११ जून २०२२

भारतीय राज्यघटना: (कलम ३६-५१)राज्याचे मार्गदर्शक तत्वे , राज्याचे मार्गदर्शक तत्वे (कलम 36 ते 51 ) भाग 4 : – राज्याचे मार्गदर्शक तत्वे (कलम 36 ते 51 )आणि गांधी तत्वे

भारतीय राज्यघटना:  (कलम ३६-५१):

राज्याचे मार्गदर्शक तत्वे

1 भाग 4 : – राज्याचे मार्गदर्शक तत्वे  (कलम 36 ते 51 )

भाग 4 : – राज्याचे मार्गदर्शक तत्वे  (कलम 36 ते 51 )

आणि गांधी तत्वे

राज्याचे मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडकडून घेतले. राज्याने कसे वागावे हे यामध्ये सांगितलेले आहे. आयर्लंडने हे स्पेन कडून घेतले आहे.

मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येत नाही.

मार्गदर्शक तत्वे आयर्लंड या देशाकडून घेण्यात आलेले आहे व हे भारतीय संविधानाच्या भाग ४ मध्ये कलम 36 ते 51 मध्ये देण्यात आलेले आहे.

हे तत्व सामाजिक न्याय घटनेशी निगडित आहे व कार्यपालिकेत कार्य करण्यासाठी हे तत्व मार्गदर्शन देतात.

कलम 36 :-

यात राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे व ही तीच व्याख्या आहे जी कलम 12 मध्ये देण्यात आलेली आहे.
यामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती चा उल्लेख केला आहे. आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे, प्रास्ताविकेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुतेचे आदर्श साध्य करणे.

कलम 37:- मार्गदर्शक तत्वांना न्यायालयीन कक्षाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. जर मार्गदर्शक तत्व मिळाले नाही तर तुम्ही कोर्टमधे जाऊ शकत नाही.

कलम 38: – कल्याणकारी राज्याची व्याख्या

ज्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय दिला जाईल व यात वाढ करण्याचे प्रयत्न केले जातील.

कलम 39 -1 :- राज्य (सरकार) सर्व व्यक्तींना जीवनउपयोगी किंवा जीवनाकरिता सर्व साधन उपलब्ध करून देईल.

कलम 39 -2: – राज्य समान कार्यासाठी समान वेतन देईल.

कलम 39 -3:- राज्य आर्थिक शोषणाच्या विरुद्ध अधिकार करून देईल.

कलम 39 -4:- यानुसार पालक अल्पवयीन व्यक्ती यांचे शोषणाचे संरक्षण करेल. व त्यांना स्वतंत्र आयुष्य जगण्याचे संधी उपलब्ध करून देईल. तसेच आरोग्य सुविधाकरिता कार्य योजना लागू करेल. (पोलिओ, अंगणवाडी)

कलम 39 -5:- समान न्याय व निःशुल्क न्यायव्यवस्था

कलम 39 -6:- यानुसार आर्थिक व्यवस्था राज्य निर्माण करेल म्हणजे खूप गरीब आणि खूप श्रीमंत होणार नाही म्हणजे समाजवादी न्यायव्यवस्था निर्माण करायची आहे.

कलम 40:- गांधीवादी तत्व (73वी घ. दु. 1992)

राज्य पंचायत राज निर्माण करण्याचे प्रयन्त करेल. पहिली ग्रामपंचायत 2 Oct 1959 रोजी नागौर जिल्हा राजस्थान मध्ये स्थापन करण्यात आली.

कलम 41:- शिक्षण रोजगार (कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ठ बाबींचा सार्वजनिक सहाय्याचा अधिकार )

राज्य हे आपले आर्थिक क्षमतेच्या मर्यादित राहून कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारी, आजार व विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक साहाय्य हक्क उपलब्ध करून देणार.

बरेचश्या राज्यात या अंतर्गतच बेरोजगारी भत्ता, निराधार योजना, जीवनदायी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना इत्यादी लागू केले आहे.

कलम 42:- Maternity Leave

कामाची परिस्थिती आणि मातृत्व साहाय्य याबाबतीत न्याय्य आणि सहृदयी व्यवस्था.
राज्य महिलांच्या प्रसूतीच्या वेळी विविध आरोग्य सुविधा निर्माण करून देईल.

उदा:- जसे की आर्थिक साहाय्य्य, वैद्यकीय साहाय्य्य

कलम 43:- कामगारांना निर्वाह वेतन

राज्य सर्व कामगारांना योग्य रीतीने निर्वाह वेतन देण्याची परिस्थिती निर्माण करेल.

कलम 43A:- 42 वी घ. दु. 1976 अनुसार संविधानात टाकण्यात आली. उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग

कलम 43B:- राज्य सहकारी सोसायटींकरिता प्रोत्साहन देण्यास प्रयन्तशील असेल. 97 वी घ. दु. 2011 अनुसार यांचा समावेश करण्यात आला.

कलम 44:- आचारसंहिता (Uniform Civil Code) लागू करण्याचा प्रयत्न राज्यांनी नेहमी करावा. नागरिकांना एकरूप नागरी संहिता. वैयक्तिक कायदे एकत्र करून सर्व नागरिकांना समान वागणूक प्रस्थापित करणे. संपूर्ण भारतीय राज्यक्षेत्रात सर्व नागरिकांना एकरूप नागरी संहिता प्राप्त करून देण्यासाठी राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.

कलम 45:- 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व त्यांच्या शिक्षणाची तरतूद.
राज्य ६ वर्षाखालील बालकांचे संगोपन व त्यांच्या शिक्षणाची तरतूद करेल.

पूर्वीच्या कलम ४५ ची तरतूद खालीलप्रमाणे होती.
राज्यसंस्था घटनेचा अंमल सुरु झाल्यापासून १० वर्षाच्या आत १४ वर्षाखालील बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी प्रयन्तशील राहील. हे एकच असे कलम आहे ज्याला कालमर्यादा दिली होती.

कलम 46:- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन सरकार करेल.
राज्यसंस्था दुर्बल घटकांचे विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे विशेष काळजीपूर्वक हितसंवर्धन करेल.
राज्यसंस्था त्यांचे सामाजिक अन्याय व इतर सर्व प्रकारच्या शोषणापासून संरंक्षण करेल.

कलम 47:- पोषणमान व राहणीमान उंचावणे, दारूबंदी आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्त्यव्य असेल.
नागरिकांचे पोषणमान, राहणीमान तसेच सार्वजनिक आरोग्य सुधारणे. ह्या गोष्टी राज्यसंस्थेच्या प्राथमिक कर्तव्यांपैकी एक असल्याचे मानले जाईल.
विशेषतः मादक पेय तसेच आरोग्यास घातक असलेले अंमली पेये यांच्यावर बंदी आणण्यासाठी राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.

अपवाद : औषधी तयार करण्यास वापरली जाणारी पेये.

कलम 48:- कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन (गौहत्या)

याअंतर्गतच गाई व वासरे व इतर जनावरे यांच्या जातीचे जतन व सुधारणा करने व त्यांच्या कत्तलला मनाई करणे याकरिता उपाययोजना करेल.

कलम 48 (A) :- राज्य पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यांचा विकास त्याचबरोबर वने, नैसर्गिक संसाधने जशे नद्या, तलाव, समुद्र व त्यामधील असणारे जीव यांचे संरक्षण करेल व त्यांच्या वाढीसाठी योग्य प्रणाल्या विकसित करेल.

टीप :- ही कलम 42 वी घ. दु. 1976 मध्ये संविधानात टाकण्यात आली.

कलम 49:- राष्ट्रीय महत्वाचे संस्थाने, वास्तू, स्मारक यांचे संरंक्षण राज्य करेल. संसदीय कायद्याअंतर्गत राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे म्हणून घोषित केले कलात्मक व ऐतिहासिक महत्वाची असणारे स्मारके, ठिकाणे व वस्तूंची लूट, विद्रुपीकरण, नाश, स्थानांतरण, विल्हेवाट आणि निर्यातीपासून संरक्षण करण्याची राज्यसंस्थेची जबाबदारी असेल .

कलम 50:- राज्य न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचे पृथ्थकरण करेल.
लोकसेवामध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवण्याकरिता राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.
मात्र सध्या राज्यसंस्थेअंतर्गत कार्यकारी दंडाधिकारी, कलेक्टर, प्रांत तहसीलदार, यांचा समावेश होतो.

कलम 51:- राज्य आंतरराष्ट्रीय शांतता आणि संरक्षण करण्याचा प्रयन्त करेल.

राज्यसंस्था खालील बाबींसाठी प्रोत्साहन देईल.
अ. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन
ब. राष्ट्रराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखणे
क. एकमेकांमध्ये व्यवहार करतांना आंतरराष्ट्रीय कायदा व तहांचा आदर करणे. (आंतर राष्ट्रीय दायित्व ) (Trade Related Intellectual Proper Rights)
ड. आंतरराष्ट्रीय तंटे लवादाच्या माध्यमातून सोडवणे.

नेत्ररोग (Eye Disease):-


१) रंग आंधळेपणा (Colour Blindness):
◆ अनुवांशिक व बरा न होणारा रोग सर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही.
◆ विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही .
◆ फक्त पुरुषांनाच होतो.
========================

२) मोतीबिंदू (Cataract):
◆ डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते.
उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते.
◆ मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो.
========================

३) काचबिंदू (Glaucoma):
◆ हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.
◆ नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू असे म्हणतात.
◆ काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते.
◆ डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.
========================

४) शुष्कता (Xerophtalmia/xerosis):
◆ व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो. डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.
========================

५) डोळे येणे (Conjuctivitis):
◆ विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग. डोळे लाल होऊन खूप दुखू लागतात व चिकट पाणी येते.
========================

६) खुपरी (Trachoma):
◆ संसर्गजन्य रोग, घाणेरडया वस्तीत, दूषित हवेत, दूर व धुळीत राहणाऱ्यांना होतो.
◆ प्रथम पापण्यांचा आतील भाग खरखरीत होतो व नंतर त्यावर साबुदाणाच्या आकाराचे उंचवटे येतात.डोळ्याच्या उघटझापीमुळे ते बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.

७) रांजणवाडी (Meibomian Cyst):
◆ पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मस्रावक ग्रंथींमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो.
◆ या ग्रंथी धूलिकण, केसातील कोंडा इत्यादी कारणांमुळे बंद झाल्यास द्रव बाहेर न पडल्याने सुजतात. त्यालाच रांजणवाडी असे म्हणतात.
◆ मानवी डोळ्यातील दृष्टिपटल अनेक प्रकाश -संवेदी (Lightsensitive) पेशींनी बनलेले असते. या पेशी दोन प्रकार / आकाराच्या असतात. (दंडाकार व शंकाकार.)
◆ प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची/ अंधुकतेची माहिती पुरवितात.
◆ दंडाकार पेशी अंधुक प्रकाशाससुद्धा प्रतिसाद देतात परंतु शंकाकार पेशींना अंधुक संवेदना नसतात. या पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात. यामुळे रंगाची संवेदना किंवा जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होते.
◆ कान हे ऐकण्याचे इंद्रिय आहे. मात्र, त्याबरोबरच शरीराचा तोल सांभाळण्याचे महत्वाचे कार्य कानामार्फत केले जाते.
◆ त्वचा हे स्पर्शाचे इंद्रिय असून शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे त्याचे महत्वाचे कार्य आहे. त्वचेच्या वरील थरामधून मेलॅनिन नावाचा द्रव स्त्रवत असतो, जो अतिनील किरणांना अपारदर्शी असतो. त्यामुळे त्वचेचा कँसर होण्याचे टळते.
◆ जिभेला पाच प्रक्रारच्या चवी कळतात. गोड, खारट, आंबट, कडू व तुरट.
◆ तिखट ही खरी चव नसून तो केवळ प्रतिसाद असतो.
◆ जिभेच्या शेंडयावर गोड चवीचे आकलन होते. तर, जिभेच्या सर्वात आतील भागावर कडू चवीचे आकलन होत असते.जिभेचे व नाकाचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी जस्त या खनिजक्षाराची आवश्यकता असते.
◆ मानवी शरीर कमी केसाळ असल्याने त्वचेतून उष्णतेचा ऱ्हास जलद होतो.
◆ मानवाचे वासाचे ज्ञान कुत्रा, मांजर, हरीण यांच्या तुलनेने फारच कमी आहे. तसेच नाकातील चेतांची टोके बराच काळ एकाच वासाची संवेदना ग्रहण करीत राहिल्यास त्या विशिष्ट वासासाठी ती बधिर होतात.
◆ मानवी डोळ्यांना विधुतचुंबकीय किरणांचा फारच थोडा भाग दिसू शकतो. मानव अतिनील किरण बघू शकत नाही. मात्र फलमाशी सारखे कीटक ते बघू शकतात.
◆ पीट वायपर जातीचा साप इन्फ्रारेड किरण बघू शकतो, म्हणूनच तो गडद अंधारातही उंदरासारखे भक्ष्य टिपू शकतो.
◆ मानवी डोळ्यातील दृष्टिपटलात फारच कमी दंडपेशी असल्याने त्याची रात्रीची दृष्टी कमकुवत आहे. मांजर, हरीण, घुबड यांसारख्या अनेक प्राण्याच्या डोळ्यात मात्र मोठया प्रमाणात दंडपेशी असल्याने त्यांची रात्रीची दृष्टी चांगली असते.
◆ ससा, घोडा, गुरे ही आवाजाच्या दिशेने त्यांचा बाह्यकर्ण वळवू शकतात, मात्र मानव आपला बाह्यकर्ण हलवू शकत नसल्याने त्याला कमी ध्वनिलहरी संकलित करता येतात.

जाणून घ्या :- सामान्य ज्ञान

📌 भारतीय सर्व्हेक्षण विभाग (SOI)
- स्थापना: वर्ष 1767;
- मुख्यालय: देहरादून.

📌 भारतीय शेतकरी खत सहकारी मर्यादित (IFFCO)
- स्थापना: 3 नोव्हेंबर 1967;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 MTNL (महानगर टेलीफोन निगम लिमिटेड)
- स्थापना: 01 एप्रिल 1986;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 BSNL (भारत संचार निगम लिमिटेड)
- स्थापना: 15 सप्टेंबर 2000;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 WWF (वर्ल्ड वाइड फंड)
- स्थापना: 29 एप्रिल 1961;
- मुख्यालय: ग्लॅंड, स्वित्झर्लंड.

📌 अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF)
- स्थापना: 23 जून 1937;
- मुख्यालय: दिल्ली.

📌 भारतीय क्रिडा प्राधिकरण (SAI)
- स्थापना: वर्ष 1984;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघ (IWF)
- स्थापना: वर्ष 1905;
- मुख्यालय: बुडापेस्ट, हंगेरी.

📌 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT)
- स्थापना: 01 सप्टेंबर 1961;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)
- स्थापना: वर्ष 1945;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 राष्ट्रीय महिला आयोगाची
- स्थापना - 31 जानेवारी 1992.

📌 इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX)
- स्थापना: 28 जून 2008;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

लक्षात ठेवा

1) ग्लुकोजचा द्रवणांक ...... इतका आहे.

1) 150⁰c✅✅

2) - 150⁰c

3)-218⁰c

4)218.4⁰c


2) अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डोमिश्रण हे .... आणि  .... पासून तयार करतात.

1) लाईम आणि सल्फर

2) लाईम आणि सोडियम

3) काॅपर सल्फेट आणि लाईम✅✅

4)काॅपर सल्फेट आणि वेटेबल सल्फर


3) ब्रास हा मिश्र खालीलपैकी कोणत्या घटकानी बनलेला असतो ?

1) काॅपर 80% + झिंक 10% + टिन 10%

2) काॅपर 80% + झिंक 20 %✅✅

3) काॅपर 80% + टीन 20 %

4) काॅपर 90 % + टीन 10 %




4)प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?
अ. प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर 
ब. प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर
क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर
ड. प्रकाशाच्या अपस्करण तत्वावरपर्यायी उत्तरे 

1) अ, ब आणि क
2) फक्त क 
3) ब आणि ड ✅✅
4) फक्त ड



5)कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होताना .... वायूचे बुडबुडे धातूच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शियम पाण्यावर तरंगते.  

1) हायड्रोजन✅✅

2) ऑक्सिजन

3) कार्बन डायाॅक्साइड

4) अमोनिया



6) विद्युत दिव्यामध्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते, कारण :

1) टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत.✅✅

2) टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवितात.    

3)निष्क्रिय वायू विपूल व स्वस्त असतात.

4) प्रकाशाची तीव्रता वाढविण्यास मदत करतात.



7) खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यास  ' फूल्स  गोल्ड ' ( मुर्खांचे सोने ) असे म्हणतात.

1)  हेमाटाईट

2) मॅग्नाटाईट

3) सायडेरेईट

4) पायराईट ✅✅


8) C7H5NO3S हे खालीलपैकी कोणाचे रासायनिक सूत्र आहे.

1) सेल्यूलोज

2) सुक्रोज

3) सॅकॅरिन ✅✅

4) ग्लुटेन



9) सल्फर ट्रायऑक्साईडच्या उत्पादनासाठी...... चा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात .

1) व्हॅनॅडिअम पेंटाॅक्साईड ✅✅

2) मॅगेनीज डायऑक्साईड

3) कॅल्शियम कार्बोनेट

4) सिल्व्हर नायट्रेट  




10) पृथ्वीवरील महासागर व किनारी परिसंस्था यांनी खेचून घेतलेला ..... हा वायू ' ब्लू कार्बन ' या नावाने ओळखला जातो.

1) नायट्रोजन

2) ऑक्सिजन

3) कार्बन डायऑक्साईड✅✅

4) हायड्रोजन






Environment GK In Hindi

Environment GK In Hindi

1.पौधे के किस भाग से दालचीनी प्राप्त की जाती है?
[A] पत्ती
[B] बीज
[C] छाल
[D] कली

Correct Answer: C [छाल]
Notes:
दालचीनी का प्रयोग मसाला और दवा के रूप में किया जाता है। यह छाल से प्राप्त की जाती है।

2.निम्नलिखित में से कौन सी पृथ्वी के वातावरण में पाए जाने वाली ग्रीन हाउस गैस नहीं है?
[A] कार्बन डाई ऑक्साइड
[B] मीथेन
[C] जलवाष्प
[D] नाइट्रोजन ऑक्साइड

Correct Answer: D [नाइट्रोजन ऑक्साइड ]
Notes:
प्रमुख ग्रीन हाउस गैस जलवाष्प, कार्बन डाई ऑक्साइड, मेथेन, नाइट्रस ऑक्साइड और ओजोन हैं| नाइट्रोजन ऑक्साइड प्रत्यक्ष रूप से ग्रीन हाउस गैस नहीं है लेकिन ओजोन के नरमन में सहायता करती है|
3.चिम्मिनी वन्यजीव अभ्यारण्य किस प्रदेश में है?
[A] केरल
[B] तमिलनाडु
[C] कर्नाटक
[D] आन्ध्र प्रदेश

Correct Answer: A [केरल ]
Notes:
चिम्मिनी वन्यजीव अभ्यारण्य केरल में है| यह थ्रिस्सुर जिले में है और पश्चिमी घाटों पर है| यहाँ पक्षिओं का एक बहुत अच्छा निवास स्थान है|

4.पम्पदुम शोला राष्ट्रीय उद्यान कहाँ है?
[A] उत्तराखंड
[B] केरल
[C] छत्तीसगढ़
[D] राजस्थान

Correct Answer: B [केरल ]
Notes:
पम्पदुम शोला राष्ट्रीय उद्यान केरल में है| यह केरल के मरायुर शहर के पास है| यह भारत के छोटे राष्ट्रीय उद्यानों में से एक है| यह 1.32 वर्ग किलोमीटर में फैला हुआ है|

5.केवलदेव राष्ट्रीय उद्यान किस प्रदेश में है?
[A] राजस्थान
[B] उत्तर प्रदेश
[C] मध्य प्रदेश
[D] महाराष्ट्र

Correct Answer: A [राजस्थान ]
Notes:
केवलदेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान में है| यह भरतपुर अभ्यारण्य के नाम से जाना जाता है|  इसमें हजारों की संख्या में दुर्लभ और विलुप्त जाति के पक्षी पाए जाते हैं, जैसे साईबेरिया से आये सारस, जो यहाँ सर्दियों के मौसम में आते हैं। यहाँ 230 से अधिक प्रजाति के पक्षी पाए जाते हैं|

6.कासु ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान किस प्रदेश में है?
[A] केरल
[B] तेलंगाना
[C] त्रिपुरा
[D] तमिलनाडु

Correct Answer: B [तेलंगाना ]
Notes:
कासु ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान तेलंगाना में है| यह तेलंगाना के जुबली पर्वत में है| इसका क्षेत्रफल 390 एकड़ में है और यहाँ 600 तरह के पेड़, 140 तरह के पक्षी पाए जाते हैं| इसके अलावा यहाँ तितलियों और कीड़े मकोड़े की भी 30 से अधिक प्रजातियाँ पायी जाती हैं|

7.कालेसर राष्ट्रीय उद्यान किस प्रदेश में है?
[A] हरयाणा
[B] उत्तर प्रदेश
[C] पंजाब
[D] इनमें से कोई नहीं

Correct Answer: A [हरयाणा ]
Notes:
कालेसर राष्ट्रीय उद्यान हरयाणा के यमुनानगर जिले में है|  यह तेरह हजार एकड़ के क्षेत्रफल में फैला हुआ है| यहाँ तेंदुए, जंगली बिल्ली, भारतीय सियार, चीतल, सांबर बहुतायात में पाए जाते हैं|


8.भिन्दवास वन्य जीव अभ्यारण्य किस प्रदेश में है?
[A] पंजाब
[B] हरयाणा
[C] हिमाचल प्रदेश
[D] उत्तर प्रदेश

Correct Answer: B [हरयाणा ]
Notes:
भिन्दवास वन्य जीव अभ्यारण्य हरयाणा  का एक प्रमुख वन्य जीव अभ्यारण्य में है| यह हरयाणा के झज्झर जिले मने है और 411.35 हेक्टेयर में फैला हुआ है|

9.कतर्निया घाट वन्यजीव अभ्यारण्य किस प्रदेश में है?
[A] उत्तर प्रदेश
[B] मध्य प्रदेश
[C] कर्नाटक
[D] बिहार

Correct Answer: A [उत्तर प्रदेश ]
Notes:
कतर्निया घात वन्यजीव अभ्यारण्य उत्तर प्रदेश के बहराइच जिले में है| यहाँ घड़ियाल, गेंडा, गंगा की डोल्फिन बहुतायात में पाए जाते हैं| यह घडियालों का प्रमुख क्षेत्र है|

10.इंदिरा गांधी वन्यजीव अभ्यारण्य किस प्रदेश में है?
[A] तमिलनाडु
[B] कर्नाटक
[C] केरल
[D] तेलंगाना

Correct Answer: A [तमिलनाडु]
Notes:
इंदिरा गांधी वन्यजीव अभ्यारण्य अनामलाई टाइगर रिज़र्व का पुराना नाम है। यह तमिलनाडु की अनामलाई पहाड़ियों में स्थित है। यह कोयम्बटूर और तिरुप्पुर जिले में है। यह सुनहरे हिरन, तेंदुए, जंगली हिरण, भौंकने वाले हिरण, साधारण लंगूर आदि का क्षेत्र है। यहां पश्चिमी घाट की 15 से 16 पक्षी प्रजातियाँ पाई जाती हैं। इसके अलावा पक्षियों की 250 से अधिक प्रजातियाँ पाई जाती हैं।

राजर्षि शाहू महाराज (महाराष्ट्रातील समाजसुधारक)

राजर्षि शाहू महाराज

जन्म – 16 जुलै 1874.
मृत्यू – 6 मे 1922.
एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल करण्यात आली.
महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.

भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

संस्थात्मक योगदान :

ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.

1901 – मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).
नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
1902 – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
15 नोव्हेंबर 1906 – किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.

1907 – मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.
1911 – जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.
1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.

1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.
1917 – माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
14 फेब्रुवारी 1919 – पाटील शाळात्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.

लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.
पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.
1894 – बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.
1917 – विधवा विवाहाचा कायदा.
1918 – आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.
1918 – महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.
वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.

1920 – माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.
1895 – गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.
1899 – वेदोक्त प्रकरण – सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.
यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.
1906 – शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.
1907 – सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.
1911 – सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.
1911 – भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.
1912 – कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

1916 – निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.
1918 – कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.
1918 – आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.
1919 – स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.
1920 – घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.
1920 – हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
कोल्हापूर शहरास ‘वस्तीगृहांची जननीम्हटले जाते.
ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वैशिष्टे :

महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.
सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.
जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.
पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.
उदार विचार प्रणालीचा राजा.
राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.
कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King – भाई माधवराव बागल.
शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता. – वि. रा. शिंदे.
टीकाकारांकडूनशुद्रांचा राजा‘ असा उल्लेख.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

केंद्र सरकारच्या समित्या:-


१. व्ही. के. सरस्वत:-
हायपरपूल तंत्रज्ञानाची तांत्रिक आणि व्यावसायिक व्यवहार्यता शोधण्यासाठी उच्च स्तरीय समिती

२. शशी हेम्प्ती:-
मुंबईत उघडकीस आलेल्या पार्श्वभूमीवर दुरचित्रवाणी गुणांक पद्धतीचा फेरआढावा घेणे

३. न्या. मदन बी लोकुर :-
पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये काडीकचरा जाळण्याचे प्रकार रोखण्याच्या हेतूने उपाय सुचविणे

४. के. एन. दीक्षित :-
भारतीय संस्कृतीचा उगम आणि विकास यांचा भ्यास करण्यासाठीची उच्च समिती

५.  राजीव महर्षी :-
कर्ज माफीचे आणि कोव्हीड-१९शीसंबधीत कर्जाच्या स्थगीतीवरील व्याजाचे आर्थिक परिणाम यांचे मोजमाप करणे

६. डॉ. प्रसन्न कुमार मोहंती :-
देशातील खासगी क्षेत्रातील बँकांचा प्रचलीत मालकी हक्क आणि त्यांची सरंचना यांचा आढावा घेण्यासाठी नेमलेला कार्यगट

७. डी. पी. सिंग:-
अधिकाधिक विद्यार्थीनी भारतात रहावे आणि त्यांचे उच्च शिक्षण चालू ठेवावे यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करणे

८. डॉ. व्ही. के. पाॅल:-
भारतसाठी कोणती कोरोना लस खरेदी करावी, तिचे वितरण कसे करावे यासाठी किती निधी लागेल याचा अभ्यास करणे

९. के. व्ही कामत :-
कोव्हीड;-१९ मुळे प्रभावीत झालेल्या कर्जाच्या पुर्नरचनेसाठी आर्थिक मापदंड ठरविणे

१०. व्ही. रामगोपाल राव:-
भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेची भूमिका आणि उत्तरदायीत्वाची पुनर व्याख्या तयार करणे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) कोणतेही काम करण्याचे टाळत राहणे, पुढे पुढे ढकलत राहणे म्हणजेच –

   1) धरसोड करणे    2) टंगळमंगळ करणे    3) सोडून देणे    4)  पुढे पुढे जाणे

उत्तर :- 2

2) ‘नेहमी घरात बसून राहणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.

   1) परात्म      2) ऐतखाऊ      3) घरकोंबडा    4) एकलकोंडा

उत्तर :- 3

3) खालील शब्दांमधून व्याकरणदृष्टया योग्य शब्द शोधा.

   1) अमिबा      2) अमीबा      3) अब्मिबा    4) अम्बिमा

उत्तर :- 1

4) खालील स्वर कोणत्या गटात मोडतात ? – अ, आ, इ, ई, उ, ऊ ...............

   1) सजातीय      2) विजातीय      3) संयुक्त      4) –हस्व

उत्तर :- 1

5) खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?

   1) कवीश्वर      2) दुरात्मा      3) सज्जन    4) गणेश

उत्तर :- 3

6) योग्य पर्याय निवडा.

   अ) विकारी शब्दाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो.
   ब) अविकारी शब्दाच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही.

   1) अ      2) दोन्ही      3) ब      4) दोन्ही नाही

उत्तर :- 2

7) ‘सैनिकांचे शौर्य पाहून देशास अभिमाने वाटतो.’ अधोरेखित शब्दाचा नामप्रकार ओळखा.

   1) भाववाचक    2) सामान्यनाम    3) क्रियावाचक    4) धातुसाधित

उत्तर :- 1

8) सर्वनामाचे एकूण मूळ ............ प्रकार पडतात. रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधून लिहा.

   1) नऊ    2) तीन      3) चार      4) सात

उत्तर :- 1

9) ‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे ?

   1) सर्वनाम साधित विशेषण    2) धातुसाधित विशेषण
   3) अव्ययवसाधित विशेषण    4) नामसाधित विशेषण

उत्तर :- 4

10) ‘तू एवढया भाकरी कराव्यात’ – या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा.

   1) आख्यात    2) वाख्यात    3) ताख्यात    4) लाख्यात

उत्तर :- 2

मराठी व्याकरण: अलंकार

मराठी व्याकरण: अलंकार

अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात. शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी, म्हणून भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवि आणि लेखक करत असतात. विशेषत: पद्यात अलंकार अधिक शोभून दिसतात.

गद्यसुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते. ‘मुख सुंदर दिसते’ किंवा ‘मुख सुंदर आहे’ ही साधी (गद्य) वाक्ये झाली; ‘परंतु ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ किंवा ‘मुख जणू कमलच आहे’ असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते. यालाच अलंकारिक भाषा म्हणतात.

अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडते. त्यांत एक प्रकारची चमत्कृती दिसते व मन आनंदित होते.

पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली, की त्यामध्ये नादमाधुर्य येते. अशा शब्दचमत्कृतीची पद्यात योजना असली, तर त्या पद्यात ‘शब्दालंकार’ असतो. पद्यात अर्थचमत्कृती प्रामुख्याने असली, तर त्या पद्यात, ‘अर्थालंकार’ असतो.

अलंकारांचे ‘शब्दालंकार’ आणि ‘अर्थालंकार’ असे दोन मुख्य प्रकार आहेत.

शब्दालंकार :
जे अलंकार शब्दांच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात, शब्दांची चमत्कृती शब्दांचा अर्थ आणि शब्दयोजना यांच्यावर आधारीत अलंकारांना ‘शब्दालंकार’ म्हणतात.

प्रकार-

अनुप्रास – कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
उदा. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
( गडद गडद जलदची पुनरावृत्ती)

यमक - शब्दालंकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यांत ‘यमक’ हा अलंकार महत्वाचा आहे. एखादा शब्द किंवा अक्षर पुनःपुन्हा पद्यात चरणांती आले, की तेथे ‘यमक’ हा अलंकार होतो.
उदा.
मना चंदनाचे परी त्वा झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे ||
या वैभवाला तुझ्या पाहुनिया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी |
सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पहिले मी न कोठे तरी |
अशा शब्दांनी नादमाधुर्य निर्माण झालेल्या पद्यपंक्ती तुमच्या पाठ्यपुस्तकातील कवितांतून निवडून काढा.

श्लेष - एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती निर्माण होते तेव्हा ‘श्लेष’ हा अलंकार होतो.
उदा.
मित्राच्या उद्याने कोणास आनंद होत नाही. (मित्र = सखा, मित्र = सूय)
श्रीकृष्ण नवरा मी नवरी |
शिशुपाल नवरा मी न-वरी ||
अर्थालंकार :
दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते. तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्यात चार गोष्टी महत्वाच्या असतात.

ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात ‘उपमेय’ असे म्हणतात. ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून ‘मुख’ हे ‘उपमेय’ आहे.
उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला ‘उपमान’ असे म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून ‘कमल’ हे तेथे ‘उपमान’ आहे.
उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला ‘साधर्म्य’ किंवा ‘समान धर्म’ असे म्हणतात. वाक्यात उपमेय ‘मुख’ आणि उपमान ‘कमळ’ यांमध्ये साम्य दाखवणारा गुण सुंदरता हा आहे.
उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला ‘साधर्म्यसूचक शब्द’ किंवा ‘साम्यसूचक शब्द’ म्हणतात.
वरील वाक्यात ‘कामलासारखे मुख’ यातील ‘सारखे’ हा ‘साधर्म्यसूचक’ शब्द आहे.

प्रकार -

उपमा – उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो.
उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे,
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळूनी लावण्या वर वहावे ||
उत्प्रेक्षा –उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उत्प्रेक्षा’ हा अलंकार असतो.
उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही
तिच्या कळ्या | होत्या मिटलेल्या सगळ्या |
जणू दमल्या | फार खेळूनी, मग निजल्या ||
व्यतिरेक –या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते.
उदा.
अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा
तू माउलीहुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ
पाणियाहूनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा
अतिशयोक्ती -कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो.
उदा.
दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं ||
मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली ||
उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला |
वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला ||
दृष्टान्त –एखादे तत्त्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास ‘दृष्टान्त’ अलंकार होतो.
उदा.
लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |
ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार ||
तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात ते कशासाठी हे पटवून देताना मुंगी होऊन साखर मिळते आणि ऐश्वर्यसंप ऐरावत होऊन अंकुशाचा मार खावा लागतो अशी उदाहरणे देतात.

स्वभावोक्ती –एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, त्याच्या स्वाभाविक हालचालींचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे हा या भाषेचा अलंकार ठरतो तेव्हा ‘स्वभावोक्ती’ अलंकार होतो.
उदा.
मातीत ते पसरले अति रम्य पंख |
केले वरी उदर पांडुर निष्कलंक ||
चंचू तशीच उघडी पद लांबविले |
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ||
विरोधाभास –एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शविला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो. तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.
उदा.
जरी आंधळी मी तुला पाहते.
मरणात खरोखर जग जगते ||

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...