाचे तंत्रउपयुक्त असत्याचे दाखवून दिले.त्यांनी याच तंत्राचा यशस्वी उपयोग 1918 साली खेडा जिल्हयात साराबंदीच्या चळवळीत आणि अहमदाबादच्या गिरणी कामगारांच्या संपात केला.


🔶जालियनवाला बाग हत्याकांड :-


पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती.1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली.

त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला.

गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले.


या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.भारतीय जनतेने या घटनेचा सार्वत्रिक निषेध केला.


कुका आंदोलन

√ पंजाब प्रांतातील एक प्रसिद्ध चळवळ.
या आंदोलनास कुका चळवळ, नामधारी चळवळ, नामधारी शीख आंदोलन या नावांनीही संबोधले जाते.

√  १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात पंजाब प्रांतामध्ये देशभक्ती व क्रांतिकारी भावना जागविण्याचे कार्य या आंदोलनाच्या माध्यमातून झाले.

√ शीख धर्मनेते भाई बालकसिंह (१७८४–१८६२) यांचे शिष्य भाई रामसिंह कुका (१८१६–१८८५) हे या आंदोलनाचे मुख्य प्रणेते.

√  ब्रिटिशांनी पंजाबची २१ प्रांतांत विभागणी केली व त्यांचे अन्यायकारक रीत्या ब्रिटिश साम्राज्यात विलीनीकरण करून प्रत्येक प्रांतावर ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.

√  ब्रिटिश सरकारच्या पंजाब विलीनीकरण धोरणामुळे पंजाब प्रांतातील शेतकरी, कष्टकरी व कारागीर यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.

√  तसेच ब्रिटिशांनी भाई रामसिंह यांच्या पत्नी राणी जिंदा (१८१७–१८६३), दिवाण मूलराज (१८१४–१८५१), भाई महाराजसिंह (मृत्यू १८५६), महाराजा दिलीपसिंह (१८३८–१८९३) यांना दिलेल्या अन्यायकारक वागणुकीमुळे व गोवधबंदी उठविल्यामुळे भाई रामसिंह यांच्या मनात ब्रिटिशविरोधी असंतोष वाढत गेला.

√   त्यांनी आपल्या अनुयायांना पांढरी पगडी, पांढरी वेशभूषा, पांढऱ्या लोकरीपासून तयार केलेले कपडे व स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याची शिकवण दिली.

√  लग्नसोहळ्यातील हुंडाप्रथा व अनावश्यक खर्च टाळण्यास, तसेच भ्रूणहत्या (कन्यावध) बंदी करण्यासाठी समाजप्रबोधन केले.

√  सरकारी शाळा, न्यायव्यवस्था, रेल्वे, डाकव्यवस्था यांवर बहिष्कार घालून भाई रामसिंह यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार पुकारला; परंतु ब्रिटिश सरकार, रूढी-परंपरावादी लोक, ख्रिश्चन धर्मप्रचारक व काही मुस्लिमांना त्यांचे शांततापूर्ण असहकार धोरण धोकादायक वाटू लागले.

√  त्यामुळे ब्रिटिश सरकारने भाई रामसिंह यांना इ. स. १८६३ मध्ये भैणी या गावात नजरकैद केले.

√  पंजाब प्रांतात ब्रिटिश शासनाच्या स्थापनेपासून गोहत्यांच्या घटनांत वाढ झाली. त्यामुळे कुकांनी एप्रिल १८७१ पासून गोवध करणाऱ्या कत्तलखान्यांवर आक्रमकपणे आंदोलनास सुरुवात केली. रामपूर मलौध दुर्ग येथे गोहत्या प्रश्नावर कुका आंदोलकांनी संघर्ष केला.

√  १५ जानेवारी १८७२ रोजी मलेरकोटला रियासतमधील गोवध करणाऱ्या कत्तलखान्यावर कुका आंदोलकांनी हल्ला केला. यावेळी लुधियानाचे ब्रिटिश आयुक्त कांबन यांनी ६८ निःशस्त्र कुका आंदोलकांना अटक करून ५० आंदोलकाना तोफेच्या तोंडी दिले.

√  यांमध्ये १३ वर्षांचा एक बालक बिशनसिंहही होता. दुसऱ्या दिवशी इतर कुका आंदोलकांना फाशी देण्यात आली. एकाच वेळी ६८ कुका आंदोलकांचे बलिदान ही भारतीय स्वातंत्र्यसंग्राम इतिहासातील अद्भुत घटना होती.

√  ब्रिटिश सरकारने कुका आंदोलकांचे प्रणेते भाई रामसिंह यांना भारतातून हद्दपार करून बर्मा (ब्रह्मदेश) येथे पाठविले. तेथेच त्यांचा वयाच्या ६१ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतरही कुका आंदोलन चालूच राहिले.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

०९ डिसेंबर २०२२

पंचवार्षिक योजना

✅ पहीली पंचवार्षिक योजना
--कालावधी-०१ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६
अध्यक्ष-पंडित जवाहरलाल नेहरू
उपाध्यक्ष-गुलझारीलाल नंदा
प्रतिमान-हेरोल्द डोमर
उपनाव-पुनरुत्थान

✅ दुसरी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च १९६१
अध्यक्ष-पंडित जवाहरलाल नेहरू
उपाध्यक्ष-महालनोबीस/व्ही.टी कृष्णामाचारी
प्रतिमान- महालनोबीस
उपनाव- नेहरू-महालनोबीस भौतिकवादी

✅ तिसरी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९६१ ते ३१ मार्च १९६६
अध्यक्ष-पंडित जवाहरलाल नेहरू(६१-६४) लाल बहादूर शास्त्री(६४-६६)
उपाध्यक्ष-व्ही.टी कृष्णामाचारी
प्रतिमान- महालनोबीस

💥 तीन सरकत्या योजना

--पहिली वार्षिक योजना(१ एप्रिल ६६ – ३१ मार्च ६७)
दुसरी वार्षिक योजना योजना(१ एप्रिल ६७ – ३१ मार्च ६८)
तिसरी वार्षिक योजना योजना(१ एप्रिल ६८ – ३१ मार्च ६९)

✅ चौथी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४
अध्यक्ष- श्रीमती इंदिरा गांधी
उपाध्यक्ष- अशोक मेहता
प्रतिमान- अलन रुद्र

✅ पाचवी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७८
अध्यक्ष- श्रीमती इंदिरा गांधी
उपाध्यक्ष- धनंजय गाडगीळ
प्रतिमान- अलन रुद्र

✅ सहावी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९८० ते ३१ मार्च १९८५
अध्यक्ष- श्रीमती इंदिरा गांधी/राजीव गांधी
उपाध्यक्ष- डी.पी.धर
प्रतिमान- अलन रुद्र

✅ सातवी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९८५ ते ३१ मार्च १९९०
अध्यक्ष- राजीव गांधी
उपाध्यक्ष- मनमोहन सिंग
प्रतिमान- वकील ब्रह्मानंद(मजुरी-वस्तू)

वार्षिक योजना (१९९० - १९९२)

--१ jully १९९१ रुपयाचे अवमूल्यन भाव वाढ
२४ jully १९९१ चे नवीन आर्थिक धोरण
१९९०-९३ तिसरे आयात निर्यात धोरण

✅ आठवी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च १९९७
अध्यक्ष- पी व्ही नरसीह राव
उपाध्यक्ष- प्रणव मुखर्जी
प्रतिमान- राव /डॉ मनमोहन सिंग

✅ नववी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२
अध्यक्ष- देवेगौडा / अट्टल बिहारी वाजपेयी
उपाध्यक्ष- जसवंतसिंग / के.सी.पंत
प्रतिमान- गांधीवादी

✅ दहावी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७
अध्यक्ष- अट्टल बिहारी वाजपेयी
उपाध्यक्ष- के.सी.पंत
प्रतिमान- गांधीवादी
घोषवाक्य- समानता व सामजिक न्याय

✅ अकरावी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१२
अध्यक्ष- डॉ.मनमोहन सिंग
उपाध्यक्ष- मोन्तेग सिंग अहलुवालिया
प्रतिमान- नवे गांधीवादी
घोषवाक्य- वेगवान व सर्वसमावेशक विकास

✅ १२ वी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७
अध्यक्ष- डॉ.मनमोहन सिंग
उपाध्यक्ष- मोन्तेग सिंग अहलुवालिया
प्रतिमान- नवे गांधीवादी
घोषवाक्य- वेगवान शाश्वत व सर्वसमावेशक वृद्धी

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना

♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.


♦️ सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.


♦️राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.


♦️तयामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.


♦️कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

०८ डिसेंबर २०२२

रिझर्व बँक ऑफ इंडिया ची कार्ये


1) चलन विषयक धोरण अंमलबजावणी – चलन विषयक धोरणांच्या अंमलबजावणीची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर टाकण्यात आली आहे. रिझर्व बँक दर सहा महिन्यांनी चलनविषयक धोरण अहवाल प्रकाशित करते, या अहवालात चलनवाढीचे स्त्रोत, पुढील 6 महिने ते 18 महिन्यातील चलनवाढीच्या शक्‍यता या बाबी स्पष्ट केलेल्या असतात .


2) चलन प्रचालन – एक रुपयाची नोट सोडून इतर सर्व नोटा छापण्याचे काम रिझर्व बॅंक करते सर्व नाणी व सर्व नोटांचे प्रचालनाचे (म्हणजे व्यवहारात आणण्याचे) काम रिझर्व बँक करते.


3) सरकारची बँक – सरकारच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी रिझर्व बँकेवरती असते. रिझर्व बँक कायदा 1934 नुसार केंद्र सरकारचे पैसा देणे विनिमय बँकिंग व्यवहार आणि कर्ज याबाबत विश्वसनीय म्हणून रिझर्व बॅंक काम पाहते. करार केल्यास राज्य सरकार यांसाठी बँकर आणि कर्जाची व्यवस्थापक म्हणून रिझर्व बँक काम पाहू शकते.

 

4) बँकांची बँक – देशातील सर्व बँकांचे खाते रिझर्व बँकेत असते. या खात्यामार्फत रिझर्व बँक बँकांना बँकिंग सुविधा पुरवते. रिझर्व बँक इतर बँकांना कर्ज पुरवते, बँकांसाठी अंतिम त्राता म्हणून उभी राहते, बँकांना धोरणात्मक सल्ला व मार्गदर्शन रिझर्व बॅंक देत असते.


5) निरसन गृह –

रिझर्व बँक निरसन गृह म्हणून कार्य करते. आंतर बँक व्यवहारांची पूर्तता करणारे केंद्र म्हणजे निरसन गृह होय. प्रत्येक बँकेकडे इतर बँकाकडून चेक, डिमांड ड्राफ्ट इत्यादी बाबी वटवण्यात येत असतात. तसेच इतर बँकांचे त्या बँके वरती चेक, डिमांड ड्राफ्ट आलेले असतात. अशा व्यवहारातून प्रत्येक बँकेला इतर बँकाकडून काही पैसे येणे व काही देणे असतात या व्यवहारांची पुर्तता करण्यासाठी बँकांचे प्रतिनिधी प्रत्येक दिवशी निरसन गृहांमध्ये एकत्र जमून आपापसातील निव्वळ येणी-देणी ठरवतात. हा व्यवहार रोखीने करण्याऐवजी आरबीआय वर चेक, ड्राफ्ट काढून पूर्ण केला जातो. प्रत्येक बँकेचे आरबीआय मध्ये खाते असते त्या चेक, ड्राफ्ट नुसार आरबीआय संबंधित बँकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करते किंवा कमी करते.


6) पतनियंत्रण – व्यापारी बँका ठेवी स्वीकारून त्यातून कर्ज देत असतात या प्रक्रियेत बँक पतनिर्मिती करीत असतात व्यापारी बँकेच्या पत निर्मितीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य आरबीआय करते.

 

7) परकीय चलन साठ्याचा नियंत्रक – देशाच्या परकीय चलन साठ्याचा सांभाळ आरबीआय करते. चलनाच्या अंतर्गत व बहिर्गत मूल्य स्थिर राखण्याचे कार्य आरबीआयला करावे लागते. रिझर्व बँक ऑफ इंडिया चलन साठ्याचा सांभाळ करून त्याचा वापर व्यवहार तोल संतुलित ठेवण्यासाठी तसेच रुपयाचा विनिमय दर स्थिर राखण्यासाठी करते. रुपयाचा विनिमय दर स्थिर राखण्याच्या आरबीआयच्या धोरणाला Sterilisation Policy असे म्हणतात.


8) बँक व्यवस्थेची नियंत्रक – रिझर्व बँक बँकिंग व्यवस्थेचे नियंत्रण करीत असते. देशातील सर्व व्यापारी बँका वित्तीय संस्था यांचे नियमन रिझर्व बँक करते. प्रादेशिक ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्य सहकारी बँका यांच्या कामकाजाचे नियमन रिझर्व बँकेचा ग्रामीण नियोजन व पत विभाग करतो.

खास सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त

1. जय एक वस्तू 70 रु. ला खरेदी करतो आणि 84 रुपयास विकतो तर या व्यवहारात जयला किती % नफा होतो?

 1) 25
 2) 20
 3) 30
 4) 10

उत्तर : 20

2. जानवी एक वस्तू 400 रूपायास खरेदी करते त्यावर तिला खरेदी किमतीच्या 1/4 नफा होतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?

 1) 400
2)  450
 3) 475
 4) 500

उत्तर : 500

3. आचल एक खुर्ची 360 रुपयास विकते त्यावर तिला 20% नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

1)  380
 2) 340
 3) 300
 4) 500

उत्तर : 300

4. एका विक्रेता काही वस्तू 200 रूपयास खरेदी करतो. त्यावर त्याला खरेदी किमतीच्या 1/5 नफा होतो. तर त्याला किती टक्के नफा होतो?

1)  20
 2) 25
 3) 30
 4) 40

उत्तर : 20

5. एक विक्रेता एक ड्रेस 350 रुपयास खरेदी करतो व 20% नफ्याने विकतो तर त्याची विक्री किंमत किती?

 1) 370
 2) 280
 3) 300
 4) 420

उत्तर : 420

6. 12 साबनांची खरेदी किंमत ही 10 सबनांच्या विक्री किमती एवढी आहे तर या व्यवहारात विक्रेत्याला किती % नफा या तोटा होतो?

 1) 20% तोटा
 2) 25% नफा
 3) 20% नफा
 4) 25% तोटा

उत्तर : 20% नफा

7. एक वस्तू दिलीप 89 रूपयास विकतो. त्यामुळे त्याला तोटा होतो. तेवढाच नफा ती वस्तु 121 रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

 1) 100
 2) 210
 3) 70
 4) 105

उत्तर : 105

8. एका वस्तूची छापील किंमत 1200 रुपये आहे. छापील किंमतीवर विक्रेता 15% सूट देतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?

 1) 1020
 2) 1050
 3) 1000
 4) 1215

उत्तर : 1020

9. एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे. त्या वस्तूवर 20% नफा ठेवून राज ती वस्तू 720 रुपयास विकतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

1)  740
 2) 700
 3) 750
 4) 600

उत्तर : 600

10. एक वस्तू 37 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 57 रुपयास विकल्याने होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

1)  67
 2) 37
 3) 57
 4) 47

उत्तर : 47


वाचा :- रुपायाचे अवमूल्यन (Devaluation Of Rupee)

अर्थ: रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे म्हणजे अवमूल्यन होय


परिणाम: 


आयातीचे आकारमान कमी होते

निर्यातीचे आकारमान वाढते

आत्तापर्यंत रुपयाचे तीन वेळा अवमूल्यन घडून आले आहे.


🛑 पाहिले अवमूल्यन, 1949


26 सप्टेंबर 1949 5% (अमेरिकन डॉलरच्या संदर्भात) तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई.


🛑 दसरे अवमूल्यन, 1966


6 जून 1966 5% (अमेरिकन डॉलर व इतर हार्ड चलन)

उद्दिष्ट्ये: हार्ड चलन देशांकडून होणारी आयात कमी करणे

निर्यात वाढवणे

 व्यापारतोल कमी करणे

तत्कालीन अर्थमंत्री: सचिन चौधरी.


🛑तिसरे अवमूल्यन, 1991


तीन टप्प्यांमध्ये

1 जुलै 1991 9%

3 जुलै 1991 10 ते78%

15 जुलै 1991 2%

सरासरी 5%

तत्कालीन अर्थमंत्री: मनमोहन शिंग.

मराठी व्याकरण



१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ? 

o   विश्वास पाटील

o   आनंद यादव

o   रणजीत देसाई

o   शिवाजी सावंत ✅


२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ? 

o   यशवंत कानेटकर

o   वि. स. खांडेकर ✅

o   व्यंकटेश माडगुळकर

o   आण्णाभाऊ साठे


३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ? 

o   आण्णाभाऊ साठे ✅

o   बा. भ. बोरकर

o   गौरी देशपांडे

o   व्यंकटेश माडगुळकर


४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ? 

o   लक्ष्मीकांत तांबोळी

o   प्रा. व. भा. बोधे

o   विश्वास महिपाती पाटील ✅

o   वा. म. जोशी


५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ? 

o   गावचा टिनोपाल गुरुजी ✅

o   चंद्रमुखी

o   ग्रंथकाली

o   मंजुघोषा


६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत . 

o   नामदेव ढसाळ ✅

o   दया पवार

o   जोगेंद्र कवाडे

o   आरती प्रभू


७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? 

o   झाडाझडती

o   संभाजी

o   बनगरवाडी ✅

o   सात सक त्रेचाळीस


८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ? 

o   श्री. ना, पेंडसे

o   भालचंद्र नेमाडे ✅

o   रा. रं. बोराडे

o   ग.ल. ठोकळ 


९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ? 

o   मुक्तामाला

o   बळीबा पाटील

o   यमुना पर्यटन ✅

o   मोचनगड


१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? 

o   एकेक पान गळावया ✅

o   स्फोट

o   कल्याणी

o   झाड


११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ? 

o   गौरी देशपांडे

o   शैला बेल्ले

o   जोत्स्ना देवधर

o   सुमती क्षेत्रमाडे ✅


१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ? 

o   डॉ. यशवंत पाटणे ✅

o   आशा कर्दळे

o   ह.ना.आपटे

o   व.ह. पिटके


१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ? 

o   वामन परत आला

o   जगबुडी

o   एक होता फेंगाड्या

o   गावपांढर ✅


१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ? 

o   राजेंद्र मलोसे ✅

o   भाऊ पाध्ये

o   दादासाहेब मोरे

o   जयंत नारळीकर


१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? 

o   कल्पनेच्या तीरावर ✅

o   गारंबीचा बापू

o   पांढरे ढग

o   वस्ती वाढते आहे


अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion)

◆ 2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी  होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी  आहेत त्याचा आढावा.....

◆ कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.

1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.

2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.

4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.

5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.

6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.

7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.

८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.

9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.

10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.

11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.

आत्मविश्वास वाढवायचाय ?

'आत्मविश्वास' या शब्दातच यशाचे गमक दडलेले असते. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही सहज मिळवू शकता. काही खास टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा आत्मविश्वास नक्की वाढवू शकता...

1) टेन्शन नही लेने का : सतत हसत रहा. तुम्हाला कितीही टेन्शन असलं तरी ते चेहऱ्यावर दिसू देऊ नका. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. अपयश आलं तरी त्याचा त्रास करून घेऊ नका. कारण टेन्शन घेतलं कि, आत्मविश्वास कमी होत असतो.

2) पेहरावाकडे लक्ष द्या : तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता. त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होत असतो. चांगले दिसण्याने तुम्ही लोकांना आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता. कारण चार-चौघात आपण कसे दिसतो? अशा शंकांमुळे न्यूनगंड निर्माण होत असतो. म्हणून पेहरावाकडे लक्ष द्या.

3) यशस्वी लोकांकडे लक्ष द्या : तुमच्या आसपास अशी काही लोक असतात. ज्यांना पाहून तुम्हाला वाटते ती व्यक्ती आत्मविश्वासाने पूर्ण आहे. अशा लोकांकडे लक्ष्य द्या आणि ती करत असलेल्या गोष्टी तुमच्या दैनंदिन आयुष्यात फॉलो करा.

4) प्रयत्न करा : एखादी गोष्ट जमत नसेल तर तिला सोडून देऊ नका. ती पूर्ण करण्यासाठी निदान प्रयत्न तरी करा. कारण प्रयत्न केल्यावरही अपयश आलं तरी त्यातून मिळालेला अनुभव तुम्हाला खूप शिकवून जातो. म्हणून प्रयत्न करणं कधीही सोडू नका.

5) तुलना नको : स्वतःची दुसऱ्या व्यक्तीबरोबर कधीच तुलना करूच नका. कारण समोरचा कसा आहे? हे फक्त समोरून दिसत असते. त्याच्याबाबत पूर्ण सत्य आपल्याला माहिती नसते. म्हणून त्याच्याशी तुलना करू नका.

6) मान्य करा : बदल करण्यासाठी व आत्मविश्वास वाढण्यासाठी कोणतीही गोष्ट मान्य करायला पाहिजे. जसे कि, एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ती मान्य करा उगाच मिरवत बसू नका.

7) बिनधास्त बोला : तुम्ही जर दबलेल्या आवाजात बोलत असाल. तर ते आजच बंद करा. कारण यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. म्हणून बिनधास्त बोला.

8) स्वत:ची स्तुती करा : दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवा व स्वतःची स्तुती करा. यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

०३ डिसेंबर २०२२

अर्थव्यवस्था प्रश्न सराव

1) भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात.

   अ) श्री. एम. एन. रॉय यांचे पुस्तक “प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया”

   ब) श्री. विश्वेश्वरय्या यांचे “टेन यिअर पिपल्स प्लॅन”

        वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?


   1) केवळ अ   

   2) केवळ ब 

   3) दोन्ही     

   4) एकही नाही


उत्तर :- 4


2) राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005-10) सुचविली आहे ?

   1) ग्रामपंचायत आणि नगरपालिकांचा वित्तीय साधनांना पूरक निधी

   2) विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देणे

   3) रस्ते आणि पूल बांधणे

   4) आर्थिक विकासास चालना देणे


उत्तर :- 2


3) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ............. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

   1) 50.3   

   2) 40.4    

   3) 45.0     

  4) 58.4


उत्तर :- 1


4) दारिद्रय निर्मुलन (गरीबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही .............. पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती.

1) तिस-या    

2) पाचव्या   

3) दुस-या    

4) सहाव्या


उत्तर :- 2


5) उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली.

   1) नवव्या    

  2) सातव्या  

  3) आठव्या   

  4) वरीलपैकी नाही


उत्तर :- 1



6) योग्य जोडया जुळवा.

   अ) 1 ली योजना      i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान    

   ब) 2 री योजना      ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान

   क) 8 वी योजना      iii) महालनोबिस प्रतिमान

   ड) 11 वी योजना    iv) पुरा प्रतिमान

  अ  ब  क  ड

         1) i  ii  iii  iv

         2) ii  iii  iv  i

         3) ii  iii  i  iv

         4) iv  i  ii  iii


उत्तर :- 3


7) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील  आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

   अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर

   ब) दारिद्रय आणि बेकारी

   क)‍ संथ औद्योगिकरण

   ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता

   1) ब, ड आणि क 

   2) अ आणि ब   

   3) अ, ब आणि क  

  4) ब आणि ड


उत्तर :- 4


8) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या 

     खालीलप्रमाणे –

   अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

   ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

   क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

         वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत  ?


   1) अ आणि क     

   2) ब आणि क   

   3) फक्त अ    

   4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


9) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

   1) बॉम्बे प्लॅन (योजना)   

   2) गांधी योजना   

   3) नेहरू योजना   

   4) पंचवार्षिक योजना


उत्तर :- 1


10) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

     1) कर्नाटक  

     2) महाराष्ट्र    

     3) गुजरात  

    4) राजस्थान


उत्तर :- 4

०२ डिसेंबर २०२२

प्रश्न मंजुषा



🔴 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.

१) मोद्रिक धोरण.
२)राजकोषीय धोरण ✔️✔️
३)द्रव्य निर्मिती
४) चलनविषयक धोरण
_____________________________

🟠 सटेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे.
१) लोखंड व कार्बन
२) लोखंड क्रोमियम व निकेल ✔️✔️
३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट
४) लोखंड टीन व कार्बन
_____________________________

🟡 गरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.

१)छोटा नागपूर
२)अरवली ✔️✔️
३) मालवा
४) विध्य
_____________________________

🟢  खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.
१) कांगारू
२) पेग्विन
३) व्हेल
४) प्लॅटिपस ✔️✔️
_____________________________

🔵 पचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे
१)दुसरे
२)पाचवे
३)सातवे
४)नववे ✔️✔️
_____________________________
🟣  रक्तगटाचा शोध कोणी लावला

१) लॅडस्टयनर ✔️✔️
२)फुन्क
३)स्टेड
४)विल्यम हार्वे
_____________________________

⚫️........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते
१)पारा
२) चांदी
३) पाणी ✔️✔️
४) लोखंड
_____________________________
🟤 भारतीय राष्ट्वादाचे जनक या‌ऺना म्हटले आहे.

१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी  ✔️✔️
२) लोकमान्य टिळक
३) न्यायमूर्ती रानडे
४)म.गांधी
_____________________________

🔴....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो
१)ग्लुकोज
२) लक्टोज
३)रेनिन
४)केसिन ✔️✔️
_____________________________

🟣 वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.
१)सी -१४  ✔️✔️
२) सी -१३
३) सी -१२
४) यापैकी एकही नाही

_____________________________

१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद ✅✅
४) नरेंद्र मोदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)✅✅
२) CH4
३) NO2
४) CO2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८✅✅
३) २०१३
४) २०१८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✅✅
३) २ वेळा
४) ५ वेळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर✅✅
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028✅✅
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✅✅
४) कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका ✅✅
४) दक्षिण आफ्रिका

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  ✅✅
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा ✅✅
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✅✅
४) स्मिता कोल्हे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५० ✅✅
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ?

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✅✅
४) शरद पवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्राचा इतिहास




⭕️ मौर्य ते यादव ⭕️


(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)



👉 मौर्य साम्राज्याचा काळ


महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.



👉 सातवाहन साम्राज्याचा काळ


सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.



👉 वाकाटकांचा काळ


वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.



👉 कलाचुरींचा काळ


वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.



👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ


वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.



👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ


वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.



👉 यादवांचा काळ


महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

________________________________________

विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात


 भारतामधील महत्वाच्या गोष्टी व घडामोडी यांची सुरुवात कधी व कोठे झाली, याबाबतची माहिती जाणून घेऊ.
▪ पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)
▪ पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)
▪पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन- मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)
▪ पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)
▪ पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)
▪ पहिले राष्ट्रीय उद्याण- जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)
▪ पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)
▪ पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली
▪ पहिले व्यापारी विमानोड्डापण-  कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)
▪ पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)
▪ पहिले पंचतारांकित हॉटेल- ताजमहाल, मुंबई (1903)
▪ पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)
▪ पहिला बोलपट- आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)
▪ पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा
▪ पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)
▪ पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)
▪ पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल
▪ पहिले दूरदर्शन केंद् - दिल्ली (1959)
▪ पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)
▪ पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)
▪ पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा
▪ पहिले रासायनिक बंदर दाहेज - गुजरात
▪ भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता
▪ पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)
▪ भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव

संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम

जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू

खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू

खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग

कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर

दक्षिण भारतातील उठाव

पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास

म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर

विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर

रोहिलखंडातील उठाव : 1801 - रोहिलखंड

रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर

फोंडा सावंतचा उठाव : 1838

भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी

०१ डिसेंबर २०२२

गूणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती :-

१) डाऊन सिंड्रोम/मंगोलिकता :- 46+1

●  यात गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे असतात 

● (46+ 1) या विकृतीला ट्रायसोमी - 21 असेही म्हणतात. (21व्या गुणसूत्राची त्री - समसुत्री अवस्था)

● कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशींमध्ये 21 व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर 1 अधिकचे गुणसूत्र असते.

 ● त्यामुळे अशा  अर्भकात 46 ऐवजी  47 गुणसूत्रे दिसतात.

● अशी बालके शक्यतो मतिमंद व अल्पायुषी असतात. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्ये आहे.

_____________________________


२) टर्नर सिंड्रोम :- 44+X

● लिंग गुणसूत्रांतील अपसामान्यतेमुळे निर्माण होतो.

● या विकारांत X गुणसूत्रातील लैंगिकतेशी संबंधित भाग निकामी झालेला असल्याने एकच X गुणसूत्र कार्यरत असते किंवा जनकांकडून एकच X गुणसूत्र संक्रमित होते.

● अशा स्त्रियांमध्ये 44+XX या स्थिती ऐवजी 44+X अशी स्थिती असते.

● अशा स्त्रियांमध्ये प्रजानेंद्रियांची वाढ पूर्ण झालेली नसल्यामुळे त्या प्रजननक्षम नसतात.

_____________________________


३) क्लाइनफेल्टर्स सिंड्रोम:- 44+XXY

● पुरुषांमधील लिंग गुणसूत्रांतील अपसामान्यतेमुळे हा विकार उद्भवतो.

● यात पुरुषांमध्ये 44+XY खेरीज X गुणसूत्र अधिक असल्यामुळे गुणसूत्रांची एकूण संख्या 44+ XXY कशी होते.

● ज्या पुरुषांमध्ये गुणसूत्रे अशा स्वरूपात असतात ते पुरुष अल्पविकसित आणि प्रजननक्षम नसतात.

_____________________________


🎯 एक जुणुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग :-

★ हचिन्सन रोग, टेसॅक्स रोग, गॅलेक्टोसेमिया, फेनिल किटोनमेह, सिकलसेल ऍनीमिया, सिस्टिक फायब्रोसिस, वर्णकहीनता, हिमोफिलिया, रातांधळेपणा...etc

_____________________________


🎯 ततुकणिकीय विकृती :- 

★ भ्रूण विकसित होताना अंड पेशीकडूनच तंतुकणिका येत असल्याने या प्रकारे उद्भवणारे विकार फक्त मातेकडूनच संततीला मिळतात 


उदा. लेबेरची अनुवंशिक चेताविकृती

_____________________________


🎯 बहुजणूकीय  उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती 

उदा. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा अतिस्थूलता.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...