२५ नोव्हेंबर २०२२

अंकगणित प्रश्नसंच

11. अस्मीता सुधाकरपेक्षा 324 दिवसानी मोठी आहे व रमेशपेक्षा 456 दिवसानी लहान आहे जर रमेशचा जन्मदिवस शनीवार असेल तर अस्मीताचा जन्मदिवशी कोणता वार असेल?

शुक्रवार
रविवार .   √
सोमवार 
मंगळवार

12. अक्षय स्नेहल यांच्या वयाचे गुणोत्तर 9: 1 आहे स्नेहल दिप यांच्या वयाचे गुणोत्तर 2: 3 आहे तर अक्षय व दिप यांच्या वयाचे गुणोत्तर किती?

3: 18
6: 1     √
2: 3
9: 1

13. नागेश सचीन अनुक्रमे एका व्यवसायात 15000, 40000 रुपये गुंतवतात 6 महिन्यानंतर सचीन अर्थी रक्कम काढून घेतो त्यांना एक वर्षानंतर 12000 नफा होतो तर नागेशचा वाटा किती?

6000
4000     √
8000
10000

14. मनोज आपल्या मासीक पगाराच्या 22% घर खर्चावर 18% प्रवासावर खर्च करतो आणि मनोज 18000 बचत करतो तर प्रवासावर किती रुपये खर्च करतो?

18000
5400      √
12000
10800

15. प्रथम 24 विषम संख्यांची सरासरी किती?

24    √
12
12.5
25

16. 6 सम संख्याची सरासरी 23 आहे तर सर्वात मोठी तिसरी संख्या कोणती?

26
24    √
28
22

17. एक बुक 250 रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती बुक 270 रुपयास विकल्याने होतो तर त्या बुकची खरेदी किंमत किती?

250
255     √
260
520

18. R.S.T यांचे सरासरी वय 19 वर्ष आहे त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 8: 5: 6 आहे तर T चे वय किती?

6
15
24
18     √

19. एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे त्या वस्तूवर 20% नफा ठेवून राज ती वस्तू 720 रुपये विकतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

740
700
750
600     √

20. 35 मिनीटांचे 1 तासाची असलेले गुणोत्तर किती?

35: 1
1: 35
12: 17
7: 12    √

महत्त्वाचे प्रश्नसंच

१)खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………?

१) सफरचंद
*२) गाजर✅*
३)केळी
४) संत्रा

२)खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

१) स्कर्व्ही
२) बेरीबेरी
*३) मुडदूस✅*
४)राताधळेपण

३)पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे?

१) २००
२) ३५०
३)५००
*४)७५०✅*

४)जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….?

१)वाढते
२) कमी होते
३) पूर्वीइतकेच राहते
*४)शून्य होते✅*

५)कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..?

१) दगडी कोळसा
२) कोक
३) चारकोल
*४) हिरा✅*

६)जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात?

१) जीवाणू (bacteria)
*२) विषाणू (virus)✅*
३) कवक (fungi)
४) बुरशी

७)लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

१) देवी
*२) मधुमेह✅*
३) पोलिओ
४) डांग्या खोकल

८)……..या किरणांना वस्तुमान नसते?

१)अल्फा
२)‘क्ष’
*३) ग्यामा✅*
४)बीटा

९)खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

१) रंगाधळेपण
२) स्कर्व्ही
३) बेरीबेरी
*४)यापैकी नाही✅*

१०)हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..?

१)पेनेसिलीन
*२)प्रायमाक्वीन✅*
३) सल्फोन
४)टेरामायसीन

११)निष्क्रिय वायू हे………..?

१) पाण्यामध्ये विरघळतात
२) स्थिर नसतात
*३)रासायनिक क्रिया करू न शकणारे✅*
४) रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील

१२)…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे?

*१) प्लुटोनिअम✅*
२) U -२३५
३)थोरीअम
४)रेडीअम

१३)खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

१) युरिया
२)नायट्रेट
३)अमोनिअम सल्फेट
*४)कंपोस्ट✅*

१४)आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

१) ‘ब-१’ जीवनसत्त्व
२) ‘ब-४’ जीवनसत्त्व
‘ड ‘ जीवनसत्त्व
*४)‘के ‘ जीवनसत्त्व✅*

१५)जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात?

१) मेंदूचे स्पंदन
२)हृदयाचे स्पंदन
*३)डोळ्यांची क्षमता✅*
४)हाडांची ठिसूळता

१६)किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

*१).१०० डी.बी.च्या वर✅*
२) ११० डी.बी.च्या वर
३)१४० डी.बी.च्या वर
४)१६० डी.बी.च्या वर

१७)डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

*१) आयोडीन-१२५✅*
२) अल्बम-३०
३) ल्युथिनिअरम-१७७
४)सेसिअम-१३७

१८)आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते?

१) अवअणू
२) अणू
*३) रेणू✅*
४) पदार्थ

१९)मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते?

*१) सेल्युलेज✅*
२) पेप्सीन
३) सेल्युलीन
४) सेल्युपेज

२०)इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन……?

*१) कमी होते✅*
२)वाढते
३) सारखेच राहते
४) शून्य होते

२१)पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते?

१) M
*२) N✅*
३) A
४) XB

२२)सौरऊर्जा …… स्वरुपात असते?

१) प्रकाश प्रारणांच्या
*२) विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅*
३) अल्फा प्रारणांच्या
४) गामा प्रारणांच्या

२३)अहरित वनस्पती ……असतात?

१) स्वयंपोषी
*२)  परपोषी✅*
३) मांसाहारी
४) अभक्ष

२४)किण्वन हा …… चा प्रकार आहे?

१) ऑक्सिश्वसन
*२) विनॉक्सिश्वसन✅*
३) प्रकाशसंश्लेषण
४) ज्वलन

२५) प्रकाश संश्लेषनात ……प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती?

*१) हरितद्रव्यामुळे✅*
२) झथोफिलमुळे
३) कॅरोटीनमुळे

१).महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट साठा सर्वात जास्त मिळतो ?
*१) कोल्हापूर ✅*
२) रत्नागिरी
३) ठाणे
४) सातारा

२).महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हटले जाणारे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे
*१) कळसुबाई ✅*
२) तारमती
३) साल्हेर
४) कलावंतीण दुर्ग

३). भारताने नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी दहशतवादी परिसरामध्ये सर्जिकल स्ट्राईक कधी घडवून आणला ?
*१) सप्टेंबर २०१६ ✅*
२) सप्टेंबर २०१५
३) जुलै २०१७
४) ऑगस्ट २०१६

४ ).जगातील सर्वात प्रथम हॉस्पिटल ट्रेन जी अतिमहत्त्वाच्या दुर्गम भागात विशेषतः भारतातील रुग्णांना वैद्यकीय मदत आणि आराम देते खालीलपैकी कोणती होती ?
१) फ्रेंच रेड क्रॉस ट्रेन
*२) लाइफलाइन एक्स्प्रेस ✅*
३) रेल्वे एम्ब्युलन्स
४) टेरापीट मटे मड्गोव्ह

५ ).जागतिक मधुमेह दिन कोणत्या दिवशी पळाला जातो ?
१) १४ सप्टेंबर
*२) १४ नोव्हेंबर ✅*
३) १ नोव्हेंबर
४) २८ नोव्हेंबर

६ ).हँगिंगगार्डन्स हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
१) पुणे
२) सोलापूर
*३) मुंबई ✅*
४) नागपूर

७). कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या राज्याशी जोडलेली नाही ?
१) महाराष्ट्र
२) कर्नाटक
*३) तेलंगणा ✅*
४) गोवा

८ ).प्रवाशी भारतीय दिवस दरवर्षी ....... ह्या दिवशी साजरा केला जातो?
१) ५ जून
२) १ डिसेंबर
*३) ९ जानेवारी ✅*
४) १० मार्च

९ ).महाराष्ट्रात अगाखान पॅलेस कुठे स्थित आहे ?
१) मुंबई
२) नागपूर
*३) पुणे ✅*
४) कोल्हापूर

१०).ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे ?
१) जळगाव
२) बीड
३) रत्नागिरी
*४) सोलापूर✅*

1). देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय ?

1) राज्य विधिमंडळ 
2) कार्यकारी मंडळ   
*3) संसद ✅*
4) न्यायमंडळ

2).   योग्य विधान ओळखा?

1)कुरबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे
2) पानवठ हा पूल कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल आहे

1)1 बरोबर
2) 2 बरोबर
*3) दोन्ही बरोबर ✅*
4) दोन्ही चूक

3).....…याला सहकाराचा जनक मानतात?

*1)रॉबर्ट ओवेन*✅
2)रॉबर्ट हूक
3)मायकेल ओवेन
4)यापैकी नाही

4).आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीनी क्रांतिकारकांची 'वाट चुकलेले देशभक्त' अशी संभावना केली ? 

1)हिंद स्वराज संघ
2)हिंदुस्‍थान स्‍वराज्‍य संघ
*3)हिंद स्वराज✅*.
4)यापैकी नाही

5).भारतातून .....हे वृत्त जाते?

*1)कर्कवृत्त*✅
2)मकरवृत्त
3)विषुववृत्त
4)कोणतेही जात नाही

6).महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात 'भाषा भवन' बांधत आहे?

1)औरंगाबाद
2)नाशिक
3)पुणे
*4)मुंबई✅*

7).भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे?

1)नागपूर
*2)आर्वी✅*
3)अहमदाबाद
4)चंद्रपूर

8).अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

1)सरस्वती
2)यमुना
*3)शरयू*✅
4)घंडक

9).भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

*1) सरदार वल्लभभाई पटेल✅*
2)जी. बी. पंत
3) जी. एल. नंदा
4)लाल बहादूर शास्त्री

10).लोकसभेचे पिता ..... आहे?

1)अनंतसांणम
2) झिकीर हुसैन
3) बासमम
*4) मावळणकर*✅

पोलीस भारती प्रश्नसंच

०१] हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२] भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३] कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow’s Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश



०४] कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५]  हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६] फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव



०७] मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८] भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९] नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०] महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११] महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर



१२]  परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग


१३] ‘V’ आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४] दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५] बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६] Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७] हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८] पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९] पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०] गोवरी’ कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१] घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२] ग्रेट बॅरियर रीफ’ कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३] या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४]  कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५]   भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६] जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७] भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८]  इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्‍यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९] पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०] वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्‍ट्र

३१]  लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२] फिग्रीन ऑफ गोरा देव’ (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३] पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४] कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५] झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६] भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७] महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार


३८] कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९] महाराष्ट्रातील कोणता प्रदेश ‘तलावाचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०]  राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१] महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२] ‘श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प’ कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३] महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४] महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

>>> उत्तर सीमेला

४५] महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

>>> ७२० किमी

४६]  कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

>>> पंचगंगा

४७] महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

>>> ४४० कि.मी.

४८] महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

४९] यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत?

>>> वणी

५०] मेळघाट हे वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे?

>>> अमरावती


भूगोल प्रश्नसंच

1) धूपे बरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते ?
   1) नत्र      2) पालाश   
   3) स्फुरद    4) लोह   
उत्तर :- 3

2) साधारणत: जमिनीची सच्छिद्रता किती असते ?
   1) 20 ते 30%    2) 30 ते 35%   
   3) 30 ते 60%    4) 60 ते 70%
उत्तर :- 3

3) खालीलपैकी कोणते पीक मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे ?
   1) मका    2) ज्वारी     
   3) बाजरी    4) चवळी
उत्तर :- 4

4) जमिनीची धूप थांबविण्यासाठी पहिली पायरी म्हणजे.................. थांबविणे.
   1) पाण्याचा प्रवाह    2) वा-याचा वेग
   3) मातीचे विभक्तीकरण    4) झाडांची वाढ
उत्तर :- 3

5) कमी ते मध्यम पावसाच्या भागामध्ये समपातळीत बांध असलेल्या काळया जमिनीवर कोणत्या प्रकारच्या टेरेसिंगचा वापर
     करतात?
   1) झिंग टेरेसिंग      2) बेंच टेरेसिंग
   3) ग्रेडेड टेरेसिंग      4) वरील सर्व
उत्तर :- 1

1) ठाळीचे बांध कोणत्या ठिकाणी घेतले जातात ?
   अ) जमीन पाण्याच्या धुपेला कमी ग्रहणशील आहे तेथे    ब) मातीची पारगम्यता कमी आहे तेथे
   क) दलदलीच्या जमिनीत           ड) जास्त उताराच्या जमिनीत
उत्तर :- 3

2) मृदेची सच्छिद्रता (Porosity) जर 50% आहे तर छिद्र गुणोत्तर (void ratio) ......................... इतके असेल.
   1) 0.5      2) 1.0      3) 2.0      4) 5.0
उत्तर :- 2

3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
   अ) जमिनीची वा-यामुळे होणारी धुप जमिनीची पारगम्यता बदलून गंभीर स्वरुपाची हानी घडवून आणते.
   ब) हिस्टोसोल्स यांनी नैसर्गिक / जैविक मृदा म्हणतात.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 2

4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
   अ) लॅटरीटिक मृदा मोसमी हवामानाच्या प्रदेशात आढळते.
   ब) लॅटरीटिक मृदा लोह, ॲल्युमिनियम, पोटॅश व चुनखडीयुक्त आहेत.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 1

5) जमिनीचा उतार ................ टक्केपेक्षा जास्त असतो तेव्हा कंटूर चर तांत्रिकदृष्टया किंवा आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत नाहीत.
   1) 10      2) 15      3) 20      4) 25
उत्तर  :- 3

1) चांगल्या पोयटयाच्या मातीत पोयटयाचे प्रमाण साधारण ....................... टक्के असते.
   1) 10-20    2) 20-30   
   3) 30-50    4) 60-75
उत्तर :- 3

2) अपपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे ?
   1) रासायनिक    2) कायिक/भौतिक   
   3) जैविक    4) भस्मीकरण
उत्तर :- 2

3) जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या जमिनीच्या (मातीच्या) ‘अ’ थरामध्ये का असते ?
   1) मातीची ‘अ’ थरामध्ये जास्त अन्नद्रव्ये असतात.    2) मातीची ‘अ’ थरामध्ये सुपीकता अधिक असते.
   3) मातीची ‘अ’ थरामध्ये जलसंपृक्त असतो.      4) मातीची ‘अ’ थरामध्ये भरपूर सेंद्रीय पदार्थ असतात.
उत्तर :- 4

4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे  ?
   अ) विम्लधर्मीय आणि क्षारयुक्त विम्‍लधर्मीय जमिनी पुन:प्रापण करण्यासाठी (सुधारण्यासाठी) सल्फर वापरतात.
   ब) क्षारयुक्त जमिनीमध्ये विनिमयात्मक सोडियमची टक्केवारी 15 पेक्षा अधिक असते.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 1

5) ‍विधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
   अ) रेगूर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खो-यात, पठारी प्रदेशात सापडते.
   ब) जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करडया रंगाची मृदा आढळते.
   1) विधान अ बरोबर    2) विधान ब बरोबर
   3) दोन्ही विधाने बरोबर    4) दोन्ही विधाने चूक
उत्तर :- 3 

1) माती (मृदा) तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पदार्थ पाण्याबरोबर वाहत जाऊन जमा होतात ते म्हणजे
   अ) कोलूव्हियम    ब) लॅक्यूस्ट्राइन    क) ॲल्यूव्हीयम    ड) टिल
   1) अ      2) अ व ब    3) क      4) ड
उत्तर :- 3

2) वरून वाहणा-या पाण्यामुळे उताराच्या जमिनीमधून समप्रमाणात पातळ थरामध्ये माती निघून जाणे याला .................... असे
     म्हणतात.
   1) ओघळपाडी धूप  2) घळई धूप    3) सालकाढी धूप    4) शिंतोडे धूप
उत्तर :- 3

3) दरवर्षी आपल्या देशात अंदाजे किती मातीची धूप होते ?
   1) 12 अब्ज टन    2) 100 अब्ज टन    3) 329 अब्ज टन    4) 120 अब्ज टन
उत्तर :- 1

4) मातीचा .................... गुणधर्म कमी करण्यासाठी ऊसाची मळी मातीमध्ये मिसळली जाते.
   1) क्षार      2) विम्ल      3) अम्ल      4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2

5) जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्युमस हे जमिनीची ......................... वाढवितात.
   अ) जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता
   ब) अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग/ दर)
   क) सच्छिद्रता
   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त
   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क
उत्तर :- 4

सराव प्रश्नसंच



१) विद्युत चुंबकीय पट्ट्यापैकी मानवी डोळ्याला दिसणारा प्रकाश ...... ते ....... तरंगलांबी असणारा आहे. 


   A. ३०००Å ते ७०००Å 

   B. २०००Å ते ६०००Å 

   C.४०००Å ते ८०००Å 

   D. ३५००Å ते ७५००Å 


A. ३०००Å ते ७०००Å

----------------------------------------

२) इन्फ्रा-रेड किरणांचा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो? 


अ) रंग सुकवण्याच्या कामात.

ब) कोंबडीच्या पिल्लांच्या जलद वाढीसाठी. 

क) स्नायू दुखी आणि सांधे दुखीवर उपाय म्हणून.

ड) टेलेव्हिजन, स्टिरीओ यांसारख्य साधनांसाठी वापरले जाणारे रिमोट कंट्रोल मध्ये. 


   A. अ आणि ब 

   B. केवळ ब 

   C. अ, ब आणि क 

   D. वरील सर्व 


D. वरील सर्व

------------------------------------

३) फ्लुरोसंट लॅम्प मध्ये खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर 'फ्लोरोसन्स' ही प्रक्रिया घडवण्यासाठी होतो? 


   A. इन्फ्रा-रेड किरणे 

   B. अति-नील किरणे 

   C. रेडीओ लहरी 

   D. क्ष-किरणे 


B. अति-नील किरणे

---------------------------------------

४) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 


अ) विद्युत क्षेत्रामुळे किंवा चुंबकीय क्षेत्रामुळे क्ष-किरणांचे विचलन होते. 

ब) एखाद्या वायुतून जात असताना क्ष-किरण त्या वायूचे आयनन करतात. 


   A. केवळ अ 

   B. केवळ ब 

   C. अ आणि ब दोन्ही 

   D. अ आणि ब दोन्ही नाही 


B. केवळ ब

-------------------------------------

५) अपवर्तनाच्या क्रियेतून पूर्ण अंतर्गत परावर्तन निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची आवश्यकता असते? 


अ) प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असावा. 

ब) आपाती कोन क्रांतिक कोनापेक्षा अधिक असावा. 


   A. केवळ अ 

   B. केवळ ब 

   C. अ आणि ब दोन्ही 

   D. अ आणि ब दोन्ही नाही 


C. अ आणि ब दोन्ही

------------------------------------

६) पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात पृथ्थकरण होण्याच्या प्रक्रियेस ....... म्हणतात. 


   A. प्रकाशाचे अपस्करण 

   B. प्रकाशाचे विकिरण 

   C. प्रकाशाचे अपवर्तन 

   D. पूर्ण अंतर्गत परावर्तन 


A. प्रकाशाचे अपस्करण

----------------------------------------

७) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 


अ) तांबड्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात जास्त तर जांभळ्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात कमी होते.

ब) पावसाळ्यात आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपस्करनामुळेच दिसते. 


   A. केवळ अ 

   B. केवळ ब 

   C. अ आणि ब दोन्ही 

   D. अ आणि ब दोन्ही नाही 


B. केवळ ब

-------------------------------------

८) खालीलपैकी कोणत्या घटना प्रकाशाचे विकिरण या प्रक्रियेमुळे घडतात? 


अ) दिवसा सर्वत्र उजेड असतो. 

ब) आकाश निळे दिसते.

क) खोल समुद्रात पाणी निळे दिसते.

ड) वाळवंटातील मृगजळ 


   A. अ आणि ब 

   B. फक्त ड 

   C. अ,ब आणि क 

   D. वरील सर्व 


C. अ,ब आणि क

--------------------------------

९) चंद्र क्षितिजावर मोठा दिसण्याचे कारण काय? 


   A. दृष्टिभ्रम 

   B. प्रकाशाचे विकिरण 

   C. प्रकाशाचे अपस्करण 

   D. प्रकाशाचे अपवर्तन 


A. दृष्टिभ्रम

------------------------------------

१०) जोड्या जुळवा. 


    कॅमेऱ्याचे भाग       डोळ्याचे भाग 

अ) शटर                 १) पापणी(eye-Lid)

ब) डायफ्रॅम             २) परीतारिका(Iris)

क) अॅपेरचर            ३) बाहुली(Pupil)

ड) फिल्म               ४) दृष्टीपटल(retina) 


             अ   ब   क   ड 

   A. १    २    ३    ४

   B. २    ३    ४    १

   C. १    २    ४    ३

   D. २    १    ३   ४


A. १ २ ३ ४

राज्यघटना निर्मिती प्रश्नसंच


1)भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
एन् एम् राॅय(1934)

2)कोणत्या रिपोर्ट मध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता?
नेहरू रिपोर्ट

3)भारतामध्ये घटना समितीची (संविधान सभा) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशी नुसार करण्यात आली?
कॅबिनेट मिशन(त्रिमंत्री योजना)

4)त्रिमंत्री योजनेत(कॅबिनेट मिशन) किती सदस्य होते?
1)स्ट्रफर्ड क्रिप्स 2)ए व्ही अलेक्झांडर 3)पॅथिक लाॅरेन्स

5)कॅबिनेट मिशन भारतात कधी आले?
24 मार्च 1946

6)त्रिमंत्री योजना कधी जाहीर करण्यात आली?
16 मे 1946

7)घटना समितीमध्ये सदस्यांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती?
389

8)घटना समितीसाठी निवडणुका कधी घेण्यात आल्या?
जुलै -आॅगस्ट 1946

9)घटना समितीच्या 389पैकी किती जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या?
296

10)घटना समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला व किती मिळाल्या?
काँग्रेस 208

11)भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीची  सदस्य संख्या किती झाली?
299

12)घटना समितीमध्ये संस्थानिकांचे किती प्रतिनिधी होते?
70

13)घटना समितीवर सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातुन निवडुन आले होते?
संयुक्त प्रांत(55)

14)घटना समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला गेला?
10 लाख

15)घटना समितीमध्ये किती महिला होत्या?
15

16)घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे  भरले होते?
दिल्ली (कौन्सिल चेंबरच्या पुस्तकालयाच्या भवनात)

17)घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते?
9ते23 डिसेंबर 1946

18)घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य हजर होते?
211

19)घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते?
सच्चिदानंद सिन्हा

20)घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते?
ए के अँथनी

21)घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची व कधी निवड करण्यात आली?
राजेंद्र प्रसाद (11 डिसेंबर 1946)

22)घटना समितीचे सल्लागार कोण होते?
बी एन राव

23)घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते?
हरेंद्र मुखर्जी

24)घटना समितीचे सचिव कोण होते?
व्हि आर अय्यंगार

25)भारतीय घटना समितीची एकुण किती अधिवेशन झाले.
11

प्रश्नसंच

🔹दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

🔹इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे

🔹मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

🔹निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

🔹महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक

🔹आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई

🔹हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी

🔹भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

🔹गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे

🔹सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे

🔹एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे

🔹परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग

🔹दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔹सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी

🔹शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

🔹 ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
__

२३ नोव्हेंबर २०२२

चालू घडामोडी प्रश्नसराव

(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.


(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Q1. राष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर :-  13 फेब्रुवारी


Q2. भरत कोकिळा हे प्रसिद्ध टोपणनाव कोणाचे आहे?

उत्तर :- सरोजिनी नायडू


Q3. अलीकडेच उत्तराखंडचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- अक्षय कुमार


Q4. सार्वभौम राज्यावर सर्वाधिक काळ राज्य करणारा राजा म्हणून खालीलपैकी कोणी फ्रान्सच्या लुई चौदावा या राजास मागे टाकले आहे?

उत्तर :- राणी एलिझाबेथ दुसरी


Q5. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- दिनेश प्रसाद सकलानी


Q6. उन्हाळी ऑलिंपिक 2028 चे आयोजन कोणाकडून केले जाणार आहे?

उत्तर :- लॉस एंजेलिस


Q7. कोणत्या बोगद्याला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डतर्फे ‘10,000 फुटांपेक्षा जास्त असणारा जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा ‘ म्हणून अधिकृतपणे प्रमाणित करण्यात आले आहे?

उत्तर :- अटल बोगदा


Q8. नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस भारत हा जगातील सर्वात मोठा परकीय चलन राखीव असलेला _देश होता?

उत्तर :- चौथा


Q9. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणाला मिळाले?

उत्तर :- राफेल नदाल


Q10. तोरग्या सण कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो?

उत्तर :- अरुणाचल प्रदेश

लोकसभा सभागृह

◼️लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. 


◼️लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ व लोकप्रिय सभागृह आहे.


◼️कलम 81 मध्ये लोकसभेच्या रचनेची तरतूद देण्यात आली आहे.


◼️लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या 552 इतकी आहे. 


◼️सतराव्या लोकसभेत एकुण 545 सदस्य आहेत


◼️330 कलमानुसार लोकसभेतील जागांमध्ये अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती यांना आरक्षण देण्यात आले आहे.


◼️लोकसभेत अनुसूचित जातीनां 84 जागा तर अनुसूचित जमातींना 48 जागा राखीव आहेत. 


◼️अनुसूचित जातीच्या सर्वाधिक 17 आरक्षित जागा  उत्तर प्रदेशात राज्यात आहेत. तर अनुसूचित जमातीच्या सर्वाधिक 6 जागा  मध्यप्रदेश राज्यात आहेत.


◼️महाराष्ट्रतून एकुण 48 लोकसभेचे सदस्य निवडू दिले जातात.


◼️महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी एकुण 5 जागा राखीव आहेत.


-अमरावती,रामटेक,शिर्डी,लातुर,सोलापूर


◼️महाराष्ट्रात अनुसूचित जमातींसाठी एकूण 4 जागा राखीव आहेत.


- नंदुरबार, पालघर, दिंडोरी, गडचिरोली-चिमूर 


◼️लोकसभेची मुदत 5 वर्ष असते.


◼️आणीबाणीच्या काळात संसद कायदा करुन जास्तीत जास्त एक वर्ष वाढवू शकते. 


◼️लोकसभेचे सदस्य 18 वर्षावरील प्रौढ मतदाराकडून प्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात.


◼️कलम 85 नुसार संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलविण्याचे अधिकार राष्ट्रपतीना आहेत.


◼️कलम 108 नुसार संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आली आहे.


◼️आत्तापर्यंत तिन वेळा संयुक्त बैठका पार पडल्या आहेत.


-हुंडा प्रतिबंधक कायदा 1961

-बँकिंग सर्विस बिल 1978

-पोटा कायदा 2002



◼️लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यासाठी एकुण सदस्य संख्येच्या 1/10  सदस्य उपस्थित असतिल तरच सभागृहाचे कामकाज चालू शकते. 


◼️लोकसभा सभापती यांची तरतूद कलम 93 मध्ये देण्यात आली आहे.


◼️ सध्याचे लोकसभा सभापती ओम बिर्ला हे आहेत. 


◼️पहिले लोकसभा सभापती गणेश वासुदेव मालवणकर

२२ नोव्हेंबर २०२२

भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी


🔶 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. 


🔶 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.


📚 संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश📚


▪️ मूलभूत हक्क : अमेरिका


▪️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका


▪️ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका


▪️ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड


▪️ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड


▪️ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड


▪️ संघराज्य पद्धत : कॅनडा


▪️ शेष अधिकार : कॅनडा'


▪️ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड


▪️ कायदा निर्मिती : इंग्लंड


▪️ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड


▪️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया


महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★


◆ गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड

◆ कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर

◆ भिमा : पंढरपुर

◆ मुळा - मुठा : पुणे

◆ इंद्रायणी : आळंदी, देहु

◆ प्रवरा : नेवासे, संगमनेर

◆ पाझरा : धुळे

◆ कयाधु : हिंगोली

◆ पंचगंगा : कोल्हापुर

◆ धाम : पवनार

◆ नाग : नागपुर

◆ गिरणा : भडगांव

◆ वशिष्ठ : चिपळूण

◆ वर्धा : पुलगाव

◆ सिंधफणा : माजलगांव

◆ वेण्णा : हिंगणघाट

◆ कऱ्हा : जेजूरी

◆ सीना : अहमदनगर

◆ बोरी : अंमळनेर

◆ ईरई : चंद्रपूर

◆ मिठी : मुंबई.

हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये भारत 8 व्या क्रमांकावर आहे; डेन्मार्क चौथ्या क्रमांकावर आहे


🖼🏞14 नोव्हेंबर 2022 रोजी, हवामान बदलाचे प्रात्यक्षिक इंडेक्स (CCPI) 2023 जारी करण्यात आला होता.  पर्यावरण स्वयंसेवी संस्था - जर्मनवॉच, न्यूक्लिमेट  संस्था आणि हवामान कृती नेटवर्क (CAN) इंटरनॅशनल द्वारे प्रकाशित. 

 

📉📊भारताने 67.35 गुणांसह आणि 'उच्च' 

कामगिरी रेटिंगसह 63 पैकी 8व्या क्रमांकावर दोन स्थानांनी झेप घेतली. 


📊📉डन्मार्क CCPI 2023 मध्ये उच्च रेटिंगसह अव्वल आहे परंतु एकूणच ते 4 व्या स्थानावर आहे, त्यानंतर स्वीडन आणि चिली अनुक्रमे 5 व्या आणि 6 व्या स्थानावर आहे.


🇮🇳 ह लक्षात घेण्यासारखे आहे की टॉप 10 उत्सर्जकांच्या गटात भारत अव्वल स्थानावर आहे. यानंतर या गटात जर्मनी आणि जपान दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.


❄️🌹डन्मार्क बद्दल:👉


🏙राजधानी - कोपनहेगन

💸चलन-डॅनिश क्रोन

युद्ध अभ्यास 22 ची 18 वी आवृत्ती भारत-अमेरिका संयुक्त सैन्य प्रशिक्षण सराव उत्तराखंडमध्ये सुरू


🌼🎊16 नोव्हेंबर 2022 रोजी, भारत युनायटेड स्टेट्स (यूएस) च्या 18 व्या आवृत्तीचा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव 'युद्ध अभ्यास 22' प्रथमच उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील औली येथे सुरू झाला, ज्याचा उद्देश सैन्यांमध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान, सामरिक कौशल्ये आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने आहे. दोन्ही देशांचे.


💠❄️16 नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान होणारा हा 15 दिवसांचा सराव प्रामुख्याने उच्च उंचीवर आणि अत्यंत शीतयुद्धावर केंद्रित आहे.


🌹❣️हायलाइट:👉


💮📯प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (LAC) सुमारे 100 किमी अंतरावर, LAC वर चीनच्या वाढत्या हस्तक्षेपादरम्यान उत्तराखंडमधील औली येथे उच्च-उंचीवरील नवीन परदेशी प्रशिक्षण नोड (FTN) येथे हा सराव आयोजित केला जाईल.


🤵‍♂ ह FTN केंद्रीय लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल योगेंद्र डिमरी यांच्या मनाची उपज आहे आणि सर्व सुविधांसह एका वेळी सुमारे 350 परदेशी सैनिकांना सामावून घेऊ शकते.

❣️👉टीप - सरावाची मागील आवृत्ती ऑक्टोबर 2021 मध्ये जॉइंट बेस एल्मडॉर्फ रिचर्डसन, अलास्का (यूएसए) येथे आयोजित करण्यात आली होती.

२१ नोव्हेंबर २०२२

भारतातील काही महत्त्वाची नवाश्मयुगीन स्थळे :


१. भारतीय उपखंडाचा वायव्येकडील प्रदेश 

पहिल्या टप्प्यात (इसवी सनापूर्वी सुमारे ७००० ते ६०००) मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली नव्हती. दुसऱ्या टप्प्यात (इसवी सनापूर्वी सुमारे ६००० ते ४५००) मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली होती.


२. जम्मू आणि काश्मीर 

काश्मीरमधील बुर्झोम आणि गुफक्राल येथे इसवी सनापूर्वी २५०० च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव-वसाहतीची सुरुवात झाली.


३. उत्तर प्रदेश 

उत्तर प्रदेशातील चोपनी मांडो, कोलढिवा आणि महागरा येथे इसवी सनापूर्वी ६००० च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव-वसाहतीची सुरुवात झाली.


४. बिहार 

बिहार येथील चिरांड, सेनुवार यांसारखी स्थळे. येथे इसवी सनापूर्वी २००० च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव-वसाहतीची सुरुवात झाली. 


५. ईशान्य भारत 

आसाममधील दाओजाली हाडिंग येथील उत्खननात ईशान्य भारतातील नवाश्मयुगाच्या अस्तित्वाचा पुरावा प्रथम उजेडात आला. तेथील गाव वसाहतींची सुरुवात इसवी सनापूर्वी २७०० च्या सुमारास झाली. येथे मिळालेली नवाश्मयुगीन हत्यारे चीनमधील नवाश्मयुगीन हत्यारांशी अधिक साम्य दर्शवणारी आहेत.


६. दक्षिण भारत 

कर्नाटकातील संगणकल्लू, मस्की, ब्रह्मगिरी, टेक्कलकोटा, पिकलीहाळ, हल्लूर, आंध्र प्रदेशातील नागार्जुनकोंडा, तमिळनाडूतील पय्यमपल्ली येथे इसवी सनापूर्वी सुमारे चौथ्या ते तिसऱ्या शतकांत नवाश्मयुगाची सुरुवात झाली.

रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते


1)  रक्तद्रव ( Plasma )

2) रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)


🔸 रक्तद्रव (Plasma)


अ.)  रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. यात सुमारे 90 ते 92% पाणी,

6 ते 8% प्रथिने

1 ते 2% असेंद्रिय क्षार

व इतर घटक असतात.


आ.) अल्ब्युमिन - संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते.


इ.)  ग्लोब्युलीन्स - संरक्षणाचे काम करतात.


ई) फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.


उ)  असेंद्रिय आयने - कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम हे चेता आणि स्नायू ठेवतात. कार्याचे नियंत्रण


🔸रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)


1. लोहित रक्तपेशी (RBC) 

आकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी या पेशीतील हिमोग्लोबीन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबीनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो. 


• रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 50-60 लक्ष RBC असतात. RBC ची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते127 दिवस जगतात.


2. श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी) (WBC) 


आकाराने मोठ्या, केंद्रकयुक्त, रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 5000-10,000 पांढऱ्या पेशी असतात


🔸 या पेशींचे 5 प्रकार आहेत - 

बेसोफील, इओसिनोफिल, न्यूट्रोफील,

मोनोसाईट्स लिम्फोसाईट्स


• पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते.


🔸 कार्य- 

पांढऱ्या पेशी, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात.


3. रक्तपट्टीका (Platelets)


• या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात. 

• रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये या सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात. 


🔸 कार्य - या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.

- CWG 2022 मध्ये भारतीय खेळाडूंनी जिंकलेली पदकं!



➡️ वेटलिफ्टर - मीराबाई चानू 

(🥇सुवर्णपदक)


➡️ वेटलिफ्टर - जेरेमी लालरिनुंगा 

(🥇सुवर्णपदक)


➡️ वेटलिफ्टर - अंचिता शेउली 

(🥇सुवर्णपदक)


🛑 लाॅल बाॅल्स - भारतीय महिला संघ 

(🥇सुवर्णपदक)


🛑 टेबल टेनिस - भारत 

(🥇सुवर्णपदक)


➡️पॅरा पाॅवरलिफ्टींग - सुधीर 

(🥇सुवर्णपदक)


➡️कुस्तीपटू - बजरंग पुनिया 

(🥇सुवर्णपदक)


➡️महिला कुस्तीपटू - साक्षी मलिक 

(🥇सुवर्णपदक)


➡️कुस्तीपटू - दिपक पुनिया

(🥇सुवर्णपदक)


➡️कुस्तीपटू - रवी कुमार दहिया

(🥇 सुवर्णपदक)


➡️महिला कुस्तीपटू - विनेश फोगट

(🥇सुवर्णपदक)


➡️कुस्तीपटू - नवीन 

(🥇सुवर्णपदक)


➡️पॅरा टेबल टेनिस - भाविना पटेल

(🥇सुवर्णपदक)


➡️महिला बॉक्सर - नितू गंगस

(🥇सुवर्णपदक)


➡️बॉक्सर - अमित पंघाल 

(🥇सुवर्णपदक)


➡️ट्रिपल जंप - एल्धोस पाॅल

(🥇सुवर्णपदक)


➡️महिला बॉक्सर - निखत झरिन 

(🥇सुवर्णपदक)


➡️टेबल टेनिस मिश्र दुहेरी गट - शरथ कमल आणि श्रीजा अकुला 

(🥇सुवर्णपदक)



➡️बॅडमिंटन पुरुष एकेरी गट - लक्ष्य सेन

(🥇सुवर्णपदक)


➡️बॅडमिंटन महिला एकेरी गट - पि.व्ही.सिंधू 

(🥇सुवर्णपदक)


➡️टेबल टेनिस पुरुष एकेरी गट - शरथ कमल 

(🥇सुवर्णपदक)


➡️ बॅडमिंटन पुरुष दुहेरी गट - सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी

(🥇सुवर्णपदक)





➡️ वेटलिफ्टर - संकेत सरगर 

(🥈रौप्यपदक)


➡️ वेटलिफ्टर - बिंदीयाराणी देवी 

(🥈रौप्यपदक)


➡️ वेटलिफ्टर - विकास ठाकुर 

(🥈रौप्यपदक)


⭐ ज्युडो - सुशीला देवी 

(🥈रौप्यपदक)


⭐️ज्यूडो - तुलिका मान

(🥈रौप्यपदक)


🏸भारतीय बॅडमिंटन संघ 

(🥈 रौप्यपदक)


➡️लांब उडी - मुरली श्रीशंकर

(🥈रौप्यपदक)


➡️महिला कुस्ती - अंशू मलिक 

(🥈रौप्यपदक)


➡️लाॅन बाॅल्स - भारतीय पुरुष संघ 

(🥈रौप्यपदक)


➡️स्टीपलचेस 3000 मीटर - अविनाश साबळे 

(🥈रौप्यपदक)


➡️10000 मीटर रेस वाॅक प्रियंका गोस्वामी 

(🥈रौप्यपदक)


➡️ट्रिपल जंप - अब्दुला अबूबकर

(🥈रौप्यपदक)


➡️टेबल टेनिस दुहेरी गट - शरथ कमल साथियान ज्ञानसेकरन 

(🥈रौप्यपदक)


➡️भारतीय महिला क्रिकेट संघ 

(🥈रौप्यपदक)


➡️बॉक्सर - सागर अहलावत 

(🥈रौप्यपदक)


➡️भारतीय पुरुष हॉकी संघ - 

(🥈रौप्यपदक)





⭐  ज्युडो - विजय कुमार 

(🥉कांस्यपदक)


➡️उंच उडी - तेजस्वीन शंकर 

(🥉 कांस्यपदक)


➡️ स्क्वाॅश - सौरव घोषाल

(🥉 कास्यंपदक)


➡️ वेटलिफ्टर  - गुरुराज पुजारी 

(🥉कांस्यपदक)


➡️वेटलिफ्टर - गुरदीप सिंह 

(🥉कांस्यपदक)


➡️ वेटलिफ्टर - हरजिंदर कौर 

(🥉कांस्यपदक)


➡️वेटलिफ्टर - लवप्रीत सिंग 

(🥉कांस्यपदक)


➡️कुस्तीपटू - मोहित ग्रेवाल

(🥉कांस्यपदक)


➡️महिला कुस्तीपटू - दिव्या काकरान

(🥉कांस्यपदक)


➡️बॉक्सिंग - जस्मीन लंबोरीया 

(🥉 कांस्यपदक)


➡️महिला कुस्तीपटू - पुजा गेहलोत

(🥉कांस्यपदक)


➡️पॅरा टेबल टेनिस - सोनलबेन पटेल

(🥉कांस्यपदक)


➡️बॉक्सर - रोहित टोकस 

(🥉कांस्यपदक)


➡️कुस्तीपटू - दिपक नेहरा

(🥉कांस्यपदक)


➡️बॉक्सर - मोहम्मद हुसामुद्दीन

(🥉कांस्यपदक)


➡️महिला कुस्तीपटू - पुजा सिहाग

(🥉कांस्यपदक)


➡️हाॅकी - भारतीय महिला संघ 

(🥉कांस्यपदक)


➡️10,000 मीटर रेस वाॅक - संदिप कुमार 

(🥉कांस्यपदक)


➡️महिला भालाफेकपटू - अणू राणी 

(🥉कांस्यपदक,60 मीटर भाला फेकला)


➡️ बॅडमिंटन - किंदाबी श्रीकांत 

(🥉कांस्यपदक)


➡️स्क्वॅश दुहेरी मिश्र गट - सौरव घोषाल आणि दिपिका पल्लीकल 

(🥉कांस्यपदक)


➡️बॅडमिंटन दुहेरी गट - गायत्री पुलेला आणि त्रिशा जाॅली 

(🥉कांस्यपदक)


➡️टेबल टेनिस पुरुष एकेरी गट - ज्ञानशेखर साथीयान 

(🥉कांस्यपदक)


🇮🇳 भारताची आत्तापर्यंतची कामगीरी 

(🥇22 , 🥈 16 , 🥉 23) एकुण 61 पदके.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...