३० एप्रिल २०२२

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून उपलब्ध आहे. राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मोगल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.

महाराष्ट्र राज्यःनकाशा
प्राचीनकाळ
संपादन करा
नावाचा उगम
संपादन करा
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे ह्युएनत्संग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु जे चूक आहे ! कारण महार शब्दाचा उल्लेख 12 व्या शतका आधी कोणत्याच साधनांत सापडत नाही ! महाराष्ट्र शब्दाची फोड " महा राष्ट्र " असा होतो ! महारठ्ठ हे महाराष्ट्राचे प्रकृत नाव आहे ! प्राकृत भाषेत रठ्ठ म्हणजे राष्ट्र होय ! काहींच्या मते हे नाव महा-कंतारा (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.

पहिले
संपादन करा
मध्यपाषाणकालामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व ४०००मध्ये धान्याची लागवड तापी नदीच्या खोऱ्यात सुरू झाली. महाराष्ट्रातील जोर्वे येथे जे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमतः सापडले, ते इसवी सन पूर्व १५०० चे आहेत. या संस्कृतीचे नाव त्या गावाच्या नावावरून ठेवले आहे. त्या गावात मुख्यतः रंगवलेली व तांब्यापासून बनवलेली भांडी आणि शस्त्रे सापडली. तेथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. तेथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली होती. ते विविध पिके उगवत होते. तेथील घरे मोठी चौकोनी, चटयांपासून व मातीपासून बनवलेली असत. कोठारांत व कणगीत धान्य साठवत असत. स्वयंपाक दोन कोनी चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस

अश्ववाहक/राऊत समाज
संपादन करा
पहिले नागरिकीकरण
संपादन करा
मौर्य ते यादव
संपादन करा
(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)

मौर्य साम्राज्याचा काळ
संपादन करा
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.

सातवाहन साम्राज्याचा काळ
संपादन करा
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.

वाकाटकांचा काळ
संपादन करा
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.

कलाचुरींचा काळ
संपादन करा
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.

बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ
संपादन करा
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती व राष्ट्रकूटांचा काळ

वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.

यादवांचा काळ
संपादन करा
महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य
संपादन करा

अजिंठातल्या लेणी
महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३ऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर (हे मुंबईच्या उत्तरेस असून आज नालासोपारा या नावाने ओळखले जाते) प्राचीन भारताच्या व्यापाराचे केंद्र होते. या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचीन या ठिकाणी व्यापार होत असे. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स ७८मध्ये गौतमीपुत्र सत्कारणी (शालिवाहन) हा महाराष्ट्राचा राज्यकर्ता होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही चालू आहे. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला. दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मोहंमद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले.मोहंमद बिन तुघलक याने आपली राजधानी दिल्लीहून हलवून दौलताबाद येथे केली.बहमनी सुल्तानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले. १६व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मुघल साम्राज्यांशी संलग्न असलेल्या अनेक इस्लामी राजवटींनी मध्य महाराष्ट्र व्यापलेला होता तर किनारपट्टीवर मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीज यांचा अंमल होता.

मराठा साम्राज्याचा उदय
संपादन करा
Broom icon.svg



Information icon.svg या लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे..
कृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान पहा.

छत्रपती शिवाजी महाराज
महाराष्ट्राच्या इतिहासाला वेगळीच कलाटणी ही १९ फेब्रुवारी १६३०ला मिळाली कारण त्या दिवशी जुन्नर येथील शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला . महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मा वेळी मुघलांचे व आदिलशाहीचे राज्य होते .पण छत्रपती शिवाजी महाराज काही मुटभर मावळे घेऊन नवीन इतिहासाला सुरुवात किली. १६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजे भोसल्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणागड जिंकला आणि १७व्या शतकाच्या मध्यास पश्चिम महाराष्ट्रात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवाजीराजांमुळे प्रथमच विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मोगल साम्राज्याविरोधात स्वतंत्र मराठा राज्य(हिंदवी स्वराज्य) उदयास आले. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांना १६७४ मध्ये राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना औरंगजेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. मोगलांनी संभाजीराजांचे धाकटे बंधु राजाराम यांना दक्षिणेस पिटाळले. राजाराम भोसल्यांनी जिंजी किल्ल्याची दुरुस्ती १८व्या शतकाच्या सुरुवातीस केली, जेव्हा तेथील परिस्थिती सुधारली होती. राजारामांचे पुतणे शाहू भोसले हे १७०८ साली मराठी दौलतीच्या गादीवर बसले. या कामास त्यांचे पेशवे (मुख्य मंत्री) बाळाजी विश्वनाथ यांची साथ मिळाली. राजारामांची विधवा पत्नी ताराबाई यांच्याशी शाहू भोसले यांचे मतभेद होते. चार दशकांनंतर 'छत्रपतींच्या' (भोसले राजघराण्यातील) नावाने राज्यकारभार पाहणाऱ्या पेशव्यांच्या हाती मराठा साम्राज्याची सूत्रे आली. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले.

पेशव्यांचा काळ
संपादन करा
बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव (पहिले) यांनी मराठा राज्य चालव‍ले. त्यांनी मोगल राज्यांकडून कर व सरदेशमुखी व चौथाई यांच्यासारखा सारा वसूल करण्याची प्रथा पाडली. पेशव्यांनी ग्वाल्हेर शिंदेंना, इंदूर होळकरांना, बडोदा गायकवाडांना तर धार पवारांना दिले. पेशव्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली (पानिपत), गुजरात (मेहसाणा), मध्य प्रदेश (ग्वाल्हेर, इंदूर), व दक्षिणेस तंजावरपर्यंत मराठी राज्य वाढविले. इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालींनी पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याचा एकसंधपणा नष्ट झाला व साम्राज्याची अनेक संस्थानांत विभागणी झाली. पेशव्यांचे माजी सरदार आपआपले राज्य सांभाळू लागले तर पुणे पेशवे परिवारांकडे राहिले. भोसल्यांची एक शाखा कोल्हापुरात शाहूच्या काळातच गेली होती तर मुख्य शाखा सातारा येथेच राहिली. कोल्हापूरचे भोसले म्हणजेच राजाराम महाराज यांचे वंशज. त्यांनी इ.स.१७०८ रोजी शाहूंचे राज्य अमान्य केले. १९व्या शतकापर्यंत कोल्हापूरच्या भोसल्यांनी छोट्या भूभागावर राज्य केले.

== ब्रिटिश """

ब्रिटिशांना विरोध
संपादन करा

लोकमान्य टिळक
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स.१७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१८मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांचे राज्य काबीज केले. सध्याच्या महाराष्ट्राचा विदर्भ आणि मराठवाडा सोडून इतर हिस्सा ब्रिटिशांच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा एक भाग होता. बॉंबे प्रेसिडेन्सीला मराठीत मुंबई इलाखा म्हणत. मुंबई इलाख्यात कराचीपासून ते उत्तर कर्नाटक(धारवाड, हुबळी, बेळगांव, कारवार, विजापूर्)पर्यंतचे भूभाग समाविष्ट होते. अनेक मराठी राजे ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य संभाळीत होते. आजचे नागपूर, सातारा व कोल्हापूर हे त्या काळात विविध राजांच्या ताब्यात होते. सातारा इ.स.१८४८ साली मुंबई इलाख्यात तर नागपूर इ.स.१८५३साली नागपूर प्रांतात (व नंतर मध्य प्रांतात) सामील करण्यात आले.. (वऱ्हाड)बेरार हा हैदराबादच्या निजामाच्या राज्याचा एक भाग होता. ब्रिटिशांनी इ.स १८५३ मध्ये बेरार काबीज केले व १९०३ मध्ये मध्य प्रांतात समाविष्ट केले. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांना सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोई-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उगारला, जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद होते.

। सामाजिक पुनर्रचना चळवळ ।
संपादन करा
।।महाराष्ट्र राज्याची निर्मिती ।
संपादन करा

हुतात्मा स्मारक,मुंबई
पहा संयुक्त महाराष्ट्र चळवळ

भारताला इ.स.१९४७ साली स्वातंत्र्य लाभले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरून मराठी-जनात क्षोभ उसळला. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९ व्या शतकापासून विविध मराठी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी व समाजाने सामाजिक उत्क्रांती आणि राजकीय स्वातंत्र्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोलाचे योगदान केले. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागास एकत्र आणले. स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय दृष्ट्या यशस्वी अशा सहकारी चळवळी आणि जातीय गणितातील प्रभुत्वाने काँग्रेस पक्षाचे शासनात वर्चस्व राहिले. राजकीय समीकरणात मराठा समाज व पश्चिम महाराष्ट्र सदैव अग्रणी राहिला. श्री. य. दि. फडके या इतिहासकारांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा काळाचा उद्बोधक आढावा घेतला आहे.

स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचे योगदान
संपादन करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
संपादन करा
स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली. १०७ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

महाराष्ट्राचे स्थान (महाराष्ट्र राजकीय व प्रशासकीय)

महाराष्ट्राचे स्थान (महाराष्ट्र राजकीय व प्रशासकीय)

1 महाराष्ट्र नागरी प्रशासन :-
1.1 १. महानगरपालिका :
1.2 2. नगरपालिका :
1.3 3. कटक मंडळे :
2 महाराष्ट्र ग्रामीण प्रशासन :-
2.1 1) जिल्हा परिषद :
2.2 2) पंचायत समिती : ३५१
2.3 3) ग्राम पंचायती\: २८,३३२ (खेडेगावांची संख्या : ४३,६६३)

स्वातंत्रोत्तर काळात १९५६ मध्ये देशात भाषावर प्रांत रचनेनुसार राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार आंध्रप्रदेश हे भाषिक तत्वावर आधारित पहिले राज्य अस्तित्वात आले. याच पुनर्रचनेनुसार राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. याच पुनर्रचनेने हैद्राबाद संस्थानातील मराठी भाषिक पाच जिल्हे (औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड) व मध्य प्रांतातील विदर्भाचे मराठी भाषिक आठ जिल्हे ( बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, चांदा) व बॉम्बे प्रेसिडेंसिमधील १३ जिल्हे असे २६ जिल्हे आणि गुजरात यांचे मिळून १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. परंतु मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी असल्यामुळे तत्कालीन द्वैभाषिक राज्यामध्ये आंदोलने झाली.

सरतेशेवटी राज्यातील १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मराठी भाषिकांकरिता गुजरात वगळता २६ जिल्हे असणारे महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले.

____________________________

१. महानगरपालिका :

राज्यात तीन लाख लोकसंख्येकरिता महानगरपालिका स्थापन करण्यात येते व या महानगरपालिकांचा कारभार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ यानुसार चालतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेकरिता मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८. राज्यात सध्यस्थितीत २६ महानगरपालिका असून बृहन्मुंबई महापालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे.

विभागमनपा संख्या महापालिकानागपूर 2नागपूर, चंद्रपूर अमरावती 2अमरावती, अकोला औरंगाबाद 4औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड – वाघाळा पुणे 5पुणे, पिंपरी -चिंचवड, सांगली -मिरज – कुपवाडा, सोलापूर, कोल्हापूर नाशिक 5नाशिक, अहमदनगर, मालेगाव, धुळे, जळगाव मुंबई (कोकण)9बृहन्मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण – डोंबिवली, नवी मुंबई, वसई – विरार, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल 

राज्यातील २७वी व कोकण विभागातील ९वी महापालिका रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे नव्याने स्थापन करण्यात आली आहे.

2. नगरपालिका :

राज्यात सद्यस्थितीत २३४ नगरपालिका व १२४ नगरपंचायती असून त्यांचा कारभार महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम १९६५ नुसार चालतो. राज्यातील नगरपालिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात येते.

नागरपरिषदांचे वर्गीकरण लोकसंख्यानिहाय करण्यात येते.

3. कटक मंडळे :

लष्कराची छावणी असलेल्या ठिकाणी कटक मंडळे स्थापन केली जातात. तेथील प्रशासन लष्कराच्या प्रशासकाद्वारे (कटक मंडळ कायदा १९२४ नुसार ) बघितले जातात. सध्यस्थितीत भारतात असणाऱ्या ६२ कटक मंडळांपैकी महाराष्ट्रातील कटक मंडळांची संख्या ७ आहेत.

जिल्हा कटकमंडळे अहमदनगर अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्ड औरंगाबाद औरंगाबाद कॅंटोन्मेंट बोर्ड पुणे देहू रोड, खडकी, पुणे नाशिक देवळाली नागपूर कामठी 

महाराष्ट्र ग्रामीण प्रशासन :-

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील प्रशासनासाठी महाराष्ट्राने त्रिस्तरीय रचनेचा स्वीकार केलेला असून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार राज्यातील ग्रामीण प्रशासनाचे कामकाज चालते.

1) जिल्हा परिषद :

त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था. महाराष्ट्रात सध्यस्थितीत मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून एकूण ३४ जिल्हा परिषद अस्तित्वात आहे.

2) पंचायत समिती : ३५१

3) ग्राम पंचायती\: २८,३३२ (खेडेगावांची संख्या : ४३,६६३)

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग 6महाराष्ट्रातील जिल्हे 36महाराष्ट्रातील तालुके (मुंबई उपनगरसह)358महाराष्ट्रातील महापालिका 27महाराष्ट्रातील नगरपालिका 234महाराष्ट्रातील नगरपंचायती 124महाराष्ट्रातील जिल्हा परिषद 34महाराष्ट्रातील पंचायत समिती 351

___________________________

महाराष्ट्राचे स्थान व विस्तार:


महाराष्ट्राचे नाव, स्थान व विस्तार

महाराष्ट्र या शब्दाचा उगम : प्राचीन काळी महाराष्ट्राचा समावेश दक्षिणापथ किंवा दंडकारण्याच्या प्रदेशात होत असे. ढोबळमानाने दक्षिणापथ दंडकारण्य व  महाराष्ट्र हे एकच भौगोलीक प्रदेश मानले जात.

सर्वसाधारणपणे महाराष्ट्र हा शब्द चौथ्या दशकापासून वापरात आलेला आढळतो.
इ.स. ३६५ : मध्य प्रदेशातील  ‘ऐरण’ गावातील स्तंभालेखात महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख आढळतो.
इ.स. ५0५: बृहत्‌संहितेच्या ( वराहमिहीर) १0 व्या अध्यायात    महाराष्ट्र शब्दाचा उल्लेख.
७ वे शतक : जैन मुनी संघदास गणीने बृहतकल्प भाष्यात महाराष्ट्राच्या कोल्लक परंपरेचा उल्लेख केला आहे.
८ वे शतक : मरहट्ट लोकांचे वर्णन ‘कुवलयमाला’ या काव्यग्रंथात केलेले आढळते. सम्राट अशोकचा नातू संप्रती याने देखील महारठ्ठ(महाराष्ट्र) असा उल्लेख केला आहे.
महानुभव वाङमय  : प्राचीन काळी दक्षिणेकडे आलेल्या लोकांनी  गोंड, मल्ल, पांडू, अपरान्त, विदर्भ व अश्मक अशी सहा राष्ट्रे वसवली. ही सहा राष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र तयार झाले असावे. महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र असा महानुभाव वाङमयात उल्लेख आढळतो.

महाराष्ट्राचे स्थान व विस्तार:

महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्‍चिम व मध्य भागात वसलेले आहे.

अक्षवृत व रेखावृत्तीय विस्तार :

अक्षवृत्तीय विस्तार – 15° 08′ 46″ उत्तर ते 22°2’13” उत्तर.

रेखावृत्तीय विस्तार – 72°16′ 45″ पूर्व ते 80°9’17” पूर्व.

महाराष्ट्र विविध परीक्षा साहित्य.

महाराष्ट्राचा आकार – महाराष्ट्राचा आकार काटकोन त्रिकोणासारखा आहे.  महाराष्ट्राचा आकार दक्षिणेकडे अरुंद आहे, तर उत्तरेकडे विस्तृत स्वरुपाचा आहे.

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ – महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, महाराष्ट्र राज्याचे एकुण क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36%एवढे क्षेत्र महाराष्ट्राने व्यापलेले आहे.

लांबी व रुंदी – महाराष्ट्राची पूर्व-पश्‍चिम लांबी 800 कि.मी. व उत्तर-दक्षिण रुंदी 700 कि. मी. आहे.

___________________________

महाराष्ट्र स्थान- विस्तार- सीमा- लोकसंख्या
महाराष्ट्र स्थान- विस्तार- सीमा- लोकसंख्या (Maharashtra General Information Short Notes)
१) महाराष्ट्र राज्याची स्थापना: १ मे १६३०

२) महाराष्ट्राचे स्थान व विस्तार:

अक्षांश: १५.८° उत्तर ते २२.१° उत्तर
रेखांश: ७२.६° पूर्व ते ८०.९° पूर्व

शेजारील राज्य :

पूर्वेस- छत्तीसगड , आग्नेयेस – आंध्रप्रदेश, दक्षिणेस- कर्नाटक आणि गोवा, उत्तरेस- मध्यप्रदेश, पश्चिमेस- अरबी समुद्र, वायव्येस- दादरा, नगर हवेली व गुजरात.

३) दक्षिणोत्तर अंतर    : सुमारे ७०० कि.मी.

४) पूर्व-पश्चिम अंतर    : सुमारे ८०० कि.मी.

५) समुद्र किनारा      : ७२० कि.मी.

६) राजधानी        : मुंबई

७) उपराजधानी         : नागपूर

८) प्रशासकीय विभाग     : सहा

९) प्रादेशिक विभाग     : चार

१०) एकूण जिल्हे         : ३६

११) जिल्हा परिषदा     : ३४ (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जिल्हा परिषद नाहीत)

१२) तालुके         : ३५५

(खालील माहिती २०११ च्या जणगणनेनुसार आहे)

१३) महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या     : ११,२३,७२,९७२

१४) महाराष्ट्राची पुरुष लोकसंख्या     : ५,८३,६१,३९७

१५) महाराष्ट्रातील स्त्री लोकसंख्या     : ५,४०,११,५७५

१६) महाराष्ट्रातील पुरुष-स्त्री प्रमाण : १०००:९१५

१७) लोकसंख्येची घनता         : ३६५ व्यक्ती प्रती चौरस किलोमीटर

१८) लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात क्रमांक:    दुसरा

१९) महाराष्ट्रातील एकूण साक्षरता     : ८२.९१%

२०) पुरुष साक्षरता         : ८९.८२%

२१) स्त्री साक्षरता         : ७५.४८%

२२) ग्रामीण साक्षरता         : ७७.०९%

२३) नागरी साक्षरता         : ८९.८४%

२४) ग्रामीण लोकसंख्या         : ५४.७७%

२५) नागरी लोकसंख्या         : ४५.२३%

२६) महाराष्ट्राचा राज्यपक्षी     : हरियाल (कबुतराच्या जातीचा एक पक्षी)

२७) महाराष्ट्राचा राज्यप्राणी    : शेकरू (मोठी खार)

२८) महाराष्ट्राचा राज्य वृक्ष     : आंबा

२९) महाराष्ट्राची राजभाषा         : मराठी

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...