१९ जून २०२२

मानवी शरीर


1: हाडांची संख्या: 206
2: स्नायूंची संख्या: 639
3: मूत्रपिंडांची संख्या: 2
4: दुधाच्या दातांची संख्या: 20
5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)
6: हार्ट चेंबर क्रमांक: 4
7: मोठी धमनी: महाधमनी
8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी
9: रक्त पीएच: 7.4
10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33

11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7
12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6
13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14
14: कवटीतील हाडांची संख्या: 22
15: छातीत हाडांची संख्या: 25
16: हात मध्ये हाडांची संख्या: 6
17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72
18: हृदयातील पंपांची संख्या: 2
19: सर्वात मोठा अवयव: त्वचा
20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत

21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय
22: सर्वात लहान सेल: शुक्राणू
23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान
24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड
25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी
26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी
27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो
28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा
29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)
30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर

31: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस
32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस
33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)
34: मानवी पायात हाडांची संख्या: 33
35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8
36: हातात हाडांची संख्या: 27
37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड
38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा
40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर
:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)

41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)
42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306
43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5
44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ
45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी
46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट
47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट
48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया
49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा
50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त

51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल
52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

सामान्य ज्ञान

गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा.

गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.

गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.

गोविंद – बुटक्या तांदळाची जात.

ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.

ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.

ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.

ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.

ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.

ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.

घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.

घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.

घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.

घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.

घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.

चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.

चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.

चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.

----------------------------------------------------

महाभरती साठी अत्यंत उपयुक्त

1) " नवल " हा शब्द भाववाचक नामात कसा वापराल ?

1) नवलाकडे
2) नवलाचे
3) नवलाई ✅
4) नवलाईने

2) " सुलभा " हे कोणते नाम आहे ?

1) सामान्यनाम
2) भाववाचक नाम
3) विशेषनाम ✅
4) सर्वनाम

3) " गोडवा " या शब्दाचा प्रकार सांगा.

1) नाम
2) भाववाचक नाम ✅
3) विशेषण
4) सर्वनाम

4) " भारत " या शब्दाची जात ओळखा ?

1) सामान्यनाम
2) समूहवाचक नाम
3) विशेषनाम ✅
4) गरिबी

5) शांतता, शहर, श्रीमंती, सौंदर्य या चार शब्दापैकी सामान्यनाम शब्द ओळखा.

1) शहर ✅
2) शांतता
3) सौदर्य
4) श्रीमंती

6) " त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. "या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे .

1) सर्वनाम
2) उभयान्वयी अव्यय
3) विशेषण
4) नाम✅

7) शब्दाचा प्रकार ओळखा -"पर्वत "

1) सामान्यनाम ✅
2) विशेषनाम
3) भाववाचक नाम
4) विशेषण नाम

8) "आपल्या " या शब्दाचे भाववाचक रूप कोणते ?

1) आपण
2) आपुलकी ✅
3) आम्ही
4) आपली

9) विशेषनामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात?

1) अनेकवचनी
2) एकवचनी ✅
3) बहुवचनी
4) यापैकी नाही

10) पुढीलपैकी पदार्थवाचक नाम ओळखा :

1) सैन्य
2) साखर ✅
3) वर्ग
4) कळप

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘दास’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) दाशी    2) दासी      3) माळीण    4) मादी

उत्तर :- 2

2) पुढीलपैकी अनेकवचनी नाम ओळखा.

   अ) शहारे    ब) हाल      क) केळे      ड) रताळे.

   1) अ आणि ब    2) अ आणि ड    3) अ, क आणि ड    4) फक्त ड

उत्तर :- 1

3) ‘कुत्रा’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?

   1) कुत्र्या    2) कुत्री      3) कुत्रे      4) कुत्रि

उत्तर :- 1

4) मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत ?

   1) सात    2) नऊ      3) आठ      4) दहा

उत्तर :- 3

5) विध्यर्थी वाक्य कोणते ते ओळखा.

   1) जर ढग दाटले तर पाऊस पडेल      2) पाऊस पडेल
   3) पाऊस पडला असता तर बरे झाले असते    4) पाऊस पडण्याची शक्यता आहे का ?

उत्तर :-2

6) एक विशाल मंदिर तयार झाले. या वाक्यातील अधोरेखित शब्द ................. आहेत.

   1) उद्देश्य    2) विधेय      3) उद्देश्यविस्तार    4) विधेयविस्तार

उत्तर :- 3

7) ‘राजा प्रधानाला बोलावतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) कर्मणी    3) भावे      4) कर्मकर्तरी

उत्तर :- 1

8) ‘नवरात्र’ या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल ?

   1) नौ रात्रीचा समूह  2) नव रात्रींचा समूह  3) नऊ रात्रींचा समूह  4) नवरात्रौत्सव

उत्तर :- 3

9) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
    “वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे ................ येतो.”

   1) अर्धविराम    2) अपूर्णविराम    3) स्वल्पविराम    4) पूर्णविराम.

उत्तर :- 4

10) ‘पाठीवरी वेणी नच, नागीणच काळी’ – या वाक्यातील अलंकार ओळखा.

   1) व्यतिरेक    2) अपन्हुती    3) उत्प्रेक्षा    4) यमक

उत्तर :- 2

१६ जून २०२२

अंकगणित सराव 20 प्रश्न उत्तरे , अवश्य सोडवा

1. मुद्दल = 5000 रु, मुदत = 4 वर्षे, व्याज = 1600 रु तर सरळव्याजाचा दर किती?

 6

 7

 9

 8

उत्तर : 8



 2. 7 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहाल?

 VI

 VII

 XII

 IIV

उत्तर :VII



 3. 720 चा शेकडा 25 किती?

 360

 180

 144

 270

उत्तर :180



 4. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?

 45,54,63,72,?

 42

 21

 81

 18

उत्तर :81



 5. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?

 29,58,87,?

 116

 96

 100

 106

उत्तर :116



 6. प्रश्नचिन्हाच्या जागीकाय येईल?

 10:50::8:?

 30

 40

 50

 60

उत्तर :40



 7. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 पुरुष:स्त्री::मोर:?

 मोरीण

 लांडोर

 लांडोरिन

 पिसारा

उत्तर :लांडोर



 8. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 6:36::?:49

 40

 6

 35

 7

उत्तर :7



 9. घड्याळाच्या दोन काटयांत साडेबारा वाजता किती अंशाचा कोन असेल?

 105°

 165°

 180°

 195°

उत्तर :165°



 10. ‘साखरभात’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही?

 साभार

 भारत

 सारखा

 साखर

उत्तर :सारखा



 11. जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात?

 पाणी

 हवा

 आकाश

 माती

उत्तर :माती



 12. गटात बसणारे पद ओळखून पर्याय लिहा.

पेन्सिल, पेन, खडू, —–?

 पाटी

 खोडरबर

 बोरू

 पट्टी

उत्तर :बोरू



 13. गटात बसणारे पद ओळखून पर्याय लिहा.

6/30,3/15,7/35,—–?

 2/10

 11/33

 8/24

 10/20

उत्तर :2/10



 14. गटात बसणारे पद ओळखून पर्याय लिहा.

4,9,16,—-

 138

 32

 164

 25

उत्तर :25



 15. गटात न बसणार्‍या पदाचा क्रमांक लिहा.

 45

 32

 47

 41

उत्तर :32



 16. गटात न बसणार्‍या पदाचा क्रमांक लिहा.

 32

 18

 43

 48

उत्तर :43



17. गटात न बसणार्‍या पदाचा क्रमांक लिहा.

 25

 12

 9

 64

उत्तर :12



 18. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

90:92::98:?

 982

 96

 89

 100

उत्तर :100



 19. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 13:26::15:?

 20

 30

 31

 40

उत्तर :30



 20. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

40:10::60:?

 20

 15

 12

 30

उत्तर : 15

मौलाना अबुल कलाम आझाद

🟢 मौलाना अबुल कलाम आझाद 🟢

◾️जन्म: 11नोव्हेंबर 1888
मक्का, ऑट्टोमन साम्राज्य (आताचे सौदी अरेबिया)

◾️मृत्यू: 22 फेब्रुवारी 1958, दिल्ली

◾️लोकजागृतीसाठी 1912 साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले.

◾️1915 साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले.

◾️अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत

◾️1923 च्या दिल्ली येथील कॉंग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले

◾️आझाद 1949 ते 46 पर्यंत कॉंग्रेसचे अध्यक्ष होते

◾️1942 ची क्रिप्स योजना, 1945 ची वेव्हेलची सिमला परिषद व 1946 मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत कॉंग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला

◾️केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्येत शिक्षणमंत्री म्हणून राहिले

◾️त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (1959) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे.

भारतीय राज्यघटनेचा सरनामा

भारतीय राज्यघटनेचा सरनामा

आम्ही,भारताचे लोक, भारताला एक सार्वभौम,

समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही,गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस:

सामाजिक,आर्थिक व राजकीय न्याय,

विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य,

दर्जाची व संधीची समानता,

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची  प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून, आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. 

भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच आपल्या राज्यघटनेचा सरनामा किंवा प्रस्तावना (Preamble) देण्यात आलेली आहे.१३ डिसेंबर १९४६ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत मांडलेल्या उद्देश पत्राच्या आधारावर आणि अमेरिकन राज्यघटनेच्या धर्तीवर भारतीय राज्यघटनेत  ‘राज्यघटनेचा सरनामा’ सामील करण्यात आलेला आहे. ही केवळ भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना नसून, भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान, मुल्ये,आदर्श व्यक्त करणारी उद्देशिका आहे आणि या सरनाम्याचे भारतीय राज्यघटनेत अनन्यसाधारण महत्व आहे.

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये घटनेच्या प्राधिकाराचा स्त्रोत; भारतीय राज्याचे स्वरूप आणि आदर्श; राज्यघटनेचे उद्देश व आकांक्षा आणि घटनेची स्वीकृती तारीख- या चार घटकांचा समावेश होतो. या प्रस्तावनेमध्ये मुख्यतः भारतीय राज्यघटनेच्या तत्वज्ञानाचे चित्र प्रदर्शन होते.    सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही,गणराज्य,न्याय, स्वातंत्र्य,समानता,बंधुता,एकता आणि एकात्मता हे प्रस्ताविकेतील तत्त्वज्ञान संपूर्ण राज्यघटनेची दिशा निर्धारित करतात. यांतील प्रत्येक शब्द हा लाखमोलाचा असून त्याचे विस्तृत विवेचन आपणास राज्यघटनेच्या विविध कलमांमधून पहावयास मिळते.

भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. ‘सार्वभौम’ म्हणजे आपणावर कोणत्याही बाह्य शक्तींचा निर्णयप्रक्रियेत प्रभाव नसणे. भारत हे सार्वभौम राष्ट्र असल्यामुळे आता आपल्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे आधिपत्य नाही आणि आपला अंतर्गत आणि बाह्य कारभार आपण आपल्या पद्धतीने करण्यास मुक्त व सक्षम आहोत. ‘समाजवादी’ हा शब्द आपणास केवळ घटनेच्या सरनाम्यात आढळतो आणि राज्यघटनेत तो शब्द इतरत्र कुठेही नमूद करण्यात आलेला नाही. लोकशाही समाजवादाच्या माध्यमातून विषमता दूर करून ‘कल्याणकारी राज्य’ स्थापन करण्याची अपेक्षा घटनाकर्त्यांना अपेक्षित आहे. ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दाचा अर्थ म्हणजे भारत देशाला स्वतःचा असा कुठलाही धर्म नाही, परंतु सर्वधर्मसमभाव हे तत्त्व आपल्या देशात अवलंबिले जाईल. ‘लोकशाही’म्हणजे लोकांनी,लोकांसाठी,लोकांमार्फत राबविलेली शासनव्यवस्था होय.

‘गणराज्य’ या शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्या देशात सर्वोच्च असे राष्ट्रप्रमुखाचे पद हे वंशपरंपरेने अथवा राजेशाही पद्धतीने नेमले जात नसून भारताचे राष्ट्रपती हे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतीनिधीमार्फत अप्रत्यक्षपणे निवडणूक पद्धतीने निवडले जातात. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील ‘न्याय’ ही संकल्पना सामाजिक,आर्थिक व राजकीय न्याय अशा पद्धतीने अपेक्षित आहे.

कुठल्याही पद्धतीच्या जात,वर्ण,वंश,लिंग यांसारख्या आधारावर भेदभाव न करता ‘सामाजिक न्याय’ प्रस्थापित करता येईल आणि  उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करून ‘आर्थिक न्याय’ प्रस्थापित होऊ शकेल. राजकीय न्यायामध्ये सर्वांना समान राजकीय हक्क,सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती,राजकीय संधींची समानता यांचा समावेश होतो. ‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा अर्थ व्यक्तींच्या कृतीवर बंधन नसणे आणि त्यांना व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी संपूर्ण संधी देणे, असा होय.

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात सर्व भारतीयांसाठी
विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. या विविध स्वातंत्र्यांची अमलबजावणी राज्यघटनेत मुलभूत हक्कांच्या स्वरुपात उपलब्ध आहे.

‘समानते’च्या तत्वानुसार सर्व भारतीय नागरिकांना नागरी,राजकीय आणि आर्थिक समानतेची हमी देण्यात आलेली आहे. ‘बंधुभावा’च्या तत्वानुसार धार्मिक,भाषिक,प्रांतिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे हे कर्तव्य असेल. ‘एकता व एकात्मता’ ह्या संकल्पना  राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुक्रमे भौगोलिक एकसंधता व मानसिक बाजू प्रदर्शित करतात. एकात्मतेच्या संकल्पनेमध्ये राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया अंतर्भूत असून त्याचा संबंध जनतेच्या भावनिक एकीकरणासोबत जोडलेला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या मूळ सरनाम्यामध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार समाजवादी,धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता- या तीन शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे भारतीय राज्यघटनेमध्ये  अनन्यसाधारण असे महत्व आहे. खऱ्या अर्थाने, ती भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय आहे. भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे भरतीय संविधानाचा आरसा आहे, जो भारतीय राज्यघटनेला खरेखुरे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिबिंबीत करतो.संविधान सभेचे सदस्य पंडित ठाकूर दास भार्गव यांच्या मते – ‘ सरनामा हा आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे.तो घटनेचा आत्मा आहे. ती घटनेची चावी आहे.

’ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार  सुरुवातीला सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा हिस्सा आहे की नाही, यांविषयी वाद होता. सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यामध्ये १९६० मध्ये सरनामा हा घटनेचा भाग नसल्याचा निवाडा दिला होता, परंतु १९७३ मधील केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचे मत फेटाळून लावले आणि सरनामा हा संविधानाचा भाग असल्याचे स्पष्ट केले. तसेच ही प्रस्ताविका अत्यंत महत्वाचा भाग असून घटनेचा अर्थ या सरनाम्यातील उदात्त दूरदृष्टीच्या संदर्भातच लावण्याचे मत प्रदर्शित करण्यात आले.

थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या

● जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

● आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

● घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

● मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

● लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

● विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

● समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

● भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

● नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

● आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

● भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

● हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद

● आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी

● भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

● भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

● पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

● नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

● हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले.

राज्य व समुद्रकिनारा

✔️गुजरात:-1700 किमी

✔️आंध्रप्रदेश:-1011 किमी

✔️तामिळनाडू:-907 किमी

✔️महाराष्ट्र:-720 किमी

✔️केरळ:-560 किमी

✔️ओरिसा:-457 किमी

✔️प.बंगाल:-374 किमी

✔️कर्नाटक:-258 किमी

✔️गोवा:-113 किमी

❇️केंद्रशासित प्रदेश:-

▪️अंदमान निकोबार:-1285 किमी

▪️लक्षद्वीप:-132 किमी

✍मुख्यभूमी किनारा:-6100

✍एकूण किनारा:-7517

✍एकूण 9 राज्य व 2 केंद्रशासित प्रदेश यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे.

✍एकूण 73 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे.

मराठी :- सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी

दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो याला सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी असे म्हणतात.

सजातीय स्वरसंधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ +अ = आ    

१. सूर्य + अस्त = सूर्यास्त

२. कट + अक्ष = कटाक्ष

३. रूप + अंतर = रुपांतर

४. मिष्ट + अन्न = मिष्टान्न

५. स + अभिनय = साभिनय

६. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय

७. सह + अध्यायी = सहाध्यायी

८. पुरुष + अर्थ = पुरुषार्थ

९. सह + अनुभूती = सहानुभूती

१०. मंद + अंध = मंदांध

११. स्वभाव + अनुसार = स्वभावानुसार

🟤 अ + आ = आ 🟤

१. देव + आलय = देवालय

२. हिम + आलय = हिमालय

३. फल + आहार = फलाहार

४. अनाथ + आश्रम = अनाथाश्रम

५. गोल + आकार = गोलाकार

६. मंत्र + आलय = मंत्रालय

७. शिशिर + आगमन = शिशिरागमन

८. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय

९. धन + आदेश = धनादेश

१०. जन + आदेश = जनादेश

११. दुख: + आर्त = दुखार्त

१२. नील + आकाश = नीलाकाश

१३. कार्य + आरंभ = कार्यारंभ

🟤 आ +आ = आ 🟤

१. महिला + आश्रम = महिलाश्रम 

२. राजा + आश्रय = राजाश्रय

३. कला + आनंद = कलानंद

४. विद्या + आलय = विद्यालय

५. राजा + आज्ञा = राजाज्ञा

६. चिंता + आतुर = चिंतातुर

🟤 इ+ इ = ई 🟤

१. मुनी + इच्छा = मुनीच्छा

२. कवि + इच्छा = कवीच्छा

🟤 इ+ इ = ई 🟤

१. मुनी + इच्छा = मुनीच्छा

२. कवि + इच्छा = कवीच्छा

३. अभि + इष्ट = अभीष्ट

🟤 इ+ ई = ई 🟤

१. गिरि + ईश = गिरीश

२. कवि + ईश्वर = कवीश्वर

३. परि + ईक्षा = परीक्षा

🟤 ई+ इ = ई 🟤

१. गोमती + इच्छा = गोमतीच्छा

२. रवी + इंद्र = रवींद्र

३. मही+  इंद्र = महिंद्र

🟤 ई+ ई = ई 🟤

१. मही + ईश = महीश

२. पार्वती + ईश = पार्वती

🟤 उ +उ = ऊ 🟤

१. गुरु + उपदेश = गुरुपदेश

२. भानु + उदय = भानुदय

🟤 ऊ +उ = ऊ 🟤

१. भू + उद्धार = भूद्धार

२. वधू + उत्कर्ष = वधूत्कर्ष

३. लघू + उत्तरी = लघूत्तरी

ऋ+ ऋ = ऋ

१. मातृ + ऋण = मातृण

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पुढे दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा.

   1) रांगणारे मूल    2) पिकलेला आंबा    3) पेणचे गणपती    4) वरचा मजला

उत्तर :- 3

2) पुढीलपैकी ‘ला’ आख्यात ओळखा.
   1) बसला    2) बसू      3) बसतो      4) बसावा

उत्तर :- 1

3) ‘तुला जसे वाटेल तसे वाग’ – या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीतीदर्शक ................. आहे.
   1) क्रियाविशेषण वाक्य      2) विशेषण वाक्य
   3) प्रधानवाक्य        4) नामवाक्य

उत्तर :- 1

4) पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.

   अ) शब्दयोगी अव्यये नामांना जोडू नयेत नाही.   
   ब) शब्दयोगी अव्यये विकारी शब्द आहेत.

   1) अ बरोबर    2) ब बरोबर    3) अ आणि ब बरोबर  4) अ आणि ब चूक

उत्तर :- 4

5) गुरुजी म्हणाले, की ‘प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे’ या वाक्यातील गौणवाक्य कोणते ?

   1) गुरुजी म्हणाले      2) प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे
   3) प्रत्येकाने नियमितपणे      4) नियमितपणे शाळेत यावे

उत्तर :- 2

6) अयोग्य जोडी निवडा.

   अ) विरोधीदर्शक    -  उंहू
   ब) शोकदर्शक    -  अगाई
   क) मौनदर्शक    -  गुपचित

   1) अ      2) ब      3) क      4) यापैकी नाही

उत्तर :- 4

7) ‘मी पुस्तक वाचत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) रीती भूतकाळ  2) रीती वर्तमानकाळ  3) पूर्ण वर्तमानकाळ  4) साधा वर्तमानकाळ

उत्तर :- 1

8) ‘कवी’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.

   1) कविता    2) कवयित्री    3) कवित्री    4) कवियित्री

उत्तर :- 2

9) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वचन हे एकवचनासारखेच राहते.

   अ) कागद    ब) आज्ञा     क) उंदीर      ड) विद्या

   1) ब, क, ड    2) अ, ब, क, ड    3) अ, क, ड    4) अ, ब, ड

उत्तर :- 2

10) ‘मुलांना’ या शब्दाचे सामान्यरूप काय होईल ?

   1) मुला    2) मुलां      3) मुलींना    4) मुलाला

उत्तर :- 2

स्पर्धात्मक चालू घडामोडी



१) "ईमान्यूअल मक्रोन" यांची कोणत्या देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे?

✅️ - फ्रांस


२) "वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडीचर रिपोर्ट २०२१ नुसार भारत सैन्य खर्चामध्ये कितव्या क्रमांकावर आहे?

✅️- ३


३) २४ वे "उन्हाळी बधीर ऑलम्पिक" कोणत्या देशात आयोजित होणार आहे?

✅️ - ब्राझील


४) चर्चेत असलेले "उर्जा प्रवाह" जहाज भारताच्या कोणत्या दलाचे आहे?

✅️INDIAN COAST GUARD


५) संरक्षण मंत्रालयाने कोठे "डेफ कनेक्ट २.०" चे अयोजन केले आहे?

✅️- दिल्ली


६) कोणत्या राज्य सरकारने "स्पेसटेक फ्रेमवर्क कार्यक्रम सुरु केला आहे?

✅️ तलंगना


७) कोणत्या देशाने "ट्रायलटरल कोर्पोरेशन फंड" सुरु केले आहे?

✅️- भारत


८) सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने किती युटूब चनेल वर "सुरक्षेच्या कारणाने" बंदीघातली आहे?

✅️ १६


९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे देशातील पहिले "सामुदायिकरेडीओ स्टेशन" "दुध वाणी" चेउद्घाटन केले आहे?

✅️- गुजरात


१०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितव्या "रायसीनाडायलोग" चे उद्घाटन केले आहे?

✅️- ७ व्या


१) पहिला “लता मंगेशकर पुरस्कार" कोणाला घोषित झाला आहे?

- नरेंद्र मोदी


२) "नॉट जस्ट ए नाईट वाचमन माय इनिंग्स विथ बीसीसीआय" पुस्तक कोणाचे आहे?

- विनोद राय


३) अलीकडेच कोणत्या दक्षिण आशियाई देशाने स्वतःला “डीफालटर" घोषित केले आहे?

- श्रीलंका


४) नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यां “१०६४ भष्टाचार विरोधी app" सुरु केले आहे ?

- उतराखंड


५) अलीकडेच कोणत्या राज्याच्या "कांगडी चाय" ला GI tag भेटला आहे ?

- हिमाचल प्रदेश


६) भारत आणि कोणत्या देशात “२ + २ डायलोग" आयोजित केला आहे?

- अमेरिका


७) सध्या चर्चेत असलेले "उमिया माता मंदिर" कोणत्या राज्यात आहे?

- गुजरात


८) दरवर्षी "मानवी अंतराळ उड्डाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस " केव्हा साजरा करण्यात येतो?

- १२ एप्रिल

१३ जून २०२२

अंकगणित प्रश्नमंजुषा

Cricket से जुड़े महत्पूर्ण प्रश्नोत्तर



Q.1. ‘क्रिकेट खेल का जन्मदाता’ किस देश को कहा जाता है?

Ans. इंग्लैंड को


Q.2. क्रिकेट में प्रयुक्त गेंद का वजन कितना होता है?

Ans. 155 ग्राम 168 ग्राम


Q.3. क्रिकेट के गेंद की परिधि कितनी होती है?

Ans. 20.79 सेमी से 22.8 सेमी.


Q.4. क्रिकेट में बल्ले की अधिकतम अनुमत लम्बाई कितनी होती है?

Ans. 38 इंच


Q.5. क्रिकेट में भूमि से स्टम्प की ऊँचाई कितनी होती है?

Ans. 28 इंच


Q.6. क्रिकेट पिच की लम्बाई कितनी होती है?

Ans. 20.12 मीटर


Q.7. वर्षा अथवा कम रोशनी के कारण बाधित क्रिकेट मैच में हार-जीत का निर्णय किस नियम के आधार पर होता है?

Ans. डकवर्थ लुइस नियम के आधार पर


Q.8. भारत द्वितीय बार एकदिवसीय क्रिकेट विश्व कप विजेता किस वर्ष बना?

Ans. 2011 ई. में


Q.9. क्रिकेट खेल का प्रसिद्ध आयोजन स्थल ‘शारजाह’ किस देश में है?

Ans. संयुक्त अरब अमीरात में


Q.10. ‘बीमर’ (Beamer) शब्द का प्रयोग किस खेल में होता है?

Ans. क्रिकेट में


Q.11. ‘सिली प्वाइंट’ शब्द किस खेल में प्रयुक्त होता है?

Ans. क्रिकेट में


Q.12. ‘टू कलर्स’ किसकी आत्कथा है?

Ans. एडम गिलक्रिस्ट


Q.13. ‘शेन वार्न्स सेंचुरी-माई टॉप 100 टेस्ट क्रिकेटर्स’ किसकी लिखी पुस्तक है?

Ans. शेन वार्न


Q.14. डोनाल्ड ब्रैडमेन किस खेल के महान् खिलाड़ी थे?

Ans. क्रिकेट के


Q.15. रोनाल्ड पैरी की किस पुस्तक में ब्रैडमैन की ‘ड्रीम टीम’ का विवरण दिया गया है?

Ans. ब्रैडमैन बेस्ट में


Q.16. मिताली राज किस खेल की प्रसिद्ध खिलाड़ी हैं?

Ans. क्रिकेट की


Q.17. क्रिकेटर मैथ्यू हेडन किस देश की खिलाड़ी हैं?

Ans. आस्ट्रेलिया के


Q.18. क्रिकेट से संबंधित ‘प्रेमदासा स्टेडियम’ कहाँ स्थित है?

Ans. कोलम्बो (श्रीलंका) में


Q.19. ईरानी ट्रॉफी का संबंध किस खेल से है?

Ans. क्रिकेट से


Q.20. ‘प्रूडेंशियल कप’ किस खेल से संबंधित है?

Ans. क्रिकेट से 


Q.21. ‘बेन्सन एण्ड हेजेज ट्रॉफी’ किस खेल से संबंधित है?

Ans. क्रिकेट


Q.22. क्रिकेट की सर्वोच्च संस्था इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल (आईसीसी) का मुख्यालय कहाँ स्थित है?

Ans. दुबई में


Q.23. पॉली उमरीगर किस खेल के प्रसिद्ध खिलाड़ी थे?

Ans. क्रिकेट के


Q.24. क्रिकेट की किस टेस्ट श्रृंखला से एशेज कप संबंधित है?

Ans. आस्ट्रेलिया-इंग्लैंड टेस्ट श्रृंखला


Q.25. एकदिवसीय अन्तर्राष्ट्रीय क्रिकेट में दोहरा शतक बनाने वाला प्रथम क्रिकेटर कौन हैं?

Ans. सचिन तेंदुलकर


Q.26. विजय हजारे ट्राफी का संबंध किस खेल से है?

Ans. क्रिकेट से


Q.27. कोलिन काउड्रे किस देश के प्रसिद्ध क्रिकेट खिलाड़ी थे?

Ans. इंग्लैड


Q.28. भारत के प्रथम टेस्ट क्रिकेट कप्तान कौन थे?

Ans. सी. के. नायडू


Q.29. भारत की पहली महिला अम्पायर कौन थी?

Ans. अंजलि राय


Q.30. भारतीय क्रिकेट के प्रथम टेस्ट सेन्चुरियन कौन थे?

Ans. लाला अमरनाथ


Q.31. किस प्रथम भारतीय खिलाड़ी ने टेस्ट क्रिकेट में तिहरा शतक बनाया?

Ans. वीरेन्द्र सहवाग ने


Q.32. ‘ग्रेट डिलेयर’ उपनाम से कौन क्रिकेट अम्पायर चर्चित है?

Ans. डिकी बर्ड


Q.33. सौरव गांगुली : द महाराजा ऑफ क्रिकेट’ के लेखक कौन है?

Ans. देवाशीष दत्ता


Q.34. टेस्ट क्रिकेट में अब तक किसी भी विकेट के लिए सर्वाधिक रनों (576) की साझेदारी किस-किस के बीच हुई है?

Ans. सनत जयसूर्या तथा रोशन महानामा के मध्य (श्रीलंका)


Q.35. वानखेड़े स्टेडियम (मुंबई) किस खेल का प्रसिद्ध मैदान है?

Ans. क्रिकेट


Q.36. क्रिकेट के आधुनिक संस्करण ‘सुपरमैक्स क्रिकेट’ में दोनों टीमों की 10 ओवर की एक-एक पारी के लिए कितना समय निर्धारित है?

Ans. 45 मिनट


Q.37. रिचर्ड हेडली किस देश के प्रसिद्ध क्रिकेट खिलाड़ी थे?

Ans. न्यूजीलैंड


Q.38. किस पत्रिका को ‘क्रिकेट का बाइबिल’ कहा जाता है?

Ans. विजडन


Q.39. कौन-सा पुरस्कार ‘क्रिकेट का ऑस्कर’ कहलाता है?

Ans. आई.सी.सी. पुरस्कार


Q.40. भारत विश्व कप क्रिकेट का चैंपियन प्रथम बार किस वर्ष बना?

Ans. 1983 ई. में


प्रमुख संस्था आणि त्यांचे मुख्यालय

1). GATT चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर - जिनिव्हा (1947)


२). G-8 देशांची स्थापना कधी झाली?

उत्तर - 1975


३). UNCTAD चे मख्यालय कोठे आहे?

उत्तर - जिनिव्हा (1964)


4). आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर - वॉशिंग्टन (1945)


५). फूड अँड क्रिएशन ऑर्गनायझेशन (FAO) कुठे आहे?

उत्तर - रोम (1945)


६). जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय कोठे आहे?

उत्तर - जिनिव्हा 1948


७) रेडक्रॉसचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर - जिनिव्हा (1863)


8). जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर - वॉशिंग्टन (1945)


9). G-15 देशांचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर - जिनिव्हा (1989)


10). जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे?

उत्तर - जिनिव्हा (1995)


11). नाटो देशांची मुख्यालये कोठे आहेत?

उत्तर - ब्रुसेल्स (1949)


१२). सार्क देशांचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर - काठमांडू (1985)


13). आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?

उत्तर - मनिला (1966)


14). आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?

उत्तर - द हेग (1946)


१५). इंटरपोल कुठे आहे?


उत्तर - पॅरिस (1923)


महाराष्ट्रातील डोंगर रांगा

📚 सपर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर आणि त्यांचा जिल्हा यांविषयी माहिती घेऊयात.


👉 डोंगराचे नाव : जिल्हा


▪️ सातमाळा : नाशिक

▪️ वणी : नाशिक

▪️ निर्मल : नांदेड

▪️ चिकोडी : कोल्हापूर

▪️ पन्हाळा : कोल्हापूर

▪️ चांदूरगड : चंद्रपूर

▪️ मांधरादेव : सातारा

▪️ महादेव : सातारा

▪️ मालिकार्जुन : सांगली

▪️ अजिंठा: औरंगाबाद

▪️ कळसूबाई : अहमदनगर

▪️ भामरागड : गडचिरोली

▪️ गाविलगड : बुलढाणा, अकोला

▪️ बालाघाट : बीड

▪️ तोरणमाळ : नंदुरबार

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


💐 ' सायकल ' चा शोध कोणी लावला ?

🎈मकमिलन.


💐 ' क्ष - किरण ' ट्यूब कोणी शोधून काढली ?

🎈रटिनजन.


💐 हरदयाची स्पंदने मोजण्यासाठी वापरत असलेल्या ' स्टेथोस्कोप ' चा शोध कोणी लावला ?

🎈लायनेक.


💐 शन्याचा शोध कोणत्या देशात लागला ?

🎈भारत.


💐 बोनसायची मूळ कल्पना कोणत्या देशातील आहे ?

🎈चीन.


💐 जगात न्यूट्राॅन बाॅम्ब सर्वप्रथम कोणत्या देशाने बनविला ?

🎈अमेरिका.


💐 हायड्रोजन बाॅम्बचा जनक कोण ?

🎈एडवर्ड टेलर.


💐 अणुबाॅम्बचा शोध कोणी लावला ?

🎈ऑटो हाॅन.


💐 अघासाठी लिपी कोणी शोधून काढली ?

🎈लईस ब्रेल.


💐 परकाशाचा वेग प्रथम कोणी मोजला ?

🎈रोमर.


💐 पहिल्या टेस्टट्यूब बेबीचे नाव काय ?

🎈इदिरा.


💐 ' डाॅली ' हे कशाचे नाव आहे ?

🎈शळीचे क्लोन.


💐 जिभेच्या पाठीमागील भागात कोणती चव समजते ?

🎈कडू.


💐 मानवी शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी कोणती ?

🎈यकृत.


💐 वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत लहान होत जाणारी ग्रंथी कोणती ?

🎈कठस्थ ग्रंथी.


💐 सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव काय होते ?

🎈पाटलीपुत्र.


💐 जागतिक कामगार दिन केव्हा असतो ?

🎈१ मे.


💐 जगातील सर्वांत मोठा महासागर कोणता ?

🎈पसिफिक महासागर.


💐 खान अब्दुल गफारखान यांनी कोणती संघटना स्थापन केली ?

🎈खदा-ई-खिदमदगार.


💐 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला ?

🎈रायगड.


💐 'जल्लीकडू महोत्सव' कुठे साजरा केला जातो ?

🎈तामिळनाडू.


💐 रडिओचा शोध कोणी लावला ?

🎈जी. मार्कोनी.


💐 'वाघा बाॅर्डर' कोणत्या राज्यात आहे ?

🎈पजाब.


💐 शतीला पूरक ठरणारा महत्त्वाचा व्यवसाय कोणता ?

🎈दग्ध व्यवसाय.


💐 अतराळ संशोधन करणारी अमेरिकेची संस्था कोणती ?

🎈नासा.


महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न

 प्र. 1. अलीकडेच पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला जाईल?

 उत्तर –  PM नरेंद्र मोदी


 

 प्रश्न 2. जागतिक आवाज दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला?

 उत्तर – १६ एप्रिल २०२२


 

 प्र. 3. पोयला बैशाख हा नवीन वर्षाचा सण अलीकडे कोठे साजरा करण्यात आला?

 उत्तर – बांगलादेश


 

 प्र. 4. अलीकडेच कोणत्या राज्याने 71 वी वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा जिंकली आहे?

 उत्तर -  तमिळनाडू


 

 प्रश्न 5. हुनर   हाटची 40 वी आवृत्ती अलीकडे कोठे सुरू झाली आहे?

 उत्तर – मुंबई


 

 प्रश्न 6. अलीकडेच प्रभात पटनायक यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

 उत्तर –  माल्कम आदिसेशिया पुरस्कार २०२२


 प्र. 7. अलीकडेच जेथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हनुमानजींच्या 108 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले आहे.

 उत्तर –गुजरात


 

 प्र. 8. अलीकडेच चर्चेत असलेली नेपच्यून क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाशी संबंधित आहे?

 उत्तर – युक्रेन


 

 प्र. 9. अलीकडे कोणत्या देशाने आयर्न बीम लेझर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे?

 उत्तर – इस्राईल


 

 प्र. 10. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 14 एप्रिल हा समता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे?

 उत्तर -   तमिळनाडू


 

 प्र. ११. अलीकडेच कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या लेफ्टनंट गव्हर्नरने बीच फेस्टिव्हल २०२२ चे उद्घाटन केले?

 उत्तर –  पाँडिचेरी

 

 

 प्रश्न 12. अलीकडेच कोणत्या देशांपैकी तीन अवकाशयत्री अवकाशातून म्हणजेच अवकाशातून १८३ दिवसांनी परतले आहेत?

 उत्तर – चीन 


 

 प्र. 13. अलीकडेच इंडिया एज्युकेशन समिट 2022 चे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे?

 उत्तर – धर्मेंद्र प्रधान


सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे

121) मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?

उत्तर : 52


122) मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस  असते?

उत्तर : 37° सेल्सियस


123) कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?

उत्तर : यकृत


124) मानवी शरीरात जंत कोठे आढळतात?

उत्तर : लहान आतड्यात


125) रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?

उत्तर : चार वेळा


126) पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?

उत्तर : मज्जासंस्था


127) चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता?

उत्तर : एडिस इजिप्ती


128) महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?

उत्तर : 1438 मी.


129) महाराष्ट्रात ‘कऱ्हांडला वाघ अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : नागपूर


130) भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?

उत्तर : बोधगया

गोष्ट युक्रेनच्या निर्मितीची…

✳️ १८१७ साली रशियाचे तत्कालीन नेतृत्व लेनिन यांनी सर्वहारा क्रांती करून राजेशाही व्यवस्था संपुष्टात आणली. त्यांनी रशियात कम्युनिस्ट शासन (साम्यवादी) व्यवस्था स्थापन केली. साधारणत: दोन वर्षानंतर बरेच छाेटे-मोठे देश संयुक्त सोव्हिएत संघात (युएसएसआर)  सहभागी झाले. यामध्ये युक्रेनही होता. १९९१ मध्ये संयुक्त सोव्हिएत संघाचे १५ देशांत विभाजन झाले आणि त्याचे नाव ‘रशिया’ झाले. या १५ देशांमध्ये युक्रेनदेखील होता.


🔆 यक्रेनच्या खास गोष्टी कोणत्या?


१) ‘ब्रेड बास्केट ऑफ युरोप’ किंवा ‘युरोपातील धान्याचे कोठार’ या नावाने युक्रेन जगात ओळखला जातो.


२) साधारणत: सहा लाख चौ. कि. मी क्षेत्रफळ असलेला युक्रेन हा युरोपमधील दुसरा मोठा (रशिया हा जगातील आणि युरोपमधीलही सर्वात मोठा देश आहे) देश आहे. तर जगातील ४६ वा मोठा देश आहे.


3) युक्रेनला जवळपास  २, ७८२ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून ‘द्रीपर’ नावाची नदी तिथे प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते.

४) चार कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या देशात १०० महिलांमागे ८६.३ टक्के  पुरूष आहेत. तर ३० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते.


५) युक्रेनची राजधानी कीव असून हे शहर तेथील सर्वात मोठे शहर आहे.


६) युक्रेनियन ही भाषा अधिकृत आहे. तर युक्रेनमध्ये पोलिश, यिडीश, रशियन हंगेरियाई या भाषाही बोलल्या जातात.

७) युक्रेनच्या भौगालिक सीमा पाहता, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया आणि हंगेरी, पूर्व आणि वायव्येस रशिया, उत्तरेस बेलारूस, नैर्ऋत्येस रोमानिया या देशांच्या सीमा आहेत.

८) युक्रेनचे अधिकृत चलन युक्रेनियन रिउनिया (Ukrainian Hryvnia) हे आहे.

९) २४ ऑगस्ट १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर युक्रेन स्वतंत्र झाला.


१०) युक्रेनचा ध्वज निळा आणि पिवळा या दोन रंगांचा आहे.

११) आपण सर्वाधिक साक्षर देश पाहिले तर लक्षात येईल की, युक्रेन हा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. साक्षरता दर  ९९.८ टक्के असा आहे.

१२) शेतीच्या बाबतीत विचार केला तर, युक्रेन हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे.

१३) जगातील सर्वात सुंदर मुलींचा देश म्हणूनही युक्रेनची ओळख आहे.


१४) हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जगातील सर्वात मोठे जहाज युक्रेनची राजधानी कीव येथे तयार केले होते. याचं नाव ‘The Antonov An-225 Mriya’ होतं आणि वजन ६, ४०, ००० किलोग्रॅम होते.

१५) युक्रेनमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ख्रिश्चन समुदायाची पाहायला मिळते.

१६) सध्याचे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेन्सकी (Volodymyr Zelenskyy ) हे आहेत.

महत्त्वाचे मुद्दे

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.


➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.


➡️ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,

दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.


 ➡️ कषेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.


 ➡️ इदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.


➡️ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.


➡️ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.


➡️ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.


➡️ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.



➡️ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ⬅️


   🌺 टरिक्स - मित्र माझा राघू छाप 


        मि - मिझोराम

        त्र - त्रिपुरा

        म - मध्य प्रदेश

        झा - झारखंड

        रा - राजस्थान

        गु - गुजरात

        छा - छत्तीसगड

        प - पश्चिम बंगाल

हे नक्की वाचा :- परीक्षेसाठी महत्वाचे



◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक


◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच


◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक


◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच


◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच


◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती


◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी


◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO


◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष


◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी


◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 


◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी


◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त


◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर


◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त


वाचा महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

🅾️ भारताचे एकूण क्षेत्रफळ  किती ?

👉 32,87,263 चौ.कि.मी.


🅾️ भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) किती ?

👉 3,214 कि.मी.


🅾️ भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) किती ?

👉 2,933 कि.मी.


🅾️ भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण किती टक्के ?

👉 23%


🅾️ भारताच्या भू-सीमेची एकूण लांबी ?

👉  15,200 कि.मी.


🅾️ भारताला स्पर्श करणारे एकूण देश किती ?

👉 सात


🅾️ भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

👉 121,01,93,422


🅾️ भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

👉 62,37,24,248


🅾️ भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

👉 58,64,69,174


🅾️ भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार किती टक्के ?

👉 74.04%


🅾️ परुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार किती टक्के ?

👉 82.14%


🅾️ महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार किती टक्के ?

👉 64.46%


🅾️ भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

👉 382 प्रति चौ.किमी.


🅾️ भारतास एकूण किती Km लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?

👉 7,517 कि.मी.


🅾️ भारतात एकूण घटक राज्ये आहेत ?

👉 28



१२ जून २०२२

UPSC च्या तयारीसाठी ३०० विद्यार्थांना प्रशिक्षण

'बार्टी'मार्फत विशेष चाचणी परीक्षा घेऊन 'यूपीएससी' परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे. दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेस 'बार्टी'द्वारे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क देण्यात येते; तसेच विद्यार्थ्यांना उपस्थितीनुसार विद्यावेतन दरमहा दोन हजार रुपये दिले जाते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (BARTI) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) पूर्वतयारीसाठी दिल्लीत अनुसूचित जातीतील २०० विद्यार्थ्यांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येते. यंदा विद्यार्थी संख्येत १०० ने वाढ करण्यात आली असून, आता २०२२-२३ या वर्षापासून ३०० विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

'बार्टी'मार्फत विशेष चाचणी परीक्षा घेऊन 'यूपीएससी' परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे. दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेस 'बार्टी'द्वारे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क देण्यात येते; तसेच विद्यार्थ्यांना उपस्थितीनुसार विद्यावेतन दरमहा दोन हजार रुपये दिले जाते. याशिवाय पहिल्या महिन्यातील आर्थिक साह्य तीन हजार रुपये आणि सुरुवातीच्या दिल्ली येथील प्रवासाकरिता पाच हजार रुपये व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी पाच हजार रुपये प्रवास भत्ता विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

गेल्या दोन वर्षांत टाळेबंदीच्या काळातही उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाइन प्रशिक्षण पद्धतीला आत्मसात करून 'बार्टी'मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित केले होते. 'बार्टी'चे २०२०मध्ये नऊ; तर २०२१मध्ये सात उमेदवार 'यूपीएससी' परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण झाले आहेत. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी https://barti.in या वेबसाइटलाला भेट देण्याचे आवाहन 'बार्टी'चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...