०३ मे २०२२

वाहतुकीचे फायदे व तोटे|वाहतुकीचे प्रदूषण

वाहतुकीचे फायदे व तोटे|वाहतुकीचे प्रदूषण
थोर विचारवंत प्राध्यापक माटे यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की,”विज्ञान एक कामधेनु आहे, तिचे तुम्ही जितके दोहन कराल तेवढा तुम्हाला तिचा लाभ होईल”.

खरेच विज्ञान हि माणसाला लाभलेली दिव्य शक्ती आहे. मानवाने विज्ञानाची उपासना केली नसती तर त्याची आदिमानवाच्या अवस्थेपासून आजवर झालेली प्रगती होऊ शकली नसतील. विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने केलेली प्रगती हे मानवाच्या अखंड प्रखर साधनेचे फळ आहे. विज्ञान हा मानवाला लाभलेला परिस आहे.

पण वाहतुकीचे फायदे व तोटे हे आहेतच. तर आपण बघूया वाहतुकीचे फायदे जास्त आहेत का तोटे जास्त आहेत?

वाहतुकीचे फायदे व तोटे, वाहतुकीचे प्रदूषण
समजा, माणसाला विज्ञानाची संगत लाभली नसती तर माणूस कायमचाच ‘कंदमुळे व वल्कले’यांच्यावर जीवन कंठत राहिला असता पण सुदैवाने असे काही घडले नाही. म्हणूनच ,आज मानवी जीवनात असे एकही क्षेत्र आढळणार नाही की जेथे विज्ञानाने प्रवेश केलेला नाही आणि ते समृद्ध केले नाही.

आजचे युग हे अविष्कार आणि चमत्काराचे युग आहे.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाने एक प्रकारची क्रांती केली आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणतात, ”सर्व प्राण्यात माणूस हा दुबळा प्राणी, पण यंत्रांनी त्याची शक्ती वाढवली आहे आणि तो सर्व प्राण्यांत प्रबळ झाला”.

जसे, मानवाने यंत्रयुग अंगीकारले तस- तशी त्याची ज्ञानाची क्षितिजे रुंदावली नवनवीन शोध लागले एकोणिसावे शतक हे प्रमुख प्रबोधनाचे शतक होते तर विसावे शतक हे विज्ञानाचे शतक आहे .

वाहतुकीचे फायदे व तोटे
वाहतुकीचे फायदे
यंत्रही मानवी विज्ञानातील एक भाग आहे.आज विज्ञान क्षेत्रात जी प्रगती झाली आहे ज्यामुळे आज आपण अल्पावधीत इच्छित स्थळी जाऊ शकतो. अंतराळ व समुद्राच्या अंतर्भागात माणूस जावून पोहोचला. अंतराळात जाऊन चंद्राचे फोटो काढून आणू शकतो ते सुद्धा पृथ्वीच्या माणसाने नियंत्रण यंत्राद्वारे केली आहे .

पूर्वी एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचे असल्यास अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास बैलगाडीने अथवा कधी पायीच केला जात असे. प्रवास म्हणजे दोन-तीन किंवा त्याहून अधिक दिवस उन्हातून, जंगलातून, दिवस-रात्र केला जात असे. कोठेही मुक्काम करावा लागत असे.

पूर्वी यंत्राचा, वाहनाचा शोध लागला नव्हता. परंतु, मानवाने विज्ञानात प्रचंड प्रगती करून तो कमी तासात अथवा कमी दिवसात रेल्वे, मोटार, बस, विमान, पानबुडी यांच्या सहायाने आज आपण शेकडो मैल अंतर अगदी बोलता-बोलता पूर्ण करू शकतो हा खूप मोठा वाहतुकीचा फायदा आहे ना…..!

परंतु दैनंदिन जीवनात असे आढळते की, माणूस आता पूर्णपणे यंत्रावर अवलंबून आहे.

माणसाने स्वतःच्या सुखासाठी यंत्रे तयार केली आहे, पण आज ही यंत्रेच माणसावर आधिपत्य गाजवित आहेत.

उद्योगधंदे कारखाने आणि वाहतुकीच्या साधनात त्याने वाहतुकीचा फायदा घेवून  प्रचंड प्रगती केली आहे. कोणी म्हणतात की, ’आज हा माणूस यंत्राचा गुलाम झाला आहे’. एकंदरीत त्याचे हे म्हणणे सत्यच आहे.

प्रत्येक नागरिकाला कामावर जाण्यास कुठल्या ना कुठल्यातरी यंत्र रुपी वाहनाची मदत घ्यावी लागते. रेल्वे, गाडी, बस, स्कूटर व मोटार या सारख्या वाहनांचा फायदा घेवू लागला .ही साधने माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून राहिलेली आहे व वाहतुकीची साधने (यंत्रे) नसली तर तो ऑफिसात जाऊच शकत नाही.

वाहतुकीचे तोटे
आजच्या तरुण पिढीला तर मोटार, स्कूटर ही वाहने एक फॅशन वाटते; या फॅशन चे रूपांतर व्यसनात होते. परंतु वाहतुकीचा तोटा असा की ,आजची तरुण मंडळी हायवे ट्रॅफिक वर रस्त्यावर बेफाम वेगाने वाहने चालवितात ही वाहने जणू माणसाच्या जीवनाचा घटक आहे.

वाहने आली की अपघात आलेच या बेभान वेगाने जाणाऱ्या वाहणांमुळे अनेक निष्पाप जीव विनाकारण बळी पडतात.

आजकाल तर मुले 18 वर्षे वयाची पूर्ण व्हायच्या आधीच त्यांच्यासाठी पालक दुचाकी वाहन घेऊन देतात. तसेच घरातील प्रत्येकाला वाहन घेतले जाते. आज आपण जर एक दृष्टिक्षेप टाकला तर, प्रत्येक घरा समोर दोन-तीन वाहने दिसतात.

वाहतुकीचा तोटा किंवा नुकसान म्हणजे  वाहने असल्याने प्रत्येक जण हा आळशी बनत चाललेला आहे. आपल्या घरापासून दोन घरे सोडून पुढे जायचे असल्यास मानव वाहनांचा उपयोग करू लागला आहे. त्यामुळे शारीरिक व्यायाम होत नाही, त्यामुळे मानवाला अनेक विकार संभवतात. व्यायाम न झाल्याने व शरीराची योग्य ती हालचाल न झाल्याने मानवाला वयाच्या आधी सांधेदुखी ,रक्तदाब तसेच शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, त्यामुळे हृदयविकार संभवतात.

लोकसंख्येच्या बाबतीत तर आज भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दर शतकास ही लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. विचार केल्यास अशा कित्येक भारतवासीयांकडे वाहनाची उपलब्धता झाली असेल तर अशा वाहनातून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणारा काळा वायू म्हणजेच कार्बन डायऑक्साइड ,कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन्स ,सल्फर डायॉक्साईड अशी अनेक घातक वायूंची निर्मिती होते, त्यालाच वायू प्रदूषण असे संबोधतात.

पर्यावरणाची हानी करणाऱ्या आणि मानवी आरोग्यास धोका पोहोचवणाऱ्या घटकास प्रदूषके म्हणतात. वाहनाच्या प्रचंड वापरामुळे बाहेर पडणाऱ्या असा प्रदूषकांचे प्रमाण वाढते व हवेचे प्रदूषण होते अशा प्रदूषणापासून मानवाला अधिक धोका आहे; कारण श्वाशोस्वासा साठी मानवाला शुद्ध हवेची गरज असते.

श्वाशोस्वासा साठी वापरल्या जाणाऱ्या हवेचे माणसाला नियंत्रण करता येत नाही .श्वाशोस्वास हा अविरत चालू असतो. हवा प्रदुषित झाली कि ती श्वासोच्छ्वासा बरोबर शरीरात जाऊन दुष्परिणाम घडवून आणते. त्याचप्रमाणे हवेतील अतिरिक्त सल्फर डायॉक्साईड मुळे खोकला ,श्वसन मार्ग दाह, श्वसन क्रिया संबंधीचे विकार होतात.

स्वयंचलित वाहनातून इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे कार्बन-डाय-ऑक्‍साईड, पाण्याची वाफ, कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईड अतिक्रमण करत आहे आणि या हल्ल्यात ओझोन नष्ट झाला तर सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण पृथ्वीवर येतील व येथील सजीव सृष्टी पार नष्ट होईल अशी भीती वाटते.

Vehicle Pollution
तसेच वाहनांमधून बाहेर पडणारा धूर व वातावरणातील धुके यांच्या मिश्रणाने धुर्के तयार होते व यात ध्र्क्यात असलेल्या सूक्ष्म कार्बन यांचा समावेश असतो. यामुळे वाहनचालकाला रस्त्यावरचे अंधूक दिसते म्हणून धुक्यामुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढते. अशा अपघातांचे प्रमाण दिल्लीमध्ये अधिक असल्याचे दिसून येते.

तसेच रेल्वे, विमानांच्या द्वारे निघणाऱ्या ध्वनी मोटार, स्कूटर, ट्रक, बस अशा वाहनांच्या सतत वाजणारे होर्न यामुळे कानाला कानठळ्या बसतात . मानवी श्रवण संवेदनक्षमता 0 ते 180 डेसिबल (ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक) एवढ्या पल्ल्याची असते. सामान्यतः 140 डेसिबल पुढील आवाज गोंगाट ठरतो. अशा आवाजामुळे ऐकू येण्यात दोष निर्माण होतो.

बराच काळ मोठा ध्वनी म्हणजेच ध्वनी प्रदूषण कानावर पडत राहिलास कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. मोठ्या आवाजाने मेंदू, यकृत, हृदय यांवर विपरीत परिणाम होतो. मोठ्या आवाजाने मानसिक संतुलन बिघाड होते म्हणून सतत मोठा आवाज हितकारक नसतो .

मानवास होणाऱ्या हानी टाळण्यासाठी मुख्य उपाय पुढीलप्रमाणे:
जवळ जाण्यासाठी वाहनाचा  वापर न करता, चालत जाणे योग्य; त्यामुळे शरीरालाही थोडा व्यायाम मिळतो.
प्रचंड प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल ऐवजी शिसे विरहित पेट्रोलचा वापर करावा.
शुद्ध इंधन वापरावे . इंधन व ऑईल यांचे योग्य प्रमाण घ्यावे. इंधन व त्यांचे प्रमाण वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असते.
वाहनांची नियमितपणे तपासणी करून इंजिन कार्यक्षम ठेवणे .वाहनांची तपासणी तज्ञ वाहन यांत्रिकी कडूनच करून घ्यावी. काही कमतरता आढळल्यास त्याची त्वरित पूर्तता करून घ्यावी. सल्फर डायॉक्साइड वायू ,स्मोक व लेडचे कण बाहेर पडत असतात. या वायूच्या हवेत होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या व बालकांच्या आरोग्यावर परिणाम होतात. कार्बन मोनॉक्साईड हा सर्वात घातक वायू आहे. हा वायू रंगहीन व वासिना असतो. या वायूचे हवेत प्रदूषण झाल्यास हा वायू श्वासोच्छ्वास द्वारे फुफ्फुसात शिरतो व रक्तात असलेल्या हिमोग्लोबीनशी संयोग पावतो व कार्बोक्सीहिमोग्लोबिन तयार होतो. CO + Hb  -> COHb कार्बन मोनॉक्साईड ची  संयोग क्षमता ऑक्सिजन पेक्षा दोनशे पटीने जास्त आहे. रक्तात कार्बोक्सीहिमोग्लोबिन चे प्रमाण वाढल्यास ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते व त्यामुळे नागरिकांना डोकेदुखी ,डोके गरगरणे,मूर्छी येणे, ग्लानी येणे इत्यादी त्रास होतात. जास्त प्रमाणातील CO मुळे प्राणघातक ठरू शकतो. नायट्रोजन डायॉक्साइड NO सुद्धा CO सारखाच घातक वायू आहे. नायट्रोजन डायॉक्साइड याची प्रकाशाच्या सानिध्यात एकमेकांची प्रकाश रासायनिक प्रक्रिया घडून Ozone व Peroxy Acitil Nitrate रोज तयार होतात. NO2 -> NO + O  O2 + O -> O3 यामुळे नागरिकांना खाज, खोकला, थकवा, सूज इत्यादी विकार होतात. सल्फर डायॉक्साईडचे हवेतील प्रमाणात वाढ झाल्यास डोळ्यांची व घशाची जळजळ होते. खोकला, श्वास मार्ग दाह आणि तत्सम श्वसनक्रिया संबंधित विकार उद्भवतात .हायड्रोजन सल्फाईडचा कुजका अंड्यासारखा वास येतो .या वायूमुळे फुफ्फुसांचा दाह होतो व श्वसनाचे रोग होतात. तसेच CO2 मुळे ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते. पृथ्वीच्या पर्यावरणाच्या बाहेर सर्वत्र ओझोन वायू आहे. पृथ्वीचे जीवनसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी हा वायू आवश्यक आहे. वाढत्या प्रदूषणामुळे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढत आहे. हा विषारी घातक वायू आहे.
वाहनाचा कार्बोरेटर नेहमी साफ ठेवल्याने इंधन पूर्णतः ज्वलन होऊन विषारी वायू बाहेर पडत नाही; म्हणून कार्बोरेटर नेहमी साफ ठेवावे.
टू  स्ट्रोक (2 STROKE)  च्या ऐवजी फोर स्ट्रोक (4 STROKE) चा वापर करावा.
ध्वनी नियंत्रणासाठी सायलेन्सर बसवावे.वेगवेगळे कर्णकर्कश हॉर्न वाजवण्यास बंदी असावी.
वसाहती, शिक्षण संस्था, तसेच रुग्णालयांचे परिसरात ध्वनी वर्जित म्हणून घोषित करावे व तश्या  पाट्या त्या भागात लावावे.
वाहनात charcoal canister बसविल्यास  प्रदूषण करणारे वायू यात शोषले जातात व त्यामधून कमीत कमी हानिकारक वायू बाहेर पडतो.
सौर ऊर्जेचा वाहनासाठी उपयोग केल्यास प्रदूषण कमी होईल.
रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावावीत, कारण झाडे CO2 वायू शोषून घेतात, झाडे ध्वनी रोधक म्हणून काम करतात.
पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे आता बिकट झाली आहे. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींनी आता धोक्याचा इशारा दिला आहे.

दिवसेंदिवस या वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढत असून ऑक्सिजन प्रमाण घटत चाललेले आहे. याच गतीने जर  प्रदूषण वाढू लागले तर लवकरात पृथ्वीवरील वातावरण तप्त होईल व अशा वातावरणात कुठल्याही सजीव प्राण्याला जगणे केवळ अशक्य होईल.

प्रदूषण समस्येकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखे नाही. असे अजूनही आज माणूस याबाबत असावा तेवढा जागरूक नाही.

save tree
स्वतःच्या स्वल्प फायद्यासाठी जंगल रक्षक व ठेकेदार यांच्याकडून बेकायदेशीर जंगलतोड होत असते. समाजातील कोणालाही त्यांच्या गंभीर परिणामांची दखल घ्यावीशी वाटत नाही.

जंगले वाचवण्याची जबाबदारी फक्त शासनाची नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे, याची जाणीव कुणालाही झालेली दिसत नाही.

झाडे लावणे जितके आवश्यक आहे, त्यांना त्याहूनही ते वाढवणे महत्त्वाचे आहे .यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड दत्तक घेतले पाहिजे झाडे लावणे आणि त्याची काळजी न घेणे याचा काही उपयोग नाही.

निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात व त्यांना पाणी मिळत नाही, कधी भुकेली  जनावरे नवीन रोपटे खाऊन टाकतात त्यामुळे लावलेल्या झाडांन पैकी  फारच थोडी झाडे जगतात, मोठी होतात. यासाठी मोहीम सुरू केली पाहिजे ,”झाडे लावा झाडे जगवा”, “एक मूल एक झाड”, लग्न मुंजी वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटी देखील एकमेकांना पुष्पगुच्छ देतो  त्या ऐवजी 1-1 रोपे भेटद्यावे .नवीन बालक जन्माला आले की त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व काळाबरोबर बाळासारखे ममतेने त्यालाही वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने शाळेच्या आवारात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी .

रस्त्यांचे जाळे,राष्ट्रीय महामार्ग,रेल्वे मार्ग,हवाई मार्ग

वाहतूक
रस्त्यांचे जाळे
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्हयांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्हयामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्हयातील मुख्य ठिकाणावरुन हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.

रस्ता
पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकुण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकुण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकुण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकुण लांबी 6,555 कि.मी. आहे.

महामार्ग
राष्ट्रीय महामार्ग
राष्ट्रीय महामार्ग नं.4 (मुंबई-बंगलोर) – राष्ट्रीय महामार्ग नं.4 हा मार्ग खंडाळा, लोणावळा, तळेगाव, चिंचवड, पुणे व खेड शिवापूर या शहरा मधून जातो. हा महामार्ग रायगड जिल्हयातून पुणे जिल्हयात प्रवेश करतो व सातारा जिल्हयापाशी संपतो. पुणे जिल्हयातील त्याची एकुण लांबी 120 कि.मी. आहे. राष्ट्रीय महामार्ग नं.9 (पुणे-सोलापूर-हैदराबाद) – राष्ट्रीय महामार्ग नं. 9 या महामार्गाची सुरुवात पुणे जिल्हयातून होत असून तो लोणी, भिगवण व इंदापूर मार्गे सोलापूर जिल्हयात प्रवेश करतो. या महामार्गाची एकुण लांबी 152 कि.मी. आहे. राष्ट्रीय महामार्ग नं. 50 (पुणे- नाशिक) – राष्ट्रीय महामार्ग नं.50 या महामार्गाची सुरुवात पुणे शहरात होत असून हा मार्ग चाकण राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव व एलेफंटा मार्गे नाशिक जिल्हयात प्रवेश करतो. या महामार्गाची एकुण लांबी 95 कि.मी. आहे.

रेल्वे
रेल्वे मार्ग
ब्रॉड गेज दुहेरी व एकेरी रेल्वे मार्गाची पुणे जिल्हयातील एकुण लांबी 311 कि.मी. आहे. यातील एकेरी रेल्वे मार्गाची लांबी 162कि.मी. तर दुहेरी रेल्वे मार्गाची लांबी 149 कि. मी. आहे. पुणे जिल्हयात पुणे व दौंड हे दोन रेल्वे जंक्शन आहेत. मुंबई-पुणे-सोलापूर, पुणे-मिरज व दौंड बारामती हे तीन महत्वाचे रेल्वे मार्ग या जिल्हयातून जातात. पुणे शहर देशातील इतर सर्व प्रमुख शहरांशी रेल्वेने जोडलेले आहे.

हवाई मार्ग
हवाई मार्ग
पुणे आपल्या देशातील सर्व ठिकाणांशी स्वदेशी हवाई मार्गाने जोडले गेले आहे. लोहगाव येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे आणि या विमानतळावरून आपल्या देशातील व आंतरराष्ट्रीय वाहतूक सुध्दा होते. याशिवाय आता जिल्हयातील खेड तालुक्या जवळ आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहू केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.

वाहतुकीचे व्यवस्थापन

वाहतुकीचे व्यवस्थापन

वाहतुकीचे महत्त्व अर्थ-उद्योग- व्यापार क्षेत्रात नाकारता येणारच नाही, पण वाहतूक क्षेत्राची प्रगती झपाटय़ाने होण्यात मात्र अडथळे अनंत असतात..

वाहतुकीचे महत्त्व अर्थ-उद्योग- व्यापार क्षेत्रात नाकारता येणारच नाही, पण वाहतूक क्षेत्राची प्रगती झपाटय़ाने होण्यात मात्र अडथळे अनंत असतात.. हे बदलण्यासाठी एकत्रित विचार करणारे धोरण हवे आणि त्यासाठी आधी अभ्यास हवा..
कोणतीही अर्थव्यवस्था वाढीला लागते तेव्हा त्यामध्ये गुंतवणूक व ऊर्जा क्षेत्राचे जसे महत्त्व असते तितकेच महत्त्व वाहतुकीचे असते. वाहतूक क्षेत्राचे जाळे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्यांचे जाळे असते. हे जाळे जेवढे मोठे व सशक्त तेवढी वाहतूक सुकर! भारतीय अर्थव्यवस्था पुढील १५ वर्षांत जर ८ ते ९% दराने वाढणार असेल तर त्याचा अर्थ त्यापेक्षा जास्त दराने व्यापाराची वृद्धी होण्याची गरज आहे. व्यापाराची वृद्धी याचाच अर्थ देशांतर्गत व आयात-निर्यातीसाठी मालाची अधिक ने-आण म्हणजेच ती ने-आण करणारी वाहतुकीची साधने व त्यांचे जाळे व या सर्वाचे व्यवस्थापन यांत प्रचंड प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे. आज वाहतूक क्षेत्र हे देशाच्या वार्षिक सकल उत्पन्नाच्या ५.५% इतके आहे तर वाहतुकीच्या अनुषंगाने होणारा एकूण खर्च हा देशाच्या वार्षिक सकल उत्पन्नाच्या १४% इतका मोठा आहे. सर्वसाधारणपणे विकसनशील देशांत हा खर्च ८ ते ९% इतका असतो. अर्थात आपल्या देशात असणाऱ्या अनास्थेमुळे व अकार्यक्षमतेमुळे हा खर्च तुलनेने खूपच जास्त आहे. येणाऱ्या काळात म्हणूनच वाहतूक व वाहतुकीचे व्यवस्थापन या क्षेत्राकडे उद्योगांनी व सरकारने अधिक आस्थेने बघणे जरुरी आहे. अन्यथा शरीरातील रक्ताभिसरणातील अडथळ्यांमुळे शरीराला जशी इजा पोहोचू शकते तशीच इजा देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला पोहोचू शकते. वाहतूक म्हटली की त्यात बरीच दालने व क्षेत्रे येतात. रेल्वे, रस्ते वाहतूक (माल व प्रवासी), हवाई वाहतूक, बंदरे, शहरी वाहतूक व दुर्गम भागातील वाहतूक. आजच्या लेखात या पैकी फक्त रेल्वे व रस्ते वाहतूक या दोनच प्रकारांची चर्चा केली आहे. कारण दोन्ही मिळून भारतातील एकंदर वार्षिक वाहतुकीचा जवळजवळ ८७% भार पेलतात. भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा भर हा रेल्वे व रस्ते वाहतुकीवर आहे.
स्वतंत्र भारतात रेल्वेचा अर्थसंकल्प भारतीय अर्थसंकल्पाहून वेगळा मांडला जातो. आज वास्तविक अशी गरज नाही व जगात कोणतेही सरकार असा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडत नाही. विकसित देशांत तर रेल्वेचे खासगीकरण झाले आहे. तेथे रेल्वेमार्ग वेगळ्या कंपन्यांच्या मालकीचे असतात, तर रेडिओ लहरींप्रमाणे या मार्गावर धावणाऱ्या गाडय़ा वेगळ्या कंपन्यांच्या मालकीच्या असतात. यामुळे एकाच रेल्वेची मक्तेदारी न राहता, स्पर्धात्मक उद्योगामुळे त्या मार्गाची व गाडय़ांच्या वाहतुकीची उत्पादकता व कार्यक्षमता सतत वाढती ठेवावी लागते. रेल्वे वाहतुकीची देशाच्या अर्थव्यवस्थेला होणारी मदत बघता स्पर्धात्मक रेल्वे उद्योग असणे गरजेचे असते. ब्रिटिशांनी मुळात ती खासगी उद्योगात सुरू केली, पण स्वतंत्र भारतात तिचे सरकारीकरण होऊन तिची मक्तेदारी आली व अनुत्पादन व अकार्यक्षमता या दोन्ही अवगुणांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठेच नुकसान केले आहे. १९५१ साली भारतीय रेल्वे एकूण मालवाहतुकीच्या ८९% हिस्सा वाहून नेत होती. १९८६-८७ मध्ये हा हिस्सा केवळ ५३% वर आला तर २००७/०८ च्या आकडेवारीनुसार हा हिस्सा केवळ ३०% वर आला आहे. वास्तविक रेल्वे वाहतूक ही किंमत व पर्यावरण या दोन्ही दृष्टींनी अर्थव्यवस्थांना किफायतशीर ठरत असताना गेल्या ६५ वर्षांत मालवाहतुकीच्या त्याच्या घसरत्या हिश्शामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे ३८,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा एक अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज भारतीय रेल्वेचे जाळे हे ६३,३२७ कि.मी. म्हणजेच जगातील तिसऱ्या क्रमांकाचे एवढे मोठे आहे. ७,००० फलाट असणारी ही रेल्वे ही जवळजवळ १४ लाख लोकांना नोकरी व रोजगार पुरवते. ७३८ कि.मी. लांब कोकण रेल्वे ही त्यावरील २००० पूल व ९२ बोगदे यामुळे जागतिक उत्तमतेचा नमुना आहे. आपल्या तंत्रज्ञांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, पण त्याचा उपयोग या प्रचंड रेल्वेच्या जाळ्याचा कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी होत नाही. भारतीय अर्थव्यवस्थेत आज रेल्वे फक्त २ लाख कोटी टन कि.मी. इतक्या मालाची ने-आण करते. जर अर्थव्यवस्था ८% नी वाढणार असेल तर ही वाहतूक ९.७% नी वाढेल व २०३१-३२ पर्यंत रेल्वेला १३ लाख कोटी टन कि.मी. म्हणजेच सध्याच्या ६.५ पट जास्त मालवाहतूक करावी लागेल. सरकारने रेल्वेच्या बाबतीत काही क्रांतिकारक धोरणात्मक बदल केले तरच हे शक्य होऊ शकेल. आज रेल्वेत भारत स्वत:च्या वार्षिक सकल उत्पादनाच्या केवळ ०.४% एवढीच गुंतवणूक करतो. १२व्या योजनेत ही गुंतवणूक ०.८% एवढी होणे व २०३० पर्यंत १.२% एवढी होणे अत्यंत गरजेचे आहे. जी गोष्ट मालवाहतुकीची तीच प्रवासी वाहतुकीची. अर्थव्यवस्थेच्या वृद्धीबरोबर भारतातील रेल्वेने होणारी प्रवासी वाहतूकही वाढणार आहे. आज भारतीय रेल्वे १० लाख कोटी प्रवासी कि.मी. इतकी वाहतूक करते. २०३० पर्यंत ही वाहतूक १६८ लाख कोटी प्रवासी कि.मी. इतकी म्हणजे १७ पटींनी वाढणार आहे. जर भारतीय रेल्वे आजच्या पद्धतीने चालू राहिली तर हे २०३० चे लक्ष्य गाठणे केवळ अशक्यप्राय आहे. सरकारने म्हणूनच आता त्यात गुंतवणूक वाढवून त्यातील सुरक्षा, उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्याकडे भर देणे जरुरी आहे.
रस्ते वाहतूक ही रेल्वेप्रमाणेच देशाच्या अर्थव्यवस्थेची जरुरी आहे. रेल्वेच्या वाहतुकीतला जो हिस्सा कमी होत गेला तो रस्ते वाहतुकीने उचलला. ९०च्या दशकात साधारण २० कि.मी. रस्त्यांचे जाळे वार्षिक ३% च्या वेगाने वाढत जाऊन आज ४० लाख कि.मी. इतके झाले आहे. पण याच काळात वाहनांची संख्या मात्र वार्षिक १५% नी वाढत गेल्याने अर्थात वाहतूक घनता सतत वाढत राहिली. यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी, इंधनाचा अपव्यय, धुराचा होणारा पर्यावरणऱ्हास, यामुळे या देशाला रस्ते वाहतूक आर्थिक व सामाजिक खर्चाचा विचार करता खूपच महाग पडत आहे. जागतिक पातळीवर दर कि.मी.चा खर्च कॅनडामध्ये १२ रुपये आहे, जपानमध्ये २२ रुपये आहे, फ्रान्समध्ये ३२ रुपये तर भारतात ४२ रुपये एवढा आहे. यात सामाजिक खर्चाची बेरीज केली तर दर कि.मी.चा खर्च १०० रुपयांच्याही वर जाईल. भारतीय अर्थव्यवस्थेला हा खर्च परवडण्यासारखा नाही. वर सांगितलेल्या ४० लाख कि.मी.पैकी केवळ १४ लाख कि.मी. रस्ते हे डांबर, सिमेंटने आच्छादित आहेत, तर १० लाख कि.मी. हे रेती व दगडाच्या तुकडय़ांनी आच्छादित आहेत. बाकी सर्व कच्चे रस्ते आहेत. या रस्त्यांवरून आज भारतातील ६१% मालवाहतूक होते व ती वार्षिक १६ ते १८% नी वाढत आहे. रेल्वेपेक्षा गेल्या २० वर्षांत भारतात रस्त्यांची बऱ्या प्रकारे वाढ झाली आहे. २०१३ पर्यंत भारतात ७० हजार कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग असल्याचे दाखवण्यात आले आहे, तर केवळ १२०८ कि.मी.चे द्रुतगती मार्ग झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गापैकी ३८% महामार्ग हे मुंबई-गोवा मार्गासारखे सिंगल लेन आहेत, तर ५५% मार्ग हे दुहेरी लेनचे आहेत.
रस्त्यांचे जाळे हे संख्यात्मकदृष्टय़ा चांगल्या प्रकारे वाढत असले तरी गुणात्मकदृष्टय़ा अजून सुधारणेला भरपूर जागा आहे. रस्त्यांच्या देखभालीसाठी लागणारे तंत्रज्ञान देशात असले, तरी ते प्रामाणिकपणे राबवणारी यंत्रणा मात्र या देशात आभावाने आढळते. रस्त्यांच्या गुणात्मक सुधारणांमुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचा वेग व फेऱ्या सुरक्षितपणे वाढू शकतील व त्यामुळे प्रति कि.मी. येणारा खर्च हा ४२ रुपयांवरून सहज २५ ते ३० रुपयांवर येऊ शकेल. आज या सुधारणेमुळे आरोग्यावर होणारा वाहनांच्या धुराचा परिणामही बऱ्याच अंशी कमी होताना दिसेल.
आपण आपल्या वाईट रस्त्यांबरोबरच, प्रत्येक राज्यात, शहरात अगदी चढाओढीने अडथळे निर्माण केले आहेत. आज मालवाहतूक करणाऱ्या कोणत्याही ट्रकला वाटेत किती वेळा अडवले जाते याची गणतीच नाही. ट्रकबरोबर असणारी ट्रकची व मालाची कागदपत्रे ‘तपासणे’ हा त्यामागचा दार्शनिक हेतू असला, तरी चालकाकडून पैसा काढणे हाही हेतू असू शकतो. प्रत्येक राज्याचे वेगळे कायदे, त्यानुसार लागणारी आवश्यक कागदपत्रे, दाखले यांची जंत्रीच होऊ शकेल. तीन-चार राज्यांतून जाणाऱ्या ट्रकांसाठी तर हे एवढे गुंतागुंतीचे असते. त्यात केंद्रीय उत्पादन शुल्कवाल्यांची छापा सत्रे आणखी भर टाकतात. मुळात हे सर्व एवढे गुंतागुंतीचे करून ठेवले आहे, की त्या सर्वाचे एकसाथ पालन करणे सर्वस्वी अशक्य आहे. यामुळे प्रत्येक वाहतूक फेरीचा वेळ वाढतो व ‘चहा-पाण्या’चा खर्च वाढतो. या सर्वावर टोल व जकात हे अधिकृत नाके! जागतिक बँकेच्या एका अंदाजानुसार रस्ते वाहतुकीच्या या विलंबाचा देशाला वार्षिक १५०० कोटी रुपयांचा बोजा उचलायला लागतो. या सर्वावर उत्तम उपाय म्हणजे सोपे कायदे, कागदपत्रांची समान आवश्यकता व त्याची प्रभावी व पारदर्शक तपासणी. टोल, जकात यासाठी तंत्रज्ञानाचा, सोप्या देयक पद्धतीचा उपयोगही जरुरी आहे. आज भारतात ७५% ट्रकमालक हे १ ते ४ ट्रकांचे मालक आहेत व बहुतेक चालक अशिक्षित आहेत. यातही बदल होणे आवश्यक आहे. मालकाकडे ट्रक जास्त असतील तर तो प्रभावी प्रणाली वापरून वाहतुकीची गुणात्मक वृद्धी करू शकेल व चांगले प्रशिक्षित चालक हे या सर्व अडथळ्यांवर मात करण्यास सक्षम असतील. आज रस्ते वाहतुकीत वार्षिक ७ ते ८ लाख वाहनांची भर पडते. म्हणजे तेवढय़ा चालकांच्या प्रशिक्षणाची गरज व रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.
वाहतूक उद्योगाचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व जाणून घेताना केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांनी एका व्यापक धोरणाची आखणी करणे जरुरी आहे. कारखान्यातील माल थेट बाजारपेठेत किंवा बंदरात इष्टतम पद्धतीने कसा जाईल यासाठी वेगवेगळी मंत्रालये व वेगवेगळी धोरणे असण्यापेक्षा एकच वाहतूक मंत्रालय व व्यापक सर्वसमावेशक धोरण आखणे जरुरी आहे. पुढच्या २० वर्षांत जवळजवळ ३० ते ४० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आवश्यकता असणाऱ्या या क्षेत्राकडे म्हणूनच अधिक गांभीर्याने पाहणे जरुरी आहे व वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी अनिवार्य आहे.
*लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक    संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय        सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...