२५ एप्रिल २०२२

लोकसंख्या

लोकसंख्या


1 लोकसंख्या एक साधन संपदा
2 लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक :
2.1 1)  नैसर्गिक घटक :
2.2 2) आर्थिक घटक :
3 लोकसंख्येची संरचना :
3.1 अ) वय संरचना :
3.2 ब ) साक्षरता :
3.3 क ) लिंग गुणोत्तर :
3.4 लोकसंख्येची घनता :
3.5 लोकसंख्येचे घनतेनुसार वितरण
3.6 इ ) स्थलांतर:
3.7 ई ) कुटुंबाचा आकार :
3.8 फ) अनुसूचित जातींची लोकसंख्या :
3.9 भ) अनुसूचित जमातींची लोकसंख्या :
4 महाराष्ट्रातील आदिवासी
4.1 1) भिल्ल :
4.2 2) गोंड :
4.3 3) कातकारी :
4.4 4) कोरकू :
4.5 5)  वारली :

लोकसंख्या

राज्यांच्या सहकार्यान केंद्र शासनामार्फत दर दहा वर्षांनी जनगणना  घेण्यात येते व याद्वारे लोकसंख्येबाबत व्यापक माहिती उपलब्ध होते. सन 2011 मध्ये घेण्यात आलेली जनगणना  ही मालिकेतील 15वी  असून त्यानुसार राज्याची लोकसंख्या 11 24 कोटी तर त्यातील स्त्रियांचे प्रमाण 48.1% आहे. राज्याचा दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर 2001 – 2011 या कालावधीत 6.7% अंकांनी कमी झाला असून राष्ट्रीय पातळीवर तो 3.8 %  अंकांनी कमी झाला आहे. राज्यांमध्ये दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर मध्ये नोंदवली गेलेली ही सार्वत्रिक घट आहे.

लोकसंख्या एक साधन संपदा
लोकसंख्या एक नैसर्गिक संसाधन आहे. लोकसंख्येची गुणवत्ता ही कार्यक्षमता, साक्षरता, बुद्धिमत्ता यावर अवलंबून असते. कोणत्याही देशातील उद्योगधंदे, शेती, व्यापार, खाणकाम, संरक्षणासाठी व व्यवसायाची प्रगती ही तेथील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. लोकसंख्येमुळे देशाला संरक्षणासाठी मानवी शक्ती प्राप्त होते
महाराष्ट्रातील जल, भूमी, वने, खनिजे व प्राणी संसाधने इत्यादींचे वितरण अत्यंत असमान आहे. या संसाधनांना महत्त्व केवळ मानवामुळे प्राप्त झाले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.  इ. स.  2011 च्या जनगणनेनुसार  महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11, 23, 72, 972 इतकी आहे. यामध्ये एका 51.9 % पुरुष व 48. 1% स्त्रिया आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9. 29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.
लोकसंख्येची वाढ

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थळ निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 4 कोटी होती. त्यानंतर गेल्या 50 वर्षांमध्ये उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, पर्यटन, शेती यांच्या विकासामुळे जीवनात स्थिरता आली. रोजगारांच्या निर्मितीमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात स्थलांतर झाले. त्यामुळे लोकसंख्येत सतत वाढ झाली आहे.
दारिद्र्य, निरक्षरता, कुटुंबनियोजनाचा अपुरा प्रचार यामुळे जन्म दर जास्त आहे तर वैद्यकीय सुविधा, अन्नधान्याचा पुरवठा, साथीच्या रोगांवर नियंत्रण इत्यादींमुळे मृत्यूदर कमी होऊन महाराष्ट्रातील लोकसंख्येची वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा वेग भारताच्या लोकसंख्या वाढीपेक्षा कमी आहे. 1961 ते 1971 च्या काळात महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर 27.45% इतका होता. तर भारताचा 24.8% होता. 1981 ते 1991 या काळात महाराष्ट्राच्या लोकसंख्या वृद्धीदर 25.73% इतका होता. यावेळी भारताचा लोकसंख्या वृद्धीदर 23. 85% होता. 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर वेग 15.99 % आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 35.94% आहे. मुंबई मध्ये  सर्वात कमी लोकसंख्या वृद्धीदर (-) 7.57% नोंदला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रथमच हा दर ऋणात्मक आहे.
लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक :
महाराष्ट्रात लोकसंख्येचे वितरण असमान आहे. कोकण,पश्‍चिम महाराष्ट्रात लोकसंख्या जास्त असून औरंगाबाद व नागपूर विभागामध्ये लोकसंख्या विरळ आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या (9.84%) असून सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग (0.08%) जिल्ह्यात आहे. लोकसंख्येच्या वितरणावर मुख्यत्वे नैसर्गिक आर्थिक व सामाजिक घटकांचा परिणाम होतो.

1)  नैसर्गिक घटक :
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दक्षिण-उत्तर सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. सह्याद्री पर्वत व त्यापासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे तसेच कोकणामध्ये उंच-सखल भूप्रदेश व दाट वने व तसेच पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही वनक्षेत्र जास्त असल्याने लोकसंख्या कमी आढळते. महाराष्ट्र पठारावर सह्याद्रीच्या पूर्व भागात, नद्यांचा मैदानी भागात अनुकूल हवामान व सुपीक मृदा यामुळे लोकसंख्या दाट आढळते.

2) आर्थिक घटक :
मुंबई – पुणे, कोल्हापूर – इचलकरंजी, औरंगाबाद – जालना व नागपूर विभाग या प्रदेशात वाहतूक, उद्योगधंदे, व्यापाऱ यांचा विकास झाल्याने लोकसंख्या दाट आढळते. पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचन सुविधांमुळे शेतीचा विकास झाला असल्यामुळे तसेच पूर्व महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या खनिजांची उपलब्धता असल्याने तेथे जास्त लोकसंख्या आढळते.

लोकसंख्येची संरचना :
लिंग गुणोत्तर, वय संरचना,  साक्षरता, व्यवसाय, ग्रामीण-शहरी यावरून लोकसंख्येची रचना ठरते. जनगणनेतून उपलब्ध लोकसंख्येच्या रचनेची माहिती मिळते. या माहितीचा उपयोग लोकसंख्येची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजनासाठी करता येतो.

अ) वय संरचना :
लोकसंख्येचे वयोगटानुसार विभाजन करता येते. सामान्यपणे 0 ते 14 वयोगट व 60 पेक्षा जास्त वयोगट वृद्धांचा (परावलंबी) समजला जातो तर 15 ते 59 वयोगट कार्यक्षम समजला जातो.  वय रचनेवरून राज्यात किती श्रमशक्ती उपलब्ध आहे व किती परावलंबी लोकसंख्या आहे याची माहिती मिळते तसेच नियोजन व विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी लोकसंख्येची वय रचना माहित असणे आवश्यक असते.

सामान्यपणे जन्मदर, मृत्युदर, स्थलांतर इत्यादी घटकांचा परिणाम वय रचनेवर होतो. इ.स.  2001 च्या जनगणनेनुसार काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण 42% तर काम न करणाऱ्यांचे प्रमाण 58% होते. यामुळे आपल्या राज्यात कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे. तसेच 50% मुलांचे प्रमाण व 8% वृद्धांचे प्रमाण आहे.

जनगणना 2011 नुसार राज्यातील सुमारे 20% लोकसंख्या किशोरवयीन गटातील (वय 10 ते 19 वर्षे) असून युवा गटाचे वय (वय 15 ते 24 ) प्रमाणही सारखेच आहे.

किशोरवयीन लोकसंख्येचे प्रमाण नंदुरबार जिल्हा मध्ये सर्वाधिक (23%) असून मुंबई शहरात सर्वात कमी (16.1%) आहे.

युवा लोकसंख्येचे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक (20.5%) सिंधुदुर्गमध्ये ते सर्वात कमी (16.5%) आहे.

जनगणना 2011 नुसार राज्याची सुमारे 9.9% लोकसंख्या 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय गटातील असून 2001 मध्ये हे प्रमाणात 8.7% होते.

राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण 2001 व 2011 करिता अनुक्रमे 7.4% व 8.6% आहे.  राज्यामध्ये 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींची सुमारे 5.12 लाख एक सदस्य कुटुंबे आहेत तर राष्ट्रीय पातळीवर अशा कुटुंबांची संख्या 49. 76 लाख आहे.

राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण भागांमध्ये 60 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींचा एक सदस्य कुटुंबांची संख्या अधिक आहे.

महाराष्ट्र
अनुक्रमांक क्षेत्र कुटुंबे पुरुष स्त्रिया
1.एकूण 5.161.163.97
2.ग्रामीण 3.680.762.93
3.नागरी 1.480.401.04
भारत
अनुक्रमांक क्षेत्र कुटुंबे पुरुष स्त्रिया
1.एकूण 49.7613.5236.24
2.ग्रामीण 38.3610.3528.02
3.नागरी 11.403.178.22
ब ) साक्षरता :
साक्षरता हे प्रगत समाजाचे लक्षण आहे. महाराष्ट्रात 83% लोक साक्षर असून स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण 67.5% आहे तर पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण 80.2% आहे, तर मुंबई व मुंबई उपनगर मध्ये पुरुष साक्षरतेचे प्रमाण 87% आहे. कारण हा पूर्णपणे नागरी विभाग आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील साक्षरतेचे प्रमाण महाराष्ट्राच्या सरासरी साक्षरते इतकी आहे तर मध्य महाराष्ट्र व पूर्व महाराष्ट्र विभागांमध्ये हे प्रमाण कमी आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार या जिल्ह्यांत  आदिवासी जमातींचे प्रमाण जास्त असल्यामुळे साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे.

राज्यातील साक्षरतेचे प्रमाण 2001 मधील 76.9% पासून 2011  मध्ये 82.3% पर्यंत वाढले आहे. या कालावधीकरिता स्त्री-साक्षरता दरांमधील वाढ (8.9%) आहे. ही पुरुष साक्षरता दरापेक्षा (2.4%) अधिक आहे. स्त्री – पुरुष साक्षरता दरामधील तफावत 2001 मधील 18.9% वरून 2011 मध्ये 12.5% पर्यंत कमी झाली आहे. राज्यातील ग्रामीण व नागरी भागातील साक्षरतेचे प्रमाण अनुक्रमे 77% व  88.7% आहे.  साक्षरता दरातील ग्रामीण- नागरी तफावत देखील 2001 मधील 15.1% वरून 2011 मध्ये 11.7% पर्यंत कमी झाली आहे.

क ) लिंग गुणोत्तर :
एखाद्या लोकसंख्येत स्त्रियांची संख्या दर हजार पुरुषाबरोबर किती अशा स्वरूपात लिंगगुणोत्तर सांगता येते. लिंगगुणोत्तरावरून लोकसंख्येची सामाजिक स्थिती समजते.ज्या लोकसंख्येत स्त्री-पुरुषांना समान दर्जा असतो  तेथे हे प्रमाण हजाराच्या जवळ असते. महाराष्ट्रात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कमी आहे.

महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षांमध्ये लिंग गुणोत्तर 992 वरून 929 वाढलेले आढळते. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर रत्नागिरी जिल्ह्यात (1122) आहे. कारण येथून पुरुषांचे व्यवसायानिमित्त स्थलांतर जास्त होते तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहर (838) जिल्ह्यात आहे. मुंबईकडे अन्य राज्यांतून व्यवसायानिमित्त पुरुषांचे होणारे स्थलांतर जास्त आहे.

संपूर्ण लोकसंख्येचे लिंगगुणोत्तर निर्धारित केले जाते त्याचप्रमाणे अलीकडे 0 ते 6 या वयोगटासाठी देखील बाल लिंग गुणोत्तर काढले. याचा उपयोग व भविष्यकाळातील लोकसंख्येचे अंदाज करण्यासाठी होतो तसेच तो लोकसंख्येच्या एक सामाजिक निकष मानला जातो. महाराष्ट्रात या वयोगटातील लिंग गुणोत्तर 894 इतके आहे. सर्व राज्यातील सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर गडचिरोली (961) जिल्ह्यात आहे. तसेच सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर बीड (807) जिल्ह्यात आहे.

बाल लिंग गुणोत्तर प्रमाण :
राज्यातील बाल लिंग गुणोत्तर प्रमाण 2001 मधील 913 वरून 19 कमी होऊन 2011 मध्ये 894 झाले आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2011 मध्ये हे प्रमाण सर्वात कमी 807 असून वर्ष 2001 ते 2011 या कालावधीमध्ये 86 गुणांची मोठी घसरण नोंदविली आहे. सन 2001 ते 2011 या कालावधीत कोल्हापूर (863), सातारा (895),  सांगली (867) आणि चंद्रपूर (953) जिल्ह्यांमध्ये बाल लिंग गुणोत्तर प्रमाणामध्ये किंचित सुधारणा झाली आहे.

तिसरा लिंग गट :
जनगणनेमध्ये इतर या तिसऱ्या लिंग गटाच्या 2011च्या जनगणनेत प्रथम समावेश करण्यात आला आहे. या गटामध्ये किन्नर लोकसंख्येसह ज्या व्यक्ती इतर गटांमध्ये नोंद करून घेण्यास इच्छुक आहेत. अशांचाही समावेश करण्यात आला आहे. जनगणना 2011 नु सार राष्ट्रीय पातळीतील सुमारे 4.88 लाख व्यक्तींची नोंद या गटांमध्ये करण्यात आली असून त्यापैकी 8.4%  व्यक्ती  राज्यामध्ये आहे. राज्यातील या गटाचा कार्य सहभाग दर 38 असून राष्ट्रीय पातळीवर तो 34 आहे.

लोकसंख्येची घनता :
एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावरून दर चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात याचे प्रमाण काढता येते. या प्रमाणास लोकसंख्येची घनता असे म्हणतात.

लोकसंख्येची घनता = एकूण लोकसंख्या / एकूण क्षेत्रफळ
महाराष्ट्राची  घनता = 11,23,72,972 / 3,07,713 = 365.18
महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर असून लोकसंख्या 11, 23, 72, 972 इतकी आहे त्यामुळेच राज्याची सरासरी घनता लोकसंख्या घनता 365 इतकी आहे.

लोकसंख्येचे घनतेनुसार वितरण
1)   अतिविरळ घनतेचे प्रदेश: ( 150 पेक्षा कमी लोकसंख्या)
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता अत्यंत विरळ आहे. या जिल्ह्यात वनक्षेत्र जास्त असून आदिवासी लोकांचे अधिक प्रमाण आहे. शेती, वाहतूक व उद्योगांचा विकास न झाल्याने या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता अतिविरळ आहे.

2) विरळ घनतेचे प्रदेश: (151 ते 300 लोकसंख्या )
पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पर्जन्यछायेचा प्रदेश आढळतो. त्यामुळे धुळे, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये विरळ लोकवस्ती आढळते. राज्याच्या पूर्व भागात डोंगराळ  आणि वनांचा प्रदेश असल्याने भंडारा,गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांत लोकसंख्या विरळ आढळते तर अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, हिंगोली, परभणी जिल्ह्यांमध्ये शेती उत्पादनातील अनिश्चितता व भटक्या जाती -जमातीचे प्रमाण जास्त असल्याने लोकसंख्या विरळ आढळते.

3) मध्यम घनतेचे प्रदेश: (301 ते 450 लोकसंख्या)
पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांबरोबरच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत लोकसंख्येची घनता मध्यम आढळते या प्रदेशांमधे शेती हा प्रमुख व्यवसाय असून औद्योगिकरणात प्रगती होत आहे.

4) जास्त घनतेचे प्रदेश: (451 ते 600 लोकसंख्या)
यामध्ये नागपूर व कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती भागात असून वाहतूक मार्गाचे केंद्र आहे तर कोल्हापूर जिल्हा शेती व औद्योगिक उत्पादनात विकसित असल्याने तेथे लोकसंख्येची घनता जास्त आहे.

5) अति जास्त घनतेचे प्रदेश: ( 601 पेक्षा जास्त लोकसंख्या)
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे या जिल्ह्यांची लोकसंख्येची घनता दर चौरस  किलोमीटरला 600 पेक्षा जास्त आहे.

मुंबई हे एक नैसर्गिक बंदर, महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये तंत्रज्ञान व वाहतुकीचा विकास झाल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या प्रदेशांकडे लोकसंख्येचे स्थलांतर झाल्याने लोकसंख्येची घनता अती जास्त आहे.

इ ) स्थलांतर:
स्थलांतर ही प्रक्रिया असून स्थलांतरामुळे व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अल्प काळ किंवा दीर्घ काळासाठी वास्तव्यास जातात. सामान्यपणे नैसर्गिक आपत्ती, व्यवसाय, युद्ध, बदली, शिक्षण, विवाह, पर्यटन इत्यादी कारणांमुळे लोक स्थलांतर करतात.
महाराष्ट्रामध्ये, मोठ्या शहरांमध्ये परराज्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालेले आहे तसेच महाराष्ट्रात ग्रामीण भागातून ग्रामीण भागाकडे असे स्थलांतर प्रामुख्याने शेतमजुरांच्या स्थलांतरातून आढळते. जलसिंचित भागाकडे इतर भागातून मजुरांचे स्थलांतर होते. विवाहामुळे स्त्रियांचे स्थलांतर होते. ग्रामीण भागातील समस्यांमुळे रोजगार मिळवण्यासाठी, शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय सुविधांसाठी लोक स्थलांतर करतात.
लोक ज्या भागातून स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या कमी होऊन मनुष्यबळाची कमतरता जाणवते, तर लोक ज्या भागात स्थलांतर करतात तेथे लोकसंख्येची घनता वाढून सामाजिक सेवा सुविधांवर ताण पडतो.
ई ) कुटुंबाचा आकार :
राज्यामध्ये सामान्य कुटुंबाची ज्यात बेघर व संस्थानांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचा समावेश नाही.
महाराष्ट्रात कुटुंबसंख्या 2. 43% कोटी असून त्यामध्ये 98. 9% लोकसंख्या आहे.
राज्यातील सामान्य कुटुंबांचा सरासरी आकार अनुक्रमे 4.5 ते 4.7 आहे.
अखिल भारतीय स्तरावर सामान्य कुटुंबात सरासरी आकार 4.8 असून तो अजा व अज प्रवर्गासाठी देखील सारखाच आहे.
फ) अनुसूचित जातींची लोकसंख्या :
जनगणना 2011 नुसार राज्यातील अजा प्रवर्गातील 1.33 कोटी ( एकूण लोकसंख्येच्या 11.8%) आहे. अजा प्रवर्गाच्या लोक संख्येतील (2001 ते 2011 या कालावधीतील) दशवार्षिक वाढ 34.3% आहे.

अजा प्रवर्गाच्या लोकसंख्येतील साक्षरतेचा दर 2001 मधील 71.9% वरून 2011 मध्ये 76% पर्यंत वाढला आहे.

भ) अनुसूचित जमातींची लोकसंख्या :
जनगणना 2011 नुसार राज्यातील अज प्रवर्गातील लोकसंख्या 1.05 कोटी (एकूण लोकसंख्येच्या 9.4%) आहे.

अज प्रवर्गाच्या लोकसंख्येतील (2001 ते 2011) दशवार्षिक वाढ 22.5% आहे. अज प्रवर्गाच्या लोकसंख्येतील साक्षरतेचा दर 2001 मधील 55. 2  वरून 2011 मध्ये 65.7% पर्यंत वाढला आहे.

वर्तमान स्थितीतील महाराष्ट्राची लोकसंख्या (महाराष्ट्र आर्थिक पाहणी – 2015 – 16)
क्रमांक जनगणना वर्षे
(दशक)

लोकसंख्या
(कोटीत )

दशवार्षिक वाढ साक्षरता प्रमाण लिंग प्रमाण घनता दर
चौ. किमी

नागरीकरण प्रमाण
1.19613.9623.6%35.1%93612928.2%
2.19715.0427.5%45.8%93016431.2%
3.19816.2824.5%57.2%93720435.0%
4.19917.8925.7%64.9%93425738.7%
5.20019.6922.7%76.9%92231542.4%
6.201111.2415.99%82.3%92936545.2%
महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे दशक1961 – 7127.45%
महाराष्ट्राचे सर्वात कमी लोकसंख्या वाढीचे दशक1911-21(-2.91%)
महाराष्ट्राचे 2001- 11 लोकसंख्या वाढीचा दर15.99%
महाराष्ट्रातील लोकसंख्या प्रमाण (भाषेनुसार )
क्रमांक भाषा प्रमाण
1.मराठी 72.21%
2.हिंदी 11.57%
3.उर्दू 7.47%
4.गुजराती 2.51%
5.तेलगू 1.52%
6.कन्नड 1.36%
7.सिंधी 0.77%
8.तामिळ 0.57%
9.मल्याळम 0.44%
10.बंगाली 0.34%
महाराष्ट्राच्या लोकसंख्येची तुलनात्मक माहिती (2011) :
क्रमांक घटक महाराष्ट्र सर्वात मोठा जिल्हा सर्वात लहान जिल्हा
1)क्षेत्रफळ (चौ. किमी) 307713 अहमदनगर – 17034
पुणे – 15637

नाशिक – 15539

मुंबई शहर – 157
मुंबई उपनगर – 446

भंडारा – 3890

2)लोकसंख्या 11.23 कोटी पुणे – 94.26 लाख
मुंबई उपनगर – 93.32 लाख

ठाणे – 88.19 लाख

सिंधुदुर्ग – 8.48 लाख
गडचिरोली – 10.71 लाख

हिंगोली – 11.78 लाख

3)दसवार्षिक वाढ 15.99%ठाणे – 35.94%
पुणे – 30.34%

औरंगाबाद – 27.80%

मुंबई शहर – -7.60%
रत्नागिरी – -4.80%

सिंधुदुर्ग – -2.20%

4)घनता (दर चौ. किमी) 365मुंबई उपनगर – 20980
मुंबई शहर – 19652

ठाणे – 1157

गडचिरोली – 74
सिंधुदुर्ग – 163

चंद्रपूर – 193

5)साक्षरता 82.34%मुंबई उपनगर – 89.90%
मुंबई शहर – 89.20%

नागपूर – 88.40%

नंदुरबार – 64.40%
जालना – 71.50%

धुळे – 72.80%

6)लिंगप्रमाण दर 929रत्नागिरी – 1122
सिंधुदुर्ग – 1036

गोंदिया – 999

मुंबई शहर – 832
ठाणे – 858

मुंबई उपनगर – 860

7)लिंगप्रमाण दर (0 ते 6 वयोगट )894गडचिरोली – 961
गोंदिया – 956

चंद्रपूर – 953

बीड – 807
जळगाव – 842

अहमदनगर – 852

महाराष्ट्रातील आदिवासी
महाराष्ट्रातील पर्वतीय प्रदेश व जंगलाच्या परिसरात प्राचीन आदिम जमातीचे लोक राहतात. सर्वसामान्यपणे त्यांना आदिवासी म्हणून ओळखले जाते. मानवी समाजात सांस्कृतिक परंपरेच्या  दृष्टिकोनातून त्यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. विभिन्न प्रकारच्या नैसर्गिक पर्यावरणात राहत असूनही या लोकांनी आपली संस्कृती व समाज व्यवस्था यांचे जतन केले आहे. भौगोलिक दृष्ट्या एकाकी पडल्यामुळे त्या प्रदेशाबाहेर मानवी विकासापासून ते वंचित झालेले आहे. पुढे महाराष्ट्रातील काही प्रमुख जमातीचे वैशिष्ट्ये दिलेली आहे.

1) भिल्ल :
प्राचीन काळी मध्यपूर्व आशियातून आलेल्या प्रोटो आॅस्ट्राॅलाॅईड लोकांचे भिल्ल हे वंशज होत. काही मानववंशशास्त्रज्ञांच्या मते भिल्ल जमात भारतातील प्राक – द्रविड जमातीपैकी एक असावी, असे मानले जाते. या जमातीची महाराष्ट्रात वस्ती प्रामुख्याने उत्तर सह्याद्री डोंगर रांगा व सातपुडा डोंगर रांगात आढळते. या ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होतो. भिल्ल जमातीचे लोक जंगलात राहून शिकार करतात. हजारो वर्षापासून हा व्यवसाय असल्याने नैसर्गिक पर्यावरण यांचा जवळचा संबंध आहे.

भिल्ल जमात आजही रानटी अवस्थेत राहतात. ते शरीराने धडधाकट व खुजे असतात. ते  रुंद नाकाचे, काळ्या रंगाचे असून त्यांचे शरीर राकट आहेत. त्यांचे केस द्रविड लोकांप्रमाण लांब असतात. भिल्ल स्त्रिया उजळ रंगाच्या व बांधेसूद असतात. भिल्ल अत्यंत विश्वासाने वागतात. कुठलीही दगाबाजी करत नाहीत. ते अत्यंत धाडसी व शूरवीर असतात.

1857 च्या उठावात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांचे प्रमुख व्यवसाय शेती, शिकार, पशुपालन व वन्य पदार्थ जमा करणे इत्यादी आहेत.

2) गोंड :
गोंड ही जमात भारतातील सर्वात मोठी व प्राचीन आदिवासी जमात आहे. महाराष्ट्रात या जमातीचे अस्तित्व पूर्व विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते. द्रविडियन आणि इंडो-आर्यन लोकांच्या दरम्यान असणाऱ्या गुंतागुंतीच्या वांशिक पद्धतीतून या जमातीची निर्मिती झाल्याचे मानले जाते.

गेल्या काही शतकात महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात गोंडांना खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. गोंड लोकांची सत्ता ज्या भूमीवर होती तिला गोंडवाना भूमी म्हणत. गोंडराजे एकेकाळी शासक म्हणून होते. गोंड ही आदिवासी जमात इमानदार, शक्तिशाली, सरळ प्रवृत्तीची निर्भय जमात आहे.

या जमातीतील लोकांची शारीरिक वैशिष्ट्ये मध्यम उंची, काळा रंग, चपटा व बसका चेहरा, मध्यम आकाराचे डोळे, निग्रो प्रमाणे बसके, रुंद नाक, दाट काळे व कुरळे केस आहेत.

या जमातीत विवाह वराच्या घरी होतात. विवाहाचे वेळी भोजन, मद्यपान व समूह नृत्य असते. गोंड स्त्रियांना स्वातंत्र्य असते. त्यांच्या विवाहपूर्व संबंधांबाबत आक्षेप घेतला जात नाही. गोंडांची युवागृहे विशेष प्रसिद्ध आहे त्यांनाच गोटुल म्हणतात. गोटुल मध्ये रात्री गोड तरुण-तरुणी एकत्र जमतात. त्यातून त्यांचे प्रेम संबंध व लैंगिक संबंधही जूळतात. अशांचेच विवाह करून देतात.

3) कातकारी :
काथोडी या नावाने ओळखली जाणारी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रहाणारी एक जमात आहे. सह्याद्रीत रायगड, ठाणे, नाशिक, पुणे या जिल्ह्यांत डोंगराळ व उंच पठाराच्या प्रदेशात वसाहत करून राहत. गावापासून दूर नदीकाठी अगर डोंगरकपारीत  त्यांची वसाहत असते. म्हणून ही खरीखुरी अरण्यवासी जमात आहे.

एका कातवाडीत 15 ते 50 झोपड्या असतात. शिकार करणे, कोळसा पाडणे, कंदमुळे व वाळलेली लाकडे गोळा करून खेडोपाडी विकणे, गोड्या पाण्यात मासेमारी करणे, शेतावर मोलमजुरी करणे इत्यादींची त्यांची व्यवसाय आहे. हे लोक निष्णात शिकारी असून तिरंदाजीतील त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे ते शिकारीसाठी धनुष्याचा वापर करतात.

कातकरी हा वर्णाने काळा, मध्यम उंचीचा, पिंगट काळ्या व विरळ केसांचा सरळ, उंच व किंचित पुढे आलेल्या कपाळाचा,  दबलेल्या अशा सरळ नाकाचा, रुंद तोंडाचा, लहान हनुवटीचा, सडपातळ पण रेखीव असा असतो. तो अत्यंत बळकट व चिवट पण तेवढाच आळशी असतो. स्त्रिया उंच व सडपातळ असतात.

या जमातीतील पुरुष अंगात बंडी, कमरेला लंगोटी व डोक्याला फटकूर असा सर्वसाधारण वेश असतो, तर स्त्रिया आखूड लुगडी व चोळी घालतात. काचमण्याच्या माळा, पोथी,  बांगड्या व कर्णफुल घालण्याची त्यांना आवड असते.

कातकऱ्यांची भाषा मुळात भिल्ली भाषा आहे. ही जमात महाराष्ट्रात अनेक शतकापासून राहत असल्याने ती मराठीच्या वळणावर गेली आहे.

4) कोरकू :
ही जमात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतात आढळते महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील गाविलगड डोंगराच्या मेळघाट परदेशात मोठ्या प्रमाणात आढळते. कोरू याचा अर्थ माणूस कोरकू याचा अर्थ माणसे असा होतो. कोरकू जमात कोल उर्फ मुंडा मानव वंशाचे एक शाखा समजतात.

लढवय्या पणा बदल व कोरकू स्त्री लुटमारी करण्याबद्दल ख्याती आहे.

कोरकूंच्या लग्नात बोरीच्या झाडाचे महत्व फार आहे. लग्न लागण्यापूर्वी नवरदेव व त्याचे आई-वडील बोरीच्या झाडाजवळ जातात. पुजारी त्यांना दोरीने झाडाला गुंडाळतात. नंतर एक कोंबडा मारून त्याचे रक्त झाडाच्या मुळाशी शिंपडतात व त्या झाडाभोवती सात फेरे घेतले जातात व अशाप्रकारे विवाह होतो.

5)  वारली :
महाराष्ट्रात या जमातीचे प्रमुख वस्ती ठाणे, नाशिक, पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. वरुड या शब्दावरून वरुडाई   – वारली – वारूली अशी शब्दाची उत्पत्ती झाली. वारल्यांची खेडी विखुरलेल्या झोपड्यांच्या गटागटाने वसलेली असतात. या वस्तीच्या गटाला पाडा म्हणतात.  शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. झोपडीच्या परिसरात पालेभाज्या, सुरण, अळू, मका, भोपळा, मिरची यादी फळ भाज्या लावल्या जातात.

वारली जमातीचे वर्ण उजळ, मोठे नाक, पिंगट तपकिरी डोळे, काटक देहयष्टी व मध्यम उंची ही वारले यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये आहे. पुरुष शेंडी ठेवतात आणि कुडते व लंगोटी लावतात. लुगडे कमरेला 3 वेढे  देऊन गुडघ्यापर्यंत नेसतात आणि गाठीची चोळी घालतात.

क्रमांकविभागआदिवासी जमाती
1.सह्याद्री विभाग
(ठाणे, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, पालघर)

महादेव कोळी, कोकण, ठाकर, वारली, कातकरी, मल्हार कोळी, ढोर कोळी
2.सातपुडा विभाग
(धुळे, जळगाव, नंदुरबार, अमरावती)

भिल्ल, गावित, पारधी, धानका, पावरा, हुबळा, कोलम, तडवी, कोरकू, माबची, ढानका, गोंड
3.गोंडवन विभाग
(भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड)

गोंड, पराधन, कोया, माडिया गोंड, आंध, हलबा, करवा
महाराष्ट्र : अनुसूचित जमाती
क्रमांक जिल्हे जमाती
1)रायगड ठाकर, वारली, कातकरी
2)पालघर व ठाणे वारली, पारधी, महादेव कोळी, ठाकर
3)पुणे कातकरी, ठाकर, महादेव कोळी
4)अहमदनगर कातकरी, ठाकर, महादेव कोळी, वारली
5)नाशिक कातकरी, ठाकर, महादेव कोळी, वारली, पारधी
6)धुळे गोमीन, भिल्ल, पारधी, कोलम
7)नंदुरबार गोमीन, भिल्ल, पारधी, पावरा, कोलम
8)जळगाव भिल्ल, पावरा, कोलम
9)अमरावती कोरकू, ढानका, गोंड, कोलम
10)यवतमाळ शेरारी, पराधन, आंध
11)नांदेड आंध, गोंड
12)चंद्रपूर गोंड, कोया, हलबा
13)गडचिरोली माडिया गोंड, कोया, हळबा गोंड

क्षेत्र व लोकसंख्या

क्षेत्र व लोकसंख्या

तुम्ही आता येथे आहात :मुख्य पृष्ठआदिवासी उपयोजनाक्षेत्र व लोकसंख्या
छापा

    महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र 3,07,713 चौ.कि.मी.एवढे असून त्यापैकी 50,757 चौ.कि.मी.क्षेत्र आदिवासी उपयोजनेखाली येते. याचे प्रमाण 16.5 टक्के एवढे होते.  गेल्या तीन दशकांतील राज्याची लोकसंख्या व आदिवासी लोकसंख्या यांची तुलनात्मक आकडेवारी खाली देण्यात आली आहे.

जनगणना वर्ष राज्याची एकूण लोकसंख्या (लाखांत) आदिवासी लोकसंख्या (लाखांत) टक्केवारी
1971 504.12 38.41 7.62
1981 627.84 57.72 9.19
1991 789.37 73.18 9.27
2001 968.79 85.77 8.85
2011 1123.74 105.10 9.35
1981-1991 या दशकातील राज्याची एकूण लोकसंख्या व आदिवासी लोकसंख्या यांची तुलना केल्यास असे दिसून येते की, आदिवासी लोकसंख्येच्या वाढीची ही टक्केवारी कमी अधिक प्रमाणात सातत्याने 9.00 ते 9.20 टक्के एवढी राहिलेली आहे. तथपि, 2001 च्या जनगणनेनुसार प्रथमच 9.00 टक्केपेक्षा आदिवासी लोकसंख्या कमी झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत. राज्यात एकूण 35 जिल्हे आहेत आणि आदिवासींची संख्या मोठया प्रमाणात धुळे, नंदूरबार, जळगांव, नाशिक व ठाणे (सहयाद्री प्रदेश) चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती व यवतमाळ (गोंडवन प्रदेश) या पूर्वेकडील वनाच्छादित जिल्हयांमध्ये मुख्यत: अधिक आहे.)

1975-76 या वर्षी भारत सरकारने निर्देश दिल्याप्रमाणे ज्या गांवातील आदिवासी संख्या एकूण लोकसंख्येच्या 50 टक्क्याहून अधिक असेल त्या गांवाचा समावेश एकात्मिकृत आदिवासी विकास प्रकल्पामध्ये (आयटीडीपी) करण्यात आला. भारत सरकारने मान्यता दिलेले अशाप्रकारे 16 प्रकल्प होते. नंतर ज्या गांवामधील आदिवासींची लोकसंख्या 50 टक्केपेक्षा किंचितशी कमी होती. त्या गांवाचा समावेशही अशा एकात्मिकृत आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रामध्ये जमा करण्यात आला आणि अशी क्षेत्रे अतिरिक्त आदिवासी उपयोजना (एटीएसपी गट/प्रकल्प) म्हणून ओळखण्यात येऊ लागली. राज्य शासनाची मान्यता मिळालेली अशी 4 अतिरिक्त आदिवासी उपयोजना प्रकल्प क्षेत्रे आहेत. कालांतराने विखुरलेल्या स्वरुपातील इतर क्षेत्रामधील आदिवासींची संख्या लक्षात घेऊन आणि त्या ठिकाणी चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा विचार करुन या आदिवासी क्षेत्रामधील कामकाज पाहण्यासाठी सध्या  एकूण 29 प्रकल्प कार्यालये सुरु करण्यात आली आहेत.

दरम्यान काळात एकात्मिकृत आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रालगतच्या प्रदेशातही काही ठिकाणी आदिवासींची वस्ती असल्याचे निदर्शनास आले.  म्हणून सुमारे 10,000 लोकवस्तीच्या गांवामध्ये आदिवासींची संख्या 50 टक्कयाहून अधिक असेल तर अशा गांवाचा समावेश सुधारीत क्षेत्र विकास खंडामध्ये (माडा) करण्यात यावा व एकूण 5,000 लोकवस्तीच्या  दोन किंवा तीन गांवामध्ये 50 टक्क्याहून अधिक आदिवासींची संख्या असेल तर, त्या गांवाचा समावेश मिनीमाडा क्षेत्रामध्ये करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले. त्यानुसार  महाराष्ट्रामध्ये एकूण 43 माडा क्षेत्रे आणि 24 मिनीमाडा क्षेत्रे निर्माण करण्यात आली आहेत.

2001 च्या जनगणेनुसार राज्यातील आदिवासीपैकी एकूण सुमारे 49 टक्के आदिवासी आयएडीपी, माडा आणि मिनीमाडा क्षेत्रात राहतात व उर्वरित 51 टक्के आदिवासी या क्षेत्राबाहेर राहतात.

अनुसूचित जाती व जमाती - लोकसंख्या आणि प्रदेशिक विभागणी

अनुसूचित जाती व जमाती -

लोकसंख्या आणि प्रदेशिक विभागणी:

स्वातंत्र्योत्तर काळात वरील योजनांच्या साह्याने अनुसूचित जातींची प्रगती झाली आहे. या जातींच्या साक्षरतेचे प्रमाण १९३१ मध्ये असलेल्या १·९ टक्क्यांवरून १९६१ मध्ये १०·२७ टक्क्यांवर गेले. तसेच १९४४-४५ला शिष्यवृत्तिधारकांची संख्या ११४ होती, ती १९६४-६५ मध्ये ७५,१४६ झाली. १९४४-४५ सालापासून १९६४-६५ पर्यंत एकूण ४,६२,२९६ शिष्यवृत्त्या दिल्या गेल्या आणि त्याकरिता एकूण १९३०-७९ लक्ष रुपये खर्च झाले. या जातींच्या मुलांना तांत्रिक व धंदेशिक्षणासाठी संक्षणसंस्थांत राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.

सरकारी नोकरीतही अनुसूचित जातींसाठी राखीव जागा आहेत. अखिल भारतीय पातळीवर खुल्या स्पर्धांच्या जागांसाठी १२ १/२ टक्के जागा अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी राखून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या बाबतीत नोकरीसाठी नियुक्त केलेली कमाल वयोमर्दाही कायद्याने पाच वर्षांनी वाढविली आहे. वरच्या पादावरील बढतीसाठी या जातींसाठी १५ टक्के राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

अनुसूचित जातींच्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी शासनाने इतरही योजना आखल्या आहेत. मागासलेल्या वर्गांच्या घरबांधणीसाठी शासनाने पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांमधून एकूण सु. २० कोटी रूपये खर्च केले. काही राज्य सरकारांनी तर त्यांसाठी खास वसाहती बांधल्या. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही या कामी केंद्र सरकार व राज्य सरकार अनुदान देते.

अनुसूचित जातींसह सर्व मागासवर्गांच्या आरोग्यरक्षणार्थ शासनातर्फे सु. ४,००० दवाखाने व प्रसूतिगृहे १९६१ पर्यंत नव्याने उघडली आहेत. तसेच फिरते दवाखाने, मलेरिया-निर्मूलन-केंद्रे, बालक-कल्याण-केंद्रे वगैरे मार्गांनीही आरोग्यरक्षणार्थ प्रयत्न करण्यात येतात. औषधखरेदी व मोठ्या आजारातील औषधोपचार यांसाठीही शासन या लोकांना आर्थिक मदत देते. याशिवाय योग्य मुबलक पाण्याचा पुरवठा होण्यासाठी विहिरी खोदणे, तलाव बांधणे इ. बाबतीत केंद्र सरकार व राज्य सरकारे यांनी सु. ८ कोटी रुपये १९६१ पर्यंत खर्च केले आहेत. शासकीय प्रेरणेने स्थानिक स्वराज्य संस्थाही या बाबतीत कार्य करीत असतात.

अनुसूचित जातींसंबंधीच्या योजना कार्यान्वित होऊन, त्यासंबंधीच्या संविधानात्मक तरतुदी पूर्ण केल्या जात आहेत किंवा नाहीत व नसल्यास त्यासंबंधी कोणती उपाययोजना करावी, यासाठी केंद्रीय गृहखात्यात एक स्वतंत्र विभाग उघडला आहे. संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अन्वये राष्ट्रपतींनी अनुसूचित जाती-जमातींसाठी एका आयुक्ताची नेमणूक केली आहे. आपल्या नऊ उपआयुक्तांच्या मदतीने अशा जमातींच्या प्रगतीचा आढावा घेणे, नवीन सूचना करणे, खाजगी संस्थांना मदत देणे, घटक राज्यांतील या जातींच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या शासकीय व अशासकीय संस्थांना आर्थिक मदत व सल्ला देणे आणि त्यांचे हिशोब तपासणे इ. कामे तो करतो.

लोकप्रतिनिधींच्या सल्ल्याचा उपयोग अनुसूचित जातींच्या प्रगतीसाठी करून घेण्याकरिता केंद्र शासनाने ‘सेंटल अ‍ॅडव्हायसरी बोर्ड फॉर हरिजन वेलफेअर’ या मंडळाचीही स्थापना केली आहे. याशिवाय केंद्र व राज्य शासन निरनिराळ्या परिषदा व परिसंवाद भरवून अनुसूचित जातींच्या प्रगतीविषयी विद्वानांचा सल्ला घेत असते. अस्पृश्यतेची समस्या आणि अनुसूचित जातींचे आर्थिक व शैक्षणिक उन्नतीचे प्रश्न यांचा विचार करण्याकरिता एप्रिल १९६५ मध्ये श्री. एल्. इलियापेरूमल यांच्या अध्यतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने जानेवारी १९६९ मध्ये सादर केलेल्या अहवालात अनुसूचित जातींच्या शैक्षणिक व आर्थिक विकासावर भर देण्याची व त्यांच्या सर्ल प्रकारच्या सवलती चालू ठेवण्याची शिफारस केली आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात शासकीय ध्येयधोरणे व योजना आणि वाढत्या औद्योगिकीकरणाचे समाजरचनेवर झालेले परिणाम यांमुळे अनुसूचित जातींची प्रगती होण्यास साहाय्य झाले. तथापि अनुसूचित जातींची सामाजिक अपंगता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी नव्या मूल्यांचा स्वीकार, कर्तव्यदक्ष शासकीय अधिकारी व जागृत लोकमत यांचीही आवश्यकता आहे. असे तज्ञांचे मत आहे.

अनुसूचित जमाती : अनुसूचित जामातींना आदिवासी, मूलनिवासी, आदिम जाती व टोळ्या, वन्यजाती व गिरिजन अशी वेगवेगळी नावे आहेत. त्यांपैकी ‘आदिवासी’ हे नाव राष्ट्रीय परिभाषेत अधिक प्रचलित आहे.

लोकसंख्या आणि प्रदेशिक विभागणी:
१९६१ सालाच्या जनगणनेप्रमाणे भारतातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या २,९८,४६,३०० म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ६·८ टक्के आहे. या जमातींपैकी जवळजवळ निम्म्या जमाती मध्य प्रदेश (६६,७८,४१०), ओरिसा (४२,२३,७५७) आणि बिहार (४२,०४,७७०) या राज्यांत मिळून आहेत.

उत्तर आणि ईशान्य विभाग, मध्य विभाग व दक्षिण विभाग असे तीन भौगोलिक विभाग आदिवासी जमातींच्या बाबतीत स्थूल मानाने कल्पिलेले आहेत. उत्तर आणि ईशान्य विभागात उत्तरेस हिमालयाच्या पायथ्याशी पसरलेला डोंगराळ प्रदेश आणि ईशान्येस ब्रह्मदेशापर्यंत जाऊन भिडणारा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश येतो. या प्रदेशात बहुतांशी आदिवासींची वस्ती आहे. आसामपासून तिबेटपर्यंच्या भागात अका, डफला, मिरी आणि अपातानी या जमाती राहतात. गालोग, मिन्योंग, पासी आणि पदम या जमाती दीहोंगच्या दरीत राहतात. उत्तर व ईशान्य डोंगराळ भागात राहणाऱ्या इतर आदिवासी जमातींमध्ये गुरूंग, लिंबू, लेपचा, अबोर, मिशमी, सिंगफो, मीकीर, राभा, कचारी, गारो, खासी, नागा, कुकी आणि चकमा ह्या प्रमुख जमाती आहेत. त्यांपैकी काही जमातींमध्ये अनेक उपशाखा आहेत. नागा जमातीत रंगपान, कोन्याक , रेंगमा, सेमा, अंगामी आणि आओ ह्या मुख्य उपशाखा समजल्या जातात. उत्तरेस गंगा नदीच्या खोऱ्यापासून ते दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरलेला डोंगराळ प्रदेश हा मध्य विभागात मोडतो. या विभागात भारतातील बहुसंख्या आदिवासींची वस्ती आहे. त्या बिहार आणि आसपासच्या राज्यांत पसरलेली संथाळ जमात आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र आणि ओरिसा येथे पसरलेली गोंड जमात या सर्वांत मोठ्या आहेत. ह्यांची लोकसंख्या अनुक्रमे अदमासे २५ लक्ष आणि २० लक्ष (१९६१ ची शिरगणती) आहे. यांव्यतिरिक्त ओरिसा पर्वतराजीवर राहणारे खोंड, भूमीज आणि भुईया; छोटा नागपूरच्या पठारावर राहणारे मुंडा, ओराओं, हो आणि बिऱ्होर; विंध्य पर्वतराजीच्या परिसरात राहणारे कोल आणि भिल्ल आणि सातपुड्याच्या पर्वतराजीवर राहणारे कोरकू, आगरिया, परधान आणि बैगा ह्या जमाती मुख्य आहेत. गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान राज्यांतील आदिवासी जमाती या जमातींच्या मानाने अल्पसंख्य आहेत. गुजरातमध्ये भिल्ल, धोडिआ, दुबळा, कोळी, वाघरी, वारली इ. जमाती प्रमुख आहेत. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या परिसरातील आगरी, कातकरी, कोकणा, महादेव कोळी, ठाकूर, वारली, खानदेशातील भिल्ल आणि विदर्भातील गोंड ह्या जमाती मोठ्या आहेत. राजस्थानात भिल्लांची जमात सर्वत्र पसरलेली असून सर्वात मोठीही आहे. दक्षिण विभाग म्हणजे पश्चिम घाटापैकी दक्षिणेचा डोंगराळ भाग. यात दक्षिण कन्नड जिल्ह्याचे कोरगा, कूर्गमधील युरूव, वायनाडचे इरूलर, पणियन व कुरुंबा, कोचीन-त्रावणकोरमधील कादर, कणिकरन, मलपंतरम इ. जमाती येतात. निलगिरी पर्वतराजीत राहणारे तोडा, बदागा आणि कोटा हेही या विभागात येतात. चेंचू ही जमात या विभागात उत्तरेकडे आंध्र प्रदेशात राहते.

या तीन विभागांशिवाय बंगाल उपसागरातील अंदमान, निकोबार आणि लखदीव-मिनिकॉई बेटांवरही आदिवासी जमाती राहतात. त्यांपैकी  अंदमानातील ओंगी आणि निकोबारी या जमाती मुख्य आहेत.

हवामान सरासरी स्थिती

हवामान सरासरी स्थिती

मराठी मध्ये हवामान हा एखाद्या जागेचं किंवा प्रदेशाचं वातावरण दर्शविण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे. इंग्रजी मध्ये हवामान ह्या शब्दाची Weather आणि Climate अशी दोन वेगवेगळी भाषांतर करता येतील. ह्या दोन्ही भाषांतराचा अर्थ ही तितकाच भिन्न आहे. व्हेदर ह्या अर्थी वापरण्यात येणाऱ्या हवामान हा शब्द "वातावरणाची सद्य स्थिती" दर्शवितो. तर क्लायमेट ह्या अर्थी वापरण्यात येणारा हवामान हा शब्द "वातावरणाची किमान ३० वर्षे असलेली सरासरी स्थिती" दर्शवितो. हा लेख क्लायमेट शी निगडीत आहे.


जगातील विभागीय हवामान क्षेत्राचा नकाशा, मोठ्या प्रमाणात अक्षांशांद्वारे प्रभावित. विषुववृत्त पासून वरच्या दिशेने जाणारे झोन (आणि खालच्या दिशेने) उष्णकटिबंधीय, कोरडे, मध्यम, खंड आणि ध्रुव आहेत. या झोनमध्ये उपक्षेत्रे आहेत.
जगभरातील कोप्पेनवर आधारित हवामान वर्गीकरण
हवामान (क्लायमेट) ही हवामानाची दीर्घ-कालावधीची सरासरी असते, साधारणत: ३० वर्षांच्या कालावधीत त्या भागात असलेल्या वातावरणाची सरासरी असते. [१][२] तापमान, आर्द्रता, वातावरणाचा दाब, वारा आणि पर्जन्यवृष्टी ही सामान्यत: हवामानासाठी मोजली जाणारी काही गुणके आहेत.

व्यापक अर्थाने हवामान (क्लायमेट) म्हणजे हवामान प्रणालीतील घटक ज्यात पृथ्वीवरील समुद्र आणि बर्फ यांचा मुख्यतः समावेश होतो. [१] एखाद्या स्थानाचे हवामान (क्लायमेट) त्याच्या अक्षांश, भूभाग आणि उंची तसेच जवळपासचे जल संस्था आणि त्यांच्या प्रवाहांनी प्रभावित होते. अधिक सामान्यत: प्रदेशातील हवामान व्यवस्थेची सामान्य स्थिती हिच त्या प्रदेशाचे "हवामान" दर्शवते.

सरासरीनुसार आणि वेगवेगळ्या चलांच्या विशिष्ट श्रेणी, सामान्यतः तापमान आणि पर्जन्यमानानुसार हवामानाचे वर्गीकरण केले जाऊ शकते. सर्वाधिक वापरली जाणारी वर्गीकरण योजना म्हणजे कोप्पेनवर आधारित हवामान वर्गीकरण पद्धत. इ.स. १९४८ पासून वापरल्या जाणाऱ्या थॉर्नथवेट सिस्टम [३] मध्ये तापमान आणि पावसाच्या माहितीसह बाष्पीभवनांचाही समावेश होतो आणि जैविक विविधता आणि हवामान बदलावर त्याचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी उपयोग केला जातो

. बर्गरन आणि स्थानिक सिनोप्टिक वर्गीकरण प्रणाली क्षेत्राचे हवामान परिभाषित करणाऱ्या वायु जनतेच्या उत्पत्तीवर लक्ष केंद्रित करते.

पॅलेओक्लिमाटोलॉजी म्हणजे प्राचीन हवामानाचा अभ्यास. १९ व्या शतकापूर्वी हवामानाबद्दलचे फारच थोडे निरिक्षण उपलब्ध आहे. पॅलेओक्लीमेट्सचा प्रॉक्सी व्हेरिएबल्सद्वारे म्हण्जे लेक बेड्स आणि बर्फ कोरमध्ये आढळलेल्या गाळासारखे नॉन-बायोटिक पुरावे आणि वृक्ष रिंग्ज आणि कोरल सारख्या जैविक पुराव्यांच्या आधारावर अनुमान लावला जातो. हवामान मॉडेल भूत, वर्तमान आणि भविष्यातील हवामानाचे गणितीय मॉडेल आहेत.

हवामान बदल विविध घटकांमधून मोठ्या आणि लहान कालावधीत होऊ शकतो. अलीकडील जागतिक तापमानवाढ ग्लोबल वार्मिगच्या नावाखाली चर्चेत आहे. ग्लोबल वार्मिंगचा पुनर्वितरणामध्ये परिणाम होतो. उदाहरणार्थ, "सरासरी वार्षिक तापमानात ३ डिग्री सेल्सियस बदल हा अक्षांश (समशीतोष्ण प्रदेशात) किंवा ५०० मीटर उंचावरच्या अंदाजे ३०० - ४०० कि.मी.च्या आइसोथर्म्समधील बदलांशी संबंधित आहे. म्हणूनच प्राण्यांच्या जाती बदलत्या हवामान क्षेत्राला प्रतिसाद म्हणून उंच जागी स्थलांतरित होतात..

हवामानशास्त्र

हवामानशास्त्र

हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र (इंग्लिश:
Meteorology, मीटिअरॉलजी ;) असे म्हणतात.

वातावरणातील या घडामोडीचे निरिक्षण करून त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा होतो.

इतिहास संपादन करा
इसवी सन पूर्व सातव्या शतकात बॅबिलॉनमध्ये ढगांच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जात असे दिसून येते. ग्रीस, चीन व भारतात विविध नैसर्गिक निरीक्षणांचा व खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जात असे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील निरिक्षणांनुसार हस्त, मृग नक्षत्राच्या राशीतील स्थानानुसार पाऊस कधी पडणार, याचा अंदाज घेतला जात असे. परंतु हे ठोकताळे दर वेळी अचूक असतील असे घडत नसे. शिवाय ज्योतिषाच्या अभ्यासानुसार त्यात फरकही होण्याची शक्यता असे.

इ.स. १९२२ मध्ये लुइस फ्राय रिचर्डसन या हवामान शास्त्रज्ञाने अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धती सुचवली. या पध्हतीनुसार निरिक्षणांच्या सांख्यिक विश्लेषणानुसार सारखेपणा शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तविता येऊ लागले. मात्र ही आकडेवारी मोठी असत असे.

सद्य स्थिती संपादन करा
संगणकाच्या शोधाने हवामानशास्त्राचा अभ्यास सुकर झाला. हवामान निरीक्षणांचा उपयोग करून, अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धतीने गणिते करून, त्यानुसार अंदाज वर्तविण्याचे काम संगणक करू लागले. या नुसार नकाशे तयार करण्याचे कामही संगणक करू लागले.

साधने संपादन करा

वाऱ्याचा वेग मोजण्याचे साधन - अ‍ॅनोमिटर
हवामान निरीक्षणासाठी अनेक प्रकारची साधने वापरली जातात. या साधनांच्या मदतीने हवामानविषयक घटनेचे भौगोलिक स्थान, तिची तीव्रता, वेग, प्रकार, तिच्यामुळे होणारे तापमानातील बदल अशा निरीक्षणांची नोंद केली जाते. ही उपकरणे जमीन, समुद्र आणि वातावरण अशी तिन्ही ठिकाणी निरिक्षणासाठी नियुक्त केली जातत.

जमिनीवरील साधने - ही प्रामुख्याने हवामान वेधशाळांमध्ये असतात.
रडार - ठिकठिकाणी उभारलेले रडार रेडिओलहरींच्या साहाय्याने विविध प्रकारच्या वृष्टीचा- पाऊस, गारा, बर्फवृष्टी इत्यादींचा अभ्यास करतात. यातील पल्स डॉपलर प्रकारच्या रडारमुळे वाऱ्याचा वेग व दिशा यांची नोंद करता येते.
समुद्राच्या पाण्यावरील साधने - समुद्राच्या पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या फुग्यांसारख्या तरंगणाऱ्या वस्तूंना बांधलेली उपकरणे पाणी व वारा या दोन्हींच्या वर्तणुकीची नोंद करतात.
वातावरणात सोडली जाणारी साधने - फुग्यांच्या साहाय्याने पृथ्वीच्या वातावरणात सोडले जाणारे रेडिओ संच तेथील विविध घटकांची निरीक्षणे रेडिओ-लहरींद्वारे पृथ्वीवर पाठवतात. अवकाशात पृथ्वीप्रदक्षिणा करणारे काही मानवनिर्मित उपग्रह खास हवामान निरीक्षणासाठी असतात व बदलांवर लक्ष ठेवून ते बदल कळवत राहतात. या शिवाय चक्रीवादळांचा अभ्यास करण्यासाठी त्या हवामानाच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावरून घिरटय़ा घालत नोंदी करणारी खास विमाने सोडली जातात. ही विमाने म्हणजे एक प्रकारच्या उडत्या हवामान वेधशाळा असतात.
वरील सर्व प्रकारे केलेल्या निरीक्षणांचा उपयोग हवामान साच्या मध्ये (वेदर मॉडेल्स) करून नजीकच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज वर्तविला जातो.

हवामान मॉडेल
हवामानाची मॉडेल करण्यासाठी प्रवाही पदार्थाच्या हालचालींविषयी समीकरणे तयार केली जातात. या समीकरणांच्या आधारे विविध स्थितीतील हवामानाचे संगणकीय साचे बनविले जातात.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...