१४ नोव्हेंबर २०२२

महाअधिवक्ता-महाराष्ट्र राज्य

महाअधिवक्ता-महाराष्ट्र राज्य

(1) नियुक्ती:-

महाअधिवक्त्याची नियुक्ती ही संविधानाच्या 165 अनुच्छेदानुसार केली जाईल आणि तो महाराष्ट्र शासनाची मर्जी असेपर्यंत अधिकारपद धारण करील.

(2) कर्तव्ये:-

(1) शासनाचा सल्लागार म्हणून:-

(क) महाअधिवक्ता कायदेविषक प्रश्नासह ज्या बाबींवर त्यांच्याकडे सल्ला मागण्यात येईल अशा

कायदेशीर बाबींवर शासनाला सल्ला देईल आणि या नियमांमध्ये वेळोवेळी विनिर्दिष्ट केलेल

असतील किंवा विधि परामर्शीकडून त्याच्याकडे वेळोवेळी निर्देशिले किंवा सोपविले जातील

अशी कायदेशीर स्वरुपाची अन्य कर्तव्य पार पाडील.

(ख) तो,राज्याच्या किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांच्या वतीने ज्या कार्यवाहीबाबत त्याने मागर्दशन करणे

अपेक्षित असले अशा कार्यवाहीबबातही मग शासनाला सल्ला देईल ती दिवाणी किंवा फौजदारी

कार्यवाही असो.

(2) अधिकाऱ्यांचा सल्लागार म्हणून:-

(क) महाअधिवक्ता, कोणत्याही बाबींवर पुढील अधिकार त्याच्याकडे प्रत्यक्षपणे सल्ला मागतील

तेव्हा त्यांना सल्ला देईल, ते अधिकारी असे:-

(एक) शासनाच्या विधि व न्याय विभागाचे विधि परामर्शी आणि सचिव,

(दोन) सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्ता, उच्च न्यायालय, मुंबई

(तीन) सरकारी वकील, उच्च न्यायालय (मुळ न्याय शाखा), मुंबई

(चार) अपर सरकारी वकील, उच्च न्यायालय (अपील न्याय शाखा), मुंबई

(पाच) सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्ता, उच्च न्यायालय, नागपूर

(सहा) सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्ता, उच्च न्यायालय, औरंगाबाद

(सात) शासनाच्या विधि व न्याय विभागातील सॉलिसिटर

(आठ) शासनाच्या सर्व मंत्रालयीन विभागाचे प्रमुख

(ख) तो, सामान्यपणे विधि परामर्शीमार्फत मंत्रालयीन विभागांकडून येणारे निर्देश विचारार्थ

स्विकारील.

(ग) तो शासनाच्या इतर कोणत्याही विभागाला त्याने (ज्या गापेनीय प्रकरणात विधि परामर्शींशी

अगोदर विचारविनिमय केलेला नसेल अशी गोपनीय प्रकरणे खेरीज करुन) प्रत्यक्षपणे दिलेले

अभिप्राय किंवा सल्ला यांच्याकडे निर्णयार्थ सोपविलेल्या मुद्यांचा समावेश असलेल्या टिप्पणीसह

विधि परामर्शीला उपलब्ध करुन देईल.

(3) सांविधिक कर्तव्ये:-

महाअधिवक्ता संविधानाव्दारे अथवा त्या अन्वये सोपविली जातील किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याव्दारे त्यांच्याकडे सोपविली जातील अशी कार्ये व कर्तव्ये पार पाडील.

(4) विधानमंडळाच्या सभांना आणि त्याच्या समित्यांच्या बैठकींना उपस्थित राहणे:-

महाअधिवक्ता शासनाकडून फर्मावण्यात येईल तेव्हा, महाराष्ट्र विधानसभेच्या व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभांना आणि त्या सभागृहांच्या समित्यांच्या बैठकींना उपस्थित राहील.

(5) अधिवक्त म्हणून कर्तव्ये:-

महाअधिवक्त्याची कर्तव्ये पुढीलप्रमाणे असतील :

(क) शासनाकडून फर्मविण्यात येईल आणि विधि परामर्शी त्याला तसे अनुदेश देईल तेव्हा उच्च न्यायालयाच्या मूळ आणि अपील न्यायशाखांमध्ये दाखल केलेल्या खटल्यांमध्ये- मग ते दिवाणी किंवा फौजदारी असोत आणि तेथून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपीलांमध्ये शासनाची बाजू मांडणे;

(ख) उच्च न्यायालयाच्या मूळ न्यायशाखेतील ज्या दाव्यात किंवा कार्यवाहीत शासन त्याच्या सेवा घेईल आणि विधि परामर्शी त्याला तसे अनुदेश देईल्‍ अश्या कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत ज्य कोणत्याही नामित पक्षकाराच्या वतीने त्याला हजर राहण्यास सांगण्यात आले असेल त्या नामित पक्षकाराच्या वतीने उपस्थित राहणे;

(ग) (एक) मुंबई, नागपूर किंवा औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट

याचिकेत मग ती दिवाणी किंवा फौजदारी असो, ज्या ज्या वेळी शासन त्याला उपस्थित

होण्यास सांगेल आणि विधि परामर्शी त्याला तसे अनुदेश देईल त्या त्या वेळी शासनाच्या

किंवा त्याच्या अधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित राहणे;

(दोन) इतर राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकांमध्ये, ज्या ज्या वेळी शासन त्याला उपस्थित होण्यास सांगेल आणि विधि परामर्शी त्यला असे अनुदेश देईल त्या त्या वेळी शासनाच्या किंवा त्यच्या अधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित राहेणे;

(घ) संविधानाच्या 228 व्या अनुच्छेदान्वये उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेल्या कोणत्यही खटल्यात, मग तो दिवाणी किंवा फौजदारी असो, शासनाकडून फर्मविण्यात आल्यास आणि विधि परामर्शीने तसे अनुदेश दिल्यास शासनाच्या वतीने उपस्थित राहणे;

(ङ) उच्च न्यायालय त्यांच्यासमोर न्यायचौकशी करण्यासाठी राज्यातील इतर कोणत्याही न्यायालयाकडून जो कोणताही मूळ खटला वर्ग करील अशा कोणत्याही मूळ खटल्यात, मग तो दिवाणी किंवा फौजदारी असो, शासनाकडून फर्मविण्यात आल्यास आणि विधि परामर्शीने त्याला तसे अनुदेश दिल्यास शासनाच्या किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित राहणे;

(च) मूळ न्यायशाखेची किंवा अपील न्यायशाखेची अधिकारीता वापरणाऱ्या उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधिशाच्या न्यायनिर्णयाविरुध्द एकस्व पत्रान्वये उच्च न्यायालयात केल्या जाणाऱ्या कोणत्याही अपीलात, शासनाकडून फर्माविण्यात आल्यास आणि विधि परामर्शीने त्याला तसे अनुदेश दिल्यास शासनाच्या अथवा त्याच्या अधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित राहणे;

(छ) त्या त्या वेळी अमंलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये घटीत केलेल्या उच्च न्यायालयाच्या कोणत्याही विशेष न्यायपीठासमोरील कोणत्याही कार्यवाहीत शासनाकडून फर्माविण्यात आल्यास आणि विधि परामर्शीने त्याला तसे अनुदेश दिल्यास, शासनाच्या वतीने उपस्थित राहणे;

(ज) बृहन्मुंबईतील किंवा क्षेत्रातील एखाद्या न्यायालयाचा कोणताही निर्णय, आदेश किंवा कार्यवाही या संदर्भात उच्च न्यायालयासमोर येईल अश्या कोणत्याही खटल्यात मग तो दिवाणी किंवा फौजदारी असो, शासनाकडून फर्माविण्यात आल्यास आणि विधि परामर्शीने त्याला तसे अनुदेश दिल्यास, शासनाच्या किंवा त्याच्या अधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित राहणे;

(झ) सर्वोच्च न्यायालयातील किंवा भारताच्या राज्यक्षेत्रातील इतर कोणत्याही उच्च न्यायालयातील इतर कोणत्याही कार्यवाहीत मग ती दिवाणी किंवा फौजदारी असो शासनाकडून फर्माविण्यात आल्यास आणि विधि परामर्शीने त्याला तसे अनुदेश दिल्यास, शासनाच्या किंवा त्याच्या अधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित राहणे;

(य) उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर बजावलेल्या नोटीशीला अनुसरुन किंवा आपले म्हणणे मांडण्यासाठी त्याने एक उक्त न्यायालयात स्वत: अर्ज केला असे त्यावरुन, कोणत्याही खटल्यात मग तो दिवाणी किंवा फौजदारी असो, उपस्थित राहणे. अशा खटल्यात, तो, उपस्थित होण्याबाबत अनुदेशासाठी तोबडतोब ती बाब विधि परामर्शीला कळविल.

(ट) ज्या खटल्यात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय, त्याला उपस्थित राहण्यास सांगील किंवा त्याने उपस्थित राहिले पाहिजे असे आपले मत व्यक्त करील, अशा कोणत्याही खटल्यात मग तो दिवाणी किंवा फौजदारी असो, उपस्थित राहणे

(ठ)शासनाकडून फर्माविण्यात आल्यास आणि विधि परामर्शीने त्याला अनुदेश दिल्यास कोणतेही न्यायाधीकरण, प्राधिकरण किंवा उच्च न्यायालयाचे दुय्यम न्यायालय यांच्यासमोरील कोणत्याही कार्यवाहीत, शासनाची बाजू मांडणे;

(ड) शासनाकडून फर्माविण्यात आल्यास आणि विधि परामर्शीने त्याला तसे अनुदेश दिल्यास, कोणत्याही कार्यवाहीतील लेखी वाद प्रतिवाद, शपथपत्रे, खटल्याचे कथन किंवा इतर कोणताही दस्तएवज निर्धारित करणे.

(6) इतर सरकारांसाठी कर्तव्ये:-

महाअधिवक्ता, जी कर्तव्ये पार पाडण्याचे त्याला शासनाकडून निदेश देण्यात येतील आणि विधि परामर्शीने त्याला तसे अनुदेश देईल अशी कायदेशीर स्वरुपाची कर्तव्ये, केंद्र सरकारच्या आणि इतर राज्य शासनाच्या वतीने पार पाडील.

(7) सर्वसाधारण कर्तव्ये:-

शासन किंवा त्याचे अधिकारी पक्षकार असलेल्या कोणत्याही प्रकरणात संबंधित न्यायालयाने निर्णय दिल्याबरोबर महा अधिवक्त्यांची पुढील कर्तव्ये असतील;-

(एक) शासनाच्या प्रशासकीय विभागाला निर्णयाचे स्वरुप कळविणे, तसेच त्या निर्णयाची एक प्रत विधि परामर्शीला देणे आणि ज्या आधार कारणांवर तो निर्णय आधारलेला असेल त्या आधार कारणांचे संक्षिप्त टिपण देणे आणि त्याबाबतचा आपला अभिप्राय कळविणे जर खटल्याचा निर्णय शासनाच्या किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांच्या विरुध्द झालेला असेल तर, उच्च न्यायालयात किंवा यथास्थिती सर्वोच्च न्यायालयात अपीलात जाण्याच्या प्रश्नांवर सकारण अभिप्राय देणे.

(दोन) जर शासनाच्या विधि व न्याय विभागाने उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला तर, त्यानंतरचे विनंती अर्ज, प्रतिज्ञापत्र किंवा खटल्याचे कथन यांचे मसुदा लेखन करण्यासह आवश्यक ते सर्व उपाय योजणे.

(तीन) कोणताही कर, उपकर, पट्टी, दंड इत्यादी बसविण्यासंबंधी किंवा कोणतीही अधिनियमीती, सांविधीक नियम, इत्यादीमध्ये असलेला कोणताही दोष किंवा उणीव यासंबंधात न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण किंवा दिलेले निर्देश प्रशासकीय विभागांच्या आणि विधि परामर्शीच्या निदर्शनास आणून देणे किंवा जर उक्त न्यायालयाने कोणताही कायदा किंवा सांविधिक नियम अधिकारबाह्य ठरवला असेल किंवा ज्यात न्यायालयाने उक्त कायदा किंवा सांविधिक अिधिनियमीती गैरसोयीस किंवा विसंगती कारणीभूत ठरत असल्याचे मत व्यक्त केले असेल तर, ते निदर्शनास आणून देणे.

(8) प्रभार आणि प्रकरणांच्या संक्षिप्त टिपणांचे वाटप:-

(क) महाअधिवक्ता, जेथवर प्रकरणांची टिपणे वाटपाचा आणि याचिका चालवण्याचा संबंध असेल तेथवर, सरकारी वकील उच्च न्यायालय (मूळ न्यायशाखा) वअपर सरकारी वकील, उच्च न्यायालय (अपील न्यायशाखा) यांच्या कार्यालयाचे सर्वांगीण पर्यवेक्षण करील.

(ख) प्रकरणांच्या संक्षिप्त टिपणाचे असे वाटप हे, महाअधिवक्त्याच्या संपूर्ण विवेकाधीन आणि रास्त निर्णयावर सोडलेले असेल. तथापि, तो, प्रकरणांच्या अशा संक्षिप्त टिपणांचे वाटप स्वत: बरोबरच सरकारी वकील, उच्च न्यायालय (मूळ न्यायशाखा) व अपर सराकरी वकील, उच्च न्यायालय (अपील न्यायशाखा) मुंबई आणि दोन्ही बाजूंकडील सहायक सरकारी वकील व नामिका समुपदेशी यांना करील आणि प्रकरणांचे संक्षिप्त टिपणांचे असे वाटप शक्यतो रास्त, न्यायी आणि योग्यपणे केले जाते याची सुनिश्चिती करील.

(ग) पूर्वगामी नियमांच्या तरतुदींच्या अधीन, जर त्याने, एखाद्या खटल्यात घटनात्मक कायद्याचा गुंतागुंतीचा प्रश्न किंवा एखाद्या संविधिच्या किंवा सांविधिक नियमांच्या विधि ग्राह्यतेसंबंधीचा प्रश्न आंतर्भूत आहे, असे निश्चित केले असेल तर, तो स्वत: अशा प्रकरणात उपस्थित राहील.

(9) खटला चालवण्यासाठी सहाय्य :-

(क) महाअधिवक्ता, मुंबई येथील उच्च न्यायालयात (मूळ किंवा अपील न्याय शाखा) दाखल केलेले खटले चालविण्यासाठी अ किंवा ब नामिका समुपदेशीमधील कोणत्याही एका कनिष्ठ समुपदेशीचे किंवा त्याच्या पसंतीच्या सहायक सरकारी वकीलाचे सहाय्य घेण्यास हक्कदार असेल.

(ख) जेव्हा जेव्हा अ नामिका समुपदेशी नेमणे आवश्यक असेल, तेव्हा तेव्हा तो, प्रथम शासनाच्या विधि व न्याय विभागाला आवश्यक ती मंजूरी देणे शक्य व्हावे म्हणून, अशा समुपदेशीच्या नेमणुकीविषयीची प्रथम माहिती देणाऱ्या पत्रात, त्या प्रकरणात अंतर्भूत असलेले महत्वाचे मुद्दे संक्षिप्तपणे मांडून ते पत्र शासनाला देईल.

(ग) तो, विशेष परिस्थिती असल्याखेरीज आणि शासनाच्या विधि व न्याय विभागाची लेखी पूर्वमान्यता घेतल्याखेरीज, कोणत्याही प्रकरणात एकापेक्षा अधिक अ किंवा ब नामिका समुपदेशी नेमणार नाही किंवा कोणताही सरकारी वकील‍ किंवा अपर किंवा सहायक सरकारी वकील नेमणार नाही.

पत्ता:- महाअधिवक्ता, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय,

खोली क्र.5, विस्तार इमारत,

सां.बा.विभाग, 1ला मजला,

मुंबई उच्च न्यायालय, मुंबई 400 032.

दूरध्वनी क्रमांक : 022-22623779/22650712

महाअधिवक्त्यांची यादी

अ.क्र.

नाव

वर्ष

1

एस.एम. थ्रिप्लंड

1807-10

2

एम.जे.मॉकलीन

1810-19

3

ओ.वुडहाऊस

1819-22

4

जी.सी.इरवीन

(हंगामी)

1822-23, 29-31

5

जी.नॉर्टन

1823-27

6

ए.हॅमॉन्ड

1827-28

7

आर.ओ.ब्रिजमन

1828

8

सर.जे.देवर

1828-29

9

जे.मील

(हंगामी)

1832

10

एच.रोपर

1832-36-37

11

ए.एस. लेमेस्सुरीयर

1833-55

12

डब्ल्यु. हावर्ड

(हंगामी)

1840, 185-56

13

एस.एस.डिकिंशन

1852-53

14

एम.वेस्टरोप

(हंगामी)

1856-57, 1861-62

15

जे.एस.विट

(हंगामी)

1870-72

16

सर.ए.स्कोबल

1870-77

17

सी.मॅंह्यू

(हंगामी)

1872

18

जे.मारीयोट

(हंगामी)

1868-84

19

एफ.एल.लेथम

(हंगामी)

1880-92

20

सर.सी.फरान

(हंगामी)

1884-86

21

जे.जे.जरडीन

(हंगामी)

1882

22

एम.एच स्टर्लिंग

1886-97

23

जे.मॅकफरसन

(हंगामी)

1890-95

24

बी.लँग

(हंगामी)

1882-91, 1893-1902

25

सर बी.स्कॉट

(हंगामी)

1899-1908

26

ई.बी.रेकिस

(हंगामी)

1905-08

27

जी.आर.

(हंगामी)

1906

28

आर.एम.ब्रान्सन

(हंगामी)

1908

29

एल.जे.रॉबर्टसन

(हंगामी)

1908

30

एम.आर.जरडीन

(हंगामी)

1908-10, 12-15, 15-16

31

सर. टी.जे.स्ट्रँगमन

1908-22

32

डी.एन.बहादुरजी

(हंगामी)

1915-19, 21

33

सर.जे.बी.कांगा

(हंगामी)

1922-35

34

बी.जे.देसाई

(हंगामी)

1926

35

सर.डी.एम.मुल्ला

(हंगामी)

1922-30

36

डी.बी.बिंग

(हंगामी)

1928

37

व्ही.एफ.तारापोरवाला

(हंगामी)

1931-34

38

के.एम.केंम्प

1935-37

39

एम.सी.सेटलवाड

1937-42

40

सर एन.डी.इंजीनीअर

(हंगामी)

1942-45

41

सी.के.दप्तरी

(हंगामी)

1945-51

42

एम.पी.अमीन

(हंगामी)

1948-57

43

एच.एम.सेरावई

1957-74

44

आर.डब्ल्यु. अदीक

1974-78

45

आर.एस.भोन्साली

1978-79

46

ए.एस.बोबडे

1987-91

47

ए.व्ही.सावंत

1982-87

48

व्ही.आर.मनोहर

1991-93

49

टी.आर.अंध्यारुजीना

1993-95

50

सी.जे.सावंत

1995-99

51

जी.ई वाहनवटी

1999-2004

52

व्ही.ए.थोरात

2004-05

53

आर.एम.कदम

2005-2012

54

डी.जे.खंबाटा

2012-2014

55

सुनिल व्ही मनोहर

2014-2015

56

अनिल सी.सिंग (इनचार्ज)

2015-2015

57

एस.जी.अणे

2015-2016

58

रोहीत देव

परीक्षेला येणारे महत्वाचे प्रश्न

❇️ आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
   - बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
   - मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
   - लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
   - बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
   - लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
   - 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
   - कलकत्ता विद्यालय

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ परीक्षेला येणारे महत्वाचे दहा प्रश्न  ❇️

प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
उत्तर - लॉर्ड पामर्स्टन

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

लॉर्ड डलहौसी

🟢 लॉर्ड डलहौसी 🟢

❇️कालावधी:-1848 ते 1856

✍खुल्या व्यापारचे तत्व आणले

✍सिमला उन्हाळी राजधानी केली

✍खालसाधोरणसाठी प्रसिद्ध होता

❇️दत्तकविधान नामंजूर खालसा

▪️सातारा:-1848

▪️संबलपूर:-1849

▪️जैतपुर:-1849

▪️बघाट:-1850

▪️उदयपूर:-1852

▪️झाशी:-1853

▪️नागपूर:-1854

❇️अंतर्गत राज्यकारभार गोंधळ

▪️सिक्कीम:-1850

▪️अवध:-1856

▪️1853:-बिनतारी संदेशवहन सुरू

▪️1854:-पोस्ट खाते सुरू

▪️पहिले पोस्ट तिकीट कराची ला

✍16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे रेल्वे धावली

▪️1856:-विधवा पुनर्विवाह कायदा पास

▪️1856:-धार्मिक अयोग्यता कायदा

▪️1856:-सामान्य सेवा भर्ती कायदा

▪️1854:-सार्वजनिक बांधकाम खाते सुरू

▪️1856:-पहिले अभियांत्रिकी कॉलेज सुरू रुरकी येथे

▪️1853:-पहिली कापड गिरणी सुरू

▪️1849:-दुसरे इंग्रज शीख युद्ध

▪️1852:-इंग्रज बर्मा युद्ध.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली ?
९ डिसेंबर १९४६.

संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
डाॅ.राजेंद्र प्रसाद.

मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
डाॅ.बाबासाहेह आंबेडकर.

घटनेची प्रस्तावना कोणी लिहिली ?
पंडित जवाहरलाल नेहरू.

भारताच्या संविधानाचे शिल्पकार असे कोणाला संबोधतात ?
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.

पंख असूनही उडता न येणा-या पक्षाचे नाव काय ?
शहामृग.

हिरव्या काचेतून लाल गुलाब बघितल्यास त्याचा रंग कसा दिसेल ?
काळा.

इलेक्ट्रिक इस्त्रीमधील तापणारा घटक कोणता ?
नायक्रोम.

शून्याचा शोध कोणी लावला ?
आर्यभट्ट.

पेनिसीलीनचा शोध कोणी लावला ?
अलेक्झांडर फ्लेमिंग.

पहिला प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा करण्यात आला ?
२६ जानेवारी १९५०.

भारतीय संविधानाप्रमाणे भारत हा काय आहे ?
राज्यांचा संघ.

देशातील ज्या भागांवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण असते,अशा भागांना काय म्हणतात ?
केंद्रशासित प्रदेश.

भारतीय संविधानाने कोणत्या व्यवस्थेचा स्विकार केला आहे ?
प्रजासत्ताक.

केंद्रीय मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो ?
संसदेला.

इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले

🔲 इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले 🔲


1) अलीपूर कट:- 1908
🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष

2) नाशिक कट:- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर

3) दिल्ली कट:- 1912
🔶 रासबिहारी बोस

4) लाहोर कट:- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस

5) काकोरी कट:- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन

6) मीरत/मेरठ कट:- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे

7) लाहोर कट:- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद

8) चितगाव कट:- 1930
🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष

महापरीक्षा ने विचारलेले प्रश्न

१) सिटीस्कॅन करण्यासाठी कोणत्या वेव्हस् वापरल्या जातात ?

👉 क्ष-किरण

२)जेट इंजिन कोणत्या तत्वावर काम करते ?

👉 लिनियर विल रिझर्वेशन

३) जर आपण मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये कौचा सहीत असलेले अंडी ठेवले तर काही काळानंतर काय घडण्याची शक्यता आहे ?

👉अंड्याचे कवच तडकेल

४)लाय डिटेक्टर तपासणी कोणत्या उपकरणाच्या साह्याने करतात ?

👉पॉली ग्राफ

५) पाण्याखाली ध्वनि चे मोजमाप करण्यासाठी कोणते साधन वापरतात ?

👉हायड्रोफोन

६) आकाशाच्या निळ्या रंगाच्या संबंधित प्रकाशाचा एक प्रकार म्हणजे ......

👉स्कॅटरिंग

७) राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?

👉 सर सी व्ही रामन यांची रमन प्रभाव शोध दिवस

८)सरासरी पुरुषाचे रुदय किती वजनाचे असते ?

👉340 ग्रॅम

९)शरीरातील रक्ताचे अभिसरण हे शरीरातील कोणत्या अवयवा द्वारे नियंत्रित केले जाते ?

👉 हृदय

१०) शरीरातील कोणता अवयव रक्तातून शरीरातील नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ काढून नंतर मूत्राद्वारे बाहेर फेकतो ?

👉 मुत्रपिंड

११)स्क्रीन वर प्राप्त केली न जाऊ शकणारी प्रतिमा कोणती  ?

👉 आभासी प्रतिमा

१२) आयोडीन हा संप्रेरकांमधील महत्त्वाचा घटक कशाद्वारे निर्माण केला जातो ?

👉 अवटू ग्रंथी

१३)एक नियंत्रित आण्विक साखळी अभिक्रिया कशाचा पाया तयार करते ?

👉 अणुबॉम्ब

१४) मनुष्य काय उत्सर्जित करतो ?

👉 युरिया

१५)भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय कोण आहेत| ?

👉 डॉ.सी. व्ही .रमण
⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔

सामान्य विज्ञान & पर्यावरण


मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System)

मध्यवर्ती चेता संस्था मेंदू आणि चेतारज्जू / मेरुरज्जू यांची बनलेली असते.

मेंदू भोवती कर्पर (Cranium) कवटीच्या हाडांचे संरक्षणात्मक आवरण असते.

चेतारज्जूला कशेरुस्तंभाचे म्हणजेच पाठीच्या कण्याचे संरक्षणात्मक आवरण असते.

मध्यवर्ती चेतासंस्था आणि हाडे यांच्या पोकळीत संरक्षणात्मक आवरण असते त्यांना मस्तिष्कावरण (Meaninges) असे म्हणतात.

मध्यवर्ती चेतासंस्थेचे कार्य ऐच्छिक स्वरूपाचे असते, म्हणजेच शरीरातील सर्व क्रियांचे नियंत्रण आणि समन्वय घडवून आणणे.

मानवी शरीर:
1: हाडांची संख्या: 206
2: स्नायूंची संख्या: 639
3: मूत्रपिंडांची संख्या: 2
4: दुधाच्या दातांची संख्या: 20
5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)
6: हार्ट चेंबर क्रमांक: 4
7: मोठी धमनी: महाधमनी
8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी
9: रक्त पीएच: 7.4
10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33
11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7
12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6
13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14
14: कवटीतील हाडांची संख्या: 22
15: छातीत हाडांची संख्या: 25
16: हात मध्ये हाडांची संख्या: 6
17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72
18: हृदयातील पंपांची संख्या: 2
19: सर्वात मोठा अवयव: त्वचा
20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत
21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय
22: सर्वात लहान सेल: शुक्राणू
23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान
24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड
25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी
26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी
27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो
28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा
29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)
30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर
:१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस
32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस
33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)
34: मानवी पायात हाडांची संख्या: 30
35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8
36: हातात हाडांची संख्या: 30
37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड
38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा
40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर
:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)
41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)
42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 270-300
43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5
44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ
45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी
46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट
47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट
48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया
49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा
50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त
51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल
52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...

मानवी डोक्याचे वजन ?
   १४०० ग्रॅम.


सामान्य रक्तदाब ?
   १२०/८० मि. मी. पा-याची उंची.

शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
   न्यूरॉन.

लाल रक्त पेशींची संख्या ?
   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.

शरिरातील एकूण रक्त ?
  ५ ते ६ लीटर.
 
सर्वात लहान हाड ?
   स्टेटस ( कानाचे हाड )

सर्वात मोठे हाड ?
   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )

लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
   १२० दिवस.

पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
  ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.

पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
   २ ते ५ दिवस.

रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.

हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.

ह्रदयाचे सामान्य ठोके ?
   ७२ ते ७५ प्रति मिनिट.

नाडी दर (पल्स रेट) ?
   ७२ प्रतिमिनिट.

सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
   थायरॉईड ग्रंथी.

सर्वात मोठा स्नायू ?
   ग्लुटियस म्याक्सीमस.

एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
   ६३९.

रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
   मोनोसाईटस - ३ ते ८%.
   बेसोफिल्स - ०.५%.
   लिम्फोसाईटस - २० ते २५%.
   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.

शरीराचे तापमान ?
   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.

प्रौढांमधील दातांची संख्या ?
  ३२.

लहान मुलांमधील दातांची संख्या ?
   २० दूधाचे दात.

सर्वात पातळ त्वचा ?
   पापणी (कंजक्टायव्हा)

आजचे प्रश्नसंच

1)  जड पाण्याचा रेनुभार किती असतो ?
:- 20

2)  कोणत्या धातूचा उल्लेख
" भविष्य काळाचा धातू " असा केल्या जातो ?
:-  टिटॅनियम

3) मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला ?
:- तांबे

4)   विजेच्या दिव्यात कोणते निष्क्रिय वायू भरलेले असतात ?
:- नायट्रोजन व अरगॉन

5) डोळ्यातील कोणत्या पेशी ह्या प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात  ?
:-शंक्वाकार पेशी

6) ज्या पावसाचा पी एच ( सामू ) 5.6 पेक्षा कमी असतो त्या पावसाला ........... पाऊस म्हणतात ?
:- आम्ल युक्त पाऊस ( एसिड रेन )

7) स्वयंपाकाच्या नॉनस्टिक भांड्यांवर कशाचा थर दिलेला असतो  ?
:- टेफ्लॉन

8) झेरॉक्स चा शोध कोणी लावला  ?
:- सी.फ. कार्लसन

9) भिंगांचा शोध कोणी लावला ?
:- रॉजर बेकन

10)  होलोग्राम चा शोध कुणी लवला?
:- डेनिस गॅबर

11) सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?
सिंगापूर
टोकिओ
रंगून
बर्लिन

● उत्तर - सिंगापूर

12) इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?
सुभाषचंद्र बोस
राशबिहारी बोस
जगन्नाथराव भोसले
कॅप्टन मोहन सिंग

● उत्तर - राशबिहारी बोस

13)……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
संत नामदेव

● उत्तर - संत एकनाथ

14)ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?
ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत
भावार्थ रामायण
मनाचे श्लोक
ज्ञानेश्वरी
● उत्तर - ज्ञानेश्वरी

15)पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे
राणी लक्ष्मीबाई
शिवाजी महाराज
नानासाहेब पेशवे

● उत्तर - तात्या टोपे

16)भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?
बाडोंली
खेडा
चंपारण्य
चौरीचौरा

● उत्तर - चंपारण्

17)पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?
बाबा पद्मजी
गो.ग. आगरकर
शि.म. परांजपे
श्रीधर व्यंकटेश केतकर

● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर

18) अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?
नाना जगन्नाथ शंकरशेठ
बाळशास्त्री जांभेकर
विष्णूशास्त्री पंडित
विष्णूबुवा ब्रह्मचारी

● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर

19)खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल
असहकार चळवळ - लोकमान्य टिळक
चंपारण्य सत्याग्रह - गो.कृ.गोखले
रामकृष्ण मिशन द्यानंद सरस्वती

● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल

20 )र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?
केसरी
मराठा
ज्ञानोदय
सुधारक (गो.ग आगरकर)

● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

रक्त (Blood)

◾️मानवी रक्त रक्तद्रव्य (एकूण रक्ताच्या 55% भाग) आणि रक्तपेशी (RBC, WBC & Platelets) या मुख्य दोन घटकांनी बनलेले असते.

◾️रक्त हे संयोजी ऊतीचा (Connective Tissue) एक प्रकार आहे.

◾️रक्ताच्या अभ्यासाला Haematology म्हंटले जाते.

◾️मानवी शरीरात साधारणतः 5 लिटर रक्त असते.

◾️रक्ताचा pH हा 7.35 ते 7.45 (अल्कली) असतो. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

◾️ रक्ताचा किंवा रक्तद्रवाचा अल्कली गुणधर्म बायकार्बोनेटमुळे येतो.

◾️प्रोथ्राॅम्बीन आणि फायब्रिनोजन ही रक्तद्रवातील प्रथिने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.

◾️मास्ट पेशीने तयार केलेले हिपॅरीन हे रसायन शरीरातील रक्त गोठू देत नाही.

◾️Leukemia म्हणजेच रक्ताचा कर्करोग.

◾️ रक्तातातील सामान्य परिस्थितीमध्ये कोलेस्टेराॅलची पातळी 50-180 mg/dl असते.

काही महत्त्वाचे प्रश्न

1) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे?

उत्तर : 1 मे 1960

2) महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे?

उत्तर : 1 मे 1962

3) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत?

उत्तर : यशवंतराव चव्हाण

4) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?


उत्तर : श्री प्रकाश

5) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?

उत्तर : – 3,07,713 चौ.कि.मी.

6) महाराष्ट्राचा विस्तार किती आहे?

उत्तर : अक्षांश 15 अंश 8′ उत्तर ते 22 अंश 1 उत्तर, रेखांश 72 अंश 6′ पूर्व ते 80 अंश 9′ पूर्व. पूर्व-पश्चिम विस्तार 800 कि.मी. उत्तर-दक्षिण विस्तार 700 कि.मी.

7) महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे?

उत्तर : 720 किमी

8) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?

उत्तर : मुंबई

9) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

उत्तर : नागपूर

10) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते आहे?

उत्तर : कळसुबाई (1646 मी.)

कोरोना व्हायरस जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे
11) कोणत्या डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

उत्तर : शंभू महादेव

12) कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?


उत्तर : हरिश्चंद्र बालाघाट

13) कोणत्या डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

उत्तर : सातमाळा अजिंठा

14) महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : तिसरा

15) महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : दुसर

16) महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्यादृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : सहावा (82.9%)

17) महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक (gdp) लागतो?

उत्तर : पहिला

18) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?

उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

19) कोणते शहर महाराष्ट्राचा ‘हरित पट्टा’ म्हणून ओळखले जाते?

उत्तर : नाशिक

20) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती?

उत्तर : सातवी

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...